कालिकत अणि माहेचे वर्णन चांगले होते....
हे कालिकत आणि कोझीकोडे एकच हे मला देखील ठाउक नव्हते....
माझ्या लिखाणाचा दर्जा मलाच सुमार वाटतो आहे. पुढे लिहावे की न लिहावे हा पेच पडला आहे
अहो , या लेखात जाता जाता मित्रांबरोबर केलेल्या गमती आणि संवाद यांचे वर्णन कमी आहे ,त्यामुळे कदाचित तुम्हाला एकसुरी वाटत आहे... तुमच्या मित्रांची वर्णने आणि संवाद हे कदाचित तुमच्या आधीच्या प्रवासवर्णनातील सामर्थ्य असावे असे वाटते... पण अजून भाग येउद्यात्...छान चाललंय... :)
कालिकत म्हणजेच कोझिकोडे... वा ज्ञानात भर पडली.
दुकानांच्या पाट्यावर सगळ्या जिलेबी काढलेली. क्वचित एखादी फ़िरंगी पाटी. शेवटी एका हॉटेलातील वेटरने इडली, डोसा, चपाती, रोटी कोठे मिळेल ते मल्याळीमध्ये खाणा खुणा करून सांगितले. खाणाखूणा मात्र कळल्या.
हे मस्त. मला आमची कोडाईकॅनल ची ट्रीप आठवली.
- (सर्वव्यापी)प्राजु
सुधीरराव असा धीर सोडू नका बुवा. दौरा मस्तच रंगतोय. पुढच्या ठिकाणी जायला आम्ही उत्सुक आहोत तेव्हा पेट्रोल भरून तयार राहा.
माझ्या लिखाणाचा दर्जा मलाच सुमार वाटतो आहे. पुढे लिहावे की न लिहावे हा पेच पडला आहे
असे म्हणून आम्हाला तुम्ही पेचात पकडताय. पण आम्ही तुम्हाला इतक्या सुखासुखी सोडणार नाही. पुढची कहाणी लवकरात लवकर पेश करावीत असा 'जनरल डायर' कडून आदेश काढायलाही आम्ही कमी करणार नाही. तेव्हा पुढे काय घडले ते शहाण्या मुलासारखे आम्हाला सांगा बघू.
कोझीकोडे हे तर आमचे घर.....
येथेच असतो सध्या...
माहि (माहे) केंद्रशासित प्रदेश आहे....दारू केरळाहून खूप स्वस्त....जाण्या येण्याचा खर्च सुटेल एवढी...
वायनाडला नाही गेलात?? अरेरे.....
केरळ...
(उसासे)
अनिकेत.
आता हे सगळे लिखाण एकसुरी(मोनोटोनस) व्हायला लागले आहे असे वाटते.
मुळीच नाही.... पुनःप्रत्ययाचा आनंद येतोय...
कालडीला मगरीने पकडल्यानेच आद्य शंकराचार्य संन्यासी बनले.. आणि बौद्धकाळात अद्वैतवाद आणि हिंदू धर्म वाचवला.... ब्राह्मसूत्र शांकरभाष्यात सर्वांचे खंडन केले...
येवढ्या लहान वयात संपूर्ण देश कसा काय हिंडले असतील? माझी अजून लोकल पकडायला फाटते...
गुरूवायूर miss केलेत? अरेरे...
अनिकेत
कांदळकरसाहेब,
लेखन छान सुरू आहे, ओघवतं होत आहे. वाचायला मौज येते आहे...
कृपया पुढील भागही येऊ द्या. नाउमेद होऊ नका. प
प्रतिसादांचं राजकारण, अर्थकारण वगैरे कसं करायचं, हे मी तुम्हाला सवडीने शिकवेन. :))
तात्या.
लय भारी...लय सापडली आहे की काका तुम्हाला.
अस॑ का म्हणताय? अहो तुम्ही लिहा हो बिनधास्त. मी आहे ना वाचायला! माणसान॑ कस॑ माझ्यासारख॑ रहाव॑...(राजासारख॑ वाच॑ल॑त का? तस॑ म्हणा हव॑ तर. ) वाटल॑... लिहिल॑... कोणाला आवडल॑ आन॑द वाटतो. नाही आवडल॑, माफ करा म्हणायच॑ पुढे चालू लागायच॑.
हे काय भलत॑च बोलताय?
आपल्या तर आवडल॑ बॉ. हे असले हाल मी बे॑गळूरला पहिल्या॑दा गेलो होतो तेव्हा सोसले होते. पण आता जमत॑ थोड॑ थोड॑ :)
असो,
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत....
-ध मा ल.
अहो तुमचा अनुभव जसा असेल तसेच प्रतिबिंब लिखाणात येणार, उगीचच ओढूनताणून प्रत्येक भाग नीटनेटकाच असावा असा आग्रह का? तो नैसर्गिक असणे जास्त मजेचे आणि खर्या आनंदाचे! वर सतलजने लिहिल्याप्रमाणे तुमच्या मित्रमंडळीतल्या खुसखुशीत संवादांची फोडणी मात्र जरा कमी पडली, ती तेवढी पुढच्या लेखात वाढवा. बाकी आम्ही वाचतोय काळजी नको.
चतुरंग
लिहिले पण नेटवरच्या तांत्रिक अडचणींमुळे चढवता आले नाहीत. तेव्हा मुंबईत होतो.नेटवरचा माझा वावर चिकाटीचा नव्हता. संपर्क तुटला तर गडबड व्हायची. नंतर घरी येणार्या शाळकरी पोरांनी माझ्या नावाने ब्लॉग उघडून ब्लॉगवर चढवले.
http://pravaassudhirsange.blogspot.com/
इथे सापडतील.
इथे छोट्या गावात तर फार गडबड होते. मी मोबाईलची नेटसेवा वापरतो. मोबाईल खिडकीबाहेर ठेवावा लागतो. पावसाळ्यात पंचाईत होते. महागडा फोन प्लॅस्टीक पिशवीत घालून पावसात ठेवायला धीर होत नाही. ३जी नेट येतेजाते. कधी कासवगतीने चालणारे २जी. मी ते मोबाईलमधून हॉटस्पॉटने लॅपटॉपला संपर्क साधून वापरतो. कधी कधी दोनतीन वेळा मोबाईल आणि लॅपटॉप रीस्टार्ट केल्यावरच नेट मिळते. कधीकधी दोनदोन दिवस नेट मिळतच नाही. असो. आपण दाखवलेया स्वारस्याबद्दल धन्यवाद.
आताही हेच नेटचे प्रॅाब्लेम होतात? माझे ३जी फोन आणि वोडाफोनची गंडलेली ३जी सेवा याला उत्तर सापडलं. रिलाअन्स वाइफाइ रूटर. अलिबाग, गुजरात, राजस्थानमध्ये आढाच तपासले. पाच एमबीपीएस स्पीड मिळतोच. हजार रुपयाच्या डबीत काम झालं.
प्रतिक्रिया
कालिकत अणि
कालिकत
छान चाललाय प्रवास!
आई ग....
आणि....
सर्वांना धन्यवाद.
छान सुरू आहे..
मस्त
लय भारी...लय
सुधीरजी, वर
सुधीरराव चालू दे,
ह्याचा पुढील भाग कुठे? का
मी हे सावकाश वाचेनच.
पुढील भाग संगणकात .......
आताही हेच नेटचे प्रॅाब्लेम