मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शंभर अदाणी हवे आहेत…

सुधीर मुतालीक ·

आणखी १०० अडाणी तुम्हां हवेत कशाला ? (म्हणजे आतचे १ + आणखी १०० = टोटल १०१) काय करणार तुम्ही १०१ अडाण्यांच ? तुम्हाला असं म्हणायचं का की जर १ अडाणी म्हणून १ पोर्ट, १ विमानतळ, १ हायवे, १ कोळसा खाण.... तर १०० अडाणी म्हणून १०० पोर्ट, १०० विमानतळ, १०० हायवे , १०० खाणी ?? असं जर असेल तर, त्या १०० पोर्ट, १०० विमानतळ, १०० हायवे , १०० खाणी साठी "भागभांडवल" येणार कोठून ? उभारणार कसे ?

In reply to by आग्या१९९०

अनंतफंदी 07/02/2023 - 13:50
फारच उत्तम माहिती मिळाली. अदानींची फसवेगिरी आहेच. पण भारतात अजुन असे सगळे उद्योग करणारे ईतर समूह नसतील कशावरुन? हे सगळे प्रकरण ईतके गुंतागुंतीचे आहे, की जिथे सरकारी ऑडिटर्सनाही समजायला वेळ लागेल तिथे सामान्यांची काय कथा? एक मात्र खरे!!अदानी समूहाने हिंडेनबर्गवर बदनामीचा खटला किवा ईतर कायदेशीर कारवाई लवकर करावी लागेल तरच त्यांची प्रतिमा टिकेल, अन्यथा हिंडेन बर्गच्या आरोपांनाच दुजोरा मिळाल्यासारखे होईल. अजुन एक--- सुधीर भाऊंचा लेख वाचुन ह्या प्रकरणाला अशीही एक बाजु असेल असे नक्कीच वाटुन गेले.

कंजूस 07/02/2023 - 14:41
तर यांचा तारणहार कोण यांच्याशी काहीही संबंध नाही. वालचंद हिराचंद यांनी ब्रिटिश बोट कंपन्यांना कशी फाईट दिली तेसुद्धा ब्रिटिश राज्य असताना हे कुणी वाचलं आहे का? तेव्हा कुठे तारणहार होते?

सरकारी कंपन्यांबरोबर काम करताना लफडी करणे अशक्य आहे, तिथल्या व्यवस्था भयानक गुंतागुंतीच्या आणि स्वच्छ आहेत.
हे कुठल्या सरकारी कंपन्याबद्दल बोलत आहात कळेल का? माझाही संबंध सरकारी व्यवस्थेशी येतच असतो थोडक्यात सांगायचे तर जिल्हा परिषद, सावजनिक बांधकाम खाते, एमआयडीसी वगैरे वगैरे. त्यामुळे 'भयानक गुंतागुंतीच्या'शी सहमत आहे पण स्वच्छ!
घरी बसल्या बसल्या लिंबाचे लोणचे खोचलेला बशीभर गोड शिरा खात खात हे मोदी आणि अदाणी देशाला लुटताहेत अशी बडबड करणाऱ्यांनी न्यायव्यवस्थेवर आणि लोकशाहीवर शक्य असेल तर विश्वास ठेवावा.
अनुभवाचे बोल आहेत, न्यायव्यवस्थेवरचा विश्वास केव्हाच उडून गेला आहे. लोकशाहीवरही फार काळ टिकेल असं वाटत नाही. बाकी, अशी दिशाभूल करणारे लेख दोन्ही बाजूने चालू असतात त्यामुळे चालू द्या! सं - दी - प

मित्रहो 07/02/2023 - 16:36
खूप रोखठोक आहे. इतका की उपहास आहे का असे वाटावे.
दाढीचे खुंट वाढवून खांद्याला झोळी लटकवून अदाणीच्या नावाने कंठशोष करणाऱ्या समस्त महारथीपैकी एकालाही पोर्ट बांधता येत नसेल काय ? नाही. अशा बोलघेवड्यांनाच काय पण आपल्या कल्पनेतल्या भलाभल्याना असे प्रकल्प हाती घेण्याची आणि ते पूर्ण करण्याची कुवत नसते.
अदाणी नको असेल तर एखादा प्रकल्प उभा करण्याचा धंदा करावा किंवा जे धंदा करीत आहेत त्यांना आपल्या सर्व ताकदीनिशी मोठे करावे.
हे दोन्ही आवडले सरकारी व्यवस्था गुंतागुंतीची असते यात शंका नाही पण स्वच्छ असते यावर सामान्यांचा विश्वास बसणे कठीण आहे. सध्यातरी अदाणींविषयी जो गोंधळ सुरु आहे तो व्यवसायाविषयी नाही तर समभागाच्या किंमतींविषयी आहे. देशाला झोलावाला नाही तर उद्योगपतींची, छोट्या व्यावसायिकांची गरज आहे यात काही दुमत नाही.

सौंदाळा 07/02/2023 - 16:36
+/- शंभर अदानी हवे आहेत याच्याशी सहमत सरकारी कंपन्यांबरोबर काम करताना लफडी करणे अशक्य आहे, तिथल्या व्यवस्था भयानक गुंतागुंतीच्या आणि स्वच्छ आहेत - असहमत माझा किंवा जवळच्या नातेवाईकांचा सरकरी कंपन्यांशी जो काही संबंध आला आहे त्यावरुन त्यांना अजिबात स्वच्छ म्हणणार नाही.

कॉमी 07/02/2023 - 16:56
तद्दन फालतू लेख. एव्हढे लिहिण्यापेक्षा डोळे मिटून तिरंगा हातात घेऊन छाती बडवतानाचा फोटो टाकला असता तरी चालले असते.

In reply to by कॉमी

Trump 07/02/2023 - 22:44
तद्दन फालतू लेख.
सहमत
एव्हढे लिहिण्यापेक्षा डोळे मिटून तिरंगा हातात घेऊन छाती बडवतानाचा फोटो टाकला असता तरी चालले असते.
असहमत

लेखातील काही मतांशी अमान्य आहे . पण तेच तेच लिहित बसत नाही आता. पण देशात व्यवसाय वृध्दी व्हाय्लाच हवी ह्यात शंका नाही . पण ती अदानीनेच का करावी ? टाटा , बिर्ला , अंबानी , बजाज, पुनावाला हीच आडनावे का ? मान्य आहे की इथे महाराष्ट्रात ( किमान पश्चिम महाराष्ट्रात तरी नकीच ) कुळकर्णी, देशपांडे , चितळे , फडणवीस वगैरे आडनावांचा द्वेष अगदी वरपासुन खालपर्यंत भिनला आहे , पण किमान पाटील, भोसले, कांबळे, गुरव, मोरे , अन गेलाबाजार मुतालिक वगैरे आडनावांना तरी यशस्वी बिजनेस करता येईल असे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करुन द्या ! इझ ऑफ डूईंग बिजनेस , वेन्चर कॅपिटल , एम.आय.डी.सी , वीज, पाणी, रस्ते , मध्ये सुविधा वगैरे उपलब्ध्द करुन द्या ! पण कसं आहे की लोकांना " अनाजीपंत , कृष्णाजी भास्कर अन पेशवे " ह्या गफ्फांमध्ये इतकं मस्त गुंगवुन ठेवलें आहे की कशाला हवेत बिजनेस अन फिजनेस ! आता त्यात अडाणी ही नवीन भर ! टाक गाडीत २०० चें पेट्रोल , अन फेक पाचशेची नोट अन चपटी की पोरं लगेच तयार होतात वाट्टेल तो झेंडा लाऊन फिरायला . हाय काय अन नाय काय ! =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

Trump 07/02/2023 - 22:57
मान्य आहे की इथे महाराष्ट्रात ( किमान पश्चिम महाराष्ट्रात तरी नकीच ) कुळकर्णी, देशपांडे , चितळे , फडणवीस वगैरे आडनावांचा द्वेष अगदी वरपासुन खालपर्यंत भिनला आहे ,
फक्त काही पक्षांचे कार्यकर्ते तसे आहेत. हा बदल गेल्या २० - २५ वर्षामधील आहे. कृपया सगळे असे सार्वत्रीकरण करु नये.

In reply to by Trump

हा बदल गेल्या २० - २५ वर्षामधील आहे. कृपया सगळे असे सार्वत्रीकरण करु नये.
हां , थोडे गणित चुकले . आता नुकतेच ३० जानेवारी १९४८ ला २०-२५ वर्षे पुर्ण झाली . या एकदा सातार्‍यात , आमच्या आजोबांचा मस्त चिरेबंदी वाडा आहे त्याची सफर करवतो तुम्हाला . नंतर मस्त आमच्या शेतात बसुन हुरडा पार्टी करुयात . =))))

अर्धवटराव 08/02/2023 - 00:01
ब्रिटीशांनी भारतातली औद्योगीक मानसीकता खच्ची केली हे एका स्थूलमानाने खरं आहे. भारतात एकीकडे शेती, बलुतेदारी, कुटीर उद्योग इत्यादी रुपाने अगदी ग्रासरूट लेव्हलला उद्योग धंदे होते. तर दुसरीकडे कापड, मसाले वगैरे एक्स्पोर्ट करणारे मोठे उद्योजकही होते. या एव्हढ्या मोठ्या स्पेक्ट्रममधे बाकी अनेक उद्योग-धंदे असतील. या उद्योजकतेला ब्रिटीशांनी संपवलं एक एक नुकसान, आणि त्यामुळे आधुनीक जगाच्या उद्योगविश्वाशी नाळ जोडता न येणे हे आनुशांगीक नुकसान (जे कदाचीत मूळ नुकसानीपेक्शाही भयंकर होते) अदानी वा इतर कुठल्याही उद्योगसमुहाला सरकारी पातळीवरुन मदत मिळणे आणि त्यातुन उद्योगसाम्राज्य मोठी होणे यात विशेष काहि नाहि. जगात सर्वत्र हेच होत असतं. त्यात काहिही गैर नाहि. उद्योगात भ्रष्टाचार होणं आणि भ्रष्टाचारासाठी उद्योग तयार करणं यात मूलभूत फरक आहे. अदानीची केस पहिल्या प्रकाराची असावी. आम्हि वैयक्तीक रित्या त्यांच्यावर बेटींग करतो आहोतच. पडलेल्या समभागांत गुंतवणुक करण्याची संधी कोण सोडेल :) बाकी अदानी, आणि त्याला जोडुन मोदी विरोध, या प्रकरणावर काहि किमान बौद्धीक पातळीचे विवेचन वाचायला मिळते का हे बरच शोधलं.. आणि अपेक्शेनुसार भ्रमनिरास झालाच. भारतात अदानीच्या तोडीचे अनेकानेक उद्योजक तयार व्हावेत. त्यांच्या कल्पकतेतुन भारताचा आर्थीक विकास व्हावा. सामान्य लोकांनी शेअरमार्केट मधुन बक्कळ पैसा कमवावा. सगळ्यांना बरोबरीची संधी मिळण्याच्या आणि पिळवणुक टाळायच्या उद्देशाने कायद्याचं पालन व्हावं. हे काहि दिवास्वप्न नाहि. भारत त्या दिशेने मार्गक्रमण करतोय असं आश्वासक चित्रं आहे. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय पुणे. जय काका हलवाई आणि चितळे बाकरवडी.

स्वधर्म 10/02/2023 - 17:42
मा. मुतालिक साहेब, आपण कोणता उद्योग करता ते माहिती नाही, पण अशा प्रकारचा लेख लिहिण्याआधी थोड़े जमिनीवरील वास्तव समजून घ्यायची तसदी घेतली असती तर बरे झाले असते. अगदी अलिकडचं उदाहरण द्यायचं झालं तर, सध्या आपल्या महावितरण या सरकारी कंपनीने वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक वीजदर असणारे राज्य असतानाही! गुजरातचे वीजदर काय आहेत? तर आपल्यापेक्षा ३५% कमी, आंध्र, कर्नाटकचे आपल्यापेक्षा १५% कमी. प्रस्ताव किती दरवाढीचा आहें? तर येत्या दोन वर्षात ५५% वाढ करण्याचा. हे सगळं जनतेच्या माथी मारणार्या सरकारी कंपनीत आजिबात भ्रष्टाचार नाही, असे केवळ दोनच लोक म्हणू शकतात, एक निर्बुध्द किंवा अंध. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जावेत म्हणून तर हे केलं जात नाही ना, हे आपली सारासार विवेकबुध्दी शाबूत ठेऊन विचार करण्याची गोष्ट आहे. गेल्या रविवारी सजग नागरिक मंच यांची मासिक सभा पुण्यात झाली, तिचे संपूर्ण चित्रिकरण यूट्यूबवर उपलब्ध आहे. त्यात प्रताप होगाडे या उद्योजकांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी केली. या धाग्यात हे देण्याचे कारण म्हणजे अडाणी यांचा या दरवाढीशी असलेला संबंध त्यांनी उलगडून सांगितला! महावितरण हे महाजनको आणि अनेक खाजगी उद्योगाकडून वीज खरेदी करते. त्यात साडेतीन रु. प्रतियुनिटपासून ५ रू. ७६ पै प्रतियुनिट इतका दर पड़ला आहें. सर्वात जास्त दर (रू. ५.७६ ) हा अडाणी पावर कंपनीकडून घेतलेल्या वीजेचा आहे. २०१२ ते २०१८ या कालावधीत जी वीज अडाणी कंपनीकडून घेतली, त्याचा परिणाम म्हणून इंधन समायोजन आकार १५ ते २० पैशापासून वाढून १ रू. ३० पैसे इतका झाला आहें. मागे असेच एनटीपीसी व इतर ऊर्जा निर्मिती करणार्या कंपन्यांना कोल इंडीया या कडून कोळसा न घेता अडाणीकडून कोळसा घेण्याचे आदेश देण्यात आल्याचेही वाचले होते. अडाणीचा दर अर्थातच खूप जास्त होता (काही पटीत). आपल्या प्रत्येक वीजबीलातून किमान १५० रू. ते कितीही हे या कंपनीवर दाखवलेल्या मेहेरबानीमुळे त्यांना जातात, हे सामान्य माणसाला समजत नाही. खालील चित्रफितीत काही प्रमाणात हे मांडले गेले आहे. सामान्य माणसाकडून अडाणी यांच्या केवळ एका धंद्यात कसे पैसे वळवले जातात, हे सहज समजून येईल. अडाणी यांचे बाकी सगळे धंदे उदा. विमानतळ, बंदरे, धान्य कोठारे असे सरकारचेच नेमके का आहेत? आपण याचा कधी विचार केला आहे का? सगळी सभाच मुळी महावितरण कसे चालते, त्यात भ्रष्टाचार आहे का? त्यांचे व्यवस्थापन काय दर्जाचे आहे? खरोखरच शेतीपंपाला दिलेली वीज मोफत आहे का? आणि दरवाढ यातील वास्तव मांडणारी झाली. पण निदान खालील तुकडे तरी पहा आणि मग १०० अडाणी आपल्याला हवेत का, सरकारी आस्थापने खरोखरच पारदर्शक व भ्रषटाचारमुक्त आहेत का याचा विचार करा. दुवा: https://www.youtube.com/watch?v=E--ofniwq44 १३:०० ते १५:०० ३५:०० ते ३५:३० ४५:०० ते ४८:०० आपण प्रिय आहें त्याला निसर्गत: महत्व देणारच, पण सत्य हे त्याहिपेक्षा महत्वाचे असते, ही जाणीव जेंव्हा आपल्या नागरिकांस होईल तेव्हाच आशेला काही जागा राहिल. अन्यथा भ्रामक प्रचारातून, स्वस्तुतीतून (पहा कालचे संसदेतील भाषण) उभ्या केलेल्या ब्रॅंडमधून जे प्रेम उपजते, ते आंधळे असते. पण वरच्याप्रमाणे प्रचारकी, भावनेला हात घालणार्या लेखांच्या रतिबात हे सांगणार तरी कुणाला?

श्रीगुरुजी 10/02/2023 - 18:55
प्रस्ताव किती दरवाढीचा आहें? तर येत्या दोन वर्षात ५५% वाढ करण्याचा. हे सगळं जनतेच्या माथी मारणार्या सरकारी कंपनीत आजिबात भ्रष्टाचार नाही, असे केवळ दोनच लोक म्हणू शकतात, एक निर्बुध्द किंवा अंध. भ्रष्टाचार असेलच, पण या दरवाढीमागे अजूनही कारणे आहेत. अनेक दशके शेतकऱ्यांना विनाशुल्क किंवा अत्यल्प भावाने वीज देणे, शेतकऱ्यांनी देयकातील वीजशुल्क न भरणे, गावोगाव व गणेशोत्सवात आकडे टाकून वीज चोरणे यामुळे ५०,००० कोटी रूपयांहून अधिक थकबाकी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्यासाठी नियमित वीजशुल्क देणाऱ्यांवर भाववाढ लादली आहे. वीजजोडणी तोडण्यासाठी गेलैल्या वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून पळवून लावले जाते. फक्त अदानीला दोष देऊन काय होणार?

In reply to by श्रीगुरुजी

आग्या१९९० 10/02/2023 - 19:26
पावसाळ्यात माझा कृषि पंप वापर शून्य असतानाही प्रत्येक महिन्यात ५०० पेक्षा अधिक युनिट्स वापर दाखवून बिल यायचे. चार महिने बिल भरले नाही. MSEB अधिकाऱ्यांना शेतात आणून प्रत्यक्ष मिटर रिडिंग दाखवले. शून्य वापर असतानाही वाढीव बिल का पाठवले? हे विचारले तर , निम्मे बिल करून देतो,लगेच भरत असल्यास. मी म्हटले पूर्ण भरतो पण मिटर रिडिंग तपासल्याची फॉर्मवर नोंद करा. त्यांनी तशी नोंद केली. ऑफीस मध्ये जाऊन शिक्का मारून घेतला. अजून बिल भरले नाही. पद्धतशीर तक्रार केली आहे. तक्रार मागे घ्यायला सांगत आहे. बघू काय होते ते. https://www.newsclick.in/inflated-power-bills-maharashtra-farmers-smell-scam

विवेकपटाईत 17/02/2023 - 11:08
गेल्या पाच वर्षांत 105 स्टार्टअप प्रत्येकी 6000 कोटींचे झाले आहेत. यातले काही अडाणी अंबानी निश्चित बनतील. टाटा ने 470 विमानांची ऑर्डर दिलइये तब्बल साडे पाच लाख कोटींची.विमान तळांची संख्या आज 147 आहेत दोन वर्षांत 200 वर जाणार. पुढील दोन वर्षांत डिफेंस उत्पादन 2 लाख कोटींपर्यंत वाढविण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे आणि निर्यात ही 35000 कोटींचा करण्याचा. उद्योगांसाठी उत्तम रास्ते, रेल्वे, optic फायबर लाइन, विमान तळ एवढेच काय वीज उत्पादन ही आठ वर्षणत 40 टक्के वाढले. सोलर स्वस्त वीज निर्मिती ही मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. बाकी शून्य तकनिकी असलेले उद्योग लाऊन पेप्सिको, कोकाकोला, यूनिलिव्हर, नेस्ले, अॅमवे समेत डझन भर अमेरिकी कंपन्या देशाला लुटतात. कुणीही त्यावर बोलात नाही. पंजाबत विदेशी कंपन्यांचे नाही तर किसान आंदोलनशी संबंध नसला तरी जिओ चे टावर जाळून 1500 कोटींचे नुकसान केले. पतंजलि फूड पार्क नुकताच सुरू झाला होता. त्यावर आक्रमण झाले. त्यात प्लांट जळला असता तर फूड पार्क =ची भ्रूण हत्या तेंव्हाच झाली असती. अर्थात हे कुणाच्या इशार्‍यांवर होते हे सुज्ञांना सांगण्याची गरज नाही. पुढील दहा वर्षांत हीच सरकार राहिली तर देशांत 100 अडाणी निश्चित बनतील.

तर्कवादी 17/02/2023 - 11:50
शंभर अदाणी हवे आहेत
हं.. थोडं कठीण वाटतंय. पण गौतम अडाणी आणि त्यांच्या दोन मुलांनी पुढची काही वर्षे इतर उद्योगांवरचं लक्ष थोडं कमी करुन "अदाणी १००" प्रोजेक्टवर अहोरात्र मेहनत घेतली तर होवू शकेल कदाचित :)

आणखी १०० अडाणी तुम्हां हवेत कशाला ? (म्हणजे आतचे १ + आणखी १०० = टोटल १०१) काय करणार तुम्ही १०१ अडाण्यांच ? तुम्हाला असं म्हणायचं का की जर १ अडाणी म्हणून १ पोर्ट, १ विमानतळ, १ हायवे, १ कोळसा खाण.... तर १०० अडाणी म्हणून १०० पोर्ट, १०० विमानतळ, १०० हायवे , १०० खाणी ?? असं जर असेल तर, त्या १०० पोर्ट, १०० विमानतळ, १०० हायवे , १०० खाणी साठी "भागभांडवल" येणार कोठून ? उभारणार कसे ?

In reply to by आग्या१९९०

अनंतफंदी 07/02/2023 - 13:50
फारच उत्तम माहिती मिळाली. अदानींची फसवेगिरी आहेच. पण भारतात अजुन असे सगळे उद्योग करणारे ईतर समूह नसतील कशावरुन? हे सगळे प्रकरण ईतके गुंतागुंतीचे आहे, की जिथे सरकारी ऑडिटर्सनाही समजायला वेळ लागेल तिथे सामान्यांची काय कथा? एक मात्र खरे!!अदानी समूहाने हिंडेनबर्गवर बदनामीचा खटला किवा ईतर कायदेशीर कारवाई लवकर करावी लागेल तरच त्यांची प्रतिमा टिकेल, अन्यथा हिंडेन बर्गच्या आरोपांनाच दुजोरा मिळाल्यासारखे होईल. अजुन एक--- सुधीर भाऊंचा लेख वाचुन ह्या प्रकरणाला अशीही एक बाजु असेल असे नक्कीच वाटुन गेले.

कंजूस 07/02/2023 - 14:41
तर यांचा तारणहार कोण यांच्याशी काहीही संबंध नाही. वालचंद हिराचंद यांनी ब्रिटिश बोट कंपन्यांना कशी फाईट दिली तेसुद्धा ब्रिटिश राज्य असताना हे कुणी वाचलं आहे का? तेव्हा कुठे तारणहार होते?

सरकारी कंपन्यांबरोबर काम करताना लफडी करणे अशक्य आहे, तिथल्या व्यवस्था भयानक गुंतागुंतीच्या आणि स्वच्छ आहेत.
हे कुठल्या सरकारी कंपन्याबद्दल बोलत आहात कळेल का? माझाही संबंध सरकारी व्यवस्थेशी येतच असतो थोडक्यात सांगायचे तर जिल्हा परिषद, सावजनिक बांधकाम खाते, एमआयडीसी वगैरे वगैरे. त्यामुळे 'भयानक गुंतागुंतीच्या'शी सहमत आहे पण स्वच्छ!
घरी बसल्या बसल्या लिंबाचे लोणचे खोचलेला बशीभर गोड शिरा खात खात हे मोदी आणि अदाणी देशाला लुटताहेत अशी बडबड करणाऱ्यांनी न्यायव्यवस्थेवर आणि लोकशाहीवर शक्य असेल तर विश्वास ठेवावा.
अनुभवाचे बोल आहेत, न्यायव्यवस्थेवरचा विश्वास केव्हाच उडून गेला आहे. लोकशाहीवरही फार काळ टिकेल असं वाटत नाही. बाकी, अशी दिशाभूल करणारे लेख दोन्ही बाजूने चालू असतात त्यामुळे चालू द्या! सं - दी - प

मित्रहो 07/02/2023 - 16:36
खूप रोखठोक आहे. इतका की उपहास आहे का असे वाटावे.
दाढीचे खुंट वाढवून खांद्याला झोळी लटकवून अदाणीच्या नावाने कंठशोष करणाऱ्या समस्त महारथीपैकी एकालाही पोर्ट बांधता येत नसेल काय ? नाही. अशा बोलघेवड्यांनाच काय पण आपल्या कल्पनेतल्या भलाभल्याना असे प्रकल्प हाती घेण्याची आणि ते पूर्ण करण्याची कुवत नसते.
अदाणी नको असेल तर एखादा प्रकल्प उभा करण्याचा धंदा करावा किंवा जे धंदा करीत आहेत त्यांना आपल्या सर्व ताकदीनिशी मोठे करावे.
हे दोन्ही आवडले सरकारी व्यवस्था गुंतागुंतीची असते यात शंका नाही पण स्वच्छ असते यावर सामान्यांचा विश्वास बसणे कठीण आहे. सध्यातरी अदाणींविषयी जो गोंधळ सुरु आहे तो व्यवसायाविषयी नाही तर समभागाच्या किंमतींविषयी आहे. देशाला झोलावाला नाही तर उद्योगपतींची, छोट्या व्यावसायिकांची गरज आहे यात काही दुमत नाही.

सौंदाळा 07/02/2023 - 16:36
+/- शंभर अदानी हवे आहेत याच्याशी सहमत सरकारी कंपन्यांबरोबर काम करताना लफडी करणे अशक्य आहे, तिथल्या व्यवस्था भयानक गुंतागुंतीच्या आणि स्वच्छ आहेत - असहमत माझा किंवा जवळच्या नातेवाईकांचा सरकरी कंपन्यांशी जो काही संबंध आला आहे त्यावरुन त्यांना अजिबात स्वच्छ म्हणणार नाही.

कॉमी 07/02/2023 - 16:56
तद्दन फालतू लेख. एव्हढे लिहिण्यापेक्षा डोळे मिटून तिरंगा हातात घेऊन छाती बडवतानाचा फोटो टाकला असता तरी चालले असते.

In reply to by कॉमी

Trump 07/02/2023 - 22:44
तद्दन फालतू लेख.
सहमत
एव्हढे लिहिण्यापेक्षा डोळे मिटून तिरंगा हातात घेऊन छाती बडवतानाचा फोटो टाकला असता तरी चालले असते.
असहमत

लेखातील काही मतांशी अमान्य आहे . पण तेच तेच लिहित बसत नाही आता. पण देशात व्यवसाय वृध्दी व्हाय्लाच हवी ह्यात शंका नाही . पण ती अदानीनेच का करावी ? टाटा , बिर्ला , अंबानी , बजाज, पुनावाला हीच आडनावे का ? मान्य आहे की इथे महाराष्ट्रात ( किमान पश्चिम महाराष्ट्रात तरी नकीच ) कुळकर्णी, देशपांडे , चितळे , फडणवीस वगैरे आडनावांचा द्वेष अगदी वरपासुन खालपर्यंत भिनला आहे , पण किमान पाटील, भोसले, कांबळे, गुरव, मोरे , अन गेलाबाजार मुतालिक वगैरे आडनावांना तरी यशस्वी बिजनेस करता येईल असे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करुन द्या ! इझ ऑफ डूईंग बिजनेस , वेन्चर कॅपिटल , एम.आय.डी.सी , वीज, पाणी, रस्ते , मध्ये सुविधा वगैरे उपलब्ध्द करुन द्या ! पण कसं आहे की लोकांना " अनाजीपंत , कृष्णाजी भास्कर अन पेशवे " ह्या गफ्फांमध्ये इतकं मस्त गुंगवुन ठेवलें आहे की कशाला हवेत बिजनेस अन फिजनेस ! आता त्यात अडाणी ही नवीन भर ! टाक गाडीत २०० चें पेट्रोल , अन फेक पाचशेची नोट अन चपटी की पोरं लगेच तयार होतात वाट्टेल तो झेंडा लाऊन फिरायला . हाय काय अन नाय काय ! =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

Trump 07/02/2023 - 22:57
मान्य आहे की इथे महाराष्ट्रात ( किमान पश्चिम महाराष्ट्रात तरी नकीच ) कुळकर्णी, देशपांडे , चितळे , फडणवीस वगैरे आडनावांचा द्वेष अगदी वरपासुन खालपर्यंत भिनला आहे ,
फक्त काही पक्षांचे कार्यकर्ते तसे आहेत. हा बदल गेल्या २० - २५ वर्षामधील आहे. कृपया सगळे असे सार्वत्रीकरण करु नये.

In reply to by Trump

हा बदल गेल्या २० - २५ वर्षामधील आहे. कृपया सगळे असे सार्वत्रीकरण करु नये.
हां , थोडे गणित चुकले . आता नुकतेच ३० जानेवारी १९४८ ला २०-२५ वर्षे पुर्ण झाली . या एकदा सातार्‍यात , आमच्या आजोबांचा मस्त चिरेबंदी वाडा आहे त्याची सफर करवतो तुम्हाला . नंतर मस्त आमच्या शेतात बसुन हुरडा पार्टी करुयात . =))))

अर्धवटराव 08/02/2023 - 00:01
ब्रिटीशांनी भारतातली औद्योगीक मानसीकता खच्ची केली हे एका स्थूलमानाने खरं आहे. भारतात एकीकडे शेती, बलुतेदारी, कुटीर उद्योग इत्यादी रुपाने अगदी ग्रासरूट लेव्हलला उद्योग धंदे होते. तर दुसरीकडे कापड, मसाले वगैरे एक्स्पोर्ट करणारे मोठे उद्योजकही होते. या एव्हढ्या मोठ्या स्पेक्ट्रममधे बाकी अनेक उद्योग-धंदे असतील. या उद्योजकतेला ब्रिटीशांनी संपवलं एक एक नुकसान, आणि त्यामुळे आधुनीक जगाच्या उद्योगविश्वाशी नाळ जोडता न येणे हे आनुशांगीक नुकसान (जे कदाचीत मूळ नुकसानीपेक्शाही भयंकर होते) अदानी वा इतर कुठल्याही उद्योगसमुहाला सरकारी पातळीवरुन मदत मिळणे आणि त्यातुन उद्योगसाम्राज्य मोठी होणे यात विशेष काहि नाहि. जगात सर्वत्र हेच होत असतं. त्यात काहिही गैर नाहि. उद्योगात भ्रष्टाचार होणं आणि भ्रष्टाचारासाठी उद्योग तयार करणं यात मूलभूत फरक आहे. अदानीची केस पहिल्या प्रकाराची असावी. आम्हि वैयक्तीक रित्या त्यांच्यावर बेटींग करतो आहोतच. पडलेल्या समभागांत गुंतवणुक करण्याची संधी कोण सोडेल :) बाकी अदानी, आणि त्याला जोडुन मोदी विरोध, या प्रकरणावर काहि किमान बौद्धीक पातळीचे विवेचन वाचायला मिळते का हे बरच शोधलं.. आणि अपेक्शेनुसार भ्रमनिरास झालाच. भारतात अदानीच्या तोडीचे अनेकानेक उद्योजक तयार व्हावेत. त्यांच्या कल्पकतेतुन भारताचा आर्थीक विकास व्हावा. सामान्य लोकांनी शेअरमार्केट मधुन बक्कळ पैसा कमवावा. सगळ्यांना बरोबरीची संधी मिळण्याच्या आणि पिळवणुक टाळायच्या उद्देशाने कायद्याचं पालन व्हावं. हे काहि दिवास्वप्न नाहि. भारत त्या दिशेने मार्गक्रमण करतोय असं आश्वासक चित्रं आहे. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय पुणे. जय काका हलवाई आणि चितळे बाकरवडी.

स्वधर्म 10/02/2023 - 17:42
मा. मुतालिक साहेब, आपण कोणता उद्योग करता ते माहिती नाही, पण अशा प्रकारचा लेख लिहिण्याआधी थोड़े जमिनीवरील वास्तव समजून घ्यायची तसदी घेतली असती तर बरे झाले असते. अगदी अलिकडचं उदाहरण द्यायचं झालं तर, सध्या आपल्या महावितरण या सरकारी कंपनीने वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक वीजदर असणारे राज्य असतानाही! गुजरातचे वीजदर काय आहेत? तर आपल्यापेक्षा ३५% कमी, आंध्र, कर्नाटकचे आपल्यापेक्षा १५% कमी. प्रस्ताव किती दरवाढीचा आहें? तर येत्या दोन वर्षात ५५% वाढ करण्याचा. हे सगळं जनतेच्या माथी मारणार्या सरकारी कंपनीत आजिबात भ्रष्टाचार नाही, असे केवळ दोनच लोक म्हणू शकतात, एक निर्बुध्द किंवा अंध. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जावेत म्हणून तर हे केलं जात नाही ना, हे आपली सारासार विवेकबुध्दी शाबूत ठेऊन विचार करण्याची गोष्ट आहे. गेल्या रविवारी सजग नागरिक मंच यांची मासिक सभा पुण्यात झाली, तिचे संपूर्ण चित्रिकरण यूट्यूबवर उपलब्ध आहे. त्यात प्रताप होगाडे या उद्योजकांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी केली. या धाग्यात हे देण्याचे कारण म्हणजे अडाणी यांचा या दरवाढीशी असलेला संबंध त्यांनी उलगडून सांगितला! महावितरण हे महाजनको आणि अनेक खाजगी उद्योगाकडून वीज खरेदी करते. त्यात साडेतीन रु. प्रतियुनिटपासून ५ रू. ७६ पै प्रतियुनिट इतका दर पड़ला आहें. सर्वात जास्त दर (रू. ५.७६ ) हा अडाणी पावर कंपनीकडून घेतलेल्या वीजेचा आहे. २०१२ ते २०१८ या कालावधीत जी वीज अडाणी कंपनीकडून घेतली, त्याचा परिणाम म्हणून इंधन समायोजन आकार १५ ते २० पैशापासून वाढून १ रू. ३० पैसे इतका झाला आहें. मागे असेच एनटीपीसी व इतर ऊर्जा निर्मिती करणार्या कंपन्यांना कोल इंडीया या कडून कोळसा न घेता अडाणीकडून कोळसा घेण्याचे आदेश देण्यात आल्याचेही वाचले होते. अडाणीचा दर अर्थातच खूप जास्त होता (काही पटीत). आपल्या प्रत्येक वीजबीलातून किमान १५० रू. ते कितीही हे या कंपनीवर दाखवलेल्या मेहेरबानीमुळे त्यांना जातात, हे सामान्य माणसाला समजत नाही. खालील चित्रफितीत काही प्रमाणात हे मांडले गेले आहे. सामान्य माणसाकडून अडाणी यांच्या केवळ एका धंद्यात कसे पैसे वळवले जातात, हे सहज समजून येईल. अडाणी यांचे बाकी सगळे धंदे उदा. विमानतळ, बंदरे, धान्य कोठारे असे सरकारचेच नेमके का आहेत? आपण याचा कधी विचार केला आहे का? सगळी सभाच मुळी महावितरण कसे चालते, त्यात भ्रष्टाचार आहे का? त्यांचे व्यवस्थापन काय दर्जाचे आहे? खरोखरच शेतीपंपाला दिलेली वीज मोफत आहे का? आणि दरवाढ यातील वास्तव मांडणारी झाली. पण निदान खालील तुकडे तरी पहा आणि मग १०० अडाणी आपल्याला हवेत का, सरकारी आस्थापने खरोखरच पारदर्शक व भ्रषटाचारमुक्त आहेत का याचा विचार करा. दुवा: https://www.youtube.com/watch?v=E--ofniwq44 १३:०० ते १५:०० ३५:०० ते ३५:३० ४५:०० ते ४८:०० आपण प्रिय आहें त्याला निसर्गत: महत्व देणारच, पण सत्य हे त्याहिपेक्षा महत्वाचे असते, ही जाणीव जेंव्हा आपल्या नागरिकांस होईल तेव्हाच आशेला काही जागा राहिल. अन्यथा भ्रामक प्रचारातून, स्वस्तुतीतून (पहा कालचे संसदेतील भाषण) उभ्या केलेल्या ब्रॅंडमधून जे प्रेम उपजते, ते आंधळे असते. पण वरच्याप्रमाणे प्रचारकी, भावनेला हात घालणार्या लेखांच्या रतिबात हे सांगणार तरी कुणाला?

श्रीगुरुजी 10/02/2023 - 18:55
प्रस्ताव किती दरवाढीचा आहें? तर येत्या दोन वर्षात ५५% वाढ करण्याचा. हे सगळं जनतेच्या माथी मारणार्या सरकारी कंपनीत आजिबात भ्रष्टाचार नाही, असे केवळ दोनच लोक म्हणू शकतात, एक निर्बुध्द किंवा अंध. भ्रष्टाचार असेलच, पण या दरवाढीमागे अजूनही कारणे आहेत. अनेक दशके शेतकऱ्यांना विनाशुल्क किंवा अत्यल्प भावाने वीज देणे, शेतकऱ्यांनी देयकातील वीजशुल्क न भरणे, गावोगाव व गणेशोत्सवात आकडे टाकून वीज चोरणे यामुळे ५०,००० कोटी रूपयांहून अधिक थकबाकी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्यासाठी नियमित वीजशुल्क देणाऱ्यांवर भाववाढ लादली आहे. वीजजोडणी तोडण्यासाठी गेलैल्या वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून पळवून लावले जाते. फक्त अदानीला दोष देऊन काय होणार?

In reply to by श्रीगुरुजी

आग्या१९९० 10/02/2023 - 19:26
पावसाळ्यात माझा कृषि पंप वापर शून्य असतानाही प्रत्येक महिन्यात ५०० पेक्षा अधिक युनिट्स वापर दाखवून बिल यायचे. चार महिने बिल भरले नाही. MSEB अधिकाऱ्यांना शेतात आणून प्रत्यक्ष मिटर रिडिंग दाखवले. शून्य वापर असतानाही वाढीव बिल का पाठवले? हे विचारले तर , निम्मे बिल करून देतो,लगेच भरत असल्यास. मी म्हटले पूर्ण भरतो पण मिटर रिडिंग तपासल्याची फॉर्मवर नोंद करा. त्यांनी तशी नोंद केली. ऑफीस मध्ये जाऊन शिक्का मारून घेतला. अजून बिल भरले नाही. पद्धतशीर तक्रार केली आहे. तक्रार मागे घ्यायला सांगत आहे. बघू काय होते ते. https://www.newsclick.in/inflated-power-bills-maharashtra-farmers-smell-scam

विवेकपटाईत 17/02/2023 - 11:08
गेल्या पाच वर्षांत 105 स्टार्टअप प्रत्येकी 6000 कोटींचे झाले आहेत. यातले काही अडाणी अंबानी निश्चित बनतील. टाटा ने 470 विमानांची ऑर्डर दिलइये तब्बल साडे पाच लाख कोटींची.विमान तळांची संख्या आज 147 आहेत दोन वर्षांत 200 वर जाणार. पुढील दोन वर्षांत डिफेंस उत्पादन 2 लाख कोटींपर्यंत वाढविण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे आणि निर्यात ही 35000 कोटींचा करण्याचा. उद्योगांसाठी उत्तम रास्ते, रेल्वे, optic फायबर लाइन, विमान तळ एवढेच काय वीज उत्पादन ही आठ वर्षणत 40 टक्के वाढले. सोलर स्वस्त वीज निर्मिती ही मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. बाकी शून्य तकनिकी असलेले उद्योग लाऊन पेप्सिको, कोकाकोला, यूनिलिव्हर, नेस्ले, अॅमवे समेत डझन भर अमेरिकी कंपन्या देशाला लुटतात. कुणीही त्यावर बोलात नाही. पंजाबत विदेशी कंपन्यांचे नाही तर किसान आंदोलनशी संबंध नसला तरी जिओ चे टावर जाळून 1500 कोटींचे नुकसान केले. पतंजलि फूड पार्क नुकताच सुरू झाला होता. त्यावर आक्रमण झाले. त्यात प्लांट जळला असता तर फूड पार्क =ची भ्रूण हत्या तेंव्हाच झाली असती. अर्थात हे कुणाच्या इशार्‍यांवर होते हे सुज्ञांना सांगण्याची गरज नाही. पुढील दहा वर्षांत हीच सरकार राहिली तर देशांत 100 अडाणी निश्चित बनतील.

तर्कवादी 17/02/2023 - 11:50
शंभर अदाणी हवे आहेत
हं.. थोडं कठीण वाटतंय. पण गौतम अडाणी आणि त्यांच्या दोन मुलांनी पुढची काही वर्षे इतर उद्योगांवरचं लक्ष थोडं कमी करुन "अदाणी १००" प्रोजेक्टवर अहोरात्र मेहनत घेतली तर होवू शकेल कदाचित :)
...आमच्या शेतकऱ्यांना सरकारचा इथला एखादा निर्णय अमान्य असेल तर आमचे शेतकरी आणि आमचे सरकार काय करायचे ते बघून घेतील. शेतकऱ्यांना अगदी एखादे सरकार पसंत नसेल तर त्यांना ते सरकार खाली खेचायचा देखील नैतिक अधिकार आहे. पण इथल्या शेतकरी आंदोलनामध्ये काड्या घालणारे, ते भडकाविणारे आपल्या देशा बाहेरचे खलनायक होते हे अलीकडे लक्षात आले :टुल किट गॅंग ! महामारी नंतर तर आर्थिक दृष्ट्या सावरलेला भारत हा जगाच्या पाठीवरचा एकमेव बडा देश आहे. केवळ सावरलेलाच नाही तर आर्थिकदृष्ट्या उत्तम स्थिती असणारा आणि प्रगती करत असणारा.

ज्ञानेश्वरी आणि श्रोडिंगर्स कॅट

प्रसाद गोडबोले ·

चित्रगुप्त 03/02/2023 - 03:07
ती बॉक्स पारदर्शक काचेची असली तर ? श्रोडिंगर साहेब काय म्हणतील यावर ? . कळेना कळेना कळेना कळेना। ढळे नाढळे संशयोही ढळेना॥ --- अशी आमची स्थिती जाहली आहे. होवेवेर, तुमचा अभ्यास आणि विद्वत्तेला कोटि कोटि प्रणिपात.

चौकस२१२ 03/02/2023 - 05:51
तर जोवर तुम्ही बॉक्स ओपन करत नाही तोपर्यंत मांजराची नक्कीच स्थिती काय आहे हे तुम्हाला सांगता येणार नाही. बाष्कळच वाटतंय भौतिक दृष्ट्या विचार केला तर ..खोक कशाला उघडायला पाहिजे १) एवढया छोट्या खोक्यात प्राणवायू किती असणार ते मांजर त्या अभावी एक तासाच्या आत मारू शकते ... २) सर्वात महत्वाचे कोणाही इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअर किंवा डॉक्टर ला विचारा ... तो सांगेल मांजराला ४ सेन्सर लावा कि ज्यातून लगेच कळेल कि मांजर जिवंत आहे कि नाही ते ...

In reply to by चौकस२१२

गवि 03/02/2023 - 06:30
तो एक थॉट एक्सपिरिमेंट आहे. प्रत्यक्ष नव्हे. एक तात्विक सिद्धता समजायला सोपी व्हावी म्हणून ते उदाहरण तयार केले आहे. त्या जागी अन्य उदाहरणे देखील घेता येतील. बाकी लेखातील दोन गोष्टींचे साम्य अधोरेखित करण्याचा प्रयत्न भयंकर रोचक आहे. खरे तर "श्रोडिंजरचे मांजर" आणि "If a tree falls in a forest and no one is around to hear it, does it make a sound?" या अगदी एकच संकल्पना नाहीत. लेखातील संकल्पना फार खोल आहे. ती जंगलात तुटणाऱ्या झाडाच्या कल्पनेशी अधिक जुळते. अर्थात तोही एक थॉट एक्सपिरिमेंटच आहे आणि तोही रोचक आहेच. लेख आवडला. (एक फिजिक्स ग्राज्वेट)

In reply to by गवि

चौकस२१२ 03/02/2023 - 07:06
तो एक थॉट एक्सपिरिमेंट आहे. प्रत्यक्ष नव्हे ते समजले होते हो पण " त्यासाठी अतर्क्य उद्धरण का द्व्यावे " विचित्र " वाटले म्या पामराला .. पटणारे तरी उदाहरण द्व्यावे

In reply to by चौकस२१२

गवि 03/02/2023 - 07:32
त्यांनी ते अधिक सुलभ करून मांडल्याने अतिसुलभ ओव्हर सिम्प्लीफाय आणि म्हणून अधिक विचित्र वाटले असावे. किंबहुना ते विचित्रच असणे अपेक्षित आहे. या प्रयोगाची एक खासियत म्हणजे श्रोडिंजरला देखील प्रत्यक्ष मांजर प्रत्यक्ष मरणे, जिवंत असणे असे अभिप्रेत नसून तो क्वांटम तत्वांतील absurdity या उदाहरणाने अधोरेखित करू इच्छित होता, जी आपल्या नेहमीच्या क्लासिक थॉट प्रोसेसमध्ये तर्कदृष्ट्या बसत नव्हती.

In reply to by गवि

If a tree falls in a forest and no one is around to hear it, does it make a sound?"
ह्यावरुन आठवले. लहान मूल जर पडले तर आसपास कोणी नसेल तर गुमान उठुन चालु लागते तेच जर आसपास पाहणारे कुणी असेल तर भोकाड पसरते. बाकी लेख पुनःपुन्हा वाचावा लागेल. पण एरवी असंबंध्द वाटणार्या कल्पनेतुन अध्यात्मातील रहस्ये व विज्ञानातील शोध लागले आहेत. बूल ह्या शास्त्रज्ञाने आपण आपले विचार गणितीय भाषेत मांडु शकतो अशी थियरी मांडली होती व त्याचे त्याकाळात फार हसे झाले होते पण पुढे येणार्या संगणक युगाची ही पहिली आणि आवश्यक पायरी होती.

In reply to by कानडाऊ योगेशु

चौकस२१२ 13/03/2023 - 06:12
If a tree falls in a forest and no one is around to hear it, does it make a sound?" हो आवाज होणारच .. कशावर आपतंटे यावर आवाज किती ते अवलंबून आहे ... साधे भौतिक शास्त्र आहे ! त्यात कसलं आलाय गूढ ? ऐकायला माणूस नसेल . प्राणी नसेल जवळपास त्याने काय फरक पडतो .. आधुनिक तंत्राप्रमाणे त्याचे निरिक्षान / आवाज टिपता येतो कि जेवहा हि यंत्रे नवहती तेवहा हे एकवेळ म्हणून शकता कि आवाज झाला कि नाही!

सांगायचा प्रयत्न करत असावा. मांजर हे रूपक असावे. मारकस भौ जरा उलगडून सांगा. बाकी ज्यांचा संतसाहित्याचा गाढा अभ्यास त्यांच्याबद्दल नेहमीच गुढ वाटते.

In reply to by कर्नलतपस्वी

अमृतानुभव - विष्णुबुवा जोग https://archive.org/details/Amrutanubhav/mode/2up हे पुस्तक अतिषय खोलवर जाऊन लिहिले असल्याने कळायला अवघड आहे, आपली आध्यात्मिक पुर्वपीठीका, शुध्द मराठीत बॅकग्राऊंड नसल्यास ह्या लेखनातील व्यामिश्रता पाहुन आपला निरास होऊ शकतो. त्या तुलनेने हे खालील पुस्तक वाचायला अन समजायला सोप्पे आहे. अमृतानुभव - दत्तराज देशपांडे . https://archive.org/details/amritanubhava_changdev_pasashti/mode/2up

In reply to by कर्नलतपस्वी

शाम भागवत 17/03/2023 - 11:08
हा प्रतिसाद एकदम आवडला. उत्तर देण्यापासून स्वत:ला रोखू शकलो नाही. काही कळण्यासाठी वाचाल तर भरपूर माहिती मिळवाल. त्यामुळे आणखी आणखी वाचत राहाल. त्या माहीतीच्या आधारे शास्री व्हाल. पंडीत व्हाल. दुसऱ्यांच्या चुका दाखवून देऊ शकाल. लोकांत ज्ञानी म्हणून प्रसिध्दही होऊ शकाल. ज्या वाचनामुळे हे सगळे मिळाले ते आणखी आणखी वाचत राहायचा प्रयत्न करत राहाल. पण अनुभव यावा असं वाटून वाचाल, तर मात्र अंतर्मुख व्हाल. आत्तापर्यंत खूप वाचले. आता वाचन थांबवून प्रत्यक्ष कृती केली पाहिजे असे वाटायला लागेल. मग मात्र लक्षात येईल की हा अमृतानुभव बाहेर नाहीये. आत आहे. बाहेरून काही मिळवायचे नाही आहे. आणि... तुमचा खरा प्रवास सुरू झालेला असेल. _/\_

चौकस२१२ 03/02/2023 - 07:11
आत्मा असेल नसेल, शरीर आहे आणि ते सुख दुःख अनुभवते .. हे अनादी अनंत काळ दिसत आहे ...मग कसले आले डोम्बलचे गूढ ! उगाच अतर्क्य कशाला करायचे .. उगचःचा रवंथ

ज्ञानोबा माउली, तुकाराम बोवा आणि समर्थ यांच्या साहित्याचा गाढा अभ्यास दिसतोय ब्वा तुमचा!! आमचा दंडवत घ्या _/\__/\_ बाकी ते तुर्या वगैरे आम्ही रोज दुपारी हापिसात अनुभवतो म्हणजे गोंदवलेकर महाराज म्हणतात तसे समुद्रकिनारी लाट आली की पाणी आणि लाट गेली की तिथे वाळू त्यातली सीमारेषा जशी सांगता येईना तसेच काहीसे. आता श्रॉडिंगर या उदाहरणावर काय म्हणेल हा ही एक मुद्दा आहेच. (आणखी एक फिजिक्स ग्राज्वेट आणि श्रॉडिंगर वेव्ह थिअरीचा पण आता फक्त कोड रन करणारा पंखा)

भागो 03/02/2023 - 08:16
ज्ञानोबा माउली, तुकाराम बोवा आणि समर्थ यांच्या साहित्याचा गाढा अभ्यास दिसतोय ब्वा तुमचा!! आमचा दंडवत घ्या _/\__/\_>>>> माझे पण दंडवत घ्या. लेख अत्यंत वाचनीय आहे. फक्त १२० वर्ष उशिरा आला.

विवेकपटाईत 03/02/2023 - 10:44
आजकाल बिना मातीची फक्त पाण्यात शेती होते. या पृथ्वीवर असे ही प्राणी असू शकतात त्यांना मातीने बनलेल्या शरीराची आवश्यकताच नाही. फक्त वायू वर जगत असतील. वायू स्वरुपी असतील. बाकी आपले जेवढे ज्ञान तेवढेच आपले तर्क.

Bhakti 03/02/2023 - 11:05
वाह प्रगो! फिजिक्स आणि संतवाणीचा मेळ!खुपचं आवडलं. पुस्तकाची प्रत दिल्याबद्दल धन्यवाद! बाकी मोगरा फुलला या पुस्तकाची शेवटची काही पान‌ वाचतेय त्यामुळे हे वाचताना अधिकच भारावले. माऊली माऊली _/\_

अर्धवटराव 03/02/2023 - 21:01
नव्हे एकच समस्या आहे.. relativity चा त्याग म्हणजे absolute चा बोध हा तो सिद्धांत. आणि "absolute चा बोध" असला काहि प्रकारच नाहि कारण बोध करणाराच उरत नाहि आणि 'बोध' हि संभावना नष्ट होते म्हणुन नेती नेती आणि शेवटी मौन. पण आता हे मौन नवीन absolute म्हणुन पुढे येतं. ते नि:शब्द आहे एव्हढाच काय तो फरक.

In reply to by अर्धवटराव

यालाच माऊली "ये ह्रुदयीचे ते ह्रुदयी घातले" म्हणत असावेत काय? किवा "शब्देवीण संवादु, दुजेविण अनुवादु" ???

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

अर्धवटराव 06/02/2023 - 09:43
आपल्या ईश्वरनिष्ठांच्या मांदीयाळी ने आपल्याकरता इतकं काहि देऊन ठेवलं आहे कि एकेका ओळीवर डोळे विस्फारावे असलं काहि सापडतं. आणि मार्कोस रावांनी तर एकदम झकास सुर पकडला आहे.

कंजूस 03/02/2023 - 21:50
कारण ज्ञानेश्वरी निरूपण ग्रंथ बऱ्याच लेखकांचे आहेत त्यापैकी कोणता घ्यावा या विचारात पडलो होतो. आमच्या इथे पुस्तक अदलाबदल प्रकल्पांत खूप ज्ञानेश्वरी येत होत्या आणि जात होत्या. पण कोणती घेऊ हे कळत नव्हते. (ज्ञानेश्वरी दुरूनच पाहिली आहे.) तर मग शेवटी एक पांढरा जाड ठोकळा दिसला. इंग्रजी भाषांतर - भवन्स प्रकाशन. ते घेतले. सांगायचा मुद्दा की सरळ रेषा आणखी सरळ करता येत नाही, रिलेटिविटी थिअरी आणखी सोपी करता येत नाही ,गीता आणखी लहान करता येत नाही. अर्जुनाला एका वाक्यात उत्तर देऊ न शकणारा कृष्ण भाराभर तत्त्वज्ञान ऐकवतो कारण ते शक्य नाही. प्रकाश कसा आहे? लहरी किंवा कण स्वरूपात? तर आपण बघू तसा आहे. (अजून एक डिजिटल ग्रॅजुएट - वय वाढलेला.) __________________ बाकी तुमचे निरूपण भारी आणि पाठदुखी घालवायचा उपायही स्वस्त.

टर्मीनेटर 03/02/2023 - 22:24
निरूपणाची आधुनिक पद्धत आवडली! (पुलंच्या असा मी असामी मधल्या) गुरुदेवांच्या 'इन ट्यून विथ द ट्यून' मधले युनिव्हर्सल केऑस मधून कॉसमॉस निर्माण होताना सुप्राकॉन्शसच्या पातळीवरून ऑकल्ट एक्सपीरिअन्सेस घेताना... वगैरे वगैरे आठवले एकदम 😂

नुकतेच "राजेश भूतकर" यांचे "क्वांटम मेकेनिक्स" वाचायला घेतले आणि हा लेख आला गोडिये आपुली गोडी। घेता काय न माये तोडी । आम्हा परस्परे आवडी । तो पाडू असे ।। लेख वाचताना असे काहीसे वाटत होते पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

___/\___ पैजारबुवा, नाव सार्थ केलेंत आपण ! दंडवत स्विकारा ___/\___ आता तुम्हाला फक्त इतकेच म्हणतो की --- सखया तुझेनि उद्देशें । भेटावया जीव उल्हासे । कीं सिद्धभेटी विसकुसे । ऐशिया बिहे ॥ ४२ ॥ भेवों पाहे तुझें दर्शन । तंव रूपा येनों पाहे मन । तेथें दर्शना होय अवजतन । ऐसें गमों लागे ॥ ४३ ॥ कांहीं करी बोले कल्पी । कां न करी न बोले न कल्पी । ये दोन्ही तुझ्या स्वरूपीं । न घेती उमसू ॥ ४४ ॥ चांगया ! तुझेनि नांवे । करणें न करणें न व्हावें । हें काय म्हणों परि न धरवे । मीपण हें ॥ ४५ ॥ ___/\___ ज्ञानियांचा राजा गुरु महाराव | म्हणती ज्ञान देव तुम्हां ऐसे || मज पामरासी काय थोरपण | पायीची वहाण पायीं बरी || पांडुरंग पांडुरंग || ___/\___

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सोत्रि 05/02/2023 - 08:39
नुकतेच "राजेश भूतकर" यांचे "क्वांटम मेकेनिक्स" वाचायला घेतले
झक्कास! वाचून झाल्यावर रसग्रहण करणारा लेख लिहा! - (क्वांटम) सोकाजी

सोत्रि 05/02/2023 - 08:23
मार्कस, सुंदर युरेका मोमेंट आणि अप्रतिम विवेचन! लेख वाचता वाचता 'वेव्ह फंक्शन कोलॅप्स' झाल्याचं फिलींग आलं.
निर्विकल्प समाधी हे दुसरे तिसरे काही नसून क्वांटम सुपर पोझिशन आहे!
_/\_ क्वांटम सुपर पोझिशन = तत्वमसि! - (क्वांटम) सोकाजी

सुमेरिअन 25/02/2023 - 04:02
कमाल केली! फारच कमी ज्ञानवंत असतील जे क्वांटम सुपरपोझिशन आणि ज्ञानेश्वरीचा असा योग्य घडवून आणू शकतील..

हा व्हिडीओ पहा >>> ६.२५ थॅन्क्यु गॉड , रीअली , थॅन्क्यु !! तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम्। ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते।।10.10।।( ___________/\_____________

राघव 13/03/2023 - 01:07
व्वा! वेधक आणि उद्बोधक! खूप आवडले! निर्विकल्प समाधी अवस्थेचं वर्णन अनेक जण करतात. पण ती अवस्था येते कशी/का, ते समजेल असं सांगता येत नाही. - स्वामी विवेकानंद म्हणतात (भावार्थ) -- जितके तर्क लावावयाचे असतील तेवढे सर्व लावून झाल्यावरही जेव्हा वर्णन करता येत नाही, तेव्हा "प्रत्ययास" येते की तर्क जिथे संपतात त्यापुढे त्याची सुरुवात आहे. ती अनुभवाचीच गोष्ट आहे, तर्काची नाही. - ठाकूर म्हणतात (भावार्थ) -- ब्रह्म अजून "उष्टे" झालेले नाही. कारण त्याचे वर्णन करायला कोणत्याही भाषेत शब्दच नाहीत. ही संकल्पनाही अशीच गूढ आहे.. समजावून सांगितले तरीही समजणार नाही.. उमजेल तेव्हाच खरं!

हा लेख आला तेव्हाच वरवर चाळलेला. विशेष काही कळालं नाही म्हणून सोडून दिला. आताच काही दिवसांपूर्वी मार्व्हल सिरीज मधला "अ‍ॅन्ट मॅन अ‍ॅन्ड वास्प - क्वांटमेनिया" हा चित्रपट पाहण्यात आला. त्यात ह्या श्रोडिंगर कॅटचा उल्लेख आला तेव्हा लगेचच हा लेख आठवला. परत एकदा नीट वाचून समजून घेऊ असं घोकलं कारण चित्रपटात ते दृश्य पाहताना अतिशय इंटरेस्टींग वाटलं. झालं, पुढे विसरून गेलो. आज हा लेख वर आल्यावर पुन्हा नीट वाचला. अजूनही पूर्णपणे कळालं नाही पण विषय रोचक आहे. चित्रपटही तसाच आहे, नक्की बघावा. त्यात मागेच आलेल्या त्या "लोकी" सिरीजशी कनेक्ट असल्यामुळे अजूनच भारी आहे. थोडक्यात, हे हॉलिवूडवाले जे आत्ता इमॅजिन करत आहेत आपण भारतीय खूप आधीच करून बसलेलो आहोत. सं - दी - प

चित्रगुप्त 03/02/2023 - 03:07
ती बॉक्स पारदर्शक काचेची असली तर ? श्रोडिंगर साहेब काय म्हणतील यावर ? . कळेना कळेना कळेना कळेना। ढळे नाढळे संशयोही ढळेना॥ --- अशी आमची स्थिती जाहली आहे. होवेवेर, तुमचा अभ्यास आणि विद्वत्तेला कोटि कोटि प्रणिपात.

चौकस२१२ 03/02/2023 - 05:51
तर जोवर तुम्ही बॉक्स ओपन करत नाही तोपर्यंत मांजराची नक्कीच स्थिती काय आहे हे तुम्हाला सांगता येणार नाही. बाष्कळच वाटतंय भौतिक दृष्ट्या विचार केला तर ..खोक कशाला उघडायला पाहिजे १) एवढया छोट्या खोक्यात प्राणवायू किती असणार ते मांजर त्या अभावी एक तासाच्या आत मारू शकते ... २) सर्वात महत्वाचे कोणाही इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअर किंवा डॉक्टर ला विचारा ... तो सांगेल मांजराला ४ सेन्सर लावा कि ज्यातून लगेच कळेल कि मांजर जिवंत आहे कि नाही ते ...

In reply to by चौकस२१२

गवि 03/02/2023 - 06:30
तो एक थॉट एक्सपिरिमेंट आहे. प्रत्यक्ष नव्हे. एक तात्विक सिद्धता समजायला सोपी व्हावी म्हणून ते उदाहरण तयार केले आहे. त्या जागी अन्य उदाहरणे देखील घेता येतील. बाकी लेखातील दोन गोष्टींचे साम्य अधोरेखित करण्याचा प्रयत्न भयंकर रोचक आहे. खरे तर "श्रोडिंजरचे मांजर" आणि "If a tree falls in a forest and no one is around to hear it, does it make a sound?" या अगदी एकच संकल्पना नाहीत. लेखातील संकल्पना फार खोल आहे. ती जंगलात तुटणाऱ्या झाडाच्या कल्पनेशी अधिक जुळते. अर्थात तोही एक थॉट एक्सपिरिमेंटच आहे आणि तोही रोचक आहेच. लेख आवडला. (एक फिजिक्स ग्राज्वेट)

In reply to by गवि

चौकस२१२ 03/02/2023 - 07:06
तो एक थॉट एक्सपिरिमेंट आहे. प्रत्यक्ष नव्हे ते समजले होते हो पण " त्यासाठी अतर्क्य उद्धरण का द्व्यावे " विचित्र " वाटले म्या पामराला .. पटणारे तरी उदाहरण द्व्यावे

In reply to by चौकस२१२

गवि 03/02/2023 - 07:32
त्यांनी ते अधिक सुलभ करून मांडल्याने अतिसुलभ ओव्हर सिम्प्लीफाय आणि म्हणून अधिक विचित्र वाटले असावे. किंबहुना ते विचित्रच असणे अपेक्षित आहे. या प्रयोगाची एक खासियत म्हणजे श्रोडिंजरला देखील प्रत्यक्ष मांजर प्रत्यक्ष मरणे, जिवंत असणे असे अभिप्रेत नसून तो क्वांटम तत्वांतील absurdity या उदाहरणाने अधोरेखित करू इच्छित होता, जी आपल्या नेहमीच्या क्लासिक थॉट प्रोसेसमध्ये तर्कदृष्ट्या बसत नव्हती.

In reply to by गवि

If a tree falls in a forest and no one is around to hear it, does it make a sound?"
ह्यावरुन आठवले. लहान मूल जर पडले तर आसपास कोणी नसेल तर गुमान उठुन चालु लागते तेच जर आसपास पाहणारे कुणी असेल तर भोकाड पसरते. बाकी लेख पुनःपुन्हा वाचावा लागेल. पण एरवी असंबंध्द वाटणार्या कल्पनेतुन अध्यात्मातील रहस्ये व विज्ञानातील शोध लागले आहेत. बूल ह्या शास्त्रज्ञाने आपण आपले विचार गणितीय भाषेत मांडु शकतो अशी थियरी मांडली होती व त्याचे त्याकाळात फार हसे झाले होते पण पुढे येणार्या संगणक युगाची ही पहिली आणि आवश्यक पायरी होती.

In reply to by कानडाऊ योगेशु

चौकस२१२ 13/03/2023 - 06:12
If a tree falls in a forest and no one is around to hear it, does it make a sound?" हो आवाज होणारच .. कशावर आपतंटे यावर आवाज किती ते अवलंबून आहे ... साधे भौतिक शास्त्र आहे ! त्यात कसलं आलाय गूढ ? ऐकायला माणूस नसेल . प्राणी नसेल जवळपास त्याने काय फरक पडतो .. आधुनिक तंत्राप्रमाणे त्याचे निरिक्षान / आवाज टिपता येतो कि जेवहा हि यंत्रे नवहती तेवहा हे एकवेळ म्हणून शकता कि आवाज झाला कि नाही!

सांगायचा प्रयत्न करत असावा. मांजर हे रूपक असावे. मारकस भौ जरा उलगडून सांगा. बाकी ज्यांचा संतसाहित्याचा गाढा अभ्यास त्यांच्याबद्दल नेहमीच गुढ वाटते.

In reply to by कर्नलतपस्वी

अमृतानुभव - विष्णुबुवा जोग https://archive.org/details/Amrutanubhav/mode/2up हे पुस्तक अतिषय खोलवर जाऊन लिहिले असल्याने कळायला अवघड आहे, आपली आध्यात्मिक पुर्वपीठीका, शुध्द मराठीत बॅकग्राऊंड नसल्यास ह्या लेखनातील व्यामिश्रता पाहुन आपला निरास होऊ शकतो. त्या तुलनेने हे खालील पुस्तक वाचायला अन समजायला सोप्पे आहे. अमृतानुभव - दत्तराज देशपांडे . https://archive.org/details/amritanubhava_changdev_pasashti/mode/2up

In reply to by कर्नलतपस्वी

शाम भागवत 17/03/2023 - 11:08
हा प्रतिसाद एकदम आवडला. उत्तर देण्यापासून स्वत:ला रोखू शकलो नाही. काही कळण्यासाठी वाचाल तर भरपूर माहिती मिळवाल. त्यामुळे आणखी आणखी वाचत राहाल. त्या माहीतीच्या आधारे शास्री व्हाल. पंडीत व्हाल. दुसऱ्यांच्या चुका दाखवून देऊ शकाल. लोकांत ज्ञानी म्हणून प्रसिध्दही होऊ शकाल. ज्या वाचनामुळे हे सगळे मिळाले ते आणखी आणखी वाचत राहायचा प्रयत्न करत राहाल. पण अनुभव यावा असं वाटून वाचाल, तर मात्र अंतर्मुख व्हाल. आत्तापर्यंत खूप वाचले. आता वाचन थांबवून प्रत्यक्ष कृती केली पाहिजे असे वाटायला लागेल. मग मात्र लक्षात येईल की हा अमृतानुभव बाहेर नाहीये. आत आहे. बाहेरून काही मिळवायचे नाही आहे. आणि... तुमचा खरा प्रवास सुरू झालेला असेल. _/\_

चौकस२१२ 03/02/2023 - 07:11
आत्मा असेल नसेल, शरीर आहे आणि ते सुख दुःख अनुभवते .. हे अनादी अनंत काळ दिसत आहे ...मग कसले आले डोम्बलचे गूढ ! उगाच अतर्क्य कशाला करायचे .. उगचःचा रवंथ

ज्ञानोबा माउली, तुकाराम बोवा आणि समर्थ यांच्या साहित्याचा गाढा अभ्यास दिसतोय ब्वा तुमचा!! आमचा दंडवत घ्या _/\__/\_ बाकी ते तुर्या वगैरे आम्ही रोज दुपारी हापिसात अनुभवतो म्हणजे गोंदवलेकर महाराज म्हणतात तसे समुद्रकिनारी लाट आली की पाणी आणि लाट गेली की तिथे वाळू त्यातली सीमारेषा जशी सांगता येईना तसेच काहीसे. आता श्रॉडिंगर या उदाहरणावर काय म्हणेल हा ही एक मुद्दा आहेच. (आणखी एक फिजिक्स ग्राज्वेट आणि श्रॉडिंगर वेव्ह थिअरीचा पण आता फक्त कोड रन करणारा पंखा)

भागो 03/02/2023 - 08:16
ज्ञानोबा माउली, तुकाराम बोवा आणि समर्थ यांच्या साहित्याचा गाढा अभ्यास दिसतोय ब्वा तुमचा!! आमचा दंडवत घ्या _/\__/\_>>>> माझे पण दंडवत घ्या. लेख अत्यंत वाचनीय आहे. फक्त १२० वर्ष उशिरा आला.

विवेकपटाईत 03/02/2023 - 10:44
आजकाल बिना मातीची फक्त पाण्यात शेती होते. या पृथ्वीवर असे ही प्राणी असू शकतात त्यांना मातीने बनलेल्या शरीराची आवश्यकताच नाही. फक्त वायू वर जगत असतील. वायू स्वरुपी असतील. बाकी आपले जेवढे ज्ञान तेवढेच आपले तर्क.

Bhakti 03/02/2023 - 11:05
वाह प्रगो! फिजिक्स आणि संतवाणीचा मेळ!खुपचं आवडलं. पुस्तकाची प्रत दिल्याबद्दल धन्यवाद! बाकी मोगरा फुलला या पुस्तकाची शेवटची काही पान‌ वाचतेय त्यामुळे हे वाचताना अधिकच भारावले. माऊली माऊली _/\_

अर्धवटराव 03/02/2023 - 21:01
नव्हे एकच समस्या आहे.. relativity चा त्याग म्हणजे absolute चा बोध हा तो सिद्धांत. आणि "absolute चा बोध" असला काहि प्रकारच नाहि कारण बोध करणाराच उरत नाहि आणि 'बोध' हि संभावना नष्ट होते म्हणुन नेती नेती आणि शेवटी मौन. पण आता हे मौन नवीन absolute म्हणुन पुढे येतं. ते नि:शब्द आहे एव्हढाच काय तो फरक.

In reply to by अर्धवटराव

यालाच माऊली "ये ह्रुदयीचे ते ह्रुदयी घातले" म्हणत असावेत काय? किवा "शब्देवीण संवादु, दुजेविण अनुवादु" ???

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

अर्धवटराव 06/02/2023 - 09:43
आपल्या ईश्वरनिष्ठांच्या मांदीयाळी ने आपल्याकरता इतकं काहि देऊन ठेवलं आहे कि एकेका ओळीवर डोळे विस्फारावे असलं काहि सापडतं. आणि मार्कोस रावांनी तर एकदम झकास सुर पकडला आहे.

कंजूस 03/02/2023 - 21:50
कारण ज्ञानेश्वरी निरूपण ग्रंथ बऱ्याच लेखकांचे आहेत त्यापैकी कोणता घ्यावा या विचारात पडलो होतो. आमच्या इथे पुस्तक अदलाबदल प्रकल्पांत खूप ज्ञानेश्वरी येत होत्या आणि जात होत्या. पण कोणती घेऊ हे कळत नव्हते. (ज्ञानेश्वरी दुरूनच पाहिली आहे.) तर मग शेवटी एक पांढरा जाड ठोकळा दिसला. इंग्रजी भाषांतर - भवन्स प्रकाशन. ते घेतले. सांगायचा मुद्दा की सरळ रेषा आणखी सरळ करता येत नाही, रिलेटिविटी थिअरी आणखी सोपी करता येत नाही ,गीता आणखी लहान करता येत नाही. अर्जुनाला एका वाक्यात उत्तर देऊ न शकणारा कृष्ण भाराभर तत्त्वज्ञान ऐकवतो कारण ते शक्य नाही. प्रकाश कसा आहे? लहरी किंवा कण स्वरूपात? तर आपण बघू तसा आहे. (अजून एक डिजिटल ग्रॅजुएट - वय वाढलेला.) __________________ बाकी तुमचे निरूपण भारी आणि पाठदुखी घालवायचा उपायही स्वस्त.

टर्मीनेटर 03/02/2023 - 22:24
निरूपणाची आधुनिक पद्धत आवडली! (पुलंच्या असा मी असामी मधल्या) गुरुदेवांच्या 'इन ट्यून विथ द ट्यून' मधले युनिव्हर्सल केऑस मधून कॉसमॉस निर्माण होताना सुप्राकॉन्शसच्या पातळीवरून ऑकल्ट एक्सपीरिअन्सेस घेताना... वगैरे वगैरे आठवले एकदम 😂

नुकतेच "राजेश भूतकर" यांचे "क्वांटम मेकेनिक्स" वाचायला घेतले आणि हा लेख आला गोडिये आपुली गोडी। घेता काय न माये तोडी । आम्हा परस्परे आवडी । तो पाडू असे ।। लेख वाचताना असे काहीसे वाटत होते पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

___/\___ पैजारबुवा, नाव सार्थ केलेंत आपण ! दंडवत स्विकारा ___/\___ आता तुम्हाला फक्त इतकेच म्हणतो की --- सखया तुझेनि उद्देशें । भेटावया जीव उल्हासे । कीं सिद्धभेटी विसकुसे । ऐशिया बिहे ॥ ४२ ॥ भेवों पाहे तुझें दर्शन । तंव रूपा येनों पाहे मन । तेथें दर्शना होय अवजतन । ऐसें गमों लागे ॥ ४३ ॥ कांहीं करी बोले कल्पी । कां न करी न बोले न कल्पी । ये दोन्ही तुझ्या स्वरूपीं । न घेती उमसू ॥ ४४ ॥ चांगया ! तुझेनि नांवे । करणें न करणें न व्हावें । हें काय म्हणों परि न धरवे । मीपण हें ॥ ४५ ॥ ___/\___ ज्ञानियांचा राजा गुरु महाराव | म्हणती ज्ञान देव तुम्हां ऐसे || मज पामरासी काय थोरपण | पायीची वहाण पायीं बरी || पांडुरंग पांडुरंग || ___/\___

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सोत्रि 05/02/2023 - 08:39
नुकतेच "राजेश भूतकर" यांचे "क्वांटम मेकेनिक्स" वाचायला घेतले
झक्कास! वाचून झाल्यावर रसग्रहण करणारा लेख लिहा! - (क्वांटम) सोकाजी

सोत्रि 05/02/2023 - 08:23
मार्कस, सुंदर युरेका मोमेंट आणि अप्रतिम विवेचन! लेख वाचता वाचता 'वेव्ह फंक्शन कोलॅप्स' झाल्याचं फिलींग आलं.
निर्विकल्प समाधी हे दुसरे तिसरे काही नसून क्वांटम सुपर पोझिशन आहे!
_/\_ क्वांटम सुपर पोझिशन = तत्वमसि! - (क्वांटम) सोकाजी

सुमेरिअन 25/02/2023 - 04:02
कमाल केली! फारच कमी ज्ञानवंत असतील जे क्वांटम सुपरपोझिशन आणि ज्ञानेश्वरीचा असा योग्य घडवून आणू शकतील..

हा व्हिडीओ पहा >>> ६.२५ थॅन्क्यु गॉड , रीअली , थॅन्क्यु !! तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम्। ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते।।10.10।।( ___________/\_____________

राघव 13/03/2023 - 01:07
व्वा! वेधक आणि उद्बोधक! खूप आवडले! निर्विकल्प समाधी अवस्थेचं वर्णन अनेक जण करतात. पण ती अवस्था येते कशी/का, ते समजेल असं सांगता येत नाही. - स्वामी विवेकानंद म्हणतात (भावार्थ) -- जितके तर्क लावावयाचे असतील तेवढे सर्व लावून झाल्यावरही जेव्हा वर्णन करता येत नाही, तेव्हा "प्रत्ययास" येते की तर्क जिथे संपतात त्यापुढे त्याची सुरुवात आहे. ती अनुभवाचीच गोष्ट आहे, तर्काची नाही. - ठाकूर म्हणतात (भावार्थ) -- ब्रह्म अजून "उष्टे" झालेले नाही. कारण त्याचे वर्णन करायला कोणत्याही भाषेत शब्दच नाहीत. ही संकल्पनाही अशीच गूढ आहे.. समजावून सांगितले तरीही समजणार नाही.. उमजेल तेव्हाच खरं!

हा लेख आला तेव्हाच वरवर चाळलेला. विशेष काही कळालं नाही म्हणून सोडून दिला. आताच काही दिवसांपूर्वी मार्व्हल सिरीज मधला "अ‍ॅन्ट मॅन अ‍ॅन्ड वास्प - क्वांटमेनिया" हा चित्रपट पाहण्यात आला. त्यात ह्या श्रोडिंगर कॅटचा उल्लेख आला तेव्हा लगेचच हा लेख आठवला. परत एकदा नीट वाचून समजून घेऊ असं घोकलं कारण चित्रपटात ते दृश्य पाहताना अतिशय इंटरेस्टींग वाटलं. झालं, पुढे विसरून गेलो. आज हा लेख वर आल्यावर पुन्हा नीट वाचला. अजूनही पूर्णपणे कळालं नाही पण विषय रोचक आहे. चित्रपटही तसाच आहे, नक्की बघावा. त्यात मागेच आलेल्या त्या "लोकी" सिरीजशी कनेक्ट असल्यामुळे अजूनच भारी आहे. थोडक्यात, हे हॉलिवूडवाले जे आत्ता इमॅजिन करत आहेत आपण भारतीय खूप आधीच करून बसलेलो आहोत. सं - दी - प
हा तर असं आहे की आपलं बैठं काम आहे. एका जागेवर आठ आठ तास बसून कोड रन करणे , कंपनीचा जास्तीत जास्त फायदा करुन देणे, हे सर्व भारतात बसुन करत असल्याने एक्सपेन्सेस कमी करणे आणि त्या योगे मेक अमेरिका ग्रेट अगेन हाच आपला उद्देश ! हां तर हे असे सारे असल्यामुळे बसून बसून खुर्ची कितीही कम्फर्टेबल असली तरीही एवढा वेळ बसल्याने व्हायचं तेच होते आणि पाठ दुखायला लागते. हलकीशी पाठ दुखायला लागली आणि अचानक अमृतानुभव मधील श्लोक आठवला.
तैसें अनुभाव्य अनुभाविक । इहीं दोही अनुभूतिक । तें गेलिया कैचें एक । एकासिचि ॥ ५-६१॥
ओवी तशी कळायला अवघड आहे म्हणून नेहमीप्रमाणे आपल्या वै. ह.भ.प.

महाराष्ट्र खगोल संमेलनाचा अविस्मरणीय अनुभव!

मार्गी ·

लेख फारच आवडला. इतक्या छान अनुभवाबद्दल तुमचा हेवा वाटला. या लेखाच्या निमित्ताने मुंबईतील एका विलक्षण परिषदेची आठवण झाली. ८ जानेवारी हा न्यूटनचा जन्मदिवस. न्यूटनजन्माला ३०० वर्षे झाल्याबद्दल मुंबईत खगोलशास्त्रविषयक विश्वपरिषद झाली होती. 'हाउ द युनिव्हर्स वर्क्स' आणि 'थ्रू द वर्महोल' या मालिका पाहतां की नाही? नसल्यास जरूर पाहा. सूंदर लेखाबद्दल अनेक अनेक धन्यवाद. या विषयावर आणखी असेच लेख वाचायला आवडतील.

लेख फारच आवडला. इतक्या छान अनुभवाबद्दल तुमचा हेवा वाटला. या लेखाच्या निमित्ताने मुंबईतील एका विलक्षण परिषदेची आठवण झाली. ८ जानेवारी हा न्यूटनचा जन्मदिवस. न्यूटनजन्माला ३०० वर्षे झाल्याबद्दल मुंबईत खगोलशास्त्रविषयक विश्वपरिषद झाली होती. 'हाउ द युनिव्हर्स वर्क्स' आणि 'थ्रू द वर्महोल' या मालिका पाहतां की नाही? नसल्यास जरूर पाहा. सूंदर लेखाबद्दल अनेक अनेक धन्यवाद. या विषयावर आणखी असेच लेख वाचायला आवडतील.
✪ सेंटर फॉर सिटिझन सायन्सेस (CCS), विज्ञान भारती आणि राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र (NCRA) द्वारे आयोजन ✪ तीन दिवसीय संमेलनामध्ये आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांची व्याख्याने, सखोल चर्चा आणि संवाद ✪ जुन्या व नवीन पिढीतील खगोलप्रेमींचं एकत्रीकरण- Passing of baton ✪ आयोजक, संबंधित संस्था, व्हॉलंटीअर्सद्वारे उत्तम नियोजन आणि चोख व्यवस्था ✪ आजच्या खगोल विज्ञानात काय सुरू आहे ह्यांचे अपडेटस आणि मूलभूत संकल्पनांची उजळणी ✪ भारतातल्या संस्था व वैज्ञानिक किती मोठं योगदान देत आहेत ह्यावर प्रकाश ✪ अजस्त्र जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT) ला भेट! ✪ GMRT येथील व्याख्याने, चर्चा सत्र आणि आकाश दर्शन ✪ व

टेलिस्कोपने धुमकेतू बघण्याचा रोमांचक अनुभव!

मार्गी ·

कंजूस 24/01/2023 - 19:02
माझा हा छंद होता तीस वर्षांपूर्वी. पण नंतर सोडावा लागला कारण गावागावांत, रस्त्यांवर सोनेरी दिवे वाढू लागले. खूप लांब जाणे परवडणारे नाही.

कंजूस 24/01/2023 - 19:02
माझा हा छंद होता तीस वर्षांपूर्वी. पण नंतर सोडावा लागला कारण गावागावांत, रस्त्यांवर सोनेरी दिवे वाढू लागले. खूप लांब जाणे परवडणारे नाही.
✪ दुर्बिणीतून धुमकेतू C/2022 E3 (ZTF) शोधण्याचा व बघण्याचा अनुभव ✪ हा धुमकेतू बायनॅक्युलरद्वारे सध्या दिसू शकतो ✪ शहरापासून लांबचं आकाश आणि धुमकेतूची अचूक स्थिती माहित असणे आवश्यक ✪ त्याची स्थिती वेगाने बदलते आहे ✪ १ फेब्रुवारीच्या सुमारास सर्वाधिक तेजस्वी असेल सर्वांना नमस्कार. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की, सध्या एक धुमकेतू- C/2022 E3 (ZTF) बायनॅक्युलरने दिसण्यासारखा आहे. २४ जानेवारीपर्यंत तो नुसत्या डोळ्याने दिसू शकेल, इतका तेजस्वी झालेला नाही आहे. परंतु तो बायनॅक्युलरने किंवा छोट्या टेलिस्कोपने बघता येऊ शकतो. त्यासाठी आपल्याला स्वच्छ आणि काळोख असलेलं आकाश लागेल.

आयटीआरबाबत अरजंट मदत हवी आहे.

शानबा५१२ ·
वेळेच्या आभावी त्या एररचा स्क्रीन्शॉट, फोटो ईथे अपलोड केला आहे. https://postimg.cc/bG2WRTY4 असा एरर कोणी सॉल्व्ह केला आहे का (प्रश्न चिन्ह काम करत नाहीये). हा एरर सोल्व्ह होतो एक चलन तयार करुन १४०ब मध्ये त्या डिटेल्स टाकयाच्या. अगदी दहा रुपयांचे चलनही चालते.मी मेथड वापरुन बघितले आहे पण नाही झाला प्रोब्लम सॉल्व्ह. प्लीज ईथले कोणी ह्या बाबतीत काही मदत करु शकता काय (प्रश्न चिन्ह काम करत नाहीये).

चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरूजींची

मार्गी ·

व्वा चांगला उपक्रम आहे. मी पण अशी शिबीरांमध्ये भाग घेतला आहे. माहितीबद्दल धन्यवाद.

व्वा चांगला उपक्रम आहे. मी पण अशी शिबीरांमध्ये भाग घेतला आहे. माहितीबद्दल धन्यवाद.
✪ तेजस्वी ता-यासारखं international space station! ✪ शनीची कडी, गुरूचे उपग्रह आणि तांबूस मंगळ ✪ सुंदर कृत्तिका- ४०० वर्षांपूर्वीचं दृश्य ✪ चंद्राचे खड्डे आणि मैदानं ✪ अहंकाराचे भ्रम दूर करणारं विराट विश्व ✪ नुसत्या डोळ्यांनी दिसणा-या गमती जमती ✪ मुलांचा व पालकांचा उत्साह सर्वांना नमस्कार. सध्या आकाश दर्शनासाठी उत्तम काळ आहे. मध्ये मध्ये येणारे तुरळक ढग सोडले तर रात्री सुंदर आकाश बघता येतं. अनेक ठिकाणी मुलांना आकाशाच्या गमती दाखवण्याची संधी मिळत आहे. आयुर्वेद व्यासपीठ परभणी ह्यांनी मुलांसाठी व मोठ्यांसाठी दि.

प्रकाश आणि सावलीचा दुर्मिळ सोहळा: २५ ऑक्टोबर रोजीचे खंडग्रास सूर्यग्रहण

मार्गी ·

मार्गी 26/10/2022 - 18:45
ग्रहण बघितलेल्या सर्वांचं अभिनंदन! अप्रतिम फोटोज बोकाजी! सूर्यग्रहण बघण्याचा थरार आणि दाखवण्याचं समाधान! काल २५.१०.२०२२ चं खंडग्रास सूर्यग्रहण खूप मस्त बघता आलं. निसर्गाने पूर्ण साथ दिली. एका छोटेखानी कार्यक्रमामध्ये मुलं आणि मोठ्यांनाही टेलिस्कोप, सोलार गॉगल आणि आरशाची प्रतिमा असं तीन प्रकारे दाखवता आलं. बघताना मुलं आणि मोठे मुलंही खूप खुश होते! चेहरे बोलत होते, आनंदाचे चित्कार दिसत होते! आणि धन्यवादही देत होते! मोठेही Life time experience मिळाला म्हणत होते. ग्रहण अद्भुतच होतं अर्थातच. चंद्राचा स्पर्श झाला आणि सूर्याचा वर्तुळाकार भाग लगेच बदलत गेला. अद्भुत अनुभव होता! बघता बघता चंद्र सूर्यासमोर येत होता. तासभर हा सोहळा रंगला. हळु हळु सूर्य झाकला जात होता. बघणारा प्रत्येक जण ह्याचा आनंद घेत होता आणि राहून राहून धन्यवाद देत होता. पुण्यातून चंद्र २३% इतकाच झाकला गेला, पण आनंद मात्र १००% मिळाला. सूर्यास्ताच्या थोडं आधी हळु हळु चंद्र बाहेर जायला निघाला आणि ग्रहण लागलेल्या स्थितीमध्येच सूर्य मावळतानाचा अपूर्व नजाराही दिसला! छोट्या आरशाच्या प्रतिमेमध्ये ग्रहण बघतानाही मुलं खुश होती. ग्रहणाबरोबर सौर डागही बघता आले. त्यानंतर तिथेच रात्री गुरू- शनी हे ग्रह दाखवले, तेव्हाही लहान आणि मोठ्यांनी गर्दी केली! आपण छोट्या कृतीतूनही इतरांना खूप मोठा आनंद आणि नेहमीसाठी लक्षात राहणारा अनुभव देऊ शकतो हे अनुभवता आलं! नुसतं दूरून स्क्रीनवर बघण्यापेक्षा किंवा थिअरी वाचण्यापेक्षा एखादी छोटी गोष्टही प्रत्यक्षात केलेली व अनुभवलेली किती सुंदर अनुभव देते, ह्याची प्रचिती आली! ह्यावेळी घेतलेले हे काही फोटोज-  सुरुवातीचा पूर्ण सूर्य आणि त्यावरील दोन डाग

मार्गी 26/10/2022 - 18:45
ग्रहण बघितलेल्या सर्वांचं अभिनंदन! अप्रतिम फोटोज बोकाजी! सूर्यग्रहण बघण्याचा थरार आणि दाखवण्याचं समाधान! काल २५.१०.२०२२ चं खंडग्रास सूर्यग्रहण खूप मस्त बघता आलं. निसर्गाने पूर्ण साथ दिली. एका छोटेखानी कार्यक्रमामध्ये मुलं आणि मोठ्यांनाही टेलिस्कोप, सोलार गॉगल आणि आरशाची प्रतिमा असं तीन प्रकारे दाखवता आलं. बघताना मुलं आणि मोठे मुलंही खूप खुश होते! चेहरे बोलत होते, आनंदाचे चित्कार दिसत होते! आणि धन्यवादही देत होते! मोठेही Life time experience मिळाला म्हणत होते. ग्रहण अद्भुतच होतं अर्थातच. चंद्राचा स्पर्श झाला आणि सूर्याचा वर्तुळाकार भाग लगेच बदलत गेला. अद्भुत अनुभव होता! बघता बघता चंद्र सूर्यासमोर येत होता. तासभर हा सोहळा रंगला. हळु हळु सूर्य झाकला जात होता. बघणारा प्रत्येक जण ह्याचा आनंद घेत होता आणि राहून राहून धन्यवाद देत होता. पुण्यातून चंद्र २३% इतकाच झाकला गेला, पण आनंद मात्र १००% मिळाला. सूर्यास्ताच्या थोडं आधी हळु हळु चंद्र बाहेर जायला निघाला आणि ग्रहण लागलेल्या स्थितीमध्येच सूर्य मावळतानाचा अपूर्व नजाराही दिसला! छोट्या आरशाच्या प्रतिमेमध्ये ग्रहण बघतानाही मुलं खुश होती. ग्रहणाबरोबर सौर डागही बघता आले. त्यानंतर तिथेच रात्री गुरू- शनी हे ग्रह दाखवले, तेव्हाही लहान आणि मोठ्यांनी गर्दी केली! आपण छोट्या कृतीतूनही इतरांना खूप मोठा आनंद आणि नेहमीसाठी लक्षात राहणारा अनुभव देऊ शकतो हे अनुभवता आलं! नुसतं दूरून स्क्रीनवर बघण्यापेक्षा किंवा थिअरी वाचण्यापेक्षा एखादी छोटी गोष्टही प्रत्यक्षात केलेली व अनुभवलेली किती सुंदर अनुभव देते, ह्याची प्रचिती आली! ह्यावेळी घेतलेले हे काही फोटोज-  सुरुवातीचा पूर्ण सूर्य आणि त्यावरील दोन डाग

मार्गी 26/10/2022 - 18:46
ग्रहण बघितलेल्या सर्वांचं अभिनंदन! अप्रतिम फोटोज बोकाजी! सूर्यग्रहण बघण्याचा थरार आणि दाखवण्याचं समाधान! काल २५.१०.२०२२ चं खंडग्रास सूर्यग्रहण खूप मस्त बघता आलं. निसर्गाने पूर्ण साथ दिली. एका छोटेखानी कार्यक्रमामध्ये मुलं आणि मोठ्यांनाही टेलिस्कोप, सोलार गॉगल आणि आरशाची प्रतिमा असं तीन प्रकारे दाखवता आलं. बघताना मुलं आणि मोठे मुलंही खूप खुश होते! चेहरे बोलत होते, आनंदाचे चित्कार दिसत होते! आणि धन्यवादही देत होते! मोठेही Life time experience मिळाला म्हणत होते. ग्रहण अद्भुतच होतं अर्थातच. चंद्राचा स्पर्श झाला आणि सूर्याचा वर्तुळाकार भाग लगेच बदलत गेला. अद्भुत अनुभव होता! बघता बघता चंद्र सूर्यासमोर येत होता. तासभर हा सोहळा रंगला. हळु हळु सूर्य झाकला जात होता. बघणारा प्रत्येक जण ह्याचा आनंद घेत होता आणि राहून राहून धन्यवाद देत होता. पुण्यातून चंद्र २३% इतकाच झाकला गेला, पण आनंद मात्र १००% मिळाला. सूर्यास्ताच्या थोडं आधी हळु हळु चंद्र बाहेर जायला निघाला आणि ग्रहण लागलेल्या स्थितीमध्येच सूर्य मावळतानाचा अपूर्व नजाराही दिसला! छोट्या आरशाच्या प्रतिमेमध्ये ग्रहण बघतानाही मुलं खुश होती. ग्रहणाबरोबर सौर डागही बघता आले. त्यानंतर तिथेच रात्री गुरू- शनी हे ग्रह दाखवले, तेव्हाही लहान आणि मोठ्यांनी गर्दी केली! आपण छोट्या कृतीतूनही इतरांना खूप मोठा आनंद आणि नेहमीसाठी लक्षात राहणारा अनुभव देऊ शकतो हे अनुभवता आलं! नुसतं दूरून स्क्रीनवर बघण्यापेक्षा किंवा थिअरी वाचण्यापेक्षा एखादी छोटी गोष्टही प्रत्यक्षात केलेली व अनुभवलेली किती सुंदर अनुभव देते, ह्याची प्रचिती आली! ह्यावेळी घेतलेले हे काही फोटोज-  सुरुवातीचा पूर्ण सूर्य आणि त्यावरील दोन डाग

मार्गी 26/10/2022 - 18:46
ग्रहण बघितलेल्या सर्वांचं अभिनंदन! अप्रतिम फोटोज बोकाजी! सूर्यग्रहण बघण्याचा थरार आणि दाखवण्याचं समाधान! काल २५.१०.२०२२ चं खंडग्रास सूर्यग्रहण खूप मस्त बघता आलं. निसर्गाने पूर्ण साथ दिली. एका छोटेखानी कार्यक्रमामध्ये मुलं आणि मोठ्यांनाही टेलिस्कोप, सोलार गॉगल आणि आरशाची प्रतिमा असं तीन प्रकारे दाखवता आलं. बघताना मुलं आणि मोठे मुलंही खूप खुश होते! चेहरे बोलत होते, आनंदाचे चित्कार दिसत होते! आणि धन्यवादही देत होते! मोठेही Life time experience मिळाला म्हणत होते. ग्रहण अद्भुतच होतं अर्थातच. चंद्राचा स्पर्श झाला आणि सूर्याचा वर्तुळाकार भाग लगेच बदलत गेला. अद्भुत अनुभव होता! बघता बघता चंद्र सूर्यासमोर येत होता. तासभर हा सोहळा रंगला. हळु हळु सूर्य झाकला जात होता. बघणारा प्रत्येक जण ह्याचा आनंद घेत होता आणि राहून राहून धन्यवाद देत होता. पुण्यातून चंद्र २३% इतकाच झाकला गेला, पण आनंद मात्र १००% मिळाला. सूर्यास्ताच्या थोडं आधी हळु हळु चंद्र बाहेर जायला निघाला आणि ग्रहण लागलेल्या स्थितीमध्येच सूर्य मावळतानाचा अपूर्व नजाराही दिसला! छोट्या आरशाच्या प्रतिमेमध्ये ग्रहण बघतानाही मुलं खुश होती. ग्रहणाबरोबर सौर डागही बघता आले. त्यानंतर तिथेच रात्री गुरू- शनी हे ग्रह दाखवले, तेव्हाही लहान आणि मोठ्यांनी गर्दी केली! आपण छोट्या कृतीतूनही इतरांना खूप मोठा आनंद आणि नेहमीसाठी लक्षात राहणारा अनुभव देऊ शकतो हे अनुभवता आलं! नुसतं दूरून स्क्रीनवर बघण्यापेक्षा किंवा थिअरी वाचण्यापेक्षा एखादी छोटी गोष्टही प्रत्यक्षात केलेली व अनुभवलेली किती सुंदर अनुभव देते, ह्याची प्रचिती आली! ह्यावेळी घेतलेले हे काही फोटोज-  सुरुवातीचा पूर्ण सूर्य आणि त्यावरील दोन डाग

२४-१०-१९९५ व २५-१०-२०२२ खग्रास व खंडग्रास दोन्ही सूर्यग्रहण बघण्याचे भाग्य लाभले. करोना,डायमंड रिंग सर्व स्टेजेस घरातूनच बघायला मीळाल्या. कालचे ग्रहण पुण्यात ४:५१ ते ६:०६ तब्बल एक तास घडलेला निसर्गाचा चमत्कार मनसोक्त घरातल्या बाल्कनीतून दोन काळे चष्मे घालून बघितला. फोटो पण काढले. वरील फोटो सुदंर आसल्याने परत डकवत नाही. मस्तच अनुभव होता.

मागे गुरू आणि शनी एकत्र असताना सुद्धा तुम्ही छान फोटो काढले होते. ग्रहण पाहण्यासाठी (आरसा वापरून, दुर्बीण वापरून, इ.) तुम्ही कसा सेटअप केला होता, त्याचे फोटो आणि डिटेल्स कृपया टाकू शकताल का?

मार्गी 01/11/2022 - 20:11
सर्वांना धन्यवाद! खरं तर फोटोज अगदी बेसिक आहेत. @ तुषार काळभोर जी, माझ्याकडे ११४/५०० रिफ्लेक्टर टेलिस्कोप आहे. त्याला सोलार फिल्टर लावला. नीट चिकटवला होता. आणि मोबाईल फोन एडप्टर वापरून आयपीसला सेट केला. आणि मस्त आले फोटोज. आधीही सौर डागांसाठी सूर्याचे घेतले होते, त्यामुळे कल्पना होतीच. आणि ग्रूपला दाखवण्यासाठी आरशाच्या प्रतिमेचाही वापर केला होता.

मार्गी 26/10/2022 - 18:45
ग्रहण बघितलेल्या सर्वांचं अभिनंदन! अप्रतिम फोटोज बोकाजी! सूर्यग्रहण बघण्याचा थरार आणि दाखवण्याचं समाधान! काल २५.१०.२०२२ चं खंडग्रास सूर्यग्रहण खूप मस्त बघता आलं. निसर्गाने पूर्ण साथ दिली. एका छोटेखानी कार्यक्रमामध्ये मुलं आणि मोठ्यांनाही टेलिस्कोप, सोलार गॉगल आणि आरशाची प्रतिमा असं तीन प्रकारे दाखवता आलं. बघताना मुलं आणि मोठे मुलंही खूप खुश होते! चेहरे बोलत होते, आनंदाचे चित्कार दिसत होते! आणि धन्यवादही देत होते! मोठेही Life time experience मिळाला म्हणत होते. ग्रहण अद्भुतच होतं अर्थातच. चंद्राचा स्पर्श झाला आणि सूर्याचा वर्तुळाकार भाग लगेच बदलत गेला. अद्भुत अनुभव होता! बघता बघता चंद्र सूर्यासमोर येत होता. तासभर हा सोहळा रंगला. हळु हळु सूर्य झाकला जात होता. बघणारा प्रत्येक जण ह्याचा आनंद घेत होता आणि राहून राहून धन्यवाद देत होता. पुण्यातून चंद्र २३% इतकाच झाकला गेला, पण आनंद मात्र १००% मिळाला. सूर्यास्ताच्या थोडं आधी हळु हळु चंद्र बाहेर जायला निघाला आणि ग्रहण लागलेल्या स्थितीमध्येच सूर्य मावळतानाचा अपूर्व नजाराही दिसला! छोट्या आरशाच्या प्रतिमेमध्ये ग्रहण बघतानाही मुलं खुश होती. ग्रहणाबरोबर सौर डागही बघता आले. त्यानंतर तिथेच रात्री गुरू- शनी हे ग्रह दाखवले, तेव्हाही लहान आणि मोठ्यांनी गर्दी केली! आपण छोट्या कृतीतूनही इतरांना खूप मोठा आनंद आणि नेहमीसाठी लक्षात राहणारा अनुभव देऊ शकतो हे अनुभवता आलं! नुसतं दूरून स्क्रीनवर बघण्यापेक्षा किंवा थिअरी वाचण्यापेक्षा एखादी छोटी गोष्टही प्रत्यक्षात केलेली व अनुभवलेली किती सुंदर अनुभव देते, ह्याची प्रचिती आली! ह्यावेळी घेतलेले हे काही फोटोज-  सुरुवातीचा पूर्ण सूर्य आणि त्यावरील दोन डाग

मार्गी 26/10/2022 - 18:45
ग्रहण बघितलेल्या सर्वांचं अभिनंदन! अप्रतिम फोटोज बोकाजी! सूर्यग्रहण बघण्याचा थरार आणि दाखवण्याचं समाधान! काल २५.१०.२०२२ चं खंडग्रास सूर्यग्रहण खूप मस्त बघता आलं. निसर्गाने पूर्ण साथ दिली. एका छोटेखानी कार्यक्रमामध्ये मुलं आणि मोठ्यांनाही टेलिस्कोप, सोलार गॉगल आणि आरशाची प्रतिमा असं तीन प्रकारे दाखवता आलं. बघताना मुलं आणि मोठे मुलंही खूप खुश होते! चेहरे बोलत होते, आनंदाचे चित्कार दिसत होते! आणि धन्यवादही देत होते! मोठेही Life time experience मिळाला म्हणत होते. ग्रहण अद्भुतच होतं अर्थातच. चंद्राचा स्पर्श झाला आणि सूर्याचा वर्तुळाकार भाग लगेच बदलत गेला. अद्भुत अनुभव होता! बघता बघता चंद्र सूर्यासमोर येत होता. तासभर हा सोहळा रंगला. हळु हळु सूर्य झाकला जात होता. बघणारा प्रत्येक जण ह्याचा आनंद घेत होता आणि राहून राहून धन्यवाद देत होता. पुण्यातून चंद्र २३% इतकाच झाकला गेला, पण आनंद मात्र १००% मिळाला. सूर्यास्ताच्या थोडं आधी हळु हळु चंद्र बाहेर जायला निघाला आणि ग्रहण लागलेल्या स्थितीमध्येच सूर्य मावळतानाचा अपूर्व नजाराही दिसला! छोट्या आरशाच्या प्रतिमेमध्ये ग्रहण बघतानाही मुलं खुश होती. ग्रहणाबरोबर सौर डागही बघता आले. त्यानंतर तिथेच रात्री गुरू- शनी हे ग्रह दाखवले, तेव्हाही लहान आणि मोठ्यांनी गर्दी केली! आपण छोट्या कृतीतूनही इतरांना खूप मोठा आनंद आणि नेहमीसाठी लक्षात राहणारा अनुभव देऊ शकतो हे अनुभवता आलं! नुसतं दूरून स्क्रीनवर बघण्यापेक्षा किंवा थिअरी वाचण्यापेक्षा एखादी छोटी गोष्टही प्रत्यक्षात केलेली व अनुभवलेली किती सुंदर अनुभव देते, ह्याची प्रचिती आली! ह्यावेळी घेतलेले हे काही फोटोज-  सुरुवातीचा पूर्ण सूर्य आणि त्यावरील दोन डाग

मार्गी 26/10/2022 - 18:46
ग्रहण बघितलेल्या सर्वांचं अभिनंदन! अप्रतिम फोटोज बोकाजी! सूर्यग्रहण बघण्याचा थरार आणि दाखवण्याचं समाधान! काल २५.१०.२०२२ चं खंडग्रास सूर्यग्रहण खूप मस्त बघता आलं. निसर्गाने पूर्ण साथ दिली. एका छोटेखानी कार्यक्रमामध्ये मुलं आणि मोठ्यांनाही टेलिस्कोप, सोलार गॉगल आणि आरशाची प्रतिमा असं तीन प्रकारे दाखवता आलं. बघताना मुलं आणि मोठे मुलंही खूप खुश होते! चेहरे बोलत होते, आनंदाचे चित्कार दिसत होते! आणि धन्यवादही देत होते! मोठेही Life time experience मिळाला म्हणत होते. ग्रहण अद्भुतच होतं अर्थातच. चंद्राचा स्पर्श झाला आणि सूर्याचा वर्तुळाकार भाग लगेच बदलत गेला. अद्भुत अनुभव होता! बघता बघता चंद्र सूर्यासमोर येत होता. तासभर हा सोहळा रंगला. हळु हळु सूर्य झाकला जात होता. बघणारा प्रत्येक जण ह्याचा आनंद घेत होता आणि राहून राहून धन्यवाद देत होता. पुण्यातून चंद्र २३% इतकाच झाकला गेला, पण आनंद मात्र १००% मिळाला. सूर्यास्ताच्या थोडं आधी हळु हळु चंद्र बाहेर जायला निघाला आणि ग्रहण लागलेल्या स्थितीमध्येच सूर्य मावळतानाचा अपूर्व नजाराही दिसला! छोट्या आरशाच्या प्रतिमेमध्ये ग्रहण बघतानाही मुलं खुश होती. ग्रहणाबरोबर सौर डागही बघता आले. त्यानंतर तिथेच रात्री गुरू- शनी हे ग्रह दाखवले, तेव्हाही लहान आणि मोठ्यांनी गर्दी केली! आपण छोट्या कृतीतूनही इतरांना खूप मोठा आनंद आणि नेहमीसाठी लक्षात राहणारा अनुभव देऊ शकतो हे अनुभवता आलं! नुसतं दूरून स्क्रीनवर बघण्यापेक्षा किंवा थिअरी वाचण्यापेक्षा एखादी छोटी गोष्टही प्रत्यक्षात केलेली व अनुभवलेली किती सुंदर अनुभव देते, ह्याची प्रचिती आली! ह्यावेळी घेतलेले हे काही फोटोज-  सुरुवातीचा पूर्ण सूर्य आणि त्यावरील दोन डाग

मार्गी 26/10/2022 - 18:46
ग्रहण बघितलेल्या सर्वांचं अभिनंदन! अप्रतिम फोटोज बोकाजी! सूर्यग्रहण बघण्याचा थरार आणि दाखवण्याचं समाधान! काल २५.१०.२०२२ चं खंडग्रास सूर्यग्रहण खूप मस्त बघता आलं. निसर्गाने पूर्ण साथ दिली. एका छोटेखानी कार्यक्रमामध्ये मुलं आणि मोठ्यांनाही टेलिस्कोप, सोलार गॉगल आणि आरशाची प्रतिमा असं तीन प्रकारे दाखवता आलं. बघताना मुलं आणि मोठे मुलंही खूप खुश होते! चेहरे बोलत होते, आनंदाचे चित्कार दिसत होते! आणि धन्यवादही देत होते! मोठेही Life time experience मिळाला म्हणत होते. ग्रहण अद्भुतच होतं अर्थातच. चंद्राचा स्पर्श झाला आणि सूर्याचा वर्तुळाकार भाग लगेच बदलत गेला. अद्भुत अनुभव होता! बघता बघता चंद्र सूर्यासमोर येत होता. तासभर हा सोहळा रंगला. हळु हळु सूर्य झाकला जात होता. बघणारा प्रत्येक जण ह्याचा आनंद घेत होता आणि राहून राहून धन्यवाद देत होता. पुण्यातून चंद्र २३% इतकाच झाकला गेला, पण आनंद मात्र १००% मिळाला. सूर्यास्ताच्या थोडं आधी हळु हळु चंद्र बाहेर जायला निघाला आणि ग्रहण लागलेल्या स्थितीमध्येच सूर्य मावळतानाचा अपूर्व नजाराही दिसला! छोट्या आरशाच्या प्रतिमेमध्ये ग्रहण बघतानाही मुलं खुश होती. ग्रहणाबरोबर सौर डागही बघता आले. त्यानंतर तिथेच रात्री गुरू- शनी हे ग्रह दाखवले, तेव्हाही लहान आणि मोठ्यांनी गर्दी केली! आपण छोट्या कृतीतूनही इतरांना खूप मोठा आनंद आणि नेहमीसाठी लक्षात राहणारा अनुभव देऊ शकतो हे अनुभवता आलं! नुसतं दूरून स्क्रीनवर बघण्यापेक्षा किंवा थिअरी वाचण्यापेक्षा एखादी छोटी गोष्टही प्रत्यक्षात केलेली व अनुभवलेली किती सुंदर अनुभव देते, ह्याची प्रचिती आली! ह्यावेळी घेतलेले हे काही फोटोज-  सुरुवातीचा पूर्ण सूर्य आणि त्यावरील दोन डाग

२४-१०-१९९५ व २५-१०-२०२२ खग्रास व खंडग्रास दोन्ही सूर्यग्रहण बघण्याचे भाग्य लाभले. करोना,डायमंड रिंग सर्व स्टेजेस घरातूनच बघायला मीळाल्या. कालचे ग्रहण पुण्यात ४:५१ ते ६:०६ तब्बल एक तास घडलेला निसर्गाचा चमत्कार मनसोक्त घरातल्या बाल्कनीतून दोन काळे चष्मे घालून बघितला. फोटो पण काढले. वरील फोटो सुदंर आसल्याने परत डकवत नाही. मस्तच अनुभव होता.

मागे गुरू आणि शनी एकत्र असताना सुद्धा तुम्ही छान फोटो काढले होते. ग्रहण पाहण्यासाठी (आरसा वापरून, दुर्बीण वापरून, इ.) तुम्ही कसा सेटअप केला होता, त्याचे फोटो आणि डिटेल्स कृपया टाकू शकताल का?

मार्गी 01/11/2022 - 20:11
सर्वांना धन्यवाद! खरं तर फोटोज अगदी बेसिक आहेत. @ तुषार काळभोर जी, माझ्याकडे ११४/५०० रिफ्लेक्टर टेलिस्कोप आहे. त्याला सोलार फिल्टर लावला. नीट चिकटवला होता. आणि मोबाईल फोन एडप्टर वापरून आयपीसला सेट केला. आणि मस्त आले फोटोज. आधीही सौर डागांसाठी सूर्याचे घेतले होते, त्यामुळे कल्पना होतीच. आणि ग्रूपला दाखवण्यासाठी आरशाच्या प्रतिमेचाही वापर केला होता.
२५ ऑक्टोबर रोजीचे खंडग्रास सूर्यग्रहण पूर्ण भारतात दिसू शकेल नमस्कार. प्रकाशाचा सोहळा असलेली दिवाळी लवकरच येते आहे. प्रकाशाच्या ह्या सोहळ्यासोबत ह्यावेळी प्रकाश आणि सावलीचा दुर्मिळ सोहळा म्हणजे खंडग्रास सूर्यग्रहणही बघता येणार आहे. २५ ऑक्टोबरच्या सायंकाळी चंद्र सूर्याच्या काही भागाला झाकणार आहे आणि हे बघायची संधी आपण सर्वांना आहे. अगदी दिवाळीतच मला स्वत:ला एक रमणीय असं सूर्यग्रहण बघितल्याचं आठवतं. पण ते वर्ष १९९५ होतं आणि तेव्हा मी लहान होतो. त्यामुळे मुलांसाठी ही संधी किती वेगळी असते ह्याची कल्पना आहे.

अलेक्सा झाssssली ...!!

गवि ·

गवि 22/09/2022 - 07:59
हल्लीच एका Artificial intelligence धाग्यावर झालेली चर्चा वाचून हे एक भविष्यकालीन काल्पनिक लिखाण आठवलं. ते प्रकाशित केलं. तीन वर्षांपूर्वीचा तो ऐतिहासिक मिपा छापील दिवाळी अंक ज्यांच्यापर्यंत पोचला नसेल अशा वाचकांसाठी.

गोष्ट वाचताना टाईम मशिन मधे बसुन भविष्यात चक्कर मारायला गेल्या सारखे वाटत होते. यातल्या काही गोष्टी कदाचित आज अतिरंजित वाटत असतील, पण आपए भविष्य असेच काहिसे असणार आहे. रच्याकने :- छापिल अंकात प्रतिक्रीया देता येत नाहीत. पैजारबुवा,

पण हा लेख म्हणजे अतिशयोक्ती अजिबात म्हणता येणार नाही. दुध कोण देतो? भैय्या अन्नाचे स्त्रोत कोणते? स्विगी आणि झोमॅटो हे विनोद जुने झाले. आणि निदान भैय्या आपला डेटा दुसर्‍या कोणाला विकत तरी नव्हता. विविध अ‍ॅप्स मुळे आपल्या जीवनातील सुखवस्तुपणा वाढला पण खाजगीपणा संपत चालला आहे. टोकाच्या ऑटोमेशन कडुन आता टोकाच्या ऑफलाईन मोड्कडे जायची आवश्यकता निर्माण झाली आहे.

श्वेता२४ 22/09/2022 - 11:35
असं भविष्यात घडू नये यासाठी आतापासूनच काळजी घेतली पाहिजे. नातेसंबंध इतके टोकाचे आर्टीफीशिअल व्हायला वेळ लागणार नाही.

In reply to by वामन देशमुख

वामन देशमुख 23/09/2022 - 08:50
लिखाण आवडलं. पंचेस, कोट्या आणि ओघवती शैली... टिपिकल गवि! लेखात लिहिलेल्या गोष्टी अंशतः सध्याच अस्तित्वात आहेत उरलेल्या गोष्टीही अस्तित्वात येण्याचा काळ फार दूर नाही.

ही वास्तववादी भविष्यकालीन गोष्ट आहे. आयतेपणा एकदा अंगात भिनला की तो झटकणं म्हणजे मानेवर बसलेला वेताळ उतरवण्यापेक्षा कठीण. हे अगदी खरंय.

झाssssलीssss ...!!!!! ही आरोळी दररोज आमच्या कानावर पण येते. बहुतेक तीन पिढ्या एकत्र असल्या व तीसरी आगदी छोटी असेल तर हमखास. माणूस सोशल प्राणी. सोशल मिडीया पहिल्यांदा पण होता पण त्याचे स्वरूप वेगळे होते. अतीशय मर्यादित होते. तंत्रज्ञानाने त्या सर्व मर्यादा तोडल्या माणसाच्या हातातला कंट्रोल बराचसा काढून घेतला. बाकी आम्ही तुमच्याच पिढीतले, दुःख म्हणजे दुःख असतं ते तुमचं आमचं सेम असतं

घरातल्या सगळ्या वस्तू एकमेकांशी जोडल्या गेल्या, माणसं सोडून. किती तरी वर्षे झाली, मुलां बरोबर साधा, बदाम सात, पण खेळलेलो नाही ... कालाय तस्मै नमः

Bhakti 22/09/2022 - 20:05
मस्तच! कथा आवडली. तंत्रज्ञानाने आपला ताबा घेतला आहे तो वाढतच आहे. लेकीला सेन्स ओरगन (ज्ञानेंद्रिये) शिकवत होते...तेव्हा मी-आपण कशाने पाहतो? मुलगी-मोबाईलने मी-तस नाही आपण टीव्ही कशाने पाहतो? मुलगी-रिमोटने तिसऱ्या प्रयत्नात जमलं !! आपली कामं कोणता यंत्र करून देईल याचाच शोध सतत आपण घेत असतो.

उपाशी बोका 22/09/2022 - 21:13
तंत्रज्ञानावर अती अवलंबून राहणे सुरू झाले आहे. --------------------- हा फेमस पिझा कंपनीचा फोन नंबर आहे का? नाही, आम्ही गूगल पिझा कंपनी आहोत. ओह, मी चुकीचा नंबर डायल केलेला दिसतोय. नाही सर, आम्ही आता त्या कंपनीला विकत घेतलंय. असं आहे होय. बरं, मला पिझा ऑर्डर द्यायची होती. सर, तुमची नेहमीचीच ऑर्डर का? नेहमीचीच? तुम्हाला काय माहीत ते? सर, तुमच्या फोननंबर वरून आम्हाला माहीत आहे की गेल्या १५ वेळेला तुम्ही १२ स्लाइसचा लार्ज पिझा विथ डबल चीज, सॉसेज आणि थिक क्रस्ट ऑर्डर केला आहे. हो, या वेळी पण तोच पाहिजे. सर, मी सुचवू का की या वेळेस तुम्ही ८ स्लाइसचा व्हेजिटेबल पिझा विथ ब्रोकोली, मश्रुम आणि टोमॅटो असा घ्यावा. नको, मला तो भाज्यांचा पिझा आवडत नाही. पण सर, तुमचे कोलेस्ट्रॉल जास्त आहे. तुम्हाला काय माहीत? तुमच्या एमेलमधल्या गेल्या ७ वर्षांच्या रिपोर्टवरून कळले तसे. असु दे, असु दे. पण मला नकोय तो पिझा. आणि तसं पण मी कोलेस्ट्रॉलचं औषध घेतो. पण सर, तुम्ही औषध नियमीत घेत नाही. गेल्यावेळी तुम्ही हॅपिहेल्थ फार्मसीमधून फक्त ३० टॅबलेट्स खरेदी केल्या त्या पण ४ महिन्यांपूर्वी. मी अजून टॅबलेट्स दुसर्‍या फार्मसीमधून घेतल्या. पण सर, तुमच्या क्रेडिट कार्डवर तसं काही दिसत नाहीये. मी रोख पैसे दिले. पण सर, तुमच्या बँक स्टेटमेंटवर तर दिसत नाहीये की तुम्ही पुरेसे पैसे काढले. माझ्याकडे उत्पन्नाचा दुसरा सोर्स आहे. पण सर, अशी रक्कम जाहीर केलेलं तुमच्या टॅक्स रिटर्नवर दिसत नाहीये. खड्ड्यात गेला तुमचा पिझा. मला या गूगल, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप सगळ्याचा वीट आला आहे. मी आता दूर एका बेटावर जाऊन राहाणार आहे, जिथे फोन पण नसेल आणि इंटरनेट पण नसेल. मला तुमच्या भावना समजतात. पण सर, तुम्ही पासपोर्टशिवाय जाणारच कसे? कारण आमच्या रेकॉर्डनुसार तर तो २ महिन्यापूर्वीच संपला.

लिओ 24/09/2022 - 20:51
" नातु अलेक्सा... "झाssssलीssss ...!!!!!" "असे ओरडला ? मला वाटते नातु alexa..... it's done असे ओरडला असेल ?

गवि 22/09/2022 - 07:59
हल्लीच एका Artificial intelligence धाग्यावर झालेली चर्चा वाचून हे एक भविष्यकालीन काल्पनिक लिखाण आठवलं. ते प्रकाशित केलं. तीन वर्षांपूर्वीचा तो ऐतिहासिक मिपा छापील दिवाळी अंक ज्यांच्यापर्यंत पोचला नसेल अशा वाचकांसाठी.

गोष्ट वाचताना टाईम मशिन मधे बसुन भविष्यात चक्कर मारायला गेल्या सारखे वाटत होते. यातल्या काही गोष्टी कदाचित आज अतिरंजित वाटत असतील, पण आपए भविष्य असेच काहिसे असणार आहे. रच्याकने :- छापिल अंकात प्रतिक्रीया देता येत नाहीत. पैजारबुवा,

पण हा लेख म्हणजे अतिशयोक्ती अजिबात म्हणता येणार नाही. दुध कोण देतो? भैय्या अन्नाचे स्त्रोत कोणते? स्विगी आणि झोमॅटो हे विनोद जुने झाले. आणि निदान भैय्या आपला डेटा दुसर्‍या कोणाला विकत तरी नव्हता. विविध अ‍ॅप्स मुळे आपल्या जीवनातील सुखवस्तुपणा वाढला पण खाजगीपणा संपत चालला आहे. टोकाच्या ऑटोमेशन कडुन आता टोकाच्या ऑफलाईन मोड्कडे जायची आवश्यकता निर्माण झाली आहे.

श्वेता२४ 22/09/2022 - 11:35
असं भविष्यात घडू नये यासाठी आतापासूनच काळजी घेतली पाहिजे. नातेसंबंध इतके टोकाचे आर्टीफीशिअल व्हायला वेळ लागणार नाही.

In reply to by वामन देशमुख

वामन देशमुख 23/09/2022 - 08:50
लिखाण आवडलं. पंचेस, कोट्या आणि ओघवती शैली... टिपिकल गवि! लेखात लिहिलेल्या गोष्टी अंशतः सध्याच अस्तित्वात आहेत उरलेल्या गोष्टीही अस्तित्वात येण्याचा काळ फार दूर नाही.

ही वास्तववादी भविष्यकालीन गोष्ट आहे. आयतेपणा एकदा अंगात भिनला की तो झटकणं म्हणजे मानेवर बसलेला वेताळ उतरवण्यापेक्षा कठीण. हे अगदी खरंय.

झाssssलीssss ...!!!!! ही आरोळी दररोज आमच्या कानावर पण येते. बहुतेक तीन पिढ्या एकत्र असल्या व तीसरी आगदी छोटी असेल तर हमखास. माणूस सोशल प्राणी. सोशल मिडीया पहिल्यांदा पण होता पण त्याचे स्वरूप वेगळे होते. अतीशय मर्यादित होते. तंत्रज्ञानाने त्या सर्व मर्यादा तोडल्या माणसाच्या हातातला कंट्रोल बराचसा काढून घेतला. बाकी आम्ही तुमच्याच पिढीतले, दुःख म्हणजे दुःख असतं ते तुमचं आमचं सेम असतं

घरातल्या सगळ्या वस्तू एकमेकांशी जोडल्या गेल्या, माणसं सोडून. किती तरी वर्षे झाली, मुलां बरोबर साधा, बदाम सात, पण खेळलेलो नाही ... कालाय तस्मै नमः

Bhakti 22/09/2022 - 20:05
मस्तच! कथा आवडली. तंत्रज्ञानाने आपला ताबा घेतला आहे तो वाढतच आहे. लेकीला सेन्स ओरगन (ज्ञानेंद्रिये) शिकवत होते...तेव्हा मी-आपण कशाने पाहतो? मुलगी-मोबाईलने मी-तस नाही आपण टीव्ही कशाने पाहतो? मुलगी-रिमोटने तिसऱ्या प्रयत्नात जमलं !! आपली कामं कोणता यंत्र करून देईल याचाच शोध सतत आपण घेत असतो.

उपाशी बोका 22/09/2022 - 21:13
तंत्रज्ञानावर अती अवलंबून राहणे सुरू झाले आहे. --------------------- हा फेमस पिझा कंपनीचा फोन नंबर आहे का? नाही, आम्ही गूगल पिझा कंपनी आहोत. ओह, मी चुकीचा नंबर डायल केलेला दिसतोय. नाही सर, आम्ही आता त्या कंपनीला विकत घेतलंय. असं आहे होय. बरं, मला पिझा ऑर्डर द्यायची होती. सर, तुमची नेहमीचीच ऑर्डर का? नेहमीचीच? तुम्हाला काय माहीत ते? सर, तुमच्या फोननंबर वरून आम्हाला माहीत आहे की गेल्या १५ वेळेला तुम्ही १२ स्लाइसचा लार्ज पिझा विथ डबल चीज, सॉसेज आणि थिक क्रस्ट ऑर्डर केला आहे. हो, या वेळी पण तोच पाहिजे. सर, मी सुचवू का की या वेळेस तुम्ही ८ स्लाइसचा व्हेजिटेबल पिझा विथ ब्रोकोली, मश्रुम आणि टोमॅटो असा घ्यावा. नको, मला तो भाज्यांचा पिझा आवडत नाही. पण सर, तुमचे कोलेस्ट्रॉल जास्त आहे. तुम्हाला काय माहीत? तुमच्या एमेलमधल्या गेल्या ७ वर्षांच्या रिपोर्टवरून कळले तसे. असु दे, असु दे. पण मला नकोय तो पिझा. आणि तसं पण मी कोलेस्ट्रॉलचं औषध घेतो. पण सर, तुम्ही औषध नियमीत घेत नाही. गेल्यावेळी तुम्ही हॅपिहेल्थ फार्मसीमधून फक्त ३० टॅबलेट्स खरेदी केल्या त्या पण ४ महिन्यांपूर्वी. मी अजून टॅबलेट्स दुसर्‍या फार्मसीमधून घेतल्या. पण सर, तुमच्या क्रेडिट कार्डवर तसं काही दिसत नाहीये. मी रोख पैसे दिले. पण सर, तुमच्या बँक स्टेटमेंटवर तर दिसत नाहीये की तुम्ही पुरेसे पैसे काढले. माझ्याकडे उत्पन्नाचा दुसरा सोर्स आहे. पण सर, अशी रक्कम जाहीर केलेलं तुमच्या टॅक्स रिटर्नवर दिसत नाहीये. खड्ड्यात गेला तुमचा पिझा. मला या गूगल, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप सगळ्याचा वीट आला आहे. मी आता दूर एका बेटावर जाऊन राहाणार आहे, जिथे फोन पण नसेल आणि इंटरनेट पण नसेल. मला तुमच्या भावना समजतात. पण सर, तुम्ही पासपोर्टशिवाय जाणारच कसे? कारण आमच्या रेकॉर्डनुसार तर तो २ महिन्यापूर्वीच संपला.

लिओ 24/09/2022 - 20:51
" नातु अलेक्सा... "झाssssलीssss ...!!!!!" "असे ओरडला ? मला वाटते नातु alexa..... it's done असे ओरडला असेल ?
अलेक्सा... "झाssssलीssss ...!!!!!" माझा नातू खच्चून ओरडत होता. मी जमेल तितका झटपट उठून बसलो. एकदम उभा राहिलो तर मला ब्लॅक आउट व्हायला होतं. बराच वेळ मी आडवाच असतो ना, म्हणून. एक मिनिट बसून मी उभा राहिलो. संतुलित होऊन बाथरुमकडे पावलं टाकत निघालो. मीही जाता जाता अलेक्सा अलेक्सा ओरडत राहिलो. काय झालं होतं मला कळेना.

गडकरींनी पुण्यात केले 'हे' वक्तव्य... खड्ड्यात वाहन गेले की...

पाषाणभेद ·

वाफेवर चहा, हवेत गाडि हे असले काहि बाहि विपरित एक्न्याचि सवय झालि आहे गुरुपासुन २०१४ ला आलेत तेव्हापासुन त्यात गड्करि साहेब आपन पन सामिल व्हा गरिब बिचारि प्रजा

विवेकपटाईत 14/09/2022 - 17:17
माझ्या सरकारी नोकरीचा शेवटचा काळ परिवहन मंत्रालयात गेला. माननीय गडकरी साहेब कितीही विनोद आणि कोट्या करत असले तरी कामाच्या बाबतीत अत्यंत शिस्तबध्द आहे. प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण झालेच पाहिजे. कुठलाही बहाणा त्यांना चालतं नाही.

श्रीगुरुजी 14/09/2022 - 17:28
गडकरी साहेब कितीही विनोद आणि कोट्या करत असले तरी कामाच्या बाबतीत अत्यंत शिस्तबध्द आहे. प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण झालेच पाहिजे. कुठलाही बहाणा त्यांना चालतं नाही. पुणे-सातारा महामार्ग लवकरच व्यवस्थित होईल असे गडकरींनी अनेकदा आश्वासन दिले आहे. परंतु प्रत्येक वर्षी या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत आहे व टोल प्रचंड वाढत चाललाय. पुणे-मुंबई महामार्गावरील चांदणी चौकात पूर्ण राडा झाला आहे. हे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि भविष्यात किमान ५ वर्षे हा रस्ता व्यवस्थित होण्याची सुतराम शक्यता नाही.

In reply to by श्रीगुरुजी

पुणे सातारा रस्त्याबद्दल सहमत. गडकरी खूप वेळा अतिशय अतिशयोक्तीपूर्ण बोलतात. पुणे बंगलोर अंतर अवघ्या ४ तासात कापता येईल, रस्त्यांची कामे नीट न केल्यास कंत्राटदाराला बुलडोझरखाली चिरडू, २०२४ च्या निवडणूकीपूर्वी भारतातील रस्ते अमेरीकेतल्या रस्त्यांसारखे असतील, उडणारी बस वगैरे वगैरे त्यांची काही अतिशयोक्तीपूर्ण वक्तव्ये. पुणे सातारा अथवा मुंबई गोवा महामार्गाची कामे ईतकी रखडलीत व दर्जाहीन होत असून सुध्दा कुणा कंत्राटदारावर काही मोठी कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. नुसतीच तोंडाची वाफ दवडणे चालू आहे.

In reply to by अभिजीत अवलिया

श्रीगुरुजी 17/09/2022 - 14:02
गडकरींनी ४-५ महिन्यांपूर्वी लोकसभेत दिलेले अजून एक आश्वासन म्हणजे पुढील १२ महिन्यांच्या आत भारतातील सर्व टोलनाके बंद होऊन सर्वत्र fast tag वापर सुरू होईल. तसे होण्याची शक्यता अजून तरी दिसते नाही.

स्वधर्म 14/09/2022 - 17:29
पण खरोखरच हा विषय अत्यंत महत्वाचा आणि तितक्याच चुकीच्या पध्दतीने हाताळला जात आहे, असे वाटते. सरकार कोणतेही असो, परिवहन धोरण हे जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतुकीस प्राधान्य देणारे असण्याच्या ऐवजी जास्तीत जास्त कंत्राटे, जास्तीत जास्त प्रकल्प, त्यातून जास्तीत जास्त मलई, जास्तीत जास्त वाहनांचा खप, टोल कंपन्या यांच्यासाठीच काम करते असे वाटते. एसटी चा संप आणि तिची सध्याची अवस्था हा याचा ढळढळीत पुरावाच.

In reply to by स्वधर्म

टर्मीनेटर 14/09/2022 - 18:06
+१००० शब्दा शब्दाशी सहमत आहे! तसेच महामार्गांचे रुंदीकरण करण्यासाठी जमीन संपादन करताना सरकारी भावापेक्षा कितीतरी अधिक दर देउन त्या मार्गांवरच्या जमीनींचे भाव अव्वाच्या साव्वा वाढवण्यातुन फार मोठ्या घोटाळ्याचा संशय येतो आहे. ह्या आणि अशा अनेक उपदव्यापांमुळे भविष्यात कधीतरी (चुकुन माकुन सत्तापालट झाल्यास) गडकरींना ईडी चौकशीला सामोरे जावे लागल्यास मला तरी अजिबात आश्चर्य वाटणार नाही. असो, गंभीर विषय विनोदी पद्धतीने चांगला हाताळला आहेत पाभे 👍

In reply to by टर्मीनेटर

मनो 15/09/2022 - 08:18
आता पुणे-बंगळूर द्रुतगती महामार्ग होणार, तो आपल्याच जमिनीतून जावा यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात आलेली आहे. पावसाचे निमित्त करून महामार्ग फलटण, खटाव या अविकसित दुष्काळी भागातून जावा असे प्रयत्न चालू आहेत. पुढच्या निवडणुकीची सोय नाहीतर कशी होणार?

In reply to by स्वधर्म

विवेकपटाईत 16/09/2022 - 09:54
गेल्या आठ वर्षांतील बदल डोळ्यांनी स्पष्ट दिसतो. मध्य प्रदेश गुजरात राजस्थान हिमाचल उत्तराखंड इथल्या रस्त्यांचा अनुभव हेच सांगतो. पूर्वी नागपुर चंद्रपूर पूर्वी बसला सहा ते सात तास लगायचे आता तीन तास बस घेते. बाकी महाराष्ट्रात काम करणे कठीण आहे, हे ही खरे. (एक अभियंताने मला सहज म्हंटले होते, महाराष्ट्रातील लोक सर्वात इमानदार असतात आणि तिथले स्थानीय नेते देशात सर्वात भ्रष्ट).

In reply to by विवेकपटाईत

चौथा कोनाडा 17/09/2022 - 13:10
"महाराष्ट्रातील लोक सर्वात इमानदार असतात आणि तिथले स्थानीय नेते देशात सर्वात भ्रष्ट" +१ - आवडलेले वाक्य

तिता 14/09/2022 - 17:54
मला हा लेख उपरोधिक आहे का खरेच गडकरी असे बोलले हे समजले नाही. विनोदी असेल तर अतिशयोक्ती फार आहे. खरे असेल तर .... माझी समज कमी आहे.

विजुभाऊ 14/09/2022 - 18:45
मिस्त्री ंच्या निधनानंतर गडकरींनी मागच्या सीटवरील लोकाम्ना सीट बेल्ट सक्तीचा केला . .सीट बेल्ट कम्पल्सरी म्हणजे पोलीसांना वसुलीचा नवा मार्ग दाखवून दिला आहे. पण त्या अगोदर चुकीचा डिव्हायडर , खड्डे असलेले रस्ते यांना जबाबदार लोकांना काहीच केले नाही. रस्त्यावर ओसंडून वाहणारे ट्रक चालक आणि मालक यांना काहीच करणार नाहीत , हायवेवरून उजव्या लेन मधला रस्ता आडवून अवजड ट्रक चालवणारे इंडीकेटर नसलेले , बांधकामाच्या सळ्या चारचार फूट बाहेर आणत वाहुन नेणारे ट्रक जुने, खिळखिळे झालेले तरीही वाहतूक करणारे ट्रक याना कोण शासन करणार?

सामान्य माणसाला या खड्डेयुक्त रस्त्यावरुन गाडी चालविल्याशिवाय पर्याय आहे का? १.रस्ते अपघातात "खड्डे चुकविण्यामधे अपघाती मृत्यु " या कारणामुळे यावर्षी ८ जण मरण पावले आहेत. शेवटचा मृत्यु कल्याण जवळील शहाड पुलावर झाला आहे. नोंदले न गेलेले कितीतरी असतील. २. गणपती जाउन आठवडा होत आला तरी गल्लोगल्ली मंडप रस्ते अडवुन उभेच आहेत. आधीच लहान असलेल्या गल्ल्यांमध्ये शाळा भरण्या सुटण्याच्या वेळी जी काही गर्दी आणि ट्रॅफिक जॅम होते ते बघुन हताश व्हायला होते. ३. पुण्यात चांदणी चौक म्हणजे तर भलताच विनोदी विषय झालाय. ऑफिसमधुन घरी येताना किमान २ कि. मी. अलीकडेपासुन बंपर टु बंपर गाडी चालवायला लागते. मागच्याच आठवड्यात मुख्यमंत्र्यांना त्याचा फटका बसल्याने आता मात्र तिकडे अरुंद पूल पाडण्याची जोरदार तयारी चालु आहे. ४. पुणे-सातारा मार्ग-- आपण फक्त टोल भरण्यासाठीच जन्मलो आहोत, त्याबदल्यात काही सुविधा वगैरे मिळाव्यात अशी अपेक्षाच करणे चुक आहे. ५. पुणे-नगर मार्ग म्हणजे मृत्युचा सापळा बनला आहे असा धागा मिपावर आल्याच्या दुसर्‍याच दिवशी तिथे एक मोठा अपघात होउन एकाच कुटुंबातील ४ जण गेले. ६. सायरस मिस्त्रींचा अपघात झाल्याने मुंबई वलसाड महामार्ग लवकरच सुधारेल असे वाटते. ७. कायप्पावरील विनोद- एखादा नेता किवा मोठा माणुस मेल्याशिवाय रस्त्यांचे भाग्य उजळत नाही, त्यामुळे आता कोकणवासी लोकांनी मुंबई-गोवा महामार्ग लवकर नीट व्हावा म्हणुन नेते मंडळींना "येवा कोकण आपलाच असा" अशी हाक मारली आहे. :)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

श्रीगुरुजी 14/09/2022 - 20:28
परवा पुण्यातून कात्रजमार्गे लवळेला जाताना चांदणी चौकाच्या अलिकडे १ किमी पासून वाहतूक खोळंबा सुरू झाला. ते १ किमी अंतर काटण्यास २० मिनिटे लागली. त्यामुळे लवळेतून पुण्यात येतान महामार्ग टाळण्यासाठी सूसवरून पाषाण-सुतारवाडीकडे जाण्यासाठी महामार्गाच्या वरून जाणाऱ्या उड्डाणपुलावरून गेललो. दिशेचा अंदाज घेत पाषाण, सुतारवाडी, NCL, ARDE वरून अभिमानश्री सोसायटीतून बाणेर रस्त्यावर येऊन विद्यापीठाच्या चौकात आल्यावर पहिला सिग्नल लागला. येथपर्यंत सर्व.रस्ते चांगले रूंद असून अत्यंत तुरळक गर्दी होती. नंतर विद्यापीठ चौक, सेनापती बापट रस्ता येथेही तुरळक गर्दी होती (रविवार असल्याने गर्दी कमी असावी). लवळेहून येताना परत महामार्ग पकडून चांदणी चौकातून आलो असतो तर दुप्पट वेळ लागला असता. आता लवळेला जाताना व येताना पाषाणमार्गेच जाणार आहे ज्यामुळे महामार्ग टाळता येईल. ५ वर्षांनंतर सुद्धा चांदणी चौकातील काम अपूर्ण आहे व पुढील ५ वर्षे तरी ते पूर्ण होणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

पाषाणभेद 14/09/2022 - 23:12
आणि फलंदाजाने मिड ऑन मधल्या क्षेत्ररक्षणात असलेले अंतर पाहून चेंडू जोरदार टोलवला व सरळ चार धावा. पुणेरी पलटण विजयाच्या टप्यात.

In reply to by श्रीगुरुजी

सतिश गावडे 15/09/2022 - 21:07
तुमचा परतीचा मार्ग या भागात दिवसा फिरायचे झाल्यास मी नेहमी वापरतो. विना रहदारी, विना सिग्नल रस्ता. मात्र रात्री हा रस्ता निर्मनुष्य होत असावा त्यामुळे सुरक्षित नसावा.

आनन्दा 15/09/2022 - 18:53
लेख आवडला.. भारी जमला आहे. बाकी गडकरी मला आवडतात, पण म्हणून या लेखातल्या गोष्टी खोट्या आहेत असे मी म्हणणार नाही.. यावर्षी गणपतीत मी पुणे कोल्हापूर प्रवास केला, सातारा रोड चे खड्डे मला तरी कुठे मिळाले नाहीत. गुरुजींना कुठे दिसतायत देव जाणे. चांदणी चौकबद्दल ना बोलणे चांगले.. मी एकवेळ मुळशी पानशेत खेडशिवापुर मार्गे येईन, त्याला पण चांदणीचौक पेक्षा कमी वेळ लागेल.. बऱ्याच वेळा तिथे एक दीड तास अडकलेला आहे.. 40 मिनीटापेक्षा कमी वेळ लागला तर मी त्याला फाऊल मानतो

वाफेवर चहा, हवेत गाडि हे असले काहि बाहि विपरित एक्न्याचि सवय झालि आहे गुरुपासुन २०१४ ला आलेत तेव्हापासुन त्यात गड्करि साहेब आपन पन सामिल व्हा गरिब बिचारि प्रजा

विवेकपटाईत 14/09/2022 - 17:17
माझ्या सरकारी नोकरीचा शेवटचा काळ परिवहन मंत्रालयात गेला. माननीय गडकरी साहेब कितीही विनोद आणि कोट्या करत असले तरी कामाच्या बाबतीत अत्यंत शिस्तबध्द आहे. प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण झालेच पाहिजे. कुठलाही बहाणा त्यांना चालतं नाही.

श्रीगुरुजी 14/09/2022 - 17:28
गडकरी साहेब कितीही विनोद आणि कोट्या करत असले तरी कामाच्या बाबतीत अत्यंत शिस्तबध्द आहे. प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण झालेच पाहिजे. कुठलाही बहाणा त्यांना चालतं नाही. पुणे-सातारा महामार्ग लवकरच व्यवस्थित होईल असे गडकरींनी अनेकदा आश्वासन दिले आहे. परंतु प्रत्येक वर्षी या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत आहे व टोल प्रचंड वाढत चाललाय. पुणे-मुंबई महामार्गावरील चांदणी चौकात पूर्ण राडा झाला आहे. हे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि भविष्यात किमान ५ वर्षे हा रस्ता व्यवस्थित होण्याची सुतराम शक्यता नाही.

In reply to by श्रीगुरुजी

पुणे सातारा रस्त्याबद्दल सहमत. गडकरी खूप वेळा अतिशय अतिशयोक्तीपूर्ण बोलतात. पुणे बंगलोर अंतर अवघ्या ४ तासात कापता येईल, रस्त्यांची कामे नीट न केल्यास कंत्राटदाराला बुलडोझरखाली चिरडू, २०२४ च्या निवडणूकीपूर्वी भारतातील रस्ते अमेरीकेतल्या रस्त्यांसारखे असतील, उडणारी बस वगैरे वगैरे त्यांची काही अतिशयोक्तीपूर्ण वक्तव्ये. पुणे सातारा अथवा मुंबई गोवा महामार्गाची कामे ईतकी रखडलीत व दर्जाहीन होत असून सुध्दा कुणा कंत्राटदारावर काही मोठी कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. नुसतीच तोंडाची वाफ दवडणे चालू आहे.

In reply to by अभिजीत अवलिया

श्रीगुरुजी 17/09/2022 - 14:02
गडकरींनी ४-५ महिन्यांपूर्वी लोकसभेत दिलेले अजून एक आश्वासन म्हणजे पुढील १२ महिन्यांच्या आत भारतातील सर्व टोलनाके बंद होऊन सर्वत्र fast tag वापर सुरू होईल. तसे होण्याची शक्यता अजून तरी दिसते नाही.

स्वधर्म 14/09/2022 - 17:29
पण खरोखरच हा विषय अत्यंत महत्वाचा आणि तितक्याच चुकीच्या पध्दतीने हाताळला जात आहे, असे वाटते. सरकार कोणतेही असो, परिवहन धोरण हे जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतुकीस प्राधान्य देणारे असण्याच्या ऐवजी जास्तीत जास्त कंत्राटे, जास्तीत जास्त प्रकल्प, त्यातून जास्तीत जास्त मलई, जास्तीत जास्त वाहनांचा खप, टोल कंपन्या यांच्यासाठीच काम करते असे वाटते. एसटी चा संप आणि तिची सध्याची अवस्था हा याचा ढळढळीत पुरावाच.

In reply to by स्वधर्म

टर्मीनेटर 14/09/2022 - 18:06
+१००० शब्दा शब्दाशी सहमत आहे! तसेच महामार्गांचे रुंदीकरण करण्यासाठी जमीन संपादन करताना सरकारी भावापेक्षा कितीतरी अधिक दर देउन त्या मार्गांवरच्या जमीनींचे भाव अव्वाच्या साव्वा वाढवण्यातुन फार मोठ्या घोटाळ्याचा संशय येतो आहे. ह्या आणि अशा अनेक उपदव्यापांमुळे भविष्यात कधीतरी (चुकुन माकुन सत्तापालट झाल्यास) गडकरींना ईडी चौकशीला सामोरे जावे लागल्यास मला तरी अजिबात आश्चर्य वाटणार नाही. असो, गंभीर विषय विनोदी पद्धतीने चांगला हाताळला आहेत पाभे 👍

In reply to by टर्मीनेटर

मनो 15/09/2022 - 08:18
आता पुणे-बंगळूर द्रुतगती महामार्ग होणार, तो आपल्याच जमिनीतून जावा यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात आलेली आहे. पावसाचे निमित्त करून महामार्ग फलटण, खटाव या अविकसित दुष्काळी भागातून जावा असे प्रयत्न चालू आहेत. पुढच्या निवडणुकीची सोय नाहीतर कशी होणार?

In reply to by स्वधर्म

विवेकपटाईत 16/09/2022 - 09:54
गेल्या आठ वर्षांतील बदल डोळ्यांनी स्पष्ट दिसतो. मध्य प्रदेश गुजरात राजस्थान हिमाचल उत्तराखंड इथल्या रस्त्यांचा अनुभव हेच सांगतो. पूर्वी नागपुर चंद्रपूर पूर्वी बसला सहा ते सात तास लगायचे आता तीन तास बस घेते. बाकी महाराष्ट्रात काम करणे कठीण आहे, हे ही खरे. (एक अभियंताने मला सहज म्हंटले होते, महाराष्ट्रातील लोक सर्वात इमानदार असतात आणि तिथले स्थानीय नेते देशात सर्वात भ्रष्ट).

In reply to by विवेकपटाईत

चौथा कोनाडा 17/09/2022 - 13:10
"महाराष्ट्रातील लोक सर्वात इमानदार असतात आणि तिथले स्थानीय नेते देशात सर्वात भ्रष्ट" +१ - आवडलेले वाक्य

तिता 14/09/2022 - 17:54
मला हा लेख उपरोधिक आहे का खरेच गडकरी असे बोलले हे समजले नाही. विनोदी असेल तर अतिशयोक्ती फार आहे. खरे असेल तर .... माझी समज कमी आहे.

विजुभाऊ 14/09/2022 - 18:45
मिस्त्री ंच्या निधनानंतर गडकरींनी मागच्या सीटवरील लोकाम्ना सीट बेल्ट सक्तीचा केला . .सीट बेल्ट कम्पल्सरी म्हणजे पोलीसांना वसुलीचा नवा मार्ग दाखवून दिला आहे. पण त्या अगोदर चुकीचा डिव्हायडर , खड्डे असलेले रस्ते यांना जबाबदार लोकांना काहीच केले नाही. रस्त्यावर ओसंडून वाहणारे ट्रक चालक आणि मालक यांना काहीच करणार नाहीत , हायवेवरून उजव्या लेन मधला रस्ता आडवून अवजड ट्रक चालवणारे इंडीकेटर नसलेले , बांधकामाच्या सळ्या चारचार फूट बाहेर आणत वाहुन नेणारे ट्रक जुने, खिळखिळे झालेले तरीही वाहतूक करणारे ट्रक याना कोण शासन करणार?

सामान्य माणसाला या खड्डेयुक्त रस्त्यावरुन गाडी चालविल्याशिवाय पर्याय आहे का? १.रस्ते अपघातात "खड्डे चुकविण्यामधे अपघाती मृत्यु " या कारणामुळे यावर्षी ८ जण मरण पावले आहेत. शेवटचा मृत्यु कल्याण जवळील शहाड पुलावर झाला आहे. नोंदले न गेलेले कितीतरी असतील. २. गणपती जाउन आठवडा होत आला तरी गल्लोगल्ली मंडप रस्ते अडवुन उभेच आहेत. आधीच लहान असलेल्या गल्ल्यांमध्ये शाळा भरण्या सुटण्याच्या वेळी जी काही गर्दी आणि ट्रॅफिक जॅम होते ते बघुन हताश व्हायला होते. ३. पुण्यात चांदणी चौक म्हणजे तर भलताच विनोदी विषय झालाय. ऑफिसमधुन घरी येताना किमान २ कि. मी. अलीकडेपासुन बंपर टु बंपर गाडी चालवायला लागते. मागच्याच आठवड्यात मुख्यमंत्र्यांना त्याचा फटका बसल्याने आता मात्र तिकडे अरुंद पूल पाडण्याची जोरदार तयारी चालु आहे. ४. पुणे-सातारा मार्ग-- आपण फक्त टोल भरण्यासाठीच जन्मलो आहोत, त्याबदल्यात काही सुविधा वगैरे मिळाव्यात अशी अपेक्षाच करणे चुक आहे. ५. पुणे-नगर मार्ग म्हणजे मृत्युचा सापळा बनला आहे असा धागा मिपावर आल्याच्या दुसर्‍याच दिवशी तिथे एक मोठा अपघात होउन एकाच कुटुंबातील ४ जण गेले. ६. सायरस मिस्त्रींचा अपघात झाल्याने मुंबई वलसाड महामार्ग लवकरच सुधारेल असे वाटते. ७. कायप्पावरील विनोद- एखादा नेता किवा मोठा माणुस मेल्याशिवाय रस्त्यांचे भाग्य उजळत नाही, त्यामुळे आता कोकणवासी लोकांनी मुंबई-गोवा महामार्ग लवकर नीट व्हावा म्हणुन नेते मंडळींना "येवा कोकण आपलाच असा" अशी हाक मारली आहे. :)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

श्रीगुरुजी 14/09/2022 - 20:28
परवा पुण्यातून कात्रजमार्गे लवळेला जाताना चांदणी चौकाच्या अलिकडे १ किमी पासून वाहतूक खोळंबा सुरू झाला. ते १ किमी अंतर काटण्यास २० मिनिटे लागली. त्यामुळे लवळेतून पुण्यात येतान महामार्ग टाळण्यासाठी सूसवरून पाषाण-सुतारवाडीकडे जाण्यासाठी महामार्गाच्या वरून जाणाऱ्या उड्डाणपुलावरून गेललो. दिशेचा अंदाज घेत पाषाण, सुतारवाडी, NCL, ARDE वरून अभिमानश्री सोसायटीतून बाणेर रस्त्यावर येऊन विद्यापीठाच्या चौकात आल्यावर पहिला सिग्नल लागला. येथपर्यंत सर्व.रस्ते चांगले रूंद असून अत्यंत तुरळक गर्दी होती. नंतर विद्यापीठ चौक, सेनापती बापट रस्ता येथेही तुरळक गर्दी होती (रविवार असल्याने गर्दी कमी असावी). लवळेहून येताना परत महामार्ग पकडून चांदणी चौकातून आलो असतो तर दुप्पट वेळ लागला असता. आता लवळेला जाताना व येताना पाषाणमार्गेच जाणार आहे ज्यामुळे महामार्ग टाळता येईल. ५ वर्षांनंतर सुद्धा चांदणी चौकातील काम अपूर्ण आहे व पुढील ५ वर्षे तरी ते पूर्ण होणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

पाषाणभेद 14/09/2022 - 23:12
आणि फलंदाजाने मिड ऑन मधल्या क्षेत्ररक्षणात असलेले अंतर पाहून चेंडू जोरदार टोलवला व सरळ चार धावा. पुणेरी पलटण विजयाच्या टप्यात.

In reply to by श्रीगुरुजी

सतिश गावडे 15/09/2022 - 21:07
तुमचा परतीचा मार्ग या भागात दिवसा फिरायचे झाल्यास मी नेहमी वापरतो. विना रहदारी, विना सिग्नल रस्ता. मात्र रात्री हा रस्ता निर्मनुष्य होत असावा त्यामुळे सुरक्षित नसावा.

आनन्दा 15/09/2022 - 18:53
लेख आवडला.. भारी जमला आहे. बाकी गडकरी मला आवडतात, पण म्हणून या लेखातल्या गोष्टी खोट्या आहेत असे मी म्हणणार नाही.. यावर्षी गणपतीत मी पुणे कोल्हापूर प्रवास केला, सातारा रोड चे खड्डे मला तरी कुठे मिळाले नाहीत. गुरुजींना कुठे दिसतायत देव जाणे. चांदणी चौकबद्दल ना बोलणे चांगले.. मी एकवेळ मुळशी पानशेत खेडशिवापुर मार्गे येईन, त्याला पण चांदणीचौक पेक्षा कमी वेळ लागेल.. बऱ्याच वेळा तिथे एक दीड तास अडकलेला आहे.. 40 मिनीटापेक्षा कमी वेळ लागला तर मी त्याला फाऊल मानतो
पुणे वार्ताहर: दि. १४ सप्टेंबर. रस्त्यातील असलेले खड्डे दुरुस्ती करणे किंवा त्या जागी नवे रस्ते करणे सरकारला लगेचच अशक्य आहे. भारतावर चीन ने राज्य केले तरच ते शक्य आहे. अशा परिस्थितीत रस्त्यांत असलेले खड्डेच वाहनचालकांच्या मदतीस येतील, कारण असल्या खड्ड्यांतूनच वीजनिर्मिती भविष्यात करू अशी घोषणा रस्ते वाहतूक मंत्री श्री. गडकरी यांनी काल पुण्यात केली. गणपती विसर्जन झाल्यानंतर आलेल्या पावसाच्या पुराची पाहणी पुण्यात केल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ही परिषद रात्री ११ वाजता शासकीय विश्रामगृहात झाली. गडकरी पुढे म्हणाले की, रस्त्यांवरील खड्डे हे आपले मित्रच आहेत. त्यांना वैरी संबोधू नका.

सायन्स फिक्शन - तिकडची आणि इथली

अनुनाद ·

In reply to by धर्मराजमुटके

अनुनाद 05/09/2022 - 00:24
आपल्या अभिप्रायातून आपले साहित्यावरचे प्रेम दिसत आहे, आणि त्या बद्दल धन्यवाद. पण मुद्दा हा आहे कि १९७० मध्ये धारपांनी ज्या कथा लिहिल्या त्या धर्तीचे चित्रपट अफाट लोकप्रिय आता होताना दिसत आहेत. अमेरिकेतली एक गोष्ट जगभर जाते आणि भारतात त्या आधी ३० वर्षे लिहिलेली तशाच धर्तीची कथा सूर्यप्रकाशही पाहू शकत नाही. आणि धारपांच्या कथा - भयकथा किंवा संदेहकथा नव्हे प्युअर सायन्स फिक्शन - कुठलीही काढून पहा. त्यातली भाषाशैली, कथेची मांडणी, त्यातून दिसणारे तंत्रज्ञानाचे मोजक्या शब्दात वर्णन - फाफट पसारा टाळून केलेली नेटकी मांडणी - हे सर्वच काळाच्या पुढचं होतं. वानगीदाखल अगदी मोजक्या कथांची नावं देतोय. कुठलीही पुस्तक काढून पहा. वाचून पूर्ण केल्याखेरीज खाली ठेववत नाही. Hugo Gernsback या लेखकाने मांडलेल्या निकषांवर ह्या कथा तंतोतंत उतरतात. Wells, Jules Verne, Arthur Clarke, असिमोव या लेखकांच्या तोडीसतोड लिखाण... १. युगपुरुष २. कंताचा मनोरा ३. चक्रावळ ४. जिद्द ५. अनोळखी दिशा (कथा संग्रह) पुस्तक हाताशी नसेल तर वर उल्लेख केलेल्या यू ट्यूब चॅनेल वर चाळुन पहा. अनुनाद

In reply to by अनुनाद

सस्नेह 05/09/2022 - 20:00
ऐसी रत्ने मेळवीन फायकसची अखेर अबक या आणखी काही विज्ञान कादंबर्या धारपांच्या विज्ञान कथा कादंबर्यांची पंखी -- स्नेहा

In reply to by सस्नेह

अनुनाद 06/09/2022 - 11:51
आवडलंय - खरंतर त्यांच्या झाडून सगळ्या कथा वाचल्या आहेत. बऱ्याचश्या संग्रही आहेत. एक छोटा refresher हवा असेल तर लेखांती उल्लेख केलेली यक्ष हि कथा youtube वर ऐकून पहा.

In reply to by अनुनाद

भागो 06/09/2022 - 09:26
Wells, Jules Verne, Arthur Clarke, असिमोव या लेखकांच्या तोडीसतोड लिखाण...>>> हे किंचित अति झाले. ते लेखक ओरिजिनल होते. हा कळीचा मुद्दा आहे. जास्त लिहित नाही. माझ्या मते नारळीकर, बाळ फोंडके, लक्षमण लोंढे, सुबोध जावडेकर हे खरे विज्ञान कथा लेखक! आणि रत्नाकर मतकरी हे खरे भयकथा लेखक.

In reply to by भागो

जेम्स वांड 06/09/2022 - 10:33
मर्यादित वाचल्यात, पण ज्या वाचल्या आहेत त्यात नारळीकर फारच जास्त आवडले. १. वामन परत न आला - आज एलोन मस्क म्हणतो "AI is more dangerous than nuclear weapons" तेच नारळीकर सर सुलभ कथा लेखनातून सांगून जातात वामन मध्ये. २. यक्षांची देणगी - ही तर माझी फेवरेट विज्ञानकथा कलेक्शन म्हणावीत असली चोपडी. Inter Dimensional travelling वर आधारित असलेली "गंगाधरपंतांचे पानिपत" आणि Time Travelling + Mobius Strip + teleportation वर आधारित "उजव्या सोंडेचा गणपती" ह्या विशेष आठवतात.

In reply to by जेम्स वांड

भागो 06/09/2022 - 12:11
यक्षांची देणगी अबब! आमेझान वर दहावी आवृत्ति आहे! "उजव्या सोंडेचा गणपती" हि कथा http://repository.iucaa.in:8080/jspui/bitstream/11007/3098/1/Ujavya%20sondecha%20Ganapati,Marathi%20Katha%20%20Visave%20Shatak,%20415.pdf इथे आहे. Technical Error by Arthur C. Clarke ही पण अशीच कथा आहे. पण Arthur C. Clarke अजून खोलात गेला आहे.

In reply to by भागो

अनुनाद 06/09/2022 - 12:23
अतिशय आवडलेली गोष्ट - मला बहुधा तुम्ही आता नारळीकरांच्या सर्व कथा परत वाचायला लावणार. :)) envelop आणि inversion वरची आकाशात तरंगणारा डोळा नामक कथा आठवत आहे. - गंगाधर पंतांचे पानिपत आणि काळाला तिरका छेद हे खूप साम्य असणारे कथानक. आर्थर क्लार्क ची nine billion names of god नावाची कथा होती - तिचा अनुवाद कालच त्या चॅनेल वर ऐकला - हिमाल मठाचे गूढ या नावाने. ते कथानक लैच भारी होतं . पण एकूण हे discussion मला खूप समृद्ध करतंय . मनापासून धन्यवाद.

In reply to by भागो

सस्नेह 06/09/2022 - 11:54
विज्ञानकथा आणि फिक्शन यामध्ये बराच फरक आहे. धारपांच्या कथा फिक्शन या सदरात मोडतात. त्यात कल्पना स्वातंत्र्य भरपूर घेतलेले असते. काय अफाट कल्पना असायच्या धारपांच्या !!

In reply to by सस्नेह

अनुनाद 06/09/2022 - 12:13
येस, कळीचा मुद्दा तोच आहे. त्यांच्या युगपुरुष या कथेत - Clifford Simac च्या time is the simplest thing या कथेवर आधारित असलेली असा उल्लेख आहे, पण मूळ कथा वाचून पाहिल्यावर जाणवले कि धारपांनी फक्त ५-१०% मूळ कथेचा आधार, कल्पना म्हणून वापरला आहे. बाकी सर्व त्यांचा कल्पना विलास.. हे खरंच थोर होतं. जिद्द हि कथा - space prison या पुस्तकाचा सही सही अनुवाद आहे. पण आधारित किंवा अनुवादित साहित्यात भाषेचं जे अवघडलेपण दिसतं त्याचा कुठेही मागमूस नाही. एक रिफ्रेशेर म्हणून खरंच ती यक्ष नामक कथा ऐकून पहा.

In reply to by भागो

अनुनाद 06/09/2022 - 12:03
हा हा, खरंय काही वेळा असं होतं कि उत्साहात काही तरी अति होऊन जातं सो क्षमस्व - नारळीकरांच्या आणि बाळ फोंडकेंच्याही सर्व - झाडून सर्व कथा वाचल्या - त्यातल्या फोंडकेंच्या एका कथेत एका astronaut च्या शरीरातून तो अवकाशातून परत आल्या नंतर एक रेडिओ frequency सतत उत्सर्जित होत असते आणि हि कल्पना नंतर काही पक्षी आणि whales ट्रॅकिंग करण्यासाठी वापरली जात आहे - अजूनही - हे भारी होतं. डाव्या सोंडेचा गणपती, वामन आठवतात. हे खरंच थोर होतं... बाकी आधारित असूनही अस्सल मराठी मातीतली वाटणारी कथा हि मला वाटतं - धारपांची ताकद होती. एक छोटा refresher हवा असेल तर लेखांती उल्लेख केलेली यक्ष हि कथा youtube वर ऐकून पहा.

जेम्स वांड 04/09/2022 - 22:08
तुमचे विज्ञानकथा ह्या लेखन पद्धती आणि कथा प्रकारातील लिखाणावर असलेले प्रेम नीट पोचले तुमच्या लेखनातून. @मुटकेजी, मला वाटतं लेखक धारपांच्या एकंदरीत प्रसिद्धी बद्दल बोलत नसून धारपांच्या विज्ञानकथा लेखक म्हणून (पुरेसे) प्रसिद्ध न वाटण्याबद्दल बोलत असावेत. धारप विज्ञानकथा लेखक होते हे मला प्रामाणिकपणे माहिती नव्हते , अर्थात मी काही अखिल महाराष्ट्रीय मराठी विज्ञानकथा वाचक वर्गाचा प्रतिनिधी नाही तरीही बहुसंख्य लोकांना धारप विज्ञानकथा लेखक असलेलं ठाऊक असेल असे वाटत नाही मला तरी.

In reply to by जेम्स वांड

मला वाटतं लेखक धारपांच्या एकंदरीत प्रसिद्धी बद्दल बोलत नसून धारपांच्या विज्ञानकथा लेखक म्हणून (पुरेसे) प्रसिद्ध न वाटण्याबद्दल बोलत असावेत. धारप विज्ञानकथा लेखक होते हे मला प्रामाणिकपणे माहिती नव्हते , अर्थात मी काही अखिल महाराष्ट्रीय मराठी विज्ञानकथा वाचक वर्गाचा प्रतिनिधी नाही तरीही बहुसंख्य लोकांना धारप विज्ञानकथा लेखक असलेलं ठाऊक असेल असे वाटत नाही मला तरी.
घाईत प्रतिसाद देण्यात माझी चूकच झाली. पण मला देखील ते विज्ञानकथा आहेत असे त्या काळी वाटत नव्हते. एकापेक्षा जास्त कथांचे संदर्भ आले तर कदाचित अनुमान काढता येईल. शिवाय ते भयकथा लेखक आहेत असे देखील मला कधी वाटले नाही. ते माझ्यामते गुढकथालेखक जास्त होते. भय हे त्यांच्या कथेचे उपउत्पादन म्हणता येईल कदाचित. अर्थात मला माझेच विचार तपासावे लागतील कारण धारप वाचून पुष्कळ काळ लोटला आहे. आता माळ्यावरुन सुटकेस काढून साठे फायकस आणि अजून काही खजिना असेल तो परत एकदा चाळावा लागेल.

In reply to by धर्मराजमुटके

अनुनाद 05/09/2022 - 00:46
धारप वाचून पुष्कळ काळ लोटला आहे. आता माळ्यावरुन सुटकेस काढून साठे फायकस आणि अजून काही खजिना असेल तो परत एकदा चाळावा लागेल. खरंय - आणि तुम्हाला त्यात नक्की मजा येईल

In reply to by जेम्स वांड

अनुनाद 05/09/2022 - 00:52
हा हा.. तुम्हाला माझ्या लिहिण्याचं reading between the lines नक्कीच कळलंय. वरील उत्तरातील काही पुस्तकं नक्की चाळून पहा - मजा येईल

तर्कवादी 05/09/2022 - 00:22
तेरा चित्रपट रिलीज झाल्यावर, X-Men चित्रपट मालिका ही जगभरात आठव्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणारी चित्रपट मालिका ठरली, या चित्रपटांनी 6 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. अशा गोष्टी पाहण्या / वाचण्याकरता आता कुठे भारतातील प्रेक्षक mature होत आहेत.
काहीसा असहमत म्हणजे नारायण धारप यांच्या कथा कदाचित चांगल्या असतीलही आणि त्या तितक्याशा प्रसिध्द न पावण्याबाबत सहमती. X-Men बद्दल माहित नाही. पण हॉलीवूड मध्ये वैज्ञानिक कथानक असलेले अनेक चित्रपट निघतात. पण बहुतेककरुन ते उगाच पांचट असतात .. त्यातली तांत्रिक करामतींसाठीची मेहनत कौतुकास्पद असते पण चित्रपट अनेकदा फसलेले असतात. अलिकडेच replicas आणि anti matter हे दोन फसलेले चित्रपट पाहिलेत. त्यातल्या त्यात replicas बरा. anti matter पुर्णतः गंडलेला. आणखी अनेक चित्रपट आठवता येतील. आणि हिंदीत/मराठीत असे चित्रपट काढल्यास त्यांना प्रेक्षक डोक्यावर घेणार नसतील तर प्रेक्षकांना मी अपरिपक्व म्हणणार् नाही

अनुनाद 05/09/2022 - 00:44
तुमचे म्हणणे बरोबर, आताचे काही हॉलिवूड चित्रपट अति तांत्रिक आहेत पाहवत नाहीत किंवा अंगावर येतात. पण आपल्याकडे जसा हिंदी चित्रपटांचा golden era येऊन गेला तसाच तिकडेही... ६० ते ९० च्या काळातले काही चित्रपट आजही क्लासिक मानले जातात. २००१ a space odyssey किंवा स्टारवॉर्स, स्टारट्रेक - DC कॉमिक्स वगैरे संपूर्ण २-३ पिढ्या समृद्ध करून गेल्या - MIB या चित्रपटात शेवटच्या सीन मध्ये माणूस म्हणून आपल्या खुजेपणाची जाणीव होते. या प्रत्येक चित्रपटातून काही तरी विचाराला चालना मिळते. काही वेगळी दिशा सापडते - तसं काही आपल्याकडे घडताना दिसत नाही - मी या चर्चेत पडत नाही पण काही पुस्तकं (वाचली नसतील तर) निदान चाळून पहा खरंच खूप समृद्ध करणारा अनुभव - पहिल्या comment ला दिलेल्या उत्तरात काही पुस्तकांची नावे दिली आहेत.

In reply to by अनुनाद

तर्कवादी 05/09/2022 - 00:58
या प्रत्येक चित्रपटातून काही तरी विचाराला चालना मिळते. काही वेगळी दिशा सापडते - तसं काही आपल्याकडे घडताना दिसत नाही
प्रत्येक समाजाची आवड निराळी असू शकते. अमेरिकन लोकांना सायन्स फिक्शन मधून वैचारिक /आशयघन सापडत असेल. आपल्याकडे इतर प्रकारच्या चित्रपटांतून
ण आपल्याकडे जसा हिंदी चित्रपटांचा golden era येऊन गेला तसाच तिकडेही.
बरोबर आहे आणि आपल्या हिंदी चित्रपटांच्या सुवर्ण काळात अनेक आशयघन चित्रपट आलेत. व्यावसायिक चित्रपटांतही दिवार सारख्या चित्रपटांतून काही विचार (भावना/ कर्तव्य यातले द्वंद ई) व्यक्त झालेत तर कलात्मक चित्रटांची मोठी यादी देता येईल. आपल्याकडे सायन्स निर्मात्यांनी फिक्शनला फारसा हात घातला नाही आणि त्यामुळे तो प्रकार लोकप्रिय झाला नाही. आता वाचनाचे प्रमाण कमी झाले आहे...चांगल्या पुस्तकांवर चित्रपट बनलेत व ते योग्य पद्धतीने बनवले गेलेत तर लोकप्रिय होवू शकतील. आता मराठी चित्रपटांचा सुवर्ण काळ आलाय असे म्हणता येइल. मराठी निर्मात्यांनी पुढे येत नवीन प्रयोग करायला हवेत.

लहानपणी नारायण धारप,बाबूराव अर्नाळकर सगळ्यात जास्त आवडते लेखक होते. अनुक्रमे समर्थ व काळापहाड ह्या व्यक्तिरेखा खुपच भारी वाटायच्या. चित्रपट तंत्रज्ञान विकसित न झाल्या मुळे व लोकांची आवड ,कल या विषयाकडे कमी असणे हे सुद्धा एक कारण असू शकेल. साठे व फायकस आणी त्याचा थरार अजुनही डोक्यातून जात नाही. बाकी पुष्कळ रहस्यकथा वाचल्या पण विस्मृतीत गेल्या. आमचं बालपणी अंगावर काटे आणून थरारक भन्नाट करण्यासाठी दोघाही दिग्गजांना मानाचा मुजरा.

शाम भागवत 05/09/2022 - 08:12
६-७ वीत असताना वाचायचो. रात्री झोप लागायची नाही. एकदा गोष्ट वाचायला सुरवात केली की, थांबताच यायचं नाही. एका वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटायचे. आता पुन्हा या पुस्तकाला हात लावायचा नाही व पुढची गोष्ट वाचायची नाही असं ठरवायचो. पण ८-१० तासांनी किंवा दुसऱ्या दिवशी पुढची गोष्ट वाचल्याशिवाय चैन पडायचं नाही. समर्थ ही व्यक्तिरेखा खूप भुरळ घालायची. असं वाटायचं की, ते कुठून तरी येतील व मला वाचवतील. त्या एका भरवशावर वाचायचे धाडस करत असे.

In reply to by शाम भागवत

अनुनाद 06/09/2022 - 12:30
exactly समर्थ आणि कृष्णचंद्र ह्या व्यक्तिरेखा म्हणजे एक वेगळेच जग होते - तुम्ही वर्णन केलेला फील मीही अनुभवला आहे. :)) उंबरठा हि कथा आठवते दोन मित्र.. एक नॉर्मल एक सायकिक त्या चॅनेल वर ती हि कथा ऐकली आणि अफाट आवडली होती ...

विजुभाऊ 05/09/2022 - 09:51
मला स्वतःला धारपांच्या भयकथा आवडतातच पण विज्ञानकथा त्याहून जास्त आवडतात. नेनचिम , गोग्रामचा चित्रार , बहुमनी या पुन्हा पुन्हा वाचल्या आहेत.

In reply to by विजुभाऊ

अनुनाद 06/09/2022 - 12:38
नेनचिम आवडली असेल तर "कंताचा मनोरा" (वाचली नसेल तर) जरूर निदान चाळून पहा - गोग्रामचा चितार मला आठवतंय - बहुधा ती माझी SciFi वाचनाची सुरुवात असावी. खरंतर भा. रा. भागवत यांच्या चंद्रावर स्वारी, धूमकेतूचे रहस्य इ कथा वाचताना रमून जायला व्हायचं - नंतर कळलं ती Jules Verne ची पुस्तकं होती, पण भागवतांनी खरंच गोडी लावली . नेनचिम म्हणजे अक्षरशः world class documentary होती... Mission to Mars ह्या चित्रपटात तीच कल्पना वापरली आहे.

भागो 05/09/2022 - 17:39
भारतात विज्ञान आधारित काहीही खपत नाही. आपल्याला फेकाफेकी जास्त पसंत. आताच "दोबारा" नावाचा चित्रपट येऊन "गेला." कुणी बघितला? कित्येक थेटरात शो कॅंसल झाले. अप्रतिम पिक्चर !

In reply to by भागो

तर्कवादी 05/09/2022 - 18:04
भारतात विज्ञान आधारित काहीही खपत नाही
असं नाहीये.. कोई मिल गया, क्रिश, रा वन आणि फार पुर्वी मिस्टर इंडिया हे चित्रपट चालले होते.
आपल्याला फेकाफेकी जास्त पसंत
हॉलिवूडच्या सायन्स फिक्शनमध्येही फेकाफेकीच असते की !!

In reply to by भागो

तर्कवादी 05/09/2022 - 19:17
भारतात विज्ञान आधारित काहीही खपत नाही
"एक डॉक्टरकी मौत" हा आशयघन चित्रपट १९९० मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने कमाई किती केली ते माहित नाही पण हा चित्रपट अनेकांना माहित आहे इतकं नक्की (चर्चेत राहिला)

भागो 05/09/2022 - 19:02
असं नाहीये.. कोई मिल गया, क्रिश, रा वन आणि फार पुर्वी मिस्टर इंडिया हे चित्रपट चालले होते.>>> व्वा. कळलंं. हाताला पाच बोट आहेत. अजून एक पिक्चरचे नाव टाका. रोबो? हॉलिवूडच्या सायन्स फिक्शनमध्येही फेकाफेकीच असते की !!>> चालायचेच.

nutanm 06/09/2022 - 06:59
मी बाबूराव अर्नाळकरांच्या झुंजार व काळापहाड कथा खूपच वाचल्या. 68--70 साली. धारप त्यानंतर आले तोवर माझा रहस्यकथेतला interest संपला होता . व मला तेव्हा त्यांची पुस्तके म्हणजे सायन्स फिक्शन ई० माहित नव्हते कळण्यासही कठीण व भितीदायक वाटल्या . त्याचवेळी मला ऐतिहासिक पुस्तकांचे वेड लागत होते म्हणून नारायण धारप तितकेसे आवडले नाहीत व डोक्यावरूनही गेले. झुंजार व काळापहाड खूप म्हणजे खूप आवडायची. काळापहाडचे चोरांची दुनिया अजूनही चांगले लक्षांत आहे खूप मस्त पुस्तक व वेगळीच चोरांची दुनिया जी काळापहाडने समाजात उघडकीस आणली व पोलिसांच्या ताब्यात बहुतेक चोर दिले, खूपच मजा आलेली वयाच्या 12/13 व्यवर्षी वाचताना व मस्त घाबरण्याचा थरार घेत रहस्यकथा वाचत असे. नविनच जगाची / पुस्तकांच्या थरारक व़िश्र्वाची ओळख होत होती.

nutanm 06/09/2022 - 07:14
झुंजार तर माझा खूपच आवडता हिरो व हे व्यक्त करणे मला जमायचे नाही व भिती व लाजही खूप वाटे त्या अर्धवट वयात. पण काळापहाड व झुंजार अजूनही खूप आवडतात. पण आता ही पुस्तके मिळत नाही वसमाज, काळ पुढे गेल्याने वाचणार्यांना थरारही वाटणार नाही, शस्त्रास्त्रेही खूप आधुनिक होऊन झुंजारचे ठोसे मारून ठगाला लोळविणे हे सर्वच शब्दासकट खूप बाळबोध वाटते व आहे हल्लीच्या काळात

In reply to by nutanm

भागो 06/09/2022 - 09:16
झुंझार माझा पण अगदी आवडता हिरो. त्या काळी माझा एक मित्र लायब्ररीतून बाबुराव अर्नाळकर गुपचूप उचलून आणून मला देत असे. त्यांची पुस्तके अजूनही मिळतात. आमेझान वर आहेत. बुधवार पेठेत मिळतात मला काही रद्दीच्या दुकानात मिळाली. शोध म्हणजे सापडेल. आता मी मुलाबरोबर/मुलीबरोबर इंग्लिश वाचायला शिकलो. मग काय खजिनाच खुला झाला. खूप खूप वाचले. पण अजूनही मला "गुजबंप्स"अतिशय आवडतात. अचाट भीतिकथा. लहान मुलांसाठी आहेत. पण ओपन आवडीने वाचतो बुवा.

Bhakti 06/09/2022 - 11:11
धारप यांचं कोणतं पुस्तक पहिल्यांदा वाचावं? तिकडची आवडती सायन्स फिक्शन फिल्म Lucy कन्सेप्ट जाम आवडतो, आणि मानवाच्या आवाक्यातला विषय आहे. इकडची आवडती सायन्स फिक्शन नाही आठवत ;) बाकी केवळ फिक्शनमध्ये अनेक मराठी छान सिनेमा जे आवडतात आहेत .पण धागा भरकटेल नंतर कधीतरी सांगते :)

अनुनाद 06/09/2022 - 11:47
मी त्या धाग्या च्या प्रथम लेखात उल्लेख केलेली यक्ष हि कथा sansovoice या you tube चॅनेल वर पहिली - खरंतर त्यातूनच हे लिहावंसं वाटलं - ऐकून पहा

स्वधर्म 06/09/2022 - 15:33
अगदी १४-१५ वर्षांचा असल्यापासून धारप वाचायची गोडी लागली. इथे त्यांचे इतके चाहते आहेत, हे पाहून खूप आनंद झालेला आहे. शब्द किती म्हणून काटेकोर वापरावेत? त्यांच्या ‘दस्त’ या कादंबरीचे फक्त पहिले पान, पहिला परिच्छेद वाचून गार पडलो होतो. एका परिच्छेदात व्यक्तिरेखा मूर्तीमंत समोर उभी करावी, ती धारपांनीच! त्यांच्या बर्याच कथा या विशिष्ट भारित घरांवर, बखळींवर, जागांवर आहेत. त्यात काही अघोरी, अमूर्त आपल्या त्रिमित विश्वापलिकडचं असं असायचं. सर्व कथांचा शेवट सुष्टाचा दुष्टावर विजय छापाच्या असल्या तरी, धारप प्लॉट असा काही फुलवतात, की माणूस अडकून पडलाच पाहिजे. त्यांच्या विज्ञानकथांपैकी दोन्ही फायकस केवळ अप्रतिम! झाडे एकमेकांशी संपर्कात असणे, त्यांची काही स्ट्रॅटेजी असणे, ही कल्पनाच अफलातून! नंतर नंतर थोडा साचेबध्दपणा आला, तरी धारप हे ‘न सुचता’ लिहीणारे लेखक नव्हते, म्हणून थोर वाटतात. तुलना कदाचित अप्रस्तुत ठरेल, पण हल्लीचे अनेक लेखक कथाबीजच नसताना पुस्तके ‘पाडतात’ असे वाटते. म्हणजे केवळ मुख्य पात्राच्या मनातील भणभणते विचार हीच कादंबरी, ज्यात काहीही ‘घडत’ नाही. आणि अशा पुस्तकांना पारितोषिकेही मिळतात. अनेक उदाहरणे देता येतील. धारप हे खास मध्यमवर्गीय कुटुंबात, घरात घडणार्या कथा लिहायचे, पण रोमहर्षक! असा लेखक पुन्हा होणे मुश्किल!

In reply to by स्वधर्म

अनुनाद 07/09/2022 - 12:36
अगदी सुरेख लिहीलंयत. वाचकाला गळा दाबून धरणं ही त्यांची खासियत होती. त्यांच्या अझाथोथ वगैरेसारख्या कथांमधून आलेले काही प्राचिन विधींचे उल्लेख आणि वर्णने पाहीली की असं वाटतं की त्यांचा काही सिक्रेट सोसायटीजशी नक्की संबंध असावा... :))

In reply to by धर्मराजमुटके

अनुनाद 05/09/2022 - 00:24
आपल्या अभिप्रायातून आपले साहित्यावरचे प्रेम दिसत आहे, आणि त्या बद्दल धन्यवाद. पण मुद्दा हा आहे कि १९७० मध्ये धारपांनी ज्या कथा लिहिल्या त्या धर्तीचे चित्रपट अफाट लोकप्रिय आता होताना दिसत आहेत. अमेरिकेतली एक गोष्ट जगभर जाते आणि भारतात त्या आधी ३० वर्षे लिहिलेली तशाच धर्तीची कथा सूर्यप्रकाशही पाहू शकत नाही. आणि धारपांच्या कथा - भयकथा किंवा संदेहकथा नव्हे प्युअर सायन्स फिक्शन - कुठलीही काढून पहा. त्यातली भाषाशैली, कथेची मांडणी, त्यातून दिसणारे तंत्रज्ञानाचे मोजक्या शब्दात वर्णन - फाफट पसारा टाळून केलेली नेटकी मांडणी - हे सर्वच काळाच्या पुढचं होतं. वानगीदाखल अगदी मोजक्या कथांची नावं देतोय. कुठलीही पुस्तक काढून पहा. वाचून पूर्ण केल्याखेरीज खाली ठेववत नाही. Hugo Gernsback या लेखकाने मांडलेल्या निकषांवर ह्या कथा तंतोतंत उतरतात. Wells, Jules Verne, Arthur Clarke, असिमोव या लेखकांच्या तोडीसतोड लिखाण... १. युगपुरुष २. कंताचा मनोरा ३. चक्रावळ ४. जिद्द ५. अनोळखी दिशा (कथा संग्रह) पुस्तक हाताशी नसेल तर वर उल्लेख केलेल्या यू ट्यूब चॅनेल वर चाळुन पहा. अनुनाद

In reply to by अनुनाद

सस्नेह 05/09/2022 - 20:00
ऐसी रत्ने मेळवीन फायकसची अखेर अबक या आणखी काही विज्ञान कादंबर्या धारपांच्या विज्ञान कथा कादंबर्यांची पंखी -- स्नेहा

In reply to by सस्नेह

अनुनाद 06/09/2022 - 11:51
आवडलंय - खरंतर त्यांच्या झाडून सगळ्या कथा वाचल्या आहेत. बऱ्याचश्या संग्रही आहेत. एक छोटा refresher हवा असेल तर लेखांती उल्लेख केलेली यक्ष हि कथा youtube वर ऐकून पहा.

In reply to by अनुनाद

भागो 06/09/2022 - 09:26
Wells, Jules Verne, Arthur Clarke, असिमोव या लेखकांच्या तोडीसतोड लिखाण...>>> हे किंचित अति झाले. ते लेखक ओरिजिनल होते. हा कळीचा मुद्दा आहे. जास्त लिहित नाही. माझ्या मते नारळीकर, बाळ फोंडके, लक्षमण लोंढे, सुबोध जावडेकर हे खरे विज्ञान कथा लेखक! आणि रत्नाकर मतकरी हे खरे भयकथा लेखक.

In reply to by भागो

जेम्स वांड 06/09/2022 - 10:33
मर्यादित वाचल्यात, पण ज्या वाचल्या आहेत त्यात नारळीकर फारच जास्त आवडले. १. वामन परत न आला - आज एलोन मस्क म्हणतो "AI is more dangerous than nuclear weapons" तेच नारळीकर सर सुलभ कथा लेखनातून सांगून जातात वामन मध्ये. २. यक्षांची देणगी - ही तर माझी फेवरेट विज्ञानकथा कलेक्शन म्हणावीत असली चोपडी. Inter Dimensional travelling वर आधारित असलेली "गंगाधरपंतांचे पानिपत" आणि Time Travelling + Mobius Strip + teleportation वर आधारित "उजव्या सोंडेचा गणपती" ह्या विशेष आठवतात.

In reply to by जेम्स वांड

भागो 06/09/2022 - 12:11
यक्षांची देणगी अबब! आमेझान वर दहावी आवृत्ति आहे! "उजव्या सोंडेचा गणपती" हि कथा http://repository.iucaa.in:8080/jspui/bitstream/11007/3098/1/Ujavya%20sondecha%20Ganapati,Marathi%20Katha%20%20Visave%20Shatak,%20415.pdf इथे आहे. Technical Error by Arthur C. Clarke ही पण अशीच कथा आहे. पण Arthur C. Clarke अजून खोलात गेला आहे.

In reply to by भागो

अनुनाद 06/09/2022 - 12:23
अतिशय आवडलेली गोष्ट - मला बहुधा तुम्ही आता नारळीकरांच्या सर्व कथा परत वाचायला लावणार. :)) envelop आणि inversion वरची आकाशात तरंगणारा डोळा नामक कथा आठवत आहे. - गंगाधर पंतांचे पानिपत आणि काळाला तिरका छेद हे खूप साम्य असणारे कथानक. आर्थर क्लार्क ची nine billion names of god नावाची कथा होती - तिचा अनुवाद कालच त्या चॅनेल वर ऐकला - हिमाल मठाचे गूढ या नावाने. ते कथानक लैच भारी होतं . पण एकूण हे discussion मला खूप समृद्ध करतंय . मनापासून धन्यवाद.

In reply to by भागो

सस्नेह 06/09/2022 - 11:54
विज्ञानकथा आणि फिक्शन यामध्ये बराच फरक आहे. धारपांच्या कथा फिक्शन या सदरात मोडतात. त्यात कल्पना स्वातंत्र्य भरपूर घेतलेले असते. काय अफाट कल्पना असायच्या धारपांच्या !!

In reply to by सस्नेह

अनुनाद 06/09/2022 - 12:13
येस, कळीचा मुद्दा तोच आहे. त्यांच्या युगपुरुष या कथेत - Clifford Simac च्या time is the simplest thing या कथेवर आधारित असलेली असा उल्लेख आहे, पण मूळ कथा वाचून पाहिल्यावर जाणवले कि धारपांनी फक्त ५-१०% मूळ कथेचा आधार, कल्पना म्हणून वापरला आहे. बाकी सर्व त्यांचा कल्पना विलास.. हे खरंच थोर होतं. जिद्द हि कथा - space prison या पुस्तकाचा सही सही अनुवाद आहे. पण आधारित किंवा अनुवादित साहित्यात भाषेचं जे अवघडलेपण दिसतं त्याचा कुठेही मागमूस नाही. एक रिफ्रेशेर म्हणून खरंच ती यक्ष नामक कथा ऐकून पहा.

In reply to by भागो

अनुनाद 06/09/2022 - 12:03
हा हा, खरंय काही वेळा असं होतं कि उत्साहात काही तरी अति होऊन जातं सो क्षमस्व - नारळीकरांच्या आणि बाळ फोंडकेंच्याही सर्व - झाडून सर्व कथा वाचल्या - त्यातल्या फोंडकेंच्या एका कथेत एका astronaut च्या शरीरातून तो अवकाशातून परत आल्या नंतर एक रेडिओ frequency सतत उत्सर्जित होत असते आणि हि कल्पना नंतर काही पक्षी आणि whales ट्रॅकिंग करण्यासाठी वापरली जात आहे - अजूनही - हे भारी होतं. डाव्या सोंडेचा गणपती, वामन आठवतात. हे खरंच थोर होतं... बाकी आधारित असूनही अस्सल मराठी मातीतली वाटणारी कथा हि मला वाटतं - धारपांची ताकद होती. एक छोटा refresher हवा असेल तर लेखांती उल्लेख केलेली यक्ष हि कथा youtube वर ऐकून पहा.

जेम्स वांड 04/09/2022 - 22:08
तुमचे विज्ञानकथा ह्या लेखन पद्धती आणि कथा प्रकारातील लिखाणावर असलेले प्रेम नीट पोचले तुमच्या लेखनातून. @मुटकेजी, मला वाटतं लेखक धारपांच्या एकंदरीत प्रसिद्धी बद्दल बोलत नसून धारपांच्या विज्ञानकथा लेखक म्हणून (पुरेसे) प्रसिद्ध न वाटण्याबद्दल बोलत असावेत. धारप विज्ञानकथा लेखक होते हे मला प्रामाणिकपणे माहिती नव्हते , अर्थात मी काही अखिल महाराष्ट्रीय मराठी विज्ञानकथा वाचक वर्गाचा प्रतिनिधी नाही तरीही बहुसंख्य लोकांना धारप विज्ञानकथा लेखक असलेलं ठाऊक असेल असे वाटत नाही मला तरी.

In reply to by जेम्स वांड

मला वाटतं लेखक धारपांच्या एकंदरीत प्रसिद्धी बद्दल बोलत नसून धारपांच्या विज्ञानकथा लेखक म्हणून (पुरेसे) प्रसिद्ध न वाटण्याबद्दल बोलत असावेत. धारप विज्ञानकथा लेखक होते हे मला प्रामाणिकपणे माहिती नव्हते , अर्थात मी काही अखिल महाराष्ट्रीय मराठी विज्ञानकथा वाचक वर्गाचा प्रतिनिधी नाही तरीही बहुसंख्य लोकांना धारप विज्ञानकथा लेखक असलेलं ठाऊक असेल असे वाटत नाही मला तरी.
घाईत प्रतिसाद देण्यात माझी चूकच झाली. पण मला देखील ते विज्ञानकथा आहेत असे त्या काळी वाटत नव्हते. एकापेक्षा जास्त कथांचे संदर्भ आले तर कदाचित अनुमान काढता येईल. शिवाय ते भयकथा लेखक आहेत असे देखील मला कधी वाटले नाही. ते माझ्यामते गुढकथालेखक जास्त होते. भय हे त्यांच्या कथेचे उपउत्पादन म्हणता येईल कदाचित. अर्थात मला माझेच विचार तपासावे लागतील कारण धारप वाचून पुष्कळ काळ लोटला आहे. आता माळ्यावरुन सुटकेस काढून साठे फायकस आणि अजून काही खजिना असेल तो परत एकदा चाळावा लागेल.

In reply to by धर्मराजमुटके

अनुनाद 05/09/2022 - 00:46
धारप वाचून पुष्कळ काळ लोटला आहे. आता माळ्यावरुन सुटकेस काढून साठे फायकस आणि अजून काही खजिना असेल तो परत एकदा चाळावा लागेल. खरंय - आणि तुम्हाला त्यात नक्की मजा येईल

In reply to by जेम्स वांड

अनुनाद 05/09/2022 - 00:52
हा हा.. तुम्हाला माझ्या लिहिण्याचं reading between the lines नक्कीच कळलंय. वरील उत्तरातील काही पुस्तकं नक्की चाळून पहा - मजा येईल

तर्कवादी 05/09/2022 - 00:22
तेरा चित्रपट रिलीज झाल्यावर, X-Men चित्रपट मालिका ही जगभरात आठव्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणारी चित्रपट मालिका ठरली, या चित्रपटांनी 6 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. अशा गोष्टी पाहण्या / वाचण्याकरता आता कुठे भारतातील प्रेक्षक mature होत आहेत.
काहीसा असहमत म्हणजे नारायण धारप यांच्या कथा कदाचित चांगल्या असतीलही आणि त्या तितक्याशा प्रसिध्द न पावण्याबाबत सहमती. X-Men बद्दल माहित नाही. पण हॉलीवूड मध्ये वैज्ञानिक कथानक असलेले अनेक चित्रपट निघतात. पण बहुतेककरुन ते उगाच पांचट असतात .. त्यातली तांत्रिक करामतींसाठीची मेहनत कौतुकास्पद असते पण चित्रपट अनेकदा फसलेले असतात. अलिकडेच replicas आणि anti matter हे दोन फसलेले चित्रपट पाहिलेत. त्यातल्या त्यात replicas बरा. anti matter पुर्णतः गंडलेला. आणखी अनेक चित्रपट आठवता येतील. आणि हिंदीत/मराठीत असे चित्रपट काढल्यास त्यांना प्रेक्षक डोक्यावर घेणार नसतील तर प्रेक्षकांना मी अपरिपक्व म्हणणार् नाही

अनुनाद 05/09/2022 - 00:44
तुमचे म्हणणे बरोबर, आताचे काही हॉलिवूड चित्रपट अति तांत्रिक आहेत पाहवत नाहीत किंवा अंगावर येतात. पण आपल्याकडे जसा हिंदी चित्रपटांचा golden era येऊन गेला तसाच तिकडेही... ६० ते ९० च्या काळातले काही चित्रपट आजही क्लासिक मानले जातात. २००१ a space odyssey किंवा स्टारवॉर्स, स्टारट्रेक - DC कॉमिक्स वगैरे संपूर्ण २-३ पिढ्या समृद्ध करून गेल्या - MIB या चित्रपटात शेवटच्या सीन मध्ये माणूस म्हणून आपल्या खुजेपणाची जाणीव होते. या प्रत्येक चित्रपटातून काही तरी विचाराला चालना मिळते. काही वेगळी दिशा सापडते - तसं काही आपल्याकडे घडताना दिसत नाही - मी या चर्चेत पडत नाही पण काही पुस्तकं (वाचली नसतील तर) निदान चाळून पहा खरंच खूप समृद्ध करणारा अनुभव - पहिल्या comment ला दिलेल्या उत्तरात काही पुस्तकांची नावे दिली आहेत.

In reply to by अनुनाद

तर्कवादी 05/09/2022 - 00:58
या प्रत्येक चित्रपटातून काही तरी विचाराला चालना मिळते. काही वेगळी दिशा सापडते - तसं काही आपल्याकडे घडताना दिसत नाही
प्रत्येक समाजाची आवड निराळी असू शकते. अमेरिकन लोकांना सायन्स फिक्शन मधून वैचारिक /आशयघन सापडत असेल. आपल्याकडे इतर प्रकारच्या चित्रपटांतून
ण आपल्याकडे जसा हिंदी चित्रपटांचा golden era येऊन गेला तसाच तिकडेही.
बरोबर आहे आणि आपल्या हिंदी चित्रपटांच्या सुवर्ण काळात अनेक आशयघन चित्रपट आलेत. व्यावसायिक चित्रपटांतही दिवार सारख्या चित्रपटांतून काही विचार (भावना/ कर्तव्य यातले द्वंद ई) व्यक्त झालेत तर कलात्मक चित्रटांची मोठी यादी देता येईल. आपल्याकडे सायन्स निर्मात्यांनी फिक्शनला फारसा हात घातला नाही आणि त्यामुळे तो प्रकार लोकप्रिय झाला नाही. आता वाचनाचे प्रमाण कमी झाले आहे...चांगल्या पुस्तकांवर चित्रपट बनलेत व ते योग्य पद्धतीने बनवले गेलेत तर लोकप्रिय होवू शकतील. आता मराठी चित्रपटांचा सुवर्ण काळ आलाय असे म्हणता येइल. मराठी निर्मात्यांनी पुढे येत नवीन प्रयोग करायला हवेत.

लहानपणी नारायण धारप,बाबूराव अर्नाळकर सगळ्यात जास्त आवडते लेखक होते. अनुक्रमे समर्थ व काळापहाड ह्या व्यक्तिरेखा खुपच भारी वाटायच्या. चित्रपट तंत्रज्ञान विकसित न झाल्या मुळे व लोकांची आवड ,कल या विषयाकडे कमी असणे हे सुद्धा एक कारण असू शकेल. साठे व फायकस आणी त्याचा थरार अजुनही डोक्यातून जात नाही. बाकी पुष्कळ रहस्यकथा वाचल्या पण विस्मृतीत गेल्या. आमचं बालपणी अंगावर काटे आणून थरारक भन्नाट करण्यासाठी दोघाही दिग्गजांना मानाचा मुजरा.

शाम भागवत 05/09/2022 - 08:12
६-७ वीत असताना वाचायचो. रात्री झोप लागायची नाही. एकदा गोष्ट वाचायला सुरवात केली की, थांबताच यायचं नाही. एका वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटायचे. आता पुन्हा या पुस्तकाला हात लावायचा नाही व पुढची गोष्ट वाचायची नाही असं ठरवायचो. पण ८-१० तासांनी किंवा दुसऱ्या दिवशी पुढची गोष्ट वाचल्याशिवाय चैन पडायचं नाही. समर्थ ही व्यक्तिरेखा खूप भुरळ घालायची. असं वाटायचं की, ते कुठून तरी येतील व मला वाचवतील. त्या एका भरवशावर वाचायचे धाडस करत असे.

In reply to by शाम भागवत

अनुनाद 06/09/2022 - 12:30
exactly समर्थ आणि कृष्णचंद्र ह्या व्यक्तिरेखा म्हणजे एक वेगळेच जग होते - तुम्ही वर्णन केलेला फील मीही अनुभवला आहे. :)) उंबरठा हि कथा आठवते दोन मित्र.. एक नॉर्मल एक सायकिक त्या चॅनेल वर ती हि कथा ऐकली आणि अफाट आवडली होती ...

विजुभाऊ 05/09/2022 - 09:51
मला स्वतःला धारपांच्या भयकथा आवडतातच पण विज्ञानकथा त्याहून जास्त आवडतात. नेनचिम , गोग्रामचा चित्रार , बहुमनी या पुन्हा पुन्हा वाचल्या आहेत.

In reply to by विजुभाऊ

अनुनाद 06/09/2022 - 12:38
नेनचिम आवडली असेल तर "कंताचा मनोरा" (वाचली नसेल तर) जरूर निदान चाळून पहा - गोग्रामचा चितार मला आठवतंय - बहुधा ती माझी SciFi वाचनाची सुरुवात असावी. खरंतर भा. रा. भागवत यांच्या चंद्रावर स्वारी, धूमकेतूचे रहस्य इ कथा वाचताना रमून जायला व्हायचं - नंतर कळलं ती Jules Verne ची पुस्तकं होती, पण भागवतांनी खरंच गोडी लावली . नेनचिम म्हणजे अक्षरशः world class documentary होती... Mission to Mars ह्या चित्रपटात तीच कल्पना वापरली आहे.

भागो 05/09/2022 - 17:39
भारतात विज्ञान आधारित काहीही खपत नाही. आपल्याला फेकाफेकी जास्त पसंत. आताच "दोबारा" नावाचा चित्रपट येऊन "गेला." कुणी बघितला? कित्येक थेटरात शो कॅंसल झाले. अप्रतिम पिक्चर !

In reply to by भागो

तर्कवादी 05/09/2022 - 18:04
भारतात विज्ञान आधारित काहीही खपत नाही
असं नाहीये.. कोई मिल गया, क्रिश, रा वन आणि फार पुर्वी मिस्टर इंडिया हे चित्रपट चालले होते.
आपल्याला फेकाफेकी जास्त पसंत
हॉलिवूडच्या सायन्स फिक्शनमध्येही फेकाफेकीच असते की !!

In reply to by भागो

तर्कवादी 05/09/2022 - 19:17
भारतात विज्ञान आधारित काहीही खपत नाही
"एक डॉक्टरकी मौत" हा आशयघन चित्रपट १९९० मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने कमाई किती केली ते माहित नाही पण हा चित्रपट अनेकांना माहित आहे इतकं नक्की (चर्चेत राहिला)

भागो 05/09/2022 - 19:02
असं नाहीये.. कोई मिल गया, क्रिश, रा वन आणि फार पुर्वी मिस्टर इंडिया हे चित्रपट चालले होते.>>> व्वा. कळलंं. हाताला पाच बोट आहेत. अजून एक पिक्चरचे नाव टाका. रोबो? हॉलिवूडच्या सायन्स फिक्शनमध्येही फेकाफेकीच असते की !!>> चालायचेच.

nutanm 06/09/2022 - 06:59
मी बाबूराव अर्नाळकरांच्या झुंजार व काळापहाड कथा खूपच वाचल्या. 68--70 साली. धारप त्यानंतर आले तोवर माझा रहस्यकथेतला interest संपला होता . व मला तेव्हा त्यांची पुस्तके म्हणजे सायन्स फिक्शन ई० माहित नव्हते कळण्यासही कठीण व भितीदायक वाटल्या . त्याचवेळी मला ऐतिहासिक पुस्तकांचे वेड लागत होते म्हणून नारायण धारप तितकेसे आवडले नाहीत व डोक्यावरूनही गेले. झुंजार व काळापहाड खूप म्हणजे खूप आवडायची. काळापहाडचे चोरांची दुनिया अजूनही चांगले लक्षांत आहे खूप मस्त पुस्तक व वेगळीच चोरांची दुनिया जी काळापहाडने समाजात उघडकीस आणली व पोलिसांच्या ताब्यात बहुतेक चोर दिले, खूपच मजा आलेली वयाच्या 12/13 व्यवर्षी वाचताना व मस्त घाबरण्याचा थरार घेत रहस्यकथा वाचत असे. नविनच जगाची / पुस्तकांच्या थरारक व़िश्र्वाची ओळख होत होती.

nutanm 06/09/2022 - 07:14
झुंजार तर माझा खूपच आवडता हिरो व हे व्यक्त करणे मला जमायचे नाही व भिती व लाजही खूप वाटे त्या अर्धवट वयात. पण काळापहाड व झुंजार अजूनही खूप आवडतात. पण आता ही पुस्तके मिळत नाही वसमाज, काळ पुढे गेल्याने वाचणार्यांना थरारही वाटणार नाही, शस्त्रास्त्रेही खूप आधुनिक होऊन झुंजारचे ठोसे मारून ठगाला लोळविणे हे सर्वच शब्दासकट खूप बाळबोध वाटते व आहे हल्लीच्या काळात

In reply to by nutanm

भागो 06/09/2022 - 09:16
झुंझार माझा पण अगदी आवडता हिरो. त्या काळी माझा एक मित्र लायब्ररीतून बाबुराव अर्नाळकर गुपचूप उचलून आणून मला देत असे. त्यांची पुस्तके अजूनही मिळतात. आमेझान वर आहेत. बुधवार पेठेत मिळतात मला काही रद्दीच्या दुकानात मिळाली. शोध म्हणजे सापडेल. आता मी मुलाबरोबर/मुलीबरोबर इंग्लिश वाचायला शिकलो. मग काय खजिनाच खुला झाला. खूप खूप वाचले. पण अजूनही मला "गुजबंप्स"अतिशय आवडतात. अचाट भीतिकथा. लहान मुलांसाठी आहेत. पण ओपन आवडीने वाचतो बुवा.

Bhakti 06/09/2022 - 11:11
धारप यांचं कोणतं पुस्तक पहिल्यांदा वाचावं? तिकडची आवडती सायन्स फिक्शन फिल्म Lucy कन्सेप्ट जाम आवडतो, आणि मानवाच्या आवाक्यातला विषय आहे. इकडची आवडती सायन्स फिक्शन नाही आठवत ;) बाकी केवळ फिक्शनमध्ये अनेक मराठी छान सिनेमा जे आवडतात आहेत .पण धागा भरकटेल नंतर कधीतरी सांगते :)

अनुनाद 06/09/2022 - 11:47
मी त्या धाग्या च्या प्रथम लेखात उल्लेख केलेली यक्ष हि कथा sansovoice या you tube चॅनेल वर पहिली - खरंतर त्यातूनच हे लिहावंसं वाटलं - ऐकून पहा

स्वधर्म 06/09/2022 - 15:33
अगदी १४-१५ वर्षांचा असल्यापासून धारप वाचायची गोडी लागली. इथे त्यांचे इतके चाहते आहेत, हे पाहून खूप आनंद झालेला आहे. शब्द किती म्हणून काटेकोर वापरावेत? त्यांच्या ‘दस्त’ या कादंबरीचे फक्त पहिले पान, पहिला परिच्छेद वाचून गार पडलो होतो. एका परिच्छेदात व्यक्तिरेखा मूर्तीमंत समोर उभी करावी, ती धारपांनीच! त्यांच्या बर्याच कथा या विशिष्ट भारित घरांवर, बखळींवर, जागांवर आहेत. त्यात काही अघोरी, अमूर्त आपल्या त्रिमित विश्वापलिकडचं असं असायचं. सर्व कथांचा शेवट सुष्टाचा दुष्टावर विजय छापाच्या असल्या तरी, धारप प्लॉट असा काही फुलवतात, की माणूस अडकून पडलाच पाहिजे. त्यांच्या विज्ञानकथांपैकी दोन्ही फायकस केवळ अप्रतिम! झाडे एकमेकांशी संपर्कात असणे, त्यांची काही स्ट्रॅटेजी असणे, ही कल्पनाच अफलातून! नंतर नंतर थोडा साचेबध्दपणा आला, तरी धारप हे ‘न सुचता’ लिहीणारे लेखक नव्हते, म्हणून थोर वाटतात. तुलना कदाचित अप्रस्तुत ठरेल, पण हल्लीचे अनेक लेखक कथाबीजच नसताना पुस्तके ‘पाडतात’ असे वाटते. म्हणजे केवळ मुख्य पात्राच्या मनातील भणभणते विचार हीच कादंबरी, ज्यात काहीही ‘घडत’ नाही. आणि अशा पुस्तकांना पारितोषिकेही मिळतात. अनेक उदाहरणे देता येतील. धारप हे खास मध्यमवर्गीय कुटुंबात, घरात घडणार्या कथा लिहायचे, पण रोमहर्षक! असा लेखक पुन्हा होणे मुश्किल!

In reply to by स्वधर्म

अनुनाद 07/09/2022 - 12:36
अगदी सुरेख लिहीलंयत. वाचकाला गळा दाबून धरणं ही त्यांची खासियत होती. त्यांच्या अझाथोथ वगैरेसारख्या कथांमधून आलेले काही प्राचिन विधींचे उल्लेख आणि वर्णने पाहीली की असं वाटतं की त्यांचा काही सिक्रेट सोसायटीजशी नक्की संबंध असावा... :))
श्री. नारायण धारप ह्यांच्यावर भयकथा लेखक हा शिक्का बसला आणि मराठीमधे अतिशय उत्कृष्ट व काळाच्या पुढच्या विज्ञानकथा लिहीणाऱ्या लेखकाची ही बाजू वाचकांसमोर कधीही आली नाही. मराठीत विज्ञानकथा रुजली नाही याला लेखकाची प्रतिभा नव्हे तर वाचकांचं अज्ञान कारणीभूत होतं. कौटुंबिक सिरीयल्सचा तोच तो चोथा चघळणारे प्रेक्षक आणि जीर्णशीर्ण लव्हस्टोरीज पलिकडे न जाणारं बाॅलिवूड यामुळे मायदेशात सायन्सफिक्शन रूळली नाही पण तरीही धारप लिहीतच राहीले... X-men (मालिकेतील पहीला चित्रपट) जुलै २००० मधे release झाला.