इंद्रधनू...
निरोप घेताना म्हणालो मी,
माझी आठवण ठेव..
नशिबापुढे हतबल आपण,
जोड्या ठरवतो देव....
क्षणात सारं बदललं तरी,
विसरू कशी तुला..?
तिचे साश्रुपूर्ण नयन,
विचारत होते मला....
निशब्द शांततेत घुमला,
उदास तिचा उसासा..
पण हात हाती घेऊन दिला,
तिनंच मला दिलासा....
केली जरी प्रीती,
पण सोडली नाही नीती..
अपराधासम खंत कशाला,
सोड मनातील भीती....
शब्द असे पडता कानी,
धरिले तिचे पाय..
परमहंस नाही गं मी,
पण तू आहेस शारदा माय....
शेवटच्या त्या भेटीमध्ये,
मनं झाली साफ..
विशाल हृदयाच्या तिनं,
केलं मला माफ....
आयुष्यात आता पुढे जाईन,
बाळगणार नाही तमा..
खूप समाधान देऊन गेली,
तिची अनमोल क्षमा....
भांबावल