मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वयास माझ्या पैंजण घालित....

शिव कन्या ·

यशोधरा 05/09/2019 - 17:56
वा!
डोळ्यांवरती जरा खालती ग्रहण हवे मज चंद्राचे त्या ग्रहणाला मोक्ष नसावा, केवळ अनुभव साक्ष असावा पोटामधले उदंड पाणी खळखळ अवघी डोळ्यांमधली एक मोजता दुजी उठावी लाट बोलकी मिटून जावी
सुंदर.

खिलजि 07/09/2019 - 17:58
कसे सावरू वयास माझ्या , तारुण्याचे वरदान कुठे ? रंगवून टाकल्या सफेद झालरी , काळा रंग लपला कुठे ? झिडकारुनी त्या वार्धक्क्यास , ठेवले माझे मन कोवळे मोतीबिंदूही हिरवे झाले , जीवन सोन्याहुनी पिवळे

जॉनविक्क 12/09/2019 - 12:21
आता तो फक्त एक बागुलबुवा होता असे वाटते. आता सगळ्याच बाबतीत फक्त साक्षीदार या नात्याने जोडला जातो (आणि या साक्षीभावाचे प्रयोजन काय इतकाच विचार मनात असतो,) कारण नाविन्य असे काही नाहीच. वार्धक्य इतरांचे जवळून पाहिलेले म्हणून तेही अपेक्षितच अन... बालपण, तरुणपण स्वतःच अनुभवलेले म्हणून ते ही ताजे नाही. त्यामुळे हा साक्षीभाव पोसून करायचे काय, टाळून करायचे काय हा एक प्रश्नच आहे ? अर्थात शोध चालूच ठेवला की उत्तरे मिळतात खरी :)

यशोधरा 05/09/2019 - 17:56
वा!
डोळ्यांवरती जरा खालती ग्रहण हवे मज चंद्राचे त्या ग्रहणाला मोक्ष नसावा, केवळ अनुभव साक्ष असावा पोटामधले उदंड पाणी खळखळ अवघी डोळ्यांमधली एक मोजता दुजी उठावी लाट बोलकी मिटून जावी
सुंदर.

खिलजि 07/09/2019 - 17:58
कसे सावरू वयास माझ्या , तारुण्याचे वरदान कुठे ? रंगवून टाकल्या सफेद झालरी , काळा रंग लपला कुठे ? झिडकारुनी त्या वार्धक्क्यास , ठेवले माझे मन कोवळे मोतीबिंदूही हिरवे झाले , जीवन सोन्याहुनी पिवळे

जॉनविक्क 12/09/2019 - 12:21
आता तो फक्त एक बागुलबुवा होता असे वाटते. आता सगळ्याच बाबतीत फक्त साक्षीदार या नात्याने जोडला जातो (आणि या साक्षीभावाचे प्रयोजन काय इतकाच विचार मनात असतो,) कारण नाविन्य असे काही नाहीच. वार्धक्य इतरांचे जवळून पाहिलेले म्हणून तेही अपेक्षितच अन... बालपण, तरुणपण स्वतःच अनुभवलेले म्हणून ते ही ताजे नाही. त्यामुळे हा साक्षीभाव पोसून करायचे काय, टाळून करायचे काय हा एक प्रश्नच आहे ? अर्थात शोध चालूच ठेवला की उत्तरे मिळतात खरी :)
शुभ्र रुपेरी हव्यात लाटा बटाबटांच्या डोक्यावरती नकोच तेव्हा काळीकुरळी बट डोळ्यावर सळसळणारी शेलाटीशी रेघ वक्रशी हातावरती उमटून जावी टिचकी मारून गिरकी घेता झोका माझा खाली यावा डोळ्यांवरती जरा खालती ग्रहण हवे मज चंद्राचे त्या ग्रहणाला मोक्ष नसावा, केवळ अनुभव साक्ष असावा नाजुक साजुक पेरांवरती खोडावरचे रिंगण यावे साल कोवळी मधुमासाची गंध फुलांचा उडून जावा पोटामधले उदंड पाणी खळखळ अवघी डोळ्यांमधली एक मोजता दुजी उठावी लाट बोलकी मिटून जावी पाठीवरच्या पानावरचा रंग केशरी विराट व्हावा त्यावर हलते माळ मण्यांची ताठ कण्याची पाठ रहावी हळुच यावे जरा बसावे आस्ते आस्ते कवेत घ्यावे वयास माझ्या

पाणी-च-पाणी

बी.डी.वायळ ·

खिलजि 04/09/2019 - 14:48
अरे कोसळतोयस , पड धुवांधार अजुन होऊन देत त्या मुसळधार धारांच्या तलवारी बुडवून टाक , तुझ्या वखवखलेल्या असुयेत कैक दीपक , उज्वल भवितव्याचे आणि मायेचे फक्त जीवनच तर मागितले होते आज कैक बळी घेऊनही तुझी भूक शमत नाही तरीही लढतायत आणि पुढेही लढत राहतील हि बळीची पिल्ले घामाच्या चिलखताला तुझ्या तलवारी कापू नाही शकत तुझ्या तलवारीची धार , त्या घामात भिनते आणि पुन्हा देते अभेद्य ताकद , जा जाऊन सांग निरोप त्या महादेवाला निर्माण , सर्वनाश , उत्पत्ती, प्रकोप सर्वांचाच कारक तू आज जी बीजे आमच्यात रोवली गेली आहेत ती सहजासहजी तुटणारी नाही आहेत तण आत खोलवर रुजलेले आहेत आणि प्रत्येक प्रकोपात ते जवळ येत जातील बनेल मग एक दिमाखदार डेरेदार कल्पवृक्ष ज्याच्या छायेत मग तुलाही रममाण व्हावंसं वाटेल

खिलजि 04/09/2019 - 14:48
अरे कोसळतोयस , पड धुवांधार अजुन होऊन देत त्या मुसळधार धारांच्या तलवारी बुडवून टाक , तुझ्या वखवखलेल्या असुयेत कैक दीपक , उज्वल भवितव्याचे आणि मायेचे फक्त जीवनच तर मागितले होते आज कैक बळी घेऊनही तुझी भूक शमत नाही तरीही लढतायत आणि पुढेही लढत राहतील हि बळीची पिल्ले घामाच्या चिलखताला तुझ्या तलवारी कापू नाही शकत तुझ्या तलवारीची धार , त्या घामात भिनते आणि पुन्हा देते अभेद्य ताकद , जा जाऊन सांग निरोप त्या महादेवाला निर्माण , सर्वनाश , उत्पत्ती, प्रकोप सर्वांचाच कारक तू आज जी बीजे आमच्यात रोवली गेली आहेत ती सहजासहजी तुटणारी नाही आहेत तण आत खोलवर रुजलेले आहेत आणि प्रत्येक प्रकोपात ते जवळ येत जातील बनेल मग एक दिमाखदार डेरेदार कल्पवृक्ष ज्याच्या छायेत मग तुलाही रममाण व्हावंसं वाटेल
असा कसा हा पाऊस | पडला बेधुंद होऊन, कित्येकांचे संसार , गेले पाण्यात वाहून | शंभर वर्षाचा त्याने, म्हणे रेकॉर्ड मोडला | जणु फाटले आकाश, असा पाऊस पडला | सरला श्रावण मास, भाद्रपद सुरु झाला | तरी ही पावसाचा, जोर कमी नाही झाला | किल-बिलती पाखरे, कशी झाली ओलीचिंब | परी कधी नाही केली, त्यांनी कुठे बोंबाबोंब | मिळेना खेळायला, मैदाने झाली ओली | कंटाळुन गेली ती, शाळेतील मूल-मुली | पडला पाऊस बेभान, पिके पाण्यात बुडाली | शेतकरी बांधवाची, झोप रात्रीची उडाली | चारतात गाई दूर, त्या रानमाळावर | येती पावसाच्या सरी, घेती आपल्या अंगावरी | रानातील पशु-पक्षी, कापतात थर थर | थंडी पावसात नाही , त्यांना उब

पाय सरावले रस्त्याला

पाषाणभेद ·
-: पाय सरावले रस्त्याला :- मी चाललो, चाललो इतका की रस्ता ओळखीचा झाला दुसरी वाट धरावी तर पाय सरावले रस्त्याला ||ध्रू|| खाच खळगे नेहमीचे झाले नवे नव्हते वाटले अडथळे तसेच होते पायात काटे खुपसले काट्यांनी तरी जावे कोठे त्यांना कोण सोबती मिळाला? पाय सरावले रस्त्याला ||१|| अडचणी अनंत आल्या उभ्या राहील्या समोर नेट लावून सामोरी गेलो प्रश्न अनेक पुढे कठोर जंजाळ पसरले समोर असता एक पक्षी अचूक उडाला पाय सरावले रस्त्याला ||२|| "कसा आहेस तू ठिक आहेस ना?" "मदत लागली काही तर मी तयार आहे ना!" ना कुणी अशी उभारी दिली काय करायचे त्या ओळखीला? पाय सरावले रस्त्याला ||३|| मीच माझी केली मदत मग हात केला मलाच

संध्याकाळी तू गंगेतीरी

शिव कन्या ·

In reply to by जॉनविक्क

शिव कन्या 01/09/2019 - 20:09
समुद्र आपली मर्यादा ओलांडून वाट शोधेल का? नाही. गंगा कधी उलटी वाहील का? नाही. पण तिला वाटते हे असे अघटीत काहीतरी घडावे, आणि त्याची भेट व्हावी.

संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस..... मला सांग ना तुलाही असेच वाटते ना कुठूनतरी समुद्राने वाट काढावी नाहीतर गंगेने पदर उलटा करावा चार व्याकुळ डोळ्यांत प्रलय व्हावा... खास. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by जॉनविक्क

शिव कन्या 01/09/2019 - 20:09
समुद्र आपली मर्यादा ओलांडून वाट शोधेल का? नाही. गंगा कधी उलटी वाहील का? नाही. पण तिला वाटते हे असे अघटीत काहीतरी घडावे, आणि त्याची भेट व्हावी.

संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस..... मला सांग ना तुलाही असेच वाटते ना कुठूनतरी समुद्राने वाट काढावी नाहीतर गंगेने पदर उलटा करावा चार व्याकुळ डोळ्यांत प्रलय व्हावा... खास. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस..... मला घेऊन चल तिच्या वळणदार लाटांवर लोटून दे तिच्या केशरी दिव्यांच्या लयीवर सोडून दे तिच्या पोटातल्या भोवऱ्यात घेऊन ये तो झुरणारा शेला पाण्यात संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस.... तुझ्याकडे तोंड करून खळखळून हसू दे बघू देत लोकांना देवांना साधुंना माझ्या हातातले पाणी तुझ्या हातातून तिच्या देहात लयदार मिसळताना.....

शोक कुणाला? खंत कुणाला?

शिव कन्या ·

माहितगार 25/08/2019 - 21:36
पु. शि. रेग्यांच्या सावित्री मध्ये घरट्यांचा उल्लेख दोनदा येतो. पहिला संघर्षाचा मन विषण्ण करणारा दुसर्‍यांदा येतो तेव्हा निसर्गचक्र त्याच्या क्रमाने हळुवारपणे पुर्वव्रत झालेले असते जे वाचकाला आश्वस्त करते.

सध्या अमेझॉन जंगलात लागलेल्या आ़गीच्या ( वणवा) पार्श्वभुमीवर कवितेची दाहकता अधिकच जाणवते आहे . __/\__.

माहितगार 25/08/2019 - 21:36
पु. शि. रेग्यांच्या सावित्री मध्ये घरट्यांचा उल्लेख दोनदा येतो. पहिला संघर्षाचा मन विषण्ण करणारा दुसर्‍यांदा येतो तेव्हा निसर्गचक्र त्याच्या क्रमाने हळुवारपणे पुर्वव्रत झालेले असते जे वाचकाला आश्वस्त करते.

सध्या अमेझॉन जंगलात लागलेल्या आ़गीच्या ( वणवा) पार्श्वभुमीवर कवितेची दाहकता अधिकच जाणवते आहे . __/\__.
हरिण शावक हत्ती चित्ते, सळसळ धावे नाग सर्पिणी धडधड धडधड रान पेटते...... शोक कुणाला? खंत कुणाला? चोची माना तुटल्या ताना,भकभक काळे पंखही जळती लपलप लपलप ज्वाला उठती...... शोक कुणाला?खंत कुणाला? पिंपळ कातळ खोड पुरातन, चट्चट् जळते गवत कोवळे भडभड भडभड पाने रडती.... शोक कुणाला? खंत कुणाला? पिले पाखरे भकास डोळे, हा हा करती समूह भाबडे चरचर चरचर डोळे झरती...... शोक कुणाला? खंत कुणाला? कुणी लावली कशी लागली, आग शेवटी जाळ काढते करकर करकर शाप जीवांचे, थरथर.... इथवर ऐकू येते..... -शिवकन्या

देवघर

शिव कन्या ·

जॉनविक्क 19/08/2019 - 22:39
फक्त ही सांस्कृतिच आता परकी वाटावी इतका बदल स्वत: मधे झालेला असल्याने, संपूर्ण वृध्दत्व येत नाही तोपर्यंत हे काव्य काळजाला भिड़ेल असे वाटत नाही.

In reply to by जॉनविक्क

माहितगार 24/08/2019 - 09:07
सहज सुचलेला एक विचार देवघर शेवटी एक आदर्शांचा श्रद्धायुक्त अल्बम असते का ? देवघरात नव्या श्रद्धांचे नवे देव जोडल्यास ? लोक तसे न ठरवताही करतच असतात, सांस्कृतिक समस्येचे निदान होत असेल तर ठरवून नवे अल्बम बनवून घेण्यास काय हरकत असावी.

In reply to by माहितगार

जॉनविक्क 24/08/2019 - 12:52
आवेनजर्स वास्तव्यास आहेत ना. उद्या तिथं रामकृष्ण परमहंसही असू शकतील. बस देवघर रिकामे नसावे इतकेच काय ते आवश्यक, अर्थात तसे ते कधीच नसते पण नास्तिकतेचा माजोरडेपणा तो भासही निर्माण करतो कधी कधी

In reply to by जॉनविक्क

सर टोबी 24/08/2019 - 15:00
हे काय असतं? माजोरडेपणा हा जर पाशवी शक्तीचा अविष्कार असेल तर नास्तिकांकडे ती कोणत्या स्वरूपाची असते? त्या उलट श्रद्धेची दुकानदारी करणारे आणि नास्तिक यांच्या युद्धामध्ये नास्तिकांच्याच आहुत्या पडल्या आहेत. नास्तिकता म्हणजे श्रद्धेचा अभाव असे नसावे. अन्यथा दररोजच्या व्यवहारात विश्वास ठेवणारे सर्वच जण श्रद्धाळू असायला हवे. पण तसे नसते. नास्तिक आपल्याला आपल्यातीलच विरोधाभासाची आठवण करून देतात. एकीकडे मोठ्याने ओरडून केलेल्या प्रार्थनेपेक्षा मूक आक्रोश देवाला ऐकू येतो असे म्हणायचे, मुंगीच्या पायात चाळ बांधला तरी देवाला तो ऐकू येतो असे म्हणायचे आणि ठणाणा करणाऱ्या आरत्या आणि काकड आरत्या करीत लोकांची झोपमोड करणे, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना त्रास होईल असे वागायचे हे 'सो कॉल्ड' नास्तिकच तुम्हाला सांगतात.

खिलजि 20/08/2019 - 15:21
मस्त लिवलंय .. जुन्या आठवणी जाग्या झाल्या .. खासकरून कोकणातल्या घराच्या .. मी महिन्यात आम्ही सर्व भावंडे तिथे अंगणात सर्व स्तोत्रे म्हणायचो .. मला वाटत दहा पंधरा वर्षे तिथे आम्ही दरवर्षी दंगा करायचो पण आता सर्व जण शहरात स्थायिक झाले आणि ते भलेमोठे घर , त्यासमोरच अंगण , वृंदावन असेच ओस पडले आहे .. तिथे तुळस लावली जाते पण ती फक्त गणपतीत आणो होळीच्या सणालाच.. नाहीतर तिथे पूर्ण शुकशुकाट असतो ... कधी पुन्हा उजळेल सारे ? कधी उतरतील त्या अंगणात तारे ? कधी भिनेल गगनात स्तोत्र ध्वनी ? कधी बैसेल ती अनोखी पंगत पुन्हा अंगणी ? तूच तर आहेस त्या सर्वांचा उदगाता निर्माता तूच घडविलेस सर्व पसारे अन नजारे तूच दिलेस कैक आशीर्वाद तूच दिल्या या अनमोल ठेवी आम्हा लोचनी पुढारलो कि सुधारलो ते तूच जाणे पण मी अजूनही तिथेच लोळतो जिवंतपणी दे , कधीतरी पुन्हा दे करून जवळ त्या भूतकाळाला ओढ अनामिक ती हृदयात कायम राहिली

नाखु 20/08/2019 - 20:54
निव्वळ अफलातून आहे. समजतेय असं वाटेपर्यंत निसटतेय आणि निसटताना समजतेय अशी अवस्था झाली आहे. मिपावर बाजूनेच निसटणारा सरधोपट वाचकांची पत्रेवाला नाखु

माहितगार 24/08/2019 - 08:25
कविता आवडली, नीटशी समजण्यासाठी बर्‍याचदा वाचावयास लागली (की अजून नीटशी समजली नाही असा प्रश्नही मनात येऊन गेला.)

In reply to by जालिम लोशन

माहितगार 24/08/2019 - 10:05
मला दोन रूपकांची शक्यता जाणवतेय - एक 'आज्जी किंवा आजोबा' या व्यक्तीरेखेचे किंवा दुसरे खूप काही वेगळे रूपक जाणवतयं -शिवकन्येनीच लिवल्यावर काय?-(स्पष्ट बोलण्याची हिम्मत नै बा आपल्यात) ज्याचे रूपक असेल ते अप्रतिम हे नक्की

जॉनविक्क 19/08/2019 - 22:39
फक्त ही सांस्कृतिच आता परकी वाटावी इतका बदल स्वत: मधे झालेला असल्याने, संपूर्ण वृध्दत्व येत नाही तोपर्यंत हे काव्य काळजाला भिड़ेल असे वाटत नाही.

In reply to by जॉनविक्क

माहितगार 24/08/2019 - 09:07
सहज सुचलेला एक विचार देवघर शेवटी एक आदर्शांचा श्रद्धायुक्त अल्बम असते का ? देवघरात नव्या श्रद्धांचे नवे देव जोडल्यास ? लोक तसे न ठरवताही करतच असतात, सांस्कृतिक समस्येचे निदान होत असेल तर ठरवून नवे अल्बम बनवून घेण्यास काय हरकत असावी.

In reply to by माहितगार

जॉनविक्क 24/08/2019 - 12:52
आवेनजर्स वास्तव्यास आहेत ना. उद्या तिथं रामकृष्ण परमहंसही असू शकतील. बस देवघर रिकामे नसावे इतकेच काय ते आवश्यक, अर्थात तसे ते कधीच नसते पण नास्तिकतेचा माजोरडेपणा तो भासही निर्माण करतो कधी कधी

In reply to by जॉनविक्क

सर टोबी 24/08/2019 - 15:00
हे काय असतं? माजोरडेपणा हा जर पाशवी शक्तीचा अविष्कार असेल तर नास्तिकांकडे ती कोणत्या स्वरूपाची असते? त्या उलट श्रद्धेची दुकानदारी करणारे आणि नास्तिक यांच्या युद्धामध्ये नास्तिकांच्याच आहुत्या पडल्या आहेत. नास्तिकता म्हणजे श्रद्धेचा अभाव असे नसावे. अन्यथा दररोजच्या व्यवहारात विश्वास ठेवणारे सर्वच जण श्रद्धाळू असायला हवे. पण तसे नसते. नास्तिक आपल्याला आपल्यातीलच विरोधाभासाची आठवण करून देतात. एकीकडे मोठ्याने ओरडून केलेल्या प्रार्थनेपेक्षा मूक आक्रोश देवाला ऐकू येतो असे म्हणायचे, मुंगीच्या पायात चाळ बांधला तरी देवाला तो ऐकू येतो असे म्हणायचे आणि ठणाणा करणाऱ्या आरत्या आणि काकड आरत्या करीत लोकांची झोपमोड करणे, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना त्रास होईल असे वागायचे हे 'सो कॉल्ड' नास्तिकच तुम्हाला सांगतात.

खिलजि 20/08/2019 - 15:21
मस्त लिवलंय .. जुन्या आठवणी जाग्या झाल्या .. खासकरून कोकणातल्या घराच्या .. मी महिन्यात आम्ही सर्व भावंडे तिथे अंगणात सर्व स्तोत्रे म्हणायचो .. मला वाटत दहा पंधरा वर्षे तिथे आम्ही दरवर्षी दंगा करायचो पण आता सर्व जण शहरात स्थायिक झाले आणि ते भलेमोठे घर , त्यासमोरच अंगण , वृंदावन असेच ओस पडले आहे .. तिथे तुळस लावली जाते पण ती फक्त गणपतीत आणो होळीच्या सणालाच.. नाहीतर तिथे पूर्ण शुकशुकाट असतो ... कधी पुन्हा उजळेल सारे ? कधी उतरतील त्या अंगणात तारे ? कधी भिनेल गगनात स्तोत्र ध्वनी ? कधी बैसेल ती अनोखी पंगत पुन्हा अंगणी ? तूच तर आहेस त्या सर्वांचा उदगाता निर्माता तूच घडविलेस सर्व पसारे अन नजारे तूच दिलेस कैक आशीर्वाद तूच दिल्या या अनमोल ठेवी आम्हा लोचनी पुढारलो कि सुधारलो ते तूच जाणे पण मी अजूनही तिथेच लोळतो जिवंतपणी दे , कधीतरी पुन्हा दे करून जवळ त्या भूतकाळाला ओढ अनामिक ती हृदयात कायम राहिली

नाखु 20/08/2019 - 20:54
निव्वळ अफलातून आहे. समजतेय असं वाटेपर्यंत निसटतेय आणि निसटताना समजतेय अशी अवस्था झाली आहे. मिपावर बाजूनेच निसटणारा सरधोपट वाचकांची पत्रेवाला नाखु

माहितगार 24/08/2019 - 08:25
कविता आवडली, नीटशी समजण्यासाठी बर्‍याचदा वाचावयास लागली (की अजून नीटशी समजली नाही असा प्रश्नही मनात येऊन गेला.)

In reply to by जालिम लोशन

माहितगार 24/08/2019 - 10:05
मला दोन रूपकांची शक्यता जाणवतेय - एक 'आज्जी किंवा आजोबा' या व्यक्तीरेखेचे किंवा दुसरे खूप काही वेगळे रूपक जाणवतयं -शिवकन्येनीच लिवल्यावर काय?-(स्पष्ट बोलण्याची हिम्मत नै बा आपल्यात) ज्याचे रूपक असेल ते अप्रतिम हे नक्की
देवघरातच सोडून आले मंद दिव्यांची सुगंधमाला पहाटवारा श्रावणओला कांत सतीचा तिथे राहिला दिवेलागणी शुभंकरोति करी एकटी तुळशीमाला बोटांमधुनी फिरत जाय ती कालगणाची अजस्त्र माला देव्हाऱ्यावर शांत सावली स्निग्ध घरावर छाया धरते त्या झाडाच्या पानांवरती कृष्णवल्लरी गाणे रचते समईमधल्या दीपकळीवर विझू विझू ते डोळे दिसती मध्यरात्रिला येता आठव देवघरातील विझते वाती हार चंदनी हात जोडुनी जन्म पिढ्यांचा भोगून जातो मागे वळुनी आपणसुद्धा हात सोडुनी भणंग होतो.... -शिवकन्या

माकडांच्या पुढे नाचली माणसे!

गंगाधर मुटे ·

पहिल्याछुट मी तुमचे नाव वाचलेच नाही. मला वाटलं की ही "खिलजी" यांचीच कविता असणार. कारण अशी शिर्षके देण्याची जबाबदारी सध्या त्यांच्याच शिरावर आहे. असो ! बरेच दिवस मिपावर दिसला नाहीत ? जुने सभासद परत आल्यावर आनंद झाला. बाकी शेतकरी साहित्य, चळवळी बद्द्ल बरेच दिवस काही लिहिलं नाही. काहीतरी लिहित चला ना..

In reply to by इरामयी

गंगाधर मुटे 26/07/2019 - 14:55
गझल आहे. त्यामुळे प्रत्येक शेर वेगळ्या अर्थाचा स्वतंत्र शेर आहे. कवितेसारखी एकजिनसी नसल्याने पूर्ण गजलेचा अर्थ लागणार नाही.

पहिल्याछुट मी तुमचे नाव वाचलेच नाही. मला वाटलं की ही "खिलजी" यांचीच कविता असणार. कारण अशी शिर्षके देण्याची जबाबदारी सध्या त्यांच्याच शिरावर आहे. असो ! बरेच दिवस मिपावर दिसला नाहीत ? जुने सभासद परत आल्यावर आनंद झाला. बाकी शेतकरी साहित्य, चळवळी बद्द्ल बरेच दिवस काही लिहिलं नाही. काहीतरी लिहित चला ना..

In reply to by इरामयी

गंगाधर मुटे 26/07/2019 - 14:55
गझल आहे. त्यामुळे प्रत्येक शेर वेगळ्या अर्थाचा स्वतंत्र शेर आहे. कवितेसारखी एकजिनसी नसल्याने पूर्ण गजलेचा अर्थ लागणार नाही.
माकडांच्या पुढे नाचली माणसे! पाहता पाहता काय झाले असे? माकडांच्या पुढे नाचली माणसे! या हवेला कुणाची हवा लागली? चित्त कामामध्ये ना तिचे फारसे त्यांसही वाढ भत्ता दिला पाहिजे मेघही वागती की पगारी जसे नित्य येणे तिचे वादळासारखे मग लपावे हृदय हे कुठे नी कसे? व्यक्त जर व्हायचे, सोड चिंता भिती तू अभय बोल तू, तू हवे तू तसे                  गंगाधर मुटे 'अभय' ==०==०==०= =०==०==०==

तर्काच्या सीमेवर तेव्हा

अनन्त्_यात्री ·

राघव 13/11/2019 - 11:59
छान! तर्कबुद्धीच्या पलिकडे असलेला, एक नवाच रोमांचकारी अनुभव, अवचित येण्याच्या क्षणाचे वर्णन खूप आवडले. :-) दुसरी कविताही त्याचेच वर्णन सांगतेय, होय ना?

राघव 13/11/2019 - 11:59
छान! तर्कबुद्धीच्या पलिकडे असलेला, एक नवाच रोमांचकारी अनुभव, अवचित येण्याच्या क्षणाचे वर्णन खूप आवडले. :-) दुसरी कविताही त्याचेच वर्णन सांगतेय, होय ना?
स्थलकालाचे ताणेबाणे जटिल, चिवट पण तटतट तुटले घालित अवघड नवे उखाणे जडातुनी चैतन्य उमलले सप्तरंग लवथवले, मिटले सप्तसूर झंकारुन शमले भवतालाला भारून काही पुन्हा निवांत झाले तर्काच्या सीमेवर तेव्हा अतर्क्य भेटुनी गेले

दे दे दे दे दे दे

पाषाणभेद ·

सगळी क्रिकेट मॅच नाही पण हायलाईट्स तरी पाहूदे हायलाईट पाहून चालला हात चोळीत अन मोका पाहुन त्यान गाठलं की बोळीत पैजारबुवा,

जास्त वेळ नाही पण थोडा वेळ तरी दे
अपेक्षाच असली दोन तीन मिनिटांची ठेवायची. मग कशाला ती देईल? तुझं तू हायलाईट इमॅजिन कर म्हणत आक्खी मॅचच खेळायला एखाद्या पंजाब्याकडे जाईल ती.

"नवर्‍याचे बायकोस अनावृत्त पत्र" हे दरवेळी क्रिकेट मॅच अगोदर व्हाटस अपवर प्रकाशित होणारे पत्र अगोदरच बायकोला दाखवले असते तर ही कारुण्यपुर्ण कविता लिहायची वेळ आली असती काय ?

सगळी क्रिकेट मॅच नाही पण हायलाईट्स तरी पाहूदे हायलाईट पाहून चालला हात चोळीत अन मोका पाहुन त्यान गाठलं की बोळीत पैजारबुवा,

जास्त वेळ नाही पण थोडा वेळ तरी दे
अपेक्षाच असली दोन तीन मिनिटांची ठेवायची. मग कशाला ती देईल? तुझं तू हायलाईट इमॅजिन कर म्हणत आक्खी मॅचच खेळायला एखाद्या पंजाब्याकडे जाईल ती.

"नवर्‍याचे बायकोस अनावृत्त पत्र" हे दरवेळी क्रिकेट मॅच अगोदर व्हाटस अपवर प्रकाशित होणारे पत्र अगोदरच बायकोला दाखवले असते तर ही कारुण्यपुर्ण कविता लिहायची वेळ आली असती काय ?
दे दे दे दे दे दे दे अगं दे दे दे दे दे दे जास्त वेळ नाही पण एकदा तरी दे जास्त वेळ नाही पण थोडा वेळ तरी दे किती वेळ झाला सारखा हातात घेते तु जशी मालकीण मी पण मालक आहे माझ्याच घरात मला चोरी झाली मालकपणाची शान थोडी तरी दाखवू दे दे दे दे दे दे दे दे सारखं सारखं नवर्याला घालून पाडून बोलते (चाल सोडून:- भाजी आणा, दळण आणा, इस्त्री करा, डबा भरा) महत्वाचे ते काम सोडून इतर कामे करवते वैतागलो मी आता मला विरंगुळा हवा थोडा सारखा रिमोट हातात ठेवते थोडा मला पण दे सगळी क्रिकेट मॅच नाही पण हायलाईट्स तरी पाहूदे दे दे दे दे दे दे दे अगं दे दे दे दे दे दे जास्त वेळ नाही पण एकदा तरी दे जास्त वेळ नाही पण थोड

मी तुझा विचार करते

शिव कन्या ·
मी तुझा विचार करते, मी तुझ्या वयात रमते.... माझे खळाळणारे हसू अनुभवांच्या भोवऱ्यांतून तरून सुशांत जलाशयातल्या शांत स्मितासारखे तुझ्या ओठांशी येऊन थांबेल...... मी तुझा विचार करते, मी तुझ्या वयात रमते......