श्रीगणेश लेखमाला : लेख क्रमांक ५ : माझी मी जन्मले फिरुनी
माझी मी जन्मले फिरुनी
माझी मी जन्मले फिरुनी
गौरीचा नैवेद्य: गवसणीच्या पोळ्या आणि शेवयांची खीर
माझ्या आईच्या माहेरी...सांगलीतील वाळवा गाव तिचं ... गौरी जेवणाला गवसणीच्या पोळ्या आणि खीर करतात. तिच्यामुळे आमच्याकडेही या पोळ्या होतात. आमरस आणि ही पोळी पण खूप छान लागते. मला तर वाटतं गणपतीत मोदकाची उकड उरली की काय करायचं यातूनच याचा शोध लागला असावा.
साहित्य:
एक वाटी तांदूळ पिठी,
दीड वाटी पाणी,
एक चमचा लोणी,
मीठ.
WA वर एक पोस्ट वाचली कि,
संदीप खरे यांना विनंती आहे कि, जेलमधे एकत्र आलेल्या बाबांसाठी "जमलेल्या बाबांची कहाणी" असं एखादं गाणं आहे का?
ती वाचून किडे वळवळले आणि जमलेल्या बाबांऐवजी "माजलेल्या बाबांची" असं विडंबन करण्याची इच्छा झाली. कृपया बदल सुचवा म्हणजे WA वर मित्रांवर शायनिंग मारता येईल.
चाल: "दमलेल्या बाबांची कहाणी"
अशक्य (कथा) (काल्पनीक) -- भाग ३
(अशक्य (कथा) (काल्पनीक) -- भाग १ ची लिंक - http://www.misalpav.com/node/40769 )
(अशक्य (कथा) (काल्पनीक) -- भाग २ ची लिंक - http://www.misalpav.com/node/40786 )
प्रास्तविक : माझे वडील गेल्या ३७ वर्षांपासून श्वसनविकार व ॲलर्जीतज्ञ म्हणुन प्रॅक्टीस करत आहेत, सुरवातीच्या ८-९ वर्षांनतर त्यांना रुग्ण प्रशिक्षण कार्यक्रमाची कल्पना सुचली तेव्हापासून आमच्या दवाखान्यात दमा ,COPD आणि टिबी या आजारांसाठी रुग्ण प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जातो .... ह्या कार्यक्रमाची २००९ साली लिमका बुक आॅफ रेकाॅर्डस् मध्ये नोंद घेतली गेली (१०,००० पेक्षा जास्त रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना प्रशिक्षीत केलं गेलं) आणि इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड मध्ये देखिल दखल घेतली गेली आहे.
अशक्य (कथा) (काल्पनीक) -- भाग २
( अशक्य (कथा) (काल्पनीक) -- भाग १ ची लिंक - http://www.misalpav.com/node/40769 )
काही दिवसांनंतर -------------
भागीरथ उद्योगसमुहाने उद्योग जगतात नुकतीच २५ वर्षे पुर्ण केली होती . त्या निमित्ताने या समुहाच्याच एका पंचतारांकीत हॉटेलमधे भव्य समारंभ आयोजीत केला होता .
आयुष्यातील आठवणी ह्या
हिवाळ्यातील धुकं पसरलेल्या वाटेसारख्या असतात ...
आपण जसजसं दूर जाऊ
तसतश्या त्या अंधुक होत जातात ...
पण काही आठवणी ह्या
त्या धुक्यातील सूर्यकिरणांसारख्या असतात ...
आपण कितीही दूर गेलो ना
तरी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव ते कायम देत राहतात ...
स्वीच on / स्वीच off हे असे शब्द मानसिक संतुलनाबाबत असंख्य वेळा ऐकायला मिळतात. मला तर अनेक सामन्यांतून हेच जाणवतं , शिकायला मिळतं. फक्त अनुभवी खेळाडूच नव्हे, तर नव-नवे खेळाडू देखील हल्ली त्यांचा खेळ अचानक पणे बदलून परिस्थितीनुसार बदलताना दिसतात. मग तो फक्त एकच फलंदाज (उमेश यादव) शिल्लक राहिला असताना अचानक t २० पद्धतीत सामना फिरविणारा हार्दिक पंड्या असो, किंवा युगंधर महेंद्र सिंह धोनी असो.
चला झाला स्वातंत्र्यदिन!! जोडून आलेल्या सुट्या पण संपल्या. देशभक्तीचा पूर आता ओसराला असेल आणि सगळं कसं पूर्ववत होऊन जाईल. सगळया थोरामोठ्यांचा तसबिरीवरच्या फुलांच निर्माल्य विसर्जन त्याच्या विचारसहित करून पुढच्या स्वातंत्र्यदिनाची वाट बघू या.
१९८८ मध्ये श्री. चंद्रकांत काळे यांनी शब्दवेध या संस्थेची स्थापना केली. शब्द व स्वर यांचे वेड असलेल्या माणसांनी एकत्र येऊन पहिला कार्यक्रम केला तो "अमृतगाथा " संतांनी भक्तीरचना रचल्या; त्यातील लोकसंगीताशी नाळ असलेल्या काही रचना एकत्र करून.सुरवात केली. पुढे त्यांनी कै. ग्रेस यांच्या कवितांवर सांजवेळ, प्रीतरंग, शेवंतीचे बन, आख्यान तुकोबाराय असे मराठी कवितांवरचे कार्यक्रम सादर केले. आंतरभारतीचा कार्यक्रम म्हणून गुरूवर्य रविंद्रनाथ टागोर यांच्या कवितांचे भाषांतर व "नाटक्याचे तारे " हा कै.