राष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान दिनानिमित्त... वरुण यंत्र - तंत्राचा जाहीर निषेध

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
11 May 2010 - 1:59 pm

राष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान दिनानिमित्त... वरुण यंत्र - यज्ञ तंत्राचा जाहीर निषेध

मिठाच्या आहूतींनी वरुण देवरायाला आळवण्याच्या हास्यास्पद प्रकाराला प्रतिबंध करावा.

आज (दि ११ मे २०१०) राष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान दिनानिमित्त दै. सकाळ पेपरमधे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी वरुण यंत्राचा वापर हा लेख पान १ व११ वाचून...

मित्र हो,
ही आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाची क्रूर चेष्टा तर नाहीना असे विचारावेसे वाटू लागले. बिरबल-अकबराच्या गोष्टीतील 'खिचडी पकाने के लिए' अती दूर ठेवलेली चूल काही कामाची नाही. हे कॉमिक वाचणारे पोर ही सांगेल.
त्यात विशेष लेखात म्हटल्याप्रमाणे कृत्रिम पावसासाठी चीनमधील दुष्काळी भागात विमाने, दहा लाख विशिष्ठ तोफ गोळे, असंख्य रॉकेट्स, सातशे किलो सिल्हर आयोडाईडचा वापर आदी आधुनिक विज्ञानने मान्यता दिलेली घसघशीत व अति खर्चिक साधनसामुग्री कुठे आणि एका डांबराच्या पिपात गोवऱ्या, भुस्सा-विटा, लाकडे घालून, व्लोअरच्या फुंकणीने बंब पेटवल्याप्रमाणे भट्टी पेटवून त्यात फक्त सहा किलो (खडे मीठ नव्हे) मीठाची थोडी थोडी आहूती टाकून वरुण यंत्राने - किंवा यज्ञाने अति किरकोळ खर्चात पाऊस पाडला जाईल असे मानणे म्हणजे बिरबलाची खिचडी पकवण्याच्या प्रयत्नांचा प्रकार वाटतो.
कुठलेही आधुनिक तंत्रज्ञान वारंवार तपासून व त्यांना अखिल जगातील वैज्ञानिकांची मान्यता असलेल्या 'नेचर' वा तत्सम मासिकात, जर्नल मधे त्याला जोवर दुजोरा वा वैज्ञानिक पद्धती म्हणून मान मिळत नाही तोवर हे खूळ थांबवले पाहिजे. अन्यथा विज्ञानाला या नव्या अंधश्रद्धेला तोंड देण्यासाठी वेगळे लढे द्यायला उभे रहावे लागेल असा खणखणीत इशारा देण्याची वेळ आलेली आहे.
सरकारी परवाने, सबसिडी वा खात्या-पित्या अनुदानांना मग अनन्य साधारण महत्व राहणार नाही. त्यामुळे या प्रकल्पांची दखल सरकारी दप्तरातून काढून टाकली जावी. नाहीतर अण्णा हजाऱ्यांना उपोषणाला बसायला निमित्त मिळायचे.
पुष्पक विमान होते असे रामायमात फक्त वाचायला मिळते म्हणून विमान भारतीयांनी शोधले असा स्वतःची पाठ थोपटू दावा केला जातो तसाच हा प्रकार समजून त्याच्याकडे कमितकमी १८६आधुनिक विज्ञानवाद्यांनी एक झकास परिपत्रक काढून याचा निषेध करावा असे सुचवावेसे वाटते. तोपर्यंत या मिठाच्या आहूतींनी वरुण देवरायाला आळवण्याच्या हास्यास्पद प्रकाराला प्रतिबंध करावा. निदान 'राष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान दिनाच्या' निमित्ताने दुर्लक्ष करावे.

मांडणीतंत्रराजकारणप्रकटनलेखशिफारसमाध्यमवेध

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

11 May 2010 - 2:02 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत आहे.

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 May 2010 - 2:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ही बातमी आहे कुठे?

अदिती

दत्ता काळे's picture

11 May 2010 - 2:07 pm | दत्ता काळे

सकाळ सारखे वृत्तपत्र अश्या प्रकारची बातमी कशी देऊ शकते ? पुढे तर त्यांनी नांदेड मध्ये हा प्रयोग नऊ वेळा यशस्वी झाला आहे असेही म्हटले आहे.

अभिषेक पटवर्धन's picture

11 May 2010 - 2:33 pm | अभिषेक पटवर्धन

तुमचा लेख वाचुन फार हसु आले....

ज्या माणसाने हा प्र्योग केलाय, तो मणुस (सकाळ मधल्या लेखावरुन) तरी रीलायेबल वाटतो. हा प्रयोग यशस्वी होणार नाही याचा काही वैज्ञानिक दाखला आहे का तुमच्याकडे. शिवाय फक्त खर्चीक आणि अति आधुनिक साधनं वापरुनच यश मिळवता येतं असा काही नियम आहे का? सत्याची पारख करण्यासाठी प्रयोगाची कसोटी वापरावी...किती पैसे खर्च केले, कुणि केले याच्याशी प्रयोगाच्या सत्यासत्यतेचं काय देणं घेणं?

शिवाय...एका नाडी वाल्याने दुसर्‍याकडे वैज्ञानिक सत्यासत्यतेची मागणी करणे अवघड आहे...

रामपुरी's picture

12 May 2010 - 12:54 am | रामपुरी

"एका नाडी वाल्याने दुसर्‍याकडे वैज्ञानिक सत्यासत्यतेची मागणी करणे अवघड आहे.."
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

भडकमकर मास्तर's picture

11 May 2010 - 3:18 pm | भडकमकर मास्तर

मलाही ल्येख जरा अतिच वाटला ...
विशेषतः ढग जमा झालेले असले पाहिजेत आणि आर्द्रता भरपूर पाहिजे मगच पाऊस पडण्याचा प्रयोग यशस्वी होतो , असे लिहिले आहे...
( म्हणजे हे वाक्य प्रेग्नन्ट स्त्रीला नऊ महिन्यांनंतर मूल व्हायची दाट शक्यता असते, असे काहीसे वाटले)..
शिवाय हा पाऊस प्रयोगामुळे पडला की असान्तसा तो पडणारच होता, हे शोधण्याचा काय उपाय? यावर काही भाष्य नव्हते...

पण बनवणारे साहेब आयायटीवाले आहेत असे लिहिले आहे... मग विचारात पडलो...
सध्या आम्ही कुंपणावर बसून आहोत...
_____________________________
श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 May 2010 - 3:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा मूळ लेख. (मास्तरांनीच लिंक शोधून दिली आहे.)

लेख वाचण्याच्या आधीचा प्रतिसादः आकाशात ढग असतील, ढगांमधे पाणी असेल तरीही पाऊस पडेलच असं नाही. पाऊस पडण्यासाठी धूलिकण असणं आवश्यक. धूलिकण नसतील तर पावसाचे थेंब तयार होत नाहीत. असा काहीसा प्रकार असेल. असेलच असं नाही.

(वरचा परिच्छेद लेख वाचल्यानंतरही संपादित केलेला नाही.)

त्यांनी लिहील्याप्रमाणे ३ किलोमीटर परिसरात पाऊस पडला आणि १० पैकी नऊ वेळा प्रयोग यशस्वी झाला. दहा हा आकडा थोडा कमी आहे, पण तरीही प्राथमिक पातळीवर विश्वास ठेवायला हरकत नाही. एकदा प्रयोग असफल का झाला याचीही कारणमीमांसा असेल ती वाचली तर प्रयोगावरचा विश्वास वाढण्यास मदत होईल.

अदिती

Nile's picture

11 May 2010 - 3:41 pm | Nile

प्रेग्नन्ट स्त्रीला नऊ महिन्यांनंतर मूल व्हायची दाट शक्यता असते,

दिवस भरले तरी सुद्धा सिझेरीअन करावे लागते ना. तसंच हे.

-Nile

महेश हतोळकर's picture

11 May 2010 - 3:50 pm | महेश हतोळकर

+१ : लेख जरा अतीच वाटला.
-१:
विशेषतः ढग जमा झालेले असले पाहिजेत आणि आर्द्रता भरपूर पाहिजे मगच पाऊस पडण्याचा प्रयोग यशस्वी होतो , असे लिहिले आहे...
( म्हणजे हे वाक्य प्रेग्नन्ट स्त्रीला नऊ महिन्यांनंतर मूल व्हायची दाट शक्यता असते, असे काहीसे वाटले)..

प्रेग्नन्ट स्त्रीचा संदर्भ घेऊनच सांगतो; इंड्युस्ड डिलिव्हरीचे इंजेक्षन ४-५व्या महिन्यात देऊन मूल होत नाही. त्यासाठी ९व्या महिन्यापर्यंत वाट पहावीच लागते. तसेच काहीसे समजा.
एवढा कमी खर्च, एवढे सोपे तंत्रज्ञान पाहून कोणीही विचारात पडेल. सहाजीक आहे. पण आनंद कर्व्यांचं आरती पहा. खूप अविश्वसनीय गोष्टी आहेत तेथे.

शिवाय हा पाऊस प्रयोगामुळे पडला की असान्तसा तो पडणारच होता, हे शोधण्याचा काय उपाय? यावर काही भाष्य नव्हते...
ह्म्म्म शंका रास्त आहे. उत्तर शोधायला/वाचायला आवडेल.

खर्चाविषयी बोलायचे तर एक ढकलकिस्सा आठवला.
अभियंत्यांच्या दोन गटांना एक पेन तयार करण्याचे काम मिळाले. प्राथमीक गरज होती "अंतराळात (शून्य गुरुत्वाकर्षणात) लिहीता यावे". एका गटाने खूप मेहनत घेऊन लाखो रुपये खर्च करून असा पेन बनवला. दुसर्‍या गटाने पेन्सील वापरली.

महेश हतोळकर

रमताराम's picture

11 May 2010 - 10:08 pm | रमताराम

अभियंत्यांच्या दोन गटांना एक पेन तयार करण्याचे काम मिळाले. प्राथमीक गरज होती "अंतराळात (शून्य गुरुत्वाकर्षणात) लिहीता यावे". एका गटाने खूप मेहनत घेऊन लाखो रुपये खर्च करून असा पेन बनवला. दुसर्‍या गटाने पेन्सील वापरली.
आम्हालाही हे ढकलपत्र बर्‍याच ठिकाणाहून आले होते. आता आमची शास्त्र विषयाची अक्कल फार कमी - अगदी शाळकरी - त्यामुळे काय कळं ना. आता पेन्सिलमधे म्हणे ग्रफाईट असते, कार्बनचे समस्थानिक. अगदी मऊ नि हाताने सहज चुरा होणारे. बरे कार्बनचे समस्थानिक असल्याने अगदी जोरदार नाही पण वीजवाहक. आता शून्य गुरुत्वाकर्षणात जर पेन्सिल वापरली नि हे ग्रफाईटचे कण तरंगत जाउन कोणत्याही सर्कीटमधे घुसून हाहा:कार माजवतील की काय अशी आम्हाला उगीच भीती वाटली. पण इतके लोक ढकलपत्र पाठविताहेत म्हणजे हे खरेच असेल नाही का?

आनंद घारे's picture

19 May 2010 - 9:14 am | आनंद घारे

अधिक माहितीसाठी थ्री ईडियट्स हा चित्रपट पहावा.

आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

आंतरजालावर हा दुवा सापडला :
http://www3.interscience.wiley.com/journal/116316045/abstract?CRETRY=1&S...

मोठ्या प्रमाणात अति-उष्ण तापमानाचे मिठचे अतिसूक्ष्म कण जमिनीवर तयार केले, तर वारा नसल्यास जमिनीपासून क्युम्युलोनिंबस ढगांच्या उंचीपर्यंत उष्णतेचा स्तंभ पोचू शकेल - कदाचित.

९/१० वेळा प्रयोग यशस्वी झाला, त्याबरोबर हा दुसरा आकडासुद्धा महत्त्वाचा. प्रयोगस्थिती योग्य असताना वरुणयंत्राचा वापर केला नाही तर साधारण किती वेळा पाऊस पडतो?

जर सामान्यपणे यंत्रविरहित पावसाची ५०% वि. ५०% संभवनीयता असेल, आणि वरुणयंत्राने संभवनीयता ९०% वि. १०% इतकी अधिक होणार असेल, समजा. तेवढ्या मोठ्या फरकाबद्दलही संख्याशास्त्रीय आधार (८०% संख्याशास्त्रीय "पावर" इतका) बळकट होण्यासाठी २५ (यंत्रासहित) + २५ (यंत्र चालू न करता) = ५० वेळा प्रयोग व्यावा
असे माझे ढोबळ गणित आहे.
(अर्थात ५० पैकी कुठल्या २५ प्रयोगांमध्ये यंत्र बंद ठेवले जाईल, ते नाणेफेकीने-यदृच्छेने ठरवणे महत्त्वाचे आहे.)

जर यंत्राविना पावसाची संभवनीयता ७५% असेल तर संख्याशास्त्रीय बळकटीसाठी खूप अधिक वेळा प्रयोग करावा लागेल. ११३+११३ = २२६ वेळा.

वरुणयंत्राचा प्रभाव किती क्षेत्रफळापर्यंत जातो? याबद्दल कल्पना असल्यास एकाच दिवशी एके ठिकाणी यंत्र चालू करून, तर एके ठिकाणी यंत्र चालू न करता प्रयोग केलेला बरा.

अर्थातच या क्षणी कुठल्या ग्रामपंचायतीने या यंत्रावर खर्च करणे योग्य नाही.

नितिन थत्ते's picture

12 May 2010 - 8:19 am | नितिन थत्ते

नेहमी अशा प्रकारांवर टीका करणार्‍या काही मंडळींकडून थोडीशी समर्थनात्मक वाक्ये वाचून ओक यांचा मोठाच गोंधळ उडाला असण्याची शक्यता आहे. =)) . हे लोक नाडीवर मात्र का तुटून पडतात बॉ.

पण अदिती आणि धनंजय यांच्या प्रतिसादाचे विश्लेषण केले तर त्यांच्या लक्षात येईल की ओपन माईंड ठेवायला कुणाचीच हरकत नसते पण त्यावरून चिकित्सा थिअरी मान्य करण्याचे निकष कसे ठरवावे वगैरे याचा विचार करावा लागतो.

उदा
अदिती: १० पैकी ९ वेळा यशस्वी.....१० हा आकडा कमी आहे पण प्राथमिक विश्वास.....

धनंजय: शक्य वाटते पण....ढोबळ गणिताने अमुक इतक्या शक्यतेसाठी ५० प्रयोग आणि इतक्यासाठी २२६ वेळा प्रयोग....

नितिन थत्ते

ओपन माईंड ठेवायला कुणाचीच हरकत नसते पण

थोडीशी समर्थनात्मक वाक्ये वाचून ओक यांचा मोठाच गोंधळ उडाला असण्याची शक्यता

राष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान दिनानिमित्त... वरुण यंत्र - यज्ञ तंत्राचा जाहीर निषेध
हा धागा टाकून मी वाट पहात होतो तेच नेमके झाले.
ज्योतिष किंवा भविष्य अशा शब्दांचा नुसता संदर्भ आला की ओपन माईंडवाल्यांना अनुभव घ्यायला का अवघड जावे हा त्यांनी विचार करण्यासारखा आहे.

चिकित्सा थिअरी मान्य करण्याचे निकष कसे ठरवावे वगैरे याचा विचार करावा लागतो.

नाडी ग्रंथांच्या बाबत निकष कसे ठरवावेत, काय असावेत याची चर्चा जरूर करावी पण आधी अनुभव तर घ्याल. त्यालाच जर कोणी नाकारत असेल तर मग निकष कसे ठरवणार, मिपावर काहींनी नाडीग्रंथांचा आस्वाद घ्यायचे ठरवले असल्याचे म्हटले गेले पण ते अपेक्षेप्रमाणे बोलघेवडे ठरले.
फतेहपुर सीक्री सहल धाग्याने मी ते हळूवारपणे दर्शवले होते.

नाडी ग्रंथाच्या चिकित्सेसाठी मिपावरील आपणासारख्या अनेकांनी विविध टिपण्यातून व माझ्या अन्य घाग्यातून "चिकित्सा थिअरी मान्य करण्याचे निकष " माहित असून त्याकडे जाणीवपुर्वक टाळले जाते हे लक्षात येते.
आपल्या सोईसाठी इथे मी आधी उल्लेख केलेला महत्वाचा निकष पुन्हा नमूद करतो - नाडीग्रंथांच्या ताडपट्टीत व्यक्तीचे नाव कोरुन येते का? येत असेल तर ते कसे? याचा शोध घेणे-
आता यात भविष्य वा ज्योतिष याचा संदर्भ आला कुठे? हा तर निखळ तमिळभाषेचा -लिपीचा शोध आहे.
मी माझ्याबाजूने केलेल्या अभ्यासाचा पुरावा सादर केला. तो मिपावरील काहींनी वाचून सत्य असल्याचा निर्वाळा दिल्याचे आपणास आठवत असेल.
त्याकडे दुर्लक्षकरून मिपाचे लोक आम्ही विचारतो त्या प्रश्नांची उत्तरे ओक देत नाहीत-टाळतात असा कांगावा करतात.
मी आत्ताच नमूद करतो की - जसा पुर्वी मला अंनिसवादी लोकांनी केलेल्या बहाण्याचा अनुभव आला त्याप्रमाणे - काही मिपाकर नाडीग्रंथांचा अनुभव मी म्हणतो म्हणून घेतीलही. पण ते अशासाठी की नंतर म्हणायला की ओकांचा आग्रह होता म्हणून त्यांच्या समाधानासाठी अनुभव घेतला. अन्यथा आम्हाला तो घ्यायची गरज नव्हती. आम्ही आधीच मानतो की नाडी-वाडी सर्व थोतांड आहे.
मात्र कोवूर,बी प्रेमानंद आदी दिग्गजांपासून ते मा श्री रिसबुड, प्रकाश घाटपांडे, दाभोळकर, शाम मानव आदी ज्या सर्वांनी छातीठोकून नाडीग्रंथांना थोतांड ठरवले त्यातल्या एकानेही नाडी पट्टीचा, त्यातील भाषेचा-लिपीचा, व्यक्तीच्या नावांचा पुरावा सादर करून काही म्हणणे मांडले असेल तर ते त्यांनी सादर करावेत. मी माझ्यापरीने ते पुरावे सादर केलेले आहेत. शिवाय त्यातच आपल्याकडून माहिती काढून तीच आपल्याला सांगितली जाते या आरोपाची शहानिशा आपोआप होते. बर त्यांनी नाही केले तर मिपाकरांनी करावेत.त्यांना तर कोणी आडवले नाही ना?

नाडी ग्रंथावरील अधिक माहितीसाठी
http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत

धनंजय's picture

12 May 2010 - 11:43 pm | धनंजय

कुठले निकष टाळले?

तुमचा गळ काय आडकवण्याकरिता आहे हे समजले होते. मिळालेले उत्तर तुम्हाला नीट समजावे म्हणून माझ्या उत्तरात निकष स्पष्ट दिलेले आहेत. कदाचित तेही समजणे कोणाला क्लिष्ट जाईल म्हणून नितिन थत्ते यांनी पुन्हा वेगळ्या शब्दात सांगितले.

शिवाय माझा निष्कर्ष : "कुठल्या ग्रामपंचायतीने आतातरी खर्च करू नये" हे वाचायचे राहिलेले दिसते.

आपणाला आणि मला एकमेकांची अगदी सामान्य विधानेही कळत नाहीत, हे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे तुम्ही वाटल्यास येथे प्रतिसाद द्या, त्यास उत्तर मी देणार नाही.

मृगनयनी's picture

13 May 2010 - 11:38 am | मृगनयनी

"विजय भटकरां" सारख्या ज्येष्ठ शास्त्रज्ञाने स्वत: नाडी-ज्योतिषाद्वारे स्वतःची "पट्टी" तपासलेली आहे.
व नाडी-ज्योतिषा'मध्ये कसलीही फसवेगिरी नसल्याचा निर्वाळा'ही दिलेला आहे.
______________

मला स्वतःला "अगस्ति-कौशिक-पट्टी" आणि "अत्रि-जीव-नाडी" यांचा फायदा झालेला आहे.
नाडी-ज्योतिषा'मुळे मिळालेल्या बहुमूल्य सल्ल्यांमुळे माझे अनेक संकंटांपासून रक्षण झालेले आहे.

______________

प्राचीन ऋषी-मुनींच्या ग्रंथसम्पदेतील "नाडी-ज्योतिष" हा एक अमोल ठेवा आहे. आपण सर्वांनी त्याचा उचित लाभ घ्यावा!

______________

नाडी-भविष्या'चा अनुभव न घेता कृपया त्याबद्दल अनुचित बोलून गैरसमज पसरवू नये व महान "ऋषी-श्रेष्ठां"चा अपमान करू नये.

______________

आपल्या दिव्य-ज्ञानाद्वारे ५००० वर्षांपूर्वी अगस्ति, कौशिक, भृगु, अत्रि, वसिष्ठ, इ ऋषींनी लिहिलेली आणि त्यांच्या दाक्षिणात्य वंशजांनी ताडपत्री'च्या सहाय्याने जतन केलेली "भविष्ये" आज आपल्याला सहज उपलब्ध आहेत, हे खरोखर केवढे मोठे भाग्य आहे! :)

केवळ अंगठ्या'च्या एका ठशावरून, त्या व्यक्तीच्या जीवनाचा पट एका पट्टी'तून उलगडला जातो. भूतकाळाबरोबरच वर्तमान आणि भविष्यातील सर्व घटनांची तंतोतंत माहिती मिळणे, अशुभ घटना टळण्यासाठी योग्य ते उपाय सांगितले जाणे, इतकेच नव्हे तर मागच्या जन्मीच्या पाप-पुण्याचा आढावा घेऊन त्याचा या जन्माशी असलेला संबंध सांगणे,.... इ.इ... अनेक गोष्टी आपल्याला समजतात....

या विज्ञानयुगातल्या इतर कुठल्याही चमत्कारापेक्षा किन्वा शोधापेक्षा हा नाडी-ज्योतिषा'चा शोध सर्वांत मोठा चमत्कारच आहे.

|| हरि ओम ||

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

नितिन थत्ते's picture

13 May 2010 - 11:52 am | नितिन थत्ते

>>केवळ अंगठ्या'च्या एका ठशावरून, त्या व्यक्तीच्या जीवनाचा पट एका पट्टी'तून उलगडला जातो. भूतकाळाबरोबरच वर्तमान आणि भविष्यातील सर्व घटनांची तंतोतंत माहिती मिळणे, अशुभ घटना टळण्यासाठी योग्य ते उपाय सांगितले जाणे, इतकेच नव्हे तर मागच्या जन्मीच्या पाप-पुण्याचा आढावा घेऊन त्याचा या जन्माशी असलेला संबंध सांगणे,.... इ.इ... अनेक गोष्टी आपल्याला समजतात....

तुम्ही अनुभव घेतला आहे का?

असो. पूर्वी मिपावर "प्रणति, राज, हेन्री..." असा एक आयडी होता त्याची आठवन झाली.

नितिन थत्ते

मृगनयनी's picture

13 May 2010 - 12:22 pm | मृगनयनी

तुम्ही अनुभव घेतला आहे का?

हो मी स्वतः "नाडी-ज्योतिषा"चा अनुभव घेतलेला आहे.
अगस्ति-कौशिक-अत्रि- ऋषींच्या मार्गदर्शनामुळे अनेक संकंटांपासून माझे रक्षण झालेले आहे. आणि त्याबद्दल मी त्यांची खरोखर आभारी आहे.

असो. पूर्वी मिपावर "प्रणति, राज, हेन्री..." असा एक आयडी होता त्याची आठवन झाली.

:-? तुम्हाला "आठवण" म्हणायचेय का?

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

Dipankar's picture

13 May 2010 - 12:32 pm | Dipankar

राजा जनमेजयाची गोष्ट माहीतच असेल , तो मृत्यु कळुन सुद्धा टाळु शकला नाही, तर भविष्य कळुन काय फायदा?
आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 May 2010 - 12:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कोण विजय भटकर? त्यांनी फक्त स्वतःचं भविष्य पाहून निर्वाळा दिला आहे का काही वैज्ञानिक, सांख्यिकी चाचण्या घेऊन हा निष्कर्ष काढला आहे?

"मला स्वतःला हेल्मेट घालून स्कूटरवर बसल्याचा फायदा झाला आहे, तुम्हीही हेल्मेट वापरा", असं कानीकपाळी ओरडून किती फरक पडतो की या नाडी भविष्याच्या अनुभवावर कोणी विश्वास ठेवावा?

केवळ अंगठ्याच्या ठशावरून श्री. ओंकार पाटील यांना काय सांगितलं ते आपण सर्वांनीच वाचलं आहे. (पकाकाका, लिंक देऊन मदत करा). त्यात काय म्हणे नवीन सांगितलं त्यांना?
माझ्या आईचं नाव म ने सुरू होतं का वडीलांचं नाव त्रयोदशाक्षरी आहे हे दुसर्‍या कोणाकडून ऐकून घेऊन माझा काय फायदा होणार?

हे ऋषी श्रेष्ठ खरोखर महान होते तर कोणा सोम्यागोम्या, लिंबूटिंबूने बोलून त्यांचा अपमान कसा होतो?

आपल्या दिव्यज्ञानाद्वारे या ऋषींनी काही गोष्टी लिहून ठेवल्या आहेत तर मग घाटपांडे काकांची आणि त्यांच्या मित्रगणाच्या नाडीपट्ट्या कोणी हरवल्या?

विज्ञानात कोणताही चमत्कार नसतो ... चमत्कार या शब्दाचा अर्थ काहीसा वेगळा आहे. पण नाड्यांना चमत्कार मानणं हा तुमचा व्यक्तीगत निर्णय आहे. आणि नाड्यांना तमिळ लिपीपलिकडे महत्त्व देणे हास्यास्पद आहे हा माझा व्यक्तीगत विचार आहे.

अदिती

मृगनयनी's picture

13 May 2010 - 1:31 pm | मृगनयनी

कोण विजय भटकर?
:-? :-? :-?
ह्म्म्म्म! :|

http://en.wikipedia.org/wiki/Vijay_P._Bhatkar

हे विजय भटकर! 'परम' सुपरकॉम्प्युटर- मालिकेचे शोधक!

केवळ अंगठ्याच्या ठशावरून श्री. ओंकार पाटील यांना काय सांगितलं ते आपण सर्वांनीच वाचलं आहे. (पकाकाका, लिंक देऊन मदत करा). त्यात काय म्हणे नवीन सांगितलं त्यांना?
माझ्या आईचं नाव म ने सुरू होतं का वडीलांचं नाव त्रयोदशाक्षरी आहे हे दुसर्‍या कोणाकडून ऐकून घेऊन माझा काय फायदा होणार?

३/४ वि. आदिती, आपल्याला मिळालेली माहिती अर्धवट आहे. नुसत्या आई-वडिलांच्या नावाची लांबी-रुन्दी सांगायला नाडी-केन्द्रे उघडलेली नाहीत. "ती" पट्टी तुमचीच आहे की नाही, याची खात्री करून घेण्यासाठी काही प्रश्न विचारले जातात. अ‍ॅक्चुअल "पट्टी" वाचणे हे त्याच्या पुढे सुरु होते!

हे ऋषी श्रेष्ठ खरोखर महान होते तर कोणा सोम्यागोम्या, लिंबूटिंबूने बोलून त्यांचा अपमान कसा होतो?

हे ऋषी -अगस्ति, कौशिक, अत्रि, वसिष्ठ, भृगु.. इ होत.

प्रभू रामचंद्राने गुरु मानलेले वसिष्ठ, राम-लक्ष्मण-सीता वनवासाला आलेले असताना त्यांना मार्गदर्शन करणारे अगस्ति-मुनी, ज्यांचे पदलांच्छन स्वतःच्या छातीवर अभिमानाने "श्रीवत्सलांच्छन" म्हणून भगवान महाविष्णु मिरवतात- ते भृगु ऋषी!
साक्षात "दत्तगुरु" स्वतःला ज्यांचे पुत्र म्हणवून घेतात ते "महर्षि- अत्रि-मुनी"
या सर्वांना जर कुणी सोम्यागोम्या किन्वा कुणी रावसाहेब, बाबासाहेब कमी लेखत असतील किन्वा त्यान्ची चेष्टा करत असतील... तर ते "माध्यान्हसमयी सूर्यावर थुन्कल्याप्रमाणेच होते"

अर्थात, त्यामुळे महर्षिंना काहीच फरक पडणार नाही. पण या गुरुतुल्य ऋषी-मुनींची ,त्यान्च्या ग्रन्थसम्पदेची चेष्टा करणे हा हिन्दु-धर्मीयांच्या देवतांचा अपमान आहे. आणि तो नक्कीच निषेधार्ह आहे!

आपल्या दिव्यज्ञानाद्वारे या ऋषींनी काही गोष्टी लिहून ठेवल्या आहेत तर मग घाटपांडे काकांची आणि त्यांच्या मित्रगणाच्या नाडीपट्ट्या कोणी हरवल्या?

पट्टी शोधण्यासाठी नाडी-केन्द्रामधील लोकांना वेळ हवा असतो. जर एखाद्या व्यक्तीची "पट्टी" त्यावेळी available नसेल, तर त्या केन्द्रामधील प्रमुख त्यांचे कार्ड संबंधित व्यक्तीस देऊन ४-५ दिवसांनी फोन करण्यास सांगतात. कारण ही नाडी-केन्द्रे संपूर्ण भारतभर आहेत. त्यामुळे त्या व्यक्तीच्या अंगठ्याचा "ठसा, जन्म-दिनांक" हा सर्वत्र पाठवला जातो. व त्या ठश्याशी मिळत्या-जुळत्या पट्ट्या संबंधित केन्द्रात मागवल्या जातात. अर्थात या "प्रोसेस'ला काही दिवस लागतात.
त्यामुळे follovv up ठेऊन 'पट्टी ' आलेली आहे की नाही, हे पहाणे त्या व्यक्तीचे काम असते... जिला स्वतःची पट्टी खरोखर बघायची आहे.

पण नाड्यांना चमत्कार मानणं हा तुमचा व्यक्तीगत निर्णय आहे. आणि नाड्यांना तमिळ लिपीपलिकडे महत्त्व देणे हास्यास्पद आहे हा माझा व्यक्तीगत विचार आहे.

ह्म्म्म.. ते तर आहेच! पण तरीही "पवित्र नाडी भविष्याचा" ज्यांनी खरोखर अनुभव घेतलेला आहे, त्यांना आणि त्यांच्या अनुभवांना कमी लेखणे, हेही चुकीचे आहे!
:)

असो! तुमचे कल्याण असो! || हरि ओम||

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

Nile's picture

13 May 2010 - 1:33 pm | Nile

एक सोपा प्रश्न.

जगाची लोकसंख्या कीती आहे? तितक्या नाड्या आहेत का?

-Nile

मृगनयनी's picture

13 May 2010 - 2:14 pm | मृगनयनी

"नाईल" जी, कशाला विश्वाची चिन्ता करताय? :-?

| जे पिन्डी तेच ब्रह्मांडी |

तुम्हाला तुमची नाडी-पट्टी हवीये का? हवी असेल तर "उजव्या हाताचा अंगठा" बरोबर घेऊन जवळच्या "नाडी-केन्द्रा"ला अवश्य भेट द्या. :)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

Nile's picture

13 May 2010 - 6:24 pm | Nile

"मृगनयनी" जी, याला आमच्या भाषेत सारासार विचार म्हणतात. विश्वाची चिंता नव्हे. अंधपणे कुणीतरी काहीतरी म्हणतंय म्हणुन नाडीकेंद्रात कुणाच्यातरी-कसल्यातरी नाड्या बघायला जायचं कारण नाही कारण मला सारासार विचार करता येतो.

पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे काय? इथे त्याचा काय संबंध?

-Nile

मृगनयनी's picture

13 May 2010 - 2:15 pm | मृगनयनी

"नाईल" जी, कशाला विश्वाची चिन्ता करताय? :-?

| जे पिन्डी तेच ब्रह्मांडी |

तुम्हाला तुमची नाडी-पट्टी हवीये का? हवी असेल तर "उजव्या हाताचा अंगठा" बरोबर घेऊन जवळच्या "नाडी-केन्द्रा"ला अवश्य भेट द्या. :)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

Dipankar's picture

13 May 2010 - 2:45 pm | Dipankar

राजा जनमेजयाची गोष्ट माहीतच असेल , तो मृत्यु कळुन सुद्धा टाळु शकला नाही, तर भविष्य कळुन काय फायदा?

आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

मृगनयनी's picture

13 May 2010 - 3:18 pm | मृगनयनी

राजा जनमेजयाची गोष्ट माहीतच असेल , तो मृत्यु कळुन सुद्धा टाळु शकला नाही, तर भविष्य कळुन काय फायदा?

दीपंकर, माणूस जन्माला येतो... तेव्हाच त्याचा मृत्यू निश्चित झालेला असतो. त्यामुळे तो टाळण्याचा प्रश्नच येत नाही!

पण हो, एखाद्याच्या पत्रिकेमधला "अपमृत्यू"चा योग मात्र "नाडी-पट्टी" मधील शान्ति-उपायांमुळे टळू शकतो. हेही तितकंच खरं आहे.

अर्थात प्रत्येक माणसाचे जसे प्राक्तन वेगळे असते, त्याप्रमाणे त्याचे उपाय'ही वेगळे असतात.

आणि प्रत्येकाचे भोगही!

आणि हो!... 'मार्कंडेय' ऋषींप्रमाणे क्वचितच कुणी असेल... जो कठोर शिवसाधनेने आपले अल्पायुष्य "अतिदीर्घायु" बनवू शकेल!

|| हरि ओम ||

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

Dipankar's picture

13 May 2010 - 4:21 pm | Dipankar

एखाद्याच्या पत्रिकेमधला "अपमृत्यू"चा योग मात्र "नाडी-पट्टी" मधील शान्ति-उपायांमुळे टळू शकतो. हेही तितकंच खरं आहे.

मृत्यू हा अटळ आहे. शान्ति-उपायांमुळे फक्त अंधश्रद्धा वाढतात

आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

मृगनयनी's picture

13 May 2010 - 4:58 pm | मृगनयनी

मृत्यू हा अटळ आहे. शान्ति-उपायांमुळे फक्त अंधश्रद्धा वाढतात

दीपंकर, मृत्यू आणि अपमृत्यू यामधला फरक आपणास कळत नाही का? :-?

ध्यानी-मनी नसताना अचानक आलेला अपघाती मृत्यू हा अपमृत्यू असतो!

अपमृत्यू' मुळे त्या मानवाच्या अनेक इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात...
मृत्यूनंतर त्याला लगेच मुक्ती मिळणे अवघड असते...
अनेक पाप-योनि त्याला नाइलाजाने फिराव्या लागतात.....

हेच... नॉर्मल मृत्यू- मध्ये.. त्या व्यक्तीला बर्‍यापैकी आधी आपल्या मृत्यू'ची जाणीव असते... त्या'च्या इच्छाही जास्त शिल्लक नसतात...
त्यामुळे शांत-मनाने तो मृत्यू'ला सामोरा जातो. व त्याला मुक्तीही लवकर मिळते.

दीपंकर, आपण कदाचित ढोबळमानाने अंधश्रद्धांबद्दल बोलत असाल, परंतु, नाडी-पट्टीतील शान्ति-उपाय तसे नाहीत... त्यामुळे खचितच एखाद्याचा अपमृत्यू टळू शकतो!

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

Dipankar's picture

13 May 2010 - 5:12 pm | Dipankar

ध्यानी-मनी नसताना अचानक आलेला अपघाती मृत्यू हा अपमृत्यू असतो!

मृत्यू हा फोन करुन वा ई-मेल पाठवून येत नाही

आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 May 2010 - 2:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> हे विजय भटकर! 'परम' सुपरकॉम्प्युटर- मालिकेचे शोधक! <<
नाडी आणि परम संगणकाचा काय संबंध? आधीच्या प्रतिसादातल्या पुढच्या प्रश्नाची पुनरावृत्ती: विजय भटकरांनी निर्वाळा दिला आहे म्हणून मानायचं का त्यांनी काही विश्वासार्ह प्रयोग केले आहेत म्हणून मानायचं? व्यक्तीपूजक नसल्यामुळे "फक्त अमका माणूस म्हणाला" म्हणून मी तरी विश्वास ठेवू शकत नाही.

श्री. ओंकार पाटील यांच्या संपूर्ण अनुभवावरून त्यांना काहीही नवीन, वेगळं सांगितलं आहे असं दिसत नाही. नातेवाईकांची नावं, संख्या इ.इ. गोष्टींवरून पट्टीची खात्री करून घेतली याच्या पुढे काय झालं हे त्यांच्या अनुभवातून समजत नाही.

देवादिकांच्या बाबतीत माझी मतं आत्यंतिक असल्यामुळे साक्षात देवादिकांची उदाहरणं देऊनही ऋषींचं महत्त्व मला पटणार नाही.
ॠषी कोण होते हा प्रश्न मला पडलेला नाही, त्याने मला फरक पडत नाही. पण कोणी शंका विचारल्या म्हणून कोणा दुसर्‍याचा अपमान होतो का हा प्रश्न आहे.

घाटपांडे काका+मित्रगणाचा अनुभव आहे, "तुमच्या पट्ट्या मिळत नाहीत" असं त्यांना सांगण्यात आलं आहे. आमच्या नाड्या/पट्ट्या/नाडीपट्ट्या असतील याची काय खात्री?
आणि नाईलचा प्रश्न याच संदर्भात आहे, जगात लोकं किती, तेवढ्या नाड्या आहेत का, जगातल्या सगळ्या लोकांना नाड्या नसतील तर का नाहीत, आमच्या असतीलच कशावरून?
आम्ही फक्त स्वतःबद्दलच विचार करावा, इतरांच्या नाड्यांची चिंता करू नये असं आमच्या असल्या-नसलेल्या पट्ट्यांमधे लिहीलं असेल तर ते आम्ही (नाईल, मी, इ.इ) आत्ताच खोटे ठरवत आहोत.

"आम्हाला अनुभव आला आहे" हे वाक्य मान्य करता येतं, जेव्हा काय अनुभव आला आहे याचंही वर्णन दिलं जातं. हेल्मेट घातलेलं असताना अपघात झाला आणि डोक्यावर पडल्यास डोक्याला कमी जखमा, त्रास होतात हा माझा अनुभव आहे, अशा काहीशा पद्धतीने अनुभव सांगितला तर तो जास्त विश्वासार्ह ठरू शकतो. त्यातही 'नवा करार'मधे लिहील्याप्रमाणे "येशूने हात लावला आणि कुष्ठ बरे झाले" वगैरे सांगितलं तर हेटाळणी वाट्याला येण्याचीच शक्यता जास्त!

आमचे कल्याण होण्यापेक्षा आमचं नारायणगाव होवो! ;-) *

अदिती
*कल्याणचा रेडीओ टेलिस्कोप आता बंद आहे, नारायणगावचा सुरू आहे.

Dipankar's picture

13 May 2010 - 3:40 pm | Dipankar

>>>>>>> घाटपांडे काका+मित्रगणाचा अनुभव आहे, "तुमच्या पट्ट्या मिळत नाहीत" असं त्यांना सांगण्यात आलं आहे. आमच्या नाड्या/पट्ट्या/नाडीपट्ट्या असतील याची काय खात्री?
आणि नाईलचा प्रश्न याच संदर्भात आहे, जगात लोकं किती, तेवढ्या नाड्या आहेत का, जगातल्या सगळ्या लोकांना नाड्या नसतील तर का नाहीत, आमच्या असतीलच कशावरून?

योग्य प्रश्न

>>"येशूने हात लावला आणि कुष्ठ बरे झाले" वगैरे सांगितलं तर हेटाळणी वाट्याला येण्याचीच शक्यता जास्त!

असे काही आपल्या निधर्मी देशात बोलायचे नसते

आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

मृगनयनी's picture

13 May 2010 - 4:39 pm | मृगनयनी

व्यक्तीपूजक नसल्यामुळे "फक्त अमका माणूस म्हणाला" म्हणून मी तरी विश्वास ठेवू शकत नाही.

exactly!!!!

३/४ विक्षिप्त अदिती.... एवढा सारा खटाटोप मला सांगण्यापेक्षा आपण स्वत: जवळच्या नाडी-केन्द्राला भेट का देत नाही?

ओन्कार पाटील, घाटपांडे काका+ मित्रगण यांचे अनुभव सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः जाऊन तिथे तुम्हाला काय अनुभव आला... हे सांगितलेत तर बरं होईल!

आपल्याला आणि आपल्या समविचारी लोकांना येवढेच कुतुहल असेल तर, ---ज्याप्रमाणे मी स्वतः नाडी-ज्योतिष कार्यालयात जाऊन पट्टी पाहिली (आणि जी मला लगेच मिळाली!!! :) ), त्याप्रमाणे आपणही प्रत्यक्ष जाऊन बघावे आणि मग बोलावे.

(कसं असतं ना!... उथळ पाण्याला फार खळखळाट असतो!.... पण एकदा नाडी-केन्द्रात जाऊन आलात तर ही खळ्खळ थाम्बून मनाला आणि त्यातील विचारांना समुद्रासारखी Depth येइल!)

नाडी-ज्योतिषानुसार पट्टी पहायला / अंगठ्याचा ठसा द्यायला आलेली व्यक्ती कोणत्या उद्देशाने पट्टी बघायला आलेली आहे' हेही त्या पट्टीमध्ये लिहिलेले असते. त्यामुळे कुणी सांगितले जरी नाही तरी कोण चेष्टा करण्यासाठी येतंय, कोण खरोखर पट्टी पाहण्यासाठी येतंय?... हे केंद्रातील पट्टी-शोधकांना बरोबर कळते.

आणि हो, नाडी-पट्टी' ही प्रत्येकाची बनलेली असते. ज्यांना "तुमची पट्टी नाही" असे उत्तर मिळाले असेल.. त्यांची "पट्टी may be दुसर्‍या एखाद्या केन्द्रात असेल , किन्वा त्या कुणा...व्यक्तीचा उद्देश "नाडी-ज्योतिषा"ची खिल्ली उडवण्याचा असेल... त्यामुळे कदाचित अजून पर्यंत "त्यां"ची पट्टी वाचायचा योग आलेला नसावा!!! :-?

त्यामुळे ३/४ विक्षिप्त अदिती, नाईल्....आणि इतर समविचारी,

नाडी-ज्योतिषाबद्दल असं Virtually बोलण्यापेक्षा आणि हवेत तीर मारण्यापेक्षा कुतुहलापोटी का होईना... पण मनात शुद्ध भाव ठेवून जवळच्या "नाडी-केन्द्रा" मध्ये स्वतःची पट्टी पाहण्यासाठी गेलात , तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील!

आणि हो!, उत्सुकतेपोटी प्रश्न विचारणे आणि चेष्टा करणे यामध्ये खूप फरक असतो! त्यामुळे थोर महर्षि- ऋषी-मुनींबद्दल कृपया आदराने बोलावे.

भारत हे जरी निधर्मी राष्ट्र असले तरी जगामध्ये ते एक "हिन्दु-राष्ट्र" म्हणूनच ओळखले जाते.

|| हरि ओम ||

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 May 2010 - 5:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आपल्या टंकनात अंमळ गणिती चूक आहे, ३/४ नसून ३_१४ आहे ... आम्ही 'पाय'भक्त आहोत.

>>आपण स्वत: जवळच्या नाडी-केन्द्राला भेट का देत नाही?<<
तिथे जाऊन काही उपयुक्त गोष्ट होईल किंवा आनंद वाटेल, काही पॉझिटीव्ह गोष्ट होईल याची अजूनही खात्री पटलेली नाही.

ओंकार, घाटपांडे काका+मित्रगण यांनी आपले अनुभव स्वच्छपणे लिहीले आहेत, यात काहीही व्यक्तीपूजा नाही. त्यांच्या अनुभवांवरून कोणालाही निष्कर्ष काढता येतो; "अमक्यातमक्याने विश्वास ठेवला आहे तर तुम्ही का नाही विश्वास ठेवत!" ही व्यक्तीपूजा झाली!

नाडीकेंद्रात जाऊन विचार समुद्रासारखे खोल होतात हा नवीनच दावा माझ्या ऐकण्यात आला आहे. हा दावा प्रत्यक्ष नाडी लिहीणार्‍यांनी किंवा अभ्यासकांनी केला आहे का हे आपलं स्वतःचं विधान आहे? असो. माझ्या मनात नसलेल्या खळखळीची काळजी करण्याबद्दल आभार! आणि शक्यतो यापुढे आपण व्यक्तीगत विधानं करणार नाहीत ही अपेक्षा!

एखाद्याच्या डोक्यात नाडीबद्दल अनादर नाही पण अजिबात आदर आणि भक्तीही नाही तर त्या व्यक्तीला तिची नाडी मिळते का? अशा प्रकारचा खुलासा नाडीकेंद्रातून अधिकृतपणे सांगतात का हा तुमचा निष्कर्ष आहे?

>> उत्सुकतेपोटी प्रश्न विचारणे आणि चेष्टा करणे यामध्ये खूप फरक असतो! त्यामुळे थोर महर्षि-ऋषी-मुनींबद्दल कृपया आदराने बोलावे.<<
आदर न करणे अथवा चेष्टा करणे ही गोष्ट सापेक्ष असावी. एखाद्या माणसाला थोर मानणे न मानणे ही गोष्ट वेगळी आणि त्याची चेष्टा करणं वेगळं! आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल आदर असेल आणि दुसर्‍याला नसेल, तर दुसर्‍याने त्या व्यक्तीचा अपमान केला आहे का नाही हे बहुतांश वेळेस आपण नीट ओळखू शकत नाही.

>> भारत हे जरी निधर्मी राष्ट्र असले तरी जगामध्ये ते एक "हिन्दु-राष्ट्र" म्हणूनच ओळखले जाते.<<
जग भारताच्या धर्माबद्दल काय म्हणतं यापेक्षा भारताच्या घटनेमधे भारत हे निधर्मी राष्ट्र आहे यावर माझा संपूर्ण विश्वास आहे.

अदिती

मृगनयनी's picture

15 May 2010 - 4:23 pm | मृगनयनी

ओंकार, घाटपांडे काका+मित्रगण यांनी आपले अनुभव स्वच्छपणे लिहीले आहेत, यात काहीही व्यक्तीपूजा नाही. त्यांच्या अनुभवांवरून कोणालाही निष्कर्ष काढता येतो; "अमक्यातमक्याने विश्वास ठेवला आहे तर तुम्ही का नाही विश्वास ठेवत!" ही व्यक्तीपूजा झाली!

नाडी आणि परम संगणकाचा काय संबंध? आधीच्या प्रतिसादातल्या पुढच्या प्रश्नाची पुनरावृत्ती: विजय भटकरांनी निर्वाळा दिला आहे म्हणून मानायचं का त्यांनी काही विश्वासार्ह प्रयोग केले आहेत म्हणून मानायचं? व्यक्तीपूजक नसल्यामुळे "फक्त अमका माणूस म्हणाला" म्हणून मी तरी विश्वास ठेवू शकत नाही.

३_४ विक्षिप्त अदिती, कुणी व्यक्तीपूजा करावी म्हणून मी "विजय भटकरां"चा अनुभव सांगितलेला नाही. :)
ज्याप्रमाणे आपण वारंवार घाटपांडे काका + मित्रगण यांचे उदाहरण देऊन नाडी-ज्योतिषाबद्दल "त्यांना" आलेले अनुभव इथे सांगत होतात... त्याप्रमाणेच मी "विजय भटकर" यांचे नाडी-ज्योतिषाबद्दलचे मत इथे प्रकट केले.... केवळ उदाहरणादाखल!
तसं, नाडी-भविष्याबद्दल चांगले मत असणारे, नाडीपट्टी वाचनानन्तर आयुष्यात सकारत्मक बदल घडलेले अनेक लोक माझ्या ओळखीचे आहेत. परन्तु आपण त्यांना ओळखत नसल्यामुळे त्यांची नावे इथे देण्यात मला स्वारस्य वाटले नाही. "विजय भटकर" ही एक प्रतिष्ठित व्यक्ती असल्यामुळे त्यांचा संदर्भ केवळ उदाहरणादाखल दिलेला आहे.

काठावर उभं राहून नदीच्या पाण्याबद्दल वारंवार चौकशी करण्यापेक्षा नदीत उडी मारून पोहायला लागलं, की पाण्याचा अंदाजही येतो आणि अनुभवही!
आणि हो! ही नदी अशी आहे जिथे बुडून मरायची अजिबात भीति नाही! उलट संसार्‍यातल्या संकटांच्या भोवर्‍यात अडकणार्‍याला सही-सलामत बाहेर काढण्यासाठीच ही नदी आहे.
आणि मी स्वतः त्याचा अनुभवही घेतलेला आहे!

श्री. ओंकार पाटील यांच्या संपूर्ण अनुभवावरून त्यांना काहीही नवीन, वेगळं सांगितलं आहे असं दिसत नाही. नातेवाईकांची नावं, संख्या इ.इ. गोष्टींवरून पट्टीची खात्री करून घेतली याच्या पुढे काय झालं हे त्यांच्या अनुभवातून समजत नाही.

याचा अर्थ 'ओन्कार पाटील' यांना नाडीपट्टी-वाचकाने पुढे काहीच सांगितलेले नाही, असा होत नाही!

कदाचित पट्टीद्वारे जे काही सांगितले गेले ते इथे प्रदर्शित करण्याची ओन्कार' यांची इच्छा नसावी! (कारण तो ओन्कार' यान्चा वैयक्तिक प्रश्न आहे!)

आणि नाईलचा प्रश्न याच संदर्भात आहे, जगात लोकं किती, तेवढ्या नाड्या आहेत का, जगातल्या सगळ्या लोकांना नाड्या नसतील तर का नाहीत, आमच्या असतीलच कशावरून?

जगात जेवढे लोक आहेत, त्या सर्वांच्या नाड्या आहेत. तुमची नाडी शोधण्यासाठी जवळच्या नाडी-ज्योतिष्-केन्द्राला भेट द्यावी लागेल.

आम्ही फक्त स्वतःबद्दलच विचार करावा, इतरांच्या नाड्यांची चिंता करू नये असं आमच्या असल्या-नसलेल्या पट्ट्यांमधे लिहीलं असेल तर ते आम्ही (नाईल, मी, इ.इ) आत्ताच खोटे ठरवत आहोत.

=)) =)) ३_४ विक्षिप्त अदिती,.... "इतरांच्या नाड्यांची चिंता करू नये" हा मी कुणाला तरी दिलेला सल्ला होता! असं कुणाच्याही नाडी-पट्टीमध्ये लिहिलेलं नसतं!
प्रत्येकाची पट्टी ही वेगळी असते. अगदी जुळ्या भावंडाची सुद्धा पट्टी वेगवेगळी असते.
अर्थात त्याबद्दल इथे काथ्याकूट करण्यापेक्षा प्रत्यक्ष "तिथे" गेल्यावरच आपल्याला आपल्या पट्टी'त काय लिहिले आहे, याचे ज्ञान होईल! :)

एखाद्याच्या डोक्यात नाडीबद्दल अनादर नाही पण अजिबात आदर आणि भक्तीही नाही तर त्या व्यक्तीला तिची नाडी मिळते का? अशा प्रकारचा खुलासा नाडीकेंद्रातून अधिकृतपणे सांगतात का हा तुमचा निष्कर्ष आहे?

नाडी-पट्टी वाचण्यासाठी प्रत्येक जीवा'ची त्याच्या आयुष्यातली वेळ ही ठरलेली असते. ती "त्या" पट्टीमध्येही नमूद केलेली असते. त्यामुळे नाडी-ज्योतिषाबद्दल अजिबात आदर, भक्ती नसलेल्या लोकांची सुद्धा जर त्यांची 'पट्टी' पहायची "वेळ" आली असेल... तर ती पट्टी नक्की मिळू शकेल. पण हेही तितकेच खरे आहे, की नाडी-ज्योतिषावर मनापासून श्रद्धा असणार्‍या लोकांवर महर्षिंची कृपादृष्टी कायम असते.

अर्थात कुणाचा विश्वास असो किन्वा नसो... पण प्रत्येक जीवाच्या या जन्मीच्या किन्वा पूर्वजन्मीच्या पुण्यसाठयामुळेच त्याला 'पट्टी' वाचण्याचे भाग्य प्राप्त होत असते. अर्थात नाडी-पट्टीतील सल्ल्यांनुसार आयुष्यातील पुढील कर्म करण्याचे किन्वा न करण्याचे स्वातंत्र्य हे प्रत्येक जीवा'ला असते.

उदा.: एखाद्या व्यक्तीस मित्राबरोबर भागीदारीमध्ये व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असेल, पण नाडी-पट्टीतील भविष्यानुसार महर्षिंनी त्या व्यक्तीस भागीदारीत व्यवसाय सुरु न करण्याचा सल्ला असेल... तर
मित्राबरोबर भागीदारी करायची की नाही, हा निर्णय सर्वस्वी त्या" व्यक्तीचा असतो. काही अश्रद्ध लोक महर्षिंच्या सूचनेकडे काणाडोळा करून जर स्वतःला पाहिजे तेच करत असतील... तर त्याला कोणीच काहीच करू शकत नाही.
पण महर्षिंचे न ऐकता, किन्वा त्यांनी सांगितलेले शांति-उपाय न केल्यामुळे कुणाचे त्यांच्या आयुष्यात काही नुकसान झाले, तर मात्र त्यासाठी "नाडी-ज्योतिष" जबाबदार राहत नाही.

त्यामुळेच सहज गंमत म्हणून पट्टी पहायला गेलेल्या व्यक्तीला तिच्या सुदैवाने पट्टी मिळाली, तर कृपया नाडी-पट्टीत सांगितल्याप्रमाणे आचरण करावे. ते तुमच्या फायद्याचेच ठरते! अगस्ति-कौशिकादि ऋषी-मुनी कुणाचे वाईट होऊ देणार नाही, याची खात्री किमान तेव्हा तरी बाळगावी.

एक गोष्ट सगळ्यांसाठी:

गंमत / कुतुहल म्हणून दवाखाना पाहायला गेलेल्या लोकांना डॉक्टर औषधे लिहून देत नाही. पण जो खरोखर पेशंट असतो आणि ज्याला डॉक्टरकडून तपासून घेण्याची इच्छा असते... त्यालाच डॉक्टर तपासून उचित औषधे देतो. अर्थात त्यासाठी पेशंटचा डॉक्टरवर पूर्ण विश्वास असणे गरजेचे असते.

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 May 2010 - 6:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

एकंदर प्रतिसादाबद्दल =)) =)) ... हसून झालं की लिहीण्याचा विचार केला जाईल!

कोण ह्या ३_४ विक्षिप्त अदिती? आणि हे माझ्या टोपणनावाबद्दलच असेल तरः

अंकमालेतल्या १४ आकड्याने तुम्हाला त्रास होईल असं काही तुम्हाला नाड्यांमधून कळलं आहे का? एकदा सांगितल्यानंतरही इतरांच्या छोट्याछोट्या शुद्धलेखनाच्या चुका काढून झाल्यानंतर स्वतः मात्र टोपणनावातही चुका करायच्या याला आमच्या भाषेत शहाजोगपणा म्हणतात! या शहाजोगपणाची शिक्षा किंवा परिमार्जन नाड्यावाल्यांना पैसे चारून होतं का??

का हे अनिरूद्ध जोशी त्यांच्या माकडांना चौदापर्यंतचे आकडे शिकवतच नाहीत?

अदिती

खुद के साथ बातां: नाड्यावाल्यांच्या नाड्याच ढिल्या करण्यासाठी काही लोकांना लिहीण्यासाठी प्रवृत्त करायलाच हवं! रामदास काका, तुमच्या पूर्वजन्मीच्या पापांमुळे तुमची नाडी सापडली नाही हो ... वाचून घ्या हे!

मृगनयनी's picture

18 May 2010 - 7:10 pm | मृगनयनी

बाई... तुम्ही ३_४ असा... नाहीतर ३_१४ असा..... तुमचा "विक्षिप्त"पणा कायम ठेवूनच तुमचे नाव लिहिले जाते... आणि जाईल... याबद्दल विश्वास बाळगा! =))
बाकी नाव काही का असेना... "भावना" तुमच्या पर्यंत पोचल्यात... ना... झालं तर मग! :)

आणि मी ज्यांच्या शुद्धलेखनाच्या चुका काढते... त्यांचा तुम्हाला का हो येवढा पुळका? :-? :-? :-? काही खास कारण आहे का? :-?

आणि हो!...विक्षिप्त'पणापेक्षा शहाजोग'पणा केव्हाही चांगला! :) किमान शहाजोग माणसांचा मेन्दू "सायकिक"तरी नसतो!

कृपया "सद्गुरु अनिरूद्ध-बापूं"ना यामध्ये ओढू नये.... नाडी-ज्योतिषा'चा विषय चालू असताना..त्याबद्दलच बोलावे....
आणि आमचे "बापू" त्यांच्या वानरसैनिकांना काय शिकवतात... या बद्दल विचार करण्यापेक्षा आपला "विक्षिप्त"पणा कसा कमी करता येइल.. याचा विचार करा...

आणि या आधी देखील (काही इतर धाग्यांमधल्या प्रतिसादांमध्ये) वारंवार सांगूनही , काहीही कारण नसताना आणि संबंध नसताना माझ्या गुरूंबद्दल - अनिरुद्ध बापूंबद्दल वारंवार वाट्टेल ती विधाने करत आहात.... ते थांबवा.

त्यांच्याबद्दल आणि त्यांच्यासारख्या गुरुतुल्य व्यक्तीबद्दल लिहिताना तारतम्य बाळगा... का तेवढेही संस्कार तुमच्यावर झालेले नाहीत? :-? की तुमच्या "विक्षिप्त" स्वभावाला अनुसरून चांगले संस्कार ग्रहण करण्याची तुमची क्षमता संपुष्टात आलेली आहे? :-?

३_ १४ च्या वादामध्ये अडकण्यापेक्षा एखाद्या नाडी-केन्द्रात जाऊन ...तुमचा "विक्षिप्तपणा" हे कोणत्या जन्मीच्या पापाचं फळ आहे... याबद्दल विचारणा करा...

मला खात्री आहे.... तुम्हाला नक्की उत्तर मिळेल!

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 May 2010 - 9:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

विसंगतीने भरलेल्या, व्यक्तीगत हल्ले करणार्‍या, विचारहीन आणि अवांतर प्रतिसादाला उत्तर देणं माझ्या सभ्यतेच्या मर्यादेबाहेर आहे; क्षमस्व!
एकदाच आठवण करून देते की सदर धागा वरूण यंत्राबद्दल आहे, नाड्या आणि अनिरुद्ध जोशींबद्दल नाही.

फक्त विषयांतरच करून व्यक्तीगत आरोपांची राळ उडवणार्‍या शहाजोग प्रतिसादांना माझं हे शेवटचं उत्तर!

अदिती

मिसळभोक्ता's picture

19 May 2010 - 5:19 am | मिसळभोक्ता

फक्त विषयांतरच करून व्यक्तीगत आरोपांची राळ उडवणार्‍या शहाजोग प्रतिसादांना माझं हे शेवटचं उत्तर!

अरेरे, आता विरंगुळ्याचे दुसरे साधन शोधायला हवे...

(क्याट फाईट प्रेमी)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 May 2010 - 9:31 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मिभोकाका, एवढीच क्याट फाईट पहायची आहे तर कोणी तुल्यबळ प्रतिस्पर्धी दाखवा ना ... मग चढा झाडावर, पॉपकॉर्न मीच पाठवून देते! ;-)

अदिती

मृगनयनी's picture

19 May 2010 - 12:34 pm | मृगनयनी

विसंगतीने भरलेल्या, व्यक्तीगत हल्ले करणार्‍या, विचारहीन आणि अवांतर प्रतिसादाला उत्तर देणं माझ्या सभ्यतेच्या मर्यादेबाहेर आहे; क्षमस्व!

=)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =))

आपल्या "सभ्यतेच्या मर्यादेबद्दल" इथे काही न बोलणंच उचित ठरेल. :-? ;) =)) =))

क्षमस्व!

ह्म्म्म्म ..चला...यावेळी सुद्धा केलं माफ तुम्हाला!.... मोठ्या मनाने! ;)

एकदाच आठवण करून देते की सदर धागा वरूण यंत्राबद्दल आहे, नाड्या आणि अनिरुद्ध जोशींबद्दल नाही.

ठ्ठोठ्ठो$$$$$$$ ठ्ठो$$$..... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))

:-? :/

फार लवकर कळलं हो तुम्हाला!.... नाही.. कारण नाडी-भविष्या'विषयी विचारण्यात आलेले सगळ्यात जास्त प्रश्न वरती तुमच्याच नावावर जमा आहेत बरं!

आणि हो... माझ्या अनिरुद्ध-बापूंबद्दल वैयक्तिक टीकेला(आणि तेही अत्यंत खालच्या दर्जाला जाऊन ! ) आपण स्वतःच सुरुवात केली!...... आणि तेही कशाचा काही संबंध नसताना!!....

ते सर्व आपण जाणुन बुजुन विसरलात का? ... की आपल्याला खरोखर 'शॉर्ट टर्म मेमरी लॉस' आहे ? :-?
असो!....

फक्त विषयांतरच करून व्यक्तीगत आरोपांची राळ उडवणार्‍या शहाजोग प्रतिसादांना माझं हे शेवटचं उत्तर!

ओह माय गॉड! रीअली!!!!! :-? इफ इट इज.... इट्स माय प्लेझर! :)

- मृगनयनी
|| हरि ओम ||

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

मृगनयनी's picture

15 May 2010 - 5:45 pm | मृगनयनी

आपणा सर्वांच्या माहितीसाठी काही लिन्क्स :

http://www.astroved.com/nadiastrology/?gclid=CNyA7qSO1KECFc9A6wod_1_cIw

http://www.naadiguruonweb.org/

http://www.naadi-shastra.com/

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

Nile's picture

13 May 2010 - 7:54 pm | Nile

उथळ पाण्याला फार खळखळाट असतो!

तो तुमच्या प्रतिसादात दिसलाच. थोतांडांना पटवता नाही आले की अशी व्यक्तीगत टिप्पणी व्ह्यायचीच.

नाडी-ज्योतिषाबद्दल असं Virtually बोलण्यापेक्षा आणि हवेत तीर मारण्यापेक्षा कुतुहलापोटी का होईना

वा वा. ते पुष्पक विमानाबद्दल कोण बोलत होतं हो? हवेत तीर कोण मारतंय ते दिसतच आहे. उद्या काहीही थापा लावाल आणि आम्हाला म्हणाल हे थोर ऋषीमुनिंनी सांगितलं आहे.

पण मनात शुद्ध भाव ठेवून जवळच्या "नाडी-केन्द्रा" मध्ये स्वतःची पट्टी पाहण्यासाठी गेलात , तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील!

मनात शुद्ध भाव ठेवणे म्हणजेच फसण्यास तयार होऊन जाणे का?

भारत हे जरी निधर्मी राष्ट्र असले तरी जगामध्ये ते एक "हिन्दु-राष्ट्र" म्हणूनच ओळखले जाते.

कुठल्या 'जगात' राहतो हो तुम्ही? आणि हिंदु शब्दच अरब लोकांनी दिला ह्या वादाबद्दल काय म्हणणे आहे? आणि हिंदु राष्ट्राचा अन नाडीचा इथे काय संबंध?

नाडीचर्चेवरील धागे वाचा, त्यात उपस्थित केलेले प्रश्न पहा,त्यांची उत्तरे द्या, उत्तरे पटली तर जाउ आम्ही नाडीकेंद्रात. (तसेही जायचे आहेच एकदा, थोतांड सिद्ध करायला मदतच होईल) उद्या तुम्हाला वाटेल ते विधान कराल आणि मग म्हणाल अनुभव घ्या अन मग बोला.

-Nile

मृगनयनी's picture

15 May 2010 - 5:26 pm | मृगनयनी

उथळ पाण्याला फार खळखळाट असतो!

तो तुमच्या प्रतिसादात दिसलाच. थोतांडांना पटवता नाही आले की अशी व्यक्तीगत टिप्पणी व्ह्यायचीच.

:-? माझ्या माहितीप्रमाणे मी स्वतः नाडी-ज्योतिषाचा अनुभव घेतलेला आहे. आणि त्या अनुषंगाने प्रत्येक विधान मी करत आहे. याउलट प्रत्यक्षात कोणत्याही नाडी-केन्द्रात न जाता,नाडी-भविष्याबद्दल अर्धवट आणि ऐकीव माहितीच्या आधारे आपण वेडी-वाकडी विधाने करत आहात. त्यामुळे "उथळ पाणी कोणाचे" हे आपण स्वतःच समजून घ्यावे! :)

वा वा. ते पुष्पक विमानाबद्दल कोण बोलत होतं हो? हवेत तीर कोण मारतंय ते दिसतच आहे. उद्या काहीही थापा लावाल आणि आम्हाला म्हणाल हे थोर ऋषीमुनिंनी सांगितलं आहे.

=)) =)) अरे बाप रे! पुष्पक विमाना'बद्दल तुम्हाला काहीच माहिती नसल्याबद्दल आश्चर्यमिश्रित खेद वाटला!

असो!... तुमच्या माहितीसाठी पुन्हा एकदा:= प्रभू रामचंद्रांनी रावणा'चा विनाश केल्यावर लंकेच्या अशोकवनातून सीतेची सुटका केली. त्यानंतर अगस्ति-ऋषी व माता लोपामुद्रा यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर राम, लक्ष्मण, सीता, बिभीषण, सुग्रीव, अंगद, जांबुवंत इ. सर्वजण "पुष्पक-विमाना"तून अयोध्येला आले.
महारूद्र-हनुमानाची शक्ती ही "क्षणार्धात कित्येक योजने" पार करण्याइतकी मोठी असल्यामुळे रामाच्या पुनरागमनाची बातमी भरताला, अयोध्यावासीयांना देण्यासाठी तो पुढे निघून गेला.

इतकेच नव्हे, तर रावणाने लक्ष्मणरेषा उल्लंघून पुढे आलेल्या सीतेला पळवून लंकेला नेले... तेही एका विमानातूनच! अर्थात "ते" रावणाचे विमान "पुष्पक" नव्हते!
------
सांगण्याचा उद्देश इतकाच की विमानांचा शोध हा फार पूर्वी'चा आहे.
आणि तेव्हाचे तंत्रज्ञानही तितकेच विकसित होते... जितके आजचे आहे!

टीपः वरील घटना व 'पुष्पक विमान' हे रामायणातील आहे. व त्यातील घडलेल्या घटना सत्य आहेत.

मनात शुद्ध भाव ठेवणे म्हणजेच फसण्यास तयार होऊन जाणे का?

असे आपणास वाटत असेल, तर तो आपला भ्रम आणि खूप मोठा गैरसमज आहे.
मी मनामध्ये शुद्ध भाव ठेवून जावे' असे सांगितले. ..'अक्कल गहाण टाकून जा' असे नाही... =))
अर्थात या दोन्हींमधला फरक आपणास कळत असता तर!!! :-?

हिंदु शब्दच अरब लोकांनी दिला ह्या वादाबद्दल काय म्हणणे आहे?

सिन्धु नदीकाठी वसाहती करणार्‍या "आर्य" लोकांमुळे 'सिन्धु-संस्कृती'चा -उदय झाला. (ज्यांचे आम्ही वंशज आहोत!) .या सिन्धु-शब्दाचाच पुढे अपभंश होऊन ते "हिन्दु" असे बनले.
...............
इतकी माहिती माझ्यासाठी पुरेशी आहे...

आणि हिंदु राष्ट्राचा अन नाडीचा इथे काय संबंध?

अगस्ति, कौशिक,.. इ. 'आर्य' (सिन्धू संस्कृतीचे - पर्यायाने हिन्दु-संस्कृतीचे उद्धारकर्ते- )ऋषी दक्षिणेकडे गेल्यावर तेथील "द्रविड" संस्कृतीशी समरस झाले.
या ऋषींनीच खगोलशास्त्राभ्यासाद्वारे आणि आपल्या दिव्य ज्ञानाद्वारे काही हजार वर्षांपूर्वी सर्व जीवांचे नाड-भविष्य ताडपत्रीवर लिहून ठेवलेले आहे.
नाडीचर्चेवरील धागे वाचा, त्यात उपस्थित केलेले प्रश्न पहा,त्यांची उत्तरे द्या, उत्तरे पटली तर जाउ आम्ही नाडीकेंद्रात. (तसेही जायचे आहेच एकदा, थोतांड सिद्ध करायला मदतच होईल) उद्या तुम्हाला वाटेल ते विधान कराल आणि मग म्हणाल अनुभव घ्या अन मग बोला.

या प्रश्नाला वरच्या '३_४ विक्षिप्त अदिती'च्या धाग्यामध्येच उत्तर दिलेले आहे. कृपया ते वाचावे..

|| हरि ओम ||

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

विजुभाऊ's picture

19 May 2010 - 12:49 pm | विजुभाऊ

सिन्धु नदीकाठी वसाहती करणार्‍या "आर्य" लोकांमुळे 'सिन्धु-संस्कृती'चा -उदय झाला. (ज्यांचे आम्ही वंशज आहोत!) .या सिन्धु-शब्दाचाच पुढे अपभंश होऊन ते "हिन्दु" असे बनले.

आपण केवळ आर्यांचेच वंशज नाही तर शक कुशाण हूण मंगोल या सर्वांची जी सरमिसळ झाली त्याचे वंशज आहोत.
आपण जर नुसत्या आर्यांचेच वंशज असतो आणि वंशसातत्याचा आग्रह धरला असता तर आज झोराष्ट्रीयन्स ची जी अवस्था झाली आहे तशीच आपली झाली असती. निम्मी प्रजा वेडसर , विक्षीप्त झाली असती.
भारतात जे जे आले त्या त्या सर्वानी इथल्या प्रजेत सरमिसळीचे काम प्रामाणीकपणे केले.....
असो... आर्य येथे येण्याच्या अगोदर इथे जे अनार्य रहात होते ते द्रवीड, आद्यद्रवीड नाग, वानर ,पिशाच्च , राक्षस वगैरेचे सुद्धा आपण वंशज आहोत.

मृगनयनी's picture

19 May 2010 - 1:36 pm | मृगनयनी

निम्मी प्रजा वेडसर , विक्षीप्त झाली असती.

=)) =)) =)) =))

विजू भाऊ!.... काही शब्दच असे असतात.... की ते वाचले की आपोआप काही व्यक्ती आठवतात! ;)

भारतात जे जे आले त्या त्या सर्वानी इथल्या प्रजेत सरमिसळीचे काम प्रामाणीकपणे केले.....
असो... आर्य येथे येण्याच्या अगोदर इथे जे अनार्य रहात होते ते द्रवीड, आद्यद्रवीड नाग, वानर ,पिशाच्च , राक्षस वगैरेचे सुद्धा आपण वंशज आहोत.

सहमत!...

""आर्य ऋषी दक्षिणेकडे आल्यावर तेथील संस्कृतीशी समरस झाले.."" हे मी वरच्या काही प्रतिसादांमध्ये सुस्पष्ट केलेले आहेच!

आर्यांच्या काही संस्कृती अनार्यांनी आत्मसात केल्या... अनार्यांच्या बर्‍याच चांगल्या गोष्टी आर्यांनी घेतल्या..

पण विजू भाऊ- नाग, द्रविड... वगैरे ठीक आहे... पण "राक्षस" जमात ही अतिशय क्रूर आणि निशाचर म्हणुन ओळखली जायची...

त्यामुळे आर्यांचे आणि राक्षसांचे तितकेसे पटलेले नाही.
आर्यांचे यज्ञ उध्वस्त करण्यासाठी "राक्षस" टोळ्या नेहमी तत्पर असायच्या.

वानरः ही जमात म्हणजे "माकड" नव्हे!... वानर ही अत्यंत पुढारलेली जमात होती... मारुति, सुग्रीव, अंगद... इ. रामभक्त याच जमातीतले होत. राजनीति पासून ते "योगा" पर्यंत सर्व गोष्टी, कला यांना अवगत होत्या. त्याचप्रमाणे यांची राज्ये देखील पुढारलेली होती.

________

असो.... विजुभाऊ- खूप दिवसांनी आपला प्रतिसाद वाचून आनंद झाला!
________

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

महेश हतोळकर's picture

13 May 2010 - 3:23 pm | महेश हतोळकर

मी एक दहा ठश्यांचा संच कुरीयर किंवा फॅक्स ने पाठवला तर पट्टी मिळेल काय?

मृगनयनी's picture

13 May 2010 - 5:03 pm | मृगनयनी

मी एक दहा ठश्यांचा संच कुरीयर किंवा फॅक्स ने पाठवला तर पट्टी मिळेल काय?

नाही! असे केल्याने पट्टी मिळणार नाही!

आपल्याला खरोखर आपले जीवनमान , भविष्य बघण्यासाठी पट्टी हवी असेल तर, आपल्याला जवळच्या नाडी-केन्द्राला किमान एकदा भेट द्यावी लागेल!

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

महेश हतोळकर's picture

13 May 2010 - 7:24 pm | महेश हतोळकर

आपल्याला जवळच्या नाडी-केन्द्राला किमान एकदा भेट द्यावी लागेल!
का? ते नुसते ठसेच तपासतात ना? काहीही प्रश्न न विचारता! मग मी समोर कशाला जायला पाहिजे. फीची चिंता असेल तर तसं सांगा; आगाऊ डीडी पाठवतो.

मृगनयनी's picture

18 May 2010 - 5:59 pm | मृगनयनी

महेश'जी, आपणास नाडी भविष्याबद्दल खूपच त्रोटक माहिती दिसतेय! :(

आणि हो, नाडी -केन्द्रांना पैशाच्या जोरावर नाही हो विकत घेता येणार!... उगीच तुमचा भ्रमनिरास होईल! :-?

आधीच देशात भ्रष्टाचार खूप बोकाळलाये! ....

:)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

महेश हतोळकर's picture

19 May 2010 - 8:53 am | महेश हतोळकर

नाडी -केन्द्रांना पैशाच्या जोरावर नाही हो विकत घेता येणार!

ठीक आहे! माझ्या मूळ प्रश्नाचे उत्तर द्या.

केवळ ठसे देऊन माझी नाडी का नाही मिळणार? मला तेथे स्वतः जाण्याची काय गरज आहे?

Nile's picture

13 May 2010 - 12:08 pm | Nile

आपल्या दिव्य-ज्ञानाद्वारे ५००० वर्षांपूर्वी अगस्ति, कौशिक, भृगु, अत्रि, वसिष्ठ, इ ऋषींनी लिहिलेली आणि त्यांच्या दाक्षिणात्य वंशजांनी ताडपत्री'च्या सहाय्याने जतन केलेली "भविष्ये" आज आपल्याला सहज उपलब्ध आहेत, हे खरोखर केवढे मोठे भाग्य आहे! Smile

=)) =))

केवळ अंगठ्या'च्या एका ठशावरून, त्या व्यक्तीच्या जीवनाचा पट एका पट्टी'तून उलगडला जातो. भूतकाळाबरोबरच वर्तमान आणि भविष्यातील सर्व घटनांची तंतोतंत माहिती मिळणे, अशुभ घटना टळण्यासाठी योग्य ते उपाय सांगितले जाणे, इतकेच नव्हे तर मागच्या जन्मीच्या पाप-पुण्याचा आढावा घेऊन त्याचा या जन्माशी असलेला संबंध सांगणे,.... इ.इ... अनेक गोष्टी आपल्याला समजतात....

=)) =)) =))

या विज्ञानयुगातल्या इतर कुठल्याही चमत्कारापेक्षा किन्वा शोधापेक्षा हा नाडी-ज्योतिषा'चा शोध सर्वांत मोठा चमत्कारच आहे.

=)) =)) =)) =))

'तुमचं' विज्ञान भलतचं दिसतंय!

सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे, अजुनही असल्या भाकडकथांवर लोक नुसता विश्वास ठेवत नाहीत तर बेधडक असली हास्यास्पद विधाने करतात हा आहे.

मुद्दे इतके हास्यास्पद आहेत की त्याचे विश्लेषण करावे की नको हा प्रश्नच आहे.

-Nile

Dipankar's picture

13 May 2010 - 12:34 pm | Dipankar

हा delete कसा करावा????????

वेताळ's picture

13 May 2010 - 2:05 pm | वेताळ

असो चालायचे.
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

बाकी हे अतिपवित्र व अतिसुंदर वाक्य कुणाचे कळेल का?
हे नक्कीच डार्विनचे वाक्य नसणार असे मला वाटते.
वेताळ

आंबोळी's picture

13 May 2010 - 2:16 pm | आंबोळी

>>बाकी हे अतिपवित्र व अतिसुंदर वाक्य कुणाचे कळेल का?
इति अनिरुद्ध महावाक्यम् || अस लिहिलेल असताना सुद्धा तुम्ही विचारताय? कमाल आहे बोवा... अनिरुद्धबापूंचे महावाक्य आहे ते.

>> विषय शेवटी भरकटलाच.........
भरकटणारच.... नुसते "मी वानरसैनिक साचार " येवढच जर धरून ठेवले तर दुसरे काय अपेक्षीत आहे?

आंबोळी

वेताळ's picture

13 May 2010 - 5:09 pm | वेताळ

पण बापु नाडी केंद्र चालवतात हे माहित नव्हते.

वेताळ

मृगनयनी's picture

15 May 2010 - 5:34 pm | मृगनयनी

पण बापु नाडी केंद्र चालवतात हे माहित नव्हते.

वेताळ

=)) =)) =))

नाही हो!... आमचे बापू "नाडी-केन्द्र" नाही चालवत! :)

कृपया लक्षात असू द्या हं!.... :-? नाहीतर एखाद्या "अनिरूद्ध उपासना केंद्रा" त जाऊन 'नाडी-पट्टी कुठे मिळेल' म्हणून विचाराल... आणि फजिती करून घ्याल! ;)

एक सल्ला : एकदा खरोखरच्या "नाडी-केन्द्रा"त जाऊन "पट्टी " बघून या!....किमान पुढच्या जन्मी तरी 'वेताळा'चा पिच्छा सुटून मानव-जन्म मिळेल! ;)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

वेताळ's picture

15 May 2010 - 5:45 pm | वेताळ

नाहीतर वानराचा मिळायचा.
वेताळ

मिहिर's picture

13 May 2010 - 10:25 pm | मिहिर

या दोन गोष्टींचा काय संबंध?

टारझन's picture

15 May 2010 - 4:50 pm | टारझन

आपलाअ णयणीवर पुर्ण विश्वास आहे ... .( णाडी वर नसला तरी ;) )
णयणी ला खरोखर चांगले अनुभव आहेत , तर आनंद आहे. :) नयने तु लढ .. आपण आहोत तुझ्या साईडने :)

मृगनयनी's picture

20 May 2010 - 2:32 pm | मृगनयनी

थैन्क्स टार्‍या, फौर युवर "मौरल"सपोर्ट! ;)

:)

|| हरि ओम ||

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

Dipankar's picture

15 May 2010 - 5:43 pm | Dipankar

कुठल्या साईडने डाव्या का उजव्या
=)) =)) =))
आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

टारझन's picture

18 May 2010 - 10:01 pm | टारझन

>> आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो
कुठ्लं तोंड वाजवतो वरचं का खालचं ?
=)) =)) =)) =)) =)) =))

- डिगंबर

अरुंधती's picture

18 May 2010 - 6:21 pm | अरुंधती

नाडीग्रंथांवर ऊहापोह करताना खालील लिंक जरूर वाचावी :

http://en.wikipedia.org/wiki/Naadi

The texts are mainly written in Vatteluttu, which is an ancient Tamil script. The script largely resembles to that of Grantha Script in its developing form. There are different schools of thought as to the author of these leaves. They were written by a great Tamil sage called Agathiyar who had divine revelations. This doctrine of astrology was made famous by astrologers around the Vaitheeswaran Temple in the state of Tamil Nadu and is still practiced around the temple by their descendants.
These Nadi leaves were initially stored in the premises of Tanjore Saraswati Mahal Library of Tamil Nadu. The British rulers later showed interest in the Nadi leaves concerned with herbs and medicine, future prediction etc; but ironically left most of the Nadi prediction leaves to their loyal people. Some leaves got destroyed and the remaining were auctioned during the British rule. These Nadi leaves were obtained and possessed by the families of astrologers in Vaitheeswaran Temple. This is an art passed down the years from one generation to the other. [1]

The Great Maharishis who wrote the leaves in the last 2500 years declared in a leaf found in year 2009 they have an ambassador in the western world for the next 50 years: a Hungarian teacher Tamas Oszter who is dedicated to connect people with their leaves in Europe, North and South America, New Zealand, Australia, and South Africa. The greatest number of leaves ever written are for the generations already alive and will be on the planet for the next 50 years. The leaves are available for one out of 62 of the total humans alive. There are great amount of reported cases of exact match in the past details and future predictions.

Procedure

Usually, the Nadi Reader asks for the thumb impression (right hand thumb impression for males and left hand thumb impression for females). The Nadi Reader then searches his repository of leaves for the seeker's classification of thumb print. Finally, the minimum possible set of matching leaves is brought. Every leaf corresponds to some individual and hence will bear the birth and kinship details of its seeker. Then the Nadi Reader goes on asking about the details mentioned on the palm leaf one by one, for sake of finding the exact leaf out of the set of the leaves. For example, he will ask you if your (i.e. the seeker's) name is XYZ. If it is correct or incorrect, the seeker would require to say yes or no. If the answer to the first question was in the affirmative, the reader then reads the next detail written on the same leaf, e.g. "Your mother's name is ABC." Again the seeker has to confirm the same or otherwise. If the seeker's mother's name was incorrect, the seeker would only have to say "no". That would mean the specific leaf did not belong to the seeker. Hence the reader starts reading another palm leaf. And so the procedure continues. The seeker is asked a series of questions, based on the verses, so as to find the exact match. These questions are to be answered yes or no. The exact leaf of the seeker is said to get only "yes" responses from the seeker. If all the details on the one and the same leaf are 100% correct, then that leaf belongs to the seeker. It is said that the details such as father/mother's name, seeker's name, name of the wife( if married), details of children, profession, present age of the seeker, date of birth of seeker etc, are found mentioned on the palm leaf. Also, to confirm the same, the seeker is provided with the astrological chart which is present in the leaves in poetic format. Once the exact leaf is found, by confirming the seeker's name, parents' name, spouse's name and many other details about his past, the future which is further mentioned in the leaf, is read out for the seeker. The future is generally written in such a way that a folder within a folder, e.g. If the seeker is not married at the time of reading, in the general chapter, it might have been written that his marriage will take place at e.g. 27 years of age. If the seeker desires more details regarding his married life then he has to refer to the seventh chapter which deals with only married life and may contain name of wife, her background etc etc. The first chapter (kandam) in the leaf has the general overview of its seeker's life. The kandams that follow this are specific ones like Marriage, Profession, etc. The list of chapters and details are as follows: [2]
1. General Kandam: Contains general summary of the future predictions for the seeker. It is gist of all the 12 houses of the horoscope.
2. Regarding family, Education, Speech, Eyes, Money and Intuition etc.
3. Regarding brothers & Sisters, affection, help or ill feelings between self and them.
4. Regarding mother, House, Land, Properties, Vehicles and the pleasures of life.
5. Regarding children, their births, reason for not having children, adoption, remedial measures for getting children, their future.
6. Regarding diseases, debts, enemies, litigation & court cases, and remedial measures for the above.
7. Regarding marriage, marital life, detailed information of future spouse, and planetary position of the spouse etc.
8. Regarding longevity, accidents and danger to life, planetary position of the day of death and the place of death.
9. Regarding father, wealth, visits to holy places, fortune; Benefit from the preachings of Guru, charitable deeds and social life.
10. Regarding career, job, profession, change of place, good-bad times in career, growth, prosperity and losses in one's profession.
11. Regarding second or further marriages, profits in business, profits from side businesses etc.
12. Regarding expenditures, foreign visits, next birth and attainment of salvation.
Separate Kandams:
13. Shanti Pariharam: This Kandam is regarding the past birth details, sins committed in past birth, remedial measures that can dilute the effect of it.
14. Deeksha Kandam: Regarding the methods of preparing the Mantra Raksha, that has the power to shield the self from evil forces of jealous and envy.
15. Aushadha Kandam: Regarding medicines for chronic diseases, method of preparing them and taking them.
Initially, only the first chapter is read to the seeker. If the seeker needs further details on some particular chapter (like Business, Health, Marriage etc), then the corresponding chapter's verses are read to him/her. The seeker is also advised rituals which can correct the future mishappenings, there by leading to a choice.

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

हैयो हैयैयो's picture

19 May 2010 - 1:26 pm | हैयो हैयैयो

वट्टेळुत्तु - कूट्टेळुत्तु.

The texts are mainly written in Vatteluttu, which is an ancient Tamil script. The script largely resembles to that of Grantha Script in its developing form.

ह्या विषयावर मी पूर्वी एकदा लेखन केलेले आहे.

http://diwali.upakram.org/node/60
http://diwali.upakram.org/node/61

वट्टेळुत्तु आणि कूट्टेळुत्तु हे मुळात ग्रंथलिपीलेखनाचे दोन उपप्रकार होत. वट्टेळुत्तु प्रकारामधील लेखन वर्तुलाकृती स्वरूपात लिहिल्या जाते, तर कूट्टेळुत्तु प्रकारामध्ये मी पूर्वी लिहिलेल्या लेखात उल्लेखिल्याप्रमाणे लेखन केल्या जाते.

अरुंधती's picture

19 May 2010 - 6:20 pm | अरुंधती

उपक्रमवरील कूटलिपी लेखनधागे दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आपण फारच सुरेख व अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे. मला अतिशय आवडला. ह्यावर पुढे जाऊन नाडीग्रंथांतील साहित्यिक मूल्ये, पद्यरचना, ऐतिहासिक संदर्भ इत्यादी विषयांना अनुषंगून आपण काही लिहिले असल्यास त्याचीही माहिती कृपया द्यावी. नाडीग्रंथांचा फक्त भविष्यकथन करणारे ग्रंथ म्हणून उल्लेख न होता त्या आधारे इतर सांस्कृतिक अंगांवर प्रकाश पडला तर इतिहास व संस्कृती अभ्यासकांना त्याचा बराच लाभ होईल. धन्यवाद! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

कवितानागेश's picture

18 May 2010 - 9:42 pm | कवितानागेश

आता इथे इंग्लिशमध्ये का लिहिले याबद्दल 'विषय' बदलण्याच्या' खाजेपोटी, चर्चा सुरु होईल!
============
माउ

मितभाषी's picture

19 May 2010 - 5:56 pm | मितभाषी

युध्द माझी आदिती करणार । समर्थ तात्या मूळ आधार ।
मी लंगडा सैनिक साचार । नाडी सुटणार निश्चित ॥
॥ इति भावश्याम् लघुवाक्यम् ॥

मृगनयनी's picture

20 May 2010 - 10:08 am | मृगनयनी

युध्द माझी आदिती करणार । समर्थ तात्या मूळ आधार ।
मी लंगडा सैनिक साचार । नाडी सुटणार निश्चित ॥
॥ इति भावश्याम् लघुवाक्यम् ॥

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

रावणाचा नाश करण्यासाठी रामाला मदत करण्यासाठी असंख्य वानरसैनिक सज्ज होते..... हे आपण समजू शकतो! :)

पण भावश्या'जी तुमची "नाडी" सुटण्यासाठी तुम्हाला असं भक्कम आधार घेऊन तुमच्यासाठी कुणालातरी युद्ध वगैरे करावं लागतं........ हे वाचून अंमळ मौज वाटली!...... ;)

चालू द्या.... नाडी सुटेपर्यंत!.... =)) =))

इतर लोक त्यांची नाडी सुटू नये म्हणून काळजी घेतात.... आणि तुम्ही 'नाडी' सोडण्यासाठी धडपडताय!!!!!.... =)) =)) =)) =))

तुम्हाला आणि तुमच्या प्रयत्नांना मनःपूर्वक शुभेच्छा! !!!!! !

|| हरि ओम ||

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 May 2010 - 10:31 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

भावश्याभाऊ,

या नाडीला काडीचंही महत्त्वाचं देण्याची गरज नाही, स्वतःच्या मरणानेच ती मरेल. (मुद्द्याला धरून सुरू असेल तर) वादविवाद करावेसे वाटतात कारण नाडीवाले काहीही पुरावे न देतात लोकांना गिर्‍हाईक बनवतात हे सरळ सरळ दिसतं.

अवांतरः माझं नाव दिती नसून अदिती आहे.

(तीनाच्या अपूर्णांकातली) अदिती