गूढ अंधारातील जग -४

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
16 Dec 2017 - 9:07 pm

गूढ अंधारातील जग -४
पाणबुडीची संरचना --
. तिचे मूळ हेतू हे शत्रूच्या जहाजाच्या नजरेस न पडता त्याच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन त्याच्या वर हल्ला करायचा. त्यामुळे सुरुवातीला पाणबुडी तयार केली ती जहाजासारखी निमुळती होती आणि वरचा भाग पाण्याच्या जरासा खाली गेला तरी चालत होता. जशी जशी विमानांची प्रगती होत गेली तशी पाणबुडीला पाण्याच्या जास्तीत जास्त खाली आणि जास्तीत जास्त वेगाने जाण्याची आवश्यकता निर्माण झाली. यामुळे पाणबुडीचा निमुळता आकार सोडून अश्रूबिंदू (teardrop) सारखा आकार म्हणजे देवमासा किंवा डॉल्फिन सारखा मोठे डोके आणि मागे निमुळता होत गेलेला आकार घेतला गेला.

मुक्तकप्रकटन

पुणे ते लेह (भाग ६ - श्रीनगर (दाल लेक/नगीन लेक) व श्रीनगर ते सोनमर्ग)

अभिजीत अवलिया's picture
अभिजीत अवलिया in भटकंती
16 Dec 2017 - 7:55 pm

३० ऑगस्ट

विडंबन : निरीश्वरवाद, निधर्मी संकल्पना - 'फुल्टू' एंटरटेनमेंट विथ 'टील डेथ' व्हॅलिडिटी.

रंगीला रतन's picture
रंगीला रतन in जनातलं, मनातलं
15 Dec 2017 - 11:26 pm

निरीश्वरवाद आणि निधर्मी नावाच्या संकल्पना कशा अस्तित्वात आल्या आणि का याच्यावर बरेच मंथन झाले आहे. यावर बऱ्याच थेअरीज आहेत. पैकी उत्क्रांतीवादानुसार निरीश्वरवाद आणि निधर्मी यावर बऱ्याच लोकांचा विश्वास असतो याचं कारण माणुस उत्क्रांत झाल्यावर त्याला या गोष्टींचा नक्कीच फायदा झाला असणार. अतिमानवाच्या (मंद)बुद्धीला पडणारे प्रश्न त्याच्या क्षमते बाहेरचे असल्याने त्याने सतत असणाऱ्या अनिश्चिततेवर, त्यातून येणाऱ्या भीतीवर मात करण्यासाठी काही मानसिक, बौद्धिक दरिद्री(दळभद्री) कल्पना विकसित केल्या त्यात निरीश्वरवाद आणि निधर्मी यांचा क्रमांक सर्वात वरचा लागतो.

विडंबनलेख

अनवट किल्ले २४: महाराष्ट्राच्या उत्तरटोकाचा, सोनगीर ( Songir )

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
15 Dec 2017 - 1:19 pm

उत्तरेकडून दक्षिणेकडे येणारा आग्रा-नाशिक मार्ग मध्ययुगात महत्वाचा होता कारण उत्तरेकडील शासक दख्खनेवर आक्रमण करण्यासाठी या मार्गाचा वापर करीत. तर मागच्या बाजुने जाणारा रस्ता नंदुरबार-सुरत या मध्ययुगीन महत्वाच्या शहरांना जोडतो. त्यामुळे या आक्रमकांना प्रतिबंध करण्या साठी मध्ययुगात उत्तर महाराष्ट्रातील या मार्गावर मोक्याच्या ठिकाणी किल्ले बांधण्यात आले. सुर्वणगिरी किल्ला नेमका कोणी बांधला याची इतिहासात नोंद नाही. सम्राट अशोकाच्या अधिपत्याखालील हा प्रदेश कालांतराने सातवाहनांकडे गेला व इ.स. २५० मध्ये अहिर राजांनी तो जिंकला.

अरि

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
15 Dec 2017 - 8:09 am

अरि
.......
त्यावर्षी पहिल्यांदाच एका भारतीय मुलाने शाळेत admission घेतली. अरिंधम त्याचे नाव. पण इतके अवघड नाव काय या अरबी मुलामुलींना घेता येईना. साहजिकच त्याचा अरि झाला. अकरावीत शिकत होता. तो म्हणजे आम्हा सर्व भारतीय शिक्षकांच्या जिव्हाळयाचा विषय! माझ्या जास्त जवळचा. कारण त्याने अकरावीला इंग्लिश साहित्य ठेवले होते, आणि पंजाबी असून महाराष्ट्रात बरीच वर्षे काढल्याने चांगले मराठी यायचे. म्हणजे, आमचे किती गूळपीठ असेल पहा!!

वाङ्मयकथाविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानअभिनंदनप्रतिभा

चीनचा भारतावर हल्ला

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
14 Dec 2017 - 11:49 pm

चीनचा हल्ला
चीनने एका युद्धात आपल्यावर हल्ला केलेलाच आहे. आपण तो अद्याप विसरू शकलेलो नाही. आता यामधे नव्या अस्त्रांची भर पडली आहे. ती म्हणजे संपर्क माध्यमे. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने मोबाईलमधल्या धोकादायक अशा जवळ जवळ ४२ सॉफ्टवेयर प्रॉग्रॅमची यादी जाहीर केली आहे. त्यांच्यामते हे प्रॉग्रॅम मोबाईलमधील माहिती आपल्या नकळत चोरतात. त्यामधे आपले पत्ते, मोबाईल नंबर्स असतात. व्हॉट्स अप किंवा मेलवरील आपले संभाषण असू शकते. या गोष्टी सर्वरकडे पाठवल्या जातात.
ashutoshjog@yahoo.com

धोरणविचार

हिरवे सोने

चांदणशेला's picture
चांदणशेला in जे न देखे रवी...
14 Dec 2017 - 9:30 pm

एकल्या माझ्या घरट्यात नांदते लाखमोलाचे ऐश्वर्य
माणिक मोत्यांची ना रास तरीही बहरते सुखाचे माधुर्य

दारिद्र्याच्या चिंध्यात लपेटून जाते जीणे
कुजलेल्या छपरातून पाझरते वैभवाचे चांदणे

पोट जाळून घामाच्या धारांनी भिजती राने
फाटक्या स्वप्नांच्या भूमीवर अंकुरते हिरवे सोने

आयुष्याच्या उतरंडीत रीती रीती जिंदगी
जगाच्या भाकरीसाठी लढाया देते बळ अंगी

कविता माझीकविता

शुल्बसूत्रामधील भूमिति - भाग १

अरविंद कोल्हटकर's picture
अरविंद कोल्हटकर in जनातलं, मनातलं
14 Dec 2017 - 4:11 am

प्राचीन भारताच्या काळात जे यज्ञ केले जात त्या यज्ञाचे इच्छित फल प्राप्त होण्यासाठी यज्ञ तंतोतंत मुळाबरहुकूम केला जाणे अपेक्षित होते आणि त्यामुळे यज्ञविधीमधील मन्त्रोच्चारण, त्यांचे व्याकरण, शब्दांचे अर्थ कळण्यासाठी व्युत्पत्ति, ऋक्-छन्दांचे ज्ञान, यज्ञास योग्य काळ आणि यज्ञांमधील कृति अशा सहा गोष्टी शिक्षा, व्याकरण, निरुक्त, छन्दस्, ज्योतिष आणि कल्प ह्या सहा निरनिराळ्या वेदांगांनी नियमित केल्या गेल्या आहेत. ह्या सहा वेदांगांपैकी कल्प हे वेदांग नाना यज्ञांचे विधि कसे करावेत हे सांगण्यासाठी निर्माण झाले आहे. कल्पसूत्रांचे मुख्यत: दोन विभाग आहेत.

संस्कृतीविचार

दिवस उजाडता.....

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in जनातलं, मनातलं
13 Dec 2017 - 8:38 pm

सकाळच्या चालण्याने आरोग्यसंपन्न आयु लाभते असं म्हणतात. पण रात्रीच्या सुखासिन झोपेचे साखळदंड तोडणं फार कठीण असतं, हा अनुभव आहे. त्यातून पुन्हा ह्यात सातत्य राखण्याचे अवघड उद्दिष्ट. मोठ्या कष्टसाध्य यशानंतर अवतीभवतीचं जग मला नव्याने 'दिसू' लागलं. नोव्हेंबर महिन्यातही मुंबईत पावसाळी वातावरणाने हवेत, सुखदपेक्षा जास्त आणि बोचरा म्हणता येणार नाही असा आल्हाददायी गारवा अनुभवत होतो. दूरवरून जाणार्‍या गाडीच्या इंजिनाचा भोंगाही, शास्त्रीय संगीतातील पहाटेच्या भूप रागाइतकाच प्रसन्न वाटतो.

कथालेख