Skip to main content

विडंबन

उद्या कट्टा आहे....बाकीची माहिती खाली देत आहे....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 14/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार, मिपाकर मोदक (हे लायन सो-सो, श्री-अमुक-तमुक. अशा चालीवर वाचले तरी चालेल.), सध्या मुंबई परीसरात असून ते कट्टा करायला तयार आहेत असे समजले. जास्त पाल्हाळ न लावता, कट्ट्या संर्दभात माहिती देत आहे. तारीख - १५-०९-२०१५ वेळ - रात्रीचे ८ ठिकाण - ३८, बँकॉक स्ट्रीट, ठाणे.

(तुझे पाशवी बोलणे ते अवेळी)

लेखक चतुरंग यांनी रविवार, 13/09/2015 05:19 या दिवशी प्रकाशित केले.
विशाल कुलकर्णींची सुरेख गजल 'तुझे मजवरी भाळणे ते अवेळी वाचली आणि लगोलग वेगळ्याच अवेळा आठवल्या. सादर आहे ... ;) तुझे पाशवी बोलणे ते अवेळी तुझे चक्रमी हासणे ते अवेळी जसे नासिकेचे अकाली बरसणे तुझे काहिही बरळणे ते अवेळी लपे 'चंद्र' केसांमध्ये तातडीने तुझे वीग शाकारणे ते अवेळी नको आप्त, वीकांत हा फक्त माझा तुझे तात का 'बैसणे' ते अवेळी? नको स्वर्ग, मी कुंभिपाकीच जातो तुझे रातचे घोरणे ते अवेळी मिटे आसही या क्षणी ऐहिकाची तुझे हालती पाळणे ते अवेळी!! 'लगावली' : अगागा अगागा अगागा अगागा वृत्त : भुजंगप्रपात -चतुरंग
काव्यरस

गंड मार्गदर्शन काव्य- मार्फत प्रेरणा दायी हम्मा (आम्ही प्रेरणा देतो :) )

लेखक माहितगार यांनी शनिवार, 12/09/2015 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
कामधेनु दावणं सोडून केव्हाच गेली काळाच्या पडद्याआड गोठाही केव्हाच गेला न पळी राहिलीए ना पंचपात्र किणकीणाट होतो कधीतरी कुठे कुठे रिकामा किणकीणाट करणारे,तेवढेच त्यांच्या नावे नुसताच टाहो फोडणारे संपत आलेल्या किणकीणाटाला खणखणाट समजून अथवा भासवून उगाच खडे फोडतात कधी कधी शिळ्याकढीला ऊत आणून कधी सत्तेच्या आशेने कधी कल्पवृक्ष मिळवून देण्याच्या मृगजळी स्वप्नाने कधी कामधेनू आपल्याही गोठ्यातून निघून गेली या दु:खाने त्यांनी इतिहासाच्या अभिमानाची रेष जेवढी फुगवून दाखवीली बरोबरीस अन्यायाची रेष तेवढीच फुगवून दाखवतो पण मूळ रेषेत फुगवटा होता हे मी विसरूनच जातो. ते इतिहासात आहेत याचं रडगाण मी गातो पण

हम्मामा म्हणे किंवा हसरी मिसळ हाणून मठ्ठा, दे रसिका दिदारसा...

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 10/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा वक्रमाप म्हणा हवे तर , बाजार हा आरसा खुपणे वा सुरस काय, पारख असो माणसा... निवडीचे स्वांतत्र्य इथे , तूप असोवा डालडा सृजन नाही सर्जन नाही , निंदला अतिसारसा.. टिकाभैरवांचे असो नृत्य तांडव मुक्तसे जिंकतो पडलेला जैसा वाढे अभ्याससा.. दोष नाही राऊळी शोध विठू राहे अंतरी हसरी मिसळ हाणून मठ्ठा, दे रसिका दिदारसा... मिसळ असते रोज नवी नवे वादळ रोज उठे ओलांडता सीमा आपुल्या मिळतील मित्र रोज नवे... हम्माऽऽऽ ...

(इच्छामटण)

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 08/09/2015 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
इच्छामटण ह्याचा अर्थ मनात इच्छा आली की "चांगले मटण" खायला मिळणे असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात आणि शेवट तांबड्या पांढर्‍या रस्स्याने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते , बायकोच्या हातात असते. ’इच्छामटण हवे’ असे तोंड खवळलेल्या व्यक्तीने सांगितले तरी श्रावणात घरातल्यांना ते पटत नाही. चातुर्मासात घरी गुपचुप मटण बनवुन खाणे अवघड असते. बायको समजुतदार असली तर त्यातल्या त्यात चांगले. परंतु बायको श्रध्दाळु असली आणि नातेवाई़क आसपास रहाणारे असतील तर मात्र अशा चवीने मटण खाणार्‍यांची अवस्था खुप दयनीय होते.

या पाच गोष्टी कायम कराव्यात

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 08/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
1. आपले वाहन नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावे. उजव्या बाजूने चालविल्यास डाव्या-उजव्यातला फरक आपल्याला कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन आपले हसे होईल. 2. चौकात आल्यावर लाल रंगाचा वाहतूक दिशादर्शक दिवा दिसल्यास तो विझेपर्यंत आणि हिरवा दिवा लागेपर्यंत थांबावे. न थांबता पुढे गेल्यास आपल्याला लाल-हिरव्या रंगातला फरक कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन लोक आपली टर उडवतील. 3. नियमांचा उल्लंघन करून वाहन चालविण्यामुळे पोलिसमामाने दंड केल्यास आपली फजिती कोणाला सांगू नये कारण सगळे आपली चेष्टा करून आपल्यावर हसतील. 4.

हरल्या आशांनी बघतो, तू मंत्री आगळा नाही

लेखक माहितगार यांनी सोमवार, 07/09/2015 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा आणि प्रेरणा जणू खिशांत नागर मर्जी, जग माझिया वाणीवरती पण अवखळ नागरवासी, मज संत म्हणाले नाही ....... किती काळ उलटला मंत्र्या, नित नवीन म्हणशी तूही ....... जरी रूप पालटले तुही, तू मंत्री आगळा नाही मी परतून आलो तरीही, माझे ना सरले काही दमलो मी घेऊन माला, मज संत म्हटले नाही ....... समजता मोल खातीचे आलेला परतून जाई .......

या पाच गोष्टी रोज सकाळी कराव्यात!

लेखक दमामि यांनी सोमवार, 07/09/2015 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
१ रोज सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा डोळे उघडावेत. यामुळे झोप निघून जाण्यास फायदा होतो. 2 नंतर चेहरा धुवावा. त्यामुळे ताजेतवाने वाटते. ३ यानंतर दात घासावेत. टुथपेस्ट आणि ब्रशने घासले तर फारच उत्तम, पण ते नसल्यास मीठ, हळद, लिंबू, कोळसा यापैकी काहिही वापरले तरी चालेल. मुख आरोग्यास लाभदायक असते. ४ यानंतर शौचास जाऊन यावे. कुणा थोर व्यक्तीने (म्हणजे मीच ) म्हटल्याप्रमाणे "पोट साफ तर मन साफ) ५ आणि नंतर पेला भरून वाफाळता चहा घ्यावा. या पाच गोष्टी नित्य नियमाने केल्यास दिवस चांगला जातो.

सच्चे वरण

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 06/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
सच्चे वरण ह्याचा अर्थ ’mageireména fakés / kalós fakés’ (ग्रीक शब्द) ", "gut Linsen (जर्मन शब्द)", "bien lentilles (फ्रेंच शब्द)" म्हणजेच "चांगले शिजलेले एकजीव झालेले वरण" असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात चांगल्या वरणभाताने आणि शेवट चांगल्या ताकभाताने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते. ’सच्चे वरण हवे’ असे अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्तीने सांगितले तरी घरातल्यांना ते पटत नाही. अंथरूणाला खिळलेल्या वृद्ध व रूग्णांना सच्चे वरण देणे अवघड असते. नवरा किंवा बायको असली तर त्यातल्या त्यात चांगले.

मिपावर निलंबने वाढत आहेत

लेखक आनन्दा यांनी शुक्रवार, 04/09/2015 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपावरील निलंबनांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने निलंबनांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या चांगल्या प्रतिसादकर्त्यांना मखरात सजवले जाते, तिथे अशा प्रकारची निलंबने बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके असहिष्णु आहोत का की आज आपल्याला चांगले विरोधी लेखन दुरापास्त होत आहे. ज्यांनी मिपाचे उत्तमोत्तम धागे हायजॅक केले, आपला वेळ देउन पंचशतकी केले तेच आज (असल्या निलंबनकारांमुळे) मिपापासुन दूर गेलेले पाहून मन दु:खी होते. सामान्य वाचक अशी आशा करतात की चांगले धागा-अपहरणकर्ते उत्तमोत्तम काड्या टाकत राहतील.