मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

घर

मिसळलेला काव्यप्रेमी ·

चाणक्य 07/02/2013 - 12:38
काय बोलू? ...प्रतिक्रिया द्यायला सुद्धा माझ्याजवळचा शब्दसाठा अपुरा आहे मित्रा...सुंदर रचना

In reply to by इनिगोय

अभ्या.. 07/02/2013 - 18:07
इन्नातैला सहमत. मिकाला वेगळी लेन्स मिळालीय. आणि ते बघितलेलं जाणवणार संवेदनशील मन. हे सर्व शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मिका

तिमा 07/02/2013 - 18:03
नावीन्यपूर्ण कल्पना मांडण्यात हातखंडा आहे मिका तुझा! कविता अर्थातच आवडली, हे वेगळं सांगायला नकोच.

तेव्हा अचानक ध्यानी आले माझ्या त्या घराने आपले छतचं गमावले होते
हे छत गमावणंच तर कधीही एकाकी न वाटण्याच रहस्य आहे!

चालत्या फिरत्या कट्ट्याला रामदास काकांनी आम्हाला दाखवलेली 'एक्स्प्लनेड मॅन्शन' बिल्डींग जी जळून गेली होती.. नंतर परत बांधली वगैरे... तिथुन चालू झाली "घर" कविता... हे लिहायचे राहिले होते, धाग्यावर.

चाणक्य 07/02/2013 - 12:38
काय बोलू? ...प्रतिक्रिया द्यायला सुद्धा माझ्याजवळचा शब्दसाठा अपुरा आहे मित्रा...सुंदर रचना

In reply to by इनिगोय

अभ्या.. 07/02/2013 - 18:07
इन्नातैला सहमत. मिकाला वेगळी लेन्स मिळालीय. आणि ते बघितलेलं जाणवणार संवेदनशील मन. हे सर्व शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मिका

तिमा 07/02/2013 - 18:03
नावीन्यपूर्ण कल्पना मांडण्यात हातखंडा आहे मिका तुझा! कविता अर्थातच आवडली, हे वेगळं सांगायला नकोच.

तेव्हा अचानक ध्यानी आले माझ्या त्या घराने आपले छतचं गमावले होते
हे छत गमावणंच तर कधीही एकाकी न वाटण्याच रहस्य आहे!

चालत्या फिरत्या कट्ट्याला रामदास काकांनी आम्हाला दाखवलेली 'एक्स्प्लनेड मॅन्शन' बिल्डींग जी जळून गेली होती.. नंतर परत बांधली वगैरे... तिथुन चालू झाली "घर" कविता... हे लिहायचे राहिले होते, धाग्यावर.
लेखनविषय:
काव्यरस
या घराला विचारले मी एकदा असा रिकामा रिकामा असतोस वाईट नाही वाटत? क्षणभर विचार करून घर म्हणाले, नाही, म्हणजे नेहमीच नाही . . म्हणाले या भिंती पाहिल्यास किती सुंदर रंग लेवून उभ्या आहेत इकडे ये, या खिडक्या पहा आपली कवाडे उलगडून उनपावसाला बोलावून आणताहेत . . अन् ते दार बघितलेस सताड उघडे, सगळे सामावून घ्यायला उत्सुक येणार्‍याला खिडकीतून आलेला पाऊस विनामूल्य देणारे वा सोनसळी उन्हाची खुशाल मेजवानी घालणारे . . हे सगळे पहिले कि नाही वाईट वाटत मी सुखावतो आणि आकंठ भरून जातो रिकामपण माझे काही क्षण का होईना विसरतो विचारले त्याला मग मगशी 'नेहमीच नाही' म्हणालास ते कां? . . म्हणाले जरा वर पहा ते झगमगणारे आक

वेडी आशा अनुदानाची -

विदेश ·
लेखनविषय:
काव्यरस
आशा मोठी वाईट असते कुणालाच ती सोडत नसते - पाऊसधार भुलवुन जाते धरा कोरडी पहात असते... गोठ्यामधली वैरण संपुन गुरेढोरे विकून झाली - डोळ्यामधल्या पाण्यामध्ये शिळीच भाकर भिजून गेली... दुष्काळाचे पडता सावट शासन सारे झोपी जाते - बळीराजाची वेडी आशा अनुदानाची वाट पहाते ! .

ती खोली

मिसळलेला काव्यप्रेमी ·

गवि 29/01/2013 - 14:12
आई ग्ग... मिका.. तू कविता लिहू नको बाबा. कविता लिहायला घेतलीस की चरचरवणारं, आतून हलवणारं काहीतरी लिहीतोस. तुझ्या कवितांची ती अशक्य हुरहूर नकोच.. तू किरकोळ "सेफ" टाईप लिखाण करत जा बाबा.. साधं ललित, चित्रपट परीक्षण, पाककृती, विनोदी, प्रेमकथा असे आणि कितीक प्रकार पडलेत.

तर्री 29/01/2013 - 16:12
त्या टोपलीत कायम हसणारा एक बाहुला होता गोंडस, निरागस...गोबर्‍या गालांचा आडवं केलं की शहाण्या बाळासारखा झोपणारा आणि बसवलं की निळे डोळे मिचकावून पुन्हा हसणारा कुठे गेला कुणास ठाऊक.... बरेच दिवस शोधतोय अंगावर काटा आणि भयानक अस्वस्थ करणारा अनुभव.

खूपच अर्थगर्भ कविता. विचार केला की जाणवतं प्रत्येकाच्या आयुष्यात अशीच एखादी 'खोली' असते. त्यात कमीजास्त खेळणी असतात आणि त्या खेळण्यांना बिलगलेल्या अस्वस्थ आठवणी. आज, सर्व महत्त्वाची कामे बाजूला सारून आठवणीतल्या ह्या सर्व खेळण्यांशी हळूवार खेळत बसावे असे वाटते आहे.

jaypal 29/01/2013 - 21:28
मुजरा स्विकराव. प्रत्येकाचे एक खोली आणि आपापली खेळणी असतात. तशीच माझी पण आहे. आधुन मधुन धुळ झटकतो. मनसोक्त खेळतो आणि परत ठेवतो. पुन्हा धुळ बसण्यासाठी... कविता खुप आवडली माझ्या ईतर मित्रांबरोबर शेअर करण्या साठी परवानगी हवी आहे. फक्त आपले नाव व्यनी करा म्हणजे सोपे होईल. cc

क्रान्ति 29/01/2013 - 21:45
मनात पार खोलवर उतरली कविता. गेला ओसरुनी प्रकाश सगळा, हो म्लान ताजेपणा आता शोधुनही न भेटति पुन्हा त्या शैशवीच्या खुणा या शांताबाईंच्या ओळी आठवल्या.

इन्दुसुता 30/01/2013 - 08:13
आज, सर्व महत्त्वाची कामे बाजूला सारून आठवणीतल्या ह्या सर्व खेळण्यांशी हळूवार खेळत बसावे असे वाटते आहे. पण खेळता येत नाही म्हणूनच अतिशय अस्वस्थ वाटते. कविता आतवर हलवून गेली.

मि.का. ची कविता म्हटल्यावर उघडुन वाचायचे टाळत होतो. पण आज शेवटी रहावलच नाही आणि जे अपेक्षीत होते तेच झाले. नकोरे असले काहीतरी लिहूस, ओरखाडे काढणार. पैजारबुवा,

चित्रगुप्त 02/02/2013 - 00:20
आत्ता ही कविता वाचताना समोरच "कायम हसणारा, गोंडस, निरागस...गोबर्‍या गालांचा बाहुला" खेळतोय, आणि उद्या त्याला सोडून दूरच्या मायदेशी जायचंय.... रडवलंत मिका. ahn

गणेशा 05/02/2013 - 12:37
बर्याच दिवसानी येथे आलो.. कविता वाचली .. तुझ्या शब्दांमार्फत कधी तुझ्या कवितेतुन मी माझ्या गावात .. माझ्या जुन्या घरात गेलो कळलेच नाही ... निरागस आठवणीनी सुद्धा आजकाल खुप जखमा होतात ..

आज इतक्या वर्षांनी पुन्हा त्या खेळण्यांची आठवण आली ...आहेत अजून माझ्याकडे ...जपून ठेवलेली.... खेळेन म्हणतो परत...बालपण सापडेल कदाचित...धूळ असेल तर पुसेन त्यावरची... खूप मस्त..

गवि 29/01/2013 - 14:12
आई ग्ग... मिका.. तू कविता लिहू नको बाबा. कविता लिहायला घेतलीस की चरचरवणारं, आतून हलवणारं काहीतरी लिहीतोस. तुझ्या कवितांची ती अशक्य हुरहूर नकोच.. तू किरकोळ "सेफ" टाईप लिखाण करत जा बाबा.. साधं ललित, चित्रपट परीक्षण, पाककृती, विनोदी, प्रेमकथा असे आणि कितीक प्रकार पडलेत.

तर्री 29/01/2013 - 16:12
त्या टोपलीत कायम हसणारा एक बाहुला होता गोंडस, निरागस...गोबर्‍या गालांचा आडवं केलं की शहाण्या बाळासारखा झोपणारा आणि बसवलं की निळे डोळे मिचकावून पुन्हा हसणारा कुठे गेला कुणास ठाऊक.... बरेच दिवस शोधतोय अंगावर काटा आणि भयानक अस्वस्थ करणारा अनुभव.

खूपच अर्थगर्भ कविता. विचार केला की जाणवतं प्रत्येकाच्या आयुष्यात अशीच एखादी 'खोली' असते. त्यात कमीजास्त खेळणी असतात आणि त्या खेळण्यांना बिलगलेल्या अस्वस्थ आठवणी. आज, सर्व महत्त्वाची कामे बाजूला सारून आठवणीतल्या ह्या सर्व खेळण्यांशी हळूवार खेळत बसावे असे वाटते आहे.

jaypal 29/01/2013 - 21:28
मुजरा स्विकराव. प्रत्येकाचे एक खोली आणि आपापली खेळणी असतात. तशीच माझी पण आहे. आधुन मधुन धुळ झटकतो. मनसोक्त खेळतो आणि परत ठेवतो. पुन्हा धुळ बसण्यासाठी... कविता खुप आवडली माझ्या ईतर मित्रांबरोबर शेअर करण्या साठी परवानगी हवी आहे. फक्त आपले नाव व्यनी करा म्हणजे सोपे होईल. cc

क्रान्ति 29/01/2013 - 21:45
मनात पार खोलवर उतरली कविता. गेला ओसरुनी प्रकाश सगळा, हो म्लान ताजेपणा आता शोधुनही न भेटति पुन्हा त्या शैशवीच्या खुणा या शांताबाईंच्या ओळी आठवल्या.

इन्दुसुता 30/01/2013 - 08:13
आज, सर्व महत्त्वाची कामे बाजूला सारून आठवणीतल्या ह्या सर्व खेळण्यांशी हळूवार खेळत बसावे असे वाटते आहे. पण खेळता येत नाही म्हणूनच अतिशय अस्वस्थ वाटते. कविता आतवर हलवून गेली.

मि.का. ची कविता म्हटल्यावर उघडुन वाचायचे टाळत होतो. पण आज शेवटी रहावलच नाही आणि जे अपेक्षीत होते तेच झाले. नकोरे असले काहीतरी लिहूस, ओरखाडे काढणार. पैजारबुवा,

चित्रगुप्त 02/02/2013 - 00:20
आत्ता ही कविता वाचताना समोरच "कायम हसणारा, गोंडस, निरागस...गोबर्‍या गालांचा बाहुला" खेळतोय, आणि उद्या त्याला सोडून दूरच्या मायदेशी जायचंय.... रडवलंत मिका. ahn

गणेशा 05/02/2013 - 12:37
बर्याच दिवसानी येथे आलो.. कविता वाचली .. तुझ्या शब्दांमार्फत कधी तुझ्या कवितेतुन मी माझ्या गावात .. माझ्या जुन्या घरात गेलो कळलेच नाही ... निरागस आठवणीनी सुद्धा आजकाल खुप जखमा होतात ..

आज इतक्या वर्षांनी पुन्हा त्या खेळण्यांची आठवण आली ...आहेत अजून माझ्याकडे ...जपून ठेवलेली.... खेळेन म्हणतो परत...बालपण सापडेल कदाचित...धूळ असेल तर पुसेन त्यावरची... खूप मस्त..
लेखनविषय:
काव्यरस
माजघराच्या डाव्या बाजूची ती खोली बंदच असते आजकाल खूप वर्ष झाली त्या खोलीत डोकावून ------- त्या खोलीत एक टोपली आहे जुन्या खेळण्यांनी भरलेली डालडाच्या मोठ्ठ्याश्या डब्यात काठोकाठ भरलेल्या गोट्या आहेत मी जिंकून आणलेल्या फक्त त्यांचे रंग धुसर झाले आहेत आता आरपार रंगीत जग दिसायचे तसे दिसत नाही आताशा ------- बरीच धूळ जमलीये त्या टोपलीवर धुळीखाली ते गर्द निळ्या रंगाचे विमान आहे खर तर एक पंख तुटलाय त्याचा पण जरा जोरात धक्का दिला तर खुरडत खुरडत चालते कधी कधी ------- एक माकडही आहे चावी दिल्यावर इवलासा ढोल वाजवणारे आताही चावी दिल्यावर हातातल्या इटुकल्या काड्या वरखाली करते पण आता काड्यांखालचा तो ढोल तेवढ

नशिबाचे भोग -

विदेश ·
लेखनविषय:
काव्यरस
" फुलू दया ना मला जरा , बघू दया ना जग जरा - तुम्ही सजीव, मीही सजीव कळून घ्या भावना जरा -" एक कळी स्फुंदत होती , वेलीजवळ मी असताना - मन आपले उलगडत होती हितगुज माझ्याशी करताना ! " काही करू शकत नाही जगाविरुद्ध जाता येत नाही - मरणाऱ्याला जगवते जग जगणाऱ्याला मारते जग -" ...केविलवाणे होत म्हणालो , दु:ख जाणूनही कळीचे . खिन्न हसून ती वदली .. " नशिबाचे भोग ज्याचे त्याचे ! " .

उरली फक्त आठवण ..

विदेश ·
लेखनविषय:
काव्यरस
बहरलेला वृक्ष होतो , एकदा मी छानसा - गळुन गेली फूल पाने.. एकटा मी हा असा ! नाचती पक्षी कसे बघुनिया खांद्यावरी.. खेळताना, होइ मजला हर्ष माझ्या अंतरी - फूल फळ हुंगावया जमति जेव्हां पाखरे - हृदय माझे भरुनिया जातसे तेव्हां खरे ! सावली शोधावया पांथस्थ ते येती कुणी - बाहु पसरुन स्वागताला धन्यता वाटे मनीं ! आज काही नाही उरले भोवती माझे इथे - एकटा मी दु:ख माझे सांगतो मजला इथे ! .

स्त्रीस श्रद्धांजली

सांजसंध्या ·

In reply to by सांजसंध्या

@अस्वस्थतेत लिहीली गेली आहे. >>> वाचतानाच तसं जाणवत होतं,म्हणून फक्त ''यथायोग्य रचना'' एवढेच म्हणतो.

रेवती 16/01/2013 - 23:26
चांगली झालीये कविता. गेल्या महिनाभरात बरच घडलं, त्या विचारानेही आपल्याला दुखलं आणि दमून गेल्यासारखं वाटलं. पारख चुकता पारध होते कसंसच झालं वाचून. आता कुठं आपण सगळे सावरतोय.

किसन शिंदे 16/01/2013 - 23:42
छानच जमली आहे, अस्वस्थता नेमकी बाहेर पडलीय कवितेतून. याच विषयावर करूण रसाच्या अगदी विरूध्द अशा रौद्र रसात लिहलेल्या माझ्या एका मैत्रिणीच्या कवितेची आठवण झाली. :) या त्यातल्याच चार ओळी.. उमा हू मै शक्ती भी हू है मेराही एक रूप दुर्गाभी अन्याय के सामने डंट के खडी महाकाली भी.

In reply to by किसन शिंदे

इन्दुसुता 17/01/2013 - 00:43
किसनभौ, मला तुमच्या मैत्रिणीची रौद्र रसातली कविता वाचायला आवडेल. शक्य असेल तर येथे द्यावी. सांजसंध्या, कवितेतून तुमची अस्वस्थता जाणवतेच, एक स्त्री म्हणून मी काय करू शकते ह्या विचारानी सध्या ग्रासीत आहे. पारध शब्द भेदून गेला जीवाला...

सांजसंध्या 17/01/2013 - 12:24
@रेवती खरंय. मनात आलं आता सारं शांत झालं. यांना न्याय तर सोडा एखादी मेणबत्ती तरी कुणी लावेल का आता ? धन्यवाद सर्वांचे.

गवि 17/01/2013 - 17:19
कवितेचा मूड वेगळा आहे. तरीही एकदाच सुरुवातीला नाविकाचं प्रयोजन लक्षात आलं नाही. पार्श्वभूमीवर किंवा पुढे नाविकाला उद्देशून संवाद केल्याचा काहीच दाखला / योजना दिसली नाही. बाकी चांगले.

सांजसंध्या 17/01/2013 - 20:48
@ गवि नाव चालते या माझ्या कवितेचा संदर्भ आहे. नावेतल्या प्रवाशांना पैलतीरावर पोहोचवणारा नाविक आणि जीवनाच्या पैलतीरावर घेऊन जाणारा मार्गदर्शक या अर्थाने ती प्रतिमा मी वापरलीये. हे गा-हाणं कुणाकडे न्यायचं ? परिस्थिती इतकी भयाण आहे कि आत्यंतिक निराशेतही नायिकेचं म्हणणं आहे कि रोग म्हणू का, स्त्री जन्माचा दोष ना तुज द्याया "त्या" ला दोष द्यायची तिची इच्छा नाही. शेवटच्या कडव्यात त्याचा उल्लेख आहे. पटतेय का ? सर्वांचे मनःपूर्वक आभार. - संध्या

कलंत्री 18/01/2013 - 22:14
स्त्री आणि पुरुष यांच्यातील संबंधांना क्वचितच चांगले स्वरुप प्राप्त झाले आहे,कृष्ण आणि द्रोपदीचे नाते मला स्त्री पुरुष संबंधातील उत्कटता आणि परमोच्च विकास कसा असावा आणि कसा हवा हे दर्शवते. अस्वस्थता अथवा रौद्र रुपापेक्षा वरील संबंधांचा परीसस्पर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी यावा.

In reply to by सांजसंध्या

@अस्वस्थतेत लिहीली गेली आहे. >>> वाचतानाच तसं जाणवत होतं,म्हणून फक्त ''यथायोग्य रचना'' एवढेच म्हणतो.

रेवती 16/01/2013 - 23:26
चांगली झालीये कविता. गेल्या महिनाभरात बरच घडलं, त्या विचारानेही आपल्याला दुखलं आणि दमून गेल्यासारखं वाटलं. पारख चुकता पारध होते कसंसच झालं वाचून. आता कुठं आपण सगळे सावरतोय.

किसन शिंदे 16/01/2013 - 23:42
छानच जमली आहे, अस्वस्थता नेमकी बाहेर पडलीय कवितेतून. याच विषयावर करूण रसाच्या अगदी विरूध्द अशा रौद्र रसात लिहलेल्या माझ्या एका मैत्रिणीच्या कवितेची आठवण झाली. :) या त्यातल्याच चार ओळी.. उमा हू मै शक्ती भी हू है मेराही एक रूप दुर्गाभी अन्याय के सामने डंट के खडी महाकाली भी.

In reply to by किसन शिंदे

इन्दुसुता 17/01/2013 - 00:43
किसनभौ, मला तुमच्या मैत्रिणीची रौद्र रसातली कविता वाचायला आवडेल. शक्य असेल तर येथे द्यावी. सांजसंध्या, कवितेतून तुमची अस्वस्थता जाणवतेच, एक स्त्री म्हणून मी काय करू शकते ह्या विचारानी सध्या ग्रासीत आहे. पारध शब्द भेदून गेला जीवाला...

सांजसंध्या 17/01/2013 - 12:24
@रेवती खरंय. मनात आलं आता सारं शांत झालं. यांना न्याय तर सोडा एखादी मेणबत्ती तरी कुणी लावेल का आता ? धन्यवाद सर्वांचे.

गवि 17/01/2013 - 17:19
कवितेचा मूड वेगळा आहे. तरीही एकदाच सुरुवातीला नाविकाचं प्रयोजन लक्षात आलं नाही. पार्श्वभूमीवर किंवा पुढे नाविकाला उद्देशून संवाद केल्याचा काहीच दाखला / योजना दिसली नाही. बाकी चांगले.

सांजसंध्या 17/01/2013 - 20:48
@ गवि नाव चालते या माझ्या कवितेचा संदर्भ आहे. नावेतल्या प्रवाशांना पैलतीरावर पोहोचवणारा नाविक आणि जीवनाच्या पैलतीरावर घेऊन जाणारा मार्गदर्शक या अर्थाने ती प्रतिमा मी वापरलीये. हे गा-हाणं कुणाकडे न्यायचं ? परिस्थिती इतकी भयाण आहे कि आत्यंतिक निराशेतही नायिकेचं म्हणणं आहे कि रोग म्हणू का, स्त्री जन्माचा दोष ना तुज द्याया "त्या" ला दोष द्यायची तिची इच्छा नाही. शेवटच्या कडव्यात त्याचा उल्लेख आहे. पटतेय का ? सर्वांचे मनःपूर्वक आभार. - संध्या

कलंत्री 18/01/2013 - 22:14
स्त्री आणि पुरुष यांच्यातील संबंधांना क्वचितच चांगले स्वरुप प्राप्त झाले आहे,कृष्ण आणि द्रोपदीचे नाते मला स्त्री पुरुष संबंधातील उत्कटता आणि परमोच्च विकास कसा असावा आणि कसा हवा हे दर्शवते. अस्वस्थता अथवा रौद्र रुपापेक्षा वरील संबंधांचा परीसस्पर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी यावा.
लेखनविषय:
काव्यरस
डिसेंबर मधे बलात्कार झालेल्या एका आठ वर्षाच्या मुलीचं टाकून दिलेलं प्रेत मिळाल्याची बातमी नुकतीच वाचनात आली, पाठोपाठ लखनौजवळच्या गावात ट्रेनमधे सामूहिक बलात्कार करून विवाहितेला झाडाला फाशी दिल्याची बातमीही ! अशा दोन चार ओळीच्या अनेक बातम्या दिसू लागल्या..

मी बिभीषण एकटा

चाणक्य ·

चाणक्य 09/01/2013 - 11:42
आजुबाजूला घडू नयेत अश्या ब-याच गोष्टी घडताना मी बघतो. पण दुर्दैवाने ईच्छा असूनही परिस्थिती बदलता येत नाही, कारण माझी एकट्याची ताकद अपुरी पडते. रावणाच्या राज्यात असलेल्या बिभीषणा सारखी माझी अवस्था झाली आहे. बघवत तर नाही, पण एकट्याने काही करताही येत नाही. आजुबाजुला सगळेच रावणाधिष्ठीत....

स्पा 09/01/2013 - 12:16
सुंदर गझल हे तर
कोणीच आज येथे, शिरसावंद्य नाही हात जोडूनी तिष्ठलो, देव राऊळी नाही होती काल परवा, हिरवी डौल शेते केव्हा लिलावले त्यांना, आम्हा कळलेच नाही पाऊस अजुनही पडतो, न पडतो ऐसे नाही झाडांचे वॄक्ष व्हाया, आकाश मात्र नाही तो तुका थोर, त्याने अभंगही तरवले आम्ही करंटे आम्हाला,आमुचाच तोल नाही
खासच

भन्नाट आहे. फिदा झालो मी या रचनेवर
पाऊस अजुनही पडतो, न पडतो ऐसे नाही झाडांचे वॄक्ष व्हाया, आकाश मात्र नाही तो तुका थोर, त्याने अभंगही तरवले आम्ही करंटे आम्हाला,आमुचाच तोल नाही वाटे जरी निराशा, माझ्या स्वरांतुनी तुम्हाला मी बिभीषण एकटा, धनुष्य पेलवत नाही झटलो बांधावया सेतू,तरले दगड नाही लिहिणा-याच्या अहो आज, हातात राम नाही...
तुफान..

चेतन 16/01/2013 - 12:36
रचना आवडली अवांतर कोणीच आज येथे, शिरसावंद्य नाही हात जोडूनी तिष्ठलो, देव राऊळी नाही येथे युधिष्ठीर आणि दुर्योधनाला भिष्मांनी सभेत शिरसावंद्य माणुस शोधण्याच्या प्रसंगाची आठवण झाली

चाणक्य 09/01/2013 - 11:42
आजुबाजूला घडू नयेत अश्या ब-याच गोष्टी घडताना मी बघतो. पण दुर्दैवाने ईच्छा असूनही परिस्थिती बदलता येत नाही, कारण माझी एकट्याची ताकद अपुरी पडते. रावणाच्या राज्यात असलेल्या बिभीषणा सारखी माझी अवस्था झाली आहे. बघवत तर नाही, पण एकट्याने काही करताही येत नाही. आजुबाजुला सगळेच रावणाधिष्ठीत....

स्पा 09/01/2013 - 12:16
सुंदर गझल हे तर
कोणीच आज येथे, शिरसावंद्य नाही हात जोडूनी तिष्ठलो, देव राऊळी नाही होती काल परवा, हिरवी डौल शेते केव्हा लिलावले त्यांना, आम्हा कळलेच नाही पाऊस अजुनही पडतो, न पडतो ऐसे नाही झाडांचे वॄक्ष व्हाया, आकाश मात्र नाही तो तुका थोर, त्याने अभंगही तरवले आम्ही करंटे आम्हाला,आमुचाच तोल नाही
खासच

भन्नाट आहे. फिदा झालो मी या रचनेवर
पाऊस अजुनही पडतो, न पडतो ऐसे नाही झाडांचे वॄक्ष व्हाया, आकाश मात्र नाही तो तुका थोर, त्याने अभंगही तरवले आम्ही करंटे आम्हाला,आमुचाच तोल नाही वाटे जरी निराशा, माझ्या स्वरांतुनी तुम्हाला मी बिभीषण एकटा, धनुष्य पेलवत नाही झटलो बांधावया सेतू,तरले दगड नाही लिहिणा-याच्या अहो आज, हातात राम नाही...
तुफान..

चेतन 16/01/2013 - 12:36
रचना आवडली अवांतर कोणीच आज येथे, शिरसावंद्य नाही हात जोडूनी तिष्ठलो, देव राऊळी नाही येथे युधिष्ठीर आणि दुर्योधनाला भिष्मांनी सभेत शिरसावंद्य माणुस शोधण्याच्या प्रसंगाची आठवण झाली
लेखनविषय:
काव्यरस
बेमुवर्त पणे येथे, मद्याचे प्याले वागती यांना न कसली नीती, यांना न कसली भिती तो जो ऊभा राहिला, अन्याय बोलण्या काही तो ही म्हणे आताशा, मद्यात धुंद राही कोणीच आज येथे, शिरसावंद्य नाही हात जोडूनी तिष्ठलो, देव राऊळी नाही होती काल परवा, हिरवी डौल शेते केव्हा लिलावले त्यांना, आम्हा कळलेच नाही पाऊस अजुनही पडतो, न पडतो ऐसे नाही झाडांचे वॄक्ष व्हाया, आकाश मात्र नाही तो तुका थोर, त्याने अभंगही तरवले आम्ही करंटे आम्हाला,आमुचाच तोल नाही वाटे जरी निराशा, माझ्या स्वरांतुनी तुम्हाला मी बिभीषण एकटा, धनुष्य पेलवत नाही झटलो बांधावया सेतू,तरले दगड नाही लिहिणा-याच्या अहो आज, हातात राम नाही...

येशील?

मिसळलेला काव्यप्रेमी ·

इन्दुसुता 10/01/2013 - 00:15
रंजीश ही सही ( मला वाटते असे लिहायचे असते... पण उर्दू येत नाही त्यामुळे नक्की माहिती नाही :( ) दिल ही दुखानेके लिये आ.... या आर्त गझलेची आठवण झाली.

जेनी... 10/01/2013 - 00:27
कविता आवडली .... पण . एक कडवं खटकलं . ते चंद्र हवाय वालं ... म्हणजे वाचुन क्षणभर वाटलं ... हि नक्कि कुनासाठी लिहिलिय ?? २२ कि २ वयवर्षे ?? बाकिच्या सगळ्या ओळी खुप खुप आवडल्या . अगदी आत पोचल्या .

In reply to by जेनी...

पूजातै, वय वर्षे २ ते वय वर्षे ९२ या सर्व वयोगटातील लोकांना चंद्राचे आकर्षण असते, असे आपले माझे मत. फक्त त्या आकर्षणातील मायने बदलतात इतकेच. बाकी प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

In reply to by जेनी...

स्पंदना 10/01/2013 - 09:24
हे चंद्र मागण, एक बालिशपणा असतो जो अगदी जिवाभावाचा असेल तोच पूरवतो. चंद्र मागण हे एक कारण, निमित्त्य. खर मागणं वेगळच असत, तूझ्यासवे उभा रहाताना जी मॅच्युरिटीची, सहगामिनीची अपेक्षा तू करतोस तशीच मला या बालीश रुपातही स्विकारशील का? हा चॅलेंज असतो. अन बिलिव्ह मी पूजा, मोठमोठ्या घटनांनी जो फरक पडणार नाही, जे नात विणल जाणार नाही ते साध्य होत या बालिश, बिन खर्चिक हट्टातून असल्या प्रसंगातून. हे असले हट्ट पूरवायला एखाद्याच त्या व्यक्तीवर इतक प्रेम असाव लागत की बस. तसेही असले हट्ट तुम्हाला पैशाची, ऐशोआरामाची मागणी नाही करत, ते करतात मागणी ती तुमच्या मनातून तुम्ही खरच माझ्यावर प्रेम करता का या पूराव्याची. अन तो देता येतो या असल्या बालिश निरागस आनंदातुनच. बघ विचार कर. प्रेमिका वेगळी. ती दोन तास भेटुन परत जाते, तुम्ही मोकळे असता तिथुन पुढे. बायको वेगळी ती २४ तास तुमच्याबरोबर रहाणार. अन मग सारं सारं शेअर कराव लागत. त्याची तयारी होते ती या असल्या बालिश हट्टातूनच.

In reply to by स्पंदना

पाषाणभेद 10/01/2013 - 09:42
क्या बात है!! एकदम काव्यमय प्रतिसाद. 'मुक्तछंद काव्य हे जरी गद्यासारखे 'लिहीलेले' असले तरी त्यातील भावना मुख्यत्वे काव्यमय असाव्यात/ असतात' असा अर्थबोध होणारा लेख श्री. रमेश तेंडूलकर (त्यांचा मुलगा सचिन तेंडूलकरांचे आहे ते!) यांचा आहे. त्याची प्रकर्षाने आठवण झाली. ताई तुमचा वरील प्रतिसाद मला त्याच प्रतिभेशी मिळताजुळता वाटला. खुप खुप बरे वाटले.

In reply to by जेनी...

स्पंदना 11/01/2013 - 07:52
त्याला वेव्हलेंग्थ जुळण म्हणतात. एक कविता आहे, तू खुळा मी खुळी आपली मुले खुळखुळी" सांगु का? नवरा बायको हे नातं एकमेकाशी अगदी घट्ट जुळतं ते खेळकरपणानेच. बघ अजुन वेळ हातचा गेला नाही आहे, आत्ता कुठे पहाट होतेय. ट्राय इट & एंजॉय!

वपाडाव 10/01/2013 - 17:21
नसतेस घरी तु जेव्हा आठौले यार... संमंना विनंती :: प्लीज, प्लीज, प्लीज.. असलं साहित्य लपवुन ठेवण्यात यावं, नाहीतर जखमा लैच्च भळभळुन वाहतात !!!

उद्या शुक्रवार आहे...उद्याच वाचली असती तर बरं झालं असतं...तुम्ही लिहित राहा, काव्य विभागात त्यामुळे पुन्हा पुन्हा येणं होईल. अन्यथा तो अमुचा प्रांत नव्हे.

क्रान्ति 30/01/2013 - 22:36
जैसे झन्नाके चटख जाये किसी साज का इक तार जैसे रेशम की किसी डोर से कट जाती है उँगली ऐसे इक जर्ब सी पडती है कही सीने के अंदर खींचकर तोडनी पड जाती है जब तुझसे निगाहें तेरे जाने की घडी . . . बडी सक्त घडी है ! गुलजार ही कविता वाचून अगदी असंच काही वाटलं. अप्रतिम कविता!

इन्दुसुता 10/01/2013 - 00:15
रंजीश ही सही ( मला वाटते असे लिहायचे असते... पण उर्दू येत नाही त्यामुळे नक्की माहिती नाही :( ) दिल ही दुखानेके लिये आ.... या आर्त गझलेची आठवण झाली.

जेनी... 10/01/2013 - 00:27
कविता आवडली .... पण . एक कडवं खटकलं . ते चंद्र हवाय वालं ... म्हणजे वाचुन क्षणभर वाटलं ... हि नक्कि कुनासाठी लिहिलिय ?? २२ कि २ वयवर्षे ?? बाकिच्या सगळ्या ओळी खुप खुप आवडल्या . अगदी आत पोचल्या .

In reply to by जेनी...

पूजातै, वय वर्षे २ ते वय वर्षे ९२ या सर्व वयोगटातील लोकांना चंद्राचे आकर्षण असते, असे आपले माझे मत. फक्त त्या आकर्षणातील मायने बदलतात इतकेच. बाकी प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

In reply to by जेनी...

स्पंदना 10/01/2013 - 09:24
हे चंद्र मागण, एक बालिशपणा असतो जो अगदी जिवाभावाचा असेल तोच पूरवतो. चंद्र मागण हे एक कारण, निमित्त्य. खर मागणं वेगळच असत, तूझ्यासवे उभा रहाताना जी मॅच्युरिटीची, सहगामिनीची अपेक्षा तू करतोस तशीच मला या बालीश रुपातही स्विकारशील का? हा चॅलेंज असतो. अन बिलिव्ह मी पूजा, मोठमोठ्या घटनांनी जो फरक पडणार नाही, जे नात विणल जाणार नाही ते साध्य होत या बालिश, बिन खर्चिक हट्टातून असल्या प्रसंगातून. हे असले हट्ट पूरवायला एखाद्याच त्या व्यक्तीवर इतक प्रेम असाव लागत की बस. तसेही असले हट्ट तुम्हाला पैशाची, ऐशोआरामाची मागणी नाही करत, ते करतात मागणी ती तुमच्या मनातून तुम्ही खरच माझ्यावर प्रेम करता का या पूराव्याची. अन तो देता येतो या असल्या बालिश निरागस आनंदातुनच. बघ विचार कर. प्रेमिका वेगळी. ती दोन तास भेटुन परत जाते, तुम्ही मोकळे असता तिथुन पुढे. बायको वेगळी ती २४ तास तुमच्याबरोबर रहाणार. अन मग सारं सारं शेअर कराव लागत. त्याची तयारी होते ती या असल्या बालिश हट्टातूनच.

In reply to by स्पंदना

पाषाणभेद 10/01/2013 - 09:42
क्या बात है!! एकदम काव्यमय प्रतिसाद. 'मुक्तछंद काव्य हे जरी गद्यासारखे 'लिहीलेले' असले तरी त्यातील भावना मुख्यत्वे काव्यमय असाव्यात/ असतात' असा अर्थबोध होणारा लेख श्री. रमेश तेंडूलकर (त्यांचा मुलगा सचिन तेंडूलकरांचे आहे ते!) यांचा आहे. त्याची प्रकर्षाने आठवण झाली. ताई तुमचा वरील प्रतिसाद मला त्याच प्रतिभेशी मिळताजुळता वाटला. खुप खुप बरे वाटले.

In reply to by जेनी...

स्पंदना 11/01/2013 - 07:52
त्याला वेव्हलेंग्थ जुळण म्हणतात. एक कविता आहे, तू खुळा मी खुळी आपली मुले खुळखुळी" सांगु का? नवरा बायको हे नातं एकमेकाशी अगदी घट्ट जुळतं ते खेळकरपणानेच. बघ अजुन वेळ हातचा गेला नाही आहे, आत्ता कुठे पहाट होतेय. ट्राय इट & एंजॉय!

वपाडाव 10/01/2013 - 17:21
नसतेस घरी तु जेव्हा आठौले यार... संमंना विनंती :: प्लीज, प्लीज, प्लीज.. असलं साहित्य लपवुन ठेवण्यात यावं, नाहीतर जखमा लैच्च भळभळुन वाहतात !!!

उद्या शुक्रवार आहे...उद्याच वाचली असती तर बरं झालं असतं...तुम्ही लिहित राहा, काव्य विभागात त्यामुळे पुन्हा पुन्हा येणं होईल. अन्यथा तो अमुचा प्रांत नव्हे.

क्रान्ति 30/01/2013 - 22:36
जैसे झन्नाके चटख जाये किसी साज का इक तार जैसे रेशम की किसी डोर से कट जाती है उँगली ऐसे इक जर्ब सी पडती है कही सीने के अंदर खींचकर तोडनी पड जाती है जब तुझसे निगाहें तेरे जाने की घडी . . . बडी सक्त घडी है ! गुलजार ही कविता वाचून अगदी असंच काही वाटलं. अप्रतिम कविता!
काव्यरस
अजुनही आठवतंय... सुंदर पुरीया रंगलेला असतांना कटकन सतारीची एकचं तार तुटावी असे काहीतरी झाले होते ----- तू गेलीस त्या दिवसापासून हे असचं होतयं मग माझ्या सगळ्या कवितांचा पसारा मांडुन बसतो घरभर पानचं पानं आणि मध्ये मी ---- अमावस्येच्या रात्री हट्ट धरून बसली होतीस मला चंद्रचं हवाय त्या रात्री कागदाचा एक चंद्र करुन खिडकीच्या काळ्या काचेवर चिकटवला होता तेव्हा कुठे समाधान झाले तुझे ती बघ तिकडे त्या कोपर्‍यात त्या कागदाच्या चंद्रावरची कविता ती माझ्याकडे कशी रागाने बघतेय... ----- दोन आठवड्यांसाठी मी परगावी जातांना डोळ्यात दोनच टप्पोरे थेंब होते तुझ्या एकाने मला बांधून टाकले आणि दुसरा तुझ्या

वेदना

kanchanbari ·

In reply to by सस्नेह

kanchanbari 06/01/2013 - 17:12
हरकत नाही. आपण सर्व परिपूर्न नाही आहोत. मी लिहिण्याचा माझा प्रयत्न करते आहे. तुम्ही समजुन घेण्याचा करावा. इथे असहाय्य देवाचे लेकरु त्याची व्यथा देवा जवळ सांगत आहे.

In reply to by kanchanbari

समयांत 08/01/2013 - 16:56
कोणत्या वेदना जाणवतायेत याचे ज्ञान आहे, हा विषय किती दुमदुमला आहे नाहीतरी, >>>असहाय्य देवाचे लेकरु त्याची व्यथा देवा जवळ सांगत आहे. १००%

पैसा 06/01/2013 - 19:55
असेच लिहीत आणि वाचत रहा. (इतरांनी लिहिलेले वाचणे आणि त्यावर चर्चा करणे हेही महत्त्वाचे आहे.)

In reply to by सस्नेह

kanchanbari 06/01/2013 - 17:12
हरकत नाही. आपण सर्व परिपूर्न नाही आहोत. मी लिहिण्याचा माझा प्रयत्न करते आहे. तुम्ही समजुन घेण्याचा करावा. इथे असहाय्य देवाचे लेकरु त्याची व्यथा देवा जवळ सांगत आहे.

In reply to by kanchanbari

समयांत 08/01/2013 - 16:56
कोणत्या वेदना जाणवतायेत याचे ज्ञान आहे, हा विषय किती दुमदुमला आहे नाहीतरी, >>>असहाय्य देवाचे लेकरु त्याची व्यथा देवा जवळ सांगत आहे. १००%

पैसा 06/01/2013 - 19:55
असेच लिहीत आणि वाचत रहा. (इतरांनी लिहिलेले वाचणे आणि त्यावर चर्चा करणे हेही महत्त्वाचे आहे.)
लेखनविषय:
काव्यरस
इवलस तूझ बाळ वेदनांनी झाल लाचार म्हणे काय केल त्याने पाप सर्वांना सांग तु आज मखमलीची असतात स्वप्नांची पिसं अत्याचारी या दुनियेत हिरमुसली तुझी कुस ओढवली आहे सर्वांनी अंधाराची चादर तुझ्या या संसाराला लागली कुणाची नजर डोळ्यांच्या या पापण्या बघतांनाही लुकलुकतात अश्रुंच्या या सागरात थेंब रक्ताचे मिसळ्तात अरे जगाच्या माय बापा तुच आहेस ना सर्वांचा भाग्य विधाता मग दुर कर नशिबातला काटा तेव्हा करेल वंदन तुला दाता

शांती नवं वर्षातली

अत्रुप्त आत्मा ·

होम हवन शांती,करायची कोणी? पापांच्या भरल्या गोणी,ते शांत झोपिले बा खरे तेची मर्म,जे हाती घडे कर्म प्राप्य अ-प्राप्य सारे,सामावले त्यात... होऊन बैसलो मी,दुनियेचा या भाट दक्षिणेचा थाट,येथे कुचं कामी... शेवटी तशी माझीही,पेटणार अखंड धुनी चार आसवांची शांती,अखंड करोनिया...
व्वाह बुवा... आज मिपावर आल्याचे सार्थक झाले... खुप सुंदर...

धन्या 03/01/2013 - 21:47
मी ही सांगे मना,टाक थोडी आहुती संसारास निगुती,ऐसी मानवे ना...
यातलं निगुती म्हणजे काय? सवड का?

In reply to by धन्या

@यातलं निगुती म्हणजे काय? सवड का?>>> नाही. इथे निगुती या शब्दाचा मतितार्थ मी वेगळ्या पद्धतीनं वापरलाय. मी ही मनाला सांगतोय,कृत्रिम,निव्वळ भावनिक उपायच अता जगताना कर.माझ्या दुबळ्या(संसारि)मनाला परखड सत्याकडे जाणारे,एकंहि टप्पा न चुकवता येणारे, कठोर मार्ग (=निगुती) जमणारे नाहित.

५० फक्त 04/01/2013 - 08:39
तुझे चालणे अन मला वेदना / अचपळ मन माझे नावरे आवरिता आणि प्रवास 'माझ्या मना बन दगड' कडे. - अशातली वाटली ही कविता. आज अचानक एवढे निगेटिव्ह विचार का हो बुवा ? अवांतर - @ मा.संपादक की जे श्री. किसन शिंदे यांक, मा. संपाद्क कि जे श्री. वल्ली हे हल्ली, अँटी सॉल्ट आणि अँटीपेपर जॅकेट हुड्कतात असे समजले आहे.

In reply to by ५० फक्त

प्रचेतस 04/01/2013 - 09:23
=)) बाकी बुवांच्या इतर कवितांचा पण मी फ्यान आहे. मा. स. सं. किसन शिंदे यांच्या निराधार आरोपांचा निषेध. :-/

In reply to by ५० फक्त

मोदक 07/01/2013 - 13:45
नुस्ते अँटी सॉल्ट आणि अँटीपेपर जॅकेट नै कै.. अँटी सॉल्ट आणि अँटीपेपर वॉटरप्रूफ जॅकेट म्हणा.. :-D बुवा - काव्य झकास जमले आहे. कच्चा माल.. कच्चा माल.. म्हणून उघडले पण सुखद धक्का बसला. (भ्रमनिरासामुळे आनंदित) मोदक.

प्रचेतस 04/01/2013 - 09:21
होऊन बैसलो मी,दुनियेचा या भाट दक्षिणेचा थाट,येथे कुचं कामी... शेवटी तशी माझीही,पेटणार अखंड धुनी चार आसवांची शांती,अखंड करोनिया...
खूप सुंदर.

स्पंदना 04/01/2013 - 10:12
शांती? अच्छा बालिका गेली आता शांती काय? आत्मुस कविता फारच हळवी आहे. तुम्हाला शोभत नाही. पन फकत कविते बद्दल बोलायच तर अतिशय उच्च!

नाखु 07/01/2013 - 11:36
छान... (विडंबनाचं) भूत जरा लांब ठेवा म्हणजे असा अस्सल (बुवा) आम्हाला लाभंल्..आणि हो "वपा" यांना जोर्दार शुभेच्च्छा....

होम हवन शांती,करायची कोणी? पापांच्या भरल्या गोणी,ते शांत झोपिले बा खरे तेची मर्म,जे हाती घडे कर्म प्राप्य अ-प्राप्य सारे,सामावले त्यात... होऊन बैसलो मी,दुनियेचा या भाट दक्षिणेचा थाट,येथे कुचं कामी... शेवटी तशी माझीही,पेटणार अखंड धुनी चार आसवांची शांती,अखंड करोनिया...
व्वाह बुवा... आज मिपावर आल्याचे सार्थक झाले... खुप सुंदर...

धन्या 03/01/2013 - 21:47
मी ही सांगे मना,टाक थोडी आहुती संसारास निगुती,ऐसी मानवे ना...
यातलं निगुती म्हणजे काय? सवड का?

In reply to by धन्या

@यातलं निगुती म्हणजे काय? सवड का?>>> नाही. इथे निगुती या शब्दाचा मतितार्थ मी वेगळ्या पद्धतीनं वापरलाय. मी ही मनाला सांगतोय,कृत्रिम,निव्वळ भावनिक उपायच अता जगताना कर.माझ्या दुबळ्या(संसारि)मनाला परखड सत्याकडे जाणारे,एकंहि टप्पा न चुकवता येणारे, कठोर मार्ग (=निगुती) जमणारे नाहित.

५० फक्त 04/01/2013 - 08:39
तुझे चालणे अन मला वेदना / अचपळ मन माझे नावरे आवरिता आणि प्रवास 'माझ्या मना बन दगड' कडे. - अशातली वाटली ही कविता. आज अचानक एवढे निगेटिव्ह विचार का हो बुवा ? अवांतर - @ मा.संपादक की जे श्री. किसन शिंदे यांक, मा. संपाद्क कि जे श्री. वल्ली हे हल्ली, अँटी सॉल्ट आणि अँटीपेपर जॅकेट हुड्कतात असे समजले आहे.

In reply to by ५० फक्त

प्रचेतस 04/01/2013 - 09:23
=)) बाकी बुवांच्या इतर कवितांचा पण मी फ्यान आहे. मा. स. सं. किसन शिंदे यांच्या निराधार आरोपांचा निषेध. :-/

In reply to by ५० फक्त

मोदक 07/01/2013 - 13:45
नुस्ते अँटी सॉल्ट आणि अँटीपेपर जॅकेट नै कै.. अँटी सॉल्ट आणि अँटीपेपर वॉटरप्रूफ जॅकेट म्हणा.. :-D बुवा - काव्य झकास जमले आहे. कच्चा माल.. कच्चा माल.. म्हणून उघडले पण सुखद धक्का बसला. (भ्रमनिरासामुळे आनंदित) मोदक.

प्रचेतस 04/01/2013 - 09:21
होऊन बैसलो मी,दुनियेचा या भाट दक्षिणेचा थाट,येथे कुचं कामी... शेवटी तशी माझीही,पेटणार अखंड धुनी चार आसवांची शांती,अखंड करोनिया...
खूप सुंदर.

स्पंदना 04/01/2013 - 10:12
शांती? अच्छा बालिका गेली आता शांती काय? आत्मुस कविता फारच हळवी आहे. तुम्हाला शोभत नाही. पन फकत कविते बद्दल बोलायच तर अतिशय उच्च!

नाखु 07/01/2013 - 11:36
छान... (विडंबनाचं) भूत जरा लांब ठेवा म्हणजे असा अस्सल (बुवा) आम्हाला लाभंल्..आणि हो "वपा" यांना जोर्दार शुभेच्च्छा....
लेखनविषय:
काव्यरस
नावातकायआहे... यांनी ख.फ...सुना सुना झाल्याचे पाहुन तिथे शांति करायचे आंमंत्रण आंम्हास दिले..http://www.misalpav.com/user/7405 पण आमच्या मनातुन आज ही वेगळीच शांति बाहेर आली,,, तिचे बीजंरोपण केंव्हा झाले?-ते शोधायची हुरहुर लाऊन...