श्रावण

काळ्याशार पाटीवर पांढरी शुभ्र रेघ ग्रीष्माच्या पाठीवर काळे काळे मेघ खरपुस ताबुंस मातीवर हिरवी चंद्रकळा प्राजक्ताच्या झाडाखाली मोतीयाचा सडा सुखावली धरती सुखावली मने इवल्या इवल्या रोपानी डुलती हिरवी राने चिंब झाले मन रुंजी घालतो साजण उभा भाऊ दारी म्हणे आला पंचमीचा सण मन पाखरू पाखरू पोचले आईच्या पायाशी डोळ्यात श्रावण भरून उभा साजण दाराशी २९-७-२०२२

अतृप्त ओळी

लेखनविषय:
आत्मसमरूप दिसतात ओळी आत्मस्वरूप असतात ओळी . इथे नदीचा दिसतो काठ तिथे संथ प्रवाह पार लावतात ओळी . निराळ्या वेदनेच्या एकाच गावी दिसता दिसतो आम्ही सहप्रवासी कुठे दूर अंधारात हरवले गाव माझे दिसे मी उगाचच तिथला निवासी असे शब्द साधे येतात साथी कविता त्यातुन वाहते प्रपाती . उरी अंतरी घाव नाजूक खोल वरी दिसते केवळ शांत ज्योती ! आम्ही नाही ऐसे कवी ज्यास म्हणती जशी वेदना ती , तसे शब्द हाती. मनाचेच सारे इथे मांडयाचे .. न पूर्ती मिळे त्यातूनी .. काय त्याचे? असा मी ही अतृप्त अतृप्त आहे . . माझ्या स्वभावी मूळचा शाप आहे .

वसंतात मृगजळ खास

काठावरचे गुपित झेलता अनु'मतीची महत्ता विशेष वसंताचे मृगजळ खास कटी बंधात उष्म निश्वास नभी नाभी ताम्र गोल चा'लते जातो तोल आर्त कुंजन आस पास पर्ण विरहीत पुष्प तटी दाट दिंगबर सुरेख मदन पाझरतो . . . . . . . स्वतःच्याच कवितेच्या विडंबनाचा विचार केला आणि कवितेतला(च) मदन अकस्मिक पाझरला. ;)

रोज किती पाणी प्यावे?

रोज किती पाणी प्यावे? शरीराची गरज असेल एवढे आणि आधुनिक विज्ञानाने सुविद्य डॉक्टर सुचवतील तेवढे रोज किती पाणी प्यावे? अन्न पिकविण्यासाठी शेतीसाठी शिल्लक राहील एवढे रोज किती पाणी प्यावे? शेती आणि शरीरांची गरज यांचे गणित नाही जुळली तर इतर अपव्यय टाळून लोकसंख्या नियंत्रणाचे महत्व ईतर चार जणांना पटवून शरीराची गरज भागेल तेवढे

आठवतो आज पुन्हा...

लेखनविषय:
आठवतो आज पुन्हा माझा गाव माझी माती सारं काही सोडले मी वितभर पोटासाठी. बरसून येती मेघ भिजूनिया जावे चिंब ओंजळीत पावसाचे झेलूनिया घ्यावे थेंब घेवूनिया हाती काठी जात होतो पोरं पोरं माळावरी चरावया घेऊनिया गुरं ढोरं. रानपाखरांच्या जैसे रानिवणी हिंडण्यात किती आठवू ते दिस मौज होती जगण्यात. मग सरले ते दिस हरवले बालपण शहरात पोटासाठी सुरू झाली वणवण. उलटले दिस मास किती काळ गेला पुढं तरी मना अजूनही आहे गवाचीच ओढ. सारं काही छान आहे दिस सरती सुखात जाई मन उडूनिया तरी गावाच्या रानात. https://youtu.be/LKb7VmDPTak

मुखवटे.

लेखनविषय:
काव्यरस
रंग पाण्यास ना, हे तसे चेहरे थांग लागेच ना मन किती गहिरे व्देष माडापरी, प्रेम झाले थिटे चेहर्‍यावर इथे मुखवटे... मुखवटे. पुण्य गेले कुठे, पाप शिरजोर हे सभ्य वेषात या नांदती चोर हे दान देण्या निघे अन जगाला लुटे चेहर्‍यावर इथे मुखवटे... मुखवटे. शब्द फुलापरी मनी निखारा जळे वेष संतापरी हृदयी विषारी तळे लुच्चे फिरती इथे साव गेले कुठे चेहर्‍यावर इथे मुखवटे... मुखवटे.

मराठी भाषा गौरव दिन अभंग

लेखनविषय:
मीही एक वारकरी माय मराठी पंढरी, नतमस्तक होवू तेथे जेथे कवींची पायरी. करु रिंगण सोहळा खेळ शब्दांचा मांडून, शब्दसृष्टीच्या ईश्वरा तेथे करुया नमन. दिव्य सारे अलंकार सजवू आपल्या देवाला, नाचवू दिंड्या पताका गुंफू शब्दांची तुलसीमाला. आपल्या इवल्या पावलांनी चालू मोठ्यांची पायवाट, शब्दसृष्टीचे मायबाप होवो सदा कृपावंत, हजारो वर्षांचा सोहळा रंगतो भाषेचा हा मेळा, चालो समृद्धीच्या वाटे लाभो स्वर्गाच्या कळा. तुझ्या नामाचा ग टिळा लागावा माझ्या माथी, बोल माझा चिमखडा रुजू व्हावा तुझ्या गाथी. तुझ्या ऐश्वर्याचा घडा सजे महाराष्ट्राच्या मनी तुझ्या अमृताचा लाभ घेई माय मराठीचा धनी. २७/०२/२०२२ मराठी भाषा गौर

तुझे गाणे

मी पाऊस झालो सखे तू माती होशील का? स्पर्शाने माझ्या अलगद तू सुगंध होशील ना? मी दरीत येऊन पडलो तू वारा होशील का? शीर्षासन करून मग मी जग पायाखाली घेईल ना. तू रात्र अबोली हो ना मी चंद्र सखा तुज भेटेल. तू पहाट होशील तेव्हा मी तुझ्याच कुशीत झोपेन. सुख बिंदू झेलायला तू गवताचे पाते हो ना. आयुष्याच्या धक्क्यांना मग मी अलगद सोशीत जाईल. जरी विस्कटली घडी जीवनाची तू अशीच हसरी राहशील? मी वचनाने मज बांधून घेतो हे गाणे तुझ्याच साठी गाईल.

अश्रूंचे झरे

लेखनविषय:
काव्यरस
स्वप्न सारे आज पेटले अश्रूंचे झरे डोळ्यांत आटले हृदयात माझ्या गहिरी वेदना जळतो हा प्राण सांगू कुणा पाश अंतरीचे कसे सुटले येते रोज आठवणींचे वादळ थकलेल्या जीवास राहिले ना बळ डोईवरले आभाळ विस्कटून गेले दैव माझे झाले खोटे हातातल्या फुलांचे झाले काटे जुलूम नियतीचे सारे मी झेलले

शब्दांची कर्णफुले

शब्दांची कर्णफुले प्रसन्न सुंदर सुगंधी सकाळी प्रेम बरसले अवचीत अवकाळी नाहत्या ओलेत्या भोर केशांतून थेंब तयाचे अवतरले भाळी ओठी शब्द फुलून आले शब्दांचे मग मोती झाले तु ते हळूवार उचलूनी घेत कर्णफुलांसम कानी ल्याले (मिपाच्या यंदाच्या दिवाळीअंकासाठी काही उत्पादन करावे म्हणून या शब्दफुलांचे उत्पादन घेतले होते. पण आम्हा शब्दशेतकर्यांच्या मनाच्या गोदामात अनेक प्रकारचा लगोलग नष्ट पावणारा पण भरघोस उत्पन्न मिळणारा माल तयार होत असल्याने आहे ते उत्पादीत शब्दपीक मिपाच्या साहित्य मंडईइत विकायला ठेवले आहे.
Subscribe to माझी कविता