मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खरडीसंबंधी सूचना..

विसोबा खेचर ·

नीलकांत 15/07/2009 - 17:37
तात्या, ही अतिशय उत्तम सूचना केलेली आहे. कुणा एकाचं मत नाही पटलं तर त्याच्याशी वैचारीक वाद विवाद करण्यासाठी आणि पटलं तर त्याचं समर्थन करण्यासाठी मिपा आहे. विषय सोडून लिहीण्यासाठी आणि प्रसंगी समोरासमोर वाद करण्यासाठी कधी खरडवहीचा वापर आपण समजू शकतो. मात्र आपल्या न आवडणार्‍या विचाराच्या व्यक्तींना मुद्दाम टारगेट करून त्यांविषयी अनावश्यक आणि कधीकधी चुकिच्या सुध्दा चर्चा करण्यास बंधन असावेच. मी यापुढे अश्या लोकांवर लक्ष ठेवेन. या लोकांची खरडवहीची सुविधा तात्काळ बंद करण्याची सुविधा तुम्हाला तात्काळ करून देतो. - ( मिपा तांत्रीक :) ) नीलकांत

In reply to by नीलकांत

विकास 15/07/2009 - 17:51
तात्यांनी एकदम योग्य सुचना केली आहे. >>>"कुणा एकाचं मत नाही पटलं तर त्याच्याशी वैचारीक वाद विवाद करण्यासाठी आणि पटलं तर त्याचं समर्थन करण्यासाठी मिपा आहे." असेच म्हणतो. :-)

In reply to by नीलकांत

चतुरंग 15/07/2009 - 19:03
घाऊक स्वरुपात खरडी उडवण्यासाठी काही तरी सोय दे रे. पानंच्या पानं खरडी एकेक करुन उडवत बसायचं म्हणजे ना माशा मारत बसल्यासारखं वाटतं! ;) (खुद के साथ बातां : मिपाचं निम्मं विदागार ह्या खरडवह्यांनीच गार झालं असेल का रे रंगा? :? ) (खरडउडवोत्सुक)चतुरंग

ध्येय धोरणा विषयी मिपाची स्पष्टता आहेच तरी संभ्रम असल्यास व्यनि ऐवजी खरड वापरल्यास इतरांनाही ते समजेल.(अर्थात इतरांना समजु न अये असे असल्यास मात्र व्यनी) बाकी मान्य. खरडवहीतुन असलेला संवाद हा सुसंवाद असावा. पुरक माहिती , व्यक्तिगत स्नेह, शिळोप्याच्या गप्पा यासाठी उत्तम 'जवळीक' साधण्याचे हत्यार.( अर्थात परस्पर सहमती असल्यास )सदस्यात मतभिन्नता असली तरी परस्परांविषयी आदर असावा.किमान अनादर तरी असु नये. आपण मिपा या कुटुंबातील सदस्य आहोत. किमान शब्दात कमाल आदर व्यक्त करण्यासाठी खव उत्तम. आमच्या मते याचा वापर माणसे झोडण्यापेक्षा माणसे जोडण्यासाठी असावा प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

चित्रा 15/07/2009 - 19:55
असेच म्हणते. नक्की याचे कारण कळले नाही, पण काहीतरी तसेच असावे :(

चतुरंग 15/07/2009 - 19:05
जिथे तुझं लक्ष जावं असं वाटत होतं ते झालेलं पाहून बरं वाटलं! :) पूर्ण समर्थन! चतुरंग

बाकरवडी 15/07/2009 - 19:11
येथे समर्थन देणारेच नियमांचे उल्लंघन करतात. :B :B :B बाकरवडी :B :B :B

In reply to by सहज

चतुरंग 15/07/2009 - 19:39
(खुद के साथ बातां : रंगा, ह्यांचं नाव 'सहज' असलं तरी प्रश्न मात्र अजिबात सहज नसतात हं! :B ) (साधासरळ)चतुरंग

In reply to by सहज

धनंजय 15/07/2009 - 20:11
("या धांदरटाचे कुठे लक्षच नसते" - इति माझी एक मावशी.) काय झाले त्याबाबत लक्ष नव्हते. पण खरडवही नामक खेळकर-टवाळकीचे साधन कोणी नासवले याबद्दल वाईट वाटते.

चला म्हणजे आता आम्हाल खव अभ्यास मंडळाचा गाशा गुंडाळावा लागणार तर ! आले तात्याजीच्या मना.... ;) आता दिवसभर काहितरी नविन उद्योग शोधावा लागणार बॉ ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन 15/07/2009 - 21:24
चला म्हणजे आता आम्हाल खव अभ्यास मंडळाचा गाशा गुंडाळावा लागणार तर !
हे वाक्य काळजाला भिडले भावा .. हृदयाचं पाणीपाणी करून गेले रे !!
आता दिवसभर काहितरी नविन उद्योग शोधावा लागणार बॉ !
चल आपण "झटपट सुतकी चेहरे करून कसे बसावे ? " ह्यावर प्रशिक्षण वर्ग काढूया भडकमकरांच्या मदतीने ! -- (.........) आता ओरिजिनल नाव नाही तर एखाद्या संताचं नाव घ्यावं म्हणतोय ..

Nile 15/07/2009 - 21:23
सहज म्हणतातः
नक्की झाले काय, असा निर्णय का घ्यावा लागला?
धनंजय म्हणतातः
काय झाले त्याबाबत लक्ष नव्हते. पण खरडवही नामक खेळकर-टवाळकीचे साधन कोणी नासवले याबद्दल वाईट वाटते.
मी ही हेच म्हणतो! स्वगतः छ्या! बर्‍याच जणांच्या की जणींच्या 'म्जय्शी म्य्त्री क्रन्रार' का च्या खरडी आल्या होत्या, आता उत्तर पण देता येणार नाही. :( 'कोण रे तो ख. व. गॉसीपींगसाठी वापरत होता? गधड्याला कळत नाही ख.व. लोकांना दिसते म्हणुन?' ;) एक बालीश प्रश्नः म्हणजे आता टिंगलटवाळी फक्त धाग्यांवरच करायची ना?

पण यामुळे खरडवहीतल्या टवाळकीला मुकावे लागू नये. कित्येक तणावाचे क्षण, केवळ या खरडवहीतल्या टवाळकीमुळेच हलके झाले आहेत. लिमिट मधे रहा, पण टवाळकी सोडू नये. असेच वाटते. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर 16/07/2009 - 01:00
पण यामुळे खरडवहीतल्या टवाळकीला मुकावे लागू नये. कित्येक तणावाचे क्षण, केवळ या खरडवहीतल्या टवाळकीमुळेच हलके झाले आहेत
हो, पण दिलेल्या मोकळीकीचा काही जण गैरफायदा घेताना आढळले म्हणून हे पाऊल उचलावे लागले.
लिमिट मधे रहा, पण टवाळकी सोडू नये. असेच वाटते.
परंतु काही जण एकमेकात सतत एखाद्याची/एखादीची टिंगलटवाळी करताना आढळले, तश्या तक्रारी माझ्याकडे आल्या म्हणून या पुढे कडक कारवाई करायचं ठरवलं आहे. त्यामुळे ही मंडळी मिपा सोडून गेली तरी बेहत्तर! फार फार तर काय मिपा बंद पडेल ना? फिकीर नाही...! तात्या.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

वजीर 16/07/2009 - 01:25
कित्येक तणावाचे क्षण, केवळ या खरडवहीतल्या टवाळकीमुळेच हलके झाले आहेत.
तुमचे तणावाचे क्षण टवाळक्या करुन हलके करायला तात्यांनी नाही म्हंटलेले नाही. तुमच्या ह्या टवाळी मधे तिसरा माणूस कशाला लागतो तुम्हाला? काय करायचीय ती टवाळी तोंडावर करा ना. मागाहुन हा चुगल्यांचा सोहळा कशाला? माफ करा पण तुमच्या खरडवहीतही अनेकदा विनाकारण (प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे) तिर्‍हाइत लोकांची टवाळी चाललेली मी पाहीली आहे म्हणून बोललो. तुमचे तणावाचे क्षण हलके करण्याचा हा कसला अघोरी उपाय? वजीर

अभिज्ञ 15/07/2009 - 23:29
तात्या, एकदम योग्य निर्णय. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

ऋषिकेश 16/07/2009 - 00:16
मला हा निर्णय असा अचानक का घ्यावा लागला हे कळले नाहि. असो. नियमच आहे म्हटल्यावर मान्यता/पाठिंबा काय देणार.. फारतर पालन होईल अशी ग्वाही देतो. (आधीही होतच होतं म्हणा) ( :( )ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

शक्तिमान 16/07/2009 - 00:19
एकमेकांच्या खरडवही मध्ये कोणी काहीही का लिहीना... बाकीच्यांना त्याचा त्रास व्हायचे काय कारण? उलट मला असे वाटते की उठसूट कुणाच्याही खरडवह्या चाळणे लोकांनी बंद करावे... विनाकारण खरडवह्या चाळणा-यांवर कारवाई व्हावी.. सूचना क्रमांक १ ने मुक्त संभाषणाच्या हक्कावर गदा येते. ह्या सूचना देण्याची पाळी का आली त्याबद्दल मला काही माहिती नाही.. परंतु माझे मत मी येथे मांडले आहे !

वजीर 16/07/2009 - 01:18
तात्यांच्या धोरणाशी सहमत आहे. खरडवह्या ह्या सार्वजनिक असतात त्या विरंगुळा म्हणुन चाळल्या जातातच. अश्यावेळी काही लोकांच्या खरडवहीत मुद्दाम एखाद्याला घालुन पाडून बोललेले पाहिले आहे. काय ती चेष्टामस्करी तोंडावर करावी. असला पाठीमागुन चहाड्या चुगल्यांचा कार्यक्रम बरा नव्हे. वजीर

टारझन 16/07/2009 - 01:45
ज्या लोकांना दुर दुर पर्यंत लाईमलाईट नाही,कधी कोणाच्या बोलण्यात त्यांचं काय त्यांच्या नात्यापणत्यांचं पण नाव नाही, त्यांनाच जास्त तावातावाने बोलताना पाहून आणि पुळका आल्याचं पाहून गंमत वाटली !! बाकी मिसळपाव वर आमचं निस्सिमप्रेम आहे, आणि मालकांना जर हितासाठी काही बदल सुचवायचे असतील तर त्याला आम्ही पाठिंबा देऊच !! बाकी ड्यूप्लिकेट आय.डींनी लुडबुड करणे थांबवाने , अन्यथा आमचे उगाच मनोरंजन होते !! - टारझन

शक्तिमान 16/07/2009 - 02:38
मतं मांडण्यासाठी लाईमलाईटमध्ये असण्याची आवश्यकता नाही असे वाटते बुवा आपल्याला. काही लोकांना याची गम्मत वाटते याची आम्हाला गम्मत वाटते. बाकी मिसळपाव वर आमचंही निस्सिमप्रेम आहे, आणि मालकांना जर हितासाठी काही बदल सुचवायचे असतील तर त्याला आम्हीही पाठिंबा देऊच !! बाकी ख-या आय.डीं.ना डुप्लीकेट समजणे थांबवावे, अन्यथा आमचे उगाच मनोरंजन होते !! - शक्तिमान

प्रियाली 16/07/2009 - 02:46
त्या काही लोकांच्या खरडवह्या बंद करून टेश्टींग करून टाकू. त्यानिमित्ताने इतरांनाही कळेल की असे निर्णय घेण्यास भाग पाडणारे महाभाग कोण आहेत ते. ;)

In reply to by प्रियाली

धमाल मुलगा 16/07/2009 - 15:20
उत्तम विचार! त्या निमित्ताने कळेल की नक्की काय केलं तर खव बंद होईल. :) बाकी, शक्तिमान म्हणतात तेही अत्यंत मुद्याचं आहे. दिसली खरडवही म्हणुन खुपसलं तोंड असं केलं तर जे प्रकार आपल्याला नाही आवडत ते दिसल्यावर नापसंतीची भावना होणं सहाजिकच आहे. तेच टाळलं तर बराचसा त्रास आपोआप मिटेल :) (स्वगतः लय बोल्लास बे धम्या...फोकलीच्या आधी ब्लॅकलिश्टमध्ये तुझं नाव नाहीय्ये ना ते कन्फर्म केलंयस का? नायतर उद्या आल्याआल्या बघावं तर खरडवही बंद! मग बस बोंबलत :T ) ---------------------------------------------------------------------------------------- एक गदारोळ प्रसवे ती स्वाक्षरी | गदारोळाचे कारण ते एक स्वाक्षरी || रे मना ऐसा खेळ ना करी | ज्या योगे वितंड मुळ धरी || ऐश्या कारणे रे धमु ना करावी स्वाक्षरी || सच्चिदानंद ! सच्चिदानंद !!

छोटा डॉन 16/07/2009 - 16:00
खास लोकाग्रहास्तव, "उत्तम निर्णय, आमचा पाठिंबा आहे" ... बाकी वरची चर्चा आवडली, बरेच नवे ज्ञान मिळाले. काही का असेना, ह्या निमित्ताने आम्ही ज्ञानमार्गी झालो हे काय कमी आहे ??? व्यवस्थापनाचे अभिनंदन .... ------ (सन्यस्त )छोटा डॉन आम्ही आमच्या आंतरजालीय दुश्मनांना काही वेळा क्षमाही करतो, मात्र त्यांचे नाव आणि आयपी अ‍ॅड्रेस कधीही विसरत नाही .. ;)

नीलकांत 15/07/2009 - 17:37
तात्या, ही अतिशय उत्तम सूचना केलेली आहे. कुणा एकाचं मत नाही पटलं तर त्याच्याशी वैचारीक वाद विवाद करण्यासाठी आणि पटलं तर त्याचं समर्थन करण्यासाठी मिपा आहे. विषय सोडून लिहीण्यासाठी आणि प्रसंगी समोरासमोर वाद करण्यासाठी कधी खरडवहीचा वापर आपण समजू शकतो. मात्र आपल्या न आवडणार्‍या विचाराच्या व्यक्तींना मुद्दाम टारगेट करून त्यांविषयी अनावश्यक आणि कधीकधी चुकिच्या सुध्दा चर्चा करण्यास बंधन असावेच. मी यापुढे अश्या लोकांवर लक्ष ठेवेन. या लोकांची खरडवहीची सुविधा तात्काळ बंद करण्याची सुविधा तुम्हाला तात्काळ करून देतो. - ( मिपा तांत्रीक :) ) नीलकांत

In reply to by नीलकांत

विकास 15/07/2009 - 17:51
तात्यांनी एकदम योग्य सुचना केली आहे. >>>"कुणा एकाचं मत नाही पटलं तर त्याच्याशी वैचारीक वाद विवाद करण्यासाठी आणि पटलं तर त्याचं समर्थन करण्यासाठी मिपा आहे." असेच म्हणतो. :-)

In reply to by नीलकांत

चतुरंग 15/07/2009 - 19:03
घाऊक स्वरुपात खरडी उडवण्यासाठी काही तरी सोय दे रे. पानंच्या पानं खरडी एकेक करुन उडवत बसायचं म्हणजे ना माशा मारत बसल्यासारखं वाटतं! ;) (खुद के साथ बातां : मिपाचं निम्मं विदागार ह्या खरडवह्यांनीच गार झालं असेल का रे रंगा? :? ) (खरडउडवोत्सुक)चतुरंग

ध्येय धोरणा विषयी मिपाची स्पष्टता आहेच तरी संभ्रम असल्यास व्यनि ऐवजी खरड वापरल्यास इतरांनाही ते समजेल.(अर्थात इतरांना समजु न अये असे असल्यास मात्र व्यनी) बाकी मान्य. खरडवहीतुन असलेला संवाद हा सुसंवाद असावा. पुरक माहिती , व्यक्तिगत स्नेह, शिळोप्याच्या गप्पा यासाठी उत्तम 'जवळीक' साधण्याचे हत्यार.( अर्थात परस्पर सहमती असल्यास )सदस्यात मतभिन्नता असली तरी परस्परांविषयी आदर असावा.किमान अनादर तरी असु नये. आपण मिपा या कुटुंबातील सदस्य आहोत. किमान शब्दात कमाल आदर व्यक्त करण्यासाठी खव उत्तम. आमच्या मते याचा वापर माणसे झोडण्यापेक्षा माणसे जोडण्यासाठी असावा प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

चित्रा 15/07/2009 - 19:55
असेच म्हणते. नक्की याचे कारण कळले नाही, पण काहीतरी तसेच असावे :(

चतुरंग 15/07/2009 - 19:05
जिथे तुझं लक्ष जावं असं वाटत होतं ते झालेलं पाहून बरं वाटलं! :) पूर्ण समर्थन! चतुरंग

बाकरवडी 15/07/2009 - 19:11
येथे समर्थन देणारेच नियमांचे उल्लंघन करतात. :B :B :B बाकरवडी :B :B :B

In reply to by सहज

चतुरंग 15/07/2009 - 19:39
(खुद के साथ बातां : रंगा, ह्यांचं नाव 'सहज' असलं तरी प्रश्न मात्र अजिबात सहज नसतात हं! :B ) (साधासरळ)चतुरंग

In reply to by सहज

धनंजय 15/07/2009 - 20:11
("या धांदरटाचे कुठे लक्षच नसते" - इति माझी एक मावशी.) काय झाले त्याबाबत लक्ष नव्हते. पण खरडवही नामक खेळकर-टवाळकीचे साधन कोणी नासवले याबद्दल वाईट वाटते.

चला म्हणजे आता आम्हाल खव अभ्यास मंडळाचा गाशा गुंडाळावा लागणार तर ! आले तात्याजीच्या मना.... ;) आता दिवसभर काहितरी नविन उद्योग शोधावा लागणार बॉ ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन 15/07/2009 - 21:24
चला म्हणजे आता आम्हाल खव अभ्यास मंडळाचा गाशा गुंडाळावा लागणार तर !
हे वाक्य काळजाला भिडले भावा .. हृदयाचं पाणीपाणी करून गेले रे !!
आता दिवसभर काहितरी नविन उद्योग शोधावा लागणार बॉ !
चल आपण "झटपट सुतकी चेहरे करून कसे बसावे ? " ह्यावर प्रशिक्षण वर्ग काढूया भडकमकरांच्या मदतीने ! -- (.........) आता ओरिजिनल नाव नाही तर एखाद्या संताचं नाव घ्यावं म्हणतोय ..

Nile 15/07/2009 - 21:23
सहज म्हणतातः
नक्की झाले काय, असा निर्णय का घ्यावा लागला?
धनंजय म्हणतातः
काय झाले त्याबाबत लक्ष नव्हते. पण खरडवही नामक खेळकर-टवाळकीचे साधन कोणी नासवले याबद्दल वाईट वाटते.
मी ही हेच म्हणतो! स्वगतः छ्या! बर्‍याच जणांच्या की जणींच्या 'म्जय्शी म्य्त्री क्रन्रार' का च्या खरडी आल्या होत्या, आता उत्तर पण देता येणार नाही. :( 'कोण रे तो ख. व. गॉसीपींगसाठी वापरत होता? गधड्याला कळत नाही ख.व. लोकांना दिसते म्हणुन?' ;) एक बालीश प्रश्नः म्हणजे आता टिंगलटवाळी फक्त धाग्यांवरच करायची ना?

पण यामुळे खरडवहीतल्या टवाळकीला मुकावे लागू नये. कित्येक तणावाचे क्षण, केवळ या खरडवहीतल्या टवाळकीमुळेच हलके झाले आहेत. लिमिट मधे रहा, पण टवाळकी सोडू नये. असेच वाटते. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर 16/07/2009 - 01:00
पण यामुळे खरडवहीतल्या टवाळकीला मुकावे लागू नये. कित्येक तणावाचे क्षण, केवळ या खरडवहीतल्या टवाळकीमुळेच हलके झाले आहेत
हो, पण दिलेल्या मोकळीकीचा काही जण गैरफायदा घेताना आढळले म्हणून हे पाऊल उचलावे लागले.
लिमिट मधे रहा, पण टवाळकी सोडू नये. असेच वाटते.
परंतु काही जण एकमेकात सतत एखाद्याची/एखादीची टिंगलटवाळी करताना आढळले, तश्या तक्रारी माझ्याकडे आल्या म्हणून या पुढे कडक कारवाई करायचं ठरवलं आहे. त्यामुळे ही मंडळी मिपा सोडून गेली तरी बेहत्तर! फार फार तर काय मिपा बंद पडेल ना? फिकीर नाही...! तात्या.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

वजीर 16/07/2009 - 01:25
कित्येक तणावाचे क्षण, केवळ या खरडवहीतल्या टवाळकीमुळेच हलके झाले आहेत.
तुमचे तणावाचे क्षण टवाळक्या करुन हलके करायला तात्यांनी नाही म्हंटलेले नाही. तुमच्या ह्या टवाळी मधे तिसरा माणूस कशाला लागतो तुम्हाला? काय करायचीय ती टवाळी तोंडावर करा ना. मागाहुन हा चुगल्यांचा सोहळा कशाला? माफ करा पण तुमच्या खरडवहीतही अनेकदा विनाकारण (प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे) तिर्‍हाइत लोकांची टवाळी चाललेली मी पाहीली आहे म्हणून बोललो. तुमचे तणावाचे क्षण हलके करण्याचा हा कसला अघोरी उपाय? वजीर

अभिज्ञ 15/07/2009 - 23:29
तात्या, एकदम योग्य निर्णय. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

ऋषिकेश 16/07/2009 - 00:16
मला हा निर्णय असा अचानक का घ्यावा लागला हे कळले नाहि. असो. नियमच आहे म्हटल्यावर मान्यता/पाठिंबा काय देणार.. फारतर पालन होईल अशी ग्वाही देतो. (आधीही होतच होतं म्हणा) ( :( )ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

शक्तिमान 16/07/2009 - 00:19
एकमेकांच्या खरडवही मध्ये कोणी काहीही का लिहीना... बाकीच्यांना त्याचा त्रास व्हायचे काय कारण? उलट मला असे वाटते की उठसूट कुणाच्याही खरडवह्या चाळणे लोकांनी बंद करावे... विनाकारण खरडवह्या चाळणा-यांवर कारवाई व्हावी.. सूचना क्रमांक १ ने मुक्त संभाषणाच्या हक्कावर गदा येते. ह्या सूचना देण्याची पाळी का आली त्याबद्दल मला काही माहिती नाही.. परंतु माझे मत मी येथे मांडले आहे !

वजीर 16/07/2009 - 01:18
तात्यांच्या धोरणाशी सहमत आहे. खरडवह्या ह्या सार्वजनिक असतात त्या विरंगुळा म्हणुन चाळल्या जातातच. अश्यावेळी काही लोकांच्या खरडवहीत मुद्दाम एखाद्याला घालुन पाडून बोललेले पाहिले आहे. काय ती चेष्टामस्करी तोंडावर करावी. असला पाठीमागुन चहाड्या चुगल्यांचा कार्यक्रम बरा नव्हे. वजीर

टारझन 16/07/2009 - 01:45
ज्या लोकांना दुर दुर पर्यंत लाईमलाईट नाही,कधी कोणाच्या बोलण्यात त्यांचं काय त्यांच्या नात्यापणत्यांचं पण नाव नाही, त्यांनाच जास्त तावातावाने बोलताना पाहून आणि पुळका आल्याचं पाहून गंमत वाटली !! बाकी मिसळपाव वर आमचं निस्सिमप्रेम आहे, आणि मालकांना जर हितासाठी काही बदल सुचवायचे असतील तर त्याला आम्ही पाठिंबा देऊच !! बाकी ड्यूप्लिकेट आय.डींनी लुडबुड करणे थांबवाने , अन्यथा आमचे उगाच मनोरंजन होते !! - टारझन

शक्तिमान 16/07/2009 - 02:38
मतं मांडण्यासाठी लाईमलाईटमध्ये असण्याची आवश्यकता नाही असे वाटते बुवा आपल्याला. काही लोकांना याची गम्मत वाटते याची आम्हाला गम्मत वाटते. बाकी मिसळपाव वर आमचंही निस्सिमप्रेम आहे, आणि मालकांना जर हितासाठी काही बदल सुचवायचे असतील तर त्याला आम्हीही पाठिंबा देऊच !! बाकी ख-या आय.डीं.ना डुप्लीकेट समजणे थांबवावे, अन्यथा आमचे उगाच मनोरंजन होते !! - शक्तिमान

प्रियाली 16/07/2009 - 02:46
त्या काही लोकांच्या खरडवह्या बंद करून टेश्टींग करून टाकू. त्यानिमित्ताने इतरांनाही कळेल की असे निर्णय घेण्यास भाग पाडणारे महाभाग कोण आहेत ते. ;)

In reply to by प्रियाली

धमाल मुलगा 16/07/2009 - 15:20
उत्तम विचार! त्या निमित्ताने कळेल की नक्की काय केलं तर खव बंद होईल. :) बाकी, शक्तिमान म्हणतात तेही अत्यंत मुद्याचं आहे. दिसली खरडवही म्हणुन खुपसलं तोंड असं केलं तर जे प्रकार आपल्याला नाही आवडत ते दिसल्यावर नापसंतीची भावना होणं सहाजिकच आहे. तेच टाळलं तर बराचसा त्रास आपोआप मिटेल :) (स्वगतः लय बोल्लास बे धम्या...फोकलीच्या आधी ब्लॅकलिश्टमध्ये तुझं नाव नाहीय्ये ना ते कन्फर्म केलंयस का? नायतर उद्या आल्याआल्या बघावं तर खरडवही बंद! मग बस बोंबलत :T ) ---------------------------------------------------------------------------------------- एक गदारोळ प्रसवे ती स्वाक्षरी | गदारोळाचे कारण ते एक स्वाक्षरी || रे मना ऐसा खेळ ना करी | ज्या योगे वितंड मुळ धरी || ऐश्या कारणे रे धमु ना करावी स्वाक्षरी || सच्चिदानंद ! सच्चिदानंद !!

छोटा डॉन 16/07/2009 - 16:00
खास लोकाग्रहास्तव, "उत्तम निर्णय, आमचा पाठिंबा आहे" ... बाकी वरची चर्चा आवडली, बरेच नवे ज्ञान मिळाले. काही का असेना, ह्या निमित्ताने आम्ही ज्ञानमार्गी झालो हे काय कमी आहे ??? व्यवस्थापनाचे अभिनंदन .... ------ (सन्यस्त )छोटा डॉन आम्ही आमच्या आंतरजालीय दुश्मनांना काही वेळा क्षमाही करतो, मात्र त्यांचे नाव आणि आयपी अ‍ॅड्रेस कधीही विसरत नाही .. ;)
सूचना १) कृपया एकमेकांना खरड पाठवताना, त्या खरडी आडून कुठल्याही सभासदाची टिंगलटवाळी होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. एकमेकांशी अगदी सहजच संवाद साधण्याकरता, काही महत्वाचा निरोप देण्याकरता, नैमित्तिक 'हाय, हॅलो' करण्याकरताच केवळ खरडीचा उपयोग व्हावा. आडूनआडून, कधी नाव घेऊन तर कधी नाव न घेता इतर सभासदांबद्दल गॉसिपिंग करण्याकरता खरडींचा वापर करू नये. अन्यथा संबंधित सभासदाची खरडवहीची आणि व्यक्तिगत निरोपाची सोय बंद करण्यात येईल.

जडण घडण २

सरपंच ·

सरपंच 11/07/2009 - 11:36
मिसळपाव वर कविता प्रकाशित करतांना आता तुमची कवीता ज्या काव्यरसाची आहे तो निवडण्याची सोय करून देण्यात आलेली आहे. काव्यरस निवड आवश्यक केलेली नाही. तुम्ही ही निवड न करता सुध्दा कविता प्रकाशित करू शकता. या विषयी काही सूचना असतील तर स्वागतच आहे.

सरपंच साहेब धाग्याच्या खाली 'स्वगृह | चर्चा | काव्य | साहित्य | छंदशास्त्र | पाककृती | कलादालन | कौल | संपादकीय | प्रवेश | वाविप्र' हे सर्व आणल्याबद्दल सर्वात आधी धन्यवाद. आता फक्त तेव्हडा टेक्स्ट बॉक्स मोठा करुन द्याहो प्लिज प्लिज प्लिज. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

सरपंच साहेब धाग्याच्या खाली 'स्वगृह | चर्चा | काव्य | साहित्य | छंदशास्त्र | पाककृती | कलादालन | कौल | संपादकीय | प्रवेश | वाविप्र' हे सर्व आणल्याबद्दल सर्वात आधी धन्यवाद.
मला नाही दिसत आहे ही सोय!
आता फक्त तेव्हडा टेक्स्ट बॉक्स मोठा करुन द्याहो प्लिज प्लिज प्लिज.
हे मात्र जरूर करा हो सरपंच! (हा प्रतिसादाही सहजरावांना सादर समर्पण)

Nile 11/07/2009 - 11:45
पान १, २ ची लिंक पानाच्या वर व खाली अशी दिलीत तर बरीच सोय होईल. धन्यवाद.

In reply to by Nile

अवलिया 11/07/2009 - 11:52
एका पानावर जास्तीत जास्त ५० च्या ऐवजी १०० प्रतिक्रिया असा बदल केला तर बरे होईल... १००च्या वर प्रतिक्रिया जाणारे धागे कमी असतात. ५० च्यावर प्रतिक्रिया असणारे धागे बरेच असतात. --अवलिया दुनिया चाहे कुछ भी बोले बोले दुनिया चाहे कुछ भी बोले हम कुछ नहीं बोलेगा हम बोलेगा तो ... हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

In reply to by बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक 11/07/2009 - 19:17
वर्जिन टेक्स्टबॉक्स आणि एका पानावर १०० प्रतिसाद. लवकरात लवकर, प्लीज!!! ?????? काहीच्या काहीच.

स्वप्नयोगी 11/07/2009 - 21:10
प्रत्येक धाग्यानंतर धाग्याच्या वर आणि खाली पुढील आणि मागील धाग्यासाठी 'पुढील धागा'आणि 'मागील धागा' अशी लिंक दिलीत तर बरे होईल म्हणजे आपल्या ई-मेल मध्ये 'Next' आणि 'Previous' अशी असते तशी म्हणजे चालू धाग्यावरुन एकदम पुढील धाग्यावर जाता येइल. त्यासाठी पुन्हा 'नवीन लेखन' वर क्लिक करायची आवश्यकता पड्णार नाही. पंखांना क्षितीज नसते, त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे आभाळ असते.

In reply to by विसोबा खेचर

नीलकांत 12/07/2009 - 10:39
त्यांच्या मतांसाठीच तर हा धागा. अर्थात ही मते निवडणूकीची नाहीत तरी येथे महत्वाचे आहे. :) लवकरच शक्य तेवढ्या सोई देण्याचा प्रयत्न करतो. - नीलकांत

श्रावण मोडक 12/07/2009 - 13:12
सदस्याशी संबंधित खरडवही, पोष्ट वगैरे तपशील वर आणता येणार नाही का? लिहिण्याची भाषा हे खाली गेलं तरी चालेल की.

मदनबाण 12/07/2009 - 13:20
मुख्य पानावर उजवीकडे खाली जिथे "अधिक" लिहले आहे त्यावर टिचकी मारल्यावर सरळ दुसरे पान दिसायला हवे,सध्या तिथे टिचकी मारल्यावर तेच पान दिसते. मदनबाण..... Success is never permanent, and failure is never final. Mike Ditka

Nile 14/07/2009 - 14:38
७० च्या वर लोक ऑनलाईन आलेकी गंडतय! काही करता येईल काय?

In reply to by Nile

७० च्या वर लोक ऑनलाईन आलेकी गंडतय! काही करता येईल काय?
+१ नाईलशी सहमत जर मिपा वर ७० पेक्षा जास्त सभासद लॉगईन झाले तर मिपा खुप हळु हळु चालत राव आणी तेव्हा हजर सभासद असतात जास्तीत जास्त ५०च्या वर पन कधी कधी मुख्य पानावर दिसतात १३० हजर सभासद आणी ५० पाहुणे ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

राधा१ 27/07/2009 - 10:52
खरड सुविधा कशी सुरु करायची? तसेच काही लेखामध्ये प्रतिक्रिया देता येत नाही आहेत. राधा

प्राजु 20/11/2009 - 01:55
सध्या स्वगृह वर गेलं की, तिथला फॉन्ट साईज प्रचंड बटबटीत आणि ढोबळा दिसतो आहे.. अंगावर येतो आहे. - प्राजक्ता http://www.praaju.com/

मालक, कोणाच्याच खरडवहीत खरडता येत नाहीये. बघा काय करता येईल का? उमराणी सरकार
न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे

सरपंच 11/07/2009 - 11:36
मिसळपाव वर कविता प्रकाशित करतांना आता तुमची कवीता ज्या काव्यरसाची आहे तो निवडण्याची सोय करून देण्यात आलेली आहे. काव्यरस निवड आवश्यक केलेली नाही. तुम्ही ही निवड न करता सुध्दा कविता प्रकाशित करू शकता. या विषयी काही सूचना असतील तर स्वागतच आहे.

सरपंच साहेब धाग्याच्या खाली 'स्वगृह | चर्चा | काव्य | साहित्य | छंदशास्त्र | पाककृती | कलादालन | कौल | संपादकीय | प्रवेश | वाविप्र' हे सर्व आणल्याबद्दल सर्वात आधी धन्यवाद. आता फक्त तेव्हडा टेक्स्ट बॉक्स मोठा करुन द्याहो प्लिज प्लिज प्लिज. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

सरपंच साहेब धाग्याच्या खाली 'स्वगृह | चर्चा | काव्य | साहित्य | छंदशास्त्र | पाककृती | कलादालन | कौल | संपादकीय | प्रवेश | वाविप्र' हे सर्व आणल्याबद्दल सर्वात आधी धन्यवाद.
मला नाही दिसत आहे ही सोय!
आता फक्त तेव्हडा टेक्स्ट बॉक्स मोठा करुन द्याहो प्लिज प्लिज प्लिज.
हे मात्र जरूर करा हो सरपंच! (हा प्रतिसादाही सहजरावांना सादर समर्पण)

Nile 11/07/2009 - 11:45
पान १, २ ची लिंक पानाच्या वर व खाली अशी दिलीत तर बरीच सोय होईल. धन्यवाद.

In reply to by Nile

अवलिया 11/07/2009 - 11:52
एका पानावर जास्तीत जास्त ५० च्या ऐवजी १०० प्रतिक्रिया असा बदल केला तर बरे होईल... १००च्या वर प्रतिक्रिया जाणारे धागे कमी असतात. ५० च्यावर प्रतिक्रिया असणारे धागे बरेच असतात. --अवलिया दुनिया चाहे कुछ भी बोले बोले दुनिया चाहे कुछ भी बोले हम कुछ नहीं बोलेगा हम बोलेगा तो ... हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

In reply to by बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक 11/07/2009 - 19:17
वर्जिन टेक्स्टबॉक्स आणि एका पानावर १०० प्रतिसाद. लवकरात लवकर, प्लीज!!! ?????? काहीच्या काहीच.

स्वप्नयोगी 11/07/2009 - 21:10
प्रत्येक धाग्यानंतर धाग्याच्या वर आणि खाली पुढील आणि मागील धाग्यासाठी 'पुढील धागा'आणि 'मागील धागा' अशी लिंक दिलीत तर बरे होईल म्हणजे आपल्या ई-मेल मध्ये 'Next' आणि 'Previous' अशी असते तशी म्हणजे चालू धाग्यावरुन एकदम पुढील धाग्यावर जाता येइल. त्यासाठी पुन्हा 'नवीन लेखन' वर क्लिक करायची आवश्यकता पड्णार नाही. पंखांना क्षितीज नसते, त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे आभाळ असते.

In reply to by विसोबा खेचर

नीलकांत 12/07/2009 - 10:39
त्यांच्या मतांसाठीच तर हा धागा. अर्थात ही मते निवडणूकीची नाहीत तरी येथे महत्वाचे आहे. :) लवकरच शक्य तेवढ्या सोई देण्याचा प्रयत्न करतो. - नीलकांत

श्रावण मोडक 12/07/2009 - 13:12
सदस्याशी संबंधित खरडवही, पोष्ट वगैरे तपशील वर आणता येणार नाही का? लिहिण्याची भाषा हे खाली गेलं तरी चालेल की.

मदनबाण 12/07/2009 - 13:20
मुख्य पानावर उजवीकडे खाली जिथे "अधिक" लिहले आहे त्यावर टिचकी मारल्यावर सरळ दुसरे पान दिसायला हवे,सध्या तिथे टिचकी मारल्यावर तेच पान दिसते. मदनबाण..... Success is never permanent, and failure is never final. Mike Ditka

Nile 14/07/2009 - 14:38
७० च्या वर लोक ऑनलाईन आलेकी गंडतय! काही करता येईल काय?

In reply to by Nile

७० च्या वर लोक ऑनलाईन आलेकी गंडतय! काही करता येईल काय?
+१ नाईलशी सहमत जर मिपा वर ७० पेक्षा जास्त सभासद लॉगईन झाले तर मिपा खुप हळु हळु चालत राव आणी तेव्हा हजर सभासद असतात जास्तीत जास्त ५०च्या वर पन कधी कधी मुख्य पानावर दिसतात १३० हजर सभासद आणी ५० पाहुणे ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

राधा१ 27/07/2009 - 10:52
खरड सुविधा कशी सुरु करायची? तसेच काही लेखामध्ये प्रतिक्रिया देता येत नाही आहेत. राधा

प्राजु 20/11/2009 - 01:55
सध्या स्वगृह वर गेलं की, तिथला फॉन्ट साईज प्रचंड बटबटीत आणि ढोबळा दिसतो आहे.. अंगावर येतो आहे. - प्राजक्ता http://www.praaju.com/

मालक, कोणाच्याच खरडवहीत खरडता येत नाहीये. बघा काय करता येईल का? उमराणी सरकार
न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे
मिसळपाव हे सतत बदलत जाणारं संकेतस्थळ आहे. नव्याने आवश्यकता भासलेल्या सोई येथे जोडल्या जात असतात. नवीन सोईंची घोषणा, ओळख करून देण्यासाठी हा धागा दुसर्‍या भागात सुरू करीत आहोत. या आधीचा धागा येथे आहे. सदस्यांना काही अडचणी असतील तर त्या येथे मांडू शकतात.

जपान लाईफ

विजुभाऊ ·

अवलिया 10/07/2009 - 14:56
हम्म... वाचतोय.... येवु द्या पुढचा भाग लवकर. --अवलिया दुनिया चाहे कुछ भी बोले बोले दुनिया चाहे कुछ भी बोले हम कुछ नहीं बोलेगा हम बोलेगा तो ... हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

महेश हतोळकर 10/07/2009 - 15:30
येऊद्या! --------------------------------------------------- तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे. ---------------------------------------------------

सहज 10/07/2009 - 15:38
वाचतोय. सुरवात छान आहे. विजुभौ किती भाग आहेत व नक्की नियमीत टाकणार का? आता हा प्रश्न प्रत्येक क्रमशः धारकाला विचारला पाहीजे.

योगी९०० 10/07/2009 - 15:50
असेच माझ्या मित्राने मला जपान लाईफ मध्ये नेऊन एक दिवस बरबाद केला होता. आता तो माझा मित्र राहीला नाही. येवु द्या पुढचा भाग लवकर...सुरवात मस्त झाली आहे. खादाडमाऊ

विजुभाऊ 13/07/2009 - 11:06
धन्यवाद ! जपान लाईफ ने लोकांना काय अन कसे कसे श्रीमन्त केले ते लवकरच लिहितोय.

मदनबाण 14/07/2009 - 06:49
जपान लाईफ ने लोकांना काय अन कसे कसे श्रीमन्त केले ते लवकरच लिहितोय. लवकर लिहा... या बद्धल बरेच ऐकले आहे, नक्की झोल काय आहे ते मात्र कळले पाहिजे. मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa

शिशिर 15/07/2009 - 09:43
गाद्यांचा उद्योग की काय? माझ्या माहितीतही बरेच लोक आहेत. पैसे कमावणारे कमी पण गमावणारे अधिक आहेत.

In reply to by शिशिर

विसोबा खेचर 15/07/2009 - 09:51
पैसे कमावणारे कमी पण गमावणारे अधिक आहेत.
सहमत आहे. त्या जपान लाईफच्या गाद्या म्हणजे लोकांना चुत्त्या बनवायचे धंदे आहेत. साला, आम्ही गेली कित्येक वर्ष जपान लाईफ गादी तर सोडाच, साध्या गादीवरही न झोपता चक्क जमिनीवर, साध्या सतरंजीवर झोपतो आहोत. ठणठणीत तब्येत आहे आमची! तात्या.

शैलेन्द्र 15/07/2009 - 09:50
"माझ्या न्ण्देने खुप पैसे कमावले" असे तिने तुम्हांला सांगितले? यात सरासरी २० पैकी १ पैसे कमवतो.

अवलिया 10/07/2009 - 14:56
हम्म... वाचतोय.... येवु द्या पुढचा भाग लवकर. --अवलिया दुनिया चाहे कुछ भी बोले बोले दुनिया चाहे कुछ भी बोले हम कुछ नहीं बोलेगा हम बोलेगा तो ... हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

महेश हतोळकर 10/07/2009 - 15:30
येऊद्या! --------------------------------------------------- तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे. ---------------------------------------------------

सहज 10/07/2009 - 15:38
वाचतोय. सुरवात छान आहे. विजुभौ किती भाग आहेत व नक्की नियमीत टाकणार का? आता हा प्रश्न प्रत्येक क्रमशः धारकाला विचारला पाहीजे.

योगी९०० 10/07/2009 - 15:50
असेच माझ्या मित्राने मला जपान लाईफ मध्ये नेऊन एक दिवस बरबाद केला होता. आता तो माझा मित्र राहीला नाही. येवु द्या पुढचा भाग लवकर...सुरवात मस्त झाली आहे. खादाडमाऊ

विजुभाऊ 13/07/2009 - 11:06
धन्यवाद ! जपान लाईफ ने लोकांना काय अन कसे कसे श्रीमन्त केले ते लवकरच लिहितोय.

मदनबाण 14/07/2009 - 06:49
जपान लाईफ ने लोकांना काय अन कसे कसे श्रीमन्त केले ते लवकरच लिहितोय. लवकर लिहा... या बद्धल बरेच ऐकले आहे, नक्की झोल काय आहे ते मात्र कळले पाहिजे. मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa

शिशिर 15/07/2009 - 09:43
गाद्यांचा उद्योग की काय? माझ्या माहितीतही बरेच लोक आहेत. पैसे कमावणारे कमी पण गमावणारे अधिक आहेत.

In reply to by शिशिर

विसोबा खेचर 15/07/2009 - 09:51
पैसे कमावणारे कमी पण गमावणारे अधिक आहेत.
सहमत आहे. त्या जपान लाईफच्या गाद्या म्हणजे लोकांना चुत्त्या बनवायचे धंदे आहेत. साला, आम्ही गेली कित्येक वर्ष जपान लाईफ गादी तर सोडाच, साध्या गादीवरही न झोपता चक्क जमिनीवर, साध्या सतरंजीवर झोपतो आहोत. ठणठणीत तब्येत आहे आमची! तात्या.

शैलेन्द्र 15/07/2009 - 09:50
"माझ्या न्ण्देने खुप पैसे कमावले" असे तिने तुम्हांला सांगितले? यात सरासरी २० पैकी १ पैसे कमवतो.
3

पुरोगामित्वाची चढाओढ ही तितकी वाईट नाही

धनंजय ·

नंदन 08/07/2009 - 03:19
लेखात मांडलेल्या विचारांशी सहमत आहे. मुळात सतीची चाल बंद करणे, स्त्रियांना मतदाराचे अधिकार देणे इ. सुधारणांना झालेल्या विरोधातील मुद्दे आणि आता घेतले जाणारे आक्षेप यांत कमालीचे साम्य आहे. (संस्कृती बुडणे, समाजव्यवस्थेचा र्‍हास होणे, स्वैराचाराला प्रोत्साहन मिळणे, विवाहसंस्था धोक्यात येणे, आंग्लाळलेल्या समाजाची किंवा मूठभर श्रीमंतांची ढोंगी पुरोगामित्वाची कल्पना इ.) एकंदरीत उठलेल्या गदारोळावरून 'when they came for me, there was no one left to speak out' ची आठवण येते.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

Nile 08/07/2009 - 04:24
आजकाल मिसळपावावरच्या काही प्रतिसादकर्त्यांच्या सह्या लोकप्रिय झाल्या आहेत त्यांत "समलैंगिकतेचे उदात्तीकरण" करणार्‍यांना व्यंग्यात्मक शैलीत ढोंगी म्हणले जाते आहे. या हेटाळणीने माझ्या (आणि कोणाच्याही) कैवाराला आलेल्यांनी बुजू नये, ही विनंती. उगाच "आपण ढोंगी आहोत का?" या विचारांत गढून स्वतःला दोष देऊ नये. डझनावारी लोकांची सहज आणि स्वस्त चिडवाचिडवी एका पारड्यात, आणि माझे जगणे काही प्रमाणात सुसह्य केल्याचे जिवाएवढे मोठे आभार दुसर्‍या पारड्यात. सौदा घाट्याचा नाही हे आश्वासन मी तुम्हाला देतो.
हा हा! असल्या सह्यांमुळे लोक मत बदलत असतील तर अश्या लोकांच्या मताला काय अर्थ? अर्थात अश्या सह्या टाकणार्‍यांच्या वागण्याने मला तरी फक्त हसु येतं. असो चालायचंच! (;) )

मिसळभोक्ता 08/07/2009 - 03:27
पुरोगामित्वाची चढाओढ वाईट नाही, हे खरेच. पण इथे किंवा इतरत्र जे बोलताहेत/लिहिताहेत, ते पुरोगामी आहेत की पुरोगामित्वाचा बुरखा पांघरलेले (नुसते बोलणारे) दांभिक लोक आहेत, हे जोखायला हवे. जिथे विज्ञानसंमेलन भरवण्यासाठी साडेतीन मुहुर्तांपैकी एक शोधला जातो, तिथे असे बुरखेच अधिक सापडणार. -- मिसळभोक्ता (अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)

In reply to by मिसळभोक्ता

>>पण इथे किंवा इतरत्र जे बोलताहेत/लिहिताहेत, ते पुरोगामी आहेत की पुरोगामित्वाचा बुरखा पांघरलेले (नुसते बोलणारे) दांभिक लोक आहेत, हे जोखायला हवे. सर्किटशी पूर्णपणे सहमत! आण्णा चिंबोरी--> (पुराणमताभिमानी)

चतुरंग 08/07/2009 - 03:37
समाजरचनेमधे काही निराळे रंग असतात (पण ते समाजाचाच भाग असतात) त्या निराळ्या रंगात आपण असणे हे एकप्रकारे विलगीकरण घडते आधी मानसिक आणि मग शारीर पातळीवर. बहुसंख्येने असलेले वैशिष्ठ्य (गैर असले तरी) उदा. "पुरुष म्हणजे स्त्रियांना मारणारच, सगळीकडे असतेच, थोडे सहन करायचे" अशी मानसिकता गैर असली तरी बहुसंख्य म्हणून खपून जाते, खपवून घेतली जाते. विलगीकरणाचे बळी ठरलेले व्यक्तिमत्व हे अतिशय जाचक परिस्थितीतून जात असते. आपण वेगळे आहोत ह्या मानसिक कोंडमार्‍यातून आपल्या नैसर्गिक जाणिवांपर्यंत पोचणे, त्या समजून घेणे आणि मग त्याच्याशी प्रामाणिक रहाणे सोपे नाही. त्यापुढे जाऊन ज्या समाजाचा आपण भाग आहोत त्याच्याशी वैफल्याने नाळ न तोडता संबंध टिकवून ठेवणे तर अभिनंदनीयच म्हणायला हवे. समलैंगिकतेचे उदत्तीकरण करण्याचा प्रश्न इथे नसावा. उदात्तीकरण कुठल्यातरी भव्यदिव्य गोष्टीचे केले जाते. सर्वसामान्य स्त्री पुरुष संबंधांचे कोणी उदात्तीकरण करीत नाही तसेच ह्याचेही असू नये. हेही नैसर्गिकच आहे पण तुलनेने कमी आढळत असावे इतकेच. बाकी सह्यांबद्दल फारसे काही बोलण्यासारखे नाही! नदीच्या कोणत्या तीरावर तुम्ही आहात त्याप्रमाणे तुम्हाला दृष्य दिसणार. चतुरंग

In reply to by चतुरंग

अनामिक 08/07/2009 - 04:18
समलैंगिकतेचे उदत्तीकरण करण्याचा प्रश्न इथे नसावा. उदात्तीकरण कुठल्यातरी भव्यदिव्य गोष्टीचे केले जाते. सर्वसामान्य स्त्री पुरुष संबंधांचे कोणी उदात्तीकरण करीत नाही तसेच ह्याचेही असू नये. हेही नैसर्गिकच आहे पण तुलनेने कमी आढळत असावे इतकेच. अगदी हेच म्हणतो. -अनामिक

शलाका 08/07/2009 - 03:39
समलैंगिकतेचे उदात्तीकरण" करणार्‍यांना व्यंग्यात्मक शैलीत ढोंगी म्हणले जाते आहे. या हेटाळणीने माझ्या (आणि कोणाच्याही) कैवाराला आलेल्यांनी बुजू नये, ही विनंती. उगाच "आपण ढोंगी आहोत का?" या विचारांत गढून स्वतःला दोष देऊ नये.
असेच म्हणते. मिसळपाववर हे लोक कोण आहेत ते सगळ्यांना ठाउक आहे. इथेही आता उच्चभ्रु उच्चभ्रु करत यथेच्छ टवाळी करायला हे लोक येतीलच. बरं काही तक्रार असेल तर मुखपृष्ठावरच मालकांनी चपला घालुन बाहेर पडायला सांगीतले आहे. त्यामुळे ह्या सोशल न्युसन्स असणार्‍या प्रवृत्तींकडे दुर्लक्ष करावे आणि स्वत:ला दोष देऊ नये हे उत्तम.

In reply to by शलाका

विसोबा खेचर 08/07/2009 - 09:09
बरं काही तक्रार असेल तर मुखपृष्ठावरच मालकांनी चपला घालुन बाहेर पडायला सांगीतले आहे.
अहो ते इतक्या सिरियसली घेऊ नका हो! :) तो संदेश मिपाला उठसूठ, मुद्दामून नावे ठेवणार्‍यांकरता आहे! धन्यवाद, तात्या.

धनंजय यांचे सर्व मुद्दे आवडले. तुमच्या संयमितपणाला सलाम. >>अतिसामान्य तर्‍हेने एकनिष्ठ प्रेम, किंवा एकनिष्ठतेचे ध्येय असलेले अतिसामान्य स्खलनशील प्रेमही, असे काही करण्यास मला भारतात वाव नाही, म्हणून माझा जन्मदेश मला जाचक आहे. संस्क्रुतीच्या गप्पा मारणार्यांनी आणि पुरोगाम्यांना नावे ठेवणार्यांनी वरचा परिच्छेद वाचावा. पुरोगामी लोकांना हिणवले की मग माझे पुरूष्/स्त्री/भिन्नलिंगी/उच्च्वर्णिय्/श्रीमंत/विवाहित असणे म्हणजे काय, आणि त्यामुळे त्या कळपात जे नाहीत त्यांच्या मुलभूत हक्कांचे, त्यांच्या स्व्प्नांचे, प्रेरणांचे काय असे विचार करण्यातून सुटका होते. >>स्वाक्षर्‍यातून बौद्धिक दारिद्र्याचे प्रदर्शन मांडणार्‍या लोकांकडे पूर्ण दुर्लक्ष करावे. सहमत. अवांतरः माझी सही: ज्या दिवशी विवाहसंस्था कोसळेल त्या दिवशी मी ब्रेक-डान्स करेन.

वजीर 08/07/2009 - 05:28
धनंजयांचे मनोगत आवडले. काहीतरी बिनडोक स्वाक्षर्‍या करणारर्‍यांची कीव करावी आणि दुर्लक्ष करावे हेच उत्तम. कारण ह्यांच्याशी वाद घालायला गेल्यावर कपडे तुमचेच घाण होणार आहेत. --वजीर ------ डुकराशी चिखलात कधीही कुस्ती करु नये. तुमचे कपडे घाण होतातच डुकराला मात्र त्यात मजा मिळत असते.

नंदन 08/07/2009 - 06:33
ही चर्चा धनंजयांनी मांडलेल्या विचारांवरच असू द्यावी, असं मला वाटतं. स्वाक्षरीवरून किंवा वेगळ्या मतावरून वैयक्तिक ताशेरे कृपया ओढू नयेत, नाहीतर त्यामुळे चर्चेला जी अनावश्यक वळणे लागतात ती बहुतेक सर्वांना परिचित असावीत. मतस्वातंत्र्यासाठी भांडताना, तुमच्या विरोधी गटाच्या मताचा (भले मग ते तुमच्या दृष्टीने मत नसून पूर्वग्रह, हेकेखोरपणा इ. असो) आदर करणेही महत्त्वाचे. नाहीतर कट्टरपणाविरूद्ध झगडताना दुसर्‍या टोकाचा कट्टरपणाही येऊ शकतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

विकास 08/07/2009 - 08:17
धनंजयने केलेले मनोगत चांगलेच आहे. त्यातल्या त्याच्या भावना आणि त्यांचे संयमित प्रदर्शनपण पूर्णपणे समजू शकतो आणि त्यांच्याशी सहमतच आहे. >>अतिसामान्य तर्‍हेने एकनिष्ठ प्रेम, किंवा एकनिष्ठतेचे ध्येय असलेले अतिसामान्य स्खलनशील प्रेमही, असे काही करण्यास मला भारतात वाव नाही, म्हणून माझा जन्मदेश मला जाचक आहे. असे म्हणणे हे भारतातील कुठल्याही नात्याच्या (समलिंगी/भिन्नलिंगी) संबंधात वाटते की केवळ समलिंगीसंबंधात? नंदनने म्हणल्याप्रमाणे चर्चा ही त्या स्वाक्षर्‍यांवर अथवा वैयक्तिक होवू नये असे वाटते. इथे वैचारीक लिहीले, टिकात्मक लिहीले तरी कोणी वाचक स्वतःची मते बदलत नाही, तर स्वाक्षर्‍या वाचून बदलेल असे खरेच वाटते का? :) चतुरंगने "उदात्तीकरणाचा" प्रश्न आणला आहे आणि तो मात्र मला मान्य आहे. कुणाचेच (सम/भिन्न) उदात्तीकरणाचा प्रश्न उद्भवत नाही असे वाटते. त्याच संदर्भात असे वाटते की जर मी या संदर्भात समलिंगींच्या विरोधात बोललो नाही आणि समजून घेतले तर याचा अर्थ मी कैवार घेतो असा असतो का? कदाचीत नाही तर असेही असू शकते इतके वैज्ञानिक सत्य म्हणून मान्य करण्याचा कदाचीत दृष्टीकोन त्यात असेल. आता वैयक्तिक स्तरावर (म्हणजे येथे धनंजय संदर्भात): आधी मी एक थोडे वेगळे उदाहरण देतो. मी अमेरिकेतील स्वतःला खूपच लिबरल समजणार्‍या राज्यात मॅसेचुसेट्स मधे रहातो. सर्वांना समान वागवणे वगैरे.. पण मग कोणी गोरा अमेरिकन माझ्याशी मी केवळ एक (इथला) अल्पसंख्य आहे, दुसर्‍या वंशाचा आहे म्हणून स्पेशल ट्रीटमेंट देत जास्तच मैत्रीपूर्ण वागला/वागली तर मला ते आवडत/णार नाही. कारण त्यात "समान/इक्वल" वागणूक नसून फुकटची सहानभुती अर्थात स्वतःचा (त्यांचा) अहंकार सुखावण्याची (मी कसा/शी लिबरला आहे) धडपड असते असेच वाटेल. मला तसेच या संदर्भात वाटते. मी जेंव्हा धनंजयशी संवाद करतो आणि या संदर्भात पण सपोर्टीव्ह लिहीतो तेंव्हा त्यात कैवार नसावा, सहानभूती नसावी तर पूर्ण एका व्यक्तीचा दुसर्‍या व्यक्तीशी बुद्धीवादाने (इंटलेक्चुअल) संवाद अथवा विरंगुळा (टाईमपास) असेल असेच वाटले पाहीजे. आता सरते शेवटी एक प्रश्नः माझा तर यासंदर्भात कधी विरोध नव्हता/नाही. कोर्टाचा निर्णय देखील स्वागतार्हच वाटला. पण मी तर टाळकुट्या, हिंदुत्ववादी माणूस...सुडोसेक्युलर्स/बुद्धीभेदी वगैरे शब्द सातत्याने वापरणारा. थोडक्यात पुरोगामी स्वत:ला समजू शकत नाही की पुरोगामी तसे मला समजणार देखील नाहीत (माझी तक्रार नाही ;) ) पुरोगामित्वाच्या चढाओढीत तर मी त्यामुळे असूच शकत नाही असे वाटते...पण मग आता मी स्वत:ला काय म्हणावे?

संस्कृतीचा अभिमान असला पाहिजे, पण संस्कृतीच्या नावाखाली काही धूर्त लोक ज्ञानी /अज्ञानी लोकांवर सतत सामाजिक दडपण टाकत असतात, आणि प्रगतीच्या वाटा खुंटतात या शंकाच नाही. सारासार विचार करण्याची शक्ती माणूस गमावून बसतो. जरासे विषयांतर होत आहे, पण लिहिण्याचा मोह आवरत नाही. शुद्रादी-अतिशूद्र आणि स्त्री-पुरुष भेद, हे दैवाने निर्माण केलेले आहे, नव्हे तर धार्मिक ग्रंथात ईश्वराने ते स्वतः सांगितलेले असल्यामुळे तसेच वागले पाहिजे, यासाठी हट्ट धरणारी मंडळी याच समाजात होती,आहे. पण ग्रंथात आलेले विचार किती भाकड आहेत,बनावट आहेत, हे सांगण्यासाठी विचारवंताना कितीतरी प्रबोधन करावे लागले. ते आपण सर्वांना ज्ञात आहे. आज एखादा विचार समाजाला मान्य नसेल, तो प्रश्न तितक्या प्रमाणात कोणाच्या घरात नसेल, पण मानसिक गरज काय असते ते एखाद्या संस्कृत रक्षकाच्या घरी असा एखादा अनुभव असल्याशिवाय त्याची अनुभूती त्यांना येणार नाही, त्यांची वटवट बंद होणार नाही,असेही वाटते. काही संस्कृत अभिमानी लोक नीतीविषयक गप्पा हादडण्यात फार पुढे असतात. अर्थात अशा लोकात त्यांचा कावेबाजपणा दडलेला असतो, हेच लोक अतिशय लवचिक धोरणाचा स्वीकार करणारे असतात. कोणत्याही पुरोगामी विचारामुळे संस्कृती बूडत नसते, या धनंजयाच्या विचाराशी मी सहमत आहे.....! खरं तरं, अशा कितीतरी गोष्टी सांगितल्या जातात. ज्यामुळे संस्कृती बूडते, तोच अभिमान आपण बाळगला असता तर आपण कितीतरी वर्ष मागेच राहिलो असतो, वो बाते फिर कभी !!! अवांतर : स्वाक्षरीचे फार मनावर घेऊ नये, तो निव्वल टाईमपास असतो :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज 08/07/2009 - 09:02
मुळ लेख, बिरुटेसरांचा प्रतिसाद याच्याशी सहमत आहे. जे योग्य वाटते त्याबद्दल भुमीका घेणे जसे नैसर्गिक तसेच तारतम्य ठेवून खुलेपणाने दुसर्‍या बाजुचा प्रतिवाद ऐकुन, खातरजमा करुन परत आपल्या मतात योग्य तो बदल करणे हे देखील तितक्याच आपसूकपणे करता आले पाहीजे. समलैंगीकतेबद्दल जे काही वाचले, ऐकले आहे त्यावरुन समलैंगीकता ही नैसर्गीक आहे असेच समजले आहे. त्यामुळे त्यावरुन एखाद्या व्यक्तिचा नैसर्गिक हक्क हिरावणे किंवा त्यावरुन दुजाभाव करणे पटत नाही. निदान असे वाटावे इतका तर २१व्या शतकातील मानवी उत्क्रांतीचा प्रवास झाला असला पाहीजे.

आनंदयात्री 08/07/2009 - 08:59
धनंजय तुझे म्हणने नेहमीच पटत आले आहे. मिपासारख्या संस्थळांवर आपण भावनिकदृष्ट्या जोडले गेलेलो आहोत, तु इथे प्रकट रुपाने समलैंगिक म्हणुन वावरतोस, त्यामुळे तुला त्या सहीने क्लेष होणे स्वाभाविक आहे. राहिला प्रश्न आंतरजालावर असलेल्या स्युडो पुरोगामित्वाचा. याची चढाओढ नक्कीच वाईट आहे, त्यावर सवडीने लिहीनच.

विसोबा खेचर 08/07/2009 - 09:15
डझनावारी लोकांची सहज आणि स्वस्त चिडवाचिडवी एका पारड्यात, आणि माझे जगणे काही प्रमाणात सुसह्य केल्याचे जिवाएवढे मोठे आभार दुसर्‍या पारड्यात. सौदा घाट्याचा नाही हे आश्वासन मी तुम्हाला देतो.
उत्तम प्रकटन... धन्याशेठला सलाम... तात्या.

यशोधरा 08/07/2009 - 09:43
नंतर शांतपणे वाचते. घाईगडबडीत नीट वाचून होणार नाही...

सुनील 08/07/2009 - 10:16
डझनावारी लोकांची सहज आणि स्वस्त चिडवाचिडवी एका पारड्यात, आणि माझे जगणे काही प्रमाणात सुसह्य केल्याचे जिवाएवढे मोठे आभार दुसर्‍या पारड्यात. सौदा घाट्याचा नाही हे आश्वासन मी तुम्हाला देतो. क्या बात है! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विजुभाऊ 08/07/2009 - 10:42
समलैंगीकता आणि त्यास कायद्याने मान्यता हा एवढा मोठा गहजब करण्या एवढा किंवा जग बुडी एवढा मोठा विषय आहे असे मला वाटत नाही. ती बाब अत्यन्त वैयक्तीक आहे. समलैंगीक असणार्‍या व्यक्तीचे कार्य आयुष्य तशा नसलेल्या माणसाइतकेच महत्वाचे असते पोटापाण्यासाठी त्याना ही काहितरी व्यवसाय करावयाचा असतो तूलनाच करायची झाली तर माझ्या सोबत असणारा एखादा/एखादी त्याच्या आलेल्या मूळव्याधीच्या मोडावर काय उपाय करतो याने मला असा काय फरक पडतो. उद्या अमिताभ बच्चनने त्याला जांघेत होणार्‍या खरजेवर कोणते मलम लावावे यावर सबसे तेज वाहिनीने एस एम एस पाठवून कौल घेण्यासारखे आहे. एखादा समलैंगीक सम्बन्ध ठेवतो/ठेवते म्हणजे ती व्यक्ती पूर्णपणे वेगळी आहे असे नाही. तो भाग त्याच्या आयुश्याचा एक छोटासा हिस्सा असतो. निदान तो कबूल तरी करत असतो. लैंगीकता त्याचे आयुष्य व्यापून टाकत नसते. त्याचे कार्य विश्व इतरांसारखेच असते रजनीश एके ठीकाणे म्हणतात की ब्रम्हचारी हा नेहमीच पाखंडी असतो. त्याच्या डोक्यात लैंगीक कामांध विचार जेवढे येतात तेव्हढे एका दहा राण्या असणार्‍या राजाच्याही मनात येत नाहीत. स्वभावतः असणारी नैसर्गीकता जे नाकारतात ते स्वतःलाच फसवत असतात भारतातली संस्कृती इस्लामी /ब्रीटीश आक्रमणापूर्वी मोकळी होती. सम्भोग आणि कामवासना हे टाकाऊ त्याज्य असे मानले जात नसे.म्हणून तर खजुराहो सारखी शिवशिल्पे झाली. "ब्रम्हचर्य म्हणजे जीवन आणि वीर्यनाश म्हणजे मृत्यू" ह्या आणि असल्या कल्पनाच खरेतर अनैसर्गीक आहेत

In reply to by विजुभाऊ

नंदा 08/07/2009 - 13:24
इथे तुमचा लैंगिकता म्हणजे केवळ शयनगृहात, खाजगीत केलेली शरीरभोगाची क्रिया असा गोंधळ होत असावा. जेंव्हा कार्यालयात तुंम्ही सहकार्‍याला सहज म्हणता की, 'परवा अर्ध्या दिवसाची रजा टाकतो, ही चिरंजीवांना घेउन काही दिवसांसाठी माहेरी जाणार आहे, त्यांना स्टेशनवर गाडीत बसवून मग परस्पर ऑफिसला येइन', तेंव्हा तुम्ही विषमलिंगी आहात, तुमची साथीदार एक स्त्री असून विषमलिंगी विवाहसंस्थेवर आधारलेले असे तुमचे सहजीवन आहे, त्यापासून तुम्हाला अपत्य आहे, वगैरे गोष्टी अनुस्यूत असतात. त्या मुद्दाम सांगाव्या लागत नाहीत कारण त्या तुंम्हाला न विचारता गृहित धरल्या जातात. हे गृहितक बरोबर असल्यामुळे तुम्हाला त्यावर आक्षेपही नसतो. पण समलैंगिक लोकांना अशा गृहितकांचा जाच होण्याचीच शक्यता अधिक. हा केवळ समलैंगिक लोकांचाच प्रश्न नाही, तर कोणत्याही बहुसंख्यांच्या समूहात राहणार्‍या कोणत्याही अल्पसंख्यांचा आहे. त्यामुळे अशा अल्पसंख्य समूहाला आपले किमान अस्तित्व ते हक्क या सर्व आघाड्यांवर जागरुक आणि झगडत राहावे लागते, आपल्या वेगेळेपणाची खासकरून जाणीव करून द्यायला लागते. नाहीतर अस्तित्वच नाकारून बहुसंख्यांत 'स्वाहां' (असिमिलेट) होण्याचा धोका असतो. म्हणून एखादा समलिंगी त्याची समलैंगिकता चव्हाट्यावर आणतो, त्याबाबतीत चर्चा घडवून आणतो, ते तो शयनगृहात, खाजगीत काय काय करतो हे सांगण्यासाठी नव्हे, तर तुमची त्याच्या संदर्भातली गृहितके बरोबर करण्यासाठी!

विसुनाना 08/07/2009 - 13:28
प्रतिसादाच्या सुरुवातीलाच हे स्पष्ट करू इच्छितो की केवळ पुरोगामित्व दाखवायचे म्हणून समलैंगिकतेला समर्थन द्यावे या मताचा मी नाही. धनंजयाचा कोणार्कशिल्पे हा लेख/(प्रकटन) वाचला तेव्हा प्रथम मला धक्काच बसला होता. या विषयावर गंभीरपणे विचार करण्याला मी कचरत होतो. पण धनंजयसारखा माणूस जेव्हा एखादे स्वानुभवाधारीत प्रकटन लिहितो तेव्हा ते चिंतनीय असते. या सामाजिक विषयाबद्दल विचार करण्यास त्या लेखाने भाग पाडले. माझ्या मनात असलेला 'बुजरेपणा' नाहीसा झाला. त्यामुळे समलैगिकता मला समर्थनीय नसली तरी मी तिचा विरोधकही नाही हे मला कळून चुकले. याउप्पर हेही खरे की समलैगिकता एक नैसर्गिक (उपजत) प्रेरणा आहे असे मान्य केले तरी हिरीरीने सरसकट समलैंगिकतेचा कैवार घ्यावा असेही मला वाटत नाही. जसे - या आणि अशा काही लोकांच्या मते "बहुसंख्य पुरुष नैसर्गिकरित्या बहुस्त्रीगामी असतात आणि एकपत्नीत्वाचा कायदा हा नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध आहे. कोणी किती लग्ने करावीत हे ज्याचे त्याने ठरवावे." या मताला पौराणिक,प्रागैतिहासिक, ऐतिहासिक, धार्मिक, सांख्यिकी आणि वैज्ञानिक ;) आधारही देता येतील. पण या मताचा हिरीरीने कैवार घ्यावा असे मला वाटत नाही. एखाद्या एकाकी व्यक्तीवर सामुहिक हल्ला होत असेल तर तिचे हिरीरीने संरक्षण करणे हे मानव्य मूल्य आहे हे मला मान्य आहे. पण त्या अगोदर त्या व्यक्तीची बाजू न्याय्य आहे हे मला पटले पाहिजे. ती व्यक्ती आपल्या अनुक्रमे माहितीची, ओळखीची, निकटची,नातेसंबंधातील, घनिष्ट असेल तर तिचे संरक्षण करण्यात मानव्य मूल्य कमी होते असे मला वाटत नाही. येथील उदाहरणात धनंजय या व्यक्तीशी माझा परिचय आहे आणि त्याची बाजू न्याय आहे हे मला पटले आहे. म्हणून केवळ या उदाहरणापुरता मी त्याची बाजू हिरीरीने घेऊ शकतो. पण हेच सूत्र सरसकट सर्वच उदाहरणात लागू होईलच असे नाही. समलैगिकतेबाबत अजूनही अनेक मुद्दे माझ्यासाठी संदिग्ध आहेत. ते कुणा इतरेजनांच्या अनुभवांच्या वाचनातून कदाचित स्पष्ट होतील. असे झाल्यास सरसकट सर्वच समलैंगिकांची बाजू घ्यायची की तिला काही 'जर..तर' जोडायचे हे निश्चित करता येईल. तोवर माझ्या पुरोगामित्वाची धाव केवळ धनंजय या एकाच व्यक्तीची वैयक्तिक मनोधारणा मान्य करण्यापुरती मर्यादित असेल. त्यामुळे पुरोगामित्वाची चढाओढ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

अग्ग बाब्बो !! ओ धनु शेठ अहो आमची सही म्हणजे मिपावर चालु असलेल्या मारामार्‍या, वाद ह्यांची टिंगल करणे येव्हड्याच उद्देशाने बनवलेल्या आहेत. त्यामुळे कोणी दुखावले असल्यास मी जाहीर माफी मागतो. ह्या सह्यांमागचा उद्देश केवळ आणी केवळ करमणुक, थट्टा हा आहे. º°¨¨°º© परा ©º°¨¨°º नविन सहीच्या शोधात. आमचे राज्य

अवलिया 08/07/2009 - 15:01
लेख उत्तम आहे. धनंजयशेट माझे मित्र आहेत. त्यांची माझी विविध विषयांवर खरड वा व्यनीतुन चर्चा होत असते तसेच क्वचित ते माझ्या लेखांना प्रतिसाद देतात तेव्हा माहितीची देवाणघेवाण होत असते. या सर्व प्रक्रियेत त्यांच्याशी एक सुहृद म्हणुनच बघत असतो याविषयी ते सुद्धा मान्यता देतील अशी खात्री आहे. त्यांचा बहुचर्चित लेख आला तेव्हा माझे आणि त्यांचे संभाषण झाले होते, पण त्या धाग्यावर मी प्रतिक्रिया दिली नव्हती कारण मला काहिही वेगळे वाटले नव्हते (पण मला काही शंका आल्या होत्या, त्यांचे निरसन मी करुन घेतले होते) आणि मी वास्तव लगेच मान्य केले होते. बाकी, सह्यावरचा थट्टा मस्करी करण्यासाठी वापरला जाणारा मजकुर धनंजयसारखी प्रगल्भ विचाराची व्यक्ती वैयक्तिक घेवुन मनाला लावुन घेते हे मला मात्र बुचकळ्यात टाकणारे आहे. असो. धनंजयांचा आदर राखुन मी ती बहुचर्चित सही वापरणे बंद करत आहे. त्यांच्या भावनांना झालेल्या इजेबद्दल मी त्यांची जाहीर माफी मागतो आणि त्यांनी उदार अंतःकरणाने मला क्षमा करावी अशी केवळ विनंती करतो... क्षमा करणे न करणे हा केवळ आणि केवळ त्यांचाच अधिकार आहे. --अवलिया

In reply to by अवलिया

धनंजय 08/07/2009 - 21:23
लांब प्रतिसाद देताना ही पोच देण्यास माझ्याकडून उशीर होऊ नये. भावना दुखावल्याबद्दलची माफी मागितलीत हे तुमचे मोठे मन. अर्थातच माफी आहे. शंका, वेगळे विचार, हे सर्व असण्याबद्दल तर माफी देण्याघेण्याचा विचारही नको. पटवणे-पटणे हीच भाषा योग्य आहे.

मला वाटते कि बरेचसे प्रतिसाद हे त्यावेळी उमटणार्या तरंगातुन प्रतिक्षिप्त क्रिये सारखे आलेले असतात. ते खुप विचारपुर्वक च दिलेले असतात असे नव्हे. समलैंगिकता हा विषय किमान आता चर्चिला तरी जातो आहे. मुळात लैंगिकता हाच विषय भारतीय समाजात फारसा बोलला जात नाही. समलैंगिकतेचे प्रमाण हे अत्यल्प असल्याने (हे तर्काच्या आधारे संख्याशास्त्रीय पुरावा नाही) ते 'वेगळेपण' पचवणे बहुसंख्यांना जड जाते. टवाळकी , अवहेलना,कुत्सितपणा, डिवचणे इ. प्रकार त्यातुनच निर्माण होतात. एखादा भांबावुन वस्तु शोधताना इकड तिकडे पाहु लागला कि त्याला इतर म्हणतात " ए आंधळ्या अरे तुझ्या समोर बघ कि....." असे म्हणताना आपण अंधजनांची अवहेलना करतो आहे अशी भावना नसते. ती परंपरागत नकळत झालेल्या संस्कारांचा भाग असते. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

लिखाळ 08/07/2009 - 21:02
सहमत आहे. लेख छान. विसुनानांचा प्रतिसाद वेगळाच आणि छान वाटला. (याचा अर्थ प्रत्येक मुद्द्याशी सहमती नाही.) नंदा यांनी जे म्हटले आहे की आपण भिन्नलिंगत्व गृहित धरतो ते सुद्धा बरोबर. उदात्तीकरण होते असे नाही पण भिन्नलिंगी जोडप्याला मान मिळतो. बहुधा कोणार्क शिल्पे या लेखावरच्या प्रतिसादांत यावर चर्चा झाली आहे. नलाने हंसाला पकडल्यावर हंस म्हणाला की बायको एकटी आहे आई म्हातारी आहे असे ऐकल्यावर नळराजा हेलावला. हीच सहानुभूती त्या हंसाला 'माझा मित्र मानसरोवरापाशी वाट पाहत असेल' असे म्हटल्यावर मिळाली असती का? असा प्रश्न पडतो. (स्त्री-पुरुष जोडीला जी मान्यता सहानुभूती मिळते ती समलिंगी जोडीला मिळत नसावी असे मला वाटते.) -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

धनंजय 10/07/2009 - 11:52
या धाग्यावरती सर्वांनीच अत्यंत गंभीरपणे विचार करून प्रतिसाद दिले आहेत. सर्वांनाच चर्चेची खोली वाढवण्याबाबत धन्यवाद. अनेकांनी मूळ लेखातील मुद्द्यांना विस्तारित केलेले आहे, किंवा अनुमोदन केलेले आहे, त्यात सर्वश्री नंदन, नाईल, चतुरंग, विसोबा खेचर, कर्क, कालिंदी, वजीर, दिलिप बिरुटे, सहज, लिखाळ यांचे विचार आहेतच. विजुभाऊ आणि नंदा यांनी नैसर्गिकता आणि समावेशन (ऍसिमिलेशन) या बाबतीत चर्चा पुढे नेली. अनेकांनी दुर्ल़क्ष करणेच योग्य हे सांगितले. उदाहरणार्थ प्रकाश घाटपांडे यांनी योग्यच सांगितले, की "ए आंधळ्या" म्हणणारे लोक जाणूनबुजून अवहेलना करत नसतात - आणि हीच बाब परिकथेतला राजकुमार आणि अवलिया यांनी सांगितली. लेख कशाबद्दल नाही - हा लेख हळवेपणाने "मी दुखावलो" असे म्हणणारा नव्हे. "तू गोरा का काळा, तुझे कोकणी उच्चार घाटी लोकांसारखे गचाळ" असल्या चिडवाचिडवीला हसतखेळत कसे सामोरे जायचे, तरीही मित्रत्व कसे ठेवायचे, त्याचे प्रशिक्षण शाळेतच प्राप्त होते. खरे उद्दिष्ट्य दोलायमान समर्थकांना आभार पोचवणे खरे तर येथे आनंदयात्री यांनी थोडक्यात मर्म जाणले, की हा लेख डिवचले जाण्याबद्दल नाही, मात्र काही प्रमाणात पूर्णपणे न पटूनही पुरोगामित्व दाखवणाऱ्यांबाबत आहे. त्यांना हे वागणे स्युडो वाटते. मला मात्र हे वागणे समाजाच्या बदलातील केवळ एक टप्पा वाटतो. माझ्या लहानपणी ज्या ठिकाणी आम्ही राहात होतो, तिथे आमच्या पोटजातीतील आम्ही एकमेव कुटुंब होतो. शेजाऱ्यापाजाऱ्यांशी आम्हा मुलांनी उगाच वेडेवाकडे बोलू नये, म्हणा, किंवा शाळेतील शिकवणीशी उगाच का भांडावे म्हणा... आमच्या घरात "जात" या विषयावर आम्ही मुलांनी फारसे काही ऐकले नाही. पुढे चुलत-मामेभावंडांची लग्ने होऊ लागली तशी घरच्यांच्या बोलण्यात अधूनमधून क्वचित आंतरजातीय विवाहांविरुद्ध काही ऐकू आले. कोणी अगदी काटेकोर फुटपट्टी नेईल, तो म्हणेल की आमच्या कुटुंबातले वडीलधारे लोक खोटार्डे होते. मी म्हणेन की त्यांचा खोटेपणा अत्यंत क्षम्य स्वरूपाचा होता, कारण त्यांच्या (थोड्याशा) सोंगामुळे पुढच्या पिढीपर्यंत आदला कट्टरपणा पोचला नाही. लेखातील मानव्य मूल्य खरेच जरुरीचे आहे का? विकास आणि विसुनाना यांनी लेखातील मुद्द्याला सीमा असावी, असा विचार पुढे नेलेला आहे. विकास आपला अनुभव सांगतात :
पण मग कोणी गोरा अमेरिकन माझ्याशी मी केवळ एक (इथला) अल्पसंख्य आहे, दुसर्‍या वंशाचा आहे म्हणून स्पेशल ट्रीटमेंट देत जास्तच मैत्रीपूर्ण वागला/वागली तर मला ते आवडत/णार नाही.
अंततोगत्वा ही भावना माझीही आहे. परंतु शारिरिक इजा न होता आत्मसन्मानाची भावना जोपासणे शक्य आहे अशा ठिकाणी मी राहातो. आज भारतात मला ते शक्य आहे का? बरेच पैसे असले तर होय, शक्य आहे. पण याला धनदांडगेपणा म्हणावा. अजून दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे. सर्वोच्च न्यायालयाचा जो काय निर्णय असेल तो लोकसभा उलथवू शकते. हा कायदा कुठे वापरला जातो? ज्यांच्याकडे अगदी थोडासुद्धा पैसा आहे त्यांना धाक दाखवून पैसे उपटण्यासाठी. नाहीतर अटक करून शिपायांकडून बलात्कार करून मग सोडून देण्याकरिता. (कोर्टापर्यंत ही प्रकरणे जातच नाहीत.) मी त्या परिस्थितीत असतो तर? कधी बलात्कार होत असताना कोणी "दिखाऊ दयावानाने" मला सोडवले, तर त्या दयेला ठोकरून आत्मसन्मानाचा उदो-उदो करण्याइतपत मी मूर्ख नाही. "कैवारी" हा एक चांगला शब्द म्हणून आंबेडकरांनी दोन वेगवेगळ्या वेळेला वापरलेला मी हल्लीच वाचला आहे. एक त्यांनी वापरला राजारामशास्त्री भागवतांबाबत, आणि एक त्यांनी वापरला ज्योतिबा फुल्यांबाबत. पैकी राजारामशास्त्री भागवत फार-फारतर पोटजातींमध्ये लग्ने व्हावीत इतपतच म्हणणारे सुधारणावादी होते. स्वत:हून त्यांचे लग्न पोटजातीच्या आतच झाले होते. त्यामुळे त्यांना "स्यूडो" म्हणावे का? केसरी वर्तमानपत्राने त्यांची निर्भर्त्सना केली, तेही आहेच. पण तरीही "कैवारी" म्हणून भागवत-शास्त्रीबोवांचा आधार घेण्यालायक होताच. समाजाच्या प्रवाहाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये कधी कैवाराचे मनापासून आभार मानावेत, आणि कधी आत्मसन्मानासाठी कैवाराचा अव्हेर करावा त्याबद्दल तारतम्य असावे लागते. अगदी अमेरिकेतही वेगळ्या प्रकारचा डबघाईचा प्रसंग येऊ शकतो. आता सांगतो ही परिस्थिती सुदैवाने माझ्यावर आलेली नाही, पण माझ्या ओळखीतील व्यक्तीवर आलेली आहे. (माझ्या ओळखीतल्या विश्वासातल्या मिपाकरांना हवे तर नाव देईन.) अतिशय तडकाफडकी इस्पितळात भरती झाल्यानंतर या मित्राच्या जोडीदाराला त्याच्या बाजूला जाता आले नाही. अशी परिस्थिती माझ्यावर आली तर काय? कोणाच्या अगदी खोट्यानाट्या दिखाऊ दयेने जर मला वेळ निभावता आली तर तशा दयेला मी मुळीच ठोकरणार नाही. विकास ज्या अत्युच्च ठिकाणी (म्हणजे कैवार नसावा, सहानभूती नसावी तर पूर्ण एका व्यक्तीचा दुसर्‍या व्यक्तीशी बुद्धीवादाने संवाद अथवा विरंगुळा असेल) आहेत, तिथे सर्व असावेत तो सुदिन लवकर येवो. पण ते आहेत तिथे सर्वांनी आताच असावे असा मी हट्ट करणार नाही. लोकलज्जेसाठी लटकेच चांगले वागणाऱ्यांना मी दोष मुळीच देणार नाही. (पण फक्त बोलायला नको - लज्जेने चांगले वागायला पाहिजे, हे आलेच.) आजच्या पुढे दोन पिढ्यांनंतर तशा लोकांना दोष देणे योग्य का असेना. आज लाजूनही जे लोक चांगले वागतात, त्यांची प्रशंसाच करणे मला योग्य वाटते. कारण इथे एकीकडे लाज आणि एकीकडे टिंगल अशा डळमळीत स्थितीत ते मागेपुढे का करेनात, पुढच्या पिढीला बदलू देत असतात. या प्रकारे त्यांचा कार्यभाग फार मोठा असतो. नैसर्गिक न्यायामुळे कोणाची कड घ्यावी का? विजुभाऊ नैसर्गिक न्यायाचा दाखला देतात की ब्रह्मचर्य हेच पुष्कळदा ढोंगी असते, त्यापेक्षा नैसर्गिक ओढ ही मोकळी असू द्यावी. त्यांच्या म्हणण्यात पुष्कळ तथ्य आहे. पण त्या संदर्भात विसुनाना न्याय्य-अन्याय्यतेबाबत बिंदुगामी चर्चा करतात. त्यांचा दाखला अत्यंत विचारणीय आहे. ते म्हणतात की काही लोक बहुपत्नीत्व नैसर्गिक आहे, असे म्हणू शकतील. तरी या बाबतीत त्यांना न्याय्यतेमुळे नैसर्गिकाच्या विरोधात जावेसे वाटते. त्यांचे किंचितही खंडन करण्यापूर्वी त्यांचे आभार मानणे योग्य आहे. माझ्याशी झालेल्या पत्रव्यवहारातून त्यांना असे जाणवले आहे, की माझी बाजू न्याय्य आहे. हा चौकसपणा आणि नवीन विचार मनात तोलण्याची तयारी खरी प्रगल्भता दाखवते. त्या प्रगल्भतेचा फायदा घेऊन मी दोन मुद्द्यांबद्दल येथे बोलणार आहे - एक तर ते म्हणतात
"एखाद्या एकाकी व्यक्तीवर सामुहिक हल्ला होत असेल तर तिचे हिरीरीने संरक्षण करणे हे मानव्य मूल्य आहे हे मला मान्य आहे. पण त्या अगोदर त्या व्यक्तीची बाजू न्याय्य आहे हे मला पटले पाहिजे."
अशा गोष्टी पटवण्यासाठी कधीकधी पुष्कळ प्रशिक्षण लागते, भरपूर माहिती हाताशी लागते, आणि ती संकलित करण्यासाठी वेळ (म्हणजेच वेळ देणारा अधिक पगाराचा व्यवसाय) आवश्यक होतो. मला असे वाटते, की स्खलनशील, अशिक्षित व्यक्तीही मानव्य विचारणेसाठी मानव म्हणून परिपूर्ण असते. अनेक देशांत (म्हणजे भारतातही) कायद्यांच्या मूलभूत नैतिकतेत दंड करणार्‍याला गुन्हा सिद्ध करावा लागतो. दंड भोगणार्‍यावर आपण न्याय्य असल्याचे सिद्ध करायचा भार नसतो. हा विचार अगदीच तर्कट नाही. सीतेला अग्निदिव्य करावे लागले हे ठीक नाही, असे कित्येक लोक हळहळतात ते याच विचारामुळे - आरोप करणार्‍या धोब्याला, किंवा शासन करणार्‍या रामाला तिचा गुन्हा सिद्ध करायला हवा होता, असा भाव कित्येक लोकांत दिसतो. त्याच प्रकारे माझे म्हणणे आहे - आणि भारतील कायद्याचेही मूलभूत तत्त्वज्ञान आहे. आता याचेच पुढचे विवेचन म्हणून मी बहुपत्नीत्वाचा मुद्दा चर्चेत घेणार आहे. येथे मी सांगणार आहे, की हा दाखला विसुनानांच्या म्हणण्याच्या पूर्णपणे विपरित आहे. बहुपत्नीत्व हेच कायद्याने पूर्वी ग्राह्य होते - ते बदलण्यासाठी कारण होते स्त्रियांना वाटणारा जाच. हा जाच पुरावे देऊन गार्‍हाणी मांडून स्त्रियांना तपशीलवार सिद्ध करावा लागला नाही. तो घटनात्मक सैद्धांतिक कारणांसाठी मान्य केला गेला. (येथे नैसर्गिक-अनैसर्गिक याचा प्रश्न नाही. कोणावर अन्याय होत असला तर अस्तित्वातल्या कायद्याला बदलावे, उगाच "तुमचे न्याय्य आहे हे सिद्ध करा" हा हट्ट धरू नये, याबद्दल आहे.) २२-९-१९५१ च्या जनता मासिकातला हा उतारा आहे - हा युक्तिवाद संसदेत कायदेमंत्री श्री. आंबेडकर यांनी केला होता -
हिंदूंची पवित्र विवाहपद्धती म्हणजे पुरुषाला बहुपत्नीत्वाचा अधिकार आणि स्त्रीची कायम गुलामगिरी. अर्थशास्त्रामध्ये गुलामी आणि स्वायत्त श्रमाची संस्था यात जो फरक आहे तोच यात आहे. स्वायत्त श्रमाच्या कल्पनेत नोकरीचा करार अवश्य वाटेल तेव्हा मोडण्याची मुभा असते. या बिलात घटस्फोटाच्या ज्या अटी आहेत, त्या कमी करण्याची नवी योजना कोणाही सभासदाने मांडली तर मी त्याचा विचार करण्यास सिद्ध आहे. तुम्हाला स्त्रियांना भारतीय घटनेत दिलेले स्वातंत्र्य द्यावयाचे असेल तर ही सोय ठेवलीच पाहिजे. नाहीतर घटनाच चालू ठेवणे योग्य ठरणार नाही. हे बील भारताच्या प्राचीन ध्येयवादावरही नाही किंवा पाश्चात्त्यांचेही अनुकरण नाही. या घटनेच्या प्रास्ताविक भागातच स्वातंत्र्य समता व बंधुत्व या कल्पना आहेत. आणि त्या निकषांवर या देशात असलेली प्रत्येक सामाजिक संस्था तपासून बघितली पाहिजे.
यातील शेवटल्या वाक्याला मी अधोरेखित केलेले आहे. कुठल्याही अशिक्षित, गांजलेल्या, सवतीने आपल्या दुखण्याची न्याय्यता सिद्ध करायची नाही आहे. सुशिक्षित मंत्री किंवा उच्चपदस्थ खासदारांवर ती जबाबदारी पडते. कायदेमंत्री आंबेडकर हे पुरुष होते, सवतपिडा झालेली स्त्री नव्हते. पुढे असे दिसते, की या बिलाला संमती कित्येक विधायकांनी लोकलज्जेने दिली - लोकसभेतले काही खासदार दृढ तार्किक विचार करणारे नसतातही. पण ते विधेयक पास होण्यासाठी हिरिरीने पुढे होणारा एक व्यक्ती आणि लज्जेने त्याला मान्यता देणारे काही स्यूडो लोक आवश्यक होते. त्या खासदारांची निर्भर्त्सना करणे मला मुळीच प्रशस्त वाटत नाही. अर्धवट पटलेल्या डळमळीत अवस्थेत त्यांनी नव्या कायदेव्यवस्थेला मान्यता दिली याबद्दल त्यांचे अभिनंदनच करणे योग्य आहे. त्यांच्या अर्ध्यामुर्ध्या धाडसामुळे पुढील पिढ्यांना स्त्री-समानतेची न्याय्यता इतकी नीट कळली की विसुनानांना हा दाखला चुकून उलट अर्थाने दिला. बहुपत्नीत्वाचा मुद्दा खरा तर असा - कायदा बहुपत्नीत्व चालवून घेत होता, काही स्त्रियांवर लादत होता. ज्या बायकांना त्याचा जाच होत होता, त्यांच्यापैकी बहुसंख्य बायका वादविवाद घालू शकत नव्हत्या. त्यांच्या बाजूने ("न्याय-अन्याय सिद्ध करा" असे न म्हणता) भारताचा (पुरुष) कायदेमंत्री बोलला. काही अर्धवट पटलेल्या खासदारांनी अर्धवट-ढोंगाने स्त्रियांना दिलासा दिला. पण जे झाले ते उत्तम झाले. - - - - पुन्हा लेखा-प्रतिसादाचा सारांश देत आहे. १. येथे मला वैयक्तिक जखम झालेली नाही. प्राथमिक शाळेतल्यापासून गंमत-टक्के-टोणपे खेळवण्यास मी समर्थ आहे. मी जिथे आहे तिथे रोजव्यवहारात सुस्थितीत आहे. मिसळपावावर स्वत:च्या आनंदासाठी येत आहे. २. पण अजून भारतात मला माझ्या बाजूने कायद्यासाठी झगडणार्‍या मित्रांची आवश्यकता आहे. ही निकड फार मोठी आहे. कारण एका दिल्ली उच्च न्यायालयाचा तकलादू निकाल हा लोकसभेच्या निकालाइतका स्थायी नाही. फार तर काही थोड्या लोकांना मी वैयक्तिक पटवू शकेन. काही सहृदय लोकांनी हे जाणावे की कित्येक अशिक्षित, दरिद्री लोकांना पटवा-पटवी करता येणार नाही. मग त्यांनी स्वत:हून त्यांची बाजू घेतली पाहिजे. घटनेच्या प्रास्ताविक भागातल्या स्वातंत्र्य समता व बंधुत्व या निकषांवर (शिवाय अन्य मूलभूत तत्त्वांवर) या देशात असलेली प्रत्येक सामाजिक संस्था तपासून बघितली पाहिजे. याचा भार भरडल्या जाणार्‍या व्यक्तीवर नसून कुठल्यातरी न-भरडल्या जाणार्‍या बोलक्या व्यक्तीनेसुद्धा हिरिरीने घ्यावा. ३. जर कोणी अर्धवट पटले असेल, आणि लोकलज्जेसाठी पुढे सरत असेल, तेसुद्धा समाजाच्या बदलातला एक टप्पा आहेत. त्यांचीसुद्धा प्रशंसाच मी करतो आहे. २ व ३. या व्यक्तींना टोमणे सहन करायची सवय नसेल. त्यांना एकजात ढोंगी म्हटले जाईल, आणि तो आरोप क्रमांक-३च्या बाबतीत काही थोड्या प्रमाणात खराही असेल. पण लोकलज्जेने चांगले केले तरी ते चांगलेच असते - त्यांना माझे आभार प्रामाणिकपणे देतो. आणि जे भारावून काम करतात, त्यांना माझ्या आभाराची अपेक्षा नाही. तरी आभार देतो. ४. कोणाची कीवयुक्त मदत झिडकारण्याची वेळ माझ्या पिढीत, भारतात तरी, आलेली नाही. आधी जीव वाचू देत मग स्वाभिमानाच्या पन्नास पगड्या विकत घेऊ. (अमेरिकेत मात्र आता स्वाभिमानाच्या पन्नास पगड्या विकत घ्यायची वेळ आलेली आहे - इथे काही गोष्टी कीव म्हणून स्वीकारणार नाही, हक्क म्हणून झगडेन.)

लिखाळ 10/07/2009 - 15:50
धनंजय, चर्चेचा परामर्श फार चांगला आणि सकारात्मक घेतला आहे. त्यातले ''याचा भार भरडल्या जाणार्‍या व्यक्तीवर नसून कुठल्यातरी न-भरडल्या जाणार्‍या बोलक्या व्यक्तीनेसुद्धा हिरिरीने घ्यावा.'' हे वाक्य नक्कीच पटले. खरेतर आंबेडकरांचे जे उदाहरण दिले आहे आणि जे मत मी उधृत केले आहे त्याच सारखे रामशास्त्रींचे एक उदाहरण मी 'पुरोगामित्वाच्या' चर्चेमध्ये लिहिले आहे. ज्यांना इतर परिस्थितीतल्या लोकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करता येतो आणि जे बोलू शकतात त्यांनी त्या भरडल्या जाणार्‍यांची बाजू मांडावीच. आजवर आपल्या माहितीमध्ये असलेले अनेकानेक समाजसेवक याच तर्‍हेचे आहेत असे मला वाटते. बहुपत्नित्वाच्या निर्णयाबद्दल दिलेली माहिती आणि त्यावरून केलेले मतप्रदशन आवडले. समलिंगी व्यक्तींच्या हक्कांबाबत मी जेव्हापासून वाचतो आहे तेव्हापासून प्रत्येक लेखामध्ये उभयलिंगी आकर्षण असलेल्या व्यक्तींबद्दल सुद्धा लिहिलेले आढळते आहे. या परिस्थितीमध्ये जर पुढे उभयलिंगी आकर्षण असलेल्या व्यक्तीने आमचा तो नैसर्गिक अधिकार आहे आणि आम्हा तिघांना 'त्रिकूट' बनवून राहण्याचा अधिकार असावा असे मागणे मांडले तर मला नवल वाटणार नाही. त्यातून पुन्हा नवे प्रश्न सामोरे येतील आणि नैसर्गिक म्हणजे काय? जे जे नैसर्गिक ते ते सर्व किती पातळीपर्यंत चालवू द्यावे? या तर्‍हेच्या चर्चा होत राहतील. पण हे विचारमंथन चांगलेच आहे. कारण या तर्‍हेच्या मंथनातून तत्कालिक प्रश्नावरच फक्त तोडगा निघतो असे नसून इतरही पुढे निर्माण होणार्‍या प्रश्नांवर विचार करण्यासाठी भूमिका तयार होते आणि विचार करण्याची क्षमता तयार होत असते असे वाटते. क्लोन करणे योग्य की नाही? या तर्‍हेच्या प्रश्नांवर झालेल्या नीति-अनीतिच्या चर्चा आणि या चर्चा, मूलतः समाजमन घडवणार्‍याच असतात असे मला वाटते. -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

In reply to by लिखाळ

या तर्‍हेच्या चर्चा होत राहतील. पण हे विचारमंथन चांगलेच आहे. कारण या तर्‍हेच्या मंथनातून तत्कालिक प्रश्नावरच फक्त तोडगा निघतो असे नसून इतरही पुढे निर्माण होणार्‍या प्रश्नांवर विचार करण्यासाठी भूमिका तयार होते आणि विचार करण्याची क्षमता तयार होत असते असे वाटते.
सहमत आहे. आज या चर्चेत ज्यांनी प्रतिसाद दिले त्यांनी दहा वर्षांनंतर मागेवळून पहाताना..... असा विचार केला तर त्यावेळी ते मनोरंजक असेल प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विसुनाना 10/07/2009 - 19:46
उत्तमच आहे. म्हणजेच विचार करायला लावणारा आहे.
व्यक्तीची बाजू न्याय्य आहे हे मला पटले पाहिजे.
या माझ्या वाक्यावर धनंजय यांचे विवेचन उत्कृष्ट आहे. न्याय्य बाजू मला कुणी पटवून देण्याची जशी गरज नाही (-म्हणजे माझ्या मताला महत्त्व देण्यासारखी व्यक्ती मी नाही किंवा मी काही त्या व्यक्तीला आरोपीच्या पिंजर्‍यात उभेही करत नाही-) तसेच ती न्याय्य आहे हे माझ्या परीने (माझ्या पायरीने, माझ्यापुरते) तपासून घेण्याला काहीच प्रत्यवाय नसावा.
त्यांच्या अर्ध्यामुर्ध्या धाडसामुळे पुढील पिढ्यांना स्त्री-समानतेची न्याय्यता इतकी नीट कळली की विसुनानांना हा दाखला चुकून उलट अर्थाने दिला.
येथे मी दिलेले उदाहरण अर्धवट होते ही चूक मी मान्य करतो. मूळ मुद्दा लैंगिक संबंधातील स्वातंत्र्याबद्दल होता. 'स्वैच्छिक बहुपतित्व' असेही रूप हा मुद्दा घेऊ शकतो. (बाबासाहेब आंबेडकरांचे बहुपत्नित्वाबद्दलचे विचार भारतीय संदर्भात योग्य आहेत. पण इतरत्र जी तथाकथित विचारधारा आहे ती कधीकाळी भारताकडे वळू शकते. विशेषतः ते शब्द - 'एकमेकांस अनुमोदन देणार्‍या प्रौढ आणि प्रगल्भ व्यक्ती' - तेच शब्द त्या विचारसरणीच्या पुरस्कर्त्यांनीही हेतुपुरस्सर वापरायला सुरुवात केली आहे.) लिखाळ यांनी परामर्शावर दिलेल्या प्रतिसादात काही शंका उपस्थित केल्या आहेत. अशा अनेक शंका माझ्याही आहेत. या विषयाबाबत माझ्यापुरतेही सर्वसमावेशक उत्तर माझ्याकडे नाही.
पुढे निर्माण होणार्‍या प्रश्नांवर विचार करण्यासाठी भूमिका तयार होते आणि विचार करण्याची क्षमता तयार होत असते असे वाटते.
हे लिखाळ यांचे मत पटते. म्हणूनच,
समलैगिकतेबाबत अजूनही अनेक मुद्दे माझ्यासाठी संदिग्ध आहेत. ते कुणा इतरेजनांच्या अनुभवांच्या वाचनातून कदाचित स्पष्ट होतील. असे झाल्यास सरसकट सर्वच समलैंगिकांची बाजू घ्यायची की तिला काही 'जर..तर' जोडायचे हे निश्चित करता येईल.
-हाच माझा सध्यापुरता पवित्रा आहे. हा (कायद्याने शिक्षा करण्यासारखा अथवा सामाजिक-नैतिक दृष्टीकोनातूनही) गुन्हा नाही पण या संबंधांना कायद्याने कोणत्या चौकटीत बसवायचे हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. असो. (अवांतर : 'लिव्ह-इन रिलेशनशिप' संबंधांना कायद्याच्या कोणत्या चौकटीत बसवावे या विषयावरही भारतात चर्चा सुरू आहे. या बाबतीत न्यायालयांचे निकाल पाहता बहुपत्नित्व मागील दाराने प्रवेश करत आहे काय? अशी शंका येते.)

नितिन थत्ते 10/07/2009 - 21:00
विसुनानांच्या प्रतिसादातील शेवटच्या मुद्द्याच्या अनुषंगाने पुन्हा थोडेसे. मुद्दा एक: असे संबंध चालवून घेणे हे समर्थनीय आहे का? न्यायालयाचा हा निर्णय फक्त शासकीय दंडव्यवस्थेला शिक्षा करण्यापासून प्रतिबंध इतकाच मर्यादित आहे. त्या संबंधांना उत्तेजन द्यायचे की दुर्लक्ष करायचे की त्या संबंधांची एक व्यवस्था लावायची हे न्यायालय ठरवणार नाहिये. सध्याच्या न्यायालयीन निर्णयाने फक्त गुन्ह्याचा शिक्का पुसलाय. तुम्ही या ठिकाणी 'हे' वाक्य लिहिलंय ना? मग 'हे दुसरे' वाक्य त्याच्याशी विसंगत आहे. असे न्यायालयाचे म्हणणे आहे. हे दुसरे वाक्य हवे'च' आहे का हे आता समाजाने ठरवायचे आहे. समाजाला जर दुसरे वाक्य हवेच आहे असे वाटत असेल तर पहिले वाक्य सुधारून/बदलून/अपवाद करून घेता येईल का हे समाजाला पहायला लागेल. आणि तेही घटनेच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता. मुद्दा दोन हे जेव्हा समाज ठरवायला बसेल तेव्हा विविध गटांत रस्सिखेच होईल. पुन्हा ही विभागणी अशी पक्क्या दोन तुकड्यांत असणार नाही. काही जण कुंपणावर असतील. त्या कुंपणावरच्यांनी लिबरल मताची (लिबरल मत दिल्याने विरोधकांकडून हेटाळणी होण्याची) भीती बाळगू नये असा धनंजय यांच्या धाग्याचा उद्देश आहे. पत्नीवर घरातली मंडळी जुलूम करीत असताना नवर्‍याने 'मी तिची बाजू घेतली तर घरातले लोक मला बाईलवेडा वगैरे म्हणतील' या भीतीने तिची बाजू घेण्यास कचरू नये. असा धनंजयचा मतितार्थ आहे. त्या नवर्‍याची त्यावेळची मनोधारणा लक्षात घेतली म्हणजे धनंजयची वेदना लक्षात येईल. दुसरे उदाहरण 'घरेलू हिंसाको रोको, बेल बजाओ' या कॅम्पेनचे घेता येईल. त्या कॅम्पेनमध्ये कोणत्या घरात हिंसा चालू असेल तर बेल वाजवा म्हणजे त्या दडपणाने हिंसा (त्यावेळी) थांबेल असा संदेश होता. विसूनाना म्हणतात तसे मारहाण चालू असेल तर 'मारहाणीचे कारण योग्य आहे की अयोग्य आहे याचा विचार आत्ता करत बसू नका. आधी बेल वाजवून मारहाण थांबवा' असा धनंजय यांचा संदेश आहे. धनंजयनी जरी समलैंगिकता या निमित्ताने हे विचार मांडले असले तरी ते बर्‍याच सामाजिक प्रश्नांमध्ये लागू आहेत. एखादी गोष्ट योग्य की अयोग्य हे ठरवणे बर्‍याचदा अवघड असते हे खरेच. बर्‍याचदा अनेक गैरसमज आपल्या मनात असतात. आजच्या लोकप्रभा मध्ये हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात समलैंगिक आणि यूनक (हिजडे) हे एकच समजून लेख लिहिलेला आहे. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)

स्वाती२ 11/07/2009 - 00:24
>>याचा भार भरडल्या जाणार्‍या व्यक्तीवर नसून कुठल्यातरी न-भरडल्या जाणार्‍या बोलक्या व्यक्तीनेसुद्धा हिरिरीने घ्यावा हे अगदी पटले. पण बरेचदा असे करायचे मनात असूनही धीर होत नाही. ३-४ महीन्यांपूर्वी असेच एकांकडे जमलो होतो. नेहमी प्रमाणे चर्चा मुलांवर आली आणि एक बाई म्हणाल्या 'मी मुलांना सांगितलय काहीही व्हा फक्त गे होऊ नका." मी पटकन DH कडे बघीतले. त्याच्या डोळ्यात 'please don't'. त्या बाईंचे म्हणणे खोडून काढावे असे मनात असूनही उगाच लोकांकडे तमाशा नको म्हणून काहीच बोलले नाही. निरोप घेऊन गाडीत बसलो आणि नवरा म्हणाला 'thanks'. तो खिन्न thanks एखाद्या थपडेसारखा लागला. त्याचे दोघे मित्र गे आहेत. पण त्या दिवशी त्यांच्याबाजूने भांडायचा धीर झाला नाही.

प्रिय धनंजय, एखाद्याने आपले खासगी आयुष्य कसे जगावे (एखाद्याने कुठली भाजी खावी पासून त्याचे सेक्शुअल ओरिएंटेशन काय असावे पर्यंत सर्वकाही) हे सांगण्याचा अधिकार इतरांना नाही. त्यामुळे हायकोर्टाने दिलेला निकाल स्वागतार्हच आहे. अनेकदा चिरफाड होत नसतानाही, काही छाकटे मी किती पुरोगामी आहे दाखवण्यासांठी इतरांच्या विवंचना, दुःखे चघळत असतात. ही त्यांची स्वतःची कहाणी नसते. पण ही मंडळी इतरांना पेट्रनाइझ (मराठीत काय म्हणतात पेट्रनाइझ करण्याला?)करत, पोकळ सहानुभूती दाखवत इकडे-तिकडे फिरत असतात. असे अनेक छाकटे एकत्र येतात आणि मग पुरोगामीपणाची चढाओढ सुरू होती. ( अशी चढाओढ चांगली आहे की वाईट हा वेगळा मुद्दा. तुम्ही म्हणता तसे अशी चढाओढ चांगलीच. कारण यातून बळ मिळते. ) पण संस्कृतीचा ऱ्हास होतो अशी बोंब मारणाऱ्यासारखीच अशा दिखाऊ पुरोगाम्यांची मला तरी खिल्ली उडवावीशी वाटते. ह्या लोकांमुळे पुरोगामीपणाची बदनामी होते, असे माझे स्पष्ट मत आहे. बाकी माझा एखादा मित्र किंवा परिचित समलैंगिक आहे की विषमलैंगिक हे माझ्यासाठी अजिबात महत्त्वाचे नाही. समलैंगिक असणे हे विषमलैंगिक असण्याइतकेच माझ्यासाठी नॉर्मल किंवा ऍबनॉर्मल आहे. थोडक्यात, एखाद्या विषमलैंगिकाची जशी टिंगलटवाळी करतो तशीच समलैंगिकांची टिंगलटवाळी केल्यास कुणी आरडाओरडा करायला नको, असे मला वाटते.
जुन्या काळापासून भारतात अम्रदपसंदी किंवा लौंडेबाजी ही अतिशय आम.
अम्रदपसंदी किंवा लौंडेबाजी हे शब्द तसे बोचणारे आहेत हे मी मान्य करतो. चैनीसाठी एखादा अशी गोष्ट करत असावा असे वाटू शकते. ह्या दोन शब्दांऐवजी समलैंगिकता हा एकच शब्द ठेवायला हवा होता. असो. ह्या शब्दांमुळे, किंवा एकंदरच त्या प्रतिसादामुळे, तुम्ही दुखावले असल्यास मी तुमची माफी मागतो. चित्तरंजन

In reply to by चित्तरंजन भट

धनंजय 14/07/2009 - 05:55
अन्यत्र सुरू झालेला संवाद येथे पुढे चालू ठेवल्याबद्दल धन्यवाद. माझ्या भावनांची तुम्ही कदर केली, सद्भावना पोचल्या. बहुतेक दु:खे ही स्वतःची नसतात. 'सह'अनुभूती शब्दातच अन्यासह अनुभूती सामावली आहे. स्वतःच्या कहाणीतली विवंचना सांगण्याला आपण "गार्‍हाणे" किंवा असे काही म्हणू. शब्दाचा कीस काढण्याचा उद्देश - हा विचार असंदर्भ आहे.
अनेकदा चिरफाड होत नसतानाही, काही छाकटे मी किती पुरोगामी आहे दाखवण्यासांठी इतरांच्या विवंचना, दुःखे चघळत असतात.
"चीरफाड होत नसतानाही" या परिस्थितीचा त्या चर्चेशी संबंध काय होता? तिथे तर चीरफाड होत होती.
अशी चढाओढ चांगली आहे की वाईट हा वेगळा मुद्दा. तुम्ही म्हणता तसे अशी चढाओढ चांगलीच... (आत्मगौरवात्मक कीव - पेट्रनाइझ करणार्‍या) ह्या लोकांमुळे पुरोगामीपणाची बदनामी होते, असे माझे स्पष्ट मत आहे.
कीव आत्मगौरवात्मक आहे की नाही यासाठी तुम्ही काय निकष वापरता? अमुक चार छाकट्यांनी (१) केवळ पुरोगामीपणा दाखवण्यासाठी केलेली आणि (२) पोकळ अशी, ही सहानुभूती आहे; आणि चार मुनुष्यांनी (१) याबद्दल विचार करून (२) खरी अशी साहानुभूती दाखवली आहे, यातला फरक तुम्हाला कसा कळतो? खिल्ली उडवण्यासाठी कोण अप्रामाणिक आहे, त्याच्या अप्रामाणिकपणावर बोट ठेवून खिल्ली उडवलेली ठीकच. त्या चर्चेत भाग घेतलेले काही "पुरोगामी" लोक मला ओळखतात. मीसुद्धा त्यांना ओळखतो. त्यांनी घेतलेला पवित्रा पटून घेतला आहे, भंपक नाही, हे मला माहीत आहे. जे माझ्या ओळखीचे नाहीत त्यांचे मला माहीत नाही. पण ते अप्रामाणिक आहेत हे तुम्हालातरी कसे ठाऊक? आणि थोडासा अपूर्ण विचार करून लोकलज्जेखातर थोडीशी सहानुभूती दाखवणारे लोकही पुरोगामित्वाची बदनामी करतात काय?
थोडक्यात, एखाद्या विषमलैंगिकाची जशी टिंगलटवाळी करतो तशीच समलैंगिकांची टिंगलटवाळी केल्यास कुणी आरडाओरडा करायला नको, असे मला वाटते.
या विचाराशी मी सहमत आहे. पण याचा संदर्भ काय? त्या चर्चेमध्ये जी टवाळी आहे ती जशी विषमलैंगिकाची असावी तशीच आहे काय? त्या चर्चेतील बहुतेक वाक्यांमधे मी "समलैंगिक" शब्दाच्या जागी "विषमलैंगिक" शब्द घालून बघितला. उदाहरणार्थ तिथला पहिला प्रतिसाद उलटवून बघूया :
विषमलैगिंकता ही एक विकृतीच आहे. ह्या मंडळींचा मला खूप किळस येतो. दादर (वा अन्य कोणत्याही) पश्चिम च्या रेल्वे फलाटावर जायलाही मी घाबरतो. तिथं सर्वत्र ही विकृत माणसं गाडीची वाट बघत असल्याचे सोंग करीत इकडे-तिकडे विचीत्र नजरेने पाहत असतात. पहीलं म्हणजे रेल्वेच्या फलाटावरच्या घाणीमुळे ही उभं राहणं शक्य होत नाही. तिथं ही मंडळी जोडीदार शोधत असतात. रेल्वेच्या डब्यात ही जनावरे नको तिथं चोरटा स्पर्श करू पाहतात. त्यांचा खूप राग येतो पण रागवता येत नाही. स्वतःच घाबरून दूर व्हावं लागतं. माझ्या मते ह्या मंडळींवर शाररीक, मानसिक व आध्यात्मिक उपचार केले जायला हवेत.
आता पुढचा प्रतिसाद उलटवून -
जर हे विषमलैंगिक अनैसर्गीक तर मग असे प्राणी हे इतर प्राणी वर्गाच्या खालच्या पातळीचे की वरच्या? हे रुग्ण की निरोगी? अशा प्राण्यांसाठी गाजर की छडी?
तुम्ही अशी विषमलैंगिकांबद्दल टवाळी ऐकली आहे म्हणता? अशी टवाळी जर सामान्य असेल तर त्याविषयी आरडाओरड करू नये हे मान्य. पण मी तरी कधी नाही ऐकली. त्यामुळे माझ्या मित्रांनी याबबत आरडाओरड केली ते मला क्रमप्राप्त वाटले.

In reply to by धनंजय

कीव आत्मगौरवात्मक आहे की नाही यासाठी तुम्ही काय निकष वापरता? अमुक चार छाकट्यांनी (१) केवळ पुरोगामीपणा दाखवण्यासाठी केलेली आणि (२) पोकळ अशी, ही सहानुभूती आहे; आणि चार मुनुष्यांनी (१) याबद्दल विचार करून (२) खरी अशी साहानुभूती दाखवली आहे, यातला फरक तुम्हाला कसा कळतो?
"आय नो वन व्हेन आय सी वन" एवढेच म्हणू शकेन. एखाद्याचा पूर्वेतिहास (आधीचे प्रतिसाद व विरोधाभास) अभ्यासल्यास काही निष्कर्ष काढता येतात, असे मला वाटते. आणि हे निष्कर्ष माझ्यापुरते आहेत. मी ते इतरांवर लादलेले नाहीत.
अनेकदा चिरफाड होत नसतानाही, काही छाकटे मी किती पुरोगामी आहे दाखवण्यासांठी इतरांच्या विवंचना, दुःखे चघळत असतात.
"चीरफाड होत नसतानाही" या परिस्थितीचा त्या चर्चेशी संबंध काय होता? तिथे तर चीरफाड होत होती.
माझा प्रतिसाद केवळ त्या प्रतिसादापुरता आणि समलैंगिकतेच्या मुद्द्यापुरता मर्यादित नाही. बाय द वे, चिरफाड होत असताना तर काही बहरात येणारे "पुरोगामी"ही छाकटे असतात. विरोधकांप्रमाणेच त्यांनाही त्यांचे ऱ्हेटरिक पाजळण्याची चांगली संधी मिळते. (पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हे वाईट नाही. २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर जो "कँडललाइट पुरोगामीपणा" झाला होता तो वाईट नव्हताच. त्यातले अनेक जण प्रामाणिक होते. नंतर झालेल्या निवडणुकीत मात्र मतदानाच्या वेळी ही मंडळी कुठे गायब झाली होती? )
थोडक्यात, एखाद्या विषमलैंगिकाची जशी टिंगलटवाळी करतो तशीच समलैंगिकांची टिंगलटवाळी केल्यास कुणी आरडाओरडा करायला नको, असे मला वाटते.
ह्याचा अर्थ असा की जेवढी मोकळीक विषमलैंगिकांची मस्करी करताना असते तेवढीच समलैंगिकांसाठी गृहीत धरावी. त्या चर्चेवरील ते होमोफोबिक प्रतिसाद माझ्यामते दखल घेण्याच्या लायकीचेही नाहीत. अशा प्रतिसादांची दखल घेऊन उगाच तेच ते जुने युक्तिवाद, ऱ्हेटरिक परजण्यासाठी मला वेळ व रुची नाही, नव्हती. आणि तुम्ही ज्या प्रतिसादांना टवाळी म्हणताहात ती टवाळी नाही. तो होमोफोबिया असू शकतो किंवा हिडीसपणा. बाय द वे, तुम्ही जसे प्रतिसाद उलटवले तसे प्रतिसाद उलटवण्याची आयड्या छान आहे. तूर्तास एवढेच.

नीधप 14/07/2009 - 10:17
तुमचे प्रांजळ लिखाण आवडले. पुरोगामी असण्यापेक्षा माणूस असणं हे खरं आहे. बाकी सगळी लेबल्स. असं मला वाटतं. - नी

नंदन 08/07/2009 - 03:19
लेखात मांडलेल्या विचारांशी सहमत आहे. मुळात सतीची चाल बंद करणे, स्त्रियांना मतदाराचे अधिकार देणे इ. सुधारणांना झालेल्या विरोधातील मुद्दे आणि आता घेतले जाणारे आक्षेप यांत कमालीचे साम्य आहे. (संस्कृती बुडणे, समाजव्यवस्थेचा र्‍हास होणे, स्वैराचाराला प्रोत्साहन मिळणे, विवाहसंस्था धोक्यात येणे, आंग्लाळलेल्या समाजाची किंवा मूठभर श्रीमंतांची ढोंगी पुरोगामित्वाची कल्पना इ.) एकंदरीत उठलेल्या गदारोळावरून 'when they came for me, there was no one left to speak out' ची आठवण येते.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

Nile 08/07/2009 - 04:24
आजकाल मिसळपावावरच्या काही प्रतिसादकर्त्यांच्या सह्या लोकप्रिय झाल्या आहेत त्यांत "समलैंगिकतेचे उदात्तीकरण" करणार्‍यांना व्यंग्यात्मक शैलीत ढोंगी म्हणले जाते आहे. या हेटाळणीने माझ्या (आणि कोणाच्याही) कैवाराला आलेल्यांनी बुजू नये, ही विनंती. उगाच "आपण ढोंगी आहोत का?" या विचारांत गढून स्वतःला दोष देऊ नये. डझनावारी लोकांची सहज आणि स्वस्त चिडवाचिडवी एका पारड्यात, आणि माझे जगणे काही प्रमाणात सुसह्य केल्याचे जिवाएवढे मोठे आभार दुसर्‍या पारड्यात. सौदा घाट्याचा नाही हे आश्वासन मी तुम्हाला देतो.
हा हा! असल्या सह्यांमुळे लोक मत बदलत असतील तर अश्या लोकांच्या मताला काय अर्थ? अर्थात अश्या सह्या टाकणार्‍यांच्या वागण्याने मला तरी फक्त हसु येतं. असो चालायचंच! (;) )

मिसळभोक्ता 08/07/2009 - 03:27
पुरोगामित्वाची चढाओढ वाईट नाही, हे खरेच. पण इथे किंवा इतरत्र जे बोलताहेत/लिहिताहेत, ते पुरोगामी आहेत की पुरोगामित्वाचा बुरखा पांघरलेले (नुसते बोलणारे) दांभिक लोक आहेत, हे जोखायला हवे. जिथे विज्ञानसंमेलन भरवण्यासाठी साडेतीन मुहुर्तांपैकी एक शोधला जातो, तिथे असे बुरखेच अधिक सापडणार. -- मिसळभोक्ता (अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)

In reply to by मिसळभोक्ता

>>पण इथे किंवा इतरत्र जे बोलताहेत/लिहिताहेत, ते पुरोगामी आहेत की पुरोगामित्वाचा बुरखा पांघरलेले (नुसते बोलणारे) दांभिक लोक आहेत, हे जोखायला हवे. सर्किटशी पूर्णपणे सहमत! आण्णा चिंबोरी--> (पुराणमताभिमानी)

चतुरंग 08/07/2009 - 03:37
समाजरचनेमधे काही निराळे रंग असतात (पण ते समाजाचाच भाग असतात) त्या निराळ्या रंगात आपण असणे हे एकप्रकारे विलगीकरण घडते आधी मानसिक आणि मग शारीर पातळीवर. बहुसंख्येने असलेले वैशिष्ठ्य (गैर असले तरी) उदा. "पुरुष म्हणजे स्त्रियांना मारणारच, सगळीकडे असतेच, थोडे सहन करायचे" अशी मानसिकता गैर असली तरी बहुसंख्य म्हणून खपून जाते, खपवून घेतली जाते. विलगीकरणाचे बळी ठरलेले व्यक्तिमत्व हे अतिशय जाचक परिस्थितीतून जात असते. आपण वेगळे आहोत ह्या मानसिक कोंडमार्‍यातून आपल्या नैसर्गिक जाणिवांपर्यंत पोचणे, त्या समजून घेणे आणि मग त्याच्याशी प्रामाणिक रहाणे सोपे नाही. त्यापुढे जाऊन ज्या समाजाचा आपण भाग आहोत त्याच्याशी वैफल्याने नाळ न तोडता संबंध टिकवून ठेवणे तर अभिनंदनीयच म्हणायला हवे. समलैंगिकतेचे उदत्तीकरण करण्याचा प्रश्न इथे नसावा. उदात्तीकरण कुठल्यातरी भव्यदिव्य गोष्टीचे केले जाते. सर्वसामान्य स्त्री पुरुष संबंधांचे कोणी उदात्तीकरण करीत नाही तसेच ह्याचेही असू नये. हेही नैसर्गिकच आहे पण तुलनेने कमी आढळत असावे इतकेच. बाकी सह्यांबद्दल फारसे काही बोलण्यासारखे नाही! नदीच्या कोणत्या तीरावर तुम्ही आहात त्याप्रमाणे तुम्हाला दृष्य दिसणार. चतुरंग

In reply to by चतुरंग

अनामिक 08/07/2009 - 04:18
समलैंगिकतेचे उदत्तीकरण करण्याचा प्रश्न इथे नसावा. उदात्तीकरण कुठल्यातरी भव्यदिव्य गोष्टीचे केले जाते. सर्वसामान्य स्त्री पुरुष संबंधांचे कोणी उदात्तीकरण करीत नाही तसेच ह्याचेही असू नये. हेही नैसर्गिकच आहे पण तुलनेने कमी आढळत असावे इतकेच. अगदी हेच म्हणतो. -अनामिक

शलाका 08/07/2009 - 03:39
समलैंगिकतेचे उदात्तीकरण" करणार्‍यांना व्यंग्यात्मक शैलीत ढोंगी म्हणले जाते आहे. या हेटाळणीने माझ्या (आणि कोणाच्याही) कैवाराला आलेल्यांनी बुजू नये, ही विनंती. उगाच "आपण ढोंगी आहोत का?" या विचारांत गढून स्वतःला दोष देऊ नये.
असेच म्हणते. मिसळपाववर हे लोक कोण आहेत ते सगळ्यांना ठाउक आहे. इथेही आता उच्चभ्रु उच्चभ्रु करत यथेच्छ टवाळी करायला हे लोक येतीलच. बरं काही तक्रार असेल तर मुखपृष्ठावरच मालकांनी चपला घालुन बाहेर पडायला सांगीतले आहे. त्यामुळे ह्या सोशल न्युसन्स असणार्‍या प्रवृत्तींकडे दुर्लक्ष करावे आणि स्वत:ला दोष देऊ नये हे उत्तम.

In reply to by शलाका

विसोबा खेचर 08/07/2009 - 09:09
बरं काही तक्रार असेल तर मुखपृष्ठावरच मालकांनी चपला घालुन बाहेर पडायला सांगीतले आहे.
अहो ते इतक्या सिरियसली घेऊ नका हो! :) तो संदेश मिपाला उठसूठ, मुद्दामून नावे ठेवणार्‍यांकरता आहे! धन्यवाद, तात्या.

धनंजय यांचे सर्व मुद्दे आवडले. तुमच्या संयमितपणाला सलाम. >>अतिसामान्य तर्‍हेने एकनिष्ठ प्रेम, किंवा एकनिष्ठतेचे ध्येय असलेले अतिसामान्य स्खलनशील प्रेमही, असे काही करण्यास मला भारतात वाव नाही, म्हणून माझा जन्मदेश मला जाचक आहे. संस्क्रुतीच्या गप्पा मारणार्यांनी आणि पुरोगाम्यांना नावे ठेवणार्यांनी वरचा परिच्छेद वाचावा. पुरोगामी लोकांना हिणवले की मग माझे पुरूष्/स्त्री/भिन्नलिंगी/उच्च्वर्णिय्/श्रीमंत/विवाहित असणे म्हणजे काय, आणि त्यामुळे त्या कळपात जे नाहीत त्यांच्या मुलभूत हक्कांचे, त्यांच्या स्व्प्नांचे, प्रेरणांचे काय असे विचार करण्यातून सुटका होते. >>स्वाक्षर्‍यातून बौद्धिक दारिद्र्याचे प्रदर्शन मांडणार्‍या लोकांकडे पूर्ण दुर्लक्ष करावे. सहमत. अवांतरः माझी सही: ज्या दिवशी विवाहसंस्था कोसळेल त्या दिवशी मी ब्रेक-डान्स करेन.

वजीर 08/07/2009 - 05:28
धनंजयांचे मनोगत आवडले. काहीतरी बिनडोक स्वाक्षर्‍या करणारर्‍यांची कीव करावी आणि दुर्लक्ष करावे हेच उत्तम. कारण ह्यांच्याशी वाद घालायला गेल्यावर कपडे तुमचेच घाण होणार आहेत. --वजीर ------ डुकराशी चिखलात कधीही कुस्ती करु नये. तुमचे कपडे घाण होतातच डुकराला मात्र त्यात मजा मिळत असते.

नंदन 08/07/2009 - 06:33
ही चर्चा धनंजयांनी मांडलेल्या विचारांवरच असू द्यावी, असं मला वाटतं. स्वाक्षरीवरून किंवा वेगळ्या मतावरून वैयक्तिक ताशेरे कृपया ओढू नयेत, नाहीतर त्यामुळे चर्चेला जी अनावश्यक वळणे लागतात ती बहुतेक सर्वांना परिचित असावीत. मतस्वातंत्र्यासाठी भांडताना, तुमच्या विरोधी गटाच्या मताचा (भले मग ते तुमच्या दृष्टीने मत नसून पूर्वग्रह, हेकेखोरपणा इ. असो) आदर करणेही महत्त्वाचे. नाहीतर कट्टरपणाविरूद्ध झगडताना दुसर्‍या टोकाचा कट्टरपणाही येऊ शकतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

विकास 08/07/2009 - 08:17
धनंजयने केलेले मनोगत चांगलेच आहे. त्यातल्या त्याच्या भावना आणि त्यांचे संयमित प्रदर्शनपण पूर्णपणे समजू शकतो आणि त्यांच्याशी सहमतच आहे. >>अतिसामान्य तर्‍हेने एकनिष्ठ प्रेम, किंवा एकनिष्ठतेचे ध्येय असलेले अतिसामान्य स्खलनशील प्रेमही, असे काही करण्यास मला भारतात वाव नाही, म्हणून माझा जन्मदेश मला जाचक आहे. असे म्हणणे हे भारतातील कुठल्याही नात्याच्या (समलिंगी/भिन्नलिंगी) संबंधात वाटते की केवळ समलिंगीसंबंधात? नंदनने म्हणल्याप्रमाणे चर्चा ही त्या स्वाक्षर्‍यांवर अथवा वैयक्तिक होवू नये असे वाटते. इथे वैचारीक लिहीले, टिकात्मक लिहीले तरी कोणी वाचक स्वतःची मते बदलत नाही, तर स्वाक्षर्‍या वाचून बदलेल असे खरेच वाटते का? :) चतुरंगने "उदात्तीकरणाचा" प्रश्न आणला आहे आणि तो मात्र मला मान्य आहे. कुणाचेच (सम/भिन्न) उदात्तीकरणाचा प्रश्न उद्भवत नाही असे वाटते. त्याच संदर्भात असे वाटते की जर मी या संदर्भात समलिंगींच्या विरोधात बोललो नाही आणि समजून घेतले तर याचा अर्थ मी कैवार घेतो असा असतो का? कदाचीत नाही तर असेही असू शकते इतके वैज्ञानिक सत्य म्हणून मान्य करण्याचा कदाचीत दृष्टीकोन त्यात असेल. आता वैयक्तिक स्तरावर (म्हणजे येथे धनंजय संदर्भात): आधी मी एक थोडे वेगळे उदाहरण देतो. मी अमेरिकेतील स्वतःला खूपच लिबरल समजणार्‍या राज्यात मॅसेचुसेट्स मधे रहातो. सर्वांना समान वागवणे वगैरे.. पण मग कोणी गोरा अमेरिकन माझ्याशी मी केवळ एक (इथला) अल्पसंख्य आहे, दुसर्‍या वंशाचा आहे म्हणून स्पेशल ट्रीटमेंट देत जास्तच मैत्रीपूर्ण वागला/वागली तर मला ते आवडत/णार नाही. कारण त्यात "समान/इक्वल" वागणूक नसून फुकटची सहानभुती अर्थात स्वतःचा (त्यांचा) अहंकार सुखावण्याची (मी कसा/शी लिबरला आहे) धडपड असते असेच वाटेल. मला तसेच या संदर्भात वाटते. मी जेंव्हा धनंजयशी संवाद करतो आणि या संदर्भात पण सपोर्टीव्ह लिहीतो तेंव्हा त्यात कैवार नसावा, सहानभूती नसावी तर पूर्ण एका व्यक्तीचा दुसर्‍या व्यक्तीशी बुद्धीवादाने (इंटलेक्चुअल) संवाद अथवा विरंगुळा (टाईमपास) असेल असेच वाटले पाहीजे. आता सरते शेवटी एक प्रश्नः माझा तर यासंदर्भात कधी विरोध नव्हता/नाही. कोर्टाचा निर्णय देखील स्वागतार्हच वाटला. पण मी तर टाळकुट्या, हिंदुत्ववादी माणूस...सुडोसेक्युलर्स/बुद्धीभेदी वगैरे शब्द सातत्याने वापरणारा. थोडक्यात पुरोगामी स्वत:ला समजू शकत नाही की पुरोगामी तसे मला समजणार देखील नाहीत (माझी तक्रार नाही ;) ) पुरोगामित्वाच्या चढाओढीत तर मी त्यामुळे असूच शकत नाही असे वाटते...पण मग आता मी स्वत:ला काय म्हणावे?

संस्कृतीचा अभिमान असला पाहिजे, पण संस्कृतीच्या नावाखाली काही धूर्त लोक ज्ञानी /अज्ञानी लोकांवर सतत सामाजिक दडपण टाकत असतात, आणि प्रगतीच्या वाटा खुंटतात या शंकाच नाही. सारासार विचार करण्याची शक्ती माणूस गमावून बसतो. जरासे विषयांतर होत आहे, पण लिहिण्याचा मोह आवरत नाही. शुद्रादी-अतिशूद्र आणि स्त्री-पुरुष भेद, हे दैवाने निर्माण केलेले आहे, नव्हे तर धार्मिक ग्रंथात ईश्वराने ते स्वतः सांगितलेले असल्यामुळे तसेच वागले पाहिजे, यासाठी हट्ट धरणारी मंडळी याच समाजात होती,आहे. पण ग्रंथात आलेले विचार किती भाकड आहेत,बनावट आहेत, हे सांगण्यासाठी विचारवंताना कितीतरी प्रबोधन करावे लागले. ते आपण सर्वांना ज्ञात आहे. आज एखादा विचार समाजाला मान्य नसेल, तो प्रश्न तितक्या प्रमाणात कोणाच्या घरात नसेल, पण मानसिक गरज काय असते ते एखाद्या संस्कृत रक्षकाच्या घरी असा एखादा अनुभव असल्याशिवाय त्याची अनुभूती त्यांना येणार नाही, त्यांची वटवट बंद होणार नाही,असेही वाटते. काही संस्कृत अभिमानी लोक नीतीविषयक गप्पा हादडण्यात फार पुढे असतात. अर्थात अशा लोकात त्यांचा कावेबाजपणा दडलेला असतो, हेच लोक अतिशय लवचिक धोरणाचा स्वीकार करणारे असतात. कोणत्याही पुरोगामी विचारामुळे संस्कृती बूडत नसते, या धनंजयाच्या विचाराशी मी सहमत आहे.....! खरं तरं, अशा कितीतरी गोष्टी सांगितल्या जातात. ज्यामुळे संस्कृती बूडते, तोच अभिमान आपण बाळगला असता तर आपण कितीतरी वर्ष मागेच राहिलो असतो, वो बाते फिर कभी !!! अवांतर : स्वाक्षरीचे फार मनावर घेऊ नये, तो निव्वल टाईमपास असतो :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज 08/07/2009 - 09:02
मुळ लेख, बिरुटेसरांचा प्रतिसाद याच्याशी सहमत आहे. जे योग्य वाटते त्याबद्दल भुमीका घेणे जसे नैसर्गिक तसेच तारतम्य ठेवून खुलेपणाने दुसर्‍या बाजुचा प्रतिवाद ऐकुन, खातरजमा करुन परत आपल्या मतात योग्य तो बदल करणे हे देखील तितक्याच आपसूकपणे करता आले पाहीजे. समलैंगीकतेबद्दल जे काही वाचले, ऐकले आहे त्यावरुन समलैंगीकता ही नैसर्गीक आहे असेच समजले आहे. त्यामुळे त्यावरुन एखाद्या व्यक्तिचा नैसर्गिक हक्क हिरावणे किंवा त्यावरुन दुजाभाव करणे पटत नाही. निदान असे वाटावे इतका तर २१व्या शतकातील मानवी उत्क्रांतीचा प्रवास झाला असला पाहीजे.

आनंदयात्री 08/07/2009 - 08:59
धनंजय तुझे म्हणने नेहमीच पटत आले आहे. मिपासारख्या संस्थळांवर आपण भावनिकदृष्ट्या जोडले गेलेलो आहोत, तु इथे प्रकट रुपाने समलैंगिक म्हणुन वावरतोस, त्यामुळे तुला त्या सहीने क्लेष होणे स्वाभाविक आहे. राहिला प्रश्न आंतरजालावर असलेल्या स्युडो पुरोगामित्वाचा. याची चढाओढ नक्कीच वाईट आहे, त्यावर सवडीने लिहीनच.

विसोबा खेचर 08/07/2009 - 09:15
डझनावारी लोकांची सहज आणि स्वस्त चिडवाचिडवी एका पारड्यात, आणि माझे जगणे काही प्रमाणात सुसह्य केल्याचे जिवाएवढे मोठे आभार दुसर्‍या पारड्यात. सौदा घाट्याचा नाही हे आश्वासन मी तुम्हाला देतो.
उत्तम प्रकटन... धन्याशेठला सलाम... तात्या.

यशोधरा 08/07/2009 - 09:43
नंतर शांतपणे वाचते. घाईगडबडीत नीट वाचून होणार नाही...

सुनील 08/07/2009 - 10:16
डझनावारी लोकांची सहज आणि स्वस्त चिडवाचिडवी एका पारड्यात, आणि माझे जगणे काही प्रमाणात सुसह्य केल्याचे जिवाएवढे मोठे आभार दुसर्‍या पारड्यात. सौदा घाट्याचा नाही हे आश्वासन मी तुम्हाला देतो. क्या बात है! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विजुभाऊ 08/07/2009 - 10:42
समलैंगीकता आणि त्यास कायद्याने मान्यता हा एवढा मोठा गहजब करण्या एवढा किंवा जग बुडी एवढा मोठा विषय आहे असे मला वाटत नाही. ती बाब अत्यन्त वैयक्तीक आहे. समलैंगीक असणार्‍या व्यक्तीचे कार्य आयुष्य तशा नसलेल्या माणसाइतकेच महत्वाचे असते पोटापाण्यासाठी त्याना ही काहितरी व्यवसाय करावयाचा असतो तूलनाच करायची झाली तर माझ्या सोबत असणारा एखादा/एखादी त्याच्या आलेल्या मूळव्याधीच्या मोडावर काय उपाय करतो याने मला असा काय फरक पडतो. उद्या अमिताभ बच्चनने त्याला जांघेत होणार्‍या खरजेवर कोणते मलम लावावे यावर सबसे तेज वाहिनीने एस एम एस पाठवून कौल घेण्यासारखे आहे. एखादा समलैंगीक सम्बन्ध ठेवतो/ठेवते म्हणजे ती व्यक्ती पूर्णपणे वेगळी आहे असे नाही. तो भाग त्याच्या आयुश्याचा एक छोटासा हिस्सा असतो. निदान तो कबूल तरी करत असतो. लैंगीकता त्याचे आयुष्य व्यापून टाकत नसते. त्याचे कार्य विश्व इतरांसारखेच असते रजनीश एके ठीकाणे म्हणतात की ब्रम्हचारी हा नेहमीच पाखंडी असतो. त्याच्या डोक्यात लैंगीक कामांध विचार जेवढे येतात तेव्हढे एका दहा राण्या असणार्‍या राजाच्याही मनात येत नाहीत. स्वभावतः असणारी नैसर्गीकता जे नाकारतात ते स्वतःलाच फसवत असतात भारतातली संस्कृती इस्लामी /ब्रीटीश आक्रमणापूर्वी मोकळी होती. सम्भोग आणि कामवासना हे टाकाऊ त्याज्य असे मानले जात नसे.म्हणून तर खजुराहो सारखी शिवशिल्पे झाली. "ब्रम्हचर्य म्हणजे जीवन आणि वीर्यनाश म्हणजे मृत्यू" ह्या आणि असल्या कल्पनाच खरेतर अनैसर्गीक आहेत

In reply to by विजुभाऊ

नंदा 08/07/2009 - 13:24
इथे तुमचा लैंगिकता म्हणजे केवळ शयनगृहात, खाजगीत केलेली शरीरभोगाची क्रिया असा गोंधळ होत असावा. जेंव्हा कार्यालयात तुंम्ही सहकार्‍याला सहज म्हणता की, 'परवा अर्ध्या दिवसाची रजा टाकतो, ही चिरंजीवांना घेउन काही दिवसांसाठी माहेरी जाणार आहे, त्यांना स्टेशनवर गाडीत बसवून मग परस्पर ऑफिसला येइन', तेंव्हा तुम्ही विषमलिंगी आहात, तुमची साथीदार एक स्त्री असून विषमलिंगी विवाहसंस्थेवर आधारलेले असे तुमचे सहजीवन आहे, त्यापासून तुम्हाला अपत्य आहे, वगैरे गोष्टी अनुस्यूत असतात. त्या मुद्दाम सांगाव्या लागत नाहीत कारण त्या तुंम्हाला न विचारता गृहित धरल्या जातात. हे गृहितक बरोबर असल्यामुळे तुम्हाला त्यावर आक्षेपही नसतो. पण समलैंगिक लोकांना अशा गृहितकांचा जाच होण्याचीच शक्यता अधिक. हा केवळ समलैंगिक लोकांचाच प्रश्न नाही, तर कोणत्याही बहुसंख्यांच्या समूहात राहणार्‍या कोणत्याही अल्पसंख्यांचा आहे. त्यामुळे अशा अल्पसंख्य समूहाला आपले किमान अस्तित्व ते हक्क या सर्व आघाड्यांवर जागरुक आणि झगडत राहावे लागते, आपल्या वेगेळेपणाची खासकरून जाणीव करून द्यायला लागते. नाहीतर अस्तित्वच नाकारून बहुसंख्यांत 'स्वाहां' (असिमिलेट) होण्याचा धोका असतो. म्हणून एखादा समलिंगी त्याची समलैंगिकता चव्हाट्यावर आणतो, त्याबाबतीत चर्चा घडवून आणतो, ते तो शयनगृहात, खाजगीत काय काय करतो हे सांगण्यासाठी नव्हे, तर तुमची त्याच्या संदर्भातली गृहितके बरोबर करण्यासाठी!

विसुनाना 08/07/2009 - 13:28
प्रतिसादाच्या सुरुवातीलाच हे स्पष्ट करू इच्छितो की केवळ पुरोगामित्व दाखवायचे म्हणून समलैंगिकतेला समर्थन द्यावे या मताचा मी नाही. धनंजयाचा कोणार्कशिल्पे हा लेख/(प्रकटन) वाचला तेव्हा प्रथम मला धक्काच बसला होता. या विषयावर गंभीरपणे विचार करण्याला मी कचरत होतो. पण धनंजयसारखा माणूस जेव्हा एखादे स्वानुभवाधारीत प्रकटन लिहितो तेव्हा ते चिंतनीय असते. या सामाजिक विषयाबद्दल विचार करण्यास त्या लेखाने भाग पाडले. माझ्या मनात असलेला 'बुजरेपणा' नाहीसा झाला. त्यामुळे समलैगिकता मला समर्थनीय नसली तरी मी तिचा विरोधकही नाही हे मला कळून चुकले. याउप्पर हेही खरे की समलैगिकता एक नैसर्गिक (उपजत) प्रेरणा आहे असे मान्य केले तरी हिरीरीने सरसकट समलैंगिकतेचा कैवार घ्यावा असेही मला वाटत नाही. जसे - या आणि अशा काही लोकांच्या मते "बहुसंख्य पुरुष नैसर्गिकरित्या बहुस्त्रीगामी असतात आणि एकपत्नीत्वाचा कायदा हा नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध आहे. कोणी किती लग्ने करावीत हे ज्याचे त्याने ठरवावे." या मताला पौराणिक,प्रागैतिहासिक, ऐतिहासिक, धार्मिक, सांख्यिकी आणि वैज्ञानिक ;) आधारही देता येतील. पण या मताचा हिरीरीने कैवार घ्यावा असे मला वाटत नाही. एखाद्या एकाकी व्यक्तीवर सामुहिक हल्ला होत असेल तर तिचे हिरीरीने संरक्षण करणे हे मानव्य मूल्य आहे हे मला मान्य आहे. पण त्या अगोदर त्या व्यक्तीची बाजू न्याय्य आहे हे मला पटले पाहिजे. ती व्यक्ती आपल्या अनुक्रमे माहितीची, ओळखीची, निकटची,नातेसंबंधातील, घनिष्ट असेल तर तिचे संरक्षण करण्यात मानव्य मूल्य कमी होते असे मला वाटत नाही. येथील उदाहरणात धनंजय या व्यक्तीशी माझा परिचय आहे आणि त्याची बाजू न्याय आहे हे मला पटले आहे. म्हणून केवळ या उदाहरणापुरता मी त्याची बाजू हिरीरीने घेऊ शकतो. पण हेच सूत्र सरसकट सर्वच उदाहरणात लागू होईलच असे नाही. समलैगिकतेबाबत अजूनही अनेक मुद्दे माझ्यासाठी संदिग्ध आहेत. ते कुणा इतरेजनांच्या अनुभवांच्या वाचनातून कदाचित स्पष्ट होतील. असे झाल्यास सरसकट सर्वच समलैंगिकांची बाजू घ्यायची की तिला काही 'जर..तर' जोडायचे हे निश्चित करता येईल. तोवर माझ्या पुरोगामित्वाची धाव केवळ धनंजय या एकाच व्यक्तीची वैयक्तिक मनोधारणा मान्य करण्यापुरती मर्यादित असेल. त्यामुळे पुरोगामित्वाची चढाओढ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

अग्ग बाब्बो !! ओ धनु शेठ अहो आमची सही म्हणजे मिपावर चालु असलेल्या मारामार्‍या, वाद ह्यांची टिंगल करणे येव्हड्याच उद्देशाने बनवलेल्या आहेत. त्यामुळे कोणी दुखावले असल्यास मी जाहीर माफी मागतो. ह्या सह्यांमागचा उद्देश केवळ आणी केवळ करमणुक, थट्टा हा आहे. º°¨¨°º© परा ©º°¨¨°º नविन सहीच्या शोधात. आमचे राज्य

अवलिया 08/07/2009 - 15:01
लेख उत्तम आहे. धनंजयशेट माझे मित्र आहेत. त्यांची माझी विविध विषयांवर खरड वा व्यनीतुन चर्चा होत असते तसेच क्वचित ते माझ्या लेखांना प्रतिसाद देतात तेव्हा माहितीची देवाणघेवाण होत असते. या सर्व प्रक्रियेत त्यांच्याशी एक सुहृद म्हणुनच बघत असतो याविषयी ते सुद्धा मान्यता देतील अशी खात्री आहे. त्यांचा बहुचर्चित लेख आला तेव्हा माझे आणि त्यांचे संभाषण झाले होते, पण त्या धाग्यावर मी प्रतिक्रिया दिली नव्हती कारण मला काहिही वेगळे वाटले नव्हते (पण मला काही शंका आल्या होत्या, त्यांचे निरसन मी करुन घेतले होते) आणि मी वास्तव लगेच मान्य केले होते. बाकी, सह्यावरचा थट्टा मस्करी करण्यासाठी वापरला जाणारा मजकुर धनंजयसारखी प्रगल्भ विचाराची व्यक्ती वैयक्तिक घेवुन मनाला लावुन घेते हे मला मात्र बुचकळ्यात टाकणारे आहे. असो. धनंजयांचा आदर राखुन मी ती बहुचर्चित सही वापरणे बंद करत आहे. त्यांच्या भावनांना झालेल्या इजेबद्दल मी त्यांची जाहीर माफी मागतो आणि त्यांनी उदार अंतःकरणाने मला क्षमा करावी अशी केवळ विनंती करतो... क्षमा करणे न करणे हा केवळ आणि केवळ त्यांचाच अधिकार आहे. --अवलिया

In reply to by अवलिया

धनंजय 08/07/2009 - 21:23
लांब प्रतिसाद देताना ही पोच देण्यास माझ्याकडून उशीर होऊ नये. भावना दुखावल्याबद्दलची माफी मागितलीत हे तुमचे मोठे मन. अर्थातच माफी आहे. शंका, वेगळे विचार, हे सर्व असण्याबद्दल तर माफी देण्याघेण्याचा विचारही नको. पटवणे-पटणे हीच भाषा योग्य आहे.

मला वाटते कि बरेचसे प्रतिसाद हे त्यावेळी उमटणार्या तरंगातुन प्रतिक्षिप्त क्रिये सारखे आलेले असतात. ते खुप विचारपुर्वक च दिलेले असतात असे नव्हे. समलैंगिकता हा विषय किमान आता चर्चिला तरी जातो आहे. मुळात लैंगिकता हाच विषय भारतीय समाजात फारसा बोलला जात नाही. समलैंगिकतेचे प्रमाण हे अत्यल्प असल्याने (हे तर्काच्या आधारे संख्याशास्त्रीय पुरावा नाही) ते 'वेगळेपण' पचवणे बहुसंख्यांना जड जाते. टवाळकी , अवहेलना,कुत्सितपणा, डिवचणे इ. प्रकार त्यातुनच निर्माण होतात. एखादा भांबावुन वस्तु शोधताना इकड तिकडे पाहु लागला कि त्याला इतर म्हणतात " ए आंधळ्या अरे तुझ्या समोर बघ कि....." असे म्हणताना आपण अंधजनांची अवहेलना करतो आहे अशी भावना नसते. ती परंपरागत नकळत झालेल्या संस्कारांचा भाग असते. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

लिखाळ 08/07/2009 - 21:02
सहमत आहे. लेख छान. विसुनानांचा प्रतिसाद वेगळाच आणि छान वाटला. (याचा अर्थ प्रत्येक मुद्द्याशी सहमती नाही.) नंदा यांनी जे म्हटले आहे की आपण भिन्नलिंगत्व गृहित धरतो ते सुद्धा बरोबर. उदात्तीकरण होते असे नाही पण भिन्नलिंगी जोडप्याला मान मिळतो. बहुधा कोणार्क शिल्पे या लेखावरच्या प्रतिसादांत यावर चर्चा झाली आहे. नलाने हंसाला पकडल्यावर हंस म्हणाला की बायको एकटी आहे आई म्हातारी आहे असे ऐकल्यावर नळराजा हेलावला. हीच सहानुभूती त्या हंसाला 'माझा मित्र मानसरोवरापाशी वाट पाहत असेल' असे म्हटल्यावर मिळाली असती का? असा प्रश्न पडतो. (स्त्री-पुरुष जोडीला जी मान्यता सहानुभूती मिळते ती समलिंगी जोडीला मिळत नसावी असे मला वाटते.) -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

धनंजय 10/07/2009 - 11:52
या धाग्यावरती सर्वांनीच अत्यंत गंभीरपणे विचार करून प्रतिसाद दिले आहेत. सर्वांनाच चर्चेची खोली वाढवण्याबाबत धन्यवाद. अनेकांनी मूळ लेखातील मुद्द्यांना विस्तारित केलेले आहे, किंवा अनुमोदन केलेले आहे, त्यात सर्वश्री नंदन, नाईल, चतुरंग, विसोबा खेचर, कर्क, कालिंदी, वजीर, दिलिप बिरुटे, सहज, लिखाळ यांचे विचार आहेतच. विजुभाऊ आणि नंदा यांनी नैसर्गिकता आणि समावेशन (ऍसिमिलेशन) या बाबतीत चर्चा पुढे नेली. अनेकांनी दुर्ल़क्ष करणेच योग्य हे सांगितले. उदाहरणार्थ प्रकाश घाटपांडे यांनी योग्यच सांगितले, की "ए आंधळ्या" म्हणणारे लोक जाणूनबुजून अवहेलना करत नसतात - आणि हीच बाब परिकथेतला राजकुमार आणि अवलिया यांनी सांगितली. लेख कशाबद्दल नाही - हा लेख हळवेपणाने "मी दुखावलो" असे म्हणणारा नव्हे. "तू गोरा का काळा, तुझे कोकणी उच्चार घाटी लोकांसारखे गचाळ" असल्या चिडवाचिडवीला हसतखेळत कसे सामोरे जायचे, तरीही मित्रत्व कसे ठेवायचे, त्याचे प्रशिक्षण शाळेतच प्राप्त होते. खरे उद्दिष्ट्य दोलायमान समर्थकांना आभार पोचवणे खरे तर येथे आनंदयात्री यांनी थोडक्यात मर्म जाणले, की हा लेख डिवचले जाण्याबद्दल नाही, मात्र काही प्रमाणात पूर्णपणे न पटूनही पुरोगामित्व दाखवणाऱ्यांबाबत आहे. त्यांना हे वागणे स्युडो वाटते. मला मात्र हे वागणे समाजाच्या बदलातील केवळ एक टप्पा वाटतो. माझ्या लहानपणी ज्या ठिकाणी आम्ही राहात होतो, तिथे आमच्या पोटजातीतील आम्ही एकमेव कुटुंब होतो. शेजाऱ्यापाजाऱ्यांशी आम्हा मुलांनी उगाच वेडेवाकडे बोलू नये, म्हणा, किंवा शाळेतील शिकवणीशी उगाच का भांडावे म्हणा... आमच्या घरात "जात" या विषयावर आम्ही मुलांनी फारसे काही ऐकले नाही. पुढे चुलत-मामेभावंडांची लग्ने होऊ लागली तशी घरच्यांच्या बोलण्यात अधूनमधून क्वचित आंतरजातीय विवाहांविरुद्ध काही ऐकू आले. कोणी अगदी काटेकोर फुटपट्टी नेईल, तो म्हणेल की आमच्या कुटुंबातले वडीलधारे लोक खोटार्डे होते. मी म्हणेन की त्यांचा खोटेपणा अत्यंत क्षम्य स्वरूपाचा होता, कारण त्यांच्या (थोड्याशा) सोंगामुळे पुढच्या पिढीपर्यंत आदला कट्टरपणा पोचला नाही. लेखातील मानव्य मूल्य खरेच जरुरीचे आहे का? विकास आणि विसुनाना यांनी लेखातील मुद्द्याला सीमा असावी, असा विचार पुढे नेलेला आहे. विकास आपला अनुभव सांगतात :
पण मग कोणी गोरा अमेरिकन माझ्याशी मी केवळ एक (इथला) अल्पसंख्य आहे, दुसर्‍या वंशाचा आहे म्हणून स्पेशल ट्रीटमेंट देत जास्तच मैत्रीपूर्ण वागला/वागली तर मला ते आवडत/णार नाही.
अंततोगत्वा ही भावना माझीही आहे. परंतु शारिरिक इजा न होता आत्मसन्मानाची भावना जोपासणे शक्य आहे अशा ठिकाणी मी राहातो. आज भारतात मला ते शक्य आहे का? बरेच पैसे असले तर होय, शक्य आहे. पण याला धनदांडगेपणा म्हणावा. अजून दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे. सर्वोच्च न्यायालयाचा जो काय निर्णय असेल तो लोकसभा उलथवू शकते. हा कायदा कुठे वापरला जातो? ज्यांच्याकडे अगदी थोडासुद्धा पैसा आहे त्यांना धाक दाखवून पैसे उपटण्यासाठी. नाहीतर अटक करून शिपायांकडून बलात्कार करून मग सोडून देण्याकरिता. (कोर्टापर्यंत ही प्रकरणे जातच नाहीत.) मी त्या परिस्थितीत असतो तर? कधी बलात्कार होत असताना कोणी "दिखाऊ दयावानाने" मला सोडवले, तर त्या दयेला ठोकरून आत्मसन्मानाचा उदो-उदो करण्याइतपत मी मूर्ख नाही. "कैवारी" हा एक चांगला शब्द म्हणून आंबेडकरांनी दोन वेगवेगळ्या वेळेला वापरलेला मी हल्लीच वाचला आहे. एक त्यांनी वापरला राजारामशास्त्री भागवतांबाबत, आणि एक त्यांनी वापरला ज्योतिबा फुल्यांबाबत. पैकी राजारामशास्त्री भागवत फार-फारतर पोटजातींमध्ये लग्ने व्हावीत इतपतच म्हणणारे सुधारणावादी होते. स्वत:हून त्यांचे लग्न पोटजातीच्या आतच झाले होते. त्यामुळे त्यांना "स्यूडो" म्हणावे का? केसरी वर्तमानपत्राने त्यांची निर्भर्त्सना केली, तेही आहेच. पण तरीही "कैवारी" म्हणून भागवत-शास्त्रीबोवांचा आधार घेण्यालायक होताच. समाजाच्या प्रवाहाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये कधी कैवाराचे मनापासून आभार मानावेत, आणि कधी आत्मसन्मानासाठी कैवाराचा अव्हेर करावा त्याबद्दल तारतम्य असावे लागते. अगदी अमेरिकेतही वेगळ्या प्रकारचा डबघाईचा प्रसंग येऊ शकतो. आता सांगतो ही परिस्थिती सुदैवाने माझ्यावर आलेली नाही, पण माझ्या ओळखीतील व्यक्तीवर आलेली आहे. (माझ्या ओळखीतल्या विश्वासातल्या मिपाकरांना हवे तर नाव देईन.) अतिशय तडकाफडकी इस्पितळात भरती झाल्यानंतर या मित्राच्या जोडीदाराला त्याच्या बाजूला जाता आले नाही. अशी परिस्थिती माझ्यावर आली तर काय? कोणाच्या अगदी खोट्यानाट्या दिखाऊ दयेने जर मला वेळ निभावता आली तर तशा दयेला मी मुळीच ठोकरणार नाही. विकास ज्या अत्युच्च ठिकाणी (म्हणजे कैवार नसावा, सहानभूती नसावी तर पूर्ण एका व्यक्तीचा दुसर्‍या व्यक्तीशी बुद्धीवादाने संवाद अथवा विरंगुळा असेल) आहेत, तिथे सर्व असावेत तो सुदिन लवकर येवो. पण ते आहेत तिथे सर्वांनी आताच असावे असा मी हट्ट करणार नाही. लोकलज्जेसाठी लटकेच चांगले वागणाऱ्यांना मी दोष मुळीच देणार नाही. (पण फक्त बोलायला नको - लज्जेने चांगले वागायला पाहिजे, हे आलेच.) आजच्या पुढे दोन पिढ्यांनंतर तशा लोकांना दोष देणे योग्य का असेना. आज लाजूनही जे लोक चांगले वागतात, त्यांची प्रशंसाच करणे मला योग्य वाटते. कारण इथे एकीकडे लाज आणि एकीकडे टिंगल अशा डळमळीत स्थितीत ते मागेपुढे का करेनात, पुढच्या पिढीला बदलू देत असतात. या प्रकारे त्यांचा कार्यभाग फार मोठा असतो. नैसर्गिक न्यायामुळे कोणाची कड घ्यावी का? विजुभाऊ नैसर्गिक न्यायाचा दाखला देतात की ब्रह्मचर्य हेच पुष्कळदा ढोंगी असते, त्यापेक्षा नैसर्गिक ओढ ही मोकळी असू द्यावी. त्यांच्या म्हणण्यात पुष्कळ तथ्य आहे. पण त्या संदर्भात विसुनाना न्याय्य-अन्याय्यतेबाबत बिंदुगामी चर्चा करतात. त्यांचा दाखला अत्यंत विचारणीय आहे. ते म्हणतात की काही लोक बहुपत्नीत्व नैसर्गिक आहे, असे म्हणू शकतील. तरी या बाबतीत त्यांना न्याय्यतेमुळे नैसर्गिकाच्या विरोधात जावेसे वाटते. त्यांचे किंचितही खंडन करण्यापूर्वी त्यांचे आभार मानणे योग्य आहे. माझ्याशी झालेल्या पत्रव्यवहारातून त्यांना असे जाणवले आहे, की माझी बाजू न्याय्य आहे. हा चौकसपणा आणि नवीन विचार मनात तोलण्याची तयारी खरी प्रगल्भता दाखवते. त्या प्रगल्भतेचा फायदा घेऊन मी दोन मुद्द्यांबद्दल येथे बोलणार आहे - एक तर ते म्हणतात
"एखाद्या एकाकी व्यक्तीवर सामुहिक हल्ला होत असेल तर तिचे हिरीरीने संरक्षण करणे हे मानव्य मूल्य आहे हे मला मान्य आहे. पण त्या अगोदर त्या व्यक्तीची बाजू न्याय्य आहे हे मला पटले पाहिजे."
अशा गोष्टी पटवण्यासाठी कधीकधी पुष्कळ प्रशिक्षण लागते, भरपूर माहिती हाताशी लागते, आणि ती संकलित करण्यासाठी वेळ (म्हणजेच वेळ देणारा अधिक पगाराचा व्यवसाय) आवश्यक होतो. मला असे वाटते, की स्खलनशील, अशिक्षित व्यक्तीही मानव्य विचारणेसाठी मानव म्हणून परिपूर्ण असते. अनेक देशांत (म्हणजे भारतातही) कायद्यांच्या मूलभूत नैतिकतेत दंड करणार्‍याला गुन्हा सिद्ध करावा लागतो. दंड भोगणार्‍यावर आपण न्याय्य असल्याचे सिद्ध करायचा भार नसतो. हा विचार अगदीच तर्कट नाही. सीतेला अग्निदिव्य करावे लागले हे ठीक नाही, असे कित्येक लोक हळहळतात ते याच विचारामुळे - आरोप करणार्‍या धोब्याला, किंवा शासन करणार्‍या रामाला तिचा गुन्हा सिद्ध करायला हवा होता, असा भाव कित्येक लोकांत दिसतो. त्याच प्रकारे माझे म्हणणे आहे - आणि भारतील कायद्याचेही मूलभूत तत्त्वज्ञान आहे. आता याचेच पुढचे विवेचन म्हणून मी बहुपत्नीत्वाचा मुद्दा चर्चेत घेणार आहे. येथे मी सांगणार आहे, की हा दाखला विसुनानांच्या म्हणण्याच्या पूर्णपणे विपरित आहे. बहुपत्नीत्व हेच कायद्याने पूर्वी ग्राह्य होते - ते बदलण्यासाठी कारण होते स्त्रियांना वाटणारा जाच. हा जाच पुरावे देऊन गार्‍हाणी मांडून स्त्रियांना तपशीलवार सिद्ध करावा लागला नाही. तो घटनात्मक सैद्धांतिक कारणांसाठी मान्य केला गेला. (येथे नैसर्गिक-अनैसर्गिक याचा प्रश्न नाही. कोणावर अन्याय होत असला तर अस्तित्वातल्या कायद्याला बदलावे, उगाच "तुमचे न्याय्य आहे हे सिद्ध करा" हा हट्ट धरू नये, याबद्दल आहे.) २२-९-१९५१ च्या जनता मासिकातला हा उतारा आहे - हा युक्तिवाद संसदेत कायदेमंत्री श्री. आंबेडकर यांनी केला होता -
हिंदूंची पवित्र विवाहपद्धती म्हणजे पुरुषाला बहुपत्नीत्वाचा अधिकार आणि स्त्रीची कायम गुलामगिरी. अर्थशास्त्रामध्ये गुलामी आणि स्वायत्त श्रमाची संस्था यात जो फरक आहे तोच यात आहे. स्वायत्त श्रमाच्या कल्पनेत नोकरीचा करार अवश्य वाटेल तेव्हा मोडण्याची मुभा असते. या बिलात घटस्फोटाच्या ज्या अटी आहेत, त्या कमी करण्याची नवी योजना कोणाही सभासदाने मांडली तर मी त्याचा विचार करण्यास सिद्ध आहे. तुम्हाला स्त्रियांना भारतीय घटनेत दिलेले स्वातंत्र्य द्यावयाचे असेल तर ही सोय ठेवलीच पाहिजे. नाहीतर घटनाच चालू ठेवणे योग्य ठरणार नाही. हे बील भारताच्या प्राचीन ध्येयवादावरही नाही किंवा पाश्चात्त्यांचेही अनुकरण नाही. या घटनेच्या प्रास्ताविक भागातच स्वातंत्र्य समता व बंधुत्व या कल्पना आहेत. आणि त्या निकषांवर या देशात असलेली प्रत्येक सामाजिक संस्था तपासून बघितली पाहिजे.
यातील शेवटल्या वाक्याला मी अधोरेखित केलेले आहे. कुठल्याही अशिक्षित, गांजलेल्या, सवतीने आपल्या दुखण्याची न्याय्यता सिद्ध करायची नाही आहे. सुशिक्षित मंत्री किंवा उच्चपदस्थ खासदारांवर ती जबाबदारी पडते. कायदेमंत्री आंबेडकर हे पुरुष होते, सवतपिडा झालेली स्त्री नव्हते. पुढे असे दिसते, की या बिलाला संमती कित्येक विधायकांनी लोकलज्जेने दिली - लोकसभेतले काही खासदार दृढ तार्किक विचार करणारे नसतातही. पण ते विधेयक पास होण्यासाठी हिरिरीने पुढे होणारा एक व्यक्ती आणि लज्जेने त्याला मान्यता देणारे काही स्यूडो लोक आवश्यक होते. त्या खासदारांची निर्भर्त्सना करणे मला मुळीच प्रशस्त वाटत नाही. अर्धवट पटलेल्या डळमळीत अवस्थेत त्यांनी नव्या कायदेव्यवस्थेला मान्यता दिली याबद्दल त्यांचे अभिनंदनच करणे योग्य आहे. त्यांच्या अर्ध्यामुर्ध्या धाडसामुळे पुढील पिढ्यांना स्त्री-समानतेची न्याय्यता इतकी नीट कळली की विसुनानांना हा दाखला चुकून उलट अर्थाने दिला. बहुपत्नीत्वाचा मुद्दा खरा तर असा - कायदा बहुपत्नीत्व चालवून घेत होता, काही स्त्रियांवर लादत होता. ज्या बायकांना त्याचा जाच होत होता, त्यांच्यापैकी बहुसंख्य बायका वादविवाद घालू शकत नव्हत्या. त्यांच्या बाजूने ("न्याय-अन्याय सिद्ध करा" असे न म्हणता) भारताचा (पुरुष) कायदेमंत्री बोलला. काही अर्धवट पटलेल्या खासदारांनी अर्धवट-ढोंगाने स्त्रियांना दिलासा दिला. पण जे झाले ते उत्तम झाले. - - - - पुन्हा लेखा-प्रतिसादाचा सारांश देत आहे. १. येथे मला वैयक्तिक जखम झालेली नाही. प्राथमिक शाळेतल्यापासून गंमत-टक्के-टोणपे खेळवण्यास मी समर्थ आहे. मी जिथे आहे तिथे रोजव्यवहारात सुस्थितीत आहे. मिसळपावावर स्वत:च्या आनंदासाठी येत आहे. २. पण अजून भारतात मला माझ्या बाजूने कायद्यासाठी झगडणार्‍या मित्रांची आवश्यकता आहे. ही निकड फार मोठी आहे. कारण एका दिल्ली उच्च न्यायालयाचा तकलादू निकाल हा लोकसभेच्या निकालाइतका स्थायी नाही. फार तर काही थोड्या लोकांना मी वैयक्तिक पटवू शकेन. काही सहृदय लोकांनी हे जाणावे की कित्येक अशिक्षित, दरिद्री लोकांना पटवा-पटवी करता येणार नाही. मग त्यांनी स्वत:हून त्यांची बाजू घेतली पाहिजे. घटनेच्या प्रास्ताविक भागातल्या स्वातंत्र्य समता व बंधुत्व या निकषांवर (शिवाय अन्य मूलभूत तत्त्वांवर) या देशात असलेली प्रत्येक सामाजिक संस्था तपासून बघितली पाहिजे. याचा भार भरडल्या जाणार्‍या व्यक्तीवर नसून कुठल्यातरी न-भरडल्या जाणार्‍या बोलक्या व्यक्तीनेसुद्धा हिरिरीने घ्यावा. ३. जर कोणी अर्धवट पटले असेल, आणि लोकलज्जेसाठी पुढे सरत असेल, तेसुद्धा समाजाच्या बदलातला एक टप्पा आहेत. त्यांचीसुद्धा प्रशंसाच मी करतो आहे. २ व ३. या व्यक्तींना टोमणे सहन करायची सवय नसेल. त्यांना एकजात ढोंगी म्हटले जाईल, आणि तो आरोप क्रमांक-३च्या बाबतीत काही थोड्या प्रमाणात खराही असेल. पण लोकलज्जेने चांगले केले तरी ते चांगलेच असते - त्यांना माझे आभार प्रामाणिकपणे देतो. आणि जे भारावून काम करतात, त्यांना माझ्या आभाराची अपेक्षा नाही. तरी आभार देतो. ४. कोणाची कीवयुक्त मदत झिडकारण्याची वेळ माझ्या पिढीत, भारतात तरी, आलेली नाही. आधी जीव वाचू देत मग स्वाभिमानाच्या पन्नास पगड्या विकत घेऊ. (अमेरिकेत मात्र आता स्वाभिमानाच्या पन्नास पगड्या विकत घ्यायची वेळ आलेली आहे - इथे काही गोष्टी कीव म्हणून स्वीकारणार नाही, हक्क म्हणून झगडेन.)

लिखाळ 10/07/2009 - 15:50
धनंजय, चर्चेचा परामर्श फार चांगला आणि सकारात्मक घेतला आहे. त्यातले ''याचा भार भरडल्या जाणार्‍या व्यक्तीवर नसून कुठल्यातरी न-भरडल्या जाणार्‍या बोलक्या व्यक्तीनेसुद्धा हिरिरीने घ्यावा.'' हे वाक्य नक्कीच पटले. खरेतर आंबेडकरांचे जे उदाहरण दिले आहे आणि जे मत मी उधृत केले आहे त्याच सारखे रामशास्त्रींचे एक उदाहरण मी 'पुरोगामित्वाच्या' चर्चेमध्ये लिहिले आहे. ज्यांना इतर परिस्थितीतल्या लोकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करता येतो आणि जे बोलू शकतात त्यांनी त्या भरडल्या जाणार्‍यांची बाजू मांडावीच. आजवर आपल्या माहितीमध्ये असलेले अनेकानेक समाजसेवक याच तर्‍हेचे आहेत असे मला वाटते. बहुपत्नित्वाच्या निर्णयाबद्दल दिलेली माहिती आणि त्यावरून केलेले मतप्रदशन आवडले. समलिंगी व्यक्तींच्या हक्कांबाबत मी जेव्हापासून वाचतो आहे तेव्हापासून प्रत्येक लेखामध्ये उभयलिंगी आकर्षण असलेल्या व्यक्तींबद्दल सुद्धा लिहिलेले आढळते आहे. या परिस्थितीमध्ये जर पुढे उभयलिंगी आकर्षण असलेल्या व्यक्तीने आमचा तो नैसर्गिक अधिकार आहे आणि आम्हा तिघांना 'त्रिकूट' बनवून राहण्याचा अधिकार असावा असे मागणे मांडले तर मला नवल वाटणार नाही. त्यातून पुन्हा नवे प्रश्न सामोरे येतील आणि नैसर्गिक म्हणजे काय? जे जे नैसर्गिक ते ते सर्व किती पातळीपर्यंत चालवू द्यावे? या तर्‍हेच्या चर्चा होत राहतील. पण हे विचारमंथन चांगलेच आहे. कारण या तर्‍हेच्या मंथनातून तत्कालिक प्रश्नावरच फक्त तोडगा निघतो असे नसून इतरही पुढे निर्माण होणार्‍या प्रश्नांवर विचार करण्यासाठी भूमिका तयार होते आणि विचार करण्याची क्षमता तयार होत असते असे वाटते. क्लोन करणे योग्य की नाही? या तर्‍हेच्या प्रश्नांवर झालेल्या नीति-अनीतिच्या चर्चा आणि या चर्चा, मूलतः समाजमन घडवणार्‍याच असतात असे मला वाटते. -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

In reply to by लिखाळ

या तर्‍हेच्या चर्चा होत राहतील. पण हे विचारमंथन चांगलेच आहे. कारण या तर्‍हेच्या मंथनातून तत्कालिक प्रश्नावरच फक्त तोडगा निघतो असे नसून इतरही पुढे निर्माण होणार्‍या प्रश्नांवर विचार करण्यासाठी भूमिका तयार होते आणि विचार करण्याची क्षमता तयार होत असते असे वाटते.
सहमत आहे. आज या चर्चेत ज्यांनी प्रतिसाद दिले त्यांनी दहा वर्षांनंतर मागेवळून पहाताना..... असा विचार केला तर त्यावेळी ते मनोरंजक असेल प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विसुनाना 10/07/2009 - 19:46
उत्तमच आहे. म्हणजेच विचार करायला लावणारा आहे.
व्यक्तीची बाजू न्याय्य आहे हे मला पटले पाहिजे.
या माझ्या वाक्यावर धनंजय यांचे विवेचन उत्कृष्ट आहे. न्याय्य बाजू मला कुणी पटवून देण्याची जशी गरज नाही (-म्हणजे माझ्या मताला महत्त्व देण्यासारखी व्यक्ती मी नाही किंवा मी काही त्या व्यक्तीला आरोपीच्या पिंजर्‍यात उभेही करत नाही-) तसेच ती न्याय्य आहे हे माझ्या परीने (माझ्या पायरीने, माझ्यापुरते) तपासून घेण्याला काहीच प्रत्यवाय नसावा.
त्यांच्या अर्ध्यामुर्ध्या धाडसामुळे पुढील पिढ्यांना स्त्री-समानतेची न्याय्यता इतकी नीट कळली की विसुनानांना हा दाखला चुकून उलट अर्थाने दिला.
येथे मी दिलेले उदाहरण अर्धवट होते ही चूक मी मान्य करतो. मूळ मुद्दा लैंगिक संबंधातील स्वातंत्र्याबद्दल होता. 'स्वैच्छिक बहुपतित्व' असेही रूप हा मुद्दा घेऊ शकतो. (बाबासाहेब आंबेडकरांचे बहुपत्नित्वाबद्दलचे विचार भारतीय संदर्भात योग्य आहेत. पण इतरत्र जी तथाकथित विचारधारा आहे ती कधीकाळी भारताकडे वळू शकते. विशेषतः ते शब्द - 'एकमेकांस अनुमोदन देणार्‍या प्रौढ आणि प्रगल्भ व्यक्ती' - तेच शब्द त्या विचारसरणीच्या पुरस्कर्त्यांनीही हेतुपुरस्सर वापरायला सुरुवात केली आहे.) लिखाळ यांनी परामर्शावर दिलेल्या प्रतिसादात काही शंका उपस्थित केल्या आहेत. अशा अनेक शंका माझ्याही आहेत. या विषयाबाबत माझ्यापुरतेही सर्वसमावेशक उत्तर माझ्याकडे नाही.
पुढे निर्माण होणार्‍या प्रश्नांवर विचार करण्यासाठी भूमिका तयार होते आणि विचार करण्याची क्षमता तयार होत असते असे वाटते.
हे लिखाळ यांचे मत पटते. म्हणूनच,
समलैगिकतेबाबत अजूनही अनेक मुद्दे माझ्यासाठी संदिग्ध आहेत. ते कुणा इतरेजनांच्या अनुभवांच्या वाचनातून कदाचित स्पष्ट होतील. असे झाल्यास सरसकट सर्वच समलैंगिकांची बाजू घ्यायची की तिला काही 'जर..तर' जोडायचे हे निश्चित करता येईल.
-हाच माझा सध्यापुरता पवित्रा आहे. हा (कायद्याने शिक्षा करण्यासारखा अथवा सामाजिक-नैतिक दृष्टीकोनातूनही) गुन्हा नाही पण या संबंधांना कायद्याने कोणत्या चौकटीत बसवायचे हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. असो. (अवांतर : 'लिव्ह-इन रिलेशनशिप' संबंधांना कायद्याच्या कोणत्या चौकटीत बसवावे या विषयावरही भारतात चर्चा सुरू आहे. या बाबतीत न्यायालयांचे निकाल पाहता बहुपत्नित्व मागील दाराने प्रवेश करत आहे काय? अशी शंका येते.)

नितिन थत्ते 10/07/2009 - 21:00
विसुनानांच्या प्रतिसादातील शेवटच्या मुद्द्याच्या अनुषंगाने पुन्हा थोडेसे. मुद्दा एक: असे संबंध चालवून घेणे हे समर्थनीय आहे का? न्यायालयाचा हा निर्णय फक्त शासकीय दंडव्यवस्थेला शिक्षा करण्यापासून प्रतिबंध इतकाच मर्यादित आहे. त्या संबंधांना उत्तेजन द्यायचे की दुर्लक्ष करायचे की त्या संबंधांची एक व्यवस्था लावायची हे न्यायालय ठरवणार नाहिये. सध्याच्या न्यायालयीन निर्णयाने फक्त गुन्ह्याचा शिक्का पुसलाय. तुम्ही या ठिकाणी 'हे' वाक्य लिहिलंय ना? मग 'हे दुसरे' वाक्य त्याच्याशी विसंगत आहे. असे न्यायालयाचे म्हणणे आहे. हे दुसरे वाक्य हवे'च' आहे का हे आता समाजाने ठरवायचे आहे. समाजाला जर दुसरे वाक्य हवेच आहे असे वाटत असेल तर पहिले वाक्य सुधारून/बदलून/अपवाद करून घेता येईल का हे समाजाला पहायला लागेल. आणि तेही घटनेच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता. मुद्दा दोन हे जेव्हा समाज ठरवायला बसेल तेव्हा विविध गटांत रस्सिखेच होईल. पुन्हा ही विभागणी अशी पक्क्या दोन तुकड्यांत असणार नाही. काही जण कुंपणावर असतील. त्या कुंपणावरच्यांनी लिबरल मताची (लिबरल मत दिल्याने विरोधकांकडून हेटाळणी होण्याची) भीती बाळगू नये असा धनंजय यांच्या धाग्याचा उद्देश आहे. पत्नीवर घरातली मंडळी जुलूम करीत असताना नवर्‍याने 'मी तिची बाजू घेतली तर घरातले लोक मला बाईलवेडा वगैरे म्हणतील' या भीतीने तिची बाजू घेण्यास कचरू नये. असा धनंजयचा मतितार्थ आहे. त्या नवर्‍याची त्यावेळची मनोधारणा लक्षात घेतली म्हणजे धनंजयची वेदना लक्षात येईल. दुसरे उदाहरण 'घरेलू हिंसाको रोको, बेल बजाओ' या कॅम्पेनचे घेता येईल. त्या कॅम्पेनमध्ये कोणत्या घरात हिंसा चालू असेल तर बेल वाजवा म्हणजे त्या दडपणाने हिंसा (त्यावेळी) थांबेल असा संदेश होता. विसूनाना म्हणतात तसे मारहाण चालू असेल तर 'मारहाणीचे कारण योग्य आहे की अयोग्य आहे याचा विचार आत्ता करत बसू नका. आधी बेल वाजवून मारहाण थांबवा' असा धनंजय यांचा संदेश आहे. धनंजयनी जरी समलैंगिकता या निमित्ताने हे विचार मांडले असले तरी ते बर्‍याच सामाजिक प्रश्नांमध्ये लागू आहेत. एखादी गोष्ट योग्य की अयोग्य हे ठरवणे बर्‍याचदा अवघड असते हे खरेच. बर्‍याचदा अनेक गैरसमज आपल्या मनात असतात. आजच्या लोकप्रभा मध्ये हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात समलैंगिक आणि यूनक (हिजडे) हे एकच समजून लेख लिहिलेला आहे. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)

स्वाती२ 11/07/2009 - 00:24
>>याचा भार भरडल्या जाणार्‍या व्यक्तीवर नसून कुठल्यातरी न-भरडल्या जाणार्‍या बोलक्या व्यक्तीनेसुद्धा हिरिरीने घ्यावा हे अगदी पटले. पण बरेचदा असे करायचे मनात असूनही धीर होत नाही. ३-४ महीन्यांपूर्वी असेच एकांकडे जमलो होतो. नेहमी प्रमाणे चर्चा मुलांवर आली आणि एक बाई म्हणाल्या 'मी मुलांना सांगितलय काहीही व्हा फक्त गे होऊ नका." मी पटकन DH कडे बघीतले. त्याच्या डोळ्यात 'please don't'. त्या बाईंचे म्हणणे खोडून काढावे असे मनात असूनही उगाच लोकांकडे तमाशा नको म्हणून काहीच बोलले नाही. निरोप घेऊन गाडीत बसलो आणि नवरा म्हणाला 'thanks'. तो खिन्न thanks एखाद्या थपडेसारखा लागला. त्याचे दोघे मित्र गे आहेत. पण त्या दिवशी त्यांच्याबाजूने भांडायचा धीर झाला नाही.

प्रिय धनंजय, एखाद्याने आपले खासगी आयुष्य कसे जगावे (एखाद्याने कुठली भाजी खावी पासून त्याचे सेक्शुअल ओरिएंटेशन काय असावे पर्यंत सर्वकाही) हे सांगण्याचा अधिकार इतरांना नाही. त्यामुळे हायकोर्टाने दिलेला निकाल स्वागतार्हच आहे. अनेकदा चिरफाड होत नसतानाही, काही छाकटे मी किती पुरोगामी आहे दाखवण्यासांठी इतरांच्या विवंचना, दुःखे चघळत असतात. ही त्यांची स्वतःची कहाणी नसते. पण ही मंडळी इतरांना पेट्रनाइझ (मराठीत काय म्हणतात पेट्रनाइझ करण्याला?)करत, पोकळ सहानुभूती दाखवत इकडे-तिकडे फिरत असतात. असे अनेक छाकटे एकत्र येतात आणि मग पुरोगामीपणाची चढाओढ सुरू होती. ( अशी चढाओढ चांगली आहे की वाईट हा वेगळा मुद्दा. तुम्ही म्हणता तसे अशी चढाओढ चांगलीच. कारण यातून बळ मिळते. ) पण संस्कृतीचा ऱ्हास होतो अशी बोंब मारणाऱ्यासारखीच अशा दिखाऊ पुरोगाम्यांची मला तरी खिल्ली उडवावीशी वाटते. ह्या लोकांमुळे पुरोगामीपणाची बदनामी होते, असे माझे स्पष्ट मत आहे. बाकी माझा एखादा मित्र किंवा परिचित समलैंगिक आहे की विषमलैंगिक हे माझ्यासाठी अजिबात महत्त्वाचे नाही. समलैंगिक असणे हे विषमलैंगिक असण्याइतकेच माझ्यासाठी नॉर्मल किंवा ऍबनॉर्मल आहे. थोडक्यात, एखाद्या विषमलैंगिकाची जशी टिंगलटवाळी करतो तशीच समलैंगिकांची टिंगलटवाळी केल्यास कुणी आरडाओरडा करायला नको, असे मला वाटते.
जुन्या काळापासून भारतात अम्रदपसंदी किंवा लौंडेबाजी ही अतिशय आम.
अम्रदपसंदी किंवा लौंडेबाजी हे शब्द तसे बोचणारे आहेत हे मी मान्य करतो. चैनीसाठी एखादा अशी गोष्ट करत असावा असे वाटू शकते. ह्या दोन शब्दांऐवजी समलैंगिकता हा एकच शब्द ठेवायला हवा होता. असो. ह्या शब्दांमुळे, किंवा एकंदरच त्या प्रतिसादामुळे, तुम्ही दुखावले असल्यास मी तुमची माफी मागतो. चित्तरंजन

In reply to by चित्तरंजन भट

धनंजय 14/07/2009 - 05:55
अन्यत्र सुरू झालेला संवाद येथे पुढे चालू ठेवल्याबद्दल धन्यवाद. माझ्या भावनांची तुम्ही कदर केली, सद्भावना पोचल्या. बहुतेक दु:खे ही स्वतःची नसतात. 'सह'अनुभूती शब्दातच अन्यासह अनुभूती सामावली आहे. स्वतःच्या कहाणीतली विवंचना सांगण्याला आपण "गार्‍हाणे" किंवा असे काही म्हणू. शब्दाचा कीस काढण्याचा उद्देश - हा विचार असंदर्भ आहे.
अनेकदा चिरफाड होत नसतानाही, काही छाकटे मी किती पुरोगामी आहे दाखवण्यासांठी इतरांच्या विवंचना, दुःखे चघळत असतात.
"चीरफाड होत नसतानाही" या परिस्थितीचा त्या चर्चेशी संबंध काय होता? तिथे तर चीरफाड होत होती.
अशी चढाओढ चांगली आहे की वाईट हा वेगळा मुद्दा. तुम्ही म्हणता तसे अशी चढाओढ चांगलीच... (आत्मगौरवात्मक कीव - पेट्रनाइझ करणार्‍या) ह्या लोकांमुळे पुरोगामीपणाची बदनामी होते, असे माझे स्पष्ट मत आहे.
कीव आत्मगौरवात्मक आहे की नाही यासाठी तुम्ही काय निकष वापरता? अमुक चार छाकट्यांनी (१) केवळ पुरोगामीपणा दाखवण्यासाठी केलेली आणि (२) पोकळ अशी, ही सहानुभूती आहे; आणि चार मुनुष्यांनी (१) याबद्दल विचार करून (२) खरी अशी साहानुभूती दाखवली आहे, यातला फरक तुम्हाला कसा कळतो? खिल्ली उडवण्यासाठी कोण अप्रामाणिक आहे, त्याच्या अप्रामाणिकपणावर बोट ठेवून खिल्ली उडवलेली ठीकच. त्या चर्चेत भाग घेतलेले काही "पुरोगामी" लोक मला ओळखतात. मीसुद्धा त्यांना ओळखतो. त्यांनी घेतलेला पवित्रा पटून घेतला आहे, भंपक नाही, हे मला माहीत आहे. जे माझ्या ओळखीचे नाहीत त्यांचे मला माहीत नाही. पण ते अप्रामाणिक आहेत हे तुम्हालातरी कसे ठाऊक? आणि थोडासा अपूर्ण विचार करून लोकलज्जेखातर थोडीशी सहानुभूती दाखवणारे लोकही पुरोगामित्वाची बदनामी करतात काय?
थोडक्यात, एखाद्या विषमलैंगिकाची जशी टिंगलटवाळी करतो तशीच समलैंगिकांची टिंगलटवाळी केल्यास कुणी आरडाओरडा करायला नको, असे मला वाटते.
या विचाराशी मी सहमत आहे. पण याचा संदर्भ काय? त्या चर्चेमध्ये जी टवाळी आहे ती जशी विषमलैंगिकाची असावी तशीच आहे काय? त्या चर्चेतील बहुतेक वाक्यांमधे मी "समलैंगिक" शब्दाच्या जागी "विषमलैंगिक" शब्द घालून बघितला. उदाहरणार्थ तिथला पहिला प्रतिसाद उलटवून बघूया :
विषमलैगिंकता ही एक विकृतीच आहे. ह्या मंडळींचा मला खूप किळस येतो. दादर (वा अन्य कोणत्याही) पश्चिम च्या रेल्वे फलाटावर जायलाही मी घाबरतो. तिथं सर्वत्र ही विकृत माणसं गाडीची वाट बघत असल्याचे सोंग करीत इकडे-तिकडे विचीत्र नजरेने पाहत असतात. पहीलं म्हणजे रेल्वेच्या फलाटावरच्या घाणीमुळे ही उभं राहणं शक्य होत नाही. तिथं ही मंडळी जोडीदार शोधत असतात. रेल्वेच्या डब्यात ही जनावरे नको तिथं चोरटा स्पर्श करू पाहतात. त्यांचा खूप राग येतो पण रागवता येत नाही. स्वतःच घाबरून दूर व्हावं लागतं. माझ्या मते ह्या मंडळींवर शाररीक, मानसिक व आध्यात्मिक उपचार केले जायला हवेत.
आता पुढचा प्रतिसाद उलटवून -
जर हे विषमलैंगिक अनैसर्गीक तर मग असे प्राणी हे इतर प्राणी वर्गाच्या खालच्या पातळीचे की वरच्या? हे रुग्ण की निरोगी? अशा प्राण्यांसाठी गाजर की छडी?
तुम्ही अशी विषमलैंगिकांबद्दल टवाळी ऐकली आहे म्हणता? अशी टवाळी जर सामान्य असेल तर त्याविषयी आरडाओरड करू नये हे मान्य. पण मी तरी कधी नाही ऐकली. त्यामुळे माझ्या मित्रांनी याबबत आरडाओरड केली ते मला क्रमप्राप्त वाटले.

In reply to by धनंजय

कीव आत्मगौरवात्मक आहे की नाही यासाठी तुम्ही काय निकष वापरता? अमुक चार छाकट्यांनी (१) केवळ पुरोगामीपणा दाखवण्यासाठी केलेली आणि (२) पोकळ अशी, ही सहानुभूती आहे; आणि चार मुनुष्यांनी (१) याबद्दल विचार करून (२) खरी अशी साहानुभूती दाखवली आहे, यातला फरक तुम्हाला कसा कळतो?
"आय नो वन व्हेन आय सी वन" एवढेच म्हणू शकेन. एखाद्याचा पूर्वेतिहास (आधीचे प्रतिसाद व विरोधाभास) अभ्यासल्यास काही निष्कर्ष काढता येतात, असे मला वाटते. आणि हे निष्कर्ष माझ्यापुरते आहेत. मी ते इतरांवर लादलेले नाहीत.
अनेकदा चिरफाड होत नसतानाही, काही छाकटे मी किती पुरोगामी आहे दाखवण्यासांठी इतरांच्या विवंचना, दुःखे चघळत असतात.
"चीरफाड होत नसतानाही" या परिस्थितीचा त्या चर्चेशी संबंध काय होता? तिथे तर चीरफाड होत होती.
माझा प्रतिसाद केवळ त्या प्रतिसादापुरता आणि समलैंगिकतेच्या मुद्द्यापुरता मर्यादित नाही. बाय द वे, चिरफाड होत असताना तर काही बहरात येणारे "पुरोगामी"ही छाकटे असतात. विरोधकांप्रमाणेच त्यांनाही त्यांचे ऱ्हेटरिक पाजळण्याची चांगली संधी मिळते. (पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हे वाईट नाही. २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर जो "कँडललाइट पुरोगामीपणा" झाला होता तो वाईट नव्हताच. त्यातले अनेक जण प्रामाणिक होते. नंतर झालेल्या निवडणुकीत मात्र मतदानाच्या वेळी ही मंडळी कुठे गायब झाली होती? )
थोडक्यात, एखाद्या विषमलैंगिकाची जशी टिंगलटवाळी करतो तशीच समलैंगिकांची टिंगलटवाळी केल्यास कुणी आरडाओरडा करायला नको, असे मला वाटते.
ह्याचा अर्थ असा की जेवढी मोकळीक विषमलैंगिकांची मस्करी करताना असते तेवढीच समलैंगिकांसाठी गृहीत धरावी. त्या चर्चेवरील ते होमोफोबिक प्रतिसाद माझ्यामते दखल घेण्याच्या लायकीचेही नाहीत. अशा प्रतिसादांची दखल घेऊन उगाच तेच ते जुने युक्तिवाद, ऱ्हेटरिक परजण्यासाठी मला वेळ व रुची नाही, नव्हती. आणि तुम्ही ज्या प्रतिसादांना टवाळी म्हणताहात ती टवाळी नाही. तो होमोफोबिया असू शकतो किंवा हिडीसपणा. बाय द वे, तुम्ही जसे प्रतिसाद उलटवले तसे प्रतिसाद उलटवण्याची आयड्या छान आहे. तूर्तास एवढेच.

नीधप 14/07/2009 - 10:17
तुमचे प्रांजळ लिखाण आवडले. पुरोगामी असण्यापेक्षा माणूस असणं हे खरं आहे. बाकी सगळी लेबल्स. असं मला वाटतं. - नी
मागे दुसर्‍या एका मराठी संकेतस्थळावर "समलैंगिकता आणि समाज" चर्चा चालू होती, तिथे "डीजे" या आयडीखाली मी पुढील प्रतिसाद दिला होता. (त्या संकेतस्थळावर "धनंजय" हा आयडी उपलब्ध नाही, म्हणून वेगळा आयडी घेतला.) बारीक सारीक बदल करून - म्हणजे मिसळपावावरील माझ्या लेखाचा दुवा देऊन, तो प्रतिसाद येथे देत आहे. - - - एका सामाजिक विषयावर चर्चा चलली आहे, आणि अपेक्षेप्रमाणे मतमतांतरे ऐकू येत आहेत. या विषयाच्या अनुषंगाने आत्मकथन मी मिसळपावावर केले आहे.

भागवत सर

विनायक पाचलग ·

शितल 06/07/2009 - 22:11
विनायक, भागवत सरांच्या विषयी लिहुन तु तर सरांच्या बद्दल असलेला अनेक आठवणी जाग्या केल्यास. मी आठवीत असताना ते सर आमचे वर्ग शिक्षक होते, शिकविणे ही देखिल एक कला आहे हे त्याच्याकडे पाहुन कळते. त्यांनी मला एक शाईचा पेन बक्षिस दिला होता, त्याच्या संबंधित अनेक आठवणी अगदी मनात जपुन आहेत. :) माझा ही माझ्या लाडक्या सरांना प्रणाम !

चतुरंग 06/07/2009 - 22:21
तुझ्या भागवत सरांची ओळख आवडली. लेख जरी गडबडीत लिहिलेला असलास तरी खूपच ढोबळ चुका राहून गेलेल्या आहेत ज्या रसभंग करतात. लक्ष देणे गरजेचे. (खुद के साथ बातां : स्वेच्छानिवृत्तीनंतरही भागवत सरांना विनायकाच्या मराठीवर मेहनत घ्यावी लागणार असं दिसतंय रंगा! :? ) चतुरंग

प्राजु 06/07/2009 - 22:41
लेख आवडला. भागवत सरांना मी ही खूप वेळा भेटले आहे. नाटक नाट्यवाचन, वक्तृत्व अशा स्पर्धामंधून खूप वेळा भेटले आहे. प्रत्यक्ष त्यांचा सहवास नसला लाभला तरी एक कलाकार म्हणून नेहमीच त्यांचा आदर वाटत आला आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आपणा सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार. सध्या हा लेख सराना दाखवावा की नको या विचारात आहे आणि हो जमेल तशा चुका दुरुस्त करीन ,त्रासाबद्दल माफी असावी स्वार्थाचा लवलेशही नसावा गर्वाचा स्पर्शही नसावा असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा...... विनायक पाचलग

In reply to by नंदन

धनंजय 07/07/2009 - 06:40
ओळख चांगली झाली आहे. *आणि हो - आईशप्पथ सांगतो हा -* पूर्वीची बाळपंडिती भाषा सोडून स्वतःची खरी अशी शैली शोधणार्‍या लेखकाचे कौतुक करावे तितके थोडके.

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार सराना लेख देणार आहे. बघु कधी देइन ते. (धनंजय्,शैली बदलायचा प्रयत्न करतोय,पण ती आवडत आहे की नाही ते समजत नाही आहे.) स्वार्थाचा लवलेशही नसावा गर्वाचा स्पर्शही नसावा असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा...... विनायक पाचलग

विन्या, मस्तच लेख रे. तुझ्यातला बदल सुखावह दिशेने जात आहे. गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूजनांना छान आदरांजली रे. लिहित रहा. बिपिन कार्यकर्ते

मिहिर 07/07/2009 - 22:13
लेख छानच झाला आहे. =D> पण ५वीत तर भागवत सर आमच्या शाळेत होते (तवनाप्पा पाटणे हायस्कूल). तुमच्या वर्गात ते ऑफ लेक्चरला कसे आले? :?

शितल 06/07/2009 - 22:11
विनायक, भागवत सरांच्या विषयी लिहुन तु तर सरांच्या बद्दल असलेला अनेक आठवणी जाग्या केल्यास. मी आठवीत असताना ते सर आमचे वर्ग शिक्षक होते, शिकविणे ही देखिल एक कला आहे हे त्याच्याकडे पाहुन कळते. त्यांनी मला एक शाईचा पेन बक्षिस दिला होता, त्याच्या संबंधित अनेक आठवणी अगदी मनात जपुन आहेत. :) माझा ही माझ्या लाडक्या सरांना प्रणाम !

चतुरंग 06/07/2009 - 22:21
तुझ्या भागवत सरांची ओळख आवडली. लेख जरी गडबडीत लिहिलेला असलास तरी खूपच ढोबळ चुका राहून गेलेल्या आहेत ज्या रसभंग करतात. लक्ष देणे गरजेचे. (खुद के साथ बातां : स्वेच्छानिवृत्तीनंतरही भागवत सरांना विनायकाच्या मराठीवर मेहनत घ्यावी लागणार असं दिसतंय रंगा! :? ) चतुरंग

प्राजु 06/07/2009 - 22:41
लेख आवडला. भागवत सरांना मी ही खूप वेळा भेटले आहे. नाटक नाट्यवाचन, वक्तृत्व अशा स्पर्धामंधून खूप वेळा भेटले आहे. प्रत्यक्ष त्यांचा सहवास नसला लाभला तरी एक कलाकार म्हणून नेहमीच त्यांचा आदर वाटत आला आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आपणा सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार. सध्या हा लेख सराना दाखवावा की नको या विचारात आहे आणि हो जमेल तशा चुका दुरुस्त करीन ,त्रासाबद्दल माफी असावी स्वार्थाचा लवलेशही नसावा गर्वाचा स्पर्शही नसावा असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा...... विनायक पाचलग

In reply to by नंदन

धनंजय 07/07/2009 - 06:40
ओळख चांगली झाली आहे. *आणि हो - आईशप्पथ सांगतो हा -* पूर्वीची बाळपंडिती भाषा सोडून स्वतःची खरी अशी शैली शोधणार्‍या लेखकाचे कौतुक करावे तितके थोडके.

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार सराना लेख देणार आहे. बघु कधी देइन ते. (धनंजय्,शैली बदलायचा प्रयत्न करतोय,पण ती आवडत आहे की नाही ते समजत नाही आहे.) स्वार्थाचा लवलेशही नसावा गर्वाचा स्पर्शही नसावा असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा...... विनायक पाचलग

विन्या, मस्तच लेख रे. तुझ्यातला बदल सुखावह दिशेने जात आहे. गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूजनांना छान आदरांजली रे. लिहित रहा. बिपिन कार्यकर्ते

मिहिर 07/07/2009 - 22:13
लेख छानच झाला आहे. =D> पण ५वीत तर भागवत सर आमच्या शाळेत होते (तवनाप्पा पाटणे हायस्कूल). तुमच्या वर्गात ते ऑफ लेक्चरला कसे आले? :?
(विनंती- सध्या कॉलेजची परिक्षा सुरु असलेने लेख जरा गडबडीत लिहिला आहे,समजुन घ्यावे ही विनंती.) उद्या गुरुपौर्णिमा.गुरुला वंदन करायचा दिवस. उद्या अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रम होतील, वंदन वगैरे केले जाईल्, आणि गुरुंचे गुणगान गाईले जाईल ,जे अतिशय योग्य असेल. पण यावेळेस मी मात्र माझी गुरुपौर्णिमा वेगळ्या पद्धतीने साजरी करणार आहे. मागच्या वेळी मी गुरुपौर्णिमेला शिक्षकांवर एक लेख लिहिला होता.(अर्थात तो सकाळ मध्ये शिक्षक दिनाच्या वेळी प्रसिद्ध झाला हा भाग अलहिदा)पण यावेळी मी माझे जीवन बदलणार्‍या एका सरांबद्दल लिहिणार आहे.

मिपाभारत

परिकथेतील राजकुमार ·

विजुभाऊ 06/07/2009 - 13:02
या कुरुकक्षेत्रावर एका बाजूला वडापाव आणि दुसरीकडे तलम पानाचे धोतरे असे दोन स्टॉल लागले होते

ऋषिकेश 06/07/2009 - 13:19
=)) =)) =)) __/\__ =)) =)) =)) ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

विसोबा खेचर 06/07/2009 - 13:23
परा, बाबारे धन्य आहे तुझी! छान निरिक्षण शक्ति...
येव्हड्यात बाजुला जोरदार गलका ऐकु आला. तात्यानी कोणाचा तरी रथ हायजॅक केला होता म्हणे. शेवटी दुबईवर्तातील शेख बिका ह्यांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला.
हा हा हा! :) आपला, (भाग्यश्रीचा मित्र) तात्या. -- आमची सही - मिपा आहे हे असं आहे. ते आवडणार्‍यांचं स्वागतच आहे , न आवडणार्‍यांनी चपला घालायच्या अन् चालू पडायचं! :)

In reply to by विसोबा खेचर

आमची सही - मिपा आहे हे असं आहे. ते आवडणार्‍यांचं स्वागतच आहे , न आवडणार्‍यांनी चपला घालायच्या अन् चालू पडायचं! हेच आव्ड्ले =)) चुचु

हहपुवा. अवांतर : श्रीकृष्णाचे विपश्यनाव्रत चालु असल्याने ते मौनात होते तत्सत अर्जुनाला गीताज्ञान ऐकवण्यासाठी श्री श्री श्री बाबामहाराज सातारकर यांना पाचारण करण्याचे ठरले. पण त्यासाठी मोरारीबापु, आसारामबापु ई. ई. देखील रांगेत असल्याचे कळल्याने विधिवत टेंडर काढण्याचे सर्वानुमते ठरले असल्याचे कळले. सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

'लावा भांड्याला कल्हई' हे गाणे म्हणुन रामदासांनी त्याच्याच सारख्या शिरस्त्राण न मीळालेल्याना मदत सुरु केली.

अवलिया 06/07/2009 - 14:54
हाणतिच्यायला ! =)) --अवलिया कर्ण जन्मतःच कवचकुंडले घालून आला होता. आम्ही चपला घालून आलोत... केव्हा म्हणाल तेव्हा तयार आहे. (सौजन्य बिका)

In reply to by अवलिया

घाटावरचे भट 06/07/2009 - 15:29
असेच म्हणतो... - भटोबा "मेरे पास गाडी है, बंगला है, दौलत है.... तुम्हारे पास क्या है, आंय?" "... मेरे पास.... मेरे पास चपला हैं"

टारझन 06/07/2009 - 15:08
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) अक्षरशः फुटेश लेका !!! तोड फोड स्फोटक !! लेका .. तिकडे स्वाती ताई आणि दिपाली ताई कौरवांना फक्त पाककृतींचे फोटोज मेल करत होत्या ते नाही टाकलंस ? बरेच कौरव जळून जळून मेले की रं .. शितल काकु त्यात कौरवांना "काळ्या काळ्या " म्हणून चिडवून न्युनगंड आणत होत्याच !! मृगणयणीनं ही काव्यग्रंथ वाचून दाखवला, त्यामुळे सुद्धा बरेच कौरव यमावहन करत होते ... कोल्हापुरी दादांनी आपल्या निबंधांच्या स्कॅन कॉपीज चे पँप्लेट्स पुर्ण सेनेत वाटले , आणि खाली मोठ्या अक्षरांत "आणि हो, वाचा आणि प्रतिक्रिया द्या" लिहीलं होतं .. शुर शुर लढवय्यांनी सुद्धा चार पाच पॅरे वाचल्यावर स्वतःच्या हातातले भाल्यांनी स्वतःला खुपसून घेतले , काहींनी गदा घालून कपाळमोक्ष करून घेतला . दुशासनानं स्वतःहून आपली छाती फोडून घेतली आणि ते रक्त तो द्रौपदीला पोस्ट करून आला. भिमाला आपली प्रतिज्ञा अपुर्ण राहिल्यानं कोदांचा पत्ता शोधत हिंडत होता . तेवढ्यात कोदांनी आय.डी. बदलून "भयानक पाठलाग" ठेवला, आणि ते वाचले . तेवढ्यात कर्णाच्या चिलखताला कोणी तरी अरूण राव णाडी बांधतानादिसले . कृष्णाला त्या णाडीमुळे कर्ण अमर होईल की काय असे वाटल्याने त्यामे युद्धात णाडीवापराला बंदी केली ! राजे नेहमी प्रमाणे युद्धातून पळून जाऊन युद्धकॅंपात जाऊन आपल्या नविन चाटफ्रेंड बरोबर व्हाईस चाट करत होता हे मी स्वतः पाहिलं होतं .. (२० हॉर्सपावरचा महारथी ) टारझन रोस्सी

In reply to by टारझन

दशानन 06/07/2009 - 15:45
प्रचंड सहमत. =)) =)) =)) >>राजे नेहमी प्रमाणे युद्धातून पळून जाऊन युद्धकॅंपात जाऊन आपल्या नविन चाटफ्रेंड बरोबर व्हाईस चाट करत होता हे मी स्वतः पाहिलं होतं .. हाणतिच्यामायला ;) =)) थोडेसं नवीन !

In reply to by दशानन

अनिल हटेला 06/07/2009 - 15:59
शॉल्लीट मिपाभारत.... परा राजे धन्य आहात आपण ^^^^^ .... बची कसर टार्‍याने पूरी केली..... लगे रहो...................;-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

In reply to by अनिल हटेला

छोटा डॉन 06/07/2009 - 17:09
=)) =)) अफाट लेख आहे पराभौ, जहबहर्‍या जमला आहे. टार्‍याच्या प्रतिसादाने अजुन ४ चांद लागले. मजा आली ... चालु द्यात, अजुन असेच येऊद्यात ... ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by ब्रिटिश टिंग्या

छोटा डॉन 06/07/2009 - 17:36
>>- (कर्ण) टिंग्या =)) =)) वाचुन अंमळ मज्जा वाटली ... पण काय हो मालक, तुमची ती सुप्रसिद्ध अभेद्य कवचकुंडले उर्फ "गेंड्याची कातडी" आहे कुठे ? त्याचे मालकी हक्क दुसर्‍याच कुणाकडे आहेत असे ऐकले आहे, ह्याला आम्ही काय समजावे ? असो. ------ डॉन्या पांचाल एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by छोटा डॉन

>>वाचुन अंमळ मज्जा वाटली ... बरं...मग उसळ खा.....शिकरण खा! ऑम्लेट खाउन झालं असेलच! >>पण काय हो मालक, तुमची ती सुप्रसिद्ध अभेद्य कवचकुंडले उर्फ "गेंड्याची कातडी" आहे कुठे ? अहो, एका हलकट ब्राम्हणाने फसवणुकीने काढुन घेतली कवचकुंडले! आम्ही आनंदाने यात्रा करीत असताना, त्या हलकटाने दिलेला प्रसाद आम्ही भक्षण करताच मुळापासुन आमची कवचकुंडले गायब झाली हो! ;) >>त्याचे मालकी हक्क दुसर्‍याच कुणाकडे आहेत असे ऐकले आहे एव्हाना समजलेच असेल कोणाकडे आहेत ते! ;) - (कौरव का पांडव हे न समजलेला) टिंग्या

या मिपाभारतात..... आणि कौरव व पांडव आपापल्या राज्यात सुखाने नांदु लागले असा शेवट व्हनार. शेवटी ष्टोरीने प्रेक्षकांशी 'जवळीक' साधली पायजे कि नाय? प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by नीधप

Nile 06/07/2009 - 22:52
हहपुवा! (महाभारत पाहुन नेहमीच खो खो-खी खी होणार्‍या प्रेक्षकांपैकी एक)

ऍडीजोशी 06/07/2009 - 17:27
मेल्या परा, भेटच तू. तुझ्या समोर मी आणि धम्या सिंगल मॉल्ट ढोसू आणि तुला कॅरट ज्यूस प्यायला लाउ :) :) :)

सखाराम गटणे पुर्ण कुरुक्षेत्रात हातात काहीतरी लाकडी यंत्र घेउन फिरत होते. प्रत्येक रथापाशी जाउन ते यंत्राकडे बघत व "ह्म्म्म्म हा कुंभोजवरुन आलाय, हा द्वारकेहुन आलाय, हा साला प्रॉक्सीवाला दिसतोय" असे काहीतरी अगम्य बडबडत होते. काय काय लक्षात ठेवतोस रे???? लेख फक्क्ड जमला आहे. पुढचा लेख लवकर टाक.

खणखणीत रे परा... मोठ्ठा धमाका. हहपुवा झाली वाचताना. बाय द वे, कधी आलास इकडे फिरत फिरत तर उंट देईन तुला वापरायला. अरे खूपच मज्जा येते... ;) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अवलिया 06/07/2009 - 19:13
बिकाशेख ! उंट वापरायला का फिरायला? :? --अवलिया काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणा-यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाहीत ? आणि समलैंगिकांचे उदात्तीकरण पण केले नाही? अरेरे ! आधुनिक कसे म्हणवते तुम्हाला !!

In reply to by अवलिया

उंट वापरायला का फिरायला? अहो, ते तुमच्या त्या वेळच्या गरजेवर आणि मूडवर अवलंबून आहे. उंट तसा मल्टिपर्पज असतो. खुद के साथ बातां: हा नाना एकदा येऊच दे इथे. नाही त्याचाच उंट केला तर नाव नाही सांगणार. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अवलिया 06/07/2009 - 19:28
हा नाना एकदा येऊच दे इथे. नाही त्याचाच उंट केला तर नाव नाही सांगणार. हॅ हॅ हॅ शेखचिल्ली के हसीन सपने! :) --अवलिया काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणा-यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाहीत ? आणि समलैंगिकांचे उदात्तीकरण पण केले नाही? अरेरे ! आधुनिक कसे म्हणवते तुम्हाला !!

In reply to by अवलिया

दशानन 07/07/2009 - 00:19
=)) काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणार्‍यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाही ? आणि समलैंगीकांचे उदात्तीकरण पण केले नाही ? अरेरे ! स्वतःला आधुनीक कसे म्हणवते तुम्हाला ?

चतुरंग 06/07/2009 - 19:32
एकेक दृष्य डोळ्यांसमोर आले! =)) =)) अरे बाबा पण मी सारखा बुद्धीबळच खेळत नाही रे! :O भर युद्धातही मला रथावर बुद्धीबळं खेळायला बसवतोय मेला! X( चतुरंग

In reply to by चतुरंग

छोटा डॉन 06/07/2009 - 19:38
>>भर युद्धातही मला रथावर बुद्धीबळं खेळायला बसवतोय मेला! तेच तर म्हणतो मी. नाहितर रंगाशेठ आपले बुद्धिबळात मग्न, आसपास काय चालु आहे ह्याचा पत्या नाय. रंगाशेठ म्हणायचे " हांग्गाशी, झालास की नाही चेक-मेट, कसा नुस्ता उंटाच्य तिरक्या चालीत हाणला बेट्या तुला ..." आणि मागुन एक गदाधारी पैलवान ( टार्‍या नव्हे ) म्हणायचा " व्हय सायबानु, झालं का तुमचं, आता हाणु का मी डोस्क्यात गदा? " मग काय करता बोला ? स्वगत : चला पळा बाबा, उशीर झाला की फुकट ट्राफिक ज्यममध्ये ४-४ तास जातात ;) ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by विनायक प्रभू

मिसळभोक्ता 06/07/2009 - 22:47
क्वाश्चुम डिझाईन घाटपांड्यांनी केलेले असावे. -- मिसळभोक्ता (अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)

In reply to by मिसळभोक्ता

विसोबा खेचर 07/07/2009 - 01:00
क्वाश्चुम डिझाईन घाटपांड्यांनी केलेले असावे.
हम्म! मिसळभोक्त्या, अजून तुझा मूळचा भिकारचोट स्वभाव गेला नाही म्हणायचा! :) तात्या.

प्राजु 06/07/2009 - 20:16
पुन्हा एकदा सिद्ध केलं आहेस तू, की तू एक उत्तम लेखकच नव्हे तर इतिहास कर्ता सुद्धा आहेस.. ;) लगे रहो.. आवांतर : कुरूक्षेत्रावर आम्हाला प्रवेश न दिल्याबद्दल तुझा त्रिवार निषेध. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

ऋषिकेश 06/07/2009 - 20:42
आवांतर : कुरूक्षेत्रावर आम्हाला प्रवेश न दिल्याबद्दल तुझा त्रिवार निषेध
:) असेच म्हणतो ;) ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

माझ्या पाकृ ने कौरव जळुन मेलेत काय? :D , बाकी लेख फुल्ल TP आहे. दिपाली :)

स्वप्निल.. 07/07/2009 - 01:22
परा आणि टार्‍या, =)) दोघेही धन्य आहात.. हसुन पोट दुखायची वेळ आली .. =)) स्वप्निल

पक्या 07/07/2009 - 04:01
हा हा हा, मस्तच. मजा आली. युध्दभूमीवर शरदिनी ताई ही आल्या होत्या आपली काव्यघोरपड घेऊन. त्यांना पाहताच चंपीच्या भितीने निम्मे सैन्य तर झारीतल्या शुक्राचार्यांसारखे वितळून गेले.

प्रतिसाद देणार्‍या व न देणार्‍या सर्वांचे आभार __/\__ आभारी º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणार्‍यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाही ? आणि समलैंगीकांचे उदात्तीकरण पण केले नाही ? अरेरे ! स्वतःला आधुनीक कसे म्हणवते तुम्हाला ? आमचे राज्य

क्रान्ति 07/07/2009 - 13:44
परा आता थेट :? पुराणात? मला वाटतं यापुढं तो "मिपर्ववेद" लिहिणार! ;) {टारु लेखनिक असेल का?} :? क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

विश्वेश 14/07/2009 - 15:27
मी नविन आहे, म्हणुन अभिमन्यु चा रोल घेतो आणि बोलतो ... हे सगळे बघून मी वैतागलो आणि बाबाना विचारले ... च्यायला हे सुरु कधी होणार युद्घ ? बाबा म्हणाले "अरे हे असेच चालायचे ..... आमच्या टायमाला .... " (पुणेरी अर्जुन) .... पुढे बाबा जे बोलत होते तिकडे लक्ष्य गेले नाही कारण पंडवानी ३०% महिला आरक्षण नियमाचे उल्लंघन केले असे कोणीतरी ओरडत आले .... म्हणे पांडवामधे महिला नसून पुरुष लोक वेश परिवर्तन करून वावरत आहेत. माला पटकन बाबांच्या कपाळावर घाम फुटलेला दिसला. त्यानी गिरिधर काकांकडे (कृष्ण) पाहिले, ते नेहमीसारखे कुत्सित हसले आणि अचानक त्यानी मपा-गीता सांगायला सुरुवात केलि .... च्यायला ... आता बसा माश्या मारत अजुन २-४ दिवस .... बाबाना की त्यांच्या डमी ला ५-६ बायकांबरोबर पलायन करताना माझ्या डोळ्यानी हेरले ....

In reply to by विश्वेश

किचेन 12/04/2012 - 18:19
यानी गिरिधर काकांकडे (कृष्ण) पाहिले, ते नेहमीसारखे कुत्सित हसले आणि अचानक त्यानी मपा-गीता सांगायला सुरुवात केलि .... माझ्या पोटात कावळे कोकलायला लागले.मी मुदपाकखान्यात कि काय तिथे जाऊन बघितले तर गणपा मुख्य बल्लवाचार्य होते आणि पियुषा आणि मृणालिनी ह्या त्याना मदत (?) करत होत्या.स्वयंपाक खूपच लवकर होणार आहे हे जाणवल्याने मी रणांगणावर चक्कर टाकून परत इथे आलो तर बघतो काय....हे तिघे वपाडावला वडापाव बनवण्याची पाक्रु शिकवतायत.मी स्वत:च्या खिशातले १० रुपये खर्च करुन भैय्याकदुन पाणिपुरि खाल्लि.

यकु 12/04/2012 - 13:02
च्यामारी येवढा ऐतिहासिक धागा सध्‍याच्या महाभारतमय वातावरणात खाली? उप्पर खींचो, उप्पर खींचो!!! पराशेठ, केवळ _____/\_____ !!! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

In reply to by यकु

प्यारे१ 12/04/2012 - 13:09
+१+१+१+१+१++++ पराशेठ, केवळ _____/\_____ !!! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) आज की तारीख में ये सब अतिरथी महारथी कहाँ गायब हो गये है?

सुहास झेले 12/04/2012 - 17:02
हा हा हा ... हसून हसून फुटलो. =)) =)) =)) धागा उपर खेचणाऱ्या यकुशेठचे विशेष आभार ;)

विजुभाऊ 06/07/2009 - 13:02
या कुरुकक्षेत्रावर एका बाजूला वडापाव आणि दुसरीकडे तलम पानाचे धोतरे असे दोन स्टॉल लागले होते

ऋषिकेश 06/07/2009 - 13:19
=)) =)) =)) __/\__ =)) =)) =)) ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

विसोबा खेचर 06/07/2009 - 13:23
परा, बाबारे धन्य आहे तुझी! छान निरिक्षण शक्ति...
येव्हड्यात बाजुला जोरदार गलका ऐकु आला. तात्यानी कोणाचा तरी रथ हायजॅक केला होता म्हणे. शेवटी दुबईवर्तातील शेख बिका ह्यांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला.
हा हा हा! :) आपला, (भाग्यश्रीचा मित्र) तात्या. -- आमची सही - मिपा आहे हे असं आहे. ते आवडणार्‍यांचं स्वागतच आहे , न आवडणार्‍यांनी चपला घालायच्या अन् चालू पडायचं! :)

In reply to by विसोबा खेचर

आमची सही - मिपा आहे हे असं आहे. ते आवडणार्‍यांचं स्वागतच आहे , न आवडणार्‍यांनी चपला घालायच्या अन् चालू पडायचं! हेच आव्ड्ले =)) चुचु

हहपुवा. अवांतर : श्रीकृष्णाचे विपश्यनाव्रत चालु असल्याने ते मौनात होते तत्सत अर्जुनाला गीताज्ञान ऐकवण्यासाठी श्री श्री श्री बाबामहाराज सातारकर यांना पाचारण करण्याचे ठरले. पण त्यासाठी मोरारीबापु, आसारामबापु ई. ई. देखील रांगेत असल्याचे कळल्याने विधिवत टेंडर काढण्याचे सर्वानुमते ठरले असल्याचे कळले. सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

'लावा भांड्याला कल्हई' हे गाणे म्हणुन रामदासांनी त्याच्याच सारख्या शिरस्त्राण न मीळालेल्याना मदत सुरु केली.

अवलिया 06/07/2009 - 14:54
हाणतिच्यायला ! =)) --अवलिया कर्ण जन्मतःच कवचकुंडले घालून आला होता. आम्ही चपला घालून आलोत... केव्हा म्हणाल तेव्हा तयार आहे. (सौजन्य बिका)

In reply to by अवलिया

घाटावरचे भट 06/07/2009 - 15:29
असेच म्हणतो... - भटोबा "मेरे पास गाडी है, बंगला है, दौलत है.... तुम्हारे पास क्या है, आंय?" "... मेरे पास.... मेरे पास चपला हैं"

टारझन 06/07/2009 - 15:08
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) अक्षरशः फुटेश लेका !!! तोड फोड स्फोटक !! लेका .. तिकडे स्वाती ताई आणि दिपाली ताई कौरवांना फक्त पाककृतींचे फोटोज मेल करत होत्या ते नाही टाकलंस ? बरेच कौरव जळून जळून मेले की रं .. शितल काकु त्यात कौरवांना "काळ्या काळ्या " म्हणून चिडवून न्युनगंड आणत होत्याच !! मृगणयणीनं ही काव्यग्रंथ वाचून दाखवला, त्यामुळे सुद्धा बरेच कौरव यमावहन करत होते ... कोल्हापुरी दादांनी आपल्या निबंधांच्या स्कॅन कॉपीज चे पँप्लेट्स पुर्ण सेनेत वाटले , आणि खाली मोठ्या अक्षरांत "आणि हो, वाचा आणि प्रतिक्रिया द्या" लिहीलं होतं .. शुर शुर लढवय्यांनी सुद्धा चार पाच पॅरे वाचल्यावर स्वतःच्या हातातले भाल्यांनी स्वतःला खुपसून घेतले , काहींनी गदा घालून कपाळमोक्ष करून घेतला . दुशासनानं स्वतःहून आपली छाती फोडून घेतली आणि ते रक्त तो द्रौपदीला पोस्ट करून आला. भिमाला आपली प्रतिज्ञा अपुर्ण राहिल्यानं कोदांचा पत्ता शोधत हिंडत होता . तेवढ्यात कोदांनी आय.डी. बदलून "भयानक पाठलाग" ठेवला, आणि ते वाचले . तेवढ्यात कर्णाच्या चिलखताला कोणी तरी अरूण राव णाडी बांधतानादिसले . कृष्णाला त्या णाडीमुळे कर्ण अमर होईल की काय असे वाटल्याने त्यामे युद्धात णाडीवापराला बंदी केली ! राजे नेहमी प्रमाणे युद्धातून पळून जाऊन युद्धकॅंपात जाऊन आपल्या नविन चाटफ्रेंड बरोबर व्हाईस चाट करत होता हे मी स्वतः पाहिलं होतं .. (२० हॉर्सपावरचा महारथी ) टारझन रोस्सी

In reply to by टारझन

दशानन 06/07/2009 - 15:45
प्रचंड सहमत. =)) =)) =)) >>राजे नेहमी प्रमाणे युद्धातून पळून जाऊन युद्धकॅंपात जाऊन आपल्या नविन चाटफ्रेंड बरोबर व्हाईस चाट करत होता हे मी स्वतः पाहिलं होतं .. हाणतिच्यामायला ;) =)) थोडेसं नवीन !

In reply to by दशानन

अनिल हटेला 06/07/2009 - 15:59
शॉल्लीट मिपाभारत.... परा राजे धन्य आहात आपण ^^^^^ .... बची कसर टार्‍याने पूरी केली..... लगे रहो...................;-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

In reply to by अनिल हटेला

छोटा डॉन 06/07/2009 - 17:09
=)) =)) अफाट लेख आहे पराभौ, जहबहर्‍या जमला आहे. टार्‍याच्या प्रतिसादाने अजुन ४ चांद लागले. मजा आली ... चालु द्यात, अजुन असेच येऊद्यात ... ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by ब्रिटिश टिंग्या

छोटा डॉन 06/07/2009 - 17:36
>>- (कर्ण) टिंग्या =)) =)) वाचुन अंमळ मज्जा वाटली ... पण काय हो मालक, तुमची ती सुप्रसिद्ध अभेद्य कवचकुंडले उर्फ "गेंड्याची कातडी" आहे कुठे ? त्याचे मालकी हक्क दुसर्‍याच कुणाकडे आहेत असे ऐकले आहे, ह्याला आम्ही काय समजावे ? असो. ------ डॉन्या पांचाल एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by छोटा डॉन

>>वाचुन अंमळ मज्जा वाटली ... बरं...मग उसळ खा.....शिकरण खा! ऑम्लेट खाउन झालं असेलच! >>पण काय हो मालक, तुमची ती सुप्रसिद्ध अभेद्य कवचकुंडले उर्फ "गेंड्याची कातडी" आहे कुठे ? अहो, एका हलकट ब्राम्हणाने फसवणुकीने काढुन घेतली कवचकुंडले! आम्ही आनंदाने यात्रा करीत असताना, त्या हलकटाने दिलेला प्रसाद आम्ही भक्षण करताच मुळापासुन आमची कवचकुंडले गायब झाली हो! ;) >>त्याचे मालकी हक्क दुसर्‍याच कुणाकडे आहेत असे ऐकले आहे एव्हाना समजलेच असेल कोणाकडे आहेत ते! ;) - (कौरव का पांडव हे न समजलेला) टिंग्या

या मिपाभारतात..... आणि कौरव व पांडव आपापल्या राज्यात सुखाने नांदु लागले असा शेवट व्हनार. शेवटी ष्टोरीने प्रेक्षकांशी 'जवळीक' साधली पायजे कि नाय? प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by नीधप

Nile 06/07/2009 - 22:52
हहपुवा! (महाभारत पाहुन नेहमीच खो खो-खी खी होणार्‍या प्रेक्षकांपैकी एक)

ऍडीजोशी 06/07/2009 - 17:27
मेल्या परा, भेटच तू. तुझ्या समोर मी आणि धम्या सिंगल मॉल्ट ढोसू आणि तुला कॅरट ज्यूस प्यायला लाउ :) :) :)

सखाराम गटणे पुर्ण कुरुक्षेत्रात हातात काहीतरी लाकडी यंत्र घेउन फिरत होते. प्रत्येक रथापाशी जाउन ते यंत्राकडे बघत व "ह्म्म्म्म हा कुंभोजवरुन आलाय, हा द्वारकेहुन आलाय, हा साला प्रॉक्सीवाला दिसतोय" असे काहीतरी अगम्य बडबडत होते. काय काय लक्षात ठेवतोस रे???? लेख फक्क्ड जमला आहे. पुढचा लेख लवकर टाक.

खणखणीत रे परा... मोठ्ठा धमाका. हहपुवा झाली वाचताना. बाय द वे, कधी आलास इकडे फिरत फिरत तर उंट देईन तुला वापरायला. अरे खूपच मज्जा येते... ;) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अवलिया 06/07/2009 - 19:13
बिकाशेख ! उंट वापरायला का फिरायला? :? --अवलिया काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणा-यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाहीत ? आणि समलैंगिकांचे उदात्तीकरण पण केले नाही? अरेरे ! आधुनिक कसे म्हणवते तुम्हाला !!

In reply to by अवलिया

उंट वापरायला का फिरायला? अहो, ते तुमच्या त्या वेळच्या गरजेवर आणि मूडवर अवलंबून आहे. उंट तसा मल्टिपर्पज असतो. खुद के साथ बातां: हा नाना एकदा येऊच दे इथे. नाही त्याचाच उंट केला तर नाव नाही सांगणार. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अवलिया 06/07/2009 - 19:28
हा नाना एकदा येऊच दे इथे. नाही त्याचाच उंट केला तर नाव नाही सांगणार. हॅ हॅ हॅ शेखचिल्ली के हसीन सपने! :) --अवलिया काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणा-यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाहीत ? आणि समलैंगिकांचे उदात्तीकरण पण केले नाही? अरेरे ! आधुनिक कसे म्हणवते तुम्हाला !!

In reply to by अवलिया

दशानन 07/07/2009 - 00:19
=)) काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणार्‍यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाही ? आणि समलैंगीकांचे उदात्तीकरण पण केले नाही ? अरेरे ! स्वतःला आधुनीक कसे म्हणवते तुम्हाला ?

चतुरंग 06/07/2009 - 19:32
एकेक दृष्य डोळ्यांसमोर आले! =)) =)) अरे बाबा पण मी सारखा बुद्धीबळच खेळत नाही रे! :O भर युद्धातही मला रथावर बुद्धीबळं खेळायला बसवतोय मेला! X( चतुरंग

In reply to by चतुरंग

छोटा डॉन 06/07/2009 - 19:38
>>भर युद्धातही मला रथावर बुद्धीबळं खेळायला बसवतोय मेला! तेच तर म्हणतो मी. नाहितर रंगाशेठ आपले बुद्धिबळात मग्न, आसपास काय चालु आहे ह्याचा पत्या नाय. रंगाशेठ म्हणायचे " हांग्गाशी, झालास की नाही चेक-मेट, कसा नुस्ता उंटाच्य तिरक्या चालीत हाणला बेट्या तुला ..." आणि मागुन एक गदाधारी पैलवान ( टार्‍या नव्हे ) म्हणायचा " व्हय सायबानु, झालं का तुमचं, आता हाणु का मी डोस्क्यात गदा? " मग काय करता बोला ? स्वगत : चला पळा बाबा, उशीर झाला की फुकट ट्राफिक ज्यममध्ये ४-४ तास जातात ;) ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by विनायक प्रभू

मिसळभोक्ता 06/07/2009 - 22:47
क्वाश्चुम डिझाईन घाटपांड्यांनी केलेले असावे. -- मिसळभोक्ता (अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)

In reply to by मिसळभोक्ता

विसोबा खेचर 07/07/2009 - 01:00
क्वाश्चुम डिझाईन घाटपांड्यांनी केलेले असावे.
हम्म! मिसळभोक्त्या, अजून तुझा मूळचा भिकारचोट स्वभाव गेला नाही म्हणायचा! :) तात्या.

प्राजु 06/07/2009 - 20:16
पुन्हा एकदा सिद्ध केलं आहेस तू, की तू एक उत्तम लेखकच नव्हे तर इतिहास कर्ता सुद्धा आहेस.. ;) लगे रहो.. आवांतर : कुरूक्षेत्रावर आम्हाला प्रवेश न दिल्याबद्दल तुझा त्रिवार निषेध. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

ऋषिकेश 06/07/2009 - 20:42
आवांतर : कुरूक्षेत्रावर आम्हाला प्रवेश न दिल्याबद्दल तुझा त्रिवार निषेध
:) असेच म्हणतो ;) ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

माझ्या पाकृ ने कौरव जळुन मेलेत काय? :D , बाकी लेख फुल्ल TP आहे. दिपाली :)

स्वप्निल.. 07/07/2009 - 01:22
परा आणि टार्‍या, =)) दोघेही धन्य आहात.. हसुन पोट दुखायची वेळ आली .. =)) स्वप्निल

पक्या 07/07/2009 - 04:01
हा हा हा, मस्तच. मजा आली. युध्दभूमीवर शरदिनी ताई ही आल्या होत्या आपली काव्यघोरपड घेऊन. त्यांना पाहताच चंपीच्या भितीने निम्मे सैन्य तर झारीतल्या शुक्राचार्यांसारखे वितळून गेले.

प्रतिसाद देणार्‍या व न देणार्‍या सर्वांचे आभार __/\__ आभारी º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणार्‍यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाही ? आणि समलैंगीकांचे उदात्तीकरण पण केले नाही ? अरेरे ! स्वतःला आधुनीक कसे म्हणवते तुम्हाला ? आमचे राज्य

क्रान्ति 07/07/2009 - 13:44
परा आता थेट :? पुराणात? मला वाटतं यापुढं तो "मिपर्ववेद" लिहिणार! ;) {टारु लेखनिक असेल का?} :? क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

विश्वेश 14/07/2009 - 15:27
मी नविन आहे, म्हणुन अभिमन्यु चा रोल घेतो आणि बोलतो ... हे सगळे बघून मी वैतागलो आणि बाबाना विचारले ... च्यायला हे सुरु कधी होणार युद्घ ? बाबा म्हणाले "अरे हे असेच चालायचे ..... आमच्या टायमाला .... " (पुणेरी अर्जुन) .... पुढे बाबा जे बोलत होते तिकडे लक्ष्य गेले नाही कारण पंडवानी ३०% महिला आरक्षण नियमाचे उल्लंघन केले असे कोणीतरी ओरडत आले .... म्हणे पांडवामधे महिला नसून पुरुष लोक वेश परिवर्तन करून वावरत आहेत. माला पटकन बाबांच्या कपाळावर घाम फुटलेला दिसला. त्यानी गिरिधर काकांकडे (कृष्ण) पाहिले, ते नेहमीसारखे कुत्सित हसले आणि अचानक त्यानी मपा-गीता सांगायला सुरुवात केलि .... च्यायला ... आता बसा माश्या मारत अजुन २-४ दिवस .... बाबाना की त्यांच्या डमी ला ५-६ बायकांबरोबर पलायन करताना माझ्या डोळ्यानी हेरले ....

In reply to by विश्वेश

किचेन 12/04/2012 - 18:19
यानी गिरिधर काकांकडे (कृष्ण) पाहिले, ते नेहमीसारखे कुत्सित हसले आणि अचानक त्यानी मपा-गीता सांगायला सुरुवात केलि .... माझ्या पोटात कावळे कोकलायला लागले.मी मुदपाकखान्यात कि काय तिथे जाऊन बघितले तर गणपा मुख्य बल्लवाचार्य होते आणि पियुषा आणि मृणालिनी ह्या त्याना मदत (?) करत होत्या.स्वयंपाक खूपच लवकर होणार आहे हे जाणवल्याने मी रणांगणावर चक्कर टाकून परत इथे आलो तर बघतो काय....हे तिघे वपाडावला वडापाव बनवण्याची पाक्रु शिकवतायत.मी स्वत:च्या खिशातले १० रुपये खर्च करुन भैय्याकदुन पाणिपुरि खाल्लि.

यकु 12/04/2012 - 13:02
च्यामारी येवढा ऐतिहासिक धागा सध्‍याच्या महाभारतमय वातावरणात खाली? उप्पर खींचो, उप्पर खींचो!!! पराशेठ, केवळ _____/\_____ !!! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

In reply to by यकु

प्यारे१ 12/04/2012 - 13:09
+१+१+१+१+१++++ पराशेठ, केवळ _____/\_____ !!! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) आज की तारीख में ये सब अतिरथी महारथी कहाँ गायब हो गये है?

सुहास झेले 12/04/2012 - 17:02
हा हा हा ... हसून हसून फुटलो. =)) =)) =)) धागा उपर खेचणाऱ्या यकुशेठचे विशेष आभार ;)
धिस पिक्चर इज जॉइंट प्रॉडक्शन ऑफ विप्र. खोपडा अ‍ॅंड परा थोपडा. मुळ कथा : बाबा म्हाराज ठाणेकर डायरेक्टर ,स्क्रिप्ट राईटींग : परा एडीटींग : धम्मु (अतिरिक्त भार) मुझी़क : विजूभौ सातारवी अँड प्रमोद देव बॅ़ग्राउंड मुझीक : प्रमोद देव फायनान्स : तात्या भयंकर स्टार कास्ट : नेहेमीचे यशस्वी मिपाकर पुनरपी मरणम पुनरपी जननम (पीत पीत जगणारे, आणि मरणारे) ह्या न्यायाने मिपाकर सुद्धा म्हाभारतातील युद्धात हजर होते. बहुतेक सर्व पांडवांच्या पार्टीत होते. काही चपला घातलेले कौरवांच्या पार्टीत होते. टारझन भीमाच्या बाजुला उभा होता.

पडसे

विजुभाऊ ·

In reply to by विंजिनेर

विजुभाऊ 25/06/2009 - 15:45
आदरणीय विजीनेर साहेब रावसाहेबजी. तुमची प्रतिक्रीया वाचली. लेखातली भाषेची गम्मत तुम्हाला समजलेली दिसत नाही एखादी प्रतिक्रीया नेगेटीव्ह आली की पुढच्या तशाच लिहायच्या अशी सध्याची फॅशन दिसते मिपावर. असो. लेख म्हणून ते फार काही ग्रेट नाही . फक्त त्यातली भाषेचीगम्मत आपल्या आकलनापलीकडची असेल हे मी ध्यानात घेउ शकलो नाही पण एकूणच तुमची प्रतिक्रीया ही मला मुद्दा न समजून घेताच धोपटण्याचा हा प्रकार वाटतो. असो. अवांतरः आपल्या सारख्या महान आदरणीय सातत्याने आषयगर्भ प्रतीसाद लिहिणार्‍या महामहीम थोर लेखकाने कधी मिपावर किंवा इतरत्र एखादा आषयघन लेखन काव्य वगैरे कधी प्रकाशीत केले आहे?

In reply to by विजुभाऊ

विंजिनेर 25/06/2009 - 18:25
तुमची प्रतिक्रीया वाचली.
धन्यवाद... अतिअवांतर : आता अवांतर प्रतिक्रिया नोंदवयाला हरकत नसावी....
आपल्या सारख्या महान आदरणीय सातत्याने आषयगर्भ प्रतीसाद लिहिणार्‍या महामहीम थोर लेखकाने
कस्चं कस्चं... मला माझं नावसुद्धा धड एका भाशेत (की भाषेत? ;) शब्द बरोबर आहे ना?) नीट लिहिता येत नाही. तेव्हा मी अडाणीच.
कधी मिपावर किंवा इतरत्र एखादा आषयघन लेखन काव्य वगैरे कधी प्रकाशीत केले आहे
हा काय जुलुमाचा राम राम आहे? एखादा लेख बकवास आहे म्ह्टले की टाक आषयघन लेखाचे सर्टिपिकीट.. असो. आपल्या प्रतिक्रिया अशाच दिलखुलास असतात कुणाला पटल्या तर घ्याव्यात नाही तर द्याव्या सोडून. ---- कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

सूहास 25/06/2009 - 14:43
ए क अ क्ष र क ळ ल अ स ल त र श प थ सुहास आयुष्य म्हणजे इश्वराने घातलेले कोडे,उभ्या - आडव्या मार्गाचे, काळ्या - पांढर्‍या चौकोनांचे,आडव्या मार्गाने पुढे जायचे तर, उभ्या मार्गाने झेप घ्यायचे,काळे चौकोन मात्र वगळायचे, कोडे आपणच सोडवत रहायचे,यशासाठी प्रयत्नांत झुरायचे, मधे अडल्यास इश्वरास विनवायचे.. सौजन्य : जागुताई...

लिखाळ 25/06/2009 - 15:50
बजेदार कल्पना :) पण लहानसे स्फुट म्हणूनच ठीक..तुम्ही क्रमशः गोष्ट लिहिणार आहत काय !.. पाहू पुढच्या भागात छोटी मुलगी किती शिंकते ते :) (ह. घ्या.) पडसे म्हणजे नक्की सर्दी की खोकला? मला पडसे म्हणजे खोकला असे वाटत होते. माझा काही गोंधळ होत असावा. -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

धमाल मुलगा 25/06/2009 - 16:07
हे काय भणायच्च भौ? आज असा का लेख लिहिलाय? तुबाला इतकी सड्दी जालीए का? अहो, बग विक्स अ‍ॅक्शन घ्या दा! (सुर्रर्रर्रर्रर्रर्र...... [गळकं नाक ओढल्याचा आवाज!] ) दे जाऊद्या, आता दुभ्ही ह्या भाषेत आख्खी लेखबाला टाकडाड का? बेलो!!!!! बी टोट्टल गड्डणाड आता :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

इजुभौ तुम्हाला पडसे झाले आहे का किबोर्ड ला ? ;) एकुणच लेखाचा प्रकार नविन आणी मजेशीर. º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

प्राजु 25/06/2009 - 19:45
लिखाळशी सहमत आहे. छोटेखानी लेख म्हणूनच ठीक आहे. क्रमशः करून आता अख्ख्या मिपाला सर्दीची लागण नका देऊ. :) पहिला पॅरा वाचेपर्यंत गंमत वाटत होती पण शेवटपर्यंत वाचताना कंटाळा आला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by विंजिनेर

विजुभाऊ 25/06/2009 - 15:45
आदरणीय विजीनेर साहेब रावसाहेबजी. तुमची प्रतिक्रीया वाचली. लेखातली भाषेची गम्मत तुम्हाला समजलेली दिसत नाही एखादी प्रतिक्रीया नेगेटीव्ह आली की पुढच्या तशाच लिहायच्या अशी सध्याची फॅशन दिसते मिपावर. असो. लेख म्हणून ते फार काही ग्रेट नाही . फक्त त्यातली भाषेचीगम्मत आपल्या आकलनापलीकडची असेल हे मी ध्यानात घेउ शकलो नाही पण एकूणच तुमची प्रतिक्रीया ही मला मुद्दा न समजून घेताच धोपटण्याचा हा प्रकार वाटतो. असो. अवांतरः आपल्या सारख्या महान आदरणीय सातत्याने आषयगर्भ प्रतीसाद लिहिणार्‍या महामहीम थोर लेखकाने कधी मिपावर किंवा इतरत्र एखादा आषयघन लेखन काव्य वगैरे कधी प्रकाशीत केले आहे?

In reply to by विजुभाऊ

विंजिनेर 25/06/2009 - 18:25
तुमची प्रतिक्रीया वाचली.
धन्यवाद... अतिअवांतर : आता अवांतर प्रतिक्रिया नोंदवयाला हरकत नसावी....
आपल्या सारख्या महान आदरणीय सातत्याने आषयगर्भ प्रतीसाद लिहिणार्‍या महामहीम थोर लेखकाने
कस्चं कस्चं... मला माझं नावसुद्धा धड एका भाशेत (की भाषेत? ;) शब्द बरोबर आहे ना?) नीट लिहिता येत नाही. तेव्हा मी अडाणीच.
कधी मिपावर किंवा इतरत्र एखादा आषयघन लेखन काव्य वगैरे कधी प्रकाशीत केले आहे
हा काय जुलुमाचा राम राम आहे? एखादा लेख बकवास आहे म्ह्टले की टाक आषयघन लेखाचे सर्टिपिकीट.. असो. आपल्या प्रतिक्रिया अशाच दिलखुलास असतात कुणाला पटल्या तर घ्याव्यात नाही तर द्याव्या सोडून. ---- कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

सूहास 25/06/2009 - 14:43
ए क अ क्ष र क ळ ल अ स ल त र श प थ सुहास आयुष्य म्हणजे इश्वराने घातलेले कोडे,उभ्या - आडव्या मार्गाचे, काळ्या - पांढर्‍या चौकोनांचे,आडव्या मार्गाने पुढे जायचे तर, उभ्या मार्गाने झेप घ्यायचे,काळे चौकोन मात्र वगळायचे, कोडे आपणच सोडवत रहायचे,यशासाठी प्रयत्नांत झुरायचे, मधे अडल्यास इश्वरास विनवायचे.. सौजन्य : जागुताई...

लिखाळ 25/06/2009 - 15:50
बजेदार कल्पना :) पण लहानसे स्फुट म्हणूनच ठीक..तुम्ही क्रमशः गोष्ट लिहिणार आहत काय !.. पाहू पुढच्या भागात छोटी मुलगी किती शिंकते ते :) (ह. घ्या.) पडसे म्हणजे नक्की सर्दी की खोकला? मला पडसे म्हणजे खोकला असे वाटत होते. माझा काही गोंधळ होत असावा. -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

धमाल मुलगा 25/06/2009 - 16:07
हे काय भणायच्च भौ? आज असा का लेख लिहिलाय? तुबाला इतकी सड्दी जालीए का? अहो, बग विक्स अ‍ॅक्शन घ्या दा! (सुर्रर्रर्रर्रर्रर्र...... [गळकं नाक ओढल्याचा आवाज!] ) दे जाऊद्या, आता दुभ्ही ह्या भाषेत आख्खी लेखबाला टाकडाड का? बेलो!!!!! बी टोट्टल गड्डणाड आता :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

इजुभौ तुम्हाला पडसे झाले आहे का किबोर्ड ला ? ;) एकुणच लेखाचा प्रकार नविन आणी मजेशीर. º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

प्राजु 25/06/2009 - 19:45
लिखाळशी सहमत आहे. छोटेखानी लेख म्हणूनच ठीक आहे. क्रमशः करून आता अख्ख्या मिपाला सर्दीची लागण नका देऊ. :) पहिला पॅरा वाचेपर्यंत गंमत वाटत होती पण शेवटपर्यंत वाचताना कंटाळा आला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
दबस्कार बित्रादो पावसाळा आला हा हबखास सर्दीचा सीझद. आता कुडाला सर्दी जाली त्याचे दाक हमखास चोद्दते.दाक असे बद्द झाले की पच्चाइत होते. सर्दी झालेल्या दाकादे काहिही बोलले तरी त्याचे कै च्या कै ऐकले जाते. बघादा आता बला जदातले बदातले असे भडायचे होते.पड ते ऐकु येतादाच विचित्र ऐकु येते. पावसातली सहल भडली की बला त्या दत्तरचे दोद तीद दिवस असेच बोलावे लागते. सगळी सादुदासीक व्यज्ज्दे अशी बदबदीत होउद जातात बग ठरवतो की बोलतदा सादुदासीक शब्द टाळूद बोलायचे बी असेच एक दिवस भरपूर पावसात कोकडात गेलो होतो. गुहागरला. चिपळूडहूद रत्दागिरी रस्त्यादे द जाता आत जायचे .

आंतरराष्ट्रीय सौजन्य!!!

प्राजु ·

हरकाम्या 09/06/2009 - 02:03
अहो ताई लेख जरावाईच ल्हाण कराहो वाचताना पार झोप लागायची वेळ आली .

गम्मत आहे. :) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

मुक्तसुनीत 09/06/2009 - 03:36
किस्सा रोचक आहे. "चिंकी" आणि तद्भव शब्द हे इतर अनेक शब्दांसारखे विशिष्ट वंशातील लोकांना उद्देशून आणि त्या वंशाचा अपमान करणारे आहेत असा रूढ समज आहे. संदर्भासाठी हा दुवा पहावा. असे अनेक संदर्भ उपलब्ध आहेत. हे शब्द वापरणे अशिष्टसंमत आहे. किंबहुना , कुठल्याही घटनेचे वर्णन करताना त्यातील व्यक्तींच्या वर्ण/जाती/वंशाचा उल्लेख अनावश्यक ठरतो. (संपादक - अपमानास्पद शब्द काढून टाकून संपादन केले आहे.)

In reply to by मुक्तसुनीत

टिउ 09/06/2009 - 04:29
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे...पण बर्‍याचदा हे शब्द वापरण्यामागे अपमान/वंशभेद या भावना नसतात/नसाव्यात असं वाटतं. तरीही असले उल्लेख टाळावे या तुमच्या मताशी सहमत! बाकी किस्सा भारीच आहे...मी तर म्हणेन असले शेजारी असतील तर रात्री दोन तीनदा घरातनंच गाडी लॉक/अनलॉक करावी! सौजन्याची ऐशी तैशी!!!

In reply to by मुक्तसुनीत

चिंकी इ. शब्द हे अपमानकारक आहेत हा आपला मुद्दा अत्यंत बरोबर आहे. ह्या लेखात वारंवार ह्या श्ब्दाचा उल्लेख वाचून आश्चर्य वाटले.

In reply to by कालिन्दि मुधोळ्कर

हुप्प्या 09/06/2009 - 07:23
पॉलिटिकल करेक्टनेसच्या नावाखाली आपण अतिरेकी हळवे, संवेदनाशील वगैरे झालो आहोत. चिंकी हा शब्द अपमानकारकच वाटला पाहिजे असे नाही. तशात मिसळपाव वाचणारे किती चिनी भाई आहेत? अगदी कुणाला तोंडावर कुठलेसे शेलके विशेषण म्हणणे वेगळे आणि असे लिहिणे वेगळे. थोडक्यात चिंकी वगैरे म्हटले की बरीच स्वभाववैशिष्ट्ये पटकन लक्षात येतात. उगाच जडजंबाल पण पॉलिटिकली करेक्ट कशाला लिहायचे? भारतीयही गुल्टी, बिहारी व घाटी म्हणतातच. त्यात त्या गटाचा निव्वळ अपमान करायचा असतो असे समजणे चुकीचे आहे.

In reply to by हुप्प्या

मुक्तसुनीत 09/06/2009 - 07:33
या न्यायाने "निग्रो" , "म्हारड्या" वगैरे वगैरे शब्दांमधून सुद्धा काय काय वैशिष्ट्ये व्यक्त होतात तेही ऐकायला आवडेल :-)

In reply to by घाटावरचे भट

टारझन 09/06/2009 - 21:09
'चिली चिकन' हा शब्द कसा वाटतो?
=)) =)) एकदम चोक्कस ... मस्त रे भटा .. जुणा शब्द आहे हा .. आम्ही चायनिज च्या हातगाडीवर कामं करणार्‍या णेपाळी-मणिपुरी पोरांना असंच म्हणायचो .. प्राजु ताई .. लेख आवडला आहे .. क्लास ...अजुन येउन देत गं (नजरकैद) टा.रू.सावरकर

In reply to by मुक्तसुनीत

मुसुरावांशी सहमत. अवांतरः 'म्हारड्या' या शब्दातून प्रचंडी रडी माणसे आठवतात. आम्ही आमच्या एका भयंकर रड्या मित्राला 'महारड्या' म्हणायचो. पण आमच्या शाळेतल्या बाईना आम्ही त्याला 'म्हारड्या' म्हणतो असे वाटायचे. :) म्हणून एकदा बाईनी चांगलेच झाडले होते मला. (पॉलिटीकली करेक्ट) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

In reply to by हुप्प्या

चतुरंग 09/06/2009 - 16:26
कदाचित पंधरावीस वर्षांपूर्वी तितकासा जाणवलाही नसता. आज परिस्थिती फार बदलली आहे. 'चिंकी' हा शब्द चिन्यांसाठी वापरतात हे मला माहीत होते, मी ही वापरायचो पण तो इथे अवमानकारक शब्दात मोडतो हे मला अमेरिकेत असून ठाऊक नव्हते. हा माहिती असण्याचा प्रश्न आहे. चुकीची सवय पडू नये आणि कुठे भलत्याच ठिकाणी हा शब्द बोलला जाऊ नये ह्या हेतून ही दुरुस्ती मला अतिरेक वाटत नाही. (तसे खाजगी संभाषणातून आपण सर्वच जण बरेच शब्द वापरत असू, म्हणून सगळेच सर्रास लिहायचे म्हटले तर आफत ओढवेल!) चतुरंग

चतुरंग 09/06/2009 - 04:57
आपल्या कारमागे हायवेवरती अचानक मोठ्याने हॉर्न वाजवला, म्हणून कोणातरी आडदांड विक्षिप्त अमेरिकनाकडून ह्या माणसाचा अपमान झाला असावा! त्या अपमानाने आणि भीतीने ह्याच्या मनात घर केल्याने येईल जाईल त्याला गाडीचा हॉर्न वाजवू नको अशी सूचना देत असेल हा! :? :W (खुद के साथ बातां : रंग्या, ह्याला 'हॉर्नी ली' असे म्हणायला काय हरकत आहे? B) ) चतुरंग

अवलिया 09/06/2009 - 06:47
हा हा हा मस्त अनुभव :) --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु

रेवती 09/06/2009 - 06:57
कधी कधी असे विचित्र स्वभावाचे लोक भेटतात व आपल्याला नसता त्रास होतो. पण असाकसा तो पॅटिओपर्यंत आला. त्याला सांग असं करू नकोस. सरळ बझ् करून ये! सध्या घरात तुझ्याबरोबर कुणी ना कुणी आहे म्हणून ठीके पण नंतर फारसं सुरक्षित नाहीये ते! (आता प्राजु मलाच भित्रीभागुबाई म्हणणार!) :) रेवती

सहज 09/06/2009 - 07:46
अनुभवकथन आवडले. लगेच सुधारणा केली ते तर अजुन जास्त आवडले. हेच तर सौजन्य! पुन्हा एकदा सांगावेसे वाटते की लेखिका कवयित्री म्हणून प्रसिद्ध असली तरी गद्यलेखन तितकेच अतिशय प्रभावी.

In reply to by सहज

मुक्तसुनीत 09/06/2009 - 08:06
सहज यांनी अचूक शब्दात वर्णन केले आहे. याहून जास्त चांगल्या शब्दात सांगता येणार नाही.

In reply to by मुक्तसुनीत

धनंजय 09/06/2009 - 19:31
विक्षिप्त शेजार्‍यांशी कसे वागायचे हा मोठा प्रश्न असतो. तरी सौजन्याने खूप प्रश्न सुटतात. अनुभववर्णन आवडले.

मराठी_माणूस 09/06/2009 - 09:00
हॉर्न ने इरिटेशन होते हि गोष्ट खरि आहे. चिनि माणसाच्या जागि अमेरिकन असता तर चुक लगेच सुधारली गेलि असती आणि हा लेख आलाच नसता का असा मनात विचार येतो

In reply to by संदीप चित्रे

प्राजु 10/06/2009 - 01:27
हो संदीप, नक्कीच आला असता. पहिली गोष्ट, फोर्ड्ची गाडी लॉक होताना हाँक करते हे कोणत्याही अमेरिकन माणसाला माहिती आहे. त्यामुळे त्याने त्यावर आक्षेप घेतला नसता. याने कसा घेतला देव जाणे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर 09/06/2009 - 10:21
आता भारत , अमेरिका आणि चायना या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर समझोता होईल ना होईल.. पण हे आंतररष्ट्रीय सौजन्य मात्र मला अनोखं वाटलं आणि म्हणून त्याला मी शब्दबद्ध केलं! मस्त! :)

यशोधरा 09/06/2009 - 11:48
एकदा दोनदा झालं तर मजेशीर अनुभव म्हणता येइल ह्याला, सतत झालं तर मात्र वैतागवाणं होईल जरा. लिहिलंस चांगलं बाकी! :)

छोटा डॉन 09/06/2009 - 11:51
फारच मजेशीर सौजन्य आहे बॉ, मस्तपैकी हसु आले. मात्र प्राजुताई, माझ्या मते माणुस चक्क "येडा ( हो येडाच, आयला सायकिक हा काय शब्द आहे ? सायंटिस्ट सारखा उच्चभ्रु वाटतो लेकाचा )" आहे असे दिसते आहे. जास्त त्याला भाव व किंमत न दिल्यास उत्तम ... भारतात कसे, असे काही झाले की मस्तपैकी "२ तडाखे" देता येतात आरामात, तिकडे आंतरराष्ट्रीय कायदा वगैरे येतो ना ... काळजी घ्या ...!!! बाकी किस्सा मस्त आणि खाऊ तर त्याहुन मस्त ;) लेख आवडला ... ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by छोटा डॉन

प्राजु, मजा आली वाचायला!!
... सायंटिस्ट सारखा उच्चभ्रु वाटतो लेकाचा)"
आक्षेप आक्षेप आक्षेप! या विद्वेषाचा त्रिवार निषेध!

हा हा हा भारीच ग प्राजुतै. अनुभव एकदम भारी वाटला वाचायला. अवांतर :- त्या ली ला 'आणी हो' चे २/३ लेख भाषांतर करुन वाचायला दे ;) बघ काही फरक पडतोय का. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन 10/06/2009 - 07:22
अवांतर :- त्या ली ला 'आणी हो' चे २/३ लेख भाषांतर करुन वाचायला दे ;) बघ काही फरक पडतोय का.
काय जोक मारून र्‍हायला बे ... ? "आणि हो" चे उच्च मराठीत लिहीलेले लेख "सुलभ मराठीत" भाषांतर करायलाच ज्ञानेश्वरांना परतावं लागेल .. आणि तु "ली" च्या भाषेत भाषांतर करायला लावतो ? तुला काही हाड ? =)) =))

ऋषिकेश 09/06/2009 - 14:07
हा हा हा! मस्त किस्सा! मजा आली बाकी एखाद्याला चिंकी, काळा वगैरे सहजतेने आलेले लेखनात चुकीचे आहेत असे वाटत नाहि. असे शब्द लिहिण्याने कोणी वर्णद्वेषी आणि न लिहिण्याने कोणी वर्णद्वेष न बाळगणारा होतात असे मला वाटत नाहि.. बोलताना/लिहिताना काय भाव आहेत हे महत्त्वाचे.. उगाच अ‍ॅफ्रो-अमेरिकन्स म्हणायचं आणि वागणूक वर्णभेदाचीच ठेवायची यापेक्षा तो काळा आहे तरीही तो आपल्यासारखा माणूस आहे ते लक्षात घेणं महत्त्वाचं असं वाटतं (काळा हे केवळ उदाहरण) माझा अनुभव असा आहे की काळे स्वतः अनेकदा ब्लॅक/निग्रो ही वचने सहज उच्चारतात ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

In reply to by ऋषिकेश

सखी 09/06/2009 - 20:25
माझा अनुभव असा आहे की काळे स्वतः अनेकदा ब्लॅक/निग्रो ही वचने सहज उच्चारतात मी असं ऐकलं आहे की त्यांना एकमेकांनी ब्लॅक/निग्रो म्हंटलेले चालतं, पण दुस-या वर्णाच्या कोणीही म्हंटलेले खपत नाही - ब-याचदा त्यावरुन वादळही उठतात/उठवली जात असावी. प्राजु - लेख आवडला, पण वर कोणीतरी म्हंटल्याप्रमाणे तुही त्याला ठणकावुन सांग की मुख्य दारातुनच त्याने यावे, नाहीतर यासाठी तूच त्याची कंप्लेंट करु शकते :)

सुनील 09/06/2009 - 18:04
मजेशीर किस्सा!! बाकी चिन्यांना जसे आपल्याला "चिंकी" म्हणतात ते ठाऊक आहे तसेच काळ्यांनाही आपल्याला भारतीय लोक "कल्लू" म्हणतात हे ठाऊक आहे. तेव्हा असे शब्द अनवधानानेदेखिल वापरात येऊ नये याची काळजी घ्यावी. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

शाल्मली 09/06/2009 - 21:19
हा हा.. मजेदारच अनुभव आहे हा अगदी! तो माणूसही भन्नाटच दिसतोय. एव्हाना त्याने तुला काहीतरी 'प्युअरली व्हेजीटेरीयन' खाऊ आणून दिलाच असेल ना? मग त्याबद्दलही काही लिही ना.. --शाल्मली.

म्हणजे सध्या प्राजुताईचा एकदम चिनी पोपट झालाय म्हणा की!!!!:) यालाच "चिनी मकाव"म्हणतात वाटतं!!!!:) आता मी तर ठरवलंय की जेंव्हा प्राजुला भेटायला जाणार तेंव्हा तिच्या घरासमोर गाडी उभी करून पहिल्यांदा दोन्-चार वेळा कर्कश्य हॉर्न वाजवणार!!! बघूया तर खरी गंमत!!! बाय द वे, प्राजुताई, ते तुला भेट मिळालेलं चिनी नॉनव्हेज जरा इकडे यूपीएस कर ना!!!! :)

प्राजु 10/06/2009 - 00:09
आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांबद्दल मनापासून धन्यवाद. तो विक्षिप्त अजून तरी आला नाहीये. आणि काही वेजी खाऊही आणून नाही दिला. .. पण आता मात्र तो आला की, मी त्याला सांगणार आहे की, बाबा.. मला असा त्रास देऊ नको नाहीतर मी ९११ ला फोन करेन. डांबिसकाका, तुम्ही याच इकडे आणि खरंच हाँक करा त्याच्या घरासमोर. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चित्रा 10/06/2009 - 01:16
अनुभव चांगला शब्दबद्ध केला आहे. (मलाही अशीच रिमोटचे बटन दोनदा दाबण्याची सवय झाली होती, हळूहळू ती कमी करीत आणली आहे, रात्री मात्र अजिबात करीत नाही).

प्रियाली 10/06/2009 - 05:51
प्राजु, किस्सा आवडला. आमच्या मिडवेष्टात कोणी हाँकच करत नाही. गाडीचा हाँक येणे म्हणजे गाडी लॉक केली आहे असा सर्वसाधारण समज आहे. आम्ही बिनधास्त दोनदा बटण दाबतो. कोणाची बिशाद नाही काही बोलण्याची कारण कोणी नसतेच अर्ध्या मैलाच्या अंतरात. ;)

हरकाम्या 09/06/2009 - 02:03
अहो ताई लेख जरावाईच ल्हाण कराहो वाचताना पार झोप लागायची वेळ आली .

गम्मत आहे. :) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

मुक्तसुनीत 09/06/2009 - 03:36
किस्सा रोचक आहे. "चिंकी" आणि तद्भव शब्द हे इतर अनेक शब्दांसारखे विशिष्ट वंशातील लोकांना उद्देशून आणि त्या वंशाचा अपमान करणारे आहेत असा रूढ समज आहे. संदर्भासाठी हा दुवा पहावा. असे अनेक संदर्भ उपलब्ध आहेत. हे शब्द वापरणे अशिष्टसंमत आहे. किंबहुना , कुठल्याही घटनेचे वर्णन करताना त्यातील व्यक्तींच्या वर्ण/जाती/वंशाचा उल्लेख अनावश्यक ठरतो. (संपादक - अपमानास्पद शब्द काढून टाकून संपादन केले आहे.)

In reply to by मुक्तसुनीत

टिउ 09/06/2009 - 04:29
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे...पण बर्‍याचदा हे शब्द वापरण्यामागे अपमान/वंशभेद या भावना नसतात/नसाव्यात असं वाटतं. तरीही असले उल्लेख टाळावे या तुमच्या मताशी सहमत! बाकी किस्सा भारीच आहे...मी तर म्हणेन असले शेजारी असतील तर रात्री दोन तीनदा घरातनंच गाडी लॉक/अनलॉक करावी! सौजन्याची ऐशी तैशी!!!

In reply to by मुक्तसुनीत

चिंकी इ. शब्द हे अपमानकारक आहेत हा आपला मुद्दा अत्यंत बरोबर आहे. ह्या लेखात वारंवार ह्या श्ब्दाचा उल्लेख वाचून आश्चर्य वाटले.

In reply to by कालिन्दि मुधोळ्कर

हुप्प्या 09/06/2009 - 07:23
पॉलिटिकल करेक्टनेसच्या नावाखाली आपण अतिरेकी हळवे, संवेदनाशील वगैरे झालो आहोत. चिंकी हा शब्द अपमानकारकच वाटला पाहिजे असे नाही. तशात मिसळपाव वाचणारे किती चिनी भाई आहेत? अगदी कुणाला तोंडावर कुठलेसे शेलके विशेषण म्हणणे वेगळे आणि असे लिहिणे वेगळे. थोडक्यात चिंकी वगैरे म्हटले की बरीच स्वभाववैशिष्ट्ये पटकन लक्षात येतात. उगाच जडजंबाल पण पॉलिटिकली करेक्ट कशाला लिहायचे? भारतीयही गुल्टी, बिहारी व घाटी म्हणतातच. त्यात त्या गटाचा निव्वळ अपमान करायचा असतो असे समजणे चुकीचे आहे.

In reply to by हुप्प्या

मुक्तसुनीत 09/06/2009 - 07:33
या न्यायाने "निग्रो" , "म्हारड्या" वगैरे वगैरे शब्दांमधून सुद्धा काय काय वैशिष्ट्ये व्यक्त होतात तेही ऐकायला आवडेल :-)

In reply to by घाटावरचे भट

टारझन 09/06/2009 - 21:09
'चिली चिकन' हा शब्द कसा वाटतो?
=)) =)) एकदम चोक्कस ... मस्त रे भटा .. जुणा शब्द आहे हा .. आम्ही चायनिज च्या हातगाडीवर कामं करणार्‍या णेपाळी-मणिपुरी पोरांना असंच म्हणायचो .. प्राजु ताई .. लेख आवडला आहे .. क्लास ...अजुन येउन देत गं (नजरकैद) टा.रू.सावरकर

In reply to by मुक्तसुनीत

मुसुरावांशी सहमत. अवांतरः 'म्हारड्या' या शब्दातून प्रचंडी रडी माणसे आठवतात. आम्ही आमच्या एका भयंकर रड्या मित्राला 'महारड्या' म्हणायचो. पण आमच्या शाळेतल्या बाईना आम्ही त्याला 'म्हारड्या' म्हणतो असे वाटायचे. :) म्हणून एकदा बाईनी चांगलेच झाडले होते मला. (पॉलिटीकली करेक्ट) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

In reply to by हुप्प्या

चतुरंग 09/06/2009 - 16:26
कदाचित पंधरावीस वर्षांपूर्वी तितकासा जाणवलाही नसता. आज परिस्थिती फार बदलली आहे. 'चिंकी' हा शब्द चिन्यांसाठी वापरतात हे मला माहीत होते, मी ही वापरायचो पण तो इथे अवमानकारक शब्दात मोडतो हे मला अमेरिकेत असून ठाऊक नव्हते. हा माहिती असण्याचा प्रश्न आहे. चुकीची सवय पडू नये आणि कुठे भलत्याच ठिकाणी हा शब्द बोलला जाऊ नये ह्या हेतून ही दुरुस्ती मला अतिरेक वाटत नाही. (तसे खाजगी संभाषणातून आपण सर्वच जण बरेच शब्द वापरत असू, म्हणून सगळेच सर्रास लिहायचे म्हटले तर आफत ओढवेल!) चतुरंग

चतुरंग 09/06/2009 - 04:57
आपल्या कारमागे हायवेवरती अचानक मोठ्याने हॉर्न वाजवला, म्हणून कोणातरी आडदांड विक्षिप्त अमेरिकनाकडून ह्या माणसाचा अपमान झाला असावा! त्या अपमानाने आणि भीतीने ह्याच्या मनात घर केल्याने येईल जाईल त्याला गाडीचा हॉर्न वाजवू नको अशी सूचना देत असेल हा! :? :W (खुद के साथ बातां : रंग्या, ह्याला 'हॉर्नी ली' असे म्हणायला काय हरकत आहे? B) ) चतुरंग

अवलिया 09/06/2009 - 06:47
हा हा हा मस्त अनुभव :) --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु

रेवती 09/06/2009 - 06:57
कधी कधी असे विचित्र स्वभावाचे लोक भेटतात व आपल्याला नसता त्रास होतो. पण असाकसा तो पॅटिओपर्यंत आला. त्याला सांग असं करू नकोस. सरळ बझ् करून ये! सध्या घरात तुझ्याबरोबर कुणी ना कुणी आहे म्हणून ठीके पण नंतर फारसं सुरक्षित नाहीये ते! (आता प्राजु मलाच भित्रीभागुबाई म्हणणार!) :) रेवती

सहज 09/06/2009 - 07:46
अनुभवकथन आवडले. लगेच सुधारणा केली ते तर अजुन जास्त आवडले. हेच तर सौजन्य! पुन्हा एकदा सांगावेसे वाटते की लेखिका कवयित्री म्हणून प्रसिद्ध असली तरी गद्यलेखन तितकेच अतिशय प्रभावी.

In reply to by सहज

मुक्तसुनीत 09/06/2009 - 08:06
सहज यांनी अचूक शब्दात वर्णन केले आहे. याहून जास्त चांगल्या शब्दात सांगता येणार नाही.

In reply to by मुक्तसुनीत

धनंजय 09/06/2009 - 19:31
विक्षिप्त शेजार्‍यांशी कसे वागायचे हा मोठा प्रश्न असतो. तरी सौजन्याने खूप प्रश्न सुटतात. अनुभववर्णन आवडले.

मराठी_माणूस 09/06/2009 - 09:00
हॉर्न ने इरिटेशन होते हि गोष्ट खरि आहे. चिनि माणसाच्या जागि अमेरिकन असता तर चुक लगेच सुधारली गेलि असती आणि हा लेख आलाच नसता का असा मनात विचार येतो

In reply to by संदीप चित्रे

प्राजु 10/06/2009 - 01:27
हो संदीप, नक्कीच आला असता. पहिली गोष्ट, फोर्ड्ची गाडी लॉक होताना हाँक करते हे कोणत्याही अमेरिकन माणसाला माहिती आहे. त्यामुळे त्याने त्यावर आक्षेप घेतला नसता. याने कसा घेतला देव जाणे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर 09/06/2009 - 10:21
आता भारत , अमेरिका आणि चायना या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर समझोता होईल ना होईल.. पण हे आंतररष्ट्रीय सौजन्य मात्र मला अनोखं वाटलं आणि म्हणून त्याला मी शब्दबद्ध केलं! मस्त! :)

यशोधरा 09/06/2009 - 11:48
एकदा दोनदा झालं तर मजेशीर अनुभव म्हणता येइल ह्याला, सतत झालं तर मात्र वैतागवाणं होईल जरा. लिहिलंस चांगलं बाकी! :)

छोटा डॉन 09/06/2009 - 11:51
फारच मजेशीर सौजन्य आहे बॉ, मस्तपैकी हसु आले. मात्र प्राजुताई, माझ्या मते माणुस चक्क "येडा ( हो येडाच, आयला सायकिक हा काय शब्द आहे ? सायंटिस्ट सारखा उच्चभ्रु वाटतो लेकाचा )" आहे असे दिसते आहे. जास्त त्याला भाव व किंमत न दिल्यास उत्तम ... भारतात कसे, असे काही झाले की मस्तपैकी "२ तडाखे" देता येतात आरामात, तिकडे आंतरराष्ट्रीय कायदा वगैरे येतो ना ... काळजी घ्या ...!!! बाकी किस्सा मस्त आणि खाऊ तर त्याहुन मस्त ;) लेख आवडला ... ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by छोटा डॉन

प्राजु, मजा आली वाचायला!!
... सायंटिस्ट सारखा उच्चभ्रु वाटतो लेकाचा)"
आक्षेप आक्षेप आक्षेप! या विद्वेषाचा त्रिवार निषेध!

हा हा हा भारीच ग प्राजुतै. अनुभव एकदम भारी वाटला वाचायला. अवांतर :- त्या ली ला 'आणी हो' चे २/३ लेख भाषांतर करुन वाचायला दे ;) बघ काही फरक पडतोय का. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन 10/06/2009 - 07:22
अवांतर :- त्या ली ला 'आणी हो' चे २/३ लेख भाषांतर करुन वाचायला दे ;) बघ काही फरक पडतोय का.
काय जोक मारून र्‍हायला बे ... ? "आणि हो" चे उच्च मराठीत लिहीलेले लेख "सुलभ मराठीत" भाषांतर करायलाच ज्ञानेश्वरांना परतावं लागेल .. आणि तु "ली" च्या भाषेत भाषांतर करायला लावतो ? तुला काही हाड ? =)) =))

ऋषिकेश 09/06/2009 - 14:07
हा हा हा! मस्त किस्सा! मजा आली बाकी एखाद्याला चिंकी, काळा वगैरे सहजतेने आलेले लेखनात चुकीचे आहेत असे वाटत नाहि. असे शब्द लिहिण्याने कोणी वर्णद्वेषी आणि न लिहिण्याने कोणी वर्णद्वेष न बाळगणारा होतात असे मला वाटत नाहि.. बोलताना/लिहिताना काय भाव आहेत हे महत्त्वाचे.. उगाच अ‍ॅफ्रो-अमेरिकन्स म्हणायचं आणि वागणूक वर्णभेदाचीच ठेवायची यापेक्षा तो काळा आहे तरीही तो आपल्यासारखा माणूस आहे ते लक्षात घेणं महत्त्वाचं असं वाटतं (काळा हे केवळ उदाहरण) माझा अनुभव असा आहे की काळे स्वतः अनेकदा ब्लॅक/निग्रो ही वचने सहज उच्चारतात ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

In reply to by ऋषिकेश

सखी 09/06/2009 - 20:25
माझा अनुभव असा आहे की काळे स्वतः अनेकदा ब्लॅक/निग्रो ही वचने सहज उच्चारतात मी असं ऐकलं आहे की त्यांना एकमेकांनी ब्लॅक/निग्रो म्हंटलेले चालतं, पण दुस-या वर्णाच्या कोणीही म्हंटलेले खपत नाही - ब-याचदा त्यावरुन वादळही उठतात/उठवली जात असावी. प्राजु - लेख आवडला, पण वर कोणीतरी म्हंटल्याप्रमाणे तुही त्याला ठणकावुन सांग की मुख्य दारातुनच त्याने यावे, नाहीतर यासाठी तूच त्याची कंप्लेंट करु शकते :)

सुनील 09/06/2009 - 18:04
मजेशीर किस्सा!! बाकी चिन्यांना जसे आपल्याला "चिंकी" म्हणतात ते ठाऊक आहे तसेच काळ्यांनाही आपल्याला भारतीय लोक "कल्लू" म्हणतात हे ठाऊक आहे. तेव्हा असे शब्द अनवधानानेदेखिल वापरात येऊ नये याची काळजी घ्यावी. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

शाल्मली 09/06/2009 - 21:19
हा हा.. मजेदारच अनुभव आहे हा अगदी! तो माणूसही भन्नाटच दिसतोय. एव्हाना त्याने तुला काहीतरी 'प्युअरली व्हेजीटेरीयन' खाऊ आणून दिलाच असेल ना? मग त्याबद्दलही काही लिही ना.. --शाल्मली.

म्हणजे सध्या प्राजुताईचा एकदम चिनी पोपट झालाय म्हणा की!!!!:) यालाच "चिनी मकाव"म्हणतात वाटतं!!!!:) आता मी तर ठरवलंय की जेंव्हा प्राजुला भेटायला जाणार तेंव्हा तिच्या घरासमोर गाडी उभी करून पहिल्यांदा दोन्-चार वेळा कर्कश्य हॉर्न वाजवणार!!! बघूया तर खरी गंमत!!! बाय द वे, प्राजुताई, ते तुला भेट मिळालेलं चिनी नॉनव्हेज जरा इकडे यूपीएस कर ना!!!! :)

प्राजु 10/06/2009 - 00:09
आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांबद्दल मनापासून धन्यवाद. तो विक्षिप्त अजून तरी आला नाहीये. आणि काही वेजी खाऊही आणून नाही दिला. .. पण आता मात्र तो आला की, मी त्याला सांगणार आहे की, बाबा.. मला असा त्रास देऊ नको नाहीतर मी ९११ ला फोन करेन. डांबिसकाका, तुम्ही याच इकडे आणि खरंच हाँक करा त्याच्या घरासमोर. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चित्रा 10/06/2009 - 01:16
अनुभव चांगला शब्दबद्ध केला आहे. (मलाही अशीच रिमोटचे बटन दोनदा दाबण्याची सवय झाली होती, हळूहळू ती कमी करीत आणली आहे, रात्री मात्र अजिबात करीत नाही).

प्रियाली 10/06/2009 - 05:51
प्राजु, किस्सा आवडला. आमच्या मिडवेष्टात कोणी हाँकच करत नाही. गाडीचा हाँक येणे म्हणजे गाडी लॉक केली आहे असा सर्वसाधारण समज आहे. आम्ही बिनधास्त दोनदा बटण दाबतो. कोणाची बिशाद नाही काही बोलण्याची कारण कोणी नसतेच अर्ध्या मैलाच्या अंतरात. ;)
गाडी चालवणं ही काही फार मोठी गोष्ट नाही. अमेरिकेत आल्यावर गाडीशिवाय पर्याय नाही हे लक्षात येताच मी परवाना मिळवला आणि गाडी चालवायला लागले. गेलं दिड वर्ष मी कुठेही न धडपडता लोकांना सुखाने गाडी चालवू देते आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाच्या तुळतुळीत रस्त्यांवरून. सांगायचा मुद्दा असा की इतके दिवस माझ्या गाडी चालवण्याबद्दल कोणीही आक्षेप घेतला नाही.. मात्र चालवून झाल्यानंतर गाडी लॉक करण्याबद्दल मात्र एका चायनीज माणसाने सॉल्लीड आक्षेप घेतला (त्याला आपण 'ली' म्हणू). सांगते ... त्याने माझ्या कार लॉक करण्यावर आक्षेप घेतला कारण सेकंदाचा १० वा भाग इतका वेळ वाजणार माझ्या गाडीचा लॉक होतानाच हॉर्न.

भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग ..... भाग ४ ...वसुली एजंट व्हा ...

भडकमकर मास्तर ·

टारझन 31/05/2009 - 17:14
वा !! छाणच !! मास्तर्स .. साऊथच्या मुव्हीचा प्रभाव दिसतो हं तुमच्या क्लासेस वर !! अजुन (दमादमानं) येउन द्या !! प्रो.प्रा. टारझन कुबड्या खविस विमा एजन्सी.

सहज 31/05/2009 - 17:19
पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा उक्तीवर विश्वास असणार्‍या पालकांनी आपल्या क्लासेसकडे धाव न घेतली तर नवलच! बाकी लेखात छायाचित्रांचा योग्य, नेमका चपखल वापर करावा तर मास्तरांनीच!

रेवती 31/05/2009 - 17:47
वा! मास्तर मानलं तुम्हाला! किती वेगळं करियर आहे हे! माझ्याकडच्या डायरीत अश्या वैविध्यपूर्ण कोर्सेसबद्दल टिपणं हमखास असतात. अहो, आमचा मुलगा अजून लहान असला म्हणून काय झालं? दुसर्‍यांना वेळीच मदत करता आली म्हणजे झालं. बाकी वसूली चाचणीमध्येच आमचे दिव्य चिरंजीव नापास...... काय करणार आता? बघते आता दुसरा कोणतातरी कोर्स! आपला सचित्र लेख मनापासून आवडला असे सांगावेसे वाटते. रेवती

अनंता 31/05/2009 - 19:14
आयला! आधी सांगितलं असंतत तर नक्की प्रवेश घेतला असता. असो. दिवट्या चिरंजिवासाठी छान करीअर ऑप्शन. प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

पाषाणभेद 31/05/2009 - 19:42
मास्तर, म्या पन आपल्या कोर्स ला ऍडमिशन घेवु म्हनतो. ल्हानपनी शाळेतून कोनाचे पेन, रबर, पेन्सीली आनत होतो तर माझे फादर माला लय चापटायचे. मोठेपनी कॉपी करून पन काय उपेग झाला नाय. आता मी पन कायतरी करू म्हनतो. नायतर आयूश्यबर रिक्षा आपन चालवनार नाय म्हना. आपल्या कोर्सला हे क्वालिपीकेसन चालल ना? माझ्या दोस्तान वर देल्येली साईट शोधायचा लय ट्राय केला पन काय सापडली नाय. आता माला लवकर तुमचा फोन नंबर द्या. मी आन माझ्या कट्यावर्ले ४-५ पडीक येवू. (फी मदे कायतरी करा राव.) कलावे. आपला, श्यामू तेलगा मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

क्रान्ति 31/05/2009 - 23:32
जबरदस्त! अफलातून! @) >:) X( क्रान्ति क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो? गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं| अग्निसखा

स्वामि 01/06/2009 - 00:17
फावल्या वेळात आपला कोर्स करावा म्हणतो.गुरुदक्षिणा मिळेलच. ;)

मास्तर तुमच्या क्लासच्या तिन चार विद्यार्थ्यांना आमच्या अखिल भैताडवाडी सहाकारी पतसंस्थेत नौकरी द्यायला आम्ही तायर आहोत. आपला कोर्स आम्हाला खुपच आवडला ==निखिल

अभिज्ञ 01/06/2009 - 12:08
मास्तर ह्यात एक मुख्य भाग राहिला तो म्हणजे वसुली एजंट मुख्यतः क्रेडिट कार्ड चे पैशे वसुली करता येतात ते. हि जनता डायरेक्ट घरीच येते. दारात उभे राहून मोठ्याने शिवीगाळ करणे,संपुर्ण बिल्डींगला ऐकु जाइल ह्या आवाजात पैशाकरीता तगादा लावणे,वगैरे बरेच प्रकार असतात. थोडक्यात संपुर्ण कॉलनीत तुमची बदनामी कशी होईल हे पाहिले जाते व त्याला घाबरून बरेचजण हि ब्याद टाळण्याकरिता दुसरीकडून कर्ज काढून ह्यांचे पैशे चुकवतात. असो. बाकि लेख उत्तम. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

धमाल मुलगा 01/06/2009 - 13:50
च्यायला....क्लाससाठी नविन जागा फर्निचर करताना लोन घ्यायला मजा वाटली का? !@#!३,%#%#^,^$%^$^ हप्ते कोन भरनार? (पच्च्याक्क! {भिंतीवर गुटख्याचा लालभडक सडा!}) चऽऽल स्कुटरची किल्ली आन हिकडं....मिणिमम पेम्येंट केल्याव माज्याकडनं घिऊन जा स्कूटर! च्यायला, &*^*,%&^&*,*(&*&&$,*&^&^&%% ---- काय हो मास्तर,
पोषाख : कुर्ता, जीन्स, करकर वाजणार्या वहाणा, गळ्यात जाड सोनेरी चेन्स,चारपाच अंगठ्या, मनगटावर जाड कडे..दोन तीन गंडे आणि ताईत. बोलण्यात अधूनमधून अमुकबाबा / तमुकमहाराजांच्या कृपेनं / सब उनकी दया है असले शब्दसमूह पेरायचे
. हे फारच ओळखीओळखीचं वाटतंय बुवा. असं का बरं :? ;) बाकी, ह्या असल्या धाकधपटशाच्या धंद्यासाठी दाक्षिणात्यांचे मानबिंदू असलेल्या नट(देव हो देव!)लोकांच्या चित्रांचा असा वापर केल्लात हे बरं नाही केलं...तुमचा निषेध!!! (अवांतरः फोटु टाकण्यापुर्वी त्यांची पर्वांगी घ्येतली होती का हो? ;) ) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

टारझन 31/05/2009 - 17:14
वा !! छाणच !! मास्तर्स .. साऊथच्या मुव्हीचा प्रभाव दिसतो हं तुमच्या क्लासेस वर !! अजुन (दमादमानं) येउन द्या !! प्रो.प्रा. टारझन कुबड्या खविस विमा एजन्सी.

सहज 31/05/2009 - 17:19
पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा उक्तीवर विश्वास असणार्‍या पालकांनी आपल्या क्लासेसकडे धाव न घेतली तर नवलच! बाकी लेखात छायाचित्रांचा योग्य, नेमका चपखल वापर करावा तर मास्तरांनीच!

रेवती 31/05/2009 - 17:47
वा! मास्तर मानलं तुम्हाला! किती वेगळं करियर आहे हे! माझ्याकडच्या डायरीत अश्या वैविध्यपूर्ण कोर्सेसबद्दल टिपणं हमखास असतात. अहो, आमचा मुलगा अजून लहान असला म्हणून काय झालं? दुसर्‍यांना वेळीच मदत करता आली म्हणजे झालं. बाकी वसूली चाचणीमध्येच आमचे दिव्य चिरंजीव नापास...... काय करणार आता? बघते आता दुसरा कोणतातरी कोर्स! आपला सचित्र लेख मनापासून आवडला असे सांगावेसे वाटते. रेवती

अनंता 31/05/2009 - 19:14
आयला! आधी सांगितलं असंतत तर नक्की प्रवेश घेतला असता. असो. दिवट्या चिरंजिवासाठी छान करीअर ऑप्शन. प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

पाषाणभेद 31/05/2009 - 19:42
मास्तर, म्या पन आपल्या कोर्स ला ऍडमिशन घेवु म्हनतो. ल्हानपनी शाळेतून कोनाचे पेन, रबर, पेन्सीली आनत होतो तर माझे फादर माला लय चापटायचे. मोठेपनी कॉपी करून पन काय उपेग झाला नाय. आता मी पन कायतरी करू म्हनतो. नायतर आयूश्यबर रिक्षा आपन चालवनार नाय म्हना. आपल्या कोर्सला हे क्वालिपीकेसन चालल ना? माझ्या दोस्तान वर देल्येली साईट शोधायचा लय ट्राय केला पन काय सापडली नाय. आता माला लवकर तुमचा फोन नंबर द्या. मी आन माझ्या कट्यावर्ले ४-५ पडीक येवू. (फी मदे कायतरी करा राव.) कलावे. आपला, श्यामू तेलगा मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

क्रान्ति 31/05/2009 - 23:32
जबरदस्त! अफलातून! @) >:) X( क्रान्ति क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो? गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं| अग्निसखा

स्वामि 01/06/2009 - 00:17
फावल्या वेळात आपला कोर्स करावा म्हणतो.गुरुदक्षिणा मिळेलच. ;)

मास्तर तुमच्या क्लासच्या तिन चार विद्यार्थ्यांना आमच्या अखिल भैताडवाडी सहाकारी पतसंस्थेत नौकरी द्यायला आम्ही तायर आहोत. आपला कोर्स आम्हाला खुपच आवडला ==निखिल

अभिज्ञ 01/06/2009 - 12:08
मास्तर ह्यात एक मुख्य भाग राहिला तो म्हणजे वसुली एजंट मुख्यतः क्रेडिट कार्ड चे पैशे वसुली करता येतात ते. हि जनता डायरेक्ट घरीच येते. दारात उभे राहून मोठ्याने शिवीगाळ करणे,संपुर्ण बिल्डींगला ऐकु जाइल ह्या आवाजात पैशाकरीता तगादा लावणे,वगैरे बरेच प्रकार असतात. थोडक्यात संपुर्ण कॉलनीत तुमची बदनामी कशी होईल हे पाहिले जाते व त्याला घाबरून बरेचजण हि ब्याद टाळण्याकरिता दुसरीकडून कर्ज काढून ह्यांचे पैशे चुकवतात. असो. बाकि लेख उत्तम. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

धमाल मुलगा 01/06/2009 - 13:50
च्यायला....क्लाससाठी नविन जागा फर्निचर करताना लोन घ्यायला मजा वाटली का? !@#!३,%#%#^,^$%^$^ हप्ते कोन भरनार? (पच्च्याक्क! {भिंतीवर गुटख्याचा लालभडक सडा!}) चऽऽल स्कुटरची किल्ली आन हिकडं....मिणिमम पेम्येंट केल्याव माज्याकडनं घिऊन जा स्कूटर! च्यायला, &*^*,%&^&*,*(&*&&$,*&^&^&%% ---- काय हो मास्तर,
पोषाख : कुर्ता, जीन्स, करकर वाजणार्या वहाणा, गळ्यात जाड सोनेरी चेन्स,चारपाच अंगठ्या, मनगटावर जाड कडे..दोन तीन गंडे आणि ताईत. बोलण्यात अधूनमधून अमुकबाबा / तमुकमहाराजांच्या कृपेनं / सब उनकी दया है असले शब्दसमूह पेरायचे
. हे फारच ओळखीओळखीचं वाटतंय बुवा. असं का बरं :? ;) बाकी, ह्या असल्या धाकधपटशाच्या धंद्यासाठी दाक्षिणात्यांचे मानबिंदू असलेल्या नट(देव हो देव!)लोकांच्या चित्रांचा असा वापर केल्लात हे बरं नाही केलं...तुमचा निषेध!!! (अवांतरः फोटु टाकण्यापुर्वी त्यांची पर्वांगी घ्येतली होती का हो? ;) ) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
या पूर्वीचे करिअर गायडन्स वर्गाचे धागे... भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग ..... भाग १ ...भंगडा पॉप आर्टिस्ट व्हा ... http://www.misalpav.com/node/1425 भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....भाग २ ... नाट्यसमीक्षक व्हा ... http://www.misalpav.com/node/1451 भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....भाग ३ ... इव्हेंट मॆनेजर व्हा... http://www.misalpav.com/node/1560 भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग ..... भाग ४ ...वसुली एजंट व्हा ... आजकाल लोक सतत कोणाला ना कोणाला काहीतरी विकताहेत.... फ़्रीमध्ये, स्कीममध्ये, लोनवर, हप्त्यांवर कसेही घ्या पण आमचीच वस्तू घ्या....

पिशितभुजाच्या कान्दिशिक नर्मदांचे विकल मनोरथ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

इनोबा म्हणे 31/05/2009 - 15:34
'अकबर-बिरबला'च्या कथांची आठवण झाली. बिरबल ही आपल्या बुद्धीचातूर्याने मुर्ख अकबराला वेगवेगळ्या संकटांतून सोडवत असे.

भो: आचार्य बिरुटे सर: | गूढ रम्य भाषेतील कथा आवडली. सुरुवातीला, अगदी शीर्षकापासून, कथा कांहीशी डोक्यावरून जाऊ लागली. आता आपणही हेमगर्भाची मात्रा घ्यावी की काय असा विचार मनांत येऊ लागला. पण पुढें मजा आली. पिशितभुजाच्या गुहेचे वर्णन वाचून अंगावर कांटा आला. मी पुन्हा लहान होऊन चांदोबातली गोष्ट वाचत तर नाहीं ना असा भास झाला. बहोत बढिया. आर्यमनाची प्रश्नावली अशीच आणखी गूढ झाली असती तर आणखी मजा आली असती. कथा आप्रतिम झाली आहे. पुलेशु.

छोटा डॉन 31/05/2009 - 17:40
हम्म् , कथा मजेशीर वाटली पण का कोण जाणे वादळापुर्वीच्या शांततेचा भंग करणार्‍या एका जहरी हवेच्या अवखळ झोतासारखी वाटली. ------ छोटा डॉन-वायदेआझमांची-फिकीर एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

नितिन थत्ते 31/05/2009 - 17:55
काही कळले नाही. अर्यमनने विचारेलेले प्रश्न, त्यांचा कथेशी संबंध आणि त्याची उत्तरे त्यांना का देता आली नाहीत ह्याचा काही ठाव लागला नाही. कथेतील वर्णनात्मक भाग उत्तम. मतकरी - धारपांची आठवण करून देणारा. खराटा (रंग माझा वेगळा)

पाषाणभेद 31/05/2009 - 18:52
मस्त कथा आहे. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

अनंता 31/05/2009 - 19:23
स.प्र.वा.नं.स.घे.टा.आ. प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

प्राजु 31/05/2009 - 20:24
हेच म्हणते.. त्या आवाजाच्या अनुरोधाने दोघेही एकमेकांचा हात धरुन जावु लागले. जाता जाता ते गुहेच्या आतमधे जावुन पोहोचले. आतमधे कुक्कुराच्या मांसाला पेटवुन मशाल बनवुन उजेड पाडला होता. तेथे एका उंचवट्यावर "ते" बसलेले होतं. केसाळ, लिबलिबित, हिरव्यागार डोळ्यांच्या खाचा मिचमिच करत, तीन मस्तकाचं, उग्र दर्प सोडत, एका तोंडानं गुरगुरत तर एका तोंडानं नुकत्याच मारलेल्या कुक्कुराचं आतडं चघळत, लाळ गाळत, एका तोंडानं सुस्कारे सोडत, विचित्र कुठलाही आकार नसलेलं पण त्रिमितीत दिसणारं "ते". विलक्षण दर्प सुटलेल्या त्या जागेत स्वतःभोवती डुलक्या घेत, अस्वस्थ सुस्कारे सोडत बसलेलं "ते". हे वर्णन आवडले. पण कथेमध्ये त्यातले प्रश्न, त्यांची न दिलेली उत्तरे, चक्रमुख आणि चक्षु:श्रवस यांनी पिशितभुजासोबत केलेला नाच.. याचा नक्की संबंध नाही समजला. थोडं विस्तारून सांगाल का? एक मात्र नक्की, की कथेतली भाषा ....संस्कृत प्रचूर शब्दांमुळे कथेचा बाज सुंदर सांभाळला गेला आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by अजय भागवत

युयुत्सु 25/07/2010 - 09:09
+१ युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

आप्ल्या बहुजनाना कळल आस कायतरी लिवा कि. ह्ये काय ह्ये. एक पन शबुद समजला नाय :-SS तुमी कंदीपास्न त्या लोकान्च्या दरवाज्याला जावुन उभ राह्यलेत? :-? */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

काळा डॉन 01/06/2009 - 08:12
मास्तर कथेची शैली परिचीत वाटते आहे. अलिकडे संजोपरावांना भेटून आलात काय? ;)

क्रान्ति 01/06/2009 - 08:43
+रत्नाकर मतकरी+सुहास शिरवळकर+नारायण धारप+चांदोबा ! क्रान्ति क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो? गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं| अग्निसखा

सहज 01/06/2009 - 08:54
"विद्यावाचस्पती"!! लेखाची भाषा आवडली. (कठीण शब्दांचे अर्थ सांगीतले नसते तर कळले नसते धन्यवाद. :-) ) कथा नव्या, जुन्या वाचकांचे वेगवेगळ्या पातळीवर मनोरंजन करते. :-) बहोत खुब!

प्रमोद देव 01/06/2009 - 09:24
विवा,काय आणि कशासंबंधी लिहीलंय हे टकुर्‍यात नाय घुसलं. पन जे बी लिवलंया त्येची भाषा बाकी जंक्शन जमलीये. हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

जयवी 01/06/2009 - 09:40
खरंच...... भाषा एकदम सही !! पण मला पण अजिबातच समजली नाही :(

वेताळ 01/06/2009 - 10:12
ज्याबद्दल आणि ज्या साठी लिहली आहे ते समजले . एकदम मस्त कथा आहे.खुपच सुंदर भाषेत लिहले आहे.खुप दिवसानी असे लेखन वाचण्यास मिळाले. धन्यवाद. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

काही अर्थ उमगले काही नाही. कथा आणी शब्द भांडार अप्रतीमच. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by निखिल देशपांडे

दशानन 01/06/2009 - 14:13
कथा आणी शब्द भांडार अप्रतीमच. सर, काय... काय ! लै भारी भारी... वजनाने पण भारी लिव्हायला चालू केलीत कि राव.... म्हणतो हुतो त्या अवलियाच्या नादी नको लागू.. डोक्यावर परिणाम झाला की नाय =)) थोडेसं नवीन !

धमाल मुलगा 01/06/2009 - 14:00
_/\_ अ-श-क्य !!! वा र लो! ख प लो!! सं प लो !!! काय लिव्हलंय काय लिव्हलंय....एकेक शब्द जोरदार! तुफ्फान हल्लाबोल!! आज पुन्हा कळलं, दिलीप बिरुटे ह्या नावापुढं 'प्रा.डॉ.' ही बिरुदं का ते. :) आमच्या भाषिक आकलनक्षमतेच्या त्रोटक आवाक्यातून काही (सोडुन बाकी सगळेच म्हणा ना!)शब्द वगळता, कथा, कथाबीज, आणि कथेचा गाभा अगदी सुर्यप्रकाशाइतका लख्ख्ख्ख उमजला हो!!!!!!!!! हाणा च्यामारी!!! एक लंबर... डायरेक्ट बोफोर्सचं बंबार्डिंगच की हो! -(एक नगरजन) ध. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

अभिज्ञ 01/06/2009 - 14:22
क्षणभर "सुरस व चमत्कारिक" ची पुढची एडिशन आली कि काय? असेच वाटून गेले.;) कथा उतम झालीय. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

ही गोष्ट मला समजली की नाही मला माहीत नाही. पण पुनःपुन्हा वाचाविशी मात्र वाटली. या गोष्टीला जबरदस्त लय आहे, जी मनाला गुंतवून टाकते. मला तर जीएंच्या गोष्टींची आठवण झाली ! आपण गूढ काहितरी लिहीता, त्या मुळे समजो न समजो आपली गोष्ट वाचाविशी मात्र वाटते. माझे मराठी प्रस्तुत लेखकाइतके चांगले नाहि.. मात्र त्यामुळे उत्सुकता नाहि असे मात्र नाहि. विनंती करतो की लेखकाने या गोष्टीमागचेत्यांच्या मनातील भाव मांडावेत असो, तुमच्या गोष्टीचे रसग्रहण करणे मला पामराला अशक्य आहे. तरी तुमच्या शब्दभांडाराला आमचा सलाम. कृपा करुन तुम्हीच तुमच्या गोष्टीचे रसग्रहण केलेत तर मला समजायला सोपे होईल. कृपया थोडा वेळ काढून या गोष्टीचा अर्थ पण सांगावा , कठीण शब्दांच्या अर्थासकट ! म्हणजे आमचे पण मराठी जरा सुधारेल की , तेव्हढीच तुमच्याकडून प्रौढ साक्षरता अभियानास मदत ..... बाकी गोष्ट कळली नाही पण वाचायला छान वाटली. प्राडाँनी रसग्रहण करावे ही विनंती. वाचाविशी वाटते नक्कीच. पण अर्थ अजिबातच कळत नाही शब्दभांडारालाच सलाम आमचा. लय वगैरेही भारीच. त्यांचे हे सारे लेखन गूढ स्वरूपाचे आहे. वाचताना काही तरी कळतेय असे वाटते आणि क्षणात ते हरवून जाते असे यांच्या प्रत्येक कवितेवेळी होत आले आहे. काहीतरी कळतंय कळतंय कळतंय... अरेच्चा काहिच कळत नाहीये.......... अशी अवस्था. ही गोष्ट वाचताना लय खूप छान लागत होती. साधारणतः एखाद्या कवीला / लेखकाला त्याच्या साहित्यकृती उकलून दाखावायला सांगणे बरोबर समजत नाहीत पण प्राडाँना कळकळीची विनंति... त्याम्च्या गोष्टी नुसत्या इथे प्रकाशित करून भागणार नाही, त्यावर त्यांनी काही भाष्य करावे. वाचायची उत्सुकता आहेच. _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

In reply to by भडकमकर मास्तर

श्रावण मोडक 01/06/2009 - 15:14
तुम्ही समीक्षक आहातच. क्रिकेटचे अंपायर नव्हे नुसतेच तर खणखणीत आक्रमक खेळी खेळणारा फलंदाजही. प्रत्येक वाक्य उच्च कोटीचे. षटकारांचा पाऊस नुसता... आम्हालाही चेंडू टाकताना कळले नव्हते त्याची उंची इतकी थोर आहे की, तो थेट स्टेडियमवरून बाहेर जाणार आहे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

चतुरंग 01/06/2009 - 21:00
मास्तुरे लईच्च भारी षटकारांची आतषबाजी! (खुद के साथ बातां : रंग्या, आता प्रा.डॉ.'शरद' बिरुटे असे म्हणावे कीकाय? B) :T ) ) चतुरंग

मैत्र 01/06/2009 - 15:24
एकदम आठवण आली... अगदी शब्द, नावे वाक्यरचना... खूप मस्त वाटलं. विकांताला एका मासिकाच्या टपरीवर चांदोबा पाहिला. मुखपृष्ठ खूपच मॉडर्न वाटलं म्हणून चाळला. विक्रम वेताळाचं तेच जुनं चित्र, तशीच नावं, लहान गावातली पडवी असलेल्या शाकारलेल्या घरांची चित्रं, पैरण आणि धोतर या वेशातली माणसं अशा अनेक गोष्टी पाहून वाटलं आहे अजून चांदोबा तसाच आहे. वरुन पोशाख जरा नवा आहे आणि गरजेचा. नीट वाचलं नाही पण नव्या जुन्या गोष्टींचा तोल सांभाळला आहे असं वाटलं. राजवैद्य, अधिपती, अर्यमन, घोरदर्शन, शयनगृहाकडे प्रस्थान केले.... मस्त आहे... अजून अशा काही कथा लिहा. जमल्यास एक मालिका. धमाल येईल. जी. ए. तर वाटले नाहीत. फक्त गूढ शब्द आणि रक्त, कवटी म्हणजे जी ए अजिबात नाहीत. आणि जी एंचे मुळात शब्दच गूढ वाटतात! शब्दार्थांवरुन वाचले तर गुहेतल्या प्रसंगाचे अन्वय लागला नाही. मनोरथ का विकल झाले हे कळाले नाही. सर्वात महत्त्वाचे अगदी अति अवघड प्रश्न असला तरी 'अर्यमन' नामक व्यक्तिने अमेरिकन डॉलरबद्दल विचारणे हे पूर्ण कथेला छेद देणारे आणि अचानकपणे बेअरिंग घालवणारे वाटले. एका वेगळ्या आणि मस्त लिखाणाबद्दल खूप धन्यवाद!

In reply to by मैत्र

Pain 25/07/2010 - 11:32
सर्वात महत्त्वाचे अगदी अति अवघड प्रश्न असला तरी 'अर्यमन' नामक व्यक्तिने अमेरिकन डॉलरबद्दल विचारणे हे पूर्ण कथेला छेद देणारे आणि अचानकपणे बेअरिंग घालवणारे वाटले. तस नाहीये. मला वाटते की ती जी मालिका चालु आहे त्यातला तो शेवटचा भाग आहे.

प्राडॉ, प्राडॉ, अवो आमचं काय चुकलं आसंल तर काढा तुमची ती डब्बल-बॅरल आणि घाला दोन गोळ्या आमच्या छाताडात!! पण हे आत्मक्लेश कशापायी करून घेताय? :)

Nile 02/06/2009 - 03:20
कोणी तो ज्याने धागा काढुन संपादकांना लिहायला उद्द्युक्त केलं होतं? ;)

In reply to by Nile

अवलिया 02/06/2009 - 07:33
हा हा हा :) कोण हो कोण तो संपादकांनाच लिहायला उद्युक्त करणारा? :) देता का सुपारी ? लिहु का त्याच्यावरच एक फक्कडसा लेख ? ;) बोला ‍ !!! :? --अवलिया

विजुभाऊ 29/12/2009 - 14:53
बिरुटे सर...... आख्ख्या वर्षात या सारखी कथा पुन्ना ल्हिली नायी? आसं का कर्ताय?

JAGOMOHANPYARE 29/12/2009 - 17:00
हे काय आहे? काही कळेना ............ :( *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

वाह ! क लिवलय क लिवलय. पुन्हा वाचुन आता अनेक अर्थ कळु लागलेत. साला हे इयान फ्लेमिंग, रश्दी, नसरीन वगैरे संपतात तिथे आमचे दि.बी. चालु होतात :) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

माया 24/07/2010 - 17:42
:O कुठेतरी वाचलयं हे...आता आठवत नाहिये... लेखकांनी संदर्भाचा खुलासा करावा... - माया.

In reply to by माया

तुम्हाला संजोपरावांच्या या लेखाबद्दल म्हणायचे आहे काय ? त्याला उत्तर म्हणूनच हे लेखन केले होते. पण तुम्ही हा लेख पूर्वी वाचल्याचा आरोप केला आहे. त्याबद्दल काय ? उगाच काहीच्या काही बरळू नका. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माया 28/07/2010 - 14:00
>>तुम्हाला संजोपरावांच्या या लेखाबद्दल म्हणायचे आहे काय ? त्याला उत्तर म्हणूनच हे लेखन केले होते. हा संदर्भ देणे आवश्यक होते असे नाही का वाटत आपल्याला? >>पण तुम्ही हा लेख पूर्वी वाचल्याचा आरोप केला आहे. त्याबद्दल काय ? मी कुठेतरी वाचलयं हे असे म्हटले आहे. यातील नावं , लिखाणाची पध्दत ओळखीची वाटली म्हणुन लिखाणही. (अन्य शब्दांचा संदर्भ दिल्याबद्दल आभार.) >>उगाच काहीच्या काही बरळू नका. तुमचीच शब्दशैली आहे का ही ? असे वाटुन गेले. असो. तक्रार आपल्याला पटलं नसेल तर तुम्ही करु शकता. संदर्भ मिळाल्याने मी यावर अजुन बोलणे योग्य नाही असे मला वाटते . धन्यवाद आणि शुभेच्छा. - माया.

Pain 25/07/2010 - 11:37
गोष्ट आवडली, शेवटचे रूपक (किंवा जे काही आहे) कळले नाही. कदाचित सर्व संदर्भ माहिती नसल्याने असेल... शंका: हेमगर्भाची मात्रा अतःकाळ समीप आल्यावर देतात ना ? एखादे काही महत्त्वाचे बोलणे राहुन जावू नये म्हणुन ?

In reply to by Pain

>>>हेमगर्भाची मात्रा अतःकाळ समीप आल्यावर देतात ना ? एखादे काही महत्त्वाचे बोलणे राहुन जावू नये म्हणुन ? श्वास अडकायला लागला आहे असे वाटल्यावर देतात असे वाचून आहे. आता तो श्वास [अंत:काळातला की] कोणत्या कारणामुळे अडकल्यावर वगैरे काही माहित नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Pain 25/07/2010 - 11:56
अच्छा, धन्यवाद. आणि माझ्या वाक्यात अंत:काळ असे असायला हवे. संपादन करता येत नाहीये.

अहिरावण 14/09/2023 - 19:25
मराठीच्या प्राध्यापकांकडून इतके छान संस्कृतप्रचुर शब्दांचा मस्त वापर केलेले लेखन पाहून बरे वाटले. असेच लेखन यावे ...

In reply to by विजुभाऊ

अहिरावण 15/09/2023 - 10:22
आजवर कोणत्या मराठीच्या प्राध्यापकांनी तुम्हाअम्हाला समजेल असे सोप्पे लिहिले आहे? त्यांचे लेखन प्रज्ञावंतांसाठीच असते.

इनोबा म्हणे 31/05/2009 - 15:34
'अकबर-बिरबला'च्या कथांची आठवण झाली. बिरबल ही आपल्या बुद्धीचातूर्याने मुर्ख अकबराला वेगवेगळ्या संकटांतून सोडवत असे.

भो: आचार्य बिरुटे सर: | गूढ रम्य भाषेतील कथा आवडली. सुरुवातीला, अगदी शीर्षकापासून, कथा कांहीशी डोक्यावरून जाऊ लागली. आता आपणही हेमगर्भाची मात्रा घ्यावी की काय असा विचार मनांत येऊ लागला. पण पुढें मजा आली. पिशितभुजाच्या गुहेचे वर्णन वाचून अंगावर कांटा आला. मी पुन्हा लहान होऊन चांदोबातली गोष्ट वाचत तर नाहीं ना असा भास झाला. बहोत बढिया. आर्यमनाची प्रश्नावली अशीच आणखी गूढ झाली असती तर आणखी मजा आली असती. कथा आप्रतिम झाली आहे. पुलेशु.

छोटा डॉन 31/05/2009 - 17:40
हम्म् , कथा मजेशीर वाटली पण का कोण जाणे वादळापुर्वीच्या शांततेचा भंग करणार्‍या एका जहरी हवेच्या अवखळ झोतासारखी वाटली. ------ छोटा डॉन-वायदेआझमांची-फिकीर एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

नितिन थत्ते 31/05/2009 - 17:55
काही कळले नाही. अर्यमनने विचारेलेले प्रश्न, त्यांचा कथेशी संबंध आणि त्याची उत्तरे त्यांना का देता आली नाहीत ह्याचा काही ठाव लागला नाही. कथेतील वर्णनात्मक भाग उत्तम. मतकरी - धारपांची आठवण करून देणारा. खराटा (रंग माझा वेगळा)

पाषाणभेद 31/05/2009 - 18:52
मस्त कथा आहे. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

अनंता 31/05/2009 - 19:23
स.प्र.वा.नं.स.घे.टा.आ. प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

प्राजु 31/05/2009 - 20:24
हेच म्हणते.. त्या आवाजाच्या अनुरोधाने दोघेही एकमेकांचा हात धरुन जावु लागले. जाता जाता ते गुहेच्या आतमधे जावुन पोहोचले. आतमधे कुक्कुराच्या मांसाला पेटवुन मशाल बनवुन उजेड पाडला होता. तेथे एका उंचवट्यावर "ते" बसलेले होतं. केसाळ, लिबलिबित, हिरव्यागार डोळ्यांच्या खाचा मिचमिच करत, तीन मस्तकाचं, उग्र दर्प सोडत, एका तोंडानं गुरगुरत तर एका तोंडानं नुकत्याच मारलेल्या कुक्कुराचं आतडं चघळत, लाळ गाळत, एका तोंडानं सुस्कारे सोडत, विचित्र कुठलाही आकार नसलेलं पण त्रिमितीत दिसणारं "ते". विलक्षण दर्प सुटलेल्या त्या जागेत स्वतःभोवती डुलक्या घेत, अस्वस्थ सुस्कारे सोडत बसलेलं "ते". हे वर्णन आवडले. पण कथेमध्ये त्यातले प्रश्न, त्यांची न दिलेली उत्तरे, चक्रमुख आणि चक्षु:श्रवस यांनी पिशितभुजासोबत केलेला नाच.. याचा नक्की संबंध नाही समजला. थोडं विस्तारून सांगाल का? एक मात्र नक्की, की कथेतली भाषा ....संस्कृत प्रचूर शब्दांमुळे कथेचा बाज सुंदर सांभाळला गेला आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by अजय भागवत

युयुत्सु 25/07/2010 - 09:09
+१ युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

आप्ल्या बहुजनाना कळल आस कायतरी लिवा कि. ह्ये काय ह्ये. एक पन शबुद समजला नाय :-SS तुमी कंदीपास्न त्या लोकान्च्या दरवाज्याला जावुन उभ राह्यलेत? :-? */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

काळा डॉन 01/06/2009 - 08:12
मास्तर कथेची शैली परिचीत वाटते आहे. अलिकडे संजोपरावांना भेटून आलात काय? ;)

क्रान्ति 01/06/2009 - 08:43
+रत्नाकर मतकरी+सुहास शिरवळकर+नारायण धारप+चांदोबा ! क्रान्ति क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो? गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं| अग्निसखा

सहज 01/06/2009 - 08:54
"विद्यावाचस्पती"!! लेखाची भाषा आवडली. (कठीण शब्दांचे अर्थ सांगीतले नसते तर कळले नसते धन्यवाद. :-) ) कथा नव्या, जुन्या वाचकांचे वेगवेगळ्या पातळीवर मनोरंजन करते. :-) बहोत खुब!

प्रमोद देव 01/06/2009 - 09:24
विवा,काय आणि कशासंबंधी लिहीलंय हे टकुर्‍यात नाय घुसलं. पन जे बी लिवलंया त्येची भाषा बाकी जंक्शन जमलीये. हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

जयवी 01/06/2009 - 09:40
खरंच...... भाषा एकदम सही !! पण मला पण अजिबातच समजली नाही :(

वेताळ 01/06/2009 - 10:12
ज्याबद्दल आणि ज्या साठी लिहली आहे ते समजले . एकदम मस्त कथा आहे.खुपच सुंदर भाषेत लिहले आहे.खुप दिवसानी असे लेखन वाचण्यास मिळाले. धन्यवाद. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

काही अर्थ उमगले काही नाही. कथा आणी शब्द भांडार अप्रतीमच. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by निखिल देशपांडे

दशानन 01/06/2009 - 14:13
कथा आणी शब्द भांडार अप्रतीमच. सर, काय... काय ! लै भारी भारी... वजनाने पण भारी लिव्हायला चालू केलीत कि राव.... म्हणतो हुतो त्या अवलियाच्या नादी नको लागू.. डोक्यावर परिणाम झाला की नाय =)) थोडेसं नवीन !

धमाल मुलगा 01/06/2009 - 14:00
_/\_ अ-श-क्य !!! वा र लो! ख प लो!! सं प लो !!! काय लिव्हलंय काय लिव्हलंय....एकेक शब्द जोरदार! तुफ्फान हल्लाबोल!! आज पुन्हा कळलं, दिलीप बिरुटे ह्या नावापुढं 'प्रा.डॉ.' ही बिरुदं का ते. :) आमच्या भाषिक आकलनक्षमतेच्या त्रोटक आवाक्यातून काही (सोडुन बाकी सगळेच म्हणा ना!)शब्द वगळता, कथा, कथाबीज, आणि कथेचा गाभा अगदी सुर्यप्रकाशाइतका लख्ख्ख्ख उमजला हो!!!!!!!!! हाणा च्यामारी!!! एक लंबर... डायरेक्ट बोफोर्सचं बंबार्डिंगच की हो! -(एक नगरजन) ध. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

अभिज्ञ 01/06/2009 - 14:22
क्षणभर "सुरस व चमत्कारिक" ची पुढची एडिशन आली कि काय? असेच वाटून गेले.;) कथा उतम झालीय. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

ही गोष्ट मला समजली की नाही मला माहीत नाही. पण पुनःपुन्हा वाचाविशी मात्र वाटली. या गोष्टीला जबरदस्त लय आहे, जी मनाला गुंतवून टाकते. मला तर जीएंच्या गोष्टींची आठवण झाली ! आपण गूढ काहितरी लिहीता, त्या मुळे समजो न समजो आपली गोष्ट वाचाविशी मात्र वाटते. माझे मराठी प्रस्तुत लेखकाइतके चांगले नाहि.. मात्र त्यामुळे उत्सुकता नाहि असे मात्र नाहि. विनंती करतो की लेखकाने या गोष्टीमागचेत्यांच्या मनातील भाव मांडावेत असो, तुमच्या गोष्टीचे रसग्रहण करणे मला पामराला अशक्य आहे. तरी तुमच्या शब्दभांडाराला आमचा सलाम. कृपा करुन तुम्हीच तुमच्या गोष्टीचे रसग्रहण केलेत तर मला समजायला सोपे होईल. कृपया थोडा वेळ काढून या गोष्टीचा अर्थ पण सांगावा , कठीण शब्दांच्या अर्थासकट ! म्हणजे आमचे पण मराठी जरा सुधारेल की , तेव्हढीच तुमच्याकडून प्रौढ साक्षरता अभियानास मदत ..... बाकी गोष्ट कळली नाही पण वाचायला छान वाटली. प्राडाँनी रसग्रहण करावे ही विनंती. वाचाविशी वाटते नक्कीच. पण अर्थ अजिबातच कळत नाही शब्दभांडारालाच सलाम आमचा. लय वगैरेही भारीच. त्यांचे हे सारे लेखन गूढ स्वरूपाचे आहे. वाचताना काही तरी कळतेय असे वाटते आणि क्षणात ते हरवून जाते असे यांच्या प्रत्येक कवितेवेळी होत आले आहे. काहीतरी कळतंय कळतंय कळतंय... अरेच्चा काहिच कळत नाहीये.......... अशी अवस्था. ही गोष्ट वाचताना लय खूप छान लागत होती. साधारणतः एखाद्या कवीला / लेखकाला त्याच्या साहित्यकृती उकलून दाखावायला सांगणे बरोबर समजत नाहीत पण प्राडाँना कळकळीची विनंति... त्याम्च्या गोष्टी नुसत्या इथे प्रकाशित करून भागणार नाही, त्यावर त्यांनी काही भाष्य करावे. वाचायची उत्सुकता आहेच. _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

In reply to by भडकमकर मास्तर

श्रावण मोडक 01/06/2009 - 15:14
तुम्ही समीक्षक आहातच. क्रिकेटचे अंपायर नव्हे नुसतेच तर खणखणीत आक्रमक खेळी खेळणारा फलंदाजही. प्रत्येक वाक्य उच्च कोटीचे. षटकारांचा पाऊस नुसता... आम्हालाही चेंडू टाकताना कळले नव्हते त्याची उंची इतकी थोर आहे की, तो थेट स्टेडियमवरून बाहेर जाणार आहे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

चतुरंग 01/06/2009 - 21:00
मास्तुरे लईच्च भारी षटकारांची आतषबाजी! (खुद के साथ बातां : रंग्या, आता प्रा.डॉ.'शरद' बिरुटे असे म्हणावे कीकाय? B) :T ) ) चतुरंग

मैत्र 01/06/2009 - 15:24
एकदम आठवण आली... अगदी शब्द, नावे वाक्यरचना... खूप मस्त वाटलं. विकांताला एका मासिकाच्या टपरीवर चांदोबा पाहिला. मुखपृष्ठ खूपच मॉडर्न वाटलं म्हणून चाळला. विक्रम वेताळाचं तेच जुनं चित्र, तशीच नावं, लहान गावातली पडवी असलेल्या शाकारलेल्या घरांची चित्रं, पैरण आणि धोतर या वेशातली माणसं अशा अनेक गोष्टी पाहून वाटलं आहे अजून चांदोबा तसाच आहे. वरुन पोशाख जरा नवा आहे आणि गरजेचा. नीट वाचलं नाही पण नव्या जुन्या गोष्टींचा तोल सांभाळला आहे असं वाटलं. राजवैद्य, अधिपती, अर्यमन, घोरदर्शन, शयनगृहाकडे प्रस्थान केले.... मस्त आहे... अजून अशा काही कथा लिहा. जमल्यास एक मालिका. धमाल येईल. जी. ए. तर वाटले नाहीत. फक्त गूढ शब्द आणि रक्त, कवटी म्हणजे जी ए अजिबात नाहीत. आणि जी एंचे मुळात शब्दच गूढ वाटतात! शब्दार्थांवरुन वाचले तर गुहेतल्या प्रसंगाचे अन्वय लागला नाही. मनोरथ का विकल झाले हे कळाले नाही. सर्वात महत्त्वाचे अगदी अति अवघड प्रश्न असला तरी 'अर्यमन' नामक व्यक्तिने अमेरिकन डॉलरबद्दल विचारणे हे पूर्ण कथेला छेद देणारे आणि अचानकपणे बेअरिंग घालवणारे वाटले. एका वेगळ्या आणि मस्त लिखाणाबद्दल खूप धन्यवाद!

In reply to by मैत्र

Pain 25/07/2010 - 11:32
सर्वात महत्त्वाचे अगदी अति अवघड प्रश्न असला तरी 'अर्यमन' नामक व्यक्तिने अमेरिकन डॉलरबद्दल विचारणे हे पूर्ण कथेला छेद देणारे आणि अचानकपणे बेअरिंग घालवणारे वाटले. तस नाहीये. मला वाटते की ती जी मालिका चालु आहे त्यातला तो शेवटचा भाग आहे.

प्राडॉ, प्राडॉ, अवो आमचं काय चुकलं आसंल तर काढा तुमची ती डब्बल-बॅरल आणि घाला दोन गोळ्या आमच्या छाताडात!! पण हे आत्मक्लेश कशापायी करून घेताय? :)

Nile 02/06/2009 - 03:20
कोणी तो ज्याने धागा काढुन संपादकांना लिहायला उद्द्युक्त केलं होतं? ;)

In reply to by Nile

अवलिया 02/06/2009 - 07:33
हा हा हा :) कोण हो कोण तो संपादकांनाच लिहायला उद्युक्त करणारा? :) देता का सुपारी ? लिहु का त्याच्यावरच एक फक्कडसा लेख ? ;) बोला ‍ !!! :? --अवलिया

विजुभाऊ 29/12/2009 - 14:53
बिरुटे सर...... आख्ख्या वर्षात या सारखी कथा पुन्ना ल्हिली नायी? आसं का कर्ताय?

JAGOMOHANPYARE 29/12/2009 - 17:00
हे काय आहे? काही कळेना ............ :( *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

वाह ! क लिवलय क लिवलय. पुन्हा वाचुन आता अनेक अर्थ कळु लागलेत. साला हे इयान फ्लेमिंग, रश्दी, नसरीन वगैरे संपतात तिथे आमचे दि.बी. चालु होतात :) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

माया 24/07/2010 - 17:42
:O कुठेतरी वाचलयं हे...आता आठवत नाहिये... लेखकांनी संदर्भाचा खुलासा करावा... - माया.

In reply to by माया

तुम्हाला संजोपरावांच्या या लेखाबद्दल म्हणायचे आहे काय ? त्याला उत्तर म्हणूनच हे लेखन केले होते. पण तुम्ही हा लेख पूर्वी वाचल्याचा आरोप केला आहे. त्याबद्दल काय ? उगाच काहीच्या काही बरळू नका. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माया 28/07/2010 - 14:00
>>तुम्हाला संजोपरावांच्या या लेखाबद्दल म्हणायचे आहे काय ? त्याला उत्तर म्हणूनच हे लेखन केले होते. हा संदर्भ देणे आवश्यक होते असे नाही का वाटत आपल्याला? >>पण तुम्ही हा लेख पूर्वी वाचल्याचा आरोप केला आहे. त्याबद्दल काय ? मी कुठेतरी वाचलयं हे असे म्हटले आहे. यातील नावं , लिखाणाची पध्दत ओळखीची वाटली म्हणुन लिखाणही. (अन्य शब्दांचा संदर्भ दिल्याबद्दल आभार.) >>उगाच काहीच्या काही बरळू नका. तुमचीच शब्दशैली आहे का ही ? असे वाटुन गेले. असो. तक्रार आपल्याला पटलं नसेल तर तुम्ही करु शकता. संदर्भ मिळाल्याने मी यावर अजुन बोलणे योग्य नाही असे मला वाटते . धन्यवाद आणि शुभेच्छा. - माया.

Pain 25/07/2010 - 11:37
गोष्ट आवडली, शेवटचे रूपक (किंवा जे काही आहे) कळले नाही. कदाचित सर्व संदर्भ माहिती नसल्याने असेल... शंका: हेमगर्भाची मात्रा अतःकाळ समीप आल्यावर देतात ना ? एखादे काही महत्त्वाचे बोलणे राहुन जावू नये म्हणुन ?

In reply to by Pain

>>>हेमगर्भाची मात्रा अतःकाळ समीप आल्यावर देतात ना ? एखादे काही महत्त्वाचे बोलणे राहुन जावू नये म्हणुन ? श्वास अडकायला लागला आहे असे वाटल्यावर देतात असे वाचून आहे. आता तो श्वास [अंत:काळातला की] कोणत्या कारणामुळे अडकल्यावर वगैरे काही माहित नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Pain 25/07/2010 - 11:56
अच्छा, धन्यवाद. आणि माझ्या वाक्यात अंत:काळ असे असायला हवे. संपादन करता येत नाहीये.

अहिरावण 14/09/2023 - 19:25
मराठीच्या प्राध्यापकांकडून इतके छान संस्कृतप्रचुर शब्दांचा मस्त वापर केलेले लेखन पाहून बरे वाटले. असेच लेखन यावे ...

In reply to by विजुभाऊ

अहिरावण 15/09/2023 - 10:22
आजवर कोणत्या मराठीच्या प्राध्यापकांनी तुम्हाअम्हाला समजेल असे सोप्पे लिहिले आहे? त्यांचे लेखन प्रज्ञावंतांसाठीच असते.
अधिपतींनी नेहमीप्रमाणे दरबाराला सुरवात व्हावी अशी आज्ञा केली. दरबाराला सुरवात झाली. किरकोळ तंटे, भांडणे यांचा यथायोग्य निवाडा करुन अधिपतींनी मौजेचे कार्यक्रम सुरु व्हावे असे सांगितले. दरबारी आपले विविध प्रकारचे कौशल्य दाखवित असतांनाच अधिपतींना लहर आली, आणि त्यांनी आपले नृत्यकौशल्य दाखविले. सभाजन अचंबित होवुन टाळ्या वाजवण्याचे विसरुन आपल्या शेजा-यांची बोटे तोंडात घालु लागले. दोन मिनिटांनी गरके घेवुन झाल्यावर "आताच भोजन झाले नाहीतर, कुणाला हार गेलो नसतो!" असे सांगुन अधिपती धापा टाकत सिंहासनावर जावुन बसले.