मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शोक कुणाला? खंत कुणाला?

शिव कन्या ·

माहितगार 25/08/2019 - 21:36
पु. शि. रेग्यांच्या सावित्री मध्ये घरट्यांचा उल्लेख दोनदा येतो. पहिला संघर्षाचा मन विषण्ण करणारा दुसर्‍यांदा येतो तेव्हा निसर्गचक्र त्याच्या क्रमाने हळुवारपणे पुर्वव्रत झालेले असते जे वाचकाला आश्वस्त करते.

सध्या अमेझॉन जंगलात लागलेल्या आ़गीच्या ( वणवा) पार्श्वभुमीवर कवितेची दाहकता अधिकच जाणवते आहे . __/\__.

माहितगार 25/08/2019 - 21:36
पु. शि. रेग्यांच्या सावित्री मध्ये घरट्यांचा उल्लेख दोनदा येतो. पहिला संघर्षाचा मन विषण्ण करणारा दुसर्‍यांदा येतो तेव्हा निसर्गचक्र त्याच्या क्रमाने हळुवारपणे पुर्वव्रत झालेले असते जे वाचकाला आश्वस्त करते.

सध्या अमेझॉन जंगलात लागलेल्या आ़गीच्या ( वणवा) पार्श्वभुमीवर कवितेची दाहकता अधिकच जाणवते आहे . __/\__.
हरिण शावक हत्ती चित्ते, सळसळ धावे नाग सर्पिणी धडधड धडधड रान पेटते...... शोक कुणाला? खंत कुणाला? चोची माना तुटल्या ताना,भकभक काळे पंखही जळती लपलप लपलप ज्वाला उठती...... शोक कुणाला?खंत कुणाला? पिंपळ कातळ खोड पुरातन, चट्चट् जळते गवत कोवळे भडभड भडभड पाने रडती.... शोक कुणाला? खंत कुणाला? पिले पाखरे भकास डोळे, हा हा करती समूह भाबडे चरचर चरचर डोळे झरती...... शोक कुणाला? खंत कुणाला? कुणी लावली कशी लागली, आग शेवटी जाळ काढते करकर करकर शाप जीवांचे, थरथर.... इथवर ऐकू येते..... -शिवकन्या

देवघर

शिव कन्या ·

जॉनविक्क 19/08/2019 - 22:39
फक्त ही सांस्कृतिच आता परकी वाटावी इतका बदल स्वत: मधे झालेला असल्याने, संपूर्ण वृध्दत्व येत नाही तोपर्यंत हे काव्य काळजाला भिड़ेल असे वाटत नाही.

In reply to by जॉनविक्क

माहितगार 24/08/2019 - 09:07
सहज सुचलेला एक विचार देवघर शेवटी एक आदर्शांचा श्रद्धायुक्त अल्बम असते का ? देवघरात नव्या श्रद्धांचे नवे देव जोडल्यास ? लोक तसे न ठरवताही करतच असतात, सांस्कृतिक समस्येचे निदान होत असेल तर ठरवून नवे अल्बम बनवून घेण्यास काय हरकत असावी.

In reply to by माहितगार

जॉनविक्क 24/08/2019 - 12:52
आवेनजर्स वास्तव्यास आहेत ना. उद्या तिथं रामकृष्ण परमहंसही असू शकतील. बस देवघर रिकामे नसावे इतकेच काय ते आवश्यक, अर्थात तसे ते कधीच नसते पण नास्तिकतेचा माजोरडेपणा तो भासही निर्माण करतो कधी कधी

In reply to by जॉनविक्क

सर टोबी 24/08/2019 - 15:00
हे काय असतं? माजोरडेपणा हा जर पाशवी शक्तीचा अविष्कार असेल तर नास्तिकांकडे ती कोणत्या स्वरूपाची असते? त्या उलट श्रद्धेची दुकानदारी करणारे आणि नास्तिक यांच्या युद्धामध्ये नास्तिकांच्याच आहुत्या पडल्या आहेत. नास्तिकता म्हणजे श्रद्धेचा अभाव असे नसावे. अन्यथा दररोजच्या व्यवहारात विश्वास ठेवणारे सर्वच जण श्रद्धाळू असायला हवे. पण तसे नसते. नास्तिक आपल्याला आपल्यातीलच विरोधाभासाची आठवण करून देतात. एकीकडे मोठ्याने ओरडून केलेल्या प्रार्थनेपेक्षा मूक आक्रोश देवाला ऐकू येतो असे म्हणायचे, मुंगीच्या पायात चाळ बांधला तरी देवाला तो ऐकू येतो असे म्हणायचे आणि ठणाणा करणाऱ्या आरत्या आणि काकड आरत्या करीत लोकांची झोपमोड करणे, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना त्रास होईल असे वागायचे हे 'सो कॉल्ड' नास्तिकच तुम्हाला सांगतात.

खिलजि 20/08/2019 - 15:21
मस्त लिवलंय .. जुन्या आठवणी जाग्या झाल्या .. खासकरून कोकणातल्या घराच्या .. मी महिन्यात आम्ही सर्व भावंडे तिथे अंगणात सर्व स्तोत्रे म्हणायचो .. मला वाटत दहा पंधरा वर्षे तिथे आम्ही दरवर्षी दंगा करायचो पण आता सर्व जण शहरात स्थायिक झाले आणि ते भलेमोठे घर , त्यासमोरच अंगण , वृंदावन असेच ओस पडले आहे .. तिथे तुळस लावली जाते पण ती फक्त गणपतीत आणो होळीच्या सणालाच.. नाहीतर तिथे पूर्ण शुकशुकाट असतो ... कधी पुन्हा उजळेल सारे ? कधी उतरतील त्या अंगणात तारे ? कधी भिनेल गगनात स्तोत्र ध्वनी ? कधी बैसेल ती अनोखी पंगत पुन्हा अंगणी ? तूच तर आहेस त्या सर्वांचा उदगाता निर्माता तूच घडविलेस सर्व पसारे अन नजारे तूच दिलेस कैक आशीर्वाद तूच दिल्या या अनमोल ठेवी आम्हा लोचनी पुढारलो कि सुधारलो ते तूच जाणे पण मी अजूनही तिथेच लोळतो जिवंतपणी दे , कधीतरी पुन्हा दे करून जवळ त्या भूतकाळाला ओढ अनामिक ती हृदयात कायम राहिली

नाखु 20/08/2019 - 20:54
निव्वळ अफलातून आहे. समजतेय असं वाटेपर्यंत निसटतेय आणि निसटताना समजतेय अशी अवस्था झाली आहे. मिपावर बाजूनेच निसटणारा सरधोपट वाचकांची पत्रेवाला नाखु

माहितगार 24/08/2019 - 08:25
कविता आवडली, नीटशी समजण्यासाठी बर्‍याचदा वाचावयास लागली (की अजून नीटशी समजली नाही असा प्रश्नही मनात येऊन गेला.)

In reply to by जालिम लोशन

माहितगार 24/08/2019 - 10:05
मला दोन रूपकांची शक्यता जाणवतेय - एक 'आज्जी किंवा आजोबा' या व्यक्तीरेखेचे किंवा दुसरे खूप काही वेगळे रूपक जाणवतयं -शिवकन्येनीच लिवल्यावर काय?-(स्पष्ट बोलण्याची हिम्मत नै बा आपल्यात) ज्याचे रूपक असेल ते अप्रतिम हे नक्की

जॉनविक्क 19/08/2019 - 22:39
फक्त ही सांस्कृतिच आता परकी वाटावी इतका बदल स्वत: मधे झालेला असल्याने, संपूर्ण वृध्दत्व येत नाही तोपर्यंत हे काव्य काळजाला भिड़ेल असे वाटत नाही.

In reply to by जॉनविक्क

माहितगार 24/08/2019 - 09:07
सहज सुचलेला एक विचार देवघर शेवटी एक आदर्शांचा श्रद्धायुक्त अल्बम असते का ? देवघरात नव्या श्रद्धांचे नवे देव जोडल्यास ? लोक तसे न ठरवताही करतच असतात, सांस्कृतिक समस्येचे निदान होत असेल तर ठरवून नवे अल्बम बनवून घेण्यास काय हरकत असावी.

In reply to by माहितगार

जॉनविक्क 24/08/2019 - 12:52
आवेनजर्स वास्तव्यास आहेत ना. उद्या तिथं रामकृष्ण परमहंसही असू शकतील. बस देवघर रिकामे नसावे इतकेच काय ते आवश्यक, अर्थात तसे ते कधीच नसते पण नास्तिकतेचा माजोरडेपणा तो भासही निर्माण करतो कधी कधी

In reply to by जॉनविक्क

सर टोबी 24/08/2019 - 15:00
हे काय असतं? माजोरडेपणा हा जर पाशवी शक्तीचा अविष्कार असेल तर नास्तिकांकडे ती कोणत्या स्वरूपाची असते? त्या उलट श्रद्धेची दुकानदारी करणारे आणि नास्तिक यांच्या युद्धामध्ये नास्तिकांच्याच आहुत्या पडल्या आहेत. नास्तिकता म्हणजे श्रद्धेचा अभाव असे नसावे. अन्यथा दररोजच्या व्यवहारात विश्वास ठेवणारे सर्वच जण श्रद्धाळू असायला हवे. पण तसे नसते. नास्तिक आपल्याला आपल्यातीलच विरोधाभासाची आठवण करून देतात. एकीकडे मोठ्याने ओरडून केलेल्या प्रार्थनेपेक्षा मूक आक्रोश देवाला ऐकू येतो असे म्हणायचे, मुंगीच्या पायात चाळ बांधला तरी देवाला तो ऐकू येतो असे म्हणायचे आणि ठणाणा करणाऱ्या आरत्या आणि काकड आरत्या करीत लोकांची झोपमोड करणे, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना त्रास होईल असे वागायचे हे 'सो कॉल्ड' नास्तिकच तुम्हाला सांगतात.

खिलजि 20/08/2019 - 15:21
मस्त लिवलंय .. जुन्या आठवणी जाग्या झाल्या .. खासकरून कोकणातल्या घराच्या .. मी महिन्यात आम्ही सर्व भावंडे तिथे अंगणात सर्व स्तोत्रे म्हणायचो .. मला वाटत दहा पंधरा वर्षे तिथे आम्ही दरवर्षी दंगा करायचो पण आता सर्व जण शहरात स्थायिक झाले आणि ते भलेमोठे घर , त्यासमोरच अंगण , वृंदावन असेच ओस पडले आहे .. तिथे तुळस लावली जाते पण ती फक्त गणपतीत आणो होळीच्या सणालाच.. नाहीतर तिथे पूर्ण शुकशुकाट असतो ... कधी पुन्हा उजळेल सारे ? कधी उतरतील त्या अंगणात तारे ? कधी भिनेल गगनात स्तोत्र ध्वनी ? कधी बैसेल ती अनोखी पंगत पुन्हा अंगणी ? तूच तर आहेस त्या सर्वांचा उदगाता निर्माता तूच घडविलेस सर्व पसारे अन नजारे तूच दिलेस कैक आशीर्वाद तूच दिल्या या अनमोल ठेवी आम्हा लोचनी पुढारलो कि सुधारलो ते तूच जाणे पण मी अजूनही तिथेच लोळतो जिवंतपणी दे , कधीतरी पुन्हा दे करून जवळ त्या भूतकाळाला ओढ अनामिक ती हृदयात कायम राहिली

नाखु 20/08/2019 - 20:54
निव्वळ अफलातून आहे. समजतेय असं वाटेपर्यंत निसटतेय आणि निसटताना समजतेय अशी अवस्था झाली आहे. मिपावर बाजूनेच निसटणारा सरधोपट वाचकांची पत्रेवाला नाखु

माहितगार 24/08/2019 - 08:25
कविता आवडली, नीटशी समजण्यासाठी बर्‍याचदा वाचावयास लागली (की अजून नीटशी समजली नाही असा प्रश्नही मनात येऊन गेला.)

In reply to by जालिम लोशन

माहितगार 24/08/2019 - 10:05
मला दोन रूपकांची शक्यता जाणवतेय - एक 'आज्जी किंवा आजोबा' या व्यक्तीरेखेचे किंवा दुसरे खूप काही वेगळे रूपक जाणवतयं -शिवकन्येनीच लिवल्यावर काय?-(स्पष्ट बोलण्याची हिम्मत नै बा आपल्यात) ज्याचे रूपक असेल ते अप्रतिम हे नक्की
देवघरातच सोडून आले मंद दिव्यांची सुगंधमाला पहाटवारा श्रावणओला कांत सतीचा तिथे राहिला दिवेलागणी शुभंकरोति करी एकटी तुळशीमाला बोटांमधुनी फिरत जाय ती कालगणाची अजस्त्र माला देव्हाऱ्यावर शांत सावली स्निग्ध घरावर छाया धरते त्या झाडाच्या पानांवरती कृष्णवल्लरी गाणे रचते समईमधल्या दीपकळीवर विझू विझू ते डोळे दिसती मध्यरात्रिला येता आठव देवघरातील विझते वाती हार चंदनी हात जोडुनी जन्म पिढ्यांचा भोगून जातो मागे वळुनी आपणसुद्धा हात सोडुनी भणंग होतो.... -शिवकन्या

बॉलिवूडचे बाप

महासंग्राम ·

कादर खान आणि शक्ती कपुर बाप नंबरी बेटा दस नंबरी मधे यांनी बापलेकांचे एक आगळे वेगळे नाते दाखवले होते. हा चित्रपट बघताना प्रत्येक वेळी मन भरुन येते. पैजारबुवा,

गड्डा झब्बू 03/08/2019 - 13:09
रेडी चित्रपटातील महेश मांजरेकर आणि सलमान खान यांचे बाप-बेट्याचे संबंधही छान वाटले. ready रच्याक: मुळच्या तेलगु चित्रपटाचा युद्धम शरणं ह्या हिंदी अवतारातील राव रमेश आणि नागचैतन्याचे असेच संबंधही खूप छान दाखवले आहेत. yudhham

उपेक्षित 03/08/2019 - 13:43
Daddy इसारलाव काय दादा ? आणि आमचा आवडता गोविंदा - कादरखान बाप-लेकाची जोडी आल टाईम हिट. (आंखे मध्ये त्यांच्या जोडीला पहिल्या हाल्फ मध्ये आपल्या चंकी पांडे ने पण धमाल आणली आहे.)

सर टोबी 03/08/2019 - 14:48
  1. ए. के. हंगल आणि सचिन शोले मध्ये
  2. सनी देओल आणि ए. के. हंगल यांचा अर्जुन
  3. अमरीश पुरी आणि रेवती यांचा मुस्कुराह्त (प्रियदर्शनचा बहुदा पहिला हिंदी सिनेमा)
  4. आणि सगळ्यांवर ताण म्हणजे अशोक कुमार आणि सुमित सन्याल यांचा आशीर्वाद

In reply to by सर टोबी

महासंग्राम 03/08/2019 - 14:56
मुस्कुराहट मध्ये बाप-लेकीचं नातं अगदी एखादी चिट्ठी हळुवार उलगडावी तसं दाखवलंय प्रियदर्शन चे गर्दीश, मुस्कुराहट आणि विरासत माझे फेव्हरिट आहेत. त्याने हिंदीत असेच अजून प्रयोग करायला हवे.

नाखु 03/08/2019 - 19:24
मध्ये रंगविलेले आमिर खान आणि सलमान खान यांचे बाप अनुक्रमे देवेन वर्मा आणि जगदीप यांचें नाते अफलातून आहे

कादर खान आणि शक्ती कपुर बाप नंबरी बेटा दस नंबरी मधे यांनी बापलेकांचे एक आगळे वेगळे नाते दाखवले होते. हा चित्रपट बघताना प्रत्येक वेळी मन भरुन येते. पैजारबुवा,

गड्डा झब्बू 03/08/2019 - 13:09
रेडी चित्रपटातील महेश मांजरेकर आणि सलमान खान यांचे बाप-बेट्याचे संबंधही छान वाटले. ready रच्याक: मुळच्या तेलगु चित्रपटाचा युद्धम शरणं ह्या हिंदी अवतारातील राव रमेश आणि नागचैतन्याचे असेच संबंधही खूप छान दाखवले आहेत. yudhham

उपेक्षित 03/08/2019 - 13:43
Daddy इसारलाव काय दादा ? आणि आमचा आवडता गोविंदा - कादरखान बाप-लेकाची जोडी आल टाईम हिट. (आंखे मध्ये त्यांच्या जोडीला पहिल्या हाल्फ मध्ये आपल्या चंकी पांडे ने पण धमाल आणली आहे.)

सर टोबी 03/08/2019 - 14:48
  1. ए. के. हंगल आणि सचिन शोले मध्ये
  2. सनी देओल आणि ए. के. हंगल यांचा अर्जुन
  3. अमरीश पुरी आणि रेवती यांचा मुस्कुराह्त (प्रियदर्शनचा बहुदा पहिला हिंदी सिनेमा)
  4. आणि सगळ्यांवर ताण म्हणजे अशोक कुमार आणि सुमित सन्याल यांचा आशीर्वाद

In reply to by सर टोबी

महासंग्राम 03/08/2019 - 14:56
मुस्कुराहट मध्ये बाप-लेकीचं नातं अगदी एखादी चिट्ठी हळुवार उलगडावी तसं दाखवलंय प्रियदर्शन चे गर्दीश, मुस्कुराहट आणि विरासत माझे फेव्हरिट आहेत. त्याने हिंदीत असेच अजून प्रयोग करायला हवे.

नाखु 03/08/2019 - 19:24
मध्ये रंगविलेले आमिर खान आणि सलमान खान यांचे बाप अनुक्रमे देवेन वर्मा आणि जगदीप यांचें नाते अफलातून आहे
बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये अनेक नाती दाखवतात. मुलगा-आई यांच्या नात्यावर भरमसाठ चित्रपटात भाष्य केलंय, पण वडील -मुलगा/मुलगी यांचे नातं हळुवारपणे उलगडणारं चित्रपट फार कमी आहेत पण ज्या काही चित्रपटात हे नातं दाखवलं आहे ते अत्यंत तरल असं आहे. त्यापैकीच बाप-लेकाचं नातं उलगडणारे काही चित्रपट इथे देतोय मिपाकर अजून भर घालतीलच. १. गर्दीश (अमरीश पुरी- जॅकी श्रॉफ) प्रसिद्ध सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर गर्दीश ला हातातून निसटत जाणाऱ्या स्वप्नांची गोष्ट म्हणतो, अगदी खरय ते. गर्दीश माझा अत्यंत आवडता चित्रपट आहे, ते यात दाखवलेल्या वडील आणि मुलाच्या हळुवार नात्यामुळे.

दिव्यांची कहाणी

शिव कन्या ·

सस्नेह 02/08/2019 - 21:42
प्रसन्न लेखन. भाषाही भारी अलंकारिक ! रच्याकने एवढी यातायात करून उलटी गंगा वाहवण्यापेक्षा एमैसीबीला एक अर्ज टाकला असता तर आम्ही चार डांब टाकून उजेड पाडला असता की ! ह घ्या :)

अप्रतिम. भाषा ओघवती आणि पूर्वीच्या काहाण्यांना साजेशी. माझी आजी आणि आता आई श्रावण शुक्रवारी जीवत्यांची पूजा करून त्यांची काहाणी वाचते. रविवारी आदित्यराणुबाईची काहाणी वाचते. लहानपणापासून ऐकलेल्या या काहाण्यांपाठ झाल्यात. त्यावेळी रविवारी हातात 3तांदळाचे दाणे घेऊन काहाणी ऐकताना काहीतरी वेगळं करतो आहोत हे जाणवायचं. त्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद

In reply to by ज्योति अळवणी

जॉनविक्क 03/08/2019 - 14:52
ऐका अमुक तमुक तुमची कहाणी, आटपाट नगर होतं अशी सुरुवात आणि जसा अमुक तमुक त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हालाही होओ, ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. हा ठरलेला शेवट वाचून एका अदभूत जगाची सफर व्हायची. मन तल्लीन व्हायचे, आयुष्य अचानक खूप सुंदर व समाधानी वाटायचे. जणू राजू हिरानीचा चित्रपटच बघितला असावा. आवडती नावडतीची कथा तर फेवरीट. हे व्रतवैकल्ये वाचून असं वाटायचे की शाळा अभ्यासाच्या कटकटीची आवश्क्ताच नाहीशी

In reply to by जॉनविक्क

जॉनविक्क 03/08/2019 - 14:57
हे व्रतवैकल्ये वाचून असं वाटायचे की शाळा अभ्यासाच्या कटकटीची आवश्क्ताच नाहीशी...
...झालेली आहे. भक्ती करावी आणि सुखाने रहावे. असे वाटे की समाधानी आयुष्यासाठी श्रद्धाळूपणा ही एक गुरुकिल्ली आहे. खूपच मंतरलेला कालखंड या कथांनी दिला :)

भीमराव 03/08/2019 - 10:34
महादेवाने आधी अर्जच केलेला, पण चिरीमिरी साठी अर्ज फायलीत पडुन आहे अजुन. साहेब म्हणाला एकट्या च्या साठी इतके डांब टाकायचा खर्च करावा तर काही आम्हाला पण मिळुद्या.

In reply to by शिव कन्या

जॉनविक्क 25/08/2019 - 00:43
मानण्या ऐवजी कशाला प्रश्नपंच सुरू करताय ? उगा प्रतिसादातही चुंबनाचा वर्षाव झाला तर वाचकांची पळता भुई थोडी होईल ;)

सस्नेह 02/08/2019 - 21:42
प्रसन्न लेखन. भाषाही भारी अलंकारिक ! रच्याकने एवढी यातायात करून उलटी गंगा वाहवण्यापेक्षा एमैसीबीला एक अर्ज टाकला असता तर आम्ही चार डांब टाकून उजेड पाडला असता की ! ह घ्या :)

अप्रतिम. भाषा ओघवती आणि पूर्वीच्या काहाण्यांना साजेशी. माझी आजी आणि आता आई श्रावण शुक्रवारी जीवत्यांची पूजा करून त्यांची काहाणी वाचते. रविवारी आदित्यराणुबाईची काहाणी वाचते. लहानपणापासून ऐकलेल्या या काहाण्यांपाठ झाल्यात. त्यावेळी रविवारी हातात 3तांदळाचे दाणे घेऊन काहाणी ऐकताना काहीतरी वेगळं करतो आहोत हे जाणवायचं. त्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद

In reply to by ज्योति अळवणी

जॉनविक्क 03/08/2019 - 14:52
ऐका अमुक तमुक तुमची कहाणी, आटपाट नगर होतं अशी सुरुवात आणि जसा अमुक तमुक त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हालाही होओ, ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. हा ठरलेला शेवट वाचून एका अदभूत जगाची सफर व्हायची. मन तल्लीन व्हायचे, आयुष्य अचानक खूप सुंदर व समाधानी वाटायचे. जणू राजू हिरानीचा चित्रपटच बघितला असावा. आवडती नावडतीची कथा तर फेवरीट. हे व्रतवैकल्ये वाचून असं वाटायचे की शाळा अभ्यासाच्या कटकटीची आवश्क्ताच नाहीशी

In reply to by जॉनविक्क

जॉनविक्क 03/08/2019 - 14:57
हे व्रतवैकल्ये वाचून असं वाटायचे की शाळा अभ्यासाच्या कटकटीची आवश्क्ताच नाहीशी...
...झालेली आहे. भक्ती करावी आणि सुखाने रहावे. असे वाटे की समाधानी आयुष्यासाठी श्रद्धाळूपणा ही एक गुरुकिल्ली आहे. खूपच मंतरलेला कालखंड या कथांनी दिला :)

भीमराव 03/08/2019 - 10:34
महादेवाने आधी अर्जच केलेला, पण चिरीमिरी साठी अर्ज फायलीत पडुन आहे अजुन. साहेब म्हणाला एकट्या च्या साठी इतके डांब टाकायचा खर्च करावा तर काही आम्हाला पण मिळुद्या.

In reply to by शिव कन्या

जॉनविक्क 25/08/2019 - 00:43
मानण्या ऐवजी कशाला प्रश्नपंच सुरू करताय ? उगा प्रतिसादातही चुंबनाचा वर्षाव झाला तर वाचकांची पळता भुई थोडी होईल ;)
(परवा दिव्यांची अवस झाली. खरंतर त्याच दिवशी इथे ही कथा पोस्ट करायची होती, पण जमले नाही. नवी पारंपरिक कथा रचण्याचे धाडस केले आहे. :) ) ऐका दीपांनो तुमची कहाणी. कैलासावर सदाशिव बसले होते. तिकडून पार्वती आली. ती नाराज दिसत होती. शंकराने कारण विचारले. तशी ती म्हणाली, ‘माझी मुले खेळणार कशी? वाढणार कशी?’ ‘काय झाले?’ ‘उजेड नाही. प्रकाश नाही. बघेन तिकडे अंधुक अंधुक. चेंडू कुठे गेला दिसत नाही. माझी मुले खेळणार कशी? वाढणार कशी? या कैलासावर सगळा कसा अंधार अंधार!’ सदाशिवाने सूर्याला बोलावले. सूर्य आला. कैलासाच्या आडच थांबला. कैलासपतीने विचारले, ‘उजेड नाही. प्रकाश नाही.

बनपाव की करवंट्या.......?

शिव कन्या ·

In reply to by आनन्दा

शिव कन्या 23/07/2019 - 22:49
हातात कळफलक आला की तो 'असा'ही चालवता आला पाहिजे.... नाहीतर इथे विडंबनासाठी कच्चा माल म्हणून नुसत्याच कविता लावण्यात काय अर्थेय?? :)))

कंजूस 23/07/2019 - 21:19
ही श्टोरी अगोदर वाचलेली पण या फारम्याटात नव्हती. भूमिका वठतीय पण चावतीय. जशी प्रतिभा तुम्हाला कोणत्या व्रताने पावली ते व्रत सांगा सर्वांना. श्रावण जवळच आलाय. (तसा मारवाडी श्रावण सुरू झालाय पौर्णिमेलाच.)

टर्मीनेटर 24/07/2019 - 11:18
एक मुंगी एका मताची नाही. सगळ्या वेगळ्या, सगळ्या खंगऱ्या. तशात, एका मुंगीला एक मत नाही!! आत्ता हे, तर मग ते... अशी मतं.
पण वाचताना मात्र वेगळाच अनुभव आला ह्या मुंग्यांचा, काय चमत्कार झाला माहित नाही पण सगळ्यांचे अचानक एकमत होऊन त्यांनी कडकडून न चावता, गुदगुल्या करून हसवले :-) छान लिहिलंय, आवडले!

नाखु 24/07/2019 - 11:49
कशाचे विडंबन आहे?? बाकी डोक्याला मुंग्या येतात हे माहित होते पण डोकेबाज मुंग्या आवडल्या!! मुंगी होऊन साखर खाणारा वाचकांची पत्रेवाला नाखु

In reply to by आनन्दा

शिव कन्या 23/07/2019 - 22:49
हातात कळफलक आला की तो 'असा'ही चालवता आला पाहिजे.... नाहीतर इथे विडंबनासाठी कच्चा माल म्हणून नुसत्याच कविता लावण्यात काय अर्थेय?? :)))

कंजूस 23/07/2019 - 21:19
ही श्टोरी अगोदर वाचलेली पण या फारम्याटात नव्हती. भूमिका वठतीय पण चावतीय. जशी प्रतिभा तुम्हाला कोणत्या व्रताने पावली ते व्रत सांगा सर्वांना. श्रावण जवळच आलाय. (तसा मारवाडी श्रावण सुरू झालाय पौर्णिमेलाच.)

टर्मीनेटर 24/07/2019 - 11:18
एक मुंगी एका मताची नाही. सगळ्या वेगळ्या, सगळ्या खंगऱ्या. तशात, एका मुंगीला एक मत नाही!! आत्ता हे, तर मग ते... अशी मतं.
पण वाचताना मात्र वेगळाच अनुभव आला ह्या मुंग्यांचा, काय चमत्कार झाला माहित नाही पण सगळ्यांचे अचानक एकमत होऊन त्यांनी कडकडून न चावता, गुदगुल्या करून हसवले :-) छान लिहिलंय, आवडले!

नाखु 24/07/2019 - 11:49
कशाचे विडंबन आहे?? बाकी डोक्याला मुंग्या येतात हे माहित होते पण डोकेबाज मुंग्या आवडल्या!! मुंगी होऊन साखर खाणारा वाचकांची पत्रेवाला नाखु
(पुरुषोत्तम बोरकर, तुम्ही 'परकारातील मल्ल' या तुमच्या आगामी पुस्तकात काय लिहिले असते, त्याची मी कल्पनाही करू शकत नाही. पण तुम्ही गेलात आणि विचारवंतांचे एक छद्मरूप डोळ्यांसमोर तरळून गेले. श्रद्धांजली.) बनपाव की करवंट्या.......? त्यांचा ‘भूमिका’ या शब्दावर जीव. अतोनात. मग ती घ्यायची असो, करायची असो वा वठवायची असो. पण ते पडले पुरुष, बाईच्या भूमिकेची त्यांना दांडगी हौस. बरं, आता भूमिका घ्यायला, वठवायला किंवा करायला बायका आहेत हे सांगूनही त्यांना पटत नसे. भूमिकेचा प्रसंग आला रे आला की ते बनपाव वापरत. मेकअपमन सांगे, ‘करवंटी वापरा.’ तर ते म्हणत, ‘तिला वजन नसते. भूमिका म्हणजे वजन पाहिजे.

झरझर झरझर

शिव कन्या ·

मऊशार उबदार वाळूत लिहावं तसं लेखन आहे तुमचं. कधीतरी निवांतपणे तिथेच बाजूला बसून वाचता येतं किंवा कधी ते लगेच लाटेच्या पाण्यासोबत वाहून जातं. कधी तिथल्या वाळूचा उबदारपणा हवाहवासा वाटतो कधी गरम चटकेही बसतात. त्या वाळूचे गरम चटके बसल्यावर आम्ही उठून जाऊ शकतो पण तुम्ही तिथेच आणि तसेच लिहित रहा. Sandy

नाखु 23/07/2019 - 22:32
अलगूज वाजते तशी ओढ वाटणारी कवीता. राग ताल नाही समजले तरी ऐकायला आवठते अशी अलगूज धून आकाशवाणी रसिक श्रोता वाचकांची पत्रेवाला नाखु

इरामयी 24/07/2019 - 11:36
खूप छान कविता आहे. लहानपण आठवलं. लहानपणचे स्पर्धा, नियम, चाकोर्‍या नसलेले वेगवेगळे खेळ आठवले. अवांतरः आणि खरंच, आपल्या लहान मुली किती समंजस असतात आणि निवांत. मुलगे म्हणजे नुसता धांगडधिंगा आणि मारामार्‍या. बहिणीबरोबरसुद्धा सतत बरोबरी आणि भांडाभांडी. पण आपल्या बहिणीला थोडं जरी लागलं खुपलं की तितकेच भावूक होतात.

In reply to by इरामयी

टर्मीनेटर 24/07/2019 - 12:12
बापरे! इतका निरागस भावार्थ होता का ह्या कवितेचा? मला काही भलताच अर्थ लागला होता! ह्याच कारणासाठी कविता ह्या साहित्य प्रकारापासून मी चार हात दूर राहतो. कवी/कवियत्रीला सांगायचे काही वेगळेच असते आणि वाचणारा आपापल्या परीने अर्थ लावतो. एकवेळ काहीच समजले नाही तरी ठीक पण अर्थाचा अनर्थ लावणे म्हणजे कवितेवर नकळत केलेला अत्याचारच कि!

In reply to by टर्मीनेटर

इरामयी 26/07/2019 - 20:01
प्रत्येक गोष्ट काय अगदी उलगडूनच लिहायला हवी का? आणि तुम्ही अवांतरचा कवितेशी संबंध जोडला की काय? असू द्या.

मऊशार उबदार वाळूत लिहावं तसं लेखन आहे तुमचं. कधीतरी निवांतपणे तिथेच बाजूला बसून वाचता येतं किंवा कधी ते लगेच लाटेच्या पाण्यासोबत वाहून जातं. कधी तिथल्या वाळूचा उबदारपणा हवाहवासा वाटतो कधी गरम चटकेही बसतात. त्या वाळूचे गरम चटके बसल्यावर आम्ही उठून जाऊ शकतो पण तुम्ही तिथेच आणि तसेच लिहित रहा. Sandy

नाखु 23/07/2019 - 22:32
अलगूज वाजते तशी ओढ वाटणारी कवीता. राग ताल नाही समजले तरी ऐकायला आवठते अशी अलगूज धून आकाशवाणी रसिक श्रोता वाचकांची पत्रेवाला नाखु

इरामयी 24/07/2019 - 11:36
खूप छान कविता आहे. लहानपण आठवलं. लहानपणचे स्पर्धा, नियम, चाकोर्‍या नसलेले वेगवेगळे खेळ आठवले. अवांतरः आणि खरंच, आपल्या लहान मुली किती समंजस असतात आणि निवांत. मुलगे म्हणजे नुसता धांगडधिंगा आणि मारामार्‍या. बहिणीबरोबरसुद्धा सतत बरोबरी आणि भांडाभांडी. पण आपल्या बहिणीला थोडं जरी लागलं खुपलं की तितकेच भावूक होतात.

In reply to by इरामयी

टर्मीनेटर 24/07/2019 - 12:12
बापरे! इतका निरागस भावार्थ होता का ह्या कवितेचा? मला काही भलताच अर्थ लागला होता! ह्याच कारणासाठी कविता ह्या साहित्य प्रकारापासून मी चार हात दूर राहतो. कवी/कवियत्रीला सांगायचे काही वेगळेच असते आणि वाचणारा आपापल्या परीने अर्थ लावतो. एकवेळ काहीच समजले नाही तरी ठीक पण अर्थाचा अनर्थ लावणे म्हणजे कवितेवर नकळत केलेला अत्याचारच कि!

In reply to by टर्मीनेटर

इरामयी 26/07/2019 - 20:01
प्रत्येक गोष्ट काय अगदी उलगडूनच लिहायला हवी का? आणि तुम्ही अवांतरचा कवितेशी संबंध जोडला की काय? असू द्या.
झरझर झरझर झरणाऱ्या कातरवेळी मुलीला घेऊन मुलाने खेळायला जाऊ नये... तिचे धावते पाय थबकतात, घरातच विलांटी घेऊन मैदानाकाठचे गवत डोळ्यांनी खुडत राहतात...

खाजगी मंदिरे की उर्मटपणा चे अड्डे?

शान्तिप्रिय ·

जेम्स वांड 20/07/2019 - 17:33
अन आपले कुलोपाध्ये जिथं भिक्षुक, पुजारी, गुरव असतील अशी मंदिरे सोडून इतर मंदिरात जाणे वयाच्या पंधराव्या वर्षीच सोडले आहे, सर्वात उत्तम मनःशांती मिळवायचा उपाय म्हणजे घरच्या देवापुढे एक दिवा लावावा, वातावरण प्रसन्न करेल अशी एकच उत्तम उदबत्ती लावावी अन ध्यानमग्न होऊन पंधरा मिनिटे वाटेल त्या देवतेचे फक्त मनःपूर्वक नामस्मरण करावे. बाकी सगळं झूट.

जर आपल्याला आलेला अनुभव खरा असेल तर आपण त्यामंदिराचे नांव पत्ता द्यायला हरकत नाही. जेणेकरुन लोकांना तेथे जाण्ञापूर्वी विचार करता येईल. आपण आपल्याला आलेला अनुभव सांगीतला आहे. त्यात 'चिखल्फेक' कसली ? खरेतर आपण लगेच तिथुन बाहेर पडायला हवे होते. अश्या मनस्थितीत दर्शन घेऊन आपण कुठली मनशांती मिळविली कळत नाही. हे खासगी मंदिर असल्याने कोणाला येऊ द्यावे, आणि कसे वागवावे हा त्यांचा खासगी मामला आहे. त्यामुळे असे अनुभव प्रसिद्ध करुनच त्यांनी सुधरावे लागेल. जेंव्हा केवळ दहा व्यक्ती दर्शनाला येतील आणि बाहेर हजारो लोक त्यांना वाईट प्रसिद्धी देतील तेंव्हाच त्यांना काहीतरी वाटेल

In reply to by सामान्यनागरिक

सुबोध खरे 20/07/2019 - 18:25
हे खासगी मंदिर असल्याने कोणाला येऊ द्यावे, आणि कसे वागवावे हा त्यांचा खासगी मामला आहे. त्यामुळे असे अनुभव प्रसिद्ध करुनच त्यांनी सुधरावे लागेल. सहमत. इतरांना असा अनुभव येऊ नये म्हणून नाव पत्ता जाहीर करावा मुळात वाईट अनुभव आला तर दुसऱ्यांदा जाणे मी टाळतोच. कदाचित त्यांना प्रसिद्धी आणि त्याबरोबर येणारी गर्दी नकोच असेल. त्यामुळे अशी (कु)प्रसिद्धी ते मुद्दाम करतही असतील पुण्यात काहीही शक्य आहे.

In reply to by सुबोध खरे

विजुभाऊ 24/07/2019 - 16:47
कदाचित अधीक अपमान होण्यामुळे त्यांच्या पुणेकरत्वावर शिक्कामोर्तब होत असावे. आणि विरुद्ध प्रसिद्धी मिळाल्यामुळे गर्दीही वाढेल असे त्यांचे नवे मार्केटिंग गिमीक असेल. पुण्यात एके काळी एक शेपटीवाले बाबा होते ( वय वर्षे १२/१५ ) ते अधूनमधून भक्ताना प्रसाद म्हणून कानफाटात वगैरे द्यायचे. मुंबईमधली ते संत राधे मां ही देखील याच पंथातली. पण ती अधीक खूश झाली की प्रसाद म्हनून काही भक्तांच्या मांडीवर पण बसायची. अवांतर : मंदीर जर खाजगी असेल तर तेथेच जाय्चा अट्टाहास कशाला? तेही एकदा अपमान करून घेतलेला असताना

नाखु 20/07/2019 - 19:26
चिंचवडमध्ये तीस वर्षे रहात असूनही एकदाही चतुर्थी ला गर्दीत मोरया गोसावी दर्शनासाठी गेलो नाही. पण त्याचा अर्थ मी नास्तिक मनुष्य आहे असं नाही. पण जिथे गर्दी आणि माज, बडेजाव असतो तिथे सात्विकता मला तरी अनुभवायला मिळाली नाही. रायगडावरील मंदीर, बदामी येथील बनशंकरी, चिंचवड येथील राममंदिर आणि शिवथरघळ ,सज्नजगड येथील समर्थ रामदास स्वामींच्या दर्शनासाठी गेलो असता मनाला समाधान लाभते आणि मुख्य म्हणजे माझी दिवंगत पत्नीबरोबर या ठिकाणी गेलो असल्यानेच आजही ती माझ्याबरोबरच आहे असा मला विश्वास वाटतो. लेकीलाही गर्दी आणि हडेलहप्पी तर दर्शन आवडत नाही म्हणून गणेशोत्सव दरम्यान कुठले गणपती पाहण्यासाठी जात नाही आणि सगळ्या राजांना घरूनच नमस्कार केला तरी पोहोचतो याची खात्री आहे. सश्रद्ध पांढरपेशा मध्यमवर्गीय नाखु

In reply to by नाखु

जिथे गर्दी आणि माज, बडेजाव असतो तिथे सात्विकता मला तरी अनुभवायला मिळाली नाही. +१०० उलट अश्या जागी तथाकथित स्वयंसेवक आणि रक्षकांची मुजोरी चालू असते... आणि त्यांची ती सवय (विशेषतः, दर्शनाला आलेल्या लोकांना पुढे ढकलणे) गर्दी नसली तरी, कायम असते. ही सवय सेवेची नसून, गर्दीवर सत्ता गाजवण्याच्या उन्मादाची असते. अशा जागी पावित्र्याची, निर्मळ आनंदाची आणि मनःशांतीची अनुभूती कशी येऊ शकेल ? नावाजलेल्या देवस्थानांत एकदोनदा त्या प्रकारच्या उन्मादी माणसांचा अनुभव आल्यानंतर, मी नावाजलेल्या आणि/किंवा गर्दी असलेल्या देवस्थानांत जाणे बंद केले आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

संगणकनंद 21/07/2019 - 09:42
तुमचा हा प्रतिसाद वाचून मुंबईतील एक प्रसिद्ध हंगामी देवस्थान आठवले लगेच. तरीही भाबडी श्रद्धा असलेले लोक जातात. आपल्या घरी असलेला देव आणि हा प्रसिद्ध देव वेगळे नाहीत ही समज येण्याइतकी त्यांची अध्यात्मिक प्रगती झालेली नसते. देव आपल्याच आत आहे ही तर त्याच्याही पुढची पायरी असते हे त्यांना कळणेही शक्य नाही. नेमका याच गोष्टीचा गैरफायदा काही धूर्त लोक घेतात. स्वतःला देवाची माणसं किंवा अध्यात्मिक गुरु म्हणून घोषित करतात आणि साधनेच्या नावावर भोळ्याभाबड्या श्रद्धावान लोकांना भरकटवतात. लोकही यालाच "आपण देवाचं काहीतरी करतोय" असं समजून या कृतकृत्य होतात. दुर्दैवी आहे हे सारं.

In reply to by संगणकनंद

त्या देवस्थानातील 'सेवकांच्या' वागणूकीचे प्रकार टिव्हीवर पाहिल्यानंतर तेथे कधी गेलो नाही, किंबहुना, आता जावे असे वाटतही नाही. परंतु, इतर बहुतेक नावाजलेल्या देवस्थानांमध्येही काही फारसा वेगळा प्रकार होतो असे नाही. एकंदरीत, "भाविकांना देवळात येऊ देवून आपण त्यांच्यावर फार मोठे उपकार करत आहोत आणि त्यांच्याशी असभ्यपणे वागणे, त्यांना धक्काबुक्की करणे, हे आपले जन्मसिद्ध अधिकार आहेत", असे गर्दी होणार्‍या बहुतेक सगळ्या देवस्थानांतील "सेवेकर्‍यांचे (?!)" मत आहे असेच दिसते. अश्या जागी देव सापडेल असे मला वाटत नाही... कारण तेथे तो असता तर त्याने सर्वप्रथम त्या नाठाळ "सेवेकर्‍यांना" वठणीवर आणले असते. प्रसिद्धी झाली, गर्दी जमली की, देवकारण हे अर्थकारणाचे दास बनते. अर्थकारणाला प्राधान्य देणार्‍यांना देवस्थानाचे पावित्र्य आणि मांगल्य कसे राखता येईल ? मग अश्या लोकांना आस्तिक तरी कसे म्हणता येईल ? "अर्थकारण सबळ झाले की देवस्थानांवर, सहाजिकपणे मागच्या दाराने, आस्तिकाच्या मुखवट्यातील नास्तिकांचे राज्य येते" असा माझा एक लाडका सिद्धांत आहे. तसे नसते तर, (अ) देवाच्या भक्ताला नाडण्याचे आणि (आ) देवावरील हक्कांकरिता (पक्षी : त्यापासून मिळणार्‍या मलिद्यासाठी) वेळप्रसंगी हिंसा करण्याचे, प्रसंग दिसले नसते, नाही का?

वकील साहेब 20/07/2019 - 20:53
याच संदर्भात शेगाव संस्थानच्या सेवेकऱ्यांची वर्तणूक फार विनम्र वाटते. असेच विपश्यना केंद्रातील स्वयंसेवक देखील फार विनम्र असतात.

Rajesh188 20/07/2019 - 21:31
मला अक्कलकोट खूप आवडलं . खूप छान सुविधा आहेत . खासगी काही ही असू ध्या तिराहित तक्रार करण्याचा अधिकार वापरू शकत नाही . मग खासगी मंदिर असेल .मंदिर हा शब्द काढून कोणताही शब्द वापरू शकता . लेखक ची घोड चूक आहे त्यांनी कोणाच्या तरी खासगी मालमत्तेत प्रवेश केला

राघव 20/07/2019 - 22:39
कुठेतरी वाचलेले एक वाक्य अशावेळी आठवतेय - "प्रत्येक मूर्खाला शहाणे करण्याचा प्रयत्न करणे हा एक मूर्खपणा आहे, आणि आम्ही तो करणार नाही." माझ्या मते हे वाक्य अशा बाबतीत आचरणात आणण्यास हरकत नसावी. :-)

In reply to by मुक्त विहारि

जॉनविक्क 24/07/2019 - 16:59
त्यामुळे फार मोजके मूर्ख मी टार्गेट करतो. बराच फायदा होतो यातून, वेळही वाचतो आणि शिरोमाणिच टार्गेट केल्याने बाकीचेहि आपसूक शहाणे होतात :)

रेमिंग्टन 21/07/2019 - 01:28
योग्य आहे सायबा.. एकदा असा अनुभव आल्यावर तिकडे परत न फिरणे इष्ट. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत तिथे तुकोबांचा अभंग आठवावा. "तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे :-) वरती अनेक जाणकार मंडळींनी फार छान सल्ले दिले आहेत. जिथे शांत, प्रसन्न वाटते आणि ईश्वराच्या अंशाशी स्थिर चित्ताने एकरूप होता येते ती खरी आपली ध्यानधारणेची जागा. कधी कधी अप्रसिद्ध अशी मंदिरं असतात तिकडे फारशी वर्दळ नसते. अशा ठिकाणी मनोभावे दर्शन घेऊन सभामंडपातल्या एखाद्या खांबाला टेकावे आणि डोळे मिटून भगवंताशी एकरूप व्हावे. चराचरात ईश्वर व्यापून राहिला आहे हे लक्षात आले की मन शांत होते. बसल्या जागेवरून तुम्ही पंढरपुरात, शिर्डीला जिथे पाहिजे तिथे पोहोचता.

झेन 21/07/2019 - 08:47
मंदिर कुठलं महिती नाही पण वेगवेगळ्या पंथाचे do's don't वेगवेगळे असू शकतात. तिथे आपले लॉजिक नाही चालणार. पहिल्या वेळची ट्रीटमेंट विसरून तुम्ही परत गेलात ? मनाची शांती घालणारा अनुभव घेऊन परत मंदिरात शांति शोधत होतात? किसी रईस की महफिल का जिक्र ही क्या है। खुदा के घर भी न जाएंगे बिनबुलाए हुए। आपलं बुवा असं आहे.

कपिलमुनी 21/07/2019 - 12:41
खासगी या शब्दात सर्व आले. दुसऱ्यांच्या जागेत त्यांनी कसे वागावे हे आपण कोण ठरवणार ? पटत नसेल तर जाऊ नये. स्वतःचे मंदिर बांधावे

In reply to by कपिलमुनी

अभ्या.. 21/07/2019 - 15:24
स्वतःचे मंदिर म्हणजे बांधून आपण स्वतः आशीर्वाद पोजमध्ये बसायचे गाभाऱ्यात? भारी आयडियाय मुनिवर. तुझे मंदिर तर कपिल देव चे मंदिर म्हणून फेमस हुईल.

उपेक्षित 21/07/2019 - 18:40
खर तर मला एक कळत नाही कि पहिल्यांदा वाईट अनुभव आला असूनही तुम्ही परत त्या वाटेला गेलाच कशाला दादा ? अर्थात त्या लोकांचे समर्थन नाहीच करते मी पण मला हा प्रश्न वारंवार पडतो जेव्हा मी शिर्डीला, तिरुपतीला, दगडूशेठ ला, लालबाग च्या राजाच्या इथे हि भली मोठ्ठी लाईन बघतो/ धक्काबुक्की बघतो लोक कशाला आपला वेळ/पैसा आणि श्रम घालवत असतील? असो न सुटणार कोड आहे हे. बाकी माझी बायडी आणि पोरग दरवर्षी गणपतीत ढोल वाजवायला जात असतात त्यांच्या वाड्याच्या गणपती समोर आणि मी मस्त घरी तंगड्या पसरून एकतर भूमी वाचत असतो नाहीतर आपल्या सनी भौंचा घातक बघत असतुया.काय करणार गर्दीमध्ये श्वास गुदमरतो आपला.

कंजूस 21/07/2019 - 22:32
अंबरनाथमधले साई सेक्शन हे त्या भागाचे नाव पडण्याचे कारण (१९५४) सूर्योदय सोसायटी स्थापून घरे बांधली गेली त्यात एकाने बंगल्यात साईबाबाचे देऊळ बांधले. बंगल्याला अति उंच भिंत बांधून गढीच केली. दरवाजा बंद. त्याकाळी साईमंदिरे फारशी नसत. प्रवेश सहज नव्हताच तरीही त्या देवळामुळे साईसेक्शन नाव पडले. २) आणखी दोन शिरडिचे किस्से आहेत पण लिहिणार नाही. ३) अक्कलकोटचाही आहे. पण भक्तगण भडकतील. जाऊद्या. --------------- काही जाण्यासाठी ठिकाणे. आपटे फाटा (पनवेल-पेण रस्ता) ते आपटे गाव या अडिच किमिटरात चार खासगी मंदिरे ( शंकर, कृष्ण, साई, मारुती) आहेत. उत्तम आहेत. आपटे स्टेशनापासून एक किमि गुळसुंदे गावातलं शिव मंदिरही छान आहे . भक्तनिवास आहे. पालीचे गणपती मंदिर रम्य. पावसाळ्यात अतिसुंदर वातावरण. राहाणे,जेवणे व्यवस्था. वसईजवळ तुंगारेश्वर परिसर.- फक्त दिवसा. अलिबागजवळ कनकेश्वर. -राहाणे,जेवणे व्यवस्था. जे उत्तम तिथे पुन्हापुन्हा जा.

Rajesh188 22/07/2019 - 00:26
वरील म्हणीचा उलट अर्थ लावून वागायचं तुम्ही कोणाच्या खासगी मालमत्ते मध्ये आरामात प्रवेश करू शकता . मालक तुमचं स्वागत च करेल

नगरीनिरंजन 22/07/2019 - 10:29
स्वतःच्या भक्तांना असं वागवणार्‍या लोकांना जो ना सौजन्याने वागयची बुद्धी देऊ शकतो ना शिक्षा देऊ शकतो अशा दुर्बळ शक्तिहीन देवाच्या मूर्तीच्या दर्शनाने काय मिळतं?

In reply to by नगरीनिरंजन

जॉनविक्क 22/07/2019 - 19:42
शेवटी देवबाप्पा आज ना उद्या ज्याला त्याला त्याच्या कर्माची शिक्षा देतोच, उसके घर देर है अंधार नही.

In reply to by जॉनविक्क

देव ही एक सुंदर संकल्पना आहे. एकदा का प्रत्येक गोष्ट देवावर सोपवली की झालं. मनुष्य मेला तरी देवाची मर्जी , असे समजले की, दूःख कमी होते. ही सामान्यतः गोष्ट आहे. सरसकट नाही. असो.. तुमच्या मताशी मी सहमत आहे....मी पण मंदीरात जास्त जात नसल्याने, बहुतेक अघोर शिक्षेला पात्र होणार.

In reply to by मुक्त विहारि

जॉनविक्क 22/07/2019 - 23:23
सैतानाशी करारासंबंधिचा नुकताच एका धाग्यावरील घडलेला इतिहास आपणास ज्ञात नसल्याने अथवा आठवत नसल्याने अथवा माहित नसल्याने आपल्या आतिषय निरागस ठरलेल्या प्रतिक्रियेने मन प्रसन्न झाले. खूप खूप धन्यवाद मुवि.

In reply to by मुक्त विहारि

जॉनविक्क 23/07/2019 - 22:55
सैतानाशी करारासंबंधिचा नुकताच एका धाग्यावरील घडलेला इतिहास आपणास ज्ञात नसल्याने अथवा आठवत नसल्याने अथवा माहित नसल्याने आपल्या आतिषय निरागस ठरलेल्या प्रतिक्रियेने मन प्रसन्न झाले. खूप खूप धन्यवाद मुवि. लिहीत रहा.

नाखु 22/07/2019 - 21:27
मी विचार करीत होतोच,कि हा धागा हळूहळू आस्तिक नास्तिक आणि देवावर खापर फोडण्याकडे कसा वळवला नाही. बाकी चालू द्या... धागा नेहमीच्या हुकुमी अंगाने यथायोग्य चिखलफेक करीत जाईल असे दिसतेय

In reply to by नाखु

नगरीनिरंजन 25/07/2019 - 10:30
काय करणार गाववाले? दुबळ्यांवर नेहमी खापर फुटत असते. दुबळ्यांना कोणी वाली नसतो. खुद्द देवही नाही. म्हटलंच आहे ना, “देवो दुर्बलघातकः|“

कंजूस 24/07/2019 - 03:20
खासगी मंदिरे म्हणजे काय हा एक चर्चेचा वेगळा विषय आहे. ग्रामदैवताचे मंदिर हे गावाच्या मालकीचे आणि त्याची व्यवस्था एक पंचसमिती पाहाते. नियम अटी तेच ठरवतात. इतर सर्व मंदिरे खासगीच असतात पण त्यात कमी अधिक जाचक अटी असतात.

चौथा कोनाडा 24/07/2019 - 16:24
हे वाचून मी एकदा उत्तर कर्नाटकातील एका माता मंदिरात गेलो होतो त्या वेळची घटना आठवली. आधीच तो पंथ कडक, अतिशिस्तीचा. (पंथ चांगला निरुपद्रवी वाटत असला तरी त्यात उत्स्फूर्तता जाणवली नाही म्हणून त्याबद्दल काही वाटत नाही) त्या मंदिरात विविध ठिकाणी फिरत असताना एका इतरांना "प्रवेश निषिद्ध" असलेल्या जागेकडे माझी पावलं चुकून वळली. तर अंधारातून एक साध्वी टाईप पांढऱ्या वेशातील म्हातारी स्वयंसेवक बाई माझया अंगावर वस्स्कन आली, इतका प्रचंड दचकलो की बास ! कुठून या माता मंदिरात आलो असं झालं ! आता त्या माताजींचं नाव काढलं की मला ती पांढऱ्या वेशातील चेटकीण बाई आठवते, जणू एखाद्या हॉरर सिनेमातील कायम लक्षात राहिलेला शॉट ! एकंदरीत देव, देवस्थानं या पासून दूरच राहतो मी !

In reply to by विजुभाऊ

उपेक्षित 24/07/2019 - 18:36
किंचित असहमत (दुसर्या ओळीसाठी) काही काही जुनी मंदिरे छोटी/ साधीशी असतात पण तिथे गेल्यावर प्रसन्न वाटते, त्यातली काही लिस्ट देतो खाली (पुण्यातली आहे गोड मानून घ्या :) धारेश्वर मंदिर, धायरी. रामाचे देऊळ, नऱ्हे विठ्ठल मंदिर, हिंगणे रामाचे मंदिर, तुळशीबाग. गणपती मंदिर, सारसबाग मृत्युंजय मंदिर, कोथरूड. गणपती मंदिर, राजाराम पूल. विठ्ठल मंदिर, नवसह्याद्री

In reply to by विजुभाऊ

जॉनविक्क 24/07/2019 - 19:57
पुराण ऐकायला कोणाला आवडते ? तरुणाईत तर कोणीच नाही पण पुण्यातील एका fm वर रोज सकाळी विविध पुराण कथा RJ त्यांच्या आधुनिक RJ स्टाईलमधेच सांगत सांगत गाणी वाजवतो आणि ते आजिबात पकाऊ वाटत नाही, थोडक्यात काळासोबत बदल घडले पाहिजेत हे पटतं.

In reply to by विजुभाऊ

सुबोध खरे 24/07/2019 - 20:59
जगातील सगळे धर्म हे जुनाट आउटडेटेड झालेले आहेत. हे मान्य करूनही त्याला सबळ असा पर्याय उपलब्ध नसल्याने तेच चालत आहेत हि शोकांतिका. धर्माच्या नावाखाली चाललेला बाजार अमान्य केला तरीही धर्मात मान्य झालेली अनेक तत्वे हि नैसर्गिक न्यायाला धरून असल्याने सामान्य लोकांना तीच भावतात. उदा. दया, क्षमा, शांती, प्रामाणिकपणा,समाजाची नियमबद्धता नास्तिकता सामान्य माणसांच्या बुद्धीला पटत नाही.

भक्ताने निर्मानी, निर्मोही, निस्वादी व्हावे अशी भगवंताची अपेक्षा असते. कदाचित पुजार्‍याला पुढे करुन देव तुमची सत्वपरीक्षा पहात असावा :)

जेम्स वांड 20/07/2019 - 17:33
अन आपले कुलोपाध्ये जिथं भिक्षुक, पुजारी, गुरव असतील अशी मंदिरे सोडून इतर मंदिरात जाणे वयाच्या पंधराव्या वर्षीच सोडले आहे, सर्वात उत्तम मनःशांती मिळवायचा उपाय म्हणजे घरच्या देवापुढे एक दिवा लावावा, वातावरण प्रसन्न करेल अशी एकच उत्तम उदबत्ती लावावी अन ध्यानमग्न होऊन पंधरा मिनिटे वाटेल त्या देवतेचे फक्त मनःपूर्वक नामस्मरण करावे. बाकी सगळं झूट.

जर आपल्याला आलेला अनुभव खरा असेल तर आपण त्यामंदिराचे नांव पत्ता द्यायला हरकत नाही. जेणेकरुन लोकांना तेथे जाण्ञापूर्वी विचार करता येईल. आपण आपल्याला आलेला अनुभव सांगीतला आहे. त्यात 'चिखल्फेक' कसली ? खरेतर आपण लगेच तिथुन बाहेर पडायला हवे होते. अश्या मनस्थितीत दर्शन घेऊन आपण कुठली मनशांती मिळविली कळत नाही. हे खासगी मंदिर असल्याने कोणाला येऊ द्यावे, आणि कसे वागवावे हा त्यांचा खासगी मामला आहे. त्यामुळे असे अनुभव प्रसिद्ध करुनच त्यांनी सुधरावे लागेल. जेंव्हा केवळ दहा व्यक्ती दर्शनाला येतील आणि बाहेर हजारो लोक त्यांना वाईट प्रसिद्धी देतील तेंव्हाच त्यांना काहीतरी वाटेल

In reply to by सामान्यनागरिक

सुबोध खरे 20/07/2019 - 18:25
हे खासगी मंदिर असल्याने कोणाला येऊ द्यावे, आणि कसे वागवावे हा त्यांचा खासगी मामला आहे. त्यामुळे असे अनुभव प्रसिद्ध करुनच त्यांनी सुधरावे लागेल. सहमत. इतरांना असा अनुभव येऊ नये म्हणून नाव पत्ता जाहीर करावा मुळात वाईट अनुभव आला तर दुसऱ्यांदा जाणे मी टाळतोच. कदाचित त्यांना प्रसिद्धी आणि त्याबरोबर येणारी गर्दी नकोच असेल. त्यामुळे अशी (कु)प्रसिद्धी ते मुद्दाम करतही असतील पुण्यात काहीही शक्य आहे.

In reply to by सुबोध खरे

विजुभाऊ 24/07/2019 - 16:47
कदाचित अधीक अपमान होण्यामुळे त्यांच्या पुणेकरत्वावर शिक्कामोर्तब होत असावे. आणि विरुद्ध प्रसिद्धी मिळाल्यामुळे गर्दीही वाढेल असे त्यांचे नवे मार्केटिंग गिमीक असेल. पुण्यात एके काळी एक शेपटीवाले बाबा होते ( वय वर्षे १२/१५ ) ते अधूनमधून भक्ताना प्रसाद म्हणून कानफाटात वगैरे द्यायचे. मुंबईमधली ते संत राधे मां ही देखील याच पंथातली. पण ती अधीक खूश झाली की प्रसाद म्हनून काही भक्तांच्या मांडीवर पण बसायची. अवांतर : मंदीर जर खाजगी असेल तर तेथेच जाय्चा अट्टाहास कशाला? तेही एकदा अपमान करून घेतलेला असताना

नाखु 20/07/2019 - 19:26
चिंचवडमध्ये तीस वर्षे रहात असूनही एकदाही चतुर्थी ला गर्दीत मोरया गोसावी दर्शनासाठी गेलो नाही. पण त्याचा अर्थ मी नास्तिक मनुष्य आहे असं नाही. पण जिथे गर्दी आणि माज, बडेजाव असतो तिथे सात्विकता मला तरी अनुभवायला मिळाली नाही. रायगडावरील मंदीर, बदामी येथील बनशंकरी, चिंचवड येथील राममंदिर आणि शिवथरघळ ,सज्नजगड येथील समर्थ रामदास स्वामींच्या दर्शनासाठी गेलो असता मनाला समाधान लाभते आणि मुख्य म्हणजे माझी दिवंगत पत्नीबरोबर या ठिकाणी गेलो असल्यानेच आजही ती माझ्याबरोबरच आहे असा मला विश्वास वाटतो. लेकीलाही गर्दी आणि हडेलहप्पी तर दर्शन आवडत नाही म्हणून गणेशोत्सव दरम्यान कुठले गणपती पाहण्यासाठी जात नाही आणि सगळ्या राजांना घरूनच नमस्कार केला तरी पोहोचतो याची खात्री आहे. सश्रद्ध पांढरपेशा मध्यमवर्गीय नाखु

In reply to by नाखु

जिथे गर्दी आणि माज, बडेजाव असतो तिथे सात्विकता मला तरी अनुभवायला मिळाली नाही. +१०० उलट अश्या जागी तथाकथित स्वयंसेवक आणि रक्षकांची मुजोरी चालू असते... आणि त्यांची ती सवय (विशेषतः, दर्शनाला आलेल्या लोकांना पुढे ढकलणे) गर्दी नसली तरी, कायम असते. ही सवय सेवेची नसून, गर्दीवर सत्ता गाजवण्याच्या उन्मादाची असते. अशा जागी पावित्र्याची, निर्मळ आनंदाची आणि मनःशांतीची अनुभूती कशी येऊ शकेल ? नावाजलेल्या देवस्थानांत एकदोनदा त्या प्रकारच्या उन्मादी माणसांचा अनुभव आल्यानंतर, मी नावाजलेल्या आणि/किंवा गर्दी असलेल्या देवस्थानांत जाणे बंद केले आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

संगणकनंद 21/07/2019 - 09:42
तुमचा हा प्रतिसाद वाचून मुंबईतील एक प्रसिद्ध हंगामी देवस्थान आठवले लगेच. तरीही भाबडी श्रद्धा असलेले लोक जातात. आपल्या घरी असलेला देव आणि हा प्रसिद्ध देव वेगळे नाहीत ही समज येण्याइतकी त्यांची अध्यात्मिक प्रगती झालेली नसते. देव आपल्याच आत आहे ही तर त्याच्याही पुढची पायरी असते हे त्यांना कळणेही शक्य नाही. नेमका याच गोष्टीचा गैरफायदा काही धूर्त लोक घेतात. स्वतःला देवाची माणसं किंवा अध्यात्मिक गुरु म्हणून घोषित करतात आणि साधनेच्या नावावर भोळ्याभाबड्या श्रद्धावान लोकांना भरकटवतात. लोकही यालाच "आपण देवाचं काहीतरी करतोय" असं समजून या कृतकृत्य होतात. दुर्दैवी आहे हे सारं.

In reply to by संगणकनंद

त्या देवस्थानातील 'सेवकांच्या' वागणूकीचे प्रकार टिव्हीवर पाहिल्यानंतर तेथे कधी गेलो नाही, किंबहुना, आता जावे असे वाटतही नाही. परंतु, इतर बहुतेक नावाजलेल्या देवस्थानांमध्येही काही फारसा वेगळा प्रकार होतो असे नाही. एकंदरीत, "भाविकांना देवळात येऊ देवून आपण त्यांच्यावर फार मोठे उपकार करत आहोत आणि त्यांच्याशी असभ्यपणे वागणे, त्यांना धक्काबुक्की करणे, हे आपले जन्मसिद्ध अधिकार आहेत", असे गर्दी होणार्‍या बहुतेक सगळ्या देवस्थानांतील "सेवेकर्‍यांचे (?!)" मत आहे असेच दिसते. अश्या जागी देव सापडेल असे मला वाटत नाही... कारण तेथे तो असता तर त्याने सर्वप्रथम त्या नाठाळ "सेवेकर्‍यांना" वठणीवर आणले असते. प्रसिद्धी झाली, गर्दी जमली की, देवकारण हे अर्थकारणाचे दास बनते. अर्थकारणाला प्राधान्य देणार्‍यांना देवस्थानाचे पावित्र्य आणि मांगल्य कसे राखता येईल ? मग अश्या लोकांना आस्तिक तरी कसे म्हणता येईल ? "अर्थकारण सबळ झाले की देवस्थानांवर, सहाजिकपणे मागच्या दाराने, आस्तिकाच्या मुखवट्यातील नास्तिकांचे राज्य येते" असा माझा एक लाडका सिद्धांत आहे. तसे नसते तर, (अ) देवाच्या भक्ताला नाडण्याचे आणि (आ) देवावरील हक्कांकरिता (पक्षी : त्यापासून मिळणार्‍या मलिद्यासाठी) वेळप्रसंगी हिंसा करण्याचे, प्रसंग दिसले नसते, नाही का?

वकील साहेब 20/07/2019 - 20:53
याच संदर्भात शेगाव संस्थानच्या सेवेकऱ्यांची वर्तणूक फार विनम्र वाटते. असेच विपश्यना केंद्रातील स्वयंसेवक देखील फार विनम्र असतात.

Rajesh188 20/07/2019 - 21:31
मला अक्कलकोट खूप आवडलं . खूप छान सुविधा आहेत . खासगी काही ही असू ध्या तिराहित तक्रार करण्याचा अधिकार वापरू शकत नाही . मग खासगी मंदिर असेल .मंदिर हा शब्द काढून कोणताही शब्द वापरू शकता . लेखक ची घोड चूक आहे त्यांनी कोणाच्या तरी खासगी मालमत्तेत प्रवेश केला

राघव 20/07/2019 - 22:39
कुठेतरी वाचलेले एक वाक्य अशावेळी आठवतेय - "प्रत्येक मूर्खाला शहाणे करण्याचा प्रयत्न करणे हा एक मूर्खपणा आहे, आणि आम्ही तो करणार नाही." माझ्या मते हे वाक्य अशा बाबतीत आचरणात आणण्यास हरकत नसावी. :-)

In reply to by मुक्त विहारि

जॉनविक्क 24/07/2019 - 16:59
त्यामुळे फार मोजके मूर्ख मी टार्गेट करतो. बराच फायदा होतो यातून, वेळही वाचतो आणि शिरोमाणिच टार्गेट केल्याने बाकीचेहि आपसूक शहाणे होतात :)

रेमिंग्टन 21/07/2019 - 01:28
योग्य आहे सायबा.. एकदा असा अनुभव आल्यावर तिकडे परत न फिरणे इष्ट. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत तिथे तुकोबांचा अभंग आठवावा. "तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे :-) वरती अनेक जाणकार मंडळींनी फार छान सल्ले दिले आहेत. जिथे शांत, प्रसन्न वाटते आणि ईश्वराच्या अंशाशी स्थिर चित्ताने एकरूप होता येते ती खरी आपली ध्यानधारणेची जागा. कधी कधी अप्रसिद्ध अशी मंदिरं असतात तिकडे फारशी वर्दळ नसते. अशा ठिकाणी मनोभावे दर्शन घेऊन सभामंडपातल्या एखाद्या खांबाला टेकावे आणि डोळे मिटून भगवंताशी एकरूप व्हावे. चराचरात ईश्वर व्यापून राहिला आहे हे लक्षात आले की मन शांत होते. बसल्या जागेवरून तुम्ही पंढरपुरात, शिर्डीला जिथे पाहिजे तिथे पोहोचता.

झेन 21/07/2019 - 08:47
मंदिर कुठलं महिती नाही पण वेगवेगळ्या पंथाचे do's don't वेगवेगळे असू शकतात. तिथे आपले लॉजिक नाही चालणार. पहिल्या वेळची ट्रीटमेंट विसरून तुम्ही परत गेलात ? मनाची शांती घालणारा अनुभव घेऊन परत मंदिरात शांति शोधत होतात? किसी रईस की महफिल का जिक्र ही क्या है। खुदा के घर भी न जाएंगे बिनबुलाए हुए। आपलं बुवा असं आहे.

कपिलमुनी 21/07/2019 - 12:41
खासगी या शब्दात सर्व आले. दुसऱ्यांच्या जागेत त्यांनी कसे वागावे हे आपण कोण ठरवणार ? पटत नसेल तर जाऊ नये. स्वतःचे मंदिर बांधावे

In reply to by कपिलमुनी

अभ्या.. 21/07/2019 - 15:24
स्वतःचे मंदिर म्हणजे बांधून आपण स्वतः आशीर्वाद पोजमध्ये बसायचे गाभाऱ्यात? भारी आयडियाय मुनिवर. तुझे मंदिर तर कपिल देव चे मंदिर म्हणून फेमस हुईल.

उपेक्षित 21/07/2019 - 18:40
खर तर मला एक कळत नाही कि पहिल्यांदा वाईट अनुभव आला असूनही तुम्ही परत त्या वाटेला गेलाच कशाला दादा ? अर्थात त्या लोकांचे समर्थन नाहीच करते मी पण मला हा प्रश्न वारंवार पडतो जेव्हा मी शिर्डीला, तिरुपतीला, दगडूशेठ ला, लालबाग च्या राजाच्या इथे हि भली मोठ्ठी लाईन बघतो/ धक्काबुक्की बघतो लोक कशाला आपला वेळ/पैसा आणि श्रम घालवत असतील? असो न सुटणार कोड आहे हे. बाकी माझी बायडी आणि पोरग दरवर्षी गणपतीत ढोल वाजवायला जात असतात त्यांच्या वाड्याच्या गणपती समोर आणि मी मस्त घरी तंगड्या पसरून एकतर भूमी वाचत असतो नाहीतर आपल्या सनी भौंचा घातक बघत असतुया.काय करणार गर्दीमध्ये श्वास गुदमरतो आपला.

कंजूस 21/07/2019 - 22:32
अंबरनाथमधले साई सेक्शन हे त्या भागाचे नाव पडण्याचे कारण (१९५४) सूर्योदय सोसायटी स्थापून घरे बांधली गेली त्यात एकाने बंगल्यात साईबाबाचे देऊळ बांधले. बंगल्याला अति उंच भिंत बांधून गढीच केली. दरवाजा बंद. त्याकाळी साईमंदिरे फारशी नसत. प्रवेश सहज नव्हताच तरीही त्या देवळामुळे साईसेक्शन नाव पडले. २) आणखी दोन शिरडिचे किस्से आहेत पण लिहिणार नाही. ३) अक्कलकोटचाही आहे. पण भक्तगण भडकतील. जाऊद्या. --------------- काही जाण्यासाठी ठिकाणे. आपटे फाटा (पनवेल-पेण रस्ता) ते आपटे गाव या अडिच किमिटरात चार खासगी मंदिरे ( शंकर, कृष्ण, साई, मारुती) आहेत. उत्तम आहेत. आपटे स्टेशनापासून एक किमि गुळसुंदे गावातलं शिव मंदिरही छान आहे . भक्तनिवास आहे. पालीचे गणपती मंदिर रम्य. पावसाळ्यात अतिसुंदर वातावरण. राहाणे,जेवणे व्यवस्था. वसईजवळ तुंगारेश्वर परिसर.- फक्त दिवसा. अलिबागजवळ कनकेश्वर. -राहाणे,जेवणे व्यवस्था. जे उत्तम तिथे पुन्हापुन्हा जा.

Rajesh188 22/07/2019 - 00:26
वरील म्हणीचा उलट अर्थ लावून वागायचं तुम्ही कोणाच्या खासगी मालमत्ते मध्ये आरामात प्रवेश करू शकता . मालक तुमचं स्वागत च करेल

नगरीनिरंजन 22/07/2019 - 10:29
स्वतःच्या भक्तांना असं वागवणार्‍या लोकांना जो ना सौजन्याने वागयची बुद्धी देऊ शकतो ना शिक्षा देऊ शकतो अशा दुर्बळ शक्तिहीन देवाच्या मूर्तीच्या दर्शनाने काय मिळतं?

In reply to by नगरीनिरंजन

जॉनविक्क 22/07/2019 - 19:42
शेवटी देवबाप्पा आज ना उद्या ज्याला त्याला त्याच्या कर्माची शिक्षा देतोच, उसके घर देर है अंधार नही.

In reply to by जॉनविक्क

देव ही एक सुंदर संकल्पना आहे. एकदा का प्रत्येक गोष्ट देवावर सोपवली की झालं. मनुष्य मेला तरी देवाची मर्जी , असे समजले की, दूःख कमी होते. ही सामान्यतः गोष्ट आहे. सरसकट नाही. असो.. तुमच्या मताशी मी सहमत आहे....मी पण मंदीरात जास्त जात नसल्याने, बहुतेक अघोर शिक्षेला पात्र होणार.

In reply to by मुक्त विहारि

जॉनविक्क 22/07/2019 - 23:23
सैतानाशी करारासंबंधिचा नुकताच एका धाग्यावरील घडलेला इतिहास आपणास ज्ञात नसल्याने अथवा आठवत नसल्याने अथवा माहित नसल्याने आपल्या आतिषय निरागस ठरलेल्या प्रतिक्रियेने मन प्रसन्न झाले. खूप खूप धन्यवाद मुवि.

In reply to by मुक्त विहारि

जॉनविक्क 23/07/2019 - 22:55
सैतानाशी करारासंबंधिचा नुकताच एका धाग्यावरील घडलेला इतिहास आपणास ज्ञात नसल्याने अथवा आठवत नसल्याने अथवा माहित नसल्याने आपल्या आतिषय निरागस ठरलेल्या प्रतिक्रियेने मन प्रसन्न झाले. खूप खूप धन्यवाद मुवि. लिहीत रहा.

नाखु 22/07/2019 - 21:27
मी विचार करीत होतोच,कि हा धागा हळूहळू आस्तिक नास्तिक आणि देवावर खापर फोडण्याकडे कसा वळवला नाही. बाकी चालू द्या... धागा नेहमीच्या हुकुमी अंगाने यथायोग्य चिखलफेक करीत जाईल असे दिसतेय

In reply to by नाखु

नगरीनिरंजन 25/07/2019 - 10:30
काय करणार गाववाले? दुबळ्यांवर नेहमी खापर फुटत असते. दुबळ्यांना कोणी वाली नसतो. खुद्द देवही नाही. म्हटलंच आहे ना, “देवो दुर्बलघातकः|“

कंजूस 24/07/2019 - 03:20
खासगी मंदिरे म्हणजे काय हा एक चर्चेचा वेगळा विषय आहे. ग्रामदैवताचे मंदिर हे गावाच्या मालकीचे आणि त्याची व्यवस्था एक पंचसमिती पाहाते. नियम अटी तेच ठरवतात. इतर सर्व मंदिरे खासगीच असतात पण त्यात कमी अधिक जाचक अटी असतात.

चौथा कोनाडा 24/07/2019 - 16:24
हे वाचून मी एकदा उत्तर कर्नाटकातील एका माता मंदिरात गेलो होतो त्या वेळची घटना आठवली. आधीच तो पंथ कडक, अतिशिस्तीचा. (पंथ चांगला निरुपद्रवी वाटत असला तरी त्यात उत्स्फूर्तता जाणवली नाही म्हणून त्याबद्दल काही वाटत नाही) त्या मंदिरात विविध ठिकाणी फिरत असताना एका इतरांना "प्रवेश निषिद्ध" असलेल्या जागेकडे माझी पावलं चुकून वळली. तर अंधारातून एक साध्वी टाईप पांढऱ्या वेशातील म्हातारी स्वयंसेवक बाई माझया अंगावर वस्स्कन आली, इतका प्रचंड दचकलो की बास ! कुठून या माता मंदिरात आलो असं झालं ! आता त्या माताजींचं नाव काढलं की मला ती पांढऱ्या वेशातील चेटकीण बाई आठवते, जणू एखाद्या हॉरर सिनेमातील कायम लक्षात राहिलेला शॉट ! एकंदरीत देव, देवस्थानं या पासून दूरच राहतो मी !

In reply to by विजुभाऊ

उपेक्षित 24/07/2019 - 18:36
किंचित असहमत (दुसर्या ओळीसाठी) काही काही जुनी मंदिरे छोटी/ साधीशी असतात पण तिथे गेल्यावर प्रसन्न वाटते, त्यातली काही लिस्ट देतो खाली (पुण्यातली आहे गोड मानून घ्या :) धारेश्वर मंदिर, धायरी. रामाचे देऊळ, नऱ्हे विठ्ठल मंदिर, हिंगणे रामाचे मंदिर, तुळशीबाग. गणपती मंदिर, सारसबाग मृत्युंजय मंदिर, कोथरूड. गणपती मंदिर, राजाराम पूल. विठ्ठल मंदिर, नवसह्याद्री

In reply to by विजुभाऊ

जॉनविक्क 24/07/2019 - 19:57
पुराण ऐकायला कोणाला आवडते ? तरुणाईत तर कोणीच नाही पण पुण्यातील एका fm वर रोज सकाळी विविध पुराण कथा RJ त्यांच्या आधुनिक RJ स्टाईलमधेच सांगत सांगत गाणी वाजवतो आणि ते आजिबात पकाऊ वाटत नाही, थोडक्यात काळासोबत बदल घडले पाहिजेत हे पटतं.

In reply to by विजुभाऊ

सुबोध खरे 24/07/2019 - 20:59
जगातील सगळे धर्म हे जुनाट आउटडेटेड झालेले आहेत. हे मान्य करूनही त्याला सबळ असा पर्याय उपलब्ध नसल्याने तेच चालत आहेत हि शोकांतिका. धर्माच्या नावाखाली चाललेला बाजार अमान्य केला तरीही धर्मात मान्य झालेली अनेक तत्वे हि नैसर्गिक न्यायाला धरून असल्याने सामान्य लोकांना तीच भावतात. उदा. दया, क्षमा, शांती, प्रामाणिकपणा,समाजाची नियमबद्धता नास्तिकता सामान्य माणसांच्या बुद्धीला पटत नाही.

भक्ताने निर्मानी, निर्मोही, निस्वादी व्हावे अशी भगवंताची अपेक्षा असते. कदाचित पुजार्‍याला पुढे करुन देव तुमची सत्वपरीक्षा पहात असावा :)
नमस्कार मित्र मैत्रिणींनो .अतिशय मोठ्या कालखंडानंतर मिपावर लिहीत आहे. सर्व कसे आहात? कंकाका यांचेशी मी अधून मधून संपर्कात असतो. मिपावर फोटो चिकटवणे ही खूप किचकट प्रक्रिया आहे म्हणून थोडा कंटाळा करत होतो.या लेखात फोटो असण्याची गरज नाही हा भाग वेगळा. फोटोसाठी काही युक्त्या कंकाका यांनी सांगितलेल्या आहेत त्या करून पाहतो.असो ....आता लेखाच्या विषयाकडे वळूया. खाजगी मंदिरे हा एक अतिशय भयानक प्रकार अलीकडेच पुण्यात पाहिला.

वाई-मंत्र

मी_आहे_ना ·

चौकटराजा 19/07/2019 - 21:32
तुम्ही जोग कंत्राटदार यांची इंपाला म्हणत असाल तर ती मध्ये मी बसलेलो नाही . पण वाईत १९७६ तर १९८० या काळात एक डॉक्टर होते. एका मित्राची व त्यांची ओळख होती त्यामुळे मी त्या लाल इंपाला मधून गावभर फिरलो आहे. तुमची शाळा बोपर्डीकर यांचे वाड्याचे शेजारी होती का ? ( बाहेर शिंदे यांचे शिवण कामाचे दुकान ). बाकी माझ्या वाईबद्दल अगणित आठवणी आहेत .

In reply to by मी_आहे_ना

चौकटराजा 20/07/2019 - 08:46
मी राहत होतो ती खोली व शाळा यांच्यात जवळ जवळ अडथळा काहीच नव्हता . मी कपडे धुवायला बाहेर आलो की पोराचा वर्ग दिसत असे. पोरे फार मस्ती करीत. एकदा गंमत झाली .कुत्रयांचा " मौसम" असावा . एक कुत्री व तिच्या मागे लागलेले दहा बारा कुत्रे अशी वरात शाळेत घुसली . कुत्री पुढे कुत्रे पाठिमागे असे पोरांच्य मधून पाठलाग सुरू झाला. बाईना काय करावे कळेना . पोरे किंचाळू लागली. जराशाने कुणीतरी काठी आपटल्याने हा प्रकार थांबला शाळा सुरू झाली .

लेख आवडला.... शाळा ही फक्त चौथी पर्यंतच आवडली.... पाचवी नंतर पांजरपोळात भरती करण्यात आली... अजून पण वाईला जाता का?

In reply to by मी_आहे_ना

मग आता वाईच्या आसपासच्या परिसरातील प्रेक्षणीय स्थळांच्या बाबतीत पण काही लिहू शकता का? वाई मध्ये खाण्याची चंगळ आहे, (पुण्या पेक्षा नक्कीच जास्त) असे ऐकीवात आहे. विशेषतः घरगुती खानावळीत जेवण चांगले मिळते, असे ऐकले आहे. ..

जालिम लोशन 19/07/2019 - 23:39
तशी आमच्यावेळी ही शाळा अस्तित्वात नव्हती. फक्त द्रविड हायस्कुल, कन्याशाळा, शिंदे हायस्कुल आणी नगरपरिषदेच्या शाळा होत्या.

In reply to by जालिम लोशन

मी_आहे_ना 20/07/2019 - 07:57
बहुधा ही शाळा १९७५ते८० दरम्यान सुरु झाली. माध्यमिक शिक्षण द्रविड्मध्येच, तेव्हाच्या आठवणी "द्रविडायन" ह्या लेखमालेतून मांडल्या आहेत, लवकरच तीही डकवतो इथे.

अभ्या.. 20/07/2019 - 11:30
टिपिकल सरासरी चरित्र. इतके प्रेडिक्टेबल की पुढील वैकुंठापर्यंत ही लिहू शकेन. अर्थात वाई सातार्यातल्या पब्लिकला रिलेट होत असणार पण इतके सरळसोट वाचायचाही कंटाळा येतो. स्मरणशक्ती मात्र वाखाणण्याजोगी आहे.

In reply to by अभ्या..

मोठ्या कौतुकाने "शाळा" आणि "दुनियादारी" वाचायला घेतले आणि संपवले. शालेय आणि बर्याच काॅलेजमधील जीवन सामान्यतः सारखेच असते.

कंजूस 20/07/2019 - 18:57
धोम धरणामुळे कृष्णेचे पाणी वरच अडले, वाई गावातल्या नदी पात्रांची डबकी झाली. मजाच गेली. कृष्णेचा उत्सव होतो फेब्रुवारीत तो सप्टेंबरात केला पाहिजे नदीला पाणी असताना.

मी_आहे_ना 23/07/2019 - 09:30
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार. पहिल्याच ओळीत सांगितल्याप्रमाणे हे लेखन माझ्यासोबत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या मित्रसमूहासाठी केलेले असल्याने त्यात सार्वत्रिक भावना असण्याला मर्यादा नक्कीच होत्या. शिवाय वाई सारख्या (तत्कालीन) खेड्यात घडणार तरी किती अन काय! अर्थात असाच सरधोपट जीवनप्रवास वैकुंठापर्यंत झाला तर तिथेपर्यंतही अश्याच छोट्या छोट्या गोष्टींबद्दल उल्लेख करून जरूर लिहीन (ह.घ्या.) पण ह्यात कृत्रीमपणा काही वाटत असल्यास ते मात्र माझे अपयश समजतो कारण ह्यात वर्णन केलेले क्षण अन क्षण मी जगलेलो आहे!

चौकटराजा 19/07/2019 - 21:32
तुम्ही जोग कंत्राटदार यांची इंपाला म्हणत असाल तर ती मध्ये मी बसलेलो नाही . पण वाईत १९७६ तर १९८० या काळात एक डॉक्टर होते. एका मित्राची व त्यांची ओळख होती त्यामुळे मी त्या लाल इंपाला मधून गावभर फिरलो आहे. तुमची शाळा बोपर्डीकर यांचे वाड्याचे शेजारी होती का ? ( बाहेर शिंदे यांचे शिवण कामाचे दुकान ). बाकी माझ्या वाईबद्दल अगणित आठवणी आहेत .

In reply to by मी_आहे_ना

चौकटराजा 20/07/2019 - 08:46
मी राहत होतो ती खोली व शाळा यांच्यात जवळ जवळ अडथळा काहीच नव्हता . मी कपडे धुवायला बाहेर आलो की पोराचा वर्ग दिसत असे. पोरे फार मस्ती करीत. एकदा गंमत झाली .कुत्रयांचा " मौसम" असावा . एक कुत्री व तिच्या मागे लागलेले दहा बारा कुत्रे अशी वरात शाळेत घुसली . कुत्री पुढे कुत्रे पाठिमागे असे पोरांच्य मधून पाठलाग सुरू झाला. बाईना काय करावे कळेना . पोरे किंचाळू लागली. जराशाने कुणीतरी काठी आपटल्याने हा प्रकार थांबला शाळा सुरू झाली .

लेख आवडला.... शाळा ही फक्त चौथी पर्यंतच आवडली.... पाचवी नंतर पांजरपोळात भरती करण्यात आली... अजून पण वाईला जाता का?

In reply to by मी_आहे_ना

मग आता वाईच्या आसपासच्या परिसरातील प्रेक्षणीय स्थळांच्या बाबतीत पण काही लिहू शकता का? वाई मध्ये खाण्याची चंगळ आहे, (पुण्या पेक्षा नक्कीच जास्त) असे ऐकीवात आहे. विशेषतः घरगुती खानावळीत जेवण चांगले मिळते, असे ऐकले आहे. ..

जालिम लोशन 19/07/2019 - 23:39
तशी आमच्यावेळी ही शाळा अस्तित्वात नव्हती. फक्त द्रविड हायस्कुल, कन्याशाळा, शिंदे हायस्कुल आणी नगरपरिषदेच्या शाळा होत्या.

In reply to by जालिम लोशन

मी_आहे_ना 20/07/2019 - 07:57
बहुधा ही शाळा १९७५ते८० दरम्यान सुरु झाली. माध्यमिक शिक्षण द्रविड्मध्येच, तेव्हाच्या आठवणी "द्रविडायन" ह्या लेखमालेतून मांडल्या आहेत, लवकरच तीही डकवतो इथे.

अभ्या.. 20/07/2019 - 11:30
टिपिकल सरासरी चरित्र. इतके प्रेडिक्टेबल की पुढील वैकुंठापर्यंत ही लिहू शकेन. अर्थात वाई सातार्यातल्या पब्लिकला रिलेट होत असणार पण इतके सरळसोट वाचायचाही कंटाळा येतो. स्मरणशक्ती मात्र वाखाणण्याजोगी आहे.

In reply to by अभ्या..

मोठ्या कौतुकाने "शाळा" आणि "दुनियादारी" वाचायला घेतले आणि संपवले. शालेय आणि बर्याच काॅलेजमधील जीवन सामान्यतः सारखेच असते.

कंजूस 20/07/2019 - 18:57
धोम धरणामुळे कृष्णेचे पाणी वरच अडले, वाई गावातल्या नदी पात्रांची डबकी झाली. मजाच गेली. कृष्णेचा उत्सव होतो फेब्रुवारीत तो सप्टेंबरात केला पाहिजे नदीला पाणी असताना.

मी_आहे_ना 23/07/2019 - 09:30
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार. पहिल्याच ओळीत सांगितल्याप्रमाणे हे लेखन माझ्यासोबत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या मित्रसमूहासाठी केलेले असल्याने त्यात सार्वत्रिक भावना असण्याला मर्यादा नक्कीच होत्या. शिवाय वाई सारख्या (तत्कालीन) खेड्यात घडणार तरी किती अन काय! अर्थात असाच सरधोपट जीवनप्रवास वैकुंठापर्यंत झाला तर तिथेपर्यंतही अश्याच छोट्या छोट्या गोष्टींबद्दल उल्लेख करून जरूर लिहीन (ह.घ्या.) पण ह्यात कृत्रीमपणा काही वाटत असल्यास ते मात्र माझे अपयश समजतो कारण ह्यात वर्णन केलेले क्षण अन क्षण मी जगलेलो आहे!
(चेपुवर पूर्वप्रकाशित. सातारा जिल्ह्यातल्या वाई सारख्या टुमदार गावात गेलेलं बालपण शब्दांकित करण्याचा छोटासा प्रयत्न.) मंडळी , "वाईमंत्र" ही लेखमाला माझ्या आवाक्यातील आठवणींनुसार लिहिली आहे. आमच्या बालवाडी ते ४थीच्या शाळेचा व्हॉट्सअ‍ॅप गृप निमित्त ठरला आणि आठवणींची एक मालिकाच बनत गेली. ती एकत्र करुन इथे पोस्ट करतोय. कदाचित इतरांनाही त्यांच्या लहानपणीचा प्रवास आठवेल. वाईमंत्र-१ 'वाई' - हा शब्दच जणू एखाद्या मंत्रासारखा. आणि आपण सगळे भाग्यवान की आपल्याला कोणाला तो वेगळा शिकायची गरजच नाही, तो आपल्याला जन्मत:च येतो :) तर अश्या ह्या वाई मधलं १९८० चं दशक.

देवाघरचे देणे आणि ग्रहणवेळा

शिव कन्या ·

अभ्या.. 18/07/2019 - 12:14
अह्ह्हा, अप्रतिम. तो डेक्कनला बसायचा डेस्क घेऊन दहाबारा वर्षापूर्वी. कधी गणपतीच्या आकारात नाव तर कधी वळणदार अक्शरातली स्वाक्षरी करुन द्यायचा. असाच दुसरा रस्त्यावर रांगोळी काढत बसायचा खडूने. तिसरा एक मंदीरातली पौराणिक चित्रे रंगवत बसायचा उधारीच्या रंगांनी. चौथा दिसला परवाच फेसबुकावर, मांडी घालून आईस्क्रीमच्या गाड्यावर देवीचे चित्र रंगवताना. फ्लेक्स येण्यापूर्वी त्याची डोळ्यात प्राण आणून वाट पाहायचे लोक. . ग्रहणकाळच का हा? कदाचित चंद्रही पाहात असेल स्वतःकडेच. ग्रहणाची काळीछाया जाणवत असेल का त्याला? मोक्षही पाहतो का काळवेळ? की हे ग्रहण असते कुणाला? की प्रत्यक्ष मोक्षालाच? काय की? कुठल्या बाजूने पाहायचे तेही कळेनासे होते. :(

In reply to by अभ्या..

शिव कन्या 18/07/2019 - 18:23
देवाघरची किती नक्षत्रं काढावीत! प्रश्न तर सगळ्यांना पडतात....चंद्राला, ग्रहणवेळेला, मोक्षकाळाला...आपण तर माणूस केवळ. तुमच्या दिलसे प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

In reply to by शिव कन्या

नाखु 24/07/2019 - 12:38
सायकलीवर लफ्फेदार नावे कोरण्याची फॅशन होती तेंव्हा असाच अवलिया डेक्कन पुलावर असायचा अदमासे तीसेक वर्षांपूर्वी बोटात जादू होती. दुसरा एक शनिवार वाड्याच्या बाजूलाच अप्पा बळवंत चौकाकडून येणाऱ्या रस्त्यावर एक पडका वाडा होता त्याच्या भिंतीवर सुरेख चित्रे रंगवायचा, बरेचदा निसर्ग चित्र आणि प्रसिद्ध चेहरेही असत. वेशभूषा अगदीच गबाळी पूर्णतः वेडसर इसमासमान असायची.नक्की काय शल्य असायचे माहित नाही पण अगदी तल्लीन होऊन चित्र रेखाटन चालू असायचे तेव्हा जाण्या येण्याच्या रस्त्यावर असलेने बरेचदा अर्धा तास सुद्धा उभे राहून कलाकृती पाहिली आहे. मनपा पर्यंत चालत गेलं की दोन रुपये वाचवायचे दिवस होते ते. कुठल्या विषयावरून काय आठवेल त्याचा नेम नाही हे स्फुट लेखन आवडले. मुदलातच गंडलेला पांढरपेशा मध्यमवर्गीय नाखु

जेम्स वांड 18/07/2019 - 12:23
ह्याला म्हणतात "लेखणीचा तलमपणा". कसलं सुंदर लिहिलं आहे तिच्या पेन्सिलचे स्ट्रोक मारताना होणारी खरखर अन त्याच्या lyre ची अदाकारी ह्यांची अवीट गोडी एकदम मनात झंकारली. देवाने तुम्हाला दान दिले आहे लिखाणाचे, अजून फुलवा नजर आहे तुमच्याकडे भावना शब्दांत कैद करायची, खूप खूप लिहा, भरपूर शुभेच्छा. Flowers 15Flowers 15

अभ्या.. 18/07/2019 - 12:14
अह्ह्हा, अप्रतिम. तो डेक्कनला बसायचा डेस्क घेऊन दहाबारा वर्षापूर्वी. कधी गणपतीच्या आकारात नाव तर कधी वळणदार अक्शरातली स्वाक्षरी करुन द्यायचा. असाच दुसरा रस्त्यावर रांगोळी काढत बसायचा खडूने. तिसरा एक मंदीरातली पौराणिक चित्रे रंगवत बसायचा उधारीच्या रंगांनी. चौथा दिसला परवाच फेसबुकावर, मांडी घालून आईस्क्रीमच्या गाड्यावर देवीचे चित्र रंगवताना. फ्लेक्स येण्यापूर्वी त्याची डोळ्यात प्राण आणून वाट पाहायचे लोक. . ग्रहणकाळच का हा? कदाचित चंद्रही पाहात असेल स्वतःकडेच. ग्रहणाची काळीछाया जाणवत असेल का त्याला? मोक्षही पाहतो का काळवेळ? की हे ग्रहण असते कुणाला? की प्रत्यक्ष मोक्षालाच? काय की? कुठल्या बाजूने पाहायचे तेही कळेनासे होते. :(

In reply to by अभ्या..

शिव कन्या 18/07/2019 - 18:23
देवाघरची किती नक्षत्रं काढावीत! प्रश्न तर सगळ्यांना पडतात....चंद्राला, ग्रहणवेळेला, मोक्षकाळाला...आपण तर माणूस केवळ. तुमच्या दिलसे प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

In reply to by शिव कन्या

नाखु 24/07/2019 - 12:38
सायकलीवर लफ्फेदार नावे कोरण्याची फॅशन होती तेंव्हा असाच अवलिया डेक्कन पुलावर असायचा अदमासे तीसेक वर्षांपूर्वी बोटात जादू होती. दुसरा एक शनिवार वाड्याच्या बाजूलाच अप्पा बळवंत चौकाकडून येणाऱ्या रस्त्यावर एक पडका वाडा होता त्याच्या भिंतीवर सुरेख चित्रे रंगवायचा, बरेचदा निसर्ग चित्र आणि प्रसिद्ध चेहरेही असत. वेशभूषा अगदीच गबाळी पूर्णतः वेडसर इसमासमान असायची.नक्की काय शल्य असायचे माहित नाही पण अगदी तल्लीन होऊन चित्र रेखाटन चालू असायचे तेव्हा जाण्या येण्याच्या रस्त्यावर असलेने बरेचदा अर्धा तास सुद्धा उभे राहून कलाकृती पाहिली आहे. मनपा पर्यंत चालत गेलं की दोन रुपये वाचवायचे दिवस होते ते. कुठल्या विषयावरून काय आठवेल त्याचा नेम नाही हे स्फुट लेखन आवडले. मुदलातच गंडलेला पांढरपेशा मध्यमवर्गीय नाखु

जेम्स वांड 18/07/2019 - 12:23
ह्याला म्हणतात "लेखणीचा तलमपणा". कसलं सुंदर लिहिलं आहे तिच्या पेन्सिलचे स्ट्रोक मारताना होणारी खरखर अन त्याच्या lyre ची अदाकारी ह्यांची अवीट गोडी एकदम मनात झंकारली. देवाने तुम्हाला दान दिले आहे लिखाणाचे, अजून फुलवा नजर आहे तुमच्याकडे भावना शब्दांत कैद करायची, खूप खूप लिहा, भरपूर शुभेच्छा. Flowers 15Flowers 15
#टिचभर_गोष्ट देवाघरचे देणे आणि ग्रहणवेळा ती दर शनिवार रविवारी पार्कातल्या एका कोपऱ्यात बसे. हाताशी ए फोर साईझचे कागद, दोनचार पेन्सिली, शार्पनर आणि इरेझर. (इरेझर लागत नसेच.) हौशी जोडपी येत, एकमेकांचे स्केच करून घेत. आईबाप मोठ्या कौतुकाने आपल्या लेकराबाळांची छबी रेखाटून घेत. आरशात पाहून कंटाळलेले कुणी स्वत:ला कागदावर उतरवून घेत. दहा ते पंधरा मिनिटात कोऱ्या कागदावर ती समोरच्याचा नाकनक्शा तंतोतंत रेखाटे. आजूबाजूला बघ्यांची गर्दी जमे. त्यांच्या डोळ्यांत आश्चर्य असे, कौतुक असे. घेणारा स्वत:च्याच रूपावर खुश असे. अंधार पडू लागला की ती पैसे मोजी.

ऑफिसात जाऊन आलो

महासंग्राम ·

नाखु 02/07/2019 - 19:15
सुट्टी जाहीर केली तेंव्हा नाही गेलात हापिसात,हेलपाटा पडला असता शिवाय घरी लवकर यायचा कंटाळा आला असता तो वेगळाच. विडंबन आवडले

नाखु 02/07/2019 - 19:15
सुट्टी जाहीर केली तेंव्हा नाही गेलात हापिसात,हेलपाटा पडला असता शिवाय घरी लवकर यायचा कंटाळा आला असता तो वेगळाच. विडंबन आवडले
ऑफिसात गेलो, गप्पा मारून आलो कॅन्टीनला जाऊन मी भजे खाऊन आलो जरी थेंब पावसाचे आले ओला .. भिजून आलो भांबावल्या दुपारी झोपा काढून आलो होते कुणी न कोणी नव्हतोच एकटे ना? लोकां कसे पटावे पाट्या टाकून आलो.. ? पाकीट जरी रिकामे अकाऊंट भरून आले.. चुकू मुळी न देता लॉगिन करून आलो. मूळ पेरणा इथे आहे