माणूस

लेखनविषय:
काव्यरस
खगांचे थवे, पाखरे ही निरागस काय कसे रज, कण संचिताचे थकेनात पंख, खळे ना भरारी रिते मोकळे सोस, निळ्या अंबराचे न हेवे न दावे, न साठे कशाचे हवेसे नितळ, पारदर्शी उसासे ढळे दिवस कोरा, रात्र आणि काळी जगाची तमा ना, असे खेळ सारे माणूस मी, भूक, व्याधी उपाधी मुळी मूढ ईर्षा, अंध, अंग जाळी परा, बुद्धी-प्रज्ञा, असूनी उपाशी अवकाळ मोठा, सदा मोह पाशी .........................अज्ञात

जालावर खेळ चाले, हा गूढ.....

लेखनविषय:
काव्यरस
डिसक्लेमर: हि एक विडंबित कविता आहे. ह्या द्वारे कोणाच्याही (डूआयडी धारक,डूआयडी समर्थक आणि डूआयडी विरोधक) भावना दुखविण्याचा अथवा खतपाणी घालण्याचा हेतू नाही.

टाळ बोले माझ्य मनीं -

लेखनविषय:
काव्यरस
टाळ बोले माझ्या मनीं नाद करी मृदुंग कानीं चिपळ्यातुनी येई ध्वनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल || हाती झेंडा नाचवुनी स्मरण होई गजरातुनी नामाचा जप मुखातुनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल || डोईवरी तुळशीवृंदावनीं पावलांच्या ठेक्यातुनी टाळ्यांच्या तालातुनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल || भक्तीच्या या वाटेवरुनी जाऊ सगळे आनंदुनी गाऊ सगळे दंग होउनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल || देहभान अपुले हरपूनी नाचू रंगूया कीर्तनी म्हणू सगळे वारीतुनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल || .

तरंग

लेखनविषय:
काव्यरस
पीत वारा धुंद होतो, नित उषेच्या मैफिली पाखरे उडती विहरती देत त्यांच्या चाहुली रोज ही चैतन्यमय लय येइ माझ्या अंगणी दूर कोठे शीळ घाली तृप्ततेची माउली शीण चिणलेला निशेचा जातसे मन लंघुनी लाट पाटाची प्रवाही होतसे क्षण बिलगुनी योजनेच्या या पळांचे गीत गाई वैखरी आळावी सारे तरंग अंतरंगी रंगुनी .............................अज्ञात

आई ..

लेखनविषय:
काव्यरस
ठेच लागता घाई घाई, तोंडी नेमके आई आई .. दु:खामधे मुखात येई कसे नेमके आई आई .. तळमळ जेव्हां जिवात होई मनीं नेमके आई आई .. समर प्रसंग सामोरी येई स्मरण नेमके आई आई .. बापाचा पाठी मार खाई तोंडी नेमके आई आई .. जन्म माणसा वाया जाई म्हटले ना जर आई आई ! .

जीवनरेषा

लेखनविषय:
काव्यरस
प्रेम असीम जलद विहारी कोणी न जाणे अंत तयाचा पवन दिशाहीन भ्रमरे भवती रोखे गिरी वेग त्याचा अजब जळी समीकरण असे हे बरसे जीवन रेषा सदनी बरसे जीवन रेषा मधुर स्वरे रसरंग परांनी नटे अवनी हृदयी मनरमणी वलये भली सुखसंवेदनांची ज्योत झरे अंजनाची गरज अटळ कळ तळकाळजाची बिन अक्षर परिभाषा वाणी बिन अक्षर परिभाषा शोध भरे ऋतु लयवित क्रांती अविरत स्पंदन खल एकांती मन साधन पण क्षितीज अनंत लेश न गावे हाती मनन स्मरण क्षण जतन करावे जनन मरण पडछाया देही जनन मरण पडछाया ...........................अज्ञात

पिसे

लेखनविषय:
काव्यरस
सुखाच्या घडीला निभावू कसे निळ्या आसमंती शशीचे हसे नसे स्वप्न हे नाही आभासही मिटे पापणी ना असे हे पिसे स्पर्श अस्पर्श खोल आत कोषातले आस वेल्ह्या नभाचे तरंग वेगळे ओलवेली तृषा तृप्त परस अंगणी कोण गाथा रुधीरास सांगते भले ? ..........................अज्ञात

गाल चोळ फक्त

लेखनविषय:
चड्डी खाली खेचल्या शिवाय मोकळे होता येत नाही पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही...... निवडुंग ती गेली तरी तीने मागे सोडलेला गंध काही गेला नाही नाकावर दाबुन धरलेल्या रुमालालाही त्याला रोखणे जमले नाही...... निवडुंग तो म्हणाला प्रिये मला डोळ्यात साठवुदे तुझे हे सुंदर रुपडे ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.......निवडुंग पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग पैजारबुवा,

आई, अशी कशी ही दिवाळी !

लेखनविषय:
काव्यरस
आई, अशी कशी ही दिवाळी येते पटकन, सरते झटकन, अभ्यासाला पुन्हा जुंपते दहा दिवस का जाती चटकन ! फराळाच्या डब्यात मोठ्ठ्या गोड गोड का तसेच उरते ? चकली चिवडा चट्टामट्टा पोटामध्ये भरकन जिरते ! भुईचक्र अन् टिकल्या आता कंटाळा मज येइ उडवता - धमाल दिसते मोठया हाती बॉम्ब नि रॉकेट आवाज करता ! सुट्टी असते किती ग हट्टी ठरल्या दिवशी येते जाते - मित्रमंडळी गोळा होता धमाल अमुची मनीं रहाते ! दिवाळी संपुन सुट्टी संपता जुनाट दिसती नवीन कपडे... आई, सांग ना दिवाळीस ग बारा महिने थांब, तू इकडे ! . .
Subscribe to अद्भुतरस