मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सणासुदीची सफाई

माहितगार ·
लेखनविषय:
"नास्तिकांनी खायला कोंडा, उशाला धोंडाचं गाणं!" कितीही म्हटलं, तरी आपल्या देशाची पक्की जमीन धर्माच्या खाटेचीच सोय! पंथाच्या गादीची उब, सांस्कृतिक उशीसंगे अल्हाददायक झोप — आपलेसेपणा देणारी ही सोय बहुतेकांना हवीच असते, नाही का? सणांच्या आधी, माळ्यावरची समृद्ध अडगळ खाली उतरते, तेव्हा माळ्याचीही सफाई होते. तसंच काहीसं — मऊ मुलायम गादीसुद्धा, खूप दिवसांनी कडक होते. मग ती कारखान्यात जाऊन सासुफ-करून, पुन्हा मुलायम होते, स्वच्छ होते, दिवाळी अंकांनी वैचारीक कल्हई दिल्या सारखी. बेडही मधूनमधून हलवावा लागतो — कचरा, जळमटे बाजूला काढून पुन्हा नीट लावावा लागतो आपलच घर चकाचक दिसण्यासाठी . सणासुदीच्या निम

अरेबिक समुद्र ते हिंदी महासागर: जागतिक भाषा प्रेम

माहितगार ·

माहितगार गुरुवार, 04/17/2025 - 19:04
जेमिनीमुनीकुमारा आपण एकदम सेक्कुलर कविता लिवून पण एक पण प्रतिसाद नाही. आपणच आपल्याला प्रतिसाद द्यायचा. शेवटी स्वन्त सुखायच सगळं

In reply to by माहितगार

मुक्त विहारि गुरुवार, 04/17/2025 - 22:56
साधा उपाय आहे... भाजपला शिव्या द्या, विशेषत: फडणवीस कसे अयोग्य आहेत ते लिहा. ह्याच्या उलट केलेत तरी चालेल.

In reply to by मुक्त विहारि

आजकाल, मिसळपाव वर तुमच्या लेखनावर प्रतिसाद न येणे, लेखनाच्या धाग्याचे काश्मीर न होणे हे लेखन उत्तम असल्याचा पुरावा आणि शाबासकी मानायची वेळ आलेली आहे , काय म्हणता ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

मुक्त विहारि Fri, 04/18/2025 - 11:46
पण सध्या मात्र व्यक्ती द्वेष आणि व्यक्ती पूजा जोरात आहे. पण त्यातही, "फडणवीस" मात्र दोघांचेही नावडते.... असो, आनंद आहे....

In reply to by मुक्त विहारि

एकदम खरं आहे .
फडणवीस
"महाराष्ट्र देशोधडीला लागला तरी टरबुज्या अणाजी पंत बामनी कावा करुन परत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला नाय पायजेल" हे वाक्य मी स्वतःच्या कानांनी ऐकले आहे! फुल्ल मजा आहे ह्या इथे =)))) कर्वे गोखलें आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सर्वच लोकं प्रचंड टोकाचे "पुरोगामी" आहेत हे धडाधडीत सत्य आहे ! घैसास केळकर ही नावे ऐकुन पहिला प्रश्न भिसे "कोण" असाच पडतो तुळजापुरच्या मंदिरातील पुजारीच ड्रग्जच्या व्यापारात आहेत हे कळाल्यावर पुजारी म्हणजे नक्की "कोण" असा प्रश्न पडतोच ! "शेटजी आणि भटजीच्या हातात राज्य देणार का " असे म्हणणारे "पुर्वी राजे पेशवाई द्यायचे , आता पेशवे राजे कोण ठरवतात" असे म्हणणारे किंवा "माझं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही" असं म्हणणारे सगळ्यांना जातीय राजकारण, जातीय समीकरणं सर्व पुढार्‍यांना व्यवस्थित कळतात आणि वळताही आहेत , आणि त्यांना मते देणार्‍या मतदारांनाही ! जात नाही ती जात ! चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः। तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।।4.13।। हे कळल्याचा मला मनापासुन फार आनंद होतो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

कर्नलतपस्वी Fri, 04/18/2025 - 16:48
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।। यातला कर्तार कुठल्या धम्माचा? भाषेची मिसळ झाल्याने निर्माण झालेली शंका..... हलकेच घ्या.

विवेकपटाईत Fri, 04/18/2025 - 18:19
उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. अमीर खुसरो ने खडी बोलीत रचना केल्या. पण दरबारी कवि असल्याने अरेबिक लिपि वापरली. अश्या रीतीने उर्दूचा जन्म झाला. खडी बोली हिन्दीची मानस कन्या उर्दू आहे. कालांतरात अरबी फारसी शब्दांचा वापर वाढू लागला. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. एक पहेली उदा. फ़ारसी बोली आई ना। तुर्की ढूँढी पाई ना।। हिन्दी बोली आरसी आए। खुसरो कहें कोई न बताए।। उत्तर- आरसी (दर्पण, आइना)

In reply to by विवेकपटाईत

माहितगार Fri, 04/18/2025 - 20:25
सारे जहांसे लिहिणारा कवि कोणी होता नंतर तो पाकिस्तान प्रेमी झाला. खुसरोने आधी काय लिहील त्याची जी काही बोली असेल ते पण ध्येय काय अरेबिक म्हणून अरेबिक लिपी . पुढे तुम्ही काय म्हणताय ".. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. " १) त्यांचे राज्यकर्ते दरबार फारसी, तुर्की, अरेबिक ला वाहिलेले होते आणि ते भारतात जन्मले म्हणून भारतीय होते आणि कथित भाषा संकर भारतातच झाला म्हणून उर्दु भारतीय! हो की नाही माझी कविता पण त्या संकराचीच तर दुहाई देते आहे. २) आपण हिंग्लिश आणि मिंग्लीशलाही भारतीयच म्हणतो की नाही नंतर त्यात हिंदी आणि मराठी शब्द नावापुरतेच उरले लिपी रोमन झाली आणि बहुसंख्य भारतीयांना नीट समजुन वाचता नाही आली तरी हिंग्लीशी आणि मिंग्लिशी भारतीयच रहाणार हो की नाही हक्कचे तो त्यांचा ३) कवितेत अरेबिक आणि फारसी लिपीचे तोंड भरून कौतुक राहुन गेले ते पुढच्या एखाद्या कवितेतून नक्की करूया

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 04/18/2025 - 20:38
असंख्य वर्षांच्या पारतंत्र्यात अरेबिक आणि रोमन लिपीचे महत्व होते त्याच्या दहा अब्जपट तरी स्वातंत्र्यानंतर परकीय लिपींचे महत्व वाढलेच पाहीजे. जिथून भाकर मिळते तिकडे दंडवत सलाम करण्याशिवाय पर्याय नसतो अशी उक्ती सार्थच असते.

माहितगार गुरुवार, 04/17/2025 - 19:04
जेमिनीमुनीकुमारा आपण एकदम सेक्कुलर कविता लिवून पण एक पण प्रतिसाद नाही. आपणच आपल्याला प्रतिसाद द्यायचा. शेवटी स्वन्त सुखायच सगळं

In reply to by माहितगार

मुक्त विहारि गुरुवार, 04/17/2025 - 22:56
साधा उपाय आहे... भाजपला शिव्या द्या, विशेषत: फडणवीस कसे अयोग्य आहेत ते लिहा. ह्याच्या उलट केलेत तरी चालेल.

In reply to by मुक्त विहारि

आजकाल, मिसळपाव वर तुमच्या लेखनावर प्रतिसाद न येणे, लेखनाच्या धाग्याचे काश्मीर न होणे हे लेखन उत्तम असल्याचा पुरावा आणि शाबासकी मानायची वेळ आलेली आहे , काय म्हणता ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

मुक्त विहारि Fri, 04/18/2025 - 11:46
पण सध्या मात्र व्यक्ती द्वेष आणि व्यक्ती पूजा जोरात आहे. पण त्यातही, "फडणवीस" मात्र दोघांचेही नावडते.... असो, आनंद आहे....

In reply to by मुक्त विहारि

एकदम खरं आहे .
फडणवीस
"महाराष्ट्र देशोधडीला लागला तरी टरबुज्या अणाजी पंत बामनी कावा करुन परत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला नाय पायजेल" हे वाक्य मी स्वतःच्या कानांनी ऐकले आहे! फुल्ल मजा आहे ह्या इथे =)))) कर्वे गोखलें आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सर्वच लोकं प्रचंड टोकाचे "पुरोगामी" आहेत हे धडाधडीत सत्य आहे ! घैसास केळकर ही नावे ऐकुन पहिला प्रश्न भिसे "कोण" असाच पडतो तुळजापुरच्या मंदिरातील पुजारीच ड्रग्जच्या व्यापारात आहेत हे कळाल्यावर पुजारी म्हणजे नक्की "कोण" असा प्रश्न पडतोच ! "शेटजी आणि भटजीच्या हातात राज्य देणार का " असे म्हणणारे "पुर्वी राजे पेशवाई द्यायचे , आता पेशवे राजे कोण ठरवतात" असे म्हणणारे किंवा "माझं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही" असं म्हणणारे सगळ्यांना जातीय राजकारण, जातीय समीकरणं सर्व पुढार्‍यांना व्यवस्थित कळतात आणि वळताही आहेत , आणि त्यांना मते देणार्‍या मतदारांनाही ! जात नाही ती जात ! चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः। तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।।4.13।। हे कळल्याचा मला मनापासुन फार आनंद होतो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

कर्नलतपस्वी Fri, 04/18/2025 - 16:48
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।। यातला कर्तार कुठल्या धम्माचा? भाषेची मिसळ झाल्याने निर्माण झालेली शंका..... हलकेच घ्या.

विवेकपटाईत Fri, 04/18/2025 - 18:19
उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. अमीर खुसरो ने खडी बोलीत रचना केल्या. पण दरबारी कवि असल्याने अरेबिक लिपि वापरली. अश्या रीतीने उर्दूचा जन्म झाला. खडी बोली हिन्दीची मानस कन्या उर्दू आहे. कालांतरात अरबी फारसी शब्दांचा वापर वाढू लागला. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. एक पहेली उदा. फ़ारसी बोली आई ना। तुर्की ढूँढी पाई ना।। हिन्दी बोली आरसी आए। खुसरो कहें कोई न बताए।। उत्तर- आरसी (दर्पण, आइना)

In reply to by विवेकपटाईत

माहितगार Fri, 04/18/2025 - 20:25
सारे जहांसे लिहिणारा कवि कोणी होता नंतर तो पाकिस्तान प्रेमी झाला. खुसरोने आधी काय लिहील त्याची जी काही बोली असेल ते पण ध्येय काय अरेबिक म्हणून अरेबिक लिपी . पुढे तुम्ही काय म्हणताय ".. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. " १) त्यांचे राज्यकर्ते दरबार फारसी, तुर्की, अरेबिक ला वाहिलेले होते आणि ते भारतात जन्मले म्हणून भारतीय होते आणि कथित भाषा संकर भारतातच झाला म्हणून उर्दु भारतीय! हो की नाही माझी कविता पण त्या संकराचीच तर दुहाई देते आहे. २) आपण हिंग्लिश आणि मिंग्लीशलाही भारतीयच म्हणतो की नाही नंतर त्यात हिंदी आणि मराठी शब्द नावापुरतेच उरले लिपी रोमन झाली आणि बहुसंख्य भारतीयांना नीट समजुन वाचता नाही आली तरी हिंग्लीशी आणि मिंग्लिशी भारतीयच रहाणार हो की नाही हक्कचे तो त्यांचा ३) कवितेत अरेबिक आणि फारसी लिपीचे तोंड भरून कौतुक राहुन गेले ते पुढच्या एखाद्या कवितेतून नक्की करूया

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 04/18/2025 - 20:38
असंख्य वर्षांच्या पारतंत्र्यात अरेबिक आणि रोमन लिपीचे महत्व होते त्याच्या दहा अब्जपट तरी स्वातंत्र्यानंतर परकीय लिपींचे महत्व वाढलेच पाहीजे. जिथून भाकर मिळते तिकडे दंडवत सलाम करण्याशिवाय पर्याय नसतो अशी उक्ती सार्थच असते.
लेखनविषय:
नक्कीच, पर्शियन आणि उर्दू भाषेतील प्रेमाची भावना दर्शवणारी कविता खालीलप्रमाणे: **पर्शियन आणि अरेबिक प्रेम:** पर्शियन भाषा, जणू सुंदर युवती, अरेबिक तरुणावर तिचे मन मोहित. मोहक अदा, नजाकत खास, प्रेमाचा रंग, जणू गुलाबाचा सुवास. **उर्दू, पर्शियन आणि अरेबिकची सुंदर कन्या:** उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. शब्दांची जादू, भावनांचा खेळ, सौंदर्याची खाण, जणू मोत्यांचा मेळ. **उर्दू आणि हिंदी प्रेम:** अशा सुंदर उर्दूचं, हिंदी तरुणावर मन भाळले. प्रेमाची कहाणी, जणू गोडते खेळ. शब्दांची गुंफण, रंगांची उधळण, दोन भाषांचं, हे अनोखं मिलन. **भाषा आरती** जय पर्शियन माता, सुंद

शुभ दिपावली

सागरसाथी ·

नूतन Mon, 11/13/2023 - 12:51
छान रचना मात्र,सुखाचा पहाट,समृद्धीचा वाट जरा खटकलं

नूतन Mon, 11/13/2023 - 12:51
छान रचना मात्र,सुखाचा पहाट,समृद्धीचा वाट जरा खटकलं
लेखनविषय:
काव्यरस
आनंदाच्या दारी परब्रह्म येते सुखाचा पहाट, दाखवते. मनामनामध्ये उजळते प्रेम समृद्धीचा वाट, सापडते. सरो सारे दु:ख होवो भरभराट दिवाळी पहाट, ऐश्वर्याची. सोबतीच्या पाया मिळो पायवाट उडू दे थाट, दिवाळीचा. आनंद सोहळा,प्रकाशाचे पर्व नात्यांचा उत्सव ,चार दिस. दिवाळी म्हणजे दुजे काही नाही आनंदाची ग्वाही, स्वत:लाच. शुभ दिपावली -----अभय बापट

मिपा कट्टा पुणे २०२२....

कर्नलतपस्वी ·

चौथा कोनाडा Sat, 09/17/2022 - 10:07
खुप छानसुंदर ! सारे रोजचे तरीही नवा प्रकाश प्रकाश .. फिटे अंधाराचे जाळे ....झाले मोकळे आकाश " या ओळी आठवल्या. भेटूयात!

In reply to by मुक्त विहारि

कवितेच्या धाग्यावर वृत्तांत नको. नवा धागा काढावा. दिशाभुल करणार्या टायटलसाठी कवींचा निषेध. 👎

In reply to by ॲबसेंट माइंडेड…

कर्नलतपस्वी Sat, 09/17/2022 - 15:39
कवितेद्वारे कट्ट्यावर येण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होता. कट्टा संपन्न झाला ,वृतांत व सहभागी सदस्यांचे प्रतीसाद ,लवकरच छायाचित्रासह वेगळा धागा प्रकाशीत होणार आहे. कट्टा आयोजित करण्यात पाभे यांनी पुढाकार घेतला व शक्य असलेल्या सदस्यांनी उत्स्फूर्त भाग घेतला या बद्दल सर्वांचे आभार.

चौथा कोनाडा Sat, 09/17/2022 - 10:07
खुप छानसुंदर ! सारे रोजचे तरीही नवा प्रकाश प्रकाश .. फिटे अंधाराचे जाळे ....झाले मोकळे आकाश " या ओळी आठवल्या. भेटूयात!

In reply to by मुक्त विहारि

कवितेच्या धाग्यावर वृत्तांत नको. नवा धागा काढावा. दिशाभुल करणार्या टायटलसाठी कवींचा निषेध. 👎

In reply to by ॲबसेंट माइंडेड…

कर्नलतपस्वी Sat, 09/17/2022 - 15:39
कवितेद्वारे कट्ट्यावर येण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होता. कट्टा संपन्न झाला ,वृतांत व सहभागी सदस्यांचे प्रतीसाद ,लवकरच छायाचित्रासह वेगळा धागा प्रकाशीत होणार आहे. कट्टा आयोजित करण्यात पाभे यांनी पुढाकार घेतला व शक्य असलेल्या सदस्यांनी उत्स्फूर्त भाग घेतला या बद्दल सर्वांचे आभार.
लेखनविषय:
सारे रोजचे तरीही..... हवे हवेसे वाटे निशाचे ते जाणे आणी उषाचे भेटणे गवाक्षातून झाके सोनसळी तिरीप पुन्हा नव्याने येतो जगण्या हुरूप सारे रोजचे तरीही..... पालवी फुटते रात्रीच्या स्वप्नानां अधिरते मन कवेत घ्यायाला गेले कालचे विरून निराशेचे सुर मन आभाळी आले ढग आशेचे भरून सारे रोजचे तरीही हवे हवेसे वाटे...... दमून भागून जीव झाला क्लांत पुन्हा घरट्यात येतो घ्याया विश्राम निवांत सारे रोजचे तरीही हवे हवेसे वाटे निशाचे ते येणे..... भगवंताचे देणे चाले असाच चरितार्थ सारे रोजचे तरीही..... कट्ट्यावर येवून साधावा परमार्थ. १७-९-२०२२ पुणे कट्ट्यासाठी हार्दिक शुभेच्छा l

गणेशवंदना

बिपीन सुरेश सांगळे ·

बाजीगर Fri, 09/09/2022 - 19:13
हे हेरंब लंबोदरा रत्नजडी फरा वरदहस्त धरा नमू पायी।। हे असूरकंदना करु गीतवंदना अर्पू पुष्पचंदना नमू पायी।। हे गणनायका बुद्धिदायका अष्टविनायका नमू पायी।। नमो एकदंता तूच भगवंता आदी अनंता नमू पायी।। हे कला च्या ईश्वरा गणेश गुणेश्वरा शरण बाजीगरा तुझ्या पायी।।

बाजीगर Fri, 09/09/2022 - 19:13
हे हेरंब लंबोदरा रत्नजडी फरा वरदहस्त धरा नमू पायी।। हे असूरकंदना करु गीतवंदना अर्पू पुष्पचंदना नमू पायी।। हे गणनायका बुद्धिदायका अष्टविनायका नमू पायी।। नमो एकदंता तूच भगवंता आदी अनंता नमू पायी।। हे कला च्या ईश्वरा गणेश गुणेश्वरा शरण बाजीगरा तुझ्या पायी।।
लेखनविषय:
काव्यरस
गणेशवंदना ------------- सृष्टीचा तू एक नियंता लंबोदरा तू एकदंता मोरया मोरया बुद्धिदाता वरदायका संकटमोचका विनायका प्रसन्न प्रेमळ भगवंता मोरया मोरया आनंदे नर्तन करिशी भक्ता हृदयी धरिशी कृपा असावी अनंता मोरया मोरया ------------------

गजानन

सागरसाथी ·
लेखनविषय:
निसर्ग बरसला सुखाचा पाऊस, आनंदाचा कंद घरी आला. भक्तीचा उत्सव आनंदले रोम गणपतीचा सण आला आला. सुखकर्ता आला विघ्नहर्ता आला, आयुष्याचा कर्ता घरी आला. वर्षभर ज्याची पाहतो मी वाट, तो दु:खहर्ता घरी आला. फुलला पारिजात उंचबळे सुवास, सुगंधाचा दाता घरी आला. विद्येचा ईश्वर ज्ञानाचा दाता बुद्धीचा विधाता घरी आला. --- अभय बापट

वसंतात मृगजळ खास

माहितगार ·
काठावरचे गुपित झेलता अनु'मतीची महत्ता विशेष वसंताचे मृगजळ खास कटी बंधात उष्म निश्वास नभी नाभी ताम्र गोल चा'लते जातो तोल आर्त कुंजन आस पास पर्ण विरहीत पुष्प तटी दाट दिंगबर सुरेख मदन पाझरतो . . . . . . . स्वतःच्याच कवितेच्या विडंबनाचा विचार केला आणि कवितेतला(च) मदन अकस्मिक पाझरला. ;)

आङळे वाङळें साहित्य संमेलन

माहितगार ·
आङळे वाङळें साहित्य संमेलन आङळे वाङळेंना म्हणाली मराठी साहित्य संमेलनाला नाही गेलात कसे ते? वाङळें आङळेंना म्हणाला तुमच्या आङळीकेचे साहित्याने अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला जागा आता उरलीच कुठे ?

कोळीगीतः समींदरा, जपून आण माझ्या घरधन्याला

पाषाणभेद ·

चित्रगुप्त Sat, 12/18/2021 - 11:44
वा पाषाणभेदराव. अतिशय र्‍हद्य, भावपूर्ण पद्यरचना. दादला दर्यावर गेल्यावर मोठीच जोखीम असते, त्यातून त्याची काहीही खबरबात मिळणे शक्य नसते. अश्या स्थितीत त्याच्या व्याकुळ पत्नीच्या मनात उसळणारे भावतरंग काय असतील, त्याची कल्पनाही आपल्यासारख्या शहरी लोकांना करता येणार नाही. ते तुम्ही त्या कोळिणीच्या जणु आंतरंगातच शिरून व्यक्त केले आहेत. खूप खूप छान. असेच लिहीत रहा, आम्ही वाचत राहू. अनेक आभार. शेवटला सोनसाखळीचा उल्लेख तसा मजेशीर वाटला, पण मनात प्रश्नचिन्हही जागवून गेला.

कर्नलतपस्वी Sat, 12/18/2021 - 12:53
कदाचित तीचा घो म्हणत असेल दुर टेकडीवरी पेटती निळे ताबंडे दिवे सांगतात ते मजला आता घरी जायला हवे कुसुमाग्रज पण तीला कसे कळणार?

Bhakti Sat, 12/18/2021 - 17:29
छान आहे कोळीगीत! अशाच कोळीण स्त्रीची व्याकुळता दाखवणार माझं एक आवडत गाणं आहे. नाख्वा हो उधाण आयलया!

चित्रगुप्त Sat, 12/18/2021 - 11:44
वा पाषाणभेदराव. अतिशय र्‍हद्य, भावपूर्ण पद्यरचना. दादला दर्यावर गेल्यावर मोठीच जोखीम असते, त्यातून त्याची काहीही खबरबात मिळणे शक्य नसते. अश्या स्थितीत त्याच्या व्याकुळ पत्नीच्या मनात उसळणारे भावतरंग काय असतील, त्याची कल्पनाही आपल्यासारख्या शहरी लोकांना करता येणार नाही. ते तुम्ही त्या कोळिणीच्या जणु आंतरंगातच शिरून व्यक्त केले आहेत. खूप खूप छान. असेच लिहीत रहा, आम्ही वाचत राहू. अनेक आभार. शेवटला सोनसाखळीचा उल्लेख तसा मजेशीर वाटला, पण मनात प्रश्नचिन्हही जागवून गेला.

कर्नलतपस्वी Sat, 12/18/2021 - 12:53
कदाचित तीचा घो म्हणत असेल दुर टेकडीवरी पेटती निळे ताबंडे दिवे सांगतात ते मजला आता घरी जायला हवे कुसुमाग्रज पण तीला कसे कळणार?

Bhakti Sat, 12/18/2021 - 17:29
छान आहे कोळीगीत! अशाच कोळीण स्त्रीची व्याकुळता दाखवणार माझं एक आवडत गाणं आहे. नाख्वा हो उधाण आयलया!
काव्यरस
समींदरा रे समींदरा, तू जपून आण माझ्या घरधन्याला लई दिवसांन परतून येईल घराला ||धृ|| नको उधाण आणू तुज्या पाण्याला नको मस्ती करू देऊ वार्‍याला काय नको होवू देऊ त्याचे होडीला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||२|| नारळ पौर्णिमेचा सण आता सरला तुला सोन्याचा नारल वाढवला नेल्या होड्या त्यानं मासेमारीला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||३|| मी कोलीण घरला एकली सारं आवरून बाजारा निघाली म्हावरं विकून येवूदे बरकतीला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||४|| एकवीरा आई माझी डोंगरावरी खणा नारळांन ओटी मी भरीन नवस केलाय मी खंडोबाला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||५|| पंधरा दिवस जायी तो समींदरात ते दिवस जातात माझे झुरण्यात

वार्ता सुखाची घेऊन....

Vivekraje ·
काव्यरस
वार्ता सुखाची घेऊन , आता यावे घरी देवा..| ओढ भेटीची लागली, होई तगमग जिवा..|| काही कळेना जीवाला, मना धाव घेऊ कोठे..| ओढ तुम्हा दर्शनाची, धीर काळजात वाटे..|| तुमच्या येण्याची चाहूल, देवा आम्हा सुखावते..| अवघी चिंता दुःख सारी, जशी दूर घालवते..|| आहे संकट हे मोठं, नाही माणसाच्या हाती..| नाही श्रीमंतीचं मोलं, होते गरीबाची माती..|| वार्ता सुखाची घेऊन , यावे वाजत गाजत..| नको दुःखाची किनार, कुणा ओल्या पापण्यात..|| नाव तुझं मंगलमूर्ती, विघ्नहर्ता तुझी कीर्ती..| तुझ्या येण्यानं ही सारी, देवा उजळावी धरती..|| जरी झाली चूक थोडी, देवा स्वीकारून घ्यावी..| रीती परंपरा उत्सवाची, देवा पुन्हा सु