मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

करुण

आज 'तो' राहिला नाही

आनंदमयी ·
लेखनविषय:
काव्यरस
यायचे कुठुनसे तेव्हा ढग दाटुन एकाएकी स्पर्शून जायची मजला प्रीतीची लाट अनोखी उधळीत पेटता श्वास 'तो' कवेत मजला घेई परि आर्त क्षणांना तैशा कधि मेघ बरसला नाही..! अन् आज दाटले मेघ ही सांज कोंडली आहे .. अन् आज अधिर श्वासात ही प्रीत मांडली आहे अन् अवचित आज खुळासा नभि मेघहि बरसुन जाई... पण कवेत मजसी घेण्या, आज 'तो' राहिला नाही! © अदिती जोशी 11.6.2013 http://unaadpaus.blogspot.com

अजून आहे मी वनवासी

आनंदमयी ·
लेखनविषय:
काव्यरस
फिरून सरला काळ,अजुनही घुटमळते मी वळणापाशी युगायुगांची फरफट तरिही,अजून आहे मी वनवासी नवा साज अन् नवे रूप मज,भोग तरीही जुनेच पदरी आसपासचे नवीन चेहरे,जुनीच तरिही नजर विखारी नवे ध्येय मज गाठायाचे,जुनी तरी भिँतीँची घुसमट उंबरठ्याच्या पल्याड अजुनी जुनेच भयकंपाचे सावट जुनीच प्यादी जुनाच पट, परि नवा खेळ हा आयुष्याशी युगायुगांची फरफट,तरिही अजून आहे मी वनवासी अजून उठती शर शंकांचे मर्यादा मी लंघून जाता जनलज्जेच्या खेळामध्ये हरलेली मी अगतिक सीता अन् काळोखी वळवणावरती टपून आहे नवा पारधी नव्या कुरूंनी विटंबिलेली नव्या युगी मी नवी द्रौपदी मी माता मी भगिनी भार्या,तरी जगाला नकोनकोशी युगायुगांची फरफट,

चारोळ्या - २

धन्या ·
लेखनविषय:
काव्यरस
चारोळ्या - १ या चारोळ्या मी जवळपास साडे पाच वर्षांपूर्वी लिहिलेल्या आहेत. यमकं बर्‍यापैकी जुळलेली असली तरी हे "र ला र आणि ट ला ट" जोडणं नव्हतं. बरंचसं उस्फुर्त.

शिळी जिलेबी - १

धन्या ·
लेखनविषय:
काव्यरस
१ धीर गंभीर गाज सागराची सोबतीला आहे बोचरा वारा हरवून गेल्या दिशा सार्‍या अन मी शोधतो आहे किनारा २ किती ऋतू असे उन्हाळ्यात गेले किती ऋतू तसे पावसात चिंब झाले कळले नाही मला कधीही ते सारं माझ्या मनात आसवांचे मेघ दाटलेले ३ डोळे पाण्याने भरून आलेले आणि मनात आठवणींचे आभाळ दाटलेले झाकोळून गेल्या चेहृयावर माझ्या थर होते टोकणार्‍या वेदनांचे साचलेले ४ तुझ्या त्या आश्वासक शब्दांमुळे मी स्वत:ला खूप सावरलं होतं मन तसं भिजून आलं होतं पण माझ्या अश्रूना मात्र मी आवरलं होतं ५ काळ वेळ कधी तशी नसतेच तशी गुलमोहर फुलांनी बहरून यायला मनाचंही थोडंसं असंच असतं पुरते एक जाणी

व्यथा

psajid ·
लेखनविषय:
काव्यरस
गरिबीचा आसूड दुनिया माझी न्हवं, पायात डोकं दुमडून घ्यावं .....! अछुत जीव मनास ठावं, क्षुद्र मराण भाळी ल्यावं .....! हक्काचं मागणं घोर जीवा लावं, शिक्षेच्या झाकोळात मुजून जावं .....! आक्रीत करण्यां मन वेडं धावं, चाकोरीबाहेर पाऊल मरणास भ्यावं .....! आश्रूंभिजल्या भूमीच्या गंधात न्हावं, 'कर' नभाकडं मातीत एकरूप व्हावं .....! श्री. साजीद यासीन पठाण

मूक आक्रोश

किसन शिंदे ·
लेखनविषय:
काव्यरस
दिल्लीतील बलात्काराची शिकार झालेल्या "निर्भया"च्या शेवटच्या शब्दांवर आधारित एक कविता सध्या सगळीकडे ऐकू येते आहे. ती इंदू वर्मा यांनी लिहिली आहे.

उसवला शर्ट नवीन पुन्हा –

विदेश ·
लेखनविषय:
काव्यरस
( चाल – उगवला चंद्र पुनवेचा ) “उसवला शर्ट नवीन पुन्हा, मज देई शिवुनिया-“ उखडला पति तिचा || "काही सुया अशा घुसल्या, सटकुनी अडकुनी तुटल्या, मम बघा रुधिर क्षती बोचल्या-" करुणरस तो गळु पडे, खवळता, पत्निचा || .

भ्रांत....?

psajid ·
लेखनविषय:
काव्यरस
सुना एकांत मनांत भ्रांत, कसे जगावे तुझ्यासवे ? तू गुणांची 'माया' मनाची, ओंजळ फुलांची सुगंधित ! प्रेम मनांत मन बंधनात, विरह आघात पिढ्यानपिढ्या ! मन पारवा ओला गारवा, तरी हा आघात वारंवार ! खंबीर होई विरुद्ध लढाई, तन बंबाळ जखमांनी !! श्री. साजीद यासीन पठाण दह्यारी (सान्गली)

पुन्हा अनोळखी होऊ .... !!

psajid ·
लेखनविषय:
काव्यरस
संधीकाळी सुखावत होता जो गंध वाऱ्याचा तो विसरू, दिलासा एकमेकां देऊ.... अन पुन्हा अनोळखी होऊ .... !! नको आठवण काढू झंकारणाऱ्या स्वरांची, वादळात विखुरला जो मेणा खांद्यावर घेऊ.... सखे गं.. पुन्हा अनोळखी होऊ .....!! विसरू ती गुंफण कुरवाळणाऱ्या हातांची, नको आवाज झुल्यांचा मन बंदिशीत ठेऊ...... पुन्हा अनोळखी होऊ .....!! एकमेकांच्या पाऊलखुणांवर अंधारून छाया आली, ते व्रण वाळूतले सखे चल, आपणच पुसून पाहू...... सखे पुन्हा अनोळखी होऊ ....!! आहे उमटले प्रतिबिंब एकत्र दोघांचे जळी, छोटासा फेकून खडा विस्कटून त्याला टाकू ..... अन….