मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जात नाहीं जात ती जात

अविनाशकुलकर्णी ·

चौकस२१२ 07/03/2020 - 18:34
यावरून "अग्निपंख " हे नाटक आठवले... आठवते ते असे - गांधी हत्ये नंतर चा महाराष्ट्रतील काळ.. - सांगली चे पटवर्धन किंवा भोर चे संस्थानिक अश्यांवर साधारण बेतलेले असावे.. संस्थानिक ब्राहमण.. काळाच्या मानाने उदारमतवादी,, त्यांचा मित्र स्थानिक पुढारी ( बहुतेक उच्च कुळी मराठा ) .. त्याकाळात जे काही गावात चालू झाले त्यात हा पुढारी पुढे.. पण आपल्याच मित्रा वर कसा हल्ला करायचाच हा मनी प्रश्न... तेव्हाच त्याचा मुलगा एका दलित मुलीच्या प्रेमात पडतो आणि त्या लग्नाला हा संस्थानिक पाठिंबा देतो..आणि निभावून नेतो ... शेवट मात्र संस्थनिक आणि त्याची बायको जळणाऱ्या वाड्यात उभे .. वाडा पेटलाय चहुबाजूने आणि हे गायत्री मंत्र म्हणत प्रसंगाला सामोरे जात आहेत ( श्रीराम लागू आणि सुहास जोशी ) थोडक्यात काय जातीभेद करण्याची चूक फक्त एका जातीकडून केली जातीय असे नाहीये..( सकळ सारखी माध्यमे आणि त्यांचे धनी सतत जी गरळ ओकत असतात/ काड्या घालत असतात त्यावरून वाटेल) . सर्व जातीतच असे नव्हे तर हिंदूइतर धर्मात पण हे होत आहे.. असे नसते तर २०२० साली सुद्धा ,मुसलमानांच्यात जाती नसत्या, कुरेशी आणि बागवान यांना रोटी बेटी वयवहार करायला प्रश्न पडला नसता, ख्रिस्ती ब्राह्माण किंवा मराठा ख्रिस्ती वर / वधु अश्या जाहिराती आल्या नसत्या .. इस्राएल मध्ये काळे जु आणि गोरे जु यांच्यात भांडण नसती ! असो नाजूक विषय आहे ...हे होणे चांगले नाही आणि ते लोप पहिलेच पाहिजे .. ते लोप पावे पर्यंत सर्वांनी समतोल राखावा हीच इच्छा

चौकस२१२ 07/03/2020 - 18:34
यावरून "अग्निपंख " हे नाटक आठवले... आठवते ते असे - गांधी हत्ये नंतर चा महाराष्ट्रतील काळ.. - सांगली चे पटवर्धन किंवा भोर चे संस्थानिक अश्यांवर साधारण बेतलेले असावे.. संस्थानिक ब्राहमण.. काळाच्या मानाने उदारमतवादी,, त्यांचा मित्र स्थानिक पुढारी ( बहुतेक उच्च कुळी मराठा ) .. त्याकाळात जे काही गावात चालू झाले त्यात हा पुढारी पुढे.. पण आपल्याच मित्रा वर कसा हल्ला करायचाच हा मनी प्रश्न... तेव्हाच त्याचा मुलगा एका दलित मुलीच्या प्रेमात पडतो आणि त्या लग्नाला हा संस्थानिक पाठिंबा देतो..आणि निभावून नेतो ... शेवट मात्र संस्थनिक आणि त्याची बायको जळणाऱ्या वाड्यात उभे .. वाडा पेटलाय चहुबाजूने आणि हे गायत्री मंत्र म्हणत प्रसंगाला सामोरे जात आहेत ( श्रीराम लागू आणि सुहास जोशी ) थोडक्यात काय जातीभेद करण्याची चूक फक्त एका जातीकडून केली जातीय असे नाहीये..( सकळ सारखी माध्यमे आणि त्यांचे धनी सतत जी गरळ ओकत असतात/ काड्या घालत असतात त्यावरून वाटेल) . सर्व जातीतच असे नव्हे तर हिंदूइतर धर्मात पण हे होत आहे.. असे नसते तर २०२० साली सुद्धा ,मुसलमानांच्यात जाती नसत्या, कुरेशी आणि बागवान यांना रोटी बेटी वयवहार करायला प्रश्न पडला नसता, ख्रिस्ती ब्राह्माण किंवा मराठा ख्रिस्ती वर / वधु अश्या जाहिराती आल्या नसत्या .. इस्राएल मध्ये काळे जु आणि गोरे जु यांच्यात भांडण नसती ! असो नाजूक विषय आहे ...हे होणे चांगले नाही आणि ते लोप पहिलेच पाहिजे .. ते लोप पावे पर्यंत सर्वांनी समतोल राखावा हीच इच्छा
जात नाहीं जात ती जात विलासराव भोसले व त्यांचा परिवार सुस्थितला होता..विलासराव महसुल खात्यात उच्च पदावर होते..परिवार फार पुरोगामी नाहि फार रुढिवादी नाहि..

मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा

महासंग्राम ·

हेमंतकुमार 27/02/2020 - 14:46
आवाहन मी गेली ३० वर्षे माझी स्वाक्षरी मराठीत करतो. असे मराठी लोक अगदी अल्पसंख्य आहेत, निदान शहरांत तरी असे निरीक्षण. एक आर्थिक व्यवहारातली इंग्लीश सही सोडून द्या, पण अन्यत्र करतांना तुम्ही ती देवनागरीत कराल ?

In reply to by हेमंतकुमार

महासंग्राम 27/02/2020 - 16:07
मी एक दोनदा प्रयत्न केला होता मराठीतल्या स्वाक्षरीचा पण पुलंना जशी जमायची तश्या प्रकारची काही जमली नाही मला

सर्वाना शुभेच्छा. अकुंचा एखादा लेख येइल असे वाटले होते- परवा लखनौकर नावाचा मित्र भेटला... प्रोपर लखनौचा .. गप्पा मारताना त्याला म्हणलो माझे पण ३-४ लखनौकर आडनावाचे दोस्त आहेत.. काहि फेसबुकावर पण आहेत.. त्यावर तो म्हणाला ते लखनौकर वेगळे ,आम्ही वेग्ळे म्ह्णजे?? ते हिंदीमिश्रीत मराठी बोलतात ..आमचे मराठीमिश्रीत हिंदी त्यांच्या संधी/समास निराळे आमचे निराळे.. काका तुम्ही "अग्गबाई सासूबाई "सिरियल बघता का? बघतो ना.... त्यातली आसावरी आनुनासिक मराठी बोलते तसे आम्हि घरी एकमेकाशी बोलतो... भोजपुरी व मैथिली हा प्रकार बिहारमध्ये असतो..तसाच तो मराठीत आहे हे ऐकुन मजा वाटली.. किति विविधता आहे..ना?

हेमंतकुमार 27/02/2020 - 14:46
आवाहन मी गेली ३० वर्षे माझी स्वाक्षरी मराठीत करतो. असे मराठी लोक अगदी अल्पसंख्य आहेत, निदान शहरांत तरी असे निरीक्षण. एक आर्थिक व्यवहारातली इंग्लीश सही सोडून द्या, पण अन्यत्र करतांना तुम्ही ती देवनागरीत कराल ?

In reply to by हेमंतकुमार

महासंग्राम 27/02/2020 - 16:07
मी एक दोनदा प्रयत्न केला होता मराठीतल्या स्वाक्षरीचा पण पुलंना जशी जमायची तश्या प्रकारची काही जमली नाही मला

सर्वाना शुभेच्छा. अकुंचा एखादा लेख येइल असे वाटले होते- परवा लखनौकर नावाचा मित्र भेटला... प्रोपर लखनौचा .. गप्पा मारताना त्याला म्हणलो माझे पण ३-४ लखनौकर आडनावाचे दोस्त आहेत.. काहि फेसबुकावर पण आहेत.. त्यावर तो म्हणाला ते लखनौकर वेगळे ,आम्ही वेग्ळे म्ह्णजे?? ते हिंदीमिश्रीत मराठी बोलतात ..आमचे मराठीमिश्रीत हिंदी त्यांच्या संधी/समास निराळे आमचे निराळे.. काका तुम्ही "अग्गबाई सासूबाई "सिरियल बघता का? बघतो ना.... त्यातली आसावरी आनुनासिक मराठी बोलते तसे आम्हि घरी एकमेकाशी बोलतो... भोजपुरी व मैथिली हा प्रकार बिहारमध्ये असतो..तसाच तो मराठीत आहे हे ऐकुन मजा वाटली.. किति विविधता आहे..ना?
तारांमध्ये बारा राशी सप्तवारामध्ये रविससी यादिमिचेआं भासांमध्ये.. मराठिया.. मिसळपाव परिवारातल्या समस्त मराठी जनांना मराठी राजभाषा दिनाच्या मऱ्हाटमोळ्या शुभेच्छा ! मराठी बोलूया, मराठी जपूया, मराठी वाढवूया ! हे आपलं मिसळपावडॉटकॉम चं ट्विटर खातं ज्यांना शक्य असेल त्यांनी लाईक आणि रिट्विट करा. आणि #मिसळपावडॉटकॉम हा हॅशटॅग वापरायला विसरू नका.

देशस्थ व कोकणस्थ

अविनाशकुलकर्णी ·

योग्य बोललास रे अवि. त्या विविधतेला आमचा सलाम. आता 'कुलकर्णी' आडनावाचा उहापोह करायचा म्हण्टला तर धागा तासाभरात शतक ठोकेल. कुलकर्णी की कुळकर्णी पासूनच सुरुवात होईल.

रमेश आठवले 14/02/2020 - 20:21
एकदा गोळवलकर गुरुजींना कोणीतरी विचारले कि तुमची जात कोणती. त्यांनी उत्तर दिले कि मी कायस्थ आहे. पृच्छकाने पुन्हा विचारले कि ते कसे. गुरुजींनी उत्तर दिले - मी या कायेत रहातो म्हणुन मी काय स्थ आहे.

गड्डा झब्बू 15/02/2020 - 00:32
त्यावर तो म्हणाला ते सावंत अन आम्हि निराळे/...
माझ्या सावंत आडनावाच्या अनेक मित्रांपैकी २ नवबौद्ध आहेत. किति विविधता आहे महाराष्ट्रात. तुम्ही सन्यास घ्यावा अशी इच्छा नाही पण उगाच काहीतरी फालतू धागे काढू नका काका.

In reply to by गड्डा झब्बू

खटपट्या 18/02/2020 - 03:00
आडनावावरुन जात ओळखणे सद्या तरी कठिण होत चालले आहे. त्यात सावंत, कदम, पाटील, मोरे ही आडनावे सर्व समावेशक आहेत यात सर्व ब्राह्मणेतर जाती येतात. आता काही नवबौध्द जोशी आडनाव लावतात त्याला काय म्हणायचं.. असो

In reply to by खटपट्या

अप्रतिम 18/02/2020 - 08:14
पाटील आडनावाचे ब्राह्मण देखील पाहण्यात आले आहेत...जॉर्ज फर्नाडीस ने हरवलेले स.का.पाटील ब्राह्मण होते असे कुठेतरी वाचण्यात आले आहे.

In reply to by खटपट्या

Sanjay Uwach 19/02/2020 - 17:10
पूर्वीच्या काळी जे वतनदार किंवा सरदार घराण्यातील लोक होते, त्यांचे एक विशिष्ट कारभारी किंव्हा खास मुख्य अधिकारी असत व लीहणे , हिशोब ठेवणे या सारखी कामे करणाऱ्या व्यक्ती ह्या बहुतेक ब्राम्हण समाजातील होत्या. त्यांना त्या सरदारांचा शिक्का उठवणे व सही करण्याचे अधिकार देखील ज्या, त्या सरदारांनी दीले असत. कालांतराने त्या मराठा सरदारांची नावे देखील त्यांना चिकटली. उदारणादाखल हेरल्याचे शिंदे, इचलकरंजीचे घोरपडे, मोरेे. ह्या जुन्या काळातल्या कारभाऱ्यांनी आपल्या धन्याच्या अनुपस्थितीत, संकटकाळात जीवाची बाजी लावून आपला इमान देखील त्यांनी जपला होता. पाटील,नाईक, देसाई मुतालिक हि आडनावे मात्र कामाच्या पदावरून पडली आहेत. हे किती जरी कांहीं असले तरी मी.पा. वरील लेखकांची नावे ही मात्र फारच मनोरंजक व निधर्मिक आहेत व ती कायमची चीकटण्याचा देखील भीती नाही.

खटपट्या 18/02/2020 - 03:03
देशस्थ व कोकणस्थ हा प्रकार ब्राह्मणात असतो..तसाच तो मराठा समा््जात पण आहे हे ऐकुन मजा वाटली..
त्यात काय मजा वाटायची ? देशावरचे ते देशस्थ आणि कोकणातले ते कोकणस्त. मग ते कोणत्याही जातीचे असोत... अगदी मुसलमानही स्वतःला कोकणस्थ आणि देशस्थ म्हणवुन घेतात. असो.

सुबोध खरे 21/02/2020 - 11:06
गोव्यात तर ख्रिश्चन सुद्धा RCB म्हणजे रोमन कॅथॉलिक ब्राम्हण म्हणून जात असून ह्यांच्या विवाहविषयक स्तंभात नवभारत टाइम्स या वृत्तपत्रात जाहिराती येत असत. हे म्हणजे पूर्वाश्रमीचे सारस्वत (ब्राम्हण) बाटल्यानंतर रोमन कॅथॉलिक झाले. पण त्यांनि आपली जात टिकवून ठेवली आहे आणि इतर जातींमध्ये लग्न करण्याची त्यांची मानसिक तयारी नाही.

योग्य बोललास रे अवि. त्या विविधतेला आमचा सलाम. आता 'कुलकर्णी' आडनावाचा उहापोह करायचा म्हण्टला तर धागा तासाभरात शतक ठोकेल. कुलकर्णी की कुळकर्णी पासूनच सुरुवात होईल.

रमेश आठवले 14/02/2020 - 20:21
एकदा गोळवलकर गुरुजींना कोणीतरी विचारले कि तुमची जात कोणती. त्यांनी उत्तर दिले कि मी कायस्थ आहे. पृच्छकाने पुन्हा विचारले कि ते कसे. गुरुजींनी उत्तर दिले - मी या कायेत रहातो म्हणुन मी काय स्थ आहे.

गड्डा झब्बू 15/02/2020 - 00:32
त्यावर तो म्हणाला ते सावंत अन आम्हि निराळे/...
माझ्या सावंत आडनावाच्या अनेक मित्रांपैकी २ नवबौद्ध आहेत. किति विविधता आहे महाराष्ट्रात. तुम्ही सन्यास घ्यावा अशी इच्छा नाही पण उगाच काहीतरी फालतू धागे काढू नका काका.

In reply to by गड्डा झब्बू

खटपट्या 18/02/2020 - 03:00
आडनावावरुन जात ओळखणे सद्या तरी कठिण होत चालले आहे. त्यात सावंत, कदम, पाटील, मोरे ही आडनावे सर्व समावेशक आहेत यात सर्व ब्राह्मणेतर जाती येतात. आता काही नवबौध्द जोशी आडनाव लावतात त्याला काय म्हणायचं.. असो

In reply to by खटपट्या

अप्रतिम 18/02/2020 - 08:14
पाटील आडनावाचे ब्राह्मण देखील पाहण्यात आले आहेत...जॉर्ज फर्नाडीस ने हरवलेले स.का.पाटील ब्राह्मण होते असे कुठेतरी वाचण्यात आले आहे.

In reply to by खटपट्या

Sanjay Uwach 19/02/2020 - 17:10
पूर्वीच्या काळी जे वतनदार किंवा सरदार घराण्यातील लोक होते, त्यांचे एक विशिष्ट कारभारी किंव्हा खास मुख्य अधिकारी असत व लीहणे , हिशोब ठेवणे या सारखी कामे करणाऱ्या व्यक्ती ह्या बहुतेक ब्राम्हण समाजातील होत्या. त्यांना त्या सरदारांचा शिक्का उठवणे व सही करण्याचे अधिकार देखील ज्या, त्या सरदारांनी दीले असत. कालांतराने त्या मराठा सरदारांची नावे देखील त्यांना चिकटली. उदारणादाखल हेरल्याचे शिंदे, इचलकरंजीचे घोरपडे, मोरेे. ह्या जुन्या काळातल्या कारभाऱ्यांनी आपल्या धन्याच्या अनुपस्थितीत, संकटकाळात जीवाची बाजी लावून आपला इमान देखील त्यांनी जपला होता. पाटील,नाईक, देसाई मुतालिक हि आडनावे मात्र कामाच्या पदावरून पडली आहेत. हे किती जरी कांहीं असले तरी मी.पा. वरील लेखकांची नावे ही मात्र फारच मनोरंजक व निधर्मिक आहेत व ती कायमची चीकटण्याचा देखील भीती नाही.

खटपट्या 18/02/2020 - 03:03
देशस्थ व कोकणस्थ हा प्रकार ब्राह्मणात असतो..तसाच तो मराठा समा््जात पण आहे हे ऐकुन मजा वाटली..
त्यात काय मजा वाटायची ? देशावरचे ते देशस्थ आणि कोकणातले ते कोकणस्त. मग ते कोणत्याही जातीचे असोत... अगदी मुसलमानही स्वतःला कोकणस्थ आणि देशस्थ म्हणवुन घेतात. असो.

सुबोध खरे 21/02/2020 - 11:06
गोव्यात तर ख्रिश्चन सुद्धा RCB म्हणजे रोमन कॅथॉलिक ब्राम्हण म्हणून जात असून ह्यांच्या विवाहविषयक स्तंभात नवभारत टाइम्स या वृत्तपत्रात जाहिराती येत असत. हे म्हणजे पूर्वाश्रमीचे सारस्वत (ब्राम्हण) बाटल्यानंतर रोमन कॅथॉलिक झाले. पण त्यांनि आपली जात टिकवून ठेवली आहे आणि इतर जातींमध्ये लग्न करण्याची त्यांची मानसिक तयारी नाही.
परवा सावंत नावाचा मित्र भेटला... प्रोपर सावंत वाडीचा .. गप्पा मारताना त्याला म्हणलो माझे पण ३-४ सावंत आडनावाचे दोस्त आहेत.. काहि फेसबुकावर पण आहेत.. त्यावर तो म्हणाला ते सावंत अन आम्हि निराळे/... म्ह्णजे?? ते देशस्थ मराठा आम्हि कोकणस्थ मराठा..आमचे मसाले खाद्य पदार्थ निराळे त्यांचे निराळे..ामचा मालवणी मसाला त्यांचा कोल्हापुरी मसाला... काका तुम्ही "काहे दिया परदेस "सिरियल बघता का? बघतो ना.... त्यातली गौरीची आज्जी जी कोकणी मिश्रित मराठी बोलते तसे आम्हि घरी एकमेकाशी बोलतो... देशस्थ व कोकणस्थ हा प्रकार ब्राह्मणात असतो..तसाच तो मराठा समा््जात पण आहे हे ऐकुन मजा वाटली.. किति विविधता आहे..

शोध बांग्लादेशींचा एक वेगळ विश्लेषण

माहितगार ·
trends.google.com हि एक गूगलची रोचक सेवा आहे. जिचा आधार मिपावर माझी विश्लेषणे देण्यासाठी मी वेळोवेळी केला आहे. महाराष्ट्र विधानसेभेच्या निवडणूकपुर्व काळात शरद पवारांची शोधप्रीयतेचा आलेख चढतो आहे हे मी सांगितल्यानंतर बहुतेकांना माझ्या विश्लेषणांवर विश्वास वाटला नव्हता. असो, या वेळी गूगल ट्रेंडच्या साहाय्याने जरासे वेगळे विश्लेषण विश्लॅषण भारतातील बांग्लादेशींचे! मी सुरवातीसच गूगल ट्रेंडचा दुवा दिला आहे. मी म्हणतो तशा पद्धतीने आपणही गूगल ट्रेंड्सवर शोध देऊन विवीध शक्यतांचा अभ्यास करू शकता.

चाळ तशीच आहे.

आदिजोशी ·

mrcoolguynice 29/11/2019 - 19:15
लेख चांगला आहे, आवडला.
पण चाळीत रहायची खरी मजा ही तिथल्या वैयक्तीक कमतरेत आणि सार्वजनीक मुबलकतेतच तर आहे.
बाकी लेखातील वरील वाक्य, तुमच्यात एक छुपा समाजवादी लपलेला आहे की काय ? अशी शंका मनात निर्माण करतो. (कृपया हळु घेणे)

मदनबाण 29/11/2019 - 19:42
माझा फार कमी काळ चाळीत गेला आहे, परंतु तिचे अनुभव आजही मेंदुत कोरलेले आहेत ! संडासच्या आत चिंतनात बसलेल्याला बाहेरचा टमरेल घेउन उभ्या उभ्या प्रेशर सहन करण्याच्या प्रयत्नात दरवाजावर जोरा जोरात थापा मारुन मुखाने काय रे झोपलास का आत? असे हमखास ओरडायचा. तर कोणी विडीकाडी ओढणारे असेल तर आत त्याचेही गंध ! :))) चाळीच्या सज्ज्यावर हात टेकवुन खाली चालणारी रहदारी पाहण्या सारखा रम्य अनुभव नाही ! अगदी काल परवाच झोपेत चाळीच्या खालुन, ओ गिरीष ची आई... गिरीष आहे का ? अशी हाक मारली होती ! उपासनी, करमरकर,भंगाळे,शहा, गांधी अशी आडनावे देखील लक्षात आहेत अजुन.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आवारापन बंजारापन एक ख़ला है सीने में हर दम हर पल बेचैनी है कौन बला है सीने में... :- JISM

In reply to by आदिजोशी

मदनबाण 29/11/2019 - 20:01
नाही. पण आत्ता तिकडे जाउन आलो, सवड मिळताच शांतपणे वाचेन.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आवारापन बंजारापन एक ख़ला है सीने में हर दम हर पल बेचैनी है कौन बला है सीने में... :- JISM

Rajesh188 29/11/2019 - 22:13
मी काही वर्ष बैठ्या चाळीत राहिलो आहे .अनुभव खूप छान होता . सर्व सण सर्व मिळून अत्यंत उत्साहात साजरे केले जायचे आणि त्यात सर्वांचा सहभाग असायचा चाळी मध्ये श्रावण महिन्यात ग्रंथ वाचन होयचं. चाळी मध्ये 1 कॉमन रूम होती त्या मध्ये. सर्व लोक एकमेकाच्या दुःखात,सुखात सहभागी असायची एकटेपणा कोणाला जाणवायचा नाही भले सुविधा कमी होत्या. संडास साठी सार्वजनिक संडास चा वापर केला जायचा. तिथे सकाळ ची लाईन असायची. सकाळी उठून संडास गेले की रेशन chya लाईन ल नंबर लावायला तोच डब्बा ठेवला जायचा. समूहात राहण्याचा आनंद च काही वेगळा असतो

सुबोध खरे 30/11/2019 - 09:41
माझ्या दोन मावश्या गिरगावात चाळीत राहत असत आणि आता मावसभाऊ राहत आहेत. तेंव्हा तेथे बऱ्याच वेळेस जाणे येणे आणि राहणे होत असे. परंतु चाळीबद्दल काहीही आकर्षण वाटले नाही. कारण आम्ही राहत होतो त्या सोसायटीत चाळीत असावा इतकाच "ओलावा आणि प्रेम होतं" एकमेकांच्या घरी कधीही जावं यावं जेवावं अशी स्थिती होती. तरीही घरं मोठी आणि वैयक्तिक जागा भरपूर असलेली होती. चाळीचा संडास हि जितक्या ठिकाणी एक अत्यंत अस्वच्छ आणि गलिच्छ जागाच आहे असे पाहत आलो आहे. बहुतेक चाळींमध्ये संडास हा चाळीच्या एका टोकाला असतात. त्यातून एखाद्याला हगवण लागली असेल तर त्याची स्थिती फारच गंभीर असते. स्त्रियांची पाळीच्या वेळेस फारच कुचंबणा होते. वेळी अवेळी एखादा म्हातारा घरात आगाऊपणे डोकावताना आणि नको असलेली चौकशी करताना तर अनेक वेळेस पाहिलेले आहे. एकंदर चाळीतच कसा ओलावा आणि प्रेम होतं आणि सोसायटीत माणसे कायम बंद खोल्यात वावरतात ( हे मिथ्या आहे) असा गहिवर काढताना पाहिले तर डोक्यात जाते. जाता जाता-- चाळीतून सोसायटीत येणारी शेकडो माणसे पाहिली आहेत पण गंगा उलटी वाहताना पाहिलेली नाही. म्हणजे कितीही कौतुक केले तरी चाळ नकोच असा एकंदर जमाखर्च येतो.

In reply to by सुबोध खरे

जॉनविक्क 30/11/2019 - 14:17
200% नाही पण 101% नक्की सहमत. अर्थात चाळीत रहाणाऱ्या लोकांबद्दल हे मत नसून चाळ नावाच्या व्यवस्थेबद्दल आहे. बाकी आम्ही नाही का जगात आमचा देश सर्वात महान म्हणतो तसेच चाळीबद्दल गहिवर असणेही चूक नाही असे स्पष्ट मत आहे

श्वेता२४ 30/11/2019 - 11:12
आज स्वखुशीने परत चाळीत रहायला जाईन का? माहिती नाही. बहुतेक तरी नाहीच. एकटाच असतो तर गेलोही असतो कदचित. यातच सारे आले.............

mrcoolguynice 29/11/2019 - 19:15
लेख चांगला आहे, आवडला.
पण चाळीत रहायची खरी मजा ही तिथल्या वैयक्तीक कमतरेत आणि सार्वजनीक मुबलकतेतच तर आहे.
बाकी लेखातील वरील वाक्य, तुमच्यात एक छुपा समाजवादी लपलेला आहे की काय ? अशी शंका मनात निर्माण करतो. (कृपया हळु घेणे)

मदनबाण 29/11/2019 - 19:42
माझा फार कमी काळ चाळीत गेला आहे, परंतु तिचे अनुभव आजही मेंदुत कोरलेले आहेत ! संडासच्या आत चिंतनात बसलेल्याला बाहेरचा टमरेल घेउन उभ्या उभ्या प्रेशर सहन करण्याच्या प्रयत्नात दरवाजावर जोरा जोरात थापा मारुन मुखाने काय रे झोपलास का आत? असे हमखास ओरडायचा. तर कोणी विडीकाडी ओढणारे असेल तर आत त्याचेही गंध ! :))) चाळीच्या सज्ज्यावर हात टेकवुन खाली चालणारी रहदारी पाहण्या सारखा रम्य अनुभव नाही ! अगदी काल परवाच झोपेत चाळीच्या खालुन, ओ गिरीष ची आई... गिरीष आहे का ? अशी हाक मारली होती ! उपासनी, करमरकर,भंगाळे,शहा, गांधी अशी आडनावे देखील लक्षात आहेत अजुन.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आवारापन बंजारापन एक ख़ला है सीने में हर दम हर पल बेचैनी है कौन बला है सीने में... :- JISM

In reply to by आदिजोशी

मदनबाण 29/11/2019 - 20:01
नाही. पण आत्ता तिकडे जाउन आलो, सवड मिळताच शांतपणे वाचेन.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आवारापन बंजारापन एक ख़ला है सीने में हर दम हर पल बेचैनी है कौन बला है सीने में... :- JISM

Rajesh188 29/11/2019 - 22:13
मी काही वर्ष बैठ्या चाळीत राहिलो आहे .अनुभव खूप छान होता . सर्व सण सर्व मिळून अत्यंत उत्साहात साजरे केले जायचे आणि त्यात सर्वांचा सहभाग असायचा चाळी मध्ये श्रावण महिन्यात ग्रंथ वाचन होयचं. चाळी मध्ये 1 कॉमन रूम होती त्या मध्ये. सर्व लोक एकमेकाच्या दुःखात,सुखात सहभागी असायची एकटेपणा कोणाला जाणवायचा नाही भले सुविधा कमी होत्या. संडास साठी सार्वजनिक संडास चा वापर केला जायचा. तिथे सकाळ ची लाईन असायची. सकाळी उठून संडास गेले की रेशन chya लाईन ल नंबर लावायला तोच डब्बा ठेवला जायचा. समूहात राहण्याचा आनंद च काही वेगळा असतो

सुबोध खरे 30/11/2019 - 09:41
माझ्या दोन मावश्या गिरगावात चाळीत राहत असत आणि आता मावसभाऊ राहत आहेत. तेंव्हा तेथे बऱ्याच वेळेस जाणे येणे आणि राहणे होत असे. परंतु चाळीबद्दल काहीही आकर्षण वाटले नाही. कारण आम्ही राहत होतो त्या सोसायटीत चाळीत असावा इतकाच "ओलावा आणि प्रेम होतं" एकमेकांच्या घरी कधीही जावं यावं जेवावं अशी स्थिती होती. तरीही घरं मोठी आणि वैयक्तिक जागा भरपूर असलेली होती. चाळीचा संडास हि जितक्या ठिकाणी एक अत्यंत अस्वच्छ आणि गलिच्छ जागाच आहे असे पाहत आलो आहे. बहुतेक चाळींमध्ये संडास हा चाळीच्या एका टोकाला असतात. त्यातून एखाद्याला हगवण लागली असेल तर त्याची स्थिती फारच गंभीर असते. स्त्रियांची पाळीच्या वेळेस फारच कुचंबणा होते. वेळी अवेळी एखादा म्हातारा घरात आगाऊपणे डोकावताना आणि नको असलेली चौकशी करताना तर अनेक वेळेस पाहिलेले आहे. एकंदर चाळीतच कसा ओलावा आणि प्रेम होतं आणि सोसायटीत माणसे कायम बंद खोल्यात वावरतात ( हे मिथ्या आहे) असा गहिवर काढताना पाहिले तर डोक्यात जाते. जाता जाता-- चाळीतून सोसायटीत येणारी शेकडो माणसे पाहिली आहेत पण गंगा उलटी वाहताना पाहिलेली नाही. म्हणजे कितीही कौतुक केले तरी चाळ नकोच असा एकंदर जमाखर्च येतो.

In reply to by सुबोध खरे

जॉनविक्क 30/11/2019 - 14:17
200% नाही पण 101% नक्की सहमत. अर्थात चाळीत रहाणाऱ्या लोकांबद्दल हे मत नसून चाळ नावाच्या व्यवस्थेबद्दल आहे. बाकी आम्ही नाही का जगात आमचा देश सर्वात महान म्हणतो तसेच चाळीबद्दल गहिवर असणेही चूक नाही असे स्पष्ट मत आहे

श्वेता२४ 30/11/2019 - 11:12
आज स्वखुशीने परत चाळीत रहायला जाईन का? माहिती नाही. बहुतेक तरी नाहीच. एकटाच असतो तर गेलोही असतो कदचित. यातच सारे आले.............
चाळ तशीच आहे. आमच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंत चाळ तशीच आहे. जुनीच. तिथे तरूणपणी रहायला येऊन वयोवॄद्ध झालेल्या अनेकांनाही चाळ अशीच आठवते. तुकतुकीत, तरणीताठी दिसणारी चाळ कुणीच बघितली नाही. कधी तरी ती तशी असेलही नक्कीच. १०० वर्ष सहज होऊन गेली चाळीला. कदचित १५० ही झाली असतील. आता त्या वयाचं चाळीशिवाय चाळीत कुणीच नसल्याने नक्की सांगता येत नाही. कधी कधी रंगरंगोटी केली जाते. पण ती म्हातारपणी कलप लावल्यासारखी वाटते. वय लपत नाही. पण चाळ तशीच आहे. पायर्‍या तेव्हाही वाजायच्या, आत्ताही वाजतात. दिवे त्यांच्या मूडनुसार दिवस-रात्र न बघता हवं तेव्हाच पेटतात. चाळीतले ते बोळ आणि जिनेही तसेच आहेत.

सुखवार्ता

vcdatrange ·
समाजात अनेक जण विविध क्षेत्रांत पारंगत असतात. काहीजण तर त्या कामातून कुठलाही आर्थिक वा अन्य लाभ मिळत नसतानाही ते मन लावून करीत असतात. अशा कार्याला कुणी समाजसेवा म्हणेल तर कुणी 'लष्कराच्या भाकऱ्या' म्हणेल. अश्याच काही हटके व्यक्तीमत्वांची दखल घेवून, या सुखवार्ता शेअर कराव्या असं ठरवलंय १. मिलिंद पगारे ---- नाशकातले मिलिंदकाका पगारे बहुराष्ट्रीय कंपनीतुन केमिकल इंजिनिअर पदाहुन रिटायर झाल्यावर केवळ हौशेपोटी प्लास्टिक प्रदुषणावर जनजागृती करतायेत.

आमार कोलकाता - भाग ९ (अंतिम) - बंगभोज

अनिंद्य ·

जेम्स वांड 06/11/2019 - 19:12
परत एकदा रसना खवळून उठली! खल्लास फोटो अन खाद्ययात्रा. एक हलकीफुलकी दुरुस्ती सुचवतो, गोड मानून घेणे इतकेच काय भारतातल्या मोजक्याच 'मिशिगन स्टार' दर्जा असलेल्या हा मिशिगन स्टार नसून मिशलीन स्टार होय असे वाटते, १९व्या शतकात स्वयंचलित चारचाकी गाड्या प्रसिद्धी पावल्या तसे त्यांना पूरक-एकमेकांस पूरक उद्योग पक्षी पोलाद, रबर टायर वगैरे उभे राहिले, अशीच एक टायर कंपनी होती मिशलीन (michelin) त्यांना टायर्सचा खप वाढवायचा होता पण लोकांनी गाड्या फिरवल्याच नाहीत तर टायर्स झिजून जुनी होणार कशी?? अन नव्या टायर्सचा खप वाढणार कसा?? त्यातून मिशलीन पडली अस्सल फ्रेंच कंपनी, फ्रेंच लोक खवय्येगिरीत वंगबंधूंचे कार्बन कॉपी किंवा एकाला झाकावे दुसऱ्याला काढावे इतकेच दर्दी, कुठं सोव्हिग्नोन कॅबरीनेट रेड वाईन उत्तम मिळते, कुठले मिमोलेत चीज सर्वोत्तम, बॅगवेत ब्रेड ताजी कुठे मिळते वगैरे सतत हुडकणारे म्हणजे फ्रेंच. झालं, मिशलीन मधल्या एका हुशार पात्राने शक्कल लढवली आणि दरवर्षी ते लोक एक मिशलीन गाईड काढू लागले सुरुवातीला (१९००-१९२२) गाईडमध्ये फक्त गाडीचे तेलपाणी वंगण वगैरे माहिती असे १९२२ पासून मिशलीननं फ्रेंच लोकांचे खाद्यप्रेम ओळखून गाईडमध्ये उत्तमोत्तम जिन्नसा मिळणारी हॉटेल्स अंतर्भूत करायला सुरुवात केली अन गम्मत म्हणजे त्यानंतर लोक गाड्या जास्त फिरवू लागले, टायर्सचा खप वाढला!! त्यानंतर मिशलीननं गाईड जरी प्रकाशित केली न केली तरी कंपनी दरवर्षी जगातील सर्वोत्तम उपहारगृह/भोजनालयांचे रेटिंग नक्कीच करते, ही प्रोसेस भयानक खडतर असते अन नावाजलेला ब्रिटिश शेफ गॉर्डन रामसे चक्क एकदा मिशलीन परिमणांवर नापास सुद्धा झालाय, त्या कडक चाचणीतून पार होणाऱ्या हॉटेल्सला वर्षभरासाठी मिशलीनकडून १,२ किंवा ३ स्टार दिले जातात ही रेटिंग बदलत असतात, म्हणून कायम मिशलीन रेटिंग मध्ये राहणे म्हणजे अशक्यप्राय असते, जे हॉटेल सतत दोन वर्षे राहिले ते तर म्हणजे सर्वोत्तम हॉटेल गणले जाते. अशी ही कथा "मिशलीन स्टार्सची"

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 06/11/2019 - 20:45
@ जेम्स, बरोबर आहे तुमचे 'मिशलीन' स्टारच पाहिजे होते. आता संपादकांनी केली तरच दुरुस्ती होईल. मिशलीनच्या जन्मकथेबद्दल खूप आभार. आता हा 'ऑल हायप लिटिल सबस्टन्स' प्रकार झालाय असे वाटते. फार माहिती नाही. ह्या लेखमालेत तुमचे अभ्यासपूर्ण पण मिश्किल प्रतिसाद वेळोवेळी आले, त्यामुळे न कंटाळता पुढील भाग लिहीत राहिलो. असाच लोभ ठेवा _/\_ अनिंद्य

पलाश 06/11/2019 - 21:03
अप्रतिम लेखमालेचा सुरस शेवट फार आवडला. माशांना "जलपुष्प" म्हणतात हे वाचल्यावर ज्या कोणी हा शब्द पहिल्यांदा वापरला असेल त्याचं कौतुक वाटलं. छानच शब्द आहे. बंगाली मिठाईंची नावंसुद्धा खूप गोड आहेत. वाचायलाही आवडली. खायला त्या ठिकाणी जायलाच हवं. पुढील लेखनाची प्रतिक्षा आहे.

In reply to by पलाश

अनिंद्य 11/11/2019 - 12:20
@ पलाश "जलपुष्प" ..... मासे खात नसलो तरी मलाही शब्द मजेदार वाटतो :-) तुम्ही वेळोवेळी दिलेल्या प्रतिसादाबद्दल अनेक आभार.

बबन ताम्बे 06/11/2019 - 22:13
काही भागांवर मी प्रतिसाद लिहायचा कंटाळा केला,पण सर्व भाग आवर्जून वाचले. अप्रतिम लेखमाला. बंग (की वंग ?) संस्कृतीची विस्तृत ओळख झाली. पुढील लेखमालेस मनपूर्वक शुभेच्छा.

In reply to by बबन ताम्बे

अनिंद्य 07/11/2019 - 10:49
@ बबन ताम्बे, कंटाळा करू नका हो, बरे-वाईट जसे वाटले ते सांगत चला :-) इथे मिळणारे अभिप्राय / सूचना / सल्ले / प्रतिसाद यामुळे चुका समजतात, हुरूप येतो.

सुमो 07/11/2019 - 11:00
लेखमाला. आणि आणि त्यावर कळस म्हणजे हा समारोपाचा बंगभोज !!! मत्स्यमंजिरी काय, शहाळ्यातल्या मलईत शिजवलेले प्रॉन्स काय, माछेर झोल काय....!! छ्या.... जायला लागतंय कोलकात्याला.

श्वेता२४ 07/11/2019 - 11:04
मिपावरील माझ्या आवडीच्या लेखमालांपैकी ही एक लेखमाला.बंगालचा ऐतिहासिक,सामाजिक, सांस्कृतिक व चालिरीतींचा विस्तारपूर्वक सचित्र धांडोळा आपण सर्वांसाठी खुला केलात. त्याबद्दल अनेक आभार.

In reply to by श्वेता२४

अनिंद्य 11/11/2019 - 12:16
@ श्वेता२४ मालिकेवर पहिलावहिला प्रतिसाद तुमचाच होता. पूर्ण बंगाल नाही तरी कोलकाता शहराबद्दल विस्तृत सांगण्याचा प्रयत्न होता, तुम्हाला लिखाण आवडले याचा आनंद आहे. _/\_

प्रचेतस 07/11/2019 - 11:22
बंगाली शाकाहारी जेवण म्हणजे मोठे तुकडे असलेली वांग्याची आणि बटाट्याची भाजी आणि भात इतकीच धारणा होती (पुण्यातली काही बंगाली जेवण मिळणारी हाटेलं). तुमच्या लेखाद्वारे त्यातील वैविध्याचाही प्रत्यय आला. बाकी बंगाली मिठायांबाबत काही प्रश्नच नाही. आहाहाहा. ही लेखमाला खूपच छान झाली, ओघवते लेखन, विपुल माहितेने लेखात आलेली समृद्धता. तुमच्या पुढील अशाच एखाद्या रोचक माहितीच्या प्रतिक्षेत. -प्रचेतस

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 11/11/2019 - 12:11
बंगाली जेवणात शाकाहार थोडा डावा पडतो, खरे आहे. पण बंगाली मिठाया लाजवाब :-) अभिप्रायाबद्दल आभार !

नरेश माने 07/11/2019 - 11:29
सुंदर लेखमालेचा तेव्हढाच सुंदर समारोप. बाकी बंगाली खाद्यपदार्थांची नावे खुपच गमतीदार आहेत. कोलकाता शहराच्या जडणघडणीची एव्हढी सुंदर माहिती तुमच्या लेखमालेमुळेच मला मिळाली. त्याबद्दल तुमचे खुप आभार!

टर्मीनेटर 07/11/2019 - 12:20
मालिकेचा पहिला आणि हा शेवटचा भागच वाचला आहे. गलेमा आणि दिवाळी अंक वाचत असताना ह्या रसरशीत लेख मालिकेतले मधले भाग वाचायचे राहून गेले त्याची चुटपूट लागून राहिली आहे! ह्या भागातील 'जोलभरा संदेश' आणि 'रसगुल्ला' हे शब्द वाचून खूप साऱ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. वडील मध्य रेल्वेमध्ये अधिकारी होते, महिन्या दोन महिन्याआड त्यांची कामानिमित्त एकतरी कलकत्ता (तेव्हा ह्या शहराला कोलकाता म्हणत नव्हते. त्यामुळे कलकत्ताच 😀 ) वारी होत असे. ते कलकत्याला गेले कि मी आणि माझी मोठी बहिण खूप खूष व्हायचो, कारण ते येताना आम्हा दोघांच्या आवडीचे 'जोलभरा संदेश' आणि 'रसगुल्ला' व आणखीन काही दर्जेदार मिठाया तर आणायचेच, वर मला जास्ती आनंद व्हायचा तो प्रत्येक वेळी त्यांनी माझ्यासाठी आणलेल्या 'स्पोर्ट्स शूज' साठी! कलकत्तावासीयांच्या फुटबॉल प्रेमामुळे कि अन्य काही कारणाने ते माहित नाही, पण तेव्हा मुंबईतही उपलब्ध नसलेल्या इतक्या वेगवेगळ्या रंगाचे आणि डिझाईनचे स्पोर्ट्स शूज कलकत्याला मिळायचे. तेव्हा मला अक्कल आणि जतन करून ठेवण्या एवढी जागा असती तर त्या मिठायांचे खोके, पत्र्याचे डबे आणि माझ्या बालपणापासून ते त्यांच्या रीटायरमेंट पर्यंत सुरु राहिलेल्या ह्या परंपरेत त्यांनी आणलेल्या शूज चे एक मस्त म्युझियम बनवता आले असते 😀 असो, लेख खूप आवडला, आता मधले वाचायचे राहिलेले भाग सलग वाचून काढतो... धन्यवाद.

In reply to by टर्मीनेटर

अनिंद्य 07/11/2019 - 18:25
@ टर्मीनेटर, तुमच्या लहानपणीच्या / वडिलांच्या कलकत्ता भेटीच्या आठवणी बंगाली मिष्टीसारख्याच गोड आहेत :-) वस्तूंचे नसले तरी या आठवणींचे म्युझिअम तुमच्या मनात कायम राहीलच. कोलकात्यातून निघतांना विमानात बसण्यापूर्वी घरातील सर्वांच्या आवडीच्या मिठाया योग्य त्या प्रमाणात घेतल्याची खात्री करावी लागते मलाही. तो टोल दिल्याशिवाय दार उघडले जात नाही :-) मधले भागही अवश्य वाचा. प्रतिसादाची प्रतीक्षा आहे. अनिंद्य

आंबट गोड 07/11/2019 - 12:34
लेखमाला. थोडी त्रोटक वाटली...अजून खूप काही लिहीता आले असते. खरे म्हणजे हे फक्त कोलकत्याचं वर्णन होतं..पूर्ण बंगाल नव्हे. बंगाल मधे टागोर आणि शांतिनिकेतन, चैतन्य महाप्रभू, स्वामी विवेकानंद व प्रभु रामक्रिष्ण, शरद्चंद्र, सुभाषबाबू ......इ इ खूपच गोष्टी येतील........ आता पुढची लेखमाला कशावर? भूतान वर लिहा. :-)

In reply to by आंबट गोड

अनिंद्य 07/11/2019 - 14:40
@ आंबट गोड, ..... फक्त कोलकत्याचं वर्णन होतं..पूर्ण बंगाल नव्हे..... अगदी बरोबर. मालिकेचे शीर्षक आणि प्रस्तावना दोन्हीकडे स्वतःसाठी 'आमार कोलकाता' असे कुंपण घातले होते, नाहीतर विषयाचा आवाका फार मोठा होतो, त्यावर पुस्तकच लिहावे लागेल. कुणी सांगावे, लिहीनही. :-) ..... लेखमाला थोडी त्रोटक वाटली.... शहराची तोंडओळख होईल इतपत लिहायचे होते, तरीही नऊ भाग झाले. अभिप्रायाबद्दल आभारी आहे.

अनिंद्य 11/11/2019 - 12:03
@ कुमार१ @ यशोधरा @ तेजस आठवले @ वीणा३ @ जॉनविक्क @ सुमो @ नरेश माने @ संजय पाटिल @ नि३सोलपुरकर, उत्साह वाढवणाऱ्या प्रतिसादाबद्दल अनेक आभार _/\_

कोमल 12/11/2019 - 14:39
अप्रतिम भाग आणि मालिकाही. फार छान गोड शेवट केला आहे. सगळे प्रचि तोंपासु. फार खुणावत असलेले हे शहर, हा भाग वाचल्यानंतर हात पसरून आलिंगन द्यायलाच तयार आहे असे वाटले. पुलेशु

लागलीच. जलपुष्प शब्द आवडला. जालमुरी, फुचका, संदेश आणि मिश्टी वा! सांगता करायला स्वीट डिश हवीच. मजा आली. एका अपूर्व लेखमालेबद्दल अनेक, अनेक धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

अनिंद्य 18/11/2019 - 11:14
@ सुधीर कांदळकर, मालिकेच्या प्रत्येक भागावर विस्तृत आणि नेमके प्रतिसाद आहेत तुमचे, त्यामुळे पुढे लिहिण्याचा उत्साह कायम राहिला. अनेक आभार.

रातराणी 29/05/2020 - 12:20
भीषण सुंदर! काही भाग वाचून, सगळे भाग प्रकाशित झाल्यावर वाचायचे म्हणून अर्धवट सोडलेली ही मालिका पुन्हा पहिल्यापासून वाचली. तुमचा अभ्यास, त्याची मुद्देसूद मांडणी आणि सोबत सुरेख प्रकाशचित्रांची जोड ही त्रिवेणी सुरेख जमलीये. मनाने त्या त्या ठिकाणी जाऊन आले मी. _/\_

अनिंद्य 24/08/2020 - 19:52
याबद्दल थोडाफार वाद असला तरी विंग्रजी तारखेप्रमाणे आज २४ ऑगस्ट कोलकात्याचा बड्डे आहे. त्यानिमित्ताने रसगुल्ला खाऊन गोडतोंडी शुभेच्छा !

जेम्स वांड 06/11/2019 - 19:12
परत एकदा रसना खवळून उठली! खल्लास फोटो अन खाद्ययात्रा. एक हलकीफुलकी दुरुस्ती सुचवतो, गोड मानून घेणे इतकेच काय भारतातल्या मोजक्याच 'मिशिगन स्टार' दर्जा असलेल्या हा मिशिगन स्टार नसून मिशलीन स्टार होय असे वाटते, १९व्या शतकात स्वयंचलित चारचाकी गाड्या प्रसिद्धी पावल्या तसे त्यांना पूरक-एकमेकांस पूरक उद्योग पक्षी पोलाद, रबर टायर वगैरे उभे राहिले, अशीच एक टायर कंपनी होती मिशलीन (michelin) त्यांना टायर्सचा खप वाढवायचा होता पण लोकांनी गाड्या फिरवल्याच नाहीत तर टायर्स झिजून जुनी होणार कशी?? अन नव्या टायर्सचा खप वाढणार कसा?? त्यातून मिशलीन पडली अस्सल फ्रेंच कंपनी, फ्रेंच लोक खवय्येगिरीत वंगबंधूंचे कार्बन कॉपी किंवा एकाला झाकावे दुसऱ्याला काढावे इतकेच दर्दी, कुठं सोव्हिग्नोन कॅबरीनेट रेड वाईन उत्तम मिळते, कुठले मिमोलेत चीज सर्वोत्तम, बॅगवेत ब्रेड ताजी कुठे मिळते वगैरे सतत हुडकणारे म्हणजे फ्रेंच. झालं, मिशलीन मधल्या एका हुशार पात्राने शक्कल लढवली आणि दरवर्षी ते लोक एक मिशलीन गाईड काढू लागले सुरुवातीला (१९००-१९२२) गाईडमध्ये फक्त गाडीचे तेलपाणी वंगण वगैरे माहिती असे १९२२ पासून मिशलीननं फ्रेंच लोकांचे खाद्यप्रेम ओळखून गाईडमध्ये उत्तमोत्तम जिन्नसा मिळणारी हॉटेल्स अंतर्भूत करायला सुरुवात केली अन गम्मत म्हणजे त्यानंतर लोक गाड्या जास्त फिरवू लागले, टायर्सचा खप वाढला!! त्यानंतर मिशलीननं गाईड जरी प्रकाशित केली न केली तरी कंपनी दरवर्षी जगातील सर्वोत्तम उपहारगृह/भोजनालयांचे रेटिंग नक्कीच करते, ही प्रोसेस भयानक खडतर असते अन नावाजलेला ब्रिटिश शेफ गॉर्डन रामसे चक्क एकदा मिशलीन परिमणांवर नापास सुद्धा झालाय, त्या कडक चाचणीतून पार होणाऱ्या हॉटेल्सला वर्षभरासाठी मिशलीनकडून १,२ किंवा ३ स्टार दिले जातात ही रेटिंग बदलत असतात, म्हणून कायम मिशलीन रेटिंग मध्ये राहणे म्हणजे अशक्यप्राय असते, जे हॉटेल सतत दोन वर्षे राहिले ते तर म्हणजे सर्वोत्तम हॉटेल गणले जाते. अशी ही कथा "मिशलीन स्टार्सची"

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 06/11/2019 - 20:45
@ जेम्स, बरोबर आहे तुमचे 'मिशलीन' स्टारच पाहिजे होते. आता संपादकांनी केली तरच दुरुस्ती होईल. मिशलीनच्या जन्मकथेबद्दल खूप आभार. आता हा 'ऑल हायप लिटिल सबस्टन्स' प्रकार झालाय असे वाटते. फार माहिती नाही. ह्या लेखमालेत तुमचे अभ्यासपूर्ण पण मिश्किल प्रतिसाद वेळोवेळी आले, त्यामुळे न कंटाळता पुढील भाग लिहीत राहिलो. असाच लोभ ठेवा _/\_ अनिंद्य

पलाश 06/11/2019 - 21:03
अप्रतिम लेखमालेचा सुरस शेवट फार आवडला. माशांना "जलपुष्प" म्हणतात हे वाचल्यावर ज्या कोणी हा शब्द पहिल्यांदा वापरला असेल त्याचं कौतुक वाटलं. छानच शब्द आहे. बंगाली मिठाईंची नावंसुद्धा खूप गोड आहेत. वाचायलाही आवडली. खायला त्या ठिकाणी जायलाच हवं. पुढील लेखनाची प्रतिक्षा आहे.

In reply to by पलाश

अनिंद्य 11/11/2019 - 12:20
@ पलाश "जलपुष्प" ..... मासे खात नसलो तरी मलाही शब्द मजेदार वाटतो :-) तुम्ही वेळोवेळी दिलेल्या प्रतिसादाबद्दल अनेक आभार.

बबन ताम्बे 06/11/2019 - 22:13
काही भागांवर मी प्रतिसाद लिहायचा कंटाळा केला,पण सर्व भाग आवर्जून वाचले. अप्रतिम लेखमाला. बंग (की वंग ?) संस्कृतीची विस्तृत ओळख झाली. पुढील लेखमालेस मनपूर्वक शुभेच्छा.

In reply to by बबन ताम्बे

अनिंद्य 07/11/2019 - 10:49
@ बबन ताम्बे, कंटाळा करू नका हो, बरे-वाईट जसे वाटले ते सांगत चला :-) इथे मिळणारे अभिप्राय / सूचना / सल्ले / प्रतिसाद यामुळे चुका समजतात, हुरूप येतो.

सुमो 07/11/2019 - 11:00
लेखमाला. आणि आणि त्यावर कळस म्हणजे हा समारोपाचा बंगभोज !!! मत्स्यमंजिरी काय, शहाळ्यातल्या मलईत शिजवलेले प्रॉन्स काय, माछेर झोल काय....!! छ्या.... जायला लागतंय कोलकात्याला.

श्वेता२४ 07/11/2019 - 11:04
मिपावरील माझ्या आवडीच्या लेखमालांपैकी ही एक लेखमाला.बंगालचा ऐतिहासिक,सामाजिक, सांस्कृतिक व चालिरीतींचा विस्तारपूर्वक सचित्र धांडोळा आपण सर्वांसाठी खुला केलात. त्याबद्दल अनेक आभार.

In reply to by श्वेता२४

अनिंद्य 11/11/2019 - 12:16
@ श्वेता२४ मालिकेवर पहिलावहिला प्रतिसाद तुमचाच होता. पूर्ण बंगाल नाही तरी कोलकाता शहराबद्दल विस्तृत सांगण्याचा प्रयत्न होता, तुम्हाला लिखाण आवडले याचा आनंद आहे. _/\_

प्रचेतस 07/11/2019 - 11:22
बंगाली शाकाहारी जेवण म्हणजे मोठे तुकडे असलेली वांग्याची आणि बटाट्याची भाजी आणि भात इतकीच धारणा होती (पुण्यातली काही बंगाली जेवण मिळणारी हाटेलं). तुमच्या लेखाद्वारे त्यातील वैविध्याचाही प्रत्यय आला. बाकी बंगाली मिठायांबाबत काही प्रश्नच नाही. आहाहाहा. ही लेखमाला खूपच छान झाली, ओघवते लेखन, विपुल माहितेने लेखात आलेली समृद्धता. तुमच्या पुढील अशाच एखाद्या रोचक माहितीच्या प्रतिक्षेत. -प्रचेतस

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 11/11/2019 - 12:11
बंगाली जेवणात शाकाहार थोडा डावा पडतो, खरे आहे. पण बंगाली मिठाया लाजवाब :-) अभिप्रायाबद्दल आभार !

नरेश माने 07/11/2019 - 11:29
सुंदर लेखमालेचा तेव्हढाच सुंदर समारोप. बाकी बंगाली खाद्यपदार्थांची नावे खुपच गमतीदार आहेत. कोलकाता शहराच्या जडणघडणीची एव्हढी सुंदर माहिती तुमच्या लेखमालेमुळेच मला मिळाली. त्याबद्दल तुमचे खुप आभार!

टर्मीनेटर 07/11/2019 - 12:20
मालिकेचा पहिला आणि हा शेवटचा भागच वाचला आहे. गलेमा आणि दिवाळी अंक वाचत असताना ह्या रसरशीत लेख मालिकेतले मधले भाग वाचायचे राहून गेले त्याची चुटपूट लागून राहिली आहे! ह्या भागातील 'जोलभरा संदेश' आणि 'रसगुल्ला' हे शब्द वाचून खूप साऱ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. वडील मध्य रेल्वेमध्ये अधिकारी होते, महिन्या दोन महिन्याआड त्यांची कामानिमित्त एकतरी कलकत्ता (तेव्हा ह्या शहराला कोलकाता म्हणत नव्हते. त्यामुळे कलकत्ताच 😀 ) वारी होत असे. ते कलकत्याला गेले कि मी आणि माझी मोठी बहिण खूप खूष व्हायचो, कारण ते येताना आम्हा दोघांच्या आवडीचे 'जोलभरा संदेश' आणि 'रसगुल्ला' व आणखीन काही दर्जेदार मिठाया तर आणायचेच, वर मला जास्ती आनंद व्हायचा तो प्रत्येक वेळी त्यांनी माझ्यासाठी आणलेल्या 'स्पोर्ट्स शूज' साठी! कलकत्तावासीयांच्या फुटबॉल प्रेमामुळे कि अन्य काही कारणाने ते माहित नाही, पण तेव्हा मुंबईतही उपलब्ध नसलेल्या इतक्या वेगवेगळ्या रंगाचे आणि डिझाईनचे स्पोर्ट्स शूज कलकत्याला मिळायचे. तेव्हा मला अक्कल आणि जतन करून ठेवण्या एवढी जागा असती तर त्या मिठायांचे खोके, पत्र्याचे डबे आणि माझ्या बालपणापासून ते त्यांच्या रीटायरमेंट पर्यंत सुरु राहिलेल्या ह्या परंपरेत त्यांनी आणलेल्या शूज चे एक मस्त म्युझियम बनवता आले असते 😀 असो, लेख खूप आवडला, आता मधले वाचायचे राहिलेले भाग सलग वाचून काढतो... धन्यवाद.

In reply to by टर्मीनेटर

अनिंद्य 07/11/2019 - 18:25
@ टर्मीनेटर, तुमच्या लहानपणीच्या / वडिलांच्या कलकत्ता भेटीच्या आठवणी बंगाली मिष्टीसारख्याच गोड आहेत :-) वस्तूंचे नसले तरी या आठवणींचे म्युझिअम तुमच्या मनात कायम राहीलच. कोलकात्यातून निघतांना विमानात बसण्यापूर्वी घरातील सर्वांच्या आवडीच्या मिठाया योग्य त्या प्रमाणात घेतल्याची खात्री करावी लागते मलाही. तो टोल दिल्याशिवाय दार उघडले जात नाही :-) मधले भागही अवश्य वाचा. प्रतिसादाची प्रतीक्षा आहे. अनिंद्य

आंबट गोड 07/11/2019 - 12:34
लेखमाला. थोडी त्रोटक वाटली...अजून खूप काही लिहीता आले असते. खरे म्हणजे हे फक्त कोलकत्याचं वर्णन होतं..पूर्ण बंगाल नव्हे. बंगाल मधे टागोर आणि शांतिनिकेतन, चैतन्य महाप्रभू, स्वामी विवेकानंद व प्रभु रामक्रिष्ण, शरद्चंद्र, सुभाषबाबू ......इ इ खूपच गोष्टी येतील........ आता पुढची लेखमाला कशावर? भूतान वर लिहा. :-)

In reply to by आंबट गोड

अनिंद्य 07/11/2019 - 14:40
@ आंबट गोड, ..... फक्त कोलकत्याचं वर्णन होतं..पूर्ण बंगाल नव्हे..... अगदी बरोबर. मालिकेचे शीर्षक आणि प्रस्तावना दोन्हीकडे स्वतःसाठी 'आमार कोलकाता' असे कुंपण घातले होते, नाहीतर विषयाचा आवाका फार मोठा होतो, त्यावर पुस्तकच लिहावे लागेल. कुणी सांगावे, लिहीनही. :-) ..... लेखमाला थोडी त्रोटक वाटली.... शहराची तोंडओळख होईल इतपत लिहायचे होते, तरीही नऊ भाग झाले. अभिप्रायाबद्दल आभारी आहे.

अनिंद्य 11/11/2019 - 12:03
@ कुमार१ @ यशोधरा @ तेजस आठवले @ वीणा३ @ जॉनविक्क @ सुमो @ नरेश माने @ संजय पाटिल @ नि३सोलपुरकर, उत्साह वाढवणाऱ्या प्रतिसादाबद्दल अनेक आभार _/\_

कोमल 12/11/2019 - 14:39
अप्रतिम भाग आणि मालिकाही. फार छान गोड शेवट केला आहे. सगळे प्रचि तोंपासु. फार खुणावत असलेले हे शहर, हा भाग वाचल्यानंतर हात पसरून आलिंगन द्यायलाच तयार आहे असे वाटले. पुलेशु

लागलीच. जलपुष्प शब्द आवडला. जालमुरी, फुचका, संदेश आणि मिश्टी वा! सांगता करायला स्वीट डिश हवीच. मजा आली. एका अपूर्व लेखमालेबद्दल अनेक, अनेक धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

अनिंद्य 18/11/2019 - 11:14
@ सुधीर कांदळकर, मालिकेच्या प्रत्येक भागावर विस्तृत आणि नेमके प्रतिसाद आहेत तुमचे, त्यामुळे पुढे लिहिण्याचा उत्साह कायम राहिला. अनेक आभार.

रातराणी 29/05/2020 - 12:20
भीषण सुंदर! काही भाग वाचून, सगळे भाग प्रकाशित झाल्यावर वाचायचे म्हणून अर्धवट सोडलेली ही मालिका पुन्हा पहिल्यापासून वाचली. तुमचा अभ्यास, त्याची मुद्देसूद मांडणी आणि सोबत सुरेख प्रकाशचित्रांची जोड ही त्रिवेणी सुरेख जमलीये. मनाने त्या त्या ठिकाणी जाऊन आले मी. _/\_

अनिंद्य 24/08/2020 - 19:52
याबद्दल थोडाफार वाद असला तरी विंग्रजी तारखेप्रमाणे आज २४ ऑगस्ट कोलकात्याचा बड्डे आहे. त्यानिमित्ताने रसगुल्ला खाऊन गोडतोंडी शुभेच्छा !
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील : भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433 भाग ४ - https://misalpav.com/node/45481 भाग ५ - http://www.misalpav.com/node/45533 भाग ६ - http://www.misalpav.com/node/45569 भाग ७ - https://misalpav.com/node/45585 आमार कोलकाता - भाग ९ (अंतिम) - बंगभोज मनुष्यजीवनात खाण्यापिण्याचा संबंध फक्त पोट भरण्यापुरताच नाही.

आमार कोलकाता – भाग ८ - भाषिक व धार्मिक वैविध्यांचे शहर

अनिंद्य ·

अनिंद्य 01/11/2019 - 13:37
@ संपादक / साहित्य संपादक मंडळी, अनुक्रमणिका करून मालिकेचे सर्व भाग एकत्र ओवण्यासाठी विनंती.

अनिंद्य 06/11/2019 - 16:01
@ कंजूस, @ जॉनविक्क, @ कुमार१, आपणा तिघांचे आभार. कोलकात्याच्या खाद्यसंस्कृतीबद्दलचा मालिकेचा अंतिम भाग इथे आहे :- https://misalpav.com/node/45677

प्रचेतस 06/11/2019 - 20:16
कोलकत्याच्या ह्या पैलूबद्दल कधीच वाचले नव्हते. त्यातही आर्मेनियन, ज्यू आणि पर्शियन लोकांच्या योगदानाबद्दल शून्य माहिती होती. धन्यवाद ह्या भागाबद्दल.

दिवाळीआधीपासून जालसेवा फारच रुसली आहे. कशीबशी लंगडत खुरडत चालली आहे. कधी आल्याची नोंद करण्यापूर्वीच सारे ठप्प होते तर बहुतेक वेळा गमन करण्याआधीच जासेवा गुप्त होते. आठदहा दिवस तर गमनच करता आले नव्हते. असो. आर्मेनिअनांबद्दल प्रथमच माहिती मिळाली.
त्यांच्या संपत्तीबद्दल ईर्षेचा सुप्त भाव शहरवासियांमध्ये दिसून येतो.
सुरेख संयत शब्दांकन. सिनेगॉग सुंदर. मी फक्त एकच कोचीनचे सिनेगॉग पाहिले होते. वाजिद अलीबद्दल पण छान माहिती.
मुघल शैलीतल्या या मशिदीचे वेगळेपण म्हणजे पाठीला जोडलेल्या सयामी जुळ्यांसारखी रचना.
मस्त निरीक्षण आणि भाष्य. मुख्य म्हणजे एवढे तपशील देऊनही कुठेही जंत्रीसारखे कंटाळवाणे होत नाही. वेग, रंजकता आणि उत्कठा ८व्या भागातही कायम आहे. हॅट्स ऑफ. धन्यवाद.

अनिंद्य 13/11/2019 - 11:01
@ सुधीर कांदळकर, ...... एवढे तपशील देऊनही कुठेही जंत्रीसारखे कंटाळवाणे होत नाही...... Hope so :-) हा भाग मला थोडा 'ठिगळं जोडल्यासारखा' वाटला होता पण शहारातील अ-बंगाली समुदायांबद्दल थोडे लिहिणे गरजेचे वाटले. विस्तृत प्रतिसादाबद्दल आभारी आहे. _/\_

अनिंद्य 01/11/2019 - 13:37
@ संपादक / साहित्य संपादक मंडळी, अनुक्रमणिका करून मालिकेचे सर्व भाग एकत्र ओवण्यासाठी विनंती.

अनिंद्य 06/11/2019 - 16:01
@ कंजूस, @ जॉनविक्क, @ कुमार१, आपणा तिघांचे आभार. कोलकात्याच्या खाद्यसंस्कृतीबद्दलचा मालिकेचा अंतिम भाग इथे आहे :- https://misalpav.com/node/45677

प्रचेतस 06/11/2019 - 20:16
कोलकत्याच्या ह्या पैलूबद्दल कधीच वाचले नव्हते. त्यातही आर्मेनियन, ज्यू आणि पर्शियन लोकांच्या योगदानाबद्दल शून्य माहिती होती. धन्यवाद ह्या भागाबद्दल.

दिवाळीआधीपासून जालसेवा फारच रुसली आहे. कशीबशी लंगडत खुरडत चालली आहे. कधी आल्याची नोंद करण्यापूर्वीच सारे ठप्प होते तर बहुतेक वेळा गमन करण्याआधीच जासेवा गुप्त होते. आठदहा दिवस तर गमनच करता आले नव्हते. असो. आर्मेनिअनांबद्दल प्रथमच माहिती मिळाली.
त्यांच्या संपत्तीबद्दल ईर्षेचा सुप्त भाव शहरवासियांमध्ये दिसून येतो.
सुरेख संयत शब्दांकन. सिनेगॉग सुंदर. मी फक्त एकच कोचीनचे सिनेगॉग पाहिले होते. वाजिद अलीबद्दल पण छान माहिती.
मुघल शैलीतल्या या मशिदीचे वेगळेपण म्हणजे पाठीला जोडलेल्या सयामी जुळ्यांसारखी रचना.
मस्त निरीक्षण आणि भाष्य. मुख्य म्हणजे एवढे तपशील देऊनही कुठेही जंत्रीसारखे कंटाळवाणे होत नाही. वेग, रंजकता आणि उत्कठा ८व्या भागातही कायम आहे. हॅट्स ऑफ. धन्यवाद.

अनिंद्य 13/11/2019 - 11:01
@ सुधीर कांदळकर, ...... एवढे तपशील देऊनही कुठेही जंत्रीसारखे कंटाळवाणे होत नाही...... Hope so :-) हा भाग मला थोडा 'ठिगळं जोडल्यासारखा' वाटला होता पण शहारातील अ-बंगाली समुदायांबद्दल थोडे लिहिणे गरजेचे वाटले. विस्तृत प्रतिसादाबद्दल आभारी आहे. _/\_
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील : भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433 भाग ४ - https://misalpav.com/node/45481 भाग ५ - http://www.misalpav.com/node/45533 भाग ६ - http://www.misalpav.com/node/45569 भाग ७ - https://misalpav.com/node/45585 आमार कोलकाता – भाग ८ - भाषिक व धार्मिक वैविध्यांचे शहर भारतातील सर्वाधिक गर्दीच्या शहरांमध्ये कोलकात्याच्या

आमार कोलकाता – भाग ७ - मेरा नाम चिन-चिन-चू

अनिंद्य ·

हेमंतकुमार 22/10/2019 - 13:28
* समाज-संस्कृती आणि भाषा एकमेकांना जगवतात >>> + १११ लेखमाला संपली की तुमच्याबरोबर कोलकाता कट्टा करावासा वाटतोय ☺️

जेम्स वांड 22/10/2019 - 14:25
वाटच पाहत होतो! कोलकात्याच्या अतूट भाग असणाऱ्या चायना टाऊन्स बद्दल! खल्लास लिहिलेत. तुमचे कोलकात्यावर विलक्षण प्रेम दिसते अनिंद्य! बाकी कोलकाता चायना टाऊनचा उल्लेख करताना तिथल्या पाकसंस्कृतीचा पासींग रेफरन्स थोडा खटकला, सद्यांत हवा होता म्हणजे बघा जगाला इंडो चायनीजची देणगी देणाऱ्या चायना टाऊनमध्ये नेल्सन वांग हे बल्लवरत्न निपजले होते खिशात सत्तावीस रुपये घेऊन मुंबईला आलेल्या ह्या माणसाने चिकन मंचुरीयन ही डिश तर शोधून काढलीच पण इंडो चायनीज जेवणाचा प्रसारही भरपूर केला. चायना गार्डन नावाचं त्याचं इंडोचायनीज रेस्टॉरंट तुफान प्रसिद्ध होतं म्हणतात मुंबईत. इंडो चायनीज हे फक्त चिनी आणि भारतीय फ्युजन जेवण नाही तर ते एक अलटरनेटिव्ह फूड कल्चर आहे, हॉटेल मध्ये न खाऊ शकणारे मजूर ते कमी पैशात पोटभरीचा पर्याय शोधणारे विद्यार्थी सगळ्यांना ह्या कुझीननं जगवलं आहे, इंजिनियरिंग कॉलेज हॉस्टेल किंवा कॅम्पस पासून "चिकन/व्हेज ट्रिपल शेजवान राईस" वेगळा काढता यायचा नाही! अन ह्या अद्वैताचा निर्माता नेल्सन वांग! मालक

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 23/10/2019 - 11:33
@ जेम्स, अधिकच्या माहितीबद्दल आभारी आहे. पण नेल्सन वांगचे कर्मक्षेत्र मुंबई आहे, कोलकाता नाही. .... इंडो चायनीज एक अलटरनेटिव्ह फूड कल्चर आहे... याबद्दल पूर्ण सहमत. खाण्यापिण्यावर तर लिहावे तितके थोडे :-) कोलकात्याच्या खाद्यसंस्कृतीवर एक मोठा भाग लिहिणार आहेच. (भाग ९) तोवर हे खास तुमच्यासाठी :-

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 23/10/2019 - 11:33
@ जेम्स, अधिकच्या माहितीबद्दल आभारी आहे. पण नेल्सन वांगचे कर्मक्षेत्र मुंबई आहे, कोलकाता नाही. .... इंडो चायनीज एक अलटरनेटिव्ह फूड कल्चर आहे... याबद्दल पूर्ण सहमत. खाण्यापिण्यावर तर लिहावे तितके थोडे :-) कोलकात्याच्या खाद्यसंस्कृतीवर एक मोठा भाग लिहिणार आहेच. (भाग ९) तोवर हे खास तुमच्यासाठी :-

In reply to by सुमो

अनिंद्य 23/10/2019 - 11:19
@ सुमो, हो, कायतरी चुकले. योग्य लिंकबद्दल आभारी आहे. आता संपादक मंडळी लेखात लिंक दुरुस्त करतील तर होईल.

कुठेतरी वाचले होते की चायना टाऊनमधले चिनी सतत काम करतात. भारतात मिळणारे सर्वोत्कृष्ट बनावटीचे बूट तिथेच मिळतात आणि तेही योग्य किंमतीत. आता कातडे कमावण्याच्या आणि शिलाईच्या आधुनिक यंत्रांमुळे कदाचित फरक पडला असेल. पखालीबद्दल वाचून मुंबईतली एक जुनी आठवण जागी झाली. मुंबईत एके ठिकाणी बालपणी ट्राममधून फिरतांना मला आठदहा फूट लांब, तीनचार फूट रुंद आणि दोन अडीच फूट खोल अशी लोखंडी भांडी पदपथाच्या कडेला रस्त्याला लागून ठेवलेली आढळली. ती कसली याचे उत्तर तीर्थरूप देऊ शकले नव्हते. पण एका वृद्धाने सांगितले की पूर्वी घोड्यांच्या ट्राम्स होत्या. त्या लोखंडी भांड्यांत घोड्यांसाठी पाणी ठेवलेले असे. कलकत्त्याची प्रचि पाहिली की मन नकळत मंबईशी तुलना करतेच. तशाच ब्रिटीश वास्तू. पण मुंबईत न आढळणारी गोष्ट प्रचिंमध्ये दिसते ती म्हणजे लाल रंगाचा वापर. जमले तर ट्रामचे चित्र वा व्हीडीओ पुढील लेखांकात टाका. धन्यवाद. पुभाप्र.

In reply to by सुधीर कांदळकर

अनिंद्य 23/10/2019 - 16:46
सुधीर जी, तुमचे अभिप्राय प्रत्येक भागात काहीतरी नवीन मुद्दा लक्षात आणून देतात, उदा. इमारतींचा लाल रंग ! खूप आभार. चिनी आणि त्यांचे परंपरागत उद्योग दोन्ही आता हद्दपारच आहेत म्हणा ना. ट्रामचे फोटो ? हा घ्या एक जुना - कोलकात्यातील घोड्यांच्या ट्रामचा. आमच्या पिढीला नाही बघायला मिळाली ही ट्राम.

प्रचेतस 23/10/2019 - 08:40
जबरदस्त. चायना टाऊनबद्द्ल तुम्ही लिहाल असं वाटलंच होतं. कोलकत्याची विभिन्न अंगांनी उत्त्म माहिती मिळत आहे.

यशोधरा 23/10/2019 - 09:40
मध्यंतरी एक कार्यक्रम पाहिला होता एका चॅनेलवर, त्यात दाखवले होते की कलकत्त्याची चिनी वंशाची तरुणाई आता इतर देशांत स्थायिक होत असल्याने - कॅनडा, ऑस्ट्रेलिया वगैरे - कलकत्त्यात आता चायना टाऊनमध्येही चिनी मंडळी खूप कमी दिसतात. पूर्वी चायना टाऊन मध्ये जी चिनी मंडळी रस्त्यावर मोमो, सूप इत्यादी विकायला घेऊन बसत असत, तो बाजारही आता बऱ्यापैकी स्थानिकांच्या हातात गेला आहे म्हणे. कार्यक्रमात रेड चर्चचा सुद्धा उल्लेख होता. चायना टाऊनवर अजून लिहिलेलेही चालले असते.

In reply to by यशोधरा

अनिंद्य 23/10/2019 - 11:38
बरोबर. आता फार कमी राहिलेत चिनी कोलकात्यात, २००० च्या आतबाहेर असतील. इंग्रजी आणि बंगाली बोलतात, स्वतःची भाषा येत नाही. म्हणूनच त्यांच्याबद्दल थोडक्यात लिहावेसे वाटले.

सरनौबत 23/10/2019 - 11:50
अप्रतिम लेख! पूर्वीचे भाग वाचायचं राहून गेलं, आता ह्या निमित्ताने नक्की वाचेन. कोलकत्याच्या अस्वच्छतेला वैतागून शिंपी आणि चांभार मुंबईत स्थायिक झाले असण्याची शक्यता आहे. ज्यांनी पुलंच्या अपूर्वाई मध्ये त्यांचे बूट आणि कोट बनवला ;-)

In reply to by सरनौबत

अनिंद्य 23/10/2019 - 13:17
थँक्यू. कानपुर आणि कोलकाता - गंगाकाठची ही दोन शहरं घाऊक चर्मोद्योगासाठी प्रसिद्ध आहेत. दोन्हीकडे स्वच्छतेचा आनंदच आहे. पूर्वीचे भागही अवश्य वाचा, , मत कळवत रहा.

अनिंद्य 24/10/2019 - 10:56
@ जॉनविक्क, @ जालिम लोशन, @ प्रचेतस, @ कंजूस, @ यशोधरा, आपण वेळोवेळी देत असलेल्या प्रोत्साहनपर अभिप्रायाबद्दल आभारी आहे. पुढील भाग आता दिवाळी अंकाचे 'रसग्रहण' झाल्यानंतर ! सर्वांना दीपावलीच्या खूप-खूप शुभेच्छा.

हेमंतकुमार 22/10/2019 - 13:28
* समाज-संस्कृती आणि भाषा एकमेकांना जगवतात >>> + १११ लेखमाला संपली की तुमच्याबरोबर कोलकाता कट्टा करावासा वाटतोय ☺️

जेम्स वांड 22/10/2019 - 14:25
वाटच पाहत होतो! कोलकात्याच्या अतूट भाग असणाऱ्या चायना टाऊन्स बद्दल! खल्लास लिहिलेत. तुमचे कोलकात्यावर विलक्षण प्रेम दिसते अनिंद्य! बाकी कोलकाता चायना टाऊनचा उल्लेख करताना तिथल्या पाकसंस्कृतीचा पासींग रेफरन्स थोडा खटकला, सद्यांत हवा होता म्हणजे बघा जगाला इंडो चायनीजची देणगी देणाऱ्या चायना टाऊनमध्ये नेल्सन वांग हे बल्लवरत्न निपजले होते खिशात सत्तावीस रुपये घेऊन मुंबईला आलेल्या ह्या माणसाने चिकन मंचुरीयन ही डिश तर शोधून काढलीच पण इंडो चायनीज जेवणाचा प्रसारही भरपूर केला. चायना गार्डन नावाचं त्याचं इंडोचायनीज रेस्टॉरंट तुफान प्रसिद्ध होतं म्हणतात मुंबईत. इंडो चायनीज हे फक्त चिनी आणि भारतीय फ्युजन जेवण नाही तर ते एक अलटरनेटिव्ह फूड कल्चर आहे, हॉटेल मध्ये न खाऊ शकणारे मजूर ते कमी पैशात पोटभरीचा पर्याय शोधणारे विद्यार्थी सगळ्यांना ह्या कुझीननं जगवलं आहे, इंजिनियरिंग कॉलेज हॉस्टेल किंवा कॅम्पस पासून "चिकन/व्हेज ट्रिपल शेजवान राईस" वेगळा काढता यायचा नाही! अन ह्या अद्वैताचा निर्माता नेल्सन वांग! मालक

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 23/10/2019 - 11:33
@ जेम्स, अधिकच्या माहितीबद्दल आभारी आहे. पण नेल्सन वांगचे कर्मक्षेत्र मुंबई आहे, कोलकाता नाही. .... इंडो चायनीज एक अलटरनेटिव्ह फूड कल्चर आहे... याबद्दल पूर्ण सहमत. खाण्यापिण्यावर तर लिहावे तितके थोडे :-) कोलकात्याच्या खाद्यसंस्कृतीवर एक मोठा भाग लिहिणार आहेच. (भाग ९) तोवर हे खास तुमच्यासाठी :-

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 23/10/2019 - 11:33
@ जेम्स, अधिकच्या माहितीबद्दल आभारी आहे. पण नेल्सन वांगचे कर्मक्षेत्र मुंबई आहे, कोलकाता नाही. .... इंडो चायनीज एक अलटरनेटिव्ह फूड कल्चर आहे... याबद्दल पूर्ण सहमत. खाण्यापिण्यावर तर लिहावे तितके थोडे :-) कोलकात्याच्या खाद्यसंस्कृतीवर एक मोठा भाग लिहिणार आहेच. (भाग ९) तोवर हे खास तुमच्यासाठी :-

In reply to by सुमो

अनिंद्य 23/10/2019 - 11:19
@ सुमो, हो, कायतरी चुकले. योग्य लिंकबद्दल आभारी आहे. आता संपादक मंडळी लेखात लिंक दुरुस्त करतील तर होईल.

कुठेतरी वाचले होते की चायना टाऊनमधले चिनी सतत काम करतात. भारतात मिळणारे सर्वोत्कृष्ट बनावटीचे बूट तिथेच मिळतात आणि तेही योग्य किंमतीत. आता कातडे कमावण्याच्या आणि शिलाईच्या आधुनिक यंत्रांमुळे कदाचित फरक पडला असेल. पखालीबद्दल वाचून मुंबईतली एक जुनी आठवण जागी झाली. मुंबईत एके ठिकाणी बालपणी ट्राममधून फिरतांना मला आठदहा फूट लांब, तीनचार फूट रुंद आणि दोन अडीच फूट खोल अशी लोखंडी भांडी पदपथाच्या कडेला रस्त्याला लागून ठेवलेली आढळली. ती कसली याचे उत्तर तीर्थरूप देऊ शकले नव्हते. पण एका वृद्धाने सांगितले की पूर्वी घोड्यांच्या ट्राम्स होत्या. त्या लोखंडी भांड्यांत घोड्यांसाठी पाणी ठेवलेले असे. कलकत्त्याची प्रचि पाहिली की मन नकळत मंबईशी तुलना करतेच. तशाच ब्रिटीश वास्तू. पण मुंबईत न आढळणारी गोष्ट प्रचिंमध्ये दिसते ती म्हणजे लाल रंगाचा वापर. जमले तर ट्रामचे चित्र वा व्हीडीओ पुढील लेखांकात टाका. धन्यवाद. पुभाप्र.

In reply to by सुधीर कांदळकर

अनिंद्य 23/10/2019 - 16:46
सुधीर जी, तुमचे अभिप्राय प्रत्येक भागात काहीतरी नवीन मुद्दा लक्षात आणून देतात, उदा. इमारतींचा लाल रंग ! खूप आभार. चिनी आणि त्यांचे परंपरागत उद्योग दोन्ही आता हद्दपारच आहेत म्हणा ना. ट्रामचे फोटो ? हा घ्या एक जुना - कोलकात्यातील घोड्यांच्या ट्रामचा. आमच्या पिढीला नाही बघायला मिळाली ही ट्राम.

प्रचेतस 23/10/2019 - 08:40
जबरदस्त. चायना टाऊनबद्द्ल तुम्ही लिहाल असं वाटलंच होतं. कोलकत्याची विभिन्न अंगांनी उत्त्म माहिती मिळत आहे.

यशोधरा 23/10/2019 - 09:40
मध्यंतरी एक कार्यक्रम पाहिला होता एका चॅनेलवर, त्यात दाखवले होते की कलकत्त्याची चिनी वंशाची तरुणाई आता इतर देशांत स्थायिक होत असल्याने - कॅनडा, ऑस्ट्रेलिया वगैरे - कलकत्त्यात आता चायना टाऊनमध्येही चिनी मंडळी खूप कमी दिसतात. पूर्वी चायना टाऊन मध्ये जी चिनी मंडळी रस्त्यावर मोमो, सूप इत्यादी विकायला घेऊन बसत असत, तो बाजारही आता बऱ्यापैकी स्थानिकांच्या हातात गेला आहे म्हणे. कार्यक्रमात रेड चर्चचा सुद्धा उल्लेख होता. चायना टाऊनवर अजून लिहिलेलेही चालले असते.

In reply to by यशोधरा

अनिंद्य 23/10/2019 - 11:38
बरोबर. आता फार कमी राहिलेत चिनी कोलकात्यात, २००० च्या आतबाहेर असतील. इंग्रजी आणि बंगाली बोलतात, स्वतःची भाषा येत नाही. म्हणूनच त्यांच्याबद्दल थोडक्यात लिहावेसे वाटले.

सरनौबत 23/10/2019 - 11:50
अप्रतिम लेख! पूर्वीचे भाग वाचायचं राहून गेलं, आता ह्या निमित्ताने नक्की वाचेन. कोलकत्याच्या अस्वच्छतेला वैतागून शिंपी आणि चांभार मुंबईत स्थायिक झाले असण्याची शक्यता आहे. ज्यांनी पुलंच्या अपूर्वाई मध्ये त्यांचे बूट आणि कोट बनवला ;-)

In reply to by सरनौबत

अनिंद्य 23/10/2019 - 13:17
थँक्यू. कानपुर आणि कोलकाता - गंगाकाठची ही दोन शहरं घाऊक चर्मोद्योगासाठी प्रसिद्ध आहेत. दोन्हीकडे स्वच्छतेचा आनंदच आहे. पूर्वीचे भागही अवश्य वाचा, , मत कळवत रहा.

अनिंद्य 24/10/2019 - 10:56
@ जॉनविक्क, @ जालिम लोशन, @ प्रचेतस, @ कंजूस, @ यशोधरा, आपण वेळोवेळी देत असलेल्या प्रोत्साहनपर अभिप्रायाबद्दल आभारी आहे. पुढील भाग आता दिवाळी अंकाचे 'रसग्रहण' झाल्यानंतर ! सर्वांना दीपावलीच्या खूप-खूप शुभेच्छा.
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील : भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433 भाग ४ - https://misalpav.com/node/45481 भाग ५ - http://www.misalpav.com/node/45533 भाग ६ - http://www.misalpav.com/node/45569 आमार कोलकाता – भाग ७ - मेरा नाम चिन-चिन-चू  भारत आणि चीन प्रचंड लोकसंख्या असलेले सख्खे शेजार

आमार कोलकाता – भाग ६ – बंगाली कलासंस्कृतीचा अध्वर्यु

अनिंद्य ·

नूतन 18/10/2019 - 13:21
लेख आवडला. रविन्द्र संगीतातील माझी आवडती दोन गाणी, भालोबाशी भालोबाशी....गायिका इन्द्राणी सेन ह्रिदोय आमार नाचेरे आजिके .... गायिका लतादिदी

जालिम लोशन 18/10/2019 - 13:31
सद्यस्थितीवर आधारीत असते तर प्रबोधनपर झाले असते. विशेषतः बंगाली माणसाचा स्वभाव त्यांची हिंसक वृत्ती वास्तवाशी तुटलेली नाळ. त्यांचे अमेरिकेविरुध्दची आंदोलने. जगभर पसरलेली डावीकडे झुकणारी लाॅबी. त्यातुन मिळवलेली नोबेल सारखी पारितोषिके. अरुधंती राॅय सारख्या कचरा लेखिकेला मिळणारी प्रसिध्दी त्याचवेळी तस्लिमा नसरिन सारख्या लेखिकेवर होणारे हल्ले ह्या मागची बंगाली मनोवृत्ती जर टिपता आली असती तर लेख वास्तववादी झाला असता.

In reply to by जालिम लोशन

जेम्स वांड 19/10/2019 - 10:20
त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून लिहिलाय, ऐतिहासिक धांडोळा घेणे हा त्यांचा मोटिव्ह स्पष्ट दिसतोय, त्यात राजकारण अन डावे विचार वगैरे घेणे न घेणे त्यांचे स्वातंत्र्य होय, त्यांच्या लिखाणावर काही बोला की. आणि, जर लेखमाला इतकी उणी वाटत असली तर तुम्ही तुम्हाला जी न्याय्य अन उत्तम वाटत असेल अश्या वळणाची लेखमाला स्वतःच लिहून टाका की एखादी, हाकानाका.

शांतिनेकेतनातील शिशुघर आणि सहजपाठांबद्दल आपल्या लेखणीतले वाचायला आवडेल. तसेच त्यांच्या एका सुनेला बंगालची मा म्हणतात - तिच्याबद्दलही वाचायला आवडेल. आणखी एका सुंदर लेखाबद्दल धन्यवाद.

जॉनविक्क 19/10/2019 - 13:44
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर व गीतांजली ही नावे नुसती ऐकली तरी मनाच्या हालचाली सुरू होतात _/\_
दोन-दोन राष्ट्रांचे राष्ट्रगीत लिहिणारे ते बहुदा जगातील एकमेव कवी असावेत. (काहींच्या मते श्रीलंकेचे राष्ट्रगीतही टागोरांनीच लिहिलय, पण त्याबद्दल एकवाक्यता नाही.)
क्या बात है...

In reply to by जॉनविक्क

जॉनविक्क 19/10/2019 - 13:47
समस्त मानवी जीवनात असा एकही प्रसंग नाही ज्यावर टागोरांची कविता आपल्याला मिळणार नाही. पण अतीप्राचीन महाभारताच्या पुढे जाऊन विचार करायची मानसिकता हवी हे उमजुन यायला आणि मान्यही करायला.

In reply to by जॉनविक्क

अनिंद्य 22/10/2019 - 11:18
@ जॉनविक्क रवींद्रनाथांचे 'एकला चलो' गायिले नाही असा बंगाली गायक/गायिका विरळाच. हे ही छान आहे, श्रेया घोषाल म्हणजे गोड गळा. मिष्टी. कवितांबद्दल सहमत, लेखात म्हटल्याप्रमाणे जीवनाच्या सर्व भल्याबुऱ्या अंगांवर टागोरांनी लिहिले आहे.

@जालीम लोशन: कोणताही हिंसाचार हा निषेधार्हच आहे. १. पु. ल. आणि काही विचारवंतांच्या मते बंगालमधील हिंसाचारात मोठा वाटा हा फाळणीच्या वेळी पूर्व पाकिस्तानमधून सर्वस्व गमावून आलेल्या निर्धन निर्वासितांच्या आणि त्यांच्या वाट चुकलेल्या वंशजांच्या नैराश्यातून आलेला आहे. त्या हिंसाचाराला परकीय हितसंबंधी खतपाणी घालतात हे उघड गुपित आहे. संवेदनाक्षम मनाचा सामान्य बंगाली माणूस हिंसाचारग्रस्तांबद्दल द्वेषाने बोलत नाही. २. कृपया अरुंधती रॉय यांच्या आपल्याला न आवडलेल्या काही पुस्तकांची नावे द्या. जमले तर त्यातली काही वाचेन. सत्यकथेच्या संपादकांनी साभार परत केलेले मराठी साहित्य श्रेष्ठ दर्जाचे निघाले होते हे विसरून चालणार नाही. ३. तस्लीमावर सर्वसामान्य बंगाली नव्हे तर कडवे धार्मिक लोक हल्ले करतात. ढाकापेक्षा ती पश्चिम बंगालमध्येच जास्त सुरक्षित आहे असे म्हणतात. ४. भारतातील दुष्काळात माणसे मरतात ती अन्न नसल्यामुळे नव्हे तर अन्न परवडत नसल्यामुळे हे नोबेलविजेते संशोधन एका सधन बंगाल्याचेच आहे.

प्रचेतस 20/10/2019 - 08:54
हा लेखही आवडला. रवींद्रनाथांचे मूळचे आडनाव ठाकूर ना? टागोर हा ब्रिटिशांनी केलेला अपभ्रंश का बंगाली भाषेच्या वळणाने गेलेला शब्द? मध्यंतरी एपिक चॅनेलवर रवींद्रनाथांच्या कथांवर आधारीत 'रबिंद्रनाथकी कथाएं' नामक मालिका प्रसारित होत होती. आपल्या मिपावर पण रातराणी ह्यांनी रवींद्रनाथांच्या 'राजर्षी' ह्या अप्रतिम कादंबरीचा भावानुवाद केला होता. दुर्दैवाने तो अनुवाद अजुन अर्धवटच आहे.

In reply to by प्रचेतस

जेम्स वांड 20/10/2019 - 10:29
महाराजा काबुलीवाला काय रंगला होता म्हणून सांगू, अहाहा! त्याशिवाय राधिका आपटेनं रंगवलेली चोखेर बाली मधील बिनोदिनी तर क्लास अभिनय, दिगदर्शक अनुराग बासू, असलं जबरी कॉम्बो आहे बघा

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 22/10/2019 - 11:39
@ प्रचेतस, .... रवींद्रनाथांचे मूळचे आडनाव ठाकूर ना? ... होय. टागोर हा ब्रिटिश अपभ्रंश. जमीनदारांना ठाकूर म्हणण्याची प्रथा आहे. त्यांचे पिताश्री ब्राम्होसमाजी झाले नसते तर कदाचित त्यांचे आडनाव 'बंदोपाध्याय' तथा 'बॅनर्जी' सुद्धा असते असे काहींचे मत आहे. एकूणच बंगाली आडनावे हा मोठा घोळ आहे. मिपावरचे 'राजर्षी' वाचतो आता.

अनिंद्य 22/10/2019 - 11:30
@ जेम्स वांड @ प्रचेतस @ यशोधरा @ सुधीर कांदळकर @ जालिम लोशन @ कुमार१ @ जॉनविक्क @ नूतन प्रतिसादांबद्दल आपला आभारी आहे. मते-मतांतरे असणारच. यानिमित्ताने आपल्याच देशातील एका शहराबद्दल थोडेफार वाचन-मनन होते आहे त्याचा आनंदच आहे.

सुबोध खरे 22/10/2019 - 19:09
बंगाली लोकांची नावे संस्कृतोद्भव आणि अतिशय अर्थपूर्ण असतात. आमच्या वर्गात १२ बंगाली होते त्यांची नवे शैबल, इंद्रोजीत, तापोष, चांद्रेयी, प्रोदीप्ता, इंद्रोनील, प्रोबल, तीर्थांकर, शुदीप्तो, नभोजीत अशी सुंदर सुंदर आहेत. आजकालच्या तरुण तरुणींची चिया, टिया, कायरा, मायरा, शिजू, बिजू सारख्या अर्थहीन नावांपेक्षा किती तरी छान वाटतात

Prajakta२१ 07/05/2020 - 20:31
गुरुदेवांना आदरांजली कालच त्यांच्या चोखेर बाली ह्या कथेची आणि त्यांच्या कथांवर आधारित एपिक चॅनेल वरील स्टोरीज ऑफ रवींद्रनाथ टागोर ह्या सिरीयल ची आठवण झाली होती वरती त्यावर चर्चा झालीच आहे एकंदर बंगाली समाज हा पांढरपेशा बुद्धिजीवी वर्गातच येतो असे वाटते "टागोरांच्या कथानायिका हा बंगाली साहित्यातील एक रोचक आणि मननीय अध्याय. त्यांच्या सर्व कथांमधील नायिका आपल्या सांप्रत काळापेक्षा पुढचा विचार करणाऱ्या, हुशार आणि वैचारिक स्पष्टता असलेल्या स्त्रिया आहेत. पुरुषांपेक्षा कोठेही कमी नसलेल्या, उलट काकणभर सरसच. दर्पहरण, हैमंती सारख्या कथांमध्ये बंगाली स्त्रीजीवनाचे तरल चित्रण आहे. एक विशेष बाब म्हणजे टागोरांच्या बहुतेक नायिका अपत्यहीन आहेत. मृणाल असो, बिनोदिनी असो की बिमला, चारुलता. बहुतेक नायिकांना अपत्य नाही. मातृशक्तीचा गौरव करणाऱ्या मातृसत्ताक धाटणीच्या बंगाली संस्कृतीतल्या या कथांमध्ये अपत्यहीन नायिका हा मुद्दा मला विशेष वाटतो.">>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> रवींद्रनाथ टागोर आणि अजून काही साहित्यिकांच्या कथांवरून (परिणिता ,देवदास इ.) बंगाली स्त्रिया ह्या स्वतंत्र आणि सामर्थ्यशाली (दुसरा कुठला शब्द नाहो) वाटतात स्वतंत्रपणे निर्णय घेऊन ते निभावण्याची क्षमता त्यांच्यात दिसून येते कदाचित ह्यामागे महिषासुरमर्दिनीची/कालिमातेची उपासना पूजा असू शकते आपण ज्या देवतांची उपासना करतो तसेच त्यांचे गुण अंगी बाळगावयास सुरवात करतो आणि कौटुंबिक मानसिकतेवर पण तसाच प्रभाव पडतो चांगल्या लेखमालेबद्दल धन्यवाद

In reply to by Prajakta२१

अनिंद्य 07/05/2020 - 21:49
प्रतिसादाबद्दल आभार. ..... आपण ज्या देवतांची उपासना करतो त्यांचे गुण अंगी ..... सर्व देवरुपे मानवनिर्मित आहेत असे माझे मत आहे :-)

चित्रगुप्त 29/11/2020 - 06:17
आज अचानकच हा लेख वाचनात आला. खूपच माहितीपूर्ण आणि रंजक शैलीत लिहीले आहे. बंगाली कला-संस्कृतीबद्दलचे तुमचे सगळे लेख आता वाचायला हवेत. मला बंगाली समजत नसले तरी रविंद्र संगीत ऐकायला आवडते. (अर्थात फारच कमी ऐकलेले आहे) श्रीराधा बॅनर्जी (म्हणजेच बंदोपाध्याय का? ) यांनी गायलेले " नील दिगोन्ते ... हे फारच आवडते. त्यांची एक कॅसेट फार पूर्वी कलकत्त्याहून आणली होती, ती रोज ऐकायचो. तसेच जयदेवच्या 'गीतगोविंद' ने भारून जाऊन रविंद्रनाथ अगदी तरूण असताना 'भानुसिंग' नावाने रचलेली पदावली खूपच ऐकायचो. सुरुवातीला हेमन्त कुमार यांच्या धीरगंभीर आवाजात जयदेवांचेच मंगलाचरण (... श्रित-कमला-कुच-मण्डल धृत-कुण्डल , कलित-ललित-वन-माल ... जय जय देव हरे) आणि त्यानंतर 'आश्रमकन्या' - कणिका बंदोपाध्याय (आणि कोरस) यांनी गायलेली रविंद्रनाथांची अप्रतीम कवने. अजूनही यूट्यूबवर अधून मधून ऐकतो. यातील 'श्रावण गगने घोर घनघटा' मधील विरहिनी राधेची व्याकुळ आर्तता अशी काही प्रकटली आहे ( - की त्यापुढे लताने गायलेले हे गीत अगदी सामान्य वाटते) 'सुंदर राधे आवे बने' मधील राधेच्या सौंदर्‍याचे वर्णन, अश्या अनेक गोष्टी अतिशय श्रवणीय आहेत. Bhanusingher Padavali, Pt. 1 https://www.youtube.com/watch?v=Xq7YjejeEEo&ab_channel=VariousArtists-Topic Bhanusingher Padavali, Pt. 2 https://www.youtube.com/watch?v=ExeoHevH-Ww&ab_channel=VariousArtists-Topic तुमचे अन्य लेख वाचून प्रतिसाद देत राहीन. माझ्यासाठी एक नवाच खजिना उघडा करून दिलाचे अनेक आभार.

चित्रगुप्त 29/11/2020 - 06:24
@अनिंद्य, भानुशिंगेर पोदाबोली मधील बंगालीतील निवेदनाचा अर्थ मला समजत नाही. हिंदी वा मराठीत हे उपलब्ध होऊ शकते का? तसेच ही पदे संस्कृतात आहे की ब्रजभा॑षेत की बंगालीत ?

In reply to by चित्रगुप्त

अनिंद्य 17/12/2020 - 21:03
भानुशिंगेर पोदाबोली फार उच्च दर्जाच्या बंगालीत आहे :-) मिपाकर 'नूतन' यांनी ह्या लेखमालेतील एका परिच्छेदाचा सुंदर अनुवाद मराठीत स्वयंस्फूर्तपणे केला होता. त्यांनी 'आरण्यक' ह्या एका सुंदर पुस्तकाचा बंगालीतून थेट मराठीत अनुवादही केला आहे. https://www.misalpav.com/node/43651 त्यांनाच विनंती करूयात. नूतन जी, हे शुभकर्म करणार का ?

अनिंद्य 17/12/2020 - 20:54
चित्रगुप्त जी, रसभोक्ते खरे तुम्ही. हेमंत कुमार, श्रीराधा बॅनर्जी, कणिका बंदोपाध्याय... सगळी मोठी नावे. जय हो ! हेमंतदांनी गायलेले रवींद्रनाथांचेच 'क्लांती आमार खोमा (क्षमा) करो प्रभू' हे माझे अत्यंत आवडते, अनेकदा ऐकतो. लेखमालेतील अन्य लेख अवश्य वाचा आणि शक्य झाल्यास अभिप्राय कळवा. बंगाली शैलीचित्रांबद्दल तुम्ही आम्हा सर्वांना नवीन काही सांगू शकाल. खूप आवडेल. 🙏

नूतन 18/10/2019 - 13:21
लेख आवडला. रविन्द्र संगीतातील माझी आवडती दोन गाणी, भालोबाशी भालोबाशी....गायिका इन्द्राणी सेन ह्रिदोय आमार नाचेरे आजिके .... गायिका लतादिदी

जालिम लोशन 18/10/2019 - 13:31
सद्यस्थितीवर आधारीत असते तर प्रबोधनपर झाले असते. विशेषतः बंगाली माणसाचा स्वभाव त्यांची हिंसक वृत्ती वास्तवाशी तुटलेली नाळ. त्यांचे अमेरिकेविरुध्दची आंदोलने. जगभर पसरलेली डावीकडे झुकणारी लाॅबी. त्यातुन मिळवलेली नोबेल सारखी पारितोषिके. अरुधंती राॅय सारख्या कचरा लेखिकेला मिळणारी प्रसिध्दी त्याचवेळी तस्लिमा नसरिन सारख्या लेखिकेवर होणारे हल्ले ह्या मागची बंगाली मनोवृत्ती जर टिपता आली असती तर लेख वास्तववादी झाला असता.

In reply to by जालिम लोशन

जेम्स वांड 19/10/2019 - 10:20
त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून लिहिलाय, ऐतिहासिक धांडोळा घेणे हा त्यांचा मोटिव्ह स्पष्ट दिसतोय, त्यात राजकारण अन डावे विचार वगैरे घेणे न घेणे त्यांचे स्वातंत्र्य होय, त्यांच्या लिखाणावर काही बोला की. आणि, जर लेखमाला इतकी उणी वाटत असली तर तुम्ही तुम्हाला जी न्याय्य अन उत्तम वाटत असेल अश्या वळणाची लेखमाला स्वतःच लिहून टाका की एखादी, हाकानाका.

शांतिनेकेतनातील शिशुघर आणि सहजपाठांबद्दल आपल्या लेखणीतले वाचायला आवडेल. तसेच त्यांच्या एका सुनेला बंगालची मा म्हणतात - तिच्याबद्दलही वाचायला आवडेल. आणखी एका सुंदर लेखाबद्दल धन्यवाद.

जॉनविक्क 19/10/2019 - 13:44
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर व गीतांजली ही नावे नुसती ऐकली तरी मनाच्या हालचाली सुरू होतात _/\_
दोन-दोन राष्ट्रांचे राष्ट्रगीत लिहिणारे ते बहुदा जगातील एकमेव कवी असावेत. (काहींच्या मते श्रीलंकेचे राष्ट्रगीतही टागोरांनीच लिहिलय, पण त्याबद्दल एकवाक्यता नाही.)
क्या बात है...

In reply to by जॉनविक्क

जॉनविक्क 19/10/2019 - 13:47
समस्त मानवी जीवनात असा एकही प्रसंग नाही ज्यावर टागोरांची कविता आपल्याला मिळणार नाही. पण अतीप्राचीन महाभारताच्या पुढे जाऊन विचार करायची मानसिकता हवी हे उमजुन यायला आणि मान्यही करायला.

In reply to by जॉनविक्क

अनिंद्य 22/10/2019 - 11:18
@ जॉनविक्क रवींद्रनाथांचे 'एकला चलो' गायिले नाही असा बंगाली गायक/गायिका विरळाच. हे ही छान आहे, श्रेया घोषाल म्हणजे गोड गळा. मिष्टी. कवितांबद्दल सहमत, लेखात म्हटल्याप्रमाणे जीवनाच्या सर्व भल्याबुऱ्या अंगांवर टागोरांनी लिहिले आहे.

@जालीम लोशन: कोणताही हिंसाचार हा निषेधार्हच आहे. १. पु. ल. आणि काही विचारवंतांच्या मते बंगालमधील हिंसाचारात मोठा वाटा हा फाळणीच्या वेळी पूर्व पाकिस्तानमधून सर्वस्व गमावून आलेल्या निर्धन निर्वासितांच्या आणि त्यांच्या वाट चुकलेल्या वंशजांच्या नैराश्यातून आलेला आहे. त्या हिंसाचाराला परकीय हितसंबंधी खतपाणी घालतात हे उघड गुपित आहे. संवेदनाक्षम मनाचा सामान्य बंगाली माणूस हिंसाचारग्रस्तांबद्दल द्वेषाने बोलत नाही. २. कृपया अरुंधती रॉय यांच्या आपल्याला न आवडलेल्या काही पुस्तकांची नावे द्या. जमले तर त्यातली काही वाचेन. सत्यकथेच्या संपादकांनी साभार परत केलेले मराठी साहित्य श्रेष्ठ दर्जाचे निघाले होते हे विसरून चालणार नाही. ३. तस्लीमावर सर्वसामान्य बंगाली नव्हे तर कडवे धार्मिक लोक हल्ले करतात. ढाकापेक्षा ती पश्चिम बंगालमध्येच जास्त सुरक्षित आहे असे म्हणतात. ४. भारतातील दुष्काळात माणसे मरतात ती अन्न नसल्यामुळे नव्हे तर अन्न परवडत नसल्यामुळे हे नोबेलविजेते संशोधन एका सधन बंगाल्याचेच आहे.

प्रचेतस 20/10/2019 - 08:54
हा लेखही आवडला. रवींद्रनाथांचे मूळचे आडनाव ठाकूर ना? टागोर हा ब्रिटिशांनी केलेला अपभ्रंश का बंगाली भाषेच्या वळणाने गेलेला शब्द? मध्यंतरी एपिक चॅनेलवर रवींद्रनाथांच्या कथांवर आधारीत 'रबिंद्रनाथकी कथाएं' नामक मालिका प्रसारित होत होती. आपल्या मिपावर पण रातराणी ह्यांनी रवींद्रनाथांच्या 'राजर्षी' ह्या अप्रतिम कादंबरीचा भावानुवाद केला होता. दुर्दैवाने तो अनुवाद अजुन अर्धवटच आहे.

In reply to by प्रचेतस

जेम्स वांड 20/10/2019 - 10:29
महाराजा काबुलीवाला काय रंगला होता म्हणून सांगू, अहाहा! त्याशिवाय राधिका आपटेनं रंगवलेली चोखेर बाली मधील बिनोदिनी तर क्लास अभिनय, दिगदर्शक अनुराग बासू, असलं जबरी कॉम्बो आहे बघा

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 22/10/2019 - 11:39
@ प्रचेतस, .... रवींद्रनाथांचे मूळचे आडनाव ठाकूर ना? ... होय. टागोर हा ब्रिटिश अपभ्रंश. जमीनदारांना ठाकूर म्हणण्याची प्रथा आहे. त्यांचे पिताश्री ब्राम्होसमाजी झाले नसते तर कदाचित त्यांचे आडनाव 'बंदोपाध्याय' तथा 'बॅनर्जी' सुद्धा असते असे काहींचे मत आहे. एकूणच बंगाली आडनावे हा मोठा घोळ आहे. मिपावरचे 'राजर्षी' वाचतो आता.

अनिंद्य 22/10/2019 - 11:30
@ जेम्स वांड @ प्रचेतस @ यशोधरा @ सुधीर कांदळकर @ जालिम लोशन @ कुमार१ @ जॉनविक्क @ नूतन प्रतिसादांबद्दल आपला आभारी आहे. मते-मतांतरे असणारच. यानिमित्ताने आपल्याच देशातील एका शहराबद्दल थोडेफार वाचन-मनन होते आहे त्याचा आनंदच आहे.

सुबोध खरे 22/10/2019 - 19:09
बंगाली लोकांची नावे संस्कृतोद्भव आणि अतिशय अर्थपूर्ण असतात. आमच्या वर्गात १२ बंगाली होते त्यांची नवे शैबल, इंद्रोजीत, तापोष, चांद्रेयी, प्रोदीप्ता, इंद्रोनील, प्रोबल, तीर्थांकर, शुदीप्तो, नभोजीत अशी सुंदर सुंदर आहेत. आजकालच्या तरुण तरुणींची चिया, टिया, कायरा, मायरा, शिजू, बिजू सारख्या अर्थहीन नावांपेक्षा किती तरी छान वाटतात

Prajakta२१ 07/05/2020 - 20:31
गुरुदेवांना आदरांजली कालच त्यांच्या चोखेर बाली ह्या कथेची आणि त्यांच्या कथांवर आधारित एपिक चॅनेल वरील स्टोरीज ऑफ रवींद्रनाथ टागोर ह्या सिरीयल ची आठवण झाली होती वरती त्यावर चर्चा झालीच आहे एकंदर बंगाली समाज हा पांढरपेशा बुद्धिजीवी वर्गातच येतो असे वाटते "टागोरांच्या कथानायिका हा बंगाली साहित्यातील एक रोचक आणि मननीय अध्याय. त्यांच्या सर्व कथांमधील नायिका आपल्या सांप्रत काळापेक्षा पुढचा विचार करणाऱ्या, हुशार आणि वैचारिक स्पष्टता असलेल्या स्त्रिया आहेत. पुरुषांपेक्षा कोठेही कमी नसलेल्या, उलट काकणभर सरसच. दर्पहरण, हैमंती सारख्या कथांमध्ये बंगाली स्त्रीजीवनाचे तरल चित्रण आहे. एक विशेष बाब म्हणजे टागोरांच्या बहुतेक नायिका अपत्यहीन आहेत. मृणाल असो, बिनोदिनी असो की बिमला, चारुलता. बहुतेक नायिकांना अपत्य नाही. मातृशक्तीचा गौरव करणाऱ्या मातृसत्ताक धाटणीच्या बंगाली संस्कृतीतल्या या कथांमध्ये अपत्यहीन नायिका हा मुद्दा मला विशेष वाटतो.">>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> रवींद्रनाथ टागोर आणि अजून काही साहित्यिकांच्या कथांवरून (परिणिता ,देवदास इ.) बंगाली स्त्रिया ह्या स्वतंत्र आणि सामर्थ्यशाली (दुसरा कुठला शब्द नाहो) वाटतात स्वतंत्रपणे निर्णय घेऊन ते निभावण्याची क्षमता त्यांच्यात दिसून येते कदाचित ह्यामागे महिषासुरमर्दिनीची/कालिमातेची उपासना पूजा असू शकते आपण ज्या देवतांची उपासना करतो तसेच त्यांचे गुण अंगी बाळगावयास सुरवात करतो आणि कौटुंबिक मानसिकतेवर पण तसाच प्रभाव पडतो चांगल्या लेखमालेबद्दल धन्यवाद

In reply to by Prajakta२१

अनिंद्य 07/05/2020 - 21:49
प्रतिसादाबद्दल आभार. ..... आपण ज्या देवतांची उपासना करतो त्यांचे गुण अंगी ..... सर्व देवरुपे मानवनिर्मित आहेत असे माझे मत आहे :-)

चित्रगुप्त 29/11/2020 - 06:17
आज अचानकच हा लेख वाचनात आला. खूपच माहितीपूर्ण आणि रंजक शैलीत लिहीले आहे. बंगाली कला-संस्कृतीबद्दलचे तुमचे सगळे लेख आता वाचायला हवेत. मला बंगाली समजत नसले तरी रविंद्र संगीत ऐकायला आवडते. (अर्थात फारच कमी ऐकलेले आहे) श्रीराधा बॅनर्जी (म्हणजेच बंदोपाध्याय का? ) यांनी गायलेले " नील दिगोन्ते ... हे फारच आवडते. त्यांची एक कॅसेट फार पूर्वी कलकत्त्याहून आणली होती, ती रोज ऐकायचो. तसेच जयदेवच्या 'गीतगोविंद' ने भारून जाऊन रविंद्रनाथ अगदी तरूण असताना 'भानुसिंग' नावाने रचलेली पदावली खूपच ऐकायचो. सुरुवातीला हेमन्त कुमार यांच्या धीरगंभीर आवाजात जयदेवांचेच मंगलाचरण (... श्रित-कमला-कुच-मण्डल धृत-कुण्डल , कलित-ललित-वन-माल ... जय जय देव हरे) आणि त्यानंतर 'आश्रमकन्या' - कणिका बंदोपाध्याय (आणि कोरस) यांनी गायलेली रविंद्रनाथांची अप्रतीम कवने. अजूनही यूट्यूबवर अधून मधून ऐकतो. यातील 'श्रावण गगने घोर घनघटा' मधील विरहिनी राधेची व्याकुळ आर्तता अशी काही प्रकटली आहे ( - की त्यापुढे लताने गायलेले हे गीत अगदी सामान्य वाटते) 'सुंदर राधे आवे बने' मधील राधेच्या सौंदर्‍याचे वर्णन, अश्या अनेक गोष्टी अतिशय श्रवणीय आहेत. Bhanusingher Padavali, Pt. 1 https://www.youtube.com/watch?v=Xq7YjejeEEo&ab_channel=VariousArtists-Topic Bhanusingher Padavali, Pt. 2 https://www.youtube.com/watch?v=ExeoHevH-Ww&ab_channel=VariousArtists-Topic तुमचे अन्य लेख वाचून प्रतिसाद देत राहीन. माझ्यासाठी एक नवाच खजिना उघडा करून दिलाचे अनेक आभार.

चित्रगुप्त 29/11/2020 - 06:24
@अनिंद्य, भानुशिंगेर पोदाबोली मधील बंगालीतील निवेदनाचा अर्थ मला समजत नाही. हिंदी वा मराठीत हे उपलब्ध होऊ शकते का? तसेच ही पदे संस्कृतात आहे की ब्रजभा॑षेत की बंगालीत ?

In reply to by चित्रगुप्त

अनिंद्य 17/12/2020 - 21:03
भानुशिंगेर पोदाबोली फार उच्च दर्जाच्या बंगालीत आहे :-) मिपाकर 'नूतन' यांनी ह्या लेखमालेतील एका परिच्छेदाचा सुंदर अनुवाद मराठीत स्वयंस्फूर्तपणे केला होता. त्यांनी 'आरण्यक' ह्या एका सुंदर पुस्तकाचा बंगालीतून थेट मराठीत अनुवादही केला आहे. https://www.misalpav.com/node/43651 त्यांनाच विनंती करूयात. नूतन जी, हे शुभकर्म करणार का ?

अनिंद्य 17/12/2020 - 20:54
चित्रगुप्त जी, रसभोक्ते खरे तुम्ही. हेमंत कुमार, श्रीराधा बॅनर्जी, कणिका बंदोपाध्याय... सगळी मोठी नावे. जय हो ! हेमंतदांनी गायलेले रवींद्रनाथांचेच 'क्लांती आमार खोमा (क्षमा) करो प्रभू' हे माझे अत्यंत आवडते, अनेकदा ऐकतो. लेखमालेतील अन्य लेख अवश्य वाचा आणि शक्य झाल्यास अभिप्राय कळवा. बंगाली शैलीचित्रांबद्दल तुम्ही आम्हा सर्वांना नवीन काही सांगू शकाल. खूप आवडेल. 🙏
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील : भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433 भाग ४ - https://misalpav.com/node/45481 भाग ५ - http://www.misalpav.com/node/45533 आमार कोलकाता - भाग ६ – बंगाली कलासंस्कृतीचा अध्वर्यु प्रत्येक भारतीय ‘जन-गण-मन’ हे राष्ट्रगीत गातो तेव्हा तो रवींद्रनाथ टागोरांचे गीत गात असतो. भारताचेच नाही तर बांगलादेशचे राष्ट्रगीतही टागोरांनी लिहिले आहे.