मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आकाशात तार्‍याचा स्फोट- ल्युपस तारकासमूहामध्ये सुपरनोव्हा

मार्गी ·

वा! असामान्य घटना. जवळजवळ ९७१ वर्षांनंतर अशा घटनेची नोंद होते आहे. हा तारकासमूह सुमारे ४६०प्रकाशवर्षें दूर आहे हे ध्यानात घेतले तर सुमारे १५६५ साली घडलेले आतां दिसते आहे असे म्हणता येईल. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता नवनवीन माहिती उजेडात येईल. उदा. लोह या धातूपेक्षा जास्त अणुक्रमांक असलेली मूलद्रव्ये कां व कशी तयार होतात हे कळले तर जाणून घ्यायला मजा येईल. ध्यानीमनी नसलेली आणखी काही माहितीही उजेडात येईल. बहुमोल माहितीबद्दल अनेक अनेक धन्यवाद.

मार्गी 24/06/2025 - 17:55
@ सुधीर कांदळकर सर, प्रतिसादाबद्दल धन्यवाद! पण पंधराव्या शतकातही शर्मिष्ठा तारकासमूहात ठळक सुपरनोव्हा बघितला गेला होता. आणि नंतरही छोटे- मोठे दिसतातच. आणि तारकासमूहाचं अंतर जरी ४६० प्रकाशवर्षं असलं तरी "त्या तार्‍याचं" अंतर तेच असेल असंही नाही. संशोधनाच्या संदर्भात असं म्हणतात की, जे जड मूलद्रव्य आहेत, ते तारकास्फोटातून बाहेर येतात.

In reply to by कंजूस

मार्गी 28/06/2025 - 18:57
पुण्यातून आणि कधी कधी बाहेरच्या प्रकाश प्रदूषण नसलेल्या लांबच्या गावांमधून. जिथे निरभ्र आकाश असेल तिथे बायनॅक्युलरने हा सुपरनोव्हा दिसू शकेल. आणि खूपच जास्त अंधारं आकाश असेल, तिथे अगदी रेअर स्थितीमध्ये नुसत्या डोळ्यांनी दिसू शकेल.

वा! असामान्य घटना. जवळजवळ ९७१ वर्षांनंतर अशा घटनेची नोंद होते आहे. हा तारकासमूह सुमारे ४६०प्रकाशवर्षें दूर आहे हे ध्यानात घेतले तर सुमारे १५६५ साली घडलेले आतां दिसते आहे असे म्हणता येईल. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता नवनवीन माहिती उजेडात येईल. उदा. लोह या धातूपेक्षा जास्त अणुक्रमांक असलेली मूलद्रव्ये कां व कशी तयार होतात हे कळले तर जाणून घ्यायला मजा येईल. ध्यानीमनी नसलेली आणखी काही माहितीही उजेडात येईल. बहुमोल माहितीबद्दल अनेक अनेक धन्यवाद.

मार्गी 24/06/2025 - 17:55
@ सुधीर कांदळकर सर, प्रतिसादाबद्दल धन्यवाद! पण पंधराव्या शतकातही शर्मिष्ठा तारकासमूहात ठळक सुपरनोव्हा बघितला गेला होता. आणि नंतरही छोटे- मोठे दिसतातच. आणि तारकासमूहाचं अंतर जरी ४६० प्रकाशवर्षं असलं तरी "त्या तार्‍याचं" अंतर तेच असेल असंही नाही. संशोधनाच्या संदर्भात असं म्हणतात की, जे जड मूलद्रव्य आहेत, ते तारकास्फोटातून बाहेर येतात.

In reply to by कंजूस

मार्गी 28/06/2025 - 18:57
पुण्यातून आणि कधी कधी बाहेरच्या प्रकाश प्रदूषण नसलेल्या लांबच्या गावांमधून. जिथे निरभ्र आकाश असेल तिथे बायनॅक्युलरने हा सुपरनोव्हा दिसू शकेल. आणि खूपच जास्त अंधारं आकाश असेल, तिथे अगदी रेअर स्थितीमध्ये नुसत्या डोळ्यांनी दिसू शकेल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्फोटामुळे 50 लाख पट तेजस्वी झालेला तारा डोळ्यांनी दिसू शकेल सुपरनोव्हा (अति नवतारा) म्हणजे तार्‍याचा स्फोट होण्याची स्थिती. तार्‍यांच्या जीवनक्रमामध्ये शेवट होण्याची एक शक्यता असा स्फोट ही असते. तार्‍यांचं युगुल (पेअर) असेल व एक तारा खुजा (ड्वार्फ) असेल किंवा तार्‍याचं वस्तुमान जास्त असेल तर असा स्फोट होतो. स्फोट झालेला तारा दक्षिणेकडच्या वृक म्हणजे ल्युपस (Lupus) तारकासमूहातला +22.3 प्रतीचा तारा होता. त्याचा स्फोट झाल्याचं 12 जूनला लक्षात आलं.

साहित्य, ललिता आणि पुरचुंडीभर राख !

kvponkshe ·

याच तत्वावर सर्व आयुष्य घालवले. विसाव्याच्या क्षणी मागे वळून पहाताना आश्चर्य वाटते की कसे आयुष्य गेले. "छडा लंX गिरधारी ना लोटा ना थाली". का कुणास ठाऊक, एक विश्वास होता. परमेश्वराने द्रौपदीची थाळी घेऊन जन्माला घातले आहे. सर्वच सांगत बसत नाही. सन दोनहजार सात मधे पुण्यात बदलून आलो. ललिता म्हणाली रिटायर व्हायची वेळ आली,काहीतरी हातपाय हलवा. वाटले एक घर घेऊन टाकावे. या गोष्टीचा कधीच विचार न केल्याने, सतत नातेवाईक म्हणत असताना सुद्धा दुर्लक्ष केले. आता रिटायर व्हायची वेळ आली. "काळ देहासी आला खाऊ", म्हणत नामदेव महाराज नाचले. रिटायरमेंट जवळ आली व घर नाही म्हणता मात्र आमचे पाय फुलले. सरकारी नोकरास रिटायरमेंट मृत्यूसमानच ना.... एक संध्याकाळ, सहकारनगर मधे बरीच नवी बांधकाम चालू होती. एरीयात चांगला वगैरे वगैरे... बिल्डरच्या ऑफिसात एक जोडपे बसले होते. मिठाई, फुललेले चेहरे,बिल्डर चावी देत म्हणाला चला वास्तूशांतीची तयारी करा. आम्हांला आमचे भविष्य दिसले. नंतर बिल्डर आमच्या कडे वळाले ,काॅफी, गुणगान वगैरे झाले . किंमत ऐकून पायाखालची नसलेली वाळू सरकली. परत येतो कागदपत्र घेऊन..... पण ,सर्व काही पूर्वनियोजित असल्याप्रमाणे , कर्ज न काढता आहे त्या पैशातून वन बि ऐच के घेतला. भाड्याने दिला. पुढे तोच मुलीच्या उच्च शिक्षणाच्या कामी आला. पुढे दोन ही झाला आता तीनही झाला. सांगायचा उद्देश प्रवाहाबरोबर चालायचे. दुसर्‍यांच्याकडे पहायचे नाही. जेव्हां होणार तेव्हाच पहाट होईल. "मामेकं शरणं व्रज", का काय म्हणतात त्या प्रमाणे.....बाकी चिंता नको. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी | अंती जाशील एकाला प्राण्या, माझे माझे म्हणोनी ॥ एकनाथ महाराजांचे भारूड.... पोटा पुरता पसा असला की बाकी, इदंम न मम म्हणायचे की चित्त शांत रहाते.

अमर विश्वास 23/06/2025 - 11:43
एकेकाळी हे असे बोधप्रद साहित्य आवडत असे .. कधीतरी मरायचे म्हणून आज जगायचे थांबवावे काय ? साहिरचे शब्द आठवतात मरना तो सबको है जी के भी देख ले चाहत का एक जाम पी के भी देख ले

In reply to by अमर विश्वास

गवि 23/06/2025 - 13:23
कधीतरी मरायचे म्हणून आज जगायचे थांबवावे काय ?
मुद्दा अगदी रास्त आणि रोचक आहे. म्हणूनच चार शब्द लिहायचा मोह होतोय. त्या मोठ्या आलिशान मध्यवर्ती फ्लॅटसाठी जी शर्यत पळावी लागेल त्यालाच कदाचित "जगायचे थांबणे" असे म्हणता येईल. त्या घरात जे जे काही करण्याची स्वप्ने (भविष्यातील जगणे) ते कुटुंब बघत आहे, ते जगण्याची फुरसत आणि मुख्य म्हणजे "सुकून" त्यांच्याकडे उरेल का? हा प्रश्नच आहे. अर्थात हे सर्व सापेक्ष आहे. अमर्याद धावणे यातच एखाद्याला जगणे सापडत असू शकेल . आपापला चॉईस. लेखकाने एक बाजू चांगल्या फॉरमॅटमधे मांडली आहे. आपल्या स्वतःसाठी जगणे म्हणजे नेमके काय हे क्षणभर थांबून, दीर्घ श्वास घेऊन स्वतःशी ठरवावेसे वाटेल इतपत ध्येय लेखकाने साध्य केले आहे असे वैयक्तिक मत.

In reply to by अमर विश्वास

प्रत्येक क्षणाचा उत्सव करा. अशा गोष्टीना बोधप्रद का म्हणतात माहीत नाही पण जगण्याची खरी प्रेरणा यातूनच मिळते. कसे जगायचे हे ज्याने त्याने ठरवायचंय. बरेच लोक पाडगावकरांची कवीतेचा संदर्भ देतात. आत्मपरीक्षण करा कसे जगायचे कळते.

कंजूस 23/06/2025 - 15:25
१. धाडस करून पाहायचे. २. परिस्थिती पुढची पायरी दाखवेल तर पाय पुढे टाकायचा. ३. सर्वांच्याच दारावर नशीब ठोठावत नाही. ४. काहीच झाले नाही तर आम्ही तुकाराम.

माझ्याही मनात असेच काहीसे विचार घोळत आहेत. जवळचाच एक २बी एच के विकायला निघालाय. ५०% कर्ज आणि बाकी पैसे स्वतःचे असा विचार चालु आहे. पण.... १. सेकंड होम साठी निवृत्तीचे प्लॅनिंग आणि थोडेफार मुलांच्या शिक्षणाचे पैसे खर्चावेत का? २.ऐनवेळी मोठा खर्च आल्यास रोख तरलता कशी येणार? ३.खाजगी नोकरीची अशाश्वता, मध्येच मनात घोळणारे लवकर निवृतीचे विचार ४. भोवतालची अस्थिर परीस्थिती व वाढत जाणारी महागाई यामुळे पाय पुढेमागे होताहेत. तेव्हा पोंक्षेसाहेब आणि मिपाकरांचा सल्ला काय असेल?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

३० पर्यंत - १ BHK / ४० पर्यंत - २ BHK /५० - ५५ पर्यंत - ३-४ BHK आणि ६० नंतर - १ RK ( शौचकूप नि उदवाहिकेची सोयीसकट ) असे चक्र पांढरपेशा वर्गात पाहिले आहे. १. सेकंड होम - लोन काढून घेऊ नये . ती गुंतवणूक नाही हौस आहे ज्याप्रमाणे सोन्याचे दागिने मिरवायला चांगले मोडीत काढायला कोणी धजावत नाही. आता सोने उच्चवर होते कोणी घरचे सोने मोडीत काढून मार्केट मध्ये गुंतवले असल्यास त्याला माझा सलाम २. टर्म प्लॅन / health इन्शुरन्स - टर्म प्लॅन चे कव्हर वाढवावे पगाराच्या हिशेबाने / असिसिडेंटल/ डिसॅबिलिटी अँड क्रिटिकल इलनेस रायडर घ्यावे . जितके लवकर घ्याल तितके चांगले. Annuity बिलकुल नको ३. आजकाल नोकरीतील तणावामुळे असे विचार साहजिक आहे अशावेळेस घर कर्ज असल्यास लवकर फेडावे उद्या वेळ आली तरी कर्जाचा भार नसेल. माझ्याच केसमध्ये मी EMI वाढवून कर्जकाळ कमी केला कारण सध्या व्याजदर सोयीचे आहेत, कमी व्याजात जादा पैसे फेडा ४. आता चा काळ बघता सरकारच जुनी कर व्यवस्था मोडीत काढणार आहे त्यामुळे घर कर्ज नि व्याजावर असणारी वजावट पुढे पूर्णतः नाहीशी होईल त्यामुळे करबचतीसाठी घर बिलकुल घेऊ नये. मार्केटची भीती असेल तर सरळ RBI बॉण्ड मध्ये पैसे गुंतवा ५. मुलांच्या शिक्षणासाठी खर्च - माझ्या केसमध्ये मी माझ्या मुलास फी न बघता ( याची फी फार वाजवी आहे , आजकाल महाग म्हणजे उत्तम असा परिपाठ आहे ) एका उत्तम दर्जाच्या शाळेत घातले. शिक्षणासाठी सोय करतोय पण पौंगडावस्थेत गेल्याशिवाय पोरातील विद्वत्ता कळत नाही , त्यामुळे आता लोड घ्यायचे नाही , आणि शैक्षणिक कर्ज हा पर्याय असतोच कि. त्यामुळे उगाच प्राथमिक शिक्षणासाठी वर्षाला १-१.५ लाख खर्च न करता तेच पैसे पुढे उपयोगाला येतील, त्यामुळे १० वीपर्यंत शिक्षणासाठी वाचलेले पैसे पुढे कामास येतील आणि नाहीच काही झाले तर पुढे त्याच्या उद्योगधंदयासाठी सीड कॅपिटल होईल ६ फायर / योलो असल्या अनेक संकल्पना आहेत . घरी बसून आपल्या घरच्यांना त्रास देण्यापेक्षा कार्यालयात जाणे कधीही चांगले :) ७ आजकाल मेंटॉरशिप / कोचिंग / इंडिपेन्डन्ट डायरेक्टर असे बरेच पर्याय ४५ + लोकांसाठी उपलब्ध आहेत . मी पण या पर्यायांची चाचपणी करतोय कारण शेती वा समाजसेवा हे पर्याय माझ्यासारख्या शहरी नि व्यवहारी माणसाला पचतील असे वाटत नाही. त्यामुळे अभ्यास चालू आहे कारण आजकाल कंपनी ४५+ लोकांना ओझे समजतात त्यामुळे तयारी करणे केव्हाही चांगले.

कबीरदास म्हणतात, फकिरा फकिरी दूर है जितनी लंबी खजूर चढे तो चाखे प्रेमरस गिरे तो चकनाचूर धाडस करताना या गोष्टीवर जरूर विचार करायला हवा. स्मशान वैराग्य क्षणात संपते. कुठलेही अर्थिक निर्णय घेताना स्वताची अर्थिक क्षमता, इतर जबाबदाऱ्या पण लक्षात घेणे व खरोखरच एव्हढ्या मोठ्या घराची ,SUV ची गरज आहे का ?,केवळ आवडले किंवा माझे स्वप्न म्हणून सर्वस्व पणाला लावणे चुकीचे आहे. असे मला वाटते. साईं इतना दीजिए, जामे कुटुंब समाए | मैं भी भूखा न रहूं, साधु न भूखा जाए||

सुबोध खरे 23/06/2025 - 19:54
luxury becomes necessity when neighbour buys it चैनीची वस्तू गरजेची केंव्हा होते? आपल्या शेजाऱ्याने विकत घेतली कि. शेजारणीने हिऱ्याचा हार घेतला कि मला घ्यायलाच पाहिजे. कारण माझ्या नवऱ्याला शेजाऱ्यापेक्षा पगार थोडा जास्तच आहे. आणि शेजाऱ्याने मुलाला आयफोन घेतला कि माझ्या मुलाला पण हवाच कि. हव्यास किती वाढत जातो याला अंत नसतो. सेकंड होमची स्थिती बहुतांशी हीच असते. केवळ मित्रांकडे आहे म्हणू आपण हि घ्यावे हि भावना बळावत जाते. मुंबईतील माझ्या माहितीच्या कित्येक लोकांचे/ नातेवाईकांचे तळेगाव येथील "सेकंड होम" हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरलेला मी पाहिला आहे. उरापोटावर कर्ज घेऊन तर सेकंड होम कधीही करू नये. कारण त्या पैशाच्या व्याजात तुम्ही त्याच ठिकाणी पंचतारांकित हॉटेलात राहू शकता असे अनेक ठिकाणी दिसून येते. What Is Lifestyle Creep? Lifestyle creep is when your standard of living rises alongside your discretionary income—and soon enough, former luxuries become new necessities. It happens little by little, without you really realizing it: it sneaks ("creeps") up on you. https://www.investopedia.com/terms/l/lifestyle-creep.asp#:~:text=By-,What%20Is%20Lifestyle%20Creep%3F,creeps%22)%20up%20on%20you. हे हि जरूर वाचून घ्या बाकी "बस आज कि रात है जिंदगी" असे म्हणू जगणारे किती तरी लोक आनंदात हि जगलेले आहेत असेही दिसते. तेंव्हा सगळ्यांना हि गोष्ट झेपणार नाही असे माझे म्हणणे अजिबात नाही. ज्याने त्याने हा मुद्दा तारतम्य बाळगून करावा इतके च म्हणणे आहे.

अमर विश्वास 23/06/2025 - 22:35
वेगवेगळे दृष्टिकोन वाचून बरे वाटले आजचा दिवस आनंदात जगणे बेजबाबदारपणा नाही ... भविष्याची पूर्ण काळजी घेऊनही आजचा दिवस आनंदात जगता येत नाही का? आणि चैनीचे म्हणाल तर पुरेसा disposable income असेल (भाविषयाची तरतूद केल्यावर ) तर चैन का करू नये ? (भविष्याची तरतूद / investment ये विषयावर मी पुरेसे लिहिलेले आहे ) ते शाळेत हट्टीकट्टी गरिबी आणि लुळीपांगळी श्रीमंती असे जे काही शिकवलंय ना .. तिथेच सगळी गडबड आहे

मारवा 24/06/2025 - 15:58
मुकेश अंबानी यांचे उजवे हात मानले जाणारे प्रकाश शहा ज्यांची सॅलरी 75 करोड होती त्यांनी नुकताच सर्वसंग परित्याग करून जैन मुनी बनले अशी बातमी नुकतीच वाचली. जैन मुनी यांचे जीवन इतर धर्मातील संन्यस्त पेक्षा कमालीचे खडतर असे असते. केशलोचंन ,वगैरे masochistic प्रकार बरेच असतात. तर मुद्दा असा की दोन प्रकारची माणसे एक लौकिक जीवनात अत्युच्च शिखर गाठणारी तसेच पारलौकिक जगातही अत्युच्च प्रयत्नांची पराकाष्ठा करणारी. दोन्हीकडे झोकून दिली जिन्दगी. सर्वकाही स्टेक वर लावून दिलं आता यात अजून एक spiritual paradox आहे तो बाजूला ठेवू. मग दुसरा प्रकार आपला साहित्य वरणभात भाजीपोळी मधला मी असा.कसा मधला वाला तिसरे बिचारे survival च्या मारामारीत ते जाऊ द्या. असो मग

श्वेता२४ 24/06/2025 - 16:25
शब्दन शब्द खरा. तुमची ही लेखमाला मला अतीशय आवडते... असेच अजून लेख येत राहोत. बाकी या लेखाबद्दल म्हणाल तर कोणतीही वस्तू घेताना मला याची खरंच गरज आहे काय़ याचा विचार करुन पैसा खर्च करणे योग्य. घर/गाडी या दोन्ही गोष्टी समाजात उगाचच व्यक्तीच्या कर्तृत्वाशी/स्टेटस शी जोडल्या गेल्या आहेत. पूर्वीच्या काळी एका घरात दोन-तीन पिढ्या राहायच्या पण आताच्या काळात एकच पिढी ते घर वपरते व पुढची पिढी दुसरीकडे. शिवाय त्या पिढीला आधीच्या घराची किंमत नसते. लोक काय वास्तुशांतीला किंवा लेखाप्रमाणे "बसण्याचे" कार्यक्रमावेळी (खोटे़-खोटे)कोतुक करतीलही, पण किती वेळा? आजकालच्या जीवनात कुणाला कुणाकडे जायला वेळ नसतो. राहायला येणे तर खूप लांबची गोष्ट... प्रत्येकावे वर्षभरात आपल्या घरी किती माणसे किती वेळा आली व राहिली याचे मोजमाप करायला घेतले तर सहज गणना करु शकु एवढा आकडा कमी असेल. अशावेळी केवळ स्वताचा भरपूर वापर होणार असेल तर आणि तरच अशा मोठ्या गोष्टी खरेेदी करणे योग्य आहे. केवळ काही फालतू लोकांशी स्पर्धा करुन किंवा मोठेपणा म्हणूल असा पांढरा हत्ती पोसावा का याचा प्रत्येकाने विचार करावा असे माझे वैयक्तीक मत.

स्वधर्म 24/06/2025 - 20:00
विचार करायला लावणारा लेख आहे. खरे तर हे विषय प्रत्येकजणच मित्रपरिवारांत बोलत असतो. अतिशय रोचक प्रकारे कथेच्या रूपात पण रोकडं सत्य सांगितलंत तुंम्ही.

लेख आवडला असे तरी कसे म्हणणार ??? मृत्यू हे अंतिम सत्य आहे . आपल्या आप्तेष्टांचे १-२ मृत्यू पाहिल्यावर हि भावना जरूर उचंबळून येते.

Bhakti 26/06/2025 - 08:14
हो ना जसं जसा काळ जातो,तसं तसे आपलं म्हातारपणात कसं होणार असं वाटतं,नकोच ते ६०-६५ मृत्यू आला तर बरं होईल.बाकी काही कितीही उपाययोजना केल्या तरी काही इन सिक्युरिटीज दूर केल्या की दुसऱ्या तोपर्यंत मनात आलेल्या असतात,हे चक्रच आहे.तेव्हा शांतपणे,सर्व बाजूंनी विचारांती योग्य निर्णयापर्यंत पोहचत राहणे हाच उत्तम मार्ग!

In reply to by Bhakti

सुबोध खरे 26/06/2025 - 09:54
तरुणपणी मृत्यू हे एक सुंदर काव्य असतं म्हातारपणी तेच एक रुक्ष गद्य होऊन जातं तेंव्हा तरुण माणसं जेंव्हा मृत्यू याबद्दल भाष्य करतात तेंव्हा आश्चर्य वाटत नाही. परंतु मृत्यू आपल्या हातात नाही. तेंव्हा म्हातारपणी आपण आपल्या जोडीदारावर आणि मुलाबाळांवर ओझं बनून राहायला नको( निदान आर्थिक भार तरी नको) इतपत तरी स्वतःची आर्थिक तरतूद नक्की असावी.

वय वाढलयं पण म्हातारा झालोय का सांगता येणार नाही. तरुणपणी मृत्यू हे एक सुंदर काव्य असतं म्हातारपणी तेच एक रुक्ष गद्य होऊन जातं दु:ख,कष्ट तरूणपणी असतात पण अंगात रग असते. म्हातारपणातली दु:ख, कष्ट वेगळे,मी म्हातारा झालोय, वय वाढलयं ही भावना जर त्या दु:ख किंवा कष्टाबरोबर जुडली तर ते असहनिय होतात. जोवर हातीपायी धडधाकट आहे तोपर्यंत आहे त्या परिस्थितीत आनंद शोधायचा. बाकी ,खाटेवर आडवे पडल्यावर मात्र नैराश्य येणे स्वाभाविक आहे. इश्वरेच्छा बलियसी म्हणत उर्वरित दिवस काढायचे. त्याला इलाज नाही.

साहित्य-ललिता मालिकेतील सर्वच लेख आवडले, विचारप्रवर्तक आहेत. सध्या आपल्याकडे जे आहे ते कोणालाच पुरे वाटत नसते, फक्त कुठे थांबायचं हे पण कळलं पाहिजे.

याच तत्वावर सर्व आयुष्य घालवले. विसाव्याच्या क्षणी मागे वळून पहाताना आश्चर्य वाटते की कसे आयुष्य गेले. "छडा लंX गिरधारी ना लोटा ना थाली". का कुणास ठाऊक, एक विश्वास होता. परमेश्वराने द्रौपदीची थाळी घेऊन जन्माला घातले आहे. सर्वच सांगत बसत नाही. सन दोनहजार सात मधे पुण्यात बदलून आलो. ललिता म्हणाली रिटायर व्हायची वेळ आली,काहीतरी हातपाय हलवा. वाटले एक घर घेऊन टाकावे. या गोष्टीचा कधीच विचार न केल्याने, सतत नातेवाईक म्हणत असताना सुद्धा दुर्लक्ष केले. आता रिटायर व्हायची वेळ आली. "काळ देहासी आला खाऊ", म्हणत नामदेव महाराज नाचले. रिटायरमेंट जवळ आली व घर नाही म्हणता मात्र आमचे पाय फुलले. सरकारी नोकरास रिटायरमेंट मृत्यूसमानच ना.... एक संध्याकाळ, सहकारनगर मधे बरीच नवी बांधकाम चालू होती. एरीयात चांगला वगैरे वगैरे... बिल्डरच्या ऑफिसात एक जोडपे बसले होते. मिठाई, फुललेले चेहरे,बिल्डर चावी देत म्हणाला चला वास्तूशांतीची तयारी करा. आम्हांला आमचे भविष्य दिसले. नंतर बिल्डर आमच्या कडे वळाले ,काॅफी, गुणगान वगैरे झाले . किंमत ऐकून पायाखालची नसलेली वाळू सरकली. परत येतो कागदपत्र घेऊन..... पण ,सर्व काही पूर्वनियोजित असल्याप्रमाणे , कर्ज न काढता आहे त्या पैशातून वन बि ऐच के घेतला. भाड्याने दिला. पुढे तोच मुलीच्या उच्च शिक्षणाच्या कामी आला. पुढे दोन ही झाला आता तीनही झाला. सांगायचा उद्देश प्रवाहाबरोबर चालायचे. दुसर्‍यांच्याकडे पहायचे नाही. जेव्हां होणार तेव्हाच पहाट होईल. "मामेकं शरणं व्रज", का काय म्हणतात त्या प्रमाणे.....बाकी चिंता नको. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी | अंती जाशील एकाला प्राण्या, माझे माझे म्हणोनी ॥ एकनाथ महाराजांचे भारूड.... पोटा पुरता पसा असला की बाकी, इदंम न मम म्हणायचे की चित्त शांत रहाते.

अमर विश्वास 23/06/2025 - 11:43
एकेकाळी हे असे बोधप्रद साहित्य आवडत असे .. कधीतरी मरायचे म्हणून आज जगायचे थांबवावे काय ? साहिरचे शब्द आठवतात मरना तो सबको है जी के भी देख ले चाहत का एक जाम पी के भी देख ले

In reply to by अमर विश्वास

गवि 23/06/2025 - 13:23
कधीतरी मरायचे म्हणून आज जगायचे थांबवावे काय ?
मुद्दा अगदी रास्त आणि रोचक आहे. म्हणूनच चार शब्द लिहायचा मोह होतोय. त्या मोठ्या आलिशान मध्यवर्ती फ्लॅटसाठी जी शर्यत पळावी लागेल त्यालाच कदाचित "जगायचे थांबणे" असे म्हणता येईल. त्या घरात जे जे काही करण्याची स्वप्ने (भविष्यातील जगणे) ते कुटुंब बघत आहे, ते जगण्याची फुरसत आणि मुख्य म्हणजे "सुकून" त्यांच्याकडे उरेल का? हा प्रश्नच आहे. अर्थात हे सर्व सापेक्ष आहे. अमर्याद धावणे यातच एखाद्याला जगणे सापडत असू शकेल . आपापला चॉईस. लेखकाने एक बाजू चांगल्या फॉरमॅटमधे मांडली आहे. आपल्या स्वतःसाठी जगणे म्हणजे नेमके काय हे क्षणभर थांबून, दीर्घ श्वास घेऊन स्वतःशी ठरवावेसे वाटेल इतपत ध्येय लेखकाने साध्य केले आहे असे वैयक्तिक मत.

In reply to by अमर विश्वास

प्रत्येक क्षणाचा उत्सव करा. अशा गोष्टीना बोधप्रद का म्हणतात माहीत नाही पण जगण्याची खरी प्रेरणा यातूनच मिळते. कसे जगायचे हे ज्याने त्याने ठरवायचंय. बरेच लोक पाडगावकरांची कवीतेचा संदर्भ देतात. आत्मपरीक्षण करा कसे जगायचे कळते.

कंजूस 23/06/2025 - 15:25
१. धाडस करून पाहायचे. २. परिस्थिती पुढची पायरी दाखवेल तर पाय पुढे टाकायचा. ३. सर्वांच्याच दारावर नशीब ठोठावत नाही. ४. काहीच झाले नाही तर आम्ही तुकाराम.

माझ्याही मनात असेच काहीसे विचार घोळत आहेत. जवळचाच एक २बी एच के विकायला निघालाय. ५०% कर्ज आणि बाकी पैसे स्वतःचे असा विचार चालु आहे. पण.... १. सेकंड होम साठी निवृत्तीचे प्लॅनिंग आणि थोडेफार मुलांच्या शिक्षणाचे पैसे खर्चावेत का? २.ऐनवेळी मोठा खर्च आल्यास रोख तरलता कशी येणार? ३.खाजगी नोकरीची अशाश्वता, मध्येच मनात घोळणारे लवकर निवृतीचे विचार ४. भोवतालची अस्थिर परीस्थिती व वाढत जाणारी महागाई यामुळे पाय पुढेमागे होताहेत. तेव्हा पोंक्षेसाहेब आणि मिपाकरांचा सल्ला काय असेल?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

३० पर्यंत - १ BHK / ४० पर्यंत - २ BHK /५० - ५५ पर्यंत - ३-४ BHK आणि ६० नंतर - १ RK ( शौचकूप नि उदवाहिकेची सोयीसकट ) असे चक्र पांढरपेशा वर्गात पाहिले आहे. १. सेकंड होम - लोन काढून घेऊ नये . ती गुंतवणूक नाही हौस आहे ज्याप्रमाणे सोन्याचे दागिने मिरवायला चांगले मोडीत काढायला कोणी धजावत नाही. आता सोने उच्चवर होते कोणी घरचे सोने मोडीत काढून मार्केट मध्ये गुंतवले असल्यास त्याला माझा सलाम २. टर्म प्लॅन / health इन्शुरन्स - टर्म प्लॅन चे कव्हर वाढवावे पगाराच्या हिशेबाने / असिसिडेंटल/ डिसॅबिलिटी अँड क्रिटिकल इलनेस रायडर घ्यावे . जितके लवकर घ्याल तितके चांगले. Annuity बिलकुल नको ३. आजकाल नोकरीतील तणावामुळे असे विचार साहजिक आहे अशावेळेस घर कर्ज असल्यास लवकर फेडावे उद्या वेळ आली तरी कर्जाचा भार नसेल. माझ्याच केसमध्ये मी EMI वाढवून कर्जकाळ कमी केला कारण सध्या व्याजदर सोयीचे आहेत, कमी व्याजात जादा पैसे फेडा ४. आता चा काळ बघता सरकारच जुनी कर व्यवस्था मोडीत काढणार आहे त्यामुळे घर कर्ज नि व्याजावर असणारी वजावट पुढे पूर्णतः नाहीशी होईल त्यामुळे करबचतीसाठी घर बिलकुल घेऊ नये. मार्केटची भीती असेल तर सरळ RBI बॉण्ड मध्ये पैसे गुंतवा ५. मुलांच्या शिक्षणासाठी खर्च - माझ्या केसमध्ये मी माझ्या मुलास फी न बघता ( याची फी फार वाजवी आहे , आजकाल महाग म्हणजे उत्तम असा परिपाठ आहे ) एका उत्तम दर्जाच्या शाळेत घातले. शिक्षणासाठी सोय करतोय पण पौंगडावस्थेत गेल्याशिवाय पोरातील विद्वत्ता कळत नाही , त्यामुळे आता लोड घ्यायचे नाही , आणि शैक्षणिक कर्ज हा पर्याय असतोच कि. त्यामुळे उगाच प्राथमिक शिक्षणासाठी वर्षाला १-१.५ लाख खर्च न करता तेच पैसे पुढे उपयोगाला येतील, त्यामुळे १० वीपर्यंत शिक्षणासाठी वाचलेले पैसे पुढे कामास येतील आणि नाहीच काही झाले तर पुढे त्याच्या उद्योगधंदयासाठी सीड कॅपिटल होईल ६ फायर / योलो असल्या अनेक संकल्पना आहेत . घरी बसून आपल्या घरच्यांना त्रास देण्यापेक्षा कार्यालयात जाणे कधीही चांगले :) ७ आजकाल मेंटॉरशिप / कोचिंग / इंडिपेन्डन्ट डायरेक्टर असे बरेच पर्याय ४५ + लोकांसाठी उपलब्ध आहेत . मी पण या पर्यायांची चाचपणी करतोय कारण शेती वा समाजसेवा हे पर्याय माझ्यासारख्या शहरी नि व्यवहारी माणसाला पचतील असे वाटत नाही. त्यामुळे अभ्यास चालू आहे कारण आजकाल कंपनी ४५+ लोकांना ओझे समजतात त्यामुळे तयारी करणे केव्हाही चांगले.

कबीरदास म्हणतात, फकिरा फकिरी दूर है जितनी लंबी खजूर चढे तो चाखे प्रेमरस गिरे तो चकनाचूर धाडस करताना या गोष्टीवर जरूर विचार करायला हवा. स्मशान वैराग्य क्षणात संपते. कुठलेही अर्थिक निर्णय घेताना स्वताची अर्थिक क्षमता, इतर जबाबदाऱ्या पण लक्षात घेणे व खरोखरच एव्हढ्या मोठ्या घराची ,SUV ची गरज आहे का ?,केवळ आवडले किंवा माझे स्वप्न म्हणून सर्वस्व पणाला लावणे चुकीचे आहे. असे मला वाटते. साईं इतना दीजिए, जामे कुटुंब समाए | मैं भी भूखा न रहूं, साधु न भूखा जाए||

सुबोध खरे 23/06/2025 - 19:54
luxury becomes necessity when neighbour buys it चैनीची वस्तू गरजेची केंव्हा होते? आपल्या शेजाऱ्याने विकत घेतली कि. शेजारणीने हिऱ्याचा हार घेतला कि मला घ्यायलाच पाहिजे. कारण माझ्या नवऱ्याला शेजाऱ्यापेक्षा पगार थोडा जास्तच आहे. आणि शेजाऱ्याने मुलाला आयफोन घेतला कि माझ्या मुलाला पण हवाच कि. हव्यास किती वाढत जातो याला अंत नसतो. सेकंड होमची स्थिती बहुतांशी हीच असते. केवळ मित्रांकडे आहे म्हणू आपण हि घ्यावे हि भावना बळावत जाते. मुंबईतील माझ्या माहितीच्या कित्येक लोकांचे/ नातेवाईकांचे तळेगाव येथील "सेकंड होम" हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरलेला मी पाहिला आहे. उरापोटावर कर्ज घेऊन तर सेकंड होम कधीही करू नये. कारण त्या पैशाच्या व्याजात तुम्ही त्याच ठिकाणी पंचतारांकित हॉटेलात राहू शकता असे अनेक ठिकाणी दिसून येते. What Is Lifestyle Creep? Lifestyle creep is when your standard of living rises alongside your discretionary income—and soon enough, former luxuries become new necessities. It happens little by little, without you really realizing it: it sneaks ("creeps") up on you. https://www.investopedia.com/terms/l/lifestyle-creep.asp#:~:text=By-,What%20Is%20Lifestyle%20Creep%3F,creeps%22)%20up%20on%20you. हे हि जरूर वाचून घ्या बाकी "बस आज कि रात है जिंदगी" असे म्हणू जगणारे किती तरी लोक आनंदात हि जगलेले आहेत असेही दिसते. तेंव्हा सगळ्यांना हि गोष्ट झेपणार नाही असे माझे म्हणणे अजिबात नाही. ज्याने त्याने हा मुद्दा तारतम्य बाळगून करावा इतके च म्हणणे आहे.

अमर विश्वास 23/06/2025 - 22:35
वेगवेगळे दृष्टिकोन वाचून बरे वाटले आजचा दिवस आनंदात जगणे बेजबाबदारपणा नाही ... भविष्याची पूर्ण काळजी घेऊनही आजचा दिवस आनंदात जगता येत नाही का? आणि चैनीचे म्हणाल तर पुरेसा disposable income असेल (भाविषयाची तरतूद केल्यावर ) तर चैन का करू नये ? (भविष्याची तरतूद / investment ये विषयावर मी पुरेसे लिहिलेले आहे ) ते शाळेत हट्टीकट्टी गरिबी आणि लुळीपांगळी श्रीमंती असे जे काही शिकवलंय ना .. तिथेच सगळी गडबड आहे

मारवा 24/06/2025 - 15:58
मुकेश अंबानी यांचे उजवे हात मानले जाणारे प्रकाश शहा ज्यांची सॅलरी 75 करोड होती त्यांनी नुकताच सर्वसंग परित्याग करून जैन मुनी बनले अशी बातमी नुकतीच वाचली. जैन मुनी यांचे जीवन इतर धर्मातील संन्यस्त पेक्षा कमालीचे खडतर असे असते. केशलोचंन ,वगैरे masochistic प्रकार बरेच असतात. तर मुद्दा असा की दोन प्रकारची माणसे एक लौकिक जीवनात अत्युच्च शिखर गाठणारी तसेच पारलौकिक जगातही अत्युच्च प्रयत्नांची पराकाष्ठा करणारी. दोन्हीकडे झोकून दिली जिन्दगी. सर्वकाही स्टेक वर लावून दिलं आता यात अजून एक spiritual paradox आहे तो बाजूला ठेवू. मग दुसरा प्रकार आपला साहित्य वरणभात भाजीपोळी मधला मी असा.कसा मधला वाला तिसरे बिचारे survival च्या मारामारीत ते जाऊ द्या. असो मग

श्वेता२४ 24/06/2025 - 16:25
शब्दन शब्द खरा. तुमची ही लेखमाला मला अतीशय आवडते... असेच अजून लेख येत राहोत. बाकी या लेखाबद्दल म्हणाल तर कोणतीही वस्तू घेताना मला याची खरंच गरज आहे काय़ याचा विचार करुन पैसा खर्च करणे योग्य. घर/गाडी या दोन्ही गोष्टी समाजात उगाचच व्यक्तीच्या कर्तृत्वाशी/स्टेटस शी जोडल्या गेल्या आहेत. पूर्वीच्या काळी एका घरात दोन-तीन पिढ्या राहायच्या पण आताच्या काळात एकच पिढी ते घर वपरते व पुढची पिढी दुसरीकडे. शिवाय त्या पिढीला आधीच्या घराची किंमत नसते. लोक काय वास्तुशांतीला किंवा लेखाप्रमाणे "बसण्याचे" कार्यक्रमावेळी (खोटे़-खोटे)कोतुक करतीलही, पण किती वेळा? आजकालच्या जीवनात कुणाला कुणाकडे जायला वेळ नसतो. राहायला येणे तर खूप लांबची गोष्ट... प्रत्येकावे वर्षभरात आपल्या घरी किती माणसे किती वेळा आली व राहिली याचे मोजमाप करायला घेतले तर सहज गणना करु शकु एवढा आकडा कमी असेल. अशावेळी केवळ स्वताचा भरपूर वापर होणार असेल तर आणि तरच अशा मोठ्या गोष्टी खरेेदी करणे योग्य आहे. केवळ काही फालतू लोकांशी स्पर्धा करुन किंवा मोठेपणा म्हणूल असा पांढरा हत्ती पोसावा का याचा प्रत्येकाने विचार करावा असे माझे वैयक्तीक मत.

स्वधर्म 24/06/2025 - 20:00
विचार करायला लावणारा लेख आहे. खरे तर हे विषय प्रत्येकजणच मित्रपरिवारांत बोलत असतो. अतिशय रोचक प्रकारे कथेच्या रूपात पण रोकडं सत्य सांगितलंत तुंम्ही.

लेख आवडला असे तरी कसे म्हणणार ??? मृत्यू हे अंतिम सत्य आहे . आपल्या आप्तेष्टांचे १-२ मृत्यू पाहिल्यावर हि भावना जरूर उचंबळून येते.

Bhakti 26/06/2025 - 08:14
हो ना जसं जसा काळ जातो,तसं तसे आपलं म्हातारपणात कसं होणार असं वाटतं,नकोच ते ६०-६५ मृत्यू आला तर बरं होईल.बाकी काही कितीही उपाययोजना केल्या तरी काही इन सिक्युरिटीज दूर केल्या की दुसऱ्या तोपर्यंत मनात आलेल्या असतात,हे चक्रच आहे.तेव्हा शांतपणे,सर्व बाजूंनी विचारांती योग्य निर्णयापर्यंत पोहचत राहणे हाच उत्तम मार्ग!

In reply to by Bhakti

सुबोध खरे 26/06/2025 - 09:54
तरुणपणी मृत्यू हे एक सुंदर काव्य असतं म्हातारपणी तेच एक रुक्ष गद्य होऊन जातं तेंव्हा तरुण माणसं जेंव्हा मृत्यू याबद्दल भाष्य करतात तेंव्हा आश्चर्य वाटत नाही. परंतु मृत्यू आपल्या हातात नाही. तेंव्हा म्हातारपणी आपण आपल्या जोडीदारावर आणि मुलाबाळांवर ओझं बनून राहायला नको( निदान आर्थिक भार तरी नको) इतपत तरी स्वतःची आर्थिक तरतूद नक्की असावी.

वय वाढलयं पण म्हातारा झालोय का सांगता येणार नाही. तरुणपणी मृत्यू हे एक सुंदर काव्य असतं म्हातारपणी तेच एक रुक्ष गद्य होऊन जातं दु:ख,कष्ट तरूणपणी असतात पण अंगात रग असते. म्हातारपणातली दु:ख, कष्ट वेगळे,मी म्हातारा झालोय, वय वाढलयं ही भावना जर त्या दु:ख किंवा कष्टाबरोबर जुडली तर ते असहनिय होतात. जोवर हातीपायी धडधाकट आहे तोपर्यंत आहे त्या परिस्थितीत आनंद शोधायचा. बाकी ,खाटेवर आडवे पडल्यावर मात्र नैराश्य येणे स्वाभाविक आहे. इश्वरेच्छा बलियसी म्हणत उर्वरित दिवस काढायचे. त्याला इलाज नाही.

साहित्य-ललिता मालिकेतील सर्वच लेख आवडले, विचारप्रवर्तक आहेत. सध्या आपल्याकडे जे आहे ते कोणालाच पुरे वाटत नसते, फक्त कुठे थांबायचं हे पण कळलं पाहिजे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
साहित्य असाच एका रविवारी फेसबुकवर चाळवाचाळव करत असताना त्याला त्या ३.५ बीएचके फ्लॅटची जाहिरात दिसली. एका बंगल्याच्या पुनर्विकासानंतर सहकारनगर सारख्या सभ्य आणि सुसंस्कृत भागात असलेला फ्लॅट "निदान बघून तरी येऊ" असे म्हणून तो, ललिता आणि लेखना तो फ्लॅट बघायला गेले. चकाचक इमारत, २ कार पार्किंग्स.. आणि तेही अगदी लांब लचक कार सहज आत बाहेर येऊ जाऊ शकेल अशा.. प्रशस्त हॉल ... सॉरी सॉरी - लिविंग रूम... मोठाल्या बेडरूमस .... वॉशिंग मशीन आणि डिश वॉशर सहज बसेल आणि तरीही जागा उरेल असे स्वयंपाकघर ... सॉरी सॉरी - मॉड्युलर किचन ... प्रत्येक बेडरूमला मध्यम बाल्कनी .. लिविंग ला मोठ्ठी गॅलरी ...

फाया

अनन्त्_यात्री ·

असेन कायम मीच मानवी सृजनाचा पाया नसेल माझे अत्तर तर कृबु कोरडाच फाया :)" मिपावर आणी अन्यत्र कृबु ची च जयजयकार होताना सध्या तरी दिसते. संकल्पना आवडली.

असेन कायम मीच मानवी सृजनाचा पाया नसेल माझे अत्तर तर कृबु कोरडाच फाया :)" मिपावर आणी अन्यत्र कृबु ची च जयजयकार होताना सध्या तरी दिसते. संकल्पना आवडली.
लेखनविषय:
"कृबु (*)व्यापित या जगी अता तुज स्थान काय उरते ? मनात येता क्षणार्धात मग इच्छित अवतरते ! काव्य, नाट्य, शिल्पे, चित्रे अन् जटिल अधिक काही गरज तुझी यासाठी कशाला?

मूक चित्रपट

भागो ·
लेखनविषय:
गेल्या काही दिवसात चार मूक चित्रपट बघितले. १ A Trip To The Moon. 2 The Last Laugh 3 The Cabinet of Dr. Caligari (1920) 4 Metropolis प्रत्येक सिनेमा साठी स्वतंत्रपाने लिहावे लागेल. आत्ता फक्त A Trip To The Moon. बद्दल लिहितो. ही फिल्म जॉर्ज मेलीएसने दिग्दर्शित केली आहे. जॉर्ज मेलीएस हा एक प्रसिद्ध जादुगार होता. ही film १९०२ बनवली होती. त्या आधीचे "सिनेमे" दोन तीन मिनिटांचे असत. ही film तब्बल साडे बारा मिनिटांची फीचर film आहे. म्हणजे ह्या सिनेमाला कथा आहे. वर ही पहिली वहिली Sci Fi film मानली जाते. ज्युल्स व्हर्न च्या कथेच्या कल्पना ह्यात वापरल्या आहेत.

यंदाचा पाऊस .

अत्रुप्त आत्मा ·

कंजूस 20/06/2025 - 15:05
हा पाऊस साला शेवटी मला, स्वतःलाच ओळखायला लावतोय ! पाऊस यंदा खरच माझ्या , मनासारखा पडतोय . . आला लाइनीवर. सरसर आली कविता अचानक भिजवून गेली. लिहा लिहा लिहा दुत्त दुत्त रुसलेल्या प्रतिभेला पुन्हा लपंडाव खेळायला लावा.

पाऊस, रस्तोरस्ती. रस्त्याच्या पलीकडचा पाऊस. रस्त्यात सर्व काळोखात वस्त्यात -कविवर्य ग्रेस महावितरण फेल.

कंजूस 20/06/2025 - 15:05
हा पाऊस साला शेवटी मला, स्वतःलाच ओळखायला लावतोय ! पाऊस यंदा खरच माझ्या , मनासारखा पडतोय . . आला लाइनीवर. सरसर आली कविता अचानक भिजवून गेली. लिहा लिहा लिहा दुत्त दुत्त रुसलेल्या प्रतिभेला पुन्हा लपंडाव खेळायला लावा.

पाऊस, रस्तोरस्ती. रस्त्याच्या पलीकडचा पाऊस. रस्त्यात सर्व काळोखात वस्त्यात -कविवर्य ग्रेस महावितरण फेल.
लेखनविषय:
पाऊस यंदा खरच माझ्या, मनासारखा पडतोय . इकडे तिकडे पळता पळता मध्येच . . , आंगणात थबकतोय ! बराच चिखल मग बरेच उन्ह मग मधेच रिपरिप , टाकते नाहवून निसरडा कधी , गच्च ओला क्षणात रस्ता भिजवतोय ! पाऊस यंदा खरच माझ्या ,मनासारखा पडतोय . ॥ १ ॥ गच्चीत कधी तोच एकटा , मी मोठा तो धाकटा , तरिही अंगावर आणवून काटा मोठ्या भावासारखा घाबरतोय ! पाऊस यंदा खरच माझ्या , मनासारखा पडतोय . ॥ २ ॥ पाऊस कधी छपरावर नाहीतर गटारातल्या डुकरावर त्याची मर्जी फिरेल तसा हवं त्याच्या नशिबावर स्वतःची शक्ती पाऊस दाखवून "मीच परमेश्वर" , म्हणतोय पाऊस यंदा खरच माझ्या, मनासारखा पडतोय .