Skip to main content

विडंबन

मुठठा माई (विडंबन)

लेखक गरजू पाटिल. यांनी शुक्रवार, 22/05/2015 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्गंध वाहते दुर्गंध वाहते मुठठा माई तीरवरल्या कोणालाही, पर्वा तीचि नाही. कुणी टाकि तित कचरा आता, कुणी टाकिती पूज्यदेवता. पाषाणाची पाहूनी ह्रुदये, पाहूनी ह्रुदये, मोजित दिन राहीली. दुर्गंध वाहते मुठठा माई तीरवरल्या कोणालाही, पर्वा तीचि नाही. सतत वाहते गढुळ पाणी, कुणी नं धजतो उचलन्या घाणी. आळ्शांस ही व्हावी कैसी मुठठा ही फलदायी ? दुर्गंध वाहते मुठठा माई तीरवरल्या कोणालाही, पर्वा तीचि नाही. माडगुळकरांची माफी मागून बरका, त्यांच्या 'गीताची' छेड काढतोय........ (संथ वाहते कृष्णामाई) दुर्गंध मानुन घ्या.........

('मी' ची कहाणी )

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 21/05/2015 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
हे चित्र म्हणजे 'मी' च्या कहाणीचे महत्वाचे वळण आहे. माझा अभिप्राय ह्या कवितेची कहाणी वाचून एका मैत्रिणीने ह्या 'मी' कले विषयी विचारले. मी या प्रकारे बनवलेल्या मी आर्टिफॅक्ट्स ची लाइन लाँच करणार आहे हे बर्‍याच मित्रमैत्रिणींना माहिती होतं पण कधी याची मलाही कल्पना नव्हती. त्यामुळे अर्थातच आर्टिफॅक्ट्स लाइनचे नाव काय ठेवायचे वगैरेही ठरलेले नव्हते.

कुणी जाल का

लेखक मित्रहो यांनी बुधवार, 20/05/2015 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षापूर्वीचे गोष्ट आहे त्यावेळेला डीजीटल कॅमेरे नुकतेच आले होते. काढलेला फोटो लगेच दिसणे ह्या गोष्टीचे फार अप्रूप होते. त्यावेळेला पर्यटन स्थळी डिजीटल कॅमेरा गळ्यात घालून फिरणे हे प्रतिष्ठेचे लक्षण होते. मी काही कामानिमित्त गोव्याला गेलो होतो, एकटाच होतो. काम झाल्यावर पणजी जवळील मिरामार बीचवर बसलो होतो. सुरेख संध्याकाळ होती, सूर्य मावळत होता, तो तांबडा रंग पाण्यावर दिसत होता. गार हवा सुटली होती. अशा रम्य संध्याकाळी, अशा रम्य ठिकाणी एक नुकतेच लग्न झालेले जोडपे आले होते. हनीमुनला आले असावे. त्या बुवाला कदाचित तिचा पावलांपर्यंत पाणी असलेला फोटो घ्यायचा होता परंतु समुद्र मस्तीत होता.
काव्यरस

न न न कविता

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 16/05/2015 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
त ते तुक क के कुक शिळी भाकर ......... कांव कांव कांव गायनाचार्य बुर्ज्वा कोकिळा ....... इवलासा मी गिळतो आकाश ढेन्चू ढेन्चू ..... ..... पीत पीत कविता लिहिली आहे, डोक्याला कमालीच्या मुंग्या आल्या. कोणी या कवितेचा अर्थ मला समजवून सांगेल का?
काव्यरस

खातेस घरी तू जेव्हा - (विडंबन)

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 15/05/2015 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल- नसतेस घरी तू जेव्हा-) खातेस घरी तू जेव्हा जीव घाबराघुबरा होतो उरण्याचे होती वांधे पोटात गोळा का येतो .. डिश फुटून खाली पडावी का तोल मना बिघडवतो तोबरा मनी हीन वाटे अन खंत वाटता रडतो .. येतात पाहुणे घराशी धुसफुसून सरती मागे चिडकीशी गाठच आता तव फंडा आठवत जातो .. तव हालचाली बोकण्याच्या मज डसती हजार वेळा जीव जाई तरी हादडावे मी बघ्याच नुसता उरतो .. तू लांब राहशिल काय सोडूनच या घरदारा सगळ्यांचा जीव भकास माझ्यासह उपास घडतो .. ना अजून झालो तगडा का दुष्काळातुनी आलो तुज पाहुन समजत जाते खाण्यास जन्म हा घडतो ! ,
काव्यरस

विश्वास वासावरचा

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी बुधवार, 06/05/2015 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
आमची पेरणा अर्थात शब्दानुज यांची क्षमा मागुन.... रोज पुन्हापुन्हा तो ढुसक्या सोडतो समोरचा नाईलाजाने नाकावर हात दाबतो हजारो वर्षांपासुन तो त्या सोडतो आणि दिवसभर पोट दाबून कळा सोसतो खरेतर प्रत्येकाच्या शरीरातून ती बाहेर पडत असते पण काहिंचे अस्तित्व नुसत्या वासावरुन ओळखता येते पवनाच्या रुपातुन तो बाहेर पडतो पोटाबरचे प्रेशर थोडेसे हलके करुन जातो प्रत्येक श्वासातुन तो नाकात घुसू पहातो श्वासाशिवाय थोड्या वेळानंतर जीव घुसमटतो काहीजण उगाचच लाजुन कायमचुर्ण घेतात वासहिन श्वासाची कामना करतात तो आला की चहुकडे वास दरवळात राहतो सेंटच्या

हं ! ते तुला कधी जमलेय

लेखक खटासि खट यांनी सोमवार, 04/05/2015 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा http://www.misalpav.com/node/31151 (मूळ कवीची मनापासून क्षमा मागून हे विडंबन शोलेकालीन व्यथा वेदनांना वाचा फोडण्यासाठी प्रसृत झाले. कळावे आपला नकवी - खट (नक्वी नव्हे) ) अरे द्यायचेच असेल तर दे गब्बरलाही पकडीत घेवु पाहणारे ते हात हं ! ते तुला कधीच जमलेय तोडलेल्या हातांवरती, कशास शाली अन बंदुकी रामलाल काकांना या कसली आहे निवांत डुलकी अरे गायचेच असेल तर गा ते स्वर मेहबुबी हेलनेचे... हं ! ते तुला कधी रे जमलेय हिंडत्या बसंतीचे ..
काव्यरस

एक "टवाळ" संध्याकाळ

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी रविवार, 03/05/2015 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.

हेल्मेट

लेखक संजुदा यांनी रविवार, 26/04/2015 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी हेल्मेटची सक्ती करण्यात आली होती त्यावेळी लिहिलेली ही कविता 'हेल्मेट 'वर कवीवर्य मंगेश पाडगांवकर यांनी जर कविता लिहिली असती तर कदाचित ती अशीच लिहिली असती . विडंबनाचा एक प्रयत्न 'हेल्मेट' पाडगांवकरांच्या शैलीत हेल्मेट म्हणजे हेल्मेट म्हणजे हेल्मेट असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं मराठीतून त्याला कवच म्हणता येतं हिंदीतून त्याला शिरस्त्राण म्हणता येतं हेल्मेट हेच त्याचं दुसरं नेम असतं हेल्मेट म्हणजे हेल्मेट म्हणजे हेल्मेट असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं हेल्मेटच्या सक्तीचा सरकारी कायदा आहे खरं तर हेल्मेटचा आपल्यालाच फायदा आहे एकदा डोक्यात घातलं की हेल्मेट झपाट्या

गुर्जीSSS……कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS

लेखक टवाळ कार्टा यांनी गुरुवार, 23/04/2015 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा - https://www.youtube.com/watch?v=mz4bTkh9elg इशेश ईणंती - गुर्जी (http://www.misalpav.com/comment/685412#comment-685412) आमच्या गुर्जींनी (इथे कानाच्या पाळीला हात लावण्यात आलेला आहे) तांबिय संस्थानाच्या मठाधिपतीची वस्त्रे तूर्तास बाजूस ठेउन इतर कार्ये हाती घेतल्यानंतर प्रथमच जाहीर ईणंती केल्याने हे ईडंबन लिल्हे आहे अवधूत गुप्ते यांची माफी मागून… ---------------------------------------------------------- सकाळच्याSSS पारी मिळेना वाट होSSS…सकाळ