मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तवंग

बेसनलाडू ·

हे नक्की काय आहे? फक्त शेवटचे थोडे फार कळाले...असे वाटत आहे.... "हिरव्याकंच जखमांचे वैभव मन शेवाळी"

बहुगुणी 14/10/2014 - 02:00
बेलाशेठ लिहिते झाले म्हणून उत्सुकतेने वाचली, आवडली. पण बेलाशेठ कधीपासून परत लिहायला लागले म्हणून शोधलं, तर पोकळी आणि दाखला या दोन यावर्षीच लिहिलेल्या कविता सापडल्या, त्या आधिक आवडल्या. वेलकम बॅक, बेलाशेठ, आता चालू ठेवा लिहिणं.

तिमा 15/10/2014 - 21:10
बे.ला. लिहायला लागले. कविता आवडली. कविता समजावून सांगायची नसते. आपापल्या अनुभवांशी ताडून बघायची असते. खुणा जुळल्या की कविता आवडते.

हे नक्की काय आहे? फक्त शेवटचे थोडे फार कळाले...असे वाटत आहे.... "हिरव्याकंच जखमांचे वैभव मन शेवाळी"

बहुगुणी 14/10/2014 - 02:00
बेलाशेठ लिहिते झाले म्हणून उत्सुकतेने वाचली, आवडली. पण बेलाशेठ कधीपासून परत लिहायला लागले म्हणून शोधलं, तर पोकळी आणि दाखला या दोन यावर्षीच लिहिलेल्या कविता सापडल्या, त्या आधिक आवडल्या. वेलकम बॅक, बेलाशेठ, आता चालू ठेवा लिहिणं.

तिमा 15/10/2014 - 21:10
बे.ला. लिहायला लागले. कविता आवडली. कविता समजावून सांगायची नसते. आपापल्या अनुभवांशी ताडून बघायची असते. खुणा जुळल्या की कविता आवडते.
लेखनविषय:
काव्यरस
माझाच चंद्र सतत हरवतो तुझ्या आभाळी कोसळणारे गढूळ धबधबे कडेकपारी झडणारा मी वसंत टपटप अश्रूंमधला ओळी कातर उल्लेख पानभर व्याकुळ शाई बंद पापण्या तवंग मणभर साचवलेले हिरव्याकंच जखमांचे वैभव मन शेवाळी

ह्ये वागनं बरं नव्हं

निराकार गाढव ·

पोटे 18/09/2014 - 10:56
तिसर्‍या ओळी सुंदरच आहेत. खेबुडकरही चाट पडतील

धन्या 18/09/2014 - 11:36
>> गावच्या धणा लय शानाच हाय, याड्यांचा जनू की डाकतर हाय, ह्या ह्या ह्या. कुणाचा विलाज करायचा असेल तर बोला. अर्थात काही हाताबाहेर गेलेल्या केशी सोडून. :)

आदूबाळ 18/09/2014 - 11:56
जमलंय जमलंय! आता प्रतिहल्ला म्हणून "घागर नळाला लाव" चं सुडंबन पडेल काय?

पैसा 18/09/2014 - 12:03
मी कुठे काय क्येलं? उगाच आपलं! तुम्हा गरीब बापड्या सदस्यांचा टंकशोष वाचून माझे कोमल हृदय द्रवले आणि आता माझे हृदयपरिवर्तन झाले आहे. यापुढे तुमच्या प्रतिक्रिया आणि लेख फुलासारखे जपेन म्हण्टे. (म्हणजे झाडं कापायची कात्रीच घेऊन बसते आता.) विश्वास ठेवा नायतर ठेवू नका! (मेरे बाप का क्या जाता!) बरं काका, (प्रसंग पडला बाका, तर गधे को केहना काका) तुमचे गुर्जी कोण ते सांगूनच टाका एकदा! त्यांच्याकडून किरपा प्राप्त करीन म्हणटे. आतापर्यंत मी १० गुर्जी करायचा प्रयत्न केला, त्यातल्या ३ जणांनी जीव दिला. ३ जण संन्यास घेऊन फरार झाले आणि उरलेले ४ जण लग्न करून घरजावई झाले. अकरावा गुरू तरी लाभतोय का बघू! बरं तुम्ही जगदीश खेबुडकरांसारख्या बूर्झ्वा, प्रतिगाम्याच्या गाण्याचं विडंबन का केलंत म्हणे? तुम्हाला पुरोगामी व्हायचे नाही?

सूड 18/09/2014 - 14:40
>>पिळ घालूनी दावतो मिश्श्या, घडीघडी त्या मूष्षकलीला आरं साळसूद्दा, कुठून उपाटतो अस्सा, हे मला उद्देशून असेल तर हा वल्ली किंवा बुवांचा डुआयडी वाटतो आहे असं नमूद कर्तो. ;)

बॅटमॅन 18/09/2014 - 14:43
अगागागागागा =)) =)) =)) =)) =)) एकाचवेळी इतक्या दुगाण्या झाडूण सगळ्यांची तोंडे बाद केल्याबद्दल या ठिकानी या माध्यमातूण मी णिराकार गाढवभाऊंचे हबिणंदण कर्तो!!!!

प्यारे१ 18/09/2014 - 15:26
>>> काव्यरस: मार्गदर्शन मी आणि माझे हझल करुण ह्या उपरोक्त रसांमधलं काव्य अ फा ट आवडलंय....!

सुहास.. 18/09/2014 - 15:39
=)) =)) =)) लईच निराकार ब्वा तुम्ही !

म्हारास्ट्राचा फुढचा शिएम निराकार गाढवच झाला पायजेल, त्योच आमाला फुढं नेईल. कारण त्याच्या मागं कोण हुभं राहणार ,लाथ वर्मी बसल्यावं काय घ्या? त्यामुळं समदी गपगुमाण फुढं चालत्याल. निराकारीय गाढवी पार्टी ,-पार्टी विथ दुगाण्या.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

काळा पहाड 19/09/2014 - 10:11
ते नावाला. अहो तुम्ही "पुण्याचे" वटवाघूळ. पुण्यातले काही विनोदी प्रकार बघता (उदा: पुणेरी मिसळ, पुणेरी वडापाव, पुणेरी सिटी बसेस, पुणेरी ट्रॅफिक सेन्स इ.) तुमचा आणि खर्‍या वटवाघूळाचा संबंध वाघ आणि मांजर इतका घनिष्ठ असू शकेल. ह.घ्या.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

बॅटमॅन 19/09/2014 - 12:50
खरोखरचे वटवाघूळ मी आहे बरं का
अन मग आमी काय कागदी पंख लावल्यालं वटवाघूळ हाय का ;) संदर्भः मगदूम च्या. "आमी आमच्या आबाआज्यापासनं मगदूम च्याच पितो." "आन आमी काय ऊन पानी पितो काय?"

जेपी 18/09/2014 - 17:05
गाढव ते गाढवच शेवटी,दुसर्याने टाकलेल ओझ वाहुन नेण्यापरीस काही जमत नाही. मग ते परटान टाकलेल्या ओझाच असो की कुभांराने टाकलेल्या मातीच असो की कुणाच्या विचारच. फक्त ओझ वहायच काम करत.

चौकटराजा 19/09/2014 - 13:05
मिपा या गावातील मी ढ असल्याने मला काय बी कल्ला नाय ? कोन हाये हा गाडाव ? काव्य बरं लिल्हय म्हानायाचं !

श्रीगुरुजी 19/09/2014 - 13:09
कोणाला उद्देशून हे उपरोधिक लिखाण केलं जातंय ते कळेल का? तिकडे स्वयंघोषित सर्वज्ञांनी देखील गाढवावर काही तरी खरडलं आहे. त्यांचं ते लिखाण नम्रपणे केलेली आत्मस्तुतीच असावी असा गोड संशय येतोय. इथेही गाढव हाच मुख्य नायक आहे. काही आयडींना अचानक स्वजातीविषयी का उमाळा वाटू लागला असावा हे एक गूढच आहे. कृपया कोणत्या आयडीला उद्देशून हे लेखन केले जात आहे ते कळेल का?

पोटे 18/09/2014 - 10:56
तिसर्‍या ओळी सुंदरच आहेत. खेबुडकरही चाट पडतील

धन्या 18/09/2014 - 11:36
>> गावच्या धणा लय शानाच हाय, याड्यांचा जनू की डाकतर हाय, ह्या ह्या ह्या. कुणाचा विलाज करायचा असेल तर बोला. अर्थात काही हाताबाहेर गेलेल्या केशी सोडून. :)

आदूबाळ 18/09/2014 - 11:56
जमलंय जमलंय! आता प्रतिहल्ला म्हणून "घागर नळाला लाव" चं सुडंबन पडेल काय?

पैसा 18/09/2014 - 12:03
मी कुठे काय क्येलं? उगाच आपलं! तुम्हा गरीब बापड्या सदस्यांचा टंकशोष वाचून माझे कोमल हृदय द्रवले आणि आता माझे हृदयपरिवर्तन झाले आहे. यापुढे तुमच्या प्रतिक्रिया आणि लेख फुलासारखे जपेन म्हण्टे. (म्हणजे झाडं कापायची कात्रीच घेऊन बसते आता.) विश्वास ठेवा नायतर ठेवू नका! (मेरे बाप का क्या जाता!) बरं काका, (प्रसंग पडला बाका, तर गधे को केहना काका) तुमचे गुर्जी कोण ते सांगूनच टाका एकदा! त्यांच्याकडून किरपा प्राप्त करीन म्हणटे. आतापर्यंत मी १० गुर्जी करायचा प्रयत्न केला, त्यातल्या ३ जणांनी जीव दिला. ३ जण संन्यास घेऊन फरार झाले आणि उरलेले ४ जण लग्न करून घरजावई झाले. अकरावा गुरू तरी लाभतोय का बघू! बरं तुम्ही जगदीश खेबुडकरांसारख्या बूर्झ्वा, प्रतिगाम्याच्या गाण्याचं विडंबन का केलंत म्हणे? तुम्हाला पुरोगामी व्हायचे नाही?

सूड 18/09/2014 - 14:40
>>पिळ घालूनी दावतो मिश्श्या, घडीघडी त्या मूष्षकलीला आरं साळसूद्दा, कुठून उपाटतो अस्सा, हे मला उद्देशून असेल तर हा वल्ली किंवा बुवांचा डुआयडी वाटतो आहे असं नमूद कर्तो. ;)

बॅटमॅन 18/09/2014 - 14:43
अगागागागागा =)) =)) =)) =)) =)) एकाचवेळी इतक्या दुगाण्या झाडूण सगळ्यांची तोंडे बाद केल्याबद्दल या ठिकानी या माध्यमातूण मी णिराकार गाढवभाऊंचे हबिणंदण कर्तो!!!!

प्यारे१ 18/09/2014 - 15:26
>>> काव्यरस: मार्गदर्शन मी आणि माझे हझल करुण ह्या उपरोक्त रसांमधलं काव्य अ फा ट आवडलंय....!

सुहास.. 18/09/2014 - 15:39
=)) =)) =)) लईच निराकार ब्वा तुम्ही !

म्हारास्ट्राचा फुढचा शिएम निराकार गाढवच झाला पायजेल, त्योच आमाला फुढं नेईल. कारण त्याच्या मागं कोण हुभं राहणार ,लाथ वर्मी बसल्यावं काय घ्या? त्यामुळं समदी गपगुमाण फुढं चालत्याल. निराकारीय गाढवी पार्टी ,-पार्टी विथ दुगाण्या.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

काळा पहाड 19/09/2014 - 10:11
ते नावाला. अहो तुम्ही "पुण्याचे" वटवाघूळ. पुण्यातले काही विनोदी प्रकार बघता (उदा: पुणेरी मिसळ, पुणेरी वडापाव, पुणेरी सिटी बसेस, पुणेरी ट्रॅफिक सेन्स इ.) तुमचा आणि खर्‍या वटवाघूळाचा संबंध वाघ आणि मांजर इतका घनिष्ठ असू शकेल. ह.घ्या.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

बॅटमॅन 19/09/2014 - 12:50
खरोखरचे वटवाघूळ मी आहे बरं का
अन मग आमी काय कागदी पंख लावल्यालं वटवाघूळ हाय का ;) संदर्भः मगदूम च्या. "आमी आमच्या आबाआज्यापासनं मगदूम च्याच पितो." "आन आमी काय ऊन पानी पितो काय?"

जेपी 18/09/2014 - 17:05
गाढव ते गाढवच शेवटी,दुसर्याने टाकलेल ओझ वाहुन नेण्यापरीस काही जमत नाही. मग ते परटान टाकलेल्या ओझाच असो की कुभांराने टाकलेल्या मातीच असो की कुणाच्या विचारच. फक्त ओझ वहायच काम करत.

चौकटराजा 19/09/2014 - 13:05
मिपा या गावातील मी ढ असल्याने मला काय बी कल्ला नाय ? कोन हाये हा गाडाव ? काव्य बरं लिल्हय म्हानायाचं !

श्रीगुरुजी 19/09/2014 - 13:09
कोणाला उद्देशून हे उपरोधिक लिखाण केलं जातंय ते कळेल का? तिकडे स्वयंघोषित सर्वज्ञांनी देखील गाढवावर काही तरी खरडलं आहे. त्यांचं ते लिखाण नम्रपणे केलेली आत्मस्तुतीच असावी असा गोड संशय येतोय. इथेही गाढव हाच मुख्य नायक आहे. काही आयडींना अचानक स्वजातीविषयी का उमाळा वाटू लागला असावा हे एक गूढच आहे. कृपया कोणत्या आयडीला उद्देशून हे लेखन केले जात आहे ते कळेल का?
रतीबावर रतीब जिलुबिचा रतीब, कश्श्ये टंकती लई चरबरीत | आवं गुर्र्जेन्ला, किती वो तरास द्येता, ह्ये वागनं बरं नव्हं ||   गुर्र्जींनि मैफल गाजिवलि, किती ह्यी ब्येनं लोळिवली पिळ घालूनी दावतो मिश्श्या, घडीघडी त्या मूष्षकलीला आरं साळसूद्दा, कुठून उपाटतो अस्सा, ह्ये वागनं बरं नव्हं ||   गावच्या धणा लय शानाच हाय, याड्यांचा जनू की डाकतर हाय, गोंयची इणि नाय आणुभवी, बणून रायली मोटी कवि आरं लांबटांग्या, हाबंग लिवतोस डोंगा, ह्ये वागनं बरं नव्हं ||   समाधीयोग शिक्कीविला, डोस्क्यात तुमच्या नाय रावला अर्धाच इच्चार करतुया, नावाला प्यार दावतुया आरं वटवाघळा, पकडून ठिवतोस गळा, ह्ये वाग

वेदना

निरन्जन वहालेकर ·

अजय जोशी 18/09/2014 - 20:03
हातात हात गुम्फलेले आपले आणि......................... तू म्हणालीस "नको रे सैल सोडुस" नाहीतर................... "निसटून जातील तुझ्या हातातून." वा

अजय जोशी 18/09/2014 - 20:03
हातात हात गुम्फलेले आपले आणि......................... तू म्हणालीस "नको रे सैल सोडुस" नाहीतर................... "निसटून जातील तुझ्या हातातून." वा
लेखनविषय:
काव्यरस
वेदना आठवणी चालून येतात अचानक......... एखाद्या बन्दुकीच्या गोळी सारख्या, आरपार भेदून जातात पुन्हा जखमी करून. तरीहि आठवतेच........ एखादी प्रसन्न सन्ध्याकाळ गन्धित क्षण, जगावेसे वाटणारे. हातात हात गुम्फलेले आपले आणि......................... तू म्हणालीस "नको रे सैल सोडुस" नाहीतर................... "निसटून जातील तुझ्या हातातून." ............................ अशाच कीतितरी जीर्ण जखमा अजुनहि काहीश्या ओल्या, काही बरया होत आलेल्या, वेदनावतात, पुन्हापुन्हा, आठवणीन्चा धक्का लागून. मी मात्र प्रयत्नात, सार काही विसरण्याचा. निश्फळ ! ! निरर्थक ! ! ! निरन्जन वहाळेकर

(चला ऑफीस आले आता...)

ऋषिकेश ·

सस्नेह 09/09/2014 - 09:46
ऑफिस सुटले की हो आता सर्फून सर्फून सगळ्या संस्थळान्चा झाला चोथा

सस्नेह 09/09/2014 - 09:46
ऑफिस सुटले की हो आता सर्फून सर्फून सगळ्या संस्थळान्चा झाला चोथा
लेखनविषय:
काव्यरस
चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे मी बनेन ट्रोल सारे नुस्ते करा स्क्रोल मी वाट्टेल तसे पिंकायचे तुम्ही पकडापकडी खेळायचे चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे|| मी संपादक बनेन सुचना देत सुटेन मी काहिंना ब्यान करायचे मग बंड तुम्ही पुकारायचे चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे|| मी एकोळी टाकेन नंतर मजा बघेन तुम्ही भरपूर बॅशिंग करायचे तरी मी पयलाच म्हणायचे चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे|| नुस्तेच फटू टाकेन तया प्रवासवर्णन म्हणेन तुम्ही तया भरपूर लाईकवायचे अजून येऊ द्या म्हणायचे चला ऑफीस आले आता, खूप खूप सर्फायचे|| मी मोदीद्वेष्टा व्हायचे तुम्ही समर्थक बनायच

सल आठवांचा...

मूकवाचक ·

अजय जोशी 25/08/2014 - 19:33
दैवगतीला शह देत प्राक्तनावर मात करण्याची वेळ यावी अन त्याच मोक्याच्या क्षणी डाव उधळून देत हार पत्करावी छानच.

अजय जोशी 25/08/2014 - 19:33
दैवगतीला शह देत प्राक्तनावर मात करण्याची वेळ यावी अन त्याच मोक्याच्या क्षणी डाव उधळून देत हार पत्करावी छानच.
लेखनविषय:
काव्यरस
(मेहदी हसन यांनी गायलेल्या 'बेकरारी सी बेकरारी है' या गझलचा स्वैर भावानुवाद) सखे, तुझ्या आठवांचा सल काही केल्या कमी होत नाही विरहाची ही असह्य तगमग मनाचे अवकाश झाकोळून टाकते आहे तो रटाळ बेजान दिवस ढळता ढळत नव्हता अन आता तर ही काळरात्रही खायला उठली आहे... दैवगतीला शह देत प्राक्तनावर मात करण्याची वेळ यावी अन त्याच मोक्याच्या क्षणी डाव उधळून देत हार पत्करावी आयुष्याच्या सारीपटावर नेहमीच रंगणारा हा डाव आता सवयीचा होत चालला आहे... मिलनाचे स्वप्न पाहतानाच्या त्या उत्कट क्षणी मनोमन तुलाच अर्पण केलेल्या माझ्या घायाळ झालेल्या काळजावर बेगुमानपणे तुला हवे तितके घाव घाल तुझी अनभिषीक्त मालकी असलेल्या त्य

सप्तरंगी पोपट !!

फिझा ·

विवेकपटाईत 03/08/2014 - 10:00
चिमण्या सुद्धा नाहीश्या झाल्या आहेत. दिल्लीत चिमण्यांना ही पिंजर्यात डांबून विकणारे हजारो दुकानदार आहेत. घरात पक्षी ठेवणे हा दिल्लीकरांचा नवीन फैशन आहे.

मदनबाण 03/08/2014 - 10:07
काळोख दाटला सभोवती भीती चिमुकल्या मनात , काजव्यांना साद घाले परंतू तो तर दिव्यांचा झगमगाट ….! केवल अप्रतिम... :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Gulabi... ;) { शुद्ध देसी Romance }

विवेकपटाईत 03/08/2014 - 10:00
चिमण्या सुद्धा नाहीश्या झाल्या आहेत. दिल्लीत चिमण्यांना ही पिंजर्यात डांबून विकणारे हजारो दुकानदार आहेत. घरात पक्षी ठेवणे हा दिल्लीकरांचा नवीन फैशन आहे.

मदनबाण 03/08/2014 - 10:07
काळोख दाटला सभोवती भीती चिमुकल्या मनात , काजव्यांना साद घाले परंतू तो तर दिव्यांचा झगमगाट ….! केवल अप्रतिम... :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Gulabi... ;) { शुद्ध देसी Romance }
लेखनविषय:
काव्यरस
सप्तरंगी पोपट !! तो दिवसच नशिबात आला अन सांजवेळ ती अशुभाची आभाळ फाटुनी घात जाहला करूण व्यथा त्या पिलाची ….! असे बंधिस्त तो पिंजरा सोन्याचा कि लोहाचा, अतिरम्य पंख किती फडकले पिल्लू गोजिरे ते पार अडकले …! गेला भरधाव तो रथही घेउनि केविलवाण्या पिंजऱ्यास , आक्रोश विरला अन अश्रूही इवलेसे डोळेच फक्त सांत्वनास …! काळोख दाटला सभोवती भीती चिमुकल्या मनात , काजव्यांना साद घाले परंतू तो तर दिव्यांचा झगमगाट ….! इथे न कुणी मायबाप प्रेमाला अन मायेला , जीवाहूनही किंमत न्यारी इथे फेकील्या पैशाला ….! सापडला जीव कोंडीत प्राक्तन ते नशिबाचे , साजरे केले तरी सोह

उंबरठा नसलेले घर - २

मिसळलेला काव्यप्रेमी ·
लेखनविषय:
काव्यरस
कां कोण जाणे पण परत उंबरठा बांधायची हिंमतच होत नाहीये ---- न जाणो ती अंगणातली फुलदाणी घरात परत आलीचं नाही तर?! ---- मग वाटतं बरं झालं उंबरठा वाहून गेला कच्चाच होता नाहीतरी ---- तुझी डायरी तेवढी बाहेर काढून वाचायची अनिवार इच्छा होतेय किमान ती अलमारी तरी शांत होईल...

शायरी - भाग २

चिनार ·
लेखनविषय:
काव्यरस
मेरी जिंदगी मे तेरा वजूद कुछ ऐसा है, , के तू नही तो मेरा कोई वजूद नही ! तुझे पाने के ख्वाईश कुछ ऐसी है, , के तू नही तो कोई और ख्वाईश नही ! ! यू तो अकेला ही चला था मै एक राह पर , , हां ! ,तेरे मिलने से राहत मिली अब तेरे ना होने का गम तो नही, , पर सामने देखता हू तो कोई मंजिल भी नही ! ! एक और दिन बीत गया तेरे खयाल मे , एक और शाम ढल गयी तेरी याद मे , अब इस रात से डरता हू , कही ये भी ना गुजर जाये तेरे इन्तेजार मे ! ! एक दिन ,एक शाम, एक रात तो बीत जायेगी , कही सांस न रुक जाये तेरे इन्तेजार मे ! !

एकलव्य..

vaibhav deshmukh ·

एस 07/07/2014 - 10:32
छान केलीय कविता. काही व्याकरण-शुद्धलेखनाच्या चुका टाळा. उदा: माञ -> मात्र निश्चिल -> निश्चल धर्नुधर -> धनुर्धर नजरात -> नजरांत

आयुर्हित 07/07/2014 - 10:40
कोणी नाकारले म्हणूनच शांत निश्चिल मूर्तीच्या साक्षीनेच मी लक्ष्यावर असंख्य बाण सोडले मी धर्नुधर झालो अभिनंदन, खुप चांगला संदेश दिला आहे.

एस 07/07/2014 - 10:32
छान केलीय कविता. काही व्याकरण-शुद्धलेखनाच्या चुका टाळा. उदा: माञ -> मात्र निश्चिल -> निश्चल धर्नुधर -> धनुर्धर नजरात -> नजरांत

आयुर्हित 07/07/2014 - 10:40
कोणी नाकारले म्हणूनच शांत निश्चिल मूर्तीच्या साक्षीनेच मी लक्ष्यावर असंख्य बाण सोडले मी धर्नुधर झालो अभिनंदन, खुप चांगला संदेश दिला आहे.
लेखनविषय:
एकलव्य.... कित्येक शतके उलटली युगांतरे झाली सत्तांतर घडले मी माञ स्थिर आहे त्याच सहानुभूतींच्या बंदिस्त नजरेत.. कोणी नाकारले म्हणूनच शांत निश्चिल मूर्तीच्या साक्षीनेच मी लक्ष्यावर असंख्य बाण सोडले मी धर्नुधर झालो रक्ताळलेल्या चार बोटांचा श्रेष्ठ शिष्यही झालो तेव्हाच; त्या हाताकडे पाहताना दु: खाचा लवलेशही नव्हता मुद्रेवर पण; मी डगमगलो ढासळलो तुमच्या अनुत्तरीत प्रश्नात? तुमच्या सहानुभूतीच्या नजरात? तुमच्या पाणावलेल्या इतिहासात? तुमच्या या पराजित युगात...!

उंबरठा नसलेले घर -- १

मिसळलेला काव्यप्रेमी ·

इनिगोय 24/06/2014 - 21:21
अंगणातली फुलं सांभाळायची कि उंबरठा नसलेले घर तेच उमजत नाहीये तिला यात असा बदल केला तर? --- अंगणातली फुलं सांभाळायची कि उंबरठा नसलेले घर तेच उमजत नाहीये ”त्याला” कविता नेहमीसारखी आवडलीच!

तुला इतक्या तरलतेनं कशा बांधता येतात, याचं नवल वाटतं. स्वातंत्र्य या आदिम इच्छेची, काव्यात्मक अभिव्यक्ती; आणि घर की अंगण या द्विधेत सापडलेली माती, मनापासून आवडली. या ओळी :
देवघरासमोरील समईची मंद ज्योत आजकाल बाळकृष्णाच्या चेहर्‍याशी पोहचेनाशी झालीये त्या वाहलेल्या उंबरठ्याच्या दिशेने झुकत राहते थरथरत
(बहुदा) अशा हव्यात ............ वाहून गेलेल्या उंबरठ्याच्या दिशेने झुकत राहते थरथरत

आपल्या रचना नेहमीच वाचतो. कविता आवडतात. काल माझ्या मैत्रीणीने या कवितेवर चांगली चर्चा केली. मैत्रीणीच्या भाषेत '' माणसाच्या आयुष्यात सुखांच्या फुलांची पण उधळण होते व अस्ताव्यस्त दु:खही सतत माणसाला लगडून असतात मग यात काय सांभाळायचं उंबरठा नसल्यावर नाही का” असं म्हणुन कवितेवर चर्चा करायला दिलं आम्हाला कामाला लावून. एखादी कविता वाचली की कवितेत असलेली सर्व कथा उलगडावी असे वाटते. एखाद्या कवितेच्या काही ओळी खास वाटतात कारण त्यात असलेल्या कल्पनेने आणि त्यातल्या अर्थाने. मला कवितेची थीम आवडली. धो धो पाऊस आलाय आणि घराचा उंबरठा वाहून गेला. घरात कोंडमारा झालेल्या सर्व वस्तू आपल्या व्यक्तिमत्वासहीत बाहेर पडल्या आहेत, बाहेरची ओढ आहेच. म्हणुनच सुरुवातीच्या ओळी मला खूप आवडल्या. बैठकीच्या खोलीतली फुलदानी बाहेर पडलीय ती पहाटेच्या वर्षावात ''एखादं फुलं पदरात पडावं म्हणुन'' निर्जीवपणा जावा, टवटवीतपणा यावा फुलदानीच्या जगण्याला अतिशय सुरेख ओळी आणि छान कल्पना. आणि मग कवितेत असा एखादा अर्थ लागला की पुढच्या ओळींमधुन तसाच अर्थ वाचायला मिळतो का असे म्हणुन वाचलं समईची मंद ज्योतीचं आता देव्हा-यात लक्ष नाही. तिचंही लक्ष विचलित झालंय तीही घराबाहेर पडलेल्या उंबरठ्याच्या दिशेने पाहात आहे, ज्योतीचं बाळकृष्णावर अतिशय प्रेम आहे, सतत त्याच्यापुढे मंद तेवत आणि झुलत असते. पण उंबरठाच गेलाय तर कदाचित तिलाही हे बंध नकोत का ? पण असं नसावं. आपल्या आयुष्याला शोभा देव्हा-यामुळे आणि मग आपल्यालाही बाहेर पडावं लागतंकी काय, म्हणुन ती थरथरते आहे. याही ओळी छान आहेत. डायरीतल्या आठवणीही बाहेर पडण्यासाठी धडपडत आहेत. उंबरठाच वाहून गेलाय तेव्हा आपलं म्हणुन काही अस्तित्व उरलं नाही असे वाटतं घरातल्या प्रत्येक वस्तुला. आणि मग ''काय झालं कुणास ठाऊक पासून ते उंबरठाच वाहून गेला'' इथपर्यंतच्या ओळी मला विस्कळीत वाटतात. कवितेचा आनंद मिळत नाही. 'अंगणातली माती आत बाहेर होत आहे' असू दे नाही तर ’फुलं सांभाळायची कि उंबरठा नसलेले घर’ यात ओळी चांगल्या आलेल्या असूनही एका सलग थीमची मजा घेता येत नाही. अर्थात कवीच्या मनातल्या कल्पना आणि अर्थ वाचकाच्या कल्पना आणि अर्थाशी जुळलाच पाहिजे असं काही नाही. आम्ही आपलं आपल्याला काही पोहोचतं का इतक्याच शोधात असतो. आपल्या कवितेवर आम्हाला चर्चा करतांना मजा आली. आभार लिहित राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डिबी, मला तरी मांडणी विस्कळीत वाटली नाही. अर्थात, मिकाच्या भावना, तो स्वतःच स्पष्ट करेल. पण मला पोहोचलेला अर्थ असा :
माणसाच्या आयुष्यात सुखांच्या फुलांची पण उधळण होते व अस्ताव्यस्त दु:खही सतत माणसाला लगडून असतात मग यात काय सांभाळायचं उंबरठा नसल्यावर नाही का”
स्वच्छंद आणि रुटीन-आयुष्य, यातली उंबरठा ही सीमा आहे. स्वच्छंद आपल्याला सतत खुणावत असतो, उंबरठा ओलांडावासं कैकदा वाटतं पण रोजचं रुटीन, ते साहस करु देत नाही. `मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो' या अप्रतीम कवितेत, संदीप खरे म्हणतो : मी जुनाट दारा परी किरकीरा बंदी तो सताड उघड्या खिडकीपरी स्वच्छंदी, मी बिजागरीशी जीव गंजवत बसतो, तो लंघून चौकट पार निघाया बघतो | ....ही चौकट पार करणं मिकाच्या कवितेचा उंबरठा वाहून जाणं आहे. तुमच्या मैत्रिणीला बहुदा, तो अर्थ पोहोचला नसावा आणि त्यामुळे पुढचे संदर्भ लागले नसतील.
काय झालं कुणास ठाऊक पण गेला एकदाचा रात्रभर बरसून पाऊस फुलं देऊन.. गेला आता अंगणात परत एकदा शांतता नांदेल
पावसानं चित्तवृत्ती फुलल्या होत्या. त्या फुलांनी स्वछंदाची ओढ लावली होती. उंबरठा वाहून गेला होता. पण आता पाऊस थांबलाय त्यामुळे अंगणात शांतता पसरलीये. पुन्हा ती ओढ विरतेयं. .........
पण आता अंगणातली माती चक्रीवादळात अडकल्यासारखी आत-बाहेर होतेय
ही माती म्हणजे आपण आहोत. आपली द्विधा मनस्थिती आहे. घरात जावं, पुन्हा रुटीनला लागावं की मोकळ्या अंगणात थांबावं हे चक्रीवादळ, मनाला घेरतंय. एकदा आत जावंसं वाटतंय, तर पुन्हा अंगण खुणावतंय. -----
अंगणातली फुलं सांभाळायची कि उंबरठा नसलेले घर तेच उमजत नाहीये तिला
स्वच्छंदाची उधळण झालेली फुलं वेचावी की पुन्हा घरात शिरावं हा मनाला संभ्रम आहे. कारण उंबरठा वाहून जाण्याची संधी; ती चौकट लंघून जाण्याची उर्मी, पुन्हापुन्हा येत नाही. -----
काय झालं कुणास ठाऊक पण काल रात्री पावसात या घराचा उंबरठाच वाहून गेलाय
हे रिपीटिशन, थीम हायलाइट करतं.... तुम्हाला परत एकदा कविता वाचाशी वाटते.

In reply to by संजय क्षीरसागर

आस्वादक म्हणुन विस्कळीत ओळीअर्थांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न उत्तम वाटला. आवडलेली कविता मी पुन्हा पुन्हा वाचतो त्यामुळे आता पुन्हा वाचण्यासारखं आणि शोधण्यासारखं काही राहिलेलं नाही, जे वाटलं ते लिहिलंच आहे तुम्हीही आणि मीही....! दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझ्या कवितेवर इतका विचार आणि चर्चा झाली हे वाचून आनंद झाला आणि समाधान वाटलं. मुळात त्या कवितेचा अर्थ मी देखिल इतक्या विस्तृतपणे मांडू शकेन कां यावर मलाच शंकाच आहे. तुम्ही उभयतांनी केलेले रसग्रहण अगदी तंतोतत आहे असे जरी म्हणता येत नसलं तरी मला अभिप्रेत असलेला भावर्थ तुमच्या रसग्रहणाशी खुप जवळ जातो. मला शेवटच्या ओळी अश्या कां लिहावाश्या वाटल्या हे मलाही सांगता येणार नाही, पण ज्या मातीचा मी उल्लेख केलाय ती माती त्या घराला धरुन होती (पाऊस येऊन उंबरठा वाहून जाण्याआधी). त्या मातीची (आणि कदाचित घरातल्या कर्त्या पुरुषाची) व्दिधा मनःस्थिती मांडण्याचा तो एक प्रयत्न आहे. असो, मला खरचं नाही सांगता येणार. तरीही तुम्ही माझी कविता इतक्या मनःपूर्वक वाचली आणि आपला विस्तृत अभिप्राय मांडण्याचे कष्ट घेतले यासाठी मनःपूर्वक धन्यवाद.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

आणि, या खुलाशानं
त्या मातीची (आणि कदाचित घरातल्या कर्त्या पुरुषाची) व्दिधा मनःस्थिती मांडण्याचा तो एक प्रयत्न आहे
मी केलेल्या रसग्रहणाचं सार्थक झालं!

असंका 26/06/2014 - 10:09
इतकं वेगळं काही बघितल्याच्या आनंदात असतानाच, एक जरा खटकलं- उंबरठा कालच वाहून गेलाय तर "आजकाल असं होतंय" याला काय संदर्भ? "आज असं होतंय" हे जास्त नैसर्गिक झाले असते ? तरीही इतकी सुंदर कल्पना ज्यांच्या डो़क्यातून निघाली त्यांच्यासमोर काय बोलायचे हो? अनेक धन्यवाद!

पैसा 26/06/2014 - 10:54
सुरेख रचना! प्रा.डो. बिरुटे सरांचं रसग्रहणही आवडलं.

एस 26/06/2014 - 23:33
कविता पुनःपुन्हा वाचतोय. 'भय इथले...' डोक्यात वाजत राहतेय आणि आपली ही कविता जणू उर फुटूून धावत सुटलीय.

शुचि 28/06/2014 - 00:25
देवघरासमोरील समईची मंद ज्योत आजकाल बाळकृष्णाच्या चेहर्‍याशी पोहचेनाशी झालीये त्या वाहलेल्या उंबरठ्याच्या दिशेने झुकत राहते थरथरत
निव्वळ टचिंग!!!

वाहुन गेलेला उंबरठा ह्या रुपकाने प्रत्येक वाचकाच्या मनात आपापले कल्पनाविश्व उभे राहिले नसल्यास नवलच. बहुदा अशी ताकतवान रुपकेच अश्या भावविभोर करणार्‍या कवितांना इतके परिणामकारक बनवत असावीत. कवितेतली जी इन्विजिबल प्रोटोगॉनिस्ट आहे तिची प्रत्येक वाचकाने आपापली तरल प्रतिमा बनवली असणार.. कुणी गेलेली आजी, कुणाची परगावी असलेली आई तर कुणाची लग्नघरी नांदणारी बहिण अन कुणाची लॉस्ट प्रेयसी. सगळ्यांच्या या प्रतिविश्वात प्रिय व्यक्तीच्या वियोगाचे दु:ख ही भावना मात्र सारखी, सगळ्या वाचकांची प्रतिविश्वं एका माळेत ओवणारी. ब्राव्हो !

इनिगोय 24/06/2014 - 21:21
अंगणातली फुलं सांभाळायची कि उंबरठा नसलेले घर तेच उमजत नाहीये तिला यात असा बदल केला तर? --- अंगणातली फुलं सांभाळायची कि उंबरठा नसलेले घर तेच उमजत नाहीये ”त्याला” कविता नेहमीसारखी आवडलीच!

तुला इतक्या तरलतेनं कशा बांधता येतात, याचं नवल वाटतं. स्वातंत्र्य या आदिम इच्छेची, काव्यात्मक अभिव्यक्ती; आणि घर की अंगण या द्विधेत सापडलेली माती, मनापासून आवडली. या ओळी :
देवघरासमोरील समईची मंद ज्योत आजकाल बाळकृष्णाच्या चेहर्‍याशी पोहचेनाशी झालीये त्या वाहलेल्या उंबरठ्याच्या दिशेने झुकत राहते थरथरत
(बहुदा) अशा हव्यात ............ वाहून गेलेल्या उंबरठ्याच्या दिशेने झुकत राहते थरथरत

आपल्या रचना नेहमीच वाचतो. कविता आवडतात. काल माझ्या मैत्रीणीने या कवितेवर चांगली चर्चा केली. मैत्रीणीच्या भाषेत '' माणसाच्या आयुष्यात सुखांच्या फुलांची पण उधळण होते व अस्ताव्यस्त दु:खही सतत माणसाला लगडून असतात मग यात काय सांभाळायचं उंबरठा नसल्यावर नाही का” असं म्हणुन कवितेवर चर्चा करायला दिलं आम्हाला कामाला लावून. एखादी कविता वाचली की कवितेत असलेली सर्व कथा उलगडावी असे वाटते. एखाद्या कवितेच्या काही ओळी खास वाटतात कारण त्यात असलेल्या कल्पनेने आणि त्यातल्या अर्थाने. मला कवितेची थीम आवडली. धो धो पाऊस आलाय आणि घराचा उंबरठा वाहून गेला. घरात कोंडमारा झालेल्या सर्व वस्तू आपल्या व्यक्तिमत्वासहीत बाहेर पडल्या आहेत, बाहेरची ओढ आहेच. म्हणुनच सुरुवातीच्या ओळी मला खूप आवडल्या. बैठकीच्या खोलीतली फुलदानी बाहेर पडलीय ती पहाटेच्या वर्षावात ''एखादं फुलं पदरात पडावं म्हणुन'' निर्जीवपणा जावा, टवटवीतपणा यावा फुलदानीच्या जगण्याला अतिशय सुरेख ओळी आणि छान कल्पना. आणि मग कवितेत असा एखादा अर्थ लागला की पुढच्या ओळींमधुन तसाच अर्थ वाचायला मिळतो का असे म्हणुन वाचलं समईची मंद ज्योतीचं आता देव्हा-यात लक्ष नाही. तिचंही लक्ष विचलित झालंय तीही घराबाहेर पडलेल्या उंबरठ्याच्या दिशेने पाहात आहे, ज्योतीचं बाळकृष्णावर अतिशय प्रेम आहे, सतत त्याच्यापुढे मंद तेवत आणि झुलत असते. पण उंबरठाच गेलाय तर कदाचित तिलाही हे बंध नकोत का ? पण असं नसावं. आपल्या आयुष्याला शोभा देव्हा-यामुळे आणि मग आपल्यालाही बाहेर पडावं लागतंकी काय, म्हणुन ती थरथरते आहे. याही ओळी छान आहेत. डायरीतल्या आठवणीही बाहेर पडण्यासाठी धडपडत आहेत. उंबरठाच वाहून गेलाय तेव्हा आपलं म्हणुन काही अस्तित्व उरलं नाही असे वाटतं घरातल्या प्रत्येक वस्तुला. आणि मग ''काय झालं कुणास ठाऊक पासून ते उंबरठाच वाहून गेला'' इथपर्यंतच्या ओळी मला विस्कळीत वाटतात. कवितेचा आनंद मिळत नाही. 'अंगणातली माती आत बाहेर होत आहे' असू दे नाही तर ’फुलं सांभाळायची कि उंबरठा नसलेले घर’ यात ओळी चांगल्या आलेल्या असूनही एका सलग थीमची मजा घेता येत नाही. अर्थात कवीच्या मनातल्या कल्पना आणि अर्थ वाचकाच्या कल्पना आणि अर्थाशी जुळलाच पाहिजे असं काही नाही. आम्ही आपलं आपल्याला काही पोहोचतं का इतक्याच शोधात असतो. आपल्या कवितेवर आम्हाला चर्चा करतांना मजा आली. आभार लिहित राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डिबी, मला तरी मांडणी विस्कळीत वाटली नाही. अर्थात, मिकाच्या भावना, तो स्वतःच स्पष्ट करेल. पण मला पोहोचलेला अर्थ असा :
माणसाच्या आयुष्यात सुखांच्या फुलांची पण उधळण होते व अस्ताव्यस्त दु:खही सतत माणसाला लगडून असतात मग यात काय सांभाळायचं उंबरठा नसल्यावर नाही का”
स्वच्छंद आणि रुटीन-आयुष्य, यातली उंबरठा ही सीमा आहे. स्वच्छंद आपल्याला सतत खुणावत असतो, उंबरठा ओलांडावासं कैकदा वाटतं पण रोजचं रुटीन, ते साहस करु देत नाही. `मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो' या अप्रतीम कवितेत, संदीप खरे म्हणतो : मी जुनाट दारा परी किरकीरा बंदी तो सताड उघड्या खिडकीपरी स्वच्छंदी, मी बिजागरीशी जीव गंजवत बसतो, तो लंघून चौकट पार निघाया बघतो | ....ही चौकट पार करणं मिकाच्या कवितेचा उंबरठा वाहून जाणं आहे. तुमच्या मैत्रिणीला बहुदा, तो अर्थ पोहोचला नसावा आणि त्यामुळे पुढचे संदर्भ लागले नसतील.
काय झालं कुणास ठाऊक पण गेला एकदाचा रात्रभर बरसून पाऊस फुलं देऊन.. गेला आता अंगणात परत एकदा शांतता नांदेल
पावसानं चित्तवृत्ती फुलल्या होत्या. त्या फुलांनी स्वछंदाची ओढ लावली होती. उंबरठा वाहून गेला होता. पण आता पाऊस थांबलाय त्यामुळे अंगणात शांतता पसरलीये. पुन्हा ती ओढ विरतेयं. .........
पण आता अंगणातली माती चक्रीवादळात अडकल्यासारखी आत-बाहेर होतेय
ही माती म्हणजे आपण आहोत. आपली द्विधा मनस्थिती आहे. घरात जावं, पुन्हा रुटीनला लागावं की मोकळ्या अंगणात थांबावं हे चक्रीवादळ, मनाला घेरतंय. एकदा आत जावंसं वाटतंय, तर पुन्हा अंगण खुणावतंय. -----
अंगणातली फुलं सांभाळायची कि उंबरठा नसलेले घर तेच उमजत नाहीये तिला
स्वच्छंदाची उधळण झालेली फुलं वेचावी की पुन्हा घरात शिरावं हा मनाला संभ्रम आहे. कारण उंबरठा वाहून जाण्याची संधी; ती चौकट लंघून जाण्याची उर्मी, पुन्हापुन्हा येत नाही. -----
काय झालं कुणास ठाऊक पण काल रात्री पावसात या घराचा उंबरठाच वाहून गेलाय
हे रिपीटिशन, थीम हायलाइट करतं.... तुम्हाला परत एकदा कविता वाचाशी वाटते.

In reply to by संजय क्षीरसागर

आस्वादक म्हणुन विस्कळीत ओळीअर्थांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न उत्तम वाटला. आवडलेली कविता मी पुन्हा पुन्हा वाचतो त्यामुळे आता पुन्हा वाचण्यासारखं आणि शोधण्यासारखं काही राहिलेलं नाही, जे वाटलं ते लिहिलंच आहे तुम्हीही आणि मीही....! दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझ्या कवितेवर इतका विचार आणि चर्चा झाली हे वाचून आनंद झाला आणि समाधान वाटलं. मुळात त्या कवितेचा अर्थ मी देखिल इतक्या विस्तृतपणे मांडू शकेन कां यावर मलाच शंकाच आहे. तुम्ही उभयतांनी केलेले रसग्रहण अगदी तंतोतत आहे असे जरी म्हणता येत नसलं तरी मला अभिप्रेत असलेला भावर्थ तुमच्या रसग्रहणाशी खुप जवळ जातो. मला शेवटच्या ओळी अश्या कां लिहावाश्या वाटल्या हे मलाही सांगता येणार नाही, पण ज्या मातीचा मी उल्लेख केलाय ती माती त्या घराला धरुन होती (पाऊस येऊन उंबरठा वाहून जाण्याआधी). त्या मातीची (आणि कदाचित घरातल्या कर्त्या पुरुषाची) व्दिधा मनःस्थिती मांडण्याचा तो एक प्रयत्न आहे. असो, मला खरचं नाही सांगता येणार. तरीही तुम्ही माझी कविता इतक्या मनःपूर्वक वाचली आणि आपला विस्तृत अभिप्राय मांडण्याचे कष्ट घेतले यासाठी मनःपूर्वक धन्यवाद.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

आणि, या खुलाशानं
त्या मातीची (आणि कदाचित घरातल्या कर्त्या पुरुषाची) व्दिधा मनःस्थिती मांडण्याचा तो एक प्रयत्न आहे
मी केलेल्या रसग्रहणाचं सार्थक झालं!

असंका 26/06/2014 - 10:09
इतकं वेगळं काही बघितल्याच्या आनंदात असतानाच, एक जरा खटकलं- उंबरठा कालच वाहून गेलाय तर "आजकाल असं होतंय" याला काय संदर्भ? "आज असं होतंय" हे जास्त नैसर्गिक झाले असते ? तरीही इतकी सुंदर कल्पना ज्यांच्या डो़क्यातून निघाली त्यांच्यासमोर काय बोलायचे हो? अनेक धन्यवाद!

पैसा 26/06/2014 - 10:54
सुरेख रचना! प्रा.डो. बिरुटे सरांचं रसग्रहणही आवडलं.

एस 26/06/2014 - 23:33
कविता पुनःपुन्हा वाचतोय. 'भय इथले...' डोक्यात वाजत राहतेय आणि आपली ही कविता जणू उर फुटूून धावत सुटलीय.

शुचि 28/06/2014 - 00:25
देवघरासमोरील समईची मंद ज्योत आजकाल बाळकृष्णाच्या चेहर्‍याशी पोहचेनाशी झालीये त्या वाहलेल्या उंबरठ्याच्या दिशेने झुकत राहते थरथरत
निव्वळ टचिंग!!!

वाहुन गेलेला उंबरठा ह्या रुपकाने प्रत्येक वाचकाच्या मनात आपापले कल्पनाविश्व उभे राहिले नसल्यास नवलच. बहुदा अशी ताकतवान रुपकेच अश्या भावविभोर करणार्‍या कवितांना इतके परिणामकारक बनवत असावीत. कवितेतली जी इन्विजिबल प्रोटोगॉनिस्ट आहे तिची प्रत्येक वाचकाने आपापली तरल प्रतिमा बनवली असणार.. कुणी गेलेली आजी, कुणाची परगावी असलेली आई तर कुणाची लग्नघरी नांदणारी बहिण अन कुणाची लॉस्ट प्रेयसी. सगळ्यांच्या या प्रतिविश्वात प्रिय व्यक्तीच्या वियोगाचे दु:ख ही भावना मात्र सारखी, सगळ्या वाचकांची प्रतिविश्वं एका माळेत ओवणारी. ब्राव्हो !
लेखनविषय:
काव्यरस
काय झालं कुणास ठाऊक पण काल रात्री पावसात या घराचा उंबरठाच वाहून गेलाय तेव्हापासून घरातल्या सगळ्या वस्तू जणू स्वतंत्र झाल्या आहेत ---- बैठकीच्या खोलीत कोपर्‍यातल्या मेजावर एक फुलदाणी होती .. काल रात्रीपर्यंत होती सकाळी अंगणात सापडली पहाटेच्या वर्षावात एखादं फुलं पदरात पडेल या आशेने अंगणात आली असावी बहुदा ---- देवघरासमोरील समईची मंद ज्योत आजकाल बाळकृष्णाच्या चेहर्‍याशी पोहचेनाशी झालीये त्या वाहलेल्या उंबरठ्याच्या दिशेने झुकत राहते थरथरत ---- तिच्या पुस्तकांची एक अलमारी आहे उजाडल्यापासून बघतोय थडाथड दारं आपटतायत बहुदा तिची डायरीही असावी त्यात ---- काय झालं कुणास ठाऊक पण गेला एकदाचा रात्रभर बरसू