मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मार्गदर्शन

हळूहळू साऱ्यांनीच प्रेमाचं दुकान मांडून टाकलं

खिलजि ·
तिच्या आवडीनिवडीसाठीच मी मैत्रीलाच गहाण ठेवलं ते बोलावयाचे नेहेमी मजला यायला सांगायचे नाक्यावर एकही धड वाटत नव्हता तिला एकेकाचं हळूहळू शिरकाण करून टाकलं शिकाऱ्यावानी माग काढत होती माझा नजरेत असावं म्हणून समोरच मचाण बांधून टाकलं त्यांना खबर पोहोचताच याची सुटकेसाठी त्यांनी जीवाचं रान करून टाकलं लग्नाआधीच तिच्याविरुद्ध माझं कान भरून टाकलं चंडी रूप धारण करून मग तिनं सर्वांचंच पायताण करून टाकलं प्रत्येक चीअर्सबरोबर एकेक थेम्ब सर्वानी ओवाळून टाकला अश्या मित्रापेक्षा सर्वाना वेटरच बरा वाटला नशेत साऱ्यांनी फोन करून शिव्यांचं दान वाटलं उमजता मज मेख सारी सालं प्रेमाचं

एक कागद

गबाळ्या ·
एक कागद कस्पटासम, रद्दीमध्ये फरपटला जसा जीव हा आप्तांमधुनी, गर्दीमध्ये भरकटला एक कागद कस्पटासम ||धृ ।। 
 एक बालक हाती घेई, मायेने मग आकार देई, बनता त्याचे जहाज हवाई, उंच तया उडविला ।। १ ।। 
 उंच विहरता मन स्वच्छंदी, हीन भासली भुतल रद्दी, वाटे मनासी खाशी शक्ती, दैवचि अर्पि मजला ।। २ ।। 
 वाटे त्यासी उंच उडावे वादळ वारे यांसी भिडावे कांबीटाचा कणा देउनी, पतंग सुंदर केला ।। ३ ।। 
 इतकी उंची तये गाठली साद मनीची नभी आटली ढील देण्या जाता बालक, मांजा संपून गेला ।। ४ ।। 
 गगन ठेंगणे खुणवी तारे मांजा परी तो रोखुनी धरे दृढनिश्चय तो मनी करुनी, तोडी त्या नाळेला ।। ५ ।। 
 उंच उंच तो जातच राही स्वानंदी मग

नवकवीस्तोत्र

माम्लेदारचा पन्खा ·
काही करण्या उरले नसता । आपली पाटी कोरी असता । काही बकांची ध्यानस्थ स्तब्धता । मत्स्यमारीकारणे ।। दिसता कोणीही नवखा । लबाड साधिती मोका । त्याची बुडवती नौका । लागलीच ।। पाडावी भोके यथेच्छ । भाषा तरी वापरावी स्वच्छ । भासवावे तयाते तुच्छ । आत्मक्लेशे ।। कवीचे उडवावे शिरस्त्राण । मागाहुनि करावे शिरकाण । मनसोक्त मारावे पादत्राण । कवितेवरी ।। आपण गाडिले कुठे झेंडे । आपल्या कापसा किती बोंडे । सगळे विसरून फेकती अंडे । अशावेळी ।। अशाने होते तरी काय । कवी हतोत्साही होऊन जाय । परि अंतरी लागते हाय । कायमची ।। सांगे कवी अशा लोका । दिसताक्षणी तिथेच ठोका । असे जरी प्रसंग बाका । विजयीभव ।।

नाही पुरेसे....

राजेंद्र देवी ·
नाही पुरेसे.... जगात शर्यती खूप आहेत नाही पुरेसे चपळपण सशांचे नको राहूस आळशी ठेव आदर्श कासवांचे चांगुलपणाचे दाखले नुसते नाही पुरेसे दाखवायचे लाव हातभार तू पण जग हे आसवांचे विझण्यास सूर्य नाही पुरेसे ढग पावसांचे नको राहूस कोरडा ढाळ चार दोन थेंब आसवांचे राजेंद्र देवी

त्याची आठवण,

ज्ञानोबाचे पैजार ·
त्याची केव्हाही आठवण आली तरी, सर्वांगावर सरकन् काटा येतो, डोक्यावरचा केस न केस उभा रहातो, आणि थंडीच्या दिवसातही दरदरुन घाम फुटतो, अंधारलेल्या डोळ्या समोर, नाचतात आकृत्या भेसुर, जिभेला पडते कोरड आणि काना मधून निघतो धुर, कित्येकांना याने लाचार बनवले, भिकारी बनवले, याच्या दहशती मूळे कित्येक पापभिरु दूराचारी झाले, तो आहेच असा भितीदायक, आता पर्यंत भेटलेला सर्वात मोठा खलनायक, मी मी म्हणणा-यांची त्याच्या पुढे टरकायची, नुसत्या आठवणीने कित्येकांची बोलती बंद व्हायची, वर्ष सहा महिन्यातुन तो एकदा कधीतरी यायचा, पण त्याचा बोलबाला मात्र वर्षभर असायचा, किती उपाय झाले, नवस झाले सायास झाले, पण याच्या समोर

तर्राट झालं जी...

सायकलस्वार ·
खुळखुळ वाजं खिशातऽऽ भलतंच खुललंया आज... बायकुचं चुकवून ड्वाळं… सुमडीत गाठलंया बार अन् झनानलंऽऽऽ बाटल्यामंदीऽऽऽ अन ग्लासातनं व्हटात गेलं जी तर्राट झालं जीऽऽ... तर्राट झालं जीऽऽऽऽ... तर्राट झालं जीऽऽऽऽऽऽ.... झिंगून गेलंया सारंऽऽ त्वंडाचं सुटलंया घाण अल्लद झेपावल्यालंऽऽ आभाळामंदी विमान.. ग्यलं व्हटातनं..

< < < < मजबूरी हय > > > >

चांदणे संदीप ·
मिकादा, पैजारबुवा, अभ्यादादा आऊर रातराणीतै के पिच्चे पिच्चे मै भी कस्काय चल पड्या कायच म्हैती नाही. पन मेरा भी जळके करपा मस्सालाभात हुवा इस्लीये मयनेभी हिन्दिक्की चिंदी करनेका ठाणच डाल्या. मंग काय...एक आय अपने पोरट्याको कयसे धोपातटी हय वैच्च चित्र कविता मे उतारके इद्दर डालरा हू!

नाडलेल्या लोकांची कहाणी .............

माम्लेदारचा पन्खा ·
मागून मागून थकलेली माणसं आली कोणी , उतरले तोंड डोळा सुटलेले पाणी ला ला ला ला , ला ..ला ला गेलेच आहेत पैसे आता खिशात काही नाही पैसे कुणा मागू आता मला कोण देई बडबडत बसतो सारखा गेले पैसे पाण्यात व्याज गेले माझे तरी मुद्दल द्या हातात सांगायची आहे माझ्या शहाण्या मुला नाडलेल्या लोकांची ही कहाणी तुला ..... ला ..ला ला ला ला , ला ..ला ला ला ला....

(जालाचे भामटं)

स्वामी संकेतानंद ·
जालाचे भामटं माझे घरीं प्रकटले। अवघेचि जालें पैसे गुल।। १।। साईटीचे कपट करुनी फसवलें अकाउंट देखिलें भागाकार गे माये।।२।। रोज बसून पूनम बारू सहज 'नीटु' प्याला। कधी ढोसियला खंबाकारे।।३।। -- स्वामी संकेतानंद, १७ फ़ेब्रुवारी, २०१५

संक्रांत

सुधीर वैद्य ·
संक्रांत आणखीन एक वर्ष सरले. थंडी घेऊनच नवीन वर्ष अवतरले. गार हवेची शाल लपेटून माणसाचे मन सुखावले. गार झुळकेने पतंग प्रेमी आनंदले. तीळ - गुळाच्या गोड वासानी पोटच भरले. संक्रांतीचे दागिने घडले. नवीन नवरीला त्याचेच अप्रूप झाले. जावईबुवा हलव्याचा हार आणि नारळ मिळणार म्हणून खुश झाले. फोटो काढले , आधी हलव्याच्या दागिन्यांचे आणि मग मुलगी -जावयाचे. आणखीन एक सण पार पडला म्हणून सासूबाईनी हुश्य म्हटले. संक्रांतीचा सण आला आणि गेला. दरवर्षीच येतो आणि जातो. पतंग उडवले जातात आणि कापले पण जातात. पतंग कधी कागदाचे असतात तर कधी स्वप्नांचे . कधी तरी माणसावर संक्रांत कोसळते.