Skip to main content

मुक्त कविता

आठवणींचा पाऊस

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 13/07/2022 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रभर पडणारा पाऊस सकाळी नकोसा होतो कितीही हलका का असेना जेव्हा सतत बरसतो संध्याकाळी उदास वातावरणात मुसळधार कोसळतो तेव्हा नको त्या आठवणींचा पूर मात्र मनात येऊन जातो रात्र उदास जाण्याची चाहूल लागते मग रात्रभरचा पाऊस नकोसा होतो. - पाभे १३/०७/२०२२

वळण नसलेल्या वाटेवर

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 27/06/2022 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
*वळण नसलेल्या सरळ वाटेवर* जेंव्हा कोणीतरी खास भेटतं मग सरळ रेषेतलं आयुष्य नागमोडी होऊन जातं वादळ आणी पाऊस मग नित्याच होतं पण वादळा पूर्वीची शांतता सोसण मात्र असह्य होतं सोसाट्याचा वारा ,गारांचा मारा संतत श्रावणधार, रस्ता चिबं होतो आणी हवाहवासा गारवा वाटेवर पसरतो भिजलेला रस्ता,दाटलेली हिरवळ पुन्हा एकदा कुशीत येते अन वाटेवरली मरगळ त्वरीत निघून जाते आसेच कुणीतरी खास भेटावे प्रत्येकाला वाटते मग नागमोडी वाट सुद्धा सरळ भासते २७-६-२०२२

कोण?

लेखक सरीवर सरी यांनी शनिवार, 28/05/2022 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
मोकळ्या अवकाशाचे अंगण हाक कोणाची? मधाळ चांदण उरात धडधड अनवट वाटा धाडतो कोण?निमीष लाटा मेघांनी बांधले स्वप्नांचे झुले कोण?उधळतो ढगांची फुले धारा ..वारा..स्वैर पसारा देह कोणाचा?संचित पहारा ज्योत दिव्याची अधीर नाही ओह?पाकोळीची तिज तिलांजली मेंदीचा गंध वेचला भाव विभोरी उमलली संध्या मिटण्या भु-वरी?
काव्यरस

ब्लिडींग हार्ट....

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 26/05/2022 08:16 या दिवशी प्रकाशित केले.
खुप दिवस मनात होते की "रक्तस्त्राव हृदय फुले" दिसावीत. अंतरजालावर एका राजकुमाराची प्रेमकहाणी वाचली म्हणूनच कुतूहल वाढले होते.सकाळची फिरण्याची सवय आज कामाला आली.ज्या झुडूपवर्गीय वनस्पतीला रक्तस्त्राव हृदया फुले येतात ते झुडूप एके ठिकाणी दिसले. जवळच "रडणार्‍या चेरी चे झाड (विपींग चेरी)",बघुन काय वाटले ते लिहीण्याचा प्रयत्न.

#तू म्हणालास

लेखक प्राची अश्विनी यांनी सोमवार, 16/05/2022 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
#तूम्हणालास तू म्हणालास "सवय लावून घेऊ नये" "मन बिघडू देऊ नये, उगा जीव लाऊ नये." पण "नये नये" चा पाढा कधी अर्ध्यावरती चुकतोच ना? मुकाट्यानं त्याचे परिणाम भोगत आपण असतोच ना? कित्ती दिवसांत भेट सोडा, एक साधा शब्द नाही. कुणी वेडं वेड्या सारखं वेडी वाट बघतंच ना? "कामात व्यस्त" पटतं, "अपेक्षा चूक" कळतं. पण मोबाईल हातामध्ये रोज घेऊन बसतंच ना? मगं कुणी ठरवतं, आता मात्र बदलायचंच. वेडेपणा सोडून आता शहाण्यासारखं वागायचंच. यापुढे आपणहून बोलायला कधी जायचंच नाही. समोरसमोर (समजा) आलोच तरी भेटायचं तर नाहीच नाही. हो नाही च्या पुढे गाडी कधी न्यायचीच नाही एकदा ठरलं म्हणजे ठरलं, दगडावरची रेघ जणू! असूदे का डोळ्
काव्यरस

वसंतात मृगजळ खास

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 29/04/2022 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
काठावरचे गुपित झेलता अनु'मतीची महत्ता विशेष वसंताचे मृगजळ खास कटी बंधात उष्म निश्वास नभी नाभी ताम्र गोल चा'लते जातो तोल आर्त कुंजन आस पास पर्ण विरहीत पुष्प तटी दाट दिंगबर सुरेख मदन पाझरतो . . . . . . . स्वतःच्याच कवितेच्या विडंबनाचा विचार केला आणि कवितेतला(च) मदन अकस्मिक पाझरला. ;)

उष्णकटिबंधीय वसंत

लेखक माहितगार यांनी सोमवार, 25/04/2022 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
वनस्पति उद्यानातून फेरफटका मारताना माहितीची पाटी नसलेले झाड पाहून साहित्यिक राजूमधील चौकश्याने विचारले हे झाड कोणते? त्याचा वनस्पती वैज्ञानिक मित्र म्हणाला उष्णकटिबंधीय म्हणजेच ट्रॉपीकल! (राजूने वेळ मारून नेणे कंसात जोडले) वनस्पती वैज्ञानिक मित्राने राजूची वसंत ऋतूवरील कविता ऐकुन झाल्यावर मोबाईलवर मराठी विकिपीडियावरचे वसंत ऋतूचे पान उघडत राजूला विचारले वसंत ऋतू आला हे कसे ओळखायचे ? झाडाला फुले लागल्यावर की कोकीळेने कुहू कुहू केल्यावर की वसंतऋतूवरील कविता ऐकल्यावर?

रोज किती पाणी प्यावे?

लेखक माहितगार यांनी रविवार, 24/04/2022 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
रोज किती पाणी प्यावे? शरीराची गरज असेल एवढे आणि आधुनिक विज्ञानाने सुविद्य डॉक्टर सुचवतील तेवढे रोज किती पाणी प्यावे? अन्न पिकविण्यासाठी शेतीसाठी शिल्लक राहील एवढे रोज किती पाणी प्यावे? शेती आणि शरीरांची गरज यांचे गणित नाही जुळली तर इतर अपव्यय टाळून लोकसंख्या नियंत्रणाचे महत्व ईतर चार जणांना पटवून शरीराची गरज भागेल तेवढे

आङळे वाङळें साहित्य संमेलन

लेखक माहितगार यांनी रविवार, 24/04/2022 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
आङळे वाङळें साहित्य संमेलन आङळे वाङळेंना म्हणाली मराठी साहित्य संमेलनाला नाही गेलात कसे ते? वाङळें आङळेंना म्हणाला तुमच्या आङळीकेचे साहित्याने अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला जागा आता उरलीच कुठे ?

प्रवास

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 28/03/2022 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
अथांगाचा तळठाव अज्ञेयाचा पैलतीर विराटाची पराकाष्ठा सूक्ष्मातील शून्याभास खुणावती ऐसे सारे क्षणोक्षणी अविरत जरी जटिल तरीही जीवा लावतात ध्यास नादावतो या ध्यासाने ठेचाळतो जागोजाग असे खडतर तरी भूल घाली हा प्रवास
काव्यरस