मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ही आगळी कहाणी : एक आगळावेगळा कथासंग्रह

अॅस्ट्रोनाट विनय ·
जेवणात गुलाबजाम अन वाचनात लघुकथा आवडत नाहीत असा व्यक्ती सापडणे अवघड. नारळीकर, धारप, वपू, मिरासदार, मतकरी वगैरे कथाकारांच्या लिखाणाने कित्येक पिढ्यांची वाचनभूक भागवली आहे. मराठी वाचक नेहमीच उत्तमोत्तम कथांच्या शोधात असतो. आजच्या धकाधकीच्या अन तणावग्रस्त आयुष्यात काही खुसखुशीत वाचायला मिळालं तर ! हीच गरज निलेश मालवणकर यांचा 'ही आगळी कहाणी' हा नवीन कथासंग्रह पुर्ण करतो. सहज म्हणून मी पुस्तक हाती घेतलं आणि संपेपर्यंत हातातून सुटलं नाही. इतक्या सहजपणे आणि विनोदी शैलीत कथाविषय मानण्याचं कसब फार कमी लेखकांकडे असतं. पुस्तकाचं रुपडं चित्ताकर्षक आहे.

दांडी मारणे - एक विलक्षण कला

किसन शिंदे ·

In reply to by किसन शिंदे

मी काय म्हणतो की एवीतेवी अभ्या जेवायला घालत आहेच तर ऑफीसला दांडी मारुन सोलापुरला एक चक्कर टाकुन येवुयात काय ? ;)

In reply to by अभ्या..

किसन शिंदे 30/03/2017 - 16:50
असं कसं x २ जिलब्या बंद झाल्या म्हणजे जेवण द्यायलाच लागेल आता. तिथे सोलापूरात नाही दिलेस तरी इकडे पुण्यात येऊन दे. ;)

In reply to by किसन शिंदे

अभ्या.. 30/03/2017 - 16:55
अबे काय लाड करुन घ्यायलास बे? अडलंय का नडलंय. जावाई का तू माझा? पुण्यात येऊन घाल म्हणे जेवण. . किसन्या अजून किती प्रतिसाद हवेत सांग ना गडे एकदाच. चाळीस झाले की बास म्हणायचं हं. ;)

मोदक 24/03/2017 - 19:20
बाकी काहीही असो.. असे आजारपणाचे / दुखापतीचे किंवा मयताच्या घरचे फोटो पुरावा म्हणून मागणे चुकीचे आहे. हुच्चभ्रु भाषेत - असंवेदनशील वगैरे. ..आणि हे वैयक्तीक घेऊ नकोस. कंपनीची तशी रीत असली तरी त्याचे अनुकरण करणे / न करणे आपल्या हातात असते.

In reply to by मोदक

किसन शिंदे 24/03/2017 - 19:26
तसं ते असंवेदनशील असलं तरी प्रत्येकाच्या बाबतीत होतेच असे नाही. ज्यांचा रेकाॅर्ड्सचा याबाबतीत नेहमी ट्रॅक ठेवला जातो, त्यांच्याकडूनच असे पुरावे मागितले जातात. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही तसाच काहीसा प्रकार.

पैसा 24/03/2017 - 20:16
एकदा मारलेल्या नातेवाईकाला पुन्हा मारलं नाही की झालं!

शेवटचा डाव 25/03/2017 - 01:43
काही लोकांकडे करीश्मा असतो माझ्या रिलीव्हर ने एकही नाईट पुर्ण आठवडा केल्याच आठवत नाही.कस काय पटवतो बाँसल काय माहाती दिवाळीत ईंटरचेँज झाल म्हणुन वाचलो .,,,,,,पर्सनली माझ्या थापा 1गाडी पंचर झाली आहे माझी ,,,,,,मग काय पर्याय नसतो अन व्हाटसाप फोटो हि नाही 2[लग्नाआधी] सर घरी पोरी कडील बघायला येणार आहे 3एकदातर प्यायला बसलो होतो .कळून चुकल आता नाईट ला जाण शक्य नाही लावला बाँसला फोन "सर दोस्तो ने जबरजस्ती दारु पिलादी हे "बाँस "मतलब आज नाईट मे नही आरहे" असो "रात्री हा नव्हता आला काय झाल त्याला" लगेच दुसरा "कशाच काय काल गेला असल त्या भवानीला भेटायला तीकडच भिडेल असल भिडु" तिसरा"साहेबाला बराबर बाटलीत टाखल साल्यान" अशा कमेँट कँन्टीन मध्ये चालतात खडुस बाँसच्या काळात 50च्या वर लिव्ह बँलंस असायच्या पोरांचा पण आमच्या चार पाच जणांचा 15च्या वर गेल्याच नाही पण नविन बाँस आला पटापट सगळेच 20 च्या आत आले त्याला कुठलेच नियोजन करावे लागत नाही फक्त फोन करायचा सर सुट्टी घेतोय तो लगेच म्हनणार ठिक आहे रिलीव्हरला सांग

आनंदयात्री 25/03/2017 - 02:10
>>अजूनही बरंच काही सांगायचंय पण...आलोच, पोटात मुरडा उठल्यामुळे कामाला येत नसल्याचा बॉसला मॅसेज टाकून.. हा हा हा. आता बॉसला फोटो मागायचीही सोय नाही. या हातच्या काकणाने नोकरदारांच्या आयुष्यात चांगलाच हलकल्लोळ उडवलाय की! कोणे एके काळी वर्क फ्रॉम होम करताना, दुपारी जरा डोळा लागेल तेव्हा लिंक/कम्युनिकेटरवरचा दिवा हिरवाच राहावा म्हणून केलेले स्क्रिप्टिंग आठवले.

जगप्रवासी 25/03/2017 - 12:01
मंथ एन्डला पगार करताना जेव्हा लिव्ह रिपोर्ट काढतो तेव्हा एक एक भन्नाट कारणे वाचायला भेटतात. एकाने सुट्टी टाकली होती की अपघात झालाय, दोन दिवस यायला जमणार नाही. त्याच्या बॉसने रजा अप्रूव्ह केली आणि त्याच पट्ठ्याने अलिबाग बीचवरचा फोटो एफबीवर लोकेशन टॅग करून टाकला, काय तर म्हणे फिलिंग रिलॅक्स अट नागाव. नशीब त्याचा बॉस एफबी वर नाहीये. अजून एक मुलगी फायनान्स मध्ये आहे जी मंथ एंडला येणाऱ्या शनिवारी हमखास दांडी मारायची, फायनान्स मॅनेजरला विचारला तर तव बोलला अरे तिचा नवरा किंवा सासू नेहमी मंथ एंडला आजारी पडतात. एका मुलाने त्याच्या बहिणीला बघायला येणार आहेत म्हणून सुट्टी घेतली होती, मी मनातच म्हटलं लेका तू तिथे राहून काय करणार होतास. इव्हन माझ्या बॉसला माहिती आहे जेव्हा मी मोठ्या ट्रेकला जातो तेव्हा सोमवारी मी काही येणार नाही. नेहमीप्रमाणे मेसेज टाकतो ट्रॅफिक मुळे सकाळी ११ला घरी पोचलो, आज यायला जमणार नाही. बॉस देखील माहित असल्याप्रमाणे ओके बोलतो. अजून खूप मजेशीर कारण आहेत, सवड भेटली की टंकेन

विशुमित 25/03/2017 - 14:59
ज्या खऱ्या कारणासाठी दांडी मारलेली असते, त्या कारणाचा उपयोग ह्या दांडी साठी न करता पुढील दांडी साठी वापरण्याचा माझा फंडा होता. आताच्या कंपनी मध्ये गेले ३ वर्ष झाले मी उद्या/आज येणार नाही एवढे सांगितले तरी मला सुट्टी मिळाली आहे, कोणते ही कारण न सांगता. नशीबवान आहे मी.

एमी 30/03/2017 - 07:45
माफ कर किसन्या, दोस्तीत जेवाया घालतो पण असल्या जिल्ब्या नकोत राव. >> =)) त्याला कुठलेच नियोजन करावे लागत नाही फक्त फोन करायचा सर सुट्टी घेतोय तो लगेच म्हनणार ठिक आहे रिलीव्हरला सांग. >> Like!

आमचे सध्याचे साहेब फार कमी रजा मंजूर करतात, मंजूर करतानाही चेहरा खूप वेडावाकडा करतात, पेक्षा सुटी नको असा फील असतो. सुटी दिली तरी फोन करतात का, ही धास्ती. मला सुट्टीसाठी 'लूज मोशन' हे कारण लागू पडले आहे. एकदा ताप आला आहे, असे सांगितले तेव्हा तुम्ही तब्येतीची डेली रिपोर्टींग केलं नाही म्हणून मला खुलासाही द्यावा लागला आहे. पण धागा मस्तय रे...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किसन शिंदे 30/03/2017 - 17:30
एकदा ताप आला आहे, असे सांगितले तेव्हा तुम्ही तब्येतीची डेली रिपोर्टींग केलं नाही म्हणून मला खुलासाही द्यावा लागला आहे.
बहुदा त्यांना तुमच्या तब्येतीची खूप काळजी असावी. #प्राचार्य रॉक्स_प्रॉ डॉ शॉक्स ;)

मी-सौरभ 30/03/2017 - 17:52
लोकं भारी भारी कारणं टाकतात. माझ्या ओळखिच्या एका काकांनी दोन दा अ‍ॅपेंडिक्क्स च्या शस्त्रक्रियेसाठी सुट्टी घेतलेली (२ वेगवेगळ्या साहेबांकडून) आणि शस्त्रक्रिया एकदा पण नाहि झालि.

In reply to by किसन शिंदे

मी काय म्हणतो की एवीतेवी अभ्या जेवायला घालत आहेच तर ऑफीसला दांडी मारुन सोलापुरला एक चक्कर टाकुन येवुयात काय ? ;)

In reply to by अभ्या..

किसन शिंदे 30/03/2017 - 16:50
असं कसं x २ जिलब्या बंद झाल्या म्हणजे जेवण द्यायलाच लागेल आता. तिथे सोलापूरात नाही दिलेस तरी इकडे पुण्यात येऊन दे. ;)

In reply to by किसन शिंदे

अभ्या.. 30/03/2017 - 16:55
अबे काय लाड करुन घ्यायलास बे? अडलंय का नडलंय. जावाई का तू माझा? पुण्यात येऊन घाल म्हणे जेवण. . किसन्या अजून किती प्रतिसाद हवेत सांग ना गडे एकदाच. चाळीस झाले की बास म्हणायचं हं. ;)

मोदक 24/03/2017 - 19:20
बाकी काहीही असो.. असे आजारपणाचे / दुखापतीचे किंवा मयताच्या घरचे फोटो पुरावा म्हणून मागणे चुकीचे आहे. हुच्चभ्रु भाषेत - असंवेदनशील वगैरे. ..आणि हे वैयक्तीक घेऊ नकोस. कंपनीची तशी रीत असली तरी त्याचे अनुकरण करणे / न करणे आपल्या हातात असते.

In reply to by मोदक

किसन शिंदे 24/03/2017 - 19:26
तसं ते असंवेदनशील असलं तरी प्रत्येकाच्या बाबतीत होतेच असे नाही. ज्यांचा रेकाॅर्ड्सचा याबाबतीत नेहमी ट्रॅक ठेवला जातो, त्यांच्याकडूनच असे पुरावे मागितले जातात. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही तसाच काहीसा प्रकार.

पैसा 24/03/2017 - 20:16
एकदा मारलेल्या नातेवाईकाला पुन्हा मारलं नाही की झालं!

शेवटचा डाव 25/03/2017 - 01:43
काही लोकांकडे करीश्मा असतो माझ्या रिलीव्हर ने एकही नाईट पुर्ण आठवडा केल्याच आठवत नाही.कस काय पटवतो बाँसल काय माहाती दिवाळीत ईंटरचेँज झाल म्हणुन वाचलो .,,,,,,पर्सनली माझ्या थापा 1गाडी पंचर झाली आहे माझी ,,,,,,मग काय पर्याय नसतो अन व्हाटसाप फोटो हि नाही 2[लग्नाआधी] सर घरी पोरी कडील बघायला येणार आहे 3एकदातर प्यायला बसलो होतो .कळून चुकल आता नाईट ला जाण शक्य नाही लावला बाँसला फोन "सर दोस्तो ने जबरजस्ती दारु पिलादी हे "बाँस "मतलब आज नाईट मे नही आरहे" असो "रात्री हा नव्हता आला काय झाल त्याला" लगेच दुसरा "कशाच काय काल गेला असल त्या भवानीला भेटायला तीकडच भिडेल असल भिडु" तिसरा"साहेबाला बराबर बाटलीत टाखल साल्यान" अशा कमेँट कँन्टीन मध्ये चालतात खडुस बाँसच्या काळात 50च्या वर लिव्ह बँलंस असायच्या पोरांचा पण आमच्या चार पाच जणांचा 15च्या वर गेल्याच नाही पण नविन बाँस आला पटापट सगळेच 20 च्या आत आले त्याला कुठलेच नियोजन करावे लागत नाही फक्त फोन करायचा सर सुट्टी घेतोय तो लगेच म्हनणार ठिक आहे रिलीव्हरला सांग

आनंदयात्री 25/03/2017 - 02:10
>>अजूनही बरंच काही सांगायचंय पण...आलोच, पोटात मुरडा उठल्यामुळे कामाला येत नसल्याचा बॉसला मॅसेज टाकून.. हा हा हा. आता बॉसला फोटो मागायचीही सोय नाही. या हातच्या काकणाने नोकरदारांच्या आयुष्यात चांगलाच हलकल्लोळ उडवलाय की! कोणे एके काळी वर्क फ्रॉम होम करताना, दुपारी जरा डोळा लागेल तेव्हा लिंक/कम्युनिकेटरवरचा दिवा हिरवाच राहावा म्हणून केलेले स्क्रिप्टिंग आठवले.

जगप्रवासी 25/03/2017 - 12:01
मंथ एन्डला पगार करताना जेव्हा लिव्ह रिपोर्ट काढतो तेव्हा एक एक भन्नाट कारणे वाचायला भेटतात. एकाने सुट्टी टाकली होती की अपघात झालाय, दोन दिवस यायला जमणार नाही. त्याच्या बॉसने रजा अप्रूव्ह केली आणि त्याच पट्ठ्याने अलिबाग बीचवरचा फोटो एफबीवर लोकेशन टॅग करून टाकला, काय तर म्हणे फिलिंग रिलॅक्स अट नागाव. नशीब त्याचा बॉस एफबी वर नाहीये. अजून एक मुलगी फायनान्स मध्ये आहे जी मंथ एंडला येणाऱ्या शनिवारी हमखास दांडी मारायची, फायनान्स मॅनेजरला विचारला तर तव बोलला अरे तिचा नवरा किंवा सासू नेहमी मंथ एंडला आजारी पडतात. एका मुलाने त्याच्या बहिणीला बघायला येणार आहेत म्हणून सुट्टी घेतली होती, मी मनातच म्हटलं लेका तू तिथे राहून काय करणार होतास. इव्हन माझ्या बॉसला माहिती आहे जेव्हा मी मोठ्या ट्रेकला जातो तेव्हा सोमवारी मी काही येणार नाही. नेहमीप्रमाणे मेसेज टाकतो ट्रॅफिक मुळे सकाळी ११ला घरी पोचलो, आज यायला जमणार नाही. बॉस देखील माहित असल्याप्रमाणे ओके बोलतो. अजून खूप मजेशीर कारण आहेत, सवड भेटली की टंकेन

विशुमित 25/03/2017 - 14:59
ज्या खऱ्या कारणासाठी दांडी मारलेली असते, त्या कारणाचा उपयोग ह्या दांडी साठी न करता पुढील दांडी साठी वापरण्याचा माझा फंडा होता. आताच्या कंपनी मध्ये गेले ३ वर्ष झाले मी उद्या/आज येणार नाही एवढे सांगितले तरी मला सुट्टी मिळाली आहे, कोणते ही कारण न सांगता. नशीबवान आहे मी.

एमी 30/03/2017 - 07:45
माफ कर किसन्या, दोस्तीत जेवाया घालतो पण असल्या जिल्ब्या नकोत राव. >> =)) त्याला कुठलेच नियोजन करावे लागत नाही फक्त फोन करायचा सर सुट्टी घेतोय तो लगेच म्हनणार ठिक आहे रिलीव्हरला सांग. >> Like!

आमचे सध्याचे साहेब फार कमी रजा मंजूर करतात, मंजूर करतानाही चेहरा खूप वेडावाकडा करतात, पेक्षा सुटी नको असा फील असतो. सुटी दिली तरी फोन करतात का, ही धास्ती. मला सुट्टीसाठी 'लूज मोशन' हे कारण लागू पडले आहे. एकदा ताप आला आहे, असे सांगितले तेव्हा तुम्ही तब्येतीची डेली रिपोर्टींग केलं नाही म्हणून मला खुलासाही द्यावा लागला आहे. पण धागा मस्तय रे...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किसन शिंदे 30/03/2017 - 17:30
एकदा ताप आला आहे, असे सांगितले तेव्हा तुम्ही तब्येतीची डेली रिपोर्टींग केलं नाही म्हणून मला खुलासाही द्यावा लागला आहे.
बहुदा त्यांना तुमच्या तब्येतीची खूप काळजी असावी. #प्राचार्य रॉक्स_प्रॉ डॉ शॉक्स ;)

मी-सौरभ 30/03/2017 - 17:52
लोकं भारी भारी कारणं टाकतात. माझ्या ओळखिच्या एका काकांनी दोन दा अ‍ॅपेंडिक्क्स च्या शस्त्रक्रियेसाठी सुट्टी घेतलेली (२ वेगवेगळ्या साहेबांकडून) आणि शस्त्रक्रिया एकदा पण नाहि झालि.
खासगी किंवा सरकारी कार्यालयात काम करताना इतर चांगल्या-वाईट अनुभवांसोबत एका वेगळ्या गोष्टीचा अनुभव सगळ्यांनाच असतो, तो म्हणजे दांडी मारण्याचा आणि त्यासाठी अफलातून अशी कारणे देण्याचा वा शोधण्याचा. दोन्ही ठिकाणी वरिष्ठ पदावर काम करत असलेल्या व्यक्तीला त्याच्या हाताखाली असलेल्या कर्मचार्‍याकडून अचानकपणे दांडी मारण्याची अनेक कारणे दिली जातात. काही वेळेला ती खरी असतातही, तर काही वेळेला ती निव्वळ खोटी आणि मजेशीरही असतात.

गोविंदराव तळवळकर

विकास ·

गॅरी ट्रुमन 22/03/2017 - 09:51
गोविंदराव तळवलकरांना श्रध्दांजली. माझ्या वयाच्या मिपाकरांच्या आठवणीत गोविंदरावांचे लिखाण फार नाही. तरीही जे काही थोडेफार वाचले त्यातून आणि इतर संदर्भांमधून त्यांच्या लेखणीचे सामर्थ्य नक्कीच कळले.

खेडूत 22/03/2017 - 10:16
गोविंदराव तळवलकरांना श्रध्दांजली.. __/\__ २७ वर्षांच्या त्यांच्या संपादकपदाच्या काळात अखेरची १५ वर्षे म्हणजे माझ्या लहानपणी म टा नियमित वाचत असे. त्याकाळी तो अत्यंत दर्जेदार पेपर होता. डाक एडिशन आमच्या गावात रात्री एस टीने आठ वाजता येई.

पैसा 22/03/2017 - 10:17
श्रद्धांजली. माझे वाचन आणि विचार जशी मी घडले त्यात गोविंदराव तळवलकरांचा फार मोठा भाग आहे. माझे वडील, काका संघाचे कार्यकर्ते असताना घरात रोजचा पेपर महाराष्ट्र टाईम्स असायचा. तो काळ तसाच होता. शरद पवार तेव्हा तरूण तडफदार आणि पुढे येणारे उगवते नेतृत्व होते. आणीबाणीनंतरचे दिवस आठवत आहेत. शाळेत जाण्याच्या वयाची असले तरीही आजूबाजूला जगात काय चालू आहे हे एका खेड्यातही आम्हाला नीट कळत होते कारण दुपारी बारा वाजता का होईना महाराष्ट्र टाईम्स घरी येत होता. त्याचा अग्रलेख आम्ही संध्याकाळी वाचायचो. पण तरी रोजचा पेपर वाचायची सवय तेव्हाच लागली. म. टा, मधले "धावते जग" हे संपादकीय सदरही फार सुरेख असायचे. तळवलकरांचे सत्तांतराचे खंड आणि इतर पुस्तके संग्रही आहेत. पत्रकारिता ही तात्कालिक घटनांवर भाष्य करणारी असली तरी गोविंदरावांचे इतर वैचारिक लिखाणही अत्युच्च दर्जाचे आहे. आताची पत्रकारिता लोकांच्या मागणीवर मागेपुढे धावत असते तर गोविंदरावांनी लोकांच्या आवडीला वळण लावण्याचे काम केले. त्या पिढीचे ते शेवटचे पत्रकार होते. गोविंदराव निवृत्त झाल्यानंतर आणि आर केंचा कॉमन मॅन मुखपृष्ठावरून हटल्यानंतर टाईम्सचा वेगळा चेहरा हरवला. आणि इतर पेपरांसारखाच अजून एक पेपर आवर्जून वाचायचे कारण उरले नाही. ती सगळी पिढी काळाच्या पडद्याआड होताना आणि टीव्हीवरच्या कंठाळी अभिनेत्याना पत्रकार म्हणून मान्यता मिळत असताना तळवलकरांसारखे लोक अस्तंगत होत आहेत ही बातमी कोणत्याही टीव्ही चॅनेलवर अजून पाहिली नाही याचेही आता नवल वाटत नाही. पुन्हा एकदा तळवलकरांना मनःपूर्वक श्रद्धांजली.

In reply to by पैसा

माहितगार 22/03/2017 - 11:42
महाराष्ट्राच्या वैचारीक जडण घडणीत त्यांचा महत्वाचा वाटा होता हे नक्कीच. त्यांचे लेखन महाराष्ट्र टाईम्स/ टाईम्स ऑफ इंडीया ग्रुपने त्यांच्या वेबसाईटवर / आंतरजालावर मोफत उपलब्ध ठेवावयास हवे असे वाटते.

In reply to by माहितगार

अजया 22/03/2017 - 16:09
तळवळकरांच्या अग्रलेखासाठी आपण महाराष्ट्र टाईम्स घ्यायचो असे मध्ये मला वडील म्हणाले होते. आताचा मटा त्यांना भेळेसाठी बरा वाटतो. कित्येकदा वडलांनी समोर पेपर टाकून आजचा अग्रलेख वाचा.हे खरे साक्षेपी लिखाण सांगितलेले आठवतं. धावते जग वाचणेही. प्रत्येक क्षेत्रातच पायावर डोके ठेवावी अशी माणसे कमी असण्याच्या काळात असे व्यासंगी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड जाणे कधीही दुःखदच. श्रध्दांजली _/\_

In reply to by पैसा

विकास 22/03/2017 - 18:22
गोविंदरावांनी लोकांच्या आवडीला वळण लावण्याचे काम केले. त्या पिढीचे ते शेवटचे पत्रकार होते. अगदी अगदी! गोविंदराव निवृत्त झाल्यानंतर आणि आर केंचा कॉमन मॅन मुखपृष्ठावरून हटल्यानंतर टाईम्सचा वेगळा चेहरा हरवला. हे कटू सत्य आहे. :(

In reply to by पैसा

संपत 23/03/2017 - 14:08
तळवलकरांसारखे लोक अस्तंगत होत आहेत ही बातमी कोणत्याही टीव्ही चॅनेलवर अजून पाहिली नाही
तुमचा प्रतिसाद काल सकाळचा आहे. फक्त माहिती साठी सांगतो काल रात्री abp माझा आणि झी ने तळवळकर ह्यांच्यावर विशेष कार्यक्रम केले. झीचा कार्यक्रम माझ्यासारख्या मटाचा वाचक नसलेल्यांना त्यांची ओळख घडवणारा होता.

थोर माणूस. महाराष्ट्र टाईम्स मध्ये अग्रलेखाच्या खाली त्यांचे एक सदर असायचे. आत्ता नाव आठवत नाही. तुम्हाला 'धावते जग' म्हणायचे असावे बहुधा.

पुंबा 22/03/2017 - 11:14
ज्या एका व्यक्तीमुळे आजही जालावर मराठी वृत्तपत्र पहायला गेलो की आपोआप महाराष्ट्र टाईम्सचे पान उघडले जाते अशी एक विचारवंत व्यक्ती आज काळाच्या पडद्याआड गेली.
सहमत. आमच्या पिढीला त्यांचे अग्रलेख वाचायला मिळाले नाहीत. मात्र त्यांचे साधनेतील दीर्घ लेख म्हणजे जबरदस्त बौद्धीक मेजवानी असे. त्यांचा टागोरांवरचा आणि जेन ऑस्टिनवरचा हे दोन लेख अजून आठवतात. तळवलकरांना आदरांजली.

वरुण मोहिते 22/03/2017 - 13:05
वाटत आहे .. संपादकांना घडववणारे होते गोविंदराव . पत्रकारांना नाही .आमच्या एका ग्रुप वर कालच बोलो होतो कि टाइम्स ह्यांच्यामुळे चालला. नकळत्या वयात मला एकदा बोरिवली ला भेटलेले ,धडाधड २७ इंग्लिश पुस्तकांची लिस्ट काढून दिली त्यांनी . काय वाच म्हणून . आताशा भारतात कमी यायचे ते .

एस्बिएस 22/03/2017 - 14:59
त्यांचे संपादकीय आणि बहुधा त्यांनीच लिहिलेली धावते जग, इंग्रजी ग्रंथ परिचय वगैरे सदरे फारच छान वाटत. तेव्हाचा मटा वाचूनच कितीतरी वेगवेगळी माहिती, विचार यांची ओळख होत असे.

कंजूस 22/03/2017 - 17:05
मी त्यांचे लेख वाचायचो॥ त्यावेळी माझी स्वतंत्र अशी कोणतीच विचारसरणी नव्हती. भाषाशैली म्हणून आवडायचे. खरंम्हणजे वेगवेगळे लेखक संपादक पुढे आणण्यात टाइम्स ग्रुप अग्रेसर आहे.

गामा पैलवान 22/03/2017 - 23:47
तळवलकरांचं लेखन फारसं वाचलं नाही. मी लहानपणापासून हिंदुत्ववादी. त्यामुळे डाव्या पठडीतलं लेखन फारसं आवडंत नसे. टाईम्स डावा असूनही काँग्रेसच्या बाजूने लिहितो म्हणजे अप्रामाणिक आहे अशी काहीशी समजूत होती. मला तळवलकरांचं लेखन फार पाश्चात्यकेंद्रित वाटंत असे (हे बरोबर की चूक ते ठाऊक नाही). शिवाय तळवलकर शिवसेनेच्या विरोधात लिहायचे, त्यामुळे पटायचे नाहीत. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर लिहिलेला इंग्रजी लेख फार म्हणजे फारंच खटकला (दुवा सापडंत नाहीये). मात्रं असं असलं तरी त्यांचे अग्रलेख समतोल असंत. आज कोणीही उठवळ तोंडाचा माणूस स्वत:स संपादक म्हणवतो, त्यामानाने तळवलकर भारदस्त होते. वैचारिकदृष्ट्या विरोधी कंपूतले असले तरी ते आदरणीय व्यक्तिमत्व होते. त्यांना आदरांजली. -गा.पै.

मारवा 23/03/2017 - 09:22
बिघडलेली होती तेव्हा जी अनेकरंगी पवित्रे व वळणे त्यांच्या निर्भीड लेखणीने घेतली ते फार रंजक होते. त्यातले ४ लेख जरी कूठे मिळाल्यास जरूर वाचा अर्थात नंतर माझी मनस्थीती खराब हती हे मान्य करण्याचा मोठेपणा ही होताच.

In reply to by मारवा

पुंबा 23/03/2017 - 11:10
मारवाजी, कुठे मिळू शकतील हे लेख? एकूणच गोविंदरावांचे त्यांच्या बहारीच्या काळातील(संपादक म्हणून) अग्रलेख एकत्रीत केलेले आहेत काय? असल्यास वाचायला आवडतील.

In reply to by मारवा

विकास 23/03/2017 - 19:18
तळवळकरांचे वैचारीक आणि कदाचीत व्यक्तीगतही मित्र असलेले पुल आणि दुर्गाबाई पण आणिबाणीविरोधात उतरल्या तरी ते असला जाहीर विरोध करू शकले नाहीत. तुम्ही म्हणता तसे त्यांनी ते नंतर जाहीर पणे मान्य देखील केले आणि म्हणूनच त्यांच्या अग्रलेखांच्या संकलनात त्या काळातले अग्रलेख प्रकाशीत केले गेले नाहीत. खालील उतारा हा म.टा. मधील आजच्या अग्रलेखातील (मृत्यूलेखातील) आहे: "इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये `आणीबाणी' लादली आणि त्यांच्या लेखणीचा प्राण जणू जेरबंद झाला. पण त्यांना संपादकपद सोडून सत्याग्रहही करवला नाही. तळवलकरांचे मोठेपण असे की, आणीबाणीनंतर त्यांनी वाचकांची बिनशर्त माफी मागितली आणि पुढच्या एकाही लेख किंवा अग्रलेखांच्या संग्रहात त्या काळातील लेखन समाविष्ट केले नाही. "

दीपा माने 23/03/2017 - 09:24
सत्तरच्या दशकात न्यूयाॅर्क महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमांचे वृत्त महाराष्ट्र टाईम्समध्ये लिहीत होते त्याचे किती कौतुक व्हायचे मटा कडून आणि महाराष्ट्र ते बडोद्या पर्यंतच्या आप्तांपर्यंत त्याची आठवण आली.

रामदास 23/03/2017 - 09:35
विनय हर्डीकर यांनी २०१६ मध्ये अंतर्नादच्या अंकात लिहिलेला गोविंदराव आय मिस यु हा लेख जरूर वाचावा. हा लेख माझ्याकडे पीडीएफ स्वरुपात आहे पण इथे तो कसा अपलोड करायचा ते कळत नाही.

In reply to by रामदास

विकास 23/03/2017 - 20:13
लेखाचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद! (अजून पूर्ण वाचून होयचा आहे, पण) खूपच माहितीपूर्ण लेख आहे. नुसताच तळवळकरांसंदर्भात नाही तर त्या काळाचे चित्रण बघण्याकरता पण.

सस्नेह 23/03/2017 - 11:29
तळवलकरांच्या स्मृतीस अभिवादन ! उत्तम लेख. पैसाताईचा प्रतिसादही समर्पक !

लहानपणी परवडत नव्हते म्हणून केवळ नवाकाळ वाचता यायचा. त्यातील निळुभाऊंचे अग्रलेख अगदी कामगारी भाषेत असायचे. त्यामुळे ते देखील डावेच वाटायचे. मात्र त्यानंतर जयश्री खाडीलकरांनी त्यातील रया घालवली. नंतर काही दात्यांच्या कृपेने सार्वजनिक मित्रमंडळांतील मोफत वाचनालयात लोकसत्ता, मटा दिसू लागले व वाचता देखील येऊ लागले. मुळातच कोणत्याही वर्तमानपत्राचा अग्रलेख वाचणे म्हणजे वर्तमानपत्रातील अत्युच्य उंचीचे सदर वाचणे हा संस्कार मनात रुजविण्याचे श्रेय निळुभाऊंनाच जाते. कॉलेजात कितीही शिकून मोठे झालो तरी बालवाडीतल्या बाईंना न विसरता येण्यासारखा काहीसा प्रकार माझ्या बाबतीत झालाय खरा. मात्र मटा आणि लोकसत्ता यांच्यातुन निवड करायची वेळ येत असे तेव्हा मी लोकसत्ताचीच निवड करत असे. सामना केवळ रविवारच्या पुरवणीसाठी बघीतला जायचा. त्यातील सदरे खरोखरीच सुंदर असायची. गोविंदरावांच्या नंतर मटाने स्वत:चे फार झपाट्याने पतन करुन घेतले असे वाटते. असो. आज सगळी वर्तमानपत्रे वाचण्याइतका वेळ आणि पैसा आहे पण वाचता यावे असे कंटेंट मिसींग आहे असे वाटते. कदाचित "भुतकालस्य कथा रम्या" असा प्रकार माझ्याबाबतीत असावा. असो. गोविंदराव तळवळकर यांना श्रद्धांजली !

गोविंदराव तळवलकरांना विनम्र अभिवादन आणि श्रध्दांजली. ज्यो, गोविंदरावांनी लोकांच्या आवडीला वळण लावण्याचे काम केले. त्या पिढीचे ते शेवटचे पत्रकार होते. गोविंदराव निवृत्त झाल्यानंतर आणि आर केंचा कॉमन मॅन मुखपृष्ठावरून हटल्यानंतर टाईम्सचा वेगळा चेहरा हरवला. अगदी सहमत आहे. स्वाती

गोविंदराव तळवलकरांना श्रध्दांजली. अभ्यासपूर्ण लेख व अग्रलेख ही त्यांची खासियत. आणीबाणीच्या काळतले लेख( व एकण्दरीतच मटातले लेख) मात्र कधी मानवले नाहीत. नेहरूवाद्,रॉयवाद वाचकांना समजावून सांगताना ते घराणेशाहीचे,काँग्रेसचे समर्थन करीत नाहीत ना असे वाटायचे. राजीव गांधी सत्तेवर आल्यावर तसे जास्तच वाटू लागले. विश्वनाथ प्रताप सिंगानी राजीव गांधींना बोफोर्सवरून अडचणीत आणले व म.टा.त विश्वनाथ प्रताप,जनता दलावर पराकोटीची टिका छापून येऊ लागली. दर पंधरवड्याला 'देशाला दिशा देण्याची ताकद कॉन्ग्रेस्मध्येच आहे..जनता दल म्हणजे कडबोळे आहे..' वगैरे. प्रत्येक व्यक्तीस राजकीय मत असते. संपादक त्यास अपवाद नसावा पण प्रचारी थाटातले,विचार्शैली वाचकांच्या गळी उतरवू पाहणारे लेख 'पडायला' लागले की चाणाक्ष वाचक ते ओळखतात. नंतर कुमार केतकर आले आणी त्यांनी तर कमालच केली! 'पत्र नव्हे स्मार्ट काँग्रेस मित्र' असे हे विनोदाने म्हणत. अर्थकारण, मोठाले ग्रंथ्,मोठे युरोपियन लेखक्,कवी..ह्यांच्या कार्याची ओळख मात्र गोविंदरावांनीच करून द्यावी.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विकास 26/03/2017 - 18:16
मला वाटते "काँग्रेस मित्र" म्हणणे हे त्या काळातील तळवळकरांसहीत अनेक विचारवंतांना लागू पडेल... शरद पवारांचा तळवळकरांवरील म.टा. मधे आलेला श्रध्दांजली-लेख वाचण्यासारखा आहे. त्यात जसे तळवळकर कळतात तसेच तो काळ देखील समजतो. आणिबाणिच्या काळात अग्रलेख वाचण्याच्या वयात मी नव्हतो. पण, जे काही नंतर वाचले त्यानुसार त्यांनी आणिबाणि उठल्यानंतर जनतेची माफी मागितली आणि त्यांच्या कुठल्याही लेखसंग्रहात अथवा अग्रलेखसंग्रहातील पुस्तकात त्या काळातले लेख समाविष्ट होऊन दिले नाहीत. राजीव गांधी सत्तेवर आल्यावर तसे जास्तच वाटू लागले. खरे आहे. तरी देखील मला वाटते त्या वेळेस त्यांनी शहाबानोच्या संदर्भात जे काही राजीव गांधींनी ३/४ बहुमताच्या जोरावर केले त्यावर टिका केली आणि आरीफ मोहम्मंद खान वर (परत, जर बरोबर आठवत असेल तर त्यांनीच) "आरीफ यांची पुन्हा एकदा तारीफ" म्हणून अग्रलेख लिहीला होता. राजीव-हत्येनंतरच्या लेखांमधे तुम्ही म्हणता तसे त्यांचे राजीव प्रेम दिसले होते. त्यावेळेस जे म्हणाल तर परदेशी असलेल्या मार्क टली ला भारताची, भारतीय जनतेची आणि लोकशाहीची खात्री वाटली होती ती खात्री स्वातंत्र्यपूर्व आणि त्या सुमारास जन्माला आलेल्या अनेकांना वाटली नव्हती. तळवळर त्याला अपवाद नव्हते. त्यांच्या लेखनात हताशपणा दिसत होता. एका लेखात त्यांनी त्यांच्या आणि राजीव गांधींच्या एका वैयक्तिक भेटीचा उल्लेख केला होता. तो पाहून आश्चर्य वाटले होते. तसेच त्या काळात एकूणच मराठी नेत्यांना देखील भाव मिळत नसताना एका वृत्तपत्रसंपादकाला ते ही आपल्या आवडत्या संपादकाला, काँग्रेसचा सर्वोच्च नेता बोलवतो हे वाचून कुठेतरी (बालबुद्धीला!) कौतुक वाटले होते. विश्वनाथ प्रताप,जनता दलावर पराकोटीची टिका छापून येऊ लागली. विषयांतर टाळून इतकेच म्हणेन की तो तळवळरांचा दोष नाही. त्याचे सर्व "श्रेय" व्हि.पी. सिंगांकडेच जाते हे आता इतिहासाने सिद्ध केले आहे! :) प्रत्येक व्यक्तीस राजकीय मत असते. संपादक त्यास अपवाद नसावा पण प्रचारी थाटातले,विचार्शैली वाचकांच्या गळी उतरवू पाहणारे लेख 'पडायला' लागले की चाणाक्ष वाचक ते ओळखतात. अगदी खरे आहे. तळवळकर हे काँग्रेसच्या नक्कीच जवळ होते. काही अंशी त्यांना आणि त्या काळातील इतर संपादकांना मला सूट द्याविशी वाटत आहे. अर्थात हे त्यांचे समर्थन नाही. पण काळ समजून प्रतिक्रीया तयार करण्याचा एक प्रयत्न आहे. त्या काळत, एकूणच माध्यमांची घडी वेगळी होती. कितीही झाले तरी मराठी माध्यम परंपरेत टिळक-आगरकर- (संंपादक म्हणून नाही पण विचारवंत म्हणून) रानडे - गोखले यांचा प्रचंड मोठा वारसा होता आणि त्यामुळे कदाचीत इतर भाषिक आणि विशेष करून इंग्रजी भाषिक वर्तमानपत्रांपेक्षा अधिक नैतिकता होती. गोविंदरावांच्याच काँग्रेस शताब्दीच्या लेखात म्हणल्याप्रमाणे, काँग्रेस ही एक स्वातंत्र्यपूर्व काळातील चळवळ होती. त्यात विविध विचारांना सुरवातीस अधिक नंतर ते कमी होत गेले, पण स्थान होते. ४७ नंतर गांधीजींच्या इच्छेचा मान न राखता, काँग्रेस विसर्जीत करण्याऐवजी पक्षाने काँग्रेस हेच नाव ठेवल्याने, आजच्या मार्केटींगच्या भाषेत, brand recongintion करणे सोपे गेले. इतर पक्ष तयार झाले नव्हते. स्वतः डावे विचारवंत असले तरी तळवळकर काही साम्यवादी नव्हते. त्यामुळे कम्युनिस्टांना एक राजकीय पक्ष म्हणून किती समर्थन करायचे यावर बंधन होतेच. आधी जनसंघ आणि नंतर भाजपा हे देखील फार मोठे पक्ष नव्हतेच, शिवाय त्यांचे राजकीय तत्वज्ञान हे डाव्या विचारवंतास मान्य होणे लांब राहीले मानवणे पण शक्य नव्हते. अशातच नेहरूंच्या प्रतिमेने कायम स्वरूपी घातलेल्या भुरळीतून ह्या रॉयिस्ट मुर्तीभंजकाला देखील बाहेर पडता आले नाही. हे त्यावेळच्या तमाम पिढीचे वास्तव आहे. यात नेहरू बरोबर का चूक अथवा त्यांच्या कार्याची आणि चुकांची शहानिशा करण्याचा प्रश्न नाही. तर एखाद्या व्यक्तीस देवत्व देऊन इतर पर्याय न मानण्याचे एकेश्वरी वर्तन करण्यातला प्रकार आहे. म्हणूनच "नेहरूंनंतर कोण?" हा मुद्दा त्यांच्या हयातीत देखील खूप चघळला गेला होता. तरी देखील एक महत्वाचा मुद्दा असा आहे की तळवळकरांनी त्यांच्या नंतरच्या काळात सुरू झालेल्या दिशाभुल (विरोधी विचारांना एकतर राक्षस ठरवणे अथवा निर्बुद्ध-अडाणी म्हणण्याच्या) लेखनाची सुरवात केली असे म्हणण्यास वाव नाही. एकमेकांबद्दल वैचारीक दृष्ट्या विरोध असला तरी आदर असण्याचा आणि मैत्री ठेवण्याचा तो काळ होता. वैचारीक अस्पृश्यता आणि जातियता ही नंतरच्या काळात वाढीस लागली आणि सामाजिक तेढ करण्यास कारणीभूत ठरली. तळवळकरांच्या लेखनाची आणि अग्रलेखाची आवड असलेला मध्यमवर्गीय मराठी समाज, तो ही विशेष करून मुंबईचा आणि मग विरळ होत इतर ठिकाणचा... पण त्यातील नक्की किती आंधळे काँग्रेस समर्थक झाले अथवा कितींनी काँग्रेस विरोधक असलेल्या कधी जनता पार्टी तर कधी शिवसेना आणि भाजपाला मते दिली हा संशोधनाचा विषय आहे. परीणामी कधी कधी त्यांचे लेखनातील (राजकीय) म्हणणे पटले नाही तरी मूळ लेखात म्हणल्या प्रमाणे, "त्यांच्या लेखनातून ब्रेनवॉशिंग करण्याऐवजी कुठेतरी विचार करायला शिकवले." इतकेच वाटत राहीले.

नंदन 27/03/2017 - 02:35
समयोचित, नेमका लेख आणि प्रतिसाद. (तळवलकरांचे अग्रलेख ते आजची 'मटा'री भाषा हे चित्र पुरेसं विदारक आणि परिस्थितिनिदर्शक असावं.)

गॅरी ट्रुमन 22/03/2017 - 09:51
गोविंदराव तळवलकरांना श्रध्दांजली. माझ्या वयाच्या मिपाकरांच्या आठवणीत गोविंदरावांचे लिखाण फार नाही. तरीही जे काही थोडेफार वाचले त्यातून आणि इतर संदर्भांमधून त्यांच्या लेखणीचे सामर्थ्य नक्कीच कळले.

खेडूत 22/03/2017 - 10:16
गोविंदराव तळवलकरांना श्रध्दांजली.. __/\__ २७ वर्षांच्या त्यांच्या संपादकपदाच्या काळात अखेरची १५ वर्षे म्हणजे माझ्या लहानपणी म टा नियमित वाचत असे. त्याकाळी तो अत्यंत दर्जेदार पेपर होता. डाक एडिशन आमच्या गावात रात्री एस टीने आठ वाजता येई.

पैसा 22/03/2017 - 10:17
श्रद्धांजली. माझे वाचन आणि विचार जशी मी घडले त्यात गोविंदराव तळवलकरांचा फार मोठा भाग आहे. माझे वडील, काका संघाचे कार्यकर्ते असताना घरात रोजचा पेपर महाराष्ट्र टाईम्स असायचा. तो काळ तसाच होता. शरद पवार तेव्हा तरूण तडफदार आणि पुढे येणारे उगवते नेतृत्व होते. आणीबाणीनंतरचे दिवस आठवत आहेत. शाळेत जाण्याच्या वयाची असले तरीही आजूबाजूला जगात काय चालू आहे हे एका खेड्यातही आम्हाला नीट कळत होते कारण दुपारी बारा वाजता का होईना महाराष्ट्र टाईम्स घरी येत होता. त्याचा अग्रलेख आम्ही संध्याकाळी वाचायचो. पण तरी रोजचा पेपर वाचायची सवय तेव्हाच लागली. म. टा, मधले "धावते जग" हे संपादकीय सदरही फार सुरेख असायचे. तळवलकरांचे सत्तांतराचे खंड आणि इतर पुस्तके संग्रही आहेत. पत्रकारिता ही तात्कालिक घटनांवर भाष्य करणारी असली तरी गोविंदरावांचे इतर वैचारिक लिखाणही अत्युच्च दर्जाचे आहे. आताची पत्रकारिता लोकांच्या मागणीवर मागेपुढे धावत असते तर गोविंदरावांनी लोकांच्या आवडीला वळण लावण्याचे काम केले. त्या पिढीचे ते शेवटचे पत्रकार होते. गोविंदराव निवृत्त झाल्यानंतर आणि आर केंचा कॉमन मॅन मुखपृष्ठावरून हटल्यानंतर टाईम्सचा वेगळा चेहरा हरवला. आणि इतर पेपरांसारखाच अजून एक पेपर आवर्जून वाचायचे कारण उरले नाही. ती सगळी पिढी काळाच्या पडद्याआड होताना आणि टीव्हीवरच्या कंठाळी अभिनेत्याना पत्रकार म्हणून मान्यता मिळत असताना तळवलकरांसारखे लोक अस्तंगत होत आहेत ही बातमी कोणत्याही टीव्ही चॅनेलवर अजून पाहिली नाही याचेही आता नवल वाटत नाही. पुन्हा एकदा तळवलकरांना मनःपूर्वक श्रद्धांजली.

In reply to by पैसा

माहितगार 22/03/2017 - 11:42
महाराष्ट्राच्या वैचारीक जडण घडणीत त्यांचा महत्वाचा वाटा होता हे नक्कीच. त्यांचे लेखन महाराष्ट्र टाईम्स/ टाईम्स ऑफ इंडीया ग्रुपने त्यांच्या वेबसाईटवर / आंतरजालावर मोफत उपलब्ध ठेवावयास हवे असे वाटते.

In reply to by माहितगार

अजया 22/03/2017 - 16:09
तळवळकरांच्या अग्रलेखासाठी आपण महाराष्ट्र टाईम्स घ्यायचो असे मध्ये मला वडील म्हणाले होते. आताचा मटा त्यांना भेळेसाठी बरा वाटतो. कित्येकदा वडलांनी समोर पेपर टाकून आजचा अग्रलेख वाचा.हे खरे साक्षेपी लिखाण सांगितलेले आठवतं. धावते जग वाचणेही. प्रत्येक क्षेत्रातच पायावर डोके ठेवावी अशी माणसे कमी असण्याच्या काळात असे व्यासंगी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड जाणे कधीही दुःखदच. श्रध्दांजली _/\_

In reply to by पैसा

विकास 22/03/2017 - 18:22
गोविंदरावांनी लोकांच्या आवडीला वळण लावण्याचे काम केले. त्या पिढीचे ते शेवटचे पत्रकार होते. अगदी अगदी! गोविंदराव निवृत्त झाल्यानंतर आणि आर केंचा कॉमन मॅन मुखपृष्ठावरून हटल्यानंतर टाईम्सचा वेगळा चेहरा हरवला. हे कटू सत्य आहे. :(

In reply to by पैसा

संपत 23/03/2017 - 14:08
तळवलकरांसारखे लोक अस्तंगत होत आहेत ही बातमी कोणत्याही टीव्ही चॅनेलवर अजून पाहिली नाही
तुमचा प्रतिसाद काल सकाळचा आहे. फक्त माहिती साठी सांगतो काल रात्री abp माझा आणि झी ने तळवळकर ह्यांच्यावर विशेष कार्यक्रम केले. झीचा कार्यक्रम माझ्यासारख्या मटाचा वाचक नसलेल्यांना त्यांची ओळख घडवणारा होता.

थोर माणूस. महाराष्ट्र टाईम्स मध्ये अग्रलेखाच्या खाली त्यांचे एक सदर असायचे. आत्ता नाव आठवत नाही. तुम्हाला 'धावते जग' म्हणायचे असावे बहुधा.

पुंबा 22/03/2017 - 11:14
ज्या एका व्यक्तीमुळे आजही जालावर मराठी वृत्तपत्र पहायला गेलो की आपोआप महाराष्ट्र टाईम्सचे पान उघडले जाते अशी एक विचारवंत व्यक्ती आज काळाच्या पडद्याआड गेली.
सहमत. आमच्या पिढीला त्यांचे अग्रलेख वाचायला मिळाले नाहीत. मात्र त्यांचे साधनेतील दीर्घ लेख म्हणजे जबरदस्त बौद्धीक मेजवानी असे. त्यांचा टागोरांवरचा आणि जेन ऑस्टिनवरचा हे दोन लेख अजून आठवतात. तळवलकरांना आदरांजली.

वरुण मोहिते 22/03/2017 - 13:05
वाटत आहे .. संपादकांना घडववणारे होते गोविंदराव . पत्रकारांना नाही .आमच्या एका ग्रुप वर कालच बोलो होतो कि टाइम्स ह्यांच्यामुळे चालला. नकळत्या वयात मला एकदा बोरिवली ला भेटलेले ,धडाधड २७ इंग्लिश पुस्तकांची लिस्ट काढून दिली त्यांनी . काय वाच म्हणून . आताशा भारतात कमी यायचे ते .

एस्बिएस 22/03/2017 - 14:59
त्यांचे संपादकीय आणि बहुधा त्यांनीच लिहिलेली धावते जग, इंग्रजी ग्रंथ परिचय वगैरे सदरे फारच छान वाटत. तेव्हाचा मटा वाचूनच कितीतरी वेगवेगळी माहिती, विचार यांची ओळख होत असे.

कंजूस 22/03/2017 - 17:05
मी त्यांचे लेख वाचायचो॥ त्यावेळी माझी स्वतंत्र अशी कोणतीच विचारसरणी नव्हती. भाषाशैली म्हणून आवडायचे. खरंम्हणजे वेगवेगळे लेखक संपादक पुढे आणण्यात टाइम्स ग्रुप अग्रेसर आहे.

गामा पैलवान 22/03/2017 - 23:47
तळवलकरांचं लेखन फारसं वाचलं नाही. मी लहानपणापासून हिंदुत्ववादी. त्यामुळे डाव्या पठडीतलं लेखन फारसं आवडंत नसे. टाईम्स डावा असूनही काँग्रेसच्या बाजूने लिहितो म्हणजे अप्रामाणिक आहे अशी काहीशी समजूत होती. मला तळवलकरांचं लेखन फार पाश्चात्यकेंद्रित वाटंत असे (हे बरोबर की चूक ते ठाऊक नाही). शिवाय तळवलकर शिवसेनेच्या विरोधात लिहायचे, त्यामुळे पटायचे नाहीत. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर लिहिलेला इंग्रजी लेख फार म्हणजे फारंच खटकला (दुवा सापडंत नाहीये). मात्रं असं असलं तरी त्यांचे अग्रलेख समतोल असंत. आज कोणीही उठवळ तोंडाचा माणूस स्वत:स संपादक म्हणवतो, त्यामानाने तळवलकर भारदस्त होते. वैचारिकदृष्ट्या विरोधी कंपूतले असले तरी ते आदरणीय व्यक्तिमत्व होते. त्यांना आदरांजली. -गा.पै.

मारवा 23/03/2017 - 09:22
बिघडलेली होती तेव्हा जी अनेकरंगी पवित्रे व वळणे त्यांच्या निर्भीड लेखणीने घेतली ते फार रंजक होते. त्यातले ४ लेख जरी कूठे मिळाल्यास जरूर वाचा अर्थात नंतर माझी मनस्थीती खराब हती हे मान्य करण्याचा मोठेपणा ही होताच.

In reply to by मारवा

पुंबा 23/03/2017 - 11:10
मारवाजी, कुठे मिळू शकतील हे लेख? एकूणच गोविंदरावांचे त्यांच्या बहारीच्या काळातील(संपादक म्हणून) अग्रलेख एकत्रीत केलेले आहेत काय? असल्यास वाचायला आवडतील.

In reply to by मारवा

विकास 23/03/2017 - 19:18
तळवळकरांचे वैचारीक आणि कदाचीत व्यक्तीगतही मित्र असलेले पुल आणि दुर्गाबाई पण आणिबाणीविरोधात उतरल्या तरी ते असला जाहीर विरोध करू शकले नाहीत. तुम्ही म्हणता तसे त्यांनी ते नंतर जाहीर पणे मान्य देखील केले आणि म्हणूनच त्यांच्या अग्रलेखांच्या संकलनात त्या काळातले अग्रलेख प्रकाशीत केले गेले नाहीत. खालील उतारा हा म.टा. मधील आजच्या अग्रलेखातील (मृत्यूलेखातील) आहे: "इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये `आणीबाणी' लादली आणि त्यांच्या लेखणीचा प्राण जणू जेरबंद झाला. पण त्यांना संपादकपद सोडून सत्याग्रहही करवला नाही. तळवलकरांचे मोठेपण असे की, आणीबाणीनंतर त्यांनी वाचकांची बिनशर्त माफी मागितली आणि पुढच्या एकाही लेख किंवा अग्रलेखांच्या संग्रहात त्या काळातील लेखन समाविष्ट केले नाही. "

दीपा माने 23/03/2017 - 09:24
सत्तरच्या दशकात न्यूयाॅर्क महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमांचे वृत्त महाराष्ट्र टाईम्समध्ये लिहीत होते त्याचे किती कौतुक व्हायचे मटा कडून आणि महाराष्ट्र ते बडोद्या पर्यंतच्या आप्तांपर्यंत त्याची आठवण आली.

रामदास 23/03/2017 - 09:35
विनय हर्डीकर यांनी २०१६ मध्ये अंतर्नादच्या अंकात लिहिलेला गोविंदराव आय मिस यु हा लेख जरूर वाचावा. हा लेख माझ्याकडे पीडीएफ स्वरुपात आहे पण इथे तो कसा अपलोड करायचा ते कळत नाही.

In reply to by रामदास

विकास 23/03/2017 - 20:13
लेखाचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद! (अजून पूर्ण वाचून होयचा आहे, पण) खूपच माहितीपूर्ण लेख आहे. नुसताच तळवळकरांसंदर्भात नाही तर त्या काळाचे चित्रण बघण्याकरता पण.

सस्नेह 23/03/2017 - 11:29
तळवलकरांच्या स्मृतीस अभिवादन ! उत्तम लेख. पैसाताईचा प्रतिसादही समर्पक !

लहानपणी परवडत नव्हते म्हणून केवळ नवाकाळ वाचता यायचा. त्यातील निळुभाऊंचे अग्रलेख अगदी कामगारी भाषेत असायचे. त्यामुळे ते देखील डावेच वाटायचे. मात्र त्यानंतर जयश्री खाडीलकरांनी त्यातील रया घालवली. नंतर काही दात्यांच्या कृपेने सार्वजनिक मित्रमंडळांतील मोफत वाचनालयात लोकसत्ता, मटा दिसू लागले व वाचता देखील येऊ लागले. मुळातच कोणत्याही वर्तमानपत्राचा अग्रलेख वाचणे म्हणजे वर्तमानपत्रातील अत्युच्य उंचीचे सदर वाचणे हा संस्कार मनात रुजविण्याचे श्रेय निळुभाऊंनाच जाते. कॉलेजात कितीही शिकून मोठे झालो तरी बालवाडीतल्या बाईंना न विसरता येण्यासारखा काहीसा प्रकार माझ्या बाबतीत झालाय खरा. मात्र मटा आणि लोकसत्ता यांच्यातुन निवड करायची वेळ येत असे तेव्हा मी लोकसत्ताचीच निवड करत असे. सामना केवळ रविवारच्या पुरवणीसाठी बघीतला जायचा. त्यातील सदरे खरोखरीच सुंदर असायची. गोविंदरावांच्या नंतर मटाने स्वत:चे फार झपाट्याने पतन करुन घेतले असे वाटते. असो. आज सगळी वर्तमानपत्रे वाचण्याइतका वेळ आणि पैसा आहे पण वाचता यावे असे कंटेंट मिसींग आहे असे वाटते. कदाचित "भुतकालस्य कथा रम्या" असा प्रकार माझ्याबाबतीत असावा. असो. गोविंदराव तळवळकर यांना श्रद्धांजली !

गोविंदराव तळवलकरांना विनम्र अभिवादन आणि श्रध्दांजली. ज्यो, गोविंदरावांनी लोकांच्या आवडीला वळण लावण्याचे काम केले. त्या पिढीचे ते शेवटचे पत्रकार होते. गोविंदराव निवृत्त झाल्यानंतर आणि आर केंचा कॉमन मॅन मुखपृष्ठावरून हटल्यानंतर टाईम्सचा वेगळा चेहरा हरवला. अगदी सहमत आहे. स्वाती

गोविंदराव तळवलकरांना श्रध्दांजली. अभ्यासपूर्ण लेख व अग्रलेख ही त्यांची खासियत. आणीबाणीच्या काळतले लेख( व एकण्दरीतच मटातले लेख) मात्र कधी मानवले नाहीत. नेहरूवाद्,रॉयवाद वाचकांना समजावून सांगताना ते घराणेशाहीचे,काँग्रेसचे समर्थन करीत नाहीत ना असे वाटायचे. राजीव गांधी सत्तेवर आल्यावर तसे जास्तच वाटू लागले. विश्वनाथ प्रताप सिंगानी राजीव गांधींना बोफोर्सवरून अडचणीत आणले व म.टा.त विश्वनाथ प्रताप,जनता दलावर पराकोटीची टिका छापून येऊ लागली. दर पंधरवड्याला 'देशाला दिशा देण्याची ताकद कॉन्ग्रेस्मध्येच आहे..जनता दल म्हणजे कडबोळे आहे..' वगैरे. प्रत्येक व्यक्तीस राजकीय मत असते. संपादक त्यास अपवाद नसावा पण प्रचारी थाटातले,विचार्शैली वाचकांच्या गळी उतरवू पाहणारे लेख 'पडायला' लागले की चाणाक्ष वाचक ते ओळखतात. नंतर कुमार केतकर आले आणी त्यांनी तर कमालच केली! 'पत्र नव्हे स्मार्ट काँग्रेस मित्र' असे हे विनोदाने म्हणत. अर्थकारण, मोठाले ग्रंथ्,मोठे युरोपियन लेखक्,कवी..ह्यांच्या कार्याची ओळख मात्र गोविंदरावांनीच करून द्यावी.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विकास 26/03/2017 - 18:16
मला वाटते "काँग्रेस मित्र" म्हणणे हे त्या काळातील तळवळकरांसहीत अनेक विचारवंतांना लागू पडेल... शरद पवारांचा तळवळकरांवरील म.टा. मधे आलेला श्रध्दांजली-लेख वाचण्यासारखा आहे. त्यात जसे तळवळकर कळतात तसेच तो काळ देखील समजतो. आणिबाणिच्या काळात अग्रलेख वाचण्याच्या वयात मी नव्हतो. पण, जे काही नंतर वाचले त्यानुसार त्यांनी आणिबाणि उठल्यानंतर जनतेची माफी मागितली आणि त्यांच्या कुठल्याही लेखसंग्रहात अथवा अग्रलेखसंग्रहातील पुस्तकात त्या काळातले लेख समाविष्ट होऊन दिले नाहीत. राजीव गांधी सत्तेवर आल्यावर तसे जास्तच वाटू लागले. खरे आहे. तरी देखील मला वाटते त्या वेळेस त्यांनी शहाबानोच्या संदर्भात जे काही राजीव गांधींनी ३/४ बहुमताच्या जोरावर केले त्यावर टिका केली आणि आरीफ मोहम्मंद खान वर (परत, जर बरोबर आठवत असेल तर त्यांनीच) "आरीफ यांची पुन्हा एकदा तारीफ" म्हणून अग्रलेख लिहीला होता. राजीव-हत्येनंतरच्या लेखांमधे तुम्ही म्हणता तसे त्यांचे राजीव प्रेम दिसले होते. त्यावेळेस जे म्हणाल तर परदेशी असलेल्या मार्क टली ला भारताची, भारतीय जनतेची आणि लोकशाहीची खात्री वाटली होती ती खात्री स्वातंत्र्यपूर्व आणि त्या सुमारास जन्माला आलेल्या अनेकांना वाटली नव्हती. तळवळर त्याला अपवाद नव्हते. त्यांच्या लेखनात हताशपणा दिसत होता. एका लेखात त्यांनी त्यांच्या आणि राजीव गांधींच्या एका वैयक्तिक भेटीचा उल्लेख केला होता. तो पाहून आश्चर्य वाटले होते. तसेच त्या काळात एकूणच मराठी नेत्यांना देखील भाव मिळत नसताना एका वृत्तपत्रसंपादकाला ते ही आपल्या आवडत्या संपादकाला, काँग्रेसचा सर्वोच्च नेता बोलवतो हे वाचून कुठेतरी (बालबुद्धीला!) कौतुक वाटले होते. विश्वनाथ प्रताप,जनता दलावर पराकोटीची टिका छापून येऊ लागली. विषयांतर टाळून इतकेच म्हणेन की तो तळवळरांचा दोष नाही. त्याचे सर्व "श्रेय" व्हि.पी. सिंगांकडेच जाते हे आता इतिहासाने सिद्ध केले आहे! :) प्रत्येक व्यक्तीस राजकीय मत असते. संपादक त्यास अपवाद नसावा पण प्रचारी थाटातले,विचार्शैली वाचकांच्या गळी उतरवू पाहणारे लेख 'पडायला' लागले की चाणाक्ष वाचक ते ओळखतात. अगदी खरे आहे. तळवळकर हे काँग्रेसच्या नक्कीच जवळ होते. काही अंशी त्यांना आणि त्या काळातील इतर संपादकांना मला सूट द्याविशी वाटत आहे. अर्थात हे त्यांचे समर्थन नाही. पण काळ समजून प्रतिक्रीया तयार करण्याचा एक प्रयत्न आहे. त्या काळत, एकूणच माध्यमांची घडी वेगळी होती. कितीही झाले तरी मराठी माध्यम परंपरेत टिळक-आगरकर- (संंपादक म्हणून नाही पण विचारवंत म्हणून) रानडे - गोखले यांचा प्रचंड मोठा वारसा होता आणि त्यामुळे कदाचीत इतर भाषिक आणि विशेष करून इंग्रजी भाषिक वर्तमानपत्रांपेक्षा अधिक नैतिकता होती. गोविंदरावांच्याच काँग्रेस शताब्दीच्या लेखात म्हणल्याप्रमाणे, काँग्रेस ही एक स्वातंत्र्यपूर्व काळातील चळवळ होती. त्यात विविध विचारांना सुरवातीस अधिक नंतर ते कमी होत गेले, पण स्थान होते. ४७ नंतर गांधीजींच्या इच्छेचा मान न राखता, काँग्रेस विसर्जीत करण्याऐवजी पक्षाने काँग्रेस हेच नाव ठेवल्याने, आजच्या मार्केटींगच्या भाषेत, brand recongintion करणे सोपे गेले. इतर पक्ष तयार झाले नव्हते. स्वतः डावे विचारवंत असले तरी तळवळकर काही साम्यवादी नव्हते. त्यामुळे कम्युनिस्टांना एक राजकीय पक्ष म्हणून किती समर्थन करायचे यावर बंधन होतेच. आधी जनसंघ आणि नंतर भाजपा हे देखील फार मोठे पक्ष नव्हतेच, शिवाय त्यांचे राजकीय तत्वज्ञान हे डाव्या विचारवंतास मान्य होणे लांब राहीले मानवणे पण शक्य नव्हते. अशातच नेहरूंच्या प्रतिमेने कायम स्वरूपी घातलेल्या भुरळीतून ह्या रॉयिस्ट मुर्तीभंजकाला देखील बाहेर पडता आले नाही. हे त्यावेळच्या तमाम पिढीचे वास्तव आहे. यात नेहरू बरोबर का चूक अथवा त्यांच्या कार्याची आणि चुकांची शहानिशा करण्याचा प्रश्न नाही. तर एखाद्या व्यक्तीस देवत्व देऊन इतर पर्याय न मानण्याचे एकेश्वरी वर्तन करण्यातला प्रकार आहे. म्हणूनच "नेहरूंनंतर कोण?" हा मुद्दा त्यांच्या हयातीत देखील खूप चघळला गेला होता. तरी देखील एक महत्वाचा मुद्दा असा आहे की तळवळकरांनी त्यांच्या नंतरच्या काळात सुरू झालेल्या दिशाभुल (विरोधी विचारांना एकतर राक्षस ठरवणे अथवा निर्बुद्ध-अडाणी म्हणण्याच्या) लेखनाची सुरवात केली असे म्हणण्यास वाव नाही. एकमेकांबद्दल वैचारीक दृष्ट्या विरोध असला तरी आदर असण्याचा आणि मैत्री ठेवण्याचा तो काळ होता. वैचारीक अस्पृश्यता आणि जातियता ही नंतरच्या काळात वाढीस लागली आणि सामाजिक तेढ करण्यास कारणीभूत ठरली. तळवळकरांच्या लेखनाची आणि अग्रलेखाची आवड असलेला मध्यमवर्गीय मराठी समाज, तो ही विशेष करून मुंबईचा आणि मग विरळ होत इतर ठिकाणचा... पण त्यातील नक्की किती आंधळे काँग्रेस समर्थक झाले अथवा कितींनी काँग्रेस विरोधक असलेल्या कधी जनता पार्टी तर कधी शिवसेना आणि भाजपाला मते दिली हा संशोधनाचा विषय आहे. परीणामी कधी कधी त्यांचे लेखनातील (राजकीय) म्हणणे पटले नाही तरी मूळ लेखात म्हणल्या प्रमाणे, "त्यांच्या लेखनातून ब्रेनवॉशिंग करण्याऐवजी कुठेतरी विचार करायला शिकवले." इतकेच वाटत राहीले.

नंदन 27/03/2017 - 02:35
समयोचित, नेमका लेख आणि प्रतिसाद. (तळवलकरांचे अग्रलेख ते आजची 'मटा'री भाषा हे चित्र पुरेसं विदारक आणि परिस्थितिनिदर्शक असावं.)
आत्ताच कळले आणि नंतर वाचले की महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार-विचारवंत गोविंदराव तळवळकर यांचे ह्युस्टन येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ज्या एका व्यक्तीमुळे आजही जालावर मराठी वृत्तपत्र पहायला गेलो की आपोआप महाराष्ट्र टाईम्सचे पान उघडले जाते अशी एक विचारवंत व्यक्ती आज काळाच्या पडद्याआड गेली. महाराष्ट्राच्या आणि त्यातही खासकरून मुंबई-पुण्याच्या वृत्तपत्रीय जगताची स्वातंत्र्यपूर्व काळात टिळक-आगरकर, काळकर्ते परांजपे, न.चिं केळकर आदी अनेक दिग्गजांनी एक जडणघडण घातली. त्याच काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातही सुरवातीस आचार्य अत्रे, ह.रा. महाजनी आदींनी वैचारीक जडणघडण चालूच ठेवली.

कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे संपत्तीकडे

लीना कनाटा ·

कंजूस 14/02/2017 - 11:07
सरकारी,मुन्शिपालटीतली कंत्राटे मिळतात. कंपन्यांना ,दुकानदारांना ,विक्रेत्यांना वाढीव माप टाकण्याचे पानसुपारीचे हिशेब दाखवत नसतील.

आनन्दा 14/02/2017 - 11:19
जर राजकारणात इतका पैसा मिळत असेल तर राजकारण हा करियर साठी चांगला पर्याय नाही का? एकंदरीत सध्या राजकारण आणि चांगले मार्केटिंग केले तर बुवाबाजी / अध्यात्म / धार्मिक स्थळे हि सहज उत्पन्न (ईझी मनी) मिळवण्याचे उत्तम मार्ग आहेत असे दिसते.
असहमत. तुम्हाला त्यांचे कष्ट दिसत नाहीत असे दिसते. बाकी आशयाशी मात्र सहमत आहे.

In reply to by आनन्दा

लीना कनाटा 17/02/2017 - 06:04
आनन्दा दा, जर तुम्हाला या लोकांच्या कष्टाची कल्पना असेल तर कृपया इथे सांगा म्हणजे ज्या कोणास माहित नाही त्यांच्या ज्ञानात भर पडेल. मात्र या मंडळींच्या उत्पन्नाची पातळी आणि त्यात होणाऱ्या वाढीचा वेग बघता त्यांच्या एव्हढे कष्ट करायची सगळ्यांची तयारी असेल असे वाटते.

Sanjay Uwach 15/02/2017 - 23:02
"बुवाबाजी / अध्यात्म / धार्मिक स्थळे हि सहज उत्पन्न (ईझी मनी) मिळवण्याचे उत्तम मार्ग आहेत असे दिसते." आता यात देखिल खुप कॉपिडीशन (स्पर्धा) सुरु झाली आहे.

कंजूस 14/02/2017 - 11:07
सरकारी,मुन्शिपालटीतली कंत्राटे मिळतात. कंपन्यांना ,दुकानदारांना ,विक्रेत्यांना वाढीव माप टाकण्याचे पानसुपारीचे हिशेब दाखवत नसतील.

आनन्दा 14/02/2017 - 11:19
जर राजकारणात इतका पैसा मिळत असेल तर राजकारण हा करियर साठी चांगला पर्याय नाही का? एकंदरीत सध्या राजकारण आणि चांगले मार्केटिंग केले तर बुवाबाजी / अध्यात्म / धार्मिक स्थळे हि सहज उत्पन्न (ईझी मनी) मिळवण्याचे उत्तम मार्ग आहेत असे दिसते.
असहमत. तुम्हाला त्यांचे कष्ट दिसत नाहीत असे दिसते. बाकी आशयाशी मात्र सहमत आहे.

In reply to by आनन्दा

लीना कनाटा 17/02/2017 - 06:04
आनन्दा दा, जर तुम्हाला या लोकांच्या कष्टाची कल्पना असेल तर कृपया इथे सांगा म्हणजे ज्या कोणास माहित नाही त्यांच्या ज्ञानात भर पडेल. मात्र या मंडळींच्या उत्पन्नाची पातळी आणि त्यात होणाऱ्या वाढीचा वेग बघता त्यांच्या एव्हढे कष्ट करायची सगळ्यांची तयारी असेल असे वाटते.

Sanjay Uwach 15/02/2017 - 23:02
"बुवाबाजी / अध्यात्म / धार्मिक स्थळे हि सहज उत्पन्न (ईझी मनी) मिळवण्याचे उत्तम मार्ग आहेत असे दिसते." आता यात देखिल खुप कॉपिडीशन (स्पर्धा) सुरु झाली आहे.
सध्या निवडणुकांमुळे वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांचे उत्पन्नाचे आकडे वर्तमानपत्रांमध्ये वाचायला मिळत आहेत. त्यात देखील जे आधी पासूनच मान्यवर (?) आहेत त्यांच्या संपत्तीमध्ये गेल्या कार्यकाळात झालेली वाढ हि विशेषत्वाने नोंद घेण्यासारखी आहे. केवळ पाच वर्षातील हि प्रचंड वाढ बघता हि सगळी मंडळी कोटीच्या कोटी उड्डाणे घेऊन वेगाने संपत्तीकडे झेपावत आहेत असे दिसून येते. जेव्हा तुमच्या आमच्या सारखी सामान्य जन मंडळी (संक्षींच्या भाषेत ईएमआयग्रस्त) जेमतेम उत्पन्न मिळवत असताना या मान्यवर मंडळींची संपत्ती मात्र वाढता वाढता वाढे भेदिलें टॅक्स मंडळा अशी कित्येक पटीनी कशी काय वाढत आहे?

राजीव मल्होत्रा - हिंदूफोबिया

वडापाव ·

पहिल्यांदाच हे नाव ऐकत आहे. त्यांच्याशी थोडा परिचय करुन घेतो आणि नंतर प्रतिक्रिया देतो. अर्थातच पहिल्या परिच्छेदातील मतांशी मीही सहमत आहेच.

In reply to by गामा पैलवान

संदीप डांगे 07/02/2017 - 00:49
बिन्डोकपणाचा कळस आहे तो सुहेल सेठ... डिस्गस्टींग. करिम्स् आणि रेल्वे साठी परदेशी आक्रमणातून झालेले अत्याचार जस्टीफाय करतो...

अनरँडम 07/02/2017 - 22:03
भाषण पाहीले. काही मुद्दे विचार करण्यासारखे आहेत पण वस्तुस्थिती पडताळून पाहील्याशिवाय या व्यक्तिविषयी काही मत बनवणे कठीण आहे.
ते चर्चा-वादाचे शिष्टाचार पाळून संवाद साधतात, समोरच्याची संपूर्ण बाजू ऐकून घेतात, आणि मगच बोलतात
तसे काही वाटले नाही. एक अमेरिकन माणूस त्यांना थोडेसे पेचात टाकणारे प्रश्न विचारत होता (साहित्यचोरीचा आरोप, शेल्डन पोलॉक या नामवंत संशोधकावर त्यांनी केलेले आरोप यासंबंधी.) तेव्हा श्री मल्होत्रा चवताळल्यासारखे बोलू लागले. त्या इसमास तो अ‍ॅडजंक्ट प्रोफेसर आहे, फक्त टेन्युअर नसल्याने टेन्युअर मिळवण्याकरता आरोप करत आहे, तो 'बी ग्रेडचा' मनुष्य आहे अशी विधाने (खरी की खोटी देव जाणे) करतांना श्री मल्होत्रा 'सभ्य शब्दांत समोरच्याची चड्डी काढणारे' न वाटता आक्रस्ताळेपणे प्रश्न विचारणार्‍या व्यक्तिचा अपमान करणारे वाटले. सिम्पथेटिक ऑडियन्स असल्याने धकून गेले असावे.

In reply to by अनरँडम

मिहिर 08/02/2017 - 04:35
तसे काही वाटले नाही. एक अमेरिकन माणूस त्यांना थोडेसे पेचात टाकणारे प्रश्न विचारत होता (साहित्यचोरीचा आरोप, शेल्डन पोलॉक या नामवंत संशोधकावर त्यांनी केलेले आरोप यासंबंधी.) तेव्हा श्री मल्होत्रा चवताळल्यासारखे बोलू लागले. त्या इसमास तो अ‍ॅडजंक्ट प्रोफेसर आहे, फक्त टेन्युअर नसल्याने टेन्युअर मिळवण्याकरता आरोप करत आहे, तो 'बी ग्रेडचा' मनुष्य आहे अशी विधाने (खरी की खोटी देव जाणे) करतांना श्री मल्होत्रा 'सभ्य शब्दांत समोरच्याची चड्डी काढणारे' न वाटता आक्रस्ताळेपणे प्रश्न विचारणार्‍या व्यक्तिचा अपमान करणारे वाटले. सिम्पथेटिक ऑडियन्स असल्याने धकून गेले असावे.
सहमत आहे. व्हिडिओतल्या भाषणावेळी मी तिथे प्रत्यक्ष उपस्थित होतो. काही मुद्दे विचार करण्यासारखे वाटले, म्हणून राजीव मल्होत्रांचे इतर व्हिडिओ पाहिले आणि फेसबुक पानही काही काळासाठी फॉलो केले, तर प्रकरण तितकेही निरुपद्रवी नसल्याचे लक्षात आले. हिंदू धर्मावर टीका करणारे सरकसट हिंदूफोबिक, 'चार्वाक' किंवा पाश्चात्य ख्रिश्चन संस्कृतीने भारतीय हिंदू संस्कृती नष्ट करायचे जे षड्यंत्र रचले आहे त्याचे 'सेपॉय' ठरतात! चार्वाक हा शब्द शिवीसारखा वापरलेला मी पहिल्यांदाच पाहिला. मूळ चार्वाक जशी वेदांवर टीका करे, तसे हे आजचे चार्वाक (मल्होत्रांच्या उच्चारात चार्वक) मूळच्या चार्वाकाचे व्हर्जन क्र. २, पण पाश्चात्य लोकांचा पाठिंबा असलेले, त्यामुळे त्यांचा प्रतिकार केला पाहिजे वगैरे .. इतकेच न थांबता, कुंभमेळे अजून मोठे झाले पाहिजेत, गुरूबिरू लोकांना सिद्धी प्राप्त झालेल्या असतात व त्यांना खरोखरीचे चमत्कार करता येतात वगैरेही सुरू होते. उदाहरणादाखल हे पाहा: https://www.facebook.com/RajivMalhotra.Official/videos/660957954057545/

In reply to by मिहिर

वडापाव 08/02/2017 - 18:24
हो. या सर्व बाबतींत मी नक्कीच असहमत आहे त्यांच्याशी. पण, त्यांनी सुरु केलेला स्वदेशी इंडोलाॅजी परिषद हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. दुसरं असं, की शेल्डन पोलाॅकवर ते वैयक्तिक आरोप करत नाहीत. ते त्याच्या अभ्यासावर आणि अभ्यासामागच्या हेतुवर टीका करतात. वैयक्तिक ते त्याचं विद्वान माणूस म्हणून कौतुकच करतात. मी दिलेल्या व्हिडीओत तो मार्क्सिस्टवादी प्रोफेसर चढला म्हणून राजीव मल्होत्राही तापले. इतर व्हिडीओत त्यांच्या विरोधी मतांच्या माणसांसोबतचं त्यांचं एकूण वर्तन पाहिलं तर ते कमालीचं सभ्य आहे असं दिसून येईल. उलट विरोधी मताच्या माणसांना आपल्या घरी बोलवून ते त्याच्यासोबत चर्चा करतात. उदा. मार्क टली. दुसरं असं की जिथे जिथे पाश्चिमात्त्यांकडून atrocity literature च्या समर्थनार्थ काहीतरी "संशोधनात्मक उपक्रम" घेण्यात आलेले आहेत, तिथे तिथे ते हिरिरीने भारतीय बाजू चांगली दाखवायचा प्रयत्न करतात. त्यांचं सगळंच म्हणणं पटायला ते काही देव नाहीत - असते तर माझा त्यांच्यावर बिलकुल विश्वास बसला नसता. पण या माणसाचं भारतीयांच्या identity crisis आणि complex बाबतचं म्हणणं जास्तीत जास्त लोकांसमोर यायला हवं आणि चर्चेचा विषय व्हावं असं वाटतं.

In reply to by वडापाव

अनरँडम 08/02/2017 - 19:25
मार्क्सिस्टवादी प्रोफेसर चढला
'चढला'! (तुम्ही तरी शब्द जरा जपून वापरू शकता) असे काही वाटले नाही. मिहिर यांनी प्रत्यक्षच्क्ष्ह तो प्रकार पाहीला असल्याने आणखी काही स्पष्टीकरणाची आवश्यकता नसावी.
पण या माणसाचं भारतीयांच्या identity crisis आणि complex बाबतचं म्हणणं जास्तीत जास्त लोकांसमोर यायला हवं
शेल्डन पोलॉक हे फिलॉलॉजिस्ट आहेत. गेली कित्तेक वर्षं ते भारतातल्या धनाढ्य राजघराण्यांकडून काही महत्त्वाचे ऐतिहासिक ग्रंथ मिळवण्यासाठी धडपड करत आहे. त्यासाठी श्री मलहोत्रांसारखे लोक त्यांना मदत करत असल्याचे ऐकिवात नाही. तेही असो. पण 'भारतीयांचा identity crisis आणि complex' (हे विषय मला वाटतं अनिवासी भारतीयांच्या दुसर्‍या पिढीतल्या लोकांसाठी attractive product आहे) या विषयावर ते तोंडी लावल्यासारखे पूसट काहीतरी बोलतात. जरा स्पष्ट करून तुम्हीतरी सांगा त्यांचं काय मत आहे या विषयावर.

In reply to by वडापाव

अनरँडम 08/02/2017 - 19:27
बाय द वे तो प्रोफेश्वर 'मार्क्सिस्ट' (मार्क्सिस्ट किंवा मार्क्सवादी पण 'मार्क्सिस्टवादी' नाही) हे तुम्हाला कसे कळले?

पहिल्यांदाच हे नाव ऐकत आहे. त्यांच्याशी थोडा परिचय करुन घेतो आणि नंतर प्रतिक्रिया देतो. अर्थातच पहिल्या परिच्छेदातील मतांशी मीही सहमत आहेच.

In reply to by गामा पैलवान

संदीप डांगे 07/02/2017 - 00:49
बिन्डोकपणाचा कळस आहे तो सुहेल सेठ... डिस्गस्टींग. करिम्स् आणि रेल्वे साठी परदेशी आक्रमणातून झालेले अत्याचार जस्टीफाय करतो...

अनरँडम 07/02/2017 - 22:03
भाषण पाहीले. काही मुद्दे विचार करण्यासारखे आहेत पण वस्तुस्थिती पडताळून पाहील्याशिवाय या व्यक्तिविषयी काही मत बनवणे कठीण आहे.
ते चर्चा-वादाचे शिष्टाचार पाळून संवाद साधतात, समोरच्याची संपूर्ण बाजू ऐकून घेतात, आणि मगच बोलतात
तसे काही वाटले नाही. एक अमेरिकन माणूस त्यांना थोडेसे पेचात टाकणारे प्रश्न विचारत होता (साहित्यचोरीचा आरोप, शेल्डन पोलॉक या नामवंत संशोधकावर त्यांनी केलेले आरोप यासंबंधी.) तेव्हा श्री मल्होत्रा चवताळल्यासारखे बोलू लागले. त्या इसमास तो अ‍ॅडजंक्ट प्रोफेसर आहे, फक्त टेन्युअर नसल्याने टेन्युअर मिळवण्याकरता आरोप करत आहे, तो 'बी ग्रेडचा' मनुष्य आहे अशी विधाने (खरी की खोटी देव जाणे) करतांना श्री मल्होत्रा 'सभ्य शब्दांत समोरच्याची चड्डी काढणारे' न वाटता आक्रस्ताळेपणे प्रश्न विचारणार्‍या व्यक्तिचा अपमान करणारे वाटले. सिम्पथेटिक ऑडियन्स असल्याने धकून गेले असावे.

In reply to by अनरँडम

मिहिर 08/02/2017 - 04:35
तसे काही वाटले नाही. एक अमेरिकन माणूस त्यांना थोडेसे पेचात टाकणारे प्रश्न विचारत होता (साहित्यचोरीचा आरोप, शेल्डन पोलॉक या नामवंत संशोधकावर त्यांनी केलेले आरोप यासंबंधी.) तेव्हा श्री मल्होत्रा चवताळल्यासारखे बोलू लागले. त्या इसमास तो अ‍ॅडजंक्ट प्रोफेसर आहे, फक्त टेन्युअर नसल्याने टेन्युअर मिळवण्याकरता आरोप करत आहे, तो 'बी ग्रेडचा' मनुष्य आहे अशी विधाने (खरी की खोटी देव जाणे) करतांना श्री मल्होत्रा 'सभ्य शब्दांत समोरच्याची चड्डी काढणारे' न वाटता आक्रस्ताळेपणे प्रश्न विचारणार्‍या व्यक्तिचा अपमान करणारे वाटले. सिम्पथेटिक ऑडियन्स असल्याने धकून गेले असावे.
सहमत आहे. व्हिडिओतल्या भाषणावेळी मी तिथे प्रत्यक्ष उपस्थित होतो. काही मुद्दे विचार करण्यासारखे वाटले, म्हणून राजीव मल्होत्रांचे इतर व्हिडिओ पाहिले आणि फेसबुक पानही काही काळासाठी फॉलो केले, तर प्रकरण तितकेही निरुपद्रवी नसल्याचे लक्षात आले. हिंदू धर्मावर टीका करणारे सरकसट हिंदूफोबिक, 'चार्वाक' किंवा पाश्चात्य ख्रिश्चन संस्कृतीने भारतीय हिंदू संस्कृती नष्ट करायचे जे षड्यंत्र रचले आहे त्याचे 'सेपॉय' ठरतात! चार्वाक हा शब्द शिवीसारखा वापरलेला मी पहिल्यांदाच पाहिला. मूळ चार्वाक जशी वेदांवर टीका करे, तसे हे आजचे चार्वाक (मल्होत्रांच्या उच्चारात चार्वक) मूळच्या चार्वाकाचे व्हर्जन क्र. २, पण पाश्चात्य लोकांचा पाठिंबा असलेले, त्यामुळे त्यांचा प्रतिकार केला पाहिजे वगैरे .. इतकेच न थांबता, कुंभमेळे अजून मोठे झाले पाहिजेत, गुरूबिरू लोकांना सिद्धी प्राप्त झालेल्या असतात व त्यांना खरोखरीचे चमत्कार करता येतात वगैरेही सुरू होते. उदाहरणादाखल हे पाहा: https://www.facebook.com/RajivMalhotra.Official/videos/660957954057545/

In reply to by मिहिर

वडापाव 08/02/2017 - 18:24
हो. या सर्व बाबतींत मी नक्कीच असहमत आहे त्यांच्याशी. पण, त्यांनी सुरु केलेला स्वदेशी इंडोलाॅजी परिषद हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. दुसरं असं, की शेल्डन पोलाॅकवर ते वैयक्तिक आरोप करत नाहीत. ते त्याच्या अभ्यासावर आणि अभ्यासामागच्या हेतुवर टीका करतात. वैयक्तिक ते त्याचं विद्वान माणूस म्हणून कौतुकच करतात. मी दिलेल्या व्हिडीओत तो मार्क्सिस्टवादी प्रोफेसर चढला म्हणून राजीव मल्होत्राही तापले. इतर व्हिडीओत त्यांच्या विरोधी मतांच्या माणसांसोबतचं त्यांचं एकूण वर्तन पाहिलं तर ते कमालीचं सभ्य आहे असं दिसून येईल. उलट विरोधी मताच्या माणसांना आपल्या घरी बोलवून ते त्याच्यासोबत चर्चा करतात. उदा. मार्क टली. दुसरं असं की जिथे जिथे पाश्चिमात्त्यांकडून atrocity literature च्या समर्थनार्थ काहीतरी "संशोधनात्मक उपक्रम" घेण्यात आलेले आहेत, तिथे तिथे ते हिरिरीने भारतीय बाजू चांगली दाखवायचा प्रयत्न करतात. त्यांचं सगळंच म्हणणं पटायला ते काही देव नाहीत - असते तर माझा त्यांच्यावर बिलकुल विश्वास बसला नसता. पण या माणसाचं भारतीयांच्या identity crisis आणि complex बाबतचं म्हणणं जास्तीत जास्त लोकांसमोर यायला हवं आणि चर्चेचा विषय व्हावं असं वाटतं.

In reply to by वडापाव

अनरँडम 08/02/2017 - 19:25
मार्क्सिस्टवादी प्रोफेसर चढला
'चढला'! (तुम्ही तरी शब्द जरा जपून वापरू शकता) असे काही वाटले नाही. मिहिर यांनी प्रत्यक्षच्क्ष्ह तो प्रकार पाहीला असल्याने आणखी काही स्पष्टीकरणाची आवश्यकता नसावी.
पण या माणसाचं भारतीयांच्या identity crisis आणि complex बाबतचं म्हणणं जास्तीत जास्त लोकांसमोर यायला हवं
शेल्डन पोलॉक हे फिलॉलॉजिस्ट आहेत. गेली कित्तेक वर्षं ते भारतातल्या धनाढ्य राजघराण्यांकडून काही महत्त्वाचे ऐतिहासिक ग्रंथ मिळवण्यासाठी धडपड करत आहे. त्यासाठी श्री मलहोत्रांसारखे लोक त्यांना मदत करत असल्याचे ऐकिवात नाही. तेही असो. पण 'भारतीयांचा identity crisis आणि complex' (हे विषय मला वाटतं अनिवासी भारतीयांच्या दुसर्‍या पिढीतल्या लोकांसाठी attractive product आहे) या विषयावर ते तोंडी लावल्यासारखे पूसट काहीतरी बोलतात. जरा स्पष्ट करून तुम्हीतरी सांगा त्यांचं काय मत आहे या विषयावर.

In reply to by वडापाव

अनरँडम 08/02/2017 - 19:27
बाय द वे तो प्रोफेश्वर 'मार्क्सिस्ट' (मार्क्सिस्ट किंवा मार्क्सवादी पण 'मार्क्सिस्टवादी' नाही) हे तुम्हाला कसे कळले?
मी निरीश्वरवादी माणूस आहे. माझा देवावर विश्वास नाही. देवावर विश्वास नसण्याचं कारण काही सिनेमांत दाखवलं जातं तसं (अष्टविनायक, देऊळ बंद) देवावरच्या रागापोटी नाही, तर देव असल्याचा, मला स्वत:ला पटेल असा शास्त्रसिद्ध पुरावा उपलब्ध नाही म्हणून. देवाचं अस्तित्व असू शकतं, या थिअरीला (सिंद्धांताला) मान द्यायला माझी ना नाही. उद्या मानवजातीला काही पुरावा गवसलाच, तर मी आनंदाने (म्हणजे नाईलाजानेच, पण पद्धत आहे बोलण्याची) माझी मतं बदलेन. पण निरीश्वरवाद्यांमध्ये सुद्धा एकवाच्यता नसते, हे मला जाणवायला काही काळ गेला. आज परिस्थिती अशी उद्भवली आहे, की बहुतेक निरीश्वरवादी माझ्या डोक्यात जाऊ लागले आहेत.

पुणे-मुंबई-पुणे - एक पुनर्नवानुभव

तिमा ·

सिरुसेरि 02/02/2017 - 15:10
लेखात लिहिलेल्या त्रासांबरोबरच अनेकदा रेल्वे प्रवासात भिकारी विनातिकिट रेल्वे डब्यात चढतात आणी प्रवाशांना अरेरावी करतात हे बघितले आहे .

पुणे रेल्वे स्टेशन, एक अतिशय होपलेस जागा. सोहराब हॉल कडील बाजूस तर (प्लॅटफॉर्म क्रमांक ७ का १०) उभं राहवत नसे. पेस्तन काका बावाजी म्हणत तसे त्याच प्लॅटफॉर्मवर बद्धा गाडी सुपडा साफ करते का काय अशी शंका येत असे. अगदी प्लॅटफॉर्मवर सुद्धा गुलाबाची फुले (सांकेतिक शब्द) विखुरलेली पाहिली आहेत. रेल्वेचा फलाट अन तो पाहून हागाय लागणारी इरसाल कार्टी ह्यावर कोणी रिसर्च करावा नोबेल मिळेल. पुणे स्टेशनची लायकी आता सर्वबाजूने वाढलेल्या पुण्याची सोय लावण्याइतपत उरलेली नाही. पुरंदारात ग्रीनफिल्ड का कुठलं एअरपोर्ट बांधण्यापेक्षा जर स्टेशनच नवे कुठंतरी तयार करता आले तर उत्तम सोय होईल सगळ्यांची.

अनुप ढेरे 02/02/2017 - 16:13
हा हा! खिडक्यांनी केलेला शाइस्तेखान हे आवडलं. आता पहिल्या फलाटावर तरी वायफाय मिळतं. सो फुकट ईन्टरनेट वापरण्याचा आनंद मिळतो बोनस म्हणून.

कंजूस 02/02/2017 - 17:45
ललित म्हणून उत्तम आहे. परंतू आम्ही यावर उत्तम उपाय काढले आहेत. १) आंध्र राज्याच्या बस:- ( AP NO वाल्या ) कुर्ला पनवेल - एक्सप्रेस वेने थेट पुणे स्टेशनला थांबतात. वाटेत शिवाजीनगरला उतरण्याचा पर्याय आहेच कारण वाकडफाडा- औंध- युनिवरसटी शिवाजीनगर मार्गे जातात. उत्म सेवा आणि बस स्वच्छ. तिकीट पन्नास रु कमी आपल्या एवेने जाणाय्रा बसपेक्षा. २) कन्याकुमारी जयंतिजंता (16381) exp चे स्लिपरचे तिकिट काढणे. पुणे स्टे ७.४० ला पोहोचते. रेल्वेच्या डब्या कोणीही त्रास द्यायला येत नाही. मस्त पुस्तक वाचत लोळावे. पुण्याला उतरल्यावर चहा वडा घेऊनच नंतर पुढे जावे ( याला accliamatisation मी म्हणतो, मनस्ताप वाचतो.) पिएमटिने. यावेळी रिकाम्या असतात. करून पाहा. पुणेकरही चांगले स्वागत करतील घाईने न आल्याबद्दल.

In reply to by तिमा

सुबोध खरे 02/02/2017 - 18:32
प्रत्येक लांब पल्ल्याच्या गाडीला पुणेहुन आरक्षण मिळणारा डबा असतो उदा महालक्ष्मी एक्स्प्रेस चा s ५, उद्यान एक्स्प्रेस ला S ७ इ. स्लिपरचे तिकीट काढायचे९ वेटिंग लिस्ट असली असली तरीही. आणि शांत पणे या डब्यातून प्रवास करायचा. आपल्या बापाची गाडी असल्यासारखे असते. रेल्वेचेच लोक त्यात असतात. निवृत्त होण्याअगोदर पुणे येथे असताना असा सुखात प्रवास भरपूर केला आहे. अन्यथा आरक्षण करताना खिडकीचे आरक्षण आवर्जून करत असे. ( तसे लिहून दिल्यास मिळते). बाकी व्हॉल्वो पेक्षा रेल्वेचा वातानुकूलित कुर्सीयानाचे तिकीट स्वस्त असून बकेट सीट असल्याने दुसऱ्याला स्पर्श होत नाही. शिवाय धूळ घाण आणि आवाज यापासून रक्षण होते हा फायदा. शिवाय रेल्वे ट्रॅफिक जॅम मध्ये अडकत नाही किंवा पुणे दर्शन करत पुण्याच्या बाहेर पडण्यास वेळ खात नाही.

Nitin Palkar 02/02/2017 - 19:49
सुंदर लेखन! 'बायकांच्या पोटिमा पोलक्यासारखी, वरवर जातच रहाते. (पोटिमा शब्द विआ बुवा नामक लेखकांनी शोधला असून त्याचा पूर्ण उच्चार, 'पोटावर टिचकी मारा", असा आवाजच्या दिवाळी अंकात वाचल्याचे स्मरते.)' पोटिमाची व्युत्पत्ती अचूक. त्याच बरोबर वि आ बुवांनी दंटिमा व बेंटिमा हे ही पोलक्याचे दोन प्रकार वर्णन केले होते.

In reply to by कंजूस

सुबोध खरे 03/02/2017 - 20:42
साडेचारला कल्याणला आहे आणि सव्वासातला पुण्याला पोहचते. काय वाईट आहे? त्यापेक्षा हैद्राबाद एक्स्प्रेस दुपारी १२.३० ला सीएस टी ला आहे आणि (१३.३०) दीड वाजता कल्याणला आहे आणि साडेचारला पुण्याला पोहोचते. जेवून खाऊन स्लीपर मध्ये ताणून द्यायची चहाच्या वेळेस पुण्यात.

In reply to by सुबोध खरे

कंजूस 03/02/2017 - 21:46
ती गाडी पुण्यासाठी रटाळ नाही,रेनिगुंठा तिरुपति रेनिगुंठा सालेम कोइमतुर त्रिशुर कन्याकुमारि जाते त्यामुळे त्याचे तिकीट मिळते.

सिरुसेरि 02/02/2017 - 15:10
लेखात लिहिलेल्या त्रासांबरोबरच अनेकदा रेल्वे प्रवासात भिकारी विनातिकिट रेल्वे डब्यात चढतात आणी प्रवाशांना अरेरावी करतात हे बघितले आहे .

पुणे रेल्वे स्टेशन, एक अतिशय होपलेस जागा. सोहराब हॉल कडील बाजूस तर (प्लॅटफॉर्म क्रमांक ७ का १०) उभं राहवत नसे. पेस्तन काका बावाजी म्हणत तसे त्याच प्लॅटफॉर्मवर बद्धा गाडी सुपडा साफ करते का काय अशी शंका येत असे. अगदी प्लॅटफॉर्मवर सुद्धा गुलाबाची फुले (सांकेतिक शब्द) विखुरलेली पाहिली आहेत. रेल्वेचा फलाट अन तो पाहून हागाय लागणारी इरसाल कार्टी ह्यावर कोणी रिसर्च करावा नोबेल मिळेल. पुणे स्टेशनची लायकी आता सर्वबाजूने वाढलेल्या पुण्याची सोय लावण्याइतपत उरलेली नाही. पुरंदारात ग्रीनफिल्ड का कुठलं एअरपोर्ट बांधण्यापेक्षा जर स्टेशनच नवे कुठंतरी तयार करता आले तर उत्तम सोय होईल सगळ्यांची.

अनुप ढेरे 02/02/2017 - 16:13
हा हा! खिडक्यांनी केलेला शाइस्तेखान हे आवडलं. आता पहिल्या फलाटावर तरी वायफाय मिळतं. सो फुकट ईन्टरनेट वापरण्याचा आनंद मिळतो बोनस म्हणून.

कंजूस 02/02/2017 - 17:45
ललित म्हणून उत्तम आहे. परंतू आम्ही यावर उत्तम उपाय काढले आहेत. १) आंध्र राज्याच्या बस:- ( AP NO वाल्या ) कुर्ला पनवेल - एक्सप्रेस वेने थेट पुणे स्टेशनला थांबतात. वाटेत शिवाजीनगरला उतरण्याचा पर्याय आहेच कारण वाकडफाडा- औंध- युनिवरसटी शिवाजीनगर मार्गे जातात. उत्म सेवा आणि बस स्वच्छ. तिकीट पन्नास रु कमी आपल्या एवेने जाणाय्रा बसपेक्षा. २) कन्याकुमारी जयंतिजंता (16381) exp चे स्लिपरचे तिकिट काढणे. पुणे स्टे ७.४० ला पोहोचते. रेल्वेच्या डब्या कोणीही त्रास द्यायला येत नाही. मस्त पुस्तक वाचत लोळावे. पुण्याला उतरल्यावर चहा वडा घेऊनच नंतर पुढे जावे ( याला accliamatisation मी म्हणतो, मनस्ताप वाचतो.) पिएमटिने. यावेळी रिकाम्या असतात. करून पाहा. पुणेकरही चांगले स्वागत करतील घाईने न आल्याबद्दल.

In reply to by तिमा

सुबोध खरे 02/02/2017 - 18:32
प्रत्येक लांब पल्ल्याच्या गाडीला पुणेहुन आरक्षण मिळणारा डबा असतो उदा महालक्ष्मी एक्स्प्रेस चा s ५, उद्यान एक्स्प्रेस ला S ७ इ. स्लिपरचे तिकीट काढायचे९ वेटिंग लिस्ट असली असली तरीही. आणि शांत पणे या डब्यातून प्रवास करायचा. आपल्या बापाची गाडी असल्यासारखे असते. रेल्वेचेच लोक त्यात असतात. निवृत्त होण्याअगोदर पुणे येथे असताना असा सुखात प्रवास भरपूर केला आहे. अन्यथा आरक्षण करताना खिडकीचे आरक्षण आवर्जून करत असे. ( तसे लिहून दिल्यास मिळते). बाकी व्हॉल्वो पेक्षा रेल्वेचा वातानुकूलित कुर्सीयानाचे तिकीट स्वस्त असून बकेट सीट असल्याने दुसऱ्याला स्पर्श होत नाही. शिवाय धूळ घाण आणि आवाज यापासून रक्षण होते हा फायदा. शिवाय रेल्वे ट्रॅफिक जॅम मध्ये अडकत नाही किंवा पुणे दर्शन करत पुण्याच्या बाहेर पडण्यास वेळ खात नाही.

Nitin Palkar 02/02/2017 - 19:49
सुंदर लेखन! 'बायकांच्या पोटिमा पोलक्यासारखी, वरवर जातच रहाते. (पोटिमा शब्द विआ बुवा नामक लेखकांनी शोधला असून त्याचा पूर्ण उच्चार, 'पोटावर टिचकी मारा", असा आवाजच्या दिवाळी अंकात वाचल्याचे स्मरते.)' पोटिमाची व्युत्पत्ती अचूक. त्याच बरोबर वि आ बुवांनी दंटिमा व बेंटिमा हे ही पोलक्याचे दोन प्रकार वर्णन केले होते.

In reply to by कंजूस

सुबोध खरे 03/02/2017 - 20:42
साडेचारला कल्याणला आहे आणि सव्वासातला पुण्याला पोहचते. काय वाईट आहे? त्यापेक्षा हैद्राबाद एक्स्प्रेस दुपारी १२.३० ला सीएस टी ला आहे आणि (१३.३०) दीड वाजता कल्याणला आहे आणि साडेचारला पुण्याला पोहोचते. जेवून खाऊन स्लीपर मध्ये ताणून द्यायची चहाच्या वेळेस पुण्यात.

In reply to by सुबोध खरे

कंजूस 03/02/2017 - 21:46
ती गाडी पुण्यासाठी रटाळ नाही,रेनिगुंठा तिरुपति रेनिगुंठा सालेम कोइमतुर त्रिशुर कन्याकुमारि जाते त्यामुळे त्याचे तिकीट मिळते.
फारा वर्षांपूर्वी आम्ही मुंबई पुणे रेल्वे प्रवास सातत्याने करायचो. ३ तासांच्या डेक्कन क्वीन प्रवासासाठी, दोन तास रिझर्व्हेशनच्या रांगेत उभे रहाण्याचाही आम्ही विक्रम नोंदवला आहे. त्या रिझर्व्हेशन केलेल्या डब्यांत तीन्-दोन अशी बसण्याची व्यवस्था असल्याने , आम्ही सेकंड क्लासमधेही , अगदी मांडी घालून प्रवास केलेला आहे. पुढे, रेल्वेला भिकेचे डोहाळे लागल्याने, त्यांनी आमचा विश्वासघात करुन तीन्-तीन अशी बसण्याची व्यवस्था आणली. त्याचा आम्ही भरपूर निषेध केला. कारण तोपर्यंत आमची बुडे भरपूर रुंदावल्यामुळे, आमची, अंगाला अंग लागू न देण्याची ब्रिटिश सभ्यता धोक्यांत आली.

दंगल: असा का पिक्चर रायते भाऊ?

मित्रहो ·

पैसा 30/01/2017 - 08:57
देवा रे देवा! लोळतेय हसून! =)) =)) असं कुठे ल्हिहिणं रायते काय! =)) नुस्ती दंगल!

खेडूत 30/01/2017 - 12:43
:)) जर का तुमाला पिच्चर बघणेच अशेल, तर ते खानावळीचे काहून पाऊन र्‍हायले- तुमाले सांगतो ते अक्षय कुमारचहे पा ना!

पिशी अबोली 30/01/2017 - 13:36
लय भारी. काल जीव वर आल्यासारखा रईस बघितला. त्यात हे सगळं अस्सं एकदम प्रॉपर मसालावालं. ते आठवून जाम हसू आलं. कायपण म्हणा, शारुख अगदी या शास्त्रांत बसणारा शास्त्रशुद्ध पिच्चर बनवणं सोडत नाही.

सही रे सई 30/01/2017 - 19:53
हा लेख वाचत असताना मनात आल कि कोणीतरी याच वाचन करून मागे दंगल्चे फोटो चिटकवून एखादा व्हिडिओ टाकला पाहिजे आपल्या यु ट्यूब चानेल वर. खास नागपुरी अंदाजात. मज्जा येईल. लेख मस्तच झाला आहे हे.वे.सां.न.ल.

In reply to by सही रे सई

मित्रहो 30/01/2017 - 21:51
प्रतिसादाबद्दल धन्यवाद मिपावरील संदीप डांगे यांनी याचे आजच सुंदर वाचन केलेय. त्यांनी ते वाचन करुन Sound CLoud वर टाकलेय. मी माझ्या पद्धतीने वाचन करुन रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करतो. थोडा वेळ लागेल.

In reply to by मित्रहो

स्रुजा 30/01/2017 - 23:35
आपलं घरचं चॅनल असताना कशाला साऊंड क्लाऊड? तुम्ही घ्याच मनावर आपण यु ट्यूब वर. व्हायरल करुयात ;) लेख फार च भारीये बाकी !

In reply to by मित्रहो

संदीप डांगे 30/01/2017 - 23:37
धन्यवाद! बोलीभाषेची मजा लहजात व लयीत आहे. उस्फूर्त वाचन करुन टाकले. फार प्रोफेशनल झाले नाही. परत नीट रेकॉर्डिंग करण्याचा योग लवकर येईल असे वाटत नाही, तेव्हा हेच गोड मानून घ्या... :-) https://soundcloud.com/sandeep-daange/ogg-7

In reply to by संदीप डांगे

ओ काय?!!! युट्युबवर का नाही टाकत तुम्ही???? इतका खत्रा लेख आहे. तुम्ही इतका खत्रा वाचलाय. युट्युबवर हवंच आहे हे.

In reply to by पिलीयन रायडर

संदीप डांगे 31/01/2017 - 00:03
टाकतो मातारानी... टाकतो. :-) जरा दुसरं नीट रेकॉर्ड करुन विडियो तयार करुन टाकतो. हे असंच आपलं करुन बघितलं. ;-)

In reply to by संदीप डांगे

सही रे सई 31/01/2017 - 21:05
धन्यवाद संदीप भाऊ. वाचन करायचं सुचवल्यावर वाटल नाही कि इतक्या चटकन कोणी करेल हे. म्या पामराची इनंती लगीच मनावर घेतल्याबद्दल दंडवत.

एमी 17/02/2017 - 10:46
हा हा कसलं भारी लिहलंय! गंभीरपणे लिहले असेल तर जास्तच आवड्ल. मला त्या हवेत गाड्या उडणार्या फायटा आणि भुरभूर केस उडणार्या हिरवीण खरोखरच फार आवडतात. पैसे देऊन ऐंटरटेनमेंट विकत घ्यायलाचतर आपण शिन्मा बघतो :-P

ते कोण्या पोराले खरचटल बी दिसल ना तर हे हातची बोरींग हापसाची सोडून त्याले जाउन इचारते “का र कोण मारल?”
निर्रा दांगळो केला राजा जानराव तुम्हि, तुमच लेखन तर एकद्म बम्म बावडा खुस्स बावडा हाये. जम्या मस्त जम्या.

पैसा 30/01/2017 - 08:57
देवा रे देवा! लोळतेय हसून! =)) =)) असं कुठे ल्हिहिणं रायते काय! =)) नुस्ती दंगल!

खेडूत 30/01/2017 - 12:43
:)) जर का तुमाला पिच्चर बघणेच अशेल, तर ते खानावळीचे काहून पाऊन र्‍हायले- तुमाले सांगतो ते अक्षय कुमारचहे पा ना!

पिशी अबोली 30/01/2017 - 13:36
लय भारी. काल जीव वर आल्यासारखा रईस बघितला. त्यात हे सगळं अस्सं एकदम प्रॉपर मसालावालं. ते आठवून जाम हसू आलं. कायपण म्हणा, शारुख अगदी या शास्त्रांत बसणारा शास्त्रशुद्ध पिच्चर बनवणं सोडत नाही.

सही रे सई 30/01/2017 - 19:53
हा लेख वाचत असताना मनात आल कि कोणीतरी याच वाचन करून मागे दंगल्चे फोटो चिटकवून एखादा व्हिडिओ टाकला पाहिजे आपल्या यु ट्यूब चानेल वर. खास नागपुरी अंदाजात. मज्जा येईल. लेख मस्तच झाला आहे हे.वे.सां.न.ल.

In reply to by सही रे सई

मित्रहो 30/01/2017 - 21:51
प्रतिसादाबद्दल धन्यवाद मिपावरील संदीप डांगे यांनी याचे आजच सुंदर वाचन केलेय. त्यांनी ते वाचन करुन Sound CLoud वर टाकलेय. मी माझ्या पद्धतीने वाचन करुन रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करतो. थोडा वेळ लागेल.

In reply to by मित्रहो

स्रुजा 30/01/2017 - 23:35
आपलं घरचं चॅनल असताना कशाला साऊंड क्लाऊड? तुम्ही घ्याच मनावर आपण यु ट्यूब वर. व्हायरल करुयात ;) लेख फार च भारीये बाकी !

In reply to by मित्रहो

संदीप डांगे 30/01/2017 - 23:37
धन्यवाद! बोलीभाषेची मजा लहजात व लयीत आहे. उस्फूर्त वाचन करुन टाकले. फार प्रोफेशनल झाले नाही. परत नीट रेकॉर्डिंग करण्याचा योग लवकर येईल असे वाटत नाही, तेव्हा हेच गोड मानून घ्या... :-) https://soundcloud.com/sandeep-daange/ogg-7

In reply to by संदीप डांगे

ओ काय?!!! युट्युबवर का नाही टाकत तुम्ही???? इतका खत्रा लेख आहे. तुम्ही इतका खत्रा वाचलाय. युट्युबवर हवंच आहे हे.

In reply to by पिलीयन रायडर

संदीप डांगे 31/01/2017 - 00:03
टाकतो मातारानी... टाकतो. :-) जरा दुसरं नीट रेकॉर्ड करुन विडियो तयार करुन टाकतो. हे असंच आपलं करुन बघितलं. ;-)

In reply to by संदीप डांगे

सही रे सई 31/01/2017 - 21:05
धन्यवाद संदीप भाऊ. वाचन करायचं सुचवल्यावर वाटल नाही कि इतक्या चटकन कोणी करेल हे. म्या पामराची इनंती लगीच मनावर घेतल्याबद्दल दंडवत.

एमी 17/02/2017 - 10:46
हा हा कसलं भारी लिहलंय! गंभीरपणे लिहले असेल तर जास्तच आवड्ल. मला त्या हवेत गाड्या उडणार्या फायटा आणि भुरभूर केस उडणार्या हिरवीण खरोखरच फार आवडतात. पैसे देऊन ऐंटरटेनमेंट विकत घ्यायलाचतर आपण शिन्मा बघतो :-P

ते कोण्या पोराले खरचटल बी दिसल ना तर हे हातची बोरींग हापसाची सोडून त्याले जाउन इचारते “का र कोण मारल?”
निर्रा दांगळो केला राजा जानराव तुम्हि, तुमच लेखन तर एकद्म बम्म बावडा खुस्स बावडा हाये. जम्या मस्त जम्या.
लय आयकून होतो दंगल दंगल. टिवी लावा के तेच चालू रायते हानिकारक बापू नाहीतर धाकड. जो तो सांगत होता लइ मस्त पिक्चर हाय. तवा म्हटल आपण बी दंगल पाहाले जाच. कापसाचा चुकारा उचलला आन बंद्या फॅमिलेले पिक्चर पाहाले घेउन गेलो, ते बी साध्यासुध्या टॉकीजमधे नाही तर नागपुरातल्या मॉलमंधी. असा पचतावा झाला ना. तुमाले सांगतो राजेहो लइ म्हणजे लइच भंगार पिक्चर हाय. असा का पिक्चर रायते भाऊ? लइ बेक्कार पिक्चर हाय. मी तुमाले येकयेक मुद्दा बराबर समजावून सांगतो. लवस्टोरी आता मले सांगा पिक्चरमंधी कमीत कमी येकतरी लवस्टोरी पायजेन का नाही. लवस्टोरी बिना पिक्चर रायते का कधी?

बडे तो बडे, छोटेमिया सुभानल्ला !

सस्नेह ·

सिरुसेरि 28/01/2017 - 09:01
वयम मोठम खोटम असं म्हणतात ते खरं आहे तर ... छान छोटे वाईट मोठे.. बाकी तुमच्या अपार्टमेंटसमधले वानरसेनेचे उद्योग वाचुन देनिस , मिष्काची आठवले .

सिरुसेरि 28/01/2017 - 09:01
वयम मोठम खोटम असं म्हणतात ते खरं आहे तर ... छान छोटे वाईट मोठे.. बाकी तुमच्या अपार्टमेंटसमधले वानरसेनेचे उद्योग वाचुन देनिस , मिष्काची आठवले .
काल सुट्टी. झेंडावंदन करून झाल्यावर रीतसर जिलबीचे जेवण झालेले. सुट्टी म्हणून दुपारी मस्तपैकी ताणून द्यावी की दुर्दर्शनच्या शिरेलीने डोक्याची मालिश करून घ्यावी हा विचार सुमारे तीन मिनिटे करून झाल्यावर लक्षात आले की शाळेला सुट्टी असल्याने बाहेर चाललेल्या चिल्ल्यापिल्ल्यांच्या धुडगूसामुळे निद्रादेवीच्या राज्याचा रस्ता सापडणे कठीणच. प्रजासत्ताक दिन म्हणजे जवळजवळ बालसत्ताक दिनच असे समीकरण करायला हरकत नाही. माझ्या घराशेजारी एकूण तीन अपार्टमेंटस असल्याने बाल-सत्ताधाऱ्यांची मांदियाळीच होती. तेव्हा दुर्चित्रवाणीचा पेटारा पेटवला आणि सोफ्यावर ऐसपैस अंग पसरले.

मटार उसळीची लागलेली चटक कशी सोडवावी?????

निनाद ·
तर मंडळी " दिसा माजी काहीतरी ते डोके खावे,प्रसंगी अखंडीत खातच जावे" असे टफीस्वामींनी सांगुन ठेवले आहे .या उक्तीमुळे रोज काहीतरी हितगुज आपल्याशी करावे असे वाटत राहाते. असो. तर आजचा विषय आहे मटार उसःळ. आपल्या सर्वांचा आवडीचा विषय. उ. त्क्रांतीवादानुसार माणुस हा मिसळ आहारी आहे .तो मिसळाहार आणि उसळाहार दोन्ही आवडीने करतो.त्याला मी कसा अपवाद असणार? जसे मला कळत आहे तेव्हापासुन मि मटार उसळीचा भोक्ता आहे. आम्ही सदस्य लहान असताना आठवड्यातून एकदा आमच्या डोक्यामध्ये मटार उसळ किंवा मिसळ शिजायची.

नोटबंदी गैरव्यवस्थापन माजी पंतप्रधानांची जबाबदारी ?

माहितगार ·

नाखु 24/11/2016 - 16:14
विषय निघालाच आहे तर १९९१ ते १९९६ या काळात आपण जाचक आयातकर अत्यंत वेगाने कमी करत नेले याचा आयात वस्तु विकणारा एक सामान्य विक्रीप्रतिनिधी म्हणून मी आठवण जतन केली आहे त्या काळात अर्थमंत्र्यांचे बजेट भाषण सुट्टी टाकून ऐकत असे आणि नंतर वाचत असे त्याच कालावधीत वस्तुंच्या उत्पादनावरील कर आपल्या सरकारने त्याच प्रमाणात का कमी केले नाहीत भारतात निर्मित वस्तु पेक्षा आयात वस्तु स्वस्त होऊ देण्या मागील आपली भूमिका आजतागायात मला व्यक्तीशः समाधानकारकपणे उलगडलेली नाही.
याच सुमारास परदेशातील घड्याळे, कॅसेट प्लएअर हे देशी उत्पादना पेंक्षा कमी किमतीत मिळत असत आणि असे का मला कळत नसे.

In reply to by नाखु

माहितगार 24/11/2016 - 16:46
'हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनीक्स वस्तुंच्या उत्पादनाकडे लक्ष द्यावयास हवे होते' ह्या बद्दल पी. चिदंबरंमांनी २०१४ मध्ये केव्हातरी कबूली दिली हे इथे लक्षात घ्यावयास हवे. तसे लक्ष्य न दिल्याचे माप मनमोहन सिंगांनतंर लगोलग पी. चिदंबरमांकडे जावयास हवे कारण मनमोहन सिंगा नंतर (९६-९७) अर्थमंत्री पद चिदंबरमाम्च्या गळ्यात आले होते. २००४ ते २०१४ पुन्हा त्यांच्या गळ्यात होते.

In reply to by नाखु

माहितगार 24/11/2016 - 16:48
खाली मिल्टनचाही अभ्यासपूर्ण प्रतिसाद आवडला, मिल्टना प्रतिसाद खरेतर कुणीतरी राज्यसभेत जरुर वाचून दाखवावयास हवा.

In reply to by नाखु

माझे वडील फिलिप्स इंडिया या कंपनीत कामाला होते आणि पुण्यात भोसरीमधे बर्‍याच म्युझिक सिस्टीमचे उत्पादन चालायचे. इतकंच नव्हे तर तिथे ईओयु मधून बाहेर निर्यातीसाठी उत्पादन पण होत असे. २००१ ते २००४ मध्ये त्यात झपाट्याने घट झाली. आधी दिल्लीतले कोमेकर आणि नंतर चिनमधले अशा क्रमाने उत्पादन कमी होत गेले आणि फिलिप्सने फॅक्टरी भाग पाडून जॅबिल आणि रहेजा बिल्डरला विकली. अजूनही ती बंद पडलेली फॅक्तरी आहे तिथे. वडीलांनी व्हीआरएस् लागल्यावर २००५ साली स्वेच्छानिवृत्ती घेतली नाहीतर त्यांना गुरुग्राम ला पठवले असते. त्या अनुषंगाने हे ही आठवले.

मिल्टन 24/11/2016 - 16:32
हा धागा काढल्याबद्दल माहितगार साहेबांचे आभार. चर्चा रंगेल त्याप्रमाणे इतर मुद्द्यांवर लिहितोच पण मनमोहनसिंगांच्या भाषणातला एक मुद्दा मात्र मला चांगलाच खटकला आहे त्याविषयी आता लिहितो. मनमोहन म्हणाले: “The government tells us that there will be distress in the short term but national interest will be served in the long term. I am reminded of Keynes who said ‘in the long run, all of us are dead". नोटाबंदीच्या निर्णयामुळे शॉर्ट टर्ममध्ये होणारा त्रास हा लॉन्ग टर्ममध्ये होणार्‍या फायद्यापेक्षा बराच जास्त आहे त्यामुळे या निर्णयाला विरोध असेल तर मला हा मुद्दा मान्य नसला तरी परमतसहिष्णुता म्हणून त्यांचे म्हणणे तत्वतः ऐकून घेता येईलच. पण मनमोहन म्हणत आहेतः "I am reminded of Keynes who said ‘in the long run, all of us are dead". त्यांनी हा मुद्दा मांडला याचे खरोखरच आश्चर्य वाटत आहे. जॉन मेनार्ड केन्सने ‘in the long run, all of us are dead' हे खूपच वेगळ्या परिस्थितीत म्हटले होते.अ‍ॅडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जॉन स्टुअर्ट मिल इत्यादींच्या प्रभावाखालील 'क्लासिकल इकॉनॉमिस्टस' चे म्हणणे होते की १९२९ मध्ये आलेल्या महामंदीविरूध्द सरकारने काहीच पावले उचलायची गरज नाही. कारण 'in the long run' सगळ्या गोष्टी ठिक होतील. हे मत बनले त्या काळातील परिस्थितीला अनुसरून ते योग्यच होते. म्हणजे क्लासिकल इकॉनॉमिस्ट्सच्या मते अर्थव्यवस्थेत मंदी येते कामगारांची पगाराची अपेक्षा वाढली की. तसे झाल्यास उद्योग नोकर्‍यांचे प्रमाण कमी करतात आणि बेकारी वाढते. त्यामुळे कामगारांची पगाराची अपेक्षा आपोआप कमी होते आणि त्यामुळे नव्या नोकर्‍या वाढतात आणि त्यातून बेकारी कमी होते आणि मंदीही आपोआप कमी होते. म्हणजे मंदी कमी करण्यासाठी काहीही प्रयत्न करायची गरज नसते तर in the long run सगळे काही ठिक होते. अ‍ॅडम स्मिथचा काळ होता १७७५ च्या सुमारासचा, डेव्हिड रिकार्डो त्यानंतर ५० वर्षांनंतर तर जॉन स्टुअर्ट मिल १८५०-६० च्या सुमारासचा. त्यावेळची परिस्थिती लक्षात घेता ते म्हणणे योग्यही होते. पण नंतरच्या काळात यांत्रिकीकरण आणि बँकिंग या दोन्हींचा विस्तार झाला. त्या परिस्थितीत काहीही न करता in the long run सगळे काही ठिक होईल या भरवशावर हातावर हात ठेऊन बसणे योग्य ठरणार नाही हे त्याकाळच्या क्लासिकल इकॉनॉमिस्टच्या प्रभावाखालच्यांना लक्षात आले नाही. किंबहुना अमेरिकेचे अध्यक्ष हर्बर्ट हूव्हरही 'prosperity is around the corner' हेच आश्वासन देत होते. त्याला उद्देशून जॉन मेनार्ड केन्सने 'in the long run we all are dead' असे म्हटले होते. म्हणजे केन्सच्या मते सरकारने मंदी दूर करायला प्रयत्न करणे गरजेचे होते. म्हणजेच सरकारने हातपाय मारणे गरजेचे होते. आपले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणत आहेत की "“The government tells us that there will be distress in the short term but national interest will be served in the long term. I am reminded of Keynes who said ‘in the long run, all of us are dead". याचा अर्थ माझ्यासारख्या सामान्यांनी काय घ्यावा? जर का ‘in the long run' आपण सगळेच मरणार असू तर सरकारने long run साठी काहीही करायचे नाही का? म्हणजे त्याच न्यायाने शॉर्ट रनमध्ये अडचण सहन करून जर लॉन्ग रनमध्ये फायदा होऊ शकेल अशी कुठचीच गोष्ट करायला नको का? म्हणजे शिक्षण, आरोग्यसेवा सुधारण्यावरही भर द्यायला नको. कारण त्यातून होणारा फायदा long run मध्ये होईल आणि तोपर्यंत आपण सगळेच मेलेलो असू. मनमोहन सिंगांचे हे मत काही पटले नाही.

In reply to by बोका-ए-आझम

अमर विश्वास 24/11/2016 - 17:41
If we don’t act now, ‘in the long run, all of us are dead’ आपल्या पंतप्रधानांनी कृती तर केली आहे लॉन्ग रन मध्ये कोण कोण डेड होतात ते कळेलच

In reply to by मिल्टन

विशुमित 24/11/2016 - 17:43
तुमचा म्हणणं मान्य पण या भाषणातील मनमोहनसिहांचं हे वाक्य मला जास्त ट्रिगर झालं And I say so with all responsibilities, that we do not know what will be the final outcome. फायनल औटकॉम काय असेल हे खरंच सरकारला माहित आहे का? कारण डेमॉनिटिसशनला कोणीच विरोध करत नाहीये, विरोध फक्त अंमलबजावणी ला होत आहे.

In reply to by विशुमित

मिल्टन 24/11/2016 - 17:54
And I say so with all responsibilities, that we do not know what will be the final outcome.
फायनल आऊटकम खात्रीने माहित असेल असे प्रसंग खरोखरच कुठल्याही जबाबदारीच्या पदांवरून निर्णय घेताना असतात का हाच प्रश्न आहे. अशा प्रसंगी नक्की काय होईल हे पूर्णपणे माहित नसले तरी आपला निर्णय अंततः हिताचा असेल ही खात्री असेल तर कितीही विरोध झाला किंवा कितीही अडचणी आल्या तरी तो निर्णय पुढे रेटायची हिंमत पाहिजे. स्वतः मनमोहनसिंगांना हे सांगायची गरजच नाही कारण त्यांच्यावरही ते अर्थमंत्री असताना 'आय.एम.एफ चे एजंट' वगैरे आरोप होत असतच तरीही आपला निर्णय देशाच्या हिताचा आहे हे कन्व्हिक्शन त्यांच्याकडे होते आणि त्यामुळे कितीही विरोध झाला तरी ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. आज मोदीही तेच करत आहेत. बहुदा मनमोहनसिंगांनी भाषण 'काँग्रेस पक्षाचा नेता' या 'हैसियत' मध्ये केले असावे अन्यथा 'फायनल आऊटकम काय' हे माहित नाही अशाप्रकारचे वक्तव्य त्यांनी केले नसते.

In reply to by मिल्टन

बहुदा मनमोहनसिंगांनी भाषण 'काँग्रेस पक्षाचा नेता' या 'हैसियत' मध्ये केले असावे
सहमत! शिवाय या अशा प्रकारच्या भाषणासाठी त्यांना निवडले गेले असावे का(स्वच्छ प्रतिमेचा वापर करण्यासाठी)?

In reply to by मिल्टन

मारवा 24/11/2016 - 19:57
संदर्भ संपन्न प्रतिसाद ! सिंपली सुपर्ब !!!!!!!!!!!! हे माहीत नसते तर वरील विधान वेगळ्याच अर्थाने बघितले गेले असते. हे तर तुमच्यामुळे केवळ माहीत झाले.

In reply to by मारवा

मारवा 24/11/2016 - 20:07
खरीखोटी माहीत नाही पण रोचक आहे नीट आठवत नाही आठवणीच्या भरवशावर मन्सुर या संताला दगडाने ठेचण्याची शिक्षा दिली जात होती. कारण त्याने "अनलहक" मी च तो आहे ईश्वर आहे अशा अर्थाचं ईशनिंदा करणार विधान केलेलं होत. त्यावेळेस त्याचा एक शिष्य होता नाव नीट आठवत नाही. तर सर्व लोक मन्सुर ला दगड मारत होते. तेव्हा मन्सुर ला त्याचे काहीच वाटले नाही तो शांतपणे सगळे सहन करत होता. मग या शिष्याने लोकदबावाला घाबरुन आपण ही लोकांच्या बरोबर आहोत हे दाखवण्यासाठी एक फुल की दगड मन्सुरला मारुन फेकले. हे पाहुन मात्र मन्सुर रडु लागला. लोकांना आश्चर्य वाटले की हा इतक्याने का रडला तर मन्सुर म्हणाला की इतर जे दगड मारत होते त्यात त्यांचा दोष नाही कारण त्यांना माहीतच नाही त्यांना मुळातच ज्ञान नाही म्हणुन त्यांच्या अज्ञानातुन आलेल्या कृत्याचे काही वाटत नाही. मात्र तु तर माझा शिष्य होतास व तुला तर सत्य माहीत आहे व हे माहीत असुनही तु माझ्यावर दगड/ का फुल उचलुन मारलास त्यामुळे तुझ्या या कृत्याने मात्र मी नक्कीच दुखी झालो व त्यामुळे रडत आहे असे काहीसे. इथे मनमोहन सिंगांना केन्स च्या विधानामागील संदर्भ माहीत असुनही तो त्यांनी जाणीवपुर्वक चुकीचा मांडला हे त्यांच्यासारख्या अर्थतज्ञाला शोभत नाही हे नक्की.

In reply to by मिल्टन

कोळसा घोटाळ्यात मनमोहनसिंगांचे नाव आले आणि त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्यानंतर लगेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना बोलवून एक मिटिंग केली. त्यानंतर सिंग यांचे सार्वजनिक स्थानांवरचे आणि राज्यसभेतले बोलणे त्यांचे स्वतःचे, म्हणजे एका सुविद्य शिक्षकासारखे, किंवा आंतरराष्ट्रिय स्तरावर काम केलेल्या जाणकार तज्ञासारखे खचितच वाटत नाही. ते इतर कोणीतरी लिहून, त्यांची एखादी दुखरी नस पकडून, त्यांना बोल्ण्याची सक्ती करत असावे असा संशय घेण्यास जागा आहे. अश्या वेळांना, ते पूर्वीच्या काळात बोलत नव्हते, तेच चालू ठेवले असते तर फार चांगले झाले असते, असे वाटते. (अ) आपल्या पंतप्रधानकाळात इतके घोटाळे होत आहेत आणि / किंवा बाहेर येत असताना व (आ) त्यासंबंधी "सगळेच बोलता येत नाही, काही राजकिय सक्ती (कंपल्शन्स) असतात असे शब्द भर वार्ताहरपरिषदेत तोंडूने येत असतानाच्या परिस्थितीत; एखादा उत्तम भूतकाळ असलेला अभिमानी माणूस राजिनामा देवून मंत्रीपरिषदेतून (किंबहुना राजकारणातून) बाहेर पडला असता. ते मनमोहन सिंग यांना का जमले नाही, हा यक्षप्रश्न आहेच. नव्वदीच्या दशकात याच माणसाबद्दल देशी-परदेशी लोकांमध्ये अतीव आदराने बोलताना छाती अभिमानाने भरून यायची ! नामवंत आंतरराष्ट्रिय अर्थतज्ञ, उत्तम ब्युरोक्रॅट आणि कल्पक अर्थमंत्री असलेल्या या माणसाची पंतप्रधानपद स्विकारल्यापासून चालू असलेली सततची अधोगती मन विषण्ण करून जाते. :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कहर आहे हा प्रतिसाद. लोकांना चांगल्या अभ्यासू धाग्यांवर conspiracy theories मांडून विघ्न आणण्यात काय आनंद मिळत असावा? :(

In reply to by फेदरवेट साहेब

१. सत्य कटू असते, विषेशत: ज्यांना ते गैरसोईचे असते त्यांना ! :) २. सत्याकडे डोळेझाक करून "अभ्यासू" धागा किंवा चर्चा शक्य नसते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मनमोहन पंतप्रधान असताना त्यांना कंट्रोल केले जात असे हे जगजाहीर सत्य आहे, त्यात नाकरण्यासारखे काहीच नाही. कारण त्याचे सबळ पुरावे अन मासले उपलब्ध आहेत. त्यांचे हल्लीचे भाषण रीग केल्याचे आहेत का तुमच्याकडे पुरावे ? का नुसते 'मला अशी शंका आहे' 'संशय घ्यायला जागा आहे' म्हणत बायस्ड मते मांडता आहात? बरं आता धाग्याबद्दल बोलायचे झाले तर, अर्थशास्रातले अंदाज अन समीकरण , प्रमेय आधारित आडाखे वेगळे अन अंदाजेपंचे दाहोदरसे आपली मते, अभ्यासकी थाटात मांडणे वेगळे. आता थोडे तुम्ही अगदी काहीतरी अर्थगर्भ लिहिल्याच्या थाटात, जी वरती दोन वाक्यं झोकात टंकली आहेत त्याच्याबद्दल बोलतो. बरोबर, सत्य गैरसोयीचे असतेच. पण ते गैरसोयीचे सत्य खरोखरीचेच सत्य आहे हे सिद्ध करायला पुरावे लागतात, अन्यथा त्याला शुद्ध लोणकढी तरी म्हणतात किंवा 'Conspiracy Theory' तरी म्हणतात. मग त्याला सत्याची व्हॅल्यु सुद्धा उरत नाही अन त्याने कोणाची गैरसोय सुद्धा होऊ शकत नाही. मनमोहन मुका होता/ कंट्रोल्ड कळसूत्री बाहुली होता, ह्या सत्यात मला कवडीचीही गौरसोय नाही, फक्त तुम्हाला एक खोचक प्रश्न विचारल्यामुळे तुमची काय तडफड झाली अन तुम्ही कुठल्या अंदाजाने माझी गैरसोय झाल्याचा सोईस्कर निष्कर्ष काढलात हे मात्र कोडे आहे. दुसरा मुद्दा तसाच गैरलागू आहे, पहिले ते सत्य घासून झळाळून सिद्ध करा अन ती conspiracy theory नसल्याचे दाखवून द्या मग त्याच्याकडे दुर्लक्ष झाले आहे की नाही किंवा अभ्यासू धागा अन चर्चा करायची १२००१ सूत्रे वगैरे बोलूयात :)

In reply to by फेदरवेट साहेब

शांत गदाधारी भीम शांत ! :) सभ्यपणे समतोल चर्चा करून सत्याचा शोध घ्यायचा असेल तर असे रागावून चालत नाही. तसेच, आपले म्हणणे मांडण्याआधी त्या विषयावर अगोदर झालेल्या चर्चेची पार्श्वभूमी आणि त्यात मांडलेल्या मुद्द्यांची दखल घेणे आवश्यक असते. तरच तो संवाद होईल, अन्यथा वितंडवाद होईल. असो. चला तर, पुराव्यांसह सत्य घासून झळाळून सिद्ध करायचा प्रयत्न करूया... १. सद्य चर्चेत कोणताही आरोप करण्याअगोदर... अ) डॉ मनमोहसिंगांचे भाषण स्वतः स्वच्छ मनाने (पक्षी : प्रामाणिकपणे / कोणत्याही चष्म्याशिवाय) पाहिले/ऐकले असेणे जरूर आहे, (चर्चा या मुख्यतः भाषणाच्या संदर्भात चालली असल्याने, ते पाहिले/ऐकले नसल्यास, अश्या व्यक्तीने केलेल्या कॉन्स्पिरसी थियरीच्याच काय पण इतर कोणत्याच टिप्पणीला काहीच अर्थ असणार नाही. ते भाषण सोईसाठी खाली दिले आहे...) आणि आ) गेल्या आठवड्याभरात मिपावर या आणि इतर लेखांवर मी मनमोहन सिंगांबद्दल लिहिलेले त्यांच्या शिक्षणाबद्दलचे, अर्थशास्त्रीय ज्ञानाबद्दलचे आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दलचे बद्दलचे, नव्हे तर त्यांच्या भारतातील आरबीआयचे गव्हर्नर, अर्थमंत्री इत्यादी कारकीर्दीबद्दलचे भारतीय म्हणून अभिमान वाटणारे प्रतिसाद वाचले असतील तरच माझ्याबद्दलच्या शेर्‍यांना काही अर्थ असेल. (हे सर्व लेखन इथेच मिपावर आहे व सर्व मिपाकरांना उपलब्ध होते/आहे/लेख मिपावर असेपर्यंत राहील. आता, ते वाचले नाहीत आणि/ किंवा वाचायची गरज नाही म्हटले तर चर्चेची व लेखनाची पार्श्वभूमी नीट माहीत करून न घेता आरोप करत सुटला आहात हे सिद्ध होईल.) २. चला आता इतक्या पार्श्वभूमीवर, आपण डॉ मनमोहनसिंगांनी त्यांच्या भाषणात मांडलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांचे एक एक करत विश्लेषण करूया... मॉन्युमेंटल मिसमॅनेजमेंट अबाउट विच देअर इज नो टू ओपिनियन्स इन द कंट्री अ‍ॅज अ होल. नागरिकांना काही प्रमाणात त्रास झाला / होत आहे / काही काळ होईल याबद्दल कोणाचेच दुमत नाही. काही पक्षांनी दिलेल्या अराजकाच्या धमक्यांना आणि चालवलेल्या आंदोलनांना जनतेचा फारसा प्रतिसाद नाही. देशात कोणत्याही प्रकारची अनागोंदी माजलेली नाही, हे स्पष्ट सत्य आहे. त्यामुळे... * "मॉन्युमेंटल मिसमॅनेजमेंट" हे शब्द वरच्या त्रासाच्या स्तराकरिता करिता चूक आहेत. उच्चविद्याविभूषित, सुसंस्कृत आणि मोठ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अनुभवाची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीकडून अशी अतिशयोक्ती (तीही संसदेच्या भाषणात) आश्चर्यकारक, धक्कादायक व संशयास्पद ठरते. * ज्यांच्या अधिकारात आणि कारकीर्दीत (पक्षी : अ‍ॅडमिनिस्ट्र्शन / मॅनेजमेंट मध्ये) अनेक लाख कोटीचे CWG घोटाळा, 2G घोटाळा, कोळसा घोटाळा, इत्यादी "मॉन्युमेंटल मिसमॅनेजमेंट" घडल्या आहेत अश्या व्यक्तीच्या तोंडून हे अतिशयोक्तिपूर्ण शब्द येणे म्हणजे कांगावखोरपणाचा कळस समजायला हरकत नाही. * शिवाय, बहुसंख्य नागरिकांनी या कारवाईचे स्वागतच केले आहे आणि होणारा त्रास सहन करायची तयारी दाखवलेली आहे हे माध्यमांत दिसते आहेच. मग "देअर इज नो टू ओपिनियन्स इन द कंट्री अ‍ॅज अ होल." हे ढळढळीत असत्य का बोलले गेले ? हे शब्द डॉ सिंग यांच्यासारख्या सालस माणसाच्या मनातले असणे शक्य नाही. इन द लाँग रन ऑल ऑफ अस आर डेड हे जगप्रसिद्ध वाक्य कोणत्या मूळ संदर्भात बोलले गेले, त्याचा अर्थ काय होतो व ते इथे विपरित अर्थाने वापरले जात आहे, हे सुविद्य असलेल्या डॉ मनमोहन सिंग यांना कळले नसावे असे मला तरी वाटत नाही, कारण, तसे म्हणणे त्यांच्या ज्ञानाचा अपमान होईल. तरीही ते त्यांना बोलावेसे वाटले. यामागे, "लोकांना काय कळते, एखादे भारदस्त वाटणारे इंग्लिश वाक्य फेकून त्या वेळी मुद्दा जिंकला की झाले" ही राजकारणी चलाखी दिसते. ती डॉ सिंग यांच्या सुविद्य आणि व्यक्तीगत भिडस्त स्वभावाशी विसंगत आहे. या वाक्याच्या संदर्भात, दुसरा मुद्दा असा: "आपल्या आजच्या कृती केवळ तत्कालिक फायद्याकरताच करायच्या नसून, देशाचा गाडा चालवताना त्यातल्या बर्‍याचश्या कृती, आपण मेल्यावरही, पुढच्या अनेक पिढ्यांचा दीर्घकालीन फायदा डोळ्यासमोर ठेवून, पुढच्या अनेक दशकांसाठी, करायच्या असतात." उच्च प्रतीचे अर्थतज्ज्ञ असलेल्या व अनेक राष्टीय व आंतर्राष्ट्रीय प्रशासकीय व राजकीय पदे भूषवलेल्या डॉ सिंग यांना हे देशाच्या व्यवस्थापनातील साधे कळत नाही, हे समजणे धारिष्ट्याचे व चूक होईल. अजून विश्वास बसला नसेल तर सर्वसामान्य माणुस १०, १५, २० वर्षांनी फळे धरणारी झाडे का लावतो, असा प्रश्न स्वतःला विचारा.इतका कोता विचार फक्त तात्कालीक स्वार्थ मनात असलेला राजकारणीच करू शकतो. डॉ सिंग नाही. व्हॉट हॅज बिन डन विल इरोड पीप्ल्स कॉन्फिडन्स इन बँकींग अँड करन्सी सिस्टींम जमिनीवरची परिस्थिती याच्या एकदम उलट आहे. ज्यांच्याबद्दल ते बोलत आहेत त्या सामान्य माणसाच्या तोंडून असे काही ऐकू येत नाही. तेव्हा हा तद्दन खोटा जावईशोध डॉ सिंग यांचा नसून कोण्या चलाख राजकारण्याने घुसडलेले वाक्य आहे असे म्हणायला जागा आहे. लोकांना बँकेत पैसे ठेवायला परवानगी आहे आणि काढायला नाही. ही तरतूद काही थोड्या काळासाठी आहे, कायमची नाही हे डॉ सिंग याना नक्की माहिती आहे. व तसे का केले (काळाबाजार्‍यांना इतर अनेकांना हाताशी धरून आपला काळा पैसा पांढर्‍या पैशात बदलता येऊ नये यासाठी केले आहे) हे सर्वसामान्य माणसाला माहीत असलेले लॉजिक डॉ सिंग यांना माहीत नाही असे म्हणणे त्यांच्या बुद्धीमत्तेचा अपमान करण्यासारखे होईल. अर्थातच, हे दिशाभूल करणारे वाक्य त्यांनी नाही तर इतर कोणी अट्टल राजकारण्यानेच लिहिलेले असावे असे म्हणणे खोटे होणार नाही. हे दुसर्‍या कोणत्याच देशात झालेले नाही. * जगावेगळ्या समस्येला उतारा म्हणून जगावेगळी कारवाई करणे आवश्यक असते, हे १९९०च्या भारतातील अर्थक्रांतीचे शिल्पकार असलेल्या डॉ सिंग यांना माहीत नाही ? मग, त्यांनी त्या वेळेस बनवलेल्या आणि अस्तित्वात आणलेल्या काही क्रांतीकारी कारवाया केवळ कोणाची कॉपीच होती काय ? आपल्याला ज्या कारवायांनी जगप्रसिद्धी मिळवून दिली त्या डॉ सिंग इतक्यात विसरले? तेव्हा हे वाक्य त्यांचे असणे शक्यच नाही. * जगावेगळे यश मिळवायला जगाची कॉपी करून भागत नाही तर जगाने आपली कॉपी करावी असे काही करावे लागते. हे व्यवस्थापनशास्त्रातले मूलभूत तत्त्व डॉ सिंग यांना माहीत नाही असे म्हणणे चूक होईल. हे सुद्धा कोण्या इतराने दडपून दिलेले वाक्य असण्याचीच दाट शक्यता आहे. या कारवाईने भारताचे जीडीपी २% ने खाली जाईल व हे अंडरएस्टीमेट आहे. याकरिता डॉ सिंग यांच्यासारख्या जगन्मान्य अर्थतज्ज्ञाने काहीतरी ठोकताळे द्यायला हवे होते, ते त्यांनी दिले नाहीत. मग हा तर एकदम हवेत बाण मारण्याजोगा अशास्त्रीय आरोप झाला. हे करणे सिंग यांच्यासारख्या जागतिक स्तराच्या अर्थतज्ज्ञाला नक्कीच अत्यंत कठीण (ऑकवर्ड) वाटेल. कारण जे इतर अर्थतज्ज्ञ पुराव्यांसह बोलत आहेत त्यांच्या मते, या कारवाईमुळे... * पूर्वी न वापरता लोकांच्या ताब्यात बंदिस्त असलेले काही लाख कोटी रुपये आता बँकेत जमा झाले आहेत / अजून होत आहेत. यातले खूपसे पैसे सरकारला प्रकल्पांसाठी आणि शेतकर्‍यांना, लहामोठ्या उद्योगांना व सर्वसामान्य जनतेला क्षकर्जे देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. पैशाची उपलब्धता वाढल्याने आत्ताच काही बँकांनी कर्जांवरील व्याजाचे दर कमी केले आहेत, भविष्यात बँकांत आवक वाढल्याने ते अजून कमी होतीझे सांगायला अर्थतज्ञाचीही गरज नाही. * बँकेत ठेवलेल्या पैशांचे नागरिकांना व्याज मिळेल. घरात ते पैसे व्याजाविना पडून होते. म्हणजे नागरिकांचाही आर्थिक फायदाच होईल. * सरकारचे उत्पन्न कर व दंडाच्या पैशांमुळे लक्षणिय प्रकारे वाढणार आहे : यात केंद्रीय सरकारकडे अतिरिक्त जमा होत आहेच, पण राज्यांचे कर, म्युनिसिपालिटींचे कर व वीज कंपन्यांची देणी यांच्या सद्य बिले व भूतकाळातल्या तुंबलेल्या बाक्या यांची मोठ्या (अनेक दशकोटी) प्रमाणात वसुली झाली आहे / होत आहे. * अशा रितीने जमा झालेली रक्कम देशाच्या अर्थसंकल्पातील तूट लक्षणीयरित्या भरून काढेल, काहींच्या तज्ज्ञांच्या मते ती पूर्ण तूट भरून काढू शकेल. शिवाय आता कराच्या जाळ्यात सापदलेले आलेले अनेक (पूर्वी कर भरणे टाळणारे बरेच, लक्षावधी किंवा काही कोटी) लोक भविष्यातही कर भरत राहतील व सरकारी उत्पन्न वर्षानुवर्षे वरच्या स्तरावर ठेवतील. * या धक्क्यामुळे भारतातील जनता पैशांच्या डिजीटल व्यवहारांकडे व पर्यायाने स्वच्छ अर्थव्यवस्थेकडे जायला मदत होईल... अर्थातच, इतर अनेक उपाय करून दिवसेदिवस भारताची अर्थव्यवस्था सबळ करण्याला मदत होईल. हे सर्व जाणल्यावर, तत्कालिक धक्क्यानंतर या सगळ्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर लक्षणिय चांगला परिणाम होईल हे सांगायला अर्थतज्ज्ञाचीही गरज नाही... आणि डॉ सिंग तर जागतिक स्तरांचे अर्थतज्ज्ञ आहेत. अर्थात हे वाक्यही दुसर्‍या कोणाचे तरी असायलाच हवे, नाही का ? एव्हरी डे, बँकिंग सिस्टिम कम्स विथ सम न्यू रूल्स ऑर मॉडीफिकेशन्स * प्रकल्पव्यवस्थापन करतानाच नव्हे तर आपल्या नेहमीच्या जीवनातही उत्तम प्रकारे प्लॅन केलेल्या मोठ्या कामातही (उदा. सहलीला जाणे, मोठा कार्यक्रम आयोजित करणे, इ) काही सीमा (कन्स्ट्रेन्स) असतात व अनपेक्षित घटना घडून बाधा येते. तेव्हा प्रकल्प चालू असताना त्यात येणार्‍या बाधा दूर करणारे बदल किंवा अधिक संसाधनिक मदत करणे हे सर्वसामान्य तत्त्व आहे. तसे न करता सरकारने लोकांना होणारा त्रास हातावर हात ठेवून बघत रहावे (आणि पर्यायाने आम्हाला सरकारची नाचक्की करण्याची संधी द्यावी) असे डॉ सिंग यांना म्हणायचे आहे काय? नक्कीच नाही, कारण ते स्वतःहून असे म्हणाले नसते. किंबहुना, त्यांना हे पण माहीत होते की, कारवाईच्या नियमांत लोकांचा त्रास दूर करण्यासाठी जे बदल सरकारने आतापर्यंत केले आहेत त्यापैकी अनेक बदल विरोधी पक्षांनी दिलेल्या सूचनांवरून केले गेले आहेत. याशिवाय, या कारवाईत जसजशी उद्यिष्ट्ये आवाक्यात येत जातील तसतश्या सर्वसामान्य जनतेसाठीच्या सोयीसवलती वाढत जातील व गुन्हेगार लोक गैरफायदा घेऊ शकतील असे नियम अधिकाधिक कडक होत जातील. हे मूलभूत तत्त्व डॉ सिंग यांच्यासारख्या प्रशासकीय जाणकाराला माहीत असणारच. खरे माहीत असले तरी दडपून खोटे बोलणे डॉ सिंग यांना जमणार नाही असे मला वाटते, अर्थात हे शब्द इतर कोणा चलाख माणसाचे असावेत. कोऑपरेटिव्ह बँकांना या कारवाईत सामील केले गेले नाही, ते करावे पूर्व आरबीआय गव्हर्नर असलेल्या डॉ सिंग यांना कोऑपरेटिव्ह बँकांच्या इतिहासाबद्दल आणि सद्यस्थितीबद्दल इतर कोणी फारसे सांगायची गरज नाही. तेव्हा त्या बँकांना का सामील केले गेले नाही हे सद्य आरबीआय गव्हर्नरइतकेच चागले त्यांनाही माहिती आहेच. त्यामुळे, हे वाक्य उच्चारताना त्यांना प्रचंड कुचमुचल्यासारखे (ऑकवर्ड) झालेले स्पष्ट दिसत होते. याविरुद्ध त्यांच्या मागे व आजूबाजूला हा मुद्दा बोलला गेला याबाबत माना हलवून व बाके वाजवून आनंद व्यक्त केला गेला ! सगळेच उघड गुपित !!! अशा अर्थाची सूचना डॉ सिंग स्वतःहून करतील असे त्यांचे कट्टर विरोघकही म्हणणार नाहीत. ऑर्गॅनाईझ्ड लूट अँड लिगॅलाईझ्ड प्लंडर * ज्यांच्या अधिकारात आणि कारकीर्दीत (उर्फ अ‍ॅडमिनिस्ट्र्शन / मॅनेजमेंट मध्ये) अनेक लाख कोटीचे CWG घोटाळा, 2G घोटाळा, कोळसा घोटाळा, इत्यादी मॉन्युमेंटल मिसमॅनेजमेंट घडल्या आहेत अश्या व्यक्तीच्या तोंडून हे अतिशयोक्तिपूर्ण शब्द येणे म्हणजे कांगावखोरपणाचा कळस समजायला हरकत नाही. दुसर्‍याने लिहिलेले इतके विपर्यासपूर्ण शब्द बोलायला त्यांना खूपच जड गेले असणार, यात वाद नाही. * हे वाक्य ते बोलणार असे अगोदरपासून माहीत असल्यासारखी विरोधी बाजूने "एssssssss" असा आवाज काढून बाके वाजवली गेली. "नव्वदीच्या दशकात याच माणसाबद्दल देशी-परदेशी लोकांमध्ये अतीव आदराने बोलताना छाती अभिमानाने भरून यायची !" असे मी मिपावर व इतर चर्चेतही सतत लिहीत/बोलत असतो. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीबद्दल तसे बोलू शकत नाही याचे मला प्रचंड दु:ख आहे. पण, तसे का करता येत नाही याची कारणे जगजाहीर आहेत. डॉ सिंग व्यक्तिगतरीत्या सज्जन व्यक्ती आहेत व असे करण्याइतके "मुरलेले" राजकारणी नाहीत असे मला वाटते. त्यामुळेच ते पंतप्रधान (कागदावर तरी सर्वोच्च अधिकारी) असूनही घोटाळ्यांसंबंधीच्या पत्रकारपरिषदेत "काही गोष्टी राजकिय कंपल्शन्समुळे कराव्या लागतात" असे म्हणून गेले. एखादा कसलेला राजकारणी झोपेतही तसे म्हणाला नसता. त्यामुळे ही सर्व वाक्ये इतर कोणी लिहिली असावीत यात संशय नाही. तसे पाहिले तर काही पक्षांत इतरांनी लिहिलेली भाषणे वाचण्याची प्रथा आहेच. तेव्हा हे एक उदाहरण काही अनपेक्षित किंवा धक्कादायक नाही. धडाडीचे भाषण करण्यासाठी डॉ सिंग प्रसिद्ध नसले तरी हे भाषण करताना त्यांचा दबलेला आवाज, अडखळत बोलणे व एकंदर ऑकवर्ड देहबोली का असावी याचा कयास बांधणे तितकेसे कठीण नाही. हे भाषण सर्वसामान्य नव्हते. कारण, नोटा रद्द करण्याच्या अनपेक्षित व धाडसी कारवाईमुळे सद्या भारताकडे सर्व जगाचे, विशेषतः जागतीक स्तराच्या राजकारण्यांचे आणि अर्थतज्ज्ञाचे लक्ष आहे. त्यामुळे भाषण करताना "मी आत्ता जे बोलतो आहे त्यामुळे माझी, या वयात, माझ्या सहाध्यायांमध्ये, काय पत राहील?" हा प्रश्न डॉ सिंग यांना सतावत नसला तरच आश्चर्य. आता इतके घासून झळाळी दिल्यानंतर, तुम्हाला माझे खालील मत (ज्याबद्दल तुम्हाला आक्षेप होता) अत्यंत दु:खद मनाने दिलेले आहे आणि सत्य वस्तुस्थिती व सबळ तर्कांवर आधारलेले आहे हे पटावे... ते वाचण्याच्या सोईसाठी इथे परत देत आहे... कोळसा घोटाळ्यात मनमोहनसिंगांचे नाव आले आणि त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्यानंतर लगेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना बोलवून एक मीटिंग केली. त्यानंतर सिंग यांचे सार्वजनिक स्थानांवरचे आणि राज्यसभेतले बोलणे त्यांचे स्वतःचे, म्हणजे एका सुविद्य शिक्षकासारखे, किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केलेल्या जाणकार तज्ज्ञासारखे खचितच वाटत नाही. ते इतर कोणीतरी लिहून, त्यांची एखादी दुखरी नस पकडून, त्यांना बोलण्याची सक्ती करत असावे असा संशय घेण्यास जागा आहे. अश्या वेळांना, ते पूर्वीच्या काळात बोलत नव्हते, तेच चालू ठेवले असते तर फार चांगले झाले असते, असे वाटते.

(अ) आपल्या पंतप्रधानकाळात इतके घोटाळे होत आहेत आणि / किंवा बाहेर येत असताना व (आ) त्यासंबंधी "सगळेच बोलता येत नाही, काही राजकीय सक्ती (कंपल्शन्स) असतात असे शब्द भर वार्ताहरपरिषदेत तोंडून येत असतानाच्या परिस्थितीत; एखादा उत्तम भूतकाळ असलेला अभिमानी माणूस राजीनामा देऊन मंत्रीपरिषदेतून (किंबहुना राजकारणातून) बाहेर पडला असता. ते मनमोहन सिंग यांना का जमले नाही, हा यक्षप्रश्न आहेच.

नव्वदीच्या दशकात याच माणसाबद्दल देशी-परदेशी लोकांमध्ये अतीव आदराने बोलताना छाती अभिमानाने भरून यायची !

नामवंत आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञ, उत्तम ब्युरोक्रॅट आणि कल्पक अर्थमंत्री असलेल्या या माणसाची पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून चालू असलेली सततची अधोगती मन विषण्ण करून जाते. :(
अर्थात, कोणीही माझे मत पूर्णपणे मानणे, न मानणे हे प्रत्येकाच्या व्यक्तीगत विचारावर अवलंबून असेल. त्या लोकशाही हक्काबद्दल मला आदरच आहे. पण, डोळे गच्च मिटून किंवा एखादा चष्मा लावून सर्वांसाठी मोकळेपणाने उपलब्ध असलेल्या संस्थळावर काहीही आरोप करण्याने, मिपाकरांसमोर स्वतःचे काय काय उघड होईल, याची काळजी करणे लेखकासाठी फायद्याचे होईल, हे मात्र नक्की.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

वरच्या प्रतिसादातील ठळक केलेल्या शब्दांतील चुका डॉ सिंग समजून उमजून करतील हे म्हणणे त्यांचा व त्यांच्या अर्थतज्ज्ञ नात्याने असलेल्या पार्श्वभूमीचा किती मोठा अपमान असेल याची कल्पना करणे कठीण आहे. त्यामुळे ते मी करणार नाही. मात्र, काही कारणाने तात्कालीक राजकीय फायदा साधण्यासाठी त्यांच्याकडून असे काही वदवून घेणे तितकेसे कठीण नाही, याला त्यांचा गेल्या एक तपाचा भूतकाळ भक्कम पुरावा आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चौकटराजा 27/11/2016 - 09:49
खरे काय ते काळच सांगेल पण २ टक्के जी डी पी कमी होईल हा मनोहन सिंगांचा अंदाज देखील मला पुस्तकी वाटतो. बजाज होंडा सर्व कारखान्यात ५० दिवसात उत्पादन चालू आहे. शेतातील पिकाना हे अर्थशास्त्र काही समजत नाही ती वाढताहेत. ही जी डी पी चा संबंध शेतीसाठी पावसाशी तर उद्योगासाठी उत्तम औद्योगिक संबंधाशी आहे . दोन महिन्यात माणसांची पोटे काय विश्राम घेत आहेत काय? ..... काही ही हं ममो.....

In reply to by चौकटराजा

२ टक्के जी डी पी कमी होईल हा मनोहन सिंगांचा अंदाज देखील मला पुस्तकी वाटतो तो पुस्तकी अंदाज नसून धडधडीत चलाख राजकारणी दावा आहे. कारण त्यात फक्त खर्चाची बाजू धरली आहे आणि जमेची बाजू पूर्णपणे दुर्लक्षित केली आहे. पण खरेतर, माझ्या अंदाजाप्रमाणे जमाखर्चाचा इतका वरवरचाही विचार केला गेला नसावा. "कारण कोण त्याला आक्षेप घेणार आहे? आणि घेतला तरी आपले काय बिघडते (पक्षी : मतांवर परिणाम होणार नाही) ?" ही चलाख राजकारणी खात्री त्यामागे आहे. त्यामुळे, ही कृती डॉ सिंग यांच्यासारख्या तज्ज्ञाकरवी झाली असली तरी सरकारने त्या आरोपांना, वरवर धन्यवाद देवून, प्रत्यक्षात केराची टोपली दाखवली तरी कॉंग्रेसलाही त्याचे आश्चर्य वाटणार नाही. फार तर, हे भाषण संसदेच्या कायम नोंदीत असेल व नंतर कोणी त्याचा परत एकदा (विपर्यस्त) संदर्भ देऊन तात्कालील राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करेल, इतकेच त्याचे महत्व आहे. हे सगळे आरोप "एका जागतिक स्तरावर मान्यवर समजल्या जाणार्‍या भारतीय तज्ज्ञाची पत पणाला लावून, तिच्या आडोश्याने, निव्वळ एखादा बिनमहत्वाचा गुण मिळविण्यासाठी (पॉईंट स्कोअरिंग) केलेला वार आहे". ते शब्द लिहिणार्‍याला जरी ते शब्द बोलणार्‍याची जागतिक पत विचारात घ्याविशी वाटली नाही, तरी त्यामुळे जागतिक स्तरावर डॉ सिंग यांची विश्वासार्हता अजूनच कमी झाली आहे हे निश्चित. आर्थिक जगतात, जागतिक स्तरावर हाताच्या बोटावर मोजले जातील असे मोजकेच भारतीय, तज्ज्ञ म्हणून गणले जातात. त्यातल्या एकाची तात्कालीक स्वार्थाकरिता केलेली अशी शोकांतिका मन विषण्ण करणारी आहे.

महासंग्राम 24/11/2016 - 16:58
बाकी सगळं ठिके राजेहो, पण धाग्याच्या शीर्षकाची लांबी शब्दबंबाळ न ठेवता जरा लहान ठेवली तर समजायला पण सोप्प जाईल. नाहीतर माझ्यसारखे लोक्स फक्त टायटल वाचूनच पळतात.

In reply to by माहितगार

महासंग्राम 24/11/2016 - 17:11
इथे म्हणाल तर नोटबंदी : मनमोहनसिंग यांच्या टिकेतील चुका नोटबंदी गैरव्यवस्थापन माजी पंतप्रधानांची जबाबदारी काही चुकले असल्यास एकडाव माफी दयावी.विषय चांगला आहे केवळ नावाच्या कठीणपणाने लोकांनी दुर्लक्ष करू नये म्हणून भोचकपणा.

In reply to by महासंग्राम

माहितगार 24/11/2016 - 17:34
सर्व गोष्टी प्रत्येकाला सुचत नाहीत आणि शीर्षकाच्या लांबीच्या बाबतील मी खरेच कमी पडतो, आपल्या मदतयूक्त सूचनेसाठी अत्यंत आभारी आहे.

In reply to by महासंग्राम

मारवा 24/11/2016 - 20:10
कृपया स्टाईल इज मॅन हे ध्यानात ठेवावे. व वैशिष्ट्यांचा आदर करावा ही विनंती. आमची पुणेरी पगडी उद्या काढा म्हणाल अहो आमची स्टाईल है राव भावनाओ को समझो स्मिताली वाचावी

चौकटराजा 24/11/2016 - 19:29
मनमोहन सिंगानी नरसिंह रावाना पटवून मुक्त अर्थ्व्यवस्था आणली तीच मुळी नाईलाजाने. भारतातील उदधोग पती, शेतकरी हे जगाच्या सम्दर्भात नालायक ठरल्याने तो निर्णय घ्यावा लागला. त्याचे खापर मात्र सरकारी मालकीच्या कंपन्यांच्या अपयशावर फोडले या दोघानी.आपल्या उद्योग पतींकडे वा शेतकर्‍याकडे किती पेटन्टस आज आहेत ? मी समाजवादी विचाराचा आहे तरीही मिश्र अर्थ्व्यवस्थेचे महत्व मी जाणतो. आजही इंडियात रेलेवे च्या रूपाने भारत आहे याची मला जाणीव आहे. त्या बाजूला टाटा बजाज अंबानी यांचे कार्य महत्वाचे आहहे ते रोजगार निर्माते म्हणून. या तिघांकडे आंतरराष्त्रीय दर्जाची किती पेटंटस आहेत हे माझ्या लेखी महत्वाचे आहे. रोजगार काय डान्सबारचा मालकही न्रिर्माण करतो. सबब आजच्या प्रगतीचे फारसे श्रेय मी मनमोहन याना देतच नाही. आजच आर टी आय च्या एका चौकशीत २०११ ते १०११४ या काळात मोठा नोटांचे एकूण नोटातील प्रमाण पद्धतशीरपणे वाढविण्यात आली असे पुढे आले आहे. हा काळ कोण प्रधानमंत्रीपदी होते ते ज्ञात झाले की काळ्यापैशाचा खरा निर्माता कोण हे समजून येईल.

In reply to by ओम शतानन्द

नाखु 26/11/2016 - 16:25
इथेसाद्यंत आहे आपल्याला अपेक्षीत माहीती इथे डकवत आहे
नोटांमधली वाढ गंभीर देशातल्या अर्थव्यवस्थेत २८ ऑक्‍टोबर २०१६ रोजी १७,७७,०० कोटी रुपयांचं चलन होते (३१ मार्च २०१६ रोजी १६,४१,५०० कोटी रुपये). या चलनातली वाढ चिंतनीय होती. खालील तक्‍त्यात दिलेल्या माहितीचा अभ्यास केला, तर असं निदर्शनास येतं, की जवळजवळ ८६ टक्के चलनाची रक्कम या नोटा रद्द करून सरकारनं तूर्त गोठविली आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेस ‘ब्रेक’ लावला आहे- यात काळ्या पैशाचा समावेश आहे. भारताचं देशांतर्गत उत्पन्न २०१५-१६ या आर्थिक वर्षात ११३.५ लाख कोटी रुपये होतं, तर रद्द केलेल्या चलनाची देशांतर्गत उत्पन्नाशी असणारी टक्केवारी १२ टक्के आहे आणि ती अपेक्षेपेक्षा जास्त आहे. गेल्या पाच वर्षांत पाचशे रुपयांच्या चलनी नोटांमध्ये ७६ टक्के, तर एक हजार रुपयांच्या चलनी नोटांमध्ये १०९ टक्के वाढ झाली आणि ती बाब दखल घेण्यासारखी असल्याचे वित्त सचिवांनी स्पष्ट केलं आहे, यातच या नोटा रद्द करण्याचं मूळ कारण दडलेलं आहे, असं वाटतं
.

In reply to by ओम शतानन्द

चौकटराजा 28/11/2016 - 16:20
आता नाव आठवत नाही. चानलवर एका कॅशियरची मुलाखती सकट या संदर्भातील लढाई दाखविण्यात आली. त्याला मनमोहन यानी दाद दिली नाही. ते काम मोदीनी करून दाखविले. दरम्यान त्यानेच आर बी आय कडून ही माहिती मिळविली तिची टेबल्स सकट माहिती त्या चानलले दाखविली. पंण त्याचा दावा असाही आहे की मोदीनी ही बातमी अगोदर फोडली असावी म्हणून त्याने म्हणे आर बी आय गव्हरनर व मोदी यांचे विरोधी एफ आर आय करण्याचे ठरविले आहे.

संदीप डांगे 24/11/2016 - 19:39
विद्यमान पंतप्रधानानांनी घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीतल्या तृटींबद्दल कसं तरी ओढून ताणून चिमुटभर तरी जबाबदारी घ्याच असं माजी पंतप्रधानांना जबरदस्तीने म्हणणे काबिले तारिफ आहे. म्हणजे "नियोजन हुकलं ते माजी पंतप्रधानांमुळेच" असा वन लायनर वापरायला समर्थक मोकळे व आपले विद्यमान पंतप्रधान काव्यशास्त्रविनोदेन करायला मोकळे.

In reply to by संदीप डांगे

माजी पंत्रप्रधान जबरदस्तीने असे बोलले असे वाटत नाही. राज्यसभेतील त्यांच्या भाषणात मुद्द्दा होता की नोटबंदीचा उद्देश चांगला आहे, पण परिणाम (आऊटकम) काय असेल हे सांगता येत नाही. पैसा आणि बँकीग क्षेत्रावर विश्वास राहणार नाही. सामान्य लोकांना त्रास होऊ नये यासाठीच्या उपाययोजना हव्या होत्या असे ते म्हणतात. दरदिवशी नवीन नियमामुळे भारतीय रिजर्व बँकेची इमेज खराब होत आहे. एक गोष्ट स्वीकारलीच पाहिजे की नेमकं काय होणार हे आज तरी अनिश्चित वाटत आहे. दुसरी गोष्ट् ठळक दिसते की लोकांना काय त्रास होतो त्यावर भारतीय रिजर्व बँकेने दरदिवशी नवे निर्णय घेतल्याचे दिसून येतात. मला नाही वाटत की ते चूक बोलले. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बोका-ए-आझम 25/11/2016 - 09:26
माजी पंत्रप्रधान जबरदस्तीने असे बोलले असे वाटत नाही.
तुम्हाला फोन आला होता की काय?;) रच्याकने ते पंतप्रधानच जबरदस्तीने झाले होते. असो. कालचं भाषण राजकीय होतं, आर्थिक नव्हतं. २००८ च्या अणुकरारावर बहुमत सिद्ध करताना जे भाषण मनमोहन सिंगांनी केलं होतं त्यातला आत्मविश्वास काल दिसला नाही. तेव्हा ' आपण बरोबर आहोत ' हा भाव त्यच्या चेहऱ्यावर होता आणि तो लोकांनाही जाणवला होता. कालच्या भाषणाबद्दल मात्र दुर्दैवाने तसं म्हणता येत नाही.

In reply to by बोका-ए-आझम

पद्माक्षी 25/11/2016 - 11:37
माजी अर्थमंत्री, माजी गव्हर्नर या नात्याने जास्त विवेचन हे या निर्णयाच्या परिणामावर अपेक्षित होते. नुसतीच टीका किंवा सरधोपट विधाने खचितच अपेक्षित नव्हती. एवीतेवी काँग्रेसचा या निर्णयाला पाठिंबा आहेच तर याचे दूरगामी परिणाम किंवा याच्या पुढची पाऊले काय असावीत याबद्दल मते आवडली असती.

In reply to by संदीप डांगे

पगला गजोधर 26/11/2016 - 17:34
संदीपजी, सुंदर प्रतिसाद.... मिल्टन यांच्या वरील (सुंदर) प्रतिसादातील,
किंबहुना अमेरिकेचे अध्यक्ष हर्बर्ट हूव्हरही 'prosperity is around the corner' हेच आश्वासन देत होते. त्याला उद्देशून जॉन मेनार्ड केन्सने 'in the long run we all are dead' असे म्हटले होते.
वाचून,'अच्छे दिन आने वाले हय' ची आठवण आली.

जुने चलन बाद केल्यानंतर नवे चलन किती लागेल आणि नव्या चलनाच्या छपाईस किती वेळ लागेल इत्यादी गणिते इकॉनॉमीक सेक्रेटरी आणि रिझर्व बँकेचे सध्याचे गव्हर्नर यांच्या बोटावर असणार त्या गणितात ते खूप चुकले असतील अशी संभावना कमी आहे.
५० दिवसानंतर सगळे सुरळीत होईल, असे सरकार कशाच्या जोरावर म्हणते? ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा रद्द करून तितक्याच किंमतीच्या ५०० आणि २००० च्या नवीन नोटा छापायला अजून सहा महीने लागतील.

In reply to by मार्मिक गोडसे

चौकटराजा 24/11/2016 - 20:31
मी बॅंकिग हा विषय स्पेशल सब्जेक्ट घेऊन पदवीधर झालो . कार्ड काढून सहा वर्शे झाली तरी मॉलमधे वा पेट्रोल पंपावर रोकडा देऊन माल घेत होतो. वीज बील ऑनलाईन भरत नव्हतो का तर पावती मिळत नाही. ( आपल्या पासबुकात एन्ट्री होते हे मला ध्यानातच नव्हते) मोदीनी झटका दिल्याने मी शहाणा झालो. ( देशभक्त झालो असा मूर्ख दावा मी करीत नाही.) आजच मेडिकल वाल्याला विचारले तुझ्याकडे कार्डाची सोय आहे का ? आता रेल्वे बुकिंग ऑन लाईन होते . ते करायला देखील घाबरायचो. ही जर माझी कथा आहे तर ती अनेक पदवीधरांची असेल. ते आता ऑनलाईन पैसे भरायला सुरूवात करतील. माझी तर अशी मागणी आहे की सर्व शॉप्सना कार्ड सक्तीचे केले पाहिजे. व कार्ड वा रोख असे पर्याय ग्राहकाला दिले पाहिजेत.याने फार फरक पडेल.नवी नोटांची छापाई टळेल. या अर्थाने ही अर्थ क्रांतीच आहे. यातून अगदी लहान लोक म्हणजे चप्पल दुरूस्त करणारा ई मात्र वगळले तर चालतील पण ज्याला शॉप लायसन्सची गरज आहे ते सर्व व मांडववाले., केटरर्स ई ना देखील कार्ड सक्तीचे केले पाहिजे.

In reply to by चौकटराजा

+१००० हीच परिस्थिती बर्‍याच लोकांची असते. रोजच्या सवई अंगवळणी पडलेल्या असल्याने बदल हा नेहमीच चिंतादायक असतो आणि समाजात तो बर्‍याचदा झटका (कायदे, नोटाबंदी, इ) देऊन करावा लागतो. पण योग्य बदलाचे चांगले अनुभव आल्यावर तोही अंगवळणी पडतो.

In reply to by चौकटराजा

चिनार 25/11/2016 - 11:33
एक प्रामाणिक शंका (कृपया बावळटासारसखा प्रश्न म्हणून फाट्यावर मारू नये ). प्लास्टिक मनी ,इलेक्ट्रॉनिक मनी वगैरेचा वापर केल्यावर रोख व्यवहार कमी होतील हे मान्य. पण त्यामुळे नोटा छपाई कमी करावी लागेल हे कसे काय ? उदा. मी १०००० रुपयाचे तिकीट ICICI नेट बँकींग ने IRCTC वरून काढले. तर हे १००००रू. कधी ना कधी तरी रोख स्वरूपात IRCTC कडे पोहोचत असतील ना ?

In reply to by चिनार

ई-मनीचे नोटांच्या स्वरूपात नाही तर संगणकिय हिशेबाच्या स्वरूपात चलनवलन होते. फार फार तर कधीकाळी एखादा रोख व्यवहार करायचा झालाच तर नोटा एकाकडून दुसर्‍याकडे जातात. रोकड व्यवहारावर सीमा असेल (उदा: रु१०.०००) तर तेवढ्याच रकमेचे पैसे एका व्यवहारात नोटांच्या स्वरूपात वापरले जातील. ई-मनीची अर्थव्यवस्था अंगवळणी पडल्यावर असे रोखीचे व्यवहार क्वचितच होतील. उदा: अमेरिकेत बहुतेक ठिकाणी $१० (काही ठिकाणी $५) च्या वरचे व्यवहार कार्डाने होऊ शकतात/होतात.

In reply to by चिनार

चौकटराजा 25/11/2016 - 16:08
नोटा व आर्थिक सत्ता या दोन गोष्टी भिन्न आहेत. आपला पगार खात्यात जमा होतो त्यावेळी आर्थिक सत्ता जमा होते.नोटा हे ती सत्ता दुसर्‍यास देण्याचे एक माध्यम आहे. अशा फिजिकल व्यवहारास पर्याय म्हणून कार्ड आले आहे. अशा वेळी जो पर्यंत सर्वच माणसे नोटाच वापरू असा हट्ट धरणार नाहीत तोपावेतो छपाई कमीच लागणार !

अमर विश्वास 24/11/2016 - 20:38
५०० व १००० च्या नोटा रद्द करून तितक्याच किंमतीच्या नवीन नोटा छापतील असे वाटत नाही ... (म्हणजे circulation मध्ये आणणार नाहीत ) मी जे वाचाले / ऐकले त्यावरुन नवीन नोटांची एकुण किंमत जुन्या नोटांपेक्षा कमी असेल...

In reply to by मार्मिक गोडसे

अमर विश्वास 25/11/2016 - 00:28
मार्मिकजी का व किती ? यातील किती चे उत्तर माझ्याकडे नाही कारण डिमॉनिटायझेशनच्या कन्सेप्ट मध्ये याचा उल्लेख होता पण अजून रिझर्व्ह बँकेने या बद्दल Official स्टॅमेंट दिलेले नाही. का? या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करतो... डिमॉनिटायझेशनच्या आधी ५०० आणि १००० च्या नोटांचे एकूण मूल्य, सगळ्या चाल मुल्याच्या ८५% होते . हे प्रमाण इतर कुठल्याही अर्थव्यवस्थेपेक्षा खूप जास्त होते. हे प्रमाण कमी करण्याची ही उत्तम संधी आहे मी आधीही एका प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे डिमॉनिटायझेशन मुळे बँक मनी मध्ये थोड्या प्रमाणात वाढ होईल . (आत्ता जमा झालेला सगळा पैसा तसाच बँकेत राहणार नाही त्याचप्रमाणे सगळा पैसे परत रोख रकमेच्या स्वरूपातही राहणार नाही ) त्यामुळें रिझर्व्ह बँक २००० च्या नोटा कमी करून अप्रत्यक्षरित्या रोख रक्कम कमी करायला हातभार लावू शकते. अर्थात अजून या पातळीपर्यंत पोचायला खूप वेळ आहे. सध्या रोख रक्कमेची कमतरता आहे ... त्यामुळें अजून महिनाभर तरी रिझर्व्ह बँकेचे मुख्य उद्दिष्ट पुरेशा प्रमाणात रोख रक्कम पुरवणे हेच राहणार आहे.

गामा पैलवान 24/11/2016 - 21:21
डॉक्टर सुहास म्हात्रे,
एखादा उत्तम भूतकाळ असलेला अभिमानी माणूस राजिनामा देवून मंत्रीपरिषदेतून (किंबहुना राजकारणातून) बाहेर पडला असता. ते मनमोहन सिंग यांना का जमले नाही, हा यक्षप्रश्न आहेच.
माझ्या मते याचं कारण काय आहे ते सांगतो. मनमोहनसिंगांच्या आडून सोनियाला राज्यकारभार हाकायचा होता. जर सिंगांनी राजीनामा दिला असता तर सोनियाने त्यांची अंडीपिल्ली बाहेर काढली असती. मनमोहनसिंगांची अंडीपिल्ली काय आहेत? त्यांनी रिझर्व बँकेचे संचालक असतांना १९८३ (किंवा आसपास) बीसीसीआय नामे एका बदनाम बँकेस भारतात व्यवहार करावयास परवानगी (= बँकिंग लायसन्स) दिली होती. याच्या बदल्यात त्यांच्या एका मुलीला ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश मिळाला. आता बीसीसीआय ही अफरातफर करून जगभरातला पैसा पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय एस आय कडे वळवणारी बँक आहे हे सगळ्यांना माहीत होतं. तरीपण मनमोहन भुलले आणि टेररिस्ट फायनान्सिंग करून बसले. त्याची फळं भारतीयांना भोगावी लागली. कशी ते सगळ्यांना माहितीये. :-( आ.न., -ग.पै.

In reply to by गामा पैलवान

प्रदीप 25/11/2016 - 16:00
१९९१ सालपर्यंत जगात सर्वत्र अधिकृतरीत्या व्यवहार करत होती. त्यासाली तिच्यावर रन झाला व ती बुडली. १९८३ साली तिच्याबद्दलचे ड्यू डिलीजन्स करून कुणाला तिची खरी परिस्थिती समजली असती, तर त्यानंतर ती जगातील सर्वच फायनॅन्शियल सेंटर्समधे पुढील इतकी वर्षे कशी कार्यरत राहिली असती?

In reply to by प्रदीप

गामा पैलवान 25/11/2016 - 21:03
प्रदीप, तुमचा प्रश्न समर्पक आहे. नेमका अशाच तऱ्हेचा प्रश्न संसदेत मनमोहनसिंगांना विचारला होता. त्यावर माननीय सिंगसाहेब मिठाची गुळणी धरून बसले होते. आ.न., -गा.पै.

In reply to by वरुण मोहिते

गामा पैलवान 25/11/2016 - 02:20
वमो, मुलीला मिळालेला प्रवेश हे केवळ बक्षीस आहे. यामागचं खरं कारणं टेररिस्ट फायनान्सिंग आहे. यासंबंधी संसदेत झालेली चर्चा इथे आहे : http://parliamentofindia.nic.in/ls/lsdeb/ls10/ses1/13070891.htm आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मारवा 25/11/2016 - 10:22
यातुन येणारे रीझल्ट रोचक आहेत. यातुन टफी वमो असे आले एखादा नमो येइल कधी तरी मला काय मावा संबोधाल का गापै ?

In reply to by मारवा

गामा पैलवान 25/11/2016 - 13:38
अहो, निव्वळ आळस आहे हो! :-) तुम्ही फक्त मा. = माननीय बरंका. उगीच भलतेसलते अर्थ काढू नका बरें. ;-) आ.न., -गा.पै.

In reply to by अनुप ढेरे

चपखल ! भाषणातली भाषा पाहता, माझ्या मते मनमोहन सिंग यांना दुसर्‍या कोणी लिहीलेले भाषण वाचण्याची सक्ती केलेली दिसते. तसे पाहिले तर मनमोहन सिंग यांच्यावर काहीही करण्याची/ बोलण्याची (किंवा न करण्याची / न बोलण्याची) सक्ती करणे फारसे कठीण नाही, हे त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत दिसून आलेच आहेच.

मृत्युन्जय 25/11/2016 - 12:49
ते बोलले हे महत्वाचे. काय बोलले हे तितकेसे महत्वाचे नाही कारण अखेर ते देखील राजधर्माने बांधील आहेत. सरकारी धोरणांवर टीका करणे हे त्यांचे कर्तव्यच आहे. पण पाच वर्षात ज्या माणसाचे शब्द ऐकणे ही दुर्मीळ गोष्ट होती तो माणुस अखेर बोलला यामुळेच भारतीय जनतेला धक्का बसला असेल. कद्दाचित मैन सोडण्याचे वरुन आदेश आले असावेत. पण टीका करताना इतक्या विद्वान माणसाने अंमलबजावणीतल्या त्रुटींवर चर्चा केली असती तर ते जास्त योग्य झाले असते. पण माजी पंतप्रधान वदले "organised loot and legalised plunder". नुसते लूटमार झाली म्हणुन आरडाओरडा केला की झाले. यात नक्की लूटमार कशी झाली हे काही केल्या कळत नाही आहे. २जी, कोल्जी, दामादजी या सगळ्यांवर "मौन" हाच एक मुखवटा धारण करणारे नोटाबंदीला "organised loot " म्हणतात तेव्हा सखेद आश्चर्य वाटल्यावाचुन राहवत नाही. फारतर एखादा माणूस म्हणेल की हा निर्णय "उपयोगशून्य आहे", "यातुन काहीही होणार नाही" पण तरीही ही "संघटित लूटमार" कशी आहे ते कळेना. मनमोहन सिंगांनी अजुन एक फारच स्फोटक विधान केले ""Those who say demonetisation is good in the long run should recall the quote: 'In the long run we are all dead'." ममोंच्या या वक्तव्याचा अर्थ असा होतो की भवितव्याचा विचार करुन कुठलेही काम करु नका. कारण एकुणात काय आपण मरणारच आहोत. त्यामुळे अजुन २५ वर्षांनी आपण अर गेल्यावर समाजाला काही फायदा होणार असेल तर त्याचा विचार कशाला करा? यानिमित्ताने एक बोधकथा आठवली: " सत्तरीतले एक आजोबा आपल्या नातवाला बरोबर घेउन बागेत आंब्याचे झाड लावत होते. नातवाने निरागसपणे विचारले की मग पुढच्या महिन्यात तुम्ही या झाडाला लागलेले आंबे खाणार का? आजोबा सस्मित उत्तरले "नाही बाळा. झाडाला आंबे लागायला तर कैक वर्षे लागतील. तोवर कदाचित मी नसेन. " नातवाने आश्चर्याने विचारले की मग तुम्ही झाड का लावत आहात. त्यावर आजोबांनी दिलेले उत्तर फार मार्मिक होते "बाळा या झाडाचे आंबे तु खाऊ शकशील. असे बघ सध्या आपणा ज्या झाडाचे आंबे खातो ते माझ्या आजोबा / पणजोबांनी लावले होते." पण बहुधा मनमोहन सिंगांना असे सुचवायचे असावे की प्रत्येकाने आपल्यापुरते बघावे. फ्युचर गया भाड मे. क्योकि " इन द एंड वी ऑल विल बी डेड इन द लॉंग रन" मनमोहन सिंग आज ८४ वर्षाचे आहेत. जेव्हा ते पंप्र झाले तेव्हा देखील ७२ वर्षांचे होते आणि पाय उतार झाले तेव्हा ८२ वर्षांचे. जर त्यांचा दृष्टीकोन 'In the long run we are all dead' असाच असेल तर त्यांच्या काळात ते इतके निष्क्रिय का होते याचे उत्तर कदाचित त्यांच्या विचारसरणीतच असु शकेल. असो. असोच.

In reply to by मृत्युन्जय

काय बोलले हे तितकेसे महत्वाचे नाही कारण अखेर ते देखील राजधर्माने बांधील आहेत. या एका वाक्यात सद्याचा भारतीय राजधर्म किती नीच पातळीवर पोचला आहे हेच सुचीत होत नाही काय ? असंबधित, विपर्यास करणारे, अर्धसत्य, इतकेच काय सरळ सरळ असत्य बोलणे हे सर्व राजकारणाच्या नावाखाली खपून जाऊ लागले आहे. यामागे, एकतर "मला कोणी काहीही करू शकत नाही" ही गुर्मी आहे, किंवा "बुद्दू भारतिय नागरिकांना काहीही/कसेही सांगून ते खपवता येते आणि त्यातून आपला स्वार्थ साधता येतो" असा विश्वास आहे. ही सद्य भारतीय राजकारणातील दुर्दैवी पण सत्य परिस्थिती आहे. मुख्य म्हणजे याबाबतीत तथाकथित अशिक्षित व गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नेतेच नव्हे तर; विचारी, तज्ञ आणि उच्चविद्याविभूषित (यांना मी सुशिक्षित म्हणू शकत नाही) समजले जाणारे नेतेही हिरीरीने पुढे आहेत ! :(

पुंबा 25/11/2016 - 13:06
मनमोहन सिंगांच्या अर्थविषयक ज्ञानावर लोकांचा विश्वास आहेच. अर्थसुधारणांचे जनक या नात्याने त्यांच्या मताला सामन्यांत, तसेच थोडेबहुत अर्थसाक्षर, वाचणाऱ्यांत, विचार करणाऱ्यांत आणि वरिष्ठ मध्यमवर्गीय यांच्यात देखील किंमत आहे. सध्या दिसतंय असं कि सर्वसामान्यांना सगळ्यात जास्त त्रास होतोय मात्र ते इतके नाखूष नाहीयेत या निर्णयावर. त्यांना याचे दूरगामी परिणाम चांगले असतील असा विश्वास आहे म्हणूनच इतका fiasco होऊनदेखील सरकारची authority शाबूत आहे. गरीब, निम्न मध्यमवर्गीय लोकांना हा त्रास असह्य वाटत नाहीये मात्र मध्यमवर्गीय अधीर झालेत. या सगळ्यामुळे काँग्रेस ने असा विचार केला की मनमोहन सिंगांनी जर authoratatively या निर्णयाच्या विरोधात भाष्य केले तर सरकारची legitimacy आपण धोक्यात आणू शकतो कारण gdp 2 टक्क्यांनी कमी होईल हि खूप अपशकुनी भविष्यवाणी आहे. यामुळे मध्यमवर्गीयांत सरकारविषयी संशय निर्माण होऊ शकतो. ममता, केजरीवाल असल्या अडाण्यांचं लोक ऐकत नाहीत मात्र सिंग बोलले तर परिणाम होऊ शकेल अशी आशा काँग्रेस ला आहे. जर खरंच त्यांच्या म्हणण्याप्रमाणे झाले तर bjp साठी परिस्थिती अवघड होईल मात्र जर posotive परिणाम दिसले, ज्याची शक्यता जास्त आहे, तर मात्र मनमोहन सिंगांची क्रेडिबिलिटी ढासळेल काँग्रेसला काही फरक पडणार नाही. त्यामुळे मनमोहन सिंग हे नेहमीप्रमाणेच काँग्रेस साठी प्यादे बनले. Queen is the real power, this man is nobody.

श्रीगुरुजी 25/11/2016 - 15:42
मनमोहन सिंग यांचे कालचे भाषण बघून अत्यंत वाईट वाटले. ते भाषण मनमोहन सिंग या अर्थतज्ज्ञाचे नसून गांधी घराण्याच्या निष्ठावंत सेवेकर्‍याचे होते असेच वाटत राहिले. ५००/१००० च्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाला "संघटित लूट" म्हणणे हे पराकोटीचा विपर्यास होता. 'In the long run we are all dead' हे ऐकल्यावर हे मनमोह्न सिंगच बोलत आहेत का त्यांच्या मुखातून साक्षात पप्पू किंवा केजरीवाल किंवा संजय निरूपम बोलत आहेत अशीच शंका आली. भविष्यात आपण नसू त्यामुळे आता काहीही करू नका असेच त्यांचा सांगायचे होते का? तसे असेल तर भविष्यातील पर्यावरण, राहणीमान, देशाचे संरक्षण, देश नावाची संकल्पना इ. सर्वांनी विसरूनच जायला हवे कारण तेव्हा आपण नसू. नोटा रद्द करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीतील त्रुटी न दाखविता किंवा त्यावर सुधारणा न सुचविता, या निर्णयाला 'संघटित लूट' म्हणणे हे अत्यंत संतापजनक होते. यांच्याच काळात देशात 'राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा', '२ जी घोटाळा', 'कोळसा खाणीवाटप घोटाळा', 'ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा', 'आदर्श घोटाळा', ..... असे असंख्य घोटाळे झाले. ते सर्व घोटाळे म्हणजे 'असंघटित लूट' होती का? हे सर्व घोटाळे यांच्या डोळ्यांसमोर यांच्याच आशिर्वादाने होत असताना हे एखाद्या नि:संग ढुढ्ढाचार्यासारखे डोळे मिटून स्वस्थ बसून होते. आपण ज्या पदावर आहोत त्या पदाला देशात सर्वोच्च अधिकार असताना हे घोटाळे न थांबविता फक्त 'मी त्यात नाही' यातच हे समाधान मानत होते. २००४ ते २०१४ या काळात यांच्याबद्दलचा आदर खूपच कमी झाला होता. आता तो आदर जवळपास नष्ट झाला आहे. सत्ता आणि एखाद्या घराण्याशी बांधिलकी एखाद्या विद्वानाचे किती अधःपतन करू शकते याचे मनमोहन सिंग हे जळजळीत उदाहरण आहे. भ्रष्टाचार्‍यांच्या संगतीत राहून यांची विचारसरणी देखील भ्रष्ट झालेली दिसते.

In reply to by श्रीगुरुजी

सुबोध खरे 25/11/2016 - 18:29
कर्जे दिली कुणी आणि कशाला आणि ती बुडीत झाली त्याचा मूळ लेख जोखा पहा. "मल्ल्याची धन करायला नोटबंदी केली" अशी कोल्हेकुई काँग्रेसने करावी याचे आश्चर्य मुळीच वाटत नाही. डॉ मनमोहन सिंग हे अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असले तरीही त्यांचे आडाखे साफ कसे चुकले याचे विवरण वाचून घ्या. http://www.businesstoday.in/opinion/delhi-durbar/sorry-mr-manmohan-singh-we-were-dead-in-flat-three-years-demonetisation/story/241029.html मिठाला जागण्यासाठी विधाने केल्याने शेवटी डॉ मनमोहन सिंग यांचा "भीष्म" झाला असेच खेदाने म्हणावे लागते.

In reply to by सुबोध खरे

गामा पैलवान 26/11/2016 - 02:11
काहीही हं खरे डॉक्टर! मनमोहन सिंगाची तुलना चक्क भीष्मचार्यांशी? अहो, कुठे भीष्मप्रतिज्ञा करणारा तो पितृव्रती पराक्रमी देवव्रत आणि कुठे टेररिस्ट फायनान्सिंग करणारा तो मातृदेशद्रोही मनमोहन सिंग! पाकिस्तानला भारतात थेट गुंतवणुकीचा राजरस्ता खोलून देणाऱ्या टेररिस्ट फायनान्सर मनमोहन सिंगाचं हे उदाहरण पाहून घ्याच : http://www.thehindu.com/business/Economy/article3310677.ece आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माहितगार 26/11/2016 - 11:35
एकवेळ व्यक्तिगत टिका ठिक, पण देशद्रोही सारखी विशेषणे लावण्याची सहसा घाई न केलेली बरी हे माझे व्यक्तिगत मत बाकी आपली मर्जी

In reply to by माहितगार

संदीप डांगे 26/11/2016 - 11:57
देशद्रोही, देशभक्त फारच स्वस्त शब्द झालेत आजकाल, त्यांचं महत्त्व हरवत चाललंय, दुसऱ्याला देशद्रोही म्हटलं की आपण फार देशभक्त ठरतो असा काही सुप्त भाव प्रचलित झालाय जणू! राजकारणाची हि नवीन परिभाषा रुळते आहे, जनतेचे सेवक, जनतेच्या भल्यासाठी असे जुने शब्द फारसे परिणाम करत नाहीत, बोथट झालेत, त्याऐवजी देश, राष्ट्र वैगेरे शब्द वापरले जात आहेत, कालांतराने तेही बोथट होतीलच,

In reply to by संदीप डांगे

गामा पैलवान 26/11/2016 - 14:14
संदीप डांगे, १.
दुसऱ्याला देशद्रोही म्हटलं की आपण फार देशभक्त ठरतो असा काही सुप्त भाव प्रचलित झालाय जणू!
हे विधान मला उद्देशून आहे का? २.
देशद्रोही, देशभक्त फारच स्वस्त शब्द झालेत आजकाल, त्यांचं महत्त्व हरवत चाललंय,
एकदम बरोबर बोललात बघा. नेमक्या याच कारणासाठी खरे देशद्रोही कसे असतात ते दाखवून द्यायला हवं. टेररिस्ट फायनान्सिंगास देशद्रोह नाही तर दुसरं काय म्हणायचं? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

संदीप डांगे 26/11/2016 - 14:41
तुम्हाला उद्देशून नाही, जनरली सगळीकडेच (इथेच मिपावर नाही) देशभक्त-देशद्रोही चा सढळहस्ते जो वापर चाललाय ते बघून म्हटलंय.. टेररीस्ट फायनान्सिंग केलंय तर ते गजाआड का नाहीत? विरोधी पक्ष तरी का शांत बसलेत अजूनही..?

In reply to by गामा पैलवान

संदीप डांगे 26/11/2016 - 16:52
काय राव? कोणी वराडतंय म्हणून त्याला जेलमंदी टाकत न्हाय व्हय? काहीतरी कॉन्क्रीट बोला की.

औरंगजेब 26/11/2016 - 13:23
मनमोहन सिंग एक अर्थतज्ञ म्हणुन उत्तम होते आहेत आणी राहतिलही.पण २००४-२०१२ त्यांना त्यांचे कर्तृत्व दाखवायची संधीच मिळाली नाही. किंबहुना मिळू दिली नाही. काहीही असो डॉ. सिंगांबद्दल मला नेहमीच आदर वाटतो. आणी तेच फक्त काँग्रेसमधले माझे आवडते नेते आहेत.

श्रीगुरुजी 26/11/2016 - 14:57
परवाच्या भाषणात मनमोहन सिंग असे सुद्धा म्हणाले की आपल्याच खात्यातले पैसे काढायला परवानगी नाही असा जगात एकतरी देश आहे का? त्यांना इतके असत्य बोलण्याची का आवश्यकता आहे? तुमच्या खात्यातून धनादेश वापरून पैसे चुकविता येतात, डेबिट कार्ड व क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खर्च करता येतो, इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून खात्यातील पैसे वापरता येतात, बँकेत जाऊन आपल्या खात्यातील २४००० रूपये प्रत्येक आठवड्याला काढता येतात, एटीम वापरून दोन हजार रूपये काढता येतात ... तरीसुद्धा आपल्याच खात्यातले पैसे काढायला परवानगी नाही असे जाहीर सांगणे हा प्रचंड विपर्यास आहे. बादवे, आपल्या मंत्रीमंडळातील सर्व मंत्री मनसोक्त लूटमार करीत असताना व त्यांना लूटमार करण्यापासून प्रतिबंध करण्याचे संपूर्ण अधिकार हातात असताना सुद्द्धा जगातील कोणत्या देशाचा पंतप्रधान डोळे मिटून शांत बसून होता व त्यांना लूटमार करण्यासाठी मोकळे रान देत होता हे मनमोहन सिंग सांगतील का?

In reply to by श्रीगुरुजी

संदीप डांगे 26/11/2016 - 15:18
बँकेत जाऊन आपल्या खात्यातील २४००० रूपये प्रत्येक आठवड्याला काढता येतात, एटीम वापरून दोन हजार रूपये काढता येतात
बॅन्केकडे कॅश असेल तर तेवढे मिळतात, एटीएम चालू असेल तर पैसे काढता येतात. प्रत्येक ठिकाणी जरतर चा मामला आहे. माझ्या परिसरातलं एसबीआय सोडून सगळे बॅन्कांचे १८+ एटीएम कॅश नाही, सर्वर प्रॉब्लम मुळे कार्यरत नाहीत. आज सकाळीच सर्वत्र पायी फिरुन आलोय. एसबीआयला गर्दी इतकी, एक-दिड तास लागतो पैसे काढायला. ही आज २६ तारखेची परिस्थिती आहे. हे आपलेच पैसे काढायला आलेले निर्बंध आहेत. खोटं काय त्यात? त्यात परत 'तुम्हाला रोज अमूक इतके पैसे लागतातच कशाला' सारखे निरर्थक प्रश्न विचारण्यापासून 'देशाच्या भल्यासाठी'पर्यंतचे दाखले देणारे आहेतच. देशात सर्वत्रच आलबेल परिस्थिती नाही हे ऐकूनच घ्यायचे नाहीये. कारण ऐकून घेतले तर सरकार त्यावर काय उपाय करतंय हा प्रश्न येणार व मग पितळ उघडं पडणार. त्यापेक्षा प्रश्न विचारणारा आणि टिका करणाराच कसा नालायक आहे हे म्हटले की प्रश्न मिटतो. चालुदे! आरबीआय रोज नवीन नवीन नियम काढते, कालचा नियम आज रद्द करते, बॅन्का भंजाळल्यात ग्राहकांना उत्तरं देऊन देऊन. सरकार आपणच दिलेली आश्वासनं पाळत नाही. उंदीर कुठे घुसतोय ते पाहून नंतर बीळ बंद करायला धावाधाव करतायत. त्यांचंही चालुदे! बाकी ज्या मंत्र्यांनी मनसोक्त लूटमार केली त्यां सर्वांना नवनिर्वाचित सरकारने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली खटला चालवून गजाआड घातले असेलच किंवा रक्कम तरी वसूल केली असेलच किंवा दोन्हीही. ह्यापैकी काही केलं असल्यास माहीती द्यावी.

In reply to by संदीप डांगे

विशुमित 26/11/2016 - 15:26
UPA १/२ मध्ये कलमाडी सोडले तर आणखी कोणत्या काँग्रेस मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. जाणकार सांगू शकतील का? फक्त वद्राना काँग्रेस मध्ये सामील करू नका.

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी 26/11/2016 - 15:37
खूप मोठी यादी आहे. मनमोहन सिंग, विजय दर्डा, दासरी नारायण राव, पवनकुमार बन्सल, शीला दिक्षित, वीरभद्र सिंग, अश्वानी कुमार, शशी थरूर ....

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी 26/11/2016 - 15:33
बॅन्केकडे कॅश असेल तर तेवढे मिळतात, एटीएम चालू असेल तर पैसे काढता येतात. प्रत्येक ठिकाणी जरतर चा मामला आहे. माझ्या परिसरातलं एसबीआय सोडून सगळे बॅन्कांचे १८+ एटीएम कॅश नाही, सर्वर प्रॉब्लम मुळे कार्यरत नाहीत. आज सकाळीच सर्वत्र पायी फिरुन आलोय. एसबीआयला गर्दी इतकी, एक-दिड तास लागतो पैसे काढायला. ही आज २६ तारखेची परिस्थिती आहे. हे आपलेच पैसे काढायला आलेले निर्बंध आहेत. खोटं काय त्यात? त्यात परत 'तुम्हाला रोज अमूक इतके पैसे लागतातच कशाला' सारखे निरर्थक प्रश्न विचारण्यापासून 'देशाच्या भल्यासाठी'पर्यंतचे दाखले देणारे आहेतच. देशात सर्वत्रच आलबेल परिस्थिती नाही हे ऐकूनच घ्यायचे नाहीये. कारण ऐकून घेतले तर सरकार त्यावर काय उपाय करतंय हा प्रश्न येणार व मग पितळ उघडं पडणार. त्यापेक्षा प्रश्न विचारणारा आणि टिका करणाराच कसा नालायक आहे हे म्हटले की प्रश्न मिटतो. चालुदे!
काही एटीएम सुरू आहेत, काही नाहीत. स्वत: बँकेत गेलात तर चेक वापरून स्वतःच्या खात्यातील पैसे काढता येतात हा अनुभव मी ३ वेगवेगळ्या बँकेत घेतला आहे. मनमोहन सिंगांचा मूळ मुद्दा होता की खात्यातून पैसे काढायला बंदी आहे असा भारत एकमेव देश आहे. परंतु या आरोपात १०% सुद्धा तथ्य नाही.
आरबीआय रोज नवीन नवीन नियम काढते, कालचा नियम आज रद्द करते, बॅन्का भंजाळल्यात ग्राहकांना उत्तरं देऊन देऊन. सरकार आपणच दिलेली आश्वासनं पाळत नाही. उंदीर कुठे घुसतोय ते पाहून नंतर बीळ बंद करायला धावाधाव करतायत. त्यांचंही चालुदे!
१३० कोटी लोकसंख्येच्या देशात असा गोंधळ होणे अनिवार्य आहे.
बाकी ज्या मंत्र्यांनी मनसोक्त लूटमार केली त्यां सर्वांना नवनिर्वाचित सरकारने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली खटला चालवून गजाआड घातले असेलच किंवा रक्कम तरी वसूल केली असेलच किंवा दोन्हीही. ह्यापैकी काही केलं असल्यास माहीती द्यावी.
विजय दर्डा, दासरी नारायण राव, मधू कोडा, नवीन जिंदाल, मारन बंधू, वीरभद्रसिंग अशा अनेक मंत्र्यांविरूद्ध न्यायालयात कारवाई सुरू आहे. दस्तुरखुद्द मनमोहन सिंगांचे नावही एका आरोपपत्रात आले होते. त्यांनी तातडीने सर्वोच्च न्यायालयात जाऊन खटल्याला बेमुदत काळापर्यंत स्थगिती मिळविली. सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला नसता तर एव्हाना खटल्याची सुनावणी सुरू झाली असती. न्यायालयांचा संथ कारभार बघता ही कारवाई अनेक वर्षे सुरू राहणार आहे.

In reply to by श्रीगुरुजी

संदीप डांगे 26/11/2016 - 16:48
न्यायालयांचा संथ कारभार असे सांगणे ही शुद्ध पळवाट आहे. ऑक्टोबर २०१४ मध्ये सुप्रिम कोर्टाने काळापैसावाल्यांची नावे जाहीर करायला तुम्हाला काय अडचण आहे असं सरकारला विचारलं होतं, दोन वर्षे होऊन गेलीत त्याला. पुढे काय झालं? टेबल टेनिस सुरु आहे काय? विद्यमान पंतप्रधानांची धडाकेबाज 'नियत' बघता अशा केसेस साठी एक फास्टर दॅन फास्टेस्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करुन सटासट प्रकरणं निकाली काढणे काय फार मोठी गोष्ट नाही. नरेंद्र मोदींनी असे काही केले तर (विरोधक कितीही आदळआपट करु देत) सामान्य जनता (फार्सिकल अॅंपमधून समर्थन न देता) रस्त्यावर उतरुन दिवाळी साजरे करेल.

नाखु 24/11/2016 - 16:14
विषय निघालाच आहे तर १९९१ ते १९९६ या काळात आपण जाचक आयातकर अत्यंत वेगाने कमी करत नेले याचा आयात वस्तु विकणारा एक सामान्य विक्रीप्रतिनिधी म्हणून मी आठवण जतन केली आहे त्या काळात अर्थमंत्र्यांचे बजेट भाषण सुट्टी टाकून ऐकत असे आणि नंतर वाचत असे त्याच कालावधीत वस्तुंच्या उत्पादनावरील कर आपल्या सरकारने त्याच प्रमाणात का कमी केले नाहीत भारतात निर्मित वस्तु पेक्षा आयात वस्तु स्वस्त होऊ देण्या मागील आपली भूमिका आजतागायात मला व्यक्तीशः समाधानकारकपणे उलगडलेली नाही.
याच सुमारास परदेशातील घड्याळे, कॅसेट प्लएअर हे देशी उत्पादना पेंक्षा कमी किमतीत मिळत असत आणि असे का मला कळत नसे.

In reply to by नाखु

माहितगार 24/11/2016 - 16:46
'हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनीक्स वस्तुंच्या उत्पादनाकडे लक्ष द्यावयास हवे होते' ह्या बद्दल पी. चिदंबरंमांनी २०१४ मध्ये केव्हातरी कबूली दिली हे इथे लक्षात घ्यावयास हवे. तसे लक्ष्य न दिल्याचे माप मनमोहन सिंगांनतंर लगोलग पी. चिदंबरमांकडे जावयास हवे कारण मनमोहन सिंगा नंतर (९६-९७) अर्थमंत्री पद चिदंबरमाम्च्या गळ्यात आले होते. २००४ ते २०१४ पुन्हा त्यांच्या गळ्यात होते.

In reply to by नाखु

माहितगार 24/11/2016 - 16:48
खाली मिल्टनचाही अभ्यासपूर्ण प्रतिसाद आवडला, मिल्टना प्रतिसाद खरेतर कुणीतरी राज्यसभेत जरुर वाचून दाखवावयास हवा.

In reply to by नाखु

माझे वडील फिलिप्स इंडिया या कंपनीत कामाला होते आणि पुण्यात भोसरीमधे बर्‍याच म्युझिक सिस्टीमचे उत्पादन चालायचे. इतकंच नव्हे तर तिथे ईओयु मधून बाहेर निर्यातीसाठी उत्पादन पण होत असे. २००१ ते २००४ मध्ये त्यात झपाट्याने घट झाली. आधी दिल्लीतले कोमेकर आणि नंतर चिनमधले अशा क्रमाने उत्पादन कमी होत गेले आणि फिलिप्सने फॅक्टरी भाग पाडून जॅबिल आणि रहेजा बिल्डरला विकली. अजूनही ती बंद पडलेली फॅक्तरी आहे तिथे. वडीलांनी व्हीआरएस् लागल्यावर २००५ साली स्वेच्छानिवृत्ती घेतली नाहीतर त्यांना गुरुग्राम ला पठवले असते. त्या अनुषंगाने हे ही आठवले.

मिल्टन 24/11/2016 - 16:32
हा धागा काढल्याबद्दल माहितगार साहेबांचे आभार. चर्चा रंगेल त्याप्रमाणे इतर मुद्द्यांवर लिहितोच पण मनमोहनसिंगांच्या भाषणातला एक मुद्दा मात्र मला चांगलाच खटकला आहे त्याविषयी आता लिहितो. मनमोहन म्हणाले: “The government tells us that there will be distress in the short term but national interest will be served in the long term. I am reminded of Keynes who said ‘in the long run, all of us are dead". नोटाबंदीच्या निर्णयामुळे शॉर्ट टर्ममध्ये होणारा त्रास हा लॉन्ग टर्ममध्ये होणार्‍या फायद्यापेक्षा बराच जास्त आहे त्यामुळे या निर्णयाला विरोध असेल तर मला हा मुद्दा मान्य नसला तरी परमतसहिष्णुता म्हणून त्यांचे म्हणणे तत्वतः ऐकून घेता येईलच. पण मनमोहन म्हणत आहेतः "I am reminded of Keynes who said ‘in the long run, all of us are dead". त्यांनी हा मुद्दा मांडला याचे खरोखरच आश्चर्य वाटत आहे. जॉन मेनार्ड केन्सने ‘in the long run, all of us are dead' हे खूपच वेगळ्या परिस्थितीत म्हटले होते.अ‍ॅडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जॉन स्टुअर्ट मिल इत्यादींच्या प्रभावाखालील 'क्लासिकल इकॉनॉमिस्टस' चे म्हणणे होते की १९२९ मध्ये आलेल्या महामंदीविरूध्द सरकारने काहीच पावले उचलायची गरज नाही. कारण 'in the long run' सगळ्या गोष्टी ठिक होतील. हे मत बनले त्या काळातील परिस्थितीला अनुसरून ते योग्यच होते. म्हणजे क्लासिकल इकॉनॉमिस्ट्सच्या मते अर्थव्यवस्थेत मंदी येते कामगारांची पगाराची अपेक्षा वाढली की. तसे झाल्यास उद्योग नोकर्‍यांचे प्रमाण कमी करतात आणि बेकारी वाढते. त्यामुळे कामगारांची पगाराची अपेक्षा आपोआप कमी होते आणि त्यामुळे नव्या नोकर्‍या वाढतात आणि त्यातून बेकारी कमी होते आणि मंदीही आपोआप कमी होते. म्हणजे मंदी कमी करण्यासाठी काहीही प्रयत्न करायची गरज नसते तर in the long run सगळे काही ठिक होते. अ‍ॅडम स्मिथचा काळ होता १७७५ च्या सुमारासचा, डेव्हिड रिकार्डो त्यानंतर ५० वर्षांनंतर तर जॉन स्टुअर्ट मिल १८५०-६० च्या सुमारासचा. त्यावेळची परिस्थिती लक्षात घेता ते म्हणणे योग्यही होते. पण नंतरच्या काळात यांत्रिकीकरण आणि बँकिंग या दोन्हींचा विस्तार झाला. त्या परिस्थितीत काहीही न करता in the long run सगळे काही ठिक होईल या भरवशावर हातावर हात ठेऊन बसणे योग्य ठरणार नाही हे त्याकाळच्या क्लासिकल इकॉनॉमिस्टच्या प्रभावाखालच्यांना लक्षात आले नाही. किंबहुना अमेरिकेचे अध्यक्ष हर्बर्ट हूव्हरही 'prosperity is around the corner' हेच आश्वासन देत होते. त्याला उद्देशून जॉन मेनार्ड केन्सने 'in the long run we all are dead' असे म्हटले होते. म्हणजे केन्सच्या मते सरकारने मंदी दूर करायला प्रयत्न करणे गरजेचे होते. म्हणजेच सरकारने हातपाय मारणे गरजेचे होते. आपले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणत आहेत की "“The government tells us that there will be distress in the short term but national interest will be served in the long term. I am reminded of Keynes who said ‘in the long run, all of us are dead". याचा अर्थ माझ्यासारख्या सामान्यांनी काय घ्यावा? जर का ‘in the long run' आपण सगळेच मरणार असू तर सरकारने long run साठी काहीही करायचे नाही का? म्हणजे त्याच न्यायाने शॉर्ट रनमध्ये अडचण सहन करून जर लॉन्ग रनमध्ये फायदा होऊ शकेल अशी कुठचीच गोष्ट करायला नको का? म्हणजे शिक्षण, आरोग्यसेवा सुधारण्यावरही भर द्यायला नको. कारण त्यातून होणारा फायदा long run मध्ये होईल आणि तोपर्यंत आपण सगळेच मेलेलो असू. मनमोहन सिंगांचे हे मत काही पटले नाही.

In reply to by बोका-ए-आझम

अमर विश्वास 24/11/2016 - 17:41
If we don’t act now, ‘in the long run, all of us are dead’ आपल्या पंतप्रधानांनी कृती तर केली आहे लॉन्ग रन मध्ये कोण कोण डेड होतात ते कळेलच

In reply to by मिल्टन

विशुमित 24/11/2016 - 17:43
तुमचा म्हणणं मान्य पण या भाषणातील मनमोहनसिहांचं हे वाक्य मला जास्त ट्रिगर झालं And I say so with all responsibilities, that we do not know what will be the final outcome. फायनल औटकॉम काय असेल हे खरंच सरकारला माहित आहे का? कारण डेमॉनिटिसशनला कोणीच विरोध करत नाहीये, विरोध फक्त अंमलबजावणी ला होत आहे.

In reply to by विशुमित

मिल्टन 24/11/2016 - 17:54
And I say so with all responsibilities, that we do not know what will be the final outcome.
फायनल आऊटकम खात्रीने माहित असेल असे प्रसंग खरोखरच कुठल्याही जबाबदारीच्या पदांवरून निर्णय घेताना असतात का हाच प्रश्न आहे. अशा प्रसंगी नक्की काय होईल हे पूर्णपणे माहित नसले तरी आपला निर्णय अंततः हिताचा असेल ही खात्री असेल तर कितीही विरोध झाला किंवा कितीही अडचणी आल्या तरी तो निर्णय पुढे रेटायची हिंमत पाहिजे. स्वतः मनमोहनसिंगांना हे सांगायची गरजच नाही कारण त्यांच्यावरही ते अर्थमंत्री असताना 'आय.एम.एफ चे एजंट' वगैरे आरोप होत असतच तरीही आपला निर्णय देशाच्या हिताचा आहे हे कन्व्हिक्शन त्यांच्याकडे होते आणि त्यामुळे कितीही विरोध झाला तरी ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. आज मोदीही तेच करत आहेत. बहुदा मनमोहनसिंगांनी भाषण 'काँग्रेस पक्षाचा नेता' या 'हैसियत' मध्ये केले असावे अन्यथा 'फायनल आऊटकम काय' हे माहित नाही अशाप्रकारचे वक्तव्य त्यांनी केले नसते.

In reply to by मिल्टन

बहुदा मनमोहनसिंगांनी भाषण 'काँग्रेस पक्षाचा नेता' या 'हैसियत' मध्ये केले असावे
सहमत! शिवाय या अशा प्रकारच्या भाषणासाठी त्यांना निवडले गेले असावे का(स्वच्छ प्रतिमेचा वापर करण्यासाठी)?

In reply to by मिल्टन

मारवा 24/11/2016 - 19:57
संदर्भ संपन्न प्रतिसाद ! सिंपली सुपर्ब !!!!!!!!!!!! हे माहीत नसते तर वरील विधान वेगळ्याच अर्थाने बघितले गेले असते. हे तर तुमच्यामुळे केवळ माहीत झाले.

In reply to by मारवा

मारवा 24/11/2016 - 20:07
खरीखोटी माहीत नाही पण रोचक आहे नीट आठवत नाही आठवणीच्या भरवशावर मन्सुर या संताला दगडाने ठेचण्याची शिक्षा दिली जात होती. कारण त्याने "अनलहक" मी च तो आहे ईश्वर आहे अशा अर्थाचं ईशनिंदा करणार विधान केलेलं होत. त्यावेळेस त्याचा एक शिष्य होता नाव नीट आठवत नाही. तर सर्व लोक मन्सुर ला दगड मारत होते. तेव्हा मन्सुर ला त्याचे काहीच वाटले नाही तो शांतपणे सगळे सहन करत होता. मग या शिष्याने लोकदबावाला घाबरुन आपण ही लोकांच्या बरोबर आहोत हे दाखवण्यासाठी एक फुल की दगड मन्सुरला मारुन फेकले. हे पाहुन मात्र मन्सुर रडु लागला. लोकांना आश्चर्य वाटले की हा इतक्याने का रडला तर मन्सुर म्हणाला की इतर जे दगड मारत होते त्यात त्यांचा दोष नाही कारण त्यांना माहीतच नाही त्यांना मुळातच ज्ञान नाही म्हणुन त्यांच्या अज्ञानातुन आलेल्या कृत्याचे काही वाटत नाही. मात्र तु तर माझा शिष्य होतास व तुला तर सत्य माहीत आहे व हे माहीत असुनही तु माझ्यावर दगड/ का फुल उचलुन मारलास त्यामुळे तुझ्या या कृत्याने मात्र मी नक्कीच दुखी झालो व त्यामुळे रडत आहे असे काहीसे. इथे मनमोहन सिंगांना केन्स च्या विधानामागील संदर्भ माहीत असुनही तो त्यांनी जाणीवपुर्वक चुकीचा मांडला हे त्यांच्यासारख्या अर्थतज्ञाला शोभत नाही हे नक्की.

In reply to by मिल्टन

कोळसा घोटाळ्यात मनमोहनसिंगांचे नाव आले आणि त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्यानंतर लगेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना बोलवून एक मिटिंग केली. त्यानंतर सिंग यांचे सार्वजनिक स्थानांवरचे आणि राज्यसभेतले बोलणे त्यांचे स्वतःचे, म्हणजे एका सुविद्य शिक्षकासारखे, किंवा आंतरराष्ट्रिय स्तरावर काम केलेल्या जाणकार तज्ञासारखे खचितच वाटत नाही. ते इतर कोणीतरी लिहून, त्यांची एखादी दुखरी नस पकडून, त्यांना बोल्ण्याची सक्ती करत असावे असा संशय घेण्यास जागा आहे. अश्या वेळांना, ते पूर्वीच्या काळात बोलत नव्हते, तेच चालू ठेवले असते तर फार चांगले झाले असते, असे वाटते. (अ) आपल्या पंतप्रधानकाळात इतके घोटाळे होत आहेत आणि / किंवा बाहेर येत असताना व (आ) त्यासंबंधी "सगळेच बोलता येत नाही, काही राजकिय सक्ती (कंपल्शन्स) असतात असे शब्द भर वार्ताहरपरिषदेत तोंडूने येत असतानाच्या परिस्थितीत; एखादा उत्तम भूतकाळ असलेला अभिमानी माणूस राजिनामा देवून मंत्रीपरिषदेतून (किंबहुना राजकारणातून) बाहेर पडला असता. ते मनमोहन सिंग यांना का जमले नाही, हा यक्षप्रश्न आहेच. नव्वदीच्या दशकात याच माणसाबद्दल देशी-परदेशी लोकांमध्ये अतीव आदराने बोलताना छाती अभिमानाने भरून यायची ! नामवंत आंतरराष्ट्रिय अर्थतज्ञ, उत्तम ब्युरोक्रॅट आणि कल्पक अर्थमंत्री असलेल्या या माणसाची पंतप्रधानपद स्विकारल्यापासून चालू असलेली सततची अधोगती मन विषण्ण करून जाते. :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कहर आहे हा प्रतिसाद. लोकांना चांगल्या अभ्यासू धाग्यांवर conspiracy theories मांडून विघ्न आणण्यात काय आनंद मिळत असावा? :(

In reply to by फेदरवेट साहेब

१. सत्य कटू असते, विषेशत: ज्यांना ते गैरसोईचे असते त्यांना ! :) २. सत्याकडे डोळेझाक करून "अभ्यासू" धागा किंवा चर्चा शक्य नसते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मनमोहन पंतप्रधान असताना त्यांना कंट्रोल केले जात असे हे जगजाहीर सत्य आहे, त्यात नाकरण्यासारखे काहीच नाही. कारण त्याचे सबळ पुरावे अन मासले उपलब्ध आहेत. त्यांचे हल्लीचे भाषण रीग केल्याचे आहेत का तुमच्याकडे पुरावे ? का नुसते 'मला अशी शंका आहे' 'संशय घ्यायला जागा आहे' म्हणत बायस्ड मते मांडता आहात? बरं आता धाग्याबद्दल बोलायचे झाले तर, अर्थशास्रातले अंदाज अन समीकरण , प्रमेय आधारित आडाखे वेगळे अन अंदाजेपंचे दाहोदरसे आपली मते, अभ्यासकी थाटात मांडणे वेगळे. आता थोडे तुम्ही अगदी काहीतरी अर्थगर्भ लिहिल्याच्या थाटात, जी वरती दोन वाक्यं झोकात टंकली आहेत त्याच्याबद्दल बोलतो. बरोबर, सत्य गैरसोयीचे असतेच. पण ते गैरसोयीचे सत्य खरोखरीचेच सत्य आहे हे सिद्ध करायला पुरावे लागतात, अन्यथा त्याला शुद्ध लोणकढी तरी म्हणतात किंवा 'Conspiracy Theory' तरी म्हणतात. मग त्याला सत्याची व्हॅल्यु सुद्धा उरत नाही अन त्याने कोणाची गैरसोय सुद्धा होऊ शकत नाही. मनमोहन मुका होता/ कंट्रोल्ड कळसूत्री बाहुली होता, ह्या सत्यात मला कवडीचीही गौरसोय नाही, फक्त तुम्हाला एक खोचक प्रश्न विचारल्यामुळे तुमची काय तडफड झाली अन तुम्ही कुठल्या अंदाजाने माझी गैरसोय झाल्याचा सोईस्कर निष्कर्ष काढलात हे मात्र कोडे आहे. दुसरा मुद्दा तसाच गैरलागू आहे, पहिले ते सत्य घासून झळाळून सिद्ध करा अन ती conspiracy theory नसल्याचे दाखवून द्या मग त्याच्याकडे दुर्लक्ष झाले आहे की नाही किंवा अभ्यासू धागा अन चर्चा करायची १२००१ सूत्रे वगैरे बोलूयात :)

In reply to by फेदरवेट साहेब

शांत गदाधारी भीम शांत ! :) सभ्यपणे समतोल चर्चा करून सत्याचा शोध घ्यायचा असेल तर असे रागावून चालत नाही. तसेच, आपले म्हणणे मांडण्याआधी त्या विषयावर अगोदर झालेल्या चर्चेची पार्श्वभूमी आणि त्यात मांडलेल्या मुद्द्यांची दखल घेणे आवश्यक असते. तरच तो संवाद होईल, अन्यथा वितंडवाद होईल. असो. चला तर, पुराव्यांसह सत्य घासून झळाळून सिद्ध करायचा प्रयत्न करूया... १. सद्य चर्चेत कोणताही आरोप करण्याअगोदर... अ) डॉ मनमोहसिंगांचे भाषण स्वतः स्वच्छ मनाने (पक्षी : प्रामाणिकपणे / कोणत्याही चष्म्याशिवाय) पाहिले/ऐकले असेणे जरूर आहे, (चर्चा या मुख्यतः भाषणाच्या संदर्भात चालली असल्याने, ते पाहिले/ऐकले नसल्यास, अश्या व्यक्तीने केलेल्या कॉन्स्पिरसी थियरीच्याच काय पण इतर कोणत्याच टिप्पणीला काहीच अर्थ असणार नाही. ते भाषण सोईसाठी खाली दिले आहे...) आणि आ) गेल्या आठवड्याभरात मिपावर या आणि इतर लेखांवर मी मनमोहन सिंगांबद्दल लिहिलेले त्यांच्या शिक्षणाबद्दलचे, अर्थशास्त्रीय ज्ञानाबद्दलचे आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दलचे बद्दलचे, नव्हे तर त्यांच्या भारतातील आरबीआयचे गव्हर्नर, अर्थमंत्री इत्यादी कारकीर्दीबद्दलचे भारतीय म्हणून अभिमान वाटणारे प्रतिसाद वाचले असतील तरच माझ्याबद्दलच्या शेर्‍यांना काही अर्थ असेल. (हे सर्व लेखन इथेच मिपावर आहे व सर्व मिपाकरांना उपलब्ध होते/आहे/लेख मिपावर असेपर्यंत राहील. आता, ते वाचले नाहीत आणि/ किंवा वाचायची गरज नाही म्हटले तर चर्चेची व लेखनाची पार्श्वभूमी नीट माहीत करून न घेता आरोप करत सुटला आहात हे सिद्ध होईल.) २. चला आता इतक्या पार्श्वभूमीवर, आपण डॉ मनमोहनसिंगांनी त्यांच्या भाषणात मांडलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांचे एक एक करत विश्लेषण करूया... मॉन्युमेंटल मिसमॅनेजमेंट अबाउट विच देअर इज नो टू ओपिनियन्स इन द कंट्री अ‍ॅज अ होल. नागरिकांना काही प्रमाणात त्रास झाला / होत आहे / काही काळ होईल याबद्दल कोणाचेच दुमत नाही. काही पक्षांनी दिलेल्या अराजकाच्या धमक्यांना आणि चालवलेल्या आंदोलनांना जनतेचा फारसा प्रतिसाद नाही. देशात कोणत्याही प्रकारची अनागोंदी माजलेली नाही, हे स्पष्ट सत्य आहे. त्यामुळे... * "मॉन्युमेंटल मिसमॅनेजमेंट" हे शब्द वरच्या त्रासाच्या स्तराकरिता करिता चूक आहेत. उच्चविद्याविभूषित, सुसंस्कृत आणि मोठ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अनुभवाची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीकडून अशी अतिशयोक्ती (तीही संसदेच्या भाषणात) आश्चर्यकारक, धक्कादायक व संशयास्पद ठरते. * ज्यांच्या अधिकारात आणि कारकीर्दीत (पक्षी : अ‍ॅडमिनिस्ट्र्शन / मॅनेजमेंट मध्ये) अनेक लाख कोटीचे CWG घोटाळा, 2G घोटाळा, कोळसा घोटाळा, इत्यादी "मॉन्युमेंटल मिसमॅनेजमेंट" घडल्या आहेत अश्या व्यक्तीच्या तोंडून हे अतिशयोक्तिपूर्ण शब्द येणे म्हणजे कांगावखोरपणाचा कळस समजायला हरकत नाही. * शिवाय, बहुसंख्य नागरिकांनी या कारवाईचे स्वागतच केले आहे आणि होणारा त्रास सहन करायची तयारी दाखवलेली आहे हे माध्यमांत दिसते आहेच. मग "देअर इज नो टू ओपिनियन्स इन द कंट्री अ‍ॅज अ होल." हे ढळढळीत असत्य का बोलले गेले ? हे शब्द डॉ सिंग यांच्यासारख्या सालस माणसाच्या मनातले असणे शक्य नाही. इन द लाँग रन ऑल ऑफ अस आर डेड हे जगप्रसिद्ध वाक्य कोणत्या मूळ संदर्भात बोलले गेले, त्याचा अर्थ काय होतो व ते इथे विपरित अर्थाने वापरले जात आहे, हे सुविद्य असलेल्या डॉ मनमोहन सिंग यांना कळले नसावे असे मला तरी वाटत नाही, कारण, तसे म्हणणे त्यांच्या ज्ञानाचा अपमान होईल. तरीही ते त्यांना बोलावेसे वाटले. यामागे, "लोकांना काय कळते, एखादे भारदस्त वाटणारे इंग्लिश वाक्य फेकून त्या वेळी मुद्दा जिंकला की झाले" ही राजकारणी चलाखी दिसते. ती डॉ सिंग यांच्या सुविद्य आणि व्यक्तीगत भिडस्त स्वभावाशी विसंगत आहे. या वाक्याच्या संदर्भात, दुसरा मुद्दा असा: "आपल्या आजच्या कृती केवळ तत्कालिक फायद्याकरताच करायच्या नसून, देशाचा गाडा चालवताना त्यातल्या बर्‍याचश्या कृती, आपण मेल्यावरही, पुढच्या अनेक पिढ्यांचा दीर्घकालीन फायदा डोळ्यासमोर ठेवून, पुढच्या अनेक दशकांसाठी, करायच्या असतात." उच्च प्रतीचे अर्थतज्ज्ञ असलेल्या व अनेक राष्टीय व आंतर्राष्ट्रीय प्रशासकीय व राजकीय पदे भूषवलेल्या डॉ सिंग यांना हे देशाच्या व्यवस्थापनातील साधे कळत नाही, हे समजणे धारिष्ट्याचे व चूक होईल. अजून विश्वास बसला नसेल तर सर्वसामान्य माणुस १०, १५, २० वर्षांनी फळे धरणारी झाडे का लावतो, असा प्रश्न स्वतःला विचारा.इतका कोता विचार फक्त तात्कालीक स्वार्थ मनात असलेला राजकारणीच करू शकतो. डॉ सिंग नाही. व्हॉट हॅज बिन डन विल इरोड पीप्ल्स कॉन्फिडन्स इन बँकींग अँड करन्सी सिस्टींम जमिनीवरची परिस्थिती याच्या एकदम उलट आहे. ज्यांच्याबद्दल ते बोलत आहेत त्या सामान्य माणसाच्या तोंडून असे काही ऐकू येत नाही. तेव्हा हा तद्दन खोटा जावईशोध डॉ सिंग यांचा नसून कोण्या चलाख राजकारण्याने घुसडलेले वाक्य आहे असे म्हणायला जागा आहे. लोकांना बँकेत पैसे ठेवायला परवानगी आहे आणि काढायला नाही. ही तरतूद काही थोड्या काळासाठी आहे, कायमची नाही हे डॉ सिंग याना नक्की माहिती आहे. व तसे का केले (काळाबाजार्‍यांना इतर अनेकांना हाताशी धरून आपला काळा पैसा पांढर्‍या पैशात बदलता येऊ नये यासाठी केले आहे) हे सर्वसामान्य माणसाला माहीत असलेले लॉजिक डॉ सिंग यांना माहीत नाही असे म्हणणे त्यांच्या बुद्धीमत्तेचा अपमान करण्यासारखे होईल. अर्थातच, हे दिशाभूल करणारे वाक्य त्यांनी नाही तर इतर कोणी अट्टल राजकारण्यानेच लिहिलेले असावे असे म्हणणे खोटे होणार नाही. हे दुसर्‍या कोणत्याच देशात झालेले नाही. * जगावेगळ्या समस्येला उतारा म्हणून जगावेगळी कारवाई करणे आवश्यक असते, हे १९९०च्या भारतातील अर्थक्रांतीचे शिल्पकार असलेल्या डॉ सिंग यांना माहीत नाही ? मग, त्यांनी त्या वेळेस बनवलेल्या आणि अस्तित्वात आणलेल्या काही क्रांतीकारी कारवाया केवळ कोणाची कॉपीच होती काय ? आपल्याला ज्या कारवायांनी जगप्रसिद्धी मिळवून दिली त्या डॉ सिंग इतक्यात विसरले? तेव्हा हे वाक्य त्यांचे असणे शक्यच नाही. * जगावेगळे यश मिळवायला जगाची कॉपी करून भागत नाही तर जगाने आपली कॉपी करावी असे काही करावे लागते. हे व्यवस्थापनशास्त्रातले मूलभूत तत्त्व डॉ सिंग यांना माहीत नाही असे म्हणणे चूक होईल. हे सुद्धा कोण्या इतराने दडपून दिलेले वाक्य असण्याचीच दाट शक्यता आहे. या कारवाईने भारताचे जीडीपी २% ने खाली जाईल व हे अंडरएस्टीमेट आहे. याकरिता डॉ सिंग यांच्यासारख्या जगन्मान्य अर्थतज्ज्ञाने काहीतरी ठोकताळे द्यायला हवे होते, ते त्यांनी दिले नाहीत. मग हा तर एकदम हवेत बाण मारण्याजोगा अशास्त्रीय आरोप झाला. हे करणे सिंग यांच्यासारख्या जागतिक स्तराच्या अर्थतज्ज्ञाला नक्कीच अत्यंत कठीण (ऑकवर्ड) वाटेल. कारण जे इतर अर्थतज्ज्ञ पुराव्यांसह बोलत आहेत त्यांच्या मते, या कारवाईमुळे... * पूर्वी न वापरता लोकांच्या ताब्यात बंदिस्त असलेले काही लाख कोटी रुपये आता बँकेत जमा झाले आहेत / अजून होत आहेत. यातले खूपसे पैसे सरकारला प्रकल्पांसाठी आणि शेतकर्‍यांना, लहामोठ्या उद्योगांना व सर्वसामान्य जनतेला क्षकर्जे देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. पैशाची उपलब्धता वाढल्याने आत्ताच काही बँकांनी कर्जांवरील व्याजाचे दर कमी केले आहेत, भविष्यात बँकांत आवक वाढल्याने ते अजून कमी होतीझे सांगायला अर्थतज्ञाचीही गरज नाही. * बँकेत ठेवलेल्या पैशांचे नागरिकांना व्याज मिळेल. घरात ते पैसे व्याजाविना पडून होते. म्हणजे नागरिकांचाही आर्थिक फायदाच होईल. * सरकारचे उत्पन्न कर व दंडाच्या पैशांमुळे लक्षणिय प्रकारे वाढणार आहे : यात केंद्रीय सरकारकडे अतिरिक्त जमा होत आहेच, पण राज्यांचे कर, म्युनिसिपालिटींचे कर व वीज कंपन्यांची देणी यांच्या सद्य बिले व भूतकाळातल्या तुंबलेल्या बाक्या यांची मोठ्या (अनेक दशकोटी) प्रमाणात वसुली झाली आहे / होत आहे. * अशा रितीने जमा झालेली रक्कम देशाच्या अर्थसंकल्पातील तूट लक्षणीयरित्या भरून काढेल, काहींच्या तज्ज्ञांच्या मते ती पूर्ण तूट भरून काढू शकेल. शिवाय आता कराच्या जाळ्यात सापदलेले आलेले अनेक (पूर्वी कर भरणे टाळणारे बरेच, लक्षावधी किंवा काही कोटी) लोक भविष्यातही कर भरत राहतील व सरकारी उत्पन्न वर्षानुवर्षे वरच्या स्तरावर ठेवतील. * या धक्क्यामुळे भारतातील जनता पैशांच्या डिजीटल व्यवहारांकडे व पर्यायाने स्वच्छ अर्थव्यवस्थेकडे जायला मदत होईल... अर्थातच, इतर अनेक उपाय करून दिवसेदिवस भारताची अर्थव्यवस्था सबळ करण्याला मदत होईल. हे सर्व जाणल्यावर, तत्कालिक धक्क्यानंतर या सगळ्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर लक्षणिय चांगला परिणाम होईल हे सांगायला अर्थतज्ज्ञाचीही गरज नाही... आणि डॉ सिंग तर जागतिक स्तरांचे अर्थतज्ज्ञ आहेत. अर्थात हे वाक्यही दुसर्‍या कोणाचे तरी असायलाच हवे, नाही का ? एव्हरी डे, बँकिंग सिस्टिम कम्स विथ सम न्यू रूल्स ऑर मॉडीफिकेशन्स * प्रकल्पव्यवस्थापन करतानाच नव्हे तर आपल्या नेहमीच्या जीवनातही उत्तम प्रकारे प्लॅन केलेल्या मोठ्या कामातही (उदा. सहलीला जाणे, मोठा कार्यक्रम आयोजित करणे, इ) काही सीमा (कन्स्ट्रेन्स) असतात व अनपेक्षित घटना घडून बाधा येते. तेव्हा प्रकल्प चालू असताना त्यात येणार्‍या बाधा दूर करणारे बदल किंवा अधिक संसाधनिक मदत करणे हे सर्वसामान्य तत्त्व आहे. तसे न करता सरकारने लोकांना होणारा त्रास हातावर हात ठेवून बघत रहावे (आणि पर्यायाने आम्हाला सरकारची नाचक्की करण्याची संधी द्यावी) असे डॉ सिंग यांना म्हणायचे आहे काय? नक्कीच नाही, कारण ते स्वतःहून असे म्हणाले नसते. किंबहुना, त्यांना हे पण माहीत होते की, कारवाईच्या नियमांत लोकांचा त्रास दूर करण्यासाठी जे बदल सरकारने आतापर्यंत केले आहेत त्यापैकी अनेक बदल विरोधी पक्षांनी दिलेल्या सूचनांवरून केले गेले आहेत. याशिवाय, या कारवाईत जसजशी उद्यिष्ट्ये आवाक्यात येत जातील तसतश्या सर्वसामान्य जनतेसाठीच्या सोयीसवलती वाढत जातील व गुन्हेगार लोक गैरफायदा घेऊ शकतील असे नियम अधिकाधिक कडक होत जातील. हे मूलभूत तत्त्व डॉ सिंग यांच्यासारख्या प्रशासकीय जाणकाराला माहीत असणारच. खरे माहीत असले तरी दडपून खोटे बोलणे डॉ सिंग यांना जमणार नाही असे मला वाटते, अर्थात हे शब्द इतर कोणा चलाख माणसाचे असावेत. कोऑपरेटिव्ह बँकांना या कारवाईत सामील केले गेले नाही, ते करावे पूर्व आरबीआय गव्हर्नर असलेल्या डॉ सिंग यांना कोऑपरेटिव्ह बँकांच्या इतिहासाबद्दल आणि सद्यस्थितीबद्दल इतर कोणी फारसे सांगायची गरज नाही. तेव्हा त्या बँकांना का सामील केले गेले नाही हे सद्य आरबीआय गव्हर्नरइतकेच चागले त्यांनाही माहिती आहेच. त्यामुळे, हे वाक्य उच्चारताना त्यांना प्रचंड कुचमुचल्यासारखे (ऑकवर्ड) झालेले स्पष्ट दिसत होते. याविरुद्ध त्यांच्या मागे व आजूबाजूला हा मुद्दा बोलला गेला याबाबत माना हलवून व बाके वाजवून आनंद व्यक्त केला गेला ! सगळेच उघड गुपित !!! अशा अर्थाची सूचना डॉ सिंग स्वतःहून करतील असे त्यांचे कट्टर विरोघकही म्हणणार नाहीत. ऑर्गॅनाईझ्ड लूट अँड लिगॅलाईझ्ड प्लंडर * ज्यांच्या अधिकारात आणि कारकीर्दीत (उर्फ अ‍ॅडमिनिस्ट्र्शन / मॅनेजमेंट मध्ये) अनेक लाख कोटीचे CWG घोटाळा, 2G घोटाळा, कोळसा घोटाळा, इत्यादी मॉन्युमेंटल मिसमॅनेजमेंट घडल्या आहेत अश्या व्यक्तीच्या तोंडून हे अतिशयोक्तिपूर्ण शब्द येणे म्हणजे कांगावखोरपणाचा कळस समजायला हरकत नाही. दुसर्‍याने लिहिलेले इतके विपर्यासपूर्ण शब्द बोलायला त्यांना खूपच जड गेले असणार, यात वाद नाही. * हे वाक्य ते बोलणार असे अगोदरपासून माहीत असल्यासारखी विरोधी बाजूने "एssssssss" असा आवाज काढून बाके वाजवली गेली. "नव्वदीच्या दशकात याच माणसाबद्दल देशी-परदेशी लोकांमध्ये अतीव आदराने बोलताना छाती अभिमानाने भरून यायची !" असे मी मिपावर व इतर चर्चेतही सतत लिहीत/बोलत असतो. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीबद्दल तसे बोलू शकत नाही याचे मला प्रचंड दु:ख आहे. पण, तसे का करता येत नाही याची कारणे जगजाहीर आहेत. डॉ सिंग व्यक्तिगतरीत्या सज्जन व्यक्ती आहेत व असे करण्याइतके "मुरलेले" राजकारणी नाहीत असे मला वाटते. त्यामुळेच ते पंतप्रधान (कागदावर तरी सर्वोच्च अधिकारी) असूनही घोटाळ्यांसंबंधीच्या पत्रकारपरिषदेत "काही गोष्टी राजकिय कंपल्शन्समुळे कराव्या लागतात" असे म्हणून गेले. एखादा कसलेला राजकारणी झोपेतही तसे म्हणाला नसता. त्यामुळे ही सर्व वाक्ये इतर कोणी लिहिली असावीत यात संशय नाही. तसे पाहिले तर काही पक्षांत इतरांनी लिहिलेली भाषणे वाचण्याची प्रथा आहेच. तेव्हा हे एक उदाहरण काही अनपेक्षित किंवा धक्कादायक नाही. धडाडीचे भाषण करण्यासाठी डॉ सिंग प्रसिद्ध नसले तरी हे भाषण करताना त्यांचा दबलेला आवाज, अडखळत बोलणे व एकंदर ऑकवर्ड देहबोली का असावी याचा कयास बांधणे तितकेसे कठीण नाही. हे भाषण सर्वसामान्य नव्हते. कारण, नोटा रद्द करण्याच्या अनपेक्षित व धाडसी कारवाईमुळे सद्या भारताकडे सर्व जगाचे, विशेषतः जागतीक स्तराच्या राजकारण्यांचे आणि अर्थतज्ज्ञाचे लक्ष आहे. त्यामुळे भाषण करताना "मी आत्ता जे बोलतो आहे त्यामुळे माझी, या वयात, माझ्या सहाध्यायांमध्ये, काय पत राहील?" हा प्रश्न डॉ सिंग यांना सतावत नसला तरच आश्चर्य. आता इतके घासून झळाळी दिल्यानंतर, तुम्हाला माझे खालील मत (ज्याबद्दल तुम्हाला आक्षेप होता) अत्यंत दु:खद मनाने दिलेले आहे आणि सत्य वस्तुस्थिती व सबळ तर्कांवर आधारलेले आहे हे पटावे... ते वाचण्याच्या सोईसाठी इथे परत देत आहे... कोळसा घोटाळ्यात मनमोहनसिंगांचे नाव आले आणि त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्यानंतर लगेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना बोलवून एक मीटिंग केली. त्यानंतर सिंग यांचे सार्वजनिक स्थानांवरचे आणि राज्यसभेतले बोलणे त्यांचे स्वतःचे, म्हणजे एका सुविद्य शिक्षकासारखे, किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केलेल्या जाणकार तज्ज्ञासारखे खचितच वाटत नाही. ते इतर कोणीतरी लिहून, त्यांची एखादी दुखरी नस पकडून, त्यांना बोलण्याची सक्ती करत असावे असा संशय घेण्यास जागा आहे. अश्या वेळांना, ते पूर्वीच्या काळात बोलत नव्हते, तेच चालू ठेवले असते तर फार चांगले झाले असते, असे वाटते.

(अ) आपल्या पंतप्रधानकाळात इतके घोटाळे होत आहेत आणि / किंवा बाहेर येत असताना व (आ) त्यासंबंधी "सगळेच बोलता येत नाही, काही राजकीय सक्ती (कंपल्शन्स) असतात असे शब्द भर वार्ताहरपरिषदेत तोंडून येत असतानाच्या परिस्थितीत; एखादा उत्तम भूतकाळ असलेला अभिमानी माणूस राजीनामा देऊन मंत्रीपरिषदेतून (किंबहुना राजकारणातून) बाहेर पडला असता. ते मनमोहन सिंग यांना का जमले नाही, हा यक्षप्रश्न आहेच.

नव्वदीच्या दशकात याच माणसाबद्दल देशी-परदेशी लोकांमध्ये अतीव आदराने बोलताना छाती अभिमानाने भरून यायची !

नामवंत आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञ, उत्तम ब्युरोक्रॅट आणि कल्पक अर्थमंत्री असलेल्या या माणसाची पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून चालू असलेली सततची अधोगती मन विषण्ण करून जाते. :(
अर्थात, कोणीही माझे मत पूर्णपणे मानणे, न मानणे हे प्रत्येकाच्या व्यक्तीगत विचारावर अवलंबून असेल. त्या लोकशाही हक्काबद्दल मला आदरच आहे. पण, डोळे गच्च मिटून किंवा एखादा चष्मा लावून सर्वांसाठी मोकळेपणाने उपलब्ध असलेल्या संस्थळावर काहीही आरोप करण्याने, मिपाकरांसमोर स्वतःचे काय काय उघड होईल, याची काळजी करणे लेखकासाठी फायद्याचे होईल, हे मात्र नक्की.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

वरच्या प्रतिसादातील ठळक केलेल्या शब्दांतील चुका डॉ सिंग समजून उमजून करतील हे म्हणणे त्यांचा व त्यांच्या अर्थतज्ज्ञ नात्याने असलेल्या पार्श्वभूमीचा किती मोठा अपमान असेल याची कल्पना करणे कठीण आहे. त्यामुळे ते मी करणार नाही. मात्र, काही कारणाने तात्कालीक राजकीय फायदा साधण्यासाठी त्यांच्याकडून असे काही वदवून घेणे तितकेसे कठीण नाही, याला त्यांचा गेल्या एक तपाचा भूतकाळ भक्कम पुरावा आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चौकटराजा 27/11/2016 - 09:49
खरे काय ते काळच सांगेल पण २ टक्के जी डी पी कमी होईल हा मनोहन सिंगांचा अंदाज देखील मला पुस्तकी वाटतो. बजाज होंडा सर्व कारखान्यात ५० दिवसात उत्पादन चालू आहे. शेतातील पिकाना हे अर्थशास्त्र काही समजत नाही ती वाढताहेत. ही जी डी पी चा संबंध शेतीसाठी पावसाशी तर उद्योगासाठी उत्तम औद्योगिक संबंधाशी आहे . दोन महिन्यात माणसांची पोटे काय विश्राम घेत आहेत काय? ..... काही ही हं ममो.....

In reply to by चौकटराजा

२ टक्के जी डी पी कमी होईल हा मनोहन सिंगांचा अंदाज देखील मला पुस्तकी वाटतो तो पुस्तकी अंदाज नसून धडधडीत चलाख राजकारणी दावा आहे. कारण त्यात फक्त खर्चाची बाजू धरली आहे आणि जमेची बाजू पूर्णपणे दुर्लक्षित केली आहे. पण खरेतर, माझ्या अंदाजाप्रमाणे जमाखर्चाचा इतका वरवरचाही विचार केला गेला नसावा. "कारण कोण त्याला आक्षेप घेणार आहे? आणि घेतला तरी आपले काय बिघडते (पक्षी : मतांवर परिणाम होणार नाही) ?" ही चलाख राजकारणी खात्री त्यामागे आहे. त्यामुळे, ही कृती डॉ सिंग यांच्यासारख्या तज्ज्ञाकरवी झाली असली तरी सरकारने त्या आरोपांना, वरवर धन्यवाद देवून, प्रत्यक्षात केराची टोपली दाखवली तरी कॉंग्रेसलाही त्याचे आश्चर्य वाटणार नाही. फार तर, हे भाषण संसदेच्या कायम नोंदीत असेल व नंतर कोणी त्याचा परत एकदा (विपर्यस्त) संदर्भ देऊन तात्कालील राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करेल, इतकेच त्याचे महत्व आहे. हे सगळे आरोप "एका जागतिक स्तरावर मान्यवर समजल्या जाणार्‍या भारतीय तज्ज्ञाची पत पणाला लावून, तिच्या आडोश्याने, निव्वळ एखादा बिनमहत्वाचा गुण मिळविण्यासाठी (पॉईंट स्कोअरिंग) केलेला वार आहे". ते शब्द लिहिणार्‍याला जरी ते शब्द बोलणार्‍याची जागतिक पत विचारात घ्याविशी वाटली नाही, तरी त्यामुळे जागतिक स्तरावर डॉ सिंग यांची विश्वासार्हता अजूनच कमी झाली आहे हे निश्चित. आर्थिक जगतात, जागतिक स्तरावर हाताच्या बोटावर मोजले जातील असे मोजकेच भारतीय, तज्ज्ञ म्हणून गणले जातात. त्यातल्या एकाची तात्कालीक स्वार्थाकरिता केलेली अशी शोकांतिका मन विषण्ण करणारी आहे.

महासंग्राम 24/11/2016 - 16:58
बाकी सगळं ठिके राजेहो, पण धाग्याच्या शीर्षकाची लांबी शब्दबंबाळ न ठेवता जरा लहान ठेवली तर समजायला पण सोप्प जाईल. नाहीतर माझ्यसारखे लोक्स फक्त टायटल वाचूनच पळतात.

In reply to by माहितगार

महासंग्राम 24/11/2016 - 17:11
इथे म्हणाल तर नोटबंदी : मनमोहनसिंग यांच्या टिकेतील चुका नोटबंदी गैरव्यवस्थापन माजी पंतप्रधानांची जबाबदारी काही चुकले असल्यास एकडाव माफी दयावी.विषय चांगला आहे केवळ नावाच्या कठीणपणाने लोकांनी दुर्लक्ष करू नये म्हणून भोचकपणा.

In reply to by महासंग्राम

माहितगार 24/11/2016 - 17:34
सर्व गोष्टी प्रत्येकाला सुचत नाहीत आणि शीर्षकाच्या लांबीच्या बाबतील मी खरेच कमी पडतो, आपल्या मदतयूक्त सूचनेसाठी अत्यंत आभारी आहे.

In reply to by महासंग्राम

मारवा 24/11/2016 - 20:10
कृपया स्टाईल इज मॅन हे ध्यानात ठेवावे. व वैशिष्ट्यांचा आदर करावा ही विनंती. आमची पुणेरी पगडी उद्या काढा म्हणाल अहो आमची स्टाईल है राव भावनाओ को समझो स्मिताली वाचावी

चौकटराजा 24/11/2016 - 19:29
मनमोहन सिंगानी नरसिंह रावाना पटवून मुक्त अर्थ्व्यवस्था आणली तीच मुळी नाईलाजाने. भारतातील उदधोग पती, शेतकरी हे जगाच्या सम्दर्भात नालायक ठरल्याने तो निर्णय घ्यावा लागला. त्याचे खापर मात्र सरकारी मालकीच्या कंपन्यांच्या अपयशावर फोडले या दोघानी.आपल्या उद्योग पतींकडे वा शेतकर्‍याकडे किती पेटन्टस आज आहेत ? मी समाजवादी विचाराचा आहे तरीही मिश्र अर्थ्व्यवस्थेचे महत्व मी जाणतो. आजही इंडियात रेलेवे च्या रूपाने भारत आहे याची मला जाणीव आहे. त्या बाजूला टाटा बजाज अंबानी यांचे कार्य महत्वाचे आहहे ते रोजगार निर्माते म्हणून. या तिघांकडे आंतरराष्त्रीय दर्जाची किती पेटंटस आहेत हे माझ्या लेखी महत्वाचे आहे. रोजगार काय डान्सबारचा मालकही न्रिर्माण करतो. सबब आजच्या प्रगतीचे फारसे श्रेय मी मनमोहन याना देतच नाही. आजच आर टी आय च्या एका चौकशीत २०११ ते १०११४ या काळात मोठा नोटांचे एकूण नोटातील प्रमाण पद्धतशीरपणे वाढविण्यात आली असे पुढे आले आहे. हा काळ कोण प्रधानमंत्रीपदी होते ते ज्ञात झाले की काळ्यापैशाचा खरा निर्माता कोण हे समजून येईल.

In reply to by ओम शतानन्द

नाखु 26/11/2016 - 16:25
इथेसाद्यंत आहे आपल्याला अपेक्षीत माहीती इथे डकवत आहे
नोटांमधली वाढ गंभीर देशातल्या अर्थव्यवस्थेत २८ ऑक्‍टोबर २०१६ रोजी १७,७७,०० कोटी रुपयांचं चलन होते (३१ मार्च २०१६ रोजी १६,४१,५०० कोटी रुपये). या चलनातली वाढ चिंतनीय होती. खालील तक्‍त्यात दिलेल्या माहितीचा अभ्यास केला, तर असं निदर्शनास येतं, की जवळजवळ ८६ टक्के चलनाची रक्कम या नोटा रद्द करून सरकारनं तूर्त गोठविली आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेस ‘ब्रेक’ लावला आहे- यात काळ्या पैशाचा समावेश आहे. भारताचं देशांतर्गत उत्पन्न २०१५-१६ या आर्थिक वर्षात ११३.५ लाख कोटी रुपये होतं, तर रद्द केलेल्या चलनाची देशांतर्गत उत्पन्नाशी असणारी टक्केवारी १२ टक्के आहे आणि ती अपेक्षेपेक्षा जास्त आहे. गेल्या पाच वर्षांत पाचशे रुपयांच्या चलनी नोटांमध्ये ७६ टक्के, तर एक हजार रुपयांच्या चलनी नोटांमध्ये १०९ टक्के वाढ झाली आणि ती बाब दखल घेण्यासारखी असल्याचे वित्त सचिवांनी स्पष्ट केलं आहे, यातच या नोटा रद्द करण्याचं मूळ कारण दडलेलं आहे, असं वाटतं
.

In reply to by ओम शतानन्द

चौकटराजा 28/11/2016 - 16:20
आता नाव आठवत नाही. चानलवर एका कॅशियरची मुलाखती सकट या संदर्भातील लढाई दाखविण्यात आली. त्याला मनमोहन यानी दाद दिली नाही. ते काम मोदीनी करून दाखविले. दरम्यान त्यानेच आर बी आय कडून ही माहिती मिळविली तिची टेबल्स सकट माहिती त्या चानलले दाखविली. पंण त्याचा दावा असाही आहे की मोदीनी ही बातमी अगोदर फोडली असावी म्हणून त्याने म्हणे आर बी आय गव्हरनर व मोदी यांचे विरोधी एफ आर आय करण्याचे ठरविले आहे.

संदीप डांगे 24/11/2016 - 19:39
विद्यमान पंतप्रधानानांनी घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीतल्या तृटींबद्दल कसं तरी ओढून ताणून चिमुटभर तरी जबाबदारी घ्याच असं माजी पंतप्रधानांना जबरदस्तीने म्हणणे काबिले तारिफ आहे. म्हणजे "नियोजन हुकलं ते माजी पंतप्रधानांमुळेच" असा वन लायनर वापरायला समर्थक मोकळे व आपले विद्यमान पंतप्रधान काव्यशास्त्रविनोदेन करायला मोकळे.

In reply to by संदीप डांगे

माजी पंत्रप्रधान जबरदस्तीने असे बोलले असे वाटत नाही. राज्यसभेतील त्यांच्या भाषणात मुद्द्दा होता की नोटबंदीचा उद्देश चांगला आहे, पण परिणाम (आऊटकम) काय असेल हे सांगता येत नाही. पैसा आणि बँकीग क्षेत्रावर विश्वास राहणार नाही. सामान्य लोकांना त्रास होऊ नये यासाठीच्या उपाययोजना हव्या होत्या असे ते म्हणतात. दरदिवशी नवीन नियमामुळे भारतीय रिजर्व बँकेची इमेज खराब होत आहे. एक गोष्ट स्वीकारलीच पाहिजे की नेमकं काय होणार हे आज तरी अनिश्चित वाटत आहे. दुसरी गोष्ट् ठळक दिसते की लोकांना काय त्रास होतो त्यावर भारतीय रिजर्व बँकेने दरदिवशी नवे निर्णय घेतल्याचे दिसून येतात. मला नाही वाटत की ते चूक बोलले. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बोका-ए-आझम 25/11/2016 - 09:26
माजी पंत्रप्रधान जबरदस्तीने असे बोलले असे वाटत नाही.
तुम्हाला फोन आला होता की काय?;) रच्याकने ते पंतप्रधानच जबरदस्तीने झाले होते. असो. कालचं भाषण राजकीय होतं, आर्थिक नव्हतं. २००८ च्या अणुकरारावर बहुमत सिद्ध करताना जे भाषण मनमोहन सिंगांनी केलं होतं त्यातला आत्मविश्वास काल दिसला नाही. तेव्हा ' आपण बरोबर आहोत ' हा भाव त्यच्या चेहऱ्यावर होता आणि तो लोकांनाही जाणवला होता. कालच्या भाषणाबद्दल मात्र दुर्दैवाने तसं म्हणता येत नाही.

In reply to by बोका-ए-आझम

पद्माक्षी 25/11/2016 - 11:37
माजी अर्थमंत्री, माजी गव्हर्नर या नात्याने जास्त विवेचन हे या निर्णयाच्या परिणामावर अपेक्षित होते. नुसतीच टीका किंवा सरधोपट विधाने खचितच अपेक्षित नव्हती. एवीतेवी काँग्रेसचा या निर्णयाला पाठिंबा आहेच तर याचे दूरगामी परिणाम किंवा याच्या पुढची पाऊले काय असावीत याबद्दल मते आवडली असती.

In reply to by संदीप डांगे

पगला गजोधर 26/11/2016 - 17:34
संदीपजी, सुंदर प्रतिसाद.... मिल्टन यांच्या वरील (सुंदर) प्रतिसादातील,
किंबहुना अमेरिकेचे अध्यक्ष हर्बर्ट हूव्हरही 'prosperity is around the corner' हेच आश्वासन देत होते. त्याला उद्देशून जॉन मेनार्ड केन्सने 'in the long run we all are dead' असे म्हटले होते.
वाचून,'अच्छे दिन आने वाले हय' ची आठवण आली.

जुने चलन बाद केल्यानंतर नवे चलन किती लागेल आणि नव्या चलनाच्या छपाईस किती वेळ लागेल इत्यादी गणिते इकॉनॉमीक सेक्रेटरी आणि रिझर्व बँकेचे सध्याचे गव्हर्नर यांच्या बोटावर असणार त्या गणितात ते खूप चुकले असतील अशी संभावना कमी आहे.
५० दिवसानंतर सगळे सुरळीत होईल, असे सरकार कशाच्या जोरावर म्हणते? ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा रद्द करून तितक्याच किंमतीच्या ५०० आणि २००० च्या नवीन नोटा छापायला अजून सहा महीने लागतील.

In reply to by मार्मिक गोडसे

चौकटराजा 24/11/2016 - 20:31
मी बॅंकिग हा विषय स्पेशल सब्जेक्ट घेऊन पदवीधर झालो . कार्ड काढून सहा वर्शे झाली तरी मॉलमधे वा पेट्रोल पंपावर रोकडा देऊन माल घेत होतो. वीज बील ऑनलाईन भरत नव्हतो का तर पावती मिळत नाही. ( आपल्या पासबुकात एन्ट्री होते हे मला ध्यानातच नव्हते) मोदीनी झटका दिल्याने मी शहाणा झालो. ( देशभक्त झालो असा मूर्ख दावा मी करीत नाही.) आजच मेडिकल वाल्याला विचारले तुझ्याकडे कार्डाची सोय आहे का ? आता रेल्वे बुकिंग ऑन लाईन होते . ते करायला देखील घाबरायचो. ही जर माझी कथा आहे तर ती अनेक पदवीधरांची असेल. ते आता ऑनलाईन पैसे भरायला सुरूवात करतील. माझी तर अशी मागणी आहे की सर्व शॉप्सना कार्ड सक्तीचे केले पाहिजे. व कार्ड वा रोख असे पर्याय ग्राहकाला दिले पाहिजेत.याने फार फरक पडेल.नवी नोटांची छापाई टळेल. या अर्थाने ही अर्थ क्रांतीच आहे. यातून अगदी लहान लोक म्हणजे चप्पल दुरूस्त करणारा ई मात्र वगळले तर चालतील पण ज्याला शॉप लायसन्सची गरज आहे ते सर्व व मांडववाले., केटरर्स ई ना देखील कार्ड सक्तीचे केले पाहिजे.

In reply to by चौकटराजा

+१००० हीच परिस्थिती बर्‍याच लोकांची असते. रोजच्या सवई अंगवळणी पडलेल्या असल्याने बदल हा नेहमीच चिंतादायक असतो आणि समाजात तो बर्‍याचदा झटका (कायदे, नोटाबंदी, इ) देऊन करावा लागतो. पण योग्य बदलाचे चांगले अनुभव आल्यावर तोही अंगवळणी पडतो.

In reply to by चौकटराजा

चिनार 25/11/2016 - 11:33
एक प्रामाणिक शंका (कृपया बावळटासारसखा प्रश्न म्हणून फाट्यावर मारू नये ). प्लास्टिक मनी ,इलेक्ट्रॉनिक मनी वगैरेचा वापर केल्यावर रोख व्यवहार कमी होतील हे मान्य. पण त्यामुळे नोटा छपाई कमी करावी लागेल हे कसे काय ? उदा. मी १०००० रुपयाचे तिकीट ICICI नेट बँकींग ने IRCTC वरून काढले. तर हे १००००रू. कधी ना कधी तरी रोख स्वरूपात IRCTC कडे पोहोचत असतील ना ?

In reply to by चिनार

ई-मनीचे नोटांच्या स्वरूपात नाही तर संगणकिय हिशेबाच्या स्वरूपात चलनवलन होते. फार फार तर कधीकाळी एखादा रोख व्यवहार करायचा झालाच तर नोटा एकाकडून दुसर्‍याकडे जातात. रोकड व्यवहारावर सीमा असेल (उदा: रु१०.०००) तर तेवढ्याच रकमेचे पैसे एका व्यवहारात नोटांच्या स्वरूपात वापरले जातील. ई-मनीची अर्थव्यवस्था अंगवळणी पडल्यावर असे रोखीचे व्यवहार क्वचितच होतील. उदा: अमेरिकेत बहुतेक ठिकाणी $१० (काही ठिकाणी $५) च्या वरचे व्यवहार कार्डाने होऊ शकतात/होतात.

In reply to by चिनार

चौकटराजा 25/11/2016 - 16:08
नोटा व आर्थिक सत्ता या दोन गोष्टी भिन्न आहेत. आपला पगार खात्यात जमा होतो त्यावेळी आर्थिक सत्ता जमा होते.नोटा हे ती सत्ता दुसर्‍यास देण्याचे एक माध्यम आहे. अशा फिजिकल व्यवहारास पर्याय म्हणून कार्ड आले आहे. अशा वेळी जो पर्यंत सर्वच माणसे नोटाच वापरू असा हट्ट धरणार नाहीत तोपावेतो छपाई कमीच लागणार !

अमर विश्वास 24/11/2016 - 20:38
५०० व १००० च्या नोटा रद्द करून तितक्याच किंमतीच्या नवीन नोटा छापतील असे वाटत नाही ... (म्हणजे circulation मध्ये आणणार नाहीत ) मी जे वाचाले / ऐकले त्यावरुन नवीन नोटांची एकुण किंमत जुन्या नोटांपेक्षा कमी असेल...

In reply to by मार्मिक गोडसे

अमर विश्वास 25/11/2016 - 00:28
मार्मिकजी का व किती ? यातील किती चे उत्तर माझ्याकडे नाही कारण डिमॉनिटायझेशनच्या कन्सेप्ट मध्ये याचा उल्लेख होता पण अजून रिझर्व्ह बँकेने या बद्दल Official स्टॅमेंट दिलेले नाही. का? या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करतो... डिमॉनिटायझेशनच्या आधी ५०० आणि १००० च्या नोटांचे एकूण मूल्य, सगळ्या चाल मुल्याच्या ८५% होते . हे प्रमाण इतर कुठल्याही अर्थव्यवस्थेपेक्षा खूप जास्त होते. हे प्रमाण कमी करण्याची ही उत्तम संधी आहे मी आधीही एका प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे डिमॉनिटायझेशन मुळे बँक मनी मध्ये थोड्या प्रमाणात वाढ होईल . (आत्ता जमा झालेला सगळा पैसा तसाच बँकेत राहणार नाही त्याचप्रमाणे सगळा पैसे परत रोख रकमेच्या स्वरूपातही राहणार नाही ) त्यामुळें रिझर्व्ह बँक २००० च्या नोटा कमी करून अप्रत्यक्षरित्या रोख रक्कम कमी करायला हातभार लावू शकते. अर्थात अजून या पातळीपर्यंत पोचायला खूप वेळ आहे. सध्या रोख रक्कमेची कमतरता आहे ... त्यामुळें अजून महिनाभर तरी रिझर्व्ह बँकेचे मुख्य उद्दिष्ट पुरेशा प्रमाणात रोख रक्कम पुरवणे हेच राहणार आहे.

गामा पैलवान 24/11/2016 - 21:21
डॉक्टर सुहास म्हात्रे,
एखादा उत्तम भूतकाळ असलेला अभिमानी माणूस राजिनामा देवून मंत्रीपरिषदेतून (किंबहुना राजकारणातून) बाहेर पडला असता. ते मनमोहन सिंग यांना का जमले नाही, हा यक्षप्रश्न आहेच.
माझ्या मते याचं कारण काय आहे ते सांगतो. मनमोहनसिंगांच्या आडून सोनियाला राज्यकारभार हाकायचा होता. जर सिंगांनी राजीनामा दिला असता तर सोनियाने त्यांची अंडीपिल्ली बाहेर काढली असती. मनमोहनसिंगांची अंडीपिल्ली काय आहेत? त्यांनी रिझर्व बँकेचे संचालक असतांना १९८३ (किंवा आसपास) बीसीसीआय नामे एका बदनाम बँकेस भारतात व्यवहार करावयास परवानगी (= बँकिंग लायसन्स) दिली होती. याच्या बदल्यात त्यांच्या एका मुलीला ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश मिळाला. आता बीसीसीआय ही अफरातफर करून जगभरातला पैसा पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय एस आय कडे वळवणारी बँक आहे हे सगळ्यांना माहीत होतं. तरीपण मनमोहन भुलले आणि टेररिस्ट फायनान्सिंग करून बसले. त्याची फळं भारतीयांना भोगावी लागली. कशी ते सगळ्यांना माहितीये. :-( आ.न., -ग.पै.

In reply to by गामा पैलवान

प्रदीप 25/11/2016 - 16:00
१९९१ सालपर्यंत जगात सर्वत्र अधिकृतरीत्या व्यवहार करत होती. त्यासाली तिच्यावर रन झाला व ती बुडली. १९८३ साली तिच्याबद्दलचे ड्यू डिलीजन्स करून कुणाला तिची खरी परिस्थिती समजली असती, तर त्यानंतर ती जगातील सर्वच फायनॅन्शियल सेंटर्समधे पुढील इतकी वर्षे कशी कार्यरत राहिली असती?

In reply to by प्रदीप

गामा पैलवान 25/11/2016 - 21:03
प्रदीप, तुमचा प्रश्न समर्पक आहे. नेमका अशाच तऱ्हेचा प्रश्न संसदेत मनमोहनसिंगांना विचारला होता. त्यावर माननीय सिंगसाहेब मिठाची गुळणी धरून बसले होते. आ.न., -गा.पै.

In reply to by वरुण मोहिते

गामा पैलवान 25/11/2016 - 02:20
वमो, मुलीला मिळालेला प्रवेश हे केवळ बक्षीस आहे. यामागचं खरं कारणं टेररिस्ट फायनान्सिंग आहे. यासंबंधी संसदेत झालेली चर्चा इथे आहे : http://parliamentofindia.nic.in/ls/lsdeb/ls10/ses1/13070891.htm आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मारवा 25/11/2016 - 10:22
यातुन येणारे रीझल्ट रोचक आहेत. यातुन टफी वमो असे आले एखादा नमो येइल कधी तरी मला काय मावा संबोधाल का गापै ?

In reply to by मारवा

गामा पैलवान 25/11/2016 - 13:38
अहो, निव्वळ आळस आहे हो! :-) तुम्ही फक्त मा. = माननीय बरंका. उगीच भलतेसलते अर्थ काढू नका बरें. ;-) आ.न., -गा.पै.

In reply to by अनुप ढेरे

चपखल ! भाषणातली भाषा पाहता, माझ्या मते मनमोहन सिंग यांना दुसर्‍या कोणी लिहीलेले भाषण वाचण्याची सक्ती केलेली दिसते. तसे पाहिले तर मनमोहन सिंग यांच्यावर काहीही करण्याची/ बोलण्याची (किंवा न करण्याची / न बोलण्याची) सक्ती करणे फारसे कठीण नाही, हे त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत दिसून आलेच आहेच.

मृत्युन्जय 25/11/2016 - 12:49
ते बोलले हे महत्वाचे. काय बोलले हे तितकेसे महत्वाचे नाही कारण अखेर ते देखील राजधर्माने बांधील आहेत. सरकारी धोरणांवर टीका करणे हे त्यांचे कर्तव्यच आहे. पण पाच वर्षात ज्या माणसाचे शब्द ऐकणे ही दुर्मीळ गोष्ट होती तो माणुस अखेर बोलला यामुळेच भारतीय जनतेला धक्का बसला असेल. कद्दाचित मैन सोडण्याचे वरुन आदेश आले असावेत. पण टीका करताना इतक्या विद्वान माणसाने अंमलबजावणीतल्या त्रुटींवर चर्चा केली असती तर ते जास्त योग्य झाले असते. पण माजी पंतप्रधान वदले "organised loot and legalised plunder". नुसते लूटमार झाली म्हणुन आरडाओरडा केला की झाले. यात नक्की लूटमार कशी झाली हे काही केल्या कळत नाही आहे. २जी, कोल्जी, दामादजी या सगळ्यांवर "मौन" हाच एक मुखवटा धारण करणारे नोटाबंदीला "organised loot " म्हणतात तेव्हा सखेद आश्चर्य वाटल्यावाचुन राहवत नाही. फारतर एखादा माणूस म्हणेल की हा निर्णय "उपयोगशून्य आहे", "यातुन काहीही होणार नाही" पण तरीही ही "संघटित लूटमार" कशी आहे ते कळेना. मनमोहन सिंगांनी अजुन एक फारच स्फोटक विधान केले ""Those who say demonetisation is good in the long run should recall the quote: 'In the long run we are all dead'." ममोंच्या या वक्तव्याचा अर्थ असा होतो की भवितव्याचा विचार करुन कुठलेही काम करु नका. कारण एकुणात काय आपण मरणारच आहोत. त्यामुळे अजुन २५ वर्षांनी आपण अर गेल्यावर समाजाला काही फायदा होणार असेल तर त्याचा विचार कशाला करा? यानिमित्ताने एक बोधकथा आठवली: " सत्तरीतले एक आजोबा आपल्या नातवाला बरोबर घेउन बागेत आंब्याचे झाड लावत होते. नातवाने निरागसपणे विचारले की मग पुढच्या महिन्यात तुम्ही या झाडाला लागलेले आंबे खाणार का? आजोबा सस्मित उत्तरले "नाही बाळा. झाडाला आंबे लागायला तर कैक वर्षे लागतील. तोवर कदाचित मी नसेन. " नातवाने आश्चर्याने विचारले की मग तुम्ही झाड का लावत आहात. त्यावर आजोबांनी दिलेले उत्तर फार मार्मिक होते "बाळा या झाडाचे आंबे तु खाऊ शकशील. असे बघ सध्या आपणा ज्या झाडाचे आंबे खातो ते माझ्या आजोबा / पणजोबांनी लावले होते." पण बहुधा मनमोहन सिंगांना असे सुचवायचे असावे की प्रत्येकाने आपल्यापुरते बघावे. फ्युचर गया भाड मे. क्योकि " इन द एंड वी ऑल विल बी डेड इन द लॉंग रन" मनमोहन सिंग आज ८४ वर्षाचे आहेत. जेव्हा ते पंप्र झाले तेव्हा देखील ७२ वर्षांचे होते आणि पाय उतार झाले तेव्हा ८२ वर्षांचे. जर त्यांचा दृष्टीकोन 'In the long run we are all dead' असाच असेल तर त्यांच्या काळात ते इतके निष्क्रिय का होते याचे उत्तर कदाचित त्यांच्या विचारसरणीतच असु शकेल. असो. असोच.

In reply to by मृत्युन्जय

काय बोलले हे तितकेसे महत्वाचे नाही कारण अखेर ते देखील राजधर्माने बांधील आहेत. या एका वाक्यात सद्याचा भारतीय राजधर्म किती नीच पातळीवर पोचला आहे हेच सुचीत होत नाही काय ? असंबधित, विपर्यास करणारे, अर्धसत्य, इतकेच काय सरळ सरळ असत्य बोलणे हे सर्व राजकारणाच्या नावाखाली खपून जाऊ लागले आहे. यामागे, एकतर "मला कोणी काहीही करू शकत नाही" ही गुर्मी आहे, किंवा "बुद्दू भारतिय नागरिकांना काहीही/कसेही सांगून ते खपवता येते आणि त्यातून आपला स्वार्थ साधता येतो" असा विश्वास आहे. ही सद्य भारतीय राजकारणातील दुर्दैवी पण सत्य परिस्थिती आहे. मुख्य म्हणजे याबाबतीत तथाकथित अशिक्षित व गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नेतेच नव्हे तर; विचारी, तज्ञ आणि उच्चविद्याविभूषित (यांना मी सुशिक्षित म्हणू शकत नाही) समजले जाणारे नेतेही हिरीरीने पुढे आहेत ! :(

पुंबा 25/11/2016 - 13:06
मनमोहन सिंगांच्या अर्थविषयक ज्ञानावर लोकांचा विश्वास आहेच. अर्थसुधारणांचे जनक या नात्याने त्यांच्या मताला सामन्यांत, तसेच थोडेबहुत अर्थसाक्षर, वाचणाऱ्यांत, विचार करणाऱ्यांत आणि वरिष्ठ मध्यमवर्गीय यांच्यात देखील किंमत आहे. सध्या दिसतंय असं कि सर्वसामान्यांना सगळ्यात जास्त त्रास होतोय मात्र ते इतके नाखूष नाहीयेत या निर्णयावर. त्यांना याचे दूरगामी परिणाम चांगले असतील असा विश्वास आहे म्हणूनच इतका fiasco होऊनदेखील सरकारची authority शाबूत आहे. गरीब, निम्न मध्यमवर्गीय लोकांना हा त्रास असह्य वाटत नाहीये मात्र मध्यमवर्गीय अधीर झालेत. या सगळ्यामुळे काँग्रेस ने असा विचार केला की मनमोहन सिंगांनी जर authoratatively या निर्णयाच्या विरोधात भाष्य केले तर सरकारची legitimacy आपण धोक्यात आणू शकतो कारण gdp 2 टक्क्यांनी कमी होईल हि खूप अपशकुनी भविष्यवाणी आहे. यामुळे मध्यमवर्गीयांत सरकारविषयी संशय निर्माण होऊ शकतो. ममता, केजरीवाल असल्या अडाण्यांचं लोक ऐकत नाहीत मात्र सिंग बोलले तर परिणाम होऊ शकेल अशी आशा काँग्रेस ला आहे. जर खरंच त्यांच्या म्हणण्याप्रमाणे झाले तर bjp साठी परिस्थिती अवघड होईल मात्र जर posotive परिणाम दिसले, ज्याची शक्यता जास्त आहे, तर मात्र मनमोहन सिंगांची क्रेडिबिलिटी ढासळेल काँग्रेसला काही फरक पडणार नाही. त्यामुळे मनमोहन सिंग हे नेहमीप्रमाणेच काँग्रेस साठी प्यादे बनले. Queen is the real power, this man is nobody.

श्रीगुरुजी 25/11/2016 - 15:42
मनमोहन सिंग यांचे कालचे भाषण बघून अत्यंत वाईट वाटले. ते भाषण मनमोहन सिंग या अर्थतज्ज्ञाचे नसून गांधी घराण्याच्या निष्ठावंत सेवेकर्‍याचे होते असेच वाटत राहिले. ५००/१००० च्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाला "संघटित लूट" म्हणणे हे पराकोटीचा विपर्यास होता. 'In the long run we are all dead' हे ऐकल्यावर हे मनमोह्न सिंगच बोलत आहेत का त्यांच्या मुखातून साक्षात पप्पू किंवा केजरीवाल किंवा संजय निरूपम बोलत आहेत अशीच शंका आली. भविष्यात आपण नसू त्यामुळे आता काहीही करू नका असेच त्यांचा सांगायचे होते का? तसे असेल तर भविष्यातील पर्यावरण, राहणीमान, देशाचे संरक्षण, देश नावाची संकल्पना इ. सर्वांनी विसरूनच जायला हवे कारण तेव्हा आपण नसू. नोटा रद्द करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीतील त्रुटी न दाखविता किंवा त्यावर सुधारणा न सुचविता, या निर्णयाला 'संघटित लूट' म्हणणे हे अत्यंत संतापजनक होते. यांच्याच काळात देशात 'राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा', '२ जी घोटाळा', 'कोळसा खाणीवाटप घोटाळा', 'ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा', 'आदर्श घोटाळा', ..... असे असंख्य घोटाळे झाले. ते सर्व घोटाळे म्हणजे 'असंघटित लूट' होती का? हे सर्व घोटाळे यांच्या डोळ्यांसमोर यांच्याच आशिर्वादाने होत असताना हे एखाद्या नि:संग ढुढ्ढाचार्यासारखे डोळे मिटून स्वस्थ बसून होते. आपण ज्या पदावर आहोत त्या पदाला देशात सर्वोच्च अधिकार असताना हे घोटाळे न थांबविता फक्त 'मी त्यात नाही' यातच हे समाधान मानत होते. २००४ ते २०१४ या काळात यांच्याबद्दलचा आदर खूपच कमी झाला होता. आता तो आदर जवळपास नष्ट झाला आहे. सत्ता आणि एखाद्या घराण्याशी बांधिलकी एखाद्या विद्वानाचे किती अधःपतन करू शकते याचे मनमोहन सिंग हे जळजळीत उदाहरण आहे. भ्रष्टाचार्‍यांच्या संगतीत राहून यांची विचारसरणी देखील भ्रष्ट झालेली दिसते.

In reply to by श्रीगुरुजी

सुबोध खरे 25/11/2016 - 18:29
कर्जे दिली कुणी आणि कशाला आणि ती बुडीत झाली त्याचा मूळ लेख जोखा पहा. "मल्ल्याची धन करायला नोटबंदी केली" अशी कोल्हेकुई काँग्रेसने करावी याचे आश्चर्य मुळीच वाटत नाही. डॉ मनमोहन सिंग हे अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असले तरीही त्यांचे आडाखे साफ कसे चुकले याचे विवरण वाचून घ्या. http://www.businesstoday.in/opinion/delhi-durbar/sorry-mr-manmohan-singh-we-were-dead-in-flat-three-years-demonetisation/story/241029.html मिठाला जागण्यासाठी विधाने केल्याने शेवटी डॉ मनमोहन सिंग यांचा "भीष्म" झाला असेच खेदाने म्हणावे लागते.

In reply to by सुबोध खरे

गामा पैलवान 26/11/2016 - 02:11
काहीही हं खरे डॉक्टर! मनमोहन सिंगाची तुलना चक्क भीष्मचार्यांशी? अहो, कुठे भीष्मप्रतिज्ञा करणारा तो पितृव्रती पराक्रमी देवव्रत आणि कुठे टेररिस्ट फायनान्सिंग करणारा तो मातृदेशद्रोही मनमोहन सिंग! पाकिस्तानला भारतात थेट गुंतवणुकीचा राजरस्ता खोलून देणाऱ्या टेररिस्ट फायनान्सर मनमोहन सिंगाचं हे उदाहरण पाहून घ्याच : http://www.thehindu.com/business/Economy/article3310677.ece आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माहितगार 26/11/2016 - 11:35
एकवेळ व्यक्तिगत टिका ठिक, पण देशद्रोही सारखी विशेषणे लावण्याची सहसा घाई न केलेली बरी हे माझे व्यक्तिगत मत बाकी आपली मर्जी

In reply to by माहितगार

संदीप डांगे 26/11/2016 - 11:57
देशद्रोही, देशभक्त फारच स्वस्त शब्द झालेत आजकाल, त्यांचं महत्त्व हरवत चाललंय, दुसऱ्याला देशद्रोही म्हटलं की आपण फार देशभक्त ठरतो असा काही सुप्त भाव प्रचलित झालाय जणू! राजकारणाची हि नवीन परिभाषा रुळते आहे, जनतेचे सेवक, जनतेच्या भल्यासाठी असे जुने शब्द फारसे परिणाम करत नाहीत, बोथट झालेत, त्याऐवजी देश, राष्ट्र वैगेरे शब्द वापरले जात आहेत, कालांतराने तेही बोथट होतीलच,

In reply to by संदीप डांगे

गामा पैलवान 26/11/2016 - 14:14
संदीप डांगे, १.
दुसऱ्याला देशद्रोही म्हटलं की आपण फार देशभक्त ठरतो असा काही सुप्त भाव प्रचलित झालाय जणू!
हे विधान मला उद्देशून आहे का? २.
देशद्रोही, देशभक्त फारच स्वस्त शब्द झालेत आजकाल, त्यांचं महत्त्व हरवत चाललंय,
एकदम बरोबर बोललात बघा. नेमक्या याच कारणासाठी खरे देशद्रोही कसे असतात ते दाखवून द्यायला हवं. टेररिस्ट फायनान्सिंगास देशद्रोह नाही तर दुसरं काय म्हणायचं? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

संदीप डांगे 26/11/2016 - 14:41
तुम्हाला उद्देशून नाही, जनरली सगळीकडेच (इथेच मिपावर नाही) देशभक्त-देशद्रोही चा सढळहस्ते जो वापर चाललाय ते बघून म्हटलंय.. टेररीस्ट फायनान्सिंग केलंय तर ते गजाआड का नाहीत? विरोधी पक्ष तरी का शांत बसलेत अजूनही..?

In reply to by गामा पैलवान

संदीप डांगे 26/11/2016 - 16:52
काय राव? कोणी वराडतंय म्हणून त्याला जेलमंदी टाकत न्हाय व्हय? काहीतरी कॉन्क्रीट बोला की.

औरंगजेब 26/11/2016 - 13:23
मनमोहन सिंग एक अर्थतज्ञ म्हणुन उत्तम होते आहेत आणी राहतिलही.पण २००४-२०१२ त्यांना त्यांचे कर्तृत्व दाखवायची संधीच मिळाली नाही. किंबहुना मिळू दिली नाही. काहीही असो डॉ. सिंगांबद्दल मला नेहमीच आदर वाटतो. आणी तेच फक्त काँग्रेसमधले माझे आवडते नेते आहेत.

श्रीगुरुजी 26/11/2016 - 14:57
परवाच्या भाषणात मनमोहन सिंग असे सुद्धा म्हणाले की आपल्याच खात्यातले पैसे काढायला परवानगी नाही असा जगात एकतरी देश आहे का? त्यांना इतके असत्य बोलण्याची का आवश्यकता आहे? तुमच्या खात्यातून धनादेश वापरून पैसे चुकविता येतात, डेबिट कार्ड व क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खर्च करता येतो, इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून खात्यातील पैसे वापरता येतात, बँकेत जाऊन आपल्या खात्यातील २४००० रूपये प्रत्येक आठवड्याला काढता येतात, एटीम वापरून दोन हजार रूपये काढता येतात ... तरीसुद्धा आपल्याच खात्यातले पैसे काढायला परवानगी नाही असे जाहीर सांगणे हा प्रचंड विपर्यास आहे. बादवे, आपल्या मंत्रीमंडळातील सर्व मंत्री मनसोक्त लूटमार करीत असताना व त्यांना लूटमार करण्यापासून प्रतिबंध करण्याचे संपूर्ण अधिकार हातात असताना सुद्द्धा जगातील कोणत्या देशाचा पंतप्रधान डोळे मिटून शांत बसून होता व त्यांना लूटमार करण्यासाठी मोकळे रान देत होता हे मनमोहन सिंग सांगतील का?

In reply to by श्रीगुरुजी

संदीप डांगे 26/11/2016 - 15:18
बँकेत जाऊन आपल्या खात्यातील २४००० रूपये प्रत्येक आठवड्याला काढता येतात, एटीम वापरून दोन हजार रूपये काढता येतात
बॅन्केकडे कॅश असेल तर तेवढे मिळतात, एटीएम चालू असेल तर पैसे काढता येतात. प्रत्येक ठिकाणी जरतर चा मामला आहे. माझ्या परिसरातलं एसबीआय सोडून सगळे बॅन्कांचे १८+ एटीएम कॅश नाही, सर्वर प्रॉब्लम मुळे कार्यरत नाहीत. आज सकाळीच सर्वत्र पायी फिरुन आलोय. एसबीआयला गर्दी इतकी, एक-दिड तास लागतो पैसे काढायला. ही आज २६ तारखेची परिस्थिती आहे. हे आपलेच पैसे काढायला आलेले निर्बंध आहेत. खोटं काय त्यात? त्यात परत 'तुम्हाला रोज अमूक इतके पैसे लागतातच कशाला' सारखे निरर्थक प्रश्न विचारण्यापासून 'देशाच्या भल्यासाठी'पर्यंतचे दाखले देणारे आहेतच. देशात सर्वत्रच आलबेल परिस्थिती नाही हे ऐकूनच घ्यायचे नाहीये. कारण ऐकून घेतले तर सरकार त्यावर काय उपाय करतंय हा प्रश्न येणार व मग पितळ उघडं पडणार. त्यापेक्षा प्रश्न विचारणारा आणि टिका करणाराच कसा नालायक आहे हे म्हटले की प्रश्न मिटतो. चालुदे! आरबीआय रोज नवीन नवीन नियम काढते, कालचा नियम आज रद्द करते, बॅन्का भंजाळल्यात ग्राहकांना उत्तरं देऊन देऊन. सरकार आपणच दिलेली आश्वासनं पाळत नाही. उंदीर कुठे घुसतोय ते पाहून नंतर बीळ बंद करायला धावाधाव करतायत. त्यांचंही चालुदे! बाकी ज्या मंत्र्यांनी मनसोक्त लूटमार केली त्यां सर्वांना नवनिर्वाचित सरकारने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली खटला चालवून गजाआड घातले असेलच किंवा रक्कम तरी वसूल केली असेलच किंवा दोन्हीही. ह्यापैकी काही केलं असल्यास माहीती द्यावी.

In reply to by संदीप डांगे

विशुमित 26/11/2016 - 15:26
UPA १/२ मध्ये कलमाडी सोडले तर आणखी कोणत्या काँग्रेस मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. जाणकार सांगू शकतील का? फक्त वद्राना काँग्रेस मध्ये सामील करू नका.

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी 26/11/2016 - 15:37
खूप मोठी यादी आहे. मनमोहन सिंग, विजय दर्डा, दासरी नारायण राव, पवनकुमार बन्सल, शीला दिक्षित, वीरभद्र सिंग, अश्वानी कुमार, शशी थरूर ....

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी 26/11/2016 - 15:33
बॅन्केकडे कॅश असेल तर तेवढे मिळतात, एटीएम चालू असेल तर पैसे काढता येतात. प्रत्येक ठिकाणी जरतर चा मामला आहे. माझ्या परिसरातलं एसबीआय सोडून सगळे बॅन्कांचे १८+ एटीएम कॅश नाही, सर्वर प्रॉब्लम मुळे कार्यरत नाहीत. आज सकाळीच सर्वत्र पायी फिरुन आलोय. एसबीआयला गर्दी इतकी, एक-दिड तास लागतो पैसे काढायला. ही आज २६ तारखेची परिस्थिती आहे. हे आपलेच पैसे काढायला आलेले निर्बंध आहेत. खोटं काय त्यात? त्यात परत 'तुम्हाला रोज अमूक इतके पैसे लागतातच कशाला' सारखे निरर्थक प्रश्न विचारण्यापासून 'देशाच्या भल्यासाठी'पर्यंतचे दाखले देणारे आहेतच. देशात सर्वत्रच आलबेल परिस्थिती नाही हे ऐकूनच घ्यायचे नाहीये. कारण ऐकून घेतले तर सरकार त्यावर काय उपाय करतंय हा प्रश्न येणार व मग पितळ उघडं पडणार. त्यापेक्षा प्रश्न विचारणारा आणि टिका करणाराच कसा नालायक आहे हे म्हटले की प्रश्न मिटतो. चालुदे!
काही एटीएम सुरू आहेत, काही नाहीत. स्वत: बँकेत गेलात तर चेक वापरून स्वतःच्या खात्यातील पैसे काढता येतात हा अनुभव मी ३ वेगवेगळ्या बँकेत घेतला आहे. मनमोहन सिंगांचा मूळ मुद्दा होता की खात्यातून पैसे काढायला बंदी आहे असा भारत एकमेव देश आहे. परंतु या आरोपात १०% सुद्धा तथ्य नाही.
आरबीआय रोज नवीन नवीन नियम काढते, कालचा नियम आज रद्द करते, बॅन्का भंजाळल्यात ग्राहकांना उत्तरं देऊन देऊन. सरकार आपणच दिलेली आश्वासनं पाळत नाही. उंदीर कुठे घुसतोय ते पाहून नंतर बीळ बंद करायला धावाधाव करतायत. त्यांचंही चालुदे!
१३० कोटी लोकसंख्येच्या देशात असा गोंधळ होणे अनिवार्य आहे.
बाकी ज्या मंत्र्यांनी मनसोक्त लूटमार केली त्यां सर्वांना नवनिर्वाचित सरकारने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली खटला चालवून गजाआड घातले असेलच किंवा रक्कम तरी वसूल केली असेलच किंवा दोन्हीही. ह्यापैकी काही केलं असल्यास माहीती द्यावी.
विजय दर्डा, दासरी नारायण राव, मधू कोडा, नवीन जिंदाल, मारन बंधू, वीरभद्रसिंग अशा अनेक मंत्र्यांविरूद्ध न्यायालयात कारवाई सुरू आहे. दस्तुरखुद्द मनमोहन सिंगांचे नावही एका आरोपपत्रात आले होते. त्यांनी तातडीने सर्वोच्च न्यायालयात जाऊन खटल्याला बेमुदत काळापर्यंत स्थगिती मिळविली. सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला नसता तर एव्हाना खटल्याची सुनावणी सुरू झाली असती. न्यायालयांचा संथ कारभार बघता ही कारवाई अनेक वर्षे सुरू राहणार आहे.

In reply to by श्रीगुरुजी

संदीप डांगे 26/11/2016 - 16:48
न्यायालयांचा संथ कारभार असे सांगणे ही शुद्ध पळवाट आहे. ऑक्टोबर २०१४ मध्ये सुप्रिम कोर्टाने काळापैसावाल्यांची नावे जाहीर करायला तुम्हाला काय अडचण आहे असं सरकारला विचारलं होतं, दोन वर्षे होऊन गेलीत त्याला. पुढे काय झालं? टेबल टेनिस सुरु आहे काय? विद्यमान पंतप्रधानांची धडाकेबाज 'नियत' बघता अशा केसेस साठी एक फास्टर दॅन फास्टेस्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करुन सटासट प्रकरणं निकाली काढणे काय फार मोठी गोष्ट नाही. नरेंद्र मोदींनी असे काही केले तर (विरोधक कितीही आदळआपट करु देत) सामान्य जनता (फार्सिकल अॅंपमधून समर्थन न देता) रस्त्यावर उतरुन दिवाळी साजरे करेल.
माननीय मनमोहनसिंगजी, मोदी सरकारने रु ५०० आणि रु १००० या नोटांचे निर्मुल्यन केल्या संबंधाने आपण आपले राज्यसभेतील टिकात्मक भाषण वाचनाचा योग आला. रु ५०० आणि रु १००० या नोटांचे निर्मुल्यनाच्या उद्दीष्टांबद्दल आपणास शंका नसल्याचे आपण म्हटले आहे. प्रश्न केवळ इंप्लीमेटॅशन (अमलबजावणी) मधील त्रुटींचा आहे या त्रुटी म्हणजे भलेमोठे गैरव्यवस्थापन आहे असे आपण आपल्या भाषणातून म्हटले आहे.