लेह-लडाख -- "पृथ्वी वरील स्वर्ग :
गेल्या वर्षी १० जुलै - २४ जुलै २०१५ लेह-लदाखची ट्रीप केली. तेव्हा काढलेल्या प्रची टाकत आहे.
गेल्या वर्षी १० जुलै - २४ जुलै २०१५ लेह-लदाखची ट्रीप केली. तेव्हा काढलेल्या प्रची टाकत आहे.
धिप्पाड शरीरयष्टी, भेदक नजर... असं हे धडकी भरवणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे ठाकरे सर. ते कोणता विषय शिकवतात हे अद्याप मला कळलेलं नाही; पण पिंपळगाव बसवंतच्या के. के. वाघ कॉलेजमध्ये ते आम्हाला एनसीसीला होते एवढं मात्र ठामपणे सांगू शकतो. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर जाणवलं, की ते भयंकर वगैरे काही नव्हते. ते तर ‘नारळी व्यक्तिमत्त्व’ होतं! होय, नारळीच!! नारळ बाहेरून टणक असलं तरी आतून मात्र गोड असतं. तसंच काहीसं.
===================================================================
मरणाआधीच मेलेल्या
जित्या मढ्याचा प्राण
चितेच्या चटक्यांनी कळवळून
बाहेर पडला आणि लांबूनच
जमावाचे अश्रू न्याहाळताना
त्याला खदखदून हसू फुटले...
भेसूर नजर भवताली भिरभिरली
अन् हात पसरून आत्मा
निघाला भीक मागण्यासाठी..
देहक्लेशांची नाटके बंद करा,
अन् चित्तक्लेशाचे रेचक रिचवा..
होऊ द्या झडझडून झाडा
पडून जाऊ द्या विकृतीच्या कृमी
कधीतरी जेव्हा वाटेल लाज,
गळून जाईल लिंगाचा माज..
माझ्या झोळीत काही घालू नका
पण एक तरी मेणबत्ती पेटवा
मंद थरथरता उजेड
आतल्या आवाजापर्यंत पोचवा..
"माझे नाव सतिश वसंत गावडे. रायगड जिल्हा परिषद शाळा वडगांवकोंड" आपल्या बोलण्यात "अशुद्ध" शब्द येणार नाही याची काळजी घेत मी वर्गाला माझी ओळख करुन दिली.
शाळेचा पहिला दिवस. गोरेगांवच्या ना. म. जोशी विद्याभवनचा इयत्ता पाचवी ब चा वर्ग. गोरेगांव तसं शहरवजा खेडेगांव. आजूबाजूच्या पंधरा-वीस खेडेगावांचे बाजार हाट करण्याचे ठिकाण. शाळा पुर्ण जिल्ह्यात नावाजलेली. अगदी माणगांव, महाड, म्हसळा आणि श्रीवर्धन या चार चार तालुक्यांच्या ठिकाणांहून मुलं ना. म. जोशीला शिकायला यायची. आजही येतात. असा शाळेचा नावलौकिक.
गेले काही दिवस सरसकटीकरणाचा तडका आणि अभंग वाचून आमच्या शहरी असंवेदनशील मेंदूच्या झुडुपाला एक कवितेची डहाळी उगवली. ती डहाळी त्याच्यासोबतच्या पालापाचोळ्यासकट येथे चिकटवत आहे... गोड मानून घ्यावी.
***********************
तुमचे शेतकरी नेते, तुमच्याच तोंडास पुसती पाने | दोष सगळे मात्र, असंवेदनशील शहरी लोकांचे |
शेतीतून मंत्र्यास होती, कोटींचा फायदा | तुला नाही वावडे, अशा दांभिकपणाचे |
रे गझलाकारा, आवर तुझे दुकान | गेले ते दिवस, फुकट सहानुभुती मिळवण्याचे ||
आतापर्यंत.....
विशाल "अभिषाच्या पोस्टवर आम्ही या विषयी सगळे सविस्तर लिहिले असून आतापर्यंत तू निर्दोष आहेस हे जवळपास सगळ्यांनी मान्य केले आहे."
हे ऐकून अमितला अतिशय आनंद झाला आपण आता काय बोलावे हे त्याला समजेना.
विशाल " आम्हाला सकाळ पर्यंत वेळ दे या प्रकारामागे कोण आहे? हे उद्या आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे."
पुढे सुरु......
सकाळचे १० वाजले होते सर्वजण एकत्र आले होते आणि आपापला नाष्टा संपवून आपण काय बोलतोय याची उत्सुकतेने वाट पाहू लागले आहेत हे पाहुन सुधीरने बोलण्यास सुरुवात केली.....
रस्त्याने चालताना इतरांच्या चेहऱ्यावर ‘चला सेमी फायनलपर्यंत तर आलो’ असा भाव होता आणि आमच्या चेहऱ्यावर मात्र बळीला चालेल्या बोकडाचा ! चहा घ्यायला मेसमध्ये गेलो. चहा घेत असताना मुद्दामुन उसवलेल्या टी- शर्ट कडे रेश्माचं लक्ष गेलं.
" अरे रेवा... तुझ किट उसवले आहे वाटतं... जा बाथरूममध्ये बदलून ये.. "
आता हिला काय सांगू मला मुद्दाम ग्राउंडवर दुसऱ्या टी शर्टमध्ये बसायचं आहे म्हणून हा उद्योग मी करून ठेवला आहे ते..
" आं... अरे हो गं... जाऊ दे आत्ता नको ग्राउंडवर गेल्यावर बदलते आणि तिथेच बसून टाके घालून टाकते.
" अगं.. कशाला अशी ग्राउंडवर येत आहेस बदल आधी.. "
भारतास मिळालेले स्वातंत्र्य हे अहिंसावादी लढ्याने मिळाले असे शालेय इतिहासात वाचल्याचे स्मरते, याउलट हिंदवी स्वराज्याच्या अग्नीकुंडात अनेकांनी प्राणांतिक आहुत्या दिल्या. त्यापैकीच दोन वीर बाजीप्रभू देशपांडे नि शिवा काशीद ! जिजाऊ प्रतिष्ठान गेली सतत ९ वर्षे "पन्हाळा - विशाळगड पदभ्रमंती - एक दिवसीय मोहीम (P2V2016 ) " त्या शूरवीरांच्या स्मृती प्रितर्थ्य आयोजित करते. या वर्षी ही मोहीम ९ जुलैला यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.
॥सांगा तुकारामा : अभंग-४॥
धाडा तुकोराया । विठूला सांगावा ।
मायेचा कांगावा । उतू आला ॥१॥
नासले सकळ । तन मन धन ।
मिथ्या जन गण । वेढीयले ॥२॥
विलासी लोळती । द्रव्याचे सोयरे ।
अनाठायी मरे । कामनिष्ठी ॥३॥
विव्देषाचा डोंब । कैसा परतावा ।
स्नेहाचा ओलावा । क्षीण झाला ॥४॥
वैष्णवाचे चित्त । झुंडीची मुसंडी ।
सावजाला धुंडी । मिथ्यावादी ॥५॥
नाही उपवासी । नाही एकादशी ।
अभय द्वादशी । सोडियेली ॥६॥
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१८/०७/२०१६