बाळ टाळ्या वाजवायला लागलं, की घरातल्या आजी-आजोबांपासून, ते बाळाच्या मोठ्या भावंडापर्यंत सगळेच नकळत विठूनामाचा गजर सुरू करतात
खरेच हे मराठमोळे वैशिष्ट्य आहे.
अकृत्रिम भाषेमुळे वाचायला मजा आली.
अभिनंदन. धन्यवाद.
आता वाटतं, आमचा तेव्हाचा तो निर्णय खरच मराठी `जगवण्या'साठी होता? का ती आमच्या पराभवच्या भीतीची प्रतिक्रिया होती? मराठी माणूस म्हणून मराठीच्या भविष्याची चिंता करताना, अशाच एखाद्या भीतीचं अनामिक ओझं तर आपण वागवत नसू ना? ते झुगारून देता येईल, असा विश्वास मराठी घरात रुजला, तर मराठमोळ्या घरांवरचं मोठ्ठं दडपण कमी होईल.
अमेरीकेत नोकरी करायची ... हे साधारणतः १०० टक्के सदाशिव पेठी... ६०-७० इतर शहरातील ... व साधारणतः १०-१५ टक्के उर्वरीत मराठी माणसांचे ध्येय वा इच्छा असते
अर्थात सगळेच ते पुर्ण करतात असे नाही
अमेरीकेत जावुन गो-यांचे अंतर्वस्त्रे धुणारी मंडळी इकडे येवुन जो तमाशा करतात त्यामुळे आमचा येथील मराठी बांधव न्युनगंडाने स्वतःला कमी लेखुन आपल्याला शक्य असलेल्या गोष्टी करायच्या सोडुन पळत्याच्या मागे लागतो
त्यातच भर म्हणजे संगणकाधारीत सेवा पुरवठादारांनी जो नंगा नाच ( अक्षरशः नंगानाचच पटत नसेल तर गुगल वर पुना बीपीओ न्युड गर्ल असा शोध घ्या) चालवला व फक्त इंग्रजी फाड फाड बोला अक्कल नसली तरी चालेल हाजारो रुपये पगार ... त्यामुळे पुन्हा न्युनगंड...
पण निराश होवु नका
अमेरीकेची वाट लागत आहे
समाज रचनेत होणारा बदल नीट बघा
१० वर्षाच्या आत अमेरीका संपुर्ण संपणार (टाळ्या)
व्याकरण शुन्य अर्धवट लोकांची गुलामी पर्वाची कटु आठबण पुन्हा पुन्हा जागृत करणारी आंग्ल भाषा या भरत भुमीवरुन संपुष्टात येणार(प्रचंड टाळ्या)
(ज्योतिषी) नाना
१० वर्षाच्या आत अमेरीका संपुर्ण संपणार (टाळ्या)
व्याकरण शुन्य अर्धवट लोकांची गुलामी पर्वाची कटु आठबण पुन्हा पुन्हा जागृत करणारी आंग्ल भाषा या भरत भुमीवरुन संपुष्टात येणार(प्रचंड टाळ्या)
असे खरोखर झाले तर मजाच आहे.. प्रचंड टाळ्या..
मनस्वी
१.सर्विस प्रोवायडर्स = बीपीओ हे समीकरण नाही; त्यात इतरही बरेच काही अंतर्भूत आहे, याचा विचारही करून पहा, ही नम्र प्रार्थना.
२. हे वाचा.
(प्रार्थनार्थी)बेसनलाडू
श्री. दिनेश५७,
खरोखर 'मराठी माणूस' ह्या विषयावर पुन्हा पुन्हा लिहीणे म्हणजे शिळ्या कढीला उत आणणेच म्हणावे लागेल. पण तोही एक अस्सल मराठी पणाच आहे. ढिगभर चर्चा करायची ....कृती शून्य.
राजकिय पक्षांनी (मुळात शिवसेनेने) मराठी माणसाच्या मनांत 'तू भूमीपुत्र आहेस' हे सारखे सारखे सांगून त्याच्या तथाकथित 'हक्कांची' जाणीव त्याला करुन दिली. काही प्रमाणात त्याला शेफारुन ठेवलं. हक्कांसाठी भांडायला शिकवलं. तो भांडायला (लगेच) शिकला आणि भांडखोर म्हणून बदनामही झाला. परंतु, मराठी माणसाला घरच्यांनी, शिक्षकांनी, मित्रांनी, साहित्यिकांनी, राजकारण्यांनी स्वउन्नतीसाठी काय करावे, स्वतःमध्ये काय काय बदल करणे आवश्यक आहे, रोजच्या व्यवहारातील स्पर्धेत टिकण्यासाठी, पुढे जाण्यासाठी कुठली मुल्ये जोपासावीत, कुठली कौशल्ये आत्मसात करावीत, आपल्या उन्नतीच्या आड येणारे कुठल्या रुढींचे, विचारांचे जोखड फेकून द्यावे हे नाही शिकवले. कोणी शिकवले नाही म्हणून मराठी माणूसही ते शिकला नाही.
कौशल्याचा, आत्मविश्वासाचा अभाव, संकुचित क्षेत्रात वावरण्याची सवय, अल्पसंतुष्ट स्वभाव, पारंपारिक संस्कारांत न झालेले बदल ह्या सर्व गोष्टी मराठी माणसाच्या 'मागे' राहण्यात आहेत.
वाहत्या जगात प्रवाहा बरोबर राहण्यासाठी स्वतःमध्ये आमुलाग्र बदल करणे आवश्यक आहे. इंग्रजी भाषा जरूर आवश्यक आहे पण ते हुशारीचे द्योतक नाही. अमेरिकेत नोकरी मिळविणे चांगलेच आहे पण ते 'स्वउन्नतीचे' परिमाण नाही.
वृत्तीतील सकारात्मक बदल, कुठल्याही न्यूनगंडाचा परित्याग, मनःचक्षू उघडे ठेवून सामाजिक बदलांचे आकलन आणि स्पर्धेला न भिता तोंड देण्याची सवयच मराठी माणसाला पुढे नेईल.
१० वर्षाच्या आत अमेरीका संपुर्ण संपणार (टाळ्या)
व्याकरण शुन्य अर्धवट लोकांची गुलामी पर्वाची कटु आठबण पुन्हा पुन्हा जागृत करणारी आंग्ल भाषा या भरत भुमीवरुन संपुष्टात येणार(प्रचंड टाळ्या)
असे खरोखर झाले तर मजाच आहे.. प्रचंड टाळ्या..
हा विचार स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखा आहे.
अमेरिकन क्लायंट च्या कामावर चालण्यार्या कंपनीत काम करणारा...
आणे त्यातून देशाला परकिय चलन मिळवुन देणारा प्रामाणीक आय टी हमाल
.............................................................विजुभाऊ
फार चांगली बाब नाही. कारण आता जगाची अशी एक अर्थव्यवस्था होऊ पहाते आहे. एकीकडचे पडसाद दुसरीकडे तितक्याच तीव्रतेने उमटतात हे आपण सर्वच स्टॉकमार्केटच्या माकडउड्यांवरुन जाणतो. त्यामुळे अमेरिका डुबली तर छान, यूरोप डबघाईला आला तर त्याहून वा वा! म्हणणे कोतेपणाचे ठरेल. आज तिथे असलेला जाळ उद्या इथे येऊ शकतो हे विसरु नये. तेव्हा 'एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ' हेच शेवटी खरे!
चतुरंग
फार महत्त्वाचे आहे.
भारतीय सॉफ्टवेअर तज्ञ फक्त कारागिरी करताहेत. मूलभूत संशोधनाची आपल्याकडे वानवा आहे. आयुकामधील संशोधनाच्या ६ पैकी ४ जागा गेल्या वर्षी रिक्त होत्या. हे खरे असेल तर आपण पाहातो ती सूज आहे. सौष्ठव नव्हे.
अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.
प्रतिक्रिया
हम्म!
किती साधी गोष्ट ........
आता वाटतं,
खरोखर
टाळ्या वाजवण्यापूर्वी
मराठी माणूस....
हा विचार स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखा आहे.
अशी कुठलीही अर्थव्यवस्था टोकापर्यंत धोक्यात येणे
मा. माजी राष्ट्रपति कलामसाहेबांचे मत .......