मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

झाडावर पाखरू बसलं : लावणी

गंगाधर मुटे ·

नाखु 29/08/2016 - 15:30
लिखाण, एखादा चाल लावणारा सापडला तर ताल-लयीत घुमवील या लावणीला. जुने जाणते प्रमोदकाकांनी लावली असती चाल.

नाखु 29/08/2016 - 15:30
लिखाण, एखादा चाल लावणारा सापडला तर ताल-लयीत घुमवील या लावणीला. जुने जाणते प्रमोदकाकांनी लावली असती चाल.
झाडावर पाखरू बसलं : लावणी

पाडाशी आला आंबा बघुनी
आभाळ खुदू खुदू हसलं
चोच टोचण्यास पोपट बघतंय
टक लावून एकतार टपलं
कुणी तरी याssss गं
पोपट धराssss गं
माझ्या धीराचं अवसान खचलं
गं बाई माझ्याsssss
झाडावर पाखरू बसलं ...||धृ||

आडून येती, झाडून येती
चहुबाजूला थवेच दिसती
लगट करुनी झोंबाझोंबी
पानाच्या आडोशाला धसती
चोचटोचुनी चोची चरती
माझ्या फळांची खादल करती
कुणी तरी याssss गं
अलग कराssss गं
माझं काळीज चोळीत थिजलं

परतून ये तू घरी

गंगाधर मुटे ·

चतुरंग 01/08/2016 - 00:03
अगदी नादमय झाली आहे! :) कविता इतकी सुंदर आहे की अधिक चांगली व्हावी असे वाटल्याने छिद्रान्वेष - नाग, चिचुंद्री बिळात घुसले पक्षी पिंपळावरती बसले इथे दुसर्‍या ओळीत मात्रा १६ असल्या तरी लय जाते आहे, विहग पिंपळावरती बसले असा किंचित बदल केलात तर कसे राहील? शिवार भिजले, तरूवर निजले अश्रू पिऊनी बुबुळं थिजले तसेच इथेही किंचित लय जाते आहे अश्रू पिऊनी लोचन थिजले असा बद्ल कसा वाटेल? (किंचितकवी)रंगा

पैसा 01/08/2016 - 11:11
कविता आवडली. पण सगळ्या रोमँटिक वातावरणात बुरुज, चिचुंद्री, बुबुळ या शब्दांनी जरा रसभंग होतो आहे.

चतुरंग 01/08/2016 - 00:03
अगदी नादमय झाली आहे! :) कविता इतकी सुंदर आहे की अधिक चांगली व्हावी असे वाटल्याने छिद्रान्वेष - नाग, चिचुंद्री बिळात घुसले पक्षी पिंपळावरती बसले इथे दुसर्‍या ओळीत मात्रा १६ असल्या तरी लय जाते आहे, विहग पिंपळावरती बसले असा किंचित बदल केलात तर कसे राहील? शिवार भिजले, तरूवर निजले अश्रू पिऊनी बुबुळं थिजले तसेच इथेही किंचित लय जाते आहे अश्रू पिऊनी लोचन थिजले असा बद्ल कसा वाटेल? (किंचितकवी)रंगा

पैसा 01/08/2016 - 11:11
कविता आवडली. पण सगळ्या रोमँटिक वातावरणात बुरुज, चिचुंद्री, बुबुळ या शब्दांनी जरा रसभंग होतो आहे.
परतून ये तू घरी

मेघ गुंजले, पवन रुंजले
आतूर झाल्या सरी
राजसा! परतून ये तू घरी॥

सूर्य, तारका, क्षितिज झाकले
किर्र ढगांनी गगन वाकले
गडगड होता बुरुजाभवती
धडधड भरली उरी
राजसा! परतून ये तू घरी॥

नाग, चिचुंद्री बिळात घुसले
पक्षी पिंपळावरती बसले
कडकडता बघ वीज नभाला
थरथरले गिरी-दरी
राजसा! परतून ये तू घरी॥

शिवार भिजले, तरूवर निजले
अश्रू पिऊनी बुबुळं थिजले
हिरमुसले बघ गायवासरू
अन् गहिवरली ओसरी

रे गझलाकारा, आवर तुझे दुकान...

मोदक ·

तुकारामांचे अभंग हे आता तलवारीसारखे फिरू लागलेत! होऊन जाऊदेत तलवारबाजीचा एक मुकाबला मिपासमक्ष! प्रतिवाराच्या प्रतीक्षेत! Sandy

कविता१९७८ 19/07/2016 - 06:02
शेतकरी नेता बनण्यासाठी आवश्यक असेल, सतत अन्याय होतोय असे सान्गितले नाही तर शेतकरी गझलकाराना मसीहा मानणार कसे आणि यान्चे मन्त्री बनण्याचे स्वप्न साकार होणार कसे?

नाखु 19/07/2016 - 09:12
काही परिक्षणे या काव्याची... पुरते वस्त्रहरण : दैनिक टका भारत शेतकरी आडत्यांनाखोडता : दैनिक मिपा जागरण बोलवित्या धन्याची भांडाफोड : दैनिक मिपा सामना. अता याही आडत्यांचा बाजार उठू दे :दैनिक नाखु समाचार. बाकी काव्य फर्मास पण अजून काही जोडणी आणि तोडणी शिल्लक ठेवली हे जाणवते. पुलेशु+पुभाप्र नाखु

आदिजोशी 19/07/2016 - 12:03
मस्त ठासली आहे. फुकट वांझोट्या चर्चा आणि जगाला नावे ठेवण्या शिवाय दुसरे उद्योग नसणारे फारच डोक्यात जातात. अपेक्षेप्रमाणे ह्याही तडक्यावर वन अँड ओन्ली मसिहा कडून उत्तर येणार नाहीच.

In reply to by आदिजोशी

सूड 19/07/2016 - 14:46
मसिहा कडून उत्तर येणार नाहीच.
एखाद्या ओळीची गरळ ओकून जातात ते कधी कधी. शहरातली माणसं किती असंवेदनशील आहेत आणि नेहमी शेतकर्‍यावरच कसा अन्याय होतो याबद्दलची त्यांची कळकळ लोकांना कळणार कशी?

झेन 19/07/2016 - 22:28
जिओ मोदकजी, लैच झाला होता धुरळा स्वय्मघोषित एकमेव कवी आणि उपेक्षितांचे अंतरंग जाणणा-या गुर्जींचा.

चंपाबाई 19/07/2016 - 23:35
शेतकर्‍याला सबसिडी नको , वीज फुकट का देताय असे रडणारे शहरी लोक हुशार म्हणायचे की काय ? सबसिडी व वीजमाफीने उत्पादन खर्च कमी होउन ते सर्वानाच फायद्याचे होते हे हुशार लोकांच्या बत्थड डोक्यात का शिरत नाही ?

In reply to by सुबोध खरे

चंपाबाई 20/07/2016 - 02:42
शेतकर्‍याला बी खतात सबसिडी दिली की शेत्मालाचा उत्पादन खर्च कमी होतो. वीज माफीचेही तसेच आहे... जर या किमती वाढल्या तर अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढुन ग्राहकाच्याच खिशाला भुर्दंड लागेल. ( हे शेकडो वेळा चर्चिले आहे... मग हे फक्त शेतीमालालाच का ? काम्प्युटर मोबैल वाल्या कंपन्यानाही सबसिडी द्या म्हणजे याही वस्तु स्वस्त होतील असे इथले लोक बोलल्याचे अंधुकसे आठवते. ) बाकी डिटेल्स तज्ञाकडुन घेणे.

In reply to by चंपाबाई

खटपट्या 20/07/2016 - 02:46
शेतीचा उत्पादन खर्च कमी झाल्यावर त्याचा थेट फायदा ग्राहकाला होइलच याची शाश्वती नाही. काहीही कीतीही माफ करा...

In reply to by चंपाबाई

बेकार तरुण 20/07/2016 - 12:18
शेतकर्‍याला बी खतात सबसिडी दिली की शेत्मालाचा उत्पादन खर्च कमी होतो. वीज माफीचेही तसेच आहे... जर या किमती वाढल्या तर अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढुन ग्राहकाच्याच खिशाला भुर्दंड लागेल.>>> हा अर्थशास्त्रीय दृष्ट्या अतिषय महान प्रतिसाद आहे !!!! सब्सिडीची रक्कम बहुतेक आकाषातला देव सरकारला देत असावा. त्याचा टॅक्स देणार्‍या लोकांशी आणि एकुणच त्यांच्या खीषाला पडडार्‍या भुर्दंडाशी काहीच संबंध नसतो का?? माझ्या अल्पमतीप्रमाणे जगभर सब्सिडी देण यशस्वी ठरलेलं नाहीये, कारण स्वस्तात वस्तु मिळालीतर जबाबदारीने वापर करणे ही प्रवृत्ती बर्‍याचदा नसते. (कृपया खुलासा करावा)

In reply to by चंपाबाई

विवेकपटाईत 20/07/2016 - 19:56
कुठल्या जगात वावरता चंपा बाई सबसिडी खत कंपन्यांच्या खिश्यात जाते. अधिकांश शेती पावसावर अवलंबून आहे. वीज सबसिडीचा फायदा होत नाही. आणखीन एक गेल्या ३० वर्षांत शेतमालाचा भाव किमान ५०% कमी झाला आहे. जास्तीही असू शकतो. उदा: कांदा १९९८ - फेब. ३ रुपये आणि सेप्ट ४०-६० , २०१६ फेब. ३-७ आणि सेप्ट. २०१५ ४०-८० रुपये. (गेल्या १८ वर्षांत बाकी वस्तूंचे भाव किती वाढले). साखर १९९० -२० रुपये आणि २०१६ ४० रुपये (बाकी वस्तूंचे भाव किमान ५-१० पटीने वाढले आहे). तसेच तेल,डाळी आणि इतर शेतमालाचे आहे. शेत माज्डूराची मजदूरी मात्र ५-७ पटीने वाढली आहे. आज तेल अर्थात पाम ओईल विदेशातून मातीच्या भावात येते त्या मुळे देश्यात खाद्य तेलाचे उत्पादन वाढत नाही आहे. शेतमालासाठी आपण विदेशांवर निर्भर होतो आहे आणि आपल्या देश्यात शेतकरी शेत रिकामे ठेवतो आहे. याचे भयंकर परिणाम निकट भविष्यात होणार आहे शहरी लोकांना याची झळ हि भोगावी लागणार आहे. पण काय करणार उच्च शिक्षित मूर्ख (IAS) देशावर राज्य करीत आहे. (हे माझे मत नाही खालच्या स्तरावर कार्य करणाऱ्या अधिकांश अधिकाऱ्यांचे आहे).

In reply to by विवेकपटाईत

चंपाबाई 21/07/2016 - 11:16
काय कळेचना बै ! सबसिडी देऊन देशी शेती वाचवायची तरी विरोध ... तिकडे एका धाग्यावर आफ्रिकेतुन अन्न आयात करण्याचे कौतुक सुरु आहे.. इथे हेच मोदीप्रेमी लोक याचे भयंकर परिणाम होतील असेही म्हणताहेत. .... सबसिडीचा मुख्य फायदा बड्या लोकाना होतो , म्हणुन ती कुचकामी आहे ! पी पी एफ चे व्याज कमी करताना सरकारने हेच कारण दिल्व होते. बड्या लोकाना व्याज जास्त मिळते. गरीबाना व्याज कमीच मिळते . मग दर कमी केला तर बिघडले कुठे ?

In reply to by चंपाबाई

बोका-ए-आझम 20/07/2016 - 17:02
सबसिडी आणि वीजमाफीने उत्पादन खर्च कमी होतो? >>> पण त्या सबसिडीचे पैसे सरकार अप्रत्यक्ष करांच्या against offset करतं आणि हे कर सगळ्यांना द्यावे लागतात, शेतकऱ्यांनाही. म्हणजे सरकार एका हाताने देतं आणि दुस-या हाताने घेतं. शेतकऱ्यांना सबसिडी नको असं म्हणणं नाहीच आहे पण सबसिडीचा फायदा हा मोठ्या शेतकऱ्यांना मिळतो कारण जेवढं शेताचं क्षेत्र जास्त तेवढी बियाण्यांची आणि खताची गरज जास्त आणि तेवढीच सबसिडी जास्त. त्यामुळे गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. वीजमाफीचंही तसंच. एकीकडे दिलेली वीजमाफी सरकार औद्योगिक दर वाढवून वसूल करतं. त्याचाही फायदा मोठ्या शेतकऱ्यांना होतो, अल्पभूधारक शेतकऱ्यांना होत नाही.

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम 20/07/2016 - 21:40
पण मोठ्या शेतकऱ्यांसाठी वीजबिल/उत्पन्न हे गुणोत्तर नक्कीच छोट्या शेतकऱ्यांपेक्षा अनुकूल असतं. अप्रत्यक्ष कर जसे गरिबांना जास्त जाचक असतात तशातलाच प्रकार.

भन्नाट कविता , सातत्याने शेतकर्याचा कळवला अस दाखवून नुसत्या टुकार कवितांचे रतीब घालणे आणि धमकी देऊन पत्ते गणांगाणा चांगलाच हाणलय की , कडक कविता __/\__

In reply to by माम्लेदारचा पन्खा

पण इतके धागे काढून पण ठाकूर-आळी वाले येतच नाहीत. नवी मुंबईच्या कट्ट्याला बोईसर-दहिसर पासून मिपाकर येतात, पण बोरीवली वाले येत नाहीत. असो, हे देवा, असे कट्टे मिस करणार्‍यांना माफ कर, त्यांनी किती आनंदाचे क्षण हुकवले आहेत, ते त्यांना कळत नाही.

शहरात फ्लॅटमध्ये ब्लॉक होणार्या आणि ब्लॉकमध्ये फ्लॅट होणार्या लोकांना शेतकर्यांविशयी कीती उद्दाम भावना आहेत त्याचे प्रतिकात्मक उदाहरण म्हणजे ही कविता मुटेजी तुम्ही शेतकर्यांचे प्रश्न मांडत चला ,आम्ही शेतकरी आहित तुमच्या बाजूने.

In reply to by मुक्त विहारि

तात्यांनी मिपाची स्थापना केली तेव्हा व्याकरणाला फाट्यावर मारले हे विसरलात का इतक्यात,आणि तुम्ही हेल्मेट वापरताना !मग ठीक आहे.

तुकारामांचे अभंग हे आता तलवारीसारखे फिरू लागलेत! होऊन जाऊदेत तलवारबाजीचा एक मुकाबला मिपासमक्ष! प्रतिवाराच्या प्रतीक्षेत! Sandy

कविता१९७८ 19/07/2016 - 06:02
शेतकरी नेता बनण्यासाठी आवश्यक असेल, सतत अन्याय होतोय असे सान्गितले नाही तर शेतकरी गझलकाराना मसीहा मानणार कसे आणि यान्चे मन्त्री बनण्याचे स्वप्न साकार होणार कसे?

नाखु 19/07/2016 - 09:12
काही परिक्षणे या काव्याची... पुरते वस्त्रहरण : दैनिक टका भारत शेतकरी आडत्यांनाखोडता : दैनिक मिपा जागरण बोलवित्या धन्याची भांडाफोड : दैनिक मिपा सामना. अता याही आडत्यांचा बाजार उठू दे :दैनिक नाखु समाचार. बाकी काव्य फर्मास पण अजून काही जोडणी आणि तोडणी शिल्लक ठेवली हे जाणवते. पुलेशु+पुभाप्र नाखु

आदिजोशी 19/07/2016 - 12:03
मस्त ठासली आहे. फुकट वांझोट्या चर्चा आणि जगाला नावे ठेवण्या शिवाय दुसरे उद्योग नसणारे फारच डोक्यात जातात. अपेक्षेप्रमाणे ह्याही तडक्यावर वन अँड ओन्ली मसिहा कडून उत्तर येणार नाहीच.

In reply to by आदिजोशी

सूड 19/07/2016 - 14:46
मसिहा कडून उत्तर येणार नाहीच.
एखाद्या ओळीची गरळ ओकून जातात ते कधी कधी. शहरातली माणसं किती असंवेदनशील आहेत आणि नेहमी शेतकर्‍यावरच कसा अन्याय होतो याबद्दलची त्यांची कळकळ लोकांना कळणार कशी?

झेन 19/07/2016 - 22:28
जिओ मोदकजी, लैच झाला होता धुरळा स्वय्मघोषित एकमेव कवी आणि उपेक्षितांचे अंतरंग जाणणा-या गुर्जींचा.

चंपाबाई 19/07/2016 - 23:35
शेतकर्‍याला सबसिडी नको , वीज फुकट का देताय असे रडणारे शहरी लोक हुशार म्हणायचे की काय ? सबसिडी व वीजमाफीने उत्पादन खर्च कमी होउन ते सर्वानाच फायद्याचे होते हे हुशार लोकांच्या बत्थड डोक्यात का शिरत नाही ?

In reply to by सुबोध खरे

चंपाबाई 20/07/2016 - 02:42
शेतकर्‍याला बी खतात सबसिडी दिली की शेत्मालाचा उत्पादन खर्च कमी होतो. वीज माफीचेही तसेच आहे... जर या किमती वाढल्या तर अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढुन ग्राहकाच्याच खिशाला भुर्दंड लागेल. ( हे शेकडो वेळा चर्चिले आहे... मग हे फक्त शेतीमालालाच का ? काम्प्युटर मोबैल वाल्या कंपन्यानाही सबसिडी द्या म्हणजे याही वस्तु स्वस्त होतील असे इथले लोक बोलल्याचे अंधुकसे आठवते. ) बाकी डिटेल्स तज्ञाकडुन घेणे.

In reply to by चंपाबाई

खटपट्या 20/07/2016 - 02:46
शेतीचा उत्पादन खर्च कमी झाल्यावर त्याचा थेट फायदा ग्राहकाला होइलच याची शाश्वती नाही. काहीही कीतीही माफ करा...

In reply to by चंपाबाई

बेकार तरुण 20/07/2016 - 12:18
शेतकर्‍याला बी खतात सबसिडी दिली की शेत्मालाचा उत्पादन खर्च कमी होतो. वीज माफीचेही तसेच आहे... जर या किमती वाढल्या तर अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढुन ग्राहकाच्याच खिशाला भुर्दंड लागेल.>>> हा अर्थशास्त्रीय दृष्ट्या अतिषय महान प्रतिसाद आहे !!!! सब्सिडीची रक्कम बहुतेक आकाषातला देव सरकारला देत असावा. त्याचा टॅक्स देणार्‍या लोकांशी आणि एकुणच त्यांच्या खीषाला पडडार्‍या भुर्दंडाशी काहीच संबंध नसतो का?? माझ्या अल्पमतीप्रमाणे जगभर सब्सिडी देण यशस्वी ठरलेलं नाहीये, कारण स्वस्तात वस्तु मिळालीतर जबाबदारीने वापर करणे ही प्रवृत्ती बर्‍याचदा नसते. (कृपया खुलासा करावा)

In reply to by चंपाबाई

विवेकपटाईत 20/07/2016 - 19:56
कुठल्या जगात वावरता चंपा बाई सबसिडी खत कंपन्यांच्या खिश्यात जाते. अधिकांश शेती पावसावर अवलंबून आहे. वीज सबसिडीचा फायदा होत नाही. आणखीन एक गेल्या ३० वर्षांत शेतमालाचा भाव किमान ५०% कमी झाला आहे. जास्तीही असू शकतो. उदा: कांदा १९९८ - फेब. ३ रुपये आणि सेप्ट ४०-६० , २०१६ फेब. ३-७ आणि सेप्ट. २०१५ ४०-८० रुपये. (गेल्या १८ वर्षांत बाकी वस्तूंचे भाव किती वाढले). साखर १९९० -२० रुपये आणि २०१६ ४० रुपये (बाकी वस्तूंचे भाव किमान ५-१० पटीने वाढले आहे). तसेच तेल,डाळी आणि इतर शेतमालाचे आहे. शेत माज्डूराची मजदूरी मात्र ५-७ पटीने वाढली आहे. आज तेल अर्थात पाम ओईल विदेशातून मातीच्या भावात येते त्या मुळे देश्यात खाद्य तेलाचे उत्पादन वाढत नाही आहे. शेतमालासाठी आपण विदेशांवर निर्भर होतो आहे आणि आपल्या देश्यात शेतकरी शेत रिकामे ठेवतो आहे. याचे भयंकर परिणाम निकट भविष्यात होणार आहे शहरी लोकांना याची झळ हि भोगावी लागणार आहे. पण काय करणार उच्च शिक्षित मूर्ख (IAS) देशावर राज्य करीत आहे. (हे माझे मत नाही खालच्या स्तरावर कार्य करणाऱ्या अधिकांश अधिकाऱ्यांचे आहे).

In reply to by विवेकपटाईत

चंपाबाई 21/07/2016 - 11:16
काय कळेचना बै ! सबसिडी देऊन देशी शेती वाचवायची तरी विरोध ... तिकडे एका धाग्यावर आफ्रिकेतुन अन्न आयात करण्याचे कौतुक सुरु आहे.. इथे हेच मोदीप्रेमी लोक याचे भयंकर परिणाम होतील असेही म्हणताहेत. .... सबसिडीचा मुख्य फायदा बड्या लोकाना होतो , म्हणुन ती कुचकामी आहे ! पी पी एफ चे व्याज कमी करताना सरकारने हेच कारण दिल्व होते. बड्या लोकाना व्याज जास्त मिळते. गरीबाना व्याज कमीच मिळते . मग दर कमी केला तर बिघडले कुठे ?

In reply to by चंपाबाई

बोका-ए-आझम 20/07/2016 - 17:02
सबसिडी आणि वीजमाफीने उत्पादन खर्च कमी होतो? >>> पण त्या सबसिडीचे पैसे सरकार अप्रत्यक्ष करांच्या against offset करतं आणि हे कर सगळ्यांना द्यावे लागतात, शेतकऱ्यांनाही. म्हणजे सरकार एका हाताने देतं आणि दुस-या हाताने घेतं. शेतकऱ्यांना सबसिडी नको असं म्हणणं नाहीच आहे पण सबसिडीचा फायदा हा मोठ्या शेतकऱ्यांना मिळतो कारण जेवढं शेताचं क्षेत्र जास्त तेवढी बियाण्यांची आणि खताची गरज जास्त आणि तेवढीच सबसिडी जास्त. त्यामुळे गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. वीजमाफीचंही तसंच. एकीकडे दिलेली वीजमाफी सरकार औद्योगिक दर वाढवून वसूल करतं. त्याचाही फायदा मोठ्या शेतकऱ्यांना होतो, अल्पभूधारक शेतकऱ्यांना होत नाही.

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम 20/07/2016 - 21:40
पण मोठ्या शेतकऱ्यांसाठी वीजबिल/उत्पन्न हे गुणोत्तर नक्कीच छोट्या शेतकऱ्यांपेक्षा अनुकूल असतं. अप्रत्यक्ष कर जसे गरिबांना जास्त जाचक असतात तशातलाच प्रकार.

भन्नाट कविता , सातत्याने शेतकर्याचा कळवला अस दाखवून नुसत्या टुकार कवितांचे रतीब घालणे आणि धमकी देऊन पत्ते गणांगाणा चांगलाच हाणलय की , कडक कविता __/\__

In reply to by माम्लेदारचा पन्खा

पण इतके धागे काढून पण ठाकूर-आळी वाले येतच नाहीत. नवी मुंबईच्या कट्ट्याला बोईसर-दहिसर पासून मिपाकर येतात, पण बोरीवली वाले येत नाहीत. असो, हे देवा, असे कट्टे मिस करणार्‍यांना माफ कर, त्यांनी किती आनंदाचे क्षण हुकवले आहेत, ते त्यांना कळत नाही.

शहरात फ्लॅटमध्ये ब्लॉक होणार्या आणि ब्लॉकमध्ये फ्लॅट होणार्या लोकांना शेतकर्यांविशयी कीती उद्दाम भावना आहेत त्याचे प्रतिकात्मक उदाहरण म्हणजे ही कविता मुटेजी तुम्ही शेतकर्यांचे प्रश्न मांडत चला ,आम्ही शेतकरी आहित तुमच्या बाजूने.

In reply to by मुक्त विहारि

तात्यांनी मिपाची स्थापना केली तेव्हा व्याकरणाला फाट्यावर मारले हे विसरलात का इतक्यात,आणि तुम्ही हेल्मेट वापरताना !मग ठीक आहे.
गेले काही दिवस सरसकटीकरणाचा तडका आणि अभंग वाचून आमच्या शहरी असंवेदनशील मेंदूच्या झुडुपाला एक कवितेची डहाळी उगवली. ती डहाळी त्याच्यासोबतच्या पालापाचोळ्यासकट येथे चिकटवत आहे...

॥सांगा तुकारामा : अभंग-४॥

गंगाधर मुटे ·
॥सांगा तुकारामा : अभंग-४॥

धाडा तुकोराया । विठूला सांगावा ।
मायेचा कांगावा । उतू आला ॥१॥

नासले सकळ । तन मन धन ।
मिथ्या जन गण । वेढीयले ॥२॥

विलासी लोळती । द्रव्याचे सोयरे ।
अनाठायी मरे । कामनिष्ठी ॥३॥

विव्देषाचा डोंब । कैसा परतावा ।
स्नेहाचा ओलावा । क्षीण झाला ॥४॥

वैष्णवाचे चित्त । झुंडीची मुसंडी ।
सावजाला धुंडी । मिथ्यावादी ॥५॥

नाही उपवासी । नाही एकादशी ।
अभय द्वादशी । सोडियेली ॥६॥

॥सांगा तुकारामा : अभंग-३॥

गंगाधर मुटे ·

पण मूळ अभंगप्रकाराची पाऊलवाट सोडून हे काव्य आधुनिक काव्यरस्त्यावर चालू लागल्यासारखे वाटते! जित्रुप = जित्राब?? बाकी देवाऐवजी सर्व अभंगात तुकारामांना केंद्रात बसवलय ते खूपच आवडल्या गेले आहे! Sandy

पण मूळ अभंगप्रकाराची पाऊलवाट सोडून हे काव्य आधुनिक काव्यरस्त्यावर चालू लागल्यासारखे वाटते! जित्रुप = जित्राब?? बाकी देवाऐवजी सर्व अभंगात तुकारामांना केंद्रात बसवलय ते खूपच आवडल्या गेले आहे! Sandy
॥सांगा तुकारामा : अभंग-३॥

सांग तुकोराया तुझा । विठू कुठे मेला? ।
कर्जापायी भक्त त्याचा । स्मशानात गेला ॥धृo॥

पुजा, अर्चा, भक्तिभाव । आरतीचे ताट ॥
सर्वकाळ सत्संगाची । सोडली ना वाट ॥
तरी का रे अल्पायुषी । श्वास बंद केला ॥१॥

जित्रुपाचा दोर हाती । ओठी विठू नाम ॥
रात्रंदिन पाण्यावाणी । गाळलाय घाम ॥
तरी का रे चोपडला । कुंकवाने शेला ॥२॥

तुझा देव, धर्म तुझा । शोषकांचा साथी ॥
घोर, दु:ख, हीनता, गरिबी । पोशिंद्याचे माथी ॥

मामाच्या पोरींना शिमग्याची भेट!

गंगाधर मुटे ·
मामाच्या पोरींना शिमग्याची भेट!

माझ्या मामाला साडेचार पोरी
चार डोमड्या पण एक छोरी गोरी
या छोर्‍यांचं कौतूकं सांगू मी काय
ये माझे शिमगेमाय!

एक नुसताच लंबा बांबू
जणू हाडाचा उभारला तंबू
रक्ता-मासाचा बिल्कूल पत्ताच नाय
ये माझे शिमगेमाय!

एक भलतीच ऐसपैस
जणू पंजाबी मुऱ्हा म्हैस
डोलतडोलत रस्त्यानं चालत जाय
ये माझे शिमगेमाय!

एका छोरीचे फ़ुगलेले गाल
हवा भरलेले जणू फ़ूटबॉल
रोज वेणीला लावते हेअरडाय

< अश्शी सासू असती तर >

अन्नू ·

In reply to by बोका-ए-आझम

शिवाय विडंबन पेरणेचा उल्लेख नाही....विडंबन कंसात टाकायचा संकेतही पाळला जात नाहीये आजकाल! :( (यामुळे'च' अजूनतरी वाचले'च' नाही!) Sandy

In reply to by बोका-ए-आझम

शिवाय विडंबन पेरणेचा उल्लेख नाही....विडंबन कंसात टाकायचा संकेतही पाळला जात नाहीये आजकाल! :( (यामुळे'च' अजूनतरी वाचले'च' नाही!) Sandy
अश्शी सासू असती तर, आंम्ही असे झालो नसतो भर तारुण्यात बायकोला, असं उठसूट सासुरवाडीला घेऊन गेलो नसतो तिची नसती आली कुणालाच सर अश्शी सासू असती तर आळी सगळी गाजवली असती, मिजास मोठी केली असती, राजा बनून हिंडलो असतो मेव्हणीही म्हणली नसती मेल्या बाजु सर अश्शी सासू असती तर घरातल्या कार्ट्यांजवळ तिला सोडून गेलो असतो आंम्हीसुद्धा नवरा-बायको मग सतत जवळ दिसलो असतो मळ्यातल्या शिदुबाने दिले असते अनेक वर अश्शी सासू असती तर सासुरवाडीतल्या मेव्हण्यांनी ठोकला असता सलाम दहा ते दहा रोज मस्त केला असता आराम सासर्‍यांनी माझं ऐकून वेळेअगोदर भरले असते लार्ज पेग अश्शी सासू असती तर मिपाबंधुंनी रम डिलेवरी केली असती म

अस्तित्वाची बोंब

संदीप डांगे ·

मितभाषी 09/02/2016 - 23:13
प्रश्न पहिला माझा, रे गड्या मितभाष्या, काय पिवुनि तुवा वाजवला हा ढोल-ताश्या
मी सध्यातरी काही पित नाही. बिरूटे सरांचा धागा फाॅलो करत आहे. प्रमाण एकदा फायनल झाले कि चालू करूया म्हणतो काय.

In reply to by मितभाषी

संदीप डांगे 09/02/2016 - 23:52
हा हा, हलकेच घेतल्याबद्दल आमच्याकडुन तुम्हाला (जेव्हा केव्हा जे प्रमाण ठरेल, जो ब्रँड ठरेल, ती) भेट!

मितभाषी 09/02/2016 - 23:13
प्रश्न पहिला माझा, रे गड्या मितभाष्या, काय पिवुनि तुवा वाजवला हा ढोल-ताश्या
मी सध्यातरी काही पित नाही. बिरूटे सरांचा धागा फाॅलो करत आहे. प्रमाण एकदा फायनल झाले कि चालू करूया म्हणतो काय.

In reply to by मितभाषी

संदीप डांगे 09/02/2016 - 23:52
हा हा, हलकेच घेतल्याबद्दल आमच्याकडुन तुम्हाला (जेव्हा केव्हा जे प्रमाण ठरेल, जो ब्रँड ठरेल, ती) भेट!
स्फुर्तीदाते: मितभाषी आणि त्यांचे लाघवी मूल. प्रश्न पहिला माझा, रे गड्या मितभाष्या, काय पिवुनि तुवा वाजवला हा ढोल-ताश्या! मूळ बघता सर्व वादांचे असे बस फक्त पिण्याचे अध्यात्म नाहीरे षंढाचे हे तुज नाही कळायाचे. भेद भावा तु बघ जरा अज्ञानास फाडती टरा टरा डोळे फिरवती गरा गरा दंभ नाहीच इथे खरा तुम्हा नसे त्याची प्रचिती म्हणुनि त्या खोटा म्हणती मनापासुनि ते ओरडती अंधारासी मी एकच पणती. हिशोब सरला रे जन्माचा बाकी थोडा असे मिपाचा मिंधा नसे कुणाच्या बा'चा पण मानासाठी घासतो टाचा करु लढाया थुंकायाच्या जोर लावुनि भुंकायाच्या दोन शिव्या

स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी तडका

गंगाधर मुटे ·

गंगाधर मुटे 26/03/2016 - 20:06
स्वदेशीचे ढोंगधतुरे : नागपुरी तडका काव्यवाचन : श्री राजीव खांडेकर, मुख्य संपादक, एबीपी माझा कवी : गंगाधर मुटे फ़ेसबूकवर VDO बघण्यासाठी लिंक https://www.facebook.com/gangadharmute/videos/1202161426475210/

गंगाधर मुटे 26/03/2016 - 20:06
स्वदेशीचे ढोंगधतुरे : नागपुरी तडका काव्यवाचन : श्री राजीव खांडेकर, मुख्य संपादक, एबीपी माझा कवी : गंगाधर मुटे फ़ेसबूकवर VDO बघण्यासाठी लिंक https://www.facebook.com/gangadharmute/videos/1202161426475210/
स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी तडका

एक आणखी झाडावरती लटकून मेला काल
तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल

पुन्हा एकदा बिनपाण्याने भाजून गेले शेत
एसीमध्ये आखतोस तू सटरमफटरम बेत
तुला दावतो भकासबंजर तू बांधावरती चाल

खते, औषधी, बीज, मजुरी दसपट झाले भाव
वीज, किराणा, डिझेल, डॉक्टर लुटून नेती गाव
अन् तुला पाहिजे स्वस्तामध्ये शेतीमधला माल

शेतपिकाच्या निर्यातीला जगात आहे वाव
बरकत येऊ शकते हे तर तुलाही आहे ठाव

निवले तुफान आता

गंगाधर मुटे ·

गंगाधर मुटे 13/12/2015 - 16:26
शेतकरी संघटनेचे प्रणेते आदरणीय शरद जोशी साहेबांचे आज (१२-१२-२०१५) सकाळी 9 वाजता पुणे येथे दुखद निधन.... मा. शरद जोशी साहेबांना विनम्र श्रद्धांजली मा. शरद जोशी यांचा जीवनपरिचय अधिक माहिती http://www.sharadjoshi.in/jivanpat

गंगाधर मुटे 13/12/2015 - 16:28
: शोकसंदेश : शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमुक्त झालेले बघितल्याशिवाय मी डोळे मिटणार नाही, अशी दृढ प्रतिज्ञा करून संपूर्ण देशातील शेतीच्या कर्जमुक्तीची स्वप्न बघणारा एक युगपुरूष आज आपल्यापासून काळाने हिरावून घेतला आहे. देशातले संपूर्ण शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त न होताच शेतकरी संघटनेच्या प्रणेत्याला डोळे मिटून घ्यावे लागले, ही बाब अत्यंत दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. "शेतकरी तितुका एक एक" अशी शिकवण देणार्‍या या शेतकरी नेत्याने शेतकर्‍यांच्या मनात स्वाभिमानाने जगण्याचे बीजारोपण केले. ताठ मानेने व मूठ आवळून जगायचा मूलमंत्र दिला आणि शेतकर्‍यांच्या मुक्तीसाठी सर्वस्व अर्पण करून त्याग करायलाही शिकवले. देशातील इतर नागरिकांसारखे सन्मानाने व सुखाने जगता यावे म्हणून रस्त्यावर उतरून लढण्याची प्रेरणा दिली. शेतकर्‍यांच्या मनातील राजसत्तेची व तुरुंगाची भीती घालवली. त्याचबरोबर प्रचलित अर्थवादाला कलाटणी देऊन शेतीच्या अर्थवादाच्या उत्क्रांतीची दिशा बदलण्यात शरद जोशी शतप्रतिशत यशस्वी झालेले आहेत. महामानव, महात्मा किंवा युगपुरुष ही विशेषणेही थिटी पडावीत, एवढे त्यांचे कार्य महान आणि विचार उत्तुंग आहेत. शरद जोशी यांनी “शेतकर्‍यांचा सूर्य” बनून पिढ्यानपिढ्या दारिद्र्याच्या अंधार्‍या खाईत चाचपडणार्‍या शेतकर्‍यांचा मुक्तीचा मार्ग प्रकाशमय करून ठेवला आहे. या प्रकाशवाटेवर वाटचाल करून त्यांचे अपूर्ण स्वप्न साकार करण्यासाठी आता शेतकर्‍यांनी कटीबद्ध झाले पाहिजे. हीच त्यांना खरीखुरी श्रद्धांजली ठरेल. अंत्यसंस्कार : दिनांक १५/१२/२०१५ मंगळवारला त्यांच्या पार्थिव देहावर त्यांच्या अंतिम इच्छेचा सन्मान राखून पुणे येथेच “वैकुठ” मध्ये त्यांची प्दिवंगत पत्नी आणि दिवंगत आईच्या स्थळाशेजारीच अंतिम संस्कार करण्यात येतील आणि त्याच दिवशी दर्शनासाठी ठेवला जाईल. दर्शनाचे स्थळ नक्की झाल्याबरोबर कळवण्यात येईल. तरी पाईकांनी मंगळवारी सकाळपर्यंत पुण्याला पोचावे, असे आवाहन करण्यात येत आहे. - गंगाधर मुटे महासचिव, स्वतंत्र भारत पक्ष, महाराष्ट्र प्रदेश जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना, वर्धा

गंगाधर मुटे 13/12/2015 - 16:28
एबीपी माझावरील चर्चेत काल माझा सहभाग होता ABP MAJHA VISHESH / SAD DEMISE of SHARAD JOSHI https://www.youtube.com/attribution_link?a=IN44USJaLJQ&u=%2Fwatch%3Fv%3D...

In reply to by कंजूस

गंगाधर मुटे 06/01/2016 - 08:14
तुमच्या इच्छेप्रमाणे प्रत्येक गोष्ट माझ्या हातून घडणार नसली तरीही यथावकाश शरद जोशींच्या व्यक्तीमत्वाविषयी लिहिण्याचा यथावकाश प्रयत्न करेनच. धन्यवाद!

In reply to by गंगाधर मुटे

आशु जोग 20/01/2016 - 01:44
नक्की करा... सर्व वर्तमानपत्रांनी त्याच्या जाण्याची बातमी दिली. पण त्यांच्या कार्याचे नेमके मोठेपण सांगणारा एकही लेख पहायला मिळाला नाही.

विकास 15/12/2015 - 01:29
शेतकर्‍याच्या व्यथा ह्या अधुनिक भारतात राजकारणाऐवजी अर्थकारणाने मांडणारे आणि "भारता"च्या व्यथा "इंडीया"ला समजतील अशा भाषेत सांगणारे शरद जोशी हे खर्‍या अर्थाने असमान्य व्यक्तिमत्व होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

खंडेराव 20/01/2016 - 04:47
शरद जोशींविषयी मला प्रचड आदर आहे. एक चांगला लेख त्यांच्या कार्यावर वाचायला दिलात तर बर्याच लो़कांना त्यांचे काम कळेल ( आपण वा इतर कोणी लिहिलेला)

गंगाधर मुटे 13/12/2015 - 16:26
शेतकरी संघटनेचे प्रणेते आदरणीय शरद जोशी साहेबांचे आज (१२-१२-२०१५) सकाळी 9 वाजता पुणे येथे दुखद निधन.... मा. शरद जोशी साहेबांना विनम्र श्रद्धांजली मा. शरद जोशी यांचा जीवनपरिचय अधिक माहिती http://www.sharadjoshi.in/jivanpat

गंगाधर मुटे 13/12/2015 - 16:28
: शोकसंदेश : शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमुक्त झालेले बघितल्याशिवाय मी डोळे मिटणार नाही, अशी दृढ प्रतिज्ञा करून संपूर्ण देशातील शेतीच्या कर्जमुक्तीची स्वप्न बघणारा एक युगपुरूष आज आपल्यापासून काळाने हिरावून घेतला आहे. देशातले संपूर्ण शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त न होताच शेतकरी संघटनेच्या प्रणेत्याला डोळे मिटून घ्यावे लागले, ही बाब अत्यंत दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. "शेतकरी तितुका एक एक" अशी शिकवण देणार्‍या या शेतकरी नेत्याने शेतकर्‍यांच्या मनात स्वाभिमानाने जगण्याचे बीजारोपण केले. ताठ मानेने व मूठ आवळून जगायचा मूलमंत्र दिला आणि शेतकर्‍यांच्या मुक्तीसाठी सर्वस्व अर्पण करून त्याग करायलाही शिकवले. देशातील इतर नागरिकांसारखे सन्मानाने व सुखाने जगता यावे म्हणून रस्त्यावर उतरून लढण्याची प्रेरणा दिली. शेतकर्‍यांच्या मनातील राजसत्तेची व तुरुंगाची भीती घालवली. त्याचबरोबर प्रचलित अर्थवादाला कलाटणी देऊन शेतीच्या अर्थवादाच्या उत्क्रांतीची दिशा बदलण्यात शरद जोशी शतप्रतिशत यशस्वी झालेले आहेत. महामानव, महात्मा किंवा युगपुरुष ही विशेषणेही थिटी पडावीत, एवढे त्यांचे कार्य महान आणि विचार उत्तुंग आहेत. शरद जोशी यांनी “शेतकर्‍यांचा सूर्य” बनून पिढ्यानपिढ्या दारिद्र्याच्या अंधार्‍या खाईत चाचपडणार्‍या शेतकर्‍यांचा मुक्तीचा मार्ग प्रकाशमय करून ठेवला आहे. या प्रकाशवाटेवर वाटचाल करून त्यांचे अपूर्ण स्वप्न साकार करण्यासाठी आता शेतकर्‍यांनी कटीबद्ध झाले पाहिजे. हीच त्यांना खरीखुरी श्रद्धांजली ठरेल. अंत्यसंस्कार : दिनांक १५/१२/२०१५ मंगळवारला त्यांच्या पार्थिव देहावर त्यांच्या अंतिम इच्छेचा सन्मान राखून पुणे येथेच “वैकुठ” मध्ये त्यांची प्दिवंगत पत्नी आणि दिवंगत आईच्या स्थळाशेजारीच अंतिम संस्कार करण्यात येतील आणि त्याच दिवशी दर्शनासाठी ठेवला जाईल. दर्शनाचे स्थळ नक्की झाल्याबरोबर कळवण्यात येईल. तरी पाईकांनी मंगळवारी सकाळपर्यंत पुण्याला पोचावे, असे आवाहन करण्यात येत आहे. - गंगाधर मुटे महासचिव, स्वतंत्र भारत पक्ष, महाराष्ट्र प्रदेश जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना, वर्धा

गंगाधर मुटे 13/12/2015 - 16:28
एबीपी माझावरील चर्चेत काल माझा सहभाग होता ABP MAJHA VISHESH / SAD DEMISE of SHARAD JOSHI https://www.youtube.com/attribution_link?a=IN44USJaLJQ&u=%2Fwatch%3Fv%3D...

In reply to by कंजूस

गंगाधर मुटे 06/01/2016 - 08:14
तुमच्या इच्छेप्रमाणे प्रत्येक गोष्ट माझ्या हातून घडणार नसली तरीही यथावकाश शरद जोशींच्या व्यक्तीमत्वाविषयी लिहिण्याचा यथावकाश प्रयत्न करेनच. धन्यवाद!

In reply to by गंगाधर मुटे

आशु जोग 20/01/2016 - 01:44
नक्की करा... सर्व वर्तमानपत्रांनी त्याच्या जाण्याची बातमी दिली. पण त्यांच्या कार्याचे नेमके मोठेपण सांगणारा एकही लेख पहायला मिळाला नाही.

विकास 15/12/2015 - 01:29
शेतकर्‍याच्या व्यथा ह्या अधुनिक भारतात राजकारणाऐवजी अर्थकारणाने मांडणारे आणि "भारता"च्या व्यथा "इंडीया"ला समजतील अशा भाषेत सांगणारे शरद जोशी हे खर्‍या अर्थाने असमान्य व्यक्तिमत्व होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

खंडेराव 20/01/2016 - 04:47
शरद जोशींविषयी मला प्रचड आदर आहे. एक चांगला लेख त्यांच्या कार्यावर वाचायला दिलात तर बर्याच लो़कांना त्यांचे काम कळेल ( आपण वा इतर कोणी लिहिलेला)


  निवले तुफान आता