मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

Brevet des Randonneurs Mondiaux 300

देशपांडेमामा ·

च्यायला उंब्रजला बाईकवर जाऊन यायच म्हंटलं तरी अक्खा दिवस जातो....तुम्ही सायकलवर जाऊन आलात...दंडवत _/\_

sagarpdy 10/02/2017 - 10:00
पोहे !? दुपारी सायकल चालवायची असताना पोहे ? अगदीच अमॅच्युअर सायकलिस्ट दिसता.:P पुढील ब्रेवे साठी मार्गदर्शन हवे असल्यास व्यनि करा. [जोरदार अभिनंदन ओ मामा]

In reply to by sagarpdy

मला वाटल मामा आता पोह्यांनंतर मिसळ खाल्ली वगैरे लिहिणार की काय ? अभिनंदन हो मामा. मला पण देशपांडे मामा व्हायचय.

In reply to by देशपांडेमामा

मोदक 14/02/2017 - 17:36
फ्फार्र सिनीयर सायकलिस्ट आहेत बरका ते ग्रुपचे. ते कुणाचेही कान उपटु शकतात :-P
हो.. आणि त्यांना सेल्फी काढायला सेल्फीस्टिकची गरज लागत नाही. :D

300 ची ब्रम्ह. हाबीनंदन वो मामा. इथं आमी 200 करायची का याचा ईच्यार बी करणा, आन तुमी 200 काय 300 काय फटक्यात करू रायले. आपला सलाम भौ तुमाला.___/\___. मामा तुमी आशेच ब्रम्हरक्षस बनून राहण्यासाठी शूबेच्छा. बाबा योगीराज

In reply to by प्रशांत

आम्ही भरुन पावलो ! असाच लोभ असु द्या _/\_ रच्याकने ..तुम्हाला मार्गदर्शन करणे म्हणजे होकायंत्राला दिशा दाखवण्यासारखे आहे !! ;-) देश

च्यायला उंब्रजला बाईकवर जाऊन यायच म्हंटलं तरी अक्खा दिवस जातो....तुम्ही सायकलवर जाऊन आलात...दंडवत _/\_

sagarpdy 10/02/2017 - 10:00
पोहे !? दुपारी सायकल चालवायची असताना पोहे ? अगदीच अमॅच्युअर सायकलिस्ट दिसता.:P पुढील ब्रेवे साठी मार्गदर्शन हवे असल्यास व्यनि करा. [जोरदार अभिनंदन ओ मामा]

In reply to by sagarpdy

मला वाटल मामा आता पोह्यांनंतर मिसळ खाल्ली वगैरे लिहिणार की काय ? अभिनंदन हो मामा. मला पण देशपांडे मामा व्हायचय.

In reply to by देशपांडेमामा

मोदक 14/02/2017 - 17:36
फ्फार्र सिनीयर सायकलिस्ट आहेत बरका ते ग्रुपचे. ते कुणाचेही कान उपटु शकतात :-P
हो.. आणि त्यांना सेल्फी काढायला सेल्फीस्टिकची गरज लागत नाही. :D

300 ची ब्रम्ह. हाबीनंदन वो मामा. इथं आमी 200 करायची का याचा ईच्यार बी करणा, आन तुमी 200 काय 300 काय फटक्यात करू रायले. आपला सलाम भौ तुमाला.___/\___. मामा तुमी आशेच ब्रम्हरक्षस बनून राहण्यासाठी शूबेच्छा. बाबा योगीराज

In reply to by प्रशांत

आम्ही भरुन पावलो ! असाच लोभ असु द्या _/\_ रच्याकने ..तुम्हाला मार्गदर्शन करणे म्हणजे होकायंत्राला दिशा दाखवण्यासारखे आहे !! ;-) देश
लेखनप्रकार
शिर्षक थोडे विचित्र आहे कारण १) हे फ्रेंच भाषेतले आहे आणि २) हा प्रकार जो पर्यंत सायकलींगची आवड लागत नाही तोपर्यंत काही कळत नाही :-) BRM च्या अधिक माहीतीकरता मोदकभाऊंच्या ह्या धाग्याला भेट द्या डिसेंबर २०१६ मध्ये २०० ची BRM म्हणजेच long distance cycling चा २०० किमी चा प्रकार पुर्ण केला होता. त्यानंतर काही ना काही कारणाने पुढचा ३०० चा प्रकार करता आला नाही. पण फेब्रुवारी २०१७ चा करायचाच असे ठरवले कारण पुढला थेट जुन मध्ये होता/आहे. नोंदणी वगरे सगळे सोपस्कार करुन तयारीला लागलो आणि नेमक तेव्हा काम वाढलं !

वर्ल्डकप क्लासिक्स - १९८७ - न्यूझीलंड विरुद्ध झिंबाब्वे

स्पार्टाकस ·

गॅरी ट्रुमन 09/02/2017 - 10:00
आणखी एका अविस्मरणीय सामन्याविषयी आणखी एक अप्रतिम लेख. या सामन्यातील डेव्ह हॉटनची बॅटिंग केवळ लाजबाब होती. सामना न्यू झीलंडने जिंकला खरा पण प्रेक्षकांची मने जिंकली निसंशयपणे हॉटनने. या सामन्यानंतर हॉटन विशेष चमकला नाही पण हा सामना मात्र त्याचाच होता.

In reply to by गॅरी ट्रुमन

स्पार्टाकस 09/02/2017 - 11:39
भारताविरुद्ध झिंबाब्वेच्या पहिल्यावहिल्या टेस्टमधे झिंबाब्वेतर्फे डेव्ह हौटननेच पहिली सेंच्युरी मारली होती.

In reply to by स्पार्टाकस

गॅरी ट्रुमन 09/02/2017 - 11:50
धन्यवाद. १९९२ ची हरारे टेस्ट का? हे लक्षात नव्हते. या टेस्टमध्ये झिम्बाब्वेने चांगल्या ४०० पेक्षा जास्त धावा पहिल्या डावात काढल्या होत्या आणि भारताची थोडी दमछाकच झाली होती तेवढ्या धावा करताना. संजय मांजरेकरने आयत्या वेळी चांगली कामगिरी करून शतक झळकावले. नाहीतर खरा तर आपल्याला झिम्बाब्वेसारख्या लिंबूटिंबू संघाकडून फॉलोऑनच मिळायचा. या टेस्टमधील संजय मांजरेकरच्या कामगिरीविषयी ठाण्यातील पत्रकार नरेंद्र बल्लाळ यांनी लिहिले होते की संजय मांजरेकर हा फटाका ऑस्ट्रेलियात गरम झाला आणि झिम्बाब्वेमध्ये फुटला (भारतीय संघाने १९९१-९२ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता). दुर्दैवाने हा फटाका झिम्बाब्वेमध्ये फुटला त्यानंतर विशेष कधी चमकलाच नाही. १९९६ च्या विश्वचषकातील मुंबईतील ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या मॅचमधील त्याने चांगली कामगिरी केली तसेच १९९४ च्या वेस्ट इंडिजच्या भारत दौर्‍यातही त्यामानाने चांगली कामगिरी केली होती. पण पाकिस्तानविरूध्द कराचीमध्ये शतक आणि लाहोरमध्ये द्विशतक ठोकणारा आणि वेस्ट इंडीजच्या तोफखान्याला तोंड देत ब्रिजटाऊनमध्ये शतक ठोकणारा संजय मांजरेकर नंतर कधी दिसलाच नाही :(

गॅरी ट्रुमन 09/02/2017 - 10:00
आणखी एका अविस्मरणीय सामन्याविषयी आणखी एक अप्रतिम लेख. या सामन्यातील डेव्ह हॉटनची बॅटिंग केवळ लाजबाब होती. सामना न्यू झीलंडने जिंकला खरा पण प्रेक्षकांची मने जिंकली निसंशयपणे हॉटनने. या सामन्यानंतर हॉटन विशेष चमकला नाही पण हा सामना मात्र त्याचाच होता.

In reply to by गॅरी ट्रुमन

स्पार्टाकस 09/02/2017 - 11:39
भारताविरुद्ध झिंबाब्वेच्या पहिल्यावहिल्या टेस्टमधे झिंबाब्वेतर्फे डेव्ह हौटननेच पहिली सेंच्युरी मारली होती.

In reply to by स्पार्टाकस

गॅरी ट्रुमन 09/02/2017 - 11:50
धन्यवाद. १९९२ ची हरारे टेस्ट का? हे लक्षात नव्हते. या टेस्टमध्ये झिम्बाब्वेने चांगल्या ४०० पेक्षा जास्त धावा पहिल्या डावात काढल्या होत्या आणि भारताची थोडी दमछाकच झाली होती तेवढ्या धावा करताना. संजय मांजरेकरने आयत्या वेळी चांगली कामगिरी करून शतक झळकावले. नाहीतर खरा तर आपल्याला झिम्बाब्वेसारख्या लिंबूटिंबू संघाकडून फॉलोऑनच मिळायचा. या टेस्टमधील संजय मांजरेकरच्या कामगिरीविषयी ठाण्यातील पत्रकार नरेंद्र बल्लाळ यांनी लिहिले होते की संजय मांजरेकर हा फटाका ऑस्ट्रेलियात गरम झाला आणि झिम्बाब्वेमध्ये फुटला (भारतीय संघाने १९९१-९२ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता). दुर्दैवाने हा फटाका झिम्बाब्वेमध्ये फुटला त्यानंतर विशेष कधी चमकलाच नाही. १९९६ च्या विश्वचषकातील मुंबईतील ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या मॅचमधील त्याने चांगली कामगिरी केली तसेच १९९४ च्या वेस्ट इंडिजच्या भारत दौर्‍यातही त्यामानाने चांगली कामगिरी केली होती. पण पाकिस्तानविरूध्द कराचीमध्ये शतक आणि लाहोरमध्ये द्विशतक ठोकणारा आणि वेस्ट इंडीजच्या तोफखान्याला तोंड देत ब्रिजटाऊनमध्ये शतक ठोकणारा संजय मांजरेकर नंतर कधी दिसलाच नाही :(
लेखनविषय:
लेखनप्रकार
१० ऑक्टोबर १९८७ लाल बहादूर शास्त्री स्टेडीयम, हैद्राबाद हैद्राबादच्या मैदानात न्यूझीलंड आणि झिंबाब्वे यांच्यातली ग्रूप ए मधली मॅच रंगणार होती. अद्यापही टेस्ट स्टॅटस न मिळालेल्या झिंबाब्वेच्या संघाचा १९८३ नंतर हा दुसराच वर्ल्डकप होता. १९८३ मध्ये झिंबाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवून सगळ्यांनाच चकीत केलं होतं. भारताचीही त्यांनी १७ / ५ अशी अवस्था केली होती, पण कपिलदेवच्या अफलातून इनिंग्जने भारताला तारलं होतं. १९८३ च्या वर्ल्डकपबरोबरच कॅप्टन डंकन फ्लेचरचं करीअरही संपुष्टात आलं होतं.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९८७ - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

स्पार्टाकस ·

गॅरी ट्रुमन 08/02/2017 - 09:53
नेहमीप्रमाणे मस्तच लेख. हा सामना मला बर्‍यापैकी आठवतो असा माझा दावा असायचा.पण मला या लेखात लिहिले आहे त्याच्या १% ही लिहिणे जमले नसते त्यामुळे माझ्या दाव्याचा फेरविचार करायची वेळ आली आहे :) १९८७ च्या रिलायन्स कपच्या वेळी मी ३ रीमध्ये होतो. ९ ऑक्टोबरच्या सामन्याच्या दिवशी सहामाही परीक्षेचा कुठचा तरी पेपर होता. परीक्षेचे पेपर नेमके अशा मॅचच्या दिवशी का ठेवतात असेही मला वाटले होते :) पेपर दुपारी अडीचला होता त्यामुळे ऑस्ट्रेलियाची पूर्ण इनिंग बघून भारताच्या इनिंगमध्ये गावसकर आऊट झाल्यावर श्रीकांत-सिध्दूची पार्टनरशीप सुरू झाली आणि मी परीक्षेला गेलो होतो हे पण आठवते. त्या काळी परीक्षा असो की काही असो मॅच माझ्यासाठी जास्त महत्वाची असायची :) माझ्या एका मित्राने परीक्षेची तयारी करायची म्हणून ऑस्ट्रेलियाची इनिंग अजिबात बघितली नव्हती. पेपर सुरू व्हायच्या आधी त्याला ऑस्ट्रेलियाने २७० रन्स केल्या आहेत आणि गावसकर आऊट झाला आहे हे पण सांगितल्याचे लक्षात आहे :) पेपरहून परत आलो त्यावेळी शेवटची दोनेक षटके बाकी होती. स्टीव वॉ चे शेवटचे षटक, त्यात मणिंदरची विकेट घ्यायच्या बॉलवर रन-अप घेताना तो अडखळला होता आणि त्याला परत रन-अप घ्यायला सुरवात करावी लागली होती तसेच मणिंदरचा त्याने उडविलेला त्रिफळा आणि त्याचबरोबर डीन जोन्सचा तो चौकार आहे ही रवी शास्त्रीने सीमारेषेवरून केलेली खूण या सगळ्या गोष्टी लक्षात आहेत. मला क्रिकेट समजायला लागल्यापासून शारजामध्ये जावेद मियांदादने चेतन शर्माला शेवटच्या बॉलवर सिक्स मारली आणि पाकिस्तानला सामना जिंकून दिला तो पहिला एकदिवसीय चुरशीचा सामना आणि रिलायन्स कपमधील भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया हा दुसरा!! त्यामुळे हा सामना विशेष आठवणीत आहे.

गॅरी ट्रुमन 08/02/2017 - 23:11
या लेखमालेतले पूर्वीचे लेख १९७५ आणि १९७९ च्या विश्वचषकांमधले होते. माझा जन्मही त्यावेळी झाला नव्हता त्यामुळे अर्थातच हे सामने परिचयाचे नव्हते आणि त्यामुळे तितके 'रिलेटेबल' नव्हते. १९८३ च्या विश्वचषकाच्या वेळी मी खूपच लहान होतो त्यामुळे घरच्यांनी ते सामने बघितले असले तरी त्या सामन्यांची आठवण नाही. त्यामुळे त्या उत्तम लेखांवर काहीच प्रतिसाद लिहिले नव्हते. पण १९८७ ते २००३ हे सगळे विश्वचषक अगदी भक्तीभावाने बघितले होते. या विश्वचषकांमधील इतर सामने अविस्मरणीय आहेत. त्या सामन्यांविषयी लिहिता आले तर खूपच चांगले होईल. अर्थात माझ्यासारख्याने अशी काही अपेक्षा करणे म्हणजे 'उंटावरून शेळ्या हाकायचे' उत्तम उदाहरण झाले पण आपल्या मिपावर चांगल्या सामन्यांचा एक कोषच होईल. १९८७ १. न्यू झीलंड विरूध्द झिम्बाब्वे मधील हैद्राबादचा सामना. या सामन्यात डेव्ह हॉटनने १३९ रन्स करून न्यू झीलंडच्या तोंडचे पाणी पळवले होते. शेवटी मार्टिन क्रोने हॉटनचा एक अफलातून कॅच घेतला आणि तो सामना न्यू झीलंडने अवघ्या ३ धावांनी जिंकला. नाहीतर त्या सामन्यात न्यू झीलंडचा पराभव निश्चित होता. २. पाकिस्तान विरूध्द वेस्ट इंडिजमधील लाहोरमधील सामना. हा सामना शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानने जिंकला होता आणि तो पण कोर्टनी वॉल्शच्या खिलाडू वृत्तीमुळे. त्याला सलीम जाफरला 'मंकडेड' पध्दतीने धावबाद करायची संधी होती पण तसे करणे त्याला प्रशस्त वाटले नाही. याच सामन्यात आयत्या वेळी अब्दुल कादिरने सिक्स मारून हातातून निसटत चाललेला सामना पाकिस्तानच्या नियंत्रणात आणला. ३. भारत विरूध्द न्यू झीलंडमधील बंगलोरमधील सामना. या सामन्यात भारताचा डाव बर्‍यापैकी चाचपडत चालला होता. पण कपिल देव आणि किरण मोरेने शेवटच्या ८ ओव्हरमध्ये ८२ धावा कुटल्या आणि त्यामुळे हा सामना भारताने १६ धावांनी जिंकला. ४. भारत विरूध्द न्यू झीलंडमधील नागपूर येथील सामना. याच सामन्यात चेतन शर्माने हॅट-ट्रिक घेतली होती आणि सुनील गावसकरने वन-डे मधील एकमेव सेंच्युरी मारली. १९९२ १. भारत विरूध्द ऑस्ट्रेलियामधील ब्रिस्बेनमधील सामना. हा सामना शेवटच्या बॉलवर भारताने एका धावेने गमावला होता. २. भारत विरूध्द पाकिस्तानमधील सिडनीमधील सामना. हा सामना भारताने जिंकला होता. याच सामन्यात जावेद मियांदाद आणि किरण मोरेमध्ये थोडी चकमक उडली होती आणि मग जावेदने भर स्टेडिअममध्ये उड्या मारून किरण मोरेची नक्कल केली होती. या सामन्यात आमीर सोहेल खूपच चांगला खेळत होता. पण आयत्या वेळी सचिनच्या बॉलिंगवर श्रीकांतने त्याचा कॅच पकडला आणि मॅच आपल्या नियंत्रणात आली. ३. पाकिस्तान विरूध्द न्यू झीलंड हा ऑकलंडमधील उपांत्य फेरीचा पहिला सामना. या सामन्यात इंझमाम उल हकने ३७ बॉलमध्ये ६० रन्स तडकावून पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता. तोपर्यंत पाकिस्तान हा सामना जिंकू शकेल असे वाटले नव्हते. पण इंझमाम न्यू झीलंडच्या बॉलर्सवर तुटून पडल्यावर न्यू झीलंडने पराभव मान्य केल्याप्रमाणेच खेळायला सुरवात केली आणि 'गिव्ह अप' केले. ४.दक्षिण आफ्रिका विरूध्द इंग्लंड हा सिडनीमधील उपांत्य फेरीचा सामना. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पावसासंदर्भाच्या विचित्र नियमामुळे पराभव झाला होता. ५. पाकिस्तान विरूध्द इंग्लंड हा मेलबर्नमधील अंतिम फेरीचा सामना. या सामन्यात सुरवातीला इम्रान खान आणि जावेद मियांदादने पाकिस्तानला बर्‍यापैकी धावसंख्या उभी करून दिली होती. तसेच इंग्लंडच्या डावात अ‍ॅलेक स्टुअर्टला चुकीचे आऊट दिले गेले होते. त्यानंतर अ‍ॅलन लॅम्बने डाव सावरायचा प्रयत्न केला. पण वसिम अक्रमने अ‍ॅलन लॅम्ब आणि क्रिस लुईस या दोघांचा लागोपाठच्या बॉल्सवर त्रिफळा उडवला आणि इंग्लंडला फार डोके वर काढू दिले नाही. १९९६ १. भारत विरूध्द श्रीलंका हा दिल्लीमधील साखळी सामना. या सामन्यात सनथ जयसूर्या म्हणजे नक्की काय चीज आहे हे भारताला समजले. जयसूर्याने या सामन्यात मनोज प्रभाकरची जी धुलाई केली होती ती केवळ अफलातून होती. त्या हार्ड विकेटवर चार-चार फास्ट बॉलर्स घेतले गेले होते आणि अनिल कुंबळे हा एकटा स्पिनर होता. त्यानंतर बिचार्‍या मनोज प्रभाकरला शेवटी ऑफस्पिन गोलंदाजी करावी लागली होती. तो मनोज प्रभाकरचा शेवटचाच सामना ठरला. २. केनया विरूध्द वेस्ट इंडिज हा साखळीतला पुण्यातला सामना. या सामन्यात दुबळ्या केनयाने चक्क वेस्ट इंडिजला ७३ धावांनी धूळ चारली होती. ३. भारत विरूध्द पाकिस्तान हा बंगलोरमधील उपांत्यपूर्व फेरीचा सामना. या सामन्यात सुरवातीला सिध्दूची चांगली खेळी आणि नंतर अजय जाडेजाने वकार युनूसची केलेली धुलाई यामुळे भारताने चांगली धावसंख्या उभारली. पुढे नवज्योत सिध्दू आणि आमीर सोहेलने अस्सल पंजाबीत एकमेकांना शिव्या हासडल्या होत्या. त्याच्याच पुढच्याच बॉलवर वेंकटेश प्रसादने त्याला बाद केले. शेवटी आयत्या वेळी रशीद लतीफची बॅट तळपली आणि सामना आपल्या हातातून जातो की काय असे वाटायला लागले. पण सुदैवाने तसे काही झाले नाही. ४. ऑस्ट्रेलिया विरूध्द वेस्ट इंडिज हा उपांत्य फेरीचा मोहालीमधील सामना. हा सामना जिंकायची आशाच ऑस्ट्रेलियाने सोडली होती पण आयत्या वेळी शेन वॉर्नची जादू चालली आणि ऑस्ट्रेलियाने धक्कादायक विजय मिळवला. १९९९ १. यातील माझ्या आठवणीतला एकमेव सामना म्हणजे एजबॅस्टनमधील ऑस्ट्रेलिया विरूध्द दक्षिण आफ्रिका हा टाय झालेला सामना. या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये दोन फोर मारून लान्स क्रूसनरने सामना जवळपास जिंकत आणला होता.पण नंतर गरज नसताना अ‍ॅलन डॉनल्ड धावायला निघाला आणि रन-आऊट झाला. २००३ १. अर्थातच जोहान्सबर्गमधील भारत विरूध्द पाकिस्तान हा सामना. या सामन्यात सचिनने शोएब अख्तरची मस्त धुलाई केली होती. २००७ मध्ये भारत पहिल्या फेरीतच गारद झाला त्यानंतर वर्ल्डकपमधील इंटरेस्ट गेला. २०११ पर्यंत क्रिकेटमध्ये तितका इंटरेस्ट राहिला नव्हता. आणि २०१५ मध्ये तर वर्ल्डकपमधील एकही सामना बघितला नव्हता. त्यामुळे त्याविषयी काहीही माहित नाही :( असो. मान्य आहे की हा प्रकार उंटावरून शेळ्या हाकण्यासारखा आहे आणि स्पार्टाकस लिहित आहेत त्याच्या १% ही लिहिणे मला जमत नाही. पण या सामन्यांविषयी स्पार्टाकस यांच्या सिध्दहस्त लेखणीतून कधीतरी वाचायला मिळाले तर तो मिपावरील एक मोठा ठेवा होईल हे नक्की.

गॅरी ट्रुमन 08/02/2017 - 09:53
नेहमीप्रमाणे मस्तच लेख. हा सामना मला बर्‍यापैकी आठवतो असा माझा दावा असायचा.पण मला या लेखात लिहिले आहे त्याच्या १% ही लिहिणे जमले नसते त्यामुळे माझ्या दाव्याचा फेरविचार करायची वेळ आली आहे :) १९८७ च्या रिलायन्स कपच्या वेळी मी ३ रीमध्ये होतो. ९ ऑक्टोबरच्या सामन्याच्या दिवशी सहामाही परीक्षेचा कुठचा तरी पेपर होता. परीक्षेचे पेपर नेमके अशा मॅचच्या दिवशी का ठेवतात असेही मला वाटले होते :) पेपर दुपारी अडीचला होता त्यामुळे ऑस्ट्रेलियाची पूर्ण इनिंग बघून भारताच्या इनिंगमध्ये गावसकर आऊट झाल्यावर श्रीकांत-सिध्दूची पार्टनरशीप सुरू झाली आणि मी परीक्षेला गेलो होतो हे पण आठवते. त्या काळी परीक्षा असो की काही असो मॅच माझ्यासाठी जास्त महत्वाची असायची :) माझ्या एका मित्राने परीक्षेची तयारी करायची म्हणून ऑस्ट्रेलियाची इनिंग अजिबात बघितली नव्हती. पेपर सुरू व्हायच्या आधी त्याला ऑस्ट्रेलियाने २७० रन्स केल्या आहेत आणि गावसकर आऊट झाला आहे हे पण सांगितल्याचे लक्षात आहे :) पेपरहून परत आलो त्यावेळी शेवटची दोनेक षटके बाकी होती. स्टीव वॉ चे शेवटचे षटक, त्यात मणिंदरची विकेट घ्यायच्या बॉलवर रन-अप घेताना तो अडखळला होता आणि त्याला परत रन-अप घ्यायला सुरवात करावी लागली होती तसेच मणिंदरचा त्याने उडविलेला त्रिफळा आणि त्याचबरोबर डीन जोन्सचा तो चौकार आहे ही रवी शास्त्रीने सीमारेषेवरून केलेली खूण या सगळ्या गोष्टी लक्षात आहेत. मला क्रिकेट समजायला लागल्यापासून शारजामध्ये जावेद मियांदादने चेतन शर्माला शेवटच्या बॉलवर सिक्स मारली आणि पाकिस्तानला सामना जिंकून दिला तो पहिला एकदिवसीय चुरशीचा सामना आणि रिलायन्स कपमधील भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया हा दुसरा!! त्यामुळे हा सामना विशेष आठवणीत आहे.

गॅरी ट्रुमन 08/02/2017 - 23:11
या लेखमालेतले पूर्वीचे लेख १९७५ आणि १९७९ च्या विश्वचषकांमधले होते. माझा जन्मही त्यावेळी झाला नव्हता त्यामुळे अर्थातच हे सामने परिचयाचे नव्हते आणि त्यामुळे तितके 'रिलेटेबल' नव्हते. १९८३ च्या विश्वचषकाच्या वेळी मी खूपच लहान होतो त्यामुळे घरच्यांनी ते सामने बघितले असले तरी त्या सामन्यांची आठवण नाही. त्यामुळे त्या उत्तम लेखांवर काहीच प्रतिसाद लिहिले नव्हते. पण १९८७ ते २००३ हे सगळे विश्वचषक अगदी भक्तीभावाने बघितले होते. या विश्वचषकांमधील इतर सामने अविस्मरणीय आहेत. त्या सामन्यांविषयी लिहिता आले तर खूपच चांगले होईल. अर्थात माझ्यासारख्याने अशी काही अपेक्षा करणे म्हणजे 'उंटावरून शेळ्या हाकायचे' उत्तम उदाहरण झाले पण आपल्या मिपावर चांगल्या सामन्यांचा एक कोषच होईल. १९८७ १. न्यू झीलंड विरूध्द झिम्बाब्वे मधील हैद्राबादचा सामना. या सामन्यात डेव्ह हॉटनने १३९ रन्स करून न्यू झीलंडच्या तोंडचे पाणी पळवले होते. शेवटी मार्टिन क्रोने हॉटनचा एक अफलातून कॅच घेतला आणि तो सामना न्यू झीलंडने अवघ्या ३ धावांनी जिंकला. नाहीतर त्या सामन्यात न्यू झीलंडचा पराभव निश्चित होता. २. पाकिस्तान विरूध्द वेस्ट इंडिजमधील लाहोरमधील सामना. हा सामना शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानने जिंकला होता आणि तो पण कोर्टनी वॉल्शच्या खिलाडू वृत्तीमुळे. त्याला सलीम जाफरला 'मंकडेड' पध्दतीने धावबाद करायची संधी होती पण तसे करणे त्याला प्रशस्त वाटले नाही. याच सामन्यात आयत्या वेळी अब्दुल कादिरने सिक्स मारून हातातून निसटत चाललेला सामना पाकिस्तानच्या नियंत्रणात आणला. ३. भारत विरूध्द न्यू झीलंडमधील बंगलोरमधील सामना. या सामन्यात भारताचा डाव बर्‍यापैकी चाचपडत चालला होता. पण कपिल देव आणि किरण मोरेने शेवटच्या ८ ओव्हरमध्ये ८२ धावा कुटल्या आणि त्यामुळे हा सामना भारताने १६ धावांनी जिंकला. ४. भारत विरूध्द न्यू झीलंडमधील नागपूर येथील सामना. याच सामन्यात चेतन शर्माने हॅट-ट्रिक घेतली होती आणि सुनील गावसकरने वन-डे मधील एकमेव सेंच्युरी मारली. १९९२ १. भारत विरूध्द ऑस्ट्रेलियामधील ब्रिस्बेनमधील सामना. हा सामना शेवटच्या बॉलवर भारताने एका धावेने गमावला होता. २. भारत विरूध्द पाकिस्तानमधील सिडनीमधील सामना. हा सामना भारताने जिंकला होता. याच सामन्यात जावेद मियांदाद आणि किरण मोरेमध्ये थोडी चकमक उडली होती आणि मग जावेदने भर स्टेडिअममध्ये उड्या मारून किरण मोरेची नक्कल केली होती. या सामन्यात आमीर सोहेल खूपच चांगला खेळत होता. पण आयत्या वेळी सचिनच्या बॉलिंगवर श्रीकांतने त्याचा कॅच पकडला आणि मॅच आपल्या नियंत्रणात आली. ३. पाकिस्तान विरूध्द न्यू झीलंड हा ऑकलंडमधील उपांत्य फेरीचा पहिला सामना. या सामन्यात इंझमाम उल हकने ३७ बॉलमध्ये ६० रन्स तडकावून पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता. तोपर्यंत पाकिस्तान हा सामना जिंकू शकेल असे वाटले नव्हते. पण इंझमाम न्यू झीलंडच्या बॉलर्सवर तुटून पडल्यावर न्यू झीलंडने पराभव मान्य केल्याप्रमाणेच खेळायला सुरवात केली आणि 'गिव्ह अप' केले. ४.दक्षिण आफ्रिका विरूध्द इंग्लंड हा सिडनीमधील उपांत्य फेरीचा सामना. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पावसासंदर्भाच्या विचित्र नियमामुळे पराभव झाला होता. ५. पाकिस्तान विरूध्द इंग्लंड हा मेलबर्नमधील अंतिम फेरीचा सामना. या सामन्यात सुरवातीला इम्रान खान आणि जावेद मियांदादने पाकिस्तानला बर्‍यापैकी धावसंख्या उभी करून दिली होती. तसेच इंग्लंडच्या डावात अ‍ॅलेक स्टुअर्टला चुकीचे आऊट दिले गेले होते. त्यानंतर अ‍ॅलन लॅम्बने डाव सावरायचा प्रयत्न केला. पण वसिम अक्रमने अ‍ॅलन लॅम्ब आणि क्रिस लुईस या दोघांचा लागोपाठच्या बॉल्सवर त्रिफळा उडवला आणि इंग्लंडला फार डोके वर काढू दिले नाही. १९९६ १. भारत विरूध्द श्रीलंका हा दिल्लीमधील साखळी सामना. या सामन्यात सनथ जयसूर्या म्हणजे नक्की काय चीज आहे हे भारताला समजले. जयसूर्याने या सामन्यात मनोज प्रभाकरची जी धुलाई केली होती ती केवळ अफलातून होती. त्या हार्ड विकेटवर चार-चार फास्ट बॉलर्स घेतले गेले होते आणि अनिल कुंबळे हा एकटा स्पिनर होता. त्यानंतर बिचार्‍या मनोज प्रभाकरला शेवटी ऑफस्पिन गोलंदाजी करावी लागली होती. तो मनोज प्रभाकरचा शेवटचाच सामना ठरला. २. केनया विरूध्द वेस्ट इंडिज हा साखळीतला पुण्यातला सामना. या सामन्यात दुबळ्या केनयाने चक्क वेस्ट इंडिजला ७३ धावांनी धूळ चारली होती. ३. भारत विरूध्द पाकिस्तान हा बंगलोरमधील उपांत्यपूर्व फेरीचा सामना. या सामन्यात सुरवातीला सिध्दूची चांगली खेळी आणि नंतर अजय जाडेजाने वकार युनूसची केलेली धुलाई यामुळे भारताने चांगली धावसंख्या उभारली. पुढे नवज्योत सिध्दू आणि आमीर सोहेलने अस्सल पंजाबीत एकमेकांना शिव्या हासडल्या होत्या. त्याच्याच पुढच्याच बॉलवर वेंकटेश प्रसादने त्याला बाद केले. शेवटी आयत्या वेळी रशीद लतीफची बॅट तळपली आणि सामना आपल्या हातातून जातो की काय असे वाटायला लागले. पण सुदैवाने तसे काही झाले नाही. ४. ऑस्ट्रेलिया विरूध्द वेस्ट इंडिज हा उपांत्य फेरीचा मोहालीमधील सामना. हा सामना जिंकायची आशाच ऑस्ट्रेलियाने सोडली होती पण आयत्या वेळी शेन वॉर्नची जादू चालली आणि ऑस्ट्रेलियाने धक्कादायक विजय मिळवला. १९९९ १. यातील माझ्या आठवणीतला एकमेव सामना म्हणजे एजबॅस्टनमधील ऑस्ट्रेलिया विरूध्द दक्षिण आफ्रिका हा टाय झालेला सामना. या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये दोन फोर मारून लान्स क्रूसनरने सामना जवळपास जिंकत आणला होता.पण नंतर गरज नसताना अ‍ॅलन डॉनल्ड धावायला निघाला आणि रन-आऊट झाला. २००३ १. अर्थातच जोहान्सबर्गमधील भारत विरूध्द पाकिस्तान हा सामना. या सामन्यात सचिनने शोएब अख्तरची मस्त धुलाई केली होती. २००७ मध्ये भारत पहिल्या फेरीतच गारद झाला त्यानंतर वर्ल्डकपमधील इंटरेस्ट गेला. २०११ पर्यंत क्रिकेटमध्ये तितका इंटरेस्ट राहिला नव्हता. आणि २०१५ मध्ये तर वर्ल्डकपमधील एकही सामना बघितला नव्हता. त्यामुळे त्याविषयी काहीही माहित नाही :( असो. मान्य आहे की हा प्रकार उंटावरून शेळ्या हाकण्यासारखा आहे आणि स्पार्टाकस लिहित आहेत त्याच्या १% ही लिहिणे मला जमत नाही. पण या सामन्यांविषयी स्पार्टाकस यांच्या सिध्दहस्त लेखणीतून कधीतरी वाचायला मिळाले तर तो मिपावरील एक मोठा ठेवा होईल हे नक्की.
लेखनविषय:
लेखनप्रकार
१९८३ मध्ये भारताने वर्ल्डकप जिंकल्यावर वर्ल्डकपचे यजमान म्हणून इंग्लंडची मक्तेदारी संपुष्टात आली. १९८७ च्या वर्ल्डकपचं यजमानपद भारत आणि पाकिस्तानला संयुक्तपणे बहाल करण्यात आलं त्यामागे १९८३ मधल्या भारतीय विजयाचा फार मोठा हातभार होता. या वर्ल्डकपमधला आणखीन एक महत्वाचा बदल म्हणजे पूर्वीच्या तीनही वर्ल्डकपप्रमाणे एका इनिंग्जच्या ओव्हर्स ६० वरुन ५० वर आल्या. तसंच इनिंग्जच्या मध्ये लंच आणि टी-टाईमला फाटा देण्यात आला. ९ ऑक्टोबर १९८७ चेपॉक, मद्रास मद्रासच्या चेपॉक मैदानावर (आत्ताचं एम ए चिदंबरम स्टेडीयम) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ग्रूप ए मधली मॅच रंगणार होती.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९८३ - फायनल - भारत विरुद्ध वेस्ट इंडीज

स्पार्टाकस ·

योगी९०० 07/02/2017 - 08:28
खूप छान...!! मस्त लिहीलेयं. मी साधारण पणे चवथीत होतो तेव्हा ही मॅच रेडीओवर ऐकली होती. कोल्हापूरला आम्ही शेजारी-पाजारी मिळून ही मॅच ऐकली होती. भारताची बॅटींग झाल्यावर सगळ्यांनी आशा सोडली होती पण फक्त मी भारत जिंकेल म्हणून सगळ्यांना थांबायला लावून मॅच ऐकायला लावली होती. नंतर माझा खूपच सत्कार झाला होता. (इतका की शेजारच्या काकांनी माझ्यासाठी शर्ट भेट म्हणून दिला...) ह्या मॅचच्या नंतर साधारण सहा महीन्यांनी हाच वेस्ट इंडीजचा संघ कोल्हापुरात आला होता. (पश्चिम विभाग विरूद्ध वेस्ट इंडीज अशी तीन दिवसीय मॅच होती). माझ्या आयूष्यातली मैदानातली एकमेव पाहीलेली मॅच होती. गॉर्डन ग्रिनिज, डेस्मंड हेन्स, व्हिव्हियन रिचर्ड्स, लॅरी गोम्स आणि रिची रिचर्डसन यांना ह्याच डोळ्याने खेळताना पाहण्याचे भाग्य मला मिळाले होते. (आपल्या प. विभागाच्या संघात गुलाम परकार, बलबिंदर संधू, रेन्डॉल डॅनियल असे वीर होते त्यांचाही खेळ पहाण्यास मिळाला...). तुमच्या ह्या लेखामुळे ह्या आठवणी जाग्या झाल्या.

बबन ताम्बे 07/02/2017 - 11:35
पुनःप्रत्ययाचा आनंद. पिंपरीतल्या अण्णासाहेब मगर स्टेडीअमवर त्यावेळी सार्वजनीक ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट टी व्ही होता. आम्ही त्या रात्री ही संपुर्ण मॅच बघीतली होती.

चौकटराजा 07/02/2017 - 11:50
१९८३ च्या सुमारास जे अगदी वेल टू डू असे लोक्स होते त्यांच्याकडे कृष्ण धवल टी व्ही असे. माझ्या सुदैवाने एका नातेवाईकाकडे तो होता. माझ्या आठवणीत तो एक अचाट दिवस होता. आता कबूल करायला हरकत नाही. अगदी ९ बळी गेले तरी विंडीज हा सामनाच जिंकणार असे मला वाटत होते. संधूचा इन्स्विंग व कपिलचा झेल हे यातील अजरामर असे दोन प्रसंग आहेत. क्रिकेट हा स्टार्सचा खेळ नवे तर तो सांघिक सहकार्याचा खेळ आहे हे या विजयाने अधोरेखित केले. तरीही भारतातील कित्येक जण हा विजय खोटा असे असे मानत होते. त्यातही मी ही एक होतो . पुढे आमची जिरली यात शंका नाही.

गॅरी ट्रुमन 07/02/2017 - 14:49
एकदम जबराट. मिपाचे क्रिकेटसम्राट स्पार्टाकसच. या फायनलविषयी वाचलेली एक गोष्ट आठवते. भारताने इंग्लंडला नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता आणि फायनल दोन दिवसांनी होती. त्यावेळी माल्कम मार्शलने लंडनमध्ये गाडी बुक केली होती आणि म्हटले होते-- वर्ल्डकप जिंकल्यावर गाडी घेऊन जातो. आणि अर्थातच नंतर तो गाडी घ्यायला गेला नाही!! ही गोष्ट खरी आहे की नाही माहित नाही पण वाचलेली आहे हे आठवते.

In reply to by गॅरी ट्रुमन

नितिन थत्ते 07/02/2017 - 15:08
भारत फायनल खेळणार म्हणजे इंग्लंडला फायनल खेळण्याचा मुक्त परवाना असे इंग्लंडचे पत्रकार सेमीफायनलपूर्वी बोलले होते.

In reply to by गॅरी ट्रुमन

स्पार्टाकस 07/02/2017 - 20:03
हो! मार्शल तेव्हा हँपशायरकडून कौंटी क्रिकेट खेळत असे. वर्ल्डकप जिंकल्यावर नविन गाडीत बसून हँपशायरला जायचा त्याचा बेत होता, पण भारताने त्यावर पाणी फेरल्यावर तो गाडीची डिलिव्हरी घेण्यासाठी गेलाच नाही!

गामा पैलवान 07/02/2017 - 19:58
स्पार्टाकस, सुंदर लिहिता हो तुम्ही. सगळ्यांनी एव्हढ्या रंजक आठवणी सांगितल्यावर मी एक पोपट आठवण सांगतो. जेव्हा रिचर्ड्स खेळंत होता त्यावेळेस दूरदर्शनवर बाते फिल्मोकी हा कार्यक्रम चालू होता. कोणीतरी कुणाचेतरी कान उपटले आणि मग म्याच दाखवायला सुरुवात झाली. ती अखेरपर्यंत. 'मायकेल होल्डिंग इज आऊट! अँड इंडिया इस द वर्ल्ड चँपियन!!' हे उद्गार आजही कानांत घुमतात. सामना संपल्यावर वे.इं.चा कोणीतरी खेळाडू विकेटवर पडून रडंत होता. तो मार्शल होता असं दुसऱ्या दिवशी लोकसत्तेत छापून आलं होतं. तेव्हा त्यात मोठ्ठी आकाशओळ (हेडलाईन) आलेली : भारतीय विक्रमाने जिंकलेला विश्वचषक. सोबत कपिलचं अर्कचित्र छापलेलं होतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

स्पार्टाकस 07/02/2017 - 20:01
धन्यवाद गापै! भारताने मॅच जिंकल्यावर विकेटवर पडून रडणारा मार्शल नव्हता. तो एक वेस्ट इंडीजचा सपोर्टर प्रेक्षक होता.

योगी९०० 07/02/2017 - 08:28
खूप छान...!! मस्त लिहीलेयं. मी साधारण पणे चवथीत होतो तेव्हा ही मॅच रेडीओवर ऐकली होती. कोल्हापूरला आम्ही शेजारी-पाजारी मिळून ही मॅच ऐकली होती. भारताची बॅटींग झाल्यावर सगळ्यांनी आशा सोडली होती पण फक्त मी भारत जिंकेल म्हणून सगळ्यांना थांबायला लावून मॅच ऐकायला लावली होती. नंतर माझा खूपच सत्कार झाला होता. (इतका की शेजारच्या काकांनी माझ्यासाठी शर्ट भेट म्हणून दिला...) ह्या मॅचच्या नंतर साधारण सहा महीन्यांनी हाच वेस्ट इंडीजचा संघ कोल्हापुरात आला होता. (पश्चिम विभाग विरूद्ध वेस्ट इंडीज अशी तीन दिवसीय मॅच होती). माझ्या आयूष्यातली मैदानातली एकमेव पाहीलेली मॅच होती. गॉर्डन ग्रिनिज, डेस्मंड हेन्स, व्हिव्हियन रिचर्ड्स, लॅरी गोम्स आणि रिची रिचर्डसन यांना ह्याच डोळ्याने खेळताना पाहण्याचे भाग्य मला मिळाले होते. (आपल्या प. विभागाच्या संघात गुलाम परकार, बलबिंदर संधू, रेन्डॉल डॅनियल असे वीर होते त्यांचाही खेळ पहाण्यास मिळाला...). तुमच्या ह्या लेखामुळे ह्या आठवणी जाग्या झाल्या.

बबन ताम्बे 07/02/2017 - 11:35
पुनःप्रत्ययाचा आनंद. पिंपरीतल्या अण्णासाहेब मगर स्टेडीअमवर त्यावेळी सार्वजनीक ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट टी व्ही होता. आम्ही त्या रात्री ही संपुर्ण मॅच बघीतली होती.

चौकटराजा 07/02/2017 - 11:50
१९८३ च्या सुमारास जे अगदी वेल टू डू असे लोक्स होते त्यांच्याकडे कृष्ण धवल टी व्ही असे. माझ्या सुदैवाने एका नातेवाईकाकडे तो होता. माझ्या आठवणीत तो एक अचाट दिवस होता. आता कबूल करायला हरकत नाही. अगदी ९ बळी गेले तरी विंडीज हा सामनाच जिंकणार असे मला वाटत होते. संधूचा इन्स्विंग व कपिलचा झेल हे यातील अजरामर असे दोन प्रसंग आहेत. क्रिकेट हा स्टार्सचा खेळ नवे तर तो सांघिक सहकार्याचा खेळ आहे हे या विजयाने अधोरेखित केले. तरीही भारतातील कित्येक जण हा विजय खोटा असे असे मानत होते. त्यातही मी ही एक होतो . पुढे आमची जिरली यात शंका नाही.

गॅरी ट्रुमन 07/02/2017 - 14:49
एकदम जबराट. मिपाचे क्रिकेटसम्राट स्पार्टाकसच. या फायनलविषयी वाचलेली एक गोष्ट आठवते. भारताने इंग्लंडला नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता आणि फायनल दोन दिवसांनी होती. त्यावेळी माल्कम मार्शलने लंडनमध्ये गाडी बुक केली होती आणि म्हटले होते-- वर्ल्डकप जिंकल्यावर गाडी घेऊन जातो. आणि अर्थातच नंतर तो गाडी घ्यायला गेला नाही!! ही गोष्ट खरी आहे की नाही माहित नाही पण वाचलेली आहे हे आठवते.

In reply to by गॅरी ट्रुमन

नितिन थत्ते 07/02/2017 - 15:08
भारत फायनल खेळणार म्हणजे इंग्लंडला फायनल खेळण्याचा मुक्त परवाना असे इंग्लंडचे पत्रकार सेमीफायनलपूर्वी बोलले होते.

In reply to by गॅरी ट्रुमन

स्पार्टाकस 07/02/2017 - 20:03
हो! मार्शल तेव्हा हँपशायरकडून कौंटी क्रिकेट खेळत असे. वर्ल्डकप जिंकल्यावर नविन गाडीत बसून हँपशायरला जायचा त्याचा बेत होता, पण भारताने त्यावर पाणी फेरल्यावर तो गाडीची डिलिव्हरी घेण्यासाठी गेलाच नाही!

गामा पैलवान 07/02/2017 - 19:58
स्पार्टाकस, सुंदर लिहिता हो तुम्ही. सगळ्यांनी एव्हढ्या रंजक आठवणी सांगितल्यावर मी एक पोपट आठवण सांगतो. जेव्हा रिचर्ड्स खेळंत होता त्यावेळेस दूरदर्शनवर बाते फिल्मोकी हा कार्यक्रम चालू होता. कोणीतरी कुणाचेतरी कान उपटले आणि मग म्याच दाखवायला सुरुवात झाली. ती अखेरपर्यंत. 'मायकेल होल्डिंग इज आऊट! अँड इंडिया इस द वर्ल्ड चँपियन!!' हे उद्गार आजही कानांत घुमतात. सामना संपल्यावर वे.इं.चा कोणीतरी खेळाडू विकेटवर पडून रडंत होता. तो मार्शल होता असं दुसऱ्या दिवशी लोकसत्तेत छापून आलं होतं. तेव्हा त्यात मोठ्ठी आकाशओळ (हेडलाईन) आलेली : भारतीय विक्रमाने जिंकलेला विश्वचषक. सोबत कपिलचं अर्कचित्र छापलेलं होतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

स्पार्टाकस 07/02/2017 - 20:01
धन्यवाद गापै! भारताने मॅच जिंकल्यावर विकेटवर पडून रडणारा मार्शल नव्हता. तो एक वेस्ट इंडीजचा सपोर्टर प्रेक्षक होता.
लेखनविषय:
लेखनप्रकार
२५ जून १९८३ लॉर्ड्स, लंडन लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानातच पहिल्या दोन वर्ल्डकपप्रमाणे तिसर्‍या वर्ल्डकपचीही फायनल रंगणार होती. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना फायनलमध्ये येऊन धडकलेल्या भारतीय संघाचा सामना होता तो क्लाईव्ह लॉईडच्या वेस्ट इंडीजशी. पहिल्या दोन वर्ल्डकपप्रमाणेच तिसरा वर्ल्डकप जिंकून हॅटट्रीक करण्याचा लॉईडचा निर्धार होता. त्यातच भारत फायनलला आल्यावर तर फायनलची मॅच ही केवळ एक औपचारिकता आहे आणि वेस्ट इंडीजने वर्ल्डकप जिंकल्यातच जमा आहे असं जवळपास प्रत्येकाचं मत होतं! अर्थात वेस्ट इंडीजचा संघही तसाच होता.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९८३ - सेमीफायनल - भारत विरुद्ध इंग्लंड

स्पार्टाकस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
वर्ल्डकप क्लासिक्स - १९८३ - सेमीफायनल - भारत विरुद्ध इंग्लंड २२ जून १९८३ ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर लँकेशायरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात भारत आणि इंग्लंड यांच्यात वर्ल्डकपची पहिली सेमीफायनल होती. बॉब विलीसचा इंग्लिश संघ ग्रूपमधल्या सहा पैकी पाच मॅचेस जिंकून सेमी फायनलमध्ये धडकला होता. उरलेली एकमेव मॅचही न्यूझीलंडने शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकली होती. इंग्लिश खेळाडूंचं सारं लक्षं केंद्रीत झालं होतं ते फायनलकडे!

वर्ल्डकप क्लासिक्स - १९८३ - भारत विरुद्ध झिंबाब्वे

स्पार्टाकस ·

चौकटराजा 05/02/2017 - 20:38
योगायोगाने म्हणा .. काही असो मला अनेक विक्रमी सामने च रेकॉर्ड ब्रेकिंग गोष्टी लाईव्ह पाहायला मिळाल्या पण मरेपर्यन्त ही खंत राहील की याची व्हिडिओ देखील पहायला मिळाली नाही. कपिल देव व धोनी हे माझे आदरणीय खेळाडू अशा साठी आहेत की सामना फिरविण्याची ताकद . ( काही वेळा हा रोल युवराज रैना यानीही पार पाडला आहेच ! ).

फारएन्ड 05/02/2017 - 22:00
मस्त वर्णन! पुढे १९८७ मधे रिचर्ड्स ने मोडेपर्यंत हा विक्रम (१७५) तसाच होता. आणि तो मोडायला रिचर्ड्स लागला हे ही कपिलचे मोठेपण दाखवते :)

फारएन्ड 05/02/2017 - 23:14
बाय द वे मोहिंदर चा आवर्जून उल्लेख केला आहेस - मोहिंदर त्या वेळेस १९८२-८३ मधे प्रचंड फॉर्मात होता. पाक व विंडीज मधे हार्ड बाउन्सी फास्ट बोलिंग तो चांगला खेळला. पण त्याला स्विंग बहुधा फारसे खेळता येत नसे (म्हणजे अझर, वेंगसरकर च्या उलटे). मोहिंदर बहुधा या कप च्या सेमी आणि फायनल मधे मॅन ऑफ द मॅच होता. पण तेव्हा ते अचाट पद्धतीने दिले जात. नाहीतर सेमी फायनल चा मॅन ऑफ द मॅच खरा संदीप पाटील हवा होता.

In reply to by फारएन्ड

स्पार्टाकस 06/02/2017 - 00:57
हो. मोहींदर सेमीफायनल आणि फायनलमध्येही मॅन ऑफ द मॅच होता. गावस्करच्या खालोखाल आणि सचिन - द्रविडचा उदय होण्यापूर्वी फास्ट बॉलर्सना जर कोणी यशस्वीपणे खेळलं असेल तर तो मोहींदरच. खासकरुन वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानच्या दौर्‍यावर त्याने हूक आणि पूलचा वापर करुन त्यांच्या बॉलर्सना पद्धतशीरपणे फटकावलं होतं. सेमीफायनलमध्ये मोहींदरला मॅन ऑफ द मॅच देण्याचं कारण म्हणजे त्याचा ऑलराऊंड परफॉर्मन्स होता. १२ ओव्हर्समध्ये २७ रन्स देत त्याने २ विकेट्स काढल्या होत्या आणि गावस्कर - श्रीकांत आऊट झाल्यावर ४६ रन्स काढत यशपालबरोबर ९२ रन्सची पार्टनरशीप केली होती.

In reply to by स्पार्टाकस

श्रीगुरुजी 06/02/2017 - 15:06
उपांत्यफेरीतील सामन्याचा मोहिंदरचा खरा सामनावीर होता. भारताचे चार मध्यमगती गोलंदाज (कपिल, बिन्नी, मदनलाल व संधू) हे प्रत्येकी पूर्ण १२ षटके टाकायचे. उर्वरीत १२ षटके कीर्ति आझाद व मोहिंदर मिळून टाकायचे. या सामन्यात या दोघांनी इतकी टिच्चून गोलंदाजी केली की कपिलने दोघांनाही पूर्ण १२ षटकांचा कोटा दिला. त्यात मोहिंदरचे पृथक्करण १२ षटकात २८ धावांत २ बळी असे होते, तर आझादचे पृथक्करण १२ षटकात २९ धावांत १ बळी असे होते. या दोघांनी २४ षटकात फक्त ५७ धावा देऊन ३ बळी घेतले होते व त्यामुळेच इंग्लंडला ६० षटकात ९ बाद २१३ इतक्या कमी धावसंख्येवर रोखले गेले. भारताला विजयासाठी ६० षटकात फक्त २१४ धावा प्रतिषटक ३.५७ धावा या वेगाने करण्याची गरज होती. भारताची फलंदाजी सुरू झाल्यानंतर गावसकरने व श्रीकांतने बर्‍यापैकी सुरूवात करून १३ षटकात ४६ धावांची सलामी दिली. त्यात गावसकरचा वाटा २५ धावांचा होता. या सामन्यात गावसकरने या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या केली. हा सामना वगळता इतर सर्व सामन्या गावसकर फ्लॉप होता. तसा तो स्लीपमध्ये चांगले झेल घेत होता, पण धावा करीत नव्हता. कीर्ती आझादने देखील या सामन्यातील गोलंदाजी वगळता इतर सर्व सामन्यात फारश्या धावा केल्या नव्हत्या व त्याला फारसे बळीही मिळाले नव्हते. ४६ धावांच्या सलामीनंतर गावसकर व श्रीकांत दोघेही पाठोपाठ बाद झाल्यानंतर मोहिंदर व यशपालने संथ फलंदाजी केली. अजून एखादी विकेट न घालविता हळूहळू धावा वाढवायच्या हा त्यांचा उद्देश होता. सामन्याची ३९ षटके संपली तेव्हा भारताची धावसंख्या फक्त १०९ होती, पण दोनच फलंदाज बाद झाले होते. आता उर्वरीत २१ षटकात १०५ धावा हव्या होत्या. त्या काळात प्रतिषटक ५ धावा हे मोठे आव्हान होते. ४० व्या षटकात यशपालने विलीसला स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून एक उत्तुंग षटकार मारून गिअर बदलला. पण मोहिंदर लगेच ४६ वर बाद झाला. त्यानंतर आलेल्या संदीप पाटिलने व यशपाल ६० वर बाद झाल्यावर आलेल्या कपिलने इंग्लंडची गोलंदाजी फोडून काढून भारताला विजय मिळवून दिला.

In reply to by श्रीगुरुजी

स्पार्टाकस 06/02/2017 - 19:42
थोडीशी गडबड आहे गुरुजी यशपाल - मोहींदर खेळत असताना सेटल झाल्यानंतर व्हिक मार्क्सला सिक्स ठोकत गिअर बदलला तो मोहींदरने. मोहींदरपाठोपाठ यशपालनेही मग अ‍ॅलट आणि विलीसला सिक्स ठोकल्या. तसंच शेवटी कपिल खेळायला आला तेव्हा भारताला फक्तं ९ रन्स बाकी होत्या, त्यामुळे कपिलला फारसं काही करावं लागलंच नाही, केवळ १ रन काढून तो नॉटआऊट राहीला. विलीसला फटकावलं होतं ते संदीप पाटील आणि यशपालनी.

In reply to by स्पार्टाकस

श्रीगुरुजी 10/02/2017 - 14:18
जराशी गडबड झालेली दिसते. १९८२ मधील कसोटीत संदीप पाटिलने व कपिलने केलेली विलीसची धुलाई आणि हा सामना यात सरमिसळ झाली. त्या सामन्यात यशपालने विलीसच्या गोलंदाजीवर किंचित ऑफच्या बाजूला सरकून स्क्वेअरलेग बाऊंड्रीला मारलेला षटकार अजून आठवतो.

गामा पैलवान 06/02/2017 - 01:09
स्पार्टाकस, मला आठवतंय आम्ही मंडळी दुसऱ्या दिवशी क्षणचित्रं पाहायला आसुसलेले असायचो. पण या बहारदार सामन्याच्या वेळी नेमकी निराशा झाली. वृत्तपत्रातल्या वर्णनावरच समाधान मानावं लागलं. आता लेख वाचून प्रत्यक्ष सामना पहात आहोत असा भास झाला. धन्यवाद! :-) जाताजाता : केव्हिन करेन नावाचा एक टेनिसपटूही आहे. आ.न., -गा.पै.

चौकटराजा 05/02/2017 - 20:38
योगायोगाने म्हणा .. काही असो मला अनेक विक्रमी सामने च रेकॉर्ड ब्रेकिंग गोष्टी लाईव्ह पाहायला मिळाल्या पण मरेपर्यन्त ही खंत राहील की याची व्हिडिओ देखील पहायला मिळाली नाही. कपिल देव व धोनी हे माझे आदरणीय खेळाडू अशा साठी आहेत की सामना फिरविण्याची ताकद . ( काही वेळा हा रोल युवराज रैना यानीही पार पाडला आहेच ! ).

फारएन्ड 05/02/2017 - 22:00
मस्त वर्णन! पुढे १९८७ मधे रिचर्ड्स ने मोडेपर्यंत हा विक्रम (१७५) तसाच होता. आणि तो मोडायला रिचर्ड्स लागला हे ही कपिलचे मोठेपण दाखवते :)

फारएन्ड 05/02/2017 - 23:14
बाय द वे मोहिंदर चा आवर्जून उल्लेख केला आहेस - मोहिंदर त्या वेळेस १९८२-८३ मधे प्रचंड फॉर्मात होता. पाक व विंडीज मधे हार्ड बाउन्सी फास्ट बोलिंग तो चांगला खेळला. पण त्याला स्विंग बहुधा फारसे खेळता येत नसे (म्हणजे अझर, वेंगसरकर च्या उलटे). मोहिंदर बहुधा या कप च्या सेमी आणि फायनल मधे मॅन ऑफ द मॅच होता. पण तेव्हा ते अचाट पद्धतीने दिले जात. नाहीतर सेमी फायनल चा मॅन ऑफ द मॅच खरा संदीप पाटील हवा होता.

In reply to by फारएन्ड

स्पार्टाकस 06/02/2017 - 00:57
हो. मोहींदर सेमीफायनल आणि फायनलमध्येही मॅन ऑफ द मॅच होता. गावस्करच्या खालोखाल आणि सचिन - द्रविडचा उदय होण्यापूर्वी फास्ट बॉलर्सना जर कोणी यशस्वीपणे खेळलं असेल तर तो मोहींदरच. खासकरुन वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानच्या दौर्‍यावर त्याने हूक आणि पूलचा वापर करुन त्यांच्या बॉलर्सना पद्धतशीरपणे फटकावलं होतं. सेमीफायनलमध्ये मोहींदरला मॅन ऑफ द मॅच देण्याचं कारण म्हणजे त्याचा ऑलराऊंड परफॉर्मन्स होता. १२ ओव्हर्समध्ये २७ रन्स देत त्याने २ विकेट्स काढल्या होत्या आणि गावस्कर - श्रीकांत आऊट झाल्यावर ४६ रन्स काढत यशपालबरोबर ९२ रन्सची पार्टनरशीप केली होती.

In reply to by स्पार्टाकस

श्रीगुरुजी 06/02/2017 - 15:06
उपांत्यफेरीतील सामन्याचा मोहिंदरचा खरा सामनावीर होता. भारताचे चार मध्यमगती गोलंदाज (कपिल, बिन्नी, मदनलाल व संधू) हे प्रत्येकी पूर्ण १२ षटके टाकायचे. उर्वरीत १२ षटके कीर्ति आझाद व मोहिंदर मिळून टाकायचे. या सामन्यात या दोघांनी इतकी टिच्चून गोलंदाजी केली की कपिलने दोघांनाही पूर्ण १२ षटकांचा कोटा दिला. त्यात मोहिंदरचे पृथक्करण १२ षटकात २८ धावांत २ बळी असे होते, तर आझादचे पृथक्करण १२ षटकात २९ धावांत १ बळी असे होते. या दोघांनी २४ षटकात फक्त ५७ धावा देऊन ३ बळी घेतले होते व त्यामुळेच इंग्लंडला ६० षटकात ९ बाद २१३ इतक्या कमी धावसंख्येवर रोखले गेले. भारताला विजयासाठी ६० षटकात फक्त २१४ धावा प्रतिषटक ३.५७ धावा या वेगाने करण्याची गरज होती. भारताची फलंदाजी सुरू झाल्यानंतर गावसकरने व श्रीकांतने बर्‍यापैकी सुरूवात करून १३ षटकात ४६ धावांची सलामी दिली. त्यात गावसकरचा वाटा २५ धावांचा होता. या सामन्यात गावसकरने या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या केली. हा सामना वगळता इतर सर्व सामन्या गावसकर फ्लॉप होता. तसा तो स्लीपमध्ये चांगले झेल घेत होता, पण धावा करीत नव्हता. कीर्ती आझादने देखील या सामन्यातील गोलंदाजी वगळता इतर सर्व सामन्यात फारश्या धावा केल्या नव्हत्या व त्याला फारसे बळीही मिळाले नव्हते. ४६ धावांच्या सलामीनंतर गावसकर व श्रीकांत दोघेही पाठोपाठ बाद झाल्यानंतर मोहिंदर व यशपालने संथ फलंदाजी केली. अजून एखादी विकेट न घालविता हळूहळू धावा वाढवायच्या हा त्यांचा उद्देश होता. सामन्याची ३९ षटके संपली तेव्हा भारताची धावसंख्या फक्त १०९ होती, पण दोनच फलंदाज बाद झाले होते. आता उर्वरीत २१ षटकात १०५ धावा हव्या होत्या. त्या काळात प्रतिषटक ५ धावा हे मोठे आव्हान होते. ४० व्या षटकात यशपालने विलीसला स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून एक उत्तुंग षटकार मारून गिअर बदलला. पण मोहिंदर लगेच ४६ वर बाद झाला. त्यानंतर आलेल्या संदीप पाटिलने व यशपाल ६० वर बाद झाल्यावर आलेल्या कपिलने इंग्लंडची गोलंदाजी फोडून काढून भारताला विजय मिळवून दिला.

In reply to by श्रीगुरुजी

स्पार्टाकस 06/02/2017 - 19:42
थोडीशी गडबड आहे गुरुजी यशपाल - मोहींदर खेळत असताना सेटल झाल्यानंतर व्हिक मार्क्सला सिक्स ठोकत गिअर बदलला तो मोहींदरने. मोहींदरपाठोपाठ यशपालनेही मग अ‍ॅलट आणि विलीसला सिक्स ठोकल्या. तसंच शेवटी कपिल खेळायला आला तेव्हा भारताला फक्तं ९ रन्स बाकी होत्या, त्यामुळे कपिलला फारसं काही करावं लागलंच नाही, केवळ १ रन काढून तो नॉटआऊट राहीला. विलीसला फटकावलं होतं ते संदीप पाटील आणि यशपालनी.

In reply to by स्पार्टाकस

श्रीगुरुजी 10/02/2017 - 14:18
जराशी गडबड झालेली दिसते. १९८२ मधील कसोटीत संदीप पाटिलने व कपिलने केलेली विलीसची धुलाई आणि हा सामना यात सरमिसळ झाली. त्या सामन्यात यशपालने विलीसच्या गोलंदाजीवर किंचित ऑफच्या बाजूला सरकून स्क्वेअरलेग बाऊंड्रीला मारलेला षटकार अजून आठवतो.

गामा पैलवान 06/02/2017 - 01:09
स्पार्टाकस, मला आठवतंय आम्ही मंडळी दुसऱ्या दिवशी क्षणचित्रं पाहायला आसुसलेले असायचो. पण या बहारदार सामन्याच्या वेळी नेमकी निराशा झाली. वृत्तपत्रातल्या वर्णनावरच समाधान मानावं लागलं. आता लेख वाचून प्रत्यक्ष सामना पहात आहोत असा भास झाला. धन्यवाद! :-) जाताजाता : केव्हिन करेन नावाचा एक टेनिसपटूही आहे. आ.न., -गा.पै.
लेखनविषय:
लेखनप्रकार
१८ जून १९८३ नेव्हील ग्राऊंड, टनब्रिज वेल्स केंट काऊंटीतल्या टनब्रिज वेल्सच्या ग्राऊंडवर भारत आणि झिंबाब्वे यांच्यातली दुसर्‍या राऊंडची मॅच रंगणार होती. ग्रूपमधल्या पहिल्या राऊंडच्या मॅचेसमध्ये डंकन फ्लेचरच्या अननुभवी झिंबाब्वेने किम ह्यूजच्या ऑस्ट्रेलियाला चकवलं होतं! कपिल देवच्या भारतीय संघाने तर पहिल्याच मॅचमध्ये वेस्ट इंडीजला पराभवाचा अनपेक्षित धक्का दिला होता! १९७५ पासून वर्ल्डकपमधली एकही मॅच न गमावणार्‍या वेस्ट इंडीजचा हा पहिलाच पराभव होता! पहिल्या राऊंडमध्ये भारताने झिंबाब्वेचा आरामात पराभव केला असला तरी ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारली होती.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९८३ - इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड

स्पार्टाकस ·

श्रीगुरुजी 04/02/2017 - 14:42
मस्त! जुन्या आठवणी जागृत होताहेत. १९८३ मधील ऑस्ट्रेलिया व झिंबाब्वे यांच्यातील सामन्याबद्दल पण लिहा. झिंबाब्वेने ऑस्ट्रेलियाला १३ धावांनी पराजित करून एक प्रचंड मोठा अपसेट नोंदविताना विश्वचषक स्पर्धेतील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली होती. विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत अंदाजे १५ सामने अपसेट म्हणून ओळखले जातात. त्यात श्रीलंकेने १९७९ मध्ये भारताविरूद्द मिळविलेला विजय, १९८३ मध्ये झिंबाब्वेचा ऑस्ट्रेलियाविरूद्ध विजय, १९९६ मध्ये केनयाने विंडीजचा ९६ धावात खुर्दा करून मिळविलेला विजय, २००३ मध्ये केनयाचा श्रीलंकेविरूद्ध व झिंबाब्वेविरूद्ध विजय, २००७ मध्ये बांगलाचा भारत व आफ्रिकेविरूद्ध विजय, २००७ मध्येच आयर्लंडचा पाकड्यांंविरूद्ध विजय, २०११ मध्ये आयर्लंडचाच इंग्लंडविरूद्ध विजय, २०११ मध्येच बांगला इंग्लंडविरूद्ध विजय, १९९९ मध्ये झिंबाब्वेचा भारताविरूद्ध विजय इ. सामन्यांसह २०१५ मधील बांगलादेशाचा इंग्लंडविरूद्ध विजय इ. सामन्यांचा समावेश होतो.

In reply to by श्रीगुरुजी

स्पार्टाकस 05/02/2017 - 07:53
वर्ल्डकपमधल्या जायंट किलर्सबद्दल पुढे-मागे लिहीणार आहेच. इंग्लंड - आयर्लंड मॅच या सिरीजच्या पुढच्या भागात आहे.

श्रीगुरुजी 04/02/2017 - 14:42
मस्त! जुन्या आठवणी जागृत होताहेत. १९८३ मधील ऑस्ट्रेलिया व झिंबाब्वे यांच्यातील सामन्याबद्दल पण लिहा. झिंबाब्वेने ऑस्ट्रेलियाला १३ धावांनी पराजित करून एक प्रचंड मोठा अपसेट नोंदविताना विश्वचषक स्पर्धेतील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली होती. विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत अंदाजे १५ सामने अपसेट म्हणून ओळखले जातात. त्यात श्रीलंकेने १९७९ मध्ये भारताविरूद्द मिळविलेला विजय, १९८३ मध्ये झिंबाब्वेचा ऑस्ट्रेलियाविरूद्ध विजय, १९९६ मध्ये केनयाने विंडीजचा ९६ धावात खुर्दा करून मिळविलेला विजय, २००३ मध्ये केनयाचा श्रीलंकेविरूद्ध व झिंबाब्वेविरूद्ध विजय, २००७ मध्ये बांगलाचा भारत व आफ्रिकेविरूद्ध विजय, २००७ मध्येच आयर्लंडचा पाकड्यांंविरूद्ध विजय, २०११ मध्ये आयर्लंडचाच इंग्लंडविरूद्ध विजय, २०११ मध्येच बांगला इंग्लंडविरूद्ध विजय, १९९९ मध्ये झिंबाब्वेचा भारताविरूद्ध विजय इ. सामन्यांसह २०१५ मधील बांगलादेशाचा इंग्लंडविरूद्ध विजय इ. सामन्यांचा समावेश होतो.

In reply to by श्रीगुरुजी

स्पार्टाकस 05/02/2017 - 07:53
वर्ल्डकपमधल्या जायंट किलर्सबद्दल पुढे-मागे लिहीणार आहेच. इंग्लंड - आयर्लंड मॅच या सिरीजच्या पुढच्या भागात आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
१९८३ चा वर्ल्डकप हा पूर्वीच्या दोन्ही वर्ल्डकपच्या तुलनेत अनेक दृष्टींनी वैविध्यपूर्ण होता. १९७९ च्या वर्ल्डकपप्रमाणेच ८ टीम्सना दोन ग्रूपमध्ये विभागण्यात आलं होतं, परंतु यावेळी प्रत्येक टीमच्या ग्रूपमधल्या दुसर्‍या टीमशी २ मॅचेस होत्या. इंग्लंडच्या लहरी हवामानाचा फटका बसल्यामुळे एखाद्या टीमला वर्ल्डकपमधून गाशा गुंडाळण्याची वेळ येऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली होती. वाईड्स आणि बंपर्सच्या बाबतीत कठोर निर्णय घेण्याच्या अंपायर्सना सूचना देण्यात आल्या होत्याच, परंतु या वर्ल्डकपमधली सर्वात नाविन्यपूर्ण बाब म्हणजे या वर्ल्डकपपासून ३० यार्डचं सर्कल अस्तित्वात आलं.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९७९ - फायनल - वेस्ट इंडीज विरुद्ध इंग्लंड

स्पार्टाकस ·

चौकटराजा 03/02/2017 - 13:25
क्रिकेटच्या इतिहासातील एक असे नाव जे जॉन्टी र्होडस बरोबर घेतले जाईल ते नाव म्हणजे डेरेक रॅन्डॉल !!

In reply to by चौकटराजा

स्पार्टाकस 03/02/2017 - 21:01
जाँटी र्‍होड्सच्याही पूर्वी निव्वळ फिल्डींगसाठी प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रीकेचाच आणखीन एक खेळाडू होता तो म्हणजे कोलिन ब्लँड. खुद्दं र्‍होड्सनेही ब्लँड आपला आदर्श होता असं नमूद केलं आहे. १९६५ च्या इंग्लंड टूरमध्ये ब्रायन जॉन्स्टनने "For the first time I heard people saying that they must go to a match especially to watch a fielder." असे उद्गार काढले ते ब्लँडबद्दलच!

पैसा 11/02/2017 - 10:15
तेव्हाचे डावपेच आता हास्यास्पद वाटतात. बॉयकॉट आणि ब्रिअर्ली म्हणजे इंग्लंडसाठी नाईटमेअर ओपनर्स म्हटले पाहिजेत!

चौकटराजा 03/02/2017 - 13:25
क्रिकेटच्या इतिहासातील एक असे नाव जे जॉन्टी र्होडस बरोबर घेतले जाईल ते नाव म्हणजे डेरेक रॅन्डॉल !!

In reply to by चौकटराजा

स्पार्टाकस 03/02/2017 - 21:01
जाँटी र्‍होड्सच्याही पूर्वी निव्वळ फिल्डींगसाठी प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रीकेचाच आणखीन एक खेळाडू होता तो म्हणजे कोलिन ब्लँड. खुद्दं र्‍होड्सनेही ब्लँड आपला आदर्श होता असं नमूद केलं आहे. १९६५ च्या इंग्लंड टूरमध्ये ब्रायन जॉन्स्टनने "For the first time I heard people saying that they must go to a match especially to watch a fielder." असे उद्गार काढले ते ब्लँडबद्दलच!

पैसा 11/02/2017 - 10:15
तेव्हाचे डावपेच आता हास्यास्पद वाटतात. बॉयकॉट आणि ब्रिअर्ली म्हणजे इंग्लंडसाठी नाईटमेअर ओपनर्स म्हटले पाहिजेत!
लेखनविषय:
लेखनप्रकार
२३ जून १९७९ लॉर्डस्, लंडन ऐतिहासिक लॉर्डसच्या मैदानातच १९७५ च्या पहिल्या वर्ल्डकपप्रमाणे दुसर्‍या वर्ल्डकपचीही फायनल रंगणार होती. पहिल्या वर्ल्डकपच्या विजेत्या क्लाईव्ह लॉईडच्या वेस्ट इंडीयन संघ दुसर्‍या वर्ल्डकपच्याही फायनलमध्ये येऊन धडकला होता. लॉईडच्या संघात स्वतः लॉईड, गॉर्डन ग्रिनिज, डेसमंड हेन्स, व्हिव्हियन रिचर्डस्, अल्विन कालिचरण असे बॅट्समन होते.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९७९ - सेमीफायनल - इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड

स्पार्टाकस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
२० जून १९७९ ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर लँकेशायरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात वर्ल्डकपचे यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पहिली सेमी फायनल रंगणार होती. मार्क बर्जेसचा न्यूझीलंड संघ कोणाचीही अपेक्षा नसताना सेमी फायनलला पोहोचला होता. बर्जेसच्या संघात स्वतः बर्जेस, जॉन राईट, ब्रूस एडगर, जेफ हॉवर्थ आणि अनुभवी ग्लेन टर्नर असे बॅट्समन होतेच, शिवाय जेरेमी कोनीसारखा हरहुन्नरी ऑलराऊंडरही होता. बॉलिंगची मदार मुख्यतः रिचर्ड हॅडलीवर होती. त्याच्या जोडीला गॅरी ट्रप, ब्रायन मॅकेंझी आणि लान्स केर्न्स असे बॉलर्स होते.

मी आज केलेला व्यायाम - फेब्रुवारी २०१७ - सायकलिंग / रनिंग चॅलेंज

मोदक ·

मोदक भाऊंनी लिहिल्याप्रमाणे बरेच दिवस ग्रुप फक्त राइड अपडेट किवा सायकल विषयी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठीच हलत होता. पण ग्रुपच्या एकुलत्या एका डॉक्टरांनी (डॉ श्रीहास) ही आयडीयाची कल्पना काढली आणि ग्रुप एकदम जागा झाला! डॉ (तेच औ.बाद वरुन पुण्याला सायकल चालवत येणारे), मोदकभाऊ (ग्लोब ट्रॉटर) , पाध्ये (उत्साहाचा मुर्तिमंत झरा! ), मानसराव (बगेर गिअर सायकल किंग) आणि बाकी मेम्बेर्स मिळुन लगेच दोनच दिवसात कल्पनेचा प्रवास अस्तिवापर्यंत आला! एकमेकांना प्रोत्साहन देत प्रसंगी (प्रेमाने) दम देत चॅलेंज पुर्ण करण्याकडे टिम्सची वाटचाल सुरु झाली. काही टिम्सचे चॅलेंज पुर्ण झाले काहींचे एक दोन दिवसात होइल. ज्यांचे चॅलेंज पुर्ण झाले ते नविन चॅलेंज घ्यायला तयार पण झालेत ! हे सगळे बघता ह्या सगळ्या उपक्रमाचा मुख्य ऊद्देश जो लोकांना व्यायाम करण्यासाठी उद्युक्त करणे होता तो नक्कीच साध्य झाला आहे ! परत एकदा सर्व सास्वांचे (सायकल स्वारांचे :-) ) हार्दिक अभिनंदन !!! देश

डॉ श्रीहास 01/02/2017 - 18:55
३५० किमी होतील ... पण ७ दिवस रोजचे ५० म्हणजे सहज करण्यासारखं वाटत नव्हतं... ४थ्या आणि ५व्या दिवशी थकवा कमी पण कंटाळा त्रास देऊ लागला.... हे अपेक्षित होत पण आपणंच चॅलेंज दिलं आणि बाहेर पडणं हे बरं नव्हतं.... शिवाय रोजची कामं होतीच दिवस लांबवायला...जोर लावला ; एक १०० किमी ची पण राईड मारली... सोबतचे नियमीत सायकलींग करणारे कारणं देऊन गायब होत गेले .... विलपावर का काय आणली ब्वा अन् ४३० किमी पेक्षा जास्त सायकलींग झालं ७ दिवसात... फार काही तीर मारला नाही कारण जोरदार सायकलींग करणारे लोक माहीती आहेत ना !! फॅन्टास्टीक फिलींग होतं.... हा ५० X७ चा प्रयोग ३-४ वेळा करायचा आहे .... मिपा परिवार व सायकल गृप च्या शुभेच्छा लागणार आहेत बरं का !! श्री

In reply to by डॉ श्रीहास

sagarpdy 03/02/2017 - 20:44
7 दिवस रोजच्या रोज, सगळ्या कामांच्या वेळा सांभाळून 50 किमी सायकल चालवणे फारच कठीण काम आहे. डॉक यांना वंदन करून लवकरच हे आव्हान एकट्याने पेलण्याचा प्रयत्न नक्की करणार. उरलेल्या 50 किमी आठवड्यांसाठी बेस्ट हॉप लक. डॉक्टरकाका आगे बढो, हम तुम्हारे साथ है

अरे.. काय माणसं आहात की कोण आहात!!!! बरं आता हे सांगा की आमच्यासारखे लोक्स काय करु शकतील? जिम आहे उपलब्ध. तर आम्ही ट्रेडमिल वगैरे वापरुन सहभाग घेऊ शकतो का? आम्ही जिमवाल्यांचा ग्रुप बनवु शकु.. काहीच न करण्यापेक्षा हे चांगलंय ना. जिमवाल्यांचा ग्रुप बनणार असेल तर कोण कोण यायला तयार आहे? अवांतर :- ह्या उपक्रमाचे एक नाव ठेवुन, लोगो बनवुन तो मिपावर सतत दिसेल असा टाकला पाहिजे. मिपा दशकपुर्तीलाच सुरु झालेल्या ह्या उपक्रमाला, प्रॉपर मार्केटींग करुन वाढवायला हवं. आंतरजालावर असा उपक्रम पहाण्यात नाही.

In reply to by पिलीयन रायडर

तुम्ही ट्रेडमिल वर धावा...मी रोडवर धावतो. प्रसाद दाते येतील बहुधा जोडीला. विचारतो त्यांना. आमचे चालेंज शुक्रवारी संपतेय.

In reply to by पिलीयन रायडर

मोदक 01/02/2017 - 21:09
फोन नंबर शेअर होण्याच्या कारणाने असे कॉमन स्त्री-पुरूषांचे ग्रुप तयार होतील असे वाटत नाही. (..आणि अनेक प्रकारची बंधने येतात. दोघांनाही. त्यामुळे वेगळे ग्रुपच बरे. यू नो इट नाऊ.) त्यामुळे तु पुढाकार घे आणि बायकांचा एक ग्रुप काढ आणि तेथे असे उपक्रम राबव. फिरायला जा, सूर्यनमस्कार घाला, सायकल चालवा किंवा जिममध्ये घाम गाळा.. काहीही करा. इथे अपडेट करा, आणखी लोकांना उद्युक्त करा. नवीन लोक आपल्यापेक्षा जास्त सूर्यनमस्कार घालतील, जास्त सायकल चालवतील, त्यांना मागे टाकण्यासाठी आळस झटकून तयार व्हा आणि सकारात्मक स्पर्धेने नियमीत व्यायाम करा.

In reply to by मोदक

फोन नंबरच शेअर व्हायला हवं असं नाहीये ना. व्यनि मध्ये ग्रुप होऊ शकतो. टारगेट ठरवुन करायचं सगळ्यांनी रोज पुर्ण. किंवा इथेच एक ओपन ग्रुप होऊ शकतो. अर्थात मुली वेगळा ग्रुप बनवु शकतात, ते जास्त सोप्पंय वगैरे ठिक आहे. पण लगेच शाळेत असल्या सारखं मुली-मुलींचा ग्रुप.. मुला-मुलांचा ग्रुप काय!! मार्ग काढा की! असो.. जिमचा इथेच ओपन ग्रुप करु सध्या. जे जे करु शकतील ते इथे लिहतील. टारगेटः- ट्रेडमिलवर चालणे/धावणे किंवा सायकल वर - रोज ५ किमी किमान - सलग ७ दिवस ठिके? कोण कोण येतंय बोला? ह्या वीकांताला सुरु करता येईल चॅलेंज.

In reply to by मोदक

४ फेबला जमवायचं का? शनिवारी सुरू करतो. ते पुढे ७ दिवस. मी तर करेन ७ दिवस रोज. इतर कुणी जॉईन होणार असेल तर इथे लिहा. एक प्रश्नः- रोज एकच एक करायचं का? म्हणजे एक दिवस सायकलिंग आणि एक दिवस ट्रेडमिल चालेल का?

In reply to by पिलीयन रायडर

मोदक 01/02/2017 - 21:42
कसेही चालेल. पण ५ किमी पळणार असलीस तर त्याच्या तुलनेत १० किमी सायकलिंग करावे असे मला वाटते. सुरू तरी करूया. मग सुचत जाईल तसे सुधारणा करू.

In reply to by मोदक

सर... लिहीताना विचार तर करा की राव आमचा. १० किमी सायकलिंग नाही तर ५ किमी पळणे!! =)) ३ किमी चालणे ही सध्या अचिव्हमेंट वाटतेय!! मी माझ्या औकात प्रमाणे टारगेट सेट केलं तर चालेल का? ५ किमी ट्रेडमिल करु शकेन पहिल्या टप्प्यात. जर ते जमलं नीट तर परत नेक्स्ट लेव्हल चॅलेंज घेते. ओके?

In reply to by पिलीयन रायडर

मोदक 01/02/2017 - 23:23
ओके, तू सांग किती सायकलिंग / रनिंग करायचे ते. माझे रोजचे 40 किमी सायकलिंग होतेच. त्या नंतर तू सांगशील तितके सायकलिंग करेन.

In reply to by पिलीयन रायडर

अंतु बर्वा 02/02/2017 - 02:31
गुगल हँगाऔट वापरता येइल. हँगाउटच अ‍ॅप सर्व स्मार्टफोनवर अवेलेबल आहे. खरा इमेल पत्ता वापरायचीही गरज नाही. इथल्या सदस्यनामाशी मिळता जुळता जीमेल आयडी बनवला की झालं.

In reply to by पिलीयन रायडर

ह्या उपक्रमाचे एक नाव ठेवुन, लोगो बनवुन तो मिपावर सतत दिसेल असा टाकला पाहिजे. मिपा दशकपुर्तीलाच सुरु झालेल्या ह्या उपक्रमाला, प्रॉपर मार्केटींग करुन वाढवायला हवं. आंतरजालावर असा उपक्रम पहाण्यात नाही.
हे मनावर घेऊन लगेच लोगो बनवल्याबद्दल धन्यवाद! अत्यंत झकास लोगो आहे! पण दोन बारिकशा सुचना करु का? १. हा लोगो फक्त स्वगृहवर दिसत आहे. तो कायमच दिसत राहिला पाहिजे. शक्यतो वर.. कारण हा गेले ४-५ महिने सातत्याने चालु असणारा महत्वाचा उपक्रम आहे. आणि चालु राहिलच. त्यामानाने लोगो लक्षात येत नाहीये चटकन. २. त्या लोगोवर क्लिक केलं की लेटेस्ट धाग्यावर जाता यायला हवं. बाकी उपक्रम झकास चालु आहे हा!

कळविण्यास अत्यंत आनंद होतो की आमचे सवंगडी सागर आणि नकुल यांचेबरोबर सल्लामसलत करून आम्ही तिघांनीं उद्यापासून ५०x७ सायकलिंगचे आव्हान समर्थपणे पेलण्याचे योजिले आहे. टोळीचे नाव असेल The Cyclomaniacs. आनंदरावांचे आशिर्वाद आणि रेंजरची प्रेरणा आहेच....तुमची सर्वांची किरपा असुद्या... जय हिंद जय महाराष्ट्र

In reply to by स्थितप्रज्ञ

sagarpdy 06/02/2017 - 10:19
५०x७ चे आव्हान मस्त चालू आहे, आज ५ वा दिवस. ग्रुप मध्ये कल्पना दिली असली तरी इकडे टाकायचं राहून गेलं. आमच्या टोळीने ५० x ७ बरोबरच पुढील आव्हाने देखील स्वीकारली आहेत : १००० किमी सायकलिंग ७००० मी चढण (सायकलिंग) प्रत्येकी ५ घाट (सायकलिंग) डॉक श्री, टीम त्रिदेव यांनी मागच्या आठवड्यात प्रेरणेची घाऊक निर्मिती केली. त्याचा परिणाम हा विकांत एकदम भारी गेला. शनिवारी पुणे-पाबे घाट-वेल्हे(तोरणा)-कादवे घाट-पानशेत-पुणे अशी १०० किमी ची फेरी आणि त्यात २ घाट झाले. रस्ते बऱ्यापैकी खराब असल्याने फटिग आला होता. तरी रविवारी दिवे घाट करण्याचा मानस होता. तर सुखद आश्चर्य - माझा एक काका (वय वर्षे ५०+) म्हणाला मी पण येतो. मग एकदम स्फुरण आले आणि दिवे घाट मारलाच, जोडीला जवळच आहे म्हणून जुना कात्रज घाट पण करून झाला. (फोटो टाकले आणि ग्रुप वर मेसेज चा नुसता पूर) भरपूर खाऊन दुपारी मस्त झोप काढली, संध्याकाळी तसं फ्रेश वाटत होतं, तर हळूच आमच्या टोळी-सवंगड्याना म्हणालो - उद्या बोपदेव घाट करेन म्हणतोय. आमचे कप्तान - स्थितप्रज्ञ साहेब म्हणाले ते पण येत आहेत. एकदम खुश झालो. आज सकाळी उठून मी आणि स्थितप्रज्ञ खडीमशीन चौकात भेटलो आणि बोपदेव तासाभरात सर झाला पण! अशा प्रकारे माझे वैयक्तिक ५ घाटांचे आव्हान या वीकांतालाच सुफळ संपूर्ण झाले. टोळीचे प्रत्येकी ५ घाटांचे आव्हान स्थितप्रज्ञ आणि नकुल पुढे नेतीलच.

आम्ही आपला एक ओपन ग्रुप स्थापन करत आहोत. तुम्हा लोकांपुढे लिंबु टिंबु आहे. पण आमचाही खारीचा वाटा. ज्यांना जॉईन व्हायचंय त्यांनी व्हा. व्यनि साखळी करु हवं तर. हा फक्त मुलींचा ग्रुप नाही. ज्यांना अगदी थोडंफारही करायचं असेल त्यांनी सामील व्हा. नुसतंच विचार करत बसण्यापेक्षा २ सुर्यनमस्कार तरी घाला. ग्रुपचं वैशिष्ट्य असंय की सगळ्यांचं टारगेट सारखं नाही. कारण सध्या ज्या मुली हे करत आहोत, त्या सगळ्या वेगवेगळ्या रुटीनमध्ये अडकलेल्या आहेत. लहान मुल घेऊन काहींना सध्या थोडं अवघड आहे. सगळ्यांनाच ५ किमी पळणे वगैरे होणार नाही. पण ज्याला जे जमेल ते टारगेट घ्यायचं आणि सलग ७ दिवस ते पुर्ण करायचं इतकंच ठरवलं आहे. हे जमलं तर अजुन पुढच्या वेळेस थोडं अवघड ध्येय घेऊ. १. मी आणि स्रुजा - जिम मध्ये ५ किमी २. सामान्य वाचक - ५ किमी पळणे ३. विशाखा राऊत - ५ सुर्यनमस्कार ४. सविता ००१ - चालणे / सुर्यनमस्कार हे सध्या बोलणं चालु आहे. टारगेट्स पक्की करतो. साधारण ह्या शनिवारी सुरु करु.

In reply to by पिलीयन रायडर

स्रुजा 02/02/2017 - 19:06
गृप चं नाव पण ठेवायचं आहे का ? सुचवा काही तरी. बादवे इथले टारगेट्स बघता #कुठेतोंड्लपवू असं झालंय

In reply to by मोदक

"iWorkout" हे नांव कसे वाटते..?
हुच्च्भ्रु! सध्या आम्हाला सलग ७ दिवस होईल का ह्याचा विश्वास नसल्याने आणि ह्यावर आम्ही फार चर्चाच केली नसल्याने - "लिंबुटिंबु"! (अजुन बरं काही सापडलं तर बदलु पुढच्या वेळेला.) ग्रुप :- लिंबुटिंबु ध्येय : - ४ फेब पासुन ७ दिवस रोज स्रुजा - ५ किमी - जिम पिरा - ५ किमी - जिम विश - ५ सुन सावा - ५ किमी - पळणे सवि - ६ किमी - चालणे इशा - ३ किमी चालणे + २५ सुन स्वाती - २५ सुन हाहा - ९ किमी सायकलिंग हे तुमच्या मुळ चॅलेंजपेक्षा फार वेगळं आहे. पण वर्किंग मदर्सचा विचार करुन आम्ही बदल केलेत. चालवुन घ्या. :)

In reply to by पिलीयन रायडर

डॉ श्रीहास 04/02/2017 - 14:34
व्यायाम करताय हे जास्त महत्वाचं आहे , आम्ही कोणीही प्रोफोश्नल अॅथलिट्स नाही आहोत .... वर्ष दोन वर्षापुर्वी सुरुवात केलेली लोक आहोत, नियमित सरावानंतर तुमची पण क्षमता नक्कीच वाढेल... आणि महत्वाचं म्हणजे कोणाशीही तुलना करू नका _/\_... तुमचं तुमचं चालू द्या , सोबत कोणी असो वा नसो,कंटाळा तर मदत करायला आम्ही लोक आहोतच ...

In reply to by पिलीयन रायडर

चला, पिरा तै, तुमच्या मुळे सुरवात झाली. असेच हळु हळु सुरु करा, नंतर नियमित होत जात. उपक्रमास शुभेच्छा. बाबा योगिराज.

In reply to by पिलीयन रायडर

सही रे सई 18/02/2017 - 03:51
तुमचा पुढील आठवड्यात असाच आव्हान सुरु ठेवायचा विचार असेल तर मी पण सामील होते यात. फक्त विकांताला जरा अवघड आहे हे करणे (न जाणो या अव्हान प्रकरणामूळे होईलही कदाचित).. इतर दिवशी ५-६ किमी सायकलिंग ते पण हिल इंटर्व्हल मधे करायला जमेल मला.

In reply to by सही रे सई

हो.. आता हे सततच चालु राहील. तू सुरू कर. किमान ७ दिवसांचं तरी चॅलेंज घे. त्याने वीकेंडला सुद्धा व्यायाम होतोच.

In reply to by पिलीयन रायडर

सप्तरंगी 09/02/2017 - 20:46
पिरा, हा ओपन ग्रुप कुठे सुरु केला आहे, मी जॉईन करू शकते का ? वॉट्स ऍप वापरात नाही बाकी ए-मेल ने वगैरे चालू शकेल मला. हे व्यनि काय आहे ? (फारच डफ्फर प्रश्न आहे का ?:)) आणि हो मी रोज ५ km पूर्ण करेन.

२९ जानेवारीला पुणे मॅरेथॉन होती. २१ किमी हाफ मॅरेथॉन २ तास ५१ मिनिटात कशीबशी फाफलत पूर्ण केली. आता एप्रिल मधे २०० ची बीआरएम करणार.

In reply to by अप्पा जोगळेकर

वा अभिनंदन , कुठलीही मॅरथॉन पूर्ण करणे हे महत्वच आहे , लावलेला डाव अर्ध्यात सोडता कामा नये - फक्त एक सांगतो सतत दर महिन्याला मॅरथॉन पळू नये , एक ही दुखापत काही काळासाठी ऑफ ट्रॅक करते

In reply to by अप्पा जोगळेकर

डॉ श्रीहास 04/02/2017 - 14:49
१०० किमी सायकलींग ला काही वाटतं नाही, पण १० किमी सुध्दा पळता येत नाही.... २१ किमी ची हाफ मॅरेथाॅन पण चालतच ३:०९ तासात पुर्ण केली होती :)) मॅरेथाॅनसाठी तुमचं खुऽऽऽऽऽऽप अभिनंदन ._/\_

अमर विश्वास 02/02/2017 - 17:24
मस्त चॅलेंज ... माझे फेब्रुवारी महिन्याचे टार्गेट : रोज ५ किमी रनिंग + सायकल (एक आड एक दिवस ) म्हणजेच दर आठवड्याला १५ किमी रनिंग + १५ किमी सायकल

अनरँडम 03/02/2017 - 20:09
रविवारः ५ मैल सोमवारः (कन्हत-कुथत) ४ मैल मंगळवारः ४.६ मैल बुधवारः ४.७५ मैल गुरूवारः ५ मैल आज विश्रांती घेण्याचा विचार आहे. येथून प्रेरीत होऊन कदाचित एप्रिल-मे महिन्यात अर्धी मॅरॅथॉन पळावी असा विचार भीत भीत करत आहे.

आज लोड रनर्सचं चॅलेंज आज पूर्णत्वास आलं. मोदक, प्रसाद दाते आणि मी स्वीकारलेलं प्रतिदिन १० किमी धावण्याचं आव्हान मोदकाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तिसऱ्या दिवशीच नव्याने मी आणि प्रसाद दातेंनी मिळून सुरु केलं. मोदकाच्या प्रोत्साहनामुळे आम्हालाही खास हुरूप आला आणि आम्ही दोघांनीच आज हे आम्हां पूर्ण केलं. सोबत स्टॅट्स जोडत आहे. Load Runners

अमर विश्वास 04/02/2017 - 09:59
प्रेरणादाई उपक्रम .. मोदक .. डॉक्टर .. या सर्वांचे उपडते पाहून स्फुरण चढते ... या आठवड्यातला केलेला व्यायाम : सोमवार : ४.५ किमी रनिंग (३० मिनिटे) मंगळवार : ५ किमी रनिंग (३४ मिनिटे) बुधवार : सायकल ६ किमी गुरुवार : ५ किमी रनिंग (३४ मिनिटे) शुक्रवार : सायकल ६ किमी शनिवार : आजचा प्लॅन : हनुमान टेकडीवर पाळणे : कांचनगल्ली पासून टेकडी चढणे ----ARAI --- वेताळ टेकडी ---- चतुश्रुंगी --- पाषाण आणि परत ... अंदाजे अंतर ८ किमी (प्रत्यक्षात किती होते ते रात्री लिहीनच )

डॉ श्रीहास 04/02/2017 - 10:40
८.५ किमी ट्रेडमिल वर चालणं आणि ६१५ किमी सायकलींग असं चांगलासा व्यायाम केला .... फेब्रुवारीची सुरवात ५० किमी सायकलींगनी केली आहे, ३ दिवस गॅप पडलाय पण ... व्यायाम परत सुरू होईल.... ह्या धाग्यातून उद्युक्त झालेल्या प्रत्येकाला खूप शुभेच्छा _/\_

नितीन पाठक 04/02/2017 - 15:52
मोदक भाऊंनी लिहिल्याप्रमाणे बरेच दिवस सायकल सायकल ग्रुप वर फक्त राइड अपडेट किवा सायकल विषयी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठीच जिवंत होता. आज माझी इतकी राईड झाली, आम्ही इकडे गेलो, तिकडे गेलो, खादाडी झाली इ. इ. या ग्रुपच्या डॉ़क साहेबांनी (डॉ श्रीहास) एक ७ दिवसाच्या नवीन चैलेंजची कल्पना काढली आणि ग्रुप मध्ये एकदम चैतन्य निर्माण झाले. डॉक्टर श्रीहास आणि बाकी टीमने भरपूर चर्चा करून पुढील नियम तयार केले. प्रत्येकाने लगेच आपल्या टीम साठी सदस्यांची शोधाशोध सुरू केली. मी, मा. श्री. योगेश साळुंके (बाबा योगीरा़ज) आणि मा. श्री. मानसरावजी चंद्रात्रे लातूरकर यांची एक टीम तयार झाली. नामकरण झाले --- टीम त्रिदेव कशी सायकल चालवायची हे ठरले आणि दि. २७ जानेवारी पासून सुरू झाला मग आपापल्या सायकलचा प्रवास, चाके गरागरा फिरू लागली. आकडे वाढायला लागले. एकमेकांना प्रोत्साहन देत चॅलेंज पुर्ण करण्याकडे टिम्सची वाटचाल सुरु झाली. पहिला दिवस, दुसरा दिवस ...... होता होता मग आला २ फेब्रुवारी ..... शेवटचा दिवस. आमच्या त्रिदेव टीम चे एकून सायकलींग झाले ८७९.५ किमी. सविस्तर वृत्तांत मा. श्री. योगेशभाउ देणार आहेत. चैलेंज सुरूवात केली आणि पहिल्याच दिवशी मा. योगेश भाउंच्या सायकलची ट्यूब खराब झाली, त्यांचा मूड गेला, त्या दिवशी त्यांची सयकलींग कमी झाली. आमचे योगेशभाउ नाराज झाले. दुस-या दिवसापासून मा. योगेश भाउंनी चागंलीच आघाडी घेतली. सोमवारी दि. ३० तारखेला तर योगेश भाऊंनी दणदणीत १२८ किमी सायकलींग केली. आम्ही दोघे एकदम गार. एका दिवसात १२८ किमी ?? बापरे !!! काय हे !! मा. मानसरावजी चंद्रात्रे लातूरकरांचे तर काय विचारता ? बिगर गिअर सायकल ने हा माणूस दररोज टळटळीत उन्हातान्हाचे कमीत कमी ५० किमी सायकल चालवत होता. काय बोलावे. यांची सायकल एकदा निघाली की ५० किमी शिवाय थांबतच नव्हती. मा. श्री. चंद्रात्रे लातूरकरांनी दररोज ५० किमी च्या वर सायकल चालवली आणि चैलेंज पूर्ण केले. इनको तो मानना पडेगा !! एक चैलेंज पूर्ण झाले. मनाला समाधान लाभले. किती झाले यापेक्षा आपण हे करू शकतो याचा आत्मविश्वास आला. खरे तर पहिल्यांदा चैलेंज मध्ये भाग घ्यायचा विचार केला तेव्हा असे वाट्ले की आपल्याला हे जमेल का ? नोकरी, प्रापंचिक जबाबदारी संभाळून हे जमू शकेल का असे ही मनात येउन गेले. पण मला आमच्या दोन्ही जोडीदारांनी प्रोस्ताहन देउन सहकार्य केले. तुम्हाला जमेल तेवढी सायकल चालवा, कमीत कमी ५ किमी दररोज चालवा असे सांगितले. आज, मा. श्री. योगेश सांळुके आणि मा. श्री. मानसरावजी चंद्रात्रे लातूरकर या दोन्ही जोडीदारांमुळे मी हे साध्य करू शकलो त्याबद्दल या दोघांना मनापासून प्रणाम. या दोघांचा मी शत:श आभारी आहे. आमच्या या चैलेंजच्या उपक्रमामध्ये सायकल सायकल समूहाच्या सर्व सदस्यांचे म्हणजे इतर सर्व सायकल स्वारांचे अतिशय प्रोत्साहन मिळाले, जोरदार पाठिंबा मिळाला. त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. विशेषता डोक्टर श्रीहास, मोदक भाउ, सरपंच, अक्षयमामा देशपांडे, पाध्ये केडी, सागर पाध्ये, बाबा योगिराज, मानसभाउ, यांचे विशेष आभार. अभिजित बुचडे, प्रतिक पाटील, वॉडरींग व्ह्यूफाईंडर, प्रसाद दाते, किरण कुमार, नकुल, इ. इ. मित्रांचे मनापासून आभार (चूकुन कोणी राहीले असल्यास क्षमस्व) Team Load Runners and Team The Cyclomaniacs यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा .......... अजून समूहावर चैलेंजेस चालू आहे. चैलेंज घेतलेल्या सर्व सदस्यांना शुभेच्छा मिपावर ब-याच जणांनी / जणींनी वेगवेगळे नवीन चैलेंज स्वीकारले आहे त्या सर्वांना शुभेच्छा ... हे सगळे बघता ह्या सगळ्या उपक्रमाचा मुख्य ऊद्देश जो लोकांना व्यायाम करण्यासाठी उद्युक्त करणे होता तो नक्कीच साध्य झाला आहे ! परत एकदा सर्व सायकल स्वारांचे हार्दिक अभिनंदन !!!

अरिंजय 04/02/2017 - 17:55
सायकल सायकल समुहावर काही दिवसांपुर्वी आव्हानांची संकल्पना मांडण्यात आली. त्यानुसार आम्ही म्हणजेच मिपाकर नितीन पाठक - रणगाडा चालक मालक 1982 ची हर्क्युलस सायकल, बाबा योगीराज व बगरघेर म्हणजेच बिना गिअर सायकलवाले मानस चंद्रात्रे असा "टीम त्रिदेव" हा संघ बनवला व 50×7 हे सांघीक आव्हान घेतले. 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या काळात "टीम त्रिदेव"ने आपले सांघीक आव्हान, 50×7, पुर्ण केले. संघाच्या सात दिवसांच्या कामगिरीचा हा लेखाजोखा - दिवस पहिला - मानस चंद्रात्रे - 49.3 नितीन पाठक - 34.8 बाबा योगीराज - 7.9 पहिली टोटल = 92 किमी दिवस दुसरा - नितिन पाठक - 42.6 बाबा योगीराज - 52.8 मानस चंद्रात्रे - 51.9 दुसरी टोटल - 147.3 किमी दिवस तिसरा नितीन पाठक - 62.5 बाबा योगीराज - 38.5 मानस चंद्रात्रे - 43.6 तिसऱ्या दिवसाची टोटल -144.6 दणदणीत चौथा दिवस- नितीन पाठक - 33.8 बाबा योगीराज- 128.4 मानस चंद्रात्रे - 10.6 चौथ्या दिवसाची टोटल - 172.8 दिवस पाचवा नितीन पाठक - 44.5 बाबा योगीराज - 11.9 मानस चंद्रात्रे - 50.5 पाचव्या दिवसाची टोटल - 106.9 दिवस सहावा नितीन पाठक - 32.4 बाबा योगीराज - 11.1 मानस चंद्रात्रे - 50.7 सहाव्या दिवसाची टोटल - 94.2 दिवस सातवा नितीन पाठक - 42 बाबा योगीराज - 24.5 मानस चंद्रात्रे - 55.2 सातव्या दिवसाची टोटल - 121.7 Grand Total = 879.5 किमी वैयक्तीक कामगिरी - नितिन पाठक - 292.6 किमी बाबा योगीराज - 275.1 किमी मानस चंद्रात्रे - 311.8 किमी

मानस भौ, पाठक काका पहिल ५०X७ च ध्येय तर यशश्विरित्या पूर्ण झालय. ह्या वेळेस ८८० किमी पुर्ण झालेत, पुढिल वेळी कमीत कमी १००० किमी पुर्ण करु. सायकल भागाओ संघट्नेचे सदस्य बाबा योगिराज

मित्रहो 04/02/2017 - 19:58
१००० किमी फेब्रुवारी महिन्यात सायकलींग. प्रयत्नच आहे. कठीण आहे. पाचशेच्या वर गाडी गेली नाही कधी. चार दिवसात ६५ किमीच झाले ३ फेब्रु - २५ किमी ४ फेब्रु - ४० किमी

In reply to by मित्रहो

मित्रहो 06/02/2017 - 21:38
५ फेब्रु - ९५ किमी (७७ आणि १८) ७७ किमी नेहमीच्याच रुटने असले तरी मस्त मजा आली यावेळेला. ६ आणि ७ बहुदा शून्यच राहनार. पायांना आराम. एकूण १७० किमी.

In reply to by मित्रहो

मित्रहो 12/02/2017 - 13:27
३ फेब्रु - २५ किमी ४ फेब्रु - ४० किमी ५ फेब्रु - १०५ किमी (७७ + १८+ १०) ८ फेब्रु - ३६ किमी ११ फेब्रु - ४३ किमी १२ फेब्रु - १०१ किमी एकूण- ३५० किमी

In reply to by मित्रहो

मित्रहो 19/02/2017 - 13:00
३ फेब्रु - २५ किमी ४ फेब्रु - ४० किमी ५ फेब्रु - १०५ किमी (७७ + १८+ १०) ८ फेब्रु - ३६ किमी ११ फेब्रु - ४३ किमी १२ फेब्रु - १०१ किमी १४ फेब्रु - ३८ किमी १८ फेब्रु - २०३ किमी (ब्रेव्हे पूर्ण ) एकूण- ५९१ किमी

गवि 05/02/2017 - 01:46
:-( खंड पडला राव. अपराधी भावना. सगळे जबरदस्त व्यायाम करताहेत आणि आम्ही पायाची इंज्युरी या निमित्ताने सुरु झालेला खंड वाढवत चाललोय. फक्त अधेमधे ३-४ दिवसांनी चालतोय. :-(

In reply to by गवि

डॉ श्रीहास 06/02/2017 - 14:17
तंगडी सलामत तो किलोमीटर पचास... मागील वर्षी सायकलवरून पडलो पाय मोडला , त्यातून बरं होऊन बाहेर आलो मग ३ वेळा १०० किमीहून अधिक राईड्स आणि एक २३० किमी ची औ'बाद-पुणे वारी केली... त्यामुळेच म्हणतो , बरे व्हा पुर्ण मग करा सुरवात !!

दाते प्रसाद 06/02/2017 - 11:00
सायकल ग्रुपवर जेव्हा चॅलेंजेस , टीम्सची चर्चा सुरु होती तेव्हा आपणही एका टीममधून सायकलिंचे आव्हान घ्यावे असं वाटत होतं पण फिरतीची नोकरी असल्याने कितपत जमेल हि शंका होती .मोदकाने रनिंगची आयडिया देऊन आमची टीम बनवली सुध्दा . मग पळणं चालु झालं , पहिल्या दोन दिवसात जरा दमायला झालं. २७ जानेवारीला मोदकाने त्याला कामामुळे /प्रवासामुळे रनींग जमणार नसल्याचं शुभवर्तमान दिलं, आणि आम्ही दोघांनी ( इरसाल कार्ट आणि मी ) हे चॅलेंज पुर्ण करायचं ठरवलं . त्यातसुद्धा मला एक दिवस बाहेरगावी जायला लागलं पण मी काम संपल्यावर तिथे त्या दिवसाचं रनींग पुर्ण केलं . अशा रीतीने आम्ही हे चॅलेंज २+७ दिवसात पूर्ण केलं . ९ दिवस सातत्यानी धावून माझा पाळायचा वेग जाणवण्याइतपत वाढला. स्पेशल थँक्स टू इरसाल कार्ट आणि मोदक

माझ्या मते सायकल चालवण्यासाठी स्ट्रेन्थ ट्रेनिंग सुद्धा आवश्यक आहे. मी एप्रिल महिन्यातल्या बीआरएम साठी तयारी करत आहे. माझे चॅलेंज मी येथे नोंदवतो. माझ्या संघात मी एकटाच असेन. ७ दिवसात २ वेळा सायकलिंग. पैकी एकदा १ तासात २५ किमी. (यामधे डांगे चौक, काळेवाडी येथील २ फ्लाय ओव्हर्स २ वेळा चढणे उतरणे असेल.) दुसर्‍यांदा २ तासात ४५ किमी. (हा कमी-अधिक चढणीचा रस्ता असेल. बहुधा वाकड ते तळेगाव आणि परत). बाकीचे दिवस स्ट्रेन्थ ट्रेनिंगचे असतील. ते येथे नोंदवत नाही. नेक्स्ट अपडेट पुढच्या सोमवारी देईन.

In reply to by अप्पा जोगळेकर

बाळ सप्रे 07/02/2017 - 14:43
ताशी २५ किमीचा वेग!! रोडबाईक आहे का तुमची?? हायब्रीड अथवा माउंटनबाईकवर हा वेग खूप कठीण आहे.. शुभेच्छा!!

In reply to by बाळ सप्रे

नाही. ष्नेल कंपनीची ६ गिअर वाली हायब्रिड बाईक आहे. माझे पहिले पर्सनल चॅलेंज हुकले आहे. १ तास २ मिनिटात २४ किमी झाले. ताशी २३ किमीचाच वेग गाठता आला. आता दुसर्या चॅलेंजचे काय होते ते पाहायचे. तुम्ही स्वतः घाटात अव्हरेज स्पीड ९-१० ने सायकल चालवता असे वाचल्याचे आठवते.

In reply to by स्थितप्रज्ञ

प्रामुख्याने बलवर्धक योगासने आणि जिन्यांची चढ- उतार. सायकल आणि धावणे यासाठी पद्मासन आणि पश्चिमोत्तानासन याचे आश्चर्यकारक फायदे होतात असा अनुभव आहे.

आमचं सुद्धा ठरवल्याप्रमाणे चालु आहे. तुमचे सायकलिंग आणि रनिंगचे आकडे पाहुन स्फुरण चढतं पण स्वतः पळायला लागलं की पार जीव घशात येतोय. चालणं मात्र जोरात चालु आहे. पळण्याची तयारी करणार रोज थोडी थोडी. सविता, स्रुजा, सामान्य वाचक जोरात धावपळ करत आहेत. इशा, विश आणि स्वाती सुर्यनमस्कार घालत आहेत. सगळं काही ऑन ट्रॅ़क!

In reply to by पिलीयन रायडर

इशा१२३ 07/02/2017 - 09:30
काय काय व्यायाम करतात बापरे!आमच आपल लिंबुटिंबु चालुये.गेले वर्षभर रोज योगासने + सूर्यनमस्कार करायची सवय आहेच.सूर्यनमस्कार दिवसासाठि दिड महिना जस्त सूर्यनमस्कार सराव योगवर्गात सुरु केले होते. ४ फेब्रुवारिस सुर्यनस्कारदिवस योगसंस्थेकडुन साजरा केला गेला.वयक्तिक लक्ष होते १०८ सूर्यनमस्कार घालायचे.एक तासात पाच मिनिटाचे सात राउंड ,मधे तिन मिनिटाचे शवासन असे करत ११२ सूर्यनमस्कार घालु शकले. एकुणात नियमितपणा आणि सराव यामुळे जमु शकते असा तरि अत्मविश्र्वास आला. पाच ताखेपासुन परत २५ सूर्यनमस्कार आणि इतर योगासने सुरु केली आहेत.

मागच्या वर्षी डिसेम्बर पासून नियमित सायकलिंग चालू केले. सुरुवातीला १९९९ साली घेतलेला रणगाडा चालवून बघितला. २ महिने सातत्य टिकल्यावर नवीन सायकल घेऊनच टाकली. सुरुवातीला नव्याचे नऊ दिवस जोरदार राईड्स झाल्या. २-३ attempt करून शंभरी पण गाठून झाली. त्यानंतर (आणि आधी सुद्धा) आठवड्यातून दोनएक दिवस कंपनीत सायकल नेणं सुरु झालं. नियमितता असली तरी अगदी न चुकता रोज सायकल काढणं म्हणजे आव्हानच वाटत होत. काल सायकल चालवली म्हणजे काही मोठा तीर मारला अशा आवेशात दुसऱ्या दिवशी आरामच व्ह्यायचा. मनातून वाटत राहायचे कि रोज सायकल चालवायला हवी पण पुश मिळत नव्हता. दरम्यान डॉ श्रीहास यांनी चॅलेंजची आयडियाची कल्पना मांडली आणि ग्रुपवर निस्ता धुमाकूळ चालू झाला. कामात गर्क असल्याकारणाने हा धुमाकूळ मिस झाला पण त्या संध्याकाळीच sagarpdy भाऊंचा "आपण टीम बनवायची का?" असा मेसेज आला. त्या आधी सागरशीच सिंहगड सर करण्याबद्दल बोलणे झाले होते त्यामुळे त्या संदर्भात काही असेल असे वाटून मी हो म्हंटले (और तीर कमान से छूट गया!). रात्री सगळे मेसेज वाचल्यावर कळले हे काहीतरी वेगळेच गौडबंगाल आहे. सागर ५० x ७ चा चॅलेंज उचलण्याबद्दल बोलत होता. तरी टीम मध्ये मिळून ५० करायचे असल्याने फार ताण येणार नव्हता म्हणून मीही लावून धरले. पण न चुकता रोज किमान ५ किमी तरी करावेच लागणार होते. म्हंटल होऊन जाऊद्या. आम्ही तिसरा गाडी शोधायचे ठरवले आणि नकुल तयार झाला. ठरल्या दिवशी (२ फेब्रुवारी) चॅलेंज सुरु झाला आणि ओघाओघाने रोज सायकलिंग सुरु झालं. वर्किंग-डे ला कंपनीत सायकल न्यायची आणि सुटीच्या दिवशी साधारण ३० किमी मारायचे असा प्रवास चालू होता. पण........... sagarpdy च्या मनात काहीतरी वेगळेच शिजत होते. या पट्ठ्याने या चॅलेंजबरोबरच मासिक ५ घाटांचा वैयक्तिक चॅलेंजसुद्धा उचलला आणि पहिल्याच दिवशी पाबे (प्रचंड थकवणारा) आणि कादवे असे २ घाट सर केले. दरम्यान आमचा तिघांचा कायप्पा ग्रुप तयार झाला होता. त्यात सागरने दुसऱ्या दिवशी दिवे घाट मारण्याची मनीषा बोलून दाखवली (च्यायला मी मागच्यावेळेस पाबे मारला होता तर एक आठवडा विश्रांती घेतली होती. याने दोन अवघड घाट मारलेत आणि लगेच ३र्याची तयारी थक्क करणारी होती). नकुलला काही कारणामुळे जॉईन होणे शक्य नसल्यामुळे आम्ही हा घाट सर करण्याबाबत चर्चा चालू झाली. पण त्या दिवशी सकाळी ११ ला मला एक महत्वाचे काम असल्याकारणाने मी काढता पाय घेतला. तरी एखादा न चढवलेला घाट चढण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. सकाळी उशिरा उठलो होतो पण (जुना) कात्रज घाट आवाक्यात असल्याचे लक्षात आल्यावर अजिबात वेळ न दवडता सायकल घेतली आणि निघालो आणि बघता बघता घाट पूर्ण केला. घरी आल्यावर समजले योगायोगाने सागरनेही दिवे घाट संपवून जुना कात्रज घाटही सर केला होता (बापरे...दोन दिवसात ४ घाट...अबब!!!). पुढच्याही दिवशी सुट्टी होती. कायप्पा ग्रुपवर सागरने बोपदेव घाटाचा बेत ठरवला होता. पण आजच कात्रज घाट केला होता आणि उद्या लगेच घाट? पण परत म्हंटल होऊन जाऊदे एकदाचं. शिवाय सागर बरोबर असणारच होता, त्याच्याकडूनच प्रेरणा घाऊ. शेवटी १ वर्ष पेंडिंग असलेला बोपदेव घाट पार पडलाच. यातून काही महत्वाच्या गोष्टी शिकलो. १. Physical stress येणे साहजिक आहे पण तो जाणवणे आधी मेंदूत सुरु होते. तुम्ही स्वतःला पुश केलेत तर शरीर सुद्धा साथ देते. फक्त निश्चय पक्का पाहिजे. २. रेगुलर व्यायाम करणे फार कष्टप्रद असते असे आजपर्यंत समजत होतो तो एक "भ्रम" होता हे क्लिअर झाले. ३. आपल्या आजूबाजूला खूप "प्रेरणा" असतात. आपण त्यांना ओळखलं पाहिजे. ४. सर्वात महत्वाचे म्हणजे "क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे!" हे प्रकर्षाने जाणवले. असो....असे चॅलेंजेस सुरु राहणार. तूर्तास चालू चॅलेंज पूर्णत्वास नेण्यास अग्रक्रम.

शैलेश दरेकर 07/02/2017 - 16:05
मोदका, माझेही १.५-२ कि.मी चालणे धरणार का तुमच्या टिम मधे ? तेवढाच आपला खारीचा वाटा... बाकी आपल रक्त "अति गोड" असल्याने फार काही जमेल अस वाटत नाही...

मोदक भाऊंनी लिहिल्याप्रमाणे बरेच दिवस ग्रुप फक्त राइड अपडेट किवा सायकल विषयी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठीच हलत होता. पण ग्रुपच्या एकुलत्या एका डॉक्टरांनी (डॉ श्रीहास) ही आयडीयाची कल्पना काढली आणि ग्रुप एकदम जागा झाला! डॉ (तेच औ.बाद वरुन पुण्याला सायकल चालवत येणारे), मोदकभाऊ (ग्लोब ट्रॉटर) , पाध्ये (उत्साहाचा मुर्तिमंत झरा! ), मानसराव (बगेर गिअर सायकल किंग) आणि बाकी मेम्बेर्स मिळुन लगेच दोनच दिवसात कल्पनेचा प्रवास अस्तिवापर्यंत आला! एकमेकांना प्रोत्साहन देत प्रसंगी (प्रेमाने) दम देत चॅलेंज पुर्ण करण्याकडे टिम्सची वाटचाल सुरु झाली. काही टिम्सचे चॅलेंज पुर्ण झाले काहींचे एक दोन दिवसात होइल. ज्यांचे चॅलेंज पुर्ण झाले ते नविन चॅलेंज घ्यायला तयार पण झालेत ! हे सगळे बघता ह्या सगळ्या उपक्रमाचा मुख्य ऊद्देश जो लोकांना व्यायाम करण्यासाठी उद्युक्त करणे होता तो नक्कीच साध्य झाला आहे ! परत एकदा सर्व सास्वांचे (सायकल स्वारांचे :-) ) हार्दिक अभिनंदन !!! देश

डॉ श्रीहास 01/02/2017 - 18:55
३५० किमी होतील ... पण ७ दिवस रोजचे ५० म्हणजे सहज करण्यासारखं वाटत नव्हतं... ४थ्या आणि ५व्या दिवशी थकवा कमी पण कंटाळा त्रास देऊ लागला.... हे अपेक्षित होत पण आपणंच चॅलेंज दिलं आणि बाहेर पडणं हे बरं नव्हतं.... शिवाय रोजची कामं होतीच दिवस लांबवायला...जोर लावला ; एक १०० किमी ची पण राईड मारली... सोबतचे नियमीत सायकलींग करणारे कारणं देऊन गायब होत गेले .... विलपावर का काय आणली ब्वा अन् ४३० किमी पेक्षा जास्त सायकलींग झालं ७ दिवसात... फार काही तीर मारला नाही कारण जोरदार सायकलींग करणारे लोक माहीती आहेत ना !! फॅन्टास्टीक फिलींग होतं.... हा ५० X७ चा प्रयोग ३-४ वेळा करायचा आहे .... मिपा परिवार व सायकल गृप च्या शुभेच्छा लागणार आहेत बरं का !! श्री

In reply to by डॉ श्रीहास

sagarpdy 03/02/2017 - 20:44
7 दिवस रोजच्या रोज, सगळ्या कामांच्या वेळा सांभाळून 50 किमी सायकल चालवणे फारच कठीण काम आहे. डॉक यांना वंदन करून लवकरच हे आव्हान एकट्याने पेलण्याचा प्रयत्न नक्की करणार. उरलेल्या 50 किमी आठवड्यांसाठी बेस्ट हॉप लक. डॉक्टरकाका आगे बढो, हम तुम्हारे साथ है

अरे.. काय माणसं आहात की कोण आहात!!!! बरं आता हे सांगा की आमच्यासारखे लोक्स काय करु शकतील? जिम आहे उपलब्ध. तर आम्ही ट्रेडमिल वगैरे वापरुन सहभाग घेऊ शकतो का? आम्ही जिमवाल्यांचा ग्रुप बनवु शकु.. काहीच न करण्यापेक्षा हे चांगलंय ना. जिमवाल्यांचा ग्रुप बनणार असेल तर कोण कोण यायला तयार आहे? अवांतर :- ह्या उपक्रमाचे एक नाव ठेवुन, लोगो बनवुन तो मिपावर सतत दिसेल असा टाकला पाहिजे. मिपा दशकपुर्तीलाच सुरु झालेल्या ह्या उपक्रमाला, प्रॉपर मार्केटींग करुन वाढवायला हवं. आंतरजालावर असा उपक्रम पहाण्यात नाही.

In reply to by पिलीयन रायडर

तुम्ही ट्रेडमिल वर धावा...मी रोडवर धावतो. प्रसाद दाते येतील बहुधा जोडीला. विचारतो त्यांना. आमचे चालेंज शुक्रवारी संपतेय.

In reply to by पिलीयन रायडर

मोदक 01/02/2017 - 21:09
फोन नंबर शेअर होण्याच्या कारणाने असे कॉमन स्त्री-पुरूषांचे ग्रुप तयार होतील असे वाटत नाही. (..आणि अनेक प्रकारची बंधने येतात. दोघांनाही. त्यामुळे वेगळे ग्रुपच बरे. यू नो इट नाऊ.) त्यामुळे तु पुढाकार घे आणि बायकांचा एक ग्रुप काढ आणि तेथे असे उपक्रम राबव. फिरायला जा, सूर्यनमस्कार घाला, सायकल चालवा किंवा जिममध्ये घाम गाळा.. काहीही करा. इथे अपडेट करा, आणखी लोकांना उद्युक्त करा. नवीन लोक आपल्यापेक्षा जास्त सूर्यनमस्कार घालतील, जास्त सायकल चालवतील, त्यांना मागे टाकण्यासाठी आळस झटकून तयार व्हा आणि सकारात्मक स्पर्धेने नियमीत व्यायाम करा.

In reply to by मोदक

फोन नंबरच शेअर व्हायला हवं असं नाहीये ना. व्यनि मध्ये ग्रुप होऊ शकतो. टारगेट ठरवुन करायचं सगळ्यांनी रोज पुर्ण. किंवा इथेच एक ओपन ग्रुप होऊ शकतो. अर्थात मुली वेगळा ग्रुप बनवु शकतात, ते जास्त सोप्पंय वगैरे ठिक आहे. पण लगेच शाळेत असल्या सारखं मुली-मुलींचा ग्रुप.. मुला-मुलांचा ग्रुप काय!! मार्ग काढा की! असो.. जिमचा इथेच ओपन ग्रुप करु सध्या. जे जे करु शकतील ते इथे लिहतील. टारगेटः- ट्रेडमिलवर चालणे/धावणे किंवा सायकल वर - रोज ५ किमी किमान - सलग ७ दिवस ठिके? कोण कोण येतंय बोला? ह्या वीकांताला सुरु करता येईल चॅलेंज.

In reply to by मोदक

४ फेबला जमवायचं का? शनिवारी सुरू करतो. ते पुढे ७ दिवस. मी तर करेन ७ दिवस रोज. इतर कुणी जॉईन होणार असेल तर इथे लिहा. एक प्रश्नः- रोज एकच एक करायचं का? म्हणजे एक दिवस सायकलिंग आणि एक दिवस ट्रेडमिल चालेल का?

In reply to by पिलीयन रायडर

मोदक 01/02/2017 - 21:42
कसेही चालेल. पण ५ किमी पळणार असलीस तर त्याच्या तुलनेत १० किमी सायकलिंग करावे असे मला वाटते. सुरू तरी करूया. मग सुचत जाईल तसे सुधारणा करू.

In reply to by मोदक

सर... लिहीताना विचार तर करा की राव आमचा. १० किमी सायकलिंग नाही तर ५ किमी पळणे!! =)) ३ किमी चालणे ही सध्या अचिव्हमेंट वाटतेय!! मी माझ्या औकात प्रमाणे टारगेट सेट केलं तर चालेल का? ५ किमी ट्रेडमिल करु शकेन पहिल्या टप्प्यात. जर ते जमलं नीट तर परत नेक्स्ट लेव्हल चॅलेंज घेते. ओके?

In reply to by पिलीयन रायडर

मोदक 01/02/2017 - 23:23
ओके, तू सांग किती सायकलिंग / रनिंग करायचे ते. माझे रोजचे 40 किमी सायकलिंग होतेच. त्या नंतर तू सांगशील तितके सायकलिंग करेन.

In reply to by पिलीयन रायडर

अंतु बर्वा 02/02/2017 - 02:31
गुगल हँगाऔट वापरता येइल. हँगाउटच अ‍ॅप सर्व स्मार्टफोनवर अवेलेबल आहे. खरा इमेल पत्ता वापरायचीही गरज नाही. इथल्या सदस्यनामाशी मिळता जुळता जीमेल आयडी बनवला की झालं.

In reply to by पिलीयन रायडर

ह्या उपक्रमाचे एक नाव ठेवुन, लोगो बनवुन तो मिपावर सतत दिसेल असा टाकला पाहिजे. मिपा दशकपुर्तीलाच सुरु झालेल्या ह्या उपक्रमाला, प्रॉपर मार्केटींग करुन वाढवायला हवं. आंतरजालावर असा उपक्रम पहाण्यात नाही.
हे मनावर घेऊन लगेच लोगो बनवल्याबद्दल धन्यवाद! अत्यंत झकास लोगो आहे! पण दोन बारिकशा सुचना करु का? १. हा लोगो फक्त स्वगृहवर दिसत आहे. तो कायमच दिसत राहिला पाहिजे. शक्यतो वर.. कारण हा गेले ४-५ महिने सातत्याने चालु असणारा महत्वाचा उपक्रम आहे. आणि चालु राहिलच. त्यामानाने लोगो लक्षात येत नाहीये चटकन. २. त्या लोगोवर क्लिक केलं की लेटेस्ट धाग्यावर जाता यायला हवं. बाकी उपक्रम झकास चालु आहे हा!

कळविण्यास अत्यंत आनंद होतो की आमचे सवंगडी सागर आणि नकुल यांचेबरोबर सल्लामसलत करून आम्ही तिघांनीं उद्यापासून ५०x७ सायकलिंगचे आव्हान समर्थपणे पेलण्याचे योजिले आहे. टोळीचे नाव असेल The Cyclomaniacs. आनंदरावांचे आशिर्वाद आणि रेंजरची प्रेरणा आहेच....तुमची सर्वांची किरपा असुद्या... जय हिंद जय महाराष्ट्र

In reply to by स्थितप्रज्ञ

sagarpdy 06/02/2017 - 10:19
५०x७ चे आव्हान मस्त चालू आहे, आज ५ वा दिवस. ग्रुप मध्ये कल्पना दिली असली तरी इकडे टाकायचं राहून गेलं. आमच्या टोळीने ५० x ७ बरोबरच पुढील आव्हाने देखील स्वीकारली आहेत : १००० किमी सायकलिंग ७००० मी चढण (सायकलिंग) प्रत्येकी ५ घाट (सायकलिंग) डॉक श्री, टीम त्रिदेव यांनी मागच्या आठवड्यात प्रेरणेची घाऊक निर्मिती केली. त्याचा परिणाम हा विकांत एकदम भारी गेला. शनिवारी पुणे-पाबे घाट-वेल्हे(तोरणा)-कादवे घाट-पानशेत-पुणे अशी १०० किमी ची फेरी आणि त्यात २ घाट झाले. रस्ते बऱ्यापैकी खराब असल्याने फटिग आला होता. तरी रविवारी दिवे घाट करण्याचा मानस होता. तर सुखद आश्चर्य - माझा एक काका (वय वर्षे ५०+) म्हणाला मी पण येतो. मग एकदम स्फुरण आले आणि दिवे घाट मारलाच, जोडीला जवळच आहे म्हणून जुना कात्रज घाट पण करून झाला. (फोटो टाकले आणि ग्रुप वर मेसेज चा नुसता पूर) भरपूर खाऊन दुपारी मस्त झोप काढली, संध्याकाळी तसं फ्रेश वाटत होतं, तर हळूच आमच्या टोळी-सवंगड्याना म्हणालो - उद्या बोपदेव घाट करेन म्हणतोय. आमचे कप्तान - स्थितप्रज्ञ साहेब म्हणाले ते पण येत आहेत. एकदम खुश झालो. आज सकाळी उठून मी आणि स्थितप्रज्ञ खडीमशीन चौकात भेटलो आणि बोपदेव तासाभरात सर झाला पण! अशा प्रकारे माझे वैयक्तिक ५ घाटांचे आव्हान या वीकांतालाच सुफळ संपूर्ण झाले. टोळीचे प्रत्येकी ५ घाटांचे आव्हान स्थितप्रज्ञ आणि नकुल पुढे नेतीलच.

आम्ही आपला एक ओपन ग्रुप स्थापन करत आहोत. तुम्हा लोकांपुढे लिंबु टिंबु आहे. पण आमचाही खारीचा वाटा. ज्यांना जॉईन व्हायचंय त्यांनी व्हा. व्यनि साखळी करु हवं तर. हा फक्त मुलींचा ग्रुप नाही. ज्यांना अगदी थोडंफारही करायचं असेल त्यांनी सामील व्हा. नुसतंच विचार करत बसण्यापेक्षा २ सुर्यनमस्कार तरी घाला. ग्रुपचं वैशिष्ट्य असंय की सगळ्यांचं टारगेट सारखं नाही. कारण सध्या ज्या मुली हे करत आहोत, त्या सगळ्या वेगवेगळ्या रुटीनमध्ये अडकलेल्या आहेत. लहान मुल घेऊन काहींना सध्या थोडं अवघड आहे. सगळ्यांनाच ५ किमी पळणे वगैरे होणार नाही. पण ज्याला जे जमेल ते टारगेट घ्यायचं आणि सलग ७ दिवस ते पुर्ण करायचं इतकंच ठरवलं आहे. हे जमलं तर अजुन पुढच्या वेळेस थोडं अवघड ध्येय घेऊ. १. मी आणि स्रुजा - जिम मध्ये ५ किमी २. सामान्य वाचक - ५ किमी पळणे ३. विशाखा राऊत - ५ सुर्यनमस्कार ४. सविता ००१ - चालणे / सुर्यनमस्कार हे सध्या बोलणं चालु आहे. टारगेट्स पक्की करतो. साधारण ह्या शनिवारी सुरु करु.

In reply to by पिलीयन रायडर

स्रुजा 02/02/2017 - 19:06
गृप चं नाव पण ठेवायचं आहे का ? सुचवा काही तरी. बादवे इथले टारगेट्स बघता #कुठेतोंड्लपवू असं झालंय

In reply to by मोदक

"iWorkout" हे नांव कसे वाटते..?
हुच्च्भ्रु! सध्या आम्हाला सलग ७ दिवस होईल का ह्याचा विश्वास नसल्याने आणि ह्यावर आम्ही फार चर्चाच केली नसल्याने - "लिंबुटिंबु"! (अजुन बरं काही सापडलं तर बदलु पुढच्या वेळेला.) ग्रुप :- लिंबुटिंबु ध्येय : - ४ फेब पासुन ७ दिवस रोज स्रुजा - ५ किमी - जिम पिरा - ५ किमी - जिम विश - ५ सुन सावा - ५ किमी - पळणे सवि - ६ किमी - चालणे इशा - ३ किमी चालणे + २५ सुन स्वाती - २५ सुन हाहा - ९ किमी सायकलिंग हे तुमच्या मुळ चॅलेंजपेक्षा फार वेगळं आहे. पण वर्किंग मदर्सचा विचार करुन आम्ही बदल केलेत. चालवुन घ्या. :)

In reply to by पिलीयन रायडर

डॉ श्रीहास 04/02/2017 - 14:34
व्यायाम करताय हे जास्त महत्वाचं आहे , आम्ही कोणीही प्रोफोश्नल अॅथलिट्स नाही आहोत .... वर्ष दोन वर्षापुर्वी सुरुवात केलेली लोक आहोत, नियमित सरावानंतर तुमची पण क्षमता नक्कीच वाढेल... आणि महत्वाचं म्हणजे कोणाशीही तुलना करू नका _/\_... तुमचं तुमचं चालू द्या , सोबत कोणी असो वा नसो,कंटाळा तर मदत करायला आम्ही लोक आहोतच ...

In reply to by पिलीयन रायडर

चला, पिरा तै, तुमच्या मुळे सुरवात झाली. असेच हळु हळु सुरु करा, नंतर नियमित होत जात. उपक्रमास शुभेच्छा. बाबा योगिराज.

In reply to by पिलीयन रायडर

सही रे सई 18/02/2017 - 03:51
तुमचा पुढील आठवड्यात असाच आव्हान सुरु ठेवायचा विचार असेल तर मी पण सामील होते यात. फक्त विकांताला जरा अवघड आहे हे करणे (न जाणो या अव्हान प्रकरणामूळे होईलही कदाचित).. इतर दिवशी ५-६ किमी सायकलिंग ते पण हिल इंटर्व्हल मधे करायला जमेल मला.

In reply to by सही रे सई

हो.. आता हे सततच चालु राहील. तू सुरू कर. किमान ७ दिवसांचं तरी चॅलेंज घे. त्याने वीकेंडला सुद्धा व्यायाम होतोच.

In reply to by पिलीयन रायडर

सप्तरंगी 09/02/2017 - 20:46
पिरा, हा ओपन ग्रुप कुठे सुरु केला आहे, मी जॉईन करू शकते का ? वॉट्स ऍप वापरात नाही बाकी ए-मेल ने वगैरे चालू शकेल मला. हे व्यनि काय आहे ? (फारच डफ्फर प्रश्न आहे का ?:)) आणि हो मी रोज ५ km पूर्ण करेन.

२९ जानेवारीला पुणे मॅरेथॉन होती. २१ किमी हाफ मॅरेथॉन २ तास ५१ मिनिटात कशीबशी फाफलत पूर्ण केली. आता एप्रिल मधे २०० ची बीआरएम करणार.

In reply to by अप्पा जोगळेकर

वा अभिनंदन , कुठलीही मॅरथॉन पूर्ण करणे हे महत्वच आहे , लावलेला डाव अर्ध्यात सोडता कामा नये - फक्त एक सांगतो सतत दर महिन्याला मॅरथॉन पळू नये , एक ही दुखापत काही काळासाठी ऑफ ट्रॅक करते

In reply to by अप्पा जोगळेकर

डॉ श्रीहास 04/02/2017 - 14:49
१०० किमी सायकलींग ला काही वाटतं नाही, पण १० किमी सुध्दा पळता येत नाही.... २१ किमी ची हाफ मॅरेथाॅन पण चालतच ३:०९ तासात पुर्ण केली होती :)) मॅरेथाॅनसाठी तुमचं खुऽऽऽऽऽऽप अभिनंदन ._/\_

अमर विश्वास 02/02/2017 - 17:24
मस्त चॅलेंज ... माझे फेब्रुवारी महिन्याचे टार्गेट : रोज ५ किमी रनिंग + सायकल (एक आड एक दिवस ) म्हणजेच दर आठवड्याला १५ किमी रनिंग + १५ किमी सायकल

अनरँडम 03/02/2017 - 20:09
रविवारः ५ मैल सोमवारः (कन्हत-कुथत) ४ मैल मंगळवारः ४.६ मैल बुधवारः ४.७५ मैल गुरूवारः ५ मैल आज विश्रांती घेण्याचा विचार आहे. येथून प्रेरीत होऊन कदाचित एप्रिल-मे महिन्यात अर्धी मॅरॅथॉन पळावी असा विचार भीत भीत करत आहे.

आज लोड रनर्सचं चॅलेंज आज पूर्णत्वास आलं. मोदक, प्रसाद दाते आणि मी स्वीकारलेलं प्रतिदिन १० किमी धावण्याचं आव्हान मोदकाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तिसऱ्या दिवशीच नव्याने मी आणि प्रसाद दातेंनी मिळून सुरु केलं. मोदकाच्या प्रोत्साहनामुळे आम्हालाही खास हुरूप आला आणि आम्ही दोघांनीच आज हे आम्हां पूर्ण केलं. सोबत स्टॅट्स जोडत आहे. Load Runners

अमर विश्वास 04/02/2017 - 09:59
प्रेरणादाई उपक्रम .. मोदक .. डॉक्टर .. या सर्वांचे उपडते पाहून स्फुरण चढते ... या आठवड्यातला केलेला व्यायाम : सोमवार : ४.५ किमी रनिंग (३० मिनिटे) मंगळवार : ५ किमी रनिंग (३४ मिनिटे) बुधवार : सायकल ६ किमी गुरुवार : ५ किमी रनिंग (३४ मिनिटे) शुक्रवार : सायकल ६ किमी शनिवार : आजचा प्लॅन : हनुमान टेकडीवर पाळणे : कांचनगल्ली पासून टेकडी चढणे ----ARAI --- वेताळ टेकडी ---- चतुश्रुंगी --- पाषाण आणि परत ... अंदाजे अंतर ८ किमी (प्रत्यक्षात किती होते ते रात्री लिहीनच )

डॉ श्रीहास 04/02/2017 - 10:40
८.५ किमी ट्रेडमिल वर चालणं आणि ६१५ किमी सायकलींग असं चांगलासा व्यायाम केला .... फेब्रुवारीची सुरवात ५० किमी सायकलींगनी केली आहे, ३ दिवस गॅप पडलाय पण ... व्यायाम परत सुरू होईल.... ह्या धाग्यातून उद्युक्त झालेल्या प्रत्येकाला खूप शुभेच्छा _/\_

नितीन पाठक 04/02/2017 - 15:52
मोदक भाऊंनी लिहिल्याप्रमाणे बरेच दिवस सायकल सायकल ग्रुप वर फक्त राइड अपडेट किवा सायकल विषयी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठीच जिवंत होता. आज माझी इतकी राईड झाली, आम्ही इकडे गेलो, तिकडे गेलो, खादाडी झाली इ. इ. या ग्रुपच्या डॉ़क साहेबांनी (डॉ श्रीहास) एक ७ दिवसाच्या नवीन चैलेंजची कल्पना काढली आणि ग्रुप मध्ये एकदम चैतन्य निर्माण झाले. डॉक्टर श्रीहास आणि बाकी टीमने भरपूर चर्चा करून पुढील नियम तयार केले. प्रत्येकाने लगेच आपल्या टीम साठी सदस्यांची शोधाशोध सुरू केली. मी, मा. श्री. योगेश साळुंके (बाबा योगीरा़ज) आणि मा. श्री. मानसरावजी चंद्रात्रे लातूरकर यांची एक टीम तयार झाली. नामकरण झाले --- टीम त्रिदेव कशी सायकल चालवायची हे ठरले आणि दि. २७ जानेवारी पासून सुरू झाला मग आपापल्या सायकलचा प्रवास, चाके गरागरा फिरू लागली. आकडे वाढायला लागले. एकमेकांना प्रोत्साहन देत चॅलेंज पुर्ण करण्याकडे टिम्सची वाटचाल सुरु झाली. पहिला दिवस, दुसरा दिवस ...... होता होता मग आला २ फेब्रुवारी ..... शेवटचा दिवस. आमच्या त्रिदेव टीम चे एकून सायकलींग झाले ८७९.५ किमी. सविस्तर वृत्तांत मा. श्री. योगेशभाउ देणार आहेत. चैलेंज सुरूवात केली आणि पहिल्याच दिवशी मा. योगेश भाउंच्या सायकलची ट्यूब खराब झाली, त्यांचा मूड गेला, त्या दिवशी त्यांची सयकलींग कमी झाली. आमचे योगेशभाउ नाराज झाले. दुस-या दिवसापासून मा. योगेश भाउंनी चागंलीच आघाडी घेतली. सोमवारी दि. ३० तारखेला तर योगेश भाऊंनी दणदणीत १२८ किमी सायकलींग केली. आम्ही दोघे एकदम गार. एका दिवसात १२८ किमी ?? बापरे !!! काय हे !! मा. मानसरावजी चंद्रात्रे लातूरकरांचे तर काय विचारता ? बिगर गिअर सायकल ने हा माणूस दररोज टळटळीत उन्हातान्हाचे कमीत कमी ५० किमी सायकल चालवत होता. काय बोलावे. यांची सायकल एकदा निघाली की ५० किमी शिवाय थांबतच नव्हती. मा. श्री. चंद्रात्रे लातूरकरांनी दररोज ५० किमी च्या वर सायकल चालवली आणि चैलेंज पूर्ण केले. इनको तो मानना पडेगा !! एक चैलेंज पूर्ण झाले. मनाला समाधान लाभले. किती झाले यापेक्षा आपण हे करू शकतो याचा आत्मविश्वास आला. खरे तर पहिल्यांदा चैलेंज मध्ये भाग घ्यायचा विचार केला तेव्हा असे वाट्ले की आपल्याला हे जमेल का ? नोकरी, प्रापंचिक जबाबदारी संभाळून हे जमू शकेल का असे ही मनात येउन गेले. पण मला आमच्या दोन्ही जोडीदारांनी प्रोस्ताहन देउन सहकार्य केले. तुम्हाला जमेल तेवढी सायकल चालवा, कमीत कमी ५ किमी दररोज चालवा असे सांगितले. आज, मा. श्री. योगेश सांळुके आणि मा. श्री. मानसरावजी चंद्रात्रे लातूरकर या दोन्ही जोडीदारांमुळे मी हे साध्य करू शकलो त्याबद्दल या दोघांना मनापासून प्रणाम. या दोघांचा मी शत:श आभारी आहे. आमच्या या चैलेंजच्या उपक्रमामध्ये सायकल सायकल समूहाच्या सर्व सदस्यांचे म्हणजे इतर सर्व सायकल स्वारांचे अतिशय प्रोत्साहन मिळाले, जोरदार पाठिंबा मिळाला. त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. विशेषता डोक्टर श्रीहास, मोदक भाउ, सरपंच, अक्षयमामा देशपांडे, पाध्ये केडी, सागर पाध्ये, बाबा योगिराज, मानसभाउ, यांचे विशेष आभार. अभिजित बुचडे, प्रतिक पाटील, वॉडरींग व्ह्यूफाईंडर, प्रसाद दाते, किरण कुमार, नकुल, इ. इ. मित्रांचे मनापासून आभार (चूकुन कोणी राहीले असल्यास क्षमस्व) Team Load Runners and Team The Cyclomaniacs यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा .......... अजून समूहावर चैलेंजेस चालू आहे. चैलेंज घेतलेल्या सर्व सदस्यांना शुभेच्छा मिपावर ब-याच जणांनी / जणींनी वेगवेगळे नवीन चैलेंज स्वीकारले आहे त्या सर्वांना शुभेच्छा ... हे सगळे बघता ह्या सगळ्या उपक्रमाचा मुख्य ऊद्देश जो लोकांना व्यायाम करण्यासाठी उद्युक्त करणे होता तो नक्कीच साध्य झाला आहे ! परत एकदा सर्व सायकल स्वारांचे हार्दिक अभिनंदन !!!

अरिंजय 04/02/2017 - 17:55
सायकल सायकल समुहावर काही दिवसांपुर्वी आव्हानांची संकल्पना मांडण्यात आली. त्यानुसार आम्ही म्हणजेच मिपाकर नितीन पाठक - रणगाडा चालक मालक 1982 ची हर्क्युलस सायकल, बाबा योगीराज व बगरघेर म्हणजेच बिना गिअर सायकलवाले मानस चंद्रात्रे असा "टीम त्रिदेव" हा संघ बनवला व 50×7 हे सांघीक आव्हान घेतले. 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या काळात "टीम त्रिदेव"ने आपले सांघीक आव्हान, 50×7, पुर्ण केले. संघाच्या सात दिवसांच्या कामगिरीचा हा लेखाजोखा - दिवस पहिला - मानस चंद्रात्रे - 49.3 नितीन पाठक - 34.8 बाबा योगीराज - 7.9 पहिली टोटल = 92 किमी दिवस दुसरा - नितिन पाठक - 42.6 बाबा योगीराज - 52.8 मानस चंद्रात्रे - 51.9 दुसरी टोटल - 147.3 किमी दिवस तिसरा नितीन पाठक - 62.5 बाबा योगीराज - 38.5 मानस चंद्रात्रे - 43.6 तिसऱ्या दिवसाची टोटल -144.6 दणदणीत चौथा दिवस- नितीन पाठक - 33.8 बाबा योगीराज- 128.4 मानस चंद्रात्रे - 10.6 चौथ्या दिवसाची टोटल - 172.8 दिवस पाचवा नितीन पाठक - 44.5 बाबा योगीराज - 11.9 मानस चंद्रात्रे - 50.5 पाचव्या दिवसाची टोटल - 106.9 दिवस सहावा नितीन पाठक - 32.4 बाबा योगीराज - 11.1 मानस चंद्रात्रे - 50.7 सहाव्या दिवसाची टोटल - 94.2 दिवस सातवा नितीन पाठक - 42 बाबा योगीराज - 24.5 मानस चंद्रात्रे - 55.2 सातव्या दिवसाची टोटल - 121.7 Grand Total = 879.5 किमी वैयक्तीक कामगिरी - नितिन पाठक - 292.6 किमी बाबा योगीराज - 275.1 किमी मानस चंद्रात्रे - 311.8 किमी

मानस भौ, पाठक काका पहिल ५०X७ च ध्येय तर यशश्विरित्या पूर्ण झालय. ह्या वेळेस ८८० किमी पुर्ण झालेत, पुढिल वेळी कमीत कमी १००० किमी पुर्ण करु. सायकल भागाओ संघट्नेचे सदस्य बाबा योगिराज

मित्रहो 04/02/2017 - 19:58
१००० किमी फेब्रुवारी महिन्यात सायकलींग. प्रयत्नच आहे. कठीण आहे. पाचशेच्या वर गाडी गेली नाही कधी. चार दिवसात ६५ किमीच झाले ३ फेब्रु - २५ किमी ४ फेब्रु - ४० किमी

In reply to by मित्रहो

मित्रहो 06/02/2017 - 21:38
५ फेब्रु - ९५ किमी (७७ आणि १८) ७७ किमी नेहमीच्याच रुटने असले तरी मस्त मजा आली यावेळेला. ६ आणि ७ बहुदा शून्यच राहनार. पायांना आराम. एकूण १७० किमी.

In reply to by मित्रहो

मित्रहो 12/02/2017 - 13:27
३ फेब्रु - २५ किमी ४ फेब्रु - ४० किमी ५ फेब्रु - १०५ किमी (७७ + १८+ १०) ८ फेब्रु - ३६ किमी ११ फेब्रु - ४३ किमी १२ फेब्रु - १०१ किमी एकूण- ३५० किमी

In reply to by मित्रहो

मित्रहो 19/02/2017 - 13:00
३ फेब्रु - २५ किमी ४ फेब्रु - ४० किमी ५ फेब्रु - १०५ किमी (७७ + १८+ १०) ८ फेब्रु - ३६ किमी ११ फेब्रु - ४३ किमी १२ फेब्रु - १०१ किमी १४ फेब्रु - ३८ किमी १८ फेब्रु - २०३ किमी (ब्रेव्हे पूर्ण ) एकूण- ५९१ किमी

गवि 05/02/2017 - 01:46
:-( खंड पडला राव. अपराधी भावना. सगळे जबरदस्त व्यायाम करताहेत आणि आम्ही पायाची इंज्युरी या निमित्ताने सुरु झालेला खंड वाढवत चाललोय. फक्त अधेमधे ३-४ दिवसांनी चालतोय. :-(

In reply to by गवि

डॉ श्रीहास 06/02/2017 - 14:17
तंगडी सलामत तो किलोमीटर पचास... मागील वर्षी सायकलवरून पडलो पाय मोडला , त्यातून बरं होऊन बाहेर आलो मग ३ वेळा १०० किमीहून अधिक राईड्स आणि एक २३० किमी ची औ'बाद-पुणे वारी केली... त्यामुळेच म्हणतो , बरे व्हा पुर्ण मग करा सुरवात !!

दाते प्रसाद 06/02/2017 - 11:00
सायकल ग्रुपवर जेव्हा चॅलेंजेस , टीम्सची चर्चा सुरु होती तेव्हा आपणही एका टीममधून सायकलिंचे आव्हान घ्यावे असं वाटत होतं पण फिरतीची नोकरी असल्याने कितपत जमेल हि शंका होती .मोदकाने रनिंगची आयडिया देऊन आमची टीम बनवली सुध्दा . मग पळणं चालु झालं , पहिल्या दोन दिवसात जरा दमायला झालं. २७ जानेवारीला मोदकाने त्याला कामामुळे /प्रवासामुळे रनींग जमणार नसल्याचं शुभवर्तमान दिलं, आणि आम्ही दोघांनी ( इरसाल कार्ट आणि मी ) हे चॅलेंज पुर्ण करायचं ठरवलं . त्यातसुद्धा मला एक दिवस बाहेरगावी जायला लागलं पण मी काम संपल्यावर तिथे त्या दिवसाचं रनींग पुर्ण केलं . अशा रीतीने आम्ही हे चॅलेंज २+७ दिवसात पूर्ण केलं . ९ दिवस सातत्यानी धावून माझा पाळायचा वेग जाणवण्याइतपत वाढला. स्पेशल थँक्स टू इरसाल कार्ट आणि मोदक

माझ्या मते सायकल चालवण्यासाठी स्ट्रेन्थ ट्रेनिंग सुद्धा आवश्यक आहे. मी एप्रिल महिन्यातल्या बीआरएम साठी तयारी करत आहे. माझे चॅलेंज मी येथे नोंदवतो. माझ्या संघात मी एकटाच असेन. ७ दिवसात २ वेळा सायकलिंग. पैकी एकदा १ तासात २५ किमी. (यामधे डांगे चौक, काळेवाडी येथील २ फ्लाय ओव्हर्स २ वेळा चढणे उतरणे असेल.) दुसर्‍यांदा २ तासात ४५ किमी. (हा कमी-अधिक चढणीचा रस्ता असेल. बहुधा वाकड ते तळेगाव आणि परत). बाकीचे दिवस स्ट्रेन्थ ट्रेनिंगचे असतील. ते येथे नोंदवत नाही. नेक्स्ट अपडेट पुढच्या सोमवारी देईन.

In reply to by अप्पा जोगळेकर

बाळ सप्रे 07/02/2017 - 14:43
ताशी २५ किमीचा वेग!! रोडबाईक आहे का तुमची?? हायब्रीड अथवा माउंटनबाईकवर हा वेग खूप कठीण आहे.. शुभेच्छा!!

In reply to by बाळ सप्रे

नाही. ष्नेल कंपनीची ६ गिअर वाली हायब्रिड बाईक आहे. माझे पहिले पर्सनल चॅलेंज हुकले आहे. १ तास २ मिनिटात २४ किमी झाले. ताशी २३ किमीचाच वेग गाठता आला. आता दुसर्या चॅलेंजचे काय होते ते पाहायचे. तुम्ही स्वतः घाटात अव्हरेज स्पीड ९-१० ने सायकल चालवता असे वाचल्याचे आठवते.

In reply to by स्थितप्रज्ञ

प्रामुख्याने बलवर्धक योगासने आणि जिन्यांची चढ- उतार. सायकल आणि धावणे यासाठी पद्मासन आणि पश्चिमोत्तानासन याचे आश्चर्यकारक फायदे होतात असा अनुभव आहे.

आमचं सुद्धा ठरवल्याप्रमाणे चालु आहे. तुमचे सायकलिंग आणि रनिंगचे आकडे पाहुन स्फुरण चढतं पण स्वतः पळायला लागलं की पार जीव घशात येतोय. चालणं मात्र जोरात चालु आहे. पळण्याची तयारी करणार रोज थोडी थोडी. सविता, स्रुजा, सामान्य वाचक जोरात धावपळ करत आहेत. इशा, विश आणि स्वाती सुर्यनमस्कार घालत आहेत. सगळं काही ऑन ट्रॅ़क!

In reply to by पिलीयन रायडर

इशा१२३ 07/02/2017 - 09:30
काय काय व्यायाम करतात बापरे!आमच आपल लिंबुटिंबु चालुये.गेले वर्षभर रोज योगासने + सूर्यनमस्कार करायची सवय आहेच.सूर्यनमस्कार दिवसासाठि दिड महिना जस्त सूर्यनमस्कार सराव योगवर्गात सुरु केले होते. ४ फेब्रुवारिस सुर्यनस्कारदिवस योगसंस्थेकडुन साजरा केला गेला.वयक्तिक लक्ष होते १०८ सूर्यनमस्कार घालायचे.एक तासात पाच मिनिटाचे सात राउंड ,मधे तिन मिनिटाचे शवासन असे करत ११२ सूर्यनमस्कार घालु शकले. एकुणात नियमितपणा आणि सराव यामुळे जमु शकते असा तरि अत्मविश्र्वास आला. पाच ताखेपासुन परत २५ सूर्यनमस्कार आणि इतर योगासने सुरु केली आहेत.

मागच्या वर्षी डिसेम्बर पासून नियमित सायकलिंग चालू केले. सुरुवातीला १९९९ साली घेतलेला रणगाडा चालवून बघितला. २ महिने सातत्य टिकल्यावर नवीन सायकल घेऊनच टाकली. सुरुवातीला नव्याचे नऊ दिवस जोरदार राईड्स झाल्या. २-३ attempt करून शंभरी पण गाठून झाली. त्यानंतर (आणि आधी सुद्धा) आठवड्यातून दोनएक दिवस कंपनीत सायकल नेणं सुरु झालं. नियमितता असली तरी अगदी न चुकता रोज सायकल काढणं म्हणजे आव्हानच वाटत होत. काल सायकल चालवली म्हणजे काही मोठा तीर मारला अशा आवेशात दुसऱ्या दिवशी आरामच व्ह्यायचा. मनातून वाटत राहायचे कि रोज सायकल चालवायला हवी पण पुश मिळत नव्हता. दरम्यान डॉ श्रीहास यांनी चॅलेंजची आयडियाची कल्पना मांडली आणि ग्रुपवर निस्ता धुमाकूळ चालू झाला. कामात गर्क असल्याकारणाने हा धुमाकूळ मिस झाला पण त्या संध्याकाळीच sagarpdy भाऊंचा "आपण टीम बनवायची का?" असा मेसेज आला. त्या आधी सागरशीच सिंहगड सर करण्याबद्दल बोलणे झाले होते त्यामुळे त्या संदर्भात काही असेल असे वाटून मी हो म्हंटले (और तीर कमान से छूट गया!). रात्री सगळे मेसेज वाचल्यावर कळले हे काहीतरी वेगळेच गौडबंगाल आहे. सागर ५० x ७ चा चॅलेंज उचलण्याबद्दल बोलत होता. तरी टीम मध्ये मिळून ५० करायचे असल्याने फार ताण येणार नव्हता म्हणून मीही लावून धरले. पण न चुकता रोज किमान ५ किमी तरी करावेच लागणार होते. म्हंटल होऊन जाऊद्या. आम्ही तिसरा गाडी शोधायचे ठरवले आणि नकुल तयार झाला. ठरल्या दिवशी (२ फेब्रुवारी) चॅलेंज सुरु झाला आणि ओघाओघाने रोज सायकलिंग सुरु झालं. वर्किंग-डे ला कंपनीत सायकल न्यायची आणि सुटीच्या दिवशी साधारण ३० किमी मारायचे असा प्रवास चालू होता. पण........... sagarpdy च्या मनात काहीतरी वेगळेच शिजत होते. या पट्ठ्याने या चॅलेंजबरोबरच मासिक ५ घाटांचा वैयक्तिक चॅलेंजसुद्धा उचलला आणि पहिल्याच दिवशी पाबे (प्रचंड थकवणारा) आणि कादवे असे २ घाट सर केले. दरम्यान आमचा तिघांचा कायप्पा ग्रुप तयार झाला होता. त्यात सागरने दुसऱ्या दिवशी दिवे घाट मारण्याची मनीषा बोलून दाखवली (च्यायला मी मागच्यावेळेस पाबे मारला होता तर एक आठवडा विश्रांती घेतली होती. याने दोन अवघड घाट मारलेत आणि लगेच ३र्याची तयारी थक्क करणारी होती). नकुलला काही कारणामुळे जॉईन होणे शक्य नसल्यामुळे आम्ही हा घाट सर करण्याबाबत चर्चा चालू झाली. पण त्या दिवशी सकाळी ११ ला मला एक महत्वाचे काम असल्याकारणाने मी काढता पाय घेतला. तरी एखादा न चढवलेला घाट चढण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. सकाळी उशिरा उठलो होतो पण (जुना) कात्रज घाट आवाक्यात असल्याचे लक्षात आल्यावर अजिबात वेळ न दवडता सायकल घेतली आणि निघालो आणि बघता बघता घाट पूर्ण केला. घरी आल्यावर समजले योगायोगाने सागरनेही दिवे घाट संपवून जुना कात्रज घाटही सर केला होता (बापरे...दोन दिवसात ४ घाट...अबब!!!). पुढच्याही दिवशी सुट्टी होती. कायप्पा ग्रुपवर सागरने बोपदेव घाटाचा बेत ठरवला होता. पण आजच कात्रज घाट केला होता आणि उद्या लगेच घाट? पण परत म्हंटल होऊन जाऊदे एकदाचं. शिवाय सागर बरोबर असणारच होता, त्याच्याकडूनच प्रेरणा घाऊ. शेवटी १ वर्ष पेंडिंग असलेला बोपदेव घाट पार पडलाच. यातून काही महत्वाच्या गोष्टी शिकलो. १. Physical stress येणे साहजिक आहे पण तो जाणवणे आधी मेंदूत सुरु होते. तुम्ही स्वतःला पुश केलेत तर शरीर सुद्धा साथ देते. फक्त निश्चय पक्का पाहिजे. २. रेगुलर व्यायाम करणे फार कष्टप्रद असते असे आजपर्यंत समजत होतो तो एक "भ्रम" होता हे क्लिअर झाले. ३. आपल्या आजूबाजूला खूप "प्रेरणा" असतात. आपण त्यांना ओळखलं पाहिजे. ४. सर्वात महत्वाचे म्हणजे "क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे!" हे प्रकर्षाने जाणवले. असो....असे चॅलेंजेस सुरु राहणार. तूर्तास चालू चॅलेंज पूर्णत्वास नेण्यास अग्रक्रम.

शैलेश दरेकर 07/02/2017 - 16:05
मोदका, माझेही १.५-२ कि.मी चालणे धरणार का तुमच्या टिम मधे ? तेवढाच आपला खारीचा वाटा... बाकी आपल रक्त "अति गोड" असल्याने फार काही जमेल अस वाटत नाही...
लेखनविषय:
लेखनप्रकार
. नमस्कार मंडळी. "मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे. व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन. आपण सर्वांनी केलेला व्यायाम पुढीलप्रमाणे - नोव्हेंबर २०१६ - सायकलिंग - ८,०१० किमी आणि रनिंग / वॉकिंग - २४८ किमी. डिसेंबर २०१६ - सायकलिंग - ९,६१३ किमी आणि रनिंग / वॉकिंग - ५४७ किमी.