नेणतां वैरी जिंकती.
नेणतां अपाई पडती.
नेणतां संहारती घडती.
जीवनाश.
समर्थ म्हणतात नेणते पणामुळे शत्रु पराभव करतात. संकटे येतात. फडशा उडतो आणि जीवनाश होतो.
या मृत्यू लोकात येताच छोट्या बाळालाही जाणण्याचा प्रयत्न करावा लागतो. बिना जाणता आईचे दूध प्राशन करणे ही त्याला जमणे शक्य नाही. शिक्षण असो, प्रपंच असो, आध्यात्मिक मार्गावर वाटचाल किंवा राजनीती असो जो जाणण्याचा प्रयत्न करत नाही तो त्याच्या क्षेत्रात असफल होतो.
समर्थांनी ही ओवी बहुधा राजनेत्यांसाठी रचली आहे. एका राजनेत्याला प्रजा सुखी आहे की नाही, प्रजेच्या गरजा किती, सरकारी अधिकारी त्यांच्या कर्तव्यांचे पालन करत आहेत की नाही, इत्यादी जाणण्याची गरज असते. ते जाणूनच राजा प्रजेच्या हितासाठी पाऊले उचलतो. या शिवाय राजाला त्याचे आंतरिक आणि बाह्य शत्रू किती, शत्रूंची शक्ती किती, त्यांचे मनसुबे काय, त्यांच्या हालचाली काय, इत्यादींवर लक्ष ठेवावे लागते. जो राजा शत्रूचे मनसुबे जाणण्याच्या प्रयत्नात कसूर करतो त्याचा पराभव होतो. त्याची सत्ता जाते आणि कधी- कधी जीव ही जातो. हे सर्व जाणण्यासाठी राजा गुप्तचर ठेवतो. जे त्याला सर्व माहिती पुरवितात. ज्या राजा जवळ सक्षम गुप्तहेर यंत्रणा असते त्याचा पराभव होणे शक्य नाही. छत्रपति शिवाजी महाराजांपाशी सक्षम गुप्तहेर यंत्रणा होती. ती प्रत्येक मोहिम पूर्वी शत्रूचे बल, त्याच्या हालचाली, त्याचे दुर्बळ पक्ष इत्यादींची अचूक माहिती पुरवायची. या माहिती आधारावर राजे रणनीती निर्धारित करत होतो. त्यामुळेच राजे अफझल खानाचा वध करू शकले, शाहिस्ता खानाचे बोटे कापू शकले आणि आग्र्याहून सकुशल स्वराज्यात परत येऊ शकले.
दुसरीकडे आपले पहिले प्रधानमंत्री नेहरुजी, चीन ने 1950 मध्ये तिब्बत गिळंकृत केला, तरी ही ते हिंदी चिनी भाई-भाईच्या दिवास्वप्नात मग्न राहिले. चीनचे मनसुबे जाणण्याचा प्रयत्नच केला नाही. परिणाम 1962 मध्ये आपला दारुण पराभव झाला. त्यांनी चीनचे मनसुबे जाणण्याचा प्रयत्न केला असता तर 1950 ते 1962 हा १२ वर्षांचा कालावधी चीन सोबत असलेल्या सीमेला सुरक्षित करण्यासाठी पर्यात होता. आपला पराजय झाला नसता.
राजनीती क्षेत्रात सफल होण्यासाठी नेत्यांनी समर्थांची ही ओवी आचरणात आणली पाहिजे.
वाचने
4505
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
समर्थांची ओवी
सुरेख!
आता पुढील ओव्यांचे प्रवचन
सहमत
In reply to आता पुढील ओव्यांचे प्रवचन by अहिरावण
सुमारे साडेतीनशे वर्ष
सहमत.
In reply to सुमारे साडेतीनशे वर्ष by सर टोबी
१००% सहमत
In reply to सुमारे साडेतीनशे वर्ष by सर टोबी
+१
In reply to सुमारे साडेतीनशे वर्ष by सर टोबी
दुसरीकडे आपले पहिले
नेहरूंहद्दल ”जया अंगी मोठेपण
In reply to दुसरीकडे आपले पहिले by भागो
नेहरूंच्या वडीलांपासून ते
In reply to नेहरूंहद्दल ”जया अंगी मोठेपण by अमरेंद्र बाहुबली
अधिकांश प्रतिसाद विषयाला धरून
जिथे तुम्ही विषयाला धरुन
In reply to अधिकांश प्रतिसाद विषयाला धरून by विवेकपटाईत
जाणता राजा.