Skip to main content

या पाच गोष्टी रोज सकाळी कराव्यात!

या पाच गोष्टी रोज सकाळी कराव्यात!

Published on 07/09/2015 - 13:23 प्रकाशित मुखपृष्ठ
१ रोज सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा डोळे उघडावेत. यामुळे झोप निघून जाण्यास फायदा होतो. 2 नंतर चेहरा धुवावा. त्यामुळे ताजेतवाने वाटते. ३ यानंतर दात घासावेत. टुथपेस्ट आणि ब्रशने घासले तर फारच उत्तम, पण ते नसल्यास मीठ, हळद, लिंबू, कोळसा यापैकी काहिही वापरले तरी चालेल. मुख आरोग्यास लाभदायक असते. ४ यानंतर शौचास जाऊन यावे. कुणा थोर व्यक्तीने (म्हणजे मीच ) म्हटल्याप्रमाणे "पोट साफ तर मन साफ) ५ आणि नंतर पेला भरून वाफाळता चहा घ्यावा. या पाच गोष्टी नित्य नियमाने केल्यास दिवस चांगला जातो. ( रात्र चांगली जाण्यासाठी टिपा पुढिल भागात, एकावेळी एक विषय हा माझा नियम आहे) तळटीप- क्रमांक ४ च्या गोष्टीचा क्रम, वेळ पडल्यास बदलला तरी चालेल. फक्त त्यानंतर साबण लावून हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे.
लेखनप्रकार

याद्या 7955
प्रतिक्रिया 41

तुम्ही स्वत: हे सगळे रोज करता की फक्त सल्ला आहे ? अंघोळी बद्दल आपले मत जाणुन घ्यायला आवडेल. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

वा काय नेमका प्रश्न विचारलात! आंघोळ म्हणजे निव्वळ वेळेचा आणि पाण्याचा अपव्यय ! चार सहा महिन्यातून एखादवेळ करावी हवी तर पण ती रोज करायला लावण्यामागे एक मोठ्ठे कट कारस्थान असावे आणि त्यात साबण कंपन्यांचा हात असावा असा आम्हाला दाट संशय आहे. आंघोळ या शब्दाची व्युत्पत्ति शोधल्यावर कळले की मूळ शब्द होता "आणखी घोळ" . पूर्वी बायका ( आपापल्या)नवऱ्यांना उपहासाने विचारीत, " काय आता आणखी घोळ करणार का?" कालौघात त्यातील उपहास जाऊन प्रश्नकम्आद्न्या आली तसेच णखी जाऊन अनुस्वार आला. असो , तूर्तास इतके पुरे. अजून कशावर मत अथवा सल्ला श्रवा असल्यास नि:संकोच विचारा. आपलाच , दमामि.

ते तो लाहो प्राणीजात! दुपारचे १.५५ झलेत ऐकूयात सुमधूर गीत खास मिपाकरांच्या पसंतीनुसार मराठमोळं गाण. "कशी नशिबान थट्टा आज मांडली" असली सवड तरच आपली आवड कार्यक्रमातून साभार. सा.सं.नी दुवा द्रुश्य स्वरूपात करावा ही जाहीर विनंती.

चहाच्या आधी चमचाभर आवळा रस कोमट पाण्यासोबत घेत जा रे दमाम्या.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

विचारप्रवर्तक धाग्यांचे ग्रहण वगैरे काही नाही. कुठल्या पाच (कळ) गोष्टी करू नयेत या विचारप्रवर्तक धाग्याचे वैचारीक विडंबन आहे ते.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

दर्जा घसरतोय तो असल्या बिनडोक धाग्यांमुळे . प्रत्येक गोष्टीचे विडंबन हे करायलाच हवे का ? तुमच्यात जर एवढीच क्षमता असेल तर तुम्हीही रचनात्मक लेखन करा की कोणी अडवलय तुम्हाला. पण ते न करता दुसर्यांनी काढलेल्या धाग्यांवर विडंबन टाकून उगीचच इथे कचरा टाकायचा आणि आपली उघड करायची यात कसले आलेय शहाणपण? आणि त्या लेखात लेखकाला जे वाटले ते लिहिले आणि शेअर केले त्याची चिरफाड करणारे तुम्ही कोण टिकोजीराव ? तुम्हाला काही गोष्टी पटत नसतील तर लेखाला प्रतिसाद लिहा की धागे कसले काढताय? संपादक मंडळानेही वेळीच हस्तक्षेप करावा ही विनंती नाहीतर आलेल्या प्रत्येक धाग्यावर विडंबन, प्रतिविडम्बन याचे पिक येत राहील , आणि संस्थळाचा दर्जा खालावून चांगले लोक सोडून जातील यात शंकाच नाही . उदयोन्मुख लेखक ही मग विडंबन निघेल या भीतीने लेख लिहिणार नाहीत .

In reply to by अभ्या..

अस म्हणता? मग हे घ्या, "बहिर्वक्र म्हणा हवे तर.विडंबन हा आरसा दोष अथवा गुण असो ,त्या फरक नाही फारसा" अभ्याभौ, तुमच्यासाठी काय पन.:)

सकाऴी या पाच गोष्टी कराव्यात. 1. झोपेतून उठणे. 2. दात घासणे, डोळे व चेहरा धुणे. 3. वाफाळता चहा घेणे. 4. शौचास जाणे,मोबाईलवर मिपा करणे. 5. आंघोळ करणे.

In reply to by हेमंत लाटकर

दोन नंबरचं काम चार नंबरला का लिहिलं? निषेध. आणि त्यात परत २ कामं एकत्रं? तुमचं काय कंफ्युजन होत नाही का?

कुणा थोर व्यक्तीने (म्हणजे मीच ) म्हटल्याप्रमाणे "पोट साफ तर मन साफ)
तुमचं वय काय हो काका? नाही म्हणजे मला हे माझ्या एका मित्राच्या आज्जीने एकदा तिला तिच्या पणजीने सांगितल्याचं सांगितलं होतं. ( मित्राची आज्जी आज असती तर ती नक्की शंभरीपार वयाची असती)

In reply to by बोका-ए-आझम

दमामीचे अभिनंदन या निमित्ताने विजूभौ आले !!! "घारापुरी"यादवाला नाखु