मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लेखकाचे मानधन : कथा आणि व्यथा

हेमंतकुमार ·

In reply to by हेमंतकुमार

शा वि कु 30/12/2019 - 19:57
नारायण कम्युनिस्ट चळवळीतून बाहेर पडून आता mnc मध्ये नोकरी करत असतो. तर चांगदेव नोकरीसाठी मुंबई सोडून लहान गावात चालला असतो. नारायणाने mnc मध्ये मोठ्या पगारासाठी नोकरी घेऊन तत्वांशी प्रतारणा केली आहे असं मित्रमंडळींचं म्हणणं असतं. तर चांगदेव आणि नारायण नारायणाच्या बीचला लागून असलेल्या आलिशान घरात बसून बियर पित गप्पा मारत असतात. तर विषयाशी सम्बंधित म्हणजे नारायण सांगत असतो की सारंग नावाच्या त्यांच्या एका मित्राला एका प्रथितयश प्रकाशकाने कस फसवलं. या अनुषंगाने तो पुढं मराठी प्रकाशक संस्कृती, देश याबद्दल भरभरून बोलतील पण रॉयल्टीच नाव काढलं तरी टाळाटाळ करतील असं बोलतो. तो त्याचा स्वतःचा अनुभव सांगतो. त्यानं मुंबईच्या भूमिगत चळवळींबद्दल स्वानुभवाने पुस्तक लिहिले असते, जे इंग्लड मधला एक प्रकाशक प्रसिद्ध करतो. तर नारायणला इंग्लड मधल्या प्रकाशकाचे प्रोफेशनल वागणे प्रचण्ड आवडते.प्रकाशनपूर्वी रॉयल्टी, किती प्रति छापणार, आवृत्या, सगळी सुस्पष्ट चर्चा त्या प्रकाशनाने केली असते. यापुढे मराठीत लिखाण करणार नसल्याच सुद्धा नारायण सांगतो.

१. मिपासारख्याच संस्थळावर सुप्रसिद्ध मराठी मासिकात अबक विषयावर लेख पाहिजेत. पसंत पडल्यास योग्य ते मानधन दिले जाईल अशी उद्घोषणा आली. मी लेख पाठवला. प्रसिद्ध झाला आणि रु. २५०/- मानधन मनी ऑर्डरने महिन्याभरात आले देखील. साल होते २००८ किंवा २००९. २. हा अनुभव साहित्याविषयी नाही. अध्यापन-साहित्याबद्दल आहे. एका व्यवस्थापन शास्त्राचे अध्यापक असलेल्या खास स्नेह्यांना अध्यापनासाठी संपूर्ण अभ्यासक्रमाची एकूण ४०-५० पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन्स बनवून दिली. आणि काही कच्चे प्रबंध बनवून दिले. खरे तर टाईम पास म्हणून दोस्तीखात्यातच बनवून दिले होते. पण त्यांनी चारसहा महिन्यातच आपणहून माझा बँक अकाउंट वगैरे तपशील घेऊन वाजवी मोबदला पाठवला जो ५० हजारांच्या आसपास होता. पण त्यातला मजकूर लिहितांना, आकृत्या काढतांना, चित्रे डकवतांना आणि मुख्य म्हणजे अभ्यासक्रमातल्या माझ्या सत्राशे पन्नास शंकांचे निरसन त्यांच्याकडून करून घेतांना केलेल्या चर्चांतून सर्जनशीलतेचा अपूर्व अवर्णनीय असा आनंद मिळाला. त्याची किंमत करता येणार नाही. ३. इथे सरळ लबाड प्रकाशनाचे नावच देतो. विचक्षण प्रकाशन. त्यांच्या कार्यालयातून श्री परदेशी यांचा फोन आला. ई - पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध करण्यासठी साहित्य पाहिजे. त्यांची वेबसाईट पाहिली. अनेक पुस्तके अजूनही दिसतात. त्यांना मिपावरचे ओरिसातले प्रवासवर्णन पसंत आले. पाठवले. मग दोन हजार रु. नोंदणी शुल्क द्यावे लागेल म्हणाले. नंतर पुस्तक विक्री मधून तुमचे पैसे वसूल होतील. फारतर अक्कलखाती जमा होतील अशा अपेक्षेने मी त्यांच्या अमरावतीच्या बँक खात्यावर आरञीजीएसने पैसे पाठवले. त्यांनी चित्रे डिझाईन वगैरे मला पाठवली. मी निवडही पाठवली. मुद्रितशोधनासाठी मला त्यांनी प्रत पाठवली. टायपिंगमध्ये अगणित चुका होत्या. दुरुस्ती पाठवली. त्यांनी नवे प्रूफ पाठवले. पुन्हा वेगळ्या अगणित चुका. पुन्हा दुरुस्ती पाठवली. असे चार वेळा झाले. मग मी नाद सोडला. चोर लोक आहेत. त्यांना माझ्याकडून फक्त २,००० रु. उकळायचे होते. नंतर मी ई मेलने स्मरणे पाठवली अर्थातच प्रतिसाद आला नाही. आता त्यांनी हे वाचून माझ्यावर मानहानीचा खटला घातला तर मज्जा येईल कारण मी सारे पुरावे ठेवलेले आहेत. असो. छान लेख. पहिले दोन्ही अनुभव फार चांगले आहेत. ते लिहावेसे वाटलेच. तिसरा मजेशीर.

In reply to by सुधीर कांदळकर

हेमंतकुमार 30/12/2019 - 20:50
शा वि कु, धन्यवाद. रोचक. सुधीर, रोचक किस्से. पहिल्या २ बद्दल तुमचे अभिनंदन आणि तिसऱ्यासाठी सहानुभूती !

जॉनविक्क 30/12/2019 - 20:40
त्यांच्या प्रथम दिवाळी अंकाच्या छापील प्रतीचे प्रकाशनात घोड चूक झाली व चक्क मूळ लेखकाचे नावा ऐवजी भलत्याचे नाव जोडले गेले. पुढील कळस तर असा आहे की आम्ही प्रकाशक म्हणजे देव, आमचे(हौशी) कष्ट म्हणजे म्हणजे लेखकांवर उपकार त्यामुळे आम्ही कष्ट करताना चुक्लो असल्याने आमचो कोरी दिलगिरी मान्य करा,बाकी काही याघाडीस होणार नाही काय कारायाचे ते करा हवं ते समजा अशी मानसिकता वरून प्रदर्शित केली.

मित्रहो 31/12/2019 - 08:05
एकाने तुमचा हा लेख आवडला आम्ही घेऊ का अशी परवानगी घेतली. मानधनाविषयी काही बोलणे झाले नव्हते. त्यांनी अंक पाठविला आणि त्यात मानधन सुद्धा त्याच लिफाफ्यात पाठविले. फार गंमत वाटली. ही फार जुनी गोष्ट आहे. तुमचा अमुक अमुक लेख आवडला आम्ही दिवाळी अंकासाठी घेऊ का, योग्य ते मानधन दिले जाईल. अंक छापला गेला पण अकं नाही की मानधन नाही. विचारणा केली असता ते चुकुन राहिले, दोन्ही आताच पाठविले असे सांगण्यात आले. आठवडाभराने अंक आले पण मानधनाचा चेक नाही. मानधनाची चौकशी केली असता सांगितले की इतरत्र आधीच प्रकाशित असल्याने मानधन मिळणार नाही. प्रश्न मानधनाचा नव्हता तो होता तो पारदर्शकतेचा. हेच आधी सांगायला हवे होते. लेखक झोलावाला असतो , तो आमच्याकडे खेटे घालणार, मग आम्ही छापणार, मग आम्ही वाटेल तेवढे पैसे देणार. या साऱ्या व्यवहाराला आम्ही मराठी साहित्याची सेवा करतोय, किंवा तुम्हाला व्यासपीठ मिळवून देतोय असा पवित्रा घेणार. मुळात प्रवृत्ती पैसे देण्याची नसते. हौशी लेखकांसाठी प्रश्न पैशाचा नसतो पण व्यवहारात पारदर्शकता नसेल तर याचा अधिक मनस्ताप हौशी लेखकाला होतो. तो हौशेखातर लिहित असतो. मानधन नाही असे सांगितले तरी तो हौशेसाठी लिहिणार पण मानधन देतो सांगायचे आणि द्यायचे नाही हे चुकीचे आहे. अशातही सारे व्यवहार सचोटीने करणारे सुद्धा काही प्रकाशक असतात. माझ्या मते तरी हल्लीच्या काळात इंटरनेटच्या माध्यमातून छापील माध्यमापेक्षा अधिकाधिक वाचकापर्यंत पोहचता येते.

हेमंतकुमार 31/12/2019 - 08:30
जॉन व मित्रहो, +१
माझ्या मते तरी हल्लीच्या काळात इंटरनेटच्या माध्यमातून छापील माध्यमापेक्षा अधिकाधिक वाचकापर्यंत पोहचता येते.
>>>>>> सहमत.

सुबोध खरे 31/12/2019 - 10:43
माझे पण दोन चार लेख कोणत्या कोणत्या मासिकात छापून आले आहेत. परंतु त्याच्या मानधना विषयी मी काही बोलणं केला नाही आणि त्यांनीही दिलं नाही. मुळात हे लेख नौदलाबद्ल होते ज्यातून तरुणांना स्फूर्ती मिळून ते लष्कराकडे एक चांगली करियरची संधी म्हणून बघतील असा माझा दृष्टिकोन होता म्हणून मी ते फारसे मनावर घेतले नाही किंवा काही अपेक्षा केली नाही. परंतु लेखकाला "वाजवी" मानधन मिळालेच पाहिजे याच्याशी मी संपूर्णपणे सहमत आहे. अशी स्थिती केवळ लेखकाचीच आहे असे नाही तर सर्वच व्यवसायात दिसून येते. कापड उद्योगात होतकरू चित्रकारांकडून डिझाईन मागवली जातात बघून सांगतो म्हणून ती ठेवायला सांगतात आणि एका रात्रीत त्याची रंगीत झेरॉक्स काढूनघेतली जाते. दुसऱ्या दिवशी चित्रकाराला डिझाईन आवडली नाहीत हे केली जातात आणि काही दिवसांनी तीच डिझाईन बाजारात सर्व तर्हेच्या कपड्यावर दिसायला लागतात. एक अत्यंत प्रथितयश हृदय शल्यक्रिया चिकित्सकाला तो नवोदित असताना एका प्रथितयश हृदयविकार तज्ज्ञाने केवळ १५००० रुपयात हृदयाची बायपास शल्यक्रिया करण्यास भाग पाडले होते. याची चीड येऊन त्याने एक देशातील मोठे हृदय रोग रुग्णालय उभे केले मोठा मासा छोट्या माशाला गिळतो हे सर्वच क्षेत्रात दिसते म्हणून प्रथितयश झाल्याशिवाय कोणत्याही लेखकाला केवळ लेखनावर पोट भरणे आपल्या देशात शक्य होत नाही.

हेमंतकुमार 31/12/2019 - 11:27
लेखनाचे मानधन ? ते काय असते ?
>> काय राव, लेखकांनीच असं विचारल्यावर कसं व्हायचं !
प्रथितयश झाल्याशिवाय कोणत्याही लेखकाला केवळ लेखनावर पोट भरणे आपल्या देशात शक्य होत नाही.
>>> अगदी. प्रादेशिक भाषेतील लेखनावर तर खूप कठीण .

In reply to by मित्रहो

हेमंतकुमार 01/01/2020 - 09:08
इथे मला पुलं ची प्रकर्षाने आठवण होतेय. आयुष्याचा थोडा काळ नोकरी आणि पुढे ती सोडून दीर्घ काळ लेखनावर (आणि अन्य कला) चरितार्थ. असे दुसरे उदा मराठीत आहे का? जाणकारांनी प्रकाश टाकावा.

In reply to by हेमंतकुमार

Nitin Palkar 01/01/2020 - 21:13
जाणकार नव्हे पण माहिती असल्याने .... 'रमेश मंत्री'. केवळ लेखनावर उपजिवीका करणाऱ्या इन्यागिन्या मराठी लेखकांमध्ये हे नाव होते. रमेश मंत्री बहुतेक युसीसमध्ये नोकरीला होते (जयवंत दळवींप्रमाणे). पण नंतर नोकरी सोडून केवळ लेखन करत होते. १९७९ या एकाच वर्षात ३४ पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. १९९१ सालच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेले आहे.

In reply to by Nitin Palkar

हेमंतकुमार 02/01/2020 - 08:33
नि पा, मंत्री यांच्या माहितीसाठी धन्यवाद. त्यांच्या एका पुस्तकातले एक विधान माझे आवडते आहे. ते असे : "या दशकातील जागतिक परिस्थिती गंभीर होती", यासारखे दुसरे विनोदी विधान नाही ! (परिस्थिती कायमच गंभीर असते, कुठल्या दशकात नव्हती? ).

In reply to by प्रकाश घाटपांडे

हेमंतकुमार 05/11/2021 - 10:37
यांना आदरांजली वाहणारा एक लेख इथे आहे. त्यातले निवडक :
आपल्या पुस्तकांच्या कमाईतून श्रीमंती मिळवणारे एक मराठी लेखक म्हणून नाईक यांना ओळखलं जातं. मात्र नंतर या लेखकावर आर्थिक संकट कोसळलं.

गवि 31/12/2019 - 11:32
अनेक ठिकाणी लेखकाला भीड पडल्याने त्याने मानधनाचा विषय आपणहून न काढणे, किंवा त्याबद्दल काहीच स्पष्टता नसतानाही गप्प राहणे असं केलेलं दिसतं. सर्वसाधारणपणे लेखक क्रिएटिव्ह असला तरी या क्षेत्रात धंदेवाईक नसतो. कलाकार, निर्मितीक्षम, सृजनशील अशा शब्दांतून एकदम रुपये, पैसे, देणे घेणे, घासाघीस या व्यावहारिक पातळीवर येणं संकोचजनक होत असावं. विशेषतः आपण त्या क्षेत्रात आधीच प्रसिद्ध नसल्यास.

In reply to by प्रकाश घाटपांडे

अनिंद्य 31/12/2019 - 12:16
:-) आहेत. माझ्या ओळखीत आहेत. मग ते पुस्तक 'साभार' प्रत्येक येणाऱ्या-जाणाऱ्याला स्वहस्ते देऊन फोटो काढून घेणे वगैरे...

हेमंतकुमार 31/12/2019 - 18:15
घासाघीस या व्यावहारिक पातळीवर येणं संकोचजनक होत असावं >>> बरोबर, व्यवहार शिकायला लेखकाला वेळ लागतो. प्रथितयश प्रकाशकाला जास्त मानधन मिळत असावे :) >>> अगदी ! अशा बऱ्याच हौशी लेखकांनी प्रकाशकाला श्रीमंत केले आहे ! आहेत. माझ्या ओळखीत आहेत. फोटो, सत्कार ... >>> खरंय, अगदी उबग येतो अशा कार्यक्रमाचा.

हेमंतकुमार 03/01/2020 - 13:39
नुकतेच दुसरे लेखक-प्रकाशक संमेलन चिपळूण येथे झाले. त्यातील "वाचनसंस्कृती टिकून राहील" या अध्यक्षीय भाषणाचा गोषवारा इथे : https://m.maharashtratimes.com/editorial/samwad/the-culture-of-reading-will-survive/articleshow/73002182.cms

सुहास शिरवळकर सुध्द्दा पूर्ण वेळ लेखन करत असत. त्यांच्या फलश्रुती ह्या पुस्तकात कादंबरीसाठी विषय हुडकण्यासाठी काय काय खटपटी कराव्या लागत असत ह्याबाबत उल्लेख आहेत.

हेमंतकुमार 06/01/2020 - 11:37
लेखनावर उपजीविका केलेले ४ मराठी लेखक प्रतिसादांतून कळले: पुलं रमेश मंत्री निरंजन घाटे सु शि. ..... माहितगारांनी अजून भर घालावी !

हेमंतकुमार 12/01/2020 - 17:45
या लेखात जो खालील किस्सा दिला आहे त्याबद्दल थोडे अधिक :
“सदर लेख आम्ही तुमच्याकडून मागवून तुम्हास कष्ट दिलेले आहेत. त्यामुळे आम्ही मानधन देणे लागतो, पण तुमचा लेख पसंत नसल्याने साभार परत करीत आहोत”
.... हा किस्सा छापलेले पुस्तक आज मी माळ्यावरून हुडकून काढले. अशोक जैन लिखित 'अशोक-वन' असे त्याचे नाव आहे. किस्सा त्यातील असल्याने आता संबंधितांची नावे लिहितो. लेखक : ना. सी. फडके लेख नाकारणारे संपादक : द्वा. भ. कर्णिक.

उपजीविकेसाठी अन्य काही व्यवसाय करायचे की नाही ठाऊक नाही. मराठी जनतेच्या तीनचार पिढ्यांच्या इंग्रजीच्या ज्ञानाला आकार देणारे द्वारकानाथ राघोबा तर्खडकर हे असेच दुसरे नाव घेता येईल. हे पंचांग देखील काढीत. शिक्षकी/प्राध्यापकी पेशात जम बसलेले काही तर काही जम न बसलेले अनेक लोक पाठ्यपुस्तक लेखन वा गाइडे काढून चांगली कमाई करतात. तर काही गाईड प्रकाशनात जम बसलेले चलाख प्रकाशक जम न बसलेल्या नवख्या शिक्षकांकडून कवडीकिंमतीत वा फुकटात गाइडे लिहून घेऊन बक्कळ पैसा कमावतात. अनेक वेळा गाईड प्रीस्क्राईब करणार्‍या शिक्षकांना मोबदला दिला जातो. अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती घोस्ट रायटर म्हणून काही व्यक्तींना एक मानधन रक्कम देऊन एखादे पुस्तक लिहून घेतात. माझ्याकडे दोनतीन इंग्रजी/मराठी प्रस्ताव आले होते. संपूर्ण आगाऊ मानधनाची अट आणि रक्कम ऐकून पळून गेले ते पुन्हा उगवले नाहीत.

In reply to by सुधीर कांदळकर

हेमंतकुमार 13/01/2020 - 07:48
प्रस्ताव आले होते. संपूर्ण आगाऊ मानधनाची अट आणि रक्कम ऐकून पळून गेले ते पुन्हा उगवले नाहीत.
>>> हे बाकी छान झाले !

In reply to by सुधीर कांदळकर

गवि 13/01/2020 - 08:20
अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती घोस्ट रायटर म्हणून काही व्यक्तींना एक मानधन रक्कम देऊन एखादे पुस्तक लिहून घेतात. माझ्याकडे दोनतीन इंग्रजी/मराठी प्रस्ताव आले होते. संपूर्ण आगाऊ मानधनाची अट आणि रक्कम ऐकून पळून गेले ते पुन्हा उगवले नाहीत.
एक उत्सुकता म्हणून विचारतो. त्या अटी मान्य असत्या (आगाऊ मानधन आणि रक्कम) तर घोस्ट रायटिंग या संकल्पनेला तुमची काही हरकत नाही का?

In reply to by गवि

सर टोबी 13/01/2020 - 14:21
म्हणून सर्वसमावेशक मत समजू नये. एकदा एका उत्साही आजोबांचे एक उपदेशपर लिखाण असलेले पुस्तक पुनर्लिखानासाठी माझ्याकडे आले होते. मजकूर आणि चित्रं अगोदरच त्यात होती. भाषा मात्र मिंग्लिश होती. "लिसन फ्रॉम वन इयर अँड लेट द एअर गो फ्रॉम अनादर इअर" अशी वाक्य होती. त्याचे सर्व पैसे एक रकमी मिळाले आणि घोस्ट रायटिंग म्हणजे काहीतरी गैर करतो आहोत असे वाटण्याचे काही कारणही नव्हते. परंतु कथा बीज आपलेच, ते फुलवण्याचे कसबही आपलेच परंतु नाव दुसऱ्याचे हा प्रकार उमेदीच्या दिवसांपर्यंतच ठीक वाटत असावा. कायम स्वरूपी नाही.

In reply to by सर टोबी

हेमंतकुमार 13/01/2020 - 14:50
प्रतिसाद आवडला. सहमत. माझा एक किस्सा. एकदा एक नात्यातील व्यक्ती एका प्रसंगाने खूप दुखावली होती. तिच्या डोक्यातून त्या कटू आठवणी काही जात नव्हत्या. मग मी तिला सुचवले की ते सगळे नामनिर्देश न करता लिहून मोकळी हो. तशा प्रकारच्या लेखनाचे एक सदर तेव्हा पेपरात होते. तिला ते पटले. ती क्षणभर सुखावली. पण तिला लेखनाची अजिबात सवय नव्हती. मग तिने मला विनंती केली. तिची परिस्थिती पाहून मी होकार दिला. मग तिला कच्चा आराखडा लिहून दिला आणि त्यात मुद्दाम काही बदल तिच्या भाषेत करायचे सुचवले. पुढे तिचा तो लेख प्रसिद्ध झाला. तो वाचल्याचे तिला बरेच जणांनी सांगितले. त्यातून तिला वेगळे समाधान मिळाले. ते पाहून मलाही बरे वाटले.

In reply to by सुधीर कांदळकर

हेमंतकुमार 17/02/2024 - 07:49
क्रीतलेखन (घोस्ट रायटिंग) केलेल्या एका इंग्लिश पुस्तकाने गतवर्षी एक गिनीज बुक विक्रम घडवला आहे : पुस्तकाचे नाव : Spare विषय : आत्मचरित्रात्मक जाहीर लेखक : Prince Harry, Duke of Sussex क्रीतलेखक : J. R. Moehringer (पुरस्कार प्राप्त पत्रकार) गिनीज विक्रम : बिगर काल्पनिका गटातील पुस्तकांत प्रकाशनानंतर पहिल्या 24 तासात 14.3 लाख प्रति विकल्या गेल्या.

काही विशिष्ट विचारसरणी असलेले काही प्रकाशक ती विचारसरणी जर असेल तर चांगले मानधन देऊन प्रकाशन करतात. पण ती विचारसरणी नसेल तर कितीही चांगले पुस्तक असले तरी स्वीकारत नाहीत. पण 'आमच्या वैचारिक धोरणात हे बसत नाही' असे स्पष्ट सांगतात. कालापव्यय करीत नाहीत.

हेमंतकुमार 13/01/2020 - 11:30
( अशोक जैन यांच्या अशोक-वन पुस्तकातून साभार !) १. शंकर पाटील यांनी ‘स्वराज्य’ला कथा दिली त्यावेळी त्याचे मानधन नगण्य होते. पण त्यांनी स्वराज्यचा खप खूप असल्याने कथा अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचणे अधिक महत्वाचे मानले. २. ना. ग. गोरे यांना ‘केसरी’त लिहील्याबद्दल ठराविक मानधन पाठवले होते. त्यांनी व्यवस्थापनाला सांगितले की आपली उपजीविका लेखनावरच असल्याने मानधन वाढवून द्यावे. ३. कुसुमाग्रजांच्या ‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी’ कवितेस ‘सकाळ’ने तब्बल ५००० रु. मानधन दिले होते. पुढे ती कविता सर्व सरकारी कार्यालयांत लावण्याचा आदेश तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी काढला होता. परंतु त्यासाठी मात्र कुसुमाग्रजांनी अजिबात मानधन घेतले नाही. ४. विजय तेंडूलकर मटासाठी एक साप्ताहिक सदर लिहीत. त्यासाठी ते मजकूर डीटीपी करून त्याची छापील प्रत पाठवीत. यासाठीचा त्यांचा होत असलेला खर्च त्यांना मानधनाव्यतिरिक्त दिला जाई.

अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींना आपल्या आयुष्यातले काही प्रसंग, हकीकती प्रसिद्ध करावयाच्या असतात. परंतु लेखन हे बहुतेकांना जमेलच असे नाही. त्या प्रसंगांच्या हकीकतींच्या शब्दांकनाचे काम घोस्ट रायटर म्हणून करायला हरकत नाही. परंतु कविता-कथा-कादंबर्‍या, ललित्/तांत्रिक लेख मात्र इतरांच्या नावाने लिहू नयेत. व्यक्ती वंदनीय पण आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यास, पुस्तकातून मिळणारे उत्पन्न त्या व्यक्तीलाच मिळणार असल्यास फुकटही करायला हरकत नाही. पण प्रकाशकच उत्पन्नाचा मोठा वाटेकरी असल्यास योग्य तो मोबतला नक्कीच घ्यावा.

In reply to by हेमंतकुमार

गामा पैलवान 14/01/2020 - 17:04
कुमारेक, क्रीतपुत्र म्हणजे विकंत घेतलेलं अपत्य. त्या धर्तीवर क्रीतलेखन म्हणजे विकंत घेतलेलं लेखन. क्रीतलेखक म्हणजे मोबदला देऊन करवून घेतलेलं लेखन. हा अर्थ जर मान्य नसेल तर पटलेखक हा ही एक पर्यायी शब्द होऊ शकतो. आ.न., -गा.पै.

In reply to by हेमंतकुमार

गवि 14/01/2020 - 17:47
शब्दांकन या शब्दाला बहुधा वेगळा अर्थ आहे. शब्दांकन करणारा मूळ व्यक्तीच्या विचारांची फक्त नीट शब्दांत मांडणी करतो. आणि त्याबद्दल शब्दांकन करणाऱ्याला ते श्रेय दिलं जातं. घोस्ट रायटिंगमध्ये प्रत्यक्ष शब्द लिहिणारी व्यक्ती नेहमीच अज्ञात राहणं अपेक्षित असावं.

In reply to by गवि

हेमंतकुमार 20/04/2022 - 16:12
क्रिकेटपटू पतौडी आणि कपिल देव यांच्यासाठी क्रीतलेखन (घोस्ट रायटिंग) केलेल्या सुरेश मेनन यांच्या पुस्तकाचा परिचय: https://www.asianage.com/amp/books/160422/book-review-of-writers-ghostwriters-and-the-magic-of-written-words.html

हेमंतकुमार 14/01/2020 - 17:42
क्रीतलेखक
>>> ठीक आहे.
लेखनिक
>>> नाही पटत. कारण एखाद्या लेखकाने जर पगारी कारकून लेखनासाठी (म्हणजे सांगितलेले उतरवून घ्यायला ) ठेवला तर तो लेखनिक असेल.

हेमंतकुमार 14/01/2020 - 18:03
पटलेखक >>>> हा नाही पटला. समजा, एखाद्याने स्वतः 'पटकथा' लिहीली, तर तोच पटलेखक ठरेल. @ गवि, बरोबर. अलीकडे अनेक वलयांकित व्यक्तींच्या वतीने अनेक लेखक शब्दांकन करीत आहेत आणि त्यांना पुस्तकाच्या मुखपृष्ठावर ही स्थान मिळते. मागे एका दिवाळी अंकात शब्दांकन या कलेवर लेख आला होता.

हेमंतकुमार 15/01/2020 - 14:05
पटलेखक व पटकथाकार वेगळे धरायचे ना?
>>>> बरोबर. तरीही पटलेखक हा खरा लेखक होईल असे वाटते. जालकोश तर चक्क "भूतलेखक " असे भाषांतर देतोय !

हेमंतकुमार 13/07/2021 - 12:36
वृत्तमाध्यमे आणि लेखकांचे मानधन या विषयावरील एक वास्तवदर्शी लेख त्यातील हे वाक्य फारच मार्मिक :
अगदी मोजकी प्रथितयश वृत्तपत्रे, नियतकालिके सोडून उरलेली ‘तुम्हाला फुकट लिहायचे तर लिहा नाहीतर नका पाठवू’ असा अलिखित बाणा घेऊन उभी असतात.

टर्मीनेटर 13/07/2021 - 13:53
अजून एक मराठीतले प्रसिद्ध रहस्यकथा लेखक माहित आहेत ज्यांची उपजीविका लेखानातून मिळणाऱ्या मानधनावर चालायची. एका मिश्रवापर इमारतीच्या तळमजल्यावर माझ्या काकांचे वर्कशॉप होते. त्याच्या विरुद्ध दिशेला असलेल्या २ खोल्यांमध्ये हे लेखक महाशय आणि त्यांची आई रहात असत. मी साधारण दहावी - अकरावीत असताना त्यांची ओळख काकांनी करुन दिली होती. एकंदरीत लेखक आणि त्यांच्या जीवनशैली बद्दल त्यावेळी असलेल्या माझ्या भ्रामक समजूतींना त्यावेळी तडा गेला होता. सुहास शिरवळकर, गुरुनाथ नाईक, शरचंद्र वाळिंबे अशा रहस्यकथा लेखकांचे समकालीन, आणि वाचकप्रिय असलेले हे लेखक महाशय कायम लुंगी आणि बनियानवर तोंडात सिगरेट धरून एका लाकडी टेबल खुर्चीवर बसून लेखन करत बसलेले दिसायचे किंवा सतरंजीवर ऐसपैस पसरून (देशी) दारू पिताना दिसायचे. आता ते हयात नसल्याने त्यांचे नाव जाहीर करुन मृत्यूपश्चात त्यांची बदनामी करणे योग्य वाटत नाही! असो लेख आवडला, धमाल किस्से लेखातून आणि प्रतिसादांतून वाचायला मिळाले.

In reply to by टर्मीनेटर

चौथा कोनाडा 19/07/2021 - 13:12
" मिश्रवापर इमारत " छान आहे हा शब्द. पुढे हा शब्द वापरीन.
अजून एक मराठीतले प्रसिद्ध रहस्यकथा लेखक माहित आहेत
त्यांचे नाव जाहीर करुन मृत्यूपश्चात त्यांची बदनामी करणे योग्य वाटत नाही!
साधारणपणे ओळखू आलेत. नावाचे सरुवात अक्षर ना आणि आडनावाचे मधले अक्षर र आहे ना ? नाव जाहीर न करण्याचा संकेत आजकाल पाळला जात नाही असे दिसते. आता हेच लेख पहा ना, किती चर्चा झाली या लेखामुळे: https://www.loksatta.com/lokrang-news/story-of-shantabai-by-subhash-awchat-shantabai-paintings-by-subhash-awchat-zws-70-2496802/ याच मालिकेत असे आणखी काही लेख आहेत. आरती प्रभूंच्या लेखामुळे तर वादळ उठलं होतं !

हेमंतकुमार 12/06/2022 - 16:20
प्रसिद्ध चरित्रकार वीणा गवाणकर यांनी नुकतेच वयाच्या ८०व्या वर्षांत पर्दापण केले आहे. त्यानिमित्ताने ९ जून २०२२ रोजी त्यांचा राजहंस प्रकाशनाकडून मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. एखाद्या लेखकाचा अशा प्रकारे सत्कार-सन्मान करण्याचा हा मराठीतला दुर्मीळ प्रसंग आहे. अभिनंदन !!

हेमंतकुमार 15/05/2023 - 09:01
मोलें घातले खरडाया… प्रवीण टोकेकर यांचा एक सुंदर लेख https://epaper.esakal.com/FlashClient/Client_Panel_ipad.aspx?One#currPage=1 आजच्या मुख्य अंकात पान ७ वर आहे. अमेरिकेच्या हॉलीवुडमधील चित्रपट आणि टीव्ही मालिकांचे लेखक सध्या संपावर गेलेले आहेत. मागणी अर्थातच: तुटपुंजे मानधन वाढवावे ही आहे !

In reply to by अहिरावण

हेमंतकुमार 22/02/2024 - 11:55
विंदा करंदीकर यांचे हे अवतरण आहे :
आमचे प्रकाशक हस्तलिखितावर इतकं प्रेम करतात की ते मुद्रकाला देण्याची कल्पनाच त्यांना अनेक वर्षे सहन होत नाही !

विवेकपटाईत 23/02/2024 - 16:54
हजारो रुपये खर्च करून पुस्तक प्रकाशित करा. ५०० प्रति ही विकल्या जात नाही. ( एका लेखकाचा अनुभव. त्यापेक्षा मिसळपाव बरे.कितीही बेक्कार लेखन असेल, कीतीही अशुध्द असेल.तरीही ५०० च्या वर वाचतात. प्रतिसाद ही भरपूर देतात. प्रतिसाद वाचताना न खर्च केलेले पैसे ही वसूल होतात.

In reply to by हेमंतकुमार

शा वि कु 30/12/2019 - 19:57
नारायण कम्युनिस्ट चळवळीतून बाहेर पडून आता mnc मध्ये नोकरी करत असतो. तर चांगदेव नोकरीसाठी मुंबई सोडून लहान गावात चालला असतो. नारायणाने mnc मध्ये मोठ्या पगारासाठी नोकरी घेऊन तत्वांशी प्रतारणा केली आहे असं मित्रमंडळींचं म्हणणं असतं. तर चांगदेव आणि नारायण नारायणाच्या बीचला लागून असलेल्या आलिशान घरात बसून बियर पित गप्पा मारत असतात. तर विषयाशी सम्बंधित म्हणजे नारायण सांगत असतो की सारंग नावाच्या त्यांच्या एका मित्राला एका प्रथितयश प्रकाशकाने कस फसवलं. या अनुषंगाने तो पुढं मराठी प्रकाशक संस्कृती, देश याबद्दल भरभरून बोलतील पण रॉयल्टीच नाव काढलं तरी टाळाटाळ करतील असं बोलतो. तो त्याचा स्वतःचा अनुभव सांगतो. त्यानं मुंबईच्या भूमिगत चळवळींबद्दल स्वानुभवाने पुस्तक लिहिले असते, जे इंग्लड मधला एक प्रकाशक प्रसिद्ध करतो. तर नारायणला इंग्लड मधल्या प्रकाशकाचे प्रोफेशनल वागणे प्रचण्ड आवडते.प्रकाशनपूर्वी रॉयल्टी, किती प्रति छापणार, आवृत्या, सगळी सुस्पष्ट चर्चा त्या प्रकाशनाने केली असते. यापुढे मराठीत लिखाण करणार नसल्याच सुद्धा नारायण सांगतो.

१. मिपासारख्याच संस्थळावर सुप्रसिद्ध मराठी मासिकात अबक विषयावर लेख पाहिजेत. पसंत पडल्यास योग्य ते मानधन दिले जाईल अशी उद्घोषणा आली. मी लेख पाठवला. प्रसिद्ध झाला आणि रु. २५०/- मानधन मनी ऑर्डरने महिन्याभरात आले देखील. साल होते २००८ किंवा २००९. २. हा अनुभव साहित्याविषयी नाही. अध्यापन-साहित्याबद्दल आहे. एका व्यवस्थापन शास्त्राचे अध्यापक असलेल्या खास स्नेह्यांना अध्यापनासाठी संपूर्ण अभ्यासक्रमाची एकूण ४०-५० पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन्स बनवून दिली. आणि काही कच्चे प्रबंध बनवून दिले. खरे तर टाईम पास म्हणून दोस्तीखात्यातच बनवून दिले होते. पण त्यांनी चारसहा महिन्यातच आपणहून माझा बँक अकाउंट वगैरे तपशील घेऊन वाजवी मोबदला पाठवला जो ५० हजारांच्या आसपास होता. पण त्यातला मजकूर लिहितांना, आकृत्या काढतांना, चित्रे डकवतांना आणि मुख्य म्हणजे अभ्यासक्रमातल्या माझ्या सत्राशे पन्नास शंकांचे निरसन त्यांच्याकडून करून घेतांना केलेल्या चर्चांतून सर्जनशीलतेचा अपूर्व अवर्णनीय असा आनंद मिळाला. त्याची किंमत करता येणार नाही. ३. इथे सरळ लबाड प्रकाशनाचे नावच देतो. विचक्षण प्रकाशन. त्यांच्या कार्यालयातून श्री परदेशी यांचा फोन आला. ई - पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध करण्यासठी साहित्य पाहिजे. त्यांची वेबसाईट पाहिली. अनेक पुस्तके अजूनही दिसतात. त्यांना मिपावरचे ओरिसातले प्रवासवर्णन पसंत आले. पाठवले. मग दोन हजार रु. नोंदणी शुल्क द्यावे लागेल म्हणाले. नंतर पुस्तक विक्री मधून तुमचे पैसे वसूल होतील. फारतर अक्कलखाती जमा होतील अशा अपेक्षेने मी त्यांच्या अमरावतीच्या बँक खात्यावर आरञीजीएसने पैसे पाठवले. त्यांनी चित्रे डिझाईन वगैरे मला पाठवली. मी निवडही पाठवली. मुद्रितशोधनासाठी मला त्यांनी प्रत पाठवली. टायपिंगमध्ये अगणित चुका होत्या. दुरुस्ती पाठवली. त्यांनी नवे प्रूफ पाठवले. पुन्हा वेगळ्या अगणित चुका. पुन्हा दुरुस्ती पाठवली. असे चार वेळा झाले. मग मी नाद सोडला. चोर लोक आहेत. त्यांना माझ्याकडून फक्त २,००० रु. उकळायचे होते. नंतर मी ई मेलने स्मरणे पाठवली अर्थातच प्रतिसाद आला नाही. आता त्यांनी हे वाचून माझ्यावर मानहानीचा खटला घातला तर मज्जा येईल कारण मी सारे पुरावे ठेवलेले आहेत. असो. छान लेख. पहिले दोन्ही अनुभव फार चांगले आहेत. ते लिहावेसे वाटलेच. तिसरा मजेशीर.

In reply to by सुधीर कांदळकर

हेमंतकुमार 30/12/2019 - 20:50
शा वि कु, धन्यवाद. रोचक. सुधीर, रोचक किस्से. पहिल्या २ बद्दल तुमचे अभिनंदन आणि तिसऱ्यासाठी सहानुभूती !

जॉनविक्क 30/12/2019 - 20:40
त्यांच्या प्रथम दिवाळी अंकाच्या छापील प्रतीचे प्रकाशनात घोड चूक झाली व चक्क मूळ लेखकाचे नावा ऐवजी भलत्याचे नाव जोडले गेले. पुढील कळस तर असा आहे की आम्ही प्रकाशक म्हणजे देव, आमचे(हौशी) कष्ट म्हणजे म्हणजे लेखकांवर उपकार त्यामुळे आम्ही कष्ट करताना चुक्लो असल्याने आमचो कोरी दिलगिरी मान्य करा,बाकी काही याघाडीस होणार नाही काय कारायाचे ते करा हवं ते समजा अशी मानसिकता वरून प्रदर्शित केली.

मित्रहो 31/12/2019 - 08:05
एकाने तुमचा हा लेख आवडला आम्ही घेऊ का अशी परवानगी घेतली. मानधनाविषयी काही बोलणे झाले नव्हते. त्यांनी अंक पाठविला आणि त्यात मानधन सुद्धा त्याच लिफाफ्यात पाठविले. फार गंमत वाटली. ही फार जुनी गोष्ट आहे. तुमचा अमुक अमुक लेख आवडला आम्ही दिवाळी अंकासाठी घेऊ का, योग्य ते मानधन दिले जाईल. अंक छापला गेला पण अकं नाही की मानधन नाही. विचारणा केली असता ते चुकुन राहिले, दोन्ही आताच पाठविले असे सांगण्यात आले. आठवडाभराने अंक आले पण मानधनाचा चेक नाही. मानधनाची चौकशी केली असता सांगितले की इतरत्र आधीच प्रकाशित असल्याने मानधन मिळणार नाही. प्रश्न मानधनाचा नव्हता तो होता तो पारदर्शकतेचा. हेच आधी सांगायला हवे होते. लेखक झोलावाला असतो , तो आमच्याकडे खेटे घालणार, मग आम्ही छापणार, मग आम्ही वाटेल तेवढे पैसे देणार. या साऱ्या व्यवहाराला आम्ही मराठी साहित्याची सेवा करतोय, किंवा तुम्हाला व्यासपीठ मिळवून देतोय असा पवित्रा घेणार. मुळात प्रवृत्ती पैसे देण्याची नसते. हौशी लेखकांसाठी प्रश्न पैशाचा नसतो पण व्यवहारात पारदर्शकता नसेल तर याचा अधिक मनस्ताप हौशी लेखकाला होतो. तो हौशेखातर लिहित असतो. मानधन नाही असे सांगितले तरी तो हौशेसाठी लिहिणार पण मानधन देतो सांगायचे आणि द्यायचे नाही हे चुकीचे आहे. अशातही सारे व्यवहार सचोटीने करणारे सुद्धा काही प्रकाशक असतात. माझ्या मते तरी हल्लीच्या काळात इंटरनेटच्या माध्यमातून छापील माध्यमापेक्षा अधिकाधिक वाचकापर्यंत पोहचता येते.

हेमंतकुमार 31/12/2019 - 08:30
जॉन व मित्रहो, +१
माझ्या मते तरी हल्लीच्या काळात इंटरनेटच्या माध्यमातून छापील माध्यमापेक्षा अधिकाधिक वाचकापर्यंत पोहचता येते.
>>>>>> सहमत.

सुबोध खरे 31/12/2019 - 10:43
माझे पण दोन चार लेख कोणत्या कोणत्या मासिकात छापून आले आहेत. परंतु त्याच्या मानधना विषयी मी काही बोलणं केला नाही आणि त्यांनीही दिलं नाही. मुळात हे लेख नौदलाबद्ल होते ज्यातून तरुणांना स्फूर्ती मिळून ते लष्कराकडे एक चांगली करियरची संधी म्हणून बघतील असा माझा दृष्टिकोन होता म्हणून मी ते फारसे मनावर घेतले नाही किंवा काही अपेक्षा केली नाही. परंतु लेखकाला "वाजवी" मानधन मिळालेच पाहिजे याच्याशी मी संपूर्णपणे सहमत आहे. अशी स्थिती केवळ लेखकाचीच आहे असे नाही तर सर्वच व्यवसायात दिसून येते. कापड उद्योगात होतकरू चित्रकारांकडून डिझाईन मागवली जातात बघून सांगतो म्हणून ती ठेवायला सांगतात आणि एका रात्रीत त्याची रंगीत झेरॉक्स काढूनघेतली जाते. दुसऱ्या दिवशी चित्रकाराला डिझाईन आवडली नाहीत हे केली जातात आणि काही दिवसांनी तीच डिझाईन बाजारात सर्व तर्हेच्या कपड्यावर दिसायला लागतात. एक अत्यंत प्रथितयश हृदय शल्यक्रिया चिकित्सकाला तो नवोदित असताना एका प्रथितयश हृदयविकार तज्ज्ञाने केवळ १५००० रुपयात हृदयाची बायपास शल्यक्रिया करण्यास भाग पाडले होते. याची चीड येऊन त्याने एक देशातील मोठे हृदय रोग रुग्णालय उभे केले मोठा मासा छोट्या माशाला गिळतो हे सर्वच क्षेत्रात दिसते म्हणून प्रथितयश झाल्याशिवाय कोणत्याही लेखकाला केवळ लेखनावर पोट भरणे आपल्या देशात शक्य होत नाही.

हेमंतकुमार 31/12/2019 - 11:27
लेखनाचे मानधन ? ते काय असते ?
>> काय राव, लेखकांनीच असं विचारल्यावर कसं व्हायचं !
प्रथितयश झाल्याशिवाय कोणत्याही लेखकाला केवळ लेखनावर पोट भरणे आपल्या देशात शक्य होत नाही.
>>> अगदी. प्रादेशिक भाषेतील लेखनावर तर खूप कठीण .

In reply to by मित्रहो

हेमंतकुमार 01/01/2020 - 09:08
इथे मला पुलं ची प्रकर्षाने आठवण होतेय. आयुष्याचा थोडा काळ नोकरी आणि पुढे ती सोडून दीर्घ काळ लेखनावर (आणि अन्य कला) चरितार्थ. असे दुसरे उदा मराठीत आहे का? जाणकारांनी प्रकाश टाकावा.

In reply to by हेमंतकुमार

Nitin Palkar 01/01/2020 - 21:13
जाणकार नव्हे पण माहिती असल्याने .... 'रमेश मंत्री'. केवळ लेखनावर उपजिवीका करणाऱ्या इन्यागिन्या मराठी लेखकांमध्ये हे नाव होते. रमेश मंत्री बहुतेक युसीसमध्ये नोकरीला होते (जयवंत दळवींप्रमाणे). पण नंतर नोकरी सोडून केवळ लेखन करत होते. १९७९ या एकाच वर्षात ३४ पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. १९९१ सालच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेले आहे.

In reply to by Nitin Palkar

हेमंतकुमार 02/01/2020 - 08:33
नि पा, मंत्री यांच्या माहितीसाठी धन्यवाद. त्यांच्या एका पुस्तकातले एक विधान माझे आवडते आहे. ते असे : "या दशकातील जागतिक परिस्थिती गंभीर होती", यासारखे दुसरे विनोदी विधान नाही ! (परिस्थिती कायमच गंभीर असते, कुठल्या दशकात नव्हती? ).

In reply to by प्रकाश घाटपांडे

हेमंतकुमार 05/11/2021 - 10:37
यांना आदरांजली वाहणारा एक लेख इथे आहे. त्यातले निवडक :
आपल्या पुस्तकांच्या कमाईतून श्रीमंती मिळवणारे एक मराठी लेखक म्हणून नाईक यांना ओळखलं जातं. मात्र नंतर या लेखकावर आर्थिक संकट कोसळलं.

गवि 31/12/2019 - 11:32
अनेक ठिकाणी लेखकाला भीड पडल्याने त्याने मानधनाचा विषय आपणहून न काढणे, किंवा त्याबद्दल काहीच स्पष्टता नसतानाही गप्प राहणे असं केलेलं दिसतं. सर्वसाधारणपणे लेखक क्रिएटिव्ह असला तरी या क्षेत्रात धंदेवाईक नसतो. कलाकार, निर्मितीक्षम, सृजनशील अशा शब्दांतून एकदम रुपये, पैसे, देणे घेणे, घासाघीस या व्यावहारिक पातळीवर येणं संकोचजनक होत असावं. विशेषतः आपण त्या क्षेत्रात आधीच प्रसिद्ध नसल्यास.

In reply to by प्रकाश घाटपांडे

अनिंद्य 31/12/2019 - 12:16
:-) आहेत. माझ्या ओळखीत आहेत. मग ते पुस्तक 'साभार' प्रत्येक येणाऱ्या-जाणाऱ्याला स्वहस्ते देऊन फोटो काढून घेणे वगैरे...

हेमंतकुमार 31/12/2019 - 18:15
घासाघीस या व्यावहारिक पातळीवर येणं संकोचजनक होत असावं >>> बरोबर, व्यवहार शिकायला लेखकाला वेळ लागतो. प्रथितयश प्रकाशकाला जास्त मानधन मिळत असावे :) >>> अगदी ! अशा बऱ्याच हौशी लेखकांनी प्रकाशकाला श्रीमंत केले आहे ! आहेत. माझ्या ओळखीत आहेत. फोटो, सत्कार ... >>> खरंय, अगदी उबग येतो अशा कार्यक्रमाचा.

हेमंतकुमार 03/01/2020 - 13:39
नुकतेच दुसरे लेखक-प्रकाशक संमेलन चिपळूण येथे झाले. त्यातील "वाचनसंस्कृती टिकून राहील" या अध्यक्षीय भाषणाचा गोषवारा इथे : https://m.maharashtratimes.com/editorial/samwad/the-culture-of-reading-will-survive/articleshow/73002182.cms

सुहास शिरवळकर सुध्द्दा पूर्ण वेळ लेखन करत असत. त्यांच्या फलश्रुती ह्या पुस्तकात कादंबरीसाठी विषय हुडकण्यासाठी काय काय खटपटी कराव्या लागत असत ह्याबाबत उल्लेख आहेत.

हेमंतकुमार 06/01/2020 - 11:37
लेखनावर उपजीविका केलेले ४ मराठी लेखक प्रतिसादांतून कळले: पुलं रमेश मंत्री निरंजन घाटे सु शि. ..... माहितगारांनी अजून भर घालावी !

हेमंतकुमार 12/01/2020 - 17:45
या लेखात जो खालील किस्सा दिला आहे त्याबद्दल थोडे अधिक :
“सदर लेख आम्ही तुमच्याकडून मागवून तुम्हास कष्ट दिलेले आहेत. त्यामुळे आम्ही मानधन देणे लागतो, पण तुमचा लेख पसंत नसल्याने साभार परत करीत आहोत”
.... हा किस्सा छापलेले पुस्तक आज मी माळ्यावरून हुडकून काढले. अशोक जैन लिखित 'अशोक-वन' असे त्याचे नाव आहे. किस्सा त्यातील असल्याने आता संबंधितांची नावे लिहितो. लेखक : ना. सी. फडके लेख नाकारणारे संपादक : द्वा. भ. कर्णिक.

उपजीविकेसाठी अन्य काही व्यवसाय करायचे की नाही ठाऊक नाही. मराठी जनतेच्या तीनचार पिढ्यांच्या इंग्रजीच्या ज्ञानाला आकार देणारे द्वारकानाथ राघोबा तर्खडकर हे असेच दुसरे नाव घेता येईल. हे पंचांग देखील काढीत. शिक्षकी/प्राध्यापकी पेशात जम बसलेले काही तर काही जम न बसलेले अनेक लोक पाठ्यपुस्तक लेखन वा गाइडे काढून चांगली कमाई करतात. तर काही गाईड प्रकाशनात जम बसलेले चलाख प्रकाशक जम न बसलेल्या नवख्या शिक्षकांकडून कवडीकिंमतीत वा फुकटात गाइडे लिहून घेऊन बक्कळ पैसा कमावतात. अनेक वेळा गाईड प्रीस्क्राईब करणार्‍या शिक्षकांना मोबदला दिला जातो. अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती घोस्ट रायटर म्हणून काही व्यक्तींना एक मानधन रक्कम देऊन एखादे पुस्तक लिहून घेतात. माझ्याकडे दोनतीन इंग्रजी/मराठी प्रस्ताव आले होते. संपूर्ण आगाऊ मानधनाची अट आणि रक्कम ऐकून पळून गेले ते पुन्हा उगवले नाहीत.

In reply to by सुधीर कांदळकर

हेमंतकुमार 13/01/2020 - 07:48
प्रस्ताव आले होते. संपूर्ण आगाऊ मानधनाची अट आणि रक्कम ऐकून पळून गेले ते पुन्हा उगवले नाहीत.
>>> हे बाकी छान झाले !

In reply to by सुधीर कांदळकर

गवि 13/01/2020 - 08:20
अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती घोस्ट रायटर म्हणून काही व्यक्तींना एक मानधन रक्कम देऊन एखादे पुस्तक लिहून घेतात. माझ्याकडे दोनतीन इंग्रजी/मराठी प्रस्ताव आले होते. संपूर्ण आगाऊ मानधनाची अट आणि रक्कम ऐकून पळून गेले ते पुन्हा उगवले नाहीत.
एक उत्सुकता म्हणून विचारतो. त्या अटी मान्य असत्या (आगाऊ मानधन आणि रक्कम) तर घोस्ट रायटिंग या संकल्पनेला तुमची काही हरकत नाही का?

In reply to by गवि

सर टोबी 13/01/2020 - 14:21
म्हणून सर्वसमावेशक मत समजू नये. एकदा एका उत्साही आजोबांचे एक उपदेशपर लिखाण असलेले पुस्तक पुनर्लिखानासाठी माझ्याकडे आले होते. मजकूर आणि चित्रं अगोदरच त्यात होती. भाषा मात्र मिंग्लिश होती. "लिसन फ्रॉम वन इयर अँड लेट द एअर गो फ्रॉम अनादर इअर" अशी वाक्य होती. त्याचे सर्व पैसे एक रकमी मिळाले आणि घोस्ट रायटिंग म्हणजे काहीतरी गैर करतो आहोत असे वाटण्याचे काही कारणही नव्हते. परंतु कथा बीज आपलेच, ते फुलवण्याचे कसबही आपलेच परंतु नाव दुसऱ्याचे हा प्रकार उमेदीच्या दिवसांपर्यंतच ठीक वाटत असावा. कायम स्वरूपी नाही.

In reply to by सर टोबी

हेमंतकुमार 13/01/2020 - 14:50
प्रतिसाद आवडला. सहमत. माझा एक किस्सा. एकदा एक नात्यातील व्यक्ती एका प्रसंगाने खूप दुखावली होती. तिच्या डोक्यातून त्या कटू आठवणी काही जात नव्हत्या. मग मी तिला सुचवले की ते सगळे नामनिर्देश न करता लिहून मोकळी हो. तशा प्रकारच्या लेखनाचे एक सदर तेव्हा पेपरात होते. तिला ते पटले. ती क्षणभर सुखावली. पण तिला लेखनाची अजिबात सवय नव्हती. मग तिने मला विनंती केली. तिची परिस्थिती पाहून मी होकार दिला. मग तिला कच्चा आराखडा लिहून दिला आणि त्यात मुद्दाम काही बदल तिच्या भाषेत करायचे सुचवले. पुढे तिचा तो लेख प्रसिद्ध झाला. तो वाचल्याचे तिला बरेच जणांनी सांगितले. त्यातून तिला वेगळे समाधान मिळाले. ते पाहून मलाही बरे वाटले.

In reply to by सुधीर कांदळकर

हेमंतकुमार 17/02/2024 - 07:49
क्रीतलेखन (घोस्ट रायटिंग) केलेल्या एका इंग्लिश पुस्तकाने गतवर्षी एक गिनीज बुक विक्रम घडवला आहे : पुस्तकाचे नाव : Spare विषय : आत्मचरित्रात्मक जाहीर लेखक : Prince Harry, Duke of Sussex क्रीतलेखक : J. R. Moehringer (पुरस्कार प्राप्त पत्रकार) गिनीज विक्रम : बिगर काल्पनिका गटातील पुस्तकांत प्रकाशनानंतर पहिल्या 24 तासात 14.3 लाख प्रति विकल्या गेल्या.

काही विशिष्ट विचारसरणी असलेले काही प्रकाशक ती विचारसरणी जर असेल तर चांगले मानधन देऊन प्रकाशन करतात. पण ती विचारसरणी नसेल तर कितीही चांगले पुस्तक असले तरी स्वीकारत नाहीत. पण 'आमच्या वैचारिक धोरणात हे बसत नाही' असे स्पष्ट सांगतात. कालापव्यय करीत नाहीत.

हेमंतकुमार 13/01/2020 - 11:30
( अशोक जैन यांच्या अशोक-वन पुस्तकातून साभार !) १. शंकर पाटील यांनी ‘स्वराज्य’ला कथा दिली त्यावेळी त्याचे मानधन नगण्य होते. पण त्यांनी स्वराज्यचा खप खूप असल्याने कथा अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचणे अधिक महत्वाचे मानले. २. ना. ग. गोरे यांना ‘केसरी’त लिहील्याबद्दल ठराविक मानधन पाठवले होते. त्यांनी व्यवस्थापनाला सांगितले की आपली उपजीविका लेखनावरच असल्याने मानधन वाढवून द्यावे. ३. कुसुमाग्रजांच्या ‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी’ कवितेस ‘सकाळ’ने तब्बल ५००० रु. मानधन दिले होते. पुढे ती कविता सर्व सरकारी कार्यालयांत लावण्याचा आदेश तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी काढला होता. परंतु त्यासाठी मात्र कुसुमाग्रजांनी अजिबात मानधन घेतले नाही. ४. विजय तेंडूलकर मटासाठी एक साप्ताहिक सदर लिहीत. त्यासाठी ते मजकूर डीटीपी करून त्याची छापील प्रत पाठवीत. यासाठीचा त्यांचा होत असलेला खर्च त्यांना मानधनाव्यतिरिक्त दिला जाई.

अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींना आपल्या आयुष्यातले काही प्रसंग, हकीकती प्रसिद्ध करावयाच्या असतात. परंतु लेखन हे बहुतेकांना जमेलच असे नाही. त्या प्रसंगांच्या हकीकतींच्या शब्दांकनाचे काम घोस्ट रायटर म्हणून करायला हरकत नाही. परंतु कविता-कथा-कादंबर्‍या, ललित्/तांत्रिक लेख मात्र इतरांच्या नावाने लिहू नयेत. व्यक्ती वंदनीय पण आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यास, पुस्तकातून मिळणारे उत्पन्न त्या व्यक्तीलाच मिळणार असल्यास फुकटही करायला हरकत नाही. पण प्रकाशकच उत्पन्नाचा मोठा वाटेकरी असल्यास योग्य तो मोबतला नक्कीच घ्यावा.

In reply to by हेमंतकुमार

गामा पैलवान 14/01/2020 - 17:04
कुमारेक, क्रीतपुत्र म्हणजे विकंत घेतलेलं अपत्य. त्या धर्तीवर क्रीतलेखन म्हणजे विकंत घेतलेलं लेखन. क्रीतलेखक म्हणजे मोबदला देऊन करवून घेतलेलं लेखन. हा अर्थ जर मान्य नसेल तर पटलेखक हा ही एक पर्यायी शब्द होऊ शकतो. आ.न., -गा.पै.

In reply to by हेमंतकुमार

गवि 14/01/2020 - 17:47
शब्दांकन या शब्दाला बहुधा वेगळा अर्थ आहे. शब्दांकन करणारा मूळ व्यक्तीच्या विचारांची फक्त नीट शब्दांत मांडणी करतो. आणि त्याबद्दल शब्दांकन करणाऱ्याला ते श्रेय दिलं जातं. घोस्ट रायटिंगमध्ये प्रत्यक्ष शब्द लिहिणारी व्यक्ती नेहमीच अज्ञात राहणं अपेक्षित असावं.

In reply to by गवि

हेमंतकुमार 20/04/2022 - 16:12
क्रिकेटपटू पतौडी आणि कपिल देव यांच्यासाठी क्रीतलेखन (घोस्ट रायटिंग) केलेल्या सुरेश मेनन यांच्या पुस्तकाचा परिचय: https://www.asianage.com/amp/books/160422/book-review-of-writers-ghostwriters-and-the-magic-of-written-words.html

हेमंतकुमार 14/01/2020 - 17:42
क्रीतलेखक
>>> ठीक आहे.
लेखनिक
>>> नाही पटत. कारण एखाद्या लेखकाने जर पगारी कारकून लेखनासाठी (म्हणजे सांगितलेले उतरवून घ्यायला ) ठेवला तर तो लेखनिक असेल.

हेमंतकुमार 14/01/2020 - 18:03
पटलेखक >>>> हा नाही पटला. समजा, एखाद्याने स्वतः 'पटकथा' लिहीली, तर तोच पटलेखक ठरेल. @ गवि, बरोबर. अलीकडे अनेक वलयांकित व्यक्तींच्या वतीने अनेक लेखक शब्दांकन करीत आहेत आणि त्यांना पुस्तकाच्या मुखपृष्ठावर ही स्थान मिळते. मागे एका दिवाळी अंकात शब्दांकन या कलेवर लेख आला होता.

हेमंतकुमार 15/01/2020 - 14:05
पटलेखक व पटकथाकार वेगळे धरायचे ना?
>>>> बरोबर. तरीही पटलेखक हा खरा लेखक होईल असे वाटते. जालकोश तर चक्क "भूतलेखक " असे भाषांतर देतोय !

हेमंतकुमार 13/07/2021 - 12:36
वृत्तमाध्यमे आणि लेखकांचे मानधन या विषयावरील एक वास्तवदर्शी लेख त्यातील हे वाक्य फारच मार्मिक :
अगदी मोजकी प्रथितयश वृत्तपत्रे, नियतकालिके सोडून उरलेली ‘तुम्हाला फुकट लिहायचे तर लिहा नाहीतर नका पाठवू’ असा अलिखित बाणा घेऊन उभी असतात.

टर्मीनेटर 13/07/2021 - 13:53
अजून एक मराठीतले प्रसिद्ध रहस्यकथा लेखक माहित आहेत ज्यांची उपजीविका लेखानातून मिळणाऱ्या मानधनावर चालायची. एका मिश्रवापर इमारतीच्या तळमजल्यावर माझ्या काकांचे वर्कशॉप होते. त्याच्या विरुद्ध दिशेला असलेल्या २ खोल्यांमध्ये हे लेखक महाशय आणि त्यांची आई रहात असत. मी साधारण दहावी - अकरावीत असताना त्यांची ओळख काकांनी करुन दिली होती. एकंदरीत लेखक आणि त्यांच्या जीवनशैली बद्दल त्यावेळी असलेल्या माझ्या भ्रामक समजूतींना त्यावेळी तडा गेला होता. सुहास शिरवळकर, गुरुनाथ नाईक, शरचंद्र वाळिंबे अशा रहस्यकथा लेखकांचे समकालीन, आणि वाचकप्रिय असलेले हे लेखक महाशय कायम लुंगी आणि बनियानवर तोंडात सिगरेट धरून एका लाकडी टेबल खुर्चीवर बसून लेखन करत बसलेले दिसायचे किंवा सतरंजीवर ऐसपैस पसरून (देशी) दारू पिताना दिसायचे. आता ते हयात नसल्याने त्यांचे नाव जाहीर करुन मृत्यूपश्चात त्यांची बदनामी करणे योग्य वाटत नाही! असो लेख आवडला, धमाल किस्से लेखातून आणि प्रतिसादांतून वाचायला मिळाले.

In reply to by टर्मीनेटर

चौथा कोनाडा 19/07/2021 - 13:12
" मिश्रवापर इमारत " छान आहे हा शब्द. पुढे हा शब्द वापरीन.
अजून एक मराठीतले प्रसिद्ध रहस्यकथा लेखक माहित आहेत
त्यांचे नाव जाहीर करुन मृत्यूपश्चात त्यांची बदनामी करणे योग्य वाटत नाही!
साधारणपणे ओळखू आलेत. नावाचे सरुवात अक्षर ना आणि आडनावाचे मधले अक्षर र आहे ना ? नाव जाहीर न करण्याचा संकेत आजकाल पाळला जात नाही असे दिसते. आता हेच लेख पहा ना, किती चर्चा झाली या लेखामुळे: https://www.loksatta.com/lokrang-news/story-of-shantabai-by-subhash-awchat-shantabai-paintings-by-subhash-awchat-zws-70-2496802/ याच मालिकेत असे आणखी काही लेख आहेत. आरती प्रभूंच्या लेखामुळे तर वादळ उठलं होतं !

हेमंतकुमार 12/06/2022 - 16:20
प्रसिद्ध चरित्रकार वीणा गवाणकर यांनी नुकतेच वयाच्या ८०व्या वर्षांत पर्दापण केले आहे. त्यानिमित्ताने ९ जून २०२२ रोजी त्यांचा राजहंस प्रकाशनाकडून मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. एखाद्या लेखकाचा अशा प्रकारे सत्कार-सन्मान करण्याचा हा मराठीतला दुर्मीळ प्रसंग आहे. अभिनंदन !!

हेमंतकुमार 15/05/2023 - 09:01
मोलें घातले खरडाया… प्रवीण टोकेकर यांचा एक सुंदर लेख https://epaper.esakal.com/FlashClient/Client_Panel_ipad.aspx?One#currPage=1 आजच्या मुख्य अंकात पान ७ वर आहे. अमेरिकेच्या हॉलीवुडमधील चित्रपट आणि टीव्ही मालिकांचे लेखक सध्या संपावर गेलेले आहेत. मागणी अर्थातच: तुटपुंजे मानधन वाढवावे ही आहे !

In reply to by अहिरावण

हेमंतकुमार 22/02/2024 - 11:55
विंदा करंदीकर यांचे हे अवतरण आहे :
आमचे प्रकाशक हस्तलिखितावर इतकं प्रेम करतात की ते मुद्रकाला देण्याची कल्पनाच त्यांना अनेक वर्षे सहन होत नाही !

विवेकपटाईत 23/02/2024 - 16:54
हजारो रुपये खर्च करून पुस्तक प्रकाशित करा. ५०० प्रति ही विकल्या जात नाही. ( एका लेखकाचा अनुभव. त्यापेक्षा मिसळपाव बरे.कितीही बेक्कार लेखन असेल, कीतीही अशुध्द असेल.तरीही ५०० च्या वर वाचतात. प्रतिसाद ही भरपूर देतात. प्रतिसाद वाचताना न खर्च केलेले पैसे ही वसूल होतात.
साहित्याच्या प्रांतात लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. मुळात एखादे साहित्य निर्माण होण्यासाठी लेखक हा मूलभूत स्त्रोत आहे. त्याने काही लिहिल्यावरच अन्य तीन घटकांचा प्रश्न उपस्थित होतो. लेखक स्वतःच्या प्रतिभेने लिहितो आणि मग ते लेखन लोकांनी वाचावे या आशेने निरनिराळ्या माध्यमांत प्रकाशित केले जाते. लेखन करताना लेखकाची बुद्धी आणि कष्ट खर्ची पडतात. त्याच्या लेखनातून वाचकांचे रंजन होते आणि त्यांना अन्य काही फायदेही होऊ शकतात. त्याचा मोबदला म्हणून लेखकाला काही मानधन मिळावे अशी प्रथा पडली. जे लेखक बाजारात यशस्वी ठरतात ते व्यावसायिक म्हणून गणले जातात.

दसरा

शिव कन्या ·

गणेशा 09/10/2019 - 14:00
मस्त. दसर्यावर चे मेसेज वाचुन बोर झालो होतो, तसेच काहीसे असेल म्हणुन उघडली पण नव्हती कविता. पण काय मस्त लिहिले आहे ज्यांच्या हाती शस्त्र दुधारी त्यांचा बुद्धीभेद न होवो नाही ज्यांच्या हाती काही त्यांचे घरटे सुखरुप होवो आज निकामी शस्त्रे ज्यांची वृक्ष शमीचा त्यांना लाभो सरुन जावो अज्ञाताचा काळ सुखाचा फिरुन येवो वा वा

गणेशा 09/10/2019 - 14:00
मस्त. दसर्यावर चे मेसेज वाचुन बोर झालो होतो, तसेच काहीसे असेल म्हणुन उघडली पण नव्हती कविता. पण काय मस्त लिहिले आहे ज्यांच्या हाती शस्त्र दुधारी त्यांचा बुद्धीभेद न होवो नाही ज्यांच्या हाती काही त्यांचे घरटे सुखरुप होवो आज निकामी शस्त्रे ज्यांची वृक्ष शमीचा त्यांना लाभो सरुन जावो अज्ञाताचा काळ सुखाचा फिरुन येवो वा वा
जगदंबेच्या हातामधली शस्त्र शलाका विजयी होवो रणचंडीचे स्मरण दुर्जना सदैव तुजला मनात होवो ज्यांच्या हाती शस्त्र दुधारी त्यांचा बुद्धीभेद न होवो नाही ज्यांच्या हाती काही त्यांचे घरटे सुखरुप होवो आज निकामी शस्त्रे ज्यांची वृक्ष शमीचा त्यांना लाभो सरुन जावो अज्ञाताचा काळ सुखाचा फिरुन येवो सोन्याचा हा दिवस आजचा उजळ होऊ दे तुझ्या अंगणी बलवानांचे मस्तक राज्ञी विनम्र होऊ दे तुझ्याच चरणी दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा. शिवकन्या

दो डोळ्यांचे....

शिव कन्या ·

गणेशा 09/10/2019 - 13:57
सांगायाला शब्द कशाला झुळूक हळवी एक उरी पाण्यालाही जागर असतो दिव्यात नसते केवळ ज्वाला इथे तिथेही कुठेच नाही तरी बहराचा शुद्ध सोहळा
ह्या ओळी खुप म्हणजे खुप आर्त वाटल्या.. निव्वळ अप्रतिम पुन्हा पुन्हा वाचली कविता.. लिहित रहा... वाचत आहे..

गणेशा 09/10/2019 - 13:57
सांगायाला शब्द कशाला झुळूक हळवी एक उरी पाण्यालाही जागर असतो दिव्यात नसते केवळ ज्वाला इथे तिथेही कुठेच नाही तरी बहराचा शुद्ध सोहळा
ह्या ओळी खुप म्हणजे खुप आर्त वाटल्या.. निव्वळ अप्रतिम पुन्हा पुन्हा वाचली कविता.. लिहित रहा... वाचत आहे..
दो डोळ्यांचे झरते पाणी इथून मजला स्पष्ट दिसे त्या पाण्याच्या आवेगावर ओठावरले गीत फिरे डोळ्यांमधल्या रेषा तांबूस पूरी सांगते व्यथा खरी सांगायाला शब्द कशाला झुळूक हळवी एक उरी गदगद्णारे हृदय राजसा तुझा पोचतो इथे हुंदका पाण्यालाही जागर असतो दिव्यात नसते केवळ ज्वाला सहवासाचे अत्तर नाही तरी मिठीचा भास कोवळा इथे तिथेही कुठेच नाही तरी बहराचा शुद्ध सोहळा -शिवकन्या

मुलीच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त लिहिलेलं पत्र: परीकथेच्या सवे

मार्गी ·

भिकार्‍याची संपत्ती

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·

जालिम लोशन 15/09/2019 - 20:54
फुकट खाणे हि प्रवृत्ती असते. गरीबीचा आणी भिक मागण्याचा संबध नसतो. माझ्या माहितीत असे लोक आहेत, प्रचंड गरीबी पण फुकट मिळालेले काही घेत नाहीत. स्वाभिमानाने जगतात.

सुबोध खरे 16/09/2019 - 10:34
काही लोकांना फक्त पैसे मोजण्यात किंवा खात्यात किती पैसे जमा झाले याचा आनंद असतो. त्याचा जगण्याच्या शैलीशी काहीही संबंध नाही. मग तो भिकारी असो किंवा अतिश्रीमंत. माझ्या माहितीतील एक प्रथितयश डॉक्टर आहेत ते फक्त रात्री २ ते ६ झोपतात बाकी दिवसभर फक्त काम आणि काम. अब्जावधी रुपये आहेत. म्हणून मग आता स्वतःचे मोठे रुग्णालय टाकले आहे. येन केन प्रकारेन तेथे रुग्ण कसे येतील याची सतत चिंता करत असतात. बरं मुलं नातवंडं सर्व काही व्यवस्थित भरपूर कमावते आहेत. आता बसून खाल्लं तरी ७ पिढ्या पुरून उरतील एवढे पैसे आहेत.

रमेश आठवले 17/09/2019 - 03:46
हा एक मानसिक विकार आहे. हैद्राबादचा शेवटचा निझाम हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ति मानला जात असे पण तरीही तो एखाद्या दरिद्रि माणसा सारखा रहात असे.

जालिम लोशन 15/09/2019 - 20:54
फुकट खाणे हि प्रवृत्ती असते. गरीबीचा आणी भिक मागण्याचा संबध नसतो. माझ्या माहितीत असे लोक आहेत, प्रचंड गरीबी पण फुकट मिळालेले काही घेत नाहीत. स्वाभिमानाने जगतात.

सुबोध खरे 16/09/2019 - 10:34
काही लोकांना फक्त पैसे मोजण्यात किंवा खात्यात किती पैसे जमा झाले याचा आनंद असतो. त्याचा जगण्याच्या शैलीशी काहीही संबंध नाही. मग तो भिकारी असो किंवा अतिश्रीमंत. माझ्या माहितीतील एक प्रथितयश डॉक्टर आहेत ते फक्त रात्री २ ते ६ झोपतात बाकी दिवसभर फक्त काम आणि काम. अब्जावधी रुपये आहेत. म्हणून मग आता स्वतःचे मोठे रुग्णालय टाकले आहे. येन केन प्रकारेन तेथे रुग्ण कसे येतील याची सतत चिंता करत असतात. बरं मुलं नातवंडं सर्व काही व्यवस्थित भरपूर कमावते आहेत. आता बसून खाल्लं तरी ७ पिढ्या पुरून उरतील एवढे पैसे आहेत.

रमेश आठवले 17/09/2019 - 03:46
हा एक मानसिक विकार आहे. हैद्राबादचा शेवटचा निझाम हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ति मानला जात असे पण तरीही तो एखाद्या दरिद्रि माणसा सारखा रहात असे.
- डॉ. सुधीर रा. देवरे काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचनात आली: चेन्नईचा एक भिकारी रस्त्यावर मरून पडला. त्याचा पंचनामा करताना रस्त्याकडेच्या त्याच्या झोपडीत पैशांनी भरलेली काही पोती सापडली. पोत्यांत भरलेले पैसे पोलिसांनी मोजले तर ती रक्कम एक कोटी ८६ लाख आणि काही हजार इतकी होती. एवढी संपत्ती गोळा करून बिचारा भिकारी रस्त्यावर बेवारशी मरून पडला. या बातमीने विचारचक्र सुरू झालं: भिकार्‍याने आपल्या भिकारीच्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली असती तर? (नोकरी हा शब्द इथं मुद्दाम वापरला आहे.) साचवलेल्या पैशांत तो मरेपर्यंत चांगलं खाऊन (पिऊन नव्हे) जगला असता.

वयास माझ्या पैंजण घालित....

शिव कन्या ·

यशोधरा 05/09/2019 - 17:56
वा!
डोळ्यांवरती जरा खालती ग्रहण हवे मज चंद्राचे त्या ग्रहणाला मोक्ष नसावा, केवळ अनुभव साक्ष असावा पोटामधले उदंड पाणी खळखळ अवघी डोळ्यांमधली एक मोजता दुजी उठावी लाट बोलकी मिटून जावी
सुंदर.

खिलजि 07/09/2019 - 17:58
कसे सावरू वयास माझ्या , तारुण्याचे वरदान कुठे ? रंगवून टाकल्या सफेद झालरी , काळा रंग लपला कुठे ? झिडकारुनी त्या वार्धक्क्यास , ठेवले माझे मन कोवळे मोतीबिंदूही हिरवे झाले , जीवन सोन्याहुनी पिवळे

जॉनविक्क 12/09/2019 - 12:21
आता तो फक्त एक बागुलबुवा होता असे वाटते. आता सगळ्याच बाबतीत फक्त साक्षीदार या नात्याने जोडला जातो (आणि या साक्षीभावाचे प्रयोजन काय इतकाच विचार मनात असतो,) कारण नाविन्य असे काही नाहीच. वार्धक्य इतरांचे जवळून पाहिलेले म्हणून तेही अपेक्षितच अन... बालपण, तरुणपण स्वतःच अनुभवलेले म्हणून ते ही ताजे नाही. त्यामुळे हा साक्षीभाव पोसून करायचे काय, टाळून करायचे काय हा एक प्रश्नच आहे ? अर्थात शोध चालूच ठेवला की उत्तरे मिळतात खरी :)

यशोधरा 05/09/2019 - 17:56
वा!
डोळ्यांवरती जरा खालती ग्रहण हवे मज चंद्राचे त्या ग्रहणाला मोक्ष नसावा, केवळ अनुभव साक्ष असावा पोटामधले उदंड पाणी खळखळ अवघी डोळ्यांमधली एक मोजता दुजी उठावी लाट बोलकी मिटून जावी
सुंदर.

खिलजि 07/09/2019 - 17:58
कसे सावरू वयास माझ्या , तारुण्याचे वरदान कुठे ? रंगवून टाकल्या सफेद झालरी , काळा रंग लपला कुठे ? झिडकारुनी त्या वार्धक्क्यास , ठेवले माझे मन कोवळे मोतीबिंदूही हिरवे झाले , जीवन सोन्याहुनी पिवळे

जॉनविक्क 12/09/2019 - 12:21
आता तो फक्त एक बागुलबुवा होता असे वाटते. आता सगळ्याच बाबतीत फक्त साक्षीदार या नात्याने जोडला जातो (आणि या साक्षीभावाचे प्रयोजन काय इतकाच विचार मनात असतो,) कारण नाविन्य असे काही नाहीच. वार्धक्य इतरांचे जवळून पाहिलेले म्हणून तेही अपेक्षितच अन... बालपण, तरुणपण स्वतःच अनुभवलेले म्हणून ते ही ताजे नाही. त्यामुळे हा साक्षीभाव पोसून करायचे काय, टाळून करायचे काय हा एक प्रश्नच आहे ? अर्थात शोध चालूच ठेवला की उत्तरे मिळतात खरी :)
शुभ्र रुपेरी हव्यात लाटा बटाबटांच्या डोक्यावरती नकोच तेव्हा काळीकुरळी बट डोळ्यावर सळसळणारी शेलाटीशी रेघ वक्रशी हातावरती उमटून जावी टिचकी मारून गिरकी घेता झोका माझा खाली यावा डोळ्यांवरती जरा खालती ग्रहण हवे मज चंद्राचे त्या ग्रहणाला मोक्ष नसावा, केवळ अनुभव साक्ष असावा नाजुक साजुक पेरांवरती खोडावरचे रिंगण यावे साल कोवळी मधुमासाची गंध फुलांचा उडून जावा पोटामधले उदंड पाणी खळखळ अवघी डोळ्यांमधली एक मोजता दुजी उठावी लाट बोलकी मिटून जावी पाठीवरच्या पानावरचा रंग केशरी विराट व्हावा त्यावर हलते माळ मण्यांची ताठ कण्याची पाठ रहावी हळुच यावे जरा बसावे आस्ते आस्ते कवेत घ्यावे वयास माझ्या

संध्याकाळी तू गंगेतीरी

शिव कन्या ·

In reply to by जॉनविक्क

शिव कन्या 01/09/2019 - 20:09
समुद्र आपली मर्यादा ओलांडून वाट शोधेल का? नाही. गंगा कधी उलटी वाहील का? नाही. पण तिला वाटते हे असे अघटीत काहीतरी घडावे, आणि त्याची भेट व्हावी.

संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस..... मला सांग ना तुलाही असेच वाटते ना कुठूनतरी समुद्राने वाट काढावी नाहीतर गंगेने पदर उलटा करावा चार व्याकुळ डोळ्यांत प्रलय व्हावा... खास. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by जॉनविक्क

शिव कन्या 01/09/2019 - 20:09
समुद्र आपली मर्यादा ओलांडून वाट शोधेल का? नाही. गंगा कधी उलटी वाहील का? नाही. पण तिला वाटते हे असे अघटीत काहीतरी घडावे, आणि त्याची भेट व्हावी.

संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस..... मला सांग ना तुलाही असेच वाटते ना कुठूनतरी समुद्राने वाट काढावी नाहीतर गंगेने पदर उलटा करावा चार व्याकुळ डोळ्यांत प्रलय व्हावा... खास. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस..... मला घेऊन चल तिच्या वळणदार लाटांवर लोटून दे तिच्या केशरी दिव्यांच्या लयीवर सोडून दे तिच्या पोटातल्या भोवऱ्यात घेऊन ये तो झुरणारा शेला पाण्यात संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस.... तुझ्याकडे तोंड करून खळखळून हसू दे बघू देत लोकांना देवांना साधुंना माझ्या हातातले पाणी तुझ्या हातातून तिच्या देहात लयदार मिसळताना.....

शोक कुणाला? खंत कुणाला?

शिव कन्या ·

माहितगार 25/08/2019 - 21:36
पु. शि. रेग्यांच्या सावित्री मध्ये घरट्यांचा उल्लेख दोनदा येतो. पहिला संघर्षाचा मन विषण्ण करणारा दुसर्‍यांदा येतो तेव्हा निसर्गचक्र त्याच्या क्रमाने हळुवारपणे पुर्वव्रत झालेले असते जे वाचकाला आश्वस्त करते.

सध्या अमेझॉन जंगलात लागलेल्या आ़गीच्या ( वणवा) पार्श्वभुमीवर कवितेची दाहकता अधिकच जाणवते आहे . __/\__.

माहितगार 25/08/2019 - 21:36
पु. शि. रेग्यांच्या सावित्री मध्ये घरट्यांचा उल्लेख दोनदा येतो. पहिला संघर्षाचा मन विषण्ण करणारा दुसर्‍यांदा येतो तेव्हा निसर्गचक्र त्याच्या क्रमाने हळुवारपणे पुर्वव्रत झालेले असते जे वाचकाला आश्वस्त करते.

सध्या अमेझॉन जंगलात लागलेल्या आ़गीच्या ( वणवा) पार्श्वभुमीवर कवितेची दाहकता अधिकच जाणवते आहे . __/\__.
हरिण शावक हत्ती चित्ते, सळसळ धावे नाग सर्पिणी धडधड धडधड रान पेटते...... शोक कुणाला? खंत कुणाला? चोची माना तुटल्या ताना,भकभक काळे पंखही जळती लपलप लपलप ज्वाला उठती...... शोक कुणाला?खंत कुणाला? पिंपळ कातळ खोड पुरातन, चट्चट् जळते गवत कोवळे भडभड भडभड पाने रडती.... शोक कुणाला? खंत कुणाला? पिले पाखरे भकास डोळे, हा हा करती समूह भाबडे चरचर चरचर डोळे झरती...... शोक कुणाला? खंत कुणाला? कुणी लावली कशी लागली, आग शेवटी जाळ काढते करकर करकर शाप जीवांचे, थरथर.... इथवर ऐकू येते..... -शिवकन्या

देवघर

शिव कन्या ·

जॉनविक्क 19/08/2019 - 22:39
फक्त ही सांस्कृतिच आता परकी वाटावी इतका बदल स्वत: मधे झालेला असल्याने, संपूर्ण वृध्दत्व येत नाही तोपर्यंत हे काव्य काळजाला भिड़ेल असे वाटत नाही.

In reply to by जॉनविक्क

माहितगार 24/08/2019 - 09:07
सहज सुचलेला एक विचार देवघर शेवटी एक आदर्शांचा श्रद्धायुक्त अल्बम असते का ? देवघरात नव्या श्रद्धांचे नवे देव जोडल्यास ? लोक तसे न ठरवताही करतच असतात, सांस्कृतिक समस्येचे निदान होत असेल तर ठरवून नवे अल्बम बनवून घेण्यास काय हरकत असावी.

In reply to by माहितगार

जॉनविक्क 24/08/2019 - 12:52
आवेनजर्स वास्तव्यास आहेत ना. उद्या तिथं रामकृष्ण परमहंसही असू शकतील. बस देवघर रिकामे नसावे इतकेच काय ते आवश्यक, अर्थात तसे ते कधीच नसते पण नास्तिकतेचा माजोरडेपणा तो भासही निर्माण करतो कधी कधी

In reply to by जॉनविक्क

सर टोबी 24/08/2019 - 15:00
हे काय असतं? माजोरडेपणा हा जर पाशवी शक्तीचा अविष्कार असेल तर नास्तिकांकडे ती कोणत्या स्वरूपाची असते? त्या उलट श्रद्धेची दुकानदारी करणारे आणि नास्तिक यांच्या युद्धामध्ये नास्तिकांच्याच आहुत्या पडल्या आहेत. नास्तिकता म्हणजे श्रद्धेचा अभाव असे नसावे. अन्यथा दररोजच्या व्यवहारात विश्वास ठेवणारे सर्वच जण श्रद्धाळू असायला हवे. पण तसे नसते. नास्तिक आपल्याला आपल्यातीलच विरोधाभासाची आठवण करून देतात. एकीकडे मोठ्याने ओरडून केलेल्या प्रार्थनेपेक्षा मूक आक्रोश देवाला ऐकू येतो असे म्हणायचे, मुंगीच्या पायात चाळ बांधला तरी देवाला तो ऐकू येतो असे म्हणायचे आणि ठणाणा करणाऱ्या आरत्या आणि काकड आरत्या करीत लोकांची झोपमोड करणे, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना त्रास होईल असे वागायचे हे 'सो कॉल्ड' नास्तिकच तुम्हाला सांगतात.

खिलजि 20/08/2019 - 15:21
मस्त लिवलंय .. जुन्या आठवणी जाग्या झाल्या .. खासकरून कोकणातल्या घराच्या .. मी महिन्यात आम्ही सर्व भावंडे तिथे अंगणात सर्व स्तोत्रे म्हणायचो .. मला वाटत दहा पंधरा वर्षे तिथे आम्ही दरवर्षी दंगा करायचो पण आता सर्व जण शहरात स्थायिक झाले आणि ते भलेमोठे घर , त्यासमोरच अंगण , वृंदावन असेच ओस पडले आहे .. तिथे तुळस लावली जाते पण ती फक्त गणपतीत आणो होळीच्या सणालाच.. नाहीतर तिथे पूर्ण शुकशुकाट असतो ... कधी पुन्हा उजळेल सारे ? कधी उतरतील त्या अंगणात तारे ? कधी भिनेल गगनात स्तोत्र ध्वनी ? कधी बैसेल ती अनोखी पंगत पुन्हा अंगणी ? तूच तर आहेस त्या सर्वांचा उदगाता निर्माता तूच घडविलेस सर्व पसारे अन नजारे तूच दिलेस कैक आशीर्वाद तूच दिल्या या अनमोल ठेवी आम्हा लोचनी पुढारलो कि सुधारलो ते तूच जाणे पण मी अजूनही तिथेच लोळतो जिवंतपणी दे , कधीतरी पुन्हा दे करून जवळ त्या भूतकाळाला ओढ अनामिक ती हृदयात कायम राहिली

नाखु 20/08/2019 - 20:54
निव्वळ अफलातून आहे. समजतेय असं वाटेपर्यंत निसटतेय आणि निसटताना समजतेय अशी अवस्था झाली आहे. मिपावर बाजूनेच निसटणारा सरधोपट वाचकांची पत्रेवाला नाखु

माहितगार 24/08/2019 - 08:25
कविता आवडली, नीटशी समजण्यासाठी बर्‍याचदा वाचावयास लागली (की अजून नीटशी समजली नाही असा प्रश्नही मनात येऊन गेला.)

In reply to by जालिम लोशन

माहितगार 24/08/2019 - 10:05
मला दोन रूपकांची शक्यता जाणवतेय - एक 'आज्जी किंवा आजोबा' या व्यक्तीरेखेचे किंवा दुसरे खूप काही वेगळे रूपक जाणवतयं -शिवकन्येनीच लिवल्यावर काय?-(स्पष्ट बोलण्याची हिम्मत नै बा आपल्यात) ज्याचे रूपक असेल ते अप्रतिम हे नक्की

जॉनविक्क 19/08/2019 - 22:39
फक्त ही सांस्कृतिच आता परकी वाटावी इतका बदल स्वत: मधे झालेला असल्याने, संपूर्ण वृध्दत्व येत नाही तोपर्यंत हे काव्य काळजाला भिड़ेल असे वाटत नाही.

In reply to by जॉनविक्क

माहितगार 24/08/2019 - 09:07
सहज सुचलेला एक विचार देवघर शेवटी एक आदर्शांचा श्रद्धायुक्त अल्बम असते का ? देवघरात नव्या श्रद्धांचे नवे देव जोडल्यास ? लोक तसे न ठरवताही करतच असतात, सांस्कृतिक समस्येचे निदान होत असेल तर ठरवून नवे अल्बम बनवून घेण्यास काय हरकत असावी.

In reply to by माहितगार

जॉनविक्क 24/08/2019 - 12:52
आवेनजर्स वास्तव्यास आहेत ना. उद्या तिथं रामकृष्ण परमहंसही असू शकतील. बस देवघर रिकामे नसावे इतकेच काय ते आवश्यक, अर्थात तसे ते कधीच नसते पण नास्तिकतेचा माजोरडेपणा तो भासही निर्माण करतो कधी कधी

In reply to by जॉनविक्क

सर टोबी 24/08/2019 - 15:00
हे काय असतं? माजोरडेपणा हा जर पाशवी शक्तीचा अविष्कार असेल तर नास्तिकांकडे ती कोणत्या स्वरूपाची असते? त्या उलट श्रद्धेची दुकानदारी करणारे आणि नास्तिक यांच्या युद्धामध्ये नास्तिकांच्याच आहुत्या पडल्या आहेत. नास्तिकता म्हणजे श्रद्धेचा अभाव असे नसावे. अन्यथा दररोजच्या व्यवहारात विश्वास ठेवणारे सर्वच जण श्रद्धाळू असायला हवे. पण तसे नसते. नास्तिक आपल्याला आपल्यातीलच विरोधाभासाची आठवण करून देतात. एकीकडे मोठ्याने ओरडून केलेल्या प्रार्थनेपेक्षा मूक आक्रोश देवाला ऐकू येतो असे म्हणायचे, मुंगीच्या पायात चाळ बांधला तरी देवाला तो ऐकू येतो असे म्हणायचे आणि ठणाणा करणाऱ्या आरत्या आणि काकड आरत्या करीत लोकांची झोपमोड करणे, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना त्रास होईल असे वागायचे हे 'सो कॉल्ड' नास्तिकच तुम्हाला सांगतात.

खिलजि 20/08/2019 - 15:21
मस्त लिवलंय .. जुन्या आठवणी जाग्या झाल्या .. खासकरून कोकणातल्या घराच्या .. मी महिन्यात आम्ही सर्व भावंडे तिथे अंगणात सर्व स्तोत्रे म्हणायचो .. मला वाटत दहा पंधरा वर्षे तिथे आम्ही दरवर्षी दंगा करायचो पण आता सर्व जण शहरात स्थायिक झाले आणि ते भलेमोठे घर , त्यासमोरच अंगण , वृंदावन असेच ओस पडले आहे .. तिथे तुळस लावली जाते पण ती फक्त गणपतीत आणो होळीच्या सणालाच.. नाहीतर तिथे पूर्ण शुकशुकाट असतो ... कधी पुन्हा उजळेल सारे ? कधी उतरतील त्या अंगणात तारे ? कधी भिनेल गगनात स्तोत्र ध्वनी ? कधी बैसेल ती अनोखी पंगत पुन्हा अंगणी ? तूच तर आहेस त्या सर्वांचा उदगाता निर्माता तूच घडविलेस सर्व पसारे अन नजारे तूच दिलेस कैक आशीर्वाद तूच दिल्या या अनमोल ठेवी आम्हा लोचनी पुढारलो कि सुधारलो ते तूच जाणे पण मी अजूनही तिथेच लोळतो जिवंतपणी दे , कधीतरी पुन्हा दे करून जवळ त्या भूतकाळाला ओढ अनामिक ती हृदयात कायम राहिली

नाखु 20/08/2019 - 20:54
निव्वळ अफलातून आहे. समजतेय असं वाटेपर्यंत निसटतेय आणि निसटताना समजतेय अशी अवस्था झाली आहे. मिपावर बाजूनेच निसटणारा सरधोपट वाचकांची पत्रेवाला नाखु

माहितगार 24/08/2019 - 08:25
कविता आवडली, नीटशी समजण्यासाठी बर्‍याचदा वाचावयास लागली (की अजून नीटशी समजली नाही असा प्रश्नही मनात येऊन गेला.)

In reply to by जालिम लोशन

माहितगार 24/08/2019 - 10:05
मला दोन रूपकांची शक्यता जाणवतेय - एक 'आज्जी किंवा आजोबा' या व्यक्तीरेखेचे किंवा दुसरे खूप काही वेगळे रूपक जाणवतयं -शिवकन्येनीच लिवल्यावर काय?-(स्पष्ट बोलण्याची हिम्मत नै बा आपल्यात) ज्याचे रूपक असेल ते अप्रतिम हे नक्की
देवघरातच सोडून आले मंद दिव्यांची सुगंधमाला पहाटवारा श्रावणओला कांत सतीचा तिथे राहिला दिवेलागणी शुभंकरोति करी एकटी तुळशीमाला बोटांमधुनी फिरत जाय ती कालगणाची अजस्त्र माला देव्हाऱ्यावर शांत सावली स्निग्ध घरावर छाया धरते त्या झाडाच्या पानांवरती कृष्णवल्लरी गाणे रचते समईमधल्या दीपकळीवर विझू विझू ते डोळे दिसती मध्यरात्रिला येता आठव देवघरातील विझते वाती हार चंदनी हात जोडुनी जन्म पिढ्यांचा भोगून जातो मागे वळुनी आपणसुद्धा हात सोडुनी भणंग होतो.... -शिवकन्या

सावज (भाग १)

अनाहूत ·

जेम्स वांड 14/08/2019 - 09:59
शृंगार हिडीस किंवा मिसोजिनिस्ट न करता लिहिणे एक कला आहे आणि तुम्हाला ती साधली आहे असे दिसते. मला तर पावसाळी रात्र अन आडवळणाचा बंगला वगैरे वाचून ती भूत असावी असे वाटले होते, पुभाप्र.

जेम्स वांड 14/08/2019 - 09:59
शृंगार हिडीस किंवा मिसोजिनिस्ट न करता लिहिणे एक कला आहे आणि तुम्हाला ती साधली आहे असे दिसते. मला तर पावसाळी रात्र अन आडवळणाचा बंगला वगैरे वाचून ती भूत असावी असे वाटले होते, पुभाप्र.
काही लोकांच्या नजरेतच ती गोष्ट असते जिने त्यांना एखादी गोष्ट करायला फारसे कष्ट करावे लागत नाहीत . तिला काय झालं होत काय माहीत पण तिने आपोआप त्याच्या मागे चालायला सुरुवात केली . ते आलिशान हॉटेल होत . त्याने दरवाजा उघडला आणि त्याच्या नजरेच्या इशाऱ्याने ती आत गेली . त्याने एकवार बाहेर नजर टाकली आणि दरवाजा बंद करून घेतला. ================================================== " करायला सगळं काही करता येत पण त्यासाठी मोबदला मोजावा लागतो आणि मोबदला नेहमी पैशात असत नाही तो कधीकधी वेळ , समर्पण , आणि कधीकधी ...