सामाजिक उपक्रम - २०१७
नमस्कार,
मित्रपरिवाराच्या साथीने गेली ७ वर्षे आम्ही स्वयंसेवक हा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आलेलो आहोत. समाजासाठी कार्य करणार्या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो.
नमस्कार,
मित्रपरिवाराच्या साथीने गेली ७ वर्षे आम्ही स्वयंसेवक हा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आलेलो आहोत. समाजासाठी कार्य करणार्या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो.
लेखकमहोदयांनी प्रकाशन कार्यालयात प्रवेश केला अन मनगटी घड्याळाकडे नजर टाकली. नियोजित वेळेच्या पाच मिनीटं आधीच ते पोहोचले होते. इथे आलं की त्यांना एकाचवेळी माहेरी आल्यासारखं अन चौकशीसाठी पोलीस स्टेशनला आल्यासारखं असं संमिश्र काहीतरी वाटायचं. आताही तसंच वाटलं. बंद पडलेल्या फिल्टरमधलं पेलाभर पाणी घटाघट पिऊन त्यांनी संपादकांचं ऑफिस गाठलं. दरवाजाबाहेर जुनाट लाकडी पाटी ठोकलेली होती. त्यावर ‘वा. चा.महाशब्दे’ हे नाव स्टार वॉर्स चित्रपटाच्या फ़ॉन्टमध्ये पेंटलेलं होतं.
सूर्यही दिवटीप्रमाणे फक्त मिणमिणतो
मी स्वत:भवती अशी कोळिष्टके विणतो
वेचतो माझेच मी अवशेष वाऱ्यावर
नी स्वत:मध्ये स्वतःला आणुनी चिणतो
वाटते आता भिती या चांदताऱ्यांची
मी तमाचे गीत एकांतात गुणगुणतो
शांततेवरची जरा रेषा हलत नाही
मंद थोडासा तुझा आभास किणकिणतो
चेहरा अपुला इथे जो तो बघुन जातो
आरशावर केवढा कल्लोळ घणघणतो
डॉ. सुनील अहिरराव
लोण्याहुन मुलायम कठोर वज्राहुन !
स्त्री हे खरोखर अजब रसायन ! !
दुर राहिलेल्या आपल्या घरात!
भुकेने रडणार्या पिलाची आठवण येउन ,
कड्यावरुन स्वत:ला झोकुन देते !
तीचे मातृप्रेम खरेच अनुपम !!
स्वत:च्या बाळास बांधुन पाठीवर !
खंबीरपणे स्वार होते घोड्यावर !!
पराक्रम करते युध्दभूमीवर !!!
तीची विरश्री करते चकीत ! ! ! !
परदेशातील कडाक्याच्या थंडीत !
ज्ञानसाधनेची उपासना करीत ! !
भारतातील पहीली डॉक्टर होते ! ! !
तीचा निश्चय करतो अचंबित ! ! ! ! !
माणसांच्या आनंदाचा मार्ग पोटातून जातो त्या प्रमाणेच घराच्या आनंदाचा मार्ग स्वयंपाक घरातून जातो असे म्हणायला हरकत नाही. घरातील स्त्रीसाठी तर स्वयंपाक घराला घराच्या ऋदयच स्थान असत. ह्या स्वयंपाक घराच आणि तिच प्रेमळ नात निर्माण झालेलं असत. ती घरात जितका वेळ असते त्यातील तिचा ७०% तरी वेळ स्वयंपाकघरातच जातो. केवळ स्त्रीच नाही तर घरातील प्रत्येक व्यक्ती रोज ह्या स्वयंपाक मंदिरात हजेरी लावतोच. ह्याच स्वयंपाक घरात अग्नीदेवतेचा वास असतो. जीवन म्हणजेच पिण्याचे पाणी असणार्या पाण्याचा माठ म्हणा की फिल्टर हा अग्रस्थानी असतो. इथलं बेसिन म्हणजे नळातून येणार्या पाण्याचा चैतन्याचा झरा.
स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही महिलांना आपल्या स्वातंत्र्यासाठी, समानतेसाठी झगडावे लागत आहे. हि अत्यंत खेदाची बाब आहे. स्त्रियांच्या या स्तिथीमागे हजारो वर्षांपासूनची गुलामगिरीची परंपरा आहे. खरे तर जेव्हा महिलांना आर्थिक व्यवहारातून वगळण्यात आले व त्यांचे उत्पन्नाचे स्रोत नाकारण्यात आले तेव्हापासून महिला पुरुषांवर अवलंबित ठेवून पुरुषसत्तेचे गुलाम म्हणून ठेवण्यात आले. त्यानंतर स्त्रियांना शिक्षणापासून वंचित करण्यात आले व निर्णय घेण्याचे हक्क पुरुषांना मिळाला. तेव्हापासून महिलांना मुलं पैदा करण्याचे यंत्र व घरकाम करणारी मोलकरीण म्हणून गणना होऊ लागली.
२ एप्रिल २०११
वानखेडे, मुंबई
मिनार!
माझी आणि तिची ओळख प्राचार्यांच्या कक्षात झाली. "मिनार आपल्या महाविद्यालयात प्रवेश घेते आहे. तिला राज्यशास्त्र विषय हवा आहे आणि तिला स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत. तिला तुमच्या वर्गात घ्या." प्राचार्यांनी ओळख करून दिली आणि मिनार माझी विद्यार्थिनी झाली. पण खरं तर तिनेच मला कितीतरी गोष्टी शिकवल्या आहेत.
उद्या आठ मार्च.... त्या निमित्ताने परत एकदा स्त्रीच्या अस्तित्वाचं... तिच्या त्यागाचं... तिच्या संसारासाठी झिजण्याचं आणि झटण्याच.... ती करत असलेल्या सर्वांच्या सेवेचं.... खूप कौतुक होईल! आणि अर्थात ते झालच पाहिजे. Because she deserves it! Rather its her right. पण आपण हे अस स्त्रीच्या स्त्रीत्वाच कौतुक करून तिने कायम सगळ्यांच सगळ केलच पाहिजे ही अपेक्षा करायला मोकळे होतो का?
आमच्या वाड्यापासुन वनविहाराची नवीन जागा बरीच लांब होती, तिथे पोहोचेपर्यंत कुणीच काही बोललं नाही, असे ही त्या रथाच्या खडखडाटामध्ये काही ऐकु येणं शक्य ही नव्हतं. आम्ही वनाजवळ पोहोचलो आणि रथातुन उतरुन विश्रांतीस्थळाकडे चालत निघालो, दहा बारा योजने चाललो तेवढ्यातच राजा दशरथ आणि राजकुमार आल्याची सुचना घेउन एक सैनिक आला, आम्ही त्यांच्या स्वागतासाठी होतो तिथेच थांबलो. राजा दशरथ स्वत्ः सगळ्यांत पुढे होते, त्यांच्या डाव्या बाजुला राम आणि भरत तर उजव्या बाजुला लक्ष्मण आणि शत्रुघ्न होते. काका एकटेच त्यांच्या स्वागतासाठी पुढे गेले.