Skip to main content

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 06/10/2014 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 35994
प्रतिक्रिया 92

प्रतिक्रिया

In reply to by कंजूस

कंजूसराव, पुण्याहून लोणावळ्याला सहज जाऊन यायचे असेल ट्रेनने, तर बरे जेवणगृह सांगता येईल का? म्हणजे लोणावळ्याला जाणे, जेवणे, चिक्की खरेदी, परत ट्रेनने पुणे!

In reply to by रेवती

रेवती ,आम्हाला इकडून डोंबिवलीहून एक दिवसीय ट्रीपसाठी लोणावळा फार सोयिचे वाटते रे० रेझ०करून थोडी गारहवा खाऊन वेळेत(X traffic) परत येण्याची खात्री असते. खंडाळा राजमाची पॉईंट अथवा लायन/टायगर पॉईंट ला जाऊन येतो. जेवणाच्या 'गुजराती थाळी' मिळणाऱ्या एका हॉटेलात नेहमी रांग पाहतो परंतू तिकडे जाण्याचा योग आला नाही. नाश्त्यासाठी मुं०पुणे रोडवर एक दोन आहेतच पण कुमारप्लाझा महागडा आहे. चिक्कीसाठी काही नैशनल आणि बाकी सारे मगनलाल. नीरा चांगली मिळते. तुमच्या पुण्याहून इकडे येण्यास लोणावळा लोकल आहेतच. परतताना मात्र पावणे चार नंतरच्या गाड्यांना फार गर्दी असते.पुणे गारच असल्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्त इकडे येण्याचे प्रयोजन नसावे हे समजू शकतो.

In reply to by प्रचेतस

कुठेही जायला मी तयार आहे.. भाजे लेणी जर डोंबोलीहून एका दिवसांत होत असतील तर फार उत्तम... मी सहकुटुंब येईन...

In reply to by मुक्त विहारि

एका दिवसांत अगदी निवांतपणे होतात. तुम्ही तिकडून इंद्रायणीने लोणावळा गाठा, तिथून कनेक्टिंग लोकलने पुढचेच स्टेशन मळवली. मळवलीतून जेमतेम २०/२५ मिनिटाच्या वाटचालीने भाजे गाव. अगदी निवांतपणे तासाभरात लेणी पाहून दुपारी १ वाजेपर्यंत परत लोणावळा गाठता येते.

In reply to by मुक्त विहारि

1)भाजे लेणी +लोहगड २)भाजे +विसापूर असे मी एका दिवसात केले आहे. परंतू लेणी /गड असे विषय काढले की बरेच जण गळतात अथवा ऐनवेळी फार फरफट वाटली की दोन गट पडतात म्हणून मी हे सुचवले नव्हते. मी येण्यास तयार आहे. लायन/टायगर पॉइंट सुध्दा लोणावळ्याहून अगदी सहज होते {हातपाय न हालवता} .

In reply to by कंजूस

कंजूस साहेब लोणावळ्याहून परत कसे यायचे ते सांगा. कारण डेक्कन एक्सप्रेस/ कोयना ला लैच गर्दी असते. दुसरा मार्ग काय आहे? दिवस भर फिरून झाल्यावर उभे राहून प्रवास करायला झेपत नाही.

In reply to by सुबोध खरे

येण्या जाण्या साठी खाजगी गाडी भाड्याने घेता येईल कुठल्या तारखेचा हा कट्टा म्हणावा ?

In reply to by सुबोध खरे

खरं आहे. शनिवारी पुण्याला सकाळी जाण्याची आणि रविवारी चार नंतर मुंबईला परत येण्याची रे० रेझ० फार अगोदरच संपतात आणि आपण कट्टा इतक्या अगोदर ठरवू शकत नाही. फारतर कर्जतला गाडी सोडून लोकल धरु म्हटले तर त्या ६.२०च्या खोपोलीहून येणाऱ्या लोकलमध्ये डेककनच्या चौपट गर्दी असते.सर्व रविवारी हीच रड असते परंतू रस्त्याच्या संध्याकाळच्या बेभरवशाच्या प्रवासापेक्षा रेल्वेची गर्दी परवडते. दिवाळी नसतांना उद्यान इक्सप्रेची स्लीपर तिकीटे आम्ही काढतो. लाल डब्याचा विचारही करू नका बऱ्याचवेळा येताना लोणावळ्यात येत नाहीत.

माफ करा दोस्तहो. कट्ट्याला हजेरी लावायची तीव्र इच्छा आहे. पण दुर्दैवाने अनेक परस्परावलंबी कामे एकमेकांच्या (आणि पर्यायाने माझ्या) तंगड्या ओढत आहेत. असो. पण तुम्ही कट्टा करा आणि मिपावर वर्णन लिहा. वाचूनच समाधान मानू. नोव्हेंबरात नक्की येऊ शकेन (असे आत्ता वाटते आहे.). सर्व कट्ट्यांना शुभेच्छा.

पेठकर काका आल्यावर ते सांगतील आणि त्यांच्या सोयीची जागा ठरवूच. खरं म्हणजे नंदीचा कंटाळा आलाय. मला जरा मोकळं फिरायला बरं वाटतं. पुण्याकडच्या लोकांना लोणावळा सोयिस्कर आहेच. जातांना गाडीतही गप्पा होतीलच. डॉक्टर मुलुंडहून रविवारी येतील असे वाटते.भाते पण येतील बहुतेक. सर्व काही जमल्यास लोणावळा भौगोलिक मध्यवर्ती ठिकाण व्हायला हरकत नसावी. सांस्कृतिक डोँबिवली आणि लौकिक पुणे आहेच.

In reply to by कंजूस

आणि चार घटका मौज-मजा करायला... त्यावेळी आपल्याला कुणाचीही आडकाठी नको असते. शिवाय एक ६/७ माणसे ऐसपैस बसतील अशी एखादी निवांत जागा आणि पदार्थांचे रास्त भाव आणि दर्जा. सध्या तरी डोंबोलीत असे "नंदी पॅलेस" हेच एकमेव हॉटेल मला ठावूक आहे. तुम्हाला दुसरे कुठले हॉटेल ठावूक असेल तर तसे सांगा... मी बर्‍याच वेळा एखाद-दुसरी बियर पीत २/३ तास नंदीत बसलो आहे.मला कुणीच त्रास दिला नाही.डोंबोलीतले इतर हॉटेल-वाले लगेच मागे लागतात.शिवाय स्टेशन-जवळची सगळीच हॉटेल्स नंदी पेक्षा किमान २५% जास्त भाव लावतात आणि पदार्थांचा दर्जा पण नंदी सारखाच असतो. बादवे, नंदीचा मालक माझ्या मित्रपरीवारात तर नाहीच शिवाय नातेवाईक पण नाही.कट्ट्याच्या बहूतांशी सगळ्या गरजा पुर्ण करणारे, ते एक चांगले ठिकाण मात्र नक्कीच आहे.अशाच कट्ट्याच्या गरजा, आपल्या पळसदरीच्या हॉटेलात पण, पूर्ण झाल्या होत्याच की.

उद्याच्या डोंबिवलीच्या नंदी पैलेस मध्ये कट्ट्याला कोण कोण येत आहेत? मुक्त विहारी, भाते , कंजूस , येणार आहेत. मी मुलुंड वरून रात्री आठ वाजता निघेन कुणाला हि माझ्या बरोबर रेल्वेने यायचे असेल तर सुस्वागतम. माझा भ्रमणध्वनी ९८१९१७००४९. ज्यांना जायचं आणि यायचं कसं याबद्दल संभ्रम असेल त्यांनी निर्धास्तपणे यावे. (मी तीर्थ प्राशन करत नाही तेंव्हा अशा लोकांनी केवळ ओलि पार्टी म्हणून येणार नाही असेल तर फेरविचार करायला हरकत नाही)

निमित्त बाहेर जायचे असल्याने मला नंदी पॅलेसला यायला जमणार नाही. :(