अज्ञाताचा गड चढताना

लेखनविषय:
काव्यरस
अज्ञाताचा गड चढताना अशी पायरी आली तर्कबुध्दी थकुनिया त्यावरी विश्रांतिस्तव बसली उठून गड बेलाग लांघण्या कंबर कसुनी उठली निरीक्षणाची, निष्कर्षाची वाट पकडुनी चढली जिथे संपली वाट त्या तिथे काहीतरी लखलखले त्या तेजातच अज्ञाताचे नवेच दर्शन घडले

गर्भार सातव्या महिन्याची

जिच्यासाठी झटून दिनरात दिली परीक्षा प्रीतीची आज भेटली ती, होऊन गर्भार सातव्या महिन्याची! मावळला ध्यास, गळाली आस गळ्यापाशी कोंडला श्वास म्हणतील मामा, तिची लेकुरे भीती मला त्या नात्याची! क्षण पदोपदी झुरण्याचे नकळत मागे फिरण्याचे आता आठवती ते खर्च आणि उसनवार मित्रांची! आता काय, शोधू दुसरी तीही नसेल तर तिसरी करणार काय, मुळातच आहे, बागेत गर्दी फुलांची! - संदीप चांदणे

गुरू

लेखनविषय:
काव्यरस
कठिण,गहन,भेदक प्रश्नांचे चिंतन ज्यांना मोहविते त्यांच्या प्रतिभेची प्रत्यंचा इंद्रधनूसही वाकविते जटिल समस्या त्यांच्या हाती पडता सरळ,सुलभ होते विभिन्न अस्फुट पैलूंमधले नाते अलगद उलगडते आदिम अनघड पत्थरातही सुबक शिल्प त्यांना दिसते केवळ प्रज्ञा-स्पर्शे त्यांच्या हीणाचे सोने बनते

असाव कोणीतरी

आयुष्यात कोणाची तरी साथ असणं खूप गरजेचं असत म्हणून कोणीतरी आपल्यासोबत कायम असाव त्याच वर्णन मी या कवितेत केल आहे. तुम्हाला ही कविता कशी वाटली हे तुम्ही कंमेंट ने कळवू शकता. https://www.truptiskavita.com

मेघ बरसला

लेखनविषय:
काव्यरस
मेघ बरसला विरही अश्रूंचा खारा खारा. मेघ बरसला प्रथम आषाढी प्रिय वार्तेचा. मेघ बरसला माळात रानात काळा काळा. मेघ बरसला भिजली धरणी हिरवी हिरवी.

मेघ बरसला

लेखनविषय:
काव्यरस
मेघ बरसला विरही अश्रूंचा खारा खारा. मेघ बरसला प्रथम आषाढी प्रिय वार्तेचा. मेघ बरसला माळात रानात काळा काळा. मेघ बरसला भिजली धरणी हिरवी हिरवी.

वाया गेलेली कविता

प्रहर चालला तो दुपारचा त्यातून घन आलेले दाटून दमट जराशी हवा पसरली लपाछपी खेळतसे ऊन दूर कुठे तो बसून रावा घालीत होता किर किर शीळ उदास होते आयुष्य झाले सरता सरेना आजची वेळ अशाच वेळी बसून एकटा हळूच असे तो निरखत तिजला एक भेंडोळे एक लेखणी होता हाती घेऊन बसला काही अंतरावर ती होती घागर बुडवीत पाण्यामध्ये रेखीव काया लवचिक बांधा वर्ण गोमटा कपडे साधे तिला ना होती जाणीव त्याची गुणगुणतसे आपल्या तंद्रीत आडोशास तो बसला होता काही खोडीत काही लिहीत घागर भरुनी ती निघताना याची लेखणी थांबे पुरी शीळ घालुनी तिज तो बोले तुजवर लिहिले हे वाच सुंदरी निघे गुलाब मग खिशातुनी जशी ती एकेक ओळ वाचता जरा थांबुनी मग ती वद

खरी वाटते, पूरी वाटते

लेखनविषय:
खरी वाटते, पूरी वाटते, जवळ असून ती दूरी वाटते भितो तुला मी, नको मजवरी ऐशी रागावूस प्रिये क्षणभर समशेरीसम मजला तुझ्या हातची सूरी वाटते हरेक सुंदरी समोर असता, हीच फक्त माझ्यासाठी पण हवेत विरते, कणी न उरते, जातच ही कर्पूरी वाटते सारे लिहिले, तारे लिहिले, शेवट ना परी मनासारखा तुझे नाव टाळतो म्हणूनच गोष्ट जरा अधुरी वाटते तू असताना सुचे न काही, आठवांनी पण भरे वही काय करू मी? हाय!

बांडगूळं

काव्यरस
बांडगूळं आधीही दिसायची… पण, ती रानात. राईतल्या भल्याथोरल्या झाडांवर… ....जुन्या खोडांवर. आता मात्र ती दिसतात अगदी कुठेही… म्हणजे... रोपांवर वगैरे. इथपर चाललं असतं पण आता ती यायला लागलीत तणांवर.. माजलेल्या… …विचारांच्या तणांवर! संदीप चांदणे (११/६/२०१८)

ये रे ये रे पावसा

लेखनविषय:
काव्यरस
मोरांपासून बेडकांपर्यंत सारे आकाशाकडे डोळे लावून बसलेयत तुझ्या वर्षावात चिंब व्हायला अभिजात कवींपासून र ट फ शब्दजुळार्‍यांपर्यंत सगळे टपलेयत तुझी रिमझिम अन् आपापल्या उबळी शब्दात कोंबायला बकाल महानगरातली पाताळधुंडी माणूसगिळी मॅनहोलं कचरतायत तुझ्या ढगफुटीत तुंबायला. यंदा तरी भरभरून येशील? बघ, तुझ्या आशेवर तर पार भेगाळलेला शेतकरी तयार आहे पुढच्या दुष्काळापर्यंत आत्महत्या लांबवायला.
Subscribe to माझी कविता