कां कोण जाणे पण परत
उंबरठा बांधायची हिंमतच
होत नाहीये
----
न जाणो ती अंगणातली
फुलदाणी घरात परत
आलीचं नाही तर?!
----
मग वाटतं बरं झालं
उंबरठा वाहून गेला
कच्चाच होता नाहीतरी
----
तुझी डायरी तेवढी
बाहेर काढून वाचायची
अनिवार इच्छा होतेय
किमान ती अलमारी तरी
शांत होईल... एकदाची !
----
देवघरासमोरच्या समईत
तेल घातले
वाटले
ज्योतीची घालमेल थांबेल
पण...
----
काल नाही समजले
पण
त्या उंबरठ्याबरोबर
"शुभ - लाभ" लिहीलेल्या
रांगोळीच्या ओळीही
वाहून गेल्या
हे आज लक्षात आले
----
पावसाची वाट बघतोय
काल रात्रीपासून
पडलाचं नाहीये
----
तुझी डायरी वाचतांना
कां कोण जाणे
सारखं धुक दाटतयं
डोळ्यांसमोर
----
बरं झालं
उंबरठा वाहून गेला
कच्चाच होता नाहीतरी
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०७/०७/२०१४)
उंबरठा नसलेले घर - १
अगदी हेच आणि असच.
जब्र्यादस्त
तू लई बेक्कार हायेस मिक्या. :(
निशब्द !!!
.... :(
पुन्हा एकदा अतिशय सुरेख.
कशाला रे असल काहीतरी जीव घेणं लिहीतोस मिका.
आता उगाच दिवसभर हुरहुर लागुन रहाणार
पैजारबुवा,
सुंदर !
हुरहुर लावणारं....तरीही मनाच्या एका कोपर्याशी मिळतं जुळतं काहीतरी वाचल्यासारखं वाटलं. *good*
चरचरतेय ही कविता.....
काळजाला हात घालणारं लिहीतोस लेका
काळजाला हात घालणारं लिहीतोस लेका
पहिल्या कवितेपेक्षा जास्त छान...!
हेलावून टाकणारी कविता