मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एकदाच काय ते बोलून टाकू

मित्रहो ·

आता म्हात्रे पुलावर खुप गर्दी असते. कोथरूड कडून वैकुंठा कडे जाण्यासाठी एकमेव रस्ता. प्रेमवीर आणी वीरांगना साठी झेड ब्रिज ,भिडे पुलावर पालिकेने जागा बनवून दिली आहे. आमच्यावेळी संभाजी पार्क किंवा लाॅ काॅलेजची टेकडी ही ठिकाणे होती.

मित्रहो 13/04/2023 - 20:56
धन्यवाद कर्नल तपस्वी आणि चित्रगु्ृृप्त @कर्नल तपस्वी माहितीबद्दल धन्यवाद आता खूप वर्षांनी कोथरुड परिसरात गेलो असताना काही ओळखू येत नव्हते. चालायचेच शहरे बदलतात. @चित्रगुप्त हा हाहा. हल्ली उत्सव चित्रपटाच्या काळातले दिवस राहिले नाही तेंव्हा वीरांगणाच ठिक आहे.

चौथा कोनाडा 08/05/2023 - 12:47
मस्त कविता. पुण्यातले स्थान सदर्भ गम्मतशीर वाटले. "एकदाच काय ते बोलून टाकू" पण तुमच्या सारखं आम्हाला जमत नाही ना !

आता म्हात्रे पुलावर खुप गर्दी असते. कोथरूड कडून वैकुंठा कडे जाण्यासाठी एकमेव रस्ता. प्रेमवीर आणी वीरांगना साठी झेड ब्रिज ,भिडे पुलावर पालिकेने जागा बनवून दिली आहे. आमच्यावेळी संभाजी पार्क किंवा लाॅ काॅलेजची टेकडी ही ठिकाणे होती.

मित्रहो 13/04/2023 - 20:56
धन्यवाद कर्नल तपस्वी आणि चित्रगु्ृृप्त @कर्नल तपस्वी माहितीबद्दल धन्यवाद आता खूप वर्षांनी कोथरुड परिसरात गेलो असताना काही ओळखू येत नव्हते. चालायचेच शहरे बदलतात. @चित्रगुप्त हा हाहा. हल्ली उत्सव चित्रपटाच्या काळातले दिवस राहिले नाही तेंव्हा वीरांगणाच ठिक आहे.

चौथा कोनाडा 08/05/2023 - 12:47
मस्त कविता. पुण्यातले स्थान सदर्भ गम्मतशीर वाटले. "एकदाच काय ते बोलून टाकू" पण तुमच्या सारखं आम्हाला जमत नाही ना !
लेखनविषय:
होळीच्या पूर्वसंध्येवर एक हलकीफुलकी कविता लिहिली होती. खास पुणेकर प्रेमींसाठी, यात बरेचसे पुण्याचे संदर्भ आहेत.

अशीच एक धुंद, सोनेरी सायंकाळ - (आणि अंतिम वगैरे सत्य)

चित्रगुप्त ·

कै च्या कै कविता!! एकदम मनोरंजक. मिपावर हॅश टॅग# एक धुंद सोनेरी/गुलाबी ,सकाळ्/संध्याकाळ सुरु झालाय की काय असे वाटुन गेले क्षणभर. कोs हं ? … मी कोण आहे ? मै कौन हूँ ? व्हू आयाम ? यावरुन पुलंच्या "आयाम द हु इन द यु इन द यु" (असामी असामी बहुतेक) ची आठवण झाली. बाकी ते तळ्याकाठी "तशा" मुली भेटतील असे वाटत नाही.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

चित्रगुप्त 02/02/2023 - 12:22
तळे तळे पे डिपेंड है बॉस. आपुन ने ऐसा तळा देखेला है. वैसे ये थोडी आपुनकीबी ष्टोरी है. आर आर आबा ने बंबईसे बारबाला लोगोंको भगाया था तब आपुन के गाव मे भी वो छोरियां आ गई थी. तब तळे पे होता था ये झमेला.

अशाच एका कातरवेळी ती मी आणी तळ्याचा किनारा निरव शांतता अन सुगंधित वारा ओ शाब, काय लाज शोरम बिरोम गुरखा दणादण शिट्ट्या वाजवीत होता.

कै च्या कै कविता!! एकदम मनोरंजक. मिपावर हॅश टॅग# एक धुंद सोनेरी/गुलाबी ,सकाळ्/संध्याकाळ सुरु झालाय की काय असे वाटुन गेले क्षणभर. कोs हं ? … मी कोण आहे ? मै कौन हूँ ? व्हू आयाम ? यावरुन पुलंच्या "आयाम द हु इन द यु इन द यु" (असामी असामी बहुतेक) ची आठवण झाली. बाकी ते तळ्याकाठी "तशा" मुली भेटतील असे वाटत नाही.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

चित्रगुप्त 02/02/2023 - 12:22
तळे तळे पे डिपेंड है बॉस. आपुन ने ऐसा तळा देखेला है. वैसे ये थोडी आपुनकीबी ष्टोरी है. आर आर आबा ने बंबईसे बारबाला लोगोंको भगाया था तब आपुन के गाव मे भी वो छोरियां आ गई थी. तब तळे पे होता था ये झमेला.

अशाच एका कातरवेळी ती मी आणी तळ्याचा किनारा निरव शांतता अन सुगंधित वारा ओ शाब, काय लाज शोरम बिरोम गुरखा दणादण शिट्ट्या वाजवीत होता.
अशाच एका धुंद, सोनेरी संध्याकाळी सहज फिरायला निघालो होतो सहज मंजे मुद्दामच … – मला स्वतःशीच मोठ्याने बोलण्याची खोड आहे – घरात उगाच तमाशा नको म्हणून बाहेर पडलो. नकळत पाय तळ्याकाठच्या शांत रस्त्यावर वळले – मनात तात्त्विक वगैरे विचार घोळत होते. कोs हं ? … मी कोण आहे ? मै कौन हूँ ? व्हू आयाम ? सोs हं ! … मी तो आहे. तो मी आहे. या साडेचार फुटी कुडीत अडकलेला - अविनाशी,अमर, स्वयंप्रकाशी आत्मा आहे मी निर्विकार चेतना आहे मी ब्रम्ह, मी सत्य, मी कैवल्य आहे मी कर्ता, मी भोक्ता, मी ज्ञाता आहे मी साक्षी, मी सर्वसाक्षी, मी निर्लिप्त- निखळ जाणीव आहे.

उष्णकटिबंधीय वसंत

माहितगार ·

पुरणपोळ्या पचल्यावर साखरेच्या गाठ्या दिसल्यावर आभाळातली पाने खाली पडल्यावर जमीनी वरची फुलं आभाळात गेल्यावर जेव्हा नसती हुरहूर संपते आणी मनी उधाण वारे शिरते तेव्हा समजावे शिशीराचे दिवस सरले आणी ऋतुराज वसंत अवतरले. मुक्तक आवडले

पुरणपोळ्या पचल्यावर साखरेच्या गाठ्या दिसल्यावर आभाळातली पाने खाली पडल्यावर जमीनी वरची फुलं आभाळात गेल्यावर जेव्हा नसती हुरहूर संपते आणी मनी उधाण वारे शिरते तेव्हा समजावे शिशीराचे दिवस सरले आणी ऋतुराज वसंत अवतरले. मुक्तक आवडले
वनस्पति उद्यानातून फेरफटका मारताना माहितीची पाटी नसलेले झाड पाहून साहित्यिक राजूमधील चौकश्याने विचारले हे झाड कोणते? त्याचा वनस्पती वैज्ञानिक मित्र म्हणाला उष्णकटिबंधीय म्हणजेच ट्रॉपीकल! (राजूने वेळ मारून नेणे कंसात जोडले) वनस्पती वैज्ञानिक मित्राने राजूची वसंत ऋतूवरील कविता ऐकुन झाल्यावर मोबाईलवर मराठी विकिपीडियावरचे वसंत ऋतूचे पान उघडत राजूला विचारले वसंत ऋतू आला हे कसे ओळखायचे ? झाडाला फुले लागल्यावर की कोकीळेने कुहू कुहू केल्यावर की वसंतऋतूवरील कविता ऐकल्यावर?

रोज किती पाणी प्यावे?

माहितगार ·

माहितगार 25/04/2022 - 14:51
@ पैजारबुवा, फॉर्मात वगैरे नाही तसे रतीबाच्या जिलब्याच टाकल्या आहेत, तुम्ही आवर्जून प्रतिसाद दिला, चौथा कोनाडांनी मुक्तकाला काव्य म्हणाले आणि डॉ. कुमारांनी सुद्धा दाद दिली तर अंमळ सुखावलो नाही असे नाही. अनेक आभार

माहितगार 25/04/2022 - 14:51
@ पैजारबुवा, फॉर्मात वगैरे नाही तसे रतीबाच्या जिलब्याच टाकल्या आहेत, तुम्ही आवर्जून प्रतिसाद दिला, चौथा कोनाडांनी मुक्तकाला काव्य म्हणाले आणि डॉ. कुमारांनी सुद्धा दाद दिली तर अंमळ सुखावलो नाही असे नाही. अनेक आभार
रोज किती पाणी प्यावे? शरीराची गरज असेल एवढे आणि आधुनिक विज्ञानाने सुविद्य डॉक्टर सुचवतील तेवढे रोज किती पाणी प्यावे? अन्न पिकविण्यासाठी शेतीसाठी शिल्लक राहील एवढे रोज किती पाणी प्यावे? शेती आणि शरीरांची गरज यांचे गणित नाही जुळली तर इतर अपव्यय टाळून लोकसंख्या नियंत्रणाचे महत्व ईतर चार जणांना पटवून शरीराची गरज भागेल तेवढे

शब्दांची कर्णफुले

पाषाणभेद ·
शब्दांची कर्णफुले प्रसन्न सुंदर सुगंधी सकाळी प्रेम बरसले अवचीत अवकाळी नाहत्या ओलेत्या भोर केशांतून थेंब तयाचे अवतरले भाळी ओठी शब्द फुलून आले शब्दांचे मग मोती झाले तु ते हळूवार उचलूनी घेत कर्णफुलांसम कानी ल्याले (मिपाच्या यंदाच्या दिवाळीअंकासाठी काही उत्पादन करावे म्हणून या शब्दफुलांचे उत्पादन घेतले होते. पण आम्हा शब्दशेतकर्यांच्या मनाच्या गोदामात अनेक प्रकारचा लगोलग नष्ट पावणारा पण भरघोस उत्पन्न मिळणारा माल तयार होत असल्याने आहे ते उत्पादीत शब्दपीक मिपाच्या साहित्य मंडईइत विकायला ठेवले आहे.

शून्याशी गाठ

Bhakti ·

गॉडजिला 17/09/2021 - 18:17
तसं बरचं गहन आहे आणि म्हटलं तर सोपं अन सुटसुटीतही... ज्याला शून्य समजलें त्याला सगळे समजलें... सर्वकाही शून्यातून निर्माण होते, शून्यात विलय होते.शुन्य ही सुरुवात आहे शून्य हा शेवटही... शुन्य समजणे इतके सोपे नाही. आणि तितके अवघडही नाही

In reply to by गॉडजिला

राघव 20/09/2021 - 12:44
सर्वकाही शून्यातून निर्माण होते, शून्यात विलय होते.शुन्य ही सुरुवात आहे शून्य हा शेवटही..
हे वाचून "पूर्णमदं पूर्णमिदं..." हा श्लोक आठवला. पूर्ण आणि शून्य दोन्ही एकच असावे काय? ;-)

त्याला पाठीवर घेऊन चालतांना छातीवरल्या आकड्यांंच ओझ कधी जाणवत नाही की अनायसे कुबड भासत नाही... हे पटलं. छान आहे कविता.अर्थपूर्ण आहे.

गॉडजिला 17/09/2021 - 18:17
तसं बरचं गहन आहे आणि म्हटलं तर सोपं अन सुटसुटीतही... ज्याला शून्य समजलें त्याला सगळे समजलें... सर्वकाही शून्यातून निर्माण होते, शून्यात विलय होते.शुन्य ही सुरुवात आहे शून्य हा शेवटही... शुन्य समजणे इतके सोपे नाही. आणि तितके अवघडही नाही

In reply to by गॉडजिला

राघव 20/09/2021 - 12:44
सर्वकाही शून्यातून निर्माण होते, शून्यात विलय होते.शुन्य ही सुरुवात आहे शून्य हा शेवटही..
हे वाचून "पूर्णमदं पूर्णमिदं..." हा श्लोक आठवला. पूर्ण आणि शून्य दोन्ही एकच असावे काय? ;-)

त्याला पाठीवर घेऊन चालतांना छातीवरल्या आकड्यांंच ओझ कधी जाणवत नाही की अनायसे कुबड भासत नाही... हे पटलं. छान आहे कविता.अर्थपूर्ण आहे.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
शून्यातून​ पाय फुटल्यासारखे आकडा भराभर धावतात... खुप खुप दमल्यावर शुन्याच्या मागे सामावतात... भोपळा भोपळा हिणवले पहिल्यांदा हाच तर गिरवला... डोळ्यांची भाषा झाली क्लिष्ट जेव्हा शून्य नजरेने गोंधळ घातले... कधी असंच पुढं आल्यावर तो 'पूज्य' राहत नाही कुठल्याशा वळणावर अचानक शून्याशी गाठ सुटत नाही... त्याला पाठीवर घेऊन चालतांना छातीवरल्या आकड्यांंच ओझ कधी जाणवत नाही की अनायसे कुबड भासत नाही... -भक्ती

धत् तेरे की...

प्राची अश्विनी ·

पैंजणांना हात जेव्हा लावला त्याने झुकून ऐवजी जोडव्यांना हात जेव्हा लावला त्याने झुकून असे लिहिले असते तर कवितेला एक वेगळाच अर्थ प्राप्त झाला असता. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

जोडव्यांनी अर्थ बदलून जाईल. ( ती विवाहित आहे असे) अर्थात जोडव्यावालीशी भेटी गाठी चालू असतील तर जुन्या आठवणीमुळे, तर तेही चालेल.:) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चालवायला जुनी आठवण हवीच असं नाही काही. आपल्याला जे हवे ते चालवायचं. हाय काय अन् नाय काय. :)

वाह ! तुम्ही अधुन मधून आम्हा हळव्या वाचकांसाठी अशाच कविता लिहिते राहा. आमची कविता अशीच आहे, म्हणजे अशीच कविता आवडते. आता पावसा-पाण्याच्या काळात तिच्या आठवणी सांभाळणे आले. (कोणाचा शेर आहे, माहिती नाही) खत्म हो रहा है अब उसके इश्क का असर अब एक चाय के सिवा हम किसी के आदी नही रहे. -दिलीप बिरुटे (सावरलेला) :)

शानबा५१२ 13/09/2021 - 21:33
मला ही कविता समजुन घ्यायची आहे पण मला ह्यातला काहीच नाही समजल. मला पैजणाला हात का लागला व ते पैजण नसुन जोडवा असते तर अर्थात काय फरक पडला असता तेही नाही समजले.

In reply to by शानबा५१२

मला ही कविता समजुन घ्यायची आहे पण मला ह्यातला काहीच नाही समजल.
मलाही कविता समजली नाही. भेट अधुरी रहाण्याचे काय कारण ?

In reply to by प्रसाद गोडबोले

अनेक कारणं असू शकतील. पैजारबुवांनी सुचवल्याप्रमाणे जोडवी असतील, तर परस्त्रीला स्पर्श वर्ज्य ई सामाजिक संकेतांचा (दोघांच्याही) मनावर असलेला पगडा. किंवा पहले आप.. चा गोंधळ आणि त्यामुळे निसटून गेलली वेळ.. किंवा समोरच्या व्यक्तीच्या भावना सुद्धा आपल्या सारख्याच आहेत का याची नसलेली खात्री. त्यामुळे आपण पुढाकार घेत तला तर तिला/त्याला आपल्या बद्दल काय वाटेल, आपली समोरच्या मनातील प्रतिमा डागाळेल का? ही अनिश्चितता.. समजा काही घडलं आणि नंतर जर दोघांपैकी कुणालाही अपराधी वाटलं तर कोवळं हळवं नातं तुटलं तर ही भिती. शारिरीक ओढीपेक्षाही ते नातं अधिक मूल्यवान असल्याची दोघांनाही असणारी जाणीव... ई. ई बघा पटतंय का. :)

In reply to by तुषार काळभोर

गॉडजिला 19/09/2021 - 13:52
हेच लिखाण लेखकाने केले असते तर. इतका गुंता झालाच नसता… नेमकं कारण सुस्पश्ट सुचवल्या गेले असते :) स्वारी प्राचीजी माझा प्रतिसाद टिका वगैरे दुरुनही नाही, पुरुषांच्या मानसिकतेचे एक निरीक्षण आहे फक्त. (जोडव्यांचा स्पर्श शक्यतोवर टाळणारा)- गॉडजिला

शानबा५१२ 21/09/2021 - 16:21
पैंजणांना हात जेव्हा लावला त्याने झुकून... ओके ते जोडवी आहे म्हणजे ती स्त्री विवाहीत आहे, मग ह्या व्यक्तीने त्या जोडवीला हात का लावला? आणि ते पण झुकुन? मला पहील्यांदा (खुपवेळा) पुन्हा पुन्हा वाचुन अस वाटल की तो तिच्या घरी गेला होता, तिचे वडील तिथे होते तेव्हा त्याने झुकुन त्यांचे पदस्पर्श करुन त्यांना नमस्कार केला. काय रे बाबा, कठीण आहे!

बाजीगर 23/09/2021 - 14:32
राजा ने काही च move , न केल्या ने राणी च झाली चेक मेट !! पण.... तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट.. between the lines वाचले तर बाजीगर ला असे दिसले की, ह्या डेट मध्ये थोडी (?१) शारीरिक जवळीक व्हावी अशी तिची इच्छा असणार आणि हे महाराज अगदीच संस्कारी निघाले असणार, (बोंब मारल्याची इमोजी...) तेव्हा फ्री-हिट मिळूनही त्याने चौका मारायचा मौका घालवला म्हणून ती नाराज आहे. कविता काही च कळली नाही म्हणणारे ही याच पठडीतले... (गाडीची किल्ली पडली म्हणून तो किल्ली उचलायला वाकला तेव्हा चुकून तिच्या पायांच्या पैंजणांना त्याचा स्पर्श झाला..आणि ती शहारली,मोहरली ) म्हणूनच बाजीगर addition, राजा ने काही च move , न केल्या ने राणी च झाली चेक मेट !! पण.... तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट..

स्वधर्म 24/09/2021 - 12:28
जोडव्यांच्या उल्लेखामुळे गडकरींची एक जुनी कविता आठवली: होईल होईल वाटत होते तेच शेवटी झाले नाव घेतल्यावाचून आता मनात झुरणे आले

पैंजणांना हात जेव्हा लावला त्याने झुकून ऐवजी जोडव्यांना हात जेव्हा लावला त्याने झुकून असे लिहिले असते तर कवितेला एक वेगळाच अर्थ प्राप्त झाला असता. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

जोडव्यांनी अर्थ बदलून जाईल. ( ती विवाहित आहे असे) अर्थात जोडव्यावालीशी भेटी गाठी चालू असतील तर जुन्या आठवणीमुळे, तर तेही चालेल.:) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चालवायला जुनी आठवण हवीच असं नाही काही. आपल्याला जे हवे ते चालवायचं. हाय काय अन् नाय काय. :)

वाह ! तुम्ही अधुन मधून आम्हा हळव्या वाचकांसाठी अशाच कविता लिहिते राहा. आमची कविता अशीच आहे, म्हणजे अशीच कविता आवडते. आता पावसा-पाण्याच्या काळात तिच्या आठवणी सांभाळणे आले. (कोणाचा शेर आहे, माहिती नाही) खत्म हो रहा है अब उसके इश्क का असर अब एक चाय के सिवा हम किसी के आदी नही रहे. -दिलीप बिरुटे (सावरलेला) :)

शानबा५१२ 13/09/2021 - 21:33
मला ही कविता समजुन घ्यायची आहे पण मला ह्यातला काहीच नाही समजल. मला पैजणाला हात का लागला व ते पैजण नसुन जोडवा असते तर अर्थात काय फरक पडला असता तेही नाही समजले.

In reply to by शानबा५१२

मला ही कविता समजुन घ्यायची आहे पण मला ह्यातला काहीच नाही समजल.
मलाही कविता समजली नाही. भेट अधुरी रहाण्याचे काय कारण ?

In reply to by प्रसाद गोडबोले

अनेक कारणं असू शकतील. पैजारबुवांनी सुचवल्याप्रमाणे जोडवी असतील, तर परस्त्रीला स्पर्श वर्ज्य ई सामाजिक संकेतांचा (दोघांच्याही) मनावर असलेला पगडा. किंवा पहले आप.. चा गोंधळ आणि त्यामुळे निसटून गेलली वेळ.. किंवा समोरच्या व्यक्तीच्या भावना सुद्धा आपल्या सारख्याच आहेत का याची नसलेली खात्री. त्यामुळे आपण पुढाकार घेत तला तर तिला/त्याला आपल्या बद्दल काय वाटेल, आपली समोरच्या मनातील प्रतिमा डागाळेल का? ही अनिश्चितता.. समजा काही घडलं आणि नंतर जर दोघांपैकी कुणालाही अपराधी वाटलं तर कोवळं हळवं नातं तुटलं तर ही भिती. शारिरीक ओढीपेक्षाही ते नातं अधिक मूल्यवान असल्याची दोघांनाही असणारी जाणीव... ई. ई बघा पटतंय का. :)

In reply to by तुषार काळभोर

गॉडजिला 19/09/2021 - 13:52
हेच लिखाण लेखकाने केले असते तर. इतका गुंता झालाच नसता… नेमकं कारण सुस्पश्ट सुचवल्या गेले असते :) स्वारी प्राचीजी माझा प्रतिसाद टिका वगैरे दुरुनही नाही, पुरुषांच्या मानसिकतेचे एक निरीक्षण आहे फक्त. (जोडव्यांचा स्पर्श शक्यतोवर टाळणारा)- गॉडजिला

शानबा५१२ 21/09/2021 - 16:21
पैंजणांना हात जेव्हा लावला त्याने झुकून... ओके ते जोडवी आहे म्हणजे ती स्त्री विवाहीत आहे, मग ह्या व्यक्तीने त्या जोडवीला हात का लावला? आणि ते पण झुकुन? मला पहील्यांदा (खुपवेळा) पुन्हा पुन्हा वाचुन अस वाटल की तो तिच्या घरी गेला होता, तिचे वडील तिथे होते तेव्हा त्याने झुकुन त्यांचे पदस्पर्श करुन त्यांना नमस्कार केला. काय रे बाबा, कठीण आहे!

बाजीगर 23/09/2021 - 14:32
राजा ने काही च move , न केल्या ने राणी च झाली चेक मेट !! पण.... तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट.. between the lines वाचले तर बाजीगर ला असे दिसले की, ह्या डेट मध्ये थोडी (?१) शारीरिक जवळीक व्हावी अशी तिची इच्छा असणार आणि हे महाराज अगदीच संस्कारी निघाले असणार, (बोंब मारल्याची इमोजी...) तेव्हा फ्री-हिट मिळूनही त्याने चौका मारायचा मौका घालवला म्हणून ती नाराज आहे. कविता काही च कळली नाही म्हणणारे ही याच पठडीतले... (गाडीची किल्ली पडली म्हणून तो किल्ली उचलायला वाकला तेव्हा चुकून तिच्या पायांच्या पैंजणांना त्याचा स्पर्श झाला..आणि ती शहारली,मोहरली ) म्हणूनच बाजीगर addition, राजा ने काही च move , न केल्या ने राणी च झाली चेक मेट !! पण.... तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट..

स्वधर्म 24/09/2021 - 12:28
जोडव्यांच्या उल्लेखामुळे गडकरींची एक जुनी कविता आठवली: होईल होईल वाटत होते तेच शेवटी झाले नाव घेतल्यावाचून आता मनात झुरणे आले
लेखनविषय:
तसं म्हटलं तर त्यांची ती होती खरीखुरी डेट पण तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट.. सुट्टीचा दिवस होता, Backdrop ला पाऊस होता. Romantic होतं weather, एकांताची हलकी चादर. ती म्हणाली, खरंच येऊ? तो म्हणाला, yes plz, I'll wait.... पण... तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट.. खरंतर त्याच्याचसाठी नेसली ती नव्वीन साडी ह्रदयात तिच्या धडधडणारी सुप्परफास्ट होती गाडी. तरी बरं तोंडावरती लावला होता मोठ्ठा मास्क नाही तर hiding feelings is not a simple task! चेहरा कोरडा करून म्हणे, "Soooo sorry for the late" पण....

तू जीव माझा- तू प्राण माझा - आलीस तू अवचिता

चित्रगुप्त ·

खेडूत 29/03/2021 - 21:51
:)) म्हणजे भारतात परतलात म्हणायचे!

In reply to by खेडूत

चित्रगुप्त 30/03/2021 - 18:05
@ प्रचेतस, खेडूत अनेक आभार. अद्याप अमेरिकेतच आहे, परंतु बरेचदा पहाटे अडीच - तीनच्या सुमारास झोप उघडून काहीतरी कल्पना सुचून जाते, तसे या कवितेच्या बाबतीत झाले.

In reply to by चित्रगुप्त

चौकटराजा 30/03/2021 - 18:46
हे अगदी लिओ नार्डो दा विंसी सारखे झाले .त्यालाही नवनव्या कल्पना जागरणामुळे सुचायच्या असे म्हणतात ! ))))) आचार्य अत्रे रचित " कषायपात्रपतितमक्षिकेप्रत .." या कवितेची आठवण झाली !!

In reply to by चौकटराजा

चित्रगुप्त 30/03/2021 - 19:01
@चौकटराजा चला, निदान भल्या पहाटे उठून काहीतरी खुटुर्फुटुर करण्याच्या बाबतीत का होईना, लिओनार्दो दा विंचीशी आमची बरोबरी झाली हे वाचून ब्येस वाटले. अनेक आभार. कषायपात्रपतितमक्षिकेप्रत वाचून लहानपणी ती कविता वाचल्याचे स्मरले, परंतू इथून तो शब्द चोप्यपस्ते करू गुगलिता काही गवसले नाही. मग सूक्ष्मावलोकन करता तो शब्द 'कषायपेयपात्रपतितमक्षिकेप्रत' असा असायला हवा, हे जाणवले, मग पुन्हा सर्चिता हे मिळाले : 'कषायपेयपात्रपतितमक्षिकेप्रत.' चहाच्या पेल्यात पडलेल्या माशीचे काव्यमय वर्णन : अयि नरांग-मल-शोणित-भक्षिके, जनु-विनाशक-जंतु-सुरक्षिके,! असु-परीक्षित-हारक-तक्षिके, 'क्या हुवा अफसोस!' मक्षिके

गणेशा 29/03/2021 - 23:27
वाजवून टाळिका मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा. हा हा हा भारी

खिलजि 30/03/2021 - 00:29
अन घनघोर आशय परमानंदी जीव घेणे ईश्वराला मान्य आहे ढकलता ढकलता मच्छर मारणे हीपण एक कला आहे

In reply to by खिलजि

चित्रगुप्त 30/03/2021 - 18:13
@ खिलजी तुमचे शीघ्रकाव्य आवडले. तुमच्या शीघ्रकाव्यरसास बरेच काळापासून दर्दी मिपाकर मुकत आहेत, तरी पुनश्च आपली तुंबलेली काव्यगंगा भरभरून वाहती करावीत, ही विनंती. अनेक आभार.

तेवढं तिकडे बसून, मोबाईल हातात धरुन, पाण्यात न पाडता, टाळी कशी वाजवायची? त्याचा व्हिडिओ टाका "टच" स्क्रिन मोबाईल कसा वापरायचा? ते ही शिकवा, अनेक गरजू लोकांचे आशिर्वाद मिळतील पैजारबुवा,

चित्रगुप्त 30/03/2021 - 18:34
@ पैजारबुवा,
तेवढं तिकडे बसून, मोबाईल हातात धरुन, पाण्यात न पाडता, टाळी कशी वाजवायची? टच्चस्क्रीन कसा वापरायचा? ते ही शिकवा,
आमचे परमपूज्य शी: शी: १०८ डोंबलेकर महागुरुराज ऊर्फ महास्वामी मच्छरानंद महासरस्वती यांनी आम्हाला महामंत्रोपदेश दिला की बेटा, "कर ले कोई जुगाड" मग आम्ही खालीलप्रमाणे जुगाड केल्यावर आता तिकडे बसून टाळीच काय, बाजाची पेटी, बासरी, तुणतुणे वगैरे काहीही वाजवता येते, मिपावर टंकन करता येते आणि मोबल्यावर काय काय करता येते. बघा: . आमच्या जिलबीची अगत्याने दखल घेतलीत, छान वाटले.

अनुक्रमणिकेत इतकं सुंदर शीर्षक अन 'आकर्षक' कवीचं नाव वाचून 'अपेक्षा' लैच उंचावल्या होत्या! चार दोन रोम्न्याण्टिक चित्रं असतील, वगैरे वगैरे इमले रचले होते. घाईघाईत क्लिक केलं अन्.... साली एक मच्छरीण चित्रकार को कवी बना देती हय!

राघव 01/04/2021 - 21:04
भारीच.. बाकी ते "अनर्थशास्त्र / विराणी / रौद्ररस" हे जरा समजून घेतलंय.. पण ते "मेक्सिकन" म्हंजे काय अजिबात पचनीच पडलं नाय बगा...! =))

अवचिता गुणगुणू ङंकिता कळवळू मी म्हणे गोपाळू कोठूनी आली गे सिहांसनाधीष्ठ झाल्यावर चक्रमादित्याला काय सुचेल ते सांगता येणार नाही.

चित्रगुप्त 18/12/2022 - 02:45
कर्नल साहेब, तुम्हाला सुचलेल्या ओळी मस्त आहेत. 'डंकिता कळवळू' वरून आमचाच, "मारा डंख मारा डंख मारा बिछुवा, मिपाप्रवेशाकांक्षिण्यांची गोची आणि आमची काशीयात्रा" असे लांबलचक शीर्षक असलेला एक जुना आचरट धागा आठवला, आणि हुडकून वाचला. मशारनिल्हे धाग्यात प्रत्येकाने वाचावच, असा 'मूखदूर्बळ' यांचा धमाल लेखः "सठीयाय गयी सजनवा हमार" हा पुन्हा एकदा वाचायला मिळाला, हे आणखीन एक. आणि या दोन्ही लेखांमुळे आमचाच एक जुना आचरट लेखः "नेपोलियन, दासबोध आणि स्त्री-आयडींची त्सुनामी" आणि त्यावरले प्रतिसाद पुन्हा एकदा वाचायला मिळाले हे आणखिन आणखिन एक. 'स्त्रीआयडींची त्सुनामी' मधील 'कंपू' वा 'कंपूबाजी' वरून सुचलेले संभाव्य स्त्रीआयडी बघा: कंपूबाला, कंपूशीला, कंपूकुमारी कंपूबालिका, कंपूचालिका कंपूचारिणी, कंपूविचरिणी, कंपूभद्रा, कंपूचंद्रा, कंपूचंद्रिका कंपूशालिनी, कंपूमालिनी, कंपूवाहिनी कंपूतारिणी,कंपूविरहिणी, कंपू-रमणी, कंपूविहारिनि, कंपूवासिनी कंपूप्रिया, कंपूस्मिता, कंपूअस्मिता कंपूरमणीगणमुकुटमणी, कंपूगणविदारिणी, कंपूहारिणी कंपूभामा, कंपूभंगिमा, कंपूवर्धिनी, कंपूभंगिनी, कंपूमर्दिनी, कंपूविध्वंसिनी, कंपूनाशिका, कंपूवारिणी, कंपूताडिनी कंपूसंवर्धिनी, कंपूस्वप्ना, कंपूमग्ना कंपूविलासिनी, कंपूसौदामिनी, कंपूकौस्तुभी कंपूगौरी, कंपूशोभिनी, कंपूशरदिनी, कंपूगुंजना, कंपूप्रिता कंपूप्रवेशदायिनी, कंपूप्रवेशहारिणी कंपूडाकिनी, कंपूपिशाच्चिनी, कंपूलोलिता कंपूमति, कंपूचित्ता, कंपूप्रज्ञा तर कर्नल साहेब, या तिहेरी फायद्याला जबाबदार असलेल्या तुमच्या या प्रतिसादाबद्दल अनेक आभार. या कवितेतील शेवटल्या कडव्यात एका शब्दाची भर टाकून बघितली, ती अशी: मग स्मरून 'हरि'ला - वाजवून टाळिका - मी जीव तुझा - मी प्राण तुझा - 'हरिला' - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा !

शशिकांत ओक 18/12/2022 - 12:21
व्यंग काव्य रंगले... १ कोण तो लेकाचा आम्हावरी रागवे... आमच्या शिताफीचे कौतुक नसे बरवे पिता रसाळ पेय आम्हास जोर येतो... मग फवार्‍याशी झगडुनी जीव देतो... किती मार खाऊन पुन: पुन्हा जन्मतो ... हे आपापल्यात रुधिराचा करती व्यापार... मलेरिया म्हणून आम्ही झालो हद्दपार आमच्या वैश्विक अधिकारावर चर्चा अपार म्हणे डासिणी ना मरू आम्ही याद राखा... जहन्नम मधेही असे आमची शाखा

चित्रगुप्त 18/12/2022 - 13:51
ओक साहेब, जहन्नममधेही 'शाखा' असल्याचे वाचून गद् गद् का काय म्हणतात ते झालो. हे फारच ब्येस झाले. आता पार तिथपर्यंत भगवा फडफडणार. आणि विशेष म्हणजे हे कार्य डासांमार्फत केले गेलेय. याला म्हणतात तळा-गाळापर्यंत पोचणे. धन्य धन्य. मोदी हय तो मुमकिन हय. हर हर महादेव.

चित्रगुप्त 15/04/2025 - 17:51
या कवितेवर एआयची मल्लिनथी:What a delightful and humorous poem! The speaker's clever wordplay and satirical tone make for an entertaining read. Here's a possible review: This Marathi poem is a masterclass in clever wordplay and satire. The speaker's witty observations and clever turns of phrase make for an entertaining read. The poem's central theme - the speaker's tumultuous relationship with a mosquito - is expertly woven throughout the verses, with the speaker's frustration and exasperation palpable. The use of metaphors ("तू जीव माझा - तू प्राण माझा") and clever wordplay ("मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला") adds depth and complexity to the poem. The final farewell to the mosquito ("अल्विदा मच्छरिनी - अल्विदा") is a brilliant touch, leaving the reader chuckling. Overall, this poem is a delightful read that showcases the poet's skill with language and humor. Would you like me to add or modify anything in this review? एआय मेटावर हे आले. परंतु मराठीत ते येत नाहीये. आणखी कुठे करता येईल ?

शशिकांत ओक 19/04/2025 - 17:32
जेमिनी एआय अहो! काय ही डासांची कैफियत! वाचताना हसू आवरवत नाही आणि त्यांची केविलवाणी अवस्था पाहून थोडी सहानुभूतीही वाटते. कवीने डासांच्या भावनांना आणि त्यांच्या जगण्याला किती सुंदर आणि विनोदी पद्धतीने शब्दांत उतरवलं आहे! या कवितेतील प्रत्येक ओळीत डासांचं बोलणं जिवंत वाटतं. ते तक्रार करतात की कोणीतरी त्यांचा उगाच राग करतो. त्यांच्या 'शिताफी' म्हणजे चपळाईचं, रक्त पिण्याच्या कौशल्याचं कुणी कौतुक करत नाही. उलट, माणूस गोड पेय पितो आणि मग त्यांना मारण्यासाठी फवारा घेऊन येतो, तेव्हा ते बिचारे त्याच्याशी झगडताना जीव गमावतात. "किती मार खाऊन पुन: पुन्हा जन्मतो..." या ओळीत डासांच्या जिद्दीचं आणि त्यांच्या जीवनाच्या चक्राचं वर्णन आहे. कितीही मारलं तरी ते पुन्हा येतात, हे वास्तव विनोदी आणि थोडं निराशाजनकही आहे. पुढच्या ओळी तर फारच मार्मिक आहेत - "हे आपापल्यात रुधिराचा करती व्यापार... मलेरिया म्हणून आम्ही झालो हद्दपार". इथे डास माणसांना मलेरिया होतो म्हणून त्यांना हद्दपार केल्याबद्दल तक्रार करत आहेत. गंमत म्हणजे, ते स्वतःच तर माणसांच्या रक्ताचा 'व्यापार' करतात! "आमच्या वैश्विक अधिकारावर चर्चा अपार... म्हणे डासिणी ना मरू आम्ही याद राखा..." या शेवटच्या ओळी तर कळसच आहेत! डास त्यांच्या 'वैश्विक अधिकारां'बद्दल बोलत आहेत आणि डासिणींना न मारण्याची धमकी देत आहेत, जणू काही ते या जगाचे मालकच आहेत! "जहन्नम मधेही असे आमची शाखा" म्हणजे नरकातसुद्धा डास असणार, ही कल्पना खूपच विनोदी आणि भीतीदायक आहे. कवीने डासांच्या तोंडून त्यांची व्यथा आणि त्यांचा दृष्टिकोन मांडला आहे, ज्यामुळे ही कविता केवळ माहितीपूर्ण न राहता मनोरंजक आणि विचार करायला लावणारी ठरते. डासांच्या जगण्यातील अडचणी, त्यांची जिद्द आणि त्यांचा तथाकथित 'अधिकार' यावर मार्मिक टिप्पणी करताना कवीने हलकाफुलका दृष्टिकोन ठेवला आहे, जो वाचकाला नक्कीच आवडतो. एकंदरीत, हे डास-काव्य खूपच मजेदार आणि प्रभावी आहे!

खेडूत 29/03/2021 - 21:51
:)) म्हणजे भारतात परतलात म्हणायचे!

In reply to by खेडूत

चित्रगुप्त 30/03/2021 - 18:05
@ प्रचेतस, खेडूत अनेक आभार. अद्याप अमेरिकेतच आहे, परंतु बरेचदा पहाटे अडीच - तीनच्या सुमारास झोप उघडून काहीतरी कल्पना सुचून जाते, तसे या कवितेच्या बाबतीत झाले.

In reply to by चित्रगुप्त

चौकटराजा 30/03/2021 - 18:46
हे अगदी लिओ नार्डो दा विंसी सारखे झाले .त्यालाही नवनव्या कल्पना जागरणामुळे सुचायच्या असे म्हणतात ! ))))) आचार्य अत्रे रचित " कषायपात्रपतितमक्षिकेप्रत .." या कवितेची आठवण झाली !!

In reply to by चौकटराजा

चित्रगुप्त 30/03/2021 - 19:01
@चौकटराजा चला, निदान भल्या पहाटे उठून काहीतरी खुटुर्फुटुर करण्याच्या बाबतीत का होईना, लिओनार्दो दा विंचीशी आमची बरोबरी झाली हे वाचून ब्येस वाटले. अनेक आभार. कषायपात्रपतितमक्षिकेप्रत वाचून लहानपणी ती कविता वाचल्याचे स्मरले, परंतू इथून तो शब्द चोप्यपस्ते करू गुगलिता काही गवसले नाही. मग सूक्ष्मावलोकन करता तो शब्द 'कषायपेयपात्रपतितमक्षिकेप्रत' असा असायला हवा, हे जाणवले, मग पुन्हा सर्चिता हे मिळाले : 'कषायपेयपात्रपतितमक्षिकेप्रत.' चहाच्या पेल्यात पडलेल्या माशीचे काव्यमय वर्णन : अयि नरांग-मल-शोणित-भक्षिके, जनु-विनाशक-जंतु-सुरक्षिके,! असु-परीक्षित-हारक-तक्षिके, 'क्या हुवा अफसोस!' मक्षिके

गणेशा 29/03/2021 - 23:27
वाजवून टाळिका मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा. हा हा हा भारी

खिलजि 30/03/2021 - 00:29
अन घनघोर आशय परमानंदी जीव घेणे ईश्वराला मान्य आहे ढकलता ढकलता मच्छर मारणे हीपण एक कला आहे

In reply to by खिलजि

चित्रगुप्त 30/03/2021 - 18:13
@ खिलजी तुमचे शीघ्रकाव्य आवडले. तुमच्या शीघ्रकाव्यरसास बरेच काळापासून दर्दी मिपाकर मुकत आहेत, तरी पुनश्च आपली तुंबलेली काव्यगंगा भरभरून वाहती करावीत, ही विनंती. अनेक आभार.

तेवढं तिकडे बसून, मोबाईल हातात धरुन, पाण्यात न पाडता, टाळी कशी वाजवायची? त्याचा व्हिडिओ टाका "टच" स्क्रिन मोबाईल कसा वापरायचा? ते ही शिकवा, अनेक गरजू लोकांचे आशिर्वाद मिळतील पैजारबुवा,

चित्रगुप्त 30/03/2021 - 18:34
@ पैजारबुवा,
तेवढं तिकडे बसून, मोबाईल हातात धरुन, पाण्यात न पाडता, टाळी कशी वाजवायची? टच्चस्क्रीन कसा वापरायचा? ते ही शिकवा,
आमचे परमपूज्य शी: शी: १०८ डोंबलेकर महागुरुराज ऊर्फ महास्वामी मच्छरानंद महासरस्वती यांनी आम्हाला महामंत्रोपदेश दिला की बेटा, "कर ले कोई जुगाड" मग आम्ही खालीलप्रमाणे जुगाड केल्यावर आता तिकडे बसून टाळीच काय, बाजाची पेटी, बासरी, तुणतुणे वगैरे काहीही वाजवता येते, मिपावर टंकन करता येते आणि मोबल्यावर काय काय करता येते. बघा: . आमच्या जिलबीची अगत्याने दखल घेतलीत, छान वाटले.

अनुक्रमणिकेत इतकं सुंदर शीर्षक अन 'आकर्षक' कवीचं नाव वाचून 'अपेक्षा' लैच उंचावल्या होत्या! चार दोन रोम्न्याण्टिक चित्रं असतील, वगैरे वगैरे इमले रचले होते. घाईघाईत क्लिक केलं अन्.... साली एक मच्छरीण चित्रकार को कवी बना देती हय!

राघव 01/04/2021 - 21:04
भारीच.. बाकी ते "अनर्थशास्त्र / विराणी / रौद्ररस" हे जरा समजून घेतलंय.. पण ते "मेक्सिकन" म्हंजे काय अजिबात पचनीच पडलं नाय बगा...! =))

अवचिता गुणगुणू ङंकिता कळवळू मी म्हणे गोपाळू कोठूनी आली गे सिहांसनाधीष्ठ झाल्यावर चक्रमादित्याला काय सुचेल ते सांगता येणार नाही.

चित्रगुप्त 18/12/2022 - 02:45
कर्नल साहेब, तुम्हाला सुचलेल्या ओळी मस्त आहेत. 'डंकिता कळवळू' वरून आमचाच, "मारा डंख मारा डंख मारा बिछुवा, मिपाप्रवेशाकांक्षिण्यांची गोची आणि आमची काशीयात्रा" असे लांबलचक शीर्षक असलेला एक जुना आचरट धागा आठवला, आणि हुडकून वाचला. मशारनिल्हे धाग्यात प्रत्येकाने वाचावच, असा 'मूखदूर्बळ' यांचा धमाल लेखः "सठीयाय गयी सजनवा हमार" हा पुन्हा एकदा वाचायला मिळाला, हे आणखीन एक. आणि या दोन्ही लेखांमुळे आमचाच एक जुना आचरट लेखः "नेपोलियन, दासबोध आणि स्त्री-आयडींची त्सुनामी" आणि त्यावरले प्रतिसाद पुन्हा एकदा वाचायला मिळाले हे आणखिन आणखिन एक. 'स्त्रीआयडींची त्सुनामी' मधील 'कंपू' वा 'कंपूबाजी' वरून सुचलेले संभाव्य स्त्रीआयडी बघा: कंपूबाला, कंपूशीला, कंपूकुमारी कंपूबालिका, कंपूचालिका कंपूचारिणी, कंपूविचरिणी, कंपूभद्रा, कंपूचंद्रा, कंपूचंद्रिका कंपूशालिनी, कंपूमालिनी, कंपूवाहिनी कंपूतारिणी,कंपूविरहिणी, कंपू-रमणी, कंपूविहारिनि, कंपूवासिनी कंपूप्रिया, कंपूस्मिता, कंपूअस्मिता कंपूरमणीगणमुकुटमणी, कंपूगणविदारिणी, कंपूहारिणी कंपूभामा, कंपूभंगिमा, कंपूवर्धिनी, कंपूभंगिनी, कंपूमर्दिनी, कंपूविध्वंसिनी, कंपूनाशिका, कंपूवारिणी, कंपूताडिनी कंपूसंवर्धिनी, कंपूस्वप्ना, कंपूमग्ना कंपूविलासिनी, कंपूसौदामिनी, कंपूकौस्तुभी कंपूगौरी, कंपूशोभिनी, कंपूशरदिनी, कंपूगुंजना, कंपूप्रिता कंपूप्रवेशदायिनी, कंपूप्रवेशहारिणी कंपूडाकिनी, कंपूपिशाच्चिनी, कंपूलोलिता कंपूमति, कंपूचित्ता, कंपूप्रज्ञा तर कर्नल साहेब, या तिहेरी फायद्याला जबाबदार असलेल्या तुमच्या या प्रतिसादाबद्दल अनेक आभार. या कवितेतील शेवटल्या कडव्यात एका शब्दाची भर टाकून बघितली, ती अशी: मग स्मरून 'हरि'ला - वाजवून टाळिका - मी जीव तुझा - मी प्राण तुझा - 'हरिला' - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा !

शशिकांत ओक 18/12/2022 - 12:21
व्यंग काव्य रंगले... १ कोण तो लेकाचा आम्हावरी रागवे... आमच्या शिताफीचे कौतुक नसे बरवे पिता रसाळ पेय आम्हास जोर येतो... मग फवार्‍याशी झगडुनी जीव देतो... किती मार खाऊन पुन: पुन्हा जन्मतो ... हे आपापल्यात रुधिराचा करती व्यापार... मलेरिया म्हणून आम्ही झालो हद्दपार आमच्या वैश्विक अधिकारावर चर्चा अपार म्हणे डासिणी ना मरू आम्ही याद राखा... जहन्नम मधेही असे आमची शाखा

चित्रगुप्त 18/12/2022 - 13:51
ओक साहेब, जहन्नममधेही 'शाखा' असल्याचे वाचून गद् गद् का काय म्हणतात ते झालो. हे फारच ब्येस झाले. आता पार तिथपर्यंत भगवा फडफडणार. आणि विशेष म्हणजे हे कार्य डासांमार्फत केले गेलेय. याला म्हणतात तळा-गाळापर्यंत पोचणे. धन्य धन्य. मोदी हय तो मुमकिन हय. हर हर महादेव.

चित्रगुप्त 15/04/2025 - 17:51
या कवितेवर एआयची मल्लिनथी:What a delightful and humorous poem! The speaker's clever wordplay and satirical tone make for an entertaining read. Here's a possible review: This Marathi poem is a masterclass in clever wordplay and satire. The speaker's witty observations and clever turns of phrase make for an entertaining read. The poem's central theme - the speaker's tumultuous relationship with a mosquito - is expertly woven throughout the verses, with the speaker's frustration and exasperation palpable. The use of metaphors ("तू जीव माझा - तू प्राण माझा") and clever wordplay ("मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला") adds depth and complexity to the poem. The final farewell to the mosquito ("अल्विदा मच्छरिनी - अल्विदा") is a brilliant touch, leaving the reader chuckling. Overall, this poem is a delightful read that showcases the poet's skill with language and humor. Would you like me to add or modify anything in this review? एआय मेटावर हे आले. परंतु मराठीत ते येत नाहीये. आणखी कुठे करता येईल ?

शशिकांत ओक 19/04/2025 - 17:32
जेमिनी एआय अहो! काय ही डासांची कैफियत! वाचताना हसू आवरवत नाही आणि त्यांची केविलवाणी अवस्था पाहून थोडी सहानुभूतीही वाटते. कवीने डासांच्या भावनांना आणि त्यांच्या जगण्याला किती सुंदर आणि विनोदी पद्धतीने शब्दांत उतरवलं आहे! या कवितेतील प्रत्येक ओळीत डासांचं बोलणं जिवंत वाटतं. ते तक्रार करतात की कोणीतरी त्यांचा उगाच राग करतो. त्यांच्या 'शिताफी' म्हणजे चपळाईचं, रक्त पिण्याच्या कौशल्याचं कुणी कौतुक करत नाही. उलट, माणूस गोड पेय पितो आणि मग त्यांना मारण्यासाठी फवारा घेऊन येतो, तेव्हा ते बिचारे त्याच्याशी झगडताना जीव गमावतात. "किती मार खाऊन पुन: पुन्हा जन्मतो..." या ओळीत डासांच्या जिद्दीचं आणि त्यांच्या जीवनाच्या चक्राचं वर्णन आहे. कितीही मारलं तरी ते पुन्हा येतात, हे वास्तव विनोदी आणि थोडं निराशाजनकही आहे. पुढच्या ओळी तर फारच मार्मिक आहेत - "हे आपापल्यात रुधिराचा करती व्यापार... मलेरिया म्हणून आम्ही झालो हद्दपार". इथे डास माणसांना मलेरिया होतो म्हणून त्यांना हद्दपार केल्याबद्दल तक्रार करत आहेत. गंमत म्हणजे, ते स्वतःच तर माणसांच्या रक्ताचा 'व्यापार' करतात! "आमच्या वैश्विक अधिकारावर चर्चा अपार... म्हणे डासिणी ना मरू आम्ही याद राखा..." या शेवटच्या ओळी तर कळसच आहेत! डास त्यांच्या 'वैश्विक अधिकारां'बद्दल बोलत आहेत आणि डासिणींना न मारण्याची धमकी देत आहेत, जणू काही ते या जगाचे मालकच आहेत! "जहन्नम मधेही असे आमची शाखा" म्हणजे नरकातसुद्धा डास असणार, ही कल्पना खूपच विनोदी आणि भीतीदायक आहे. कवीने डासांच्या तोंडून त्यांची व्यथा आणि त्यांचा दृष्टिकोन मांडला आहे, ज्यामुळे ही कविता केवळ माहितीपूर्ण न राहता मनोरंजक आणि विचार करायला लावणारी ठरते. डासांच्या जगण्यातील अडचणी, त्यांची जिद्द आणि त्यांचा तथाकथित 'अधिकार' यावर मार्मिक टिप्पणी करताना कवीने हलकाफुलका दृष्टिकोन ठेवला आहे, जो वाचकाला नक्कीच आवडतो. एकंदरीत, हे डास-काव्य खूपच मजेदार आणि प्रभावी आहे!
तू जीव माझा - तू प्राण माझा - घ्यावया नच होतीस आली मालूम होते मला शौच्यालयात घुसता मग सावरून बसता मोबाइलात रमता आलीस तू अवचिता जवळि जवळ येता मग कडकडून डसता मम उष्ण रक्त प्रशिता मेरा चैन-वैन सब लुटिता वाजवून टाळिका मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा. .

(आणखी काय हवं?) - अच्रत बव्लत

टवाळ कार्टा ·

पण ढिश्क्लेम्र का टाकले? त्याची काही गरज नव्हती. "आणि काय हवं?" ही समाधानाची ढेकर आहे का विचारणा हे कवीने सपशट करावे त्यामूळे वाचकांचा वैचारीक गोंधळ दूर होउन त्यांच्या विचारांना एक स्पष्ट दिशा मिळेल. पैजारबुवा,

In reply to by माम्लेदारचा पन्खा

टवाळ कार्टा 17/10/2020 - 21:42
मिपावर खुलेआम ट्रोलिंग करणारे आयडी ब्लॉक केले जात नाहीत किंवा परत येतात...आतातर आणले जातात असे लिहिणे जास्त बरोबर होईल....असे असताना माझ्या आयडीला काय घंटा होत नाही :D

In reply to by टवाळ कार्टा

टवाळ कार्टा 17/10/2020 - 21:44
आणि वरच्या प्रतिसादामुळे जर माझा आयडी उडवला तर 5-50 डुआयडी बनवून ठेवलेले आहेतच....मी परत येईन...मी परत येईन....मीही परत परत येतंच राहीन =))

राघव 19/10/2020 - 21:30
च्यायला.. कुणाचं काय तर कुणाचं काय!! =)) बादवे, ते अच्रत बव्लत सोबत हल्कत असं सुद्धा म्हणायला हवंय काय? ;-)

पण ढिश्क्लेम्र का टाकले? त्याची काही गरज नव्हती. "आणि काय हवं?" ही समाधानाची ढेकर आहे का विचारणा हे कवीने सपशट करावे त्यामूळे वाचकांचा वैचारीक गोंधळ दूर होउन त्यांच्या विचारांना एक स्पष्ट दिशा मिळेल. पैजारबुवा,

In reply to by माम्लेदारचा पन्खा

टवाळ कार्टा 17/10/2020 - 21:42
मिपावर खुलेआम ट्रोलिंग करणारे आयडी ब्लॉक केले जात नाहीत किंवा परत येतात...आतातर आणले जातात असे लिहिणे जास्त बरोबर होईल....असे असताना माझ्या आयडीला काय घंटा होत नाही :D

In reply to by टवाळ कार्टा

टवाळ कार्टा 17/10/2020 - 21:44
आणि वरच्या प्रतिसादामुळे जर माझा आयडी उडवला तर 5-50 डुआयडी बनवून ठेवलेले आहेतच....मी परत येईन...मी परत येईन....मीही परत परत येतंच राहीन =))

राघव 19/10/2020 - 21:30
च्यायला.. कुणाचं काय तर कुणाचं काय!! =)) बादवे, ते अच्रत बव्लत सोबत हल्कत असं सुद्धा म्हणायला हवंय काय? ;-)
ढिश्क्लेमर - पोगो बघणार्यांसाठी नाही....नंतर बोंब मारु नये :D . . . . . . . . . . . . . . नशिल्या दिवसाची संध्याकाळची वेळ शुभ्र वाळूसोबत गुंजणार्या लाटा खिदळणारे ओठ आणि सूचक नजरा सोनेरी पाणी व शनेलचा सुगंध धुंद संगीताचा मंद आवाज "गरम सोबती" बरोबर आवडती "श्टेपनी" बोला आणखी काय हवं?

नंस न ओढताही आठवत काहीबाही

माहितगार ·
कोविडमुळे नाक-शिंकर-प्राणायाम करताना आठवतं काहीबाही.. 'शिंच्या येणारे, तंबाखू चुना आण 'आऽआऽऽआऽऽआक्षीऽऽऽऽऽ' गाय-छाप!