मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

साहित्यिक

शेवटचा अश्रू

अनुस्वार ·
लेखनप्रकार
एकदा जन्म झाला की आत्म्याच्या तोडीची म्हणता येईल अशी साथ आपल्याला देणारे अश्रूंशिवाय दुसरे काय असते. माध्यमं आणि भाषा यांनी कितीही उंची गाठली तरी व्यक्त होण्यातली अश्रूंची हुकुमत त्यांना कधीच साधता येणार नाही. अश्रू हा नात्यांचा पहिला पाया असतो. ज्या नात्यांनी डोळे कधीच पाणावले नाहीत ती सारी नाती खोटी!औचित्यभंग नको म्हणून मनुष्याला एकवेळ हसणं आवरता येईल, पण मनाचा वज्रबांध जमीनदोस्त करत गालावर ओघळणारा अश्रू भावनांचं गाठोड जपून ठेवण्याच्या भानगडीत पडत नाही. विद्युल्लते सोबत तेज चमकावे तसे भावनां सोबत अश्रू वाहतात. स्वतःला चाणाक्ष आणि व्यवहारी म्हणवणारे आपण जगाची किंमत पैशांत करतो.

घर..

आजी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझे वडील डॉक्टर होते. सरकारी नोकरी होती. त्यांच्या दर दोन,तीन वर्षांनी बदल्या होत. प्रत्येक गावात राहायला सरकारी क्वार्टर्स असत. त्यामुळं वेगवेगळ्या खूप घरांतून राहायचा मला अनुभव मिळाला. घरे मोठी,ऐसपैस. वडील रिटायर झाले. तेव्हा मी पाचवीत होते. मी माझ्या आईवडिलांना उशीरा झालेली मुलगी आहे. माझ्या भावंडांच्यात आणि माझ्यात वयाचं खूपच अंतर आहे. वडील रिटायर झाल्यावर आम्ही भाड्याच्या घरातही राहिलो. मग लगेचच आम्ही थोडंसं गावाबाहेर स्वतःचं घर बांधलं. ते घर चौदा हजारांत बांधून झालं. त्यावेळी मी सहावीत शिकत होते. त्या घरात आम्ही राहायला आलो.

आरण्यक :

जयंत कुलकर्णी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आरण्यक Simple, Free Image and File Hosting at MediaFire मित्र आणि मैत्रिणींनो, आज एक नवीन पुस्तक घेऊन येत आहे. या पुस्तकाचा मी अनुवाद करणार आहे हे मी पूर्वीच सांगितले होते. त्याप्रमाणे हे पुस्तक आपल्यापुढे सादर करण्यास मला आनंद होतोय.

व्यंगचित्रांच्या निमित्ताने...

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे (संदर्भ: 2012 साली केंद्रीय विद्यालयांच्या राज्यशास्त्र- नागरीकशास्त्र विषयांतील अभ्यासाला पुरक असलेल्या स्वातंत्र्याच्या पहाट काळातील काही भारतीय राजकीय ऐतिहासिक व्यक्‍तींच्या व्यंगचित्रांमुळे भावना दुखावण्याचा प्रसंग उद्‍भवला होता. म्हणून तत्कालीन शासनाकडून अनेक चांगली व्यंगचित्रे त्या अभ्यासक्रमातून हटवण्यात आली होती. त्यावेळी लिहिलेला हा लेख. पण ब्लॉगवर अजूनही प्रकाशित केला नव्हता.) आजचे राजकीय नेते नको इतके संवेदनाशील झालेले आहेत.

प्रार्थनास्थळे बंद असण्याबाबत साहित्यीकांची अन मान्यवरांची दुटप्पी भुमिका

पाषाणभेद ·
प्रार्थनास्थळे बंद असण्याबाबत साहित्यीकांची अन मान्यवरांची दुटप्पी भुमिका आजच्या ऑनलाईन वर्तमानपत्रांत "नेमाडे-पठारेंसह 2 हजार मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले समर्थनाचे पत्र, (मंदीरे उघडण्याबाबतीत) श्रद्धांशी खेळणाऱ्या राजकारणावर घेतला आक्षेप" अशा अर्थाच्या बातम्या आलेल्या आहेत.

(आणखी काय हवं?) - अच्रत बव्लत

टवाळ कार्टा ·
ढिश्क्लेमर - पोगो बघणार्यांसाठी नाही....नंतर बोंब मारु नये :D . . . . . . . . . . . . . . नशिल्या दिवसाची संध्याकाळची वेळ शुभ्र वाळूसोबत गुंजणार्या लाटा खिदळणारे ओठ आणि सूचक नजरा सोनेरी पाणी व शनेलचा सुगंध धुंद संगीताचा मंद आवाज "गरम सोबती" बरोबर आवडती "श्टेपनी" बोला आणखी काय हवं?

आणखी काय हवं?

Pratham ·
मावळणाऱ्या दिवसाची संध्याकाळची वेळ वाहणाऱ्या वाऱ्यामुळे सरसरणारी पाने कडाडणारे ढग आणि चमकणाऱ्या विजा पावसाचे पाणी व मातीचा सुगंध बरसणाऱ्या थेंबाचा रपरपणारा आवाज गरम चहा बरोबर आवडते पुस्तक बोला आणखी काय हवं?

मावळतीला

Pratham ·
लेखनप्रकार
दिवस मावळतीकडे झुकताना सावल्या अदृश्य होऊ लागतात.मनात एक हुरहूर लागून राहते.ती हुरहूर आपल्याला नेमक्या शब्दांत व्यक्त करता येत नाही,हवीहवीशी तरीही नकोशी.एक वेगळीच भावना असते ती.चार भिंतीमध्ये बसून राहिले तर मन उदासीन होते तेच जर मोकळ्या हवेत गेले तर एकदम शांत वाटते,अस्तित्वाची जाणीव होते.सूर्य मावळतानाचे दृश्य खूप सुखद वाटते.सूर्य हळूहळू कलत असतो,आकाशात तांबड्या-केशरी रंगाची उधळण असते.एखाद्या तळ्या किनारी मावळतीचे दृश्य भलतेच सुंदर दिसते.पाण्यावर सूर्याचे प्रतिबिंब पडलेले असते,आकाश लाल रंगात न्हाहून गेलेले असते,पक्षी दिवसभर अन्नासाठी भटकून परतताना दिसतात.झुंडीने ते एका संथ लयीत उडत असतात.पाण्य

न बदलणारं 'पंगतीतलं पान'

महासंग्राम ·

आपल्या गावगाड्यात जात नावाची व्यवस्था अगदी पाचर मारल्यासारखी फिट्ट बसली आहे. कितीही हाकला म्हंटलं तर जात नाही ती जात असं तिचं वर्णन केलं जातं. आपण सगळे जण कळत नकळतपणे का होईना या जातिव्यवस्थाचे पाईक आहोत. भारताच्या कुठल्याही खेड्यात गेलं तर हे वास्तव सहजपणे दिसून येतं. शहरात थेट नसला तर वेगवेगळ्या पद्धतीने जातीभेद दिसतोच. कधी तो रहाण्याच्या बाबतीत असतो, तर कधी खाण्यापिण्याच्या बाबतीत.

शिक्षक दिन

कवि मनाचा ·
लेखनप्रकार
५ सप्टेंबर... शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. छोट्या-छोट्या प्रसंगातून शिक्षक-विद्यार्थ्यातले संवाद व त्याद्वारे समजलेली शिक्षणमूल्ये लिहिण्याचा हा एक प्रयत्न... ------------------------------------- एक आई आपल्या लहानग्या मुलाला शिकवते की, जीवनात नेहमी चांगल्या लोकांची संगत धरावी. चांगली संगत असेल तरच तुझी प्रगती होईल. वाईट संगत तुला वाईट मार्गावर नेईल. म्हणून देवाची तू प्रार्थना कर - "देवा, मला आयुष्यात नेहमी चांगल्या लोकांच्या सहवासात ठेव." वाचनाची आवड लागावी म्हणून आई त्या मुलाला गावातल्या सार्वजनिक वाचनालयात जाण्याची सवयही लावते. मुलगा वाचनालयात जाऊन डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. सी. व्ही.