"स्वामी" तिन्ही जगाचा..... मी मात्र भिकारी
लेखनप्रकार
माझ्या वयातल्या इतर कुणाही मुलाप्रमाणे मी सहावी किंवा सातवीत पहिल्यांदा स्वामी कादंबरी वाचली. मला हे कबुल करायला अजिबात संकोच वाटत नाही की ती कादंबरी त्यावेळी मला खुप आवडली होती. माधवरावांची एक प्रतिमा माझ्या मनात नोंदली गेली होती. कादंबरीच्या सुरवातीच्या पानावर असलेल्या इतिहासकारांच्या काही अभिप्रायामुळे शेंदराचा टीळा व्यवस्थित लागला होता. एकंदर ब्राह्मणी वातावरणात लहानपण गेल्यामुळे लावणी वगैरे अतिशय घाण प्रकार असतो त्याला टाळणे हेच उत्तम असा संस्कार असल्यामुळे कादंबरीतील माधवराव मधुन उठून जातात इत्यादी प्रसंग दाद देणारे आणि माधवराव या व्यक्तीबद्दल आदर वाढवणारे ठरले. रमामाधव यांच्यातील काही हलके फुलके नर्मविनोदी प्रणय प्रसंग त्याकाळातील माझ्या वयाला मोहवणारे वाटले आणि अखेरची ताटातुट गळ्यात आवंढा आणणारी होती. काकापुतण्यातील ताणतणावाचे प्रसंग बरी अद्दल मोडली अशा पुटपुटीत बदलुन हाणला मस्त अशा मांडीवर थाप मारत दाद देण्यापर्यंत प्रसंगी जात असे. हे सर्व दहावी पर्यंत येईपर्यंत तीन चार वेळेस नक्की झालं असेल. अर्थात त्याकाळात अशीच दाद वीरधवल, कालिकामुर्ती इत्यादी कादंबरींना सुद्धा दिली जात असे. खरी गोष्ट ही होती की माझ्या मनात इतिहासकालीन व्यक्तीरेखा आणि कादंबरीमधील व्यक्तीरेखा यांच्यामधे फरक करणार्या विवेकाचा अभाव होता.
आजही मी जेव्हा अशा विवेकाबद्दल बोलतो तेव्हा तसा विवेक माझ्या ठायी आहे असा माझा अजिबात दावा नाही. परंतु असा विवेक असावा अशा पद्धतीचे भान मला आज आहे असे माझे प्रामाणिक मत आहे. यामताबद्दल विरोध असु शकतो परंतु असा विरोध नोंदवण्याआधी माझे मत समजुन घेतले जावे अशी माझी माफक अपेक्षा आहे. इतिहासकालिन कादंबरी आणि काल्पनिक कादंबरी यामधे प्रमुख भेद हा असतो की दोन्ही मधील व्यक्तिरेखा पुर्णपणे भिन्न असतात. इतिहासकालीन कादंबरीमधील व्यक्ती प्रत्यक्षात जीवन जगलेल्या असतात. त्यांच्या संबंधी, त्यांच्या गुणावगुणांविषयीचे उल्लेख कुठे न कुठेतरी नोंदले गेलेले असतात. अशा व्यक्तिंचे चित्रण करतांना त्यांच्या या उल्लेखांना बाजुला सारता येणे अवघड असते. काल्पनिक व्यक्तिरेखा आपण हव्या तशा गुणांची बनवु शकतो. प्रसंगी त्यांच्यातील मनुष्याला बाजुला सारत सुपरहिरो बनवु शकतो. मात्र ऐतिहासिक कादंबरीमधे हे घडणे अवघड असते. पण कादंबरीकार मात्र हे भान न ठेवता हिरोला सुपर हिरो करतातच पण प्रसंगी व्हिलनला सुद्धा सुपरहिरो बनवतात. भारतासारख्या इतिहासाबद्दल अक्षम्य बेपर्वाई असलेल्या पण इतिहासाबद्दल अत्यंत उर्मट अहंभाव असलेल्या देशामधे ऐतिहासिक कादंबरीच्या नावाखाली वाटेल ते दडपणे गेल्या काही वर्षांमधे सुरु झाले आणि तशा कथानकांमधुन पुढे आलेला इतिहास हाच खरा इतिहास आहे अशी भ्रामक समजुत विशेषत: महाराष्ट्रात पसरली. अशा कथानकांमधले अग्रेसर नाव स्वामी कादंबरी आहे. आज मला स्वामी कादंबरी अजिबात आवडत नाही. मी आजही तिचे वाचन करेन परंतु काही वर्षांपुर्वी ज्या भावुकतेने मला ती कादंबरी आवडली होती तशी आज आवडत नाही.
स्वामी कादंबरी ज्या काळात आली त्या काळात साहित्य हे ब्राह्मणांचे ब्राह्मणांनी ब्राह्मणांसाठी लिहिलेले अशा एका परिघात अडकलेले होते. नाही म्हणायला इतर लेखक होते, परंतु त्यांचा आवाका मर्यादीत होता आणि त्यांची मजल पुणे वा दादर मधुन शाबासकी मिळावी इतकाच होता. त्यापलिकडे वाचकवर्गच नव्हता आणि प्रकाशन व्यवसाय मक्तेदारी असल्याने वेगळे काही लिहिलेले छापले जाण्याचा संभव नव्हता. अहो रुपम अहो ध्वनी करुन पाठखाजवणी करुन पैसे कमवणे आणि जमल्यास नाव कमवणे हे उद्देश असल्यावर जशी साहित्यनिर्मिती होईल ती तशी त्या काळात झाली. बहुधा हे पुरातन काळापासुन आहे. मुद्दा हा आहे की अशा काळात एखादी कादंबरी जी ब्राह्मणांची अहंता जोपासेल, त्यांच्या गतकालीन वैभवाची (!) जाण करुन देईल, त्यांच्या अक्षम्य चुकांवर पांघरुण घालेल नव्हे त्यांचा उल्लेख सुद्धा टाळेल, देव देश आणि धर्माच्या पेल्यातील अमृत प्यायला देऊन निवांत झोप आणेल, वर्तमानातील समस्यांना क्षणभर अंधारकोठडीत टाकून कर्तृत्वाचे धगधगते पलिते ह्या हातातुन त्या हातात झेलत भुतकाळातील तथाकथित संग्राम सावल्यांच्या खेळाच्या रुपात मांडून जागरणाने डोळे विस्फारत अभिमानाने डोलवायला लावेल अशा कथानकाची गरजच त्या काळात निर्माण झालेली होती. ती गरज स्वामीने पूर्ण केली.
४८ च्या गांधीहत्येनंतर ब्राह्मणांचे सामाजिक आयूष्य संपले. राजकीय आयुष्य १९२० ला टिळकांच्या मृत्युसमवेत संपले. ५२ चा कुळकायदा ब्राह्मणांचे आर्थिक आयुष्य संपवणारा ठरला. अशा प्रकारे २० ते ५२ अशा सुमारे ३०-३५ वर्षांच्या आत गेली दोन ते तीन हजार वर्षे भारतात आणि महाराष्ट्रात समाजाच्या जडणघडणीवर ब्राह्मणांचा पगडा होता तो संपून गेला. तसा तो सातव्या आठव्या शतकात मुहम्मद बिन कासिमच्या आक्रमणापासुन संपू लागलाच होता. आणि सुरु झाला होता एक काळा कालखंड ज्यामधे अस्तित्व टिकवण्यासाठी वाटेल ते करण्याचे उरफाटे धंदे. इस १००० च्या पुर्वीचा ब्राह्मण आणि इस १००० नंतरचा ब्राह्मण यामधे प्रचंड फरक आहे. अगदी जसा वैदिक कालखंडातील सर्वशक्तीमान, दयाळु राजा इंद्र आणि पुराणकथांमधुन समोर आलेला लंपट, लबाड इंद्र यांच्या सारखा. याचा अर्थ इस १००० नंतरचे सगळेच ब्राह्मण वाईट असा अर्थ नाही. समाजातील इतरही घटक साथीला असतांना जे घडू शकते तेच ह्या कालखंडात झाले. समाजातील योग्य घटकांनी अयोग्य गोष्टींकडे दुर्लक्ष केले की समाजाचे पतन निश्चित होत असते. ब्राह्मणांचे तेच झाले. वैयक्तिक लाभ अन हिशेब यांच्या नादात पेशवाई पतन पावली. नव्या साम्राज्यात कारकुनीशिवाय काही करता आले नाही. थोडेफार बरे निपजले ते फासावर गेले किंवा समाजाकडून धिक्कारले गेले. टिळकांच्या अस्ताबरोबर ब्राह्मणांची राजकीय घुसमट झाली. ६० च्या दशकात ब्राह्मण समाज म्हणून संपलेला होता.
अशा वेळेस स्वामी कादंबरी समोर आली. ब्राह्मणांची थोडीफार जमीन उरली होती तिचे वाटणीवरुन कज्जे चालु होते. नोकरी करुन आपण बरे आपली बायको बरी अशी विचारसरणी दृढ होत होती. एकत्र कुटुंब भांडणात तुटत होते किंवा सकाळ संध्याकाळ भांडे आदळत दात ओठ आवळत होते. तिन्ही लोकी भ्रष्ट पण आम्हीच श्रेष्ट असा फुकाचा अहंभाव वाढत होता. हा आपला तो त्यांचा असे वर्गीकरण मनात सुरु झाले होते. गाव सोडून शहरात आल्यामुळे गावची बलुतेदारी आणि जातीव्यवस्था सुटली होती. पण त्यामुळे इतर जातीच्या लोकांशी मिसळून वागण्याची गरज संपली होती. सोसायटीत आजुबाजुला ब्राह्मणच असावे असा आग्रह आणि कटाक्ष पाळला जात होता. त्यामुळे गावाकडुन शहरात विशिष्ट उपनगरातच घर घेतले जात होते. या सर्व घडामोडीत आपण ब्राह्मण असून धड शिक्षण नाही, धड नोकरी नाही, चार पैसे गाठीला नाहीत ह्याचा विचार न करता जुनी कर्मकांडे मात्र अगदी व्यवस्थित पुन्हा सुरु केली होती. प्रसंगी कर्ज काढले जात होते. मुंजीचे औचित्य संपुन दोन हजार वर्षे उलटली आहेत पण ब्राह्मण अजुनही मुंजीत अडकला होता. मानपान देणे घेणे यातच पुरुषार्थ शोधत होता. अशा ब्राह्मण मनाला स्वामी कादंबरीची भुरळ पडली.
काका पुतण्याच्या भांडणात, माधवरावाच्या देवभक्तीत, लांबुन लांबुन केल्या जाणार्या प्रेमकुजनात, संतापुन चाबकाचे फटके देऊन शासन करणार्या माधवरावात, हताश गोपिकाबाईत, राघोबादादात, नानात प्रत्येकात ब्राह्मण समाज स्वत:ला शोधत होता. स्वत:ला रमवत होता. गतकाळाच्या स्मृतीमधे आजचा वर्तमान विसरत होता. ब्राह्मणसमाजाने स्वामीला डोक्यावर घेतले. त्या कादंबरीत खरे किती खोटे किती हा संशोधनाचा विषय आहे. कादंबरी आवडलेल्यांना त्याची फिकीर नाही. हीच गोष्ट संपूर्ण पेशवाई बद्दल आहे. हीच गोष्ट इतिहासातील कुठल्याही कालखंडाबद्दल आहे. इतिहास कसाही असो कादंबरी आम्हाला हवी तशीच हवी ही वाचकांची मागणी आहे. ही मागणी स्वामी पूर्ण करते. ब्राह्मण जे करतो जसे वागतो बोलतो तसे इतर समाज करत असतो हे बर्याचदा आढळले आहे. त्याचमुळे नंतर इतर समाजातील लोकांना सुद्धा स्वामी कादंबरी आवडु लागली. कारण समस्या सर्वच समाजात असतात. आणि वर्तमान विसरुन भुतकाळात रमायला अनेकांना आवडते.
स्वामी मला का आवडत नाही याची कारण मिमांसा तुम्हाला कदाचित पटणार नाही. पटावी असा माझा आग्रह नाही. माझ्या कारण मीमांसेमधे काही चुका असण्याची शक्यता मी नाकारत नाही. कालानुरुप माझी मते बदलत असतात त्यात मला कमीपणा वाटत नाही. स्वामी मला का आवडत नाही याची कारणे तुम्ही शांतपणे वाचलीत याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि हे आभार नोंदवणे मला माझे कर्तव्य वाटते.
वाचने
16726
वाचनखूण
प्रतिक्रिया
70
परखड मुक्तक आवडले!
प्रांजळ लिखाण एकंदरित आवडले.
> राजकीय आयुष्य १९२० ला
In reply to > राजकीय आयुष्य १९२० ला by मनो
आपल्या प्रतिक्रियेबद्दल
In reply to आपल्या प्रतिक्रियेबद्दल by अहिरावण
हळू आवाजात बोला,!
In reply to आपल्या प्रतिक्रियेबद्दल by अहिरावण
माझ्या मते .. गुप्त काळापासून
पण कादंबरीकार मात्र हे भान न
In reply to पण कादंबरीकार मात्र हे भान न by टर्मीनेटर
> ते पात्र खरेच तसे पराक्रमी
In reply to > ते पात्र खरेच तसे पराक्रमी by मनो
अच्छा, म्हणजे जंगल मे मोर
प र ख ड
जे काल होते ते आज नाही आणि आजचे उद्या नाही ...
In reply to जे काल होते ते आज नाही आणि आजचे उद्या नाही ... by चित्रगुप्त
आपल्या मतांचा आदर आहेच.
लेख आवडला
वाचकाचे वय....
In reply to वाचकाचे वय.... by कर्नलतपस्वी
काही प्रश्न
In reply to काही प्रश्न by भागो
@भागो...
In reply to @भागो... by कर्नलतपस्वी
कर्नल साहेब
In reply to वाचकाचे वय.... by कर्नलतपस्वी
आपल्या प्रतिक्रियेबद्द्ल
ऐतिहासिक गाजलेल्या कादंबऱ्या
In reply to ऐतिहासिक गाजलेल्या कादंबऱ्या by कंजूस
:)
In reply to :) by अहिरावण
हे बरीक खरे. गदर-२ वगैरे.
चित्रदर्शी लेखन, निवेदन, आणि चित्रीकरण
In reply to चित्रदर्शी लेखन, निवेदन, आणि चित्रीकरण by सर टोबी
सरजी प्रतिसाद एकदम पातला.
In reply to सरजी प्रतिसाद एकदम पातला. by भागो
सरजी प्रतिसाद एकदम पटला.
In reply to चित्रदर्शी लेखन, निवेदन, आणि चित्रीकरण by सर टोबी
लय भारी !
माझे विरोधी
In reply to माझे विरोधी by सौन्दर्य
इतर कोणालाही जाणवला नाही पण
ब्राह्मण जे करतो जसे वागतो बोलतो तसे इतर समाज करत असतो हे बर्या
In reply to ब्राह्मण जे करतो जसे वागतो बोलतो तसे इतर समाज करत असतो हे बर्या by धर्मराजमुटके
सहमत आहे. सध्याचे दलित,
सर्व वाचक, प्रतिसादकांचे आभार
लेख अत्यंत आवडला
In reply to लेख अत्यंत आवडला by स्वधर्म
हे हिंदवी स्वराज्य व्हावे
In reply to हे हिंदवी स्वराज्य व्हावे by अहिरावण
शिवाजी महाराजांच्या मनात
In reply to शिवाजी महाराजांच्या मनात by सुबोध खरे
अरे हो हो !
In reply to अरे हो हो ! by अहिरावण
दख्खन वाचला ह्यात शंका नाही.
In reply to दख्खन वाचला ह्यात शंका नाही. by चौकस२१२
"सुरुवात केली" असे वाचावे
In reply to अरे हो हो ! by अहिरावण
विनायक दामोदर सावरकर यांची
In reply to शिवाजी महाराजांच्या मनात by सुबोध खरे
रजपुतांचे तसे मत नसावे. उदा
In reply to शिवाजी महाराजांच्या मनात by सुबोध खरे
वस्तुस्थिती डोळेझाक करायची
हिंदवी - म्हणजे हिंदू नव्हे
त्यांनी त्यांचे कर्म केले ...
शिवाजी महाराजांना सेक्युलर
In reply to शिवाजी महाराजांना सेक्युलर by सुबोध खरे
तुमचा संदर्भरहीत अस्थानी
In reply to तुमचा संदर्भरहीत अस्थानी by अहिरावण
या भूमंडळाचे ठायी
धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्रधर्म राहिला काही
तुम्हा कारणे! कित्येक दुष्ट संहारिला कित्येकासी धाक सुटला कित्येकासी आश्रयो जाहला शिवकल्याण राजा! हे समर्थ रामदास स्वामी नि सोळाव्या शतकात लिहून ठेवले आहेIn reply to या भूमंडळाचे ठायी by सुबोध खरे
:)
In reply to :) by अहिरावण
ब्वॉर्र
In reply to शिवाजी महाराजांना सेक्युलर by सुबोध खरे
अॅहॅ रे नॅरेटिव्ह
In reply to अॅहॅ रे नॅरेटिव्ह by सुरिया
आरशाच्या पलीकडे गेल्यास आपला
In reply to आरशाच्या पलीकडे गेल्यास आपला by सुबोध खरे
जय हो सुभाषित बाबा की
In reply to अॅहॅ रे नॅरेटिव्ह by सुरिया
नॅरेटिव्ह पसरवयाचे धंदे?
In reply to नॅरेटिव्ह पसरवयाचे धंदे? by चौकस२१२
हीहीही
In reply to हीहीही by सुरिया
टूल किट म्हणजे काय रे भाऊ !
In reply to शिवाजी महाराजांना सेक्युलर by सुबोध खरे
हा डावा दांभिक पणा आता
यांचा लेख....
In reply to यांचा लेख.... by कर्नलतपस्वी
स्वामी होणे फार कठीण कमीत कमी
स्वामी, श्रीमान योगी ह्या
एका जातीवर आग पाखड करणे हा दिसला .. मिपावर हे चालते?
@चौकसभौ,
In reply to @चौकसभौ, by कर्नलतपस्वी
कर्नल साहेब आपण नक्की
In reply to कर्नल साहेब आपण नक्की by चौकस२१२
तुम्हांला नाही हो
सर्व वाचक प्रतिसादकांचे
In reply to सर्व वाचक प्रतिसादकांचे by अहिरावण
असेच व्यक्त होऊ ! डाव्यांना
In reply to असेच व्यक्त होऊ ! डाव्यांना by चौकस२१२
अजेंडा? हा हा हा
In reply to सर्व वाचक प्रतिसादकांचे by अहिरावण
काही डाव्यांना मी उजवा वाटतो,
स्वामी...
मीन व्हाईल, राजकीय पक्षांच्या
निषेध
In reply to निषेध by सौन्दर्य
आपल्या आकलन क्षमतेचे मला
लेखकांनी स्वामी कादंबरीचे
In reply to लेखकांनी स्वामी कादंबरीचे by चौकस२१२
आपली शोध पत्रकारीता वंदनीय