मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नशा - एक चिंतन!

पिवळा डांबिस ·

भडकमकर मास्तर Mon, 03/03/2008 - 01:53
१. अतिनशेचेच दुष्परिणाम होतात्...माफक प्रमाणात योग्य जागी काय हरकत? .... ई.ई. मुद्दे पटले... दारू पिऊन वाहन चालवणे अत्यंत घातक....( न पिणारा चालक अथवा मित्र चालक म्हणून बरोबर ठेवण्याचे नशीब सर्वांकडे नसते...तरी हे प्रयत्नपूर्वक पाळले पाहिजे)....... .......... २. लोकल ऍनेस्थेशियाची तुलना नशेशी करणे , ( तुमचे एपिड्यूरल चे उदाहरण ) याला असहमत.... जनरल ऍनेस्थेशियाची तुलना एक वेळ ठीक आहे..... ३. हे सेवन त्यांच्या परमेश्वरप्राप्तीच्या आड येऊ शकले नाही. कदाचित मदतच केली असेल... (ह. घ्या) ४. मात्र ही अवस्था एखाद्या बाह्य पदार्थाच्या सेवनानेच प्राप्त होऊ शकते. .... अर्धवट असहमती....मी फार तज्ञ नाही यातला पण माझा स्वतःचा अनुभव आहे की एखाद्या उत्तम इन्स्ट्रक्टरने मार्गदर्शन करत केलेले रिलॅक्सेशन तंत्र / शवासन आणि उत्तम दर्जाची दारू पिऊन आलेली नशा यामध्ये मेंदूची असणारी शांत, शिथील आणि उत्साही अवस्था यात मला तरी साम्य वाटले होते..... उत्तम ध्यानधारणा करू शकणारे लोक मनशक्तीने त्या मेंदूच्या अवस्थेपर्यंत पोचू शकत असावेत..... ....स्वतः डॉक्टर असणार्‍या एका हिप्नॉटिजम इन्स्ट्रक्टरने मला सांगितल्याचे स्मरते की त्याचे काही विद्यार्थी डेंटिस्ट कडे दात काढण्यासाठी लोकल ऍनेस्थेशियाचे इंजेक्षन घेत नाहीत, स्वसंमोहनाच्या सरावाने त्यांना हे जमते....त्या काळात ही गोष्ट आम्ही अविश्वसनीय / फेकाफेकी या सदरात टाकली होती...( आम्ही स्वतः दाताचे डॉक्टर आहोत, एकदा प्रात्यक्षिक पाहिले आणि विश्वास बसला, अर्थात हे रूटीनली सार्‍यांना शक्य नाही हे ही खरेच)__________________________

In reply to by भडकमकर मास्तर

चतुरंग Tue, 03/04/2008 - 02:21
पुण्यात नारायणपेठेत पत्र्या मारुतीजवळ वैद्य शेंडेशास्त्रींचा दवाखाना आहे. रुग्णाला एका विशिष्ठ आसनात बसवून (शवासन नाही) ते दुखणारी दाढसुध्दा अनस्थेशिया न देता काढतात. मध्यंतरी पुणे विद्यापीठात झालेल्या जागतिक आयुर्वेद परिषदेत त्यांनी ह्याचे प्रात्यक्षिक दाखविले होते असे कळते. तेव्हा शिथिल अवस्था ही फक्त मादक पदार्थांच्या सेवनाने येते असे नाही तर योगातल्या काही प्रकारच्या आसनांनीही येते. चतुरंग

In reply to by चतुरंग

भडकमकर मास्तर Wed, 03/05/2008 - 00:42
अजून तिथे कोणी प्रॆक्टिस करतात काय? मी त्याबद्दल ऐकले आहे, की एक विशिष्ट नस दाबून वगैरे लोकल आनेस्थेशिया (सारखे कही तरी !) देतात किंवा घडवतात असे म्हटले पाहिजे...माझ्या काही पेशंट कडून ऐकली होती गोष्ट... ...ते इथले दाढे डॊक्टर कुठे गेले? त्यांना अधिक डीटेल्स ठाउक असणार..असो हे जरा विषयांतर होतेय...

व्यंकट Mon, 03/03/2008 - 03:58
सारांश काय की नशेत चांगले किंवा वाईट असे काही नाही, ती एक अवस्था आहे. मात्र ही अवस्था एखाद्या बाह्य पदार्थाच्या सेवनानेच प्राप्त होऊ शकते. मानवी शरीर आपल्याआपण ही अवस्था प्राप्त करून घेऊ शकत नाही. जीवनातील इतर सर्व गोष्टीप्रमाणेच तिचा अतिरेक वाईट असला तरी तिच्या माफक अंगिकारामध्ये काहीही गैर, असंस्कृत वा अपायकारक नाही. अधोरेखीत सांराशांशी असहमत. दारू प्या काही वाईट नाही असा थोडा सुर वाटतो आहे त्यामुळे लेख जरा एकीकडे झुकला आहे. इतर चिंतन ठीक वाटले.

सर्किट Mon, 03/03/2008 - 07:03
आमचे दक्षिणेतले शेजारी पिवळे डांबिसराव ह्यांच्या लेखाला प्रतिसाद देण्याची संधी आम्हाला मिळते आहे, ह्याबद्दल आम्ही मिसळपावाशी कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. (हल्ली तशी फ्याशन आहे, म्हणे.) नशा हा विषय आमच्या आवडीचा आहे. मिसळपावावर लिहिण्याची देखील नशा काही व्यक्तींना आहे असे समजते. ही नशा सर्वात घातक ! ह्यापेक्षा दारू प्या असा सल्ला आम्ही देऊ इच्छितो ! (आम्हीही एकेकाळी विविध संकेतस्थळांवर वावरत होतो. तेथे आपण लिहिणे आणि कुणी वाचले आहे की नाही ते सतत पाहत राहणे ही नशा जबर्दस्त आहे. इतर नशांशीही आम्ही परिचित आहोत, त्यापेक्षाही ही लिहिण्याची नशा अधिक जोमाची आहे. त्यापासून सावध असावे. त्यापेक्षा मस्त दारू प्यावी. ती नशा कमी ठरते.) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सृष्टीलावण्या Sun, 03/16/2008 - 08:44
@मिसळपावावर लिहिण्याची देखील नशा काही व्यक्तींना आहे असे समजते. ही नशा सर्वात घातक ! ह्यापेक्षा दारू प्या असा सल्ला आम्ही देऊ इच्छितो ! आज सहज मधुमतिचे गाणे आठवले त्यात जॉनी लिव्हर म्हणतो : किसी को सुट, बुट, कोट का नशा है, किसी को हरे हरे नोट का नशा है, हम जो थोडी सी पी के जरा झुमे, हाय रे सबने देखा, जंगल मे मोर नाचा किसी ने ना देखा, हम जो थोडी सी पी के जरा झुमे, हाय रे सबने देखा... पण ही जी थोडी सी आहे ती कधी जास्त होते सांगता येत नाही. एकच प्याला चे अनेक प्याले होतात. दारुचे व्यसन लागलेल्या अनेक कलाकारांचेच पहा ना, एकेकाळी कोट्यधीश असलेली ही मंडळी मरताना विपन्नावस्थेत, गलितगात्र होऊन, एकाकी (पैशासाठी जमलेली भुते नाहीशी झालेली असतात) मरतात. मी तर म्हणेन, माणसाने दारु पिणे वाईट नाही पण दारुने माणसाला पिणे नक्कीच वाईट. कळावें, केवळ बाटलीबंद खनिज पाण्याने (Mineral Water ने) सुद्धा तोल जाऊ शकणारी, सृष्टीलावण्या. > > सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर Sun, 03/16/2008 - 10:49
मी तर म्हणेन, माणसाने दारु पिणे वाईट नाही पण दारुने माणसाला पिणे नक्कीच वाईट. अगदी सहमत आहे! आपला, (दारूला पिणारा!) तात्या. -- When I read about the evils of drinking, I gave up reading! :)

In reply to by सृष्टीलावण्या

सृष्टीलावण्या Sun, 03/16/2008 - 11:18
चू.भु.द्या.घ्या. वरच्या गाण्यातील अभिनेता जॉनी लिव्हर नसून जॉनी वॉकर आहे ज्याने आयुष्यात कधी ही दारुच्या थेंबाला ही स्पर्श केला नाही मात्र तो बेवड्या असण्याचा अभिनय हुबेहुब करायचा. त्याच्या अभिनयकौशल्याला मुजरा. > > सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

बेसनलाडू Mon, 03/03/2008 - 08:25
विवेचन, दृष्टिकोन आणि माहिती आवडली. (वाचक)बेसनलाडू अती सर्वत्र वर्जयेत हा नियम मादक पदार्थांनाच नव्हे तर सगळ्याच पदार्थांना लागू पडतो आणि विशेषतः 'नशा'बाज, काही विशिष्ट संकेतस्थळांवरील विशिष्ट प्रकारच्या आंतरजालीय लेखनालाही? ;) (सूचक)बेसनलाडू

विसोबा खेचर Mon, 03/03/2008 - 08:36
डांबिसा, अतिशय सुंदर लेख! मनापासून आवडला.... मी तर म्हणेन की एक वेळ दारुची नशा परवडली परंतु अध्यात्माची नशा तर फारच भयंकर! आम्ही असे काही आध्यात्मिक नशाबाज पाहिले आहेत! असो... तात्या.

धमाल मुलगा Mon, 03/03/2008 - 12:02
वा डा॑बिसकाका, आम्हा सर्व मे॑दूच्या शैथिल्याचा आन॑द घेणार्‍या आणि स॑भाविता॑कडून नशेबाज म्हणून हिणवले जाणार्‍या॑चे मसिहा आहात आपण ! प्रणाम ! ह्या विषयावर कि॑बहुना ह्या विषयाच्या बाजूने मत॑ मा॑डणारा हा एकमेव लेख असावा (निदान भारतीय). एरवी सगळे नशेच्या नावान॑ बोट॑ मोडायला सर्वात पुढे ! आपली मत॑ त॑तोत॑त पटली. बाकी तात्याबा, मी तर म्हणेन की एक वेळ दारुची नशा परवडली परंतु अध्यात्माची नशा तर फारच भयंकर! सहमत, ह्याबरोबर मी म्हणेन, "स्टेजवरच्या पडद्याच्या सळसळीची, तिथल्या धूपाच्या वासाची, होणार्‍या तिन्ही घ॑टा॑ची आणि टाळ्या॑च्या कडकडाटाची नशा तर जीवघेणीच! "

विजुभाऊ Mon, 03/03/2008 - 12:51
अध्यात्माची नशा तर फारच भयंकर! १००टक्के खरे....आणि या नशे चे स्वरूप सध्या फारच सोज्वळ आहे असे दाखवतात. शुद्ध मराठीत सांगायचे तर "मी नाही त्यातली अन कडी लाव आतली" असे आहे..बाकी नशा निदान "बदनाम" तरी आहेत त्या व्यक्तिगत आहेत......अध्यात्माची नशा हा एक सार्वत्रीक रोग आहे.... सगळे टी व्ही चॅनेल रोज सकाळी याचा रतीब घालत असतात.

एक Tue, 03/04/2008 - 00:07
डांबीस, मी असं वाचल्याचं आठवत आहे कि नशेसाठी काही लोक खाली दिलेले मार्गपण वापरतात. त्यात कितपत तथ्य आहे? १. आयोडेक्स सँडविच. २. पाल मारून, जाळून त्याचा धूर ओढ्णे. ३. कमी विषारी नागाकडून जिभेला चावून घेणे (धामण?) हे जर खरं असेल तर या प्रकारातून नशा का येते?

प्राजु Tue, 03/04/2008 - 00:44
लेख आवडला. प्रत्येकाला कसलीतरि नशा असतेच. पण अती सर्वत्र वर्जयेत हा नियम मादक पदार्थांनाच नव्हे तर सगळ्याच पदार्थांना लागू पडतो.. हे महत्वाचे. आईने पुरणपोळीत घातलेल्या जायफळामुळे परिक्षेच्या काळात अभ्यास करताना झोप आलेली आठवते.. - (सर्वव्यापी)प्राजु

चतुरंग Tue, 03/04/2008 - 04:13
काही मुद्द्यांबाबत असहमत - >>>जेंव्हा मेंदू व इतर मज्जासंस्था शिथील अवस्थेत असते त्या अवस्थेला नशा असे म्हणतात ही व्यख्या फारच तोकडी आहे - प्राणायामाने, शवासनाने सुध्दा मेंदू आणि मज्जसंस्थेला एकप्रकारची शिथिलता येते पण त्यातून बाहेर आल्यावर ती रिजुविनेटिंग (पुनुरुत्साहित?) करणारी असते - हँगओव्हर देणारी नाही. >>>...त्यालाच आपण "माणूस आउट झाला" असे म्हणतो. हा परिणाम फक्त मादक पदार्थाचे अतिरेकी सेवन केल्यावरच होतो आणि तोसुद्धा तात्पुरताच असतो. सुरुवातीला तात्पुरता वाटणारा परिणाम हा काही काळानंतर बर्‍याच अंशी कायमचा दिसू लागतो. नशेच्या प्रकार आणि प्रमाणावरती होणारे परिणाम हे किती वेगाने कायम स्वरुपात बदलतात हे ठरते. >>>>हे परिणाम मुख्यत: मेंदूवर नसून इतर अवयवांवर असतात. मेंदूवर परिणाम होतोच. तो टाळता येत नाही. नशेने मेंदूत रासायनिक बदल घडतातच. किंबहुना प्रथम तिथेच परिणाम होतो आणि मग अतिरेकी नशा असेल तर इतर अवयवही एकेक करुन कोलमडू शकतात. >>>>सारांश काय की नशेत चांगले किंवा वाईट असे काही नाही, ती एक अवस्था आहे. मात्र ही अवस्था एखाद्या बाह्य पदार्थाच्या सेवनानेच प्राप्त होऊ शकते. मानवी शरीर आपल्याआपण ही अवस्था प्राप्त करून घेऊ शकत नाही. नशा ही वाईट आणि चांगली अशी दोन्ही असते. आणि त्यासाठी मादक पदार्थाचे सेवन करावेच लागते असेही नाही. एखाद्या चांगल्या गोष्टीचा पराकोटीचा ध्यास हा नशेत रुपांतरित होतो आणि त्यापुढे अचाट शारीरिक चमत्कारही साध्य होतात की जे सर्वसामान्यपणे केले जाणे अवघड असते. (उदा. बाजीप्रभूने खिंड लढवणे आणि एकहाती अनेक हबशांना रोखून धरणे - शिवरायांना काही केल्या धोका पोहचू नये ह्या टोकाच्या स्वामिभक्तीतून आलेल्या नशेने केलेला तो चमत्कार आहे!) नशा का करावीशी वाटते ह्यातच ती चांगली की वाईट ह्याचे उत्तर आहे असे मला वाटते. असो. एकूण लेखाचे प्रयोजन हे चिंतनापेक्षा "नशा करणे हे वाईट नाही फक्त अतिरेक टाळावा, नशा करणार्‍यांना वाईट म्हणणे कसे चुकीचे आहे" असा दिसतो. अर्थातच तुम्ही नशाबाजांची नशीली बाजू मांडली आहे आणि त्यात काही चूक नाही! विवेकानंदांचे उदाहरण हे हटकून दिले जाते (हे याआधी अशाच प्रकारच्या चर्चेत ऐकण्यात आले आहे आणि काही ठिकाणी माझ्या वाचनातही) कारण त्यायोगे नशा ह्या प्रकाराला एक प्रकारचे वलय किंवा प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न असतो असे मला वाटते. हे उदाहरण मला पटत अशासाठी नाही की केवळ तंबाखू खाणे ह्याच गोष्टीवर भर देऊन विवेकानंदांनीसुध्दा ती खाल्ली मग आम्ही का नको? असा तो युक्तिवाद वाटतो. (तसेच आणखी एक उदा. लो.टिळकांचे सुपारीचे व्यसन...) त्याखेरीज त्यांच्या बाकीच्या अध्यात्मिक उंचीकडे सोयिस्कर दुर्लक्ष होण्याची दाट शक्यता असते. ज्यांना नशा करायची आहे त्यांनी ती स्वतःशी प्रामाणिक राहून करावी त्यासाठी इतर कोणाची उदाहरणे देऊ नयेत असे माझे मत आहे. तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल अपराधी भाव मनात असतील तर अशी उदाहरणे दिली जातात कारण मग त्यामुळे तुमच्या मनातली बोच काही अंशी तरी कमी व्हायला मदत होते. मी स्वतः दारू घेत नाही. मी कोणत्याही गेट्-टुगेदरला गेलो, खास करुन सगळेच भारतीय असलेल्या, की हमखास जवळजवळ सगळेच घेणारे असतात. मला आग्रह होतो. मी नाकारतो. फळांचे रस वगैरे घेणारा मी एकटाच निघतो. दारु पिणार्‍यांना मी कोणताही उपदेश करत नाही, त्यांना घ्या-घेऊ नका असेही सांगत नाही पण तरीही थोड्या वेळाने दारू पिणे ह्यात गैर कसे काही नाही, आम्ही थोडीच घेतो, आम्ही काय बेवडे वाटतो काय? आमचा कंट्रोल कसा जात नाही... इ. गप्पा सुरु होतात. (मग हळूहळू कंट्रोल कसा जातो हेही समजते;)). मला काहीही करुन त्यांच्या कळपात खेचण्याचा आग्रह होतोच. असे का व्हावे? हा सर्व प्रकार मला हास्यास्पद वाटतो. तुम्ही घेत असाल तर घ्या, त्यात नाकारण्यासारखे किंवा समर्थन करण्यासारखे दोन्हीही नाही. आणि तुमच्या मनात जर अपराधी भाव असला तर तो तसा का आहे ह्याचा शोध तुम्हालाच घ्यायचा आहे, न पिणार्‍यांना प्यायला लावून तो लागणार नाही, असे माझे मत असते! आणि ह्यावरुन बराच वाद-विवाद होतो. तरीही एकूण अशा प्रकारच्या मुक्त चर्चेचे मी स्वागतच करतो कारण त्यामुळे माझी वैचारिक मतप्रदर्शनाची नशा काही अंशीतरी पूर्ण होतेच!! :)) तेव्हा डांबिसकाका, चियर्स!!!;)) चतुरंग

In reply to by चतुरंग

मी पण असाच असुरावादी आहे. त्यामुळे पार्टी मधे एकटाच मी लिम्का पित आणि चकण्याचे दाणे खात बसत असे. बा़की टेबलवर सर्वजण धुंद आणि मी सर्वाना सावरत बसत असे. :) ते डोलकर आणि मी सावरकर... पुण्याचे पेशवे

सृष्टीलावण्या Tue, 03/04/2008 - 07:33
दारु आणि इतर नशा स्वत:ची, स्वत:च्या शरीराची वाट लावतात, धुम्रपान मात्र स्वत: बरोबर इतरांच्या आयुष्याची पण वाट लावते. स्वत:च्या २ वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन अखंड धुम्रपान करणारा महाभाग मी पाहिला आहे. त्याने सोडलेला धूर त्या मुलाच्या नाकातोंडात जात असतो. थोडक्यात काय तर धुम्रपान करणे शरीराला घातक आणि धुम्रपान करणारे समाजाला घातक. त्यांची नशा दुसर्‍यांसाठी सजा बनते. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

छोटा डॉन Tue, 03/04/2008 - 10:33
डांबिसकाकांनी छेडलेल्या 'नशा' या विषयावरील चर्चेला मिळालेले अनेक अर्थपूर्ण प्रतिसाद पाहून आमची अवस्था एकदम धूंदीत गेल्यासारखी झाली आहे. त्या धूंदीचा अंमल कालपर्यंत टिकून होता म्हणून आज "पूर्णपणे होशोहवाज" मध्ये मी प्रतिसाद द्याय्चे ठरवले.... "सारांश काय की नशेत चांगले किंवा वाईट असे काही नाही, ती एक अवस्था आहे ....." मान्य आहे. सामान्यता कोणतीही अवस्था नैसर्गीकच असते त्यामुळे इथून पुढे आम्ही "पिऊन टूल्ल होऊन पडणे" यालाच सभ्य भाषेत "आम्ही एका अवस्थेत होतो" असे म्हणणार. त्यात काही वाईट नाही . "अतिनशेचेच दुष्परिणाम होतात्...माफक प्रमाणात योग्य जागी काय हरकत" आम्ही सुध्धा हेच म्हणतो. पण हे "योग्य प्रमाण" आणि "अतिसेवन" यांचे परिमाण आणि त्यांची सिमारेषा अतिशय तुटक आहे. त्यात आपण जनरली 'गफलत' करतो व योग्य प्रमाण म्हणून अतिसेवन करतो व परिणाम म्हणजे धूंद अवस्था. ".......... दारू प्या काही वाईट नाही असा थोडा सुर वाटतो आहे त्यामुळे लेख जरा एकीकडे झुकला आहे" नाही. आम्हाला असे वाटत नाही, एकदम मस्त लिहला आहे लेख. "विविध संकेतस्थळांवर आपण लिहिणे आणि कुणी वाचले आहे की नाही ते सतत पाहत राहणे ही नशा जबर्दस्त आहे. इतर नशांशीही आम्ही परिचित आहोत, त्यापेक्षाही ही लिहिण्याची नशा अधिक जोमाची आहे. त्यापासून सावध असावे. त्यापेक्षा मस्त दारू प्यावी. ती नशा कमी ठरते" सर्कीटेश्वर क्या सही डायलॉक मारा है भाय. आपूनको १०० % कबूल .... खरचं सगळ्यात डेजर नशा आहे ही. .... "मी तर म्हणेन की एक वेळ दारुची नशा परवडली परंतु अध्यात्माची नशा तर फारच भयंकर! स्टेजवरच्या पडद्याच्या सळसळीची, तिथल्या धूपाच्या वासाची, होणार्‍या तिन्ही घ॑टा॑ची आणि टाळ्या॑च्या कडकडाटाची नशा तर जीवघेणीच! " सहमत . आध्यात्म्याच्या नशेचा जेवढा तिरस्कार करतो तेवढेच 'स्टेजवरच्या पडद्याच्या सळसळीची, तिथल्या धूपाच्या वासाची, होणार्‍या तिन्ही घ॑टा॑ची आणि टाळ्या॑च्या कडकडाटाची नशा ' यावर प्रेम करतो. या नशेवर ताबा ठेवणे हे मला या जन्मात तरी शक्य नाही, पुढच्या जन्मात बघू जमले तर ..... "१. आयोडेक्स सँडविच. २. पाल मारून, जाळून त्याचा धूर ओढ्णे. ३. कमी विषारी नागाकडून जिभेला चावून घेणे (धामण?)" अनभिज्ञ ......... "आईने पुरणपोळीत घातलेल्या जायफळामुळे परिक्षेच्या काळात अभ्यास करताना झोप आलेली आठवते."" अशी नशा आम्ही आवडीने व कुणाची तमा न बाळागता करू ..... काही इतर नशा : आपल्या आवडत्या 'व्यक्तीशी तासनतास फोनवर बोलण्याअची नशा ', त्या व्यक्तीच्या 'डोळ्यात बूडून जाण्याची नशा' , आपापसात घडलेल्या घटना आठवून एकटेच हसत बसण्याची नशा , ३ महिन्याच्या अवकाशानंतर बेंगलोरहून पुण्याला जाऊन तिला भेटण्याच्या कल्पनेतील नशा वगैरे वगैरे ..... गररोज ऊठल्या ऊठल्या पेपर वाचण्याची नशा .... खाताना / जेवण करताना काही तरी वाचन करण्यची नशा .... 'रेहमानची गाणी ' ऐकत झोपण्याची नशा .... इत्यादी इत्यादी .......... तळटीप : वर व्यक्त झालेल्या 'इतर नशा' ह्या मला अतिप्रिय आहेत. कोणतेही दूष्परिणाम जर त्यामुळे होणार असलील तर मला त्याची तमा नाही. छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या "http://chhota-don.blogspot.com/ "] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

विजुभाऊ Tue, 03/04/2008 - 12:13
नशा ही नशा च असते......तुमची आणि आमची अगदी सेम असते..... कोणत्याही गोष्टीत वहावत जाणे म्हणजे नशा..... काही नशा चांगल्या असतात्.......उदा: यश मिळवण्याची नशा....... त्यामुळे माणसाचा उतकर्ष होतो..... मला वाटते की जी गोष्ट जगाचा विसर पाडण्यास भग पाडते तिला नशा म्हणण्यास हरकत नसावी. पण केवळ दारु बद्दल बोलायचे झाले तर आपल्या सगळ्याना केवळ आपल्याला हव्या याच गोष्टी ऐकु येतात कोणी "दारु सोडा.....असे सांगितले तर्....दारु आणि सोडा...." असे ऐकु येते.. आपला अट्टल वाचन बाज विजुभाऊ

विकास Tue, 03/04/2008 - 18:13
सर्व प्रथम चतुरंग यांचा आणि तसेच या संदर्भातील इतर काही प्रतिसाद पटले. गेल्या जुलै मधे उपक्रमावर मी "दारू एक दृष्टांत" म्हणून छोटासा लेख वजा चर्चा टाकली होती. त्यातपण अशाच रोचक प्रतिक्रीया आल्या होत्या. मिपासदस्यांना कदाचीत ही घटना वाचायला आवडेलः
उपक्रमात सध्या दारूपायी भांडणे होत आहेत.. सध्याचे एक ताजे वाक्य होते: शेवटी दारू आणि व्यसन वाईटच. त्यावरून एक पाहीलेली घटना आठवली, ती वरील वाक्याला केवळ प्रतिसाद म्हणून न देता चर्चेच्या रूपाने सुरू करतो. आपल्याला काय वाटते ते जरूर लिहा! बॉस्टनमधील एका विश्व विद्यालयात एक भारतीय मुलांचा सांस्कृतीक कार्यक्रम चालू होता (दोन दिवसांचे संमेलनच होते). त्यातील एका उपकार्यक्रमाला एक स्वामीजी आले होते. नाव असेच काहीतरी *आनंद होते (मला वटते सर्वगतानंद अथवा तदात्मानंद पण १५ वर्षांपुर्वीची घटना असल्याने नी टसे आठवत नाही, आणि चुकीचे नाव सांगायला नको म्हणून लिहीत नाही).तर् ते असो. कार्यक्रमाचा एक भाग म्हणून प्रश्नोत्तरच्या वेळात एका अमेरिकेत जन्मलेल्या भारतीय वंशाच्या वीस-एक वर्षाच्या तरूणाने (थोडासा खोचकपणानेच) स्वामिजींना प्रश्न विचारला, "स्वामीजी , दारू पिणे चांगले की वाईट?" असे वाटले, आता स्वामिजी बिचारे काय म्हणणार? ते तर दारू पित नाहीत... पण स्वामिजींनी शांतपणे अशा अर्थाचे उत्तर दिले, "दारू पिणे चांगले का वाईट हा प्रश्न नाही , चांगले काय नाही तर"कशाचीही नशा चढणे" (something on this line, "it's not the issue if conuming alcohol is good or bad, what is bad is intoxication") . माणसाला (मुख्यत्वे मनुष्य स्वभावाला आणि त्यामुळे इतरांना) मारक काय असते तर ते "कशाचीही नशा चढणे". पुढचे पारायण माझे:-) तात्पर्यः कुठलेही काम अथवा क्रिया करताना माणसाने ते मन लावून करावे (वी) पण त्याचा दुरूपयोग न होता उचीत उपयोग होण्यासाठी आणि स्वतःस त्याचा त्रास होऊ न देता "आत्मोद्धारासाठी" म्हणून त्या कार्याची "नशा चढणार नाही "याची काळजी घ्यावी. चांगली गोष्ट करताना पण अशी नशा चढते आणि माणसं, सात्वीक असला तरी अहंकारापोटी स्वतःच्या कार्यपद्धती आणि कार्याबद्दल अतिरेकी होयला लागतात आणि त्यामुळे चांगल्या कार्याचा नाश तरी होतो अथवा चुकीची फळे मिळू लागतात. इतिहासाची पाने चाळली तर महाभारतापासून ते अर्वाचीन भारतापर्यंत (आणि अर्थातच जगात इतरत्रही) अशी बरीच महान व्यक्तिमत्वे दिसतील ज्यांना असे स्वतःच्या कार्याच्या नशेने पछाडले आणि परीणामी चुकीची फळे त्यांना आणि इतरांना भोगावी लागली. पण तो आत्ता (जुन्या कुरापती काढायचा हा) विषय नाही ... असे थोरांचे होते तर तुम्ही आम्ही कोण लागून गेलो!
खुलासा प्रेषक विकास (रवि, 07/15/2007 - 23:34) >>>....त्यामुळे त्यातल्या त्यात निवडीत पहिल्या प्रकारच्या नशेचे पारडे जड असावे असे वाटते. मी हे लिहीत असताना कुठल्याही नशेचे अजिबातच समर्थन करत नव्हतो अथवा दारू (किंवा तत्सम इतर उत्तेजके/अंमली पदार्थ) यांना आणि इतर गोष्टींना (विशेष करून चांगल्या कार्याला) समान मानत नव्हतो. कदाची त काही म्हणतच असलो तर ते इतकेच की ज्याला/जीला ज्याची नशा चढते त्याला/तीला त्या नशेचा कालांतराने त्रास होऊ शकतो. दारू पिऊन पण इतरांना खच्ची करणारे असतात आणि न पिऊन पण स्वतः खच्ची होणारे असतात. दोन्हीचे कारण / मूळ अखेर मानसीकतेत आणि स्वत:ला कोण कसे त्यामुळे "intoxicate" करून घेत आहे यात आहेत, इतकेच. धन्यवाद »

डांबिसा,
विषय चांगलाच आहे आणि आपण केलेले विवेचनही, त्याचबरोबर काही प्रतिसादही तितकेच चिंतनात भर टाकणारे.
बाकी नशेचे प्रकार अनेक  असु शकतात तो भाग वेगळा ,त्याच्याइतकेच कोणतीही नशा 'अधिकची' ती वाईट इतके आम्हाला समजते.
'नशे मे कोण नही है मुझे बताओ जरा ' या गाण्याची आम्हाला मुद्दाम आठवण झाली. इथे प्रत्येकाची नशा वेगवेगळी आहे  आणि धडपडही नशेचीच आहे, असे वाटत राहते. कोणत्या तरी नशेत माणूस असतोच, कोणाला दारु आणि इतर मादक द्रव्याची, कोणाला अध्यात्माच्या नशेची, राजकीय, पुस्तकाची, माणसाची, आणि कितीतरी सांगता येतील. पण शरिरावर आघात करणार्‍या  अनुक्रमे नशा कोणत्या, त्याचे अनुक्रमही व्यक्तीसापेक्ष असावेत की काय असे आम्हास वाटते.   माणुस 'आउट होतो ते केवळ मज्जासंस्थेने काम थांबविल्यावर, आणि ते केवळ मादक पदार्थानेच होते, तसेच असेल तर तशा नशेपासून दूर राहिले पाहिजे.......असे वाटते !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास Tue, 03/04/2008 - 20:02
माणुस 'आउट होतो ते केवळ मज्जासंस्थेने काम थांबविल्यावर, आणि ते केवळ मादक पदार्थानेच होते, तसेच असेल तर तशा नशेपासून दूर राहिले पाहिजे.......असे वाटते !!!
छान वाक्य आणि चर्चेतून निघावे असे तात्पर्य!

भडकमकर मास्तर Mon, 03/03/2008 - 01:53
१. अतिनशेचेच दुष्परिणाम होतात्...माफक प्रमाणात योग्य जागी काय हरकत? .... ई.ई. मुद्दे पटले... दारू पिऊन वाहन चालवणे अत्यंत घातक....( न पिणारा चालक अथवा मित्र चालक म्हणून बरोबर ठेवण्याचे नशीब सर्वांकडे नसते...तरी हे प्रयत्नपूर्वक पाळले पाहिजे)....... .......... २. लोकल ऍनेस्थेशियाची तुलना नशेशी करणे , ( तुमचे एपिड्यूरल चे उदाहरण ) याला असहमत.... जनरल ऍनेस्थेशियाची तुलना एक वेळ ठीक आहे..... ३. हे सेवन त्यांच्या परमेश्वरप्राप्तीच्या आड येऊ शकले नाही. कदाचित मदतच केली असेल... (ह. घ्या) ४. मात्र ही अवस्था एखाद्या बाह्य पदार्थाच्या सेवनानेच प्राप्त होऊ शकते. .... अर्धवट असहमती....मी फार तज्ञ नाही यातला पण माझा स्वतःचा अनुभव आहे की एखाद्या उत्तम इन्स्ट्रक्टरने मार्गदर्शन करत केलेले रिलॅक्सेशन तंत्र / शवासन आणि उत्तम दर्जाची दारू पिऊन आलेली नशा यामध्ये मेंदूची असणारी शांत, शिथील आणि उत्साही अवस्था यात मला तरी साम्य वाटले होते..... उत्तम ध्यानधारणा करू शकणारे लोक मनशक्तीने त्या मेंदूच्या अवस्थेपर्यंत पोचू शकत असावेत..... ....स्वतः डॉक्टर असणार्‍या एका हिप्नॉटिजम इन्स्ट्रक्टरने मला सांगितल्याचे स्मरते की त्याचे काही विद्यार्थी डेंटिस्ट कडे दात काढण्यासाठी लोकल ऍनेस्थेशियाचे इंजेक्षन घेत नाहीत, स्वसंमोहनाच्या सरावाने त्यांना हे जमते....त्या काळात ही गोष्ट आम्ही अविश्वसनीय / फेकाफेकी या सदरात टाकली होती...( आम्ही स्वतः दाताचे डॉक्टर आहोत, एकदा प्रात्यक्षिक पाहिले आणि विश्वास बसला, अर्थात हे रूटीनली सार्‍यांना शक्य नाही हे ही खरेच)__________________________

In reply to by भडकमकर मास्तर

चतुरंग Tue, 03/04/2008 - 02:21
पुण्यात नारायणपेठेत पत्र्या मारुतीजवळ वैद्य शेंडेशास्त्रींचा दवाखाना आहे. रुग्णाला एका विशिष्ठ आसनात बसवून (शवासन नाही) ते दुखणारी दाढसुध्दा अनस्थेशिया न देता काढतात. मध्यंतरी पुणे विद्यापीठात झालेल्या जागतिक आयुर्वेद परिषदेत त्यांनी ह्याचे प्रात्यक्षिक दाखविले होते असे कळते. तेव्हा शिथिल अवस्था ही फक्त मादक पदार्थांच्या सेवनाने येते असे नाही तर योगातल्या काही प्रकारच्या आसनांनीही येते. चतुरंग

In reply to by चतुरंग

भडकमकर मास्तर Wed, 03/05/2008 - 00:42
अजून तिथे कोणी प्रॆक्टिस करतात काय? मी त्याबद्दल ऐकले आहे, की एक विशिष्ट नस दाबून वगैरे लोकल आनेस्थेशिया (सारखे कही तरी !) देतात किंवा घडवतात असे म्हटले पाहिजे...माझ्या काही पेशंट कडून ऐकली होती गोष्ट... ...ते इथले दाढे डॊक्टर कुठे गेले? त्यांना अधिक डीटेल्स ठाउक असणार..असो हे जरा विषयांतर होतेय...

व्यंकट Mon, 03/03/2008 - 03:58
सारांश काय की नशेत चांगले किंवा वाईट असे काही नाही, ती एक अवस्था आहे. मात्र ही अवस्था एखाद्या बाह्य पदार्थाच्या सेवनानेच प्राप्त होऊ शकते. मानवी शरीर आपल्याआपण ही अवस्था प्राप्त करून घेऊ शकत नाही. जीवनातील इतर सर्व गोष्टीप्रमाणेच तिचा अतिरेक वाईट असला तरी तिच्या माफक अंगिकारामध्ये काहीही गैर, असंस्कृत वा अपायकारक नाही. अधोरेखीत सांराशांशी असहमत. दारू प्या काही वाईट नाही असा थोडा सुर वाटतो आहे त्यामुळे लेख जरा एकीकडे झुकला आहे. इतर चिंतन ठीक वाटले.

सर्किट Mon, 03/03/2008 - 07:03
आमचे दक्षिणेतले शेजारी पिवळे डांबिसराव ह्यांच्या लेखाला प्रतिसाद देण्याची संधी आम्हाला मिळते आहे, ह्याबद्दल आम्ही मिसळपावाशी कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. (हल्ली तशी फ्याशन आहे, म्हणे.) नशा हा विषय आमच्या आवडीचा आहे. मिसळपावावर लिहिण्याची देखील नशा काही व्यक्तींना आहे असे समजते. ही नशा सर्वात घातक ! ह्यापेक्षा दारू प्या असा सल्ला आम्ही देऊ इच्छितो ! (आम्हीही एकेकाळी विविध संकेतस्थळांवर वावरत होतो. तेथे आपण लिहिणे आणि कुणी वाचले आहे की नाही ते सतत पाहत राहणे ही नशा जबर्दस्त आहे. इतर नशांशीही आम्ही परिचित आहोत, त्यापेक्षाही ही लिहिण्याची नशा अधिक जोमाची आहे. त्यापासून सावध असावे. त्यापेक्षा मस्त दारू प्यावी. ती नशा कमी ठरते.) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सृष्टीलावण्या Sun, 03/16/2008 - 08:44
@मिसळपावावर लिहिण्याची देखील नशा काही व्यक्तींना आहे असे समजते. ही नशा सर्वात घातक ! ह्यापेक्षा दारू प्या असा सल्ला आम्ही देऊ इच्छितो ! आज सहज मधुमतिचे गाणे आठवले त्यात जॉनी लिव्हर म्हणतो : किसी को सुट, बुट, कोट का नशा है, किसी को हरे हरे नोट का नशा है, हम जो थोडी सी पी के जरा झुमे, हाय रे सबने देखा, जंगल मे मोर नाचा किसी ने ना देखा, हम जो थोडी सी पी के जरा झुमे, हाय रे सबने देखा... पण ही जी थोडी सी आहे ती कधी जास्त होते सांगता येत नाही. एकच प्याला चे अनेक प्याले होतात. दारुचे व्यसन लागलेल्या अनेक कलाकारांचेच पहा ना, एकेकाळी कोट्यधीश असलेली ही मंडळी मरताना विपन्नावस्थेत, गलितगात्र होऊन, एकाकी (पैशासाठी जमलेली भुते नाहीशी झालेली असतात) मरतात. मी तर म्हणेन, माणसाने दारु पिणे वाईट नाही पण दारुने माणसाला पिणे नक्कीच वाईट. कळावें, केवळ बाटलीबंद खनिज पाण्याने (Mineral Water ने) सुद्धा तोल जाऊ शकणारी, सृष्टीलावण्या. > > सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर Sun, 03/16/2008 - 10:49
मी तर म्हणेन, माणसाने दारु पिणे वाईट नाही पण दारुने माणसाला पिणे नक्कीच वाईट. अगदी सहमत आहे! आपला, (दारूला पिणारा!) तात्या. -- When I read about the evils of drinking, I gave up reading! :)

In reply to by सृष्टीलावण्या

सृष्टीलावण्या Sun, 03/16/2008 - 11:18
चू.भु.द्या.घ्या. वरच्या गाण्यातील अभिनेता जॉनी लिव्हर नसून जॉनी वॉकर आहे ज्याने आयुष्यात कधी ही दारुच्या थेंबाला ही स्पर्श केला नाही मात्र तो बेवड्या असण्याचा अभिनय हुबेहुब करायचा. त्याच्या अभिनयकौशल्याला मुजरा. > > सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

बेसनलाडू Mon, 03/03/2008 - 08:25
विवेचन, दृष्टिकोन आणि माहिती आवडली. (वाचक)बेसनलाडू अती सर्वत्र वर्जयेत हा नियम मादक पदार्थांनाच नव्हे तर सगळ्याच पदार्थांना लागू पडतो आणि विशेषतः 'नशा'बाज, काही विशिष्ट संकेतस्थळांवरील विशिष्ट प्रकारच्या आंतरजालीय लेखनालाही? ;) (सूचक)बेसनलाडू

विसोबा खेचर Mon, 03/03/2008 - 08:36
डांबिसा, अतिशय सुंदर लेख! मनापासून आवडला.... मी तर म्हणेन की एक वेळ दारुची नशा परवडली परंतु अध्यात्माची नशा तर फारच भयंकर! आम्ही असे काही आध्यात्मिक नशाबाज पाहिले आहेत! असो... तात्या.

धमाल मुलगा Mon, 03/03/2008 - 12:02
वा डा॑बिसकाका, आम्हा सर्व मे॑दूच्या शैथिल्याचा आन॑द घेणार्‍या आणि स॑भाविता॑कडून नशेबाज म्हणून हिणवले जाणार्‍या॑चे मसिहा आहात आपण ! प्रणाम ! ह्या विषयावर कि॑बहुना ह्या विषयाच्या बाजूने मत॑ मा॑डणारा हा एकमेव लेख असावा (निदान भारतीय). एरवी सगळे नशेच्या नावान॑ बोट॑ मोडायला सर्वात पुढे ! आपली मत॑ त॑तोत॑त पटली. बाकी तात्याबा, मी तर म्हणेन की एक वेळ दारुची नशा परवडली परंतु अध्यात्माची नशा तर फारच भयंकर! सहमत, ह्याबरोबर मी म्हणेन, "स्टेजवरच्या पडद्याच्या सळसळीची, तिथल्या धूपाच्या वासाची, होणार्‍या तिन्ही घ॑टा॑ची आणि टाळ्या॑च्या कडकडाटाची नशा तर जीवघेणीच! "

विजुभाऊ Mon, 03/03/2008 - 12:51
अध्यात्माची नशा तर फारच भयंकर! १००टक्के खरे....आणि या नशे चे स्वरूप सध्या फारच सोज्वळ आहे असे दाखवतात. शुद्ध मराठीत सांगायचे तर "मी नाही त्यातली अन कडी लाव आतली" असे आहे..बाकी नशा निदान "बदनाम" तरी आहेत त्या व्यक्तिगत आहेत......अध्यात्माची नशा हा एक सार्वत्रीक रोग आहे.... सगळे टी व्ही चॅनेल रोज सकाळी याचा रतीब घालत असतात.

एक Tue, 03/04/2008 - 00:07
डांबीस, मी असं वाचल्याचं आठवत आहे कि नशेसाठी काही लोक खाली दिलेले मार्गपण वापरतात. त्यात कितपत तथ्य आहे? १. आयोडेक्स सँडविच. २. पाल मारून, जाळून त्याचा धूर ओढ्णे. ३. कमी विषारी नागाकडून जिभेला चावून घेणे (धामण?) हे जर खरं असेल तर या प्रकारातून नशा का येते?

प्राजु Tue, 03/04/2008 - 00:44
लेख आवडला. प्रत्येकाला कसलीतरि नशा असतेच. पण अती सर्वत्र वर्जयेत हा नियम मादक पदार्थांनाच नव्हे तर सगळ्याच पदार्थांना लागू पडतो.. हे महत्वाचे. आईने पुरणपोळीत घातलेल्या जायफळामुळे परिक्षेच्या काळात अभ्यास करताना झोप आलेली आठवते.. - (सर्वव्यापी)प्राजु

चतुरंग Tue, 03/04/2008 - 04:13
काही मुद्द्यांबाबत असहमत - >>>जेंव्हा मेंदू व इतर मज्जासंस्था शिथील अवस्थेत असते त्या अवस्थेला नशा असे म्हणतात ही व्यख्या फारच तोकडी आहे - प्राणायामाने, शवासनाने सुध्दा मेंदू आणि मज्जसंस्थेला एकप्रकारची शिथिलता येते पण त्यातून बाहेर आल्यावर ती रिजुविनेटिंग (पुनुरुत्साहित?) करणारी असते - हँगओव्हर देणारी नाही. >>>...त्यालाच आपण "माणूस आउट झाला" असे म्हणतो. हा परिणाम फक्त मादक पदार्थाचे अतिरेकी सेवन केल्यावरच होतो आणि तोसुद्धा तात्पुरताच असतो. सुरुवातीला तात्पुरता वाटणारा परिणाम हा काही काळानंतर बर्‍याच अंशी कायमचा दिसू लागतो. नशेच्या प्रकार आणि प्रमाणावरती होणारे परिणाम हे किती वेगाने कायम स्वरुपात बदलतात हे ठरते. >>>>हे परिणाम मुख्यत: मेंदूवर नसून इतर अवयवांवर असतात. मेंदूवर परिणाम होतोच. तो टाळता येत नाही. नशेने मेंदूत रासायनिक बदल घडतातच. किंबहुना प्रथम तिथेच परिणाम होतो आणि मग अतिरेकी नशा असेल तर इतर अवयवही एकेक करुन कोलमडू शकतात. >>>>सारांश काय की नशेत चांगले किंवा वाईट असे काही नाही, ती एक अवस्था आहे. मात्र ही अवस्था एखाद्या बाह्य पदार्थाच्या सेवनानेच प्राप्त होऊ शकते. मानवी शरीर आपल्याआपण ही अवस्था प्राप्त करून घेऊ शकत नाही. नशा ही वाईट आणि चांगली अशी दोन्ही असते. आणि त्यासाठी मादक पदार्थाचे सेवन करावेच लागते असेही नाही. एखाद्या चांगल्या गोष्टीचा पराकोटीचा ध्यास हा नशेत रुपांतरित होतो आणि त्यापुढे अचाट शारीरिक चमत्कारही साध्य होतात की जे सर्वसामान्यपणे केले जाणे अवघड असते. (उदा. बाजीप्रभूने खिंड लढवणे आणि एकहाती अनेक हबशांना रोखून धरणे - शिवरायांना काही केल्या धोका पोहचू नये ह्या टोकाच्या स्वामिभक्तीतून आलेल्या नशेने केलेला तो चमत्कार आहे!) नशा का करावीशी वाटते ह्यातच ती चांगली की वाईट ह्याचे उत्तर आहे असे मला वाटते. असो. एकूण लेखाचे प्रयोजन हे चिंतनापेक्षा "नशा करणे हे वाईट नाही फक्त अतिरेक टाळावा, नशा करणार्‍यांना वाईट म्हणणे कसे चुकीचे आहे" असा दिसतो. अर्थातच तुम्ही नशाबाजांची नशीली बाजू मांडली आहे आणि त्यात काही चूक नाही! विवेकानंदांचे उदाहरण हे हटकून दिले जाते (हे याआधी अशाच प्रकारच्या चर्चेत ऐकण्यात आले आहे आणि काही ठिकाणी माझ्या वाचनातही) कारण त्यायोगे नशा ह्या प्रकाराला एक प्रकारचे वलय किंवा प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न असतो असे मला वाटते. हे उदाहरण मला पटत अशासाठी नाही की केवळ तंबाखू खाणे ह्याच गोष्टीवर भर देऊन विवेकानंदांनीसुध्दा ती खाल्ली मग आम्ही का नको? असा तो युक्तिवाद वाटतो. (तसेच आणखी एक उदा. लो.टिळकांचे सुपारीचे व्यसन...) त्याखेरीज त्यांच्या बाकीच्या अध्यात्मिक उंचीकडे सोयिस्कर दुर्लक्ष होण्याची दाट शक्यता असते. ज्यांना नशा करायची आहे त्यांनी ती स्वतःशी प्रामाणिक राहून करावी त्यासाठी इतर कोणाची उदाहरणे देऊ नयेत असे माझे मत आहे. तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल अपराधी भाव मनात असतील तर अशी उदाहरणे दिली जातात कारण मग त्यामुळे तुमच्या मनातली बोच काही अंशी तरी कमी व्हायला मदत होते. मी स्वतः दारू घेत नाही. मी कोणत्याही गेट्-टुगेदरला गेलो, खास करुन सगळेच भारतीय असलेल्या, की हमखास जवळजवळ सगळेच घेणारे असतात. मला आग्रह होतो. मी नाकारतो. फळांचे रस वगैरे घेणारा मी एकटाच निघतो. दारु पिणार्‍यांना मी कोणताही उपदेश करत नाही, त्यांना घ्या-घेऊ नका असेही सांगत नाही पण तरीही थोड्या वेळाने दारू पिणे ह्यात गैर कसे काही नाही, आम्ही थोडीच घेतो, आम्ही काय बेवडे वाटतो काय? आमचा कंट्रोल कसा जात नाही... इ. गप्पा सुरु होतात. (मग हळूहळू कंट्रोल कसा जातो हेही समजते;)). मला काहीही करुन त्यांच्या कळपात खेचण्याचा आग्रह होतोच. असे का व्हावे? हा सर्व प्रकार मला हास्यास्पद वाटतो. तुम्ही घेत असाल तर घ्या, त्यात नाकारण्यासारखे किंवा समर्थन करण्यासारखे दोन्हीही नाही. आणि तुमच्या मनात जर अपराधी भाव असला तर तो तसा का आहे ह्याचा शोध तुम्हालाच घ्यायचा आहे, न पिणार्‍यांना प्यायला लावून तो लागणार नाही, असे माझे मत असते! आणि ह्यावरुन बराच वाद-विवाद होतो. तरीही एकूण अशा प्रकारच्या मुक्त चर्चेचे मी स्वागतच करतो कारण त्यामुळे माझी वैचारिक मतप्रदर्शनाची नशा काही अंशीतरी पूर्ण होतेच!! :)) तेव्हा डांबिसकाका, चियर्स!!!;)) चतुरंग

In reply to by चतुरंग

मी पण असाच असुरावादी आहे. त्यामुळे पार्टी मधे एकटाच मी लिम्का पित आणि चकण्याचे दाणे खात बसत असे. बा़की टेबलवर सर्वजण धुंद आणि मी सर्वाना सावरत बसत असे. :) ते डोलकर आणि मी सावरकर... पुण्याचे पेशवे

सृष्टीलावण्या Tue, 03/04/2008 - 07:33
दारु आणि इतर नशा स्वत:ची, स्वत:च्या शरीराची वाट लावतात, धुम्रपान मात्र स्वत: बरोबर इतरांच्या आयुष्याची पण वाट लावते. स्वत:च्या २ वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन अखंड धुम्रपान करणारा महाभाग मी पाहिला आहे. त्याने सोडलेला धूर त्या मुलाच्या नाकातोंडात जात असतो. थोडक्यात काय तर धुम्रपान करणे शरीराला घातक आणि धुम्रपान करणारे समाजाला घातक. त्यांची नशा दुसर्‍यांसाठी सजा बनते. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

छोटा डॉन Tue, 03/04/2008 - 10:33
डांबिसकाकांनी छेडलेल्या 'नशा' या विषयावरील चर्चेला मिळालेले अनेक अर्थपूर्ण प्रतिसाद पाहून आमची अवस्था एकदम धूंदीत गेल्यासारखी झाली आहे. त्या धूंदीचा अंमल कालपर्यंत टिकून होता म्हणून आज "पूर्णपणे होशोहवाज" मध्ये मी प्रतिसाद द्याय्चे ठरवले.... "सारांश काय की नशेत चांगले किंवा वाईट असे काही नाही, ती एक अवस्था आहे ....." मान्य आहे. सामान्यता कोणतीही अवस्था नैसर्गीकच असते त्यामुळे इथून पुढे आम्ही "पिऊन टूल्ल होऊन पडणे" यालाच सभ्य भाषेत "आम्ही एका अवस्थेत होतो" असे म्हणणार. त्यात काही वाईट नाही . "अतिनशेचेच दुष्परिणाम होतात्...माफक प्रमाणात योग्य जागी काय हरकत" आम्ही सुध्धा हेच म्हणतो. पण हे "योग्य प्रमाण" आणि "अतिसेवन" यांचे परिमाण आणि त्यांची सिमारेषा अतिशय तुटक आहे. त्यात आपण जनरली 'गफलत' करतो व योग्य प्रमाण म्हणून अतिसेवन करतो व परिणाम म्हणजे धूंद अवस्था. ".......... दारू प्या काही वाईट नाही असा थोडा सुर वाटतो आहे त्यामुळे लेख जरा एकीकडे झुकला आहे" नाही. आम्हाला असे वाटत नाही, एकदम मस्त लिहला आहे लेख. "विविध संकेतस्थळांवर आपण लिहिणे आणि कुणी वाचले आहे की नाही ते सतत पाहत राहणे ही नशा जबर्दस्त आहे. इतर नशांशीही आम्ही परिचित आहोत, त्यापेक्षाही ही लिहिण्याची नशा अधिक जोमाची आहे. त्यापासून सावध असावे. त्यापेक्षा मस्त दारू प्यावी. ती नशा कमी ठरते" सर्कीटेश्वर क्या सही डायलॉक मारा है भाय. आपूनको १०० % कबूल .... खरचं सगळ्यात डेजर नशा आहे ही. .... "मी तर म्हणेन की एक वेळ दारुची नशा परवडली परंतु अध्यात्माची नशा तर फारच भयंकर! स्टेजवरच्या पडद्याच्या सळसळीची, तिथल्या धूपाच्या वासाची, होणार्‍या तिन्ही घ॑टा॑ची आणि टाळ्या॑च्या कडकडाटाची नशा तर जीवघेणीच! " सहमत . आध्यात्म्याच्या नशेचा जेवढा तिरस्कार करतो तेवढेच 'स्टेजवरच्या पडद्याच्या सळसळीची, तिथल्या धूपाच्या वासाची, होणार्‍या तिन्ही घ॑टा॑ची आणि टाळ्या॑च्या कडकडाटाची नशा ' यावर प्रेम करतो. या नशेवर ताबा ठेवणे हे मला या जन्मात तरी शक्य नाही, पुढच्या जन्मात बघू जमले तर ..... "१. आयोडेक्स सँडविच. २. पाल मारून, जाळून त्याचा धूर ओढ्णे. ३. कमी विषारी नागाकडून जिभेला चावून घेणे (धामण?)" अनभिज्ञ ......... "आईने पुरणपोळीत घातलेल्या जायफळामुळे परिक्षेच्या काळात अभ्यास करताना झोप आलेली आठवते."" अशी नशा आम्ही आवडीने व कुणाची तमा न बाळागता करू ..... काही इतर नशा : आपल्या आवडत्या 'व्यक्तीशी तासनतास फोनवर बोलण्याअची नशा ', त्या व्यक्तीच्या 'डोळ्यात बूडून जाण्याची नशा' , आपापसात घडलेल्या घटना आठवून एकटेच हसत बसण्याची नशा , ३ महिन्याच्या अवकाशानंतर बेंगलोरहून पुण्याला जाऊन तिला भेटण्याच्या कल्पनेतील नशा वगैरे वगैरे ..... गररोज ऊठल्या ऊठल्या पेपर वाचण्याची नशा .... खाताना / जेवण करताना काही तरी वाचन करण्यची नशा .... 'रेहमानची गाणी ' ऐकत झोपण्याची नशा .... इत्यादी इत्यादी .......... तळटीप : वर व्यक्त झालेल्या 'इतर नशा' ह्या मला अतिप्रिय आहेत. कोणतेही दूष्परिणाम जर त्यामुळे होणार असलील तर मला त्याची तमा नाही. छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या "http://chhota-don.blogspot.com/ "] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

विजुभाऊ Tue, 03/04/2008 - 12:13
नशा ही नशा च असते......तुमची आणि आमची अगदी सेम असते..... कोणत्याही गोष्टीत वहावत जाणे म्हणजे नशा..... काही नशा चांगल्या असतात्.......उदा: यश मिळवण्याची नशा....... त्यामुळे माणसाचा उतकर्ष होतो..... मला वाटते की जी गोष्ट जगाचा विसर पाडण्यास भग पाडते तिला नशा म्हणण्यास हरकत नसावी. पण केवळ दारु बद्दल बोलायचे झाले तर आपल्या सगळ्याना केवळ आपल्याला हव्या याच गोष्टी ऐकु येतात कोणी "दारु सोडा.....असे सांगितले तर्....दारु आणि सोडा...." असे ऐकु येते.. आपला अट्टल वाचन बाज विजुभाऊ

विकास Tue, 03/04/2008 - 18:13
सर्व प्रथम चतुरंग यांचा आणि तसेच या संदर्भातील इतर काही प्रतिसाद पटले. गेल्या जुलै मधे उपक्रमावर मी "दारू एक दृष्टांत" म्हणून छोटासा लेख वजा चर्चा टाकली होती. त्यातपण अशाच रोचक प्रतिक्रीया आल्या होत्या. मिपासदस्यांना कदाचीत ही घटना वाचायला आवडेलः
उपक्रमात सध्या दारूपायी भांडणे होत आहेत.. सध्याचे एक ताजे वाक्य होते: शेवटी दारू आणि व्यसन वाईटच. त्यावरून एक पाहीलेली घटना आठवली, ती वरील वाक्याला केवळ प्रतिसाद म्हणून न देता चर्चेच्या रूपाने सुरू करतो. आपल्याला काय वाटते ते जरूर लिहा! बॉस्टनमधील एका विश्व विद्यालयात एक भारतीय मुलांचा सांस्कृतीक कार्यक्रम चालू होता (दोन दिवसांचे संमेलनच होते). त्यातील एका उपकार्यक्रमाला एक स्वामीजी आले होते. नाव असेच काहीतरी *आनंद होते (मला वटते सर्वगतानंद अथवा तदात्मानंद पण १५ वर्षांपुर्वीची घटना असल्याने नी टसे आठवत नाही, आणि चुकीचे नाव सांगायला नको म्हणून लिहीत नाही).तर् ते असो. कार्यक्रमाचा एक भाग म्हणून प्रश्नोत्तरच्या वेळात एका अमेरिकेत जन्मलेल्या भारतीय वंशाच्या वीस-एक वर्षाच्या तरूणाने (थोडासा खोचकपणानेच) स्वामिजींना प्रश्न विचारला, "स्वामीजी , दारू पिणे चांगले की वाईट?" असे वाटले, आता स्वामिजी बिचारे काय म्हणणार? ते तर दारू पित नाहीत... पण स्वामिजींनी शांतपणे अशा अर्थाचे उत्तर दिले, "दारू पिणे चांगले का वाईट हा प्रश्न नाही , चांगले काय नाही तर"कशाचीही नशा चढणे" (something on this line, "it's not the issue if conuming alcohol is good or bad, what is bad is intoxication") . माणसाला (मुख्यत्वे मनुष्य स्वभावाला आणि त्यामुळे इतरांना) मारक काय असते तर ते "कशाचीही नशा चढणे". पुढचे पारायण माझे:-) तात्पर्यः कुठलेही काम अथवा क्रिया करताना माणसाने ते मन लावून करावे (वी) पण त्याचा दुरूपयोग न होता उचीत उपयोग होण्यासाठी आणि स्वतःस त्याचा त्रास होऊ न देता "आत्मोद्धारासाठी" म्हणून त्या कार्याची "नशा चढणार नाही "याची काळजी घ्यावी. चांगली गोष्ट करताना पण अशी नशा चढते आणि माणसं, सात्वीक असला तरी अहंकारापोटी स्वतःच्या कार्यपद्धती आणि कार्याबद्दल अतिरेकी होयला लागतात आणि त्यामुळे चांगल्या कार्याचा नाश तरी होतो अथवा चुकीची फळे मिळू लागतात. इतिहासाची पाने चाळली तर महाभारतापासून ते अर्वाचीन भारतापर्यंत (आणि अर्थातच जगात इतरत्रही) अशी बरीच महान व्यक्तिमत्वे दिसतील ज्यांना असे स्वतःच्या कार्याच्या नशेने पछाडले आणि परीणामी चुकीची फळे त्यांना आणि इतरांना भोगावी लागली. पण तो आत्ता (जुन्या कुरापती काढायचा हा) विषय नाही ... असे थोरांचे होते तर तुम्ही आम्ही कोण लागून गेलो!
खुलासा प्रेषक विकास (रवि, 07/15/2007 - 23:34) >>>....त्यामुळे त्यातल्या त्यात निवडीत पहिल्या प्रकारच्या नशेचे पारडे जड असावे असे वाटते. मी हे लिहीत असताना कुठल्याही नशेचे अजिबातच समर्थन करत नव्हतो अथवा दारू (किंवा तत्सम इतर उत्तेजके/अंमली पदार्थ) यांना आणि इतर गोष्टींना (विशेष करून चांगल्या कार्याला) समान मानत नव्हतो. कदाची त काही म्हणतच असलो तर ते इतकेच की ज्याला/जीला ज्याची नशा चढते त्याला/तीला त्या नशेचा कालांतराने त्रास होऊ शकतो. दारू पिऊन पण इतरांना खच्ची करणारे असतात आणि न पिऊन पण स्वतः खच्ची होणारे असतात. दोन्हीचे कारण / मूळ अखेर मानसीकतेत आणि स्वत:ला कोण कसे त्यामुळे "intoxicate" करून घेत आहे यात आहेत, इतकेच. धन्यवाद »

डांबिसा,
विषय चांगलाच आहे आणि आपण केलेले विवेचनही, त्याचबरोबर काही प्रतिसादही तितकेच चिंतनात भर टाकणारे.
बाकी नशेचे प्रकार अनेक  असु शकतात तो भाग वेगळा ,त्याच्याइतकेच कोणतीही नशा 'अधिकची' ती वाईट इतके आम्हाला समजते.
'नशे मे कोण नही है मुझे बताओ जरा ' या गाण्याची आम्हाला मुद्दाम आठवण झाली. इथे प्रत्येकाची नशा वेगवेगळी आहे  आणि धडपडही नशेचीच आहे, असे वाटत राहते. कोणत्या तरी नशेत माणूस असतोच, कोणाला दारु आणि इतर मादक द्रव्याची, कोणाला अध्यात्माच्या नशेची, राजकीय, पुस्तकाची, माणसाची, आणि कितीतरी सांगता येतील. पण शरिरावर आघात करणार्‍या  अनुक्रमे नशा कोणत्या, त्याचे अनुक्रमही व्यक्तीसापेक्ष असावेत की काय असे आम्हास वाटते.   माणुस 'आउट होतो ते केवळ मज्जासंस्थेने काम थांबविल्यावर, आणि ते केवळ मादक पदार्थानेच होते, तसेच असेल तर तशा नशेपासून दूर राहिले पाहिजे.......असे वाटते !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास Tue, 03/04/2008 - 20:02
माणुस 'आउट होतो ते केवळ मज्जासंस्थेने काम थांबविल्यावर, आणि ते केवळ मादक पदार्थानेच होते, तसेच असेल तर तशा नशेपासून दूर राहिले पाहिजे.......असे वाटते !!!
छान वाक्य आणि चर्चेतून निघावे असे तात्पर्य!
नशा! आमच्या असे लक्षांत आले आहे की नशा या विषयावर मि. पा. वर बरेच लिहिले जाते. त्यातील बहुतेक लाईट, थट्टामस्करीच्या स्वरूपातील असते. काही जि़ज्ञासू लोकांनी ज्ञानसंपादनाच्या दृष्टीने विचारलेले प्रश्न असतात, तर काही अज्ञ कॉमेंन्टस ही असतात. परंतु प्रस्तुत प्रयत्न मात्र या विषयावर काही गंभीर विचार मांडण्याचा आहे. नशा म्हणजे काय हे प्रथम निश्चित केले पाहिजे. मटेरिया मेडिकाच्या व्याख्येनुसार (मराठीत अनुवादित) जेंव्हा मेंदू व इतर मज्जासंस्था शिथील अवस्थेत असते त्या अवस्थेला नशा असे म्हणतात. लक्षात घ्या, "शांत" किंवा "आनंदी" अवस्था नव्हे, तर "शिथील" अवस्था!

सुंदर चित्रे...

सृष्टीलावण्या ·

सर्किट Mon, 03/03/2008 - 07:10
काय सुंदर चित्र आहे ! वा ! इतक्या लहान मुलांना इतका सुंदर मोर कसा काढता येतो ?? रवीच्या किंडर गार्टन च्या टीचर ला भेटायला हवे ! रवि परांजपे जेव्हा दुसर्‍या वर्गातून तिसर्‍या वर्गात जातील तेव्हा किती छान चित्रे काढतील नाही ??? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय Mon, 03/03/2008 - 09:18
त्यांच्या चित्राची शैली सोपेपणा दाखवून चकवते. माझ्या मते मोराच्या चित्रात रंगसंगती आणि घटकांची मांडणी मोठी कुशल आहे. वाटल्यास हे चित्र बघा : cat in chawl मग मोराच्या चित्राकडे पुन्हा बघा. पुन्हा बघूनही तुम्हाला ते आवडेलच असे नाही. पण आवडण्या/न आवडण्यासाठी प्रौढ कारणे लागतील. "चित्र बाळबोध आहे," हे कारण पुरणार नाही, असे वाटते. चित्रकारांच्या बाबतीत माझे अज्ञान फार आहे. रवी परांजपे यांची ओळख करून दिल्याबाबत सृष्टीलावण्या यांना धन्यवाद.

In reply to by धनंजय

विसोबा खेचर Mon, 03/03/2008 - 09:49
पण आवडण्या/न आवडण्यासाठी प्रौढ कारणे लागतील. हा हा हा! खरं आहे... :) "चित्र बाळबोध आहे," हे कारण पुरणार नाही, असे वाटते. सहमत आहे... चित्रकारांच्या बाबतीत माझे अज्ञान फार आहे. रवी परांजपे यांची ओळख करून दिल्याबाबत सृष्टीलावण्या यांना धन्यवाद. हेच म्हण्तो! तात्या.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सृष्टीलावण्या Mon, 03/03/2008 - 16:04
महोदय, चित्रकारीला वयाचे बंधन नसते आणि ती समजून घ्यायला वकूब लागतो. जो दुर्दैवाने परमेश्वराने प्रत्येकालाच दिलेला असतो असे नाही. पण आपल्या मर्यादा ज्याने त्याने स्वत:च ओळखल्या पाहिजेत. नाहीतर लोक म्हणतात. "गा.गु.च.का." > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

केशवराव Mon, 03/03/2008 - 14:43
सृष्टी लावण्या , अतीशय चांगल्या कलाकाराशी ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. --------- केशवराव.

धमाल मुलगा Mon, 03/03/2008 - 14:48
रवि परा॑जप्या॑च्या कु॑चल्याचे फटकारे मिपावर देखील अवतरले हे पाहून छान वाटले. सृष्टीताई धन्यवाद.

आनंद घारे Mon, 03/03/2008 - 22:47
हे एक आदरणीय ज्येष्ठ चित्रकार आहेत. नवचित्रकलेच्या प्रवाहाच्या विरुद्ध ठामपणे उभे राहून त्यांनी अभिजात शैलीचा पाठपुरावा केला आहे. त्यांचे सुंदर चित्र पाहून चांगले वाटले, पण त्यावरील काही प्रतिक्रिया अभिरुचीपूर्ण नव्हत्या.

आनंद घारे Mon, 03/03/2008 - 22:57
"नवचित्रकलेच्या प्रवाहाच्या विरुद्ध " ऐवजी 'नवचित्रकलेच्या नावाने कुरूपतेचे कौतुक करण्याच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध" असे म्हणणे जास्त योग्य होईल.

चतुरंग Tue, 03/04/2008 - 00:43
मोराचे आणि वरती धनंजयने दिलेले दोन्ही चित्रे सुरेखच आहेत. मोराच्या वरती रेखाटलेली फांदी जणू दुसरा मोरच वाटते आहे! रवि प. यांची शैली अनोखी आहे. सशक्त रेषा, सोपी आणि ओघवती मांडणी, त्रिमिती दाखवण्याचे वेगळे कसब, वेगवेगळे पोत कुंचल्यातून साकारण्याची ताकद. ते एक उत्तम चित्रकार आहेतच, शिवाय एक चांगले कला समीक्षक, लेखक आहेत, आणि ह्या पलीकडे जाऊन ते सामाजिक जाणीव असलेले एक नागरिकही आहेत. दै.सकाळच्या बाल चित्रकला स्पर्धेला त्यांचे कित्येक वर्षे मार्गदर्शन लाभते आहे. त्यांच्या चित्रांची ओळख मला लहानपणीच दिनदर्शिकांवरच्या अनोख्या चित्रातून झाली. त्यानंतर ते वेगवेगळ्या चित्रातून भेटतच गेले. सुदैवाने शाळेत मला इ.पाचवी पासूनच, राष्ट्रपती पारितोषिक विजेते कै.अंबादास जगन्नाथ घारे आणि उत्कृष्ट व्यक्तिचित्रण (पोर्ट्रेट) करणारे वसंत विटणकर हे दोघे चित्रकला शिक्षक म्हणून लाभले हे माझे भाग्य! माझी आई ही सुध्दा एक उत्तम चित्रकार आहे. त्यामुळे रंग-रेषांची ओळख लवकर झाली. सृष्टीलावण्यताई हा विषय इथे आणल्याबद्दल आभार. चतुरंग

प्राजु Tue, 03/04/2008 - 09:02
पिसारच्या छ्टा खूप सुंदर आहेत. धन्यवाद सृष्टीताई.. - (सर्वव्यापी)प्राजु

सर्किट Tue, 03/04/2008 - 09:08
सृष्टिलावण्यताई/दादा/काका/मावशी, तुमच्या आदर्शाला उगाच काहीच्याबाही बोलून गेल्याबद्दल क्षमस्व ! च्यमारी ह्या चित्रकलेतले आम्हाला काही कळत नाही. बहुतांश सर्वसाधारण लोकांना जे आवडते, त्याची आम्हाला किळस येते. आमचे डोके बिघडलेलेच आहे, हे नक्की !! एक उदाहरण देतो. हल्लीच आम्ही साल्वादोर दालीचे मेल्टिंग क्लॉक्स बघितले, खूप आवडले. त्यावर आमच्या मित्राने आम्हाला झाडले. त्यात काय दिसते असे आम्हाला विचारले. म्हटलं, घड्याळ म्हणजे वेळ. असा वितळणारा वेळ पाहताना मजा वाटली. असा आमचा वेळ वितळून जावा, असे कुठेतरी वाटले. तर म्हणतो कसा, तुम्हा इंटलेक्च्युअल लोकांना ह्य असल्या वेड्यावाकड्या चित्रांत काहीतरी सुंदरच दिसणार. तो दाली एक यडपट आणि तुम्ही शंभर यडपट ! आता, एक स्पष्ट करतो, ते चित्र पाहिपर्यंत मला डाली कोण हे माहितीदेखील नव्हते. आणि हे तुम्ही दिलेले चित्र पाहीपर्यंत रवी परांजपे ज्येष्ठ आहेत की कनिष्ठ, नक्की कितव्या वर्गात हे देखील माहिती नव्हते. मुळात चित्रकार कोण आहे हे माहिती नसताना चित्राविषयी दिलेला अभिप्राय अधिक योग्य नाही का ? असो. आम्हाला ह्या चित्रात दिसले ते आम्ही लिहिले. चित्रकार मराठी आहे, म्हणून उगाच त्याच्या चित्राविषयी अभिमान का बरे ? चित्र पाहायचे, आवडले तर हो म्हणायचे, नाही तर नाही ! आमचे तर बुवा असे आहे. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय Tue, 03/04/2008 - 22:12
की येथे तुम्ही तुम्हाला झाडण्यासारख्या मित्रासारखे वागत आहात. मोराचे चित्र तुम्हाला वाटले त्यापेक्षा गुंतागुंतीचे आहे. तुम्ही जितपत प्रयत्न दालीच्या चित्राचा आस्वाद घेण्यात खर्चिला, तितपत या चित्राचा आस्वाद घेण्यातही खर्चावा. नपेक्षा तुम्हाला झाडणारा मित्रही योग्यच बोलत होता, असे मान्य करावे - त्यानेही "चित्र बघितले, आणि नावडले म्हणून ना म्हटले", नाही का? मराठी माणूस असल्याचा चित्रकलेशी संबंध नाही हे तुमचे म्हणणे खरे असले तरी, या त्याचा या संकेतस्थळाशी संबंध आहे. साल्वादोर दालींच्या चित्रांचे मोठे संग्रहालय बार्सेलोना(स्पेन)मध्ये आहे. त्यांची चित्रे सुंदर असण्याचा त्यांच्या स्पॅनिश असण्याशी संबंध नाही म्हणा, पण त्यांचे संग्रहालय स्पेनमध्ये कौतुकाने असण्याशी आहे. तसेच कौतुक या चित्रकाराचे मिपा या मराठी संकेतस्थळावरती होत आहे. वरील मोराचे चित्र आणि खालील दालीचे प्रसिद्ध चित्र दोन्ही आवडण्यासारखी आहेत, त्यात इंटलेक्च्युअल असण्या-नसण्याचा काय संबंध? persistence of memory

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

चतुरंग Tue, 03/04/2008 - 22:59
कोणत्याही कलाकाराच्या सर्व कलाकृती उच्च दर्जाच्या असतातच असे नाही. प्रत्येक कलाकृती ही प्रत्येकाला आवडलीच पाहीजे असेही नाही. पण आवड/नावड का हे मात्र सांगता यायला हवे हे अमान्य नसावे. मोराचे चित्र हे प्रत्येकाला आवडेलच असा आग्रह नाही. तुम्ही म्हणता - >>आणि हे तुम्ही दिलेले चित्र पाहीपर्यंत रवी परांजपे ज्येष्ठ आहेत की कनिष्ठ, नक्की कितव्या वर्गात हे देखील माहिती नव्हते. मुळात चित्रकार कोण आहे हे माहिती नसताना चित्राविषयी दिलेला अभिप्राय अधिक योग्य नाही का ? असे जर असेल, तर ज्या कलाकाराबद्दल तुम्हाला काहीही माहिती नाही त्याच्या चित्राबद्दल - (ते केजी तून वरच्या वर्गात..... वगैरे) अशी तद्दन खालच्या दर्जाची टवाळ टिप्पणी करण्याचे धार्ष्ट्य मला अचंबित करुन गेले! अशा वेळी खरेतर तुम्हाला ते का आवडले नाही ह्याची कारणे देता आली असती तर बरे झाले असते. दाली च्या चित्राबद्दल धनंजयने लिहिलेच आहे. त्यामुळे मी त्यावर काही भाष्य करत नाही. इंट्लेक्चुअल असणे/नसणे ह्याचाही इथे काहीही संबंध नाही. बहुतांश सर्वसाधारण लोकांना जे आवडते, त्याची आम्हाला किळस येते. ह्या तुमच्या वाक्याबद्दलही मी आपल्याला स्पष्टीकरण मागू इच्छितो. आपण असाधारण असाल त्याबद्दल आमचे काहीच म्हणणे नाही पण इतरांना सर्वसाधारण ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? जालावरच्या दुनियेत अनेक पात्रे वावरत असतात त्यांची काहीही ओळख नसताना त्यांचा असा उपमर्द करण्याचे काहीही कारण आम्हाला दिसत नाही. चतुरंग

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर Wed, 03/05/2008 - 09:54
अशी तद्दन खालच्या दर्जाची टवाळ टिप्पणी करण्याचे धार्ष्ट्य मला अचंबित करुन गेले! अशा वेळी खरेतर तुम्हाला ते का आवडले नाही ह्याची कारणे देता आली असती तर बरे झाले असते. सहमत आहे... ह्या तुमच्या वाक्याबद्दलही मी आपल्याला स्पष्टीकरण मागू इच्छितो. आपण असाधारण असाल त्याबद्दल आमचे काहीच म्हणणे नाही पण इतरांना सर्वसाधारण ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? सहमत आहे.. आमच्या फारिदा खानुमच्या आज़ जाने की जि़द ना करो या गाण्यावरील लेखालाही सर्कीटने काही कारण नसताना मिपावरील वाचकांना ऐरेगैरे म्हटल्याचे आठवते! माझ्या मते सर्कीटरावांनी वारंवार असा भिकारचोटपणा करू नये...ते शहाणे असतील/आहेत तर त्यांच्या घरचे! असो, तात्या.

In reply to by चतुरंग

सर्किट Wed, 03/05/2008 - 22:32
ह्या तुमच्या वाक्याबद्दलही मी आपल्याला स्पष्टीकरण मागू इच्छितो. आपण असाधारण असाल त्याबद्दल आमचे काहीच म्हणणे नाही पण इतरांना सर्वसाधारण ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? "सर्वसाधारण" ह्या शब्दामुळे आपला गैरसमज झाला असावा असे वाटते. मला "नॉर्मल" ला दुसरा शब्द सापडला नाही. मला कुणाचाही उपमर्द करायचा नव्हता. - सर्किट

सुधीर कांदळकर Tue, 03/04/2008 - 14:03
भाषा असते. मोराचे चित्र सुरेख आहे. निसर्ग (झाड आणी मोर) आणि कल्पना (पिसा-याचे अनोखे, वेगळे रंग, भौमितीक आकृत्या) यांची मनोहर सरमिसळ (पुन्हा मिसळच) झालेली आहे. मला देखील चित्रातले फारसे कळत नाही. परंतु जसे भिडले तसे लिहिले. मिपावरील नव्या चित्रकार सदस्याताईनी रसास्वाद लिहिला तर बरे होईल. माझ्या मडक्यात किती शिरले ते तरी कळेल. धन्यवाद. शुभेच्छा.

चित्तरंजन भट Tue, 03/04/2008 - 14:49
सुंदर चित्र आहे. फ्लिकरदुव्यावरील इतर चित्रे, प्रकाशचित्रेदेखील बघितली. आवडली. धन्यवाद!

विजुभाऊ Tue, 03/04/2008 - 15:22
सृष्टीलावण्य ताई महोदया, "चित्रकारीला वयाचे बंधन नसते आणि ती समजून घ्यायला वकूब लागतो. जो दुर्दैवाने परमेश्वराने प्रत्येकालाच दिलेला असतो असे नाही. पण आपल्या मर्यादा ज्याने त्याने स्वत:च ओळखल्या पाहिजेत. नाहीतर लोक म्हणतात. "गा.गु.च.का."" मला पहील्या दोन ओळी कळाल्या.... पण तिसर्या ओळीत "गा.गु.च.का."" लिहिले आहे "गा.गु.च.का."" म्हणजे काय...( तात्यानु बघतांव ना आमचो मराठी भाषेचो घोळ.....) तुमचो एक अज्ञानी मराठी पात्राव विजुभाऊ

लिखाळ Tue, 03/04/2008 - 21:03
वा .. रवी परांजप्यांची बाकीची चित्रे सुद्धा त्यांच्या संकेतस्थळावर जावून पाहिली. फारच छान आहेत. चित्रकलेतल्या विविध शैलींविषयी आपण काही लिहिलेत तर वाचायला आवडेल. -- लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

मदनबाण Wed, 03/05/2008 - 11:26
मोराचे चित्र अतिशय सुंन्दर आहे.मोराची मान,डोळे आणि डोक्यावरील तुरा तर फारच आवडला. चित्राची रंगसंगती अतिशय सुंदर आहे. सृष्टिलावण्यजी या सुंदर चित्र मि.पा वर दिल्या बद्धल आपल्याला धन्यवाद..... आपल्या इथे फक्त अनवाणी चालणारे आणि हिंदु देव-देवतांची नग्न चित्रे काढणारे तथाकथित चित्रकारांचा बोलबाला आहे !!!!!आणि अशा या चित्रकाराची अन्य चित्रे (सर्व सामान्यांना समजणारी ?) कोट्यावधी रुपयांच्या लिलावांनी विकली जातात...(यातील बहुसंख्य चित्रे पाहिल्या नंतर त्या चित्रांचा विषय कोणता असतो हे समजण्यासाठी बहुतेक चित्रकलेत पी.एच.डी करावी लागेल.....) (राजा रविवर्मा,दीनानाथ दलाल,रघुवीर मुळगावकर यांचा चित्र भक्त) मदनबाण

नंदन Wed, 03/05/2008 - 11:49
हा ओढून-ताणून लावलेला किंवा बादरायण संबंध असेल, पण या चित्राच्या वरील अर्ध्या भागात झाडाच्या सुकलेल्या, रंगहीन फांद्यांचा मोरासारखा (तुर्‍याच्या जागी पांढरी फुले, फांद्यांचा 'पिसारा' खाली झुकलेला) आकार आहे आणि त्याची आरशातली प्रतिमा वाटावी असा रंगीत मोर खाली. चित्राच्या डावीकडे दोघांची सरमिसळ झालेली. [अर्थात, यातून अनेक प्रतीकात्मक अर्थ काढता येतील.] चित्रकलेत मला मल्लखांबाइतकीच गती (किंवा तिचा अभाव) आहे, त्यामुळे हे निरीक्षण कितपत बरोबर आहे, ते माहीत नाही.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

सर्किट Mon, 03/03/2008 - 07:10
काय सुंदर चित्र आहे ! वा ! इतक्या लहान मुलांना इतका सुंदर मोर कसा काढता येतो ?? रवीच्या किंडर गार्टन च्या टीचर ला भेटायला हवे ! रवि परांजपे जेव्हा दुसर्‍या वर्गातून तिसर्‍या वर्गात जातील तेव्हा किती छान चित्रे काढतील नाही ??? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय Mon, 03/03/2008 - 09:18
त्यांच्या चित्राची शैली सोपेपणा दाखवून चकवते. माझ्या मते मोराच्या चित्रात रंगसंगती आणि घटकांची मांडणी मोठी कुशल आहे. वाटल्यास हे चित्र बघा : cat in chawl मग मोराच्या चित्राकडे पुन्हा बघा. पुन्हा बघूनही तुम्हाला ते आवडेलच असे नाही. पण आवडण्या/न आवडण्यासाठी प्रौढ कारणे लागतील. "चित्र बाळबोध आहे," हे कारण पुरणार नाही, असे वाटते. चित्रकारांच्या बाबतीत माझे अज्ञान फार आहे. रवी परांजपे यांची ओळख करून दिल्याबाबत सृष्टीलावण्या यांना धन्यवाद.

In reply to by धनंजय

विसोबा खेचर Mon, 03/03/2008 - 09:49
पण आवडण्या/न आवडण्यासाठी प्रौढ कारणे लागतील. हा हा हा! खरं आहे... :) "चित्र बाळबोध आहे," हे कारण पुरणार नाही, असे वाटते. सहमत आहे... चित्रकारांच्या बाबतीत माझे अज्ञान फार आहे. रवी परांजपे यांची ओळख करून दिल्याबाबत सृष्टीलावण्या यांना धन्यवाद. हेच म्हण्तो! तात्या.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सृष्टीलावण्या Mon, 03/03/2008 - 16:04
महोदय, चित्रकारीला वयाचे बंधन नसते आणि ती समजून घ्यायला वकूब लागतो. जो दुर्दैवाने परमेश्वराने प्रत्येकालाच दिलेला असतो असे नाही. पण आपल्या मर्यादा ज्याने त्याने स्वत:च ओळखल्या पाहिजेत. नाहीतर लोक म्हणतात. "गा.गु.च.का." > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

केशवराव Mon, 03/03/2008 - 14:43
सृष्टी लावण्या , अतीशय चांगल्या कलाकाराशी ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. --------- केशवराव.

धमाल मुलगा Mon, 03/03/2008 - 14:48
रवि परा॑जप्या॑च्या कु॑चल्याचे फटकारे मिपावर देखील अवतरले हे पाहून छान वाटले. सृष्टीताई धन्यवाद.

आनंद घारे Mon, 03/03/2008 - 22:47
हे एक आदरणीय ज्येष्ठ चित्रकार आहेत. नवचित्रकलेच्या प्रवाहाच्या विरुद्ध ठामपणे उभे राहून त्यांनी अभिजात शैलीचा पाठपुरावा केला आहे. त्यांचे सुंदर चित्र पाहून चांगले वाटले, पण त्यावरील काही प्रतिक्रिया अभिरुचीपूर्ण नव्हत्या.

आनंद घारे Mon, 03/03/2008 - 22:57
"नवचित्रकलेच्या प्रवाहाच्या विरुद्ध " ऐवजी 'नवचित्रकलेच्या नावाने कुरूपतेचे कौतुक करण्याच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध" असे म्हणणे जास्त योग्य होईल.

चतुरंग Tue, 03/04/2008 - 00:43
मोराचे आणि वरती धनंजयने दिलेले दोन्ही चित्रे सुरेखच आहेत. मोराच्या वरती रेखाटलेली फांदी जणू दुसरा मोरच वाटते आहे! रवि प. यांची शैली अनोखी आहे. सशक्त रेषा, सोपी आणि ओघवती मांडणी, त्रिमिती दाखवण्याचे वेगळे कसब, वेगवेगळे पोत कुंचल्यातून साकारण्याची ताकद. ते एक उत्तम चित्रकार आहेतच, शिवाय एक चांगले कला समीक्षक, लेखक आहेत, आणि ह्या पलीकडे जाऊन ते सामाजिक जाणीव असलेले एक नागरिकही आहेत. दै.सकाळच्या बाल चित्रकला स्पर्धेला त्यांचे कित्येक वर्षे मार्गदर्शन लाभते आहे. त्यांच्या चित्रांची ओळख मला लहानपणीच दिनदर्शिकांवरच्या अनोख्या चित्रातून झाली. त्यानंतर ते वेगवेगळ्या चित्रातून भेटतच गेले. सुदैवाने शाळेत मला इ.पाचवी पासूनच, राष्ट्रपती पारितोषिक विजेते कै.अंबादास जगन्नाथ घारे आणि उत्कृष्ट व्यक्तिचित्रण (पोर्ट्रेट) करणारे वसंत विटणकर हे दोघे चित्रकला शिक्षक म्हणून लाभले हे माझे भाग्य! माझी आई ही सुध्दा एक उत्तम चित्रकार आहे. त्यामुळे रंग-रेषांची ओळख लवकर झाली. सृष्टीलावण्यताई हा विषय इथे आणल्याबद्दल आभार. चतुरंग

प्राजु Tue, 03/04/2008 - 09:02
पिसारच्या छ्टा खूप सुंदर आहेत. धन्यवाद सृष्टीताई.. - (सर्वव्यापी)प्राजु

सर्किट Tue, 03/04/2008 - 09:08
सृष्टिलावण्यताई/दादा/काका/मावशी, तुमच्या आदर्शाला उगाच काहीच्याबाही बोलून गेल्याबद्दल क्षमस्व ! च्यमारी ह्या चित्रकलेतले आम्हाला काही कळत नाही. बहुतांश सर्वसाधारण लोकांना जे आवडते, त्याची आम्हाला किळस येते. आमचे डोके बिघडलेलेच आहे, हे नक्की !! एक उदाहरण देतो. हल्लीच आम्ही साल्वादोर दालीचे मेल्टिंग क्लॉक्स बघितले, खूप आवडले. त्यावर आमच्या मित्राने आम्हाला झाडले. त्यात काय दिसते असे आम्हाला विचारले. म्हटलं, घड्याळ म्हणजे वेळ. असा वितळणारा वेळ पाहताना मजा वाटली. असा आमचा वेळ वितळून जावा, असे कुठेतरी वाटले. तर म्हणतो कसा, तुम्हा इंटलेक्च्युअल लोकांना ह्य असल्या वेड्यावाकड्या चित्रांत काहीतरी सुंदरच दिसणार. तो दाली एक यडपट आणि तुम्ही शंभर यडपट ! आता, एक स्पष्ट करतो, ते चित्र पाहिपर्यंत मला डाली कोण हे माहितीदेखील नव्हते. आणि हे तुम्ही दिलेले चित्र पाहीपर्यंत रवी परांजपे ज्येष्ठ आहेत की कनिष्ठ, नक्की कितव्या वर्गात हे देखील माहिती नव्हते. मुळात चित्रकार कोण आहे हे माहिती नसताना चित्राविषयी दिलेला अभिप्राय अधिक योग्य नाही का ? असो. आम्हाला ह्या चित्रात दिसले ते आम्ही लिहिले. चित्रकार मराठी आहे, म्हणून उगाच त्याच्या चित्राविषयी अभिमान का बरे ? चित्र पाहायचे, आवडले तर हो म्हणायचे, नाही तर नाही ! आमचे तर बुवा असे आहे. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय Tue, 03/04/2008 - 22:12
की येथे तुम्ही तुम्हाला झाडण्यासारख्या मित्रासारखे वागत आहात. मोराचे चित्र तुम्हाला वाटले त्यापेक्षा गुंतागुंतीचे आहे. तुम्ही जितपत प्रयत्न दालीच्या चित्राचा आस्वाद घेण्यात खर्चिला, तितपत या चित्राचा आस्वाद घेण्यातही खर्चावा. नपेक्षा तुम्हाला झाडणारा मित्रही योग्यच बोलत होता, असे मान्य करावे - त्यानेही "चित्र बघितले, आणि नावडले म्हणून ना म्हटले", नाही का? मराठी माणूस असल्याचा चित्रकलेशी संबंध नाही हे तुमचे म्हणणे खरे असले तरी, या त्याचा या संकेतस्थळाशी संबंध आहे. साल्वादोर दालींच्या चित्रांचे मोठे संग्रहालय बार्सेलोना(स्पेन)मध्ये आहे. त्यांची चित्रे सुंदर असण्याचा त्यांच्या स्पॅनिश असण्याशी संबंध नाही म्हणा, पण त्यांचे संग्रहालय स्पेनमध्ये कौतुकाने असण्याशी आहे. तसेच कौतुक या चित्रकाराचे मिपा या मराठी संकेतस्थळावरती होत आहे. वरील मोराचे चित्र आणि खालील दालीचे प्रसिद्ध चित्र दोन्ही आवडण्यासारखी आहेत, त्यात इंटलेक्च्युअल असण्या-नसण्याचा काय संबंध? persistence of memory

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

चतुरंग Tue, 03/04/2008 - 22:59
कोणत्याही कलाकाराच्या सर्व कलाकृती उच्च दर्जाच्या असतातच असे नाही. प्रत्येक कलाकृती ही प्रत्येकाला आवडलीच पाहीजे असेही नाही. पण आवड/नावड का हे मात्र सांगता यायला हवे हे अमान्य नसावे. मोराचे चित्र हे प्रत्येकाला आवडेलच असा आग्रह नाही. तुम्ही म्हणता - >>आणि हे तुम्ही दिलेले चित्र पाहीपर्यंत रवी परांजपे ज्येष्ठ आहेत की कनिष्ठ, नक्की कितव्या वर्गात हे देखील माहिती नव्हते. मुळात चित्रकार कोण आहे हे माहिती नसताना चित्राविषयी दिलेला अभिप्राय अधिक योग्य नाही का ? असे जर असेल, तर ज्या कलाकाराबद्दल तुम्हाला काहीही माहिती नाही त्याच्या चित्राबद्दल - (ते केजी तून वरच्या वर्गात..... वगैरे) अशी तद्दन खालच्या दर्जाची टवाळ टिप्पणी करण्याचे धार्ष्ट्य मला अचंबित करुन गेले! अशा वेळी खरेतर तुम्हाला ते का आवडले नाही ह्याची कारणे देता आली असती तर बरे झाले असते. दाली च्या चित्राबद्दल धनंजयने लिहिलेच आहे. त्यामुळे मी त्यावर काही भाष्य करत नाही. इंट्लेक्चुअल असणे/नसणे ह्याचाही इथे काहीही संबंध नाही. बहुतांश सर्वसाधारण लोकांना जे आवडते, त्याची आम्हाला किळस येते. ह्या तुमच्या वाक्याबद्दलही मी आपल्याला स्पष्टीकरण मागू इच्छितो. आपण असाधारण असाल त्याबद्दल आमचे काहीच म्हणणे नाही पण इतरांना सर्वसाधारण ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? जालावरच्या दुनियेत अनेक पात्रे वावरत असतात त्यांची काहीही ओळख नसताना त्यांचा असा उपमर्द करण्याचे काहीही कारण आम्हाला दिसत नाही. चतुरंग

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर Wed, 03/05/2008 - 09:54
अशी तद्दन खालच्या दर्जाची टवाळ टिप्पणी करण्याचे धार्ष्ट्य मला अचंबित करुन गेले! अशा वेळी खरेतर तुम्हाला ते का आवडले नाही ह्याची कारणे देता आली असती तर बरे झाले असते. सहमत आहे... ह्या तुमच्या वाक्याबद्दलही मी आपल्याला स्पष्टीकरण मागू इच्छितो. आपण असाधारण असाल त्याबद्दल आमचे काहीच म्हणणे नाही पण इतरांना सर्वसाधारण ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? सहमत आहे.. आमच्या फारिदा खानुमच्या आज़ जाने की जि़द ना करो या गाण्यावरील लेखालाही सर्कीटने काही कारण नसताना मिपावरील वाचकांना ऐरेगैरे म्हटल्याचे आठवते! माझ्या मते सर्कीटरावांनी वारंवार असा भिकारचोटपणा करू नये...ते शहाणे असतील/आहेत तर त्यांच्या घरचे! असो, तात्या.

In reply to by चतुरंग

सर्किट Wed, 03/05/2008 - 22:32
ह्या तुमच्या वाक्याबद्दलही मी आपल्याला स्पष्टीकरण मागू इच्छितो. आपण असाधारण असाल त्याबद्दल आमचे काहीच म्हणणे नाही पण इतरांना सर्वसाधारण ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? "सर्वसाधारण" ह्या शब्दामुळे आपला गैरसमज झाला असावा असे वाटते. मला "नॉर्मल" ला दुसरा शब्द सापडला नाही. मला कुणाचाही उपमर्द करायचा नव्हता. - सर्किट

सुधीर कांदळकर Tue, 03/04/2008 - 14:03
भाषा असते. मोराचे चित्र सुरेख आहे. निसर्ग (झाड आणी मोर) आणि कल्पना (पिसा-याचे अनोखे, वेगळे रंग, भौमितीक आकृत्या) यांची मनोहर सरमिसळ (पुन्हा मिसळच) झालेली आहे. मला देखील चित्रातले फारसे कळत नाही. परंतु जसे भिडले तसे लिहिले. मिपावरील नव्या चित्रकार सदस्याताईनी रसास्वाद लिहिला तर बरे होईल. माझ्या मडक्यात किती शिरले ते तरी कळेल. धन्यवाद. शुभेच्छा.

चित्तरंजन भट Tue, 03/04/2008 - 14:49
सुंदर चित्र आहे. फ्लिकरदुव्यावरील इतर चित्रे, प्रकाशचित्रेदेखील बघितली. आवडली. धन्यवाद!

विजुभाऊ Tue, 03/04/2008 - 15:22
सृष्टीलावण्य ताई महोदया, "चित्रकारीला वयाचे बंधन नसते आणि ती समजून घ्यायला वकूब लागतो. जो दुर्दैवाने परमेश्वराने प्रत्येकालाच दिलेला असतो असे नाही. पण आपल्या मर्यादा ज्याने त्याने स्वत:च ओळखल्या पाहिजेत. नाहीतर लोक म्हणतात. "गा.गु.च.का."" मला पहील्या दोन ओळी कळाल्या.... पण तिसर्या ओळीत "गा.गु.च.का."" लिहिले आहे "गा.गु.च.का."" म्हणजे काय...( तात्यानु बघतांव ना आमचो मराठी भाषेचो घोळ.....) तुमचो एक अज्ञानी मराठी पात्राव विजुभाऊ

लिखाळ Tue, 03/04/2008 - 21:03
वा .. रवी परांजप्यांची बाकीची चित्रे सुद्धा त्यांच्या संकेतस्थळावर जावून पाहिली. फारच छान आहेत. चित्रकलेतल्या विविध शैलींविषयी आपण काही लिहिलेत तर वाचायला आवडेल. -- लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

मदनबाण Wed, 03/05/2008 - 11:26
मोराचे चित्र अतिशय सुंन्दर आहे.मोराची मान,डोळे आणि डोक्यावरील तुरा तर फारच आवडला. चित्राची रंगसंगती अतिशय सुंदर आहे. सृष्टिलावण्यजी या सुंदर चित्र मि.पा वर दिल्या बद्धल आपल्याला धन्यवाद..... आपल्या इथे फक्त अनवाणी चालणारे आणि हिंदु देव-देवतांची नग्न चित्रे काढणारे तथाकथित चित्रकारांचा बोलबाला आहे !!!!!आणि अशा या चित्रकाराची अन्य चित्रे (सर्व सामान्यांना समजणारी ?) कोट्यावधी रुपयांच्या लिलावांनी विकली जातात...(यातील बहुसंख्य चित्रे पाहिल्या नंतर त्या चित्रांचा विषय कोणता असतो हे समजण्यासाठी बहुतेक चित्रकलेत पी.एच.डी करावी लागेल.....) (राजा रविवर्मा,दीनानाथ दलाल,रघुवीर मुळगावकर यांचा चित्र भक्त) मदनबाण

नंदन Wed, 03/05/2008 - 11:49
हा ओढून-ताणून लावलेला किंवा बादरायण संबंध असेल, पण या चित्राच्या वरील अर्ध्या भागात झाडाच्या सुकलेल्या, रंगहीन फांद्यांचा मोरासारखा (तुर्‍याच्या जागी पांढरी फुले, फांद्यांचा 'पिसारा' खाली झुकलेला) आकार आहे आणि त्याची आरशातली प्रतिमा वाटावी असा रंगीत मोर खाली. चित्राच्या डावीकडे दोघांची सरमिसळ झालेली. [अर्थात, यातून अनेक प्रतीकात्मक अर्थ काढता येतील.] चित्रकलेत मला मल्लखांबाइतकीच गती (किंवा तिचा अभाव) आहे, त्यामुळे हे निरीक्षण कितपत बरोबर आहे, ते माहीत नाही.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

रवि परांजपे ह्यांची... mor त्यांची इतर चित्रे पण छान आहेत... एक मराठी कलाकार म्हणून त्यांच्याबद्दल अभिमान आणि ममत्व वाटते... त्यांच्या चित्रांची मी पंखा आहे...

दिल्लीदरबारची मटनबिर्याणी!!

पिवळा डांबिस ·

केशवराव Sun, 03/02/2008 - 19:28
एक ' दिल्लीदरबार ' ग्रॅण्टरोडवर होते. चिकन तंदुरी काय झकास मिळायची ! आठवणही नकोशी वाटते. ----------------- केशवराव.

In reply to by केशवराव

बेसनलाडू Mon, 03/03/2008 - 06:51
नॉवेल्टी सिनेमावरून कामाठीपुर्‍याच्या दिशेने सरळ काही अंतर चालून गेले की की उजव्या हातास 'दिल्ली दरबार' लागते. मस्तच जेवण मिळते. त्यांचीच एक शाखा पिडांकाका म्हणतात त्याप्रमाणे रीगलजवळ आहे. (स्मरणशील)बेसनलाडू

प्रभाकर पेठकर Sun, 03/02/2008 - 20:58
श्री. तात्या, 'आजची पाककृती' हे शीर्षक दिशाभूल करणारे आहे. कारण त्याखाली दाखविलेल्या बिर्याणीची पाककृती मिपावर दिसत नाही. एकतर पाककृती द्यावी अथवा 'आजचा खाद्यपदार्थ' असे शीर्षक द्यावे.

सर्किट Mon, 03/03/2008 - 07:05
हे म्हणजे प्यारिसला नववारी संस्कृती शोधण्यासारखे झाले. हैदराबादच्या ओल्ड टावून मध्ये बादशाहची बिर्याणी खावी. उगाच मुंबईत बिर्याणी शोधू नये. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू Mon, 03/03/2008 - 08:20
दिल्ली दरबारची चाखली नसेल तर चाखून पहावी. आणि दुसरी बडे मियाँकडची. अवांतर - वरिजिनल हैद्राबादी माणसाने मुंबईत येऊन वरिनजल हैद्राबादी बिर्याणी बनवली, तर हैद्राबादला जावे की मुंबईत खावे? (आस्वादक)बेसनलाडू

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Mon, 03/03/2008 - 08:41
उगाच मुंबईत बिर्याणी शोधू नये. असहमत आहे. दिल्ली दरबारला खास लखनवी थाटाची उत्तम बिर्याणी मिळते. हैदराबादच्या ओल्ड टावून मध्ये बादशाहची बिर्याणी खावी. मी हैदराबादेतही बिर्याणी खाल्ली आहे आणि बिर्याणीचं माहेरघर असलेल्या लखनऊमध्येही उत्तम बिर्याणी खाल्ली आहे... तात्या.

विसोबा खेचर Mon, 03/03/2008 - 08:46
कमीतकमी हाटेलाची तरी माहिती दे. आपल्याकडे मुंबईकरेतर बरेच आहेत, कधी मुंबईत आले तर त्यांना उपयोगी पडेल!! फॉकलन्डरोडच्या नाक्याला, गोलदेवळाजवळ हे हाटेल आहे...माझ्या माहितीप्रमाणे मेट्रो, माहिम येथेही शाखा आहेत. त्या परिसरातली आमची ऐश करायची आवडती ठिकाणं दोन, एक हे आणि दुसरं "कॉपर चिमनी", बोरीबंदर स्टेशनच्या पाठीमागे असलेलं! माझ्या माहितीप्रमाणे वरळीला नेहरू सेंटरच्या जवळ कॉपर चिमनी हे हॉटेल आहे. बोरीबंदरचं कॉपरचिमनी मला माहिती नाही... असो... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पिवळा डांबिस गुरुवार, 03/06/2008 - 00:19
माझ्या माहितीप्रमाणे वरळीला नेहरू सेंटरच्या जवळ कॉपर चिमनी हे हॉटेल आहे. बोरीबंदरचं कॉपरचिमनी मला माहिती नाही... बरोबर! मी सांगत असलेलं कॉपर चिमनी हे त्यांचीच शाखा आहे. मला बोरीबंदरच्या ठिकाणाच्या रस्त्याचे नक्की नांव आता आठवत नाही पण त्याचे प्रवेशद्वार तस्सेच तांब्याच्या पत्र्याने मढविलेले आहे. बोरीबंदरवरच्या फेरीवाल्यांना जर "लाल दरवाजेका होटल" म्हणून विचारले तर ते सांगतात... -डांबिस

विजुभाऊ Mon, 03/03/2008 - 13:10
तात्या नुसत्या फोटो वरुन पदार्थ कसे करयचे याचा क्लास काढायाचा ठरवतोय मी आणि पिवळा डांबिस काका...... तुम्च्या अशा फोटो पाक क्रुती अजुन येवुद्यात्....आमचा क्लास जोरात चालेल्...(हो ....तुमचे जे काय असेल ते ठरवुया.....)

सुधीर कांदळकर Tue, 03/04/2008 - 13:18
आहे. त्यांचीच शाखा रीगलसमोर आहे. नामांकित ५ तारांकित हॉटेलातील चोखंदळ प्रवासी येथीलच बिर्यानी खातात. मुख्य म्हणजे नोव्हेल्टीच्या समोरील हॉटेलात गावठी कोंबडी देखील मिळते. दिल्ली दरबारची रुमाली रोटी पण छान असते. खिमा पण छानअसतो. आणि गाजर हलवा वेगळा पण सुरेख. असा गाजर हलवा फक्त आमच्या घरी होतो. माहीमला फक्त 'पार्सल' मिळते. खाण्यासाठी जागा नाही. वरळी नाक्याला एक इराणी आहे. त्याच्याकडील खिमापाव व पानी कम चहा उत्कृष्ट. अख्ख्या मुंबईत असा चहा कोठे मिळत नाही. पण थोडा असतो. म्हणून ३ - ४ कप प्यावा लागतो. गिरगाव चौपाटीला क्रीम सेंटर मध्ये ट्रिपल संडे आईसक्रीम छान मिळते. वरळीला (नायलॉक हाऊस) 'क्वालिटी' नावाचे रेस्टॉरंट आहे. तेथील ट्रिपल संडे पण अप्रतिम. येथे देखील एक कॉपर चिमनी आहे. फुले (क्रॉफर्ड) मार्केटसमोर बादशाही कोल्ड्रिंक हाऊस आहे. येथील फालूदा उत्तम. पेडररोडजवईल चायना टाऊन मध्ये तसेच वरळीच्या फ्लोरामध्ये आणी शिवाजी पार्क च्या जिप्सी मध्ये चायनीज पदार्थ सुरेख. दादरला सेना भवनाजवळ प्रकाश आणि आस्वाद अशी दोन रेस्टॉरंट्स आहेत. मराठमोळे पदार्थ येथे छान मिळतात. प्रकाशम्ध्ये वांगीभात आणि मिसळ आणि आस्वादमध्ये रस्सा. प्रकाशमधे आणखी एक गंमत आहे. महाशिवरात्र, आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दिवशी येथे फक्त उपासाचे पदार्थ मिळतात. उपास न करणारांचीच गर्दी जास्त असते. मासे इ. समुद्री पदार्थ खाण्यासाठी बरीच हॉटेले आहेत. जंत्री देता येत नाही. फार लांबलचक होईल. जीपीओ जवळ 'भारत', दादरला सिंधुदुर्ग, सचीन, परेलला बरीच आहेत. माहीमला गोवा पोर्तुगीझा, इ. इ. अट्टल मुंबईकर

संजय अभ्यंकर Wed, 03/05/2008 - 22:37
पुना कॉफी हाऊसच्यामागे (बोळात) छान बिर्याणी मिळते (केशरी बिर्याणी). उ. गृहाचे नांव तृष्णाज बिर्याणी हाउस. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

केशवराव Sun, 03/02/2008 - 19:28
एक ' दिल्लीदरबार ' ग्रॅण्टरोडवर होते. चिकन तंदुरी काय झकास मिळायची ! आठवणही नकोशी वाटते. ----------------- केशवराव.

In reply to by केशवराव

बेसनलाडू Mon, 03/03/2008 - 06:51
नॉवेल्टी सिनेमावरून कामाठीपुर्‍याच्या दिशेने सरळ काही अंतर चालून गेले की की उजव्या हातास 'दिल्ली दरबार' लागते. मस्तच जेवण मिळते. त्यांचीच एक शाखा पिडांकाका म्हणतात त्याप्रमाणे रीगलजवळ आहे. (स्मरणशील)बेसनलाडू

प्रभाकर पेठकर Sun, 03/02/2008 - 20:58
श्री. तात्या, 'आजची पाककृती' हे शीर्षक दिशाभूल करणारे आहे. कारण त्याखाली दाखविलेल्या बिर्याणीची पाककृती मिपावर दिसत नाही. एकतर पाककृती द्यावी अथवा 'आजचा खाद्यपदार्थ' असे शीर्षक द्यावे.

सर्किट Mon, 03/03/2008 - 07:05
हे म्हणजे प्यारिसला नववारी संस्कृती शोधण्यासारखे झाले. हैदराबादच्या ओल्ड टावून मध्ये बादशाहची बिर्याणी खावी. उगाच मुंबईत बिर्याणी शोधू नये. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू Mon, 03/03/2008 - 08:20
दिल्ली दरबारची चाखली नसेल तर चाखून पहावी. आणि दुसरी बडे मियाँकडची. अवांतर - वरिजिनल हैद्राबादी माणसाने मुंबईत येऊन वरिनजल हैद्राबादी बिर्याणी बनवली, तर हैद्राबादला जावे की मुंबईत खावे? (आस्वादक)बेसनलाडू

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Mon, 03/03/2008 - 08:41
उगाच मुंबईत बिर्याणी शोधू नये. असहमत आहे. दिल्ली दरबारला खास लखनवी थाटाची उत्तम बिर्याणी मिळते. हैदराबादच्या ओल्ड टावून मध्ये बादशाहची बिर्याणी खावी. मी हैदराबादेतही बिर्याणी खाल्ली आहे आणि बिर्याणीचं माहेरघर असलेल्या लखनऊमध्येही उत्तम बिर्याणी खाल्ली आहे... तात्या.

विसोबा खेचर Mon, 03/03/2008 - 08:46
कमीतकमी हाटेलाची तरी माहिती दे. आपल्याकडे मुंबईकरेतर बरेच आहेत, कधी मुंबईत आले तर त्यांना उपयोगी पडेल!! फॉकलन्डरोडच्या नाक्याला, गोलदेवळाजवळ हे हाटेल आहे...माझ्या माहितीप्रमाणे मेट्रो, माहिम येथेही शाखा आहेत. त्या परिसरातली आमची ऐश करायची आवडती ठिकाणं दोन, एक हे आणि दुसरं "कॉपर चिमनी", बोरीबंदर स्टेशनच्या पाठीमागे असलेलं! माझ्या माहितीप्रमाणे वरळीला नेहरू सेंटरच्या जवळ कॉपर चिमनी हे हॉटेल आहे. बोरीबंदरचं कॉपरचिमनी मला माहिती नाही... असो... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पिवळा डांबिस गुरुवार, 03/06/2008 - 00:19
माझ्या माहितीप्रमाणे वरळीला नेहरू सेंटरच्या जवळ कॉपर चिमनी हे हॉटेल आहे. बोरीबंदरचं कॉपरचिमनी मला माहिती नाही... बरोबर! मी सांगत असलेलं कॉपर चिमनी हे त्यांचीच शाखा आहे. मला बोरीबंदरच्या ठिकाणाच्या रस्त्याचे नक्की नांव आता आठवत नाही पण त्याचे प्रवेशद्वार तस्सेच तांब्याच्या पत्र्याने मढविलेले आहे. बोरीबंदरवरच्या फेरीवाल्यांना जर "लाल दरवाजेका होटल" म्हणून विचारले तर ते सांगतात... -डांबिस

विजुभाऊ Mon, 03/03/2008 - 13:10
तात्या नुसत्या फोटो वरुन पदार्थ कसे करयचे याचा क्लास काढायाचा ठरवतोय मी आणि पिवळा डांबिस काका...... तुम्च्या अशा फोटो पाक क्रुती अजुन येवुद्यात्....आमचा क्लास जोरात चालेल्...(हो ....तुमचे जे काय असेल ते ठरवुया.....)

सुधीर कांदळकर Tue, 03/04/2008 - 13:18
आहे. त्यांचीच शाखा रीगलसमोर आहे. नामांकित ५ तारांकित हॉटेलातील चोखंदळ प्रवासी येथीलच बिर्यानी खातात. मुख्य म्हणजे नोव्हेल्टीच्या समोरील हॉटेलात गावठी कोंबडी देखील मिळते. दिल्ली दरबारची रुमाली रोटी पण छान असते. खिमा पण छानअसतो. आणि गाजर हलवा वेगळा पण सुरेख. असा गाजर हलवा फक्त आमच्या घरी होतो. माहीमला फक्त 'पार्सल' मिळते. खाण्यासाठी जागा नाही. वरळी नाक्याला एक इराणी आहे. त्याच्याकडील खिमापाव व पानी कम चहा उत्कृष्ट. अख्ख्या मुंबईत असा चहा कोठे मिळत नाही. पण थोडा असतो. म्हणून ३ - ४ कप प्यावा लागतो. गिरगाव चौपाटीला क्रीम सेंटर मध्ये ट्रिपल संडे आईसक्रीम छान मिळते. वरळीला (नायलॉक हाऊस) 'क्वालिटी' नावाचे रेस्टॉरंट आहे. तेथील ट्रिपल संडे पण अप्रतिम. येथे देखील एक कॉपर चिमनी आहे. फुले (क्रॉफर्ड) मार्केटसमोर बादशाही कोल्ड्रिंक हाऊस आहे. येथील फालूदा उत्तम. पेडररोडजवईल चायना टाऊन मध्ये तसेच वरळीच्या फ्लोरामध्ये आणी शिवाजी पार्क च्या जिप्सी मध्ये चायनीज पदार्थ सुरेख. दादरला सेना भवनाजवळ प्रकाश आणि आस्वाद अशी दोन रेस्टॉरंट्स आहेत. मराठमोळे पदार्थ येथे छान मिळतात. प्रकाशम्ध्ये वांगीभात आणि मिसळ आणि आस्वादमध्ये रस्सा. प्रकाशमधे आणखी एक गंमत आहे. महाशिवरात्र, आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दिवशी येथे फक्त उपासाचे पदार्थ मिळतात. उपास न करणारांचीच गर्दी जास्त असते. मासे इ. समुद्री पदार्थ खाण्यासाठी बरीच हॉटेले आहेत. जंत्री देता येत नाही. फार लांबलचक होईल. जीपीओ जवळ 'भारत', दादरला सिंधुदुर्ग, सचीन, परेलला बरीच आहेत. माहीमला गोवा पोर्तुगीझा, इ. इ. अट्टल मुंबईकर

संजय अभ्यंकर Wed, 03/05/2008 - 22:37
पुना कॉफी हाऊसच्यामागे (बोळात) छान बिर्याणी मिळते (केशरी बिर्याणी). उ. गृहाचे नांव तृष्णाज बिर्याणी हाउस. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
ओ तात्या, नुसता फोटो दाखवून जळवण्यात कसलं आलंय रे "सौजन्य"? :) आजची पाककृतीमध्ये बिर्याणीचा फोटू देतोस, पण बाकी काही माहिती (जमल्यास रेसिपी) वगैरे दे ना बाबा! कमीतकमी हाटेलाची तरी माहिती दे. आपल्याकडे मुंबईकरेतर बरेच आहेत, कधी मुंबईत आले तर त्यांना उपयोगी पडेल!! हे दिल्लीदरबार म्हणजे रीगलच्या जवळचं का रे? एकदम झक्कास हाटेल आहे. थोडं महागडं, पण पदार्थ आणि एकूणच सेट्-अप मस्त आहे!! आम्ही हेक्स्ट्-हाऊसमध्ये असतांना आमचे खायचे (अर्थात कंपनीच्या खर्चाने!) ते आवडते ठिकाण होते. अजून ते आहे हे ऐकून जुना दोस्त भेटल्याचा आनंद झाला. मि. पा.

लेखनानुसार प्रतिसादाचा ट्रॅकर..

सरपंच ·
मिपाच्या मुखपृष्ठाचे काम अजूनही सुरू आहे. तरी तूर्तास लेखनानुसार प्रतिसादांचा ट्रॅकर पाहण्यासाठी कृपया डाव्या हाताच्या समासातील नवे लेखन इथे टिचकी मारा. धन्यवाद....

काही वादविवाद...("का रे भुललासि " या आमच्याच आगामी दीर्घांकातील एक भाग)

भडकमकर मास्तर ·

भडकमकर मास्तर Mon, 03/03/2008 - 01:20
ते असो, हे लेखन सुचायचे कारण म्हणजे ९२ किंवा ९३ साली पुण्यातील एका प्रसिद्ध कॉलेजातील कॅम्पस मध्ये भर दिवसा एका विद्यार्थ्याने आपल्या मैत्रिणीला पिस्तुलातून गोळी चालवून ठार केले होते...आता डीटेल्स आठवत नाहीत पण त्या काळात घटना फारच धक्कादायक वाटली होती हे ही खरे....... मग समजा त्याच जोडीला आदर्श जोडी मानणार्‍या एका दुसर्‍या जोडीवर याचा कसा कसा परिणाम होईल, हा विचार करता करता वरील दीर्घांक सुचला आहे...

In reply to by भडकमकर मास्तर

धम्मकलाडू Tue, 12/30/2008 - 13:19
ते असो, हे लेखन सुचायचे कारण म्हणजे ९२ किंवा ९३ साली पुण्यातील एका प्रसिद्ध कॉलेजातील कॅम्पस मध्ये भर दिवसा एका विद्यार्थ्याने आपल्या मैत्रिणीला पिस्तुलातून गोळी चालवून ठार केले होते... आता डीटेल्स आठवत नाहीत
तन्वी (की जान्हवी?) तुपे या मैत्रिणीला ज्याने गोळी घालून आत्महत्या केली तो प्रसन्न पंडित. ही आमदार विठ्ठल तुपे यांची मुलगी. प्रसन्न पंडितच्या कुटुंबाची कहाणी एकंदरच दुर्दैवी... पुन्हा कधीतरी...
पण त्या काळात घटना फारच धक्कादायक वाटली होती हे ही खरे....... मग समजा त्याच जोडीला आदर्श जोडी मानणार्‍या एका दुसर्‍या जोडीवर याचा कसा कसा परिणाम होईल, हा विचार करता करता वरील दीर्घांक सुचला आहे..
. दीर्घांकाला शुभेच्छा. () धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

धनंजय Mon, 03/03/2008 - 01:51
संवादाची शैली आवडली. पण प्रतिसाद काय द्यायचा त्याबद्दल थोडा किंकार्यविमूढ आहे. साहित्यिक प्रतिसाद हा की नक्कीच आवडले. संवाद अत्यंत पटण्यासारखे उतरले आहेत.या पात्रांच्याविषयी कुतुहल जागे झाले आहे. पण एका विशिष्ट जोडप्यातील खटका चित्रित करणे हा तुमचा नाट्यप्रवेशामागचा हेतू नाही, हे स्पष्ट दिसत आहे. उलट तुम्हाला "महत्त्वाकांक्षा विरुद्ध अल्पसंतोष" या मोठ्या मुद्द्याला हात घालायचा आहे. आणि मला वाटते की तुम्ही "तो 'अल्प' नसून खराखरचा संतोष आहे", आणि "महत्त्वाकांक्षा ही घातक आहे" अशा दोन निष्कर्षांप्रत पोचता. हे या विशिष्ट पात्रांच्याबाबतीत खरे असू शकेल असे वाटते, यात तुमचे साहित्यिक कौशल्य आहे. पण माझ्या मते या पात्रांच्या पलिकडे तुम्ही मला हे निष्कर्ष पटवू शकले नाहीत. माधवी ही एक सौम्य लेडी मॅक्बेथ आहे, तिच्यामध्ये खूप स्त्रियांचे सामान्यीकरण थोडेफार जमते [मला पटत नाही तरी]. मनीष मॅक्बेथसारखा इरेला पेटतो, की नाही, ते आपल्याला या प्रवेशात कळत नाही, तो अजून निराशेतच बोलतो आहे. सुमेध हा केवळ एक माथेफिरू युवक असू शकतो - त्याचे कुठलेच सामान्यीकरण करता येत नाही. त्याची व्यक्तिरेखा मनीष-माधवींच्या बोलण्यात हवी तेवढी खुललेली नाही. माधवीला "पॉझिटिव्ह" वाटणारा, "धट्टीकट्टी श्रीमंती"चा उदाहरण वाटणारा सुमेध हा माथेफिरू का - याचा तार्किक संबंध लागत नाही. माधवीला व्यक्तिपरीक्षा नीट करता येत नसेल, तर सुमेधचा खरा परिचय करून देणारे एखादे पात्र या नाट्यप्रवेशात यायला हवे होते. असो. मला खुद्द अल्पसंतोष/अतिमहत्त्वाकांक्षा अशी टोकाची वर्गीकरणे खर्‍या आयुष्यात पसंत नाहीत, पण नाटकात जरूर चालवून घेईन. पण ती वर्गीकरणे तुम्ही अधिक पटवायला पाहिजेत.

भडकमकर मास्तर Mon, 03/03/2008 - 02:30
उलट तुम्हाला "महत्त्वाकांक्षा विरुद्ध अल्पसंतोष" या मोठ्या मुद्द्याला हात घालायचा आहे. आणि मला वाटते की तुम्ही "तो 'अल्प' नसून खराखरचा संतोष आहे", आणि "महत्त्वाकांक्षा ही घातक आहे" अशा दोन निष्कर्षांप्रत पोचता. अचूक्...परफेक्ट........इतक्या मोजक्या शब्दांत मलासुद्धा हे सांगता आलं नसतं. पण माझ्या मते या पात्रांच्या पलिकडे तुम्ही मला हे निष्कर्ष पटवू शकले नाहीत. मान्य....पण या पात्रांपुरते तरी असे निष्कर्ष जाणवले , हे ही खूपच झाले.. :) माधवीला "पॉझिटिव्ह" वाटणारा, "धट्टीकट्टी श्रीमंती"चा उदाहरण वाटणारा सुमेध हा माथेफिरू का - याचा तार्किक संबंध लागत नाही. माधवीला व्यक्तिपरीक्षा नीट करता येत नसेल, तर सुमेधचा खरा परिचय करून देणारे एखादे पात्र या नाट्यप्रवेशात यायला हवे होते. आक्षेप मान्य, त्यावरील सोल्यूशनही विचार करायला लावणारे.... ( तो अति पझेसिव आहे, आणि कदाचित संशय घेऊन माथेफिरूपणे तो तिला मारतो, अशी गोष्ट डोक्यात ठेवून लिहिले...( आठवणीतील मूळ घटना वर लिहिलीच आहे)पण एकदा मारण्याच्या कारणांचे डीटेल्स द्यायला लागलो की मुख्य गोष्ट त्याच्याशी संबंधित नाही , त्याचा फापटपसारा वाढायचा धोका संभवतो, असे वाटले होते) असो. मला खुद्द अल्पसंतोष/अतिमहत्त्वाकांक्षा अशी टोकाची वर्गीकरणे खर्‍या आयुष्यात पसंत नाहीत, पण नाटकात जरूर चालवून घेईन. पण ती वर्गीकरणे तुम्ही अधिक पटवायला पाहिजेत. मलाही टोकाची वर्गीकरणे आवडत नाहीत.... सगळ्या बायका अश्या असतात किंवा सगळे पुरुष असेच असतात , असली.... कथेमध्ये तेवढी पात्रे त्या त्या स्वभावाची आहेत असे समजावे झाले...आणि वरील पात्रे शेवटी का होईना आपापल्या चुका समजून घ्यायच्या प्रयत्नांत आहेत, निदान असा एखादा प्रसंग त्यांना स्वतःला आणि जोडीदाराला समजून घ्यायला मदत करतो, इतकेच अपेक्षित....

मनिष Mon, 03/03/2008 - 10:23
मला फारच आवडले हे...फक्त सुमेधकडून हत्या हे खूपच "far fetched" वाटले. तो प्रसंग मलाही माहित आहे, पण त्याचा इथे संबंध नाही (नसावा) असे वाटते. सुमेधच्या महत्वा़कांक्षी स्वभावाला फुट्णारे काटे वेगळ्या पद्ध्तीने दाखवता येतील का ते बघ (अरे-तुरे चालेल ना? मला राव, पंत, अहो जाहो चा वीट आला आहे).

भडकमकर मास्तर Tue, 03/04/2008 - 00:03
अरे-तुरे चालेल ना? अरे तुरे अगदी लई वेळा चालेल....तेच बेष्ट.. सुमेधकडून हत्या हे खूपच "far fetched" वाटले आता मलाही तसंच का वाटायला लागलंय ?? बर्‍याच जणांनी अशी प्रतिक्रिया दिली, त्यांना मी माझ्या कॉलेज-काळात घडलेला तो प्रसंग सांगतो आणि हे शक्य आहे की नाही ते विचारतो....ते म्हणतात, शक्य आहे पण त्याची गरज नाहीये ना या गोष्टीला.... :) सुमेधच्या महत्वा़कांक्षी स्वभावाला फुट्णारे काटे वेगळ्या पद्ध्तीने दाखवता येतील का ते बघ हो, शक्य आहे,...पण ते सांगताना फोकस हलायला नको म्हणून मी त्याबद्दल बोललोच नाही....असो...यदाकदाचित ही गोष्ट दोन अंकी करायचे ठरले तर हा अँगल चांगला वाटेल......धन्यवाद...

अभिज्ञ Tue, 03/04/2008 - 02:21
हि घटना ९३-९४ मधे फर्गसन महाविद्यालयात घडल्याचे स्मरणात आहे. ले़खकाने ह्या घटनेच्या पार्श्वभुमिवर केलेलि नाट्यनिर्मिती एक वेगळाच अनुभव देउन जाते. वातावरण निर्मिती उत्क्रुष्टा जमवलि आहे. दोन्हि पात्रा॑मधले स॑वाद अप्रतिम लिहिले आहेत. काहि जणाना नाटकाच्या शेवटी आलेले अनपेक्षित वळण थोडेसे अवघड वाटत असेल,परन्तु नाट़काचा हा एक छोटासा भाग असल्याने त्यावर एकदम भाष्य करणे योग्य होणार नाही. आणि जर नाटकाच्या परिभाषेत बोलायचे झाले तर ह्यात वावगे असे काहि वाटत नाहि. भडकमकर साहेब,आगे बढो.अशाच उत्तम उत्तम कलाक्रुति येउ द्यात. आमच्या सारख्या मराठि मातिपासून दूर राहणार्याना हे "नाट्य वाचन" एक सुखद अनुभव देउन जाते. आणी गूळाने मुन्गळाचि वाट कशाला बघायचि? (एक मराठि नाट्यवेडा) अबब.

आंबोळी Tue, 03/04/2008 - 11:54
अबब अत्यन्त मोलाच सल्ला दिलात सतलजला ! आसो. " हट्टिकट्टि गरीबी आनि लुळीपान्गळी श्रिमन्ति " हाच मुद्दा माझ्या द्रुश्तिने अधोरेखित होतो आहे. ( माझ्या अल्प्बुध्धिचा दोश) . पन वर उल्लेखिल्याप्रमाने शेवटचा टर्न फारच शार्प आसल्यने प्रेसेन्टेशन बाळबोध वाटते. सुमेध - सानिक ही पात्रे म्हणावी तेवधी एस्टब्लिश होत नाहीत. त्यामुळे खून पचायला अवघड जातोय. " अति पझेसिव " पणा खुलवून सुमेधच्या महत्वा़कांक्षी स्वभावाला फुट्णारे काटे वेगळ्या पद्ध्तीने दाखवले आसते तर आजुन मजा आली आसती असे वाटते. असो. मनिश-माधवी यान्चे सन्वाद छान जमले आहेत. पण त्यान्च्या सन्वादाच प्रवाह शेवटी कुठे जाणार ते लक्शात येते.... एन्ड प्रेडीक्टेबल वाटतो. (कदाचित तुला धक्का द्यायचा नसेल....). पण दोघानची पात्रे छान जमुन आलि आहेत. दीर्घांन्काच्या द्रुश्टिने विचार्करता विषय , पात्रे , सन्वाद चान्गले जमले आहेत. याचा प्रयोग कधी करणार आहात ते जरूर कळवा.... आम्हि नक्की येउ. जाता जाता.... सुमेध्-सानिका , मनिष्-माधवी अशी यमकी नावे वाचुन ६०-७० च्या दशकातिल बा-वाचकाची निद्रादेवीच्या राज्यात प्रवेश्याची सोय करणारी पुस्तके आणि त्यातील पात्रे आठवून पुन्हप्रत्ययाच आनन्द मिळाला..... धन्यवाद!

भडकमकर मास्तर Wed, 03/05/2008 - 00:16
जाता जाता.... सुमेध्-सानिका , मनिष्-माधवी अशी यमकी नावे वाचुन ६०-७० च्या दशकातिल बा-वाचकाची निद्रादेवीच्या राज्यात प्रवेश्याची सोय करणारी पुस्तके आणि त्यातील पात्रे आठवून पुन्हप्रत्ययाच आनन्द मिळाला..... धन्यवाद! हाहाहाहा...हे पटले.... आमची पात्रांची नावे ठरवण्यात लई टाईम जातो.... आणि टाईम घेऊनसुद्धा आम्ही हे असे करतो... ...सगळे वेळेत जुळून आले तर पुढल्या महिन्यात पुण्यात सुदर्शन ला प्रयोग होईल....

भडकमकर मास्तर Tue, 12/30/2008 - 01:37
प्रयोग दीर्घांक स्पर्धेमध्ये सुदर्शन रंगमंच ... दिनांक ३ जानेवारी २००८ ,दुपारी १२ वाजता.... स्पर्धेसाठीचा हा प्रयोग विनामूल्य आहे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

भडकमकर मास्तर Mon, 03/03/2008 - 01:20
ते असो, हे लेखन सुचायचे कारण म्हणजे ९२ किंवा ९३ साली पुण्यातील एका प्रसिद्ध कॉलेजातील कॅम्पस मध्ये भर दिवसा एका विद्यार्थ्याने आपल्या मैत्रिणीला पिस्तुलातून गोळी चालवून ठार केले होते...आता डीटेल्स आठवत नाहीत पण त्या काळात घटना फारच धक्कादायक वाटली होती हे ही खरे....... मग समजा त्याच जोडीला आदर्श जोडी मानणार्‍या एका दुसर्‍या जोडीवर याचा कसा कसा परिणाम होईल, हा विचार करता करता वरील दीर्घांक सुचला आहे...

In reply to by भडकमकर मास्तर

धम्मकलाडू Tue, 12/30/2008 - 13:19
ते असो, हे लेखन सुचायचे कारण म्हणजे ९२ किंवा ९३ साली पुण्यातील एका प्रसिद्ध कॉलेजातील कॅम्पस मध्ये भर दिवसा एका विद्यार्थ्याने आपल्या मैत्रिणीला पिस्तुलातून गोळी चालवून ठार केले होते... आता डीटेल्स आठवत नाहीत
तन्वी (की जान्हवी?) तुपे या मैत्रिणीला ज्याने गोळी घालून आत्महत्या केली तो प्रसन्न पंडित. ही आमदार विठ्ठल तुपे यांची मुलगी. प्रसन्न पंडितच्या कुटुंबाची कहाणी एकंदरच दुर्दैवी... पुन्हा कधीतरी...
पण त्या काळात घटना फारच धक्कादायक वाटली होती हे ही खरे....... मग समजा त्याच जोडीला आदर्श जोडी मानणार्‍या एका दुसर्‍या जोडीवर याचा कसा कसा परिणाम होईल, हा विचार करता करता वरील दीर्घांक सुचला आहे..
. दीर्घांकाला शुभेच्छा. () धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

धनंजय Mon, 03/03/2008 - 01:51
संवादाची शैली आवडली. पण प्रतिसाद काय द्यायचा त्याबद्दल थोडा किंकार्यविमूढ आहे. साहित्यिक प्रतिसाद हा की नक्कीच आवडले. संवाद अत्यंत पटण्यासारखे उतरले आहेत.या पात्रांच्याविषयी कुतुहल जागे झाले आहे. पण एका विशिष्ट जोडप्यातील खटका चित्रित करणे हा तुमचा नाट्यप्रवेशामागचा हेतू नाही, हे स्पष्ट दिसत आहे. उलट तुम्हाला "महत्त्वाकांक्षा विरुद्ध अल्पसंतोष" या मोठ्या मुद्द्याला हात घालायचा आहे. आणि मला वाटते की तुम्ही "तो 'अल्प' नसून खराखरचा संतोष आहे", आणि "महत्त्वाकांक्षा ही घातक आहे" अशा दोन निष्कर्षांप्रत पोचता. हे या विशिष्ट पात्रांच्याबाबतीत खरे असू शकेल असे वाटते, यात तुमचे साहित्यिक कौशल्य आहे. पण माझ्या मते या पात्रांच्या पलिकडे तुम्ही मला हे निष्कर्ष पटवू शकले नाहीत. माधवी ही एक सौम्य लेडी मॅक्बेथ आहे, तिच्यामध्ये खूप स्त्रियांचे सामान्यीकरण थोडेफार जमते [मला पटत नाही तरी]. मनीष मॅक्बेथसारखा इरेला पेटतो, की नाही, ते आपल्याला या प्रवेशात कळत नाही, तो अजून निराशेतच बोलतो आहे. सुमेध हा केवळ एक माथेफिरू युवक असू शकतो - त्याचे कुठलेच सामान्यीकरण करता येत नाही. त्याची व्यक्तिरेखा मनीष-माधवींच्या बोलण्यात हवी तेवढी खुललेली नाही. माधवीला "पॉझिटिव्ह" वाटणारा, "धट्टीकट्टी श्रीमंती"चा उदाहरण वाटणारा सुमेध हा माथेफिरू का - याचा तार्किक संबंध लागत नाही. माधवीला व्यक्तिपरीक्षा नीट करता येत नसेल, तर सुमेधचा खरा परिचय करून देणारे एखादे पात्र या नाट्यप्रवेशात यायला हवे होते. असो. मला खुद्द अल्पसंतोष/अतिमहत्त्वाकांक्षा अशी टोकाची वर्गीकरणे खर्‍या आयुष्यात पसंत नाहीत, पण नाटकात जरूर चालवून घेईन. पण ती वर्गीकरणे तुम्ही अधिक पटवायला पाहिजेत.

भडकमकर मास्तर Mon, 03/03/2008 - 02:30
उलट तुम्हाला "महत्त्वाकांक्षा विरुद्ध अल्पसंतोष" या मोठ्या मुद्द्याला हात घालायचा आहे. आणि मला वाटते की तुम्ही "तो 'अल्प' नसून खराखरचा संतोष आहे", आणि "महत्त्वाकांक्षा ही घातक आहे" अशा दोन निष्कर्षांप्रत पोचता. अचूक्...परफेक्ट........इतक्या मोजक्या शब्दांत मलासुद्धा हे सांगता आलं नसतं. पण माझ्या मते या पात्रांच्या पलिकडे तुम्ही मला हे निष्कर्ष पटवू शकले नाहीत. मान्य....पण या पात्रांपुरते तरी असे निष्कर्ष जाणवले , हे ही खूपच झाले.. :) माधवीला "पॉझिटिव्ह" वाटणारा, "धट्टीकट्टी श्रीमंती"चा उदाहरण वाटणारा सुमेध हा माथेफिरू का - याचा तार्किक संबंध लागत नाही. माधवीला व्यक्तिपरीक्षा नीट करता येत नसेल, तर सुमेधचा खरा परिचय करून देणारे एखादे पात्र या नाट्यप्रवेशात यायला हवे होते. आक्षेप मान्य, त्यावरील सोल्यूशनही विचार करायला लावणारे.... ( तो अति पझेसिव आहे, आणि कदाचित संशय घेऊन माथेफिरूपणे तो तिला मारतो, अशी गोष्ट डोक्यात ठेवून लिहिले...( आठवणीतील मूळ घटना वर लिहिलीच आहे)पण एकदा मारण्याच्या कारणांचे डीटेल्स द्यायला लागलो की मुख्य गोष्ट त्याच्याशी संबंधित नाही , त्याचा फापटपसारा वाढायचा धोका संभवतो, असे वाटले होते) असो. मला खुद्द अल्पसंतोष/अतिमहत्त्वाकांक्षा अशी टोकाची वर्गीकरणे खर्‍या आयुष्यात पसंत नाहीत, पण नाटकात जरूर चालवून घेईन. पण ती वर्गीकरणे तुम्ही अधिक पटवायला पाहिजेत. मलाही टोकाची वर्गीकरणे आवडत नाहीत.... सगळ्या बायका अश्या असतात किंवा सगळे पुरुष असेच असतात , असली.... कथेमध्ये तेवढी पात्रे त्या त्या स्वभावाची आहेत असे समजावे झाले...आणि वरील पात्रे शेवटी का होईना आपापल्या चुका समजून घ्यायच्या प्रयत्नांत आहेत, निदान असा एखादा प्रसंग त्यांना स्वतःला आणि जोडीदाराला समजून घ्यायला मदत करतो, इतकेच अपेक्षित....

मनिष Mon, 03/03/2008 - 10:23
मला फारच आवडले हे...फक्त सुमेधकडून हत्या हे खूपच "far fetched" वाटले. तो प्रसंग मलाही माहित आहे, पण त्याचा इथे संबंध नाही (नसावा) असे वाटते. सुमेधच्या महत्वा़कांक्षी स्वभावाला फुट्णारे काटे वेगळ्या पद्ध्तीने दाखवता येतील का ते बघ (अरे-तुरे चालेल ना? मला राव, पंत, अहो जाहो चा वीट आला आहे).

भडकमकर मास्तर Tue, 03/04/2008 - 00:03
अरे-तुरे चालेल ना? अरे तुरे अगदी लई वेळा चालेल....तेच बेष्ट.. सुमेधकडून हत्या हे खूपच "far fetched" वाटले आता मलाही तसंच का वाटायला लागलंय ?? बर्‍याच जणांनी अशी प्रतिक्रिया दिली, त्यांना मी माझ्या कॉलेज-काळात घडलेला तो प्रसंग सांगतो आणि हे शक्य आहे की नाही ते विचारतो....ते म्हणतात, शक्य आहे पण त्याची गरज नाहीये ना या गोष्टीला.... :) सुमेधच्या महत्वा़कांक्षी स्वभावाला फुट्णारे काटे वेगळ्या पद्ध्तीने दाखवता येतील का ते बघ हो, शक्य आहे,...पण ते सांगताना फोकस हलायला नको म्हणून मी त्याबद्दल बोललोच नाही....असो...यदाकदाचित ही गोष्ट दोन अंकी करायचे ठरले तर हा अँगल चांगला वाटेल......धन्यवाद...

अभिज्ञ Tue, 03/04/2008 - 02:21
हि घटना ९३-९४ मधे फर्गसन महाविद्यालयात घडल्याचे स्मरणात आहे. ले़खकाने ह्या घटनेच्या पार्श्वभुमिवर केलेलि नाट्यनिर्मिती एक वेगळाच अनुभव देउन जाते. वातावरण निर्मिती उत्क्रुष्टा जमवलि आहे. दोन्हि पात्रा॑मधले स॑वाद अप्रतिम लिहिले आहेत. काहि जणाना नाटकाच्या शेवटी आलेले अनपेक्षित वळण थोडेसे अवघड वाटत असेल,परन्तु नाट़काचा हा एक छोटासा भाग असल्याने त्यावर एकदम भाष्य करणे योग्य होणार नाही. आणि जर नाटकाच्या परिभाषेत बोलायचे झाले तर ह्यात वावगे असे काहि वाटत नाहि. भडकमकर साहेब,आगे बढो.अशाच उत्तम उत्तम कलाक्रुति येउ द्यात. आमच्या सारख्या मराठि मातिपासून दूर राहणार्याना हे "नाट्य वाचन" एक सुखद अनुभव देउन जाते. आणी गूळाने मुन्गळाचि वाट कशाला बघायचि? (एक मराठि नाट्यवेडा) अबब.

आंबोळी Tue, 03/04/2008 - 11:54
अबब अत्यन्त मोलाच सल्ला दिलात सतलजला ! आसो. " हट्टिकट्टि गरीबी आनि लुळीपान्गळी श्रिमन्ति " हाच मुद्दा माझ्या द्रुश्तिने अधोरेखित होतो आहे. ( माझ्या अल्प्बुध्धिचा दोश) . पन वर उल्लेखिल्याप्रमाने शेवटचा टर्न फारच शार्प आसल्यने प्रेसेन्टेशन बाळबोध वाटते. सुमेध - सानिक ही पात्रे म्हणावी तेवधी एस्टब्लिश होत नाहीत. त्यामुळे खून पचायला अवघड जातोय. " अति पझेसिव " पणा खुलवून सुमेधच्या महत्वा़कांक्षी स्वभावाला फुट्णारे काटे वेगळ्या पद्ध्तीने दाखवले आसते तर आजुन मजा आली आसती असे वाटते. असो. मनिश-माधवी यान्चे सन्वाद छान जमले आहेत. पण त्यान्च्या सन्वादाच प्रवाह शेवटी कुठे जाणार ते लक्शात येते.... एन्ड प्रेडीक्टेबल वाटतो. (कदाचित तुला धक्का द्यायचा नसेल....). पण दोघानची पात्रे छान जमुन आलि आहेत. दीर्घांन्काच्या द्रुश्टिने विचार्करता विषय , पात्रे , सन्वाद चान्गले जमले आहेत. याचा प्रयोग कधी करणार आहात ते जरूर कळवा.... आम्हि नक्की येउ. जाता जाता.... सुमेध्-सानिका , मनिष्-माधवी अशी यमकी नावे वाचुन ६०-७० च्या दशकातिल बा-वाचकाची निद्रादेवीच्या राज्यात प्रवेश्याची सोय करणारी पुस्तके आणि त्यातील पात्रे आठवून पुन्हप्रत्ययाच आनन्द मिळाला..... धन्यवाद!

भडकमकर मास्तर Wed, 03/05/2008 - 00:16
जाता जाता.... सुमेध्-सानिका , मनिष्-माधवी अशी यमकी नावे वाचुन ६०-७० च्या दशकातिल बा-वाचकाची निद्रादेवीच्या राज्यात प्रवेश्याची सोय करणारी पुस्तके आणि त्यातील पात्रे आठवून पुन्हप्रत्ययाच आनन्द मिळाला..... धन्यवाद! हाहाहाहा...हे पटले.... आमची पात्रांची नावे ठरवण्यात लई टाईम जातो.... आणि टाईम घेऊनसुद्धा आम्ही हे असे करतो... ...सगळे वेळेत जुळून आले तर पुढल्या महिन्यात पुण्यात सुदर्शन ला प्रयोग होईल....

भडकमकर मास्तर Tue, 12/30/2008 - 01:37
प्रयोग दीर्घांक स्पर्धेमध्ये सुदर्शन रंगमंच ... दिनांक ३ जानेवारी २००८ ,दुपारी १२ वाजता.... स्पर्धेसाठीचा हा प्रयोग विनामूल्य आहे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
लेखनविषय:
लेखनप्रकार
[ एका कोलेज च्या एका मोठ्या क्रीडांगणाचा एक कोपरा.त्या ground चं कुंपण, भिंत, गेट आणि त्यामागचा रस्ता...प्रेक्षकांसमोर एक दोन बेंच आणि त्यासमोरून गेलेला जोगिंग ट्रॆक...ground ला चालत चक्कर मारणार्या स्त्रिया, मध्यमवयीन माणसे आणि काही खेळाडू अधून मधून दिसावेत...groundवर क्रिकेट सामना चालू आहे.पडदा उघडतो तेव्हा मनीष आणि माधवी स्टेजवर दिसतात....] >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>माधवी - मनीष्चे लग्न ठरले आहे, आणि मनीषने अधिक चांगल्या पगाराची नोकरी धरली पाहिजे असा सतत आ

कितीही येऊ दे वादळं वाटेत माझ्या ...

फटू ·

प्राजु Sun, 03/02/2008 - 21:29
कोणाही निराश माणसाला उत्साह देईल अशी आहे. निराशेने गळून न जाता नविन लढाई लढण्यास समर्थ व्हा असा संदेश देणारी कविता आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर Mon, 03/03/2008 - 09:02
गावडेसाहेब, सुंदर कविता! भरून आले पाण्याने डोळे, पण म्हटलं अस खचून जायचं नाही आयुष्यात अस होतंच राहणार निराशेचा गुलाम व्हायचं नाही वरील ओळी सुंदर आहेत... तात्या.

चतुरंग Tue, 03/04/2008 - 01:17
कितीही येऊ दे वादळं वाटेत माझ्या असंख्य तुफानाना टक्कर देईन मी असेल जरी इथे आज अंधार चहूकडे उद्या उज्वल यशाचा दिवस पाहिन मी ओळी आवडल्या. आगे बढो! चतुरंग

विकास Tue, 03/04/2008 - 21:07
फार सुंदर कविता. वाचनखुणांमधे घातले...किप इट अप! मला कुसुमाग्रजांच्या "कणा"या कवितेतील विद्यार्थ्याच्या "बाण्या"ची आठवण झाली. छोटेसे काव्य असल्याने, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी खाली लिहीत आहे: ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून "गंगामाई पाहूणी आली" गेली घरट्यात राहून माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली भिंत खचली,चूल विझली, होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमधे पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेउन सर आता, संगे लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच, हसत हसत उठला पैसे नको, जरा एकटे पणा वाटला मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून, नुसते लढ म्हणा

In reply to by विकास

विसोबा खेचर Tue, 03/04/2008 - 21:42
धन्यवाद विकासराव, कुसुमाग्रजांची माझी ही अतिशय आवडती कविता! प्रसिद्ध निवेदक भाऊ मराठे ही कविता फार सुंदर म्हणतात असा माझा अनुभव आहे... आपला, (कुसुमाग्रजप्रेमी) तात्या.

प्राजु Sun, 03/02/2008 - 21:29
कोणाही निराश माणसाला उत्साह देईल अशी आहे. निराशेने गळून न जाता नविन लढाई लढण्यास समर्थ व्हा असा संदेश देणारी कविता आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर Mon, 03/03/2008 - 09:02
गावडेसाहेब, सुंदर कविता! भरून आले पाण्याने डोळे, पण म्हटलं अस खचून जायचं नाही आयुष्यात अस होतंच राहणार निराशेचा गुलाम व्हायचं नाही वरील ओळी सुंदर आहेत... तात्या.

चतुरंग Tue, 03/04/2008 - 01:17
कितीही येऊ दे वादळं वाटेत माझ्या असंख्य तुफानाना टक्कर देईन मी असेल जरी इथे आज अंधार चहूकडे उद्या उज्वल यशाचा दिवस पाहिन मी ओळी आवडल्या. आगे बढो! चतुरंग

विकास Tue, 03/04/2008 - 21:07
फार सुंदर कविता. वाचनखुणांमधे घातले...किप इट अप! मला कुसुमाग्रजांच्या "कणा"या कवितेतील विद्यार्थ्याच्या "बाण्या"ची आठवण झाली. छोटेसे काव्य असल्याने, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी खाली लिहीत आहे: ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून "गंगामाई पाहूणी आली" गेली घरट्यात राहून माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली भिंत खचली,चूल विझली, होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमधे पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेउन सर आता, संगे लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच, हसत हसत उठला पैसे नको, जरा एकटे पणा वाटला मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून, नुसते लढ म्हणा

In reply to by विकास

विसोबा खेचर Tue, 03/04/2008 - 21:42
धन्यवाद विकासराव, कुसुमाग्रजांची माझी ही अतिशय आवडती कविता! प्रसिद्ध निवेदक भाऊ मराठे ही कविता फार सुंदर म्हणतात असा माझा अनुभव आहे... आपला, (कुसुमाग्रजप्रेमी) तात्या.
जे व्हायचं होतं ते तसं होऊन गेलं आता मी स्वत:ला सावरतो आहे अडवून पापण्याआड चिंब आसवाना मी भावनांचा पसारा आवरतो आहे कोण जाणे काय झालं होतं मला एका स्वप्नाने गात्रं भारली होती उद्याच्या उजेडावर विसंबून मी अंधारात एक उडी मारली होती कशावर तरी आदळलो, आणि जाणवलं, फसलीच आपली उडी कुठेच दिसत नाही इथे किनारा भरकटली आहे आपली होडी भरून आले पाण्याने डोळे, पण म्हटलं अस खचून जायचं नाही आयुष्यात अस होतंच राहणार निराशेचा गुलाम व्हायचं नाही खेळवीत चेहर्‍यावर निरागस हसू मी स्वत:लाच धीर इथे देतो आहे पायात बेड्या पराभवाच्या अन् नजेरेने उज्वल उद्याचा वेध घेतो आहे कितीही

अंगारकी चतुर्थी दिनांक ११ मार्च

धोंडोपंत ·

प्राजु Sat, 03/01/2008 - 21:51
धोंडोपंत , आपण दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे. पण एक शंका आहे ही चतुर्थी चंद्रोदयापर्यंत नाहिये का? म्हणजे एरवीची संकष्टी म्हणजे उपास जशी चंद्रोदयाला सोडतात तशी ही केव्हा सोडायची?- (सर्वव्यापी)प्राजु

धोंडोपंत Sat, 03/01/2008 - 22:00
प्राजुताई, ही संकष्टी नसून विनायकी आहे. विनायकीचा उपवास दुसर्‍या दिवशी सोडायचा असतो. दुसर्‍या दिवशी म्हणजे पंचमी लागल्यावर विनायकीचा उपवास सोडतात. त्यामुळे हिचा चंद्रोदयाशी संबंध नाही. आपला, (दशग्रंथी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

केशवराव Sun, 03/02/2008 - 19:22
अहो दशग्रंथी महोदय , मंगळवारी चतुर्थी आली तर ' अंगारक योग आहे ' असे म्हणतात. याचा नेमका अर्थ काय ? अंगारक योगाचे नेमके महत्व काय ? कृपया माहिती द्यावी. ----------- केशवराव .

प्राजु Sat, 03/01/2008 - 21:51
धोंडोपंत , आपण दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे. पण एक शंका आहे ही चतुर्थी चंद्रोदयापर्यंत नाहिये का? म्हणजे एरवीची संकष्टी म्हणजे उपास जशी चंद्रोदयाला सोडतात तशी ही केव्हा सोडायची?- (सर्वव्यापी)प्राजु

धोंडोपंत Sat, 03/01/2008 - 22:00
प्राजुताई, ही संकष्टी नसून विनायकी आहे. विनायकीचा उपवास दुसर्‍या दिवशी सोडायचा असतो. दुसर्‍या दिवशी म्हणजे पंचमी लागल्यावर विनायकीचा उपवास सोडतात. त्यामुळे हिचा चंद्रोदयाशी संबंध नाही. आपला, (दशग्रंथी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

केशवराव Sun, 03/02/2008 - 19:22
अहो दशग्रंथी महोदय , मंगळवारी चतुर्थी आली तर ' अंगारक योग आहे ' असे म्हणतात. याचा नेमका अर्थ काय ? अंगारक योगाचे नेमके महत्व काय ? कृपया माहिती द्यावी. ----------- केशवराव .
लोकहो, अंगारकी चतुर्थी (विनायकी) दिनांक ११ मार्च रोजी आहे. सर्व गणेशभक्तांसाठी हा अत्यंत महत्वाचा दिवस. ही चतुर्थी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंतच आहे. त्यामुळे पूजा, अभिषेक आणि विशेषत्वाने आवर्तने त्यापूर्वी संपतील याची काळजी घ्यावी. आपला, (घनपाठी) धोंडोपंत

पारपत्र

आनंद घारे ·

लबाड मुलगा Sat, 03/01/2008 - 15:45
पासपोर्ट म्हणजे काय व कशाला लागतं हे झंगाट? रेशन्कार्ड वरीजीनल व डिप्लीकेट १ दिवसात देवु शकतो भागल का त्याने काम... सांगा व्यनि करा .. तोड्पाणी सांग्तो डिटेल्मदी प्क्या

चतुरंग Sun, 03/02/2008 - 12:31
http://passport.nic.in/ ह्या कार्यालयात थेट संपर्क साधून काम करणे जास्त योग्य ठरते. एजंट वगैरे गाठू नयेत एकतर ते ठरलेल्या कार्यपध्दतीबाहेर फार काही करु शकत नसतात (संगणकीकरणाचा फायदा!) आणि दुसरे भ्रष्टाचाराला आणखी एक कुरण! माझे पारपत्र मी स्वतः मुंबईच्या कार्यालयात जाऊन, सनदशीर मार्गाने अर्ज देऊन बरोबर ४५ दिवसात घरपोच मिळवले एका पैची ही लाच न देता!! माझी अशा प्रकारच्या कामातली भारतातली पध्द्त अशी - आधी सनदशीर मार्गाने जाऊन काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे, जर विनाकारण अडवाअडवी, टाळाटाळ झाली तर खालच्या माणसांशी काहीही वाद न घालता थेट त्या कार्यालयातल्या सर्वात वरिष्ठ अधिकार्‍याला भेटणे (थोडं राजकारणी पध्दतीने जावं लागतं, पण सरावाने जमतं ;)- १० पैकी ९ वेळा काम होतेच होते! चतुरंग

आनंद घारे Tue, 03/04/2008 - 07:55
तुमचे सांगणे अगदी योग्य आहे, पण मी मांडलेल मुद्दा वेगळा आहे. मुंबईहून नवी मुंबई किंवा ठाण्याला रहायला गेलात तर त्यासाठी नवीन पासपोर्ट काढावा लागतो हे मला आणि माझ्या मित्राला माहीत नव्हते म्हणून मी त्याबद्दल विचारणा केली होती. आपण दिलेल्या लिंक वर ही माहिती दिसली नाही.

In reply to by आनंद घारे

चतुरंग Tue, 03/04/2008 - 21:24
पटत नाही हो. मी दिलेल्या दुव्यामधल्या पहिल्याच पानावरचा "FAQ" सेक्शन बघितलात तर पहिल्याच प्रश्नाच्या उत्तरात तुमचं उत्तर आहे. फॉर्म नं.२ भरुन तुम्हाला चेंज ऑफ ऍड्रेस करता येतो. चतुरंग

आनंद घारे Wed, 03/05/2008 - 08:16
१.वरील उत्तरात दिल्लीहून बंगलोरला गेल्यावर काय करायचे हे सांगितलेले आहे. नवी मुंबई हे एक वेगळे शहर आहे आणि ते ठाणे जिल्ह्यात येते. त्यामुळे तेथेच जावे लागते. हे सहसा कोणाच्या लक्षात येणार नाही. २. पत्ता बदलण्यासाठी नवा पासपोर्ट दिला जातो अशी सध्याची पद्धत स्पष्टपणे त्या उत्तरात दिलेली नाही.

लबाड मुलगा Sat, 03/01/2008 - 15:45
पासपोर्ट म्हणजे काय व कशाला लागतं हे झंगाट? रेशन्कार्ड वरीजीनल व डिप्लीकेट १ दिवसात देवु शकतो भागल का त्याने काम... सांगा व्यनि करा .. तोड्पाणी सांग्तो डिटेल्मदी प्क्या

चतुरंग Sun, 03/02/2008 - 12:31
http://passport.nic.in/ ह्या कार्यालयात थेट संपर्क साधून काम करणे जास्त योग्य ठरते. एजंट वगैरे गाठू नयेत एकतर ते ठरलेल्या कार्यपध्दतीबाहेर फार काही करु शकत नसतात (संगणकीकरणाचा फायदा!) आणि दुसरे भ्रष्टाचाराला आणखी एक कुरण! माझे पारपत्र मी स्वतः मुंबईच्या कार्यालयात जाऊन, सनदशीर मार्गाने अर्ज देऊन बरोबर ४५ दिवसात घरपोच मिळवले एका पैची ही लाच न देता!! माझी अशा प्रकारच्या कामातली भारतातली पध्द्त अशी - आधी सनदशीर मार्गाने जाऊन काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे, जर विनाकारण अडवाअडवी, टाळाटाळ झाली तर खालच्या माणसांशी काहीही वाद न घालता थेट त्या कार्यालयातल्या सर्वात वरिष्ठ अधिकार्‍याला भेटणे (थोडं राजकारणी पध्दतीने जावं लागतं, पण सरावाने जमतं ;)- १० पैकी ९ वेळा काम होतेच होते! चतुरंग

आनंद घारे Tue, 03/04/2008 - 07:55
तुमचे सांगणे अगदी योग्य आहे, पण मी मांडलेल मुद्दा वेगळा आहे. मुंबईहून नवी मुंबई किंवा ठाण्याला रहायला गेलात तर त्यासाठी नवीन पासपोर्ट काढावा लागतो हे मला आणि माझ्या मित्राला माहीत नव्हते म्हणून मी त्याबद्दल विचारणा केली होती. आपण दिलेल्या लिंक वर ही माहिती दिसली नाही.

In reply to by आनंद घारे

चतुरंग Tue, 03/04/2008 - 21:24
पटत नाही हो. मी दिलेल्या दुव्यामधल्या पहिल्याच पानावरचा "FAQ" सेक्शन बघितलात तर पहिल्याच प्रश्नाच्या उत्तरात तुमचं उत्तर आहे. फॉर्म नं.२ भरुन तुम्हाला चेंज ऑफ ऍड्रेस करता येतो. चतुरंग

आनंद घारे Wed, 03/05/2008 - 08:16
१.वरील उत्तरात दिल्लीहून बंगलोरला गेल्यावर काय करायचे हे सांगितलेले आहे. नवी मुंबई हे एक वेगळे शहर आहे आणि ते ठाणे जिल्ह्यात येते. त्यामुळे तेथेच जावे लागते. हे सहसा कोणाच्या लक्षात येणार नाही. २. पत्ता बदलण्यासाठी नवा पासपोर्ट दिला जातो अशी सध्याची पद्धत स्पष्टपणे त्या उत्तरात दिलेली नाही.
माझा एक मित्र मुंबईतून नवी मुंबईमध्ये रहायला गेला. पासपोर्टवरील पत्ता बदलून घेण्यासाठी तो प्रभादेवी येथील पासपोर्ट ऑफीसात गेला. यापूर्वी त्याच ऑफीसात जाऊन त्याचे पत्ता बदलण्याचे काम झाले होते. या वेळेस फॉर्म भरून रांगेतून खिडकीवर पोचल्यावर त्याला ठाणे येथील ऑफीसात जायला सांगितले गेले. दुसरे दिवशी तो तेथे गेला. त्याला यासाठी नवा पासपोर्ट बनवावा लागेल असे तेथे समजले आहे. कोणाला या बाबतीत अद्ययावत माहिती किंवा ताजा अनुभव आहे का?

मराटी टायपि॑ग

हर्शल ·

नीलकांत Sat, 03/01/2008 - 16:57
येथे किंवा एकूनच महाजालावरचे लिखाण हे युनिकोड मानकाचं आहे. तुमच्या जवळ युनिकोड लिहीणारं व ज्यात असे वेगवेगळे किबोर्ड उपलब्ध आहेत असं सॉफ्टवेअर असेल तर त्यात लिहून येथे चिटकवता येईल. कदाचित 'आकृती' मधे ही सोय आहे. किंवा मग तुमच्या आवडीच्या फॉन्ट मधे लिहीलेलं युनिकोड मधे रुपांतरीत करून येथे चिटकवता येईल. नीलकांत

सृष्टीलावण्या Mon, 03/03/2008 - 06:48
http://www.chhahari.com/unicode हे पान अतिशय उपयुक्त आहे. ते उपयोगकर्त्यासाठी मैत्रिपूर्ण (user friendly) पण आहे. इथे तुम्ही थेट युनिकोड मध्ये टंकित करू शकता. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

सुधीर कांदळकर Tue, 03/04/2008 - 17:46
चिकटवावेत? मी पीडीएफ फाईल्मधील फोटो कॉपी केले. परंतु नवीन लेखन करतांना पेस्ट ची कमांड पुसट होऊन अकार्यरत होती. फोटो लेखात चिकटविण्यासाठी काय करावे? मी सॉफ्टवेअरमध्ये फारच नवखा आहे. मला फक्त टंकवून अपलोड करता आले. तेपण ५-१० असफल प्रयत्नानंतर. सध्या मी बरहा मध्ये टंकित करून कॉपी करतो आणि नवीन लेखनात चिकटवतो. फोटो बरहामध्ये पण चिकटवता येत नाहीत. तेथे देखील असेच होते. पेस्ट ची कमांड अकार्यरत होते.

नीलकांत Sat, 03/01/2008 - 16:57
येथे किंवा एकूनच महाजालावरचे लिखाण हे युनिकोड मानकाचं आहे. तुमच्या जवळ युनिकोड लिहीणारं व ज्यात असे वेगवेगळे किबोर्ड उपलब्ध आहेत असं सॉफ्टवेअर असेल तर त्यात लिहून येथे चिटकवता येईल. कदाचित 'आकृती' मधे ही सोय आहे. किंवा मग तुमच्या आवडीच्या फॉन्ट मधे लिहीलेलं युनिकोड मधे रुपांतरीत करून येथे चिटकवता येईल. नीलकांत

सृष्टीलावण्या Mon, 03/03/2008 - 06:48
http://www.chhahari.com/unicode हे पान अतिशय उपयुक्त आहे. ते उपयोगकर्त्यासाठी मैत्रिपूर्ण (user friendly) पण आहे. इथे तुम्ही थेट युनिकोड मध्ये टंकित करू शकता. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

सुधीर कांदळकर Tue, 03/04/2008 - 17:46
चिकटवावेत? मी पीडीएफ फाईल्मधील फोटो कॉपी केले. परंतु नवीन लेखन करतांना पेस्ट ची कमांड पुसट होऊन अकार्यरत होती. फोटो लेखात चिकटविण्यासाठी काय करावे? मी सॉफ्टवेअरमध्ये फारच नवखा आहे. मला फक्त टंकवून अपलोड करता आले. तेपण ५-१० असफल प्रयत्नानंतर. सध्या मी बरहा मध्ये टंकित करून कॉपी करतो आणि नवीन लेखनात चिकटवतो. फोटो बरहामध्ये पण चिकटवता येत नाहीत. तेथे देखील असेच होते. पेस्ट ची कमांड अकार्यरत होते.
फोनटिक किबोर्ड शिवाय ईतर किबोर्ड वापरता येतील का ? उदा. टायपि॑ग मशिन किबोर्ड

रम , व्होडका , व्हिस्की , स्कोच , ब्रैन्डी , फेणी ,मोसंबी ,नारंगी

विजुभाऊ ·

पिवळा डांबिस Sat, 03/01/2008 - 11:26

सर्वदेव नमस्कार: केशवंप्रति गच्छति!!

या सर्वांमध्ये ते इथाईल अल्कोहोल नांवाचे द्रव्य आहे जे नशेला कारणीभूत आहे.

बाकी सर्व नांवे त्या त्या द्रव्याच्या रॉ मटेरिअल्स प्रमाणे पडली आहेत!!

ऊस, बटाटा, गहू, द्राक्षं, काजू, मोसंबी आणि संत्री (अनुक्रमे) या सर्वांमध्ये ग्लुकोज असते जे यीस्ट वापरून अल्कोहोलमध्ये परिवर्तित करता येते.  जसे यीस्ट वापरून इडलीचे किंवा पावाचे पीठ फुगवता येते त्याप्रमाणेच!  जर पीठ मर्यादेबाहेर फुगू दिले तर त्यास आंबूस वास येतो, तो इथाईल अल्कोहोलचा असतो.

या द्रव्यांना दिलेला वास आणि चव ही बहुतेक वेळा कृत्रिम असते.

बर्‍याचे वर्षांनी आपले रसायनशास्त्राचे ज्ञान कारणी लावणारा,

पिवळा डांबिस

विजुभाऊ Sat, 03/01/2008 - 11:15

मी या बाबतीत अज्ञानी आहे ..पामर आहे....बालक आहे.

मि पा वर बरीच तज्ञ मंड्ली आहेत्.ती अजून काही राहिले असल्यास सान्गतीलच्.........धन्यवाद्....तुमच्या उ.सु. बद्दल

विसोबा खेचर Sat, 03/01/2008 - 11:16

रम , व्होडका , व्हिस्की , स्कोच , ब्रैन्डी , फेणी ,मोसंबी ,नारंगी   यात नक्की फरक काय आहे?

बराच फरक आहे.. अनुभवांती ज्ञानप्राप्ती होईल! :)

आपला,
(सिंगलमाल्ट परिवारातला) तात्या.

विसोबा खेचर Sat, 03/01/2008 - 11:30

आता मद्याचाच विषय निघाला आहे, त्या अनुषंगाने मला पुढे ढकललेल्या इपत्राने आलेले हे काही टाईमपास विनोद! :)

१)

ब्रँडी + पाणी = किडन्यांना घातक
रम
+ पाणी = लिव्हरला
घातक
व्हिस्की
+ पाणी = हृदयाला
घातक
जिन
+ पाणी = मेंदूला
घातक
तेव्हा
,

पाणी
टाळा!!!

२)

आयुष्यात कधी ना कधी
आपण
स्वत:
ला
काही
महत्त्वाचे
प्रश्न
विचारलेच
पाहिजेत...

आपण
कोण आहोत?...
कोठून
आलो आहोत?...
कोठे
निघालो आहोत?...
आणि
जेव्हा तिथे पोहोचू
तेव्हा
तिथले
बार
उघडे असतील का
?!!!

३)

नेहमीच्याच बारमध्ये नेहमीच्याच मेंबरांची सपत्नीक पाटीर् ऐन रंगात आली होती. रामरावांसकट सगळ्यांनी दोन दोन क्वार्टर रिचवल्या होत्या. अचानक रामराव चित्कारले, ''मित्रहो, आपल्यापैकी जे विवाहित असतील, त्यांना मी असं आवाहन करतो की त्यांनी उठावं आणि ज्या व्यक्तीमुळे त्यांच्या आयुष्याला अर्थ लाभला, ज्या व्यक्तीमुळे त्यांचं आयुष्य सुखाचं झालं,त्या व्यक्तीच्या शेजारी जाऊन उभं राहावं...''

क्षणार्धात
रोज दारू र्सव्ह करणाऱ्या बगाराम वेटरशेजारी अशी काही झुंबड उडाली म्हणता!!!!

४)

तो फार सज्जन माणूस होता.

त्याने
कधी सुपारीच्या खांडाचेही व्यसन केले नाही.

त्याने
आयुष्यात एकही खोटा शब्द उच्चारला नाही.

त्याने
परस्त्रीकडे डोळा वर करून कधीही पाहिले नाही...

...
तो मरण पावला,


तेव्हा
इन्शुरन्स कंपनीने क्लेम नाकारला...

...
ते म्हणाले, 'जो जगलाच नाही, तो मेला कसा?!!!'

आपला,
(छंदिफंदी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

लिखाळ Sat, 03/01/2008 - 21:33
हा हा हा .... तात्या, विनोद जोरातच. ---लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

पिवळा डांबिस Sat, 03/01/2008 - 11:38

बार उघडे असतील का?!!!

मागे कुठेतरी एकदा वाचलं होतं,

जर स्मशानात बार ठेवले तर काय बहार येईल!  उगाच कवटी फुटेपर्यंत ताटकळत बसायला नको!  दोन-दोन पेग मारुन होतील.  स्मशानयात्रा ही (इतरांसाठी) आनंदयात्रा होईल!!

बार काय चालेल, काय चालेल!!! :))

लिहिण्यार्‍या महाभागाचे नांव लक्षात नाही पण तो आपल्या कुळीचाच असला पाहिजे, तात्या!!! :)))

 

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर Sat, 03/01/2008 - 11:54

लिहिण्यार्‍या महाभागाचे नांव लक्षात नाही पण तो आपल्या कुळीचाच असला पाहिजे, तात्या!!! :)))

आपल्या कुळीचा?!!!!!!!!

साल्या डांबिसा, मला का उगाच खेचतोस तुम्हा बेवड्यांच्या कुळीत?:)

आपला तर साला बुधवार-शनिवार ठरलेला आहे! ते देखील मोजून दोन ते अडीच पेग! तुमच्यासारखी रोजच्या रोज आपण टाकी फुल्ल करत नाही! :))

वा रे वा!! म्हणे आपल्या कुणीचा!!! ;)))

तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पिवळा डांबिस Sat, 03/01/2008 - 12:08

साल्या डांबिसा, मला का उगाच खेचतोस तुम्हा बेवड्यांच्या कुळीत?:)

आता साथ सोडून लगेच संभवित होतोस काय! :))

कबिराने म्हटलं आहे,

ऐसी प्रीत न किजिये, जैसे खिरा ने कीन|   (खिरा = काकडी)

बाहरसे तो मिले हुए, भीतर फांके तीन||

दुख्खी:,

पिवळा डांबिस

In reply to by विसोबा खेचर

पिवळा डांबिस Sat, 03/01/2008 - 12:18

आपला तर साला बुधवार-शनिवार ठरलेला आहे!

आणि आमची फक्त शुक्रवार संध्याकाळ!  म्हणजे आत्ता!! :))

आठवडाभर मेहेनत केल्यानंतर कंपनीच्या बैलाला घो! असं म्हणत आम्ही शुक्रवार संध्याकाळ साजरी करतो आणि वीकेंड आमच्या बायकापोरांत घालवायला मोकळे होतो!!!

In reply to by पिवळा डांबिस

छोटा डॉन Sat, 03/01/2008 - 12:26
आमचा पण जवळजवळ "शूक्रवार" हा ठरलेला दिवस आहे.[ बाकी इतर दिवशी एखद्या याराला जर ईच्छा झाली तर आम्ही त्याचा अपमान करत नाही.]
आत्तच आम्ही कालच्या 'अंमलातून' जागे होऊन आपल्या मिपा वर काय चल्ले आहे याची खबर घ्यायला आलो तर ही चर्चा ....
हाण तिच्यायला .....
आम्ही सध्या 'अविवाहित' असल्यामुळे तसा काही "डांबिसकाका" म्हणतात तसा 'बायका-पोरांबरोबर कार्यक्रम नसतोच ... त्यांउळे आम्ही शहरातील इतर 'प्रेक्षणिय स्थळे' पाहण्याच्या सुहेतूने शहरप्रदक्षिणा करत असतो.........

छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

अवांतर : अजून 'धमाल्या' आला दिसत नाही. म्हणे अजून अमलाखलीच आहे असे [थोडे थोडे ] दिसतयं

In reply to by छोटा डॉन

पिवळा डांबिस Sat, 03/01/2008 - 13:01

अजून 'धमाल्या' आला दिसत नाही. म्हणे अजून अमलाखलीच आहे असे [थोडे थोडे ] दिसतयं

अरे, त्याचा अंमल म्हणजे इंग्रजी सत्तेच्या अंमलासारखा आहे, दीर्घकालीन!! :)

इतक्यात थोडाच उतरणार? :)))

In reply to by पिवळा डांबिस

धमाल मुलगा Mon, 03/03/2008 - 11:37
ओ डॉनभाऊ, डा॑बिसकाका, का लहान पोरा॑ना बदनाम करताय??? (म्हणजे अस॑ सगळ्या॑समोर बोलून...आमच॑ गुपित उघड करताय) ह्या विका॑ताला जरा लैच बिझी होतो म्हणून हजेरी लावायची राहिली तर डायरेक्ट हे अस॑? आमचा कार्यक्रम तसा महिन्यातून एखाद्यावेळीच असतो, सगळी उपद्व्यापी भुतावळ एकत्र जमली की मग हा बेत पार पडतो. औ॑दाच्या विका॑ताला मात्र हे जुळून आल॑ आन् धूमशान मज्जा केली हो.... हे हे...तात्याशेठ, ते "बार उघडे असतील का?" लै भारी ! अरे, त्याचा अंमल म्हणजे इंग्रजी सत्तेच्या अंमलासारखा आहे, दीर्घकालीन!! :) इतक्यात थोडाच उतरणार? :))) अस॑ का? अस॑? आयला, दुसर॑ कोन भेटल॑ नाय का हो? का दिसला धमाल्या की मार त्याची ?:)))) आमचा पार "पी.के. गिरपडे" करुन टाकला राव तुम्ही.

In reply to by विजुभाऊ

विसोबा खेचर Sat, 03/01/2008 - 12:09

उत्तर टाळलंय कुठे?

बराच फरक आहे.. अनुभवांती ज्ञानप्राप्ती होईल! :)

असं उत्तर मागेच दिलं आहे! हां, आता ते ते मद्य कसं बनवतात, कशापासून बनवतात याबद्दल आपल्याला काय माहीत नाय!

आपल्याला काय, प्रत्येकाच्या चवीशी मतलब! आणि तो फरक शब्दात व्यक्त करता येत नाही, तर त्याचा अनुभव घेऊन पाहावा लागतो!

ती स्वानुभवातून येणारी अनुभूती आहे! :)**

**वरील वाक्य हे संत तात्याबा महाराजांच्या एका प्रवचनातील आहे! :)

असो..

आपला,
(जाणीवेतला-नेणीवेतला!) श्रीसंत तात्याबा महाराज.

In reply to by विजुभाऊ

पिवळा डांबिस Sat, 03/01/2008 - 12:22

असं माझ्या आणि तात्याच्या नादी लागाल तर आम्ही दिवसभर (आमच्याकडे रात्रभर) असेच अभिप्राय देत राहू! :))

तुम्हाला ज्ञानप्राप्ती करायची असेल तर लवकर दुसरा गुरू शोधावा हे उत्तम! :))))))))

विजुभाऊ Sat, 03/01/2008 - 12:29

रमणींच्या लत्ताप्रहाराने अशोक व्रुक्श वॄक्ष ( हा जमले एकदाचे) फुलतो असे म्हणतात.

रम च्या लत्ताप्रहाराने कोणता वॄक्ष  फुलतो

आणखी कसल्या लत्ताप्रहाराने कोणते वॄक्ष फुलतात?

In reply to by विजुभाऊ

पिवळा डांबिस Sat, 03/01/2008 - 12:43

या प्रश्नाचे उत्तर इथे येणारी ताज्या दमाची, तरूण, अविवाहित मंडळी देऊ शकतील!!!

आमचं आपलं, "पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा"

आमचा अशोकवृक्ष फुलून, पानगळ होऊन, आता वठला आहे, आलं का लक्षांत? :)))

(सरपंच बहुतेक आम्हाला 'समज' देणार या अभिप्रायाबद्द्ल!!! पण काय करणार, तुम्ही प्रश्नच तसा विचारलात!:))))

सॉरी, हो सरपंच!

मदनबाण Sat, 03/01/2008 - 12:29

मला मेल द्वारे आलेली एक सुंदर कविता:---

 

मी मेल्यावर गंध गुलाल लावुनी तिरडी माझी सजवा

मात्र त्यावर टाकावयाची फुले दारुत आधी भिजवा

माझ्या अंतयात्रेला सर्वजण शुध्दीत असावेत

मात्र चार खांदेकरी थोडेसे प्यायलेले असावेत

हे सर्व पाहुन तुम्ही म्हणाल बरं झालं बेवडा गेला

पण दारु प्यालेले म्हणतील आमचा जोडीदार गेला

असे हे जीवन .....! जगण्यापेक्षा मेलेले बरे

पण भिती वाटते मरण्याची म्हणुन थोडेसे प्यालेले बरे 

(रोज दारु सोडली म्हणणारा )

          मदन बाण

ओगलेशेठ, संध्याकाळी नसेल दारू जगू कशाला? जगलंच नाही तर दुसर्‍या दिवशी पिणार कसे बॉ? गावामध्ये नसेल बारू जगू कशाला? त्याकरिता आणून ठेवा घरात दारु...... दारू पिता मला वाटते हलके हलके खरयं..... या धरतीला होऊन भारू जगू कशाला? त्यापरि दारु पिउनी व्हावे हलके-हलके, जेणेकरूनी हा विचार मनी न झलके ;) आपला, (हलका-हलका) छोटी टिंगी ;)

सृष्टीलावण्या Sun, 03/02/2008 - 09:50
नशा येण्यासाठी लोकांना पैसे खर्च करावे लागतात आणि इतक्या सार्‍या गोष्टींचा आसरा घ्यावा लागतो... अरेरे... आपल्याला तर बुवा, भेळेच्या दुकानाबाहेर येणार्‍या चुरलेल्या कांदा-कोथिंबिरीच्या वासाने, पहिल्या पावसाच्यामुळे मातीला येणार्‍या वासाने, मंदीरांच्या बाहेर असणार्‍या चाफ्याच्या सड्यामुळे, कवितांच्या हृदयस्पर्शी ओळीमुळे, मांजराच्या पिल्लाच्या बागडण्याने नशा येते. त्यासाठी कृत्रिम साधनांची आवश्यकता वाटत नाही.

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर Sun, 03/02/2008 - 10:13
प्रत्येक नशेची गंमत वेगळी, अनुभव वेगळा! आम्हाला वरील गोष्टींतूनही नशा येते आणि उत्तम प्रतिच्या विदेशी मद्यानेही आम्ही दोन घटका धुंद होतो! तसं पाहायला गेलं तर आम्ही उत्तम लागलेल्या तानपुर्‍यांच्या जोडीच्या गुंजारवातही अगदी रमून जातो आणि अण्णांच्या पुरियातल्या निषादानेही आमचं देहभान हरवतं! एखादी मधाळ तरूणीही आम्हाला अवचित घायळ करते! आपण दिलेली यादी फारच तोकडी आहे! या जगात धुंद करणार्‍या, बेहोष करणार्‍या अनेक गोष्टी आहेत. प्रत्येकाची गंमत वेगळी, मजा वेगळी! आणि ती लुटताना आम्ही कधीच, 'हीच काय ती नशा!' अशी संकुचित वृत्ती ठेवत नाही! तात्या.

In reply to by सृष्टीलावण्या

पिवळा डांबिस Sun, 03/02/2008 - 20:03
आपल्याला तर बुवा, भेळेच्या दुकानाबाहेर येणार्‍या चुरलेल्या कांदा-कोथिंबिरीच्या वासाने, पहिल्या पावसाच्यामुळे मातीला येणार्‍या वासाने, मंदीरांच्या बाहेर असणार्‍या चाफ्याच्या सड्यामुळे, कवितांच्या हृदयस्पर्शी ओळीमुळे, मांजराच्या पिल्लाच्या बागडण्याने नशा येते. याचा अर्थच, नशा म्हणजे काय हे तुम्हाला ठावूक नाही. आणि 'नशा' आणि 'प्रसन्नता' यांतील फरक तुम्हाला कळलेला दिसत नाही.... नशा येण्यासाठी लोकांना पैसे खर्च करावे लागतात आणि इतक्या सार्‍या गोष्टींचा आसरा घ्यावा लागतो... जी गोष्ट आपल्याला माहिती नाही ती विचारावी. उगाच व्यर्थ तारे तोडण्यात काय अर्थ? :))

सृष्टीलावण्या Sun, 03/02/2008 - 20:11
हे म्हणजे, "आपण खाल्लं की गोमय आणि दुसर्‍याने खाल्ले की शेण" ह्यातला प्रकार झाला. आपणाला येते ती नशा आणि दुसर्‍याला येते ती प्रसन्नता????? बापु, चुरलेल्या कांदा-कोथिंबिरीला सुद्धा मादक वास असतो बरे... अर्थातच त्याची नशा आपल्याच नियंत्रणात असते.. ती सोडायला अल्कोहोलिक्स अनॉनिमस लागत नाही... कळावें, लोभ असावा... आणि राग नसावा, आपली, सृष्टीलावण्या परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

In reply to by सृष्टीलावण्या

पिवळा डांबिस Sun, 03/02/2008 - 20:17
"आपण खाल्लं की गोमय आणि दुसर्‍याने खाल्ले की शेण" ह्यातला प्रकार झाला. आपणाला येते ती नशा आणि दुसर्‍याला येते ती प्रसन्नता????? म्हणजे तुमच्याच म्हणण्याप्रमाणे, गोमय = नशा शेण = प्रसन्नता! ठीक आहे, आपली हरकत नाही!! :)))))

धमाल मुलगा Mon, 03/03/2008 - 11:52
अरे, सृष्टीताई, आम्हीसुद्धा आपल्यासारखेच त्या सगळ्या गोष्टी॑नी धु॑द होतो बर॑...मजा येते ! त्याशिवाय, आपल्या आवडत्या व्यक्तीच्या डोळ्यात रोखून बघत काळवेळाच॑ भान हरपून वेडे होतो, ह्या सगळ्याने आम्हाला नशाही येते, धु॑दीही जाणवते आणि प्रसन्न देखिल वाटते.... पण.............. आम्ही बिचारे सर्वसामान्य लोक ब्रम्हान॑द टाळीच्या योग्यतेला पोहचू शकत नाही, मग...उन्मनी अवस्थेस जाण्याकरीता आम्हाला पैसा खर्च करावा लागतो. ह्या सगळ्या नशा॑चे आपापले स्वतःचे खास असे बाज आहेत...उगाच एकीची तुलना दुसरीशी करुन, ही उच्च अन् ती नीच असा दुजाभाव नको मा॑डूस ग॑ ! तो त्या सगळ्याच नशा॑चा अपमान ठरेल! असो, जो जे वा॑छिल तो ते लाहो | तिन्हीलोक धु॑द राहो | आपला, - ड्ड म्मा ळ.... (अरे..हे अस॑ का होत॑य? ह॑ अस॑ आहे तर...नशा ही नशा है !!!)

विजुभाऊ Mon, 03/03/2008 - 12:42
...उगाच एकीची तुलना दुसरीशी करुन, ही उच्च अन् ती नीच असा दुजाभाव नको मा॑डूस ग॑ हे म्हणजे ऐश्वर्या राय देखणी कि जयश्री गडकर्..( मी सन्ध्या म्हणत नाही.....तीचे सौन्दर्य फक्त व्हि शान्तारामनाच दिसायचे).........मधुबाला सुन्दर की माधुरी.......... विषय तो नाही....मी विचारलेला प्रश्न हा आहे की रम , व्होडका , व्हिस्की , स्कोच , ब्रैन्डी , फेणी ,मोसंबी ,नारंगी यात नक्की फरक काय आहे? रम ची लत्ता पटकन आणि जोरात बसते आणि व्हिस्की ची लत्ता थोडी उशीरा का बसते.( सृष्टीलावण्य बाई ....शेवटी ती लाथ च....) हा ज्याचा त्याचा वैयक्तिक नसून सार्वत्रिक अनुभव आहे...(तात्या याला दुजोरा नक्की देतील)...... थोडासा अध्यात्मिक अनुभावा सारखा (तरिच कार्ल मार्क्स आध्यात्म ही अफुची गोळी आहे असे म्हणाला होत) हे असे का होते.

'धर्म अफूची गोळी आहे' असे काहीतरी ऐकले आहे मी. असो नशा ही नशा असते मग ती कसलीही असो. पण आम्हाला मद्याची नशा कधीच भावली नाही. :) आणि आम्ही न पिताच इतके बेधुंद आहोत की वेगळी दारू पिण्याची गरजच नाही. त्यामुळे नारिंगी, मोसंबी, ताडी, रातराणी, खोपडी यात रंगाचा फरक असतो इतके सोडून मी तरी काही सांगू शकत नाही. -असुरावादी(डॅनी) पुण्याचे पेशवे

कंजूस Sat, 09/02/2023 - 05:10
आता म्हणे ते घेऊन घेऊन डॉक्युमेंटेंशन करत आहेत ते खरं आहे का? त्या निमित्ताने देशाटन वगैरे. जपान आणि रशिया हे देशही यादीत असावेत.

पिवळा डांबिस Sat, 03/01/2008 - 11:26

सर्वदेव नमस्कार: केशवंप्रति गच्छति!!

या सर्वांमध्ये ते इथाईल अल्कोहोल नांवाचे द्रव्य आहे जे नशेला कारणीभूत आहे.

बाकी सर्व नांवे त्या त्या द्रव्याच्या रॉ मटेरिअल्स प्रमाणे पडली आहेत!!

ऊस, बटाटा, गहू, द्राक्षं, काजू, मोसंबी आणि संत्री (अनुक्रमे) या सर्वांमध्ये ग्लुकोज असते जे यीस्ट वापरून अल्कोहोलमध्ये परिवर्तित करता येते.  जसे यीस्ट वापरून इडलीचे किंवा पावाचे पीठ फुगवता येते त्याप्रमाणेच!  जर पीठ मर्यादेबाहेर फुगू दिले तर त्यास आंबूस वास येतो, तो इथाईल अल्कोहोलचा असतो.

या द्रव्यांना दिलेला वास आणि चव ही बहुतेक वेळा कृत्रिम असते.

बर्‍याचे वर्षांनी आपले रसायनशास्त्राचे ज्ञान कारणी लावणारा,

पिवळा डांबिस

विजुभाऊ Sat, 03/01/2008 - 11:15

मी या बाबतीत अज्ञानी आहे ..पामर आहे....बालक आहे.

मि पा वर बरीच तज्ञ मंड्ली आहेत्.ती अजून काही राहिले असल्यास सान्गतीलच्.........धन्यवाद्....तुमच्या उ.सु. बद्दल

विसोबा खेचर Sat, 03/01/2008 - 11:16

रम , व्होडका , व्हिस्की , स्कोच , ब्रैन्डी , फेणी ,मोसंबी ,नारंगी   यात नक्की फरक काय आहे?

बराच फरक आहे.. अनुभवांती ज्ञानप्राप्ती होईल! :)

आपला,
(सिंगलमाल्ट परिवारातला) तात्या.

विसोबा खेचर Sat, 03/01/2008 - 11:30

आता मद्याचाच विषय निघाला आहे, त्या अनुषंगाने मला पुढे ढकललेल्या इपत्राने आलेले हे काही टाईमपास विनोद! :)

१)

ब्रँडी + पाणी = किडन्यांना घातक
रम
+ पाणी = लिव्हरला
घातक
व्हिस्की
+ पाणी = हृदयाला
घातक
जिन
+ पाणी = मेंदूला
घातक
तेव्हा
,

पाणी
टाळा!!!

२)

आयुष्यात कधी ना कधी
आपण
स्वत:
ला
काही
महत्त्वाचे
प्रश्न
विचारलेच
पाहिजेत...

आपण
कोण आहोत?...
कोठून
आलो आहोत?...
कोठे
निघालो आहोत?...
आणि
जेव्हा तिथे पोहोचू
तेव्हा
तिथले
बार
उघडे असतील का
?!!!

३)

नेहमीच्याच बारमध्ये नेहमीच्याच मेंबरांची सपत्नीक पाटीर् ऐन रंगात आली होती. रामरावांसकट सगळ्यांनी दोन दोन क्वार्टर रिचवल्या होत्या. अचानक रामराव चित्कारले, ''मित्रहो, आपल्यापैकी जे विवाहित असतील, त्यांना मी असं आवाहन करतो की त्यांनी उठावं आणि ज्या व्यक्तीमुळे त्यांच्या आयुष्याला अर्थ लाभला, ज्या व्यक्तीमुळे त्यांचं आयुष्य सुखाचं झालं,त्या व्यक्तीच्या शेजारी जाऊन उभं राहावं...''

क्षणार्धात
रोज दारू र्सव्ह करणाऱ्या बगाराम वेटरशेजारी अशी काही झुंबड उडाली म्हणता!!!!

४)

तो फार सज्जन माणूस होता.

त्याने
कधी सुपारीच्या खांडाचेही व्यसन केले नाही.

त्याने
आयुष्यात एकही खोटा शब्द उच्चारला नाही.

त्याने
परस्त्रीकडे डोळा वर करून कधीही पाहिले नाही...

...
तो मरण पावला,


तेव्हा
इन्शुरन्स कंपनीने क्लेम नाकारला...

...
ते म्हणाले, 'जो जगलाच नाही, तो मेला कसा?!!!'

आपला,
(छंदिफंदी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

लिखाळ Sat, 03/01/2008 - 21:33
हा हा हा .... तात्या, विनोद जोरातच. ---लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

पिवळा डांबिस Sat, 03/01/2008 - 11:38

बार उघडे असतील का?!!!

मागे कुठेतरी एकदा वाचलं होतं,

जर स्मशानात बार ठेवले तर काय बहार येईल!  उगाच कवटी फुटेपर्यंत ताटकळत बसायला नको!  दोन-दोन पेग मारुन होतील.  स्मशानयात्रा ही (इतरांसाठी) आनंदयात्रा होईल!!

बार काय चालेल, काय चालेल!!! :))

लिहिण्यार्‍या महाभागाचे नांव लक्षात नाही पण तो आपल्या कुळीचाच असला पाहिजे, तात्या!!! :)))

 

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर Sat, 03/01/2008 - 11:54

लिहिण्यार्‍या महाभागाचे नांव लक्षात नाही पण तो आपल्या कुळीचाच असला पाहिजे, तात्या!!! :)))

आपल्या कुळीचा?!!!!!!!!

साल्या डांबिसा, मला का उगाच खेचतोस तुम्हा बेवड्यांच्या कुळीत?:)

आपला तर साला बुधवार-शनिवार ठरलेला आहे! ते देखील मोजून दोन ते अडीच पेग! तुमच्यासारखी रोजच्या रोज आपण टाकी फुल्ल करत नाही! :))

वा रे वा!! म्हणे आपल्या कुणीचा!!! ;)))

तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पिवळा डांबिस Sat, 03/01/2008 - 12:08

साल्या डांबिसा, मला का उगाच खेचतोस तुम्हा बेवड्यांच्या कुळीत?:)

आता साथ सोडून लगेच संभवित होतोस काय! :))

कबिराने म्हटलं आहे,

ऐसी प्रीत न किजिये, जैसे खिरा ने कीन|   (खिरा = काकडी)

बाहरसे तो मिले हुए, भीतर फांके तीन||

दुख्खी:,

पिवळा डांबिस

In reply to by विसोबा खेचर

पिवळा डांबिस Sat, 03/01/2008 - 12:18

आपला तर साला बुधवार-शनिवार ठरलेला आहे!

आणि आमची फक्त शुक्रवार संध्याकाळ!  म्हणजे आत्ता!! :))

आठवडाभर मेहेनत केल्यानंतर कंपनीच्या बैलाला घो! असं म्हणत आम्ही शुक्रवार संध्याकाळ साजरी करतो आणि वीकेंड आमच्या बायकापोरांत घालवायला मोकळे होतो!!!

In reply to by पिवळा डांबिस

छोटा डॉन Sat, 03/01/2008 - 12:26
आमचा पण जवळजवळ "शूक्रवार" हा ठरलेला दिवस आहे.[ बाकी इतर दिवशी एखद्या याराला जर ईच्छा झाली तर आम्ही त्याचा अपमान करत नाही.]
आत्तच आम्ही कालच्या 'अंमलातून' जागे होऊन आपल्या मिपा वर काय चल्ले आहे याची खबर घ्यायला आलो तर ही चर्चा ....
हाण तिच्यायला .....
आम्ही सध्या 'अविवाहित' असल्यामुळे तसा काही "डांबिसकाका" म्हणतात तसा 'बायका-पोरांबरोबर कार्यक्रम नसतोच ... त्यांउळे आम्ही शहरातील इतर 'प्रेक्षणिय स्थळे' पाहण्याच्या सुहेतूने शहरप्रदक्षिणा करत असतो.........

छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

अवांतर : अजून 'धमाल्या' आला दिसत नाही. म्हणे अजून अमलाखलीच आहे असे [थोडे थोडे ] दिसतयं

In reply to by छोटा डॉन

पिवळा डांबिस Sat, 03/01/2008 - 13:01

अजून 'धमाल्या' आला दिसत नाही. म्हणे अजून अमलाखलीच आहे असे [थोडे थोडे ] दिसतयं

अरे, त्याचा अंमल म्हणजे इंग्रजी सत्तेच्या अंमलासारखा आहे, दीर्घकालीन!! :)

इतक्यात थोडाच उतरणार? :)))

In reply to by पिवळा डांबिस

धमाल मुलगा Mon, 03/03/2008 - 11:37
ओ डॉनभाऊ, डा॑बिसकाका, का लहान पोरा॑ना बदनाम करताय??? (म्हणजे अस॑ सगळ्या॑समोर बोलून...आमच॑ गुपित उघड करताय) ह्या विका॑ताला जरा लैच बिझी होतो म्हणून हजेरी लावायची राहिली तर डायरेक्ट हे अस॑? आमचा कार्यक्रम तसा महिन्यातून एखाद्यावेळीच असतो, सगळी उपद्व्यापी भुतावळ एकत्र जमली की मग हा बेत पार पडतो. औ॑दाच्या विका॑ताला मात्र हे जुळून आल॑ आन् धूमशान मज्जा केली हो.... हे हे...तात्याशेठ, ते "बार उघडे असतील का?" लै भारी ! अरे, त्याचा अंमल म्हणजे इंग्रजी सत्तेच्या अंमलासारखा आहे, दीर्घकालीन!! :) इतक्यात थोडाच उतरणार? :))) अस॑ का? अस॑? आयला, दुसर॑ कोन भेटल॑ नाय का हो? का दिसला धमाल्या की मार त्याची ?:)))) आमचा पार "पी.के. गिरपडे" करुन टाकला राव तुम्ही.

In reply to by विजुभाऊ

विसोबा खेचर Sat, 03/01/2008 - 12:09

उत्तर टाळलंय कुठे?

बराच फरक आहे.. अनुभवांती ज्ञानप्राप्ती होईल! :)

असं उत्तर मागेच दिलं आहे! हां, आता ते ते मद्य कसं बनवतात, कशापासून बनवतात याबद्दल आपल्याला काय माहीत नाय!

आपल्याला काय, प्रत्येकाच्या चवीशी मतलब! आणि तो फरक शब्दात व्यक्त करता येत नाही, तर त्याचा अनुभव घेऊन पाहावा लागतो!

ती स्वानुभवातून येणारी अनुभूती आहे! :)**

**वरील वाक्य हे संत तात्याबा महाराजांच्या एका प्रवचनातील आहे! :)

असो..

आपला,
(जाणीवेतला-नेणीवेतला!) श्रीसंत तात्याबा महाराज.

In reply to by विजुभाऊ

पिवळा डांबिस Sat, 03/01/2008 - 12:22

असं माझ्या आणि तात्याच्या नादी लागाल तर आम्ही दिवसभर (आमच्याकडे रात्रभर) असेच अभिप्राय देत राहू! :))

तुम्हाला ज्ञानप्राप्ती करायची असेल तर लवकर दुसरा गुरू शोधावा हे उत्तम! :))))))))

विजुभाऊ Sat, 03/01/2008 - 12:29

रमणींच्या लत्ताप्रहाराने अशोक व्रुक्श वॄक्ष ( हा जमले एकदाचे) फुलतो असे म्हणतात.

रम च्या लत्ताप्रहाराने कोणता वॄक्ष  फुलतो

आणखी कसल्या लत्ताप्रहाराने कोणते वॄक्ष फुलतात?

In reply to by विजुभाऊ

पिवळा डांबिस Sat, 03/01/2008 - 12:43

या प्रश्नाचे उत्तर इथे येणारी ताज्या दमाची, तरूण, अविवाहित मंडळी देऊ शकतील!!!

आमचं आपलं, "पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा"

आमचा अशोकवृक्ष फुलून, पानगळ होऊन, आता वठला आहे, आलं का लक्षांत? :)))

(सरपंच बहुतेक आम्हाला 'समज' देणार या अभिप्रायाबद्द्ल!!! पण काय करणार, तुम्ही प्रश्नच तसा विचारलात!:))))

सॉरी, हो सरपंच!

मदनबाण Sat, 03/01/2008 - 12:29

मला मेल द्वारे आलेली एक सुंदर कविता:---

 

मी मेल्यावर गंध गुलाल लावुनी तिरडी माझी सजवा

मात्र त्यावर टाकावयाची फुले दारुत आधी भिजवा

माझ्या अंतयात्रेला सर्वजण शुध्दीत असावेत

मात्र चार खांदेकरी थोडेसे प्यायलेले असावेत

हे सर्व पाहुन तुम्ही म्हणाल बरं झालं बेवडा गेला

पण दारु प्यालेले म्हणतील आमचा जोडीदार गेला

असे हे जीवन .....! जगण्यापेक्षा मेलेले बरे

पण भिती वाटते मरण्याची म्हणुन थोडेसे प्यालेले बरे 

(रोज दारु सोडली म्हणणारा )

          मदन बाण

ओगलेशेठ, संध्याकाळी नसेल दारू जगू कशाला? जगलंच नाही तर दुसर्‍या दिवशी पिणार कसे बॉ? गावामध्ये नसेल बारू जगू कशाला? त्याकरिता आणून ठेवा घरात दारु...... दारू पिता मला वाटते हलके हलके खरयं..... या धरतीला होऊन भारू जगू कशाला? त्यापरि दारु पिउनी व्हावे हलके-हलके, जेणेकरूनी हा विचार मनी न झलके ;) आपला, (हलका-हलका) छोटी टिंगी ;)

सृष्टीलावण्या Sun, 03/02/2008 - 09:50
नशा येण्यासाठी लोकांना पैसे खर्च करावे लागतात आणि इतक्या सार्‍या गोष्टींचा आसरा घ्यावा लागतो... अरेरे... आपल्याला तर बुवा, भेळेच्या दुकानाबाहेर येणार्‍या चुरलेल्या कांदा-कोथिंबिरीच्या वासाने, पहिल्या पावसाच्यामुळे मातीला येणार्‍या वासाने, मंदीरांच्या बाहेर असणार्‍या चाफ्याच्या सड्यामुळे, कवितांच्या हृदयस्पर्शी ओळीमुळे, मांजराच्या पिल्लाच्या बागडण्याने नशा येते. त्यासाठी कृत्रिम साधनांची आवश्यकता वाटत नाही.

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर Sun, 03/02/2008 - 10:13
प्रत्येक नशेची गंमत वेगळी, अनुभव वेगळा! आम्हाला वरील गोष्टींतूनही नशा येते आणि उत्तम प्रतिच्या विदेशी मद्यानेही आम्ही दोन घटका धुंद होतो! तसं पाहायला गेलं तर आम्ही उत्तम लागलेल्या तानपुर्‍यांच्या जोडीच्या गुंजारवातही अगदी रमून जातो आणि अण्णांच्या पुरियातल्या निषादानेही आमचं देहभान हरवतं! एखादी मधाळ तरूणीही आम्हाला अवचित घायळ करते! आपण दिलेली यादी फारच तोकडी आहे! या जगात धुंद करणार्‍या, बेहोष करणार्‍या अनेक गोष्टी आहेत. प्रत्येकाची गंमत वेगळी, मजा वेगळी! आणि ती लुटताना आम्ही कधीच, 'हीच काय ती नशा!' अशी संकुचित वृत्ती ठेवत नाही! तात्या.

In reply to by सृष्टीलावण्या

पिवळा डांबिस Sun, 03/02/2008 - 20:03
आपल्याला तर बुवा, भेळेच्या दुकानाबाहेर येणार्‍या चुरलेल्या कांदा-कोथिंबिरीच्या वासाने, पहिल्या पावसाच्यामुळे मातीला येणार्‍या वासाने, मंदीरांच्या बाहेर असणार्‍या चाफ्याच्या सड्यामुळे, कवितांच्या हृदयस्पर्शी ओळीमुळे, मांजराच्या पिल्लाच्या बागडण्याने नशा येते. याचा अर्थच, नशा म्हणजे काय हे तुम्हाला ठावूक नाही. आणि 'नशा' आणि 'प्रसन्नता' यांतील फरक तुम्हाला कळलेला दिसत नाही.... नशा येण्यासाठी लोकांना पैसे खर्च करावे लागतात आणि इतक्या सार्‍या गोष्टींचा आसरा घ्यावा लागतो... जी गोष्ट आपल्याला माहिती नाही ती विचारावी. उगाच व्यर्थ तारे तोडण्यात काय अर्थ? :))

सृष्टीलावण्या Sun, 03/02/2008 - 20:11
हे म्हणजे, "आपण खाल्लं की गोमय आणि दुसर्‍याने खाल्ले की शेण" ह्यातला प्रकार झाला. आपणाला येते ती नशा आणि दुसर्‍याला येते ती प्रसन्नता????? बापु, चुरलेल्या कांदा-कोथिंबिरीला सुद्धा मादक वास असतो बरे... अर्थातच त्याची नशा आपल्याच नियंत्रणात असते.. ती सोडायला अल्कोहोलिक्स अनॉनिमस लागत नाही... कळावें, लोभ असावा... आणि राग नसावा, आपली, सृष्टीलावण्या परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

In reply to by सृष्टीलावण्या

पिवळा डांबिस Sun, 03/02/2008 - 20:17
"आपण खाल्लं की गोमय आणि दुसर्‍याने खाल्ले की शेण" ह्यातला प्रकार झाला. आपणाला येते ती नशा आणि दुसर्‍याला येते ती प्रसन्नता????? म्हणजे तुमच्याच म्हणण्याप्रमाणे, गोमय = नशा शेण = प्रसन्नता! ठीक आहे, आपली हरकत नाही!! :)))))

धमाल मुलगा Mon, 03/03/2008 - 11:52
अरे, सृष्टीताई, आम्हीसुद्धा आपल्यासारखेच त्या सगळ्या गोष्टी॑नी धु॑द होतो बर॑...मजा येते ! त्याशिवाय, आपल्या आवडत्या व्यक्तीच्या डोळ्यात रोखून बघत काळवेळाच॑ भान हरपून वेडे होतो, ह्या सगळ्याने आम्हाला नशाही येते, धु॑दीही जाणवते आणि प्रसन्न देखिल वाटते.... पण.............. आम्ही बिचारे सर्वसामान्य लोक ब्रम्हान॑द टाळीच्या योग्यतेला पोहचू शकत नाही, मग...उन्मनी अवस्थेस जाण्याकरीता आम्हाला पैसा खर्च करावा लागतो. ह्या सगळ्या नशा॑चे आपापले स्वतःचे खास असे बाज आहेत...उगाच एकीची तुलना दुसरीशी करुन, ही उच्च अन् ती नीच असा दुजाभाव नको मा॑डूस ग॑ ! तो त्या सगळ्याच नशा॑चा अपमान ठरेल! असो, जो जे वा॑छिल तो ते लाहो | तिन्हीलोक धु॑द राहो | आपला, - ड्ड म्मा ळ.... (अरे..हे अस॑ का होत॑य? ह॑ अस॑ आहे तर...नशा ही नशा है !!!)

विजुभाऊ Mon, 03/03/2008 - 12:42
...उगाच एकीची तुलना दुसरीशी करुन, ही उच्च अन् ती नीच असा दुजाभाव नको मा॑डूस ग॑ हे म्हणजे ऐश्वर्या राय देखणी कि जयश्री गडकर्..( मी सन्ध्या म्हणत नाही.....तीचे सौन्दर्य फक्त व्हि शान्तारामनाच दिसायचे).........मधुबाला सुन्दर की माधुरी.......... विषय तो नाही....मी विचारलेला प्रश्न हा आहे की रम , व्होडका , व्हिस्की , स्कोच , ब्रैन्डी , फेणी ,मोसंबी ,नारंगी यात नक्की फरक काय आहे? रम ची लत्ता पटकन आणि जोरात बसते आणि व्हिस्की ची लत्ता थोडी उशीरा का बसते.( सृष्टीलावण्य बाई ....शेवटी ती लाथ च....) हा ज्याचा त्याचा वैयक्तिक नसून सार्वत्रिक अनुभव आहे...(तात्या याला दुजोरा नक्की देतील)...... थोडासा अध्यात्मिक अनुभावा सारखा (तरिच कार्ल मार्क्स आध्यात्म ही अफुची गोळी आहे असे म्हणाला होत) हे असे का होते.

'धर्म अफूची गोळी आहे' असे काहीतरी ऐकले आहे मी. असो नशा ही नशा असते मग ती कसलीही असो. पण आम्हाला मद्याची नशा कधीच भावली नाही. :) आणि आम्ही न पिताच इतके बेधुंद आहोत की वेगळी दारू पिण्याची गरजच नाही. त्यामुळे नारिंगी, मोसंबी, ताडी, रातराणी, खोपडी यात रंगाचा फरक असतो इतके सोडून मी तरी काही सांगू शकत नाही. -असुरावादी(डॅनी) पुण्याचे पेशवे

कंजूस Sat, 09/02/2023 - 05:10
आता म्हणे ते घेऊन घेऊन डॉक्युमेंटेंशन करत आहेत ते खरं आहे का? त्या निमित्ताने देशाटन वगैरे. जपान आणि रशिया हे देशही यादीत असावेत.

रम , व्होडका , व्हिस्की , स्कोच , ब्रैन्डी , फेणी ,मोसंबी ,नारंगी   यात नक्की फरक काय आहे?

तज्ञानी सल्ला द्यावा....मला यातली शून्य अक्कल आहे? उगाच हाय कम्बख्त तूने पी ही नही असे रिमार्क्स मारू नका?