मनाचा एकांत - रवा आणि खसखस
रवा आणि खसखस
वेगवेगळे करायची
शिक्षा भोगताना,
सूक्ष्म नजरेने,
एकाग्र चित्ताने,
वेचत राहते मन
जनामनातले साम्यभेद
तासनतास,
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी!
शिवकन्या
रवा आणि खसखस
वेगवेगळे करायची
शिक्षा भोगताना,
सूक्ष्म नजरेने,
एकाग्र चित्ताने,
वेचत राहते मन
जनामनातले साम्यभेद
तासनतास,
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी!
शिवकन्या
===============================================================================
त्या घरात दोघी बाया रहातात.
एकीच्या पाठीवर पंख आहेत,
तर दुसरीच्या पायात पैजण.
दोघींना पहाटेची चिकार स्वप्न पडतात,
ती स्वप्नं डोळ्यात घेऊनच त्या उठतात.
पंखवालीला दिसते शुभ्र आकाश, निळे डोंगर,
तर पैंजणवाली बघते सुंदर सजवलेलं नीटस घर.
दोघी आपापल्या स्वप्नांना न्याहाळत रहातात,
एकमेकींकडे पाठ करून स्वप्नांनाच जवळ करतात.
घर बिचारं दमून जातं,
पंखांच्या फडफडाटाला छेद देणारा,
पैजणांचा छुमछुमाट ऐकत रहातं.
दिवस मावळत येतो.
पंख दमतात, पैंजण थकतात,
दोघीजणी एकमेकींना सामोर्या येतात.
अमावास्या हा दिवस आपल्या कडे अशुभ मानतात ..
वातावरणात अनेक अघोरी व अमानवी शक्ती वास करत असतात व त्या अमावास्येला कार्य रत होतात.
या बाबतच्या दोन आठवणी ..
१...भोसरीत तुफान पाऊस सुरू झाला होता...
कारखान्यात अडकून बसण्याची वेळ आली..गाडी सर्विसिनंग ला टाकली होती
तेवढात मित्राची गाडी दिसली व त्याला थांबवून रिक्षा स्ट्यांड पर्यंत सोडण्याची विनंती
केली..
पुण्याचे भाडे म्हटल्यावर रिक्शावाला पण खूश..
पुल ओलांडला अन चौकात जाम होता.
रिक्षावाल्याला म्हटले भाऊ..खडकीवरुन होळकर पुलावरून येरवडा मार्गे चल..
तो बोलेना..म्हटले ५-५० ज्यादा घे..
नमस्ते मित्रांनो
मी काही दिवसापुर्वी सर्व चांदोबा माझ्याकडे आहेत म्हणून एक पोस्ट टाकली होती . टाकताना असे वाटले की कोण वाचणार आणि कोण आजकाल वाचतो
पण मित्रांनो सुरेख प्रतिसाद मिळाला भरपूर जणानी तर मला वैयक्तिक मेसेजेस केले. कौतुक केले की तुम्ही हा ठेवा जपून ठेवलाय म्हणून
************************
भाग ६ - केलाँग ते कारू
************************
प्रेरणा : ओळखली ना ? ( डॉक खरेकाका ह घ्या..)
मागच्या रविवारी संध्याकाळी नवऱ्या बरोबर फिरायला गेले होते.. (मुळात सकाळी संध्याकाळी आम्ही भरपूर भांडण करत असल्याने रविवारी संध्याकाळी आम्ही आवर्जून फिरायला जातो.) तेंव्हा आमचा एक पुतण्या रमेश तिथे फिरताना दिसला. नमस्कार चमत्कार झाल्यावर त्याला विचारले एकटाच इकडे कुठे फिरतो आहेस. त्यावर तो म्हणाला आम्ही इथे जवळच नवीन घर घेतले आहे. आणि आग्रहाने आम्हाला त्याच्या घरी घेऊन गेला.
प्रास्ताविक
हं एक ब्लॉग काय लिहिला फार मोठा लेखक झाला वाटतं “प्रास्ताविक” म्हणे.
चांदण्यात एकदा न्हायचंय मला
ताऱ्यांच्या गावाला जायचंय मला
वेळूच्या बनात दूर किर्र रानात
गातो जे गीत वारा, गायचंय मला
रात्रीच्या काळोखात नदीच्या पात्रात
सोडलेल्या दिव्यासंगे वाहायचंय मला
अंधारात सुगंधाचा मागोवा घेत घेत
स्वप्नांच्या गावाला जायचंय मला
माझ्यात जो खोल खोल बसलाय दडून
त्याचा रूप एकदा पहायचंय मला
रोजच्या जीवनात मला पडणारे प्रश्न
शहर कोणतेही असो
निवडणुका आल्यावर प्रत्येक रस्त्याच्या सुरूवातीला व शेवटी सदरचा रस्ता कोणत्या आमदार / खासदार वा नगरसेवकाच्या कुठल्या निधीतून झाला किती खर्च झाला
ठेकेदार कोण होते
असे भपकेदार पोस्टर / बँनर झळकत असतात
पण जेव्हा
त्याच रस्त्यावर खड्ड्याचां भुलभुल्लैया होतो
नागरिकांच्या मनक्यांचा शाँक अबझाँरव्हर होतो
वाहनांचा खुळखुळा आणि शरीराचा भुगा होतो