ब्राह्मणद्वेष
ब्राह्मणद्वेष
=====
प्रत्येक व्यक्ती लहान वयात जास्तीतजास्त संस्कारक्षम असते, त्याप्रमाणे लहान आकारातला समूह हा बदलांना पटकन सामोरा जाऊ शकतो. त्यात ब्राह्मण मूळात एक नसल्याने (सोलापूरकरसारख्या प्रकरणात ते ठळक दिसते.), त्यात ब्राह्मणत्व निश्चित काय हे आज सांगता येत नाही, त्यामुळे आता ब्राह्मणांचे बरेचसे प्रश्न हाता बाहेर गेल्यात जमा आहेत. दे हॅव लॉस्ट देअर पोझिशन इन सोसायटी...आज ब्राह्मणेतर समाज जसा "घटनेवर" निष्ठा ठेवतो (कारणे स्पष्ट आहेत), तसे ब्राह्मण "घटने"बद्दल आत्मीयतेने बोलताना दिसत नाहीत...
ब्राह्मणांनी समाजातील "पात्र" व्यक्तीना जानवी वाटणे (ब्राह्मणीकरण) चालू ठेवले असते तर ब्राह्मणविरोध आटोक्यात राहीला असता. जातीच्या व्याख्येत असं काय आहे की ती बदलता येत नाही? पण अनलेस द माईण्ड इज डीकण्डीशण्ड इट कॅन नॉट फाईण्ड इनोव्हेटीव्ह सोल्युशन्स! कटू सत्य आहे.
पण मराठा समाजाने जसे हुंडाबळीनंतर मोठे निर्णय घेतले तसे ब्राह्मणांनी समाजाच्या ऐक्यासाठी/स्वास्थ्यासाठी मोठे निर्णय घेतल्याचे माझ्या आठवणीत नाही.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे चाणक्याला आयकॉन करायचे सोडून परशुरामासारख्या आक्रस्ताळी व्यक्तीला आयकॉन बनवले. २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय करूनही क्षत्रिय संपले नाहीत - हा परशुरामाचा पराभव आहे. ब्राह्मणेतरांचे आयकॉन त्यांना जी ताकद देतात, तशी ताकद परशुराम आजच्या ब्राह्मणांना देतो का? माझे उत्तर नाही असे आहे.
सध्या गोत्र, सनातन सारख्या निरर्थक/व्याख्यारहित कल्पनांच्या ओझ्याखाली दबलेला ब्राह्मण नवा विचार करण्यास असमर्थ आहे. तो आपल्याच समाजाला दिशा देण्यास, ब्राह्मणद्वेष संपविण्यास असमर्थ आहे.
सध्याच्या काळात जुन्या कालबाह्य कल्पनांची पुनर्स्थापना अशक्य आहेच, पण ते न समजल्यामुळे नव्या कल्पना पण रूजणे कठीण आहे.
नुकतेच माझ्या घराचे वॉटरप्रुफींगचे काम केले तेव्हा मी ब्राह्मण व्यावसायिकाना प्राधान्य द्यायचे ठरवले होते. एकाही ब्राह्मण व्यक्तीने मला योग्य मोजमाप, दर आवश्यक ती माहिती पुरवली नाही. शेवटी मोठ्या अनिच्छेने ते काम ब्राह्मणेतराकडून करू घेतले. त्याने मोजमाप किती प्रामाणिकपणे घेतले हा माझा महत्त्वाचा निकष होता. मग मी त्याला खुष होऊन कबूल केलेल्या रकमेशिवाय बक्षिस पण दिले.
असो. पण यातून ब्राह्मण काही बोध घेतील असे वाटत नाही.
--राजीव उपाध्ये
संदर्भ - https://www.youtube.com/watch?si=YrVrFrbDk1B3M_aH&v=gIh594r5sZM&feature=youtu.be
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बराचसा दिशाहीन आणि हुकलेला
ब्राह्मणांमधले सुधारक हे
फक्त लग्न संमारंभातील सुधारणा
जातीच्या व्याख्येत असं काय
<लेदर इंडस्ट्री मधील
<पण जात्यांतर करता येत नाही.>
जात ही अंधश्रद्धा आहे ही
<यासाठी अंनिस काय करते? असा
मुळात ब्राम्हणात जातपंचायत
आय्०आय्०टी० चा इथे सर्रास
आपले आरवणे ऐकण्यासाठीच सूर्य
कोंबडे जगात काही कमी नाहीत.
बराचसा दिशाहीन आणि हुकलेला लेख आहे.
लेख पटला नाही.
<मराठा जातीतल्या लोकांनी अमुक
जात कशी काम करते
ब्राह्मणांनी समाज म्हणून
युयूत्सुजी ही दोन विधाने समजली नाहीत
श्री० मारवा
हम करें तो कॅरॅक्टर ढिला....
आय आय टी मधल्या माणसाने
बाकी लेखात फक्त
द्वेष?
<ब्राम्हण कुणाचाही द्वेष करत
भारतात सर्वात जास्त सुधारलेला
आपलं मत क्षणभर ग्राह्य मानलं
आर्य शब्दांचा जाती समूहाशी
आपलं मत क्षणभर ग्राह्य मानलं
दुरुस्ती
लेखाचे शीर्षक आणि मजकूर अगदी
आत्मविरोधी कुतूहल धरा...!
सर्वात महत्त्वाचे म्हणजे
तुमच्या ब्लॉगवरच्या कथा
(आज ब्राह्मणेतर समाज जसा
श्री० खटपट्या
दुरुस्ती
ह्म्म!!
शेवटी सगळ्यांना फाट्यावर मारुन मी एका भय्या कडुन ते काम करुन
जात पात ही पुर्वी समाजाला
श्री० राजेंद्र मेहेंदळे
अरे बावळट माणसा. "आता
ब्राह्मणांनी जात विसर्जित