निष्पाप कळी तुटताना गहिवरली संध्याराणी
हलक्याच प्रकाशामध्ये डोळ्यांतुन झरले पाणी
पानांची सळसळ नाही थिजलेली अवघी सृष्टी
अन् उनाड वेडा वारा निमिषातच झाला कष्टी
थरथरल्या दुःखी फांद्या भ्रमरांची खंडीत गाणी
संध्येच्या ह्रदयामधली अगतिकता पानोपानी
अनिवार बुडाल्या शोके लतिकाही लेकुरवाळ्या
कोमेजुन झुकल्या खाली सुंदरशा उंच डहाळ्या
फुललेली हजार पुष्पे आक्रंदती मुक बिचारी
नटलेल्या वनराईच्या ही कशी अवकळा दारी
विणलेली अपार स्वप्ने संध्येने कळीच्याभवती
दुष्टांच्या पुरवित मोहा नियतीला पर्वा नव्हती
गतिमान परि काळाची अविरत धावती चाके
सारुन पुन्हा तिमिराला तेजोमय प्रकाश फाके
संध्येची बनली रजनी उधळीत तमाच्
शार्दूलपंत, मिपाचे 'बालकवि'
In reply to शार्दूलपंत, मिपाचे 'बालकवि' by अभ्या..
मान गाये उस्ताद !
In reply to शार्दूलपंत, मिपाचे 'बालकवि' by अभ्या..
अभिजीतदादा आणि फुत्कार, मनापासुन आभार !!
वा!
छान कविता !
ह्रदयस्पर्शी रचना!
धन्यवाद !!
अतिशय सुरेख.
>>>पानांची सळसळ नाही थिजलेली
थोड्याशा फेरफारांनंतर कविता उत्कृष्ठ झालीये !
धन्यवाद मंडळी !
@शोधुन नव्यात स्मृतींना ही
मस्त....
खरंच!! शब्द नाहीयेत कौतुकाला !!
सुंदर लिहीलीये कविता.
सर्वांचे हार्दिक आभार !!
किती सुरेख! पुन्हा पुन्हा
खूप छान, मस्त जमून आलीये!
धन्यवाद प्राचीजी आणि प्रसाद !
खूपच सुरेख !!!
कवी मन दिसतंय !
कवी मन दिसतंय !
छानच!
सर्वांचे आभार !! __/\__