मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मला आवडलेल्या काही अलिकडील कविता

मुक्तसुनीत ·

धनंजय Wed, 03/05/2008 - 10:51
जाते आहे. "माणसे माणसे चुकतात" शब्दप्रयोग आवडला. "सिव्हिल विधाने" चा अर्थ "सुसंस्कृत धाटणीचे पठडीबद्ध बोलणे" असा होतो का?

In reply to by धनंजय

मुक्तसुनीत Wed, 03/05/2008 - 11:23
एकूण कवितेचा सूर हा आधुनिक जगात माणसामाणसामधल्या संप्रेषणाच्या (कम्युनिकेशनच्या ) अभावाकडे लक्ष वेधून घेणारा आहे. (मिस्टर आणि मिसेस लिमये समोरासमोर असतात; पण एकमेकाना हाक मारायला जणू पब्लिक् अनाउंसमेंटची गरज पडते.) आणि या अभावावर भाष्य करताना , मग कविता सर्वसामान्य श्रद्धांवर , भाबडेपणावर तिरकस असे भाष्यसुद्धा करते. "सबका मालिक एक" वरील या औपरोधिक ओळी या भाष्याच्या खात्यावर जमा होतात ; असा मी अर्थ लावला. रेल्वे स्थानकावर कधीतरी ऐकलेल्या अनाउंसमेंटवरून - त्या अनाउनंसमेंटच्या एका अंधुक स्मृतीतून ही कविता येते. रेल्वे स्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी आढळाणार्‍या "सबका मालिक एक" सारख्या ढोबळ ओळी त्या अनुषंगानेच येतात असे मला जाणवले. >>> "सिव्हिल विधाने" चा अर्थ "सुसंस्कृत धाटणीचे पठडीबद्ध बोलणे" असा होतो का? होय. असाच अर्थ मी लावला.

In reply to by धनंजय

मुक्तसुनीत Wed, 03/05/2008 - 21:06
धनंजय यानी या ओळीवर विचारलेल्या प्रश्नांवर थोडा विचार केला असता असे जाणवले की , कवितेत या ठिकाणी तर्कशास्त्र (लॉजिक) आणि स्थापत्य अभियांत्रिकीमधल्या संज्ञांची आलटापलट करून एक रचना केली आहे. घरे विकत घेताना बिल्टअप एरिआ, सुपरबिल्टअप एरिआ असे शब्द ऐकतो . तर या सुपरबिल्टअप एरिआवर सिव्हील इंजिनीयरींगची बांधकामे उभी असतात. तर्कशास्त्रामधे असे म्हण्टले जाते की विधाने ही काही विश्वासांवर उभी असतात. (स्टेटमेंट्स आर बेस्ड ऑन सर्टन प्रेमिसेस.) तर्कशास्त्र (लॉजिक) आणि स्थापत्य अभियांत्रिकीमधल्या संज्ञांची आलटापलट अशी साधलेली आहे.

धमाल मुलगा Wed, 03/05/2008 - 11:18
शब्द आणि त्या॑नी बनलेली वाक्य॑ वाचली, त्या॑चा बाळबोध अर्थही लागला, पण........ कविता म्हणून म्हणाल तर..एकजात सगळ॑ टाळक्याच्या १०००० फुटावरून भुर्रर्रर्र.... काय करणार, आम्ही पडलो यत्कि॑चित गद्य जीव, (ग)धडा च म्हणा ना, कविता कसली कळणार डो॑बल? आपला, - (ग)धडा ध मा ल.

मुक्तसुनीत Wed, 03/05/2008 - 11:36
...आणि मला आवडलेली कविता. विठोबा . सगळे नकाशे उलगडून दाखवतो तो हा मास्टर प्लॅनर, शक्यतांची दाट रानं माझ्या अश्रूंचं ठिबकसिंचन करून वाढवली तो हा वनमाळी प्रत्येक चुकलेल्या वासरच्या कानापर्यंत जाते याची बासरी भवतापाचा गरगरता फेरा नि पायात या गुराख्यानं पेरली भिंगरी हे हरी दमला की रे माझा जीव, शक्यता सम्प्रदायातल्या माझ्या बापा आता धर मला पोटाशी अणि ठेव तुझ्यापाशी. कवियत्री : इन्डीगो.

मुक्तसुनीत Wed, 03/05/2008 - 11:39
विठोबा म्हणजे पोहायला शिकण्यापूर्वीचं पाणी स्वरांच्याही अलिकडचा शुद्ध गंधार कातळ अंधार अनन्त रात्रींचा याच्या कृपासलीलासाठी आपण तहानेलं व्हावं तर यानं दुष्काळ पाडावेत ओठांना भेगाळून टाकावं यानं हाताची बोटं झडवावीत यानं क्रूर व्हावं यानच तहान अणि पाण्यातलं द्वैत मिटवून टाकावं यानं तहानेचाच पूर आणावा यानं आर्तं हाकांना पाझर फोडावेत याला घाबरवं तेव्हा यानं भय व्हावं, मृत्यू व्हावं यानं जीव दडपावा यानंच संहार मांडवा यानंच मग जोजवून घ्यावं यानं असून नाहिसं व्हावं जसं लयीत पोहायला शिकल्यावर आपसूक तरंगता यावं तसं यानं बाजूला व्हावं होऊन पोहायला शिकण्यापूर्वीचं पाणी

नंदन Wed, 03/05/2008 - 11:57
उपक्रम आहे. धनंजयांनी म्हटल्याप्रमाणे, लिमयांच्या कवितेतले दुसरे कडवे जरा समजण्यास अवघड गेले. 'विठोबा'च्या दोन्ही कविता आवडल्या. (दुसरी वाचताना किंचित तूच घडविसी, तूच फोडिसी ची आठवण आली.) पोहायल्या शिकण्यापूर्वीचं पाणी...अप्रतिम! या दोन कवितांवरुन (काहीशी विरुद्ध टोकाची असली तरी) दासू वैद्यांची 'मरुन पडलेला पांडुरंग' ही कविता आठवली. ती येथे द्यायचा मोह होतो आहे - मरून पडलेला पांडुरंग वक्तशीर मुलगा पाठीवर दप्तर घेऊन शाळेत वेळेवर पोहोचतो तसा येऊन पोहोचला पाऊस, एखादं आदिम तत्त्वज्ञान रूजवावं तसं शेतकऱ्यानं बी पेरून दिलं जमिनीच्या पोटात मग भुरभुर वारा सुटला... छोट्या स्टेशनवर न थांबता एक्सप्रेस गाडी धाड धाड निघून गेल्याप्रमाणे काळे ढग नुस्तेच तरंगत गेले, वाटचुकल्या भ्रमिष्ट माणसासारखा अचानक पाऊस बेपत्ता झाला बियाच्या पोपटी अंकुरानं जमिनीला धडका मारून वर येण्यासाठी रचलेले मनसुभे दिवसागणिक वाळून गेले, जन्मताच दगावलेल्या पोराचा बाप दवाखान्यातल्या व्हरांड्यात विमनस्क फेऱ्या मारतो तसा शेतकरी धुऱ्यावर उभा लांबवर टाळ मृदंगाच्या गजरात पंढरपुराकडे निघालेली दिंडी आणि इथं काळ्या शेतात मरून पडलेला हिरवा पांडुरंग! कवी - दासू वैद्य कवितासंग्रह - तूर्तास

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

सर्किट Wed, 03/05/2008 - 22:38
नंदन ही कविता फारच सुंदर आहे. दासू वैद्यांच्या आणखी कविता देशील का इथे ? जन्मताच दगावलेल्या पोराचा बाप दवाखान्यातल्या व्हरांड्यात विमनस्क फेऱ्या मारतो तसा शेतकरी धुऱ्यावर उभा डोळ्यासमोर आपसूक उभे राहणारे चित्रण ! - सर्किट (दासू वैद्य हे ज्येष्ह्ठ की कनिष्ठ हे माहिती नाही, ह्याची सदस्यांनी नोंद घ्यावी. पण कविता फस्क्लास आहे.)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

भडकमकर मास्तर Fri, 03/07/2008 - 15:36
दासू वैद्य एकदा पुण्यात पाच दिवसांच्या नाट्यलेखन शिबिरामध्ये भेटले होते... तेव्हा थोडी ओळखही झाली होती.... ( शिबिराच्या आठवणीत मग्न) भडकमकर

चतुरंग Wed, 03/05/2008 - 21:00
फारच भेदक मुक्तछंद आहे! माणसां-माणसांतला एक अगम्य दुरावा आणि वाढत चाललेली अहंकाराची दरी ह्यातून आलेल्या तुटलेपणावर आणि तरिही ते मान्य न करता तुझं तू माझं मी ह्याच तत्वानं आयुष्य पुढे रेटणार्‍या, आत्मवंचना करणार्‍या मनोवृत्तीवरची ही टीका आहे. मन्या जोशीचे मानवी स्वभावाचे सूक्ष्म निरीक्षण आणि तो अनुभव शब्दात मांडण्याची ताकद ह्या दोन्हीला माझी दाद!! चतुरंग

धनंजय Wed, 03/05/2008 - 10:51
जाते आहे. "माणसे माणसे चुकतात" शब्दप्रयोग आवडला. "सिव्हिल विधाने" चा अर्थ "सुसंस्कृत धाटणीचे पठडीबद्ध बोलणे" असा होतो का?

In reply to by धनंजय

मुक्तसुनीत Wed, 03/05/2008 - 11:23
एकूण कवितेचा सूर हा आधुनिक जगात माणसामाणसामधल्या संप्रेषणाच्या (कम्युनिकेशनच्या ) अभावाकडे लक्ष वेधून घेणारा आहे. (मिस्टर आणि मिसेस लिमये समोरासमोर असतात; पण एकमेकाना हाक मारायला जणू पब्लिक् अनाउंसमेंटची गरज पडते.) आणि या अभावावर भाष्य करताना , मग कविता सर्वसामान्य श्रद्धांवर , भाबडेपणावर तिरकस असे भाष्यसुद्धा करते. "सबका मालिक एक" वरील या औपरोधिक ओळी या भाष्याच्या खात्यावर जमा होतात ; असा मी अर्थ लावला. रेल्वे स्थानकावर कधीतरी ऐकलेल्या अनाउंसमेंटवरून - त्या अनाउनंसमेंटच्या एका अंधुक स्मृतीतून ही कविता येते. रेल्वे स्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी आढळाणार्‍या "सबका मालिक एक" सारख्या ढोबळ ओळी त्या अनुषंगानेच येतात असे मला जाणवले. >>> "सिव्हिल विधाने" चा अर्थ "सुसंस्कृत धाटणीचे पठडीबद्ध बोलणे" असा होतो का? होय. असाच अर्थ मी लावला.

In reply to by धनंजय

मुक्तसुनीत Wed, 03/05/2008 - 21:06
धनंजय यानी या ओळीवर विचारलेल्या प्रश्नांवर थोडा विचार केला असता असे जाणवले की , कवितेत या ठिकाणी तर्कशास्त्र (लॉजिक) आणि स्थापत्य अभियांत्रिकीमधल्या संज्ञांची आलटापलट करून एक रचना केली आहे. घरे विकत घेताना बिल्टअप एरिआ, सुपरबिल्टअप एरिआ असे शब्द ऐकतो . तर या सुपरबिल्टअप एरिआवर सिव्हील इंजिनीयरींगची बांधकामे उभी असतात. तर्कशास्त्रामधे असे म्हण्टले जाते की विधाने ही काही विश्वासांवर उभी असतात. (स्टेटमेंट्स आर बेस्ड ऑन सर्टन प्रेमिसेस.) तर्कशास्त्र (लॉजिक) आणि स्थापत्य अभियांत्रिकीमधल्या संज्ञांची आलटापलट अशी साधलेली आहे.

धमाल मुलगा Wed, 03/05/2008 - 11:18
शब्द आणि त्या॑नी बनलेली वाक्य॑ वाचली, त्या॑चा बाळबोध अर्थही लागला, पण........ कविता म्हणून म्हणाल तर..एकजात सगळ॑ टाळक्याच्या १०००० फुटावरून भुर्रर्रर्र.... काय करणार, आम्ही पडलो यत्कि॑चित गद्य जीव, (ग)धडा च म्हणा ना, कविता कसली कळणार डो॑बल? आपला, - (ग)धडा ध मा ल.

मुक्तसुनीत Wed, 03/05/2008 - 11:36
...आणि मला आवडलेली कविता. विठोबा . सगळे नकाशे उलगडून दाखवतो तो हा मास्टर प्लॅनर, शक्यतांची दाट रानं माझ्या अश्रूंचं ठिबकसिंचन करून वाढवली तो हा वनमाळी प्रत्येक चुकलेल्या वासरच्या कानापर्यंत जाते याची बासरी भवतापाचा गरगरता फेरा नि पायात या गुराख्यानं पेरली भिंगरी हे हरी दमला की रे माझा जीव, शक्यता सम्प्रदायातल्या माझ्या बापा आता धर मला पोटाशी अणि ठेव तुझ्यापाशी. कवियत्री : इन्डीगो.

मुक्तसुनीत Wed, 03/05/2008 - 11:39
विठोबा म्हणजे पोहायला शिकण्यापूर्वीचं पाणी स्वरांच्याही अलिकडचा शुद्ध गंधार कातळ अंधार अनन्त रात्रींचा याच्या कृपासलीलासाठी आपण तहानेलं व्हावं तर यानं दुष्काळ पाडावेत ओठांना भेगाळून टाकावं यानं हाताची बोटं झडवावीत यानं क्रूर व्हावं यानच तहान अणि पाण्यातलं द्वैत मिटवून टाकावं यानं तहानेचाच पूर आणावा यानं आर्तं हाकांना पाझर फोडावेत याला घाबरवं तेव्हा यानं भय व्हावं, मृत्यू व्हावं यानं जीव दडपावा यानंच संहार मांडवा यानंच मग जोजवून घ्यावं यानं असून नाहिसं व्हावं जसं लयीत पोहायला शिकल्यावर आपसूक तरंगता यावं तसं यानं बाजूला व्हावं होऊन पोहायला शिकण्यापूर्वीचं पाणी

नंदन Wed, 03/05/2008 - 11:57
उपक्रम आहे. धनंजयांनी म्हटल्याप्रमाणे, लिमयांच्या कवितेतले दुसरे कडवे जरा समजण्यास अवघड गेले. 'विठोबा'च्या दोन्ही कविता आवडल्या. (दुसरी वाचताना किंचित तूच घडविसी, तूच फोडिसी ची आठवण आली.) पोहायल्या शिकण्यापूर्वीचं पाणी...अप्रतिम! या दोन कवितांवरुन (काहीशी विरुद्ध टोकाची असली तरी) दासू वैद्यांची 'मरुन पडलेला पांडुरंग' ही कविता आठवली. ती येथे द्यायचा मोह होतो आहे - मरून पडलेला पांडुरंग वक्तशीर मुलगा पाठीवर दप्तर घेऊन शाळेत वेळेवर पोहोचतो तसा येऊन पोहोचला पाऊस, एखादं आदिम तत्त्वज्ञान रूजवावं तसं शेतकऱ्यानं बी पेरून दिलं जमिनीच्या पोटात मग भुरभुर वारा सुटला... छोट्या स्टेशनवर न थांबता एक्सप्रेस गाडी धाड धाड निघून गेल्याप्रमाणे काळे ढग नुस्तेच तरंगत गेले, वाटचुकल्या भ्रमिष्ट माणसासारखा अचानक पाऊस बेपत्ता झाला बियाच्या पोपटी अंकुरानं जमिनीला धडका मारून वर येण्यासाठी रचलेले मनसुभे दिवसागणिक वाळून गेले, जन्मताच दगावलेल्या पोराचा बाप दवाखान्यातल्या व्हरांड्यात विमनस्क फेऱ्या मारतो तसा शेतकरी धुऱ्यावर उभा लांबवर टाळ मृदंगाच्या गजरात पंढरपुराकडे निघालेली दिंडी आणि इथं काळ्या शेतात मरून पडलेला हिरवा पांडुरंग! कवी - दासू वैद्य कवितासंग्रह - तूर्तास

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

सर्किट Wed, 03/05/2008 - 22:38
नंदन ही कविता फारच सुंदर आहे. दासू वैद्यांच्या आणखी कविता देशील का इथे ? जन्मताच दगावलेल्या पोराचा बाप दवाखान्यातल्या व्हरांड्यात विमनस्क फेऱ्या मारतो तसा शेतकरी धुऱ्यावर उभा डोळ्यासमोर आपसूक उभे राहणारे चित्रण ! - सर्किट (दासू वैद्य हे ज्येष्ह्ठ की कनिष्ठ हे माहिती नाही, ह्याची सदस्यांनी नोंद घ्यावी. पण कविता फस्क्लास आहे.)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

भडकमकर मास्तर Fri, 03/07/2008 - 15:36
दासू वैद्य एकदा पुण्यात पाच दिवसांच्या नाट्यलेखन शिबिरामध्ये भेटले होते... तेव्हा थोडी ओळखही झाली होती.... ( शिबिराच्या आठवणीत मग्न) भडकमकर

चतुरंग Wed, 03/05/2008 - 21:00
फारच भेदक मुक्तछंद आहे! माणसां-माणसांतला एक अगम्य दुरावा आणि वाढत चाललेली अहंकाराची दरी ह्यातून आलेल्या तुटलेपणावर आणि तरिही ते मान्य न करता तुझं तू माझं मी ह्याच तत्वानं आयुष्य पुढे रेटणार्‍या, आत्मवंचना करणार्‍या मनोवृत्तीवरची ही टीका आहे. मन्या जोशीचे मानवी स्वभावाचे सूक्ष्म निरीक्षण आणि तो अनुभव शब्दात मांडण्याची ताकद ह्या दोन्हीला माझी दाद!! चतुरंग
मराठी संकेतस्थळांवर भटकताना अनेकदा कविता वाचायला मिळतात. अनेक नवे लोक आपापल्या परीने काहीतरी प्रयत्न करून पहात असतात. या भटकंतीमधे सापडलेल्या या काही कविता. या सर्व कविता नव्व्दीच्या दशकातल्या किंवा नंतरच्या आहेत. त्या अशा कवींच्या आहेत जे मला केवळ आंतरजालामुळे माहीत झाले. विषय , मांडणी, भाषेला दिलेली वाटावळणे , या सर्व बाबतीमधे या कविता फार अनवट आणि म्हणूनच महत्त्वाच्या ठराव्यात. कविता या प्रकाराच्या शक्यताना जेव्हा आतापर्यंतच्या मार्गांपेक्षा वेगळ्या अंगानी भिडण्याचे प्रयत्न होतात तेव्हा एक नवीन प्रकारची कविता जन्म घेते. सुरवात करतो मन्या जोशीच्या एका कवितेने.

कांगारु

चतुरंग ·

'दोन्ही सामन्यात | लाविली ती वाट | रहावे चड्डीत | कांगारूंनी |' हे बाकी मस्त. बरेच दिवसानी चड्डीत रहा शब्दप्रयोग ऐकला. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

केशवसुमार Wed, 03/05/2008 - 23:52
'दोन्ही सामन्यात | लाविली ती वाट | रहावे चड्डीत | कांगारूंनी |' हे बाकी मस्त. बरेच दिवसानी चड्डीत रहा शब्दप्रयोग ऐकला. चालू द्या.. (लुग्गीवाला)केशवसुमार

प्राजु Wed, 03/05/2008 - 09:17
चतुरंग, मानलं तुम्हाला.... अप्रतिम. एकदमच सह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हि................ - (सर्वव्यापी)प्राजु

सुधीर कांदळकर Wed, 03/05/2008 - 20:15
अँड्र्यूचे मर्कट | लढवी तर्कट | त्यालाही सपोर्ट | रिकी चा ह्या|| या ओळीत आपण वांशिक टीका केलीत. आता कांगारू काय म्हणेल? गेला जगातील सर्वात मोठ्या विभागात, ज्यात सर्व त्याज्य वस्तु आपण पाठवतो. पण चड्ड्या आपणच पुरवाव्या लागतील. सगळ्या धोनी आणि मंडळींनी काढून घेतल्या. माझे चार आणे जाहीर. संत चतुरंग जी , मज्जा आली. अशाच प्रसंगानुरूप शानदार जानदार ओव्या येऊ द्यात. आचरटाचार्य.

ऋषिकेश Wed, 03/05/2008 - 22:49
आजच मिपावर २-३ दिवसंनी आलो आणि ही कविता वाच्ली.. सुंदर!!! आवडली :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

वरदा Wed, 03/05/2008 - 23:53
मी तर चड्डीत रहाणे पहिल्यांदाच ऐकलं...मस्तच आहेत ओव्या....

सचिन Wed, 03/12/2008 - 00:11
भाषान्तर करून "डाउन अण्डर " पाठवून द्या !! पॉण्टिङ्गच्या ऑस्सी की तैसी !!

सचिन Wed, 03/12/2008 - 00:12
भाषान्तर करून "डाउन अण्डर " पाठवून द्या !! पॉण्टिङ्गच्या ऑस्सी की तैसी !!

'दोन्ही सामन्यात | लाविली ती वाट | रहावे चड्डीत | कांगारूंनी |' हे बाकी मस्त. बरेच दिवसानी चड्डीत रहा शब्दप्रयोग ऐकला. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

केशवसुमार Wed, 03/05/2008 - 23:52
'दोन्ही सामन्यात | लाविली ती वाट | रहावे चड्डीत | कांगारूंनी |' हे बाकी मस्त. बरेच दिवसानी चड्डीत रहा शब्दप्रयोग ऐकला. चालू द्या.. (लुग्गीवाला)केशवसुमार

प्राजु Wed, 03/05/2008 - 09:17
चतुरंग, मानलं तुम्हाला.... अप्रतिम. एकदमच सह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हि................ - (सर्वव्यापी)प्राजु

सुधीर कांदळकर Wed, 03/05/2008 - 20:15
अँड्र्यूचे मर्कट | लढवी तर्कट | त्यालाही सपोर्ट | रिकी चा ह्या|| या ओळीत आपण वांशिक टीका केलीत. आता कांगारू काय म्हणेल? गेला जगातील सर्वात मोठ्या विभागात, ज्यात सर्व त्याज्य वस्तु आपण पाठवतो. पण चड्ड्या आपणच पुरवाव्या लागतील. सगळ्या धोनी आणि मंडळींनी काढून घेतल्या. माझे चार आणे जाहीर. संत चतुरंग जी , मज्जा आली. अशाच प्रसंगानुरूप शानदार जानदार ओव्या येऊ द्यात. आचरटाचार्य.

ऋषिकेश Wed, 03/05/2008 - 22:49
आजच मिपावर २-३ दिवसंनी आलो आणि ही कविता वाच्ली.. सुंदर!!! आवडली :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

वरदा Wed, 03/05/2008 - 23:53
मी तर चड्डीत रहाणे पहिल्यांदाच ऐकलं...मस्तच आहेत ओव्या....

सचिन Wed, 03/12/2008 - 00:11
भाषान्तर करून "डाउन अण्डर " पाठवून द्या !! पॉण्टिङ्गच्या ऑस्सी की तैसी !!

सचिन Wed, 03/12/2008 - 00:12
भाषान्तर करून "डाउन अण्डर " पाठवून द्या !! पॉण्टिङ्गच्या ऑस्सी की तैसी !!
कांगारूंचा संघ | मस्तीत तो दंग| भलतेच रंग | उधळीसे || भारताचा संघ | होतातरी दंग | खेळण्यात भंग | रिकी करे|| अँड्र्यूचे मर्कट | लढवी तर्कट | त्यालाही सपोर्ट | रिकी चा ह्या|| भज्जी तोही चिडे | काढता वाभाडे | तरीही तो नडे | रिकी बाळ || नसते आरोप | करती ते खूप || दिला मग चोप | खेळामाजी || वामन सचिन | करतो हैराण | घरचे मैदान | कुठे जाशी?|| एकदिस क्रिकेट | कांगारु ते धीट | बोले फटाफट | संपवूया || धोणीनेही मग | बांधला तो चंग | पाजली ती भांग | कांगारुंना || दोन्ही सामन्यात | लाविली ती वाट | रहावे चड्डीत | कांगारूंनी || पुरे तरी आता | बाष्कळह्या बाता | म्हणे बोध देता| 'चतुरंगे'||

स्वर्ग

सृष्टीलावण्या ·

धनंजय Tue, 03/04/2008 - 21:45
अन् माझ्या हातातल्या गुलाबाची प्रत्येक पाकळी थरथरली, कल्पक आणि भावुक. विनोदी नसलेल्या भावपूर्ण कवितेतही सुंदर वाटावी.

प्राजु Tue, 03/04/2008 - 21:49
कल्पक आणि भावुक. विनोदी नसलेल्या भावपूर्ण कवितेतही सुंदर वाटावी. -सहमत. बाकी शेवट मात्र अगदी मजेदार.. - (सर्वव्यापी)प्राजु

वरदा Tue, 03/04/2008 - 21:59
अन् माझ्या हातातल्या गुलाबाची प्रत्येक पाकळी थरथरली, कल्पक आणि भावुक. विनोदी नसलेल्या भावपूर्ण कवितेतही सुंदर वाटावी. १००% सहमत्...कविता छान विषय नेहेमीचा असुनही मस्त वाटलं वाचुन....

सुधीर कांदळकर Tue, 03/04/2008 - 22:13
एव्हढ्यात तिची सुंदर सावली रस्त्यावर पडली अन् माझ्या हातातल्या गुलाबाची प्रत्येक पाकळी थरथरली, हृदयाचे दरवाजे लागले धडधडू, या ओळी आवडल्या. प्रेमात पडल्यावर सावली पण सुंदर वाटते. हातातील गुलाबाची पाने थरथरतात आणि हृदयाचे दरवाजे धडधडतात. वाहवा. अप्रतिम कल्पना. आपल्या नावातील लावण्य कवितेत उतरले सृलाताई. आणि नंतर अनपेक्षित विनोदी वळण. विनोदी कविता एवढी सुंदर क्वचितच असते. येथे मला परसाईंच्या एका हिंदी कविता आठवली. ते प्रियेच्या सौंदर्याची अभिजात शब्दात तारीफ करतात. सात आठ ओळीनंतर म्हणतात, लेकिन तेरी यादों के मच्छर मुझे सोने नहीं देते. असो. धन्यवाद आणि शुभेच्छा.

सृष्टीलावण्या Wed, 03/05/2008 - 07:26
@आपल्या नावातील लावण्य कवितेत उतरले सृलाताई. पण ही कविता माझी नाही किंबहुना ह्या जगात कोणतीच कविता माझी नाही. कारण कविता करण्यासाठी जी प्रतिभा लागते ती माझ्याकडे नाही. मी नेहेमी विचार करते की केशवसुमारांसारखे कविता कौशल्य माझ्याकडे असते तर मिपावर कवितांचा रतीबच घातला. (केशवसुमार हेच नाव किती छान आहे आणि विनम्रता दर्शकसुद्धा, आपल्या बरेच काही येत असूनसुद्धा जास्त काही येत नाही ही जाणीव ठेवणारे विरळा कारण भाषेचा सागर इतका मोठा आहे की त्यातून आपण फार तर २-३ थेंब घेऊ शकतो). > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

फटू Wed, 03/05/2008 - 09:19
कविता कुणाचीही असो पण खूपच छान आहे... अस्मादिकास कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली. आमच्यावेळीही प्रत्येक नवीन प्रयत्नात काहीतरी असाच फालतुपणा व्हायचा.... पण आम्ही हार न मानता पुन्हा नव्या उमेदीने दुसरं प्रकरण चालू करण्याच्या मागे लागायचो...

अविनाश ओगले Wed, 03/05/2008 - 20:26
दिवाळीत तुझ्या घरी मी आलो पाहुणा रूप तुझे पाहुनिया केल्या तुजला खुणा तू ही हासूनी पाहशी झाला मनी आनंद प्रेमाचा गे तुझिया लागे मजला छंद मुक्तपणे बोलशी, हासशी पाहून माझ्याकडे त्या हास्याने होई धक धक हृदयी माझ्या गडे रुजत होते अजुनी माझ्या मनी प्रेमाचे बीज तो एके सकाळी ओवाळूनी दिलास धक्का मज तेव्हाचे ते शब्द तुझे उठले मजला खाया "भाऊबीज आज असे" वदलीस "भाऊराया" -अविनाश ओगले

सृष्टीलावण्या Wed, 03/05/2008 - 23:41
आठवतो का तो दिवस, तो होता दसरा, आठवतो मला तुझा चेहरा गोड आणि हसरा, सीमा ओलांडली आपण आणि सोनं ही लुटलं, आता मात्र म्हणतेस कोण आणि कुठलं.....! संकलक - अनुराधा धुपकर > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

धनंजय Tue, 03/04/2008 - 21:45
अन् माझ्या हातातल्या गुलाबाची प्रत्येक पाकळी थरथरली, कल्पक आणि भावुक. विनोदी नसलेल्या भावपूर्ण कवितेतही सुंदर वाटावी.

प्राजु Tue, 03/04/2008 - 21:49
कल्पक आणि भावुक. विनोदी नसलेल्या भावपूर्ण कवितेतही सुंदर वाटावी. -सहमत. बाकी शेवट मात्र अगदी मजेदार.. - (सर्वव्यापी)प्राजु

वरदा Tue, 03/04/2008 - 21:59
अन् माझ्या हातातल्या गुलाबाची प्रत्येक पाकळी थरथरली, कल्पक आणि भावुक. विनोदी नसलेल्या भावपूर्ण कवितेतही सुंदर वाटावी. १००% सहमत्...कविता छान विषय नेहेमीचा असुनही मस्त वाटलं वाचुन....

सुधीर कांदळकर Tue, 03/04/2008 - 22:13
एव्हढ्यात तिची सुंदर सावली रस्त्यावर पडली अन् माझ्या हातातल्या गुलाबाची प्रत्येक पाकळी थरथरली, हृदयाचे दरवाजे लागले धडधडू, या ओळी आवडल्या. प्रेमात पडल्यावर सावली पण सुंदर वाटते. हातातील गुलाबाची पाने थरथरतात आणि हृदयाचे दरवाजे धडधडतात. वाहवा. अप्रतिम कल्पना. आपल्या नावातील लावण्य कवितेत उतरले सृलाताई. आणि नंतर अनपेक्षित विनोदी वळण. विनोदी कविता एवढी सुंदर क्वचितच असते. येथे मला परसाईंच्या एका हिंदी कविता आठवली. ते प्रियेच्या सौंदर्याची अभिजात शब्दात तारीफ करतात. सात आठ ओळीनंतर म्हणतात, लेकिन तेरी यादों के मच्छर मुझे सोने नहीं देते. असो. धन्यवाद आणि शुभेच्छा.

सृष्टीलावण्या Wed, 03/05/2008 - 07:26
@आपल्या नावातील लावण्य कवितेत उतरले सृलाताई. पण ही कविता माझी नाही किंबहुना ह्या जगात कोणतीच कविता माझी नाही. कारण कविता करण्यासाठी जी प्रतिभा लागते ती माझ्याकडे नाही. मी नेहेमी विचार करते की केशवसुमारांसारखे कविता कौशल्य माझ्याकडे असते तर मिपावर कवितांचा रतीबच घातला. (केशवसुमार हेच नाव किती छान आहे आणि विनम्रता दर्शकसुद्धा, आपल्या बरेच काही येत असूनसुद्धा जास्त काही येत नाही ही जाणीव ठेवणारे विरळा कारण भाषेचा सागर इतका मोठा आहे की त्यातून आपण फार तर २-३ थेंब घेऊ शकतो). > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

फटू Wed, 03/05/2008 - 09:19
कविता कुणाचीही असो पण खूपच छान आहे... अस्मादिकास कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली. आमच्यावेळीही प्रत्येक नवीन प्रयत्नात काहीतरी असाच फालतुपणा व्हायचा.... पण आम्ही हार न मानता पुन्हा नव्या उमेदीने दुसरं प्रकरण चालू करण्याच्या मागे लागायचो...

अविनाश ओगले Wed, 03/05/2008 - 20:26
दिवाळीत तुझ्या घरी मी आलो पाहुणा रूप तुझे पाहुनिया केल्या तुजला खुणा तू ही हासूनी पाहशी झाला मनी आनंद प्रेमाचा गे तुझिया लागे मजला छंद मुक्तपणे बोलशी, हासशी पाहून माझ्याकडे त्या हास्याने होई धक धक हृदयी माझ्या गडे रुजत होते अजुनी माझ्या मनी प्रेमाचे बीज तो एके सकाळी ओवाळूनी दिलास धक्का मज तेव्हाचे ते शब्द तुझे उठले मजला खाया "भाऊबीज आज असे" वदलीस "भाऊराया" -अविनाश ओगले

सृष्टीलावण्या Wed, 03/05/2008 - 23:41
आठवतो का तो दिवस, तो होता दसरा, आठवतो मला तुझा चेहरा गोड आणि हसरा, सीमा ओलांडली आपण आणि सोनं ही लुटलं, आता मात्र म्हणतेस कोण आणि कुठलं.....! संकलक - अनुराधा धुपकर > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
कालच सकाळी मराठीच्या तासाला पहिल्या बाकावरील तिने वळून पाहिले मला दोन्ही बाजूने कोपरखळ्या आल्या आणि शब्द मध्येच "मजा आहे तुझी साल्या" मग मी ही लिहिलं एक प्रेमपत्र, 'प्रिये तुझ्या प्रीतीस होईन का ग पात्र?' संध्याकाळी निघालो तिच्या भेटीला, डोळे लाऊन बसलो तिच्या घरी जायच्या वाटेला, एव्हढ्यात तिची सुंदर सावली रस्त्यावर पडली अन् माझ्या हातातल्या गुलाबाची प्रत्येक पाकळी थरथरली, हृदयाचे दरवाजे लागले धडधडू, 'तिच्याशी बोलायला विषय कसा काढू?' एव्हढ्यात एका गुंडाने तिची छेड काढली अन् त्या गुंडाची कानफडं रंगली..

अजुन काय हवे ...

विवेकवि ·

धनंजय Tue, 03/04/2008 - 21:39
एकच कटाक्श, तो पण हळूच... एकच होकार, तो पण लाजून... एकच स्पर्श, तो पण थरथरून... अजुन काय हवे असते आपल्या प्रियेकडून थोडी अधिक अपेक्षा असली, थोडे अधिक हवेसे असले, तरीही चालेल. (माझ्या दोन्ही आज्यांनी श्रीखंडाची वाटी अर्धी तोडली नाही, आणि शिवी देऊन धपाटा दिला नाही. पण "जे न देखे रवी" म्हणून कवीचे म्हणणे चालवून घेऊ...) बाकी "समाधानी असावे" हा उपदेश तसा पटतो. पण इथे पाक थोडा जास्तच गोड झाला आहे. मुरंब्यात थोडे लिंबू पिळा, असे अज्ञात कवीला सांगावेसे वाटते.

सुधीर कांदळकर Tue, 03/04/2008 - 22:02
चुकला. ते फारच व्यवहारी आहेत. कविता भावनेतून येते, बुद्धीतून येते. विशिष्ट मूडची असते. त्यांच्या व्यवहारकोरड्या मनाला हे पटणार नाही. पहिला कटाक्ष, पहिला स्पर्श, आज्जीची पहिली भुताची गोष्ट, बाळाची पहिली हाक, बाळाचे पहिले पाऊल, या सर्व पहिल्या अनुभवांची सर पुन्हा कशी येणार? अशा काही खास गोष्टीबद्दल ही कविता असावी. अनुभवाची खोली महत्वाची असते. लांबी रुंदी वा संख्या नाही. म्हणुन तर कवी वेडा असतो. असो. कविता छान आहे. शुभेच्छा.

In reply to by सुधीर कांदळकर

धनंजय Tue, 03/04/2008 - 22:31
नाही. या सर्व गोष्टींचे महत्त्व पटते. उलट त्यातील प्रत्येक माझ्यासाठी एकेका कवितेच्या लायकीचे भाव आहेत. माझ्या टीकेचे ते मूळ नाही. भरमसाठ यादी देऊन प्रत्येकाचा भाव कमी होतो - त्या अनुभवाच्या विशिष्ट मूडचे काय राहाते? शेवटी "अजून काय हवे" हेच अतिमिठ्ठे पालुपद माझ्या लक्षात राहाते. माझे व्यवहारकोरडे नसल्याचा, एक-एक अनुभव आवडण्याचा नमुना येथे बघावा : http://www.misalpav.com/node/990#comment-12708

सुवर्णमयी Tue, 03/04/2008 - 23:46
कविता चांगली आहे पण शेवटचे कडवेच नसते किंवा सगळ्यांनी दिले न मागून इथेच कविता थांबली असती तर मला जास्त प्रभावी वाटली असती. श्रीखंडाची वाटी आणि धपाटा याबद्दल माझेही मत धनंजय म्हणतात तसेच आहे. शेवटी त्याला जे जे लिहायचे त्याची कवीला मोकळीक आहेच की! (ते वाचून काय म्हणायचे याचे स्वातंत्र्य वाचकांना सुद्धा) इथे कवी अज्ञात आहे म्हणून बचावला ! नाही तर सुरु मारामारी! सोनाली

विसोबा खेचर Wed, 03/05/2008 - 11:48
एकच मायेची थाप, ती पण कुर्वाळून... एकच गरम पोळी, ती पण तूप लावून... एकच आशिर्वाद, तो पण डोळ्यात आसवे आणून.. अजुन काय हवे असते आपल्या आईकडून. सुरेख..! तात्या.

शरुबाबा Wed, 03/05/2008 - 12:20
एकच कठोर नकार स्वईराचाराला, तो पण ह्रुदयावर दगड ठेउन... एकच सडेतोड उपदेश, तो पण घोघर्या आवाजातून... एकच नजर अभिमानाची, आपली प्रगती पाहून... अजुन काय हवे असते आपल्या वडिलांकडून

धनंजय Tue, 03/04/2008 - 21:39
एकच कटाक्श, तो पण हळूच... एकच होकार, तो पण लाजून... एकच स्पर्श, तो पण थरथरून... अजुन काय हवे असते आपल्या प्रियेकडून थोडी अधिक अपेक्षा असली, थोडे अधिक हवेसे असले, तरीही चालेल. (माझ्या दोन्ही आज्यांनी श्रीखंडाची वाटी अर्धी तोडली नाही, आणि शिवी देऊन धपाटा दिला नाही. पण "जे न देखे रवी" म्हणून कवीचे म्हणणे चालवून घेऊ...) बाकी "समाधानी असावे" हा उपदेश तसा पटतो. पण इथे पाक थोडा जास्तच गोड झाला आहे. मुरंब्यात थोडे लिंबू पिळा, असे अज्ञात कवीला सांगावेसे वाटते.

सुधीर कांदळकर Tue, 03/04/2008 - 22:02
चुकला. ते फारच व्यवहारी आहेत. कविता भावनेतून येते, बुद्धीतून येते. विशिष्ट मूडची असते. त्यांच्या व्यवहारकोरड्या मनाला हे पटणार नाही. पहिला कटाक्ष, पहिला स्पर्श, आज्जीची पहिली भुताची गोष्ट, बाळाची पहिली हाक, बाळाचे पहिले पाऊल, या सर्व पहिल्या अनुभवांची सर पुन्हा कशी येणार? अशा काही खास गोष्टीबद्दल ही कविता असावी. अनुभवाची खोली महत्वाची असते. लांबी रुंदी वा संख्या नाही. म्हणुन तर कवी वेडा असतो. असो. कविता छान आहे. शुभेच्छा.

In reply to by सुधीर कांदळकर

धनंजय Tue, 03/04/2008 - 22:31
नाही. या सर्व गोष्टींचे महत्त्व पटते. उलट त्यातील प्रत्येक माझ्यासाठी एकेका कवितेच्या लायकीचे भाव आहेत. माझ्या टीकेचे ते मूळ नाही. भरमसाठ यादी देऊन प्रत्येकाचा भाव कमी होतो - त्या अनुभवाच्या विशिष्ट मूडचे काय राहाते? शेवटी "अजून काय हवे" हेच अतिमिठ्ठे पालुपद माझ्या लक्षात राहाते. माझे व्यवहारकोरडे नसल्याचा, एक-एक अनुभव आवडण्याचा नमुना येथे बघावा : http://www.misalpav.com/node/990#comment-12708

सुवर्णमयी Tue, 03/04/2008 - 23:46
कविता चांगली आहे पण शेवटचे कडवेच नसते किंवा सगळ्यांनी दिले न मागून इथेच कविता थांबली असती तर मला जास्त प्रभावी वाटली असती. श्रीखंडाची वाटी आणि धपाटा याबद्दल माझेही मत धनंजय म्हणतात तसेच आहे. शेवटी त्याला जे जे लिहायचे त्याची कवीला मोकळीक आहेच की! (ते वाचून काय म्हणायचे याचे स्वातंत्र्य वाचकांना सुद्धा) इथे कवी अज्ञात आहे म्हणून बचावला ! नाही तर सुरु मारामारी! सोनाली

विसोबा खेचर Wed, 03/05/2008 - 11:48
एकच मायेची थाप, ती पण कुर्वाळून... एकच गरम पोळी, ती पण तूप लावून... एकच आशिर्वाद, तो पण डोळ्यात आसवे आणून.. अजुन काय हवे असते आपल्या आईकडून. सुरेख..! तात्या.

शरुबाबा Wed, 03/05/2008 - 12:20
एकच कठोर नकार स्वईराचाराला, तो पण ह्रुदयावर दगड ठेउन... एकच सडेतोड उपदेश, तो पण घोघर्या आवाजातून... एकच नजर अभिमानाची, आपली प्रगती पाहून... अजुन काय हवे असते आपल्या वडिलांकडून
एकच चहा, तो पण कटींग... एकच पीक्चर, तो पण टेक्स फ्री... एकच साद, ती पण मनापासुन... अजुन काय हवे असते आपल्या मित्रांकडून एकच कटाक्श, तो पण हळूच... एकच होकार, तो पण लाजून... एकच स्पर्श, तो पण थरथरून... अजुन काय हवे असते आपल्या प्रियेकडून एकच भूताची गोष्ट, ती पण रंगवून... एकच श्रीखंडाची वडी, ती पण अर्धी तोडून... एकच जोरदार धपाटा, तो पण शिवी हासडून... अजुन काय हवे असते आपल्या आजीकडून एकच मायेची थाप, ती पण कुर्वाळून... एकच गरम पोळी, ती पण तूप लावून... एकच आशिर्वाद, तो पण डोळ्यात आसवे आणून.. अजुन काय हवे असते आपल्या आईकडून. एकच कठोर नकार स्वईराचाराला, तो पण ह्रुदयावर दगड ठेउन... एकच सडेत

आठवण.......

विवेकवि ·

सुधीर कांदळकर Tue, 03/04/2008 - 21:46
निष्काळजी टंकण्यामुळे बेरंग झाला. एक तर कविता न कळणा-यांना ती समजणे अगोदरच कठीण जाते. दहादा वाचावी लागते तेव्हा मडक्यात शिरते. वाचायलाच अडथळा आला तर ........ असो. नीटनेटकेपणा कोणत्याहि गोष्टीचे सौंदर्य वाढवतो हे खरेच. काही कवि तर अक्षरे तेखील रंगात टंकतात. ती सुबक अक्षरे पाहूनच मन तृप्त होते. म्हणून तर कोणतेहि प्रॉडक्ट सुंदर पॅकिंगमध्येच विकतात. हाच नीटनेटकेपणा, चोखंदळपणा, नंतर शब्दयोजनेतहि उतरेल. आणि कविता जास्त सुंदर आकर्षक होईल. अनाहूत कडू सल्ल्याबद्दल क्षमस्व. पुढील कवितेसाठी. शुभेच्छा.

विसोबा खेचर Wed, 03/05/2008 - 11:36
बेधुंद करणार्या रातराणीचा बहर नाही मागत तुझ्याकडे जाताना एक मोगर्याची कळी मात्र आठवनीने दे वा, सुंदर!

सुधीर कांदळकर Tue, 03/04/2008 - 21:46
निष्काळजी टंकण्यामुळे बेरंग झाला. एक तर कविता न कळणा-यांना ती समजणे अगोदरच कठीण जाते. दहादा वाचावी लागते तेव्हा मडक्यात शिरते. वाचायलाच अडथळा आला तर ........ असो. नीटनेटकेपणा कोणत्याहि गोष्टीचे सौंदर्य वाढवतो हे खरेच. काही कवि तर अक्षरे तेखील रंगात टंकतात. ती सुबक अक्षरे पाहूनच मन तृप्त होते. म्हणून तर कोणतेहि प्रॉडक्ट सुंदर पॅकिंगमध्येच विकतात. हाच नीटनेटकेपणा, चोखंदळपणा, नंतर शब्दयोजनेतहि उतरेल. आणि कविता जास्त सुंदर आकर्षक होईल. अनाहूत कडू सल्ल्याबद्दल क्षमस्व. पुढील कवितेसाठी. शुभेच्छा.

विसोबा खेचर Wed, 03/05/2008 - 11:36
बेधुंद करणार्या रातराणीचा बहर नाही मागत तुझ्याकडे जाताना एक मोगर्याची कळी मात्र आठवनीने दे वा, सुंदर!
चांदणे पांघरलेले आकाश नाही मागत तुझ्याकडे क्षितिजावर लुकलुकणारा एक तारा मात्र आठवनीने दे बेभान कोसळणारा मुक्त पाउस नाही मागत तुझ्याकडे श्वासात दरवळणारा ओल्या मातीचा सुवास मात्र आठवनीने दे बेधुंद करणार्या रातराणीचा बहर नाही मागत तुझ्याकडे जाताना एक मोगर्याची कळी मात्र आठवनीने दे उसळणारा बेछुट दर्या नाही मागत तुझ्याकडे शांत जलाशयातील एक तरंग मात्र आठवनीने दे मुठी एवढे ह्रुदय नाही मागत तुझ्याकडे मझ्यासाठी चुकलेला एक ठोका मात्र आठवनीने दे आठवणीने दे..... कविता आली आहे लेखक माहित नाहीत........

तुझ्याशिवाय..............

विवेकवि ·
कारण आता तुझ्याशिवाय मी नक्की जगणार आहे दु:खाला विसरून सुखाला आणणार आहे आता तुझ्याशिवाय मी नक्की जगणार आहे मनापासून प्रेम फ़क्त मीच करत होतो तुला जगता यावे यासाठी फ़क्त मीच मरत होतो माझ्या प्रेमाची कदर तुला कधीच कळली नाहि कारण तुझ्या हृदयाची जागा कधीच खाली झाली नाहि पण मी आनंदी राहू शकतो हेच तुला दिसणार आहे कारण आता तुझ्याशिवाय मी नक्की जगणार आहे तुला मी नको फ़क्त पैसा नी आराम हवा होता तुला मी हेही दिले असते मला फ़क्त जरासा वेळ हवा होता तुला हे सर्व मिळाले असेल पण मी नाहि मिळणार कारण प्रेम म्हणजे काय तुला कधीच नाही कळणार मी किती मजेत आहे हे सर्व जग बघणार आहे कारण आता तुझ्याशिवाय मी नक्की जगणार आ

कांगारुंचा पोपट

शरुबाबा ·

चतुरंग Tue, 03/04/2008 - 19:35
लई ट्यॅव ट्यॅव लावली होती, चांगली जिरली! कांगारुंचा नुसता नाही तर सप्तरंगी पोपट केल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन!!! सचिनचे लागोपाठ दुसरे शतक झाले असते तर त्यांची पिसे निघाली असती पण तरीही हरकत नाही आपण जिंकलो हे महत्वाचे. चतुरंग

नन्दु Tue, 03/04/2008 - 19:43
फायनल फक्त २ नच होतिल असे फुशर्कित सन्गन्र्य रिकि ल दोन्हि सम्न्यत धुळ चरुन विजय्श्रि मिलवलि सर्व जननि मिलुन सन्घिक विजय मिळ्वला पन लक्शत रहते ति सचिन चि खेलि फायनल व अधिचा सामन्यातिल चमक्दर खेलि भले !!!!! सर्व भारतीयाचे व भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन...

In reply to by नन्दु

फायनल फक्त २ नच होतिल असे फुशर्कित सन्गन्र्य रिकि ल दोन्हि सम्न्यत धुळ चरुन विजय्श्रि मिलवलि सर्व जननि मिलुन सन्घिक विजय मिळ्वला पन लक्शत रहते ति सचिन चि खेलि फायनल व अधिचा सामन्यातिल चमक्दर खेलि भले !!!!! सर्व भारतीयाचे व भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन... नन्दु, मलाही तुझ्याइतकाच आनंद झाला, तुझ्या भावनांशी सहमत !!!! क्रिकेटवेडा प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धोंडोपंत Tue, 03/04/2008 - 21:11
भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन. रिकी पाँटींग, ऍन्ड्र्यू सायमंडस, ब्रॅड हॉग आणि मॅथ्यू हॅडनची केविलवाणी थोबाडं पाहून आमच्या डोळ्याचे पारणे फिटले. फोकलीचे लई माजले होते. आपला, (प्रेक्षक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

भडकमकर मास्तर Wed, 03/05/2008 - 01:19
अगदी खरे आहे....खरेतर टूर्नामेंट सुरू होताना अजिबात अपेक्षा नव्हती इतका आनंददायक विजय मिळेल म्हणून...पण जशी जशी एक एक मॆच व्हायला लागली, तशा आशा वाढायला लागल्या... ...आज तर धमाल आली... सचिन चक्क दोन्हीही फ़ायनल मध्ये अगदी दहा वर्षांपूर्वा सारखा ( शारजा एप्रिल १९९८)फ़ॊर्मात खेळला...हरलेल्या ऒसी मंडळी ना पाहून असे वाटायला लागले की अभेद्य बुरुजाला खिंडारे पडू लागली आहेत....वॊर्न, मॆग्रा गेले, गिल्ली गेला आज, हेडन , हसी , पोंटिंग दोन तीन वर्षांहून फ़ार काळ राहतील असे वाटत नाही...मग एक ब्रेट ली सोडला तर तसा महान आणि बराच खिलाडू माणूस कोण? ( तरी चोराने सचिनला परवा बीमर बरा टाकला !!! ..निदान सॊरी म्हटला , म्हणून खिलाडू :))आज इयान चॆपल म्हणाला, इंडियाकडे जसे यंग्स्टर १९ आणि २० वर्षांचे येत आहेत तसे ऒसी संघात २६ आणि २८ वर्षाचे लोक पदार्पण करत आहेत, हे फ़ारसे बरे चित्र नाही... ... अहाहा काय बरे वाटले म्हणून सांगू... शेवटची ओव्हर धोनी कोणाला देणार ते टेन्शन फ़ार होते, आणि पुन्हा पठाण म्हटल्यावर भीती फ़ार वाढली होती, पण धोनी साहेब कूल होते., असे वाटले... शेवट त्याने कुठेही स्वत:वर फ़ोकस घेतला नाही, माज केला नाही......

भडकमकर मास्तर Wed, 03/05/2008 - 01:36
तो मायकेल क्लार्क सचिनला पकडून कसा कबड्डी खेळत होता ते पाहिलं का? धन्य ती खिलाडू व्रुत्ती.... लोक ऑसींच्या खिलाडू व्रुत्तीचे पुढच्या दहा हजार वर्षांत नाव काढतील... आणि हा असला माणूस पुढे कॅप्टन होणार म्हणे... आश्चर्य नाहीएच म्हणा..पोंटिंग्ची गादी चालवायला असलाच रडका माणूस हवा...

सृष्टीलावण्या Wed, 03/05/2008 - 08:35
ह्यावरून आठवले, पूर्वी अगदी सुरवातीला जेव्हा पहिल्यांदिच मुरलीधरन् वर खोटे आरोप झाले त्यावेळी अर्जुन रणतुंग म्हणाला होता... "ऑसी असे वागतात यात आम्हाला काहीच आश्चर्य वाटत नाही कारण श्रीलंकेला २५०० वर्षाची संस्कृति आहे आणि ऑस्ट्रेलियाचा इतिहास तर सर्वच जाणतात (इंग्लंडहून तडिपार केलेले अट्टल गुंड व खुनी ऑस्ट्रेलियात आले ज्यांनी तिथे वंशविच्छेदनाचे काम केले, अनेक आदिवासी जमाती पूर्णत: नष्ट केल्या)". > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

सुधीर कांदळकर Wed, 03/05/2008 - 20:45
इंग्लंडहून तडिपार केलेले अट्टल गुंड व खुनी ऑस्ट्रेलियात आले ज्यांनी तिथे वंशविच्छेदनाचे काम केले, अनेक आदिवासी जमाती पूर्णत: नष्ट केल्या". चेंडूफळीचा खेळ देखील नष्ट करण्याच्या मार्गावर आहेत. या असंस्कृत हलकटांना भारताचा व्हिसा पण देता नये.

चतुरंग Tue, 03/04/2008 - 19:35
लई ट्यॅव ट्यॅव लावली होती, चांगली जिरली! कांगारुंचा नुसता नाही तर सप्तरंगी पोपट केल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन!!! सचिनचे लागोपाठ दुसरे शतक झाले असते तर त्यांची पिसे निघाली असती पण तरीही हरकत नाही आपण जिंकलो हे महत्वाचे. चतुरंग

नन्दु Tue, 03/04/2008 - 19:43
फायनल फक्त २ नच होतिल असे फुशर्कित सन्गन्र्य रिकि ल दोन्हि सम्न्यत धुळ चरुन विजय्श्रि मिलवलि सर्व जननि मिलुन सन्घिक विजय मिळ्वला पन लक्शत रहते ति सचिन चि खेलि फायनल व अधिचा सामन्यातिल चमक्दर खेलि भले !!!!! सर्व भारतीयाचे व भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन...

In reply to by नन्दु

फायनल फक्त २ नच होतिल असे फुशर्कित सन्गन्र्य रिकि ल दोन्हि सम्न्यत धुळ चरुन विजय्श्रि मिलवलि सर्व जननि मिलुन सन्घिक विजय मिळ्वला पन लक्शत रहते ति सचिन चि खेलि फायनल व अधिचा सामन्यातिल चमक्दर खेलि भले !!!!! सर्व भारतीयाचे व भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन... नन्दु, मलाही तुझ्याइतकाच आनंद झाला, तुझ्या भावनांशी सहमत !!!! क्रिकेटवेडा प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धोंडोपंत Tue, 03/04/2008 - 21:11
भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन. रिकी पाँटींग, ऍन्ड्र्यू सायमंडस, ब्रॅड हॉग आणि मॅथ्यू हॅडनची केविलवाणी थोबाडं पाहून आमच्या डोळ्याचे पारणे फिटले. फोकलीचे लई माजले होते. आपला, (प्रेक्षक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

भडकमकर मास्तर Wed, 03/05/2008 - 01:19
अगदी खरे आहे....खरेतर टूर्नामेंट सुरू होताना अजिबात अपेक्षा नव्हती इतका आनंददायक विजय मिळेल म्हणून...पण जशी जशी एक एक मॆच व्हायला लागली, तशा आशा वाढायला लागल्या... ...आज तर धमाल आली... सचिन चक्क दोन्हीही फ़ायनल मध्ये अगदी दहा वर्षांपूर्वा सारखा ( शारजा एप्रिल १९९८)फ़ॊर्मात खेळला...हरलेल्या ऒसी मंडळी ना पाहून असे वाटायला लागले की अभेद्य बुरुजाला खिंडारे पडू लागली आहेत....वॊर्न, मॆग्रा गेले, गिल्ली गेला आज, हेडन , हसी , पोंटिंग दोन तीन वर्षांहून फ़ार काळ राहतील असे वाटत नाही...मग एक ब्रेट ली सोडला तर तसा महान आणि बराच खिलाडू माणूस कोण? ( तरी चोराने सचिनला परवा बीमर बरा टाकला !!! ..निदान सॊरी म्हटला , म्हणून खिलाडू :))आज इयान चॆपल म्हणाला, इंडियाकडे जसे यंग्स्टर १९ आणि २० वर्षांचे येत आहेत तसे ऒसी संघात २६ आणि २८ वर्षाचे लोक पदार्पण करत आहेत, हे फ़ारसे बरे चित्र नाही... ... अहाहा काय बरे वाटले म्हणून सांगू... शेवटची ओव्हर धोनी कोणाला देणार ते टेन्शन फ़ार होते, आणि पुन्हा पठाण म्हटल्यावर भीती फ़ार वाढली होती, पण धोनी साहेब कूल होते., असे वाटले... शेवट त्याने कुठेही स्वत:वर फ़ोकस घेतला नाही, माज केला नाही......

भडकमकर मास्तर Wed, 03/05/2008 - 01:36
तो मायकेल क्लार्क सचिनला पकडून कसा कबड्डी खेळत होता ते पाहिलं का? धन्य ती खिलाडू व्रुत्ती.... लोक ऑसींच्या खिलाडू व्रुत्तीचे पुढच्या दहा हजार वर्षांत नाव काढतील... आणि हा असला माणूस पुढे कॅप्टन होणार म्हणे... आश्चर्य नाहीएच म्हणा..पोंटिंग्ची गादी चालवायला असलाच रडका माणूस हवा...

सृष्टीलावण्या Wed, 03/05/2008 - 08:35
ह्यावरून आठवले, पूर्वी अगदी सुरवातीला जेव्हा पहिल्यांदिच मुरलीधरन् वर खोटे आरोप झाले त्यावेळी अर्जुन रणतुंग म्हणाला होता... "ऑसी असे वागतात यात आम्हाला काहीच आश्चर्य वाटत नाही कारण श्रीलंकेला २५०० वर्षाची संस्कृति आहे आणि ऑस्ट्रेलियाचा इतिहास तर सर्वच जाणतात (इंग्लंडहून तडिपार केलेले अट्टल गुंड व खुनी ऑस्ट्रेलियात आले ज्यांनी तिथे वंशविच्छेदनाचे काम केले, अनेक आदिवासी जमाती पूर्णत: नष्ट केल्या)". > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

सुधीर कांदळकर Wed, 03/05/2008 - 20:45
इंग्लंडहून तडिपार केलेले अट्टल गुंड व खुनी ऑस्ट्रेलियात आले ज्यांनी तिथे वंशविच्छेदनाचे काम केले, अनेक आदिवासी जमाती पूर्णत: नष्ट केल्या". चेंडूफळीचा खेळ देखील नष्ट करण्याच्या मार्गावर आहेत. या असंस्कृत हलकटांना भारताचा व्हिसा पण देता नये.
महेंद्रसिंग ढोणीच्या टीम इंडियानं जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात धूळ चारली आणि मालिका त्यांच्याकडून खेचून घेत विक्रम रचला.

जयव॑त दळवी॑ या॑ची पुस्तके कुठे मिळतील?

डॉ.प्रसाद दाढे ·

विसोबा खेचर Tue, 03/04/2008 - 18:29
आपण गिरगावातल्या मॅजेस्टिक बुक डेपोमध्ये चौकशी केलीत का? तिथे तरी नक्की मिळायला हवीत असे वाटते... आपला, (दळवीप्रेमी)

In reply to by विसोबा खेचर

सृष्टीलावण्या Wed, 03/05/2008 - 09:36
प्लाझा चित्रपटगृहाच्या मागे विष्णु निवास इथे दुसरे मॅजेस्टिक बुक डेपो आहे तिथे ५०००-१०००० पुस्तके विषयवार shelf वर ठेवलेली असतात जरा शोधले तर कुठलेही दुर्मिळ पुस्तकसुद्धा सहज मिळते. मात्र दुकानातील मालक व चाकरवर्गास त्रास देऊ नये नाहीतर पुणेरी दुकानातील मराठी बोलीचा अनुभव मिळेल. तसेच तिथे कुठल्याही रु. १००/-च्या पेक्षा जास्त खरेदीवर १०% ते ३०% सवलत मिळते. . . परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

डॉ.प्रसाद दाढे Tue, 03/04/2008 - 19:41
धन्यवाद तात्या, पण मी पुण्यातल्या मॅजेस्टिकमध्ये चौकशी केली होती, कोठावळे कुटु॑बातील एकजण माझे पेश॑टही आहेत, त्या॑नीच मला 'आउट ऑफ प्रि॑ट' असे सा॑गितले होते..आता एकमेव पर्याय म्हणजे दळवी कुटु॑बाशीच स॑पर्क होऊ शकला तरच..

चतुरंग Tue, 03/04/2008 - 20:26
पुणे विद्यापीठाचे जयकर ग्रंथालय कदाचित उपयोगाचे ठरु शकेल. चतुरंग

धोंडोपंत Tue, 03/04/2008 - 20:48
आयडियल बुक कंपनी, दादर (पश्चिम) येथे चौकशी करावी. संपर्क - श्री. मंदारशेठ नेरूरकर ( मालक) दूरध्वनी क्रमांक - २४३०२१२६ आपट्यांकडून आलो आहोत असे सांगावे, कोणत्याही पुस्तकावर १०% सवलत मिळेल. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

मुक्तसुनीत Tue, 03/04/2008 - 23:14
दळवींच्या पुस्तकांच्या निमित्ताने त्यांच्या लिखाणाची आठवण अनेक वर्षांनी आली. नव्वदीच्या दशकाच्या प्रारंभकालापर्यंत दळवी हे मराठीतील एक अत्यंत लोकप्रिय , आघाडीचे लेखक म्हणून प्रसिद्ध होते. एका माणसामधे जणू दोन माणसे वसतीला असावी , तसे , त्यांचे लिखाण सरळसरळ दोन प्रकारांमधे मोडायचे - गंभीर आणि गमतीदार. "ठणठणपाळ" या नावाने साहित्यिकांची यथेच्छ खिल्ली त्यानी जवळजवळ पंचवीस वर्षे उडवली. मध्यमवर्गीय माणासाच्या आयुष्यातील विनोद असे त्यांच्या गमतीच्या लिखाणाचे वर्णन करता येईल. मूळ विनोदी स्वभाव आणि त्यावर चढलेला कोकणी गजालींचा रंग. दळवींचे या विभागातले लिखाण विपुल आहे. वर्षानुवर्षे विविध अंकातून त्यानी ते सातत्याने केले. मात्र दळवीनी जे गंभीर प्रकृतीचे लिखाण केले - विशेषतः कांदबरी या सदरामधे - ते अजोड आहे असे मला वाटते. मनोविकृतींची जी चित्रणे त्यानी केली , ती एकाच वेळी विदारक आहेत आणि कारुण्यपूर्ण सुद्धा. मनोविकाराने ग्रासलेली दुर्दैवी आयुष्ये, त्या माणासांच्या आप्तस्वकीयांची होणारी परवड , निरनिराळ्या लैंगिक विकृती, त्यांच्यातील कुरुपता याची जीवघेणी चित्रणे त्यानी केली आहेत. दळवीनी खूप पाहिले हे खरे. आणि खूप जवळून पाहिले. जे पाहिले ते पहायला धैर्य हवे; बघणार्‍याला त्यामागचे कारुण्य आणि शोकांतिका कळायला हवी आणि ते नेमक्या शब्दात विशद करण्याची ताकद हवी. आज पेंडसे, दळवी यांसारखे मोठे लेखक विस्मृतीप्राय झालेले पाहून व्यथित व्हायला होते.

डॉ.प्रसाद दाढे Wed, 03/05/2008 - 07:56
दळवी॑च्या ठणठणपाळने सत्तर्-ऐ॑शीच्या दशका॑मध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता, आपल्या मालवणी 'वाडकर' स्टाइलमध्ये त्या॑नी साहित्यविश्वातील ढुढ्ढाचार्या॑ची जी रेवडी उडविली त्याला तोड नाही..आजही ते सर्व वाचताना मजा येते. माझ्याकडे दळवी॑ची खालील पुस्तके आहेत परममित्र, सारे प्रवासी घडीचे, निवडक ठणठणपाळ, आणखी ठणठणपाळ, अलाणे-फलाणे, श्री म॑गलमूर्ती आणि क॑पनी, श्रीका॑त, स्वप्नरेखा, महान॑दा सारे प्रवासी' ने तर खूप हसविले आणि शेवटी डोळ्यात पाणीसुद्धा आणले.. पे॑डसे॑च्या 'तु॑बाडचे खोत' ने अ॑गावर काटा आणला होता,अफाट काद॑बरी आहे. मला स्वतःला रथचक्र आणि गार॑बीचा बापू पेक्षा तु॑बाड जास्त आवडली. खुद्द श्री. ना॑ची सुद्धा तु॑बाडच जास्त लाडकी होती (असे त्या॑नीच मला सा॑गितले होते.) दुर्दैवाने माझी आणि दळवी॑ची कधीच भेट होउ शकली नाही पण पे॑डसे मात्र एकदा भेटले पुण्यात त्या॑च्या एका नातलगाच्या लग्नात. मस्त गप्पा मारल्या त्या॑नी, खूप चा॑गले बोलले. दळवी आणि पे॑डसे या॑च्यातील दोन साम्य स्थळे म्हणजे दोघेही मूळ कोकणातले आणि दोघा॑नाही साहित्य स॑मेलनाच्या अध्यक्षपदात रस नव्हता

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

विसोबा खेचर Wed, 03/05/2008 - 08:49
सारे प्रवासी' ने तर खूप हसविले आणि शेवटी डोळ्यात पाणीसुद्धा आणले.. 'सारे प्रवासी...' तर फारच सुंदर पुस्तक आहे. छोटेखानीच, परंतु अतिशय हलकंफुलकं! आपला, भावल्या किलिंडर. पे॑डसे॑च्या 'तु॑बाडचे खोत' ने अ॑गावर काटा आणला होता,अफाट काद॑बरी आहे. मला स्वतःला रथचक्र आणि गार॑बीचा बापू पेक्षा तु॑बाड जास्त आवडली. खुद्द श्री. ना॑ची सुद्धा तु॑बाडच जास्त लाडकी होती (असे त्या॑नीच मला सा॑गितले होते.) सहमत आहे. तुंबाडचे खोत क्लासच कादंबरी आहे, खिळवून ठेवते! पेंडश्यांच्या प्रतिभेला सलाम.. आपला, नरसू खोत. दळवी आणि पे॑डसे या॑च्यातील दोन साम्य स्थळे म्हणजे दोघेही मूळ कोकणातले बाकी कोकणची माणसंच विलक्षण प्रतिभावान असतात! आपला, तात्या देवगडकर.

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

धोंडोपंत Wed, 03/05/2008 - 20:09
दळवी आणि पे॑डसे या॑च्यातील दोन साम्य स्थळे म्हणजे दोघेही मूळ कोकणातले आणि दोघा॑नाही साहित्य स॑मेलनाच्या अध्यक्षपदात रस नव्हता पेंडसे आणि दळवी या दोघांच्या लेखनात कोकण असले तरी शिरूभाऊंच्या लेखनात उत्तर रत्नागिरी जिल्हा आहे आणि दळवी सारस्वत असल्यामुळे कदाचित असेल, त्यांच्या लेखनात गोव्याकडील भाग आहे. ते सगळ तिकडचं. मंगेश, शांतादुर्गा वगैरे . शिरूभाऊ आमच्याकडचे. खेड, दापोली, आंजर्ले , हर्णै, केळशी , मुर्डी, दाभोळ, चिपळूण असा फरक आहे. आपला, (तौलनिक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

विजुभाऊ Wed, 03/05/2008 - 15:25
उपहास कथा माझ्या कडे आहे.... पहातो...वेल मिळाला तर तुम्हाला झेरोक्ष साठी देतो विजुभाऊ ९२२६१०२८१२

डॉ.प्रसाद दाढे Wed, 03/05/2008 - 18:14
विजुभाऊ, लाख लाख धन्यवाद! मी गेली आठ वर्षे ते पुस्तक शोधत आहे पण मिळत नव्हते. हताश झालो होतो..मिसळ-पावमुळे तुमची भेट झाली आणि 'दिल कि आरजू' पूर्ण झाली..मिसळ-पाव मला 'पावले.' लवकरच भेटू

डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 03/06/2008 - 08:38
दळवी या॑चे मूळ गाव 'आरवली' मला वाटते गोव्याला लागूनच आहे आणि पे॑डसे या॑चे गाव साखरपे॑डी (मुरूड-हर्णै) त्यामुळे को॑कणातलेच दोन वेगळे र॑ग वाचका॑ना अनुभवा॑स येतात. गो. नी दा॑चे सुद्धा कोकण फार लाडके होते..याची साक्ष 'शितू' आणि 'पडघवली' ह्या दोन अप्रतिम काद॑बर्‍या देतात. केळशीस माझी सासूरवाडी आहे व तिथे समुद्रामध्ये सैर करता॑ना 'अ॑जनवेलचा' किल्ला आणि बाजूच्या डो॑गरावरील 'बालेपिराचे' ठिकाण पाहिल्यावर मला पडघवलीची खूप आठवण आली.

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

पिवळा डांबिस गुरुवार, 03/06/2008 - 09:47
जयवंत दळवींचे मूळ गाव आरवली हे बरोबर. ते सावंतवाडीजवळ शिरोड्याला लागून आहे. शिरोडा ही वि. स. खांडेकरांची सुद्धा कर्मभूमी! शिरोड्याच्या हायस्कूलमध्ये ते शिक्षक होते. जयवंत दळवींचे आरवलीत (कोकणीत ' आरलीत') घर होते ते मी पाहिले आहे. गाव जरी गोव्याला लागून नसले तरी गोव्याची हद्द (बांदा) तेथून जवळ आहे. हा सर्व भाग अतिशय निसर्गरम्य आहे. विशेषतः शिरोड्याचा समुद्रकिनारा अतिशय रमणीय आहे. पर्यटकांपासून अस्पर्श (व्हर्जिन) आहे/होता... माझे आजोळ शिरोड्याचे असल्याने आम्ही लहान असतांना सुट्टीत तेथे जात असू. तेंव्हा सायंकाळी तेथे पुळणीवर फिरायला आलेले (तेही सुट्टीवर आले असावेत!) दळवी एकदा आईने दुरून दाखवलेले आठवतात! आता तो भाग बराच 'डेव्हलप' झाला आहे म्हणे! "हाऊ ग्रीन वॉज माय व्हॅली!!!!!":(((

अनिला गुरुवार, 03/06/2008 - 12:37
अएकदा ध्रुतरश्ट्राने च्स्म्याचे दुकान टाकले वगैरे मजकूर वाचला हो ता. तो पूर्ण पाहिजे आअहे कुठे असावा? क्रुपया मदत करा

विसोबा खेचर Tue, 03/04/2008 - 18:29
आपण गिरगावातल्या मॅजेस्टिक बुक डेपोमध्ये चौकशी केलीत का? तिथे तरी नक्की मिळायला हवीत असे वाटते... आपला, (दळवीप्रेमी)

In reply to by विसोबा खेचर

सृष्टीलावण्या Wed, 03/05/2008 - 09:36
प्लाझा चित्रपटगृहाच्या मागे विष्णु निवास इथे दुसरे मॅजेस्टिक बुक डेपो आहे तिथे ५०००-१०००० पुस्तके विषयवार shelf वर ठेवलेली असतात जरा शोधले तर कुठलेही दुर्मिळ पुस्तकसुद्धा सहज मिळते. मात्र दुकानातील मालक व चाकरवर्गास त्रास देऊ नये नाहीतर पुणेरी दुकानातील मराठी बोलीचा अनुभव मिळेल. तसेच तिथे कुठल्याही रु. १००/-च्या पेक्षा जास्त खरेदीवर १०% ते ३०% सवलत मिळते. . . परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

डॉ.प्रसाद दाढे Tue, 03/04/2008 - 19:41
धन्यवाद तात्या, पण मी पुण्यातल्या मॅजेस्टिकमध्ये चौकशी केली होती, कोठावळे कुटु॑बातील एकजण माझे पेश॑टही आहेत, त्या॑नीच मला 'आउट ऑफ प्रि॑ट' असे सा॑गितले होते..आता एकमेव पर्याय म्हणजे दळवी कुटु॑बाशीच स॑पर्क होऊ शकला तरच..

चतुरंग Tue, 03/04/2008 - 20:26
पुणे विद्यापीठाचे जयकर ग्रंथालय कदाचित उपयोगाचे ठरु शकेल. चतुरंग

धोंडोपंत Tue, 03/04/2008 - 20:48
आयडियल बुक कंपनी, दादर (पश्चिम) येथे चौकशी करावी. संपर्क - श्री. मंदारशेठ नेरूरकर ( मालक) दूरध्वनी क्रमांक - २४३०२१२६ आपट्यांकडून आलो आहोत असे सांगावे, कोणत्याही पुस्तकावर १०% सवलत मिळेल. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

मुक्तसुनीत Tue, 03/04/2008 - 23:14
दळवींच्या पुस्तकांच्या निमित्ताने त्यांच्या लिखाणाची आठवण अनेक वर्षांनी आली. नव्वदीच्या दशकाच्या प्रारंभकालापर्यंत दळवी हे मराठीतील एक अत्यंत लोकप्रिय , आघाडीचे लेखक म्हणून प्रसिद्ध होते. एका माणसामधे जणू दोन माणसे वसतीला असावी , तसे , त्यांचे लिखाण सरळसरळ दोन प्रकारांमधे मोडायचे - गंभीर आणि गमतीदार. "ठणठणपाळ" या नावाने साहित्यिकांची यथेच्छ खिल्ली त्यानी जवळजवळ पंचवीस वर्षे उडवली. मध्यमवर्गीय माणासाच्या आयुष्यातील विनोद असे त्यांच्या गमतीच्या लिखाणाचे वर्णन करता येईल. मूळ विनोदी स्वभाव आणि त्यावर चढलेला कोकणी गजालींचा रंग. दळवींचे या विभागातले लिखाण विपुल आहे. वर्षानुवर्षे विविध अंकातून त्यानी ते सातत्याने केले. मात्र दळवीनी जे गंभीर प्रकृतीचे लिखाण केले - विशेषतः कांदबरी या सदरामधे - ते अजोड आहे असे मला वाटते. मनोविकृतींची जी चित्रणे त्यानी केली , ती एकाच वेळी विदारक आहेत आणि कारुण्यपूर्ण सुद्धा. मनोविकाराने ग्रासलेली दुर्दैवी आयुष्ये, त्या माणासांच्या आप्तस्वकीयांची होणारी परवड , निरनिराळ्या लैंगिक विकृती, त्यांच्यातील कुरुपता याची जीवघेणी चित्रणे त्यानी केली आहेत. दळवीनी खूप पाहिले हे खरे. आणि खूप जवळून पाहिले. जे पाहिले ते पहायला धैर्य हवे; बघणार्‍याला त्यामागचे कारुण्य आणि शोकांतिका कळायला हवी आणि ते नेमक्या शब्दात विशद करण्याची ताकद हवी. आज पेंडसे, दळवी यांसारखे मोठे लेखक विस्मृतीप्राय झालेले पाहून व्यथित व्हायला होते.

डॉ.प्रसाद दाढे Wed, 03/05/2008 - 07:56
दळवी॑च्या ठणठणपाळने सत्तर्-ऐ॑शीच्या दशका॑मध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता, आपल्या मालवणी 'वाडकर' स्टाइलमध्ये त्या॑नी साहित्यविश्वातील ढुढ्ढाचार्या॑ची जी रेवडी उडविली त्याला तोड नाही..आजही ते सर्व वाचताना मजा येते. माझ्याकडे दळवी॑ची खालील पुस्तके आहेत परममित्र, सारे प्रवासी घडीचे, निवडक ठणठणपाळ, आणखी ठणठणपाळ, अलाणे-फलाणे, श्री म॑गलमूर्ती आणि क॑पनी, श्रीका॑त, स्वप्नरेखा, महान॑दा सारे प्रवासी' ने तर खूप हसविले आणि शेवटी डोळ्यात पाणीसुद्धा आणले.. पे॑डसे॑च्या 'तु॑बाडचे खोत' ने अ॑गावर काटा आणला होता,अफाट काद॑बरी आहे. मला स्वतःला रथचक्र आणि गार॑बीचा बापू पेक्षा तु॑बाड जास्त आवडली. खुद्द श्री. ना॑ची सुद्धा तु॑बाडच जास्त लाडकी होती (असे त्या॑नीच मला सा॑गितले होते.) दुर्दैवाने माझी आणि दळवी॑ची कधीच भेट होउ शकली नाही पण पे॑डसे मात्र एकदा भेटले पुण्यात त्या॑च्या एका नातलगाच्या लग्नात. मस्त गप्पा मारल्या त्या॑नी, खूप चा॑गले बोलले. दळवी आणि पे॑डसे या॑च्यातील दोन साम्य स्थळे म्हणजे दोघेही मूळ कोकणातले आणि दोघा॑नाही साहित्य स॑मेलनाच्या अध्यक्षपदात रस नव्हता

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

विसोबा खेचर Wed, 03/05/2008 - 08:49
सारे प्रवासी' ने तर खूप हसविले आणि शेवटी डोळ्यात पाणीसुद्धा आणले.. 'सारे प्रवासी...' तर फारच सुंदर पुस्तक आहे. छोटेखानीच, परंतु अतिशय हलकंफुलकं! आपला, भावल्या किलिंडर. पे॑डसे॑च्या 'तु॑बाडचे खोत' ने अ॑गावर काटा आणला होता,अफाट काद॑बरी आहे. मला स्वतःला रथचक्र आणि गार॑बीचा बापू पेक्षा तु॑बाड जास्त आवडली. खुद्द श्री. ना॑ची सुद्धा तु॑बाडच जास्त लाडकी होती (असे त्या॑नीच मला सा॑गितले होते.) सहमत आहे. तुंबाडचे खोत क्लासच कादंबरी आहे, खिळवून ठेवते! पेंडश्यांच्या प्रतिभेला सलाम.. आपला, नरसू खोत. दळवी आणि पे॑डसे या॑च्यातील दोन साम्य स्थळे म्हणजे दोघेही मूळ कोकणातले बाकी कोकणची माणसंच विलक्षण प्रतिभावान असतात! आपला, तात्या देवगडकर.

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

धोंडोपंत Wed, 03/05/2008 - 20:09
दळवी आणि पे॑डसे या॑च्यातील दोन साम्य स्थळे म्हणजे दोघेही मूळ कोकणातले आणि दोघा॑नाही साहित्य स॑मेलनाच्या अध्यक्षपदात रस नव्हता पेंडसे आणि दळवी या दोघांच्या लेखनात कोकण असले तरी शिरूभाऊंच्या लेखनात उत्तर रत्नागिरी जिल्हा आहे आणि दळवी सारस्वत असल्यामुळे कदाचित असेल, त्यांच्या लेखनात गोव्याकडील भाग आहे. ते सगळ तिकडचं. मंगेश, शांतादुर्गा वगैरे . शिरूभाऊ आमच्याकडचे. खेड, दापोली, आंजर्ले , हर्णै, केळशी , मुर्डी, दाभोळ, चिपळूण असा फरक आहे. आपला, (तौलनिक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

विजुभाऊ Wed, 03/05/2008 - 15:25
उपहास कथा माझ्या कडे आहे.... पहातो...वेल मिळाला तर तुम्हाला झेरोक्ष साठी देतो विजुभाऊ ९२२६१०२८१२

डॉ.प्रसाद दाढे Wed, 03/05/2008 - 18:14
विजुभाऊ, लाख लाख धन्यवाद! मी गेली आठ वर्षे ते पुस्तक शोधत आहे पण मिळत नव्हते. हताश झालो होतो..मिसळ-पावमुळे तुमची भेट झाली आणि 'दिल कि आरजू' पूर्ण झाली..मिसळ-पाव मला 'पावले.' लवकरच भेटू

डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 03/06/2008 - 08:38
दळवी या॑चे मूळ गाव 'आरवली' मला वाटते गोव्याला लागूनच आहे आणि पे॑डसे या॑चे गाव साखरपे॑डी (मुरूड-हर्णै) त्यामुळे को॑कणातलेच दोन वेगळे र॑ग वाचका॑ना अनुभवा॑स येतात. गो. नी दा॑चे सुद्धा कोकण फार लाडके होते..याची साक्ष 'शितू' आणि 'पडघवली' ह्या दोन अप्रतिम काद॑बर्‍या देतात. केळशीस माझी सासूरवाडी आहे व तिथे समुद्रामध्ये सैर करता॑ना 'अ॑जनवेलचा' किल्ला आणि बाजूच्या डो॑गरावरील 'बालेपिराचे' ठिकाण पाहिल्यावर मला पडघवलीची खूप आठवण आली.

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

पिवळा डांबिस गुरुवार, 03/06/2008 - 09:47
जयवंत दळवींचे मूळ गाव आरवली हे बरोबर. ते सावंतवाडीजवळ शिरोड्याला लागून आहे. शिरोडा ही वि. स. खांडेकरांची सुद्धा कर्मभूमी! शिरोड्याच्या हायस्कूलमध्ये ते शिक्षक होते. जयवंत दळवींचे आरवलीत (कोकणीत ' आरलीत') घर होते ते मी पाहिले आहे. गाव जरी गोव्याला लागून नसले तरी गोव्याची हद्द (बांदा) तेथून जवळ आहे. हा सर्व भाग अतिशय निसर्गरम्य आहे. विशेषतः शिरोड्याचा समुद्रकिनारा अतिशय रमणीय आहे. पर्यटकांपासून अस्पर्श (व्हर्जिन) आहे/होता... माझे आजोळ शिरोड्याचे असल्याने आम्ही लहान असतांना सुट्टीत तेथे जात असू. तेंव्हा सायंकाळी तेथे पुळणीवर फिरायला आलेले (तेही सुट्टीवर आले असावेत!) दळवी एकदा आईने दुरून दाखवलेले आठवतात! आता तो भाग बराच 'डेव्हलप' झाला आहे म्हणे! "हाऊ ग्रीन वॉज माय व्हॅली!!!!!":(((

अनिला गुरुवार, 03/06/2008 - 12:37
अएकदा ध्रुतरश्ट्राने च्स्म्याचे दुकान टाकले वगैरे मजकूर वाचला हो ता. तो पूर्ण पाहिजे आअहे कुठे असावा? क्रुपया मदत करा
जयव॑त दळवी या॑ची खालील पुस्तके मी शोधत आहे १) उपहास कथा २) कशासाठी पोटासाठी वरील दोन्ही पुस्तका॑तील कथा तुफान विनोदी आहेत; पूर्वी माझ्याकडे होती ही पुस्तके पण फाटून नष्ट झाली. दुकाना॑त चौकशी केली असता 'आउट ऑफ प्रि॑ट' असे खेदजनक उत्तर मिळाले. इतक्या चा॑गल्या पुस्तका॑ची पुनर्मुद्रणे का होऊ नयेत? कोणाजवळ ही पुस्तके असतील तर कृपया मला झेरॉक्स द्यावी ..

आळस, कंटाळा व फिरंग्याची भेट !!!!

छोटा डॉन ·

सृष्टीलावण्या Mon, 03/03/2008 - 16:19
एकच गोष्ट डोळ्यासमोर येते.... आम्ही मॅक्सम्युलरमधून परतताना जंहागिरच्या आसपास बरेच परदेशी विशेषत: युरोपीयन्स भटकताना दिसायचे... तेव्हा माझी एक मैत्रिण (जिचा चेहरा लाघवी होता ती ) त्यांच्याकडे पाहून जोरात ओरडायची, "गोरेगोमटे". जे ऐकून रस्त्यातील सगळी हसायची पण फिरंग्यांना कळायचेच नाही लोक का हसतात. बरे तिच्यावर रागवावे तर तिचा चेहरा इतका निरागस दिसायचा की त्यांना काय बोलावे तेच कळायचे नाही. . . परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

वरदा Mon, 03/03/2008 - 21:26
कुणीतरी आहे माझ्यासारखं....मि.पा. वरच्या एकूणएक लेखांना प्रतिसाद द्या...जमेल तिथे आपली मते मांडण्यासाठी मोठा प्रतिसाद दिलात की जास्त वेळ जाईल...बाहेर जेवायला जा.. कितीही काम दिसलं तरी परवा साठी ठेवून द्या...सगळं काय एकदम करायचं?..सही आहे हो खरंच व्ही. पी आले होते एक प्रेझेंटेशन द्यायला मधे, आम्ही मजा केली...पिझा पार्टी आणि चीझकेक एन्जॉय केला.. तेव्हा करा टाईमपास.....

लेले Mon, 03/03/2008 - 23:28
चा॑गलय राव तुम्हा इ॑जिनिअर लोका॑च असा टाईम्-पास करायला मिसळ पाव वर तरी येता येत. पण आमचि 'LIFE' मधे हे काहि जमत नाहि. कारण जाऊन पड्लोय त्या M.B.B.S.ला साला असला फावला वेळच मिळत नाहि. त्यामुळे ज्या लोका॑ना असा वेळ आहे त्या॑नी फुल्ल एन्जोय करुन घ्या राव...............

सुधीर कांदळकर Tue, 03/04/2008 - 13:43
दुकान असे पाहायचे की दुकानावरचा मालक खडूस असला पाहिजे. तर बाहेरून अंदाज बांधायचा की याच्याकडे काय मिळत नाही. ती वस्तु आहे की नाही ते विचारायचे. नसेल तर उत्तम. असल्यास दुसरी नसलेली गोष्ट. उदा. 'लव्हेंडर ड्यू' किंवा 'ऍरामस्क' साबण. बहुतेक दुकानात नसतो. आणखी पंधरा जण त्याच्या दुकानात ती वस्तु मागायला पाठवायचे. परत फिरतांना आपल्या मातृभाषेत दुकानाला 'काय फालतू दुकान आहे अशी खडुस्ला ऐकू जाईल अशी दूषणे द्यायची. मग त्या मालकाचे थोबाड पाहायचे. एकदा करून पाहा. उत्कृष्ट टाईम पास. रस्त्याने टकल्या माणूस चालतांना दिसला तर ए टकल्या म्हणून आरोळी ठोकावी आणी सभ्य चेहरा करून (तो आहेच) खाली पाहून पदपथ बदलावा. हे खास सृष्टिलावण्य ताईंसाठी. मी आज दांडी मारून घरी बसून मॅच पाहातोय हे सूज्ञांच्या लक्षात आले असेलच.

In reply to by सुधीर कांदळकर

चतुरंग Tue, 03/04/2008 - 20:57
रस्त्याने टकल्या माणूस चालतांना दिसला तर ए टकल्या म्हणून आरोळी ठोकावी आणी सभ्य चेहरा करून (तो आहेच) खाली पाहून पदपथ बदलावा. हे मात्र जड जाऊ शकते हं. फर्ग्युसन मधल्या कार्ट्यांचा एक किस्सा सांगतो - रुपालीच्या बाहेर कार्टी टवाळक्या करत थांबलेली. एक काळाकुळकुळीत माणूस रस्त्याने निघालेला. एक कार्टं दुसर्‍याला "ए तू माझ्या मागे फटफटीवर बैस त्या काळ्याशेजारुन जाताना तू मोठ्यांदा 'ए ~~ काळ्या' असं ओरडायचं!" दुसरा बरं म्हणून त्याच्या मागं बसला आणि ठरवल्याप्रमाणे केलं. थोडं पुढं जाऊन ह्यानं फटफटी उभी केलीन की - दुसर्‍याची जाम तंतरली, तो जोरजोरात "ए, अरे हे काय, चल चल अरे लवकर चल तो आला!!" हा ढिम्म हलायला तयार नाही?!?!?! शेवटी तो गाडीवरुन उतरून पसार झाला आणि इकडे बघणारे हसून हसून खल्लास!!! चतुरंग

सृष्टीलावण्या Tue, 03/04/2008 - 21:08
माझी दुसरी एक मैत्रिण तर त्याहून भारी होती. रस्ताने जाताना कोणी मध्यमवर्गीय काकू दिसल्या की बोलायला थांबायची आणि अगदी सलगीने काय, कश्या आहात? सध्या काय चाललयं? हल्ली दिसत नाही इ. इ. बोलायची. त्यांचा प्रश्नांकित चेहरा पाहून आपण गाडीत भेटलो नव्हतो का असे लाघवीपणे म्हणायची. आता मुंबईत आगगाडीत कोणीही कोणाला भेटते आणि चेहरे थोडीच लक्षात राहतात.. वर जाताना २-३ वेळा वळून वळून टाटा करायची. त्या बिचार्‍या काकू बुचकळ्यात. . . . परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

शैलेन्द्र Mon, 03/10/2008 - 16:33
अजुन एक, समोरून येनार्य्याच्या पायाकदे लाम्बुन बघत यायच, आनि तो जवल आल कि म्हनयच, चप्पल ऊलति आहे ना?

सृष्टीलावण्या Mon, 03/03/2008 - 16:19
एकच गोष्ट डोळ्यासमोर येते.... आम्ही मॅक्सम्युलरमधून परतताना जंहागिरच्या आसपास बरेच परदेशी विशेषत: युरोपीयन्स भटकताना दिसायचे... तेव्हा माझी एक मैत्रिण (जिचा चेहरा लाघवी होता ती ) त्यांच्याकडे पाहून जोरात ओरडायची, "गोरेगोमटे". जे ऐकून रस्त्यातील सगळी हसायची पण फिरंग्यांना कळायचेच नाही लोक का हसतात. बरे तिच्यावर रागवावे तर तिचा चेहरा इतका निरागस दिसायचा की त्यांना काय बोलावे तेच कळायचे नाही. . . परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

वरदा Mon, 03/03/2008 - 21:26
कुणीतरी आहे माझ्यासारखं....मि.पा. वरच्या एकूणएक लेखांना प्रतिसाद द्या...जमेल तिथे आपली मते मांडण्यासाठी मोठा प्रतिसाद दिलात की जास्त वेळ जाईल...बाहेर जेवायला जा.. कितीही काम दिसलं तरी परवा साठी ठेवून द्या...सगळं काय एकदम करायचं?..सही आहे हो खरंच व्ही. पी आले होते एक प्रेझेंटेशन द्यायला मधे, आम्ही मजा केली...पिझा पार्टी आणि चीझकेक एन्जॉय केला.. तेव्हा करा टाईमपास.....

लेले Mon, 03/03/2008 - 23:28
चा॑गलय राव तुम्हा इ॑जिनिअर लोका॑च असा टाईम्-पास करायला मिसळ पाव वर तरी येता येत. पण आमचि 'LIFE' मधे हे काहि जमत नाहि. कारण जाऊन पड्लोय त्या M.B.B.S.ला साला असला फावला वेळच मिळत नाहि. त्यामुळे ज्या लोका॑ना असा वेळ आहे त्या॑नी फुल्ल एन्जोय करुन घ्या राव...............

सुधीर कांदळकर Tue, 03/04/2008 - 13:43
दुकान असे पाहायचे की दुकानावरचा मालक खडूस असला पाहिजे. तर बाहेरून अंदाज बांधायचा की याच्याकडे काय मिळत नाही. ती वस्तु आहे की नाही ते विचारायचे. नसेल तर उत्तम. असल्यास दुसरी नसलेली गोष्ट. उदा. 'लव्हेंडर ड्यू' किंवा 'ऍरामस्क' साबण. बहुतेक दुकानात नसतो. आणखी पंधरा जण त्याच्या दुकानात ती वस्तु मागायला पाठवायचे. परत फिरतांना आपल्या मातृभाषेत दुकानाला 'काय फालतू दुकान आहे अशी खडुस्ला ऐकू जाईल अशी दूषणे द्यायची. मग त्या मालकाचे थोबाड पाहायचे. एकदा करून पाहा. उत्कृष्ट टाईम पास. रस्त्याने टकल्या माणूस चालतांना दिसला तर ए टकल्या म्हणून आरोळी ठोकावी आणी सभ्य चेहरा करून (तो आहेच) खाली पाहून पदपथ बदलावा. हे खास सृष्टिलावण्य ताईंसाठी. मी आज दांडी मारून घरी बसून मॅच पाहातोय हे सूज्ञांच्या लक्षात आले असेलच.

In reply to by सुधीर कांदळकर

चतुरंग Tue, 03/04/2008 - 20:57
रस्त्याने टकल्या माणूस चालतांना दिसला तर ए टकल्या म्हणून आरोळी ठोकावी आणी सभ्य चेहरा करून (तो आहेच) खाली पाहून पदपथ बदलावा. हे मात्र जड जाऊ शकते हं. फर्ग्युसन मधल्या कार्ट्यांचा एक किस्सा सांगतो - रुपालीच्या बाहेर कार्टी टवाळक्या करत थांबलेली. एक काळाकुळकुळीत माणूस रस्त्याने निघालेला. एक कार्टं दुसर्‍याला "ए तू माझ्या मागे फटफटीवर बैस त्या काळ्याशेजारुन जाताना तू मोठ्यांदा 'ए ~~ काळ्या' असं ओरडायचं!" दुसरा बरं म्हणून त्याच्या मागं बसला आणि ठरवल्याप्रमाणे केलं. थोडं पुढं जाऊन ह्यानं फटफटी उभी केलीन की - दुसर्‍याची जाम तंतरली, तो जोरजोरात "ए, अरे हे काय, चल चल अरे लवकर चल तो आला!!" हा ढिम्म हलायला तयार नाही?!?!?! शेवटी तो गाडीवरुन उतरून पसार झाला आणि इकडे बघणारे हसून हसून खल्लास!!! चतुरंग

सृष्टीलावण्या Tue, 03/04/2008 - 21:08
माझी दुसरी एक मैत्रिण तर त्याहून भारी होती. रस्ताने जाताना कोणी मध्यमवर्गीय काकू दिसल्या की बोलायला थांबायची आणि अगदी सलगीने काय, कश्या आहात? सध्या काय चाललयं? हल्ली दिसत नाही इ. इ. बोलायची. त्यांचा प्रश्नांकित चेहरा पाहून आपण गाडीत भेटलो नव्हतो का असे लाघवीपणे म्हणायची. आता मुंबईत आगगाडीत कोणीही कोणाला भेटते आणि चेहरे थोडीच लक्षात राहतात.. वर जाताना २-३ वेळा वळून वळून टाटा करायची. त्या बिचार्‍या काकू बुचकळ्यात. . . . परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

शैलेन्द्र Mon, 03/10/2008 - 16:33
अजुन एक, समोरून येनार्य्याच्या पायाकदे लाम्बुन बघत यायच, आनि तो जवल आल कि म्हनयच, चप्पल ऊलति आहे ना?
[ खालील रटाळ व निरर्थक लेख वाचून कुणाला कंटाल व आळस आल्यास त्याची जबाबदारी लेखकावर राहणार नाही. आपापल्या रिस्क वर वाचन करा अथवा सोडून द्या, कसे !!!]
आज एकदम काहितरी वेगळेच वाटत आहे, खूप कंटाळा आला आहे. काहिच करण्याची इच्छा होत नाहीये [ तसे नहितरी आम्ही दररोज काही तीर मारीत नाही, तरिपण ...]. मला वाटतं या सगळ्याचे कारण सोमवार असावं . पण सोमवारच का ?

बन्स रोड की निलोफर

व्यंकट ·

विसोबा खेचर Mon, 03/03/2008 - 11:24
वा व्यंकटराव! आज प्रथमच तुमची लेखनशैली अनुभवली. खूप साधी सोपी आणि प्रवाही वाटली! निलोफरच्या गोष्टीची आपण फार नेटकी, मोजक्या शब्दात आणि कुठेही पाल्हाळ न लावता ओळख करून दिली आहे... सध्या जरा कामाच्या गडबडीत आहे, सवडीने आपण दिलेल्या दुव्यावर जाऊन चित्रफिती पाहीन. थोडीशी झलक मात्र पाहिली! छान आहे... अवांतर - बाकी तुम्ही काही म्हणा व्यंकटशेठ, साला मुसुलमानी सौंदर्याची नशा काही औरच! फार सुरेख दिसतात या मुसुलमानी बायका! खानदानी सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण करणार्‍या, गोर्‍यापान, नाकीडोळी अतिशय आखीवरेखीव आणि सगळं अगदी जिथल्या तिथे प्रमाणबद्ध आकारात आणि मापात असलेल्या! छ्या....! :) तुमची निलोफरपण बाकी खासच दिसत्ये हो! कोण अभिनेत्री आहे कुणास ठाऊक पण साला काय सुरेख आणि बोलके डोळे आहेत त्या बयेचे! छ्या! आपण तर साला बसल्या खुर्चीत खल्लास...! आपला, (मुसुलमानी बिर्याणीचा, अत्तराचा, आणि सौंदर्याचा पागल) तात्या हामिद! :)

In reply to by विसोबा खेचर

व्यंकट Mon, 03/03/2008 - 18:46
धन्यवाद तात्या. मला पण निलोफरच नाव माहिती नाही. बाकी तुम्ही जे वर्णन केलं आहे, त्यास माझे अनुमोदन. ;)

सृष्टीलावण्या Mon, 03/03/2008 - 15:56
खुप उत्सुकता असते. १५-२० वर्षापूर्वी एक प्रवासवर्णन वाचले होते त्यातील एक प्रसंग आठवला... लेखक एकदा पाकिस्थानला गेला होता... तिकिट काढण्यासाठी बारीतून हात आत घातला पैसे देण्यासाठी.. तर तिथल्या विक्रेत्याने पटकन म्हटले.. तुमचे घड्याळ छान आहे, तुम्ही भारतीय किती भाग्यवान आहात. घड्याळे तयार करण्याची तुमची स्वत:ची एचएमटी कंपनी आहे.. आमच्या पाकिस्तानात सर्वच अमेरिकेतून येते.. खिळ्यापासून रणगाड्यापर्यंत. मला एकदा यायचंय हिंदुस्तानात (व्हिसा न मिळण्यामुळे जे त्यावेळी अशक्यप्राय समजले जायचे). > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर Mon, 03/03/2008 - 17:37
सृष्टीलावण्या, आपल्या प्रतिसादातील घड्याळाचा किस्सा छानच आहे, परंतु संबंधित विषयानुरूपही (म्हणजे निलोफरचे कथानक, चित्रफिती इत्यादी) आपण काही प्रतिसादपर लिहिले असतेत तर आपल्या प्रतिसादातील असंबद्धता तेवढी जाणवली नसती असे वाटते...! असो... आपला, (सुसंगत!) तात्या.

प्राजु Mon, 03/03/2008 - 23:51
व्हीडीओ दिसत नहिये त्या दुव्यावर. काय करावे? बाकी फोटोमध्ये ही निलोफर खूप छान दिसते आहे. दुव्यावर नाटक पहाता आले तर ते पाहून नंतर प्रतिसाद देइन. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by व्यंकट

व्यंकट Tue, 03/04/2008 - 00:14
दिसेनासा झालेला आहे. पण झी शेअर वर पहाता येतोय अजूनही http://www.apnicommunity.com/pak-tv-pakistani-tv-drama-serials-shows/34144-bans-road-ki-nilofar-ary-tv-drama.html

चित्तरंजन भट Tue, 03/04/2008 - 14:54
व्यंकटराव, 'बन्स रोड की नीलोफ़र' बद्दल इथे ओघवत्या शैलीत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. वाचून बघायलाच हवी ही नीलोफ़र असे वाटले. सवडीने विडियो बघेन म्हणतो. बाकी मी 'तात्या हामिद' ह्यांच्या 'मुसुलमानी' (हा शब्द फारच आवडला. उच्चारताना फार मजा येते आहे.) प्रतिसादाशी सहमत आहेच.

व्यंकटराव,
बन्स रोड की नीलोफर,नाटकाचे कथानक आपल्या सहज शैलीत वाचायले मिळाले आपले अभिनंदन,  बाकी नीलोफर दिसायला खासच हं !!! :)
!!!

विसोबा खेचर Mon, 03/03/2008 - 11:24
वा व्यंकटराव! आज प्रथमच तुमची लेखनशैली अनुभवली. खूप साधी सोपी आणि प्रवाही वाटली! निलोफरच्या गोष्टीची आपण फार नेटकी, मोजक्या शब्दात आणि कुठेही पाल्हाळ न लावता ओळख करून दिली आहे... सध्या जरा कामाच्या गडबडीत आहे, सवडीने आपण दिलेल्या दुव्यावर जाऊन चित्रफिती पाहीन. थोडीशी झलक मात्र पाहिली! छान आहे... अवांतर - बाकी तुम्ही काही म्हणा व्यंकटशेठ, साला मुसुलमानी सौंदर्याची नशा काही औरच! फार सुरेख दिसतात या मुसुलमानी बायका! खानदानी सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण करणार्‍या, गोर्‍यापान, नाकीडोळी अतिशय आखीवरेखीव आणि सगळं अगदी जिथल्या तिथे प्रमाणबद्ध आकारात आणि मापात असलेल्या! छ्या....! :) तुमची निलोफरपण बाकी खासच दिसत्ये हो! कोण अभिनेत्री आहे कुणास ठाऊक पण साला काय सुरेख आणि बोलके डोळे आहेत त्या बयेचे! छ्या! आपण तर साला बसल्या खुर्चीत खल्लास...! आपला, (मुसुलमानी बिर्याणीचा, अत्तराचा, आणि सौंदर्याचा पागल) तात्या हामिद! :)

In reply to by विसोबा खेचर

व्यंकट Mon, 03/03/2008 - 18:46
धन्यवाद तात्या. मला पण निलोफरच नाव माहिती नाही. बाकी तुम्ही जे वर्णन केलं आहे, त्यास माझे अनुमोदन. ;)

सृष्टीलावण्या Mon, 03/03/2008 - 15:56
खुप उत्सुकता असते. १५-२० वर्षापूर्वी एक प्रवासवर्णन वाचले होते त्यातील एक प्रसंग आठवला... लेखक एकदा पाकिस्थानला गेला होता... तिकिट काढण्यासाठी बारीतून हात आत घातला पैसे देण्यासाठी.. तर तिथल्या विक्रेत्याने पटकन म्हटले.. तुमचे घड्याळ छान आहे, तुम्ही भारतीय किती भाग्यवान आहात. घड्याळे तयार करण्याची तुमची स्वत:ची एचएमटी कंपनी आहे.. आमच्या पाकिस्तानात सर्वच अमेरिकेतून येते.. खिळ्यापासून रणगाड्यापर्यंत. मला एकदा यायचंय हिंदुस्तानात (व्हिसा न मिळण्यामुळे जे त्यावेळी अशक्यप्राय समजले जायचे). > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर Mon, 03/03/2008 - 17:37
सृष्टीलावण्या, आपल्या प्रतिसादातील घड्याळाचा किस्सा छानच आहे, परंतु संबंधित विषयानुरूपही (म्हणजे निलोफरचे कथानक, चित्रफिती इत्यादी) आपण काही प्रतिसादपर लिहिले असतेत तर आपल्या प्रतिसादातील असंबद्धता तेवढी जाणवली नसती असे वाटते...! असो... आपला, (सुसंगत!) तात्या.

प्राजु Mon, 03/03/2008 - 23:51
व्हीडीओ दिसत नहिये त्या दुव्यावर. काय करावे? बाकी फोटोमध्ये ही निलोफर खूप छान दिसते आहे. दुव्यावर नाटक पहाता आले तर ते पाहून नंतर प्रतिसाद देइन. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by व्यंकट

व्यंकट Tue, 03/04/2008 - 00:14
दिसेनासा झालेला आहे. पण झी शेअर वर पहाता येतोय अजूनही http://www.apnicommunity.com/pak-tv-pakistani-tv-drama-serials-shows/34144-bans-road-ki-nilofar-ary-tv-drama.html

चित्तरंजन भट Tue, 03/04/2008 - 14:54
व्यंकटराव, 'बन्स रोड की नीलोफ़र' बद्दल इथे ओघवत्या शैलीत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. वाचून बघायलाच हवी ही नीलोफ़र असे वाटले. सवडीने विडियो बघेन म्हणतो. बाकी मी 'तात्या हामिद' ह्यांच्या 'मुसुलमानी' (हा शब्द फारच आवडला. उच्चारताना फार मजा येते आहे.) प्रतिसादाशी सहमत आहेच.

व्यंकटराव,
बन्स रोड की नीलोफर,नाटकाचे कथानक आपल्या सहज शैलीत वाचायले मिळाले आपले अभिनंदन,  बाकी नीलोफर दिसायला खासच हं !!! :)
!!!

भारतातील छोट्या पडद्यावरील "के-सिरियल्स" जेव्हा पाकिस्थानात पोचल्या, लोकप्रिय झाल्या नव्हे त्यांनी भारतीयांइतकंच पाकिस्थान्यांना वेड लावलं. त्याबरोबर तेथे सांस्कृतीक आक्रमणाची ओरड सुरू झाली. पाठोपाठ तेथील प्रसार माध्यमांतून झालेल्या चर्चा, विचारमंथनानंतर; 'बन्स रोड की निलोफर' ह्या धारावाहीकाला जन्म देण्याचे लेखक / पटकथा लेखक फसीह बारी खान आणि दिग्दर्शक एस्.