< < < < मजबूरी हय > > > >

मिकादा, पैजारबुवा, अभ्यादादा आऊर रातराणीतै के पिच्चे पिच्चे मै भी कस्काय चल पड्या कायच म्हैती नाही. पन मेरा भी जळके करपा मस्सालाभात हुवा इस्लीये मयनेभी हिन्दिक्की चिंदी करनेका ठाणच डाल्या. मंग काय...एक आय अपने पोरट्याको कयसे धोपातटी हय वैच्च चित्र कविता मे उतारके इद्दर डालरा हू!

माझा मंडपेश्वर अनुभव

काल दहिसर बोरिवलीदरम्यानच्या मंडपेश्वर लेणींमध्ये जाऊन आलो. भारतीय इतिहास संकलन समितीच्या बोरीवली शाखेनं आखलेला कार्यक्रम होता. तन्ना सरांचा मेसेज आला आणि लगोलग तो दहा-बाराजणांना पुढे पाठवला. रविवारचा सुटीचा सोयीचा दिवस आणि मंडपेश्वरबाबत डाॅ. सूरज पंडित (Dr. Suraj A. Pandit ) यांच्याकडून मोफत माहिती. ब-याच जणांनी हो-नाही म्हणत, काही जणांनी 'मंडपेश्वरात काय पाहायचं' असा पवित्रा घेत, शेवटी माझ्यासोबत एकटा ( Manas Barve ) मानस बर्वेच आला. तोही वेळेच्या आधी. मीच आरामात उठून चेंगटासारखं आटपत आलो. येताना न विसरता कॅमेरा सोबत घेतला.

निसर्ग, पर्यावरण आणि आपण ३: आर्थिक विकासातला अनर्थ

लेखनप्रकार
निसर्ग, पर्यावरण आणि आपण १: प्रस्तावना निसर्ग, पर्यावरण आणि आपण २: नैसर्गिक असंतुलनामध्ये मानवाची भुमिका आर्थिक विकासातला अनर्थ आज आपण ज्याला विकास म्हणतो, तो प्रत्यक्षात काय आहे? आज आपण म्हणतो की, अनेक देश विकसित आहेत आणि अनेक विकसनशील आहेत. किंवा अमुक सरकारच्या पाच वर्षांमध्ये राज्याचा काहीच विकास झाला नाही. विकासाचा 'अर्थ' काय आहे? विकासाची प्रचलित संकल्पना पश्चिमेकडून आलेली आहे आणि ती मुख्यत: आर्थिक विकासावर आधारित आहे.

निसर्ग, पर्यावरण आणि आपण २: नैसर्गिक असंतुलनामध्ये मानवाची भुमिका

लेखनप्रकार
निसर्ग, पर्यावरण आणि आपण १: प्रस्तावना नैसर्गिक असंतुलनामध्ये मानवाची भुमिका मागच्या लेखात आपण बघितलं की, निसर्गाच्या नियमानुसार सर्व सृष्टी चालते. त्याची एक व्यवस्था असते. जर ह्या व्यवस्थेवर ताण पडला, तर निसर्गही बदलतो. जसं गुरुत्वाकर्षण हा एक नियम आहे. जर आपण वाकडे तिकडे चाललो तर आपण ह्या नियमामुळेच पडतो. त्याच प्रकारे आपण आणि निसर्ग ह्यांच्यात तणाव निर्माण होऊ शकतो.

महाभारत कथा ३ -धर्मयुद्ध

लेखनविषय:
"केशवा अन्याय झालाय माझ्यावर!" "आणि तु केलास तो न्याय होता दुर्योधना? भर सभेत तु मांडी उघडून दाखवलीस तो न्याय होता?" दुर्योधन विषण्णपणे हसला! "माझी अंधपुत्र म्हणून हेटाळणी झाली तो न्याय होता? प्रत्येक वेळी मी भीमाच्या बरोबरीचा असतांना फक्त पितृहीन म्हणून भीष्म, विदुर आणि द्रोण यांचा प्रेमाचा झरा त्याच्यासाठीच वाहणे हा न्याय होता?" "तू आपली बाजू निवडून घेतलीस दुर्योधना!" "नाही केशवा लादली गेली ती बाजू माझ्यावर. जेव्हा आपल्याच लोकांचा आधार संपतो, तेव्हा मनुष्य कुठलाही आधार शोधतो!" "तुझा अहंकार तुला आडवा आला." "मला अंधपुत्र म्हणताना अहंकार नव्हता?

यथा शास्त्रप्रमाणेनं...

लेखनप्रकार
सदर लेखनाचा रोख हा धार्मिकविधींमध्ये साध्या साध्या व्यवहाराच्या गोष्टी धार्मिक-आचार म्हणून कश्या रूढ होतात? हे दाखवून देणे हा आहे. 1)मुंजीतील क्षौर विधी-(न्हाव्याकडून) डोक्याचे केस काढणे. (गोटा करणे) (केंव्हा तरी) घडलेला घटना प्रसंग:- न्हाव्याकडून वस्तरा फिरवून झाल्यावर डोक्यावर काही केस राहिले. पुढे मुंजमुलाची तशीच अंघोळ झाली. नंतर कपडे घालून मुंजमुलगा मांडवात आला. कुणाला तरी राहिलेले केस दिसले. "हे चूक आहे" अशी चर्चा तिथे नातेवाईक/पुरोहित .. इत्यादिंकडून घडली. पुन्हा मुंजमुलास पाटावर बसवून राहिलेले केस न्हाव्याकडून काढण्यात आले.

पांडुरंग/पौंड्रक,आणि विट्ठल??

लेखनविषय:
लेखनप्रकार
जालावर पंढरपूरच्या पांडुरंगाची माहिती शोधत असताना एक इंटरेस्टिंग लेख सापडला. लेख संजय सोनावणी यांचा आहे,खाली त्यांची लिंक देतोय, http://m.maharashtratimes.com//articleshow/9165085.cms लिंक उघडायचा टंकाळा आला असेल तर हा घ्या लेख खाली पेस्टवतोय. >>> महाराष्ट्राचे आराध्य श्रीविट्ठल हे आजवर रहस्यच बनून गेले होते. विष्णुच्या २४ अवतारांत आणि विष्णु सहसनामांतही न सापडणारा हा एवढे माहात्म्य पावलेला देव कोणता? कोठून आला?

मरण!

"अरे का तापलायेस माझ्यावर? या निष्ठुर जगातल्या लोकांनी दिलेले चटके कमी आहेत का! तु तरी घे एकदाचा जीव माझा!" म्हातारा आकाशकडे पाहुन बडबडत होता.

..आणि 'ती'ला चर्चच्या गाभार्‍यात प्रवेश हवा आहे !

'मिनु इत्त्यीप्पे' नावाच्या स्त्रीचा स्क्रोल.इन नावाच्या संस्थळावर लेख आला आहे. 'मिनु इत्त्यीप्पे' तिच्या लेखाच्या शीर्षकापासूनच "Why only temples? Even some churches don't allow women into the inner sanctum; Religions continue to discriminate against women in the name of tradition." चर्चमधील स्त्रीयांशी केल्या जाणार्‍या भेदभावा बद्दल तक्रार करते. लेखात तीने दिलेल्या माहितीनुसार ती 'मलंकारा मरथोमा सिरीयन' नावाच्या चर्चशी संलग्न आहे.

देव गाभाऱ्याबाहेर निघाला!

शून्य मनाने बसलो होतो गाभाऱ्यात आली ती पलीकडुन! सांगितले कानात येताहेत भेटायला तुला! किती आनंदलो मी! बहुता दिसा भेट होणार का जन्मासी आलो मी! जगण्याला अर्थ येणार आली ती देवळात निघाली माझ्याकडे येण्यासाठी! आता रिते झाले मन नवे वर्म भरून घेण्यासाठी! थांब कुलटा घणाघात झाला! परंपरा तोडशिल? मुलाला भेटायला! परंपरा आड आली भरल्या डोळ्याने परत निघाली! मुलाला भेटावयाची इच्छा इच्छा अधुरीच राहिली! माता गेली माघारी मुलाचा कोप झाला! आणि परंपरा तोडून देव गाभाऱ्याबाहेर निघाला!
Subscribe to धर्म