RIP पंडित
पंडित आताच तू गेल्याची बातमी वाचली आणी जाणवलं पुण्याशी आपुलकीने नातं असलेला अजून एका कलाकार गेला.
कित्येक चित्रपटातून तू भेटत होतास अगदी विविध रोल्स मध्ये पण तुझं खास असं अस्तिव जाणवलं ते 'माचीस' मध्ये त्यातला 'सनातन' तू ज्या दहकतेने रंगवला आहेस त्याला तोड नाही.
'जंगल बुक' मधला 'बघिरा' कोण विसरू शकेल, त्या आवाजातच एवढी जरब होती कि बस्स.....
हरिश्चंद्रगड भाग २
हरिश्चंद्रगड भाग १.
दोन महिन्यांपासून तारखा ठरवत होतो, पण सुवर्णमध्य काही मिळत नव्हता…
सगळ्यांनाच ट्रेकला जायचे होते, तेही दोन दिवसांसाठी. म्हणजे एक रात्र वस्तीला. पण तारखा जुळत नव्हत्या. अख्या ग्रुप मधल्या सगळ्यांच्या सुट्या वेगवेगळ्या दिवशी. त्यात आमचे कनिष्ठ बंधू रत्नागिरीतील लांज्यात आय डी बी आय बँकेत कार्यरत असल्यामुळे त्यांचे येण्या जाण्याचे वेळापत्रक जुळणे सगळ्यात कठीण. त्यात कोणाच्या चुलत भवाचं लग्न तर कोणाच्या मित्राचं. स्पष्ट काही ठरत नव्हतं. मधेच अमरावतीकर सागरचं गावाला जाणंही होतंच.
सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग १५ समाप्ती)
गुरूनाथच्या अंतीम आठवणी.
सोनचाफ्याच्या फुलाचं झाड पडलेलं पाहिल्यानंतर त्या दिवसापासून गुरूनाथ फारच विक्षीप्त वागू लागला. सकाळी सोनचाफ्याची फुलं सुम्याच्या फोटो समोर ठेवता येत नाहीत म्हणून खट्टू व्हायचा.कधी कधी तो दिवसातून दोन तीन वेळा आंघोळ करायचा.सकाळी जेवला असताना जेवलोच नाही म्हणून मदतनीसाकडून परत जेवणाचं ताट मागवायचा.त्याने जेवल्याची आठवण करून दिली तर त्याच्याशी वाद घालायचा.फार्मसीत कामावर जाण्यासाठी म्हणून सकाळीच जाण्याची तयारी करायचा. कधी कधी निपचीत पडून असायचा.
थंडीसाठी झटपट आणि पौष्टीक लाडू
बन्दे की मेहनत को किस्मतका सादर परनाम है प्यारे.. दंगल दंगल!
दंगल पाहिला. आवडलाच..
अगदी शतकोत्तर कलाकृती नसली तरी पिक्चर उत्तमच आहे. आणि मला आमीर खान देशद्रोही वाटत नाही, म्हणुन मला त्याचं कौतुक करायलाही काही त्रास नाही.
देशाचा अपमान
"बाबा, जन-गण-मन केव्हाही म्हटलं की देशाचा अपमान होतो ना?" तन्मय, आमची थोरली पाती.
"इकडे ये, मला नीट ऐकू नाही आलं." अस्मादिक.
.
.
"बाबा, जन-गण-मन केव्हाही म्हटलं की देशाचा अपमान होतो ना?" अॅक्शन रिप्ले.
"तुला कोणी सांगितलं? कुठे ऐकलं" (प्रश्नाचे सरळ उत्तर देतील तर पालक म्हणवून घेण्यावर बट्टा लागेल नै?)
"असंच, मला माहिती आहे." थोरली पाती.
"अरे, म्हणजे कुठं ऐकलं, कोणी सांगितलं, कोणी बोलत होतं का असं?"
"गौरव म्हणाला. केव्हापण जन-गण-मन म्हटलं तर देशाचा अपमान होतो."
.
.
भारत-तैवान-चीन - एक सुवर्णसंधी
गेल्या आठवड्यात ट्रंपने तैवानच्या अध्यक्षाला फोन केल्याची बातमी वाचली. त्यावरुन चिनने केलेला थयथयाट पण पाहिला. खरतर ही भारतासाठी असलेली सुवर्णसंधी आहे.
आजपर्यंत तैवान हा चिनचा भाग आहे ही दिलेली मान्यता आपण आता काढुन घ्यायला हवी. तैवानला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणुन मान्यता द्यायला हवी.
खरतर चिनचा ग्वादार बंदर आणी एकुणच CPEC योजनेला भारताची ही भुमिका जबर धक्का ठरेल. विशेषतः अमेरिका+ भारत अशा दोघांनीही ही घोषणा केली तर जगाचा याकडे बघायचा द्रुष्टीकोनच बदलेल. आणी ते योग्यच आहे. भारताला तैवानचा उपयोग पूर्वेकडचे भारताचे ग्वादार म्हणुन करता येईल.
दुसरे ट्विटर मराठी भाषा संमेलन २०१७ :: ३ ते ६ फेब्रूवारी २०१७ रोजी वापरा #ट्विटरसंमेलन
" प्रकट व्हा, अभिव्यक्त व्हा !! "
ट्विटर हे एक जागतिक व्यासपीठ आहे.ह्या व्यासपीठावर रोज करोडो लोक आपले मत आपल्या भाषेत नोंदवत असतात.एकेकाळी फक्त इंग्रजी भाषेचा बोलबाला असणारे ट्विटर आज जगातील प्रत्येक लिपी असणारी भाषा सामावून घेत आहे.मग अशा ह्या ट्विटरवर मराठीचे अस्तित्व किती आहे ? असा तुम्हाला प्रश्न पडेल.सध्या मराठीचे ट्विटरविश्व जरी उगमावस्थेत असले तरी त्याचे भविष्य उज्जवल आहे. मराठीचे ट्विटरविश्व अधिकाधिक फुलावे आणी मराठीत रोज एक लक्ष ट्विट्स लिहल्या जाव्यात ह्या ध्येयातूनच #ट्विटरसंमेलन ह्या कल्पनेचा जन्म झाला.