#तूम्हणालास
तू म्हणालास "सवय लावून घेऊ नये"
"मन बिघडू देऊ नये, उगा जीव लाऊ नये."
पण "नये नये" चा पाढा कधी अर्ध्यावरती चुकतोच ना?
मुकाट्यानं त्याचे परिणाम भोगत आपण असतोच ना?
कित्ती दिवसांत भेट सोडा, एक साधा शब्द नाही.
कुणी वेडं वेड्या सारखं वेडी वाट बघतंच ना?
"कामात व्यस्त" पटतं, "अपेक्षा चूक" कळतं.
पण मोबाईल हातामध्ये रोज घेऊन बसतंच ना?
मगं कुणी ठरवतं, आता मात्र बदलायचंच.
वेडेपणा सोडून आता शहाण्यासारखं वागायचंच.
यापुढे आपणहून बोलायला कधी जायचंच नाही.
समोरसमोर (समजा) आलोच तरी भेटायचं तर नाहीच नाही.
हो नाही च्या पुढे गाडी कधी न्यायचीच नाही
एकदा ठरलं म्हणजे ठरलं, दगडावरची रेघ जणू!
असूदे का डोळ्