मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सायन्स फिक्शन - तिकडची आणि इथली

अनुनाद ·

In reply to by धर्मराजमुटके

अनुनाद 05/09/2022 - 00:24
आपल्या अभिप्रायातून आपले साहित्यावरचे प्रेम दिसत आहे, आणि त्या बद्दल धन्यवाद. पण मुद्दा हा आहे कि १९७० मध्ये धारपांनी ज्या कथा लिहिल्या त्या धर्तीचे चित्रपट अफाट लोकप्रिय आता होताना दिसत आहेत. अमेरिकेतली एक गोष्ट जगभर जाते आणि भारतात त्या आधी ३० वर्षे लिहिलेली तशाच धर्तीची कथा सूर्यप्रकाशही पाहू शकत नाही. आणि धारपांच्या कथा - भयकथा किंवा संदेहकथा नव्हे प्युअर सायन्स फिक्शन - कुठलीही काढून पहा. त्यातली भाषाशैली, कथेची मांडणी, त्यातून दिसणारे तंत्रज्ञानाचे मोजक्या शब्दात वर्णन - फाफट पसारा टाळून केलेली नेटकी मांडणी - हे सर्वच काळाच्या पुढचं होतं. वानगीदाखल अगदी मोजक्या कथांची नावं देतोय. कुठलीही पुस्तक काढून पहा. वाचून पूर्ण केल्याखेरीज खाली ठेववत नाही. Hugo Gernsback या लेखकाने मांडलेल्या निकषांवर ह्या कथा तंतोतंत उतरतात. Wells, Jules Verne, Arthur Clarke, असिमोव या लेखकांच्या तोडीसतोड लिखाण... १. युगपुरुष २. कंताचा मनोरा ३. चक्रावळ ४. जिद्द ५. अनोळखी दिशा (कथा संग्रह) पुस्तक हाताशी नसेल तर वर उल्लेख केलेल्या यू ट्यूब चॅनेल वर चाळुन पहा. अनुनाद

In reply to by अनुनाद

सस्नेह 05/09/2022 - 20:00
ऐसी रत्ने मेळवीन फायकसची अखेर अबक या आणखी काही विज्ञान कादंबर्या धारपांच्या विज्ञान कथा कादंबर्यांची पंखी -- स्नेहा

In reply to by सस्नेह

अनुनाद 06/09/2022 - 11:51
आवडलंय - खरंतर त्यांच्या झाडून सगळ्या कथा वाचल्या आहेत. बऱ्याचश्या संग्रही आहेत. एक छोटा refresher हवा असेल तर लेखांती उल्लेख केलेली यक्ष हि कथा youtube वर ऐकून पहा.

In reply to by अनुनाद

भागो 06/09/2022 - 09:26
Wells, Jules Verne, Arthur Clarke, असिमोव या लेखकांच्या तोडीसतोड लिखाण...>>> हे किंचित अति झाले. ते लेखक ओरिजिनल होते. हा कळीचा मुद्दा आहे. जास्त लिहित नाही. माझ्या मते नारळीकर, बाळ फोंडके, लक्षमण लोंढे, सुबोध जावडेकर हे खरे विज्ञान कथा लेखक! आणि रत्नाकर मतकरी हे खरे भयकथा लेखक.

In reply to by भागो

जेम्स वांड 06/09/2022 - 10:33
मर्यादित वाचल्यात, पण ज्या वाचल्या आहेत त्यात नारळीकर फारच जास्त आवडले. १. वामन परत न आला - आज एलोन मस्क म्हणतो "AI is more dangerous than nuclear weapons" तेच नारळीकर सर सुलभ कथा लेखनातून सांगून जातात वामन मध्ये. २. यक्षांची देणगी - ही तर माझी फेवरेट विज्ञानकथा कलेक्शन म्हणावीत असली चोपडी. Inter Dimensional travelling वर आधारित असलेली "गंगाधरपंतांचे पानिपत" आणि Time Travelling + Mobius Strip + teleportation वर आधारित "उजव्या सोंडेचा गणपती" ह्या विशेष आठवतात.

In reply to by जेम्स वांड

भागो 06/09/2022 - 12:11
यक्षांची देणगी अबब! आमेझान वर दहावी आवृत्ति आहे! "उजव्या सोंडेचा गणपती" हि कथा http://repository.iucaa.in:8080/jspui/bitstream/11007/3098/1/Ujavya%20sondecha%20Ganapati,Marathi%20Katha%20%20Visave%20Shatak,%20415.pdf इथे आहे. Technical Error by Arthur C. Clarke ही पण अशीच कथा आहे. पण Arthur C. Clarke अजून खोलात गेला आहे.

In reply to by भागो

अनुनाद 06/09/2022 - 12:23
अतिशय आवडलेली गोष्ट - मला बहुधा तुम्ही आता नारळीकरांच्या सर्व कथा परत वाचायला लावणार. :)) envelop आणि inversion वरची आकाशात तरंगणारा डोळा नामक कथा आठवत आहे. - गंगाधर पंतांचे पानिपत आणि काळाला तिरका छेद हे खूप साम्य असणारे कथानक. आर्थर क्लार्क ची nine billion names of god नावाची कथा होती - तिचा अनुवाद कालच त्या चॅनेल वर ऐकला - हिमाल मठाचे गूढ या नावाने. ते कथानक लैच भारी होतं . पण एकूण हे discussion मला खूप समृद्ध करतंय . मनापासून धन्यवाद.

In reply to by भागो

सस्नेह 06/09/2022 - 11:54
विज्ञानकथा आणि फिक्शन यामध्ये बराच फरक आहे. धारपांच्या कथा फिक्शन या सदरात मोडतात. त्यात कल्पना स्वातंत्र्य भरपूर घेतलेले असते. काय अफाट कल्पना असायच्या धारपांच्या !!

In reply to by सस्नेह

अनुनाद 06/09/2022 - 12:13
येस, कळीचा मुद्दा तोच आहे. त्यांच्या युगपुरुष या कथेत - Clifford Simac च्या time is the simplest thing या कथेवर आधारित असलेली असा उल्लेख आहे, पण मूळ कथा वाचून पाहिल्यावर जाणवले कि धारपांनी फक्त ५-१०% मूळ कथेचा आधार, कल्पना म्हणून वापरला आहे. बाकी सर्व त्यांचा कल्पना विलास.. हे खरंच थोर होतं. जिद्द हि कथा - space prison या पुस्तकाचा सही सही अनुवाद आहे. पण आधारित किंवा अनुवादित साहित्यात भाषेचं जे अवघडलेपण दिसतं त्याचा कुठेही मागमूस नाही. एक रिफ्रेशेर म्हणून खरंच ती यक्ष नामक कथा ऐकून पहा.

In reply to by भागो

अनुनाद 06/09/2022 - 12:03
हा हा, खरंय काही वेळा असं होतं कि उत्साहात काही तरी अति होऊन जातं सो क्षमस्व - नारळीकरांच्या आणि बाळ फोंडकेंच्याही सर्व - झाडून सर्व कथा वाचल्या - त्यातल्या फोंडकेंच्या एका कथेत एका astronaut च्या शरीरातून तो अवकाशातून परत आल्या नंतर एक रेडिओ frequency सतत उत्सर्जित होत असते आणि हि कल्पना नंतर काही पक्षी आणि whales ट्रॅकिंग करण्यासाठी वापरली जात आहे - अजूनही - हे भारी होतं. डाव्या सोंडेचा गणपती, वामन आठवतात. हे खरंच थोर होतं... बाकी आधारित असूनही अस्सल मराठी मातीतली वाटणारी कथा हि मला वाटतं - धारपांची ताकद होती. एक छोटा refresher हवा असेल तर लेखांती उल्लेख केलेली यक्ष हि कथा youtube वर ऐकून पहा.

जेम्स वांड 04/09/2022 - 22:08
तुमचे विज्ञानकथा ह्या लेखन पद्धती आणि कथा प्रकारातील लिखाणावर असलेले प्रेम नीट पोचले तुमच्या लेखनातून. @मुटकेजी, मला वाटतं लेखक धारपांच्या एकंदरीत प्रसिद्धी बद्दल बोलत नसून धारपांच्या विज्ञानकथा लेखक म्हणून (पुरेसे) प्रसिद्ध न वाटण्याबद्दल बोलत असावेत. धारप विज्ञानकथा लेखक होते हे मला प्रामाणिकपणे माहिती नव्हते , अर्थात मी काही अखिल महाराष्ट्रीय मराठी विज्ञानकथा वाचक वर्गाचा प्रतिनिधी नाही तरीही बहुसंख्य लोकांना धारप विज्ञानकथा लेखक असलेलं ठाऊक असेल असे वाटत नाही मला तरी.

In reply to by जेम्स वांड

मला वाटतं लेखक धारपांच्या एकंदरीत प्रसिद्धी बद्दल बोलत नसून धारपांच्या विज्ञानकथा लेखक म्हणून (पुरेसे) प्रसिद्ध न वाटण्याबद्दल बोलत असावेत. धारप विज्ञानकथा लेखक होते हे मला प्रामाणिकपणे माहिती नव्हते , अर्थात मी काही अखिल महाराष्ट्रीय मराठी विज्ञानकथा वाचक वर्गाचा प्रतिनिधी नाही तरीही बहुसंख्य लोकांना धारप विज्ञानकथा लेखक असलेलं ठाऊक असेल असे वाटत नाही मला तरी.
घाईत प्रतिसाद देण्यात माझी चूकच झाली. पण मला देखील ते विज्ञानकथा आहेत असे त्या काळी वाटत नव्हते. एकापेक्षा जास्त कथांचे संदर्भ आले तर कदाचित अनुमान काढता येईल. शिवाय ते भयकथा लेखक आहेत असे देखील मला कधी वाटले नाही. ते माझ्यामते गुढकथालेखक जास्त होते. भय हे त्यांच्या कथेचे उपउत्पादन म्हणता येईल कदाचित. अर्थात मला माझेच विचार तपासावे लागतील कारण धारप वाचून पुष्कळ काळ लोटला आहे. आता माळ्यावरुन सुटकेस काढून साठे फायकस आणि अजून काही खजिना असेल तो परत एकदा चाळावा लागेल.

In reply to by धर्मराजमुटके

अनुनाद 05/09/2022 - 00:46
धारप वाचून पुष्कळ काळ लोटला आहे. आता माळ्यावरुन सुटकेस काढून साठे फायकस आणि अजून काही खजिना असेल तो परत एकदा चाळावा लागेल. खरंय - आणि तुम्हाला त्यात नक्की मजा येईल

In reply to by जेम्स वांड

अनुनाद 05/09/2022 - 00:52
हा हा.. तुम्हाला माझ्या लिहिण्याचं reading between the lines नक्कीच कळलंय. वरील उत्तरातील काही पुस्तकं नक्की चाळून पहा - मजा येईल

तर्कवादी 05/09/2022 - 00:22
तेरा चित्रपट रिलीज झाल्यावर, X-Men चित्रपट मालिका ही जगभरात आठव्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणारी चित्रपट मालिका ठरली, या चित्रपटांनी 6 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. अशा गोष्टी पाहण्या / वाचण्याकरता आता कुठे भारतातील प्रेक्षक mature होत आहेत.
काहीसा असहमत म्हणजे नारायण धारप यांच्या कथा कदाचित चांगल्या असतीलही आणि त्या तितक्याशा प्रसिध्द न पावण्याबाबत सहमती. X-Men बद्दल माहित नाही. पण हॉलीवूड मध्ये वैज्ञानिक कथानक असलेले अनेक चित्रपट निघतात. पण बहुतेककरुन ते उगाच पांचट असतात .. त्यातली तांत्रिक करामतींसाठीची मेहनत कौतुकास्पद असते पण चित्रपट अनेकदा फसलेले असतात. अलिकडेच replicas आणि anti matter हे दोन फसलेले चित्रपट पाहिलेत. त्यातल्या त्यात replicas बरा. anti matter पुर्णतः गंडलेला. आणखी अनेक चित्रपट आठवता येतील. आणि हिंदीत/मराठीत असे चित्रपट काढल्यास त्यांना प्रेक्षक डोक्यावर घेणार नसतील तर प्रेक्षकांना मी अपरिपक्व म्हणणार् नाही

अनुनाद 05/09/2022 - 00:44
तुमचे म्हणणे बरोबर, आताचे काही हॉलिवूड चित्रपट अति तांत्रिक आहेत पाहवत नाहीत किंवा अंगावर येतात. पण आपल्याकडे जसा हिंदी चित्रपटांचा golden era येऊन गेला तसाच तिकडेही... ६० ते ९० च्या काळातले काही चित्रपट आजही क्लासिक मानले जातात. २००१ a space odyssey किंवा स्टारवॉर्स, स्टारट्रेक - DC कॉमिक्स वगैरे संपूर्ण २-३ पिढ्या समृद्ध करून गेल्या - MIB या चित्रपटात शेवटच्या सीन मध्ये माणूस म्हणून आपल्या खुजेपणाची जाणीव होते. या प्रत्येक चित्रपटातून काही तरी विचाराला चालना मिळते. काही वेगळी दिशा सापडते - तसं काही आपल्याकडे घडताना दिसत नाही - मी या चर्चेत पडत नाही पण काही पुस्तकं (वाचली नसतील तर) निदान चाळून पहा खरंच खूप समृद्ध करणारा अनुभव - पहिल्या comment ला दिलेल्या उत्तरात काही पुस्तकांची नावे दिली आहेत.

In reply to by अनुनाद

तर्कवादी 05/09/2022 - 00:58
या प्रत्येक चित्रपटातून काही तरी विचाराला चालना मिळते. काही वेगळी दिशा सापडते - तसं काही आपल्याकडे घडताना दिसत नाही
प्रत्येक समाजाची आवड निराळी असू शकते. अमेरिकन लोकांना सायन्स फिक्शन मधून वैचारिक /आशयघन सापडत असेल. आपल्याकडे इतर प्रकारच्या चित्रपटांतून
ण आपल्याकडे जसा हिंदी चित्रपटांचा golden era येऊन गेला तसाच तिकडेही.
बरोबर आहे आणि आपल्या हिंदी चित्रपटांच्या सुवर्ण काळात अनेक आशयघन चित्रपट आलेत. व्यावसायिक चित्रपटांतही दिवार सारख्या चित्रपटांतून काही विचार (भावना/ कर्तव्य यातले द्वंद ई) व्यक्त झालेत तर कलात्मक चित्रटांची मोठी यादी देता येईल. आपल्याकडे सायन्स निर्मात्यांनी फिक्शनला फारसा हात घातला नाही आणि त्यामुळे तो प्रकार लोकप्रिय झाला नाही. आता वाचनाचे प्रमाण कमी झाले आहे...चांगल्या पुस्तकांवर चित्रपट बनलेत व ते योग्य पद्धतीने बनवले गेलेत तर लोकप्रिय होवू शकतील. आता मराठी चित्रपटांचा सुवर्ण काळ आलाय असे म्हणता येइल. मराठी निर्मात्यांनी पुढे येत नवीन प्रयोग करायला हवेत.

लहानपणी नारायण धारप,बाबूराव अर्नाळकर सगळ्यात जास्त आवडते लेखक होते. अनुक्रमे समर्थ व काळापहाड ह्या व्यक्तिरेखा खुपच भारी वाटायच्या. चित्रपट तंत्रज्ञान विकसित न झाल्या मुळे व लोकांची आवड ,कल या विषयाकडे कमी असणे हे सुद्धा एक कारण असू शकेल. साठे व फायकस आणी त्याचा थरार अजुनही डोक्यातून जात नाही. बाकी पुष्कळ रहस्यकथा वाचल्या पण विस्मृतीत गेल्या. आमचं बालपणी अंगावर काटे आणून थरारक भन्नाट करण्यासाठी दोघाही दिग्गजांना मानाचा मुजरा.

शाम भागवत 05/09/2022 - 08:12
६-७ वीत असताना वाचायचो. रात्री झोप लागायची नाही. एकदा गोष्ट वाचायला सुरवात केली की, थांबताच यायचं नाही. एका वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटायचे. आता पुन्हा या पुस्तकाला हात लावायचा नाही व पुढची गोष्ट वाचायची नाही असं ठरवायचो. पण ८-१० तासांनी किंवा दुसऱ्या दिवशी पुढची गोष्ट वाचल्याशिवाय चैन पडायचं नाही. समर्थ ही व्यक्तिरेखा खूप भुरळ घालायची. असं वाटायचं की, ते कुठून तरी येतील व मला वाचवतील. त्या एका भरवशावर वाचायचे धाडस करत असे.

In reply to by शाम भागवत

अनुनाद 06/09/2022 - 12:30
exactly समर्थ आणि कृष्णचंद्र ह्या व्यक्तिरेखा म्हणजे एक वेगळेच जग होते - तुम्ही वर्णन केलेला फील मीही अनुभवला आहे. :)) उंबरठा हि कथा आठवते दोन मित्र.. एक नॉर्मल एक सायकिक त्या चॅनेल वर ती हि कथा ऐकली आणि अफाट आवडली होती ...

विजुभाऊ 05/09/2022 - 09:51
मला स्वतःला धारपांच्या भयकथा आवडतातच पण विज्ञानकथा त्याहून जास्त आवडतात. नेनचिम , गोग्रामचा चित्रार , बहुमनी या पुन्हा पुन्हा वाचल्या आहेत.

In reply to by विजुभाऊ

अनुनाद 06/09/2022 - 12:38
नेनचिम आवडली असेल तर "कंताचा मनोरा" (वाचली नसेल तर) जरूर निदान चाळून पहा - गोग्रामचा चितार मला आठवतंय - बहुधा ती माझी SciFi वाचनाची सुरुवात असावी. खरंतर भा. रा. भागवत यांच्या चंद्रावर स्वारी, धूमकेतूचे रहस्य इ कथा वाचताना रमून जायला व्हायचं - नंतर कळलं ती Jules Verne ची पुस्तकं होती, पण भागवतांनी खरंच गोडी लावली . नेनचिम म्हणजे अक्षरशः world class documentary होती... Mission to Mars ह्या चित्रपटात तीच कल्पना वापरली आहे.

भागो 05/09/2022 - 17:39
भारतात विज्ञान आधारित काहीही खपत नाही. आपल्याला फेकाफेकी जास्त पसंत. आताच "दोबारा" नावाचा चित्रपट येऊन "गेला." कुणी बघितला? कित्येक थेटरात शो कॅंसल झाले. अप्रतिम पिक्चर !

In reply to by भागो

तर्कवादी 05/09/2022 - 18:04
भारतात विज्ञान आधारित काहीही खपत नाही
असं नाहीये.. कोई मिल गया, क्रिश, रा वन आणि फार पुर्वी मिस्टर इंडिया हे चित्रपट चालले होते.
आपल्याला फेकाफेकी जास्त पसंत
हॉलिवूडच्या सायन्स फिक्शनमध्येही फेकाफेकीच असते की !!

In reply to by भागो

तर्कवादी 05/09/2022 - 19:17
भारतात विज्ञान आधारित काहीही खपत नाही
"एक डॉक्टरकी मौत" हा आशयघन चित्रपट १९९० मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने कमाई किती केली ते माहित नाही पण हा चित्रपट अनेकांना माहित आहे इतकं नक्की (चर्चेत राहिला)

भागो 05/09/2022 - 19:02
असं नाहीये.. कोई मिल गया, क्रिश, रा वन आणि फार पुर्वी मिस्टर इंडिया हे चित्रपट चालले होते.>>> व्वा. कळलंं. हाताला पाच बोट आहेत. अजून एक पिक्चरचे नाव टाका. रोबो? हॉलिवूडच्या सायन्स फिक्शनमध्येही फेकाफेकीच असते की !!>> चालायचेच.

nutanm 06/09/2022 - 06:59
मी बाबूराव अर्नाळकरांच्या झुंजार व काळापहाड कथा खूपच वाचल्या. 68--70 साली. धारप त्यानंतर आले तोवर माझा रहस्यकथेतला interest संपला होता . व मला तेव्हा त्यांची पुस्तके म्हणजे सायन्स फिक्शन ई० माहित नव्हते कळण्यासही कठीण व भितीदायक वाटल्या . त्याचवेळी मला ऐतिहासिक पुस्तकांचे वेड लागत होते म्हणून नारायण धारप तितकेसे आवडले नाहीत व डोक्यावरूनही गेले. झुंजार व काळापहाड खूप म्हणजे खूप आवडायची. काळापहाडचे चोरांची दुनिया अजूनही चांगले लक्षांत आहे खूप मस्त पुस्तक व वेगळीच चोरांची दुनिया जी काळापहाडने समाजात उघडकीस आणली व पोलिसांच्या ताब्यात बहुतेक चोर दिले, खूपच मजा आलेली वयाच्या 12/13 व्यवर्षी वाचताना व मस्त घाबरण्याचा थरार घेत रहस्यकथा वाचत असे. नविनच जगाची / पुस्तकांच्या थरारक व़िश्र्वाची ओळख होत होती.

nutanm 06/09/2022 - 07:14
झुंजार तर माझा खूपच आवडता हिरो व हे व्यक्त करणे मला जमायचे नाही व भिती व लाजही खूप वाटे त्या अर्धवट वयात. पण काळापहाड व झुंजार अजूनही खूप आवडतात. पण आता ही पुस्तके मिळत नाही वसमाज, काळ पुढे गेल्याने वाचणार्यांना थरारही वाटणार नाही, शस्त्रास्त्रेही खूप आधुनिक होऊन झुंजारचे ठोसे मारून ठगाला लोळविणे हे सर्वच शब्दासकट खूप बाळबोध वाटते व आहे हल्लीच्या काळात

In reply to by nutanm

भागो 06/09/2022 - 09:16
झुंझार माझा पण अगदी आवडता हिरो. त्या काळी माझा एक मित्र लायब्ररीतून बाबुराव अर्नाळकर गुपचूप उचलून आणून मला देत असे. त्यांची पुस्तके अजूनही मिळतात. आमेझान वर आहेत. बुधवार पेठेत मिळतात मला काही रद्दीच्या दुकानात मिळाली. शोध म्हणजे सापडेल. आता मी मुलाबरोबर/मुलीबरोबर इंग्लिश वाचायला शिकलो. मग काय खजिनाच खुला झाला. खूप खूप वाचले. पण अजूनही मला "गुजबंप्स"अतिशय आवडतात. अचाट भीतिकथा. लहान मुलांसाठी आहेत. पण ओपन आवडीने वाचतो बुवा.

Bhakti 06/09/2022 - 11:11
धारप यांचं कोणतं पुस्तक पहिल्यांदा वाचावं? तिकडची आवडती सायन्स फिक्शन फिल्म Lucy कन्सेप्ट जाम आवडतो, आणि मानवाच्या आवाक्यातला विषय आहे. इकडची आवडती सायन्स फिक्शन नाही आठवत ;) बाकी केवळ फिक्शनमध्ये अनेक मराठी छान सिनेमा जे आवडतात आहेत .पण धागा भरकटेल नंतर कधीतरी सांगते :)

अनुनाद 06/09/2022 - 11:47
मी त्या धाग्या च्या प्रथम लेखात उल्लेख केलेली यक्ष हि कथा sansovoice या you tube चॅनेल वर पहिली - खरंतर त्यातूनच हे लिहावंसं वाटलं - ऐकून पहा

स्वधर्म 06/09/2022 - 15:33
अगदी १४-१५ वर्षांचा असल्यापासून धारप वाचायची गोडी लागली. इथे त्यांचे इतके चाहते आहेत, हे पाहून खूप आनंद झालेला आहे. शब्द किती म्हणून काटेकोर वापरावेत? त्यांच्या ‘दस्त’ या कादंबरीचे फक्त पहिले पान, पहिला परिच्छेद वाचून गार पडलो होतो. एका परिच्छेदात व्यक्तिरेखा मूर्तीमंत समोर उभी करावी, ती धारपांनीच! त्यांच्या बर्याच कथा या विशिष्ट भारित घरांवर, बखळींवर, जागांवर आहेत. त्यात काही अघोरी, अमूर्त आपल्या त्रिमित विश्वापलिकडचं असं असायचं. सर्व कथांचा शेवट सुष्टाचा दुष्टावर विजय छापाच्या असल्या तरी, धारप प्लॉट असा काही फुलवतात, की माणूस अडकून पडलाच पाहिजे. त्यांच्या विज्ञानकथांपैकी दोन्ही फायकस केवळ अप्रतिम! झाडे एकमेकांशी संपर्कात असणे, त्यांची काही स्ट्रॅटेजी असणे, ही कल्पनाच अफलातून! नंतर नंतर थोडा साचेबध्दपणा आला, तरी धारप हे ‘न सुचता’ लिहीणारे लेखक नव्हते, म्हणून थोर वाटतात. तुलना कदाचित अप्रस्तुत ठरेल, पण हल्लीचे अनेक लेखक कथाबीजच नसताना पुस्तके ‘पाडतात’ असे वाटते. म्हणजे केवळ मुख्य पात्राच्या मनातील भणभणते विचार हीच कादंबरी, ज्यात काहीही ‘घडत’ नाही. आणि अशा पुस्तकांना पारितोषिकेही मिळतात. अनेक उदाहरणे देता येतील. धारप हे खास मध्यमवर्गीय कुटुंबात, घरात घडणार्या कथा लिहायचे, पण रोमहर्षक! असा लेखक पुन्हा होणे मुश्किल!

In reply to by स्वधर्म

अनुनाद 07/09/2022 - 12:36
अगदी सुरेख लिहीलंयत. वाचकाला गळा दाबून धरणं ही त्यांची खासियत होती. त्यांच्या अझाथोथ वगैरेसारख्या कथांमधून आलेले काही प्राचिन विधींचे उल्लेख आणि वर्णने पाहीली की असं वाटतं की त्यांचा काही सिक्रेट सोसायटीजशी नक्की संबंध असावा... :))

In reply to by धर्मराजमुटके

अनुनाद 05/09/2022 - 00:24
आपल्या अभिप्रायातून आपले साहित्यावरचे प्रेम दिसत आहे, आणि त्या बद्दल धन्यवाद. पण मुद्दा हा आहे कि १९७० मध्ये धारपांनी ज्या कथा लिहिल्या त्या धर्तीचे चित्रपट अफाट लोकप्रिय आता होताना दिसत आहेत. अमेरिकेतली एक गोष्ट जगभर जाते आणि भारतात त्या आधी ३० वर्षे लिहिलेली तशाच धर्तीची कथा सूर्यप्रकाशही पाहू शकत नाही. आणि धारपांच्या कथा - भयकथा किंवा संदेहकथा नव्हे प्युअर सायन्स फिक्शन - कुठलीही काढून पहा. त्यातली भाषाशैली, कथेची मांडणी, त्यातून दिसणारे तंत्रज्ञानाचे मोजक्या शब्दात वर्णन - फाफट पसारा टाळून केलेली नेटकी मांडणी - हे सर्वच काळाच्या पुढचं होतं. वानगीदाखल अगदी मोजक्या कथांची नावं देतोय. कुठलीही पुस्तक काढून पहा. वाचून पूर्ण केल्याखेरीज खाली ठेववत नाही. Hugo Gernsback या लेखकाने मांडलेल्या निकषांवर ह्या कथा तंतोतंत उतरतात. Wells, Jules Verne, Arthur Clarke, असिमोव या लेखकांच्या तोडीसतोड लिखाण... १. युगपुरुष २. कंताचा मनोरा ३. चक्रावळ ४. जिद्द ५. अनोळखी दिशा (कथा संग्रह) पुस्तक हाताशी नसेल तर वर उल्लेख केलेल्या यू ट्यूब चॅनेल वर चाळुन पहा. अनुनाद

In reply to by अनुनाद

सस्नेह 05/09/2022 - 20:00
ऐसी रत्ने मेळवीन फायकसची अखेर अबक या आणखी काही विज्ञान कादंबर्या धारपांच्या विज्ञान कथा कादंबर्यांची पंखी -- स्नेहा

In reply to by सस्नेह

अनुनाद 06/09/2022 - 11:51
आवडलंय - खरंतर त्यांच्या झाडून सगळ्या कथा वाचल्या आहेत. बऱ्याचश्या संग्रही आहेत. एक छोटा refresher हवा असेल तर लेखांती उल्लेख केलेली यक्ष हि कथा youtube वर ऐकून पहा.

In reply to by अनुनाद

भागो 06/09/2022 - 09:26
Wells, Jules Verne, Arthur Clarke, असिमोव या लेखकांच्या तोडीसतोड लिखाण...>>> हे किंचित अति झाले. ते लेखक ओरिजिनल होते. हा कळीचा मुद्दा आहे. जास्त लिहित नाही. माझ्या मते नारळीकर, बाळ फोंडके, लक्षमण लोंढे, सुबोध जावडेकर हे खरे विज्ञान कथा लेखक! आणि रत्नाकर मतकरी हे खरे भयकथा लेखक.

In reply to by भागो

जेम्स वांड 06/09/2022 - 10:33
मर्यादित वाचल्यात, पण ज्या वाचल्या आहेत त्यात नारळीकर फारच जास्त आवडले. १. वामन परत न आला - आज एलोन मस्क म्हणतो "AI is more dangerous than nuclear weapons" तेच नारळीकर सर सुलभ कथा लेखनातून सांगून जातात वामन मध्ये. २. यक्षांची देणगी - ही तर माझी फेवरेट विज्ञानकथा कलेक्शन म्हणावीत असली चोपडी. Inter Dimensional travelling वर आधारित असलेली "गंगाधरपंतांचे पानिपत" आणि Time Travelling + Mobius Strip + teleportation वर आधारित "उजव्या सोंडेचा गणपती" ह्या विशेष आठवतात.

In reply to by जेम्स वांड

भागो 06/09/2022 - 12:11
यक्षांची देणगी अबब! आमेझान वर दहावी आवृत्ति आहे! "उजव्या सोंडेचा गणपती" हि कथा http://repository.iucaa.in:8080/jspui/bitstream/11007/3098/1/Ujavya%20sondecha%20Ganapati,Marathi%20Katha%20%20Visave%20Shatak,%20415.pdf इथे आहे. Technical Error by Arthur C. Clarke ही पण अशीच कथा आहे. पण Arthur C. Clarke अजून खोलात गेला आहे.

In reply to by भागो

अनुनाद 06/09/2022 - 12:23
अतिशय आवडलेली गोष्ट - मला बहुधा तुम्ही आता नारळीकरांच्या सर्व कथा परत वाचायला लावणार. :)) envelop आणि inversion वरची आकाशात तरंगणारा डोळा नामक कथा आठवत आहे. - गंगाधर पंतांचे पानिपत आणि काळाला तिरका छेद हे खूप साम्य असणारे कथानक. आर्थर क्लार्क ची nine billion names of god नावाची कथा होती - तिचा अनुवाद कालच त्या चॅनेल वर ऐकला - हिमाल मठाचे गूढ या नावाने. ते कथानक लैच भारी होतं . पण एकूण हे discussion मला खूप समृद्ध करतंय . मनापासून धन्यवाद.

In reply to by भागो

सस्नेह 06/09/2022 - 11:54
विज्ञानकथा आणि फिक्शन यामध्ये बराच फरक आहे. धारपांच्या कथा फिक्शन या सदरात मोडतात. त्यात कल्पना स्वातंत्र्य भरपूर घेतलेले असते. काय अफाट कल्पना असायच्या धारपांच्या !!

In reply to by सस्नेह

अनुनाद 06/09/2022 - 12:13
येस, कळीचा मुद्दा तोच आहे. त्यांच्या युगपुरुष या कथेत - Clifford Simac च्या time is the simplest thing या कथेवर आधारित असलेली असा उल्लेख आहे, पण मूळ कथा वाचून पाहिल्यावर जाणवले कि धारपांनी फक्त ५-१०% मूळ कथेचा आधार, कल्पना म्हणून वापरला आहे. बाकी सर्व त्यांचा कल्पना विलास.. हे खरंच थोर होतं. जिद्द हि कथा - space prison या पुस्तकाचा सही सही अनुवाद आहे. पण आधारित किंवा अनुवादित साहित्यात भाषेचं जे अवघडलेपण दिसतं त्याचा कुठेही मागमूस नाही. एक रिफ्रेशेर म्हणून खरंच ती यक्ष नामक कथा ऐकून पहा.

In reply to by भागो

अनुनाद 06/09/2022 - 12:03
हा हा, खरंय काही वेळा असं होतं कि उत्साहात काही तरी अति होऊन जातं सो क्षमस्व - नारळीकरांच्या आणि बाळ फोंडकेंच्याही सर्व - झाडून सर्व कथा वाचल्या - त्यातल्या फोंडकेंच्या एका कथेत एका astronaut च्या शरीरातून तो अवकाशातून परत आल्या नंतर एक रेडिओ frequency सतत उत्सर्जित होत असते आणि हि कल्पना नंतर काही पक्षी आणि whales ट्रॅकिंग करण्यासाठी वापरली जात आहे - अजूनही - हे भारी होतं. डाव्या सोंडेचा गणपती, वामन आठवतात. हे खरंच थोर होतं... बाकी आधारित असूनही अस्सल मराठी मातीतली वाटणारी कथा हि मला वाटतं - धारपांची ताकद होती. एक छोटा refresher हवा असेल तर लेखांती उल्लेख केलेली यक्ष हि कथा youtube वर ऐकून पहा.

जेम्स वांड 04/09/2022 - 22:08
तुमचे विज्ञानकथा ह्या लेखन पद्धती आणि कथा प्रकारातील लिखाणावर असलेले प्रेम नीट पोचले तुमच्या लेखनातून. @मुटकेजी, मला वाटतं लेखक धारपांच्या एकंदरीत प्रसिद्धी बद्दल बोलत नसून धारपांच्या विज्ञानकथा लेखक म्हणून (पुरेसे) प्रसिद्ध न वाटण्याबद्दल बोलत असावेत. धारप विज्ञानकथा लेखक होते हे मला प्रामाणिकपणे माहिती नव्हते , अर्थात मी काही अखिल महाराष्ट्रीय मराठी विज्ञानकथा वाचक वर्गाचा प्रतिनिधी नाही तरीही बहुसंख्य लोकांना धारप विज्ञानकथा लेखक असलेलं ठाऊक असेल असे वाटत नाही मला तरी.

In reply to by जेम्स वांड

मला वाटतं लेखक धारपांच्या एकंदरीत प्रसिद्धी बद्दल बोलत नसून धारपांच्या विज्ञानकथा लेखक म्हणून (पुरेसे) प्रसिद्ध न वाटण्याबद्दल बोलत असावेत. धारप विज्ञानकथा लेखक होते हे मला प्रामाणिकपणे माहिती नव्हते , अर्थात मी काही अखिल महाराष्ट्रीय मराठी विज्ञानकथा वाचक वर्गाचा प्रतिनिधी नाही तरीही बहुसंख्य लोकांना धारप विज्ञानकथा लेखक असलेलं ठाऊक असेल असे वाटत नाही मला तरी.
घाईत प्रतिसाद देण्यात माझी चूकच झाली. पण मला देखील ते विज्ञानकथा आहेत असे त्या काळी वाटत नव्हते. एकापेक्षा जास्त कथांचे संदर्भ आले तर कदाचित अनुमान काढता येईल. शिवाय ते भयकथा लेखक आहेत असे देखील मला कधी वाटले नाही. ते माझ्यामते गुढकथालेखक जास्त होते. भय हे त्यांच्या कथेचे उपउत्पादन म्हणता येईल कदाचित. अर्थात मला माझेच विचार तपासावे लागतील कारण धारप वाचून पुष्कळ काळ लोटला आहे. आता माळ्यावरुन सुटकेस काढून साठे फायकस आणि अजून काही खजिना असेल तो परत एकदा चाळावा लागेल.

In reply to by धर्मराजमुटके

अनुनाद 05/09/2022 - 00:46
धारप वाचून पुष्कळ काळ लोटला आहे. आता माळ्यावरुन सुटकेस काढून साठे फायकस आणि अजून काही खजिना असेल तो परत एकदा चाळावा लागेल. खरंय - आणि तुम्हाला त्यात नक्की मजा येईल

In reply to by जेम्स वांड

अनुनाद 05/09/2022 - 00:52
हा हा.. तुम्हाला माझ्या लिहिण्याचं reading between the lines नक्कीच कळलंय. वरील उत्तरातील काही पुस्तकं नक्की चाळून पहा - मजा येईल

तर्कवादी 05/09/2022 - 00:22
तेरा चित्रपट रिलीज झाल्यावर, X-Men चित्रपट मालिका ही जगभरात आठव्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणारी चित्रपट मालिका ठरली, या चित्रपटांनी 6 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. अशा गोष्टी पाहण्या / वाचण्याकरता आता कुठे भारतातील प्रेक्षक mature होत आहेत.
काहीसा असहमत म्हणजे नारायण धारप यांच्या कथा कदाचित चांगल्या असतीलही आणि त्या तितक्याशा प्रसिध्द न पावण्याबाबत सहमती. X-Men बद्दल माहित नाही. पण हॉलीवूड मध्ये वैज्ञानिक कथानक असलेले अनेक चित्रपट निघतात. पण बहुतेककरुन ते उगाच पांचट असतात .. त्यातली तांत्रिक करामतींसाठीची मेहनत कौतुकास्पद असते पण चित्रपट अनेकदा फसलेले असतात. अलिकडेच replicas आणि anti matter हे दोन फसलेले चित्रपट पाहिलेत. त्यातल्या त्यात replicas बरा. anti matter पुर्णतः गंडलेला. आणखी अनेक चित्रपट आठवता येतील. आणि हिंदीत/मराठीत असे चित्रपट काढल्यास त्यांना प्रेक्षक डोक्यावर घेणार नसतील तर प्रेक्षकांना मी अपरिपक्व म्हणणार् नाही

अनुनाद 05/09/2022 - 00:44
तुमचे म्हणणे बरोबर, आताचे काही हॉलिवूड चित्रपट अति तांत्रिक आहेत पाहवत नाहीत किंवा अंगावर येतात. पण आपल्याकडे जसा हिंदी चित्रपटांचा golden era येऊन गेला तसाच तिकडेही... ६० ते ९० च्या काळातले काही चित्रपट आजही क्लासिक मानले जातात. २००१ a space odyssey किंवा स्टारवॉर्स, स्टारट्रेक - DC कॉमिक्स वगैरे संपूर्ण २-३ पिढ्या समृद्ध करून गेल्या - MIB या चित्रपटात शेवटच्या सीन मध्ये माणूस म्हणून आपल्या खुजेपणाची जाणीव होते. या प्रत्येक चित्रपटातून काही तरी विचाराला चालना मिळते. काही वेगळी दिशा सापडते - तसं काही आपल्याकडे घडताना दिसत नाही - मी या चर्चेत पडत नाही पण काही पुस्तकं (वाचली नसतील तर) निदान चाळून पहा खरंच खूप समृद्ध करणारा अनुभव - पहिल्या comment ला दिलेल्या उत्तरात काही पुस्तकांची नावे दिली आहेत.

In reply to by अनुनाद

तर्कवादी 05/09/2022 - 00:58
या प्रत्येक चित्रपटातून काही तरी विचाराला चालना मिळते. काही वेगळी दिशा सापडते - तसं काही आपल्याकडे घडताना दिसत नाही
प्रत्येक समाजाची आवड निराळी असू शकते. अमेरिकन लोकांना सायन्स फिक्शन मधून वैचारिक /आशयघन सापडत असेल. आपल्याकडे इतर प्रकारच्या चित्रपटांतून
ण आपल्याकडे जसा हिंदी चित्रपटांचा golden era येऊन गेला तसाच तिकडेही.
बरोबर आहे आणि आपल्या हिंदी चित्रपटांच्या सुवर्ण काळात अनेक आशयघन चित्रपट आलेत. व्यावसायिक चित्रपटांतही दिवार सारख्या चित्रपटांतून काही विचार (भावना/ कर्तव्य यातले द्वंद ई) व्यक्त झालेत तर कलात्मक चित्रटांची मोठी यादी देता येईल. आपल्याकडे सायन्स निर्मात्यांनी फिक्शनला फारसा हात घातला नाही आणि त्यामुळे तो प्रकार लोकप्रिय झाला नाही. आता वाचनाचे प्रमाण कमी झाले आहे...चांगल्या पुस्तकांवर चित्रपट बनलेत व ते योग्य पद्धतीने बनवले गेलेत तर लोकप्रिय होवू शकतील. आता मराठी चित्रपटांचा सुवर्ण काळ आलाय असे म्हणता येइल. मराठी निर्मात्यांनी पुढे येत नवीन प्रयोग करायला हवेत.

लहानपणी नारायण धारप,बाबूराव अर्नाळकर सगळ्यात जास्त आवडते लेखक होते. अनुक्रमे समर्थ व काळापहाड ह्या व्यक्तिरेखा खुपच भारी वाटायच्या. चित्रपट तंत्रज्ञान विकसित न झाल्या मुळे व लोकांची आवड ,कल या विषयाकडे कमी असणे हे सुद्धा एक कारण असू शकेल. साठे व फायकस आणी त्याचा थरार अजुनही डोक्यातून जात नाही. बाकी पुष्कळ रहस्यकथा वाचल्या पण विस्मृतीत गेल्या. आमचं बालपणी अंगावर काटे आणून थरारक भन्नाट करण्यासाठी दोघाही दिग्गजांना मानाचा मुजरा.

शाम भागवत 05/09/2022 - 08:12
६-७ वीत असताना वाचायचो. रात्री झोप लागायची नाही. एकदा गोष्ट वाचायला सुरवात केली की, थांबताच यायचं नाही. एका वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटायचे. आता पुन्हा या पुस्तकाला हात लावायचा नाही व पुढची गोष्ट वाचायची नाही असं ठरवायचो. पण ८-१० तासांनी किंवा दुसऱ्या दिवशी पुढची गोष्ट वाचल्याशिवाय चैन पडायचं नाही. समर्थ ही व्यक्तिरेखा खूप भुरळ घालायची. असं वाटायचं की, ते कुठून तरी येतील व मला वाचवतील. त्या एका भरवशावर वाचायचे धाडस करत असे.

In reply to by शाम भागवत

अनुनाद 06/09/2022 - 12:30
exactly समर्थ आणि कृष्णचंद्र ह्या व्यक्तिरेखा म्हणजे एक वेगळेच जग होते - तुम्ही वर्णन केलेला फील मीही अनुभवला आहे. :)) उंबरठा हि कथा आठवते दोन मित्र.. एक नॉर्मल एक सायकिक त्या चॅनेल वर ती हि कथा ऐकली आणि अफाट आवडली होती ...

विजुभाऊ 05/09/2022 - 09:51
मला स्वतःला धारपांच्या भयकथा आवडतातच पण विज्ञानकथा त्याहून जास्त आवडतात. नेनचिम , गोग्रामचा चित्रार , बहुमनी या पुन्हा पुन्हा वाचल्या आहेत.

In reply to by विजुभाऊ

अनुनाद 06/09/2022 - 12:38
नेनचिम आवडली असेल तर "कंताचा मनोरा" (वाचली नसेल तर) जरूर निदान चाळून पहा - गोग्रामचा चितार मला आठवतंय - बहुधा ती माझी SciFi वाचनाची सुरुवात असावी. खरंतर भा. रा. भागवत यांच्या चंद्रावर स्वारी, धूमकेतूचे रहस्य इ कथा वाचताना रमून जायला व्हायचं - नंतर कळलं ती Jules Verne ची पुस्तकं होती, पण भागवतांनी खरंच गोडी लावली . नेनचिम म्हणजे अक्षरशः world class documentary होती... Mission to Mars ह्या चित्रपटात तीच कल्पना वापरली आहे.

भागो 05/09/2022 - 17:39
भारतात विज्ञान आधारित काहीही खपत नाही. आपल्याला फेकाफेकी जास्त पसंत. आताच "दोबारा" नावाचा चित्रपट येऊन "गेला." कुणी बघितला? कित्येक थेटरात शो कॅंसल झाले. अप्रतिम पिक्चर !

In reply to by भागो

तर्कवादी 05/09/2022 - 18:04
भारतात विज्ञान आधारित काहीही खपत नाही
असं नाहीये.. कोई मिल गया, क्रिश, रा वन आणि फार पुर्वी मिस्टर इंडिया हे चित्रपट चालले होते.
आपल्याला फेकाफेकी जास्त पसंत
हॉलिवूडच्या सायन्स फिक्शनमध्येही फेकाफेकीच असते की !!

In reply to by भागो

तर्कवादी 05/09/2022 - 19:17
भारतात विज्ञान आधारित काहीही खपत नाही
"एक डॉक्टरकी मौत" हा आशयघन चित्रपट १९९० मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने कमाई किती केली ते माहित नाही पण हा चित्रपट अनेकांना माहित आहे इतकं नक्की (चर्चेत राहिला)

भागो 05/09/2022 - 19:02
असं नाहीये.. कोई मिल गया, क्रिश, रा वन आणि फार पुर्वी मिस्टर इंडिया हे चित्रपट चालले होते.>>> व्वा. कळलंं. हाताला पाच बोट आहेत. अजून एक पिक्चरचे नाव टाका. रोबो? हॉलिवूडच्या सायन्स फिक्शनमध्येही फेकाफेकीच असते की !!>> चालायचेच.

nutanm 06/09/2022 - 06:59
मी बाबूराव अर्नाळकरांच्या झुंजार व काळापहाड कथा खूपच वाचल्या. 68--70 साली. धारप त्यानंतर आले तोवर माझा रहस्यकथेतला interest संपला होता . व मला तेव्हा त्यांची पुस्तके म्हणजे सायन्स फिक्शन ई० माहित नव्हते कळण्यासही कठीण व भितीदायक वाटल्या . त्याचवेळी मला ऐतिहासिक पुस्तकांचे वेड लागत होते म्हणून नारायण धारप तितकेसे आवडले नाहीत व डोक्यावरूनही गेले. झुंजार व काळापहाड खूप म्हणजे खूप आवडायची. काळापहाडचे चोरांची दुनिया अजूनही चांगले लक्षांत आहे खूप मस्त पुस्तक व वेगळीच चोरांची दुनिया जी काळापहाडने समाजात उघडकीस आणली व पोलिसांच्या ताब्यात बहुतेक चोर दिले, खूपच मजा आलेली वयाच्या 12/13 व्यवर्षी वाचताना व मस्त घाबरण्याचा थरार घेत रहस्यकथा वाचत असे. नविनच जगाची / पुस्तकांच्या थरारक व़िश्र्वाची ओळख होत होती.

nutanm 06/09/2022 - 07:14
झुंजार तर माझा खूपच आवडता हिरो व हे व्यक्त करणे मला जमायचे नाही व भिती व लाजही खूप वाटे त्या अर्धवट वयात. पण काळापहाड व झुंजार अजूनही खूप आवडतात. पण आता ही पुस्तके मिळत नाही वसमाज, काळ पुढे गेल्याने वाचणार्यांना थरारही वाटणार नाही, शस्त्रास्त्रेही खूप आधुनिक होऊन झुंजारचे ठोसे मारून ठगाला लोळविणे हे सर्वच शब्दासकट खूप बाळबोध वाटते व आहे हल्लीच्या काळात

In reply to by nutanm

भागो 06/09/2022 - 09:16
झुंझार माझा पण अगदी आवडता हिरो. त्या काळी माझा एक मित्र लायब्ररीतून बाबुराव अर्नाळकर गुपचूप उचलून आणून मला देत असे. त्यांची पुस्तके अजूनही मिळतात. आमेझान वर आहेत. बुधवार पेठेत मिळतात मला काही रद्दीच्या दुकानात मिळाली. शोध म्हणजे सापडेल. आता मी मुलाबरोबर/मुलीबरोबर इंग्लिश वाचायला शिकलो. मग काय खजिनाच खुला झाला. खूप खूप वाचले. पण अजूनही मला "गुजबंप्स"अतिशय आवडतात. अचाट भीतिकथा. लहान मुलांसाठी आहेत. पण ओपन आवडीने वाचतो बुवा.

Bhakti 06/09/2022 - 11:11
धारप यांचं कोणतं पुस्तक पहिल्यांदा वाचावं? तिकडची आवडती सायन्स फिक्शन फिल्म Lucy कन्सेप्ट जाम आवडतो, आणि मानवाच्या आवाक्यातला विषय आहे. इकडची आवडती सायन्स फिक्शन नाही आठवत ;) बाकी केवळ फिक्शनमध्ये अनेक मराठी छान सिनेमा जे आवडतात आहेत .पण धागा भरकटेल नंतर कधीतरी सांगते :)

अनुनाद 06/09/2022 - 11:47
मी त्या धाग्या च्या प्रथम लेखात उल्लेख केलेली यक्ष हि कथा sansovoice या you tube चॅनेल वर पहिली - खरंतर त्यातूनच हे लिहावंसं वाटलं - ऐकून पहा

स्वधर्म 06/09/2022 - 15:33
अगदी १४-१५ वर्षांचा असल्यापासून धारप वाचायची गोडी लागली. इथे त्यांचे इतके चाहते आहेत, हे पाहून खूप आनंद झालेला आहे. शब्द किती म्हणून काटेकोर वापरावेत? त्यांच्या ‘दस्त’ या कादंबरीचे फक्त पहिले पान, पहिला परिच्छेद वाचून गार पडलो होतो. एका परिच्छेदात व्यक्तिरेखा मूर्तीमंत समोर उभी करावी, ती धारपांनीच! त्यांच्या बर्याच कथा या विशिष्ट भारित घरांवर, बखळींवर, जागांवर आहेत. त्यात काही अघोरी, अमूर्त आपल्या त्रिमित विश्वापलिकडचं असं असायचं. सर्व कथांचा शेवट सुष्टाचा दुष्टावर विजय छापाच्या असल्या तरी, धारप प्लॉट असा काही फुलवतात, की माणूस अडकून पडलाच पाहिजे. त्यांच्या विज्ञानकथांपैकी दोन्ही फायकस केवळ अप्रतिम! झाडे एकमेकांशी संपर्कात असणे, त्यांची काही स्ट्रॅटेजी असणे, ही कल्पनाच अफलातून! नंतर नंतर थोडा साचेबध्दपणा आला, तरी धारप हे ‘न सुचता’ लिहीणारे लेखक नव्हते, म्हणून थोर वाटतात. तुलना कदाचित अप्रस्तुत ठरेल, पण हल्लीचे अनेक लेखक कथाबीजच नसताना पुस्तके ‘पाडतात’ असे वाटते. म्हणजे केवळ मुख्य पात्राच्या मनातील भणभणते विचार हीच कादंबरी, ज्यात काहीही ‘घडत’ नाही. आणि अशा पुस्तकांना पारितोषिकेही मिळतात. अनेक उदाहरणे देता येतील. धारप हे खास मध्यमवर्गीय कुटुंबात, घरात घडणार्या कथा लिहायचे, पण रोमहर्षक! असा लेखक पुन्हा होणे मुश्किल!

In reply to by स्वधर्म

अनुनाद 07/09/2022 - 12:36
अगदी सुरेख लिहीलंयत. वाचकाला गळा दाबून धरणं ही त्यांची खासियत होती. त्यांच्या अझाथोथ वगैरेसारख्या कथांमधून आलेले काही प्राचिन विधींचे उल्लेख आणि वर्णने पाहीली की असं वाटतं की त्यांचा काही सिक्रेट सोसायटीजशी नक्की संबंध असावा... :))
श्री. नारायण धारप ह्यांच्यावर भयकथा लेखक हा शिक्का बसला आणि मराठीमधे अतिशय उत्कृष्ट व काळाच्या पुढच्या विज्ञानकथा लिहीणाऱ्या लेखकाची ही बाजू वाचकांसमोर कधीही आली नाही. मराठीत विज्ञानकथा रुजली नाही याला लेखकाची प्रतिभा नव्हे तर वाचकांचं अज्ञान कारणीभूत होतं. कौटुंबिक सिरीयल्सचा तोच तो चोथा चघळणारे प्रेक्षक आणि जीर्णशीर्ण लव्हस्टोरीज पलिकडे न जाणारं बाॅलिवूड यामुळे मायदेशात सायन्सफिक्शन रूळली नाही पण तरीही धारप लिहीतच राहीले... X-men (मालिकेतील पहीला चित्रपट) जुलै २००० मधे release झाला.

पुस्तक परिचय - कोकणच्या आख्यायिका

चिमी ·

मनो 30/07/2022 - 03:40
पुस्तकाविषयी आणि खरेदीसाठी https://www.legendsofkokan.com/ इंग्रजी पुस्तक pdf रुपात आंतरजालावर आहे नाव गुगलवर टाकून पहावे.

@चिमी लेखाबद्दल धन्यवाद @ मनो लिंक व चकटफू पडफ माहीतीसाठी धन्यवाद . उतरून घेतले सवडीने वाचतो. जास्त मोठे नाही फक्त ३३३ पाने आहेत.

मनो 30/07/2022 - 03:40
पुस्तकाविषयी आणि खरेदीसाठी https://www.legendsofkokan.com/ इंग्रजी पुस्तक pdf रुपात आंतरजालावर आहे नाव गुगलवर टाकून पहावे.

@चिमी लेखाबद्दल धन्यवाद @ मनो लिंक व चकटफू पडफ माहीतीसाठी धन्यवाद . उतरून घेतले सवडीने वाचतो. जास्त मोठे नाही फक्त ३३३ पाने आहेत.
कोकणच्या आख्यायिका हे अफाट भारी पुस्तक वाचून पूर्ण झाले. Arthur Crawford (हो, हा म्हणजे मुंबईचे क्रॉफर्ड मार्केट ज्याच्या नावावर आहे ना, तोच हा) मुंबईचा पहिला Municipal Commissioner .. याने आपल्या कोकणातल्या वास्तव्यामध्ये एका भटजीबुवांबरोबर मैत्री केली. या भटजीबुवांकडे एक पोथी-पुराणांचे बाड होते. या पोथ्यांमध्ये लिहिलेल्या होत्या कित्येक वर्षांपूर्वीच्या गोष्टी.

वीस वर्षांनंतर (भाषांतर)

स्मिताके ·

गोष्ट आवडली, शेवट अनपेक्षीत नव्हता पण गोष्ट रंगवुन सांगण्याच्या शैली मुळे वाचावीशी वाटली. पैजारबुवा,

तर्कवादी 16/06/2022 - 11:14
फार पुर्वी ही कथा वाचली होती. आता मराठीत वाचायला आवडली.
बीटवरचा पोलीस
बीट म्हणजे काय ?

क्या बात है. कथा भारी रंगवली आहे, आवडली. ओळ न ओळ, शब्द न शब्द आवडला. कथेचा शेवट पण क्लास आहे. येत राहावे, लिहिते राहावे...! पुलेशु. -दिलीप बिरुटे

कथा छान. वाईट वाटलं. ज्या मित्राला भेटायला तो आलाहोता त्यानेच अशी दगाबाजी करावी. मैत्री २० वर्षे जूनी असो की ३५ वर्षे दगाबाजी होतेच. :)

छान भाषांतर केलंय. मूळ कथा माहित होती तरी वाचताना उत्सुकता होती, मित्र येईल का याची.

स्मिताके 17/06/2022 - 19:56
कुमार१, ज्ञानोबाचे पैजार, तर्कवादी, प्रा. डॉ., अ बा, श्वेता व्यास, भक्ती, सस्नेह, सरिता बांदेकर, कर्नलतपस्वी प्रतिसादांबद्द्ल आभारी आहे. मला आवडलेली कथा आपल्यालाही आवडली हे वाचून आनंद द्विगुणित झाला आहे. कुमार१: आपण लिहिलेली शैलीची वैशिष्ट्ये नेमकी दाखवणारी कथा! तर्कवादी : प्रत्येक पोलिसाच्या गस्त घालण्याच्या ठराविक मार्गाला त्याचा बीट म्हणतात. भक्ती : हो, अगदी चित्रदर्शी कथा आहे. मलाही हे प्रसंग डोळ्यासमोर घडल्यासारखं वाटत होतं.

अंदाजे २७-२८ वर्षांपूर्वी या अनुवादाच्या मूळ कथेचा अनुवाद लोकसत्तेच्या लोकरंगमधे आला होता. ही कथा तेव्हापासून मनाला भावली आहे. आज त्या कथेचा आणखी एक अनुवाद पुन्हा एकदा वाचून खूप समाधान लाभलं. मनःपूर्वक धन्यवाद.

गोष्ट आवडली, शेवट अनपेक्षीत नव्हता पण गोष्ट रंगवुन सांगण्याच्या शैली मुळे वाचावीशी वाटली. पैजारबुवा,

तर्कवादी 16/06/2022 - 11:14
फार पुर्वी ही कथा वाचली होती. आता मराठीत वाचायला आवडली.
बीटवरचा पोलीस
बीट म्हणजे काय ?

क्या बात है. कथा भारी रंगवली आहे, आवडली. ओळ न ओळ, शब्द न शब्द आवडला. कथेचा शेवट पण क्लास आहे. येत राहावे, लिहिते राहावे...! पुलेशु. -दिलीप बिरुटे

कथा छान. वाईट वाटलं. ज्या मित्राला भेटायला तो आलाहोता त्यानेच अशी दगाबाजी करावी. मैत्री २० वर्षे जूनी असो की ३५ वर्षे दगाबाजी होतेच. :)

छान भाषांतर केलंय. मूळ कथा माहित होती तरी वाचताना उत्सुकता होती, मित्र येईल का याची.

स्मिताके 17/06/2022 - 19:56
कुमार१, ज्ञानोबाचे पैजार, तर्कवादी, प्रा. डॉ., अ बा, श्वेता व्यास, भक्ती, सस्नेह, सरिता बांदेकर, कर्नलतपस्वी प्रतिसादांबद्द्ल आभारी आहे. मला आवडलेली कथा आपल्यालाही आवडली हे वाचून आनंद द्विगुणित झाला आहे. कुमार१: आपण लिहिलेली शैलीची वैशिष्ट्ये नेमकी दाखवणारी कथा! तर्कवादी : प्रत्येक पोलिसाच्या गस्त घालण्याच्या ठराविक मार्गाला त्याचा बीट म्हणतात. भक्ती : हो, अगदी चित्रदर्शी कथा आहे. मलाही हे प्रसंग डोळ्यासमोर घडल्यासारखं वाटत होतं.

अंदाजे २७-२८ वर्षांपूर्वी या अनुवादाच्या मूळ कथेचा अनुवाद लोकसत्तेच्या लोकरंगमधे आला होता. ही कथा तेव्हापासून मनाला भावली आहे. आज त्या कथेचा आणखी एक अनुवाद पुन्हा एकदा वाचून खूप समाधान लाभलं. मनःपूर्वक धन्यवाद.
बीटवरचा पोलीस कडक रुबाबात रस्त्यावरून फिरत होता. ती त्याची रोजची सवयीची चाल होती. तो काही कोणाला रुबाब दाखवावा असा प्रयत्न करत नव्हता, कारण त्याला पाहायला तिथे फारसं कोणी नव्हतंच. रात्रीचे दहा वाजत आले होते. थंड वाऱ्याच्या झुळुका सुरु झाल्या होत्या. पावसाचा ओलावा दाटून आला होता. त्यामुळे रस्ते जवळजवळ निर्मनुष्य झाले होते. चालता चालता तो रस्त्यावरच्या दुकानांची दारं ढकलून पाहत होता. हातातली काठी छानशा लयीत फिरवत होता. अधूनमधून वळून आजूबाजूच्या शांत रस्त्यांवर जरबेची नजर टाकत होता. ताठ, दमदार पावलं टाकणारा तो दक्ष पोलीस म्हणजे जणू मूर्तिमंत शांततेचा रक्षक.

भगवद्गीता शांकरभाष्य नमन आणि प्रस्तावना - मराठी भाषांतर

अभिजीत ·

गामा पैलवान 09/05/2022 - 00:43
अभिषेक, अनुवाद फक्कड जमलाय. तन्निमित्त धन्यवाद. हाव आणि मोह यांतील फरक विशेषत्वे भावला. माझ्या मते एखादी वस्तू लाभल्यावर किंचितकाळ तरी समाधान मिळतं, त्यास लोभ म्हणावं. एखाद्या वस्तूची वा प्रसंगाची जी भुरळ पडते त्यास मोह मानावं. बाकी, शंकराचार्यांच्या साहित्यास अवघ्या जगात तोड नाही. हिंदू मानसावर महर्षी व्यासवाल्मिकीपश्चात आद्य शंकराचार्य यांचाच प्रभाव लक्षणीय आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सोत्रि 12/05/2022 - 14:28
इथे षड्रिपू ह्या विकेपेजवर लोभ आणि मोह ह्यांच्या चपखल व्याख्या आहेत. मोह किंवा मोहाचा पडदा हे ignorance ह्या अर्थी समजून घेतल्यास वरील व्याख्या अधिक सुलभतेने समजण्यास मदत होइल. - (मोहाचा पडदा दूर करण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B7%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%82

Jayant Naik 11/05/2022 - 17:54
सुरेख भाषांतर. तुम्ही म्हणता ते खरे आहे. आद्य शंकराचार्य अद्वैत तत्त्वप्रणाली सुरेख शब्दात मांडतात. त्यांचे गीतेचे भाष्य तर प्रमाणभूत म्हणावे लागेल.

Jayant Naik 11/05/2022 - 17:55
सुरेख भाषांतर. तुम्ही म्हणता ते खरे आहे. आद्य शंकराचार्य अद्वैत तत्त्वप्रणाली सुरेख शब्दात मांडतात. त्यांचे गीतेचे भाष्य तर प्रमाणभूत म्हणावे लागेल.

वरील सर्व प्रतिसादांशी देखिल सहमत, शंकराचार्यांनी जे कार्य केले आहे त्याला तोड नाही. तर्कसंगत मांडणी हे त्यांच्या प्रत्येक रचनेचे वैशिठ्य होते. पैजारबुवा,

गामा पैलवान 09/05/2022 - 00:43
अभिषेक, अनुवाद फक्कड जमलाय. तन्निमित्त धन्यवाद. हाव आणि मोह यांतील फरक विशेषत्वे भावला. माझ्या मते एखादी वस्तू लाभल्यावर किंचितकाळ तरी समाधान मिळतं, त्यास लोभ म्हणावं. एखाद्या वस्तूची वा प्रसंगाची जी भुरळ पडते त्यास मोह मानावं. बाकी, शंकराचार्यांच्या साहित्यास अवघ्या जगात तोड नाही. हिंदू मानसावर महर्षी व्यासवाल्मिकीपश्चात आद्य शंकराचार्य यांचाच प्रभाव लक्षणीय आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सोत्रि 12/05/2022 - 14:28
इथे षड्रिपू ह्या विकेपेजवर लोभ आणि मोह ह्यांच्या चपखल व्याख्या आहेत. मोह किंवा मोहाचा पडदा हे ignorance ह्या अर्थी समजून घेतल्यास वरील व्याख्या अधिक सुलभतेने समजण्यास मदत होइल. - (मोहाचा पडदा दूर करण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B7%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%82

Jayant Naik 11/05/2022 - 17:54
सुरेख भाषांतर. तुम्ही म्हणता ते खरे आहे. आद्य शंकराचार्य अद्वैत तत्त्वप्रणाली सुरेख शब्दात मांडतात. त्यांचे गीतेचे भाष्य तर प्रमाणभूत म्हणावे लागेल.

Jayant Naik 11/05/2022 - 17:55
सुरेख भाषांतर. तुम्ही म्हणता ते खरे आहे. आद्य शंकराचार्य अद्वैत तत्त्वप्रणाली सुरेख शब्दात मांडतात. त्यांचे गीतेचे भाष्य तर प्रमाणभूत म्हणावे लागेल.

वरील सर्व प्रतिसादांशी देखिल सहमत, शंकराचार्यांनी जे कार्य केले आहे त्याला तोड नाही. तर्कसंगत मांडणी हे त्यांच्या प्रत्येक रचनेचे वैशिठ्य होते. पैजारबुवा,

आद्य शंकराचार्य जयंती - वैशाख शुक्ल पक्ष पंचमी (मे ६, २०२२) आद्य शंकराचार्य वेदोक्त अशा अद्वैत मताचे पुरस्कर्ते होत. केवळ ३२ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी प्रस्थानत्रयी (भगवद्गीता, ब्रह्मसूत्रे आणि उपनिषदे) वर भाष्ये लिहिली, तत्कालीन भारत देशात चार वेळा भ्रमण करून प्रस्थपित असलेली अवैदीक मते खोडून काढली व वैदिक धर्माची पुनःस्थापना केली. द्वारका, जगन्‍नाथपुरी, शृंगेरी आणि बद्रीकेदार येथे चार पीठे स्थापन केली. वेदकाळापासून सुरू असलेली आचार्य परंपरा, आद्य शंकराचार्यांनी पुढे सुरू ठेवली.

भिकारी (भाषांतर)

स्मिताके ·

सौन्दर्य 21/01/2022 - 00:20
खूपच छान कथा. कथेच्या शेवटी काहीतरी अनपेक्षित घडणार ह्याचा अंदाज होता तरी देखील ती ओल्गा त्याला लाकडे फोडून देई, हा क्लायमॅक्सच होता.

गोष्ट आवडली, भाषांतरही अगदी ओघवते झाले आहे, काही संदर्भ बदलले असते तर हे भाषांतर आहे हे समजले देखिल नसते. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

स्मिताके 22/01/2022 - 20:16
निराळ्या स्थळकाळाचे संदर्भ वाचायला मला आवडतं म्हणून भाषांतर ही माझी वैयक्तिक आवड. पण रूपांतरही रंजक होईल. प्रतिसादाबद्द्ल आभारी आहे.

स्मिताके 22/01/2022 - 20:20
प्रा.डॉ., कुमार१, चौको, सौन्दर्य, श्रीरंग_जोशी, सुखीमाणूस, पैजारबुवा, स्वधर्म, गोरगावलेकर, भक्ती प्रतिसादांबद्द्ल अनेक आभार..

सौन्दर्य 21/01/2022 - 00:20
खूपच छान कथा. कथेच्या शेवटी काहीतरी अनपेक्षित घडणार ह्याचा अंदाज होता तरी देखील ती ओल्गा त्याला लाकडे फोडून देई, हा क्लायमॅक्सच होता.

गोष्ट आवडली, भाषांतरही अगदी ओघवते झाले आहे, काही संदर्भ बदलले असते तर हे भाषांतर आहे हे समजले देखिल नसते. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

स्मिताके 22/01/2022 - 20:16
निराळ्या स्थळकाळाचे संदर्भ वाचायला मला आवडतं म्हणून भाषांतर ही माझी वैयक्तिक आवड. पण रूपांतरही रंजक होईल. प्रतिसादाबद्द्ल आभारी आहे.

स्मिताके 22/01/2022 - 20:20
प्रा.डॉ., कुमार१, चौको, सौन्दर्य, श्रीरंग_जोशी, सुखीमाणूस, पैजारबुवा, स्वधर्म, गोरगावलेकर, भक्ती प्रतिसादांबद्द्ल अनेक आभार..
"गरिबावर दया करा साहेब. तीन दिवस अन्न चाखलं नाही साहेब. रात्रीच्या मुक्कामापुरते पाच कोपेक्सदेखील नाहीत हो. देवाशपथ सांगतो. पाच वर्षं गावाकडे मास्तर होतो. झारच्या या नव्या झेम्स्तवो सरकारच्या कारस्थानामुळे नोकरी गेली माझी. खोटी साक्ष देऊन बळी घेतला त्यांनी माझा. वर्ष झालं, मला राहायला घर नाही, साहेब." सेंट पीटर्सबर्गमधले वकील स्क्वॉर्तसोव्ह त्याच्याकडे बघत उभे होते. त्याचा तो गडद निळा फाटका कोट, नशा केल्यासारखे धुंद डोळे, गालावरचे तांबडे डाग पाहून त्यांना वाटलं, आपण याला याआधी कुठेतरी पाहिलं आहे. तो पुढे बोलत राहिला, "आणि आता मला त्यांनी कालुगा प्रांतात नोकरी दिली आहे.

आरसा (भाषांतर)

स्मिताके ·

गुल्लू दादा 10/06/2021 - 19:46
आवडलं. शेवटचा ट्विस्ट आवडला. दुसरी किंकाळी राणीची होती हे ऐकून सुकून वाटला.

In reply to by गॉडजिला

स्मिताके 11/06/2021 - 18:29
असाच प्रश्न मलाही पडला होता. शशक मध्ये मी थोडं स्वातंत्र्य घेऊन, किंकाळ्यांमुळे मारेकरी दचकला आणि वॅलेंटिन पळाला असा शेवट केला होता. पण मूळ कथा दोन किंकाळ्यांवर संपली आहे.

स्मिताके 11/06/2021 - 18:32
कुमार१, पाषाणभेद, गुल्लू दादा, सौन्दर्य, सौ मृदुला धनंजय..., कॉमी, गॉडजिला, चौथा कोनाडा, तुषार काळभोर प्रतिसादांबद्दल आभारी आहे.

स्मिताके 14/07/2021 - 21:55
म्हणजे खरंच, ही कथा यूट्यूबवर ऐका.. श्री. आणि सौ. चौथा कोनाडा यांनी केलेले आरसा या कथेचे अभिवाचन यूट्यूबवर कलामंच चॅनेल वर प्रकाशित झाले आहे. https://www.youtube.com/watch?v=z2ANyopGqFk

In reply to by स्मिताके

मागच्या वर्षी चौ को यांनी रामदास यांच्या कथेचं सुंदर अभिवाचन केलं होतं. ही कथा सुद्धा मस्त सादर केली आहे. तिघांचं अभिनंदन!

गुल्लू दादा 10/06/2021 - 19:46
आवडलं. शेवटचा ट्विस्ट आवडला. दुसरी किंकाळी राणीची होती हे ऐकून सुकून वाटला.

In reply to by गॉडजिला

स्मिताके 11/06/2021 - 18:29
असाच प्रश्न मलाही पडला होता. शशक मध्ये मी थोडं स्वातंत्र्य घेऊन, किंकाळ्यांमुळे मारेकरी दचकला आणि वॅलेंटिन पळाला असा शेवट केला होता. पण मूळ कथा दोन किंकाळ्यांवर संपली आहे.

स्मिताके 11/06/2021 - 18:32
कुमार१, पाषाणभेद, गुल्लू दादा, सौन्दर्य, सौ मृदुला धनंजय..., कॉमी, गॉडजिला, चौथा कोनाडा, तुषार काळभोर प्रतिसादांबद्दल आभारी आहे.

स्मिताके 14/07/2021 - 21:55
म्हणजे खरंच, ही कथा यूट्यूबवर ऐका.. श्री. आणि सौ. चौथा कोनाडा यांनी केलेले आरसा या कथेचे अभिवाचन यूट्यूबवर कलामंच चॅनेल वर प्रकाशित झाले आहे. https://www.youtube.com/watch?v=z2ANyopGqFk

In reply to by स्मिताके

मागच्या वर्षी चौ को यांनी रामदास यांच्या कथेचं सुंदर अभिवाचन केलं होतं. ही कथा सुद्धा मस्त सादर केली आहे. तिघांचं अभिनंदन!
काही वर्षांपूर्वी मी या कथेवर आधारित एक शशक लिहिली होती. त्याच संपूर्ण कथेचं हे भाषांतर. मूळ कथा : The Mirror by Catulle Mendes *** आरसा त्या देशात मुळी आरसेच नव्हते. किती शोधले, तरी अगदी औषधाला सुद्धा सापडले नसते. राणीची आज्ञाच होती ना, "तोडून टाका ते आरसे. फोडून अगदी बारीक चुरा करून टाका. कोणाच्या घरात एक एवढासा तुकडा जरी सापडला तर याद राखा. घरातल्या सगळ्यांना हाल हाल करून मारून टाकीन." यापुढे कोणाची काय बिशाद, आरसे बाळगायची! कसली ही विचित्र आज्ञा! हं.. त्यामागे एक रहस्य दडलं होतं.. राणी अतिशय कुरूप होती. पाहणाऱ्याचा भीतीने थरकाप होईल, इतकी कुरूप.

नवीन समाजमाध्यम वावर नियमावलीच्या अनुवादात साहाय्य हवे

माहितगार ·

गॉडजिला 27/05/2021 - 10:31
उत्तर हो असेल तर आपला पास, मिपाचे माननीय व जबाबदार साहित्य संपादक हे सर्व हाताळायला त्यांचे ते समर्थ होते आणी आहेत त्यांना सदस्यांकडून या विषयासंबंधी कसल्याही स्पष्टीकरणाची गरज न्हवती आणि नाही असा माझा ठाम विश्वास आहे.

In reply to by गॉडजिला

माहितगार 27/05/2021 - 11:23
* उपरोक्त नविन नियमावलीत नमुद मर्यादा सर्वसामान्यांना लागू होणार आहेत आणि समाज माध्यमांना स्पष्टीकरण मागण्याचा अधिकारही सर्वसामान्यांना देणार आहेत. लागू समाज माध्यमांना होत असली तरी सर्वसमान्य व्यक्तींना सुयोग्य प्रमाणात अंकुश ठेवण्यास जागा निर्माण होते त्यामुळे सकारात्मकपणे पहाणे श्रेयस्कर असावे. * नियमावली केवळ मिपा नव्हे सर्वच समाज माध्यमांना लागू होत असल्यामुळे महत्वाची सर्वसामान्यांच्या माहितीसाठी महत्वाची आहे, आणि इतरांनाही मिपाबाह्य परिस्थितीत सहज वापरली जावी म्हणूनच उपलब्ध केले जाणारे अनुवाद कॉपीराईट फ्री प्रताधिकारमुक्त राहील असे नमुद केले आहे. * मी मिपाचा सर्वसामान्य सदस्य आहे मिपा प्रशासनाचा प्रतिनिधी नव्हे मी इतर सर्वांप्रमाणे अधून मधून मिपा निती इत्यादीवर सभ्य पण कठोर टिकाही करतो, सर्वसामान्यांना साहाय्यभूत कायदे विषयक बाबींवर लेखन ते अनुवाद (मिपाशी संबंध असो नसो) मी नेहमीच पुढाकार घेतला आहे हा ही त्याचाच भाग आहे.

In reply to by माहितगार

गॉडजिला 27/05/2021 - 13:10
आपण मिपाचेच सर्वसामान्य सदस्य आहात मिपा प्रशासनाचा प्रतिनिधी नव्हे हे मान्य आहे... ... तरीही मिपा व्यवस्थापन आपण धाग्यात दिलेल्या नियमावलीचा जो अर्थ स्पष्ट करण्यास सक्षम आहे त्याचेच मिपावर पालन करायचे कि त्या प्रत्यक्ष नियमावलीचे पालन करत मिपावर राहायचे कि मिपाने ती नियमावली मिपासाठी सुधारित केल्यावर त्याचे पालन करत मिपावर नांदायचे याबाबत अत्यन्त कन्फ्युज झालो असल्याने मिपा साहित्य मंडळानेच यावर प्रकाश टाकणे योग्य असे माझे मन झाले आहे. कारण एकदा मिपाने माझ्या कन्फ्युजन मधे क्लेरीटी दिली कि त्याआधारे यापूर्वी मिपावर प्रसिद्ध असलेला व मी ही वाचलेला कोण कोणता मजकूर उडवावा लागेल यावर मि खनबीरपणे मार्गदर्शन करू शकतो असे मला सकृत दर्शनी इंग्रजीतील नियमावली वाचून खात्रीने वाटत आहे...

In reply to by गॉडजिला

माहितगार 27/05/2021 - 14:31
नविन नियमावली धोरणात जोडण्यासाठी सुविधादात्यांना आपण विनंती/आग्रह करु शकता. भारतीय राज्यघटना ती नुसार पारीत कायदे आणि नियमावली सुप्रीम कोर्टाचे निकाल लक्षात घेऊन यांची प्रधानता बंधनकारक असणे अभिप्रेतच असते. त्या नंतर तुमचे सुविधादाते जसे मिसळपाव यांनी जारी केलेली नियमावलीतून अधिकचे काही जोडले असेल (आणि भारतीय कायद्यास अनुसरुन असेल) ते ते सर्व लागू होणे अभिप्रेत असावे. नविन नियमावली उपरोक्त नियमांचा माध्यम सेवादात्यांच्या नियमावलीत समावेश करण्याचा आदेश देते. पण जरी काही सेवासुविधा दात्यांनी हयगय केली तरी भारतीय राज्यघटना ती नुसार पारीत कायदे आणि नियमावली व कोर्टाचे निकाल लागू रहातातच यात कन्फ्युजन खुपसा वाव आणि कारण दिसत नाही, म्हणून आपले कन्फ्युजन समजले नाही.

In reply to by माहितगार

गॉडजिला 27/05/2021 - 15:56
मी मिपावर कोणत्या गोष्टी ठेवल्या नाही पाहीजेत यावर खनबीरपणे मार्गदर्शन करायला सक्षम आहे याची मला खात्री पटली आहे.

In reply to by गॉडजिला

माहितगार 27/05/2021 - 17:53
एकुणच अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयाचा आवाका आणि बारकाव्यांची संख्या मोठी आहे. सर्वांनाच अगदी चांगले इंग्रजी समजणार्‍यांनाही ईंग्रजीभाषेतील कायदा आणि नियमावलीत वापलेल्या भाषेचे सर्व बारकावे आणि काँटेक्स्ट ठाऊक असतातच असे नाही. त्यामुळे आधी अनुवादास प्राधान्य, मग स्वतः नियमावलीचे पालन करणे आणि मग इतरांनी पालनाचा आग्रह हा अधिक श्रेयस्कर मार्ग असावा असे माझे व्यक्तिगत मत आहे. अनेक आभार

माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शकतत्त्वे आणि डिजिटल मीडिया नीतिशास्त्र कोड) नियम 2021 भाग I व्याख्या .— (1) (डब्ल्यू) ̳ सोशल मीडिया इंटरमीडियरी ’म्हणजे एक मध्यस्थ जो प्रामुख्याने किंवा पूर्णपणे दोन किंवा अधिक वापरकर्त्यांमधील ऑनलाइन संवाद सक्षम करतो आणि त्यास सेवा वापरुन माहिती तयार, अपलोड, सामायिकरण, प्रसारित, सुधारित किंवा प्रवेश करण्याची परवानगी देतो; (एक्स) ̳ वापरकर्त्याचा अर्थ असा आहे की कोणतीही व्यक्ती जो माहिती, होस्टिंग, प्रकाशन, सामायिकरण, व्यवहार, पहाणे, प्रदर्शित करणे, डाउनलोड करणे किंवा अपलोड करणे या उद्देशाने मध्यस्थ किंवा प्रकाशकाच्या कोणत्याही संगणकाच्या संसाधनावर प्रवेश मिळविते किंवा त्याचा उपयोग करीत असेल आणि ज्यात वापरण्यात सहभागी असलेल्या इतर लोकांचा समावेश असेल अशा संगणक स्त्रोत आणि पत्ता आणि प्रवर्तक; (वाय.) 'खाते खाते' म्हणजे मध्यस्थ किंवा प्रकाशकाच्या वापरकर्त्याची खाते नोंदणी आणि त्यात प्रोफाइल, खाती, पृष्ठे, हँडल आणि इतर तत्सम समावेश ज्याचा उपयोग मध्यस्थ किंवा प्रकाशकाद्वारे ऑफर केलेल्या सेवांमध्ये प्रवेश करण्यास सक्षम आहे. 3 भाग II. (१) (बी) (i) दुसर्‍या व्यक्तीचे आहे आणि ज्याचा वापरकर्त्यास कोणताही हक्क नाही; (ii) बदनामीकारक, अश्लिल, अश्लील, अर्धांगवायू, शारीरिक गोपनीयतेसह, दुसर्‍याच्या गोपनीयतेस आक्रमक आहे, लिंगाच्या आधारावर अपमान किंवा छळ करणे, निंदनीय, वांशिक किंवा वांशिकदृष्ट्या आक्षेपार्ह, पैशाच्या लँडिंग किंवा जुगाराशी संबंधित किंवा प्रोत्साहित करणे किंवा अन्यथा विसंगत अंमलात असलेल्या कायद्यांसह किंवा त्याविरूद्ध; (iii) मुलासाठी हानिकारक आहे; (iv) कोणत्याही पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट किंवा इतर मालकी हक्कांचे उल्लंघन करते; (v) सध्या अस्तित्त्वात असलेल्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन; (vi) संदेशाच्या उत्पत्तीबद्दल पत्ता किंवा दिशाभूल करतो किंवा मुद्दाम खोटी किंवा दिशाभूल करणारी कोणतीही माहिती जाणूनबुजून आणि हेतुपुरस्सर संप्रेषित करते परंतु कदाचित त्यास तथ्य म्हणून समजले जाऊ शकते; (vii) दुसर्‍या व्यक्तीची तोतयागिरी करते; (viii) भारताची ऐक्य, अखंडता, संरक्षण, सुरक्षा किंवा सार्वभौमत्व, परदेशी राज्यांशी मैत्रीपूर्ण संबंध किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेस धोका आहे किंवा कोणत्याही संज्ञेय गुन्ह्यासंबंधी चिथावणी दिली जाते किंवा कोणत्याही गुन्ह्याचा तपास रोखू शकतो किंवा इतर देशाचा अपमान करतो आहे; (ix) मध्ये सॉफ्टवेअर व्हायरस किंवा इतर कोणत्याही संगणक कोड, कोणत्याही संगणकाच्या संसाधनाची कार्यक्षमता व्यत्यय आणणे, नष्ट करणे किंवा मर्यादित करण्यासाठी डिझाइन केलेली फाईल किंवा प्रोग्राम आहे; (एक्स) हे स्पष्टपणे खोटे आणि चुकीचे आहे आणि एखाद्या व्यक्तीला, संस्थेला किंवा एजन्सीला आर्थिक फायद्यासाठी किंवा कोणत्याही व्यक्तीला इजा पोहोचवण्यासाठी चुकीच्या मार्गाने किंवा छळविण्याच्या उद्देशाने हे कोणत्याही स्वरूपात लिहिले किंवा प्रकाशित केले गेले आहे; 3 भाग II. (२) (बी) या उपनियमांतर्गत एखाद्या व्यक्तीने किंवा त्याच्या वतीने कोणत्याही व्यक्तीने केलेल्या तक्रारीच्या प्राप्तीनंतर मध्यस्थाने, चोवीस तासांच्या आत, अशा सामग्रीच्या संबंधात जे या स्वरूपाचे प्राथमिक स्वरूप आहे अशी सामग्री जी अशा व्यक्तीचे खाजगी क्षेत्र उघड करते, अशा व्यक्तीस पूर्ण किंवा आंशिक नग्नतेने दर्शवते किंवा अशा व्यक्तीस कोणत्याही लैंगिक कृतीत किंवा आचरणामध्ये दाखवते किंवा चित्रण करते किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात तोतयागिरीच्या स्वरुपात आहे अशा कृत्रिमरित्या मोर्फेड प्रतिमांसह वैयक्तिकरित्या, त्याद्वारे होस्ट केलेले, संग्रहित, प्रकाशित केलेले किंवा प्रसारित केलेल्या अशा सामग्रीमध्ये प्रवेश काढून टाकण्यासाठी किंवा अक्षम करण्यासाठी सर्व वाजवी आणि व्यवहार्य उपाय करणे. टीप : गूगल ट्रांसलेट या एप्लीकेशनमधे भाषांतर करुन इथे टाकलेय. थोड़ा वेळ मिळाला की काही शब्द बदलून वाक्य रचना आणि अर्थ लागेल असे बदल करीन. किंवा कोणीही केले तरी चालेल. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 27/05/2021 - 14:42
धन्यवाद, कायदाविषयास अनुरुप अधिक सुयोग्य पारिभाषिक शब्द व वाक्यरचना उपलब्ध होण्यासाठी दोन तीन संस्करणातून अद्ययावत करावे लागेल. आपण दिलेले मशिन ट्रान्सलेशन मी गुगल डॉक मध्ये सेव्ह केले आहे. सावकाशीने वेळ देईन. * उद्या कुणि तुमच्या लेखनामुळे आमची दिशाभूल झाली असे म्हणावयास नको आणि माहितीची खात्री करून घेण्याची जबाबदारी माहितीच्या वापरकर्त्याची असते याचे स्मरण देण्यासाठी उत्तरदायीत्वास नकार नमुद केलेला बरा पडतो. अनेक आभार

In reply to by माहितगार

>>कायदाविषयास अनुरुप अधिक सुयोग्य पारिभाषिक शब्द व वाक्यरचना उपलब्ध होण्यासाठी दोन तीन संस्करणातून अद्ययावत करावे लागेल. हम्म. ओके. व्यस्थित आणि सुटसुटीत अर्थ लावण्यासाठी एक प्रयत्न करुन पाहीनच. >>उद्या कुणि तुमच्या लेखनामुळे आमची दिशाभूल झाली असे म्हणावयास नको आणि माहितीची खात्री करून घेण्याची जबाबदारी माहितीच्या वापरकर्त्याची असते याचे स्मरण देण्यासाठी उत्तरदायीत्वास नकार नमुद केलेला बरा पडतो. हे कायम उपयोगी पडणारे आहे. आभार. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 27/05/2021 - 17:58
व्यस्थित आणि सुटसुटीत अर्थ लावण्यासाठी एक प्रयत्न करुन पाहीनच.
हो त्यात साहाय्य हवेच आहे कारण माझी स्वतःची भाषा बर्‍याच जणांना बर्‍याच वेळा अवजड का बोजड वाटते. पण सुलभीकरण करताना एखाद्या शब्दात कायदेविषयक बारकावे असतील तर ते सुटावयास नको म्हणून अनुवाद एखाद दोन संस्करणातून गेलेला बरा पडेल असे वाटते. अनेक आभार

माझं पण 'उत्तरदायित्वास नकार लागू' ( माहीतगारसेठ) हेही प्रकरण सविस्तर समजून सांगा. च्यायला, उगाच काही लचांड नको. -दिलीप बिरुटे (सावध)

In reply to by गॉडजिला

माहितगार 27/05/2021 - 14:49
कायद्याच्या अभ्यासकांना सल्लागारपदांच्या संधीचे नवे क्षेत्र खुले होताना दिसते आहे.

गॉडजिला 27/05/2021 - 10:31
उत्तर हो असेल तर आपला पास, मिपाचे माननीय व जबाबदार साहित्य संपादक हे सर्व हाताळायला त्यांचे ते समर्थ होते आणी आहेत त्यांना सदस्यांकडून या विषयासंबंधी कसल्याही स्पष्टीकरणाची गरज न्हवती आणि नाही असा माझा ठाम विश्वास आहे.

In reply to by गॉडजिला

माहितगार 27/05/2021 - 11:23
* उपरोक्त नविन नियमावलीत नमुद मर्यादा सर्वसामान्यांना लागू होणार आहेत आणि समाज माध्यमांना स्पष्टीकरण मागण्याचा अधिकारही सर्वसामान्यांना देणार आहेत. लागू समाज माध्यमांना होत असली तरी सर्वसमान्य व्यक्तींना सुयोग्य प्रमाणात अंकुश ठेवण्यास जागा निर्माण होते त्यामुळे सकारात्मकपणे पहाणे श्रेयस्कर असावे. * नियमावली केवळ मिपा नव्हे सर्वच समाज माध्यमांना लागू होत असल्यामुळे महत्वाची सर्वसामान्यांच्या माहितीसाठी महत्वाची आहे, आणि इतरांनाही मिपाबाह्य परिस्थितीत सहज वापरली जावी म्हणूनच उपलब्ध केले जाणारे अनुवाद कॉपीराईट फ्री प्रताधिकारमुक्त राहील असे नमुद केले आहे. * मी मिपाचा सर्वसामान्य सदस्य आहे मिपा प्रशासनाचा प्रतिनिधी नव्हे मी इतर सर्वांप्रमाणे अधून मधून मिपा निती इत्यादीवर सभ्य पण कठोर टिकाही करतो, सर्वसामान्यांना साहाय्यभूत कायदे विषयक बाबींवर लेखन ते अनुवाद (मिपाशी संबंध असो नसो) मी नेहमीच पुढाकार घेतला आहे हा ही त्याचाच भाग आहे.

In reply to by माहितगार

गॉडजिला 27/05/2021 - 13:10
आपण मिपाचेच सर्वसामान्य सदस्य आहात मिपा प्रशासनाचा प्रतिनिधी नव्हे हे मान्य आहे... ... तरीही मिपा व्यवस्थापन आपण धाग्यात दिलेल्या नियमावलीचा जो अर्थ स्पष्ट करण्यास सक्षम आहे त्याचेच मिपावर पालन करायचे कि त्या प्रत्यक्ष नियमावलीचे पालन करत मिपावर राहायचे कि मिपाने ती नियमावली मिपासाठी सुधारित केल्यावर त्याचे पालन करत मिपावर नांदायचे याबाबत अत्यन्त कन्फ्युज झालो असल्याने मिपा साहित्य मंडळानेच यावर प्रकाश टाकणे योग्य असे माझे मन झाले आहे. कारण एकदा मिपाने माझ्या कन्फ्युजन मधे क्लेरीटी दिली कि त्याआधारे यापूर्वी मिपावर प्रसिद्ध असलेला व मी ही वाचलेला कोण कोणता मजकूर उडवावा लागेल यावर मि खनबीरपणे मार्गदर्शन करू शकतो असे मला सकृत दर्शनी इंग्रजीतील नियमावली वाचून खात्रीने वाटत आहे...

In reply to by गॉडजिला

माहितगार 27/05/2021 - 14:31
नविन नियमावली धोरणात जोडण्यासाठी सुविधादात्यांना आपण विनंती/आग्रह करु शकता. भारतीय राज्यघटना ती नुसार पारीत कायदे आणि नियमावली सुप्रीम कोर्टाचे निकाल लक्षात घेऊन यांची प्रधानता बंधनकारक असणे अभिप्रेतच असते. त्या नंतर तुमचे सुविधादाते जसे मिसळपाव यांनी जारी केलेली नियमावलीतून अधिकचे काही जोडले असेल (आणि भारतीय कायद्यास अनुसरुन असेल) ते ते सर्व लागू होणे अभिप्रेत असावे. नविन नियमावली उपरोक्त नियमांचा माध्यम सेवादात्यांच्या नियमावलीत समावेश करण्याचा आदेश देते. पण जरी काही सेवासुविधा दात्यांनी हयगय केली तरी भारतीय राज्यघटना ती नुसार पारीत कायदे आणि नियमावली व कोर्टाचे निकाल लागू रहातातच यात कन्फ्युजन खुपसा वाव आणि कारण दिसत नाही, म्हणून आपले कन्फ्युजन समजले नाही.

In reply to by माहितगार

गॉडजिला 27/05/2021 - 15:56
मी मिपावर कोणत्या गोष्टी ठेवल्या नाही पाहीजेत यावर खनबीरपणे मार्गदर्शन करायला सक्षम आहे याची मला खात्री पटली आहे.

In reply to by गॉडजिला

माहितगार 27/05/2021 - 17:53
एकुणच अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयाचा आवाका आणि बारकाव्यांची संख्या मोठी आहे. सर्वांनाच अगदी चांगले इंग्रजी समजणार्‍यांनाही ईंग्रजीभाषेतील कायदा आणि नियमावलीत वापलेल्या भाषेचे सर्व बारकावे आणि काँटेक्स्ट ठाऊक असतातच असे नाही. त्यामुळे आधी अनुवादास प्राधान्य, मग स्वतः नियमावलीचे पालन करणे आणि मग इतरांनी पालनाचा आग्रह हा अधिक श्रेयस्कर मार्ग असावा असे माझे व्यक्तिगत मत आहे. अनेक आभार

माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शकतत्त्वे आणि डिजिटल मीडिया नीतिशास्त्र कोड) नियम 2021 भाग I व्याख्या .— (1) (डब्ल्यू) ̳ सोशल मीडिया इंटरमीडियरी ’म्हणजे एक मध्यस्थ जो प्रामुख्याने किंवा पूर्णपणे दोन किंवा अधिक वापरकर्त्यांमधील ऑनलाइन संवाद सक्षम करतो आणि त्यास सेवा वापरुन माहिती तयार, अपलोड, सामायिकरण, प्रसारित, सुधारित किंवा प्रवेश करण्याची परवानगी देतो; (एक्स) ̳ वापरकर्त्याचा अर्थ असा आहे की कोणतीही व्यक्ती जो माहिती, होस्टिंग, प्रकाशन, सामायिकरण, व्यवहार, पहाणे, प्रदर्शित करणे, डाउनलोड करणे किंवा अपलोड करणे या उद्देशाने मध्यस्थ किंवा प्रकाशकाच्या कोणत्याही संगणकाच्या संसाधनावर प्रवेश मिळविते किंवा त्याचा उपयोग करीत असेल आणि ज्यात वापरण्यात सहभागी असलेल्या इतर लोकांचा समावेश असेल अशा संगणक स्त्रोत आणि पत्ता आणि प्रवर्तक; (वाय.) 'खाते खाते' म्हणजे मध्यस्थ किंवा प्रकाशकाच्या वापरकर्त्याची खाते नोंदणी आणि त्यात प्रोफाइल, खाती, पृष्ठे, हँडल आणि इतर तत्सम समावेश ज्याचा उपयोग मध्यस्थ किंवा प्रकाशकाद्वारे ऑफर केलेल्या सेवांमध्ये प्रवेश करण्यास सक्षम आहे. 3 भाग II. (१) (बी) (i) दुसर्‍या व्यक्तीचे आहे आणि ज्याचा वापरकर्त्यास कोणताही हक्क नाही; (ii) बदनामीकारक, अश्लिल, अश्लील, अर्धांगवायू, शारीरिक गोपनीयतेसह, दुसर्‍याच्या गोपनीयतेस आक्रमक आहे, लिंगाच्या आधारावर अपमान किंवा छळ करणे, निंदनीय, वांशिक किंवा वांशिकदृष्ट्या आक्षेपार्ह, पैशाच्या लँडिंग किंवा जुगाराशी संबंधित किंवा प्रोत्साहित करणे किंवा अन्यथा विसंगत अंमलात असलेल्या कायद्यांसह किंवा त्याविरूद्ध; (iii) मुलासाठी हानिकारक आहे; (iv) कोणत्याही पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट किंवा इतर मालकी हक्कांचे उल्लंघन करते; (v) सध्या अस्तित्त्वात असलेल्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन; (vi) संदेशाच्या उत्पत्तीबद्दल पत्ता किंवा दिशाभूल करतो किंवा मुद्दाम खोटी किंवा दिशाभूल करणारी कोणतीही माहिती जाणूनबुजून आणि हेतुपुरस्सर संप्रेषित करते परंतु कदाचित त्यास तथ्य म्हणून समजले जाऊ शकते; (vii) दुसर्‍या व्यक्तीची तोतयागिरी करते; (viii) भारताची ऐक्य, अखंडता, संरक्षण, सुरक्षा किंवा सार्वभौमत्व, परदेशी राज्यांशी मैत्रीपूर्ण संबंध किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेस धोका आहे किंवा कोणत्याही संज्ञेय गुन्ह्यासंबंधी चिथावणी दिली जाते किंवा कोणत्याही गुन्ह्याचा तपास रोखू शकतो किंवा इतर देशाचा अपमान करतो आहे; (ix) मध्ये सॉफ्टवेअर व्हायरस किंवा इतर कोणत्याही संगणक कोड, कोणत्याही संगणकाच्या संसाधनाची कार्यक्षमता व्यत्यय आणणे, नष्ट करणे किंवा मर्यादित करण्यासाठी डिझाइन केलेली फाईल किंवा प्रोग्राम आहे; (एक्स) हे स्पष्टपणे खोटे आणि चुकीचे आहे आणि एखाद्या व्यक्तीला, संस्थेला किंवा एजन्सीला आर्थिक फायद्यासाठी किंवा कोणत्याही व्यक्तीला इजा पोहोचवण्यासाठी चुकीच्या मार्गाने किंवा छळविण्याच्या उद्देशाने हे कोणत्याही स्वरूपात लिहिले किंवा प्रकाशित केले गेले आहे; 3 भाग II. (२) (बी) या उपनियमांतर्गत एखाद्या व्यक्तीने किंवा त्याच्या वतीने कोणत्याही व्यक्तीने केलेल्या तक्रारीच्या प्राप्तीनंतर मध्यस्थाने, चोवीस तासांच्या आत, अशा सामग्रीच्या संबंधात जे या स्वरूपाचे प्राथमिक स्वरूप आहे अशी सामग्री जी अशा व्यक्तीचे खाजगी क्षेत्र उघड करते, अशा व्यक्तीस पूर्ण किंवा आंशिक नग्नतेने दर्शवते किंवा अशा व्यक्तीस कोणत्याही लैंगिक कृतीत किंवा आचरणामध्ये दाखवते किंवा चित्रण करते किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात तोतयागिरीच्या स्वरुपात आहे अशा कृत्रिमरित्या मोर्फेड प्रतिमांसह वैयक्तिकरित्या, त्याद्वारे होस्ट केलेले, संग्रहित, प्रकाशित केलेले किंवा प्रसारित केलेल्या अशा सामग्रीमध्ये प्रवेश काढून टाकण्यासाठी किंवा अक्षम करण्यासाठी सर्व वाजवी आणि व्यवहार्य उपाय करणे. टीप : गूगल ट्रांसलेट या एप्लीकेशनमधे भाषांतर करुन इथे टाकलेय. थोड़ा वेळ मिळाला की काही शब्द बदलून वाक्य रचना आणि अर्थ लागेल असे बदल करीन. किंवा कोणीही केले तरी चालेल. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 27/05/2021 - 14:42
धन्यवाद, कायदाविषयास अनुरुप अधिक सुयोग्य पारिभाषिक शब्द व वाक्यरचना उपलब्ध होण्यासाठी दोन तीन संस्करणातून अद्ययावत करावे लागेल. आपण दिलेले मशिन ट्रान्सलेशन मी गुगल डॉक मध्ये सेव्ह केले आहे. सावकाशीने वेळ देईन. * उद्या कुणि तुमच्या लेखनामुळे आमची दिशाभूल झाली असे म्हणावयास नको आणि माहितीची खात्री करून घेण्याची जबाबदारी माहितीच्या वापरकर्त्याची असते याचे स्मरण देण्यासाठी उत्तरदायीत्वास नकार नमुद केलेला बरा पडतो. अनेक आभार

In reply to by माहितगार

>>कायदाविषयास अनुरुप अधिक सुयोग्य पारिभाषिक शब्द व वाक्यरचना उपलब्ध होण्यासाठी दोन तीन संस्करणातून अद्ययावत करावे लागेल. हम्म. ओके. व्यस्थित आणि सुटसुटीत अर्थ लावण्यासाठी एक प्रयत्न करुन पाहीनच. >>उद्या कुणि तुमच्या लेखनामुळे आमची दिशाभूल झाली असे म्हणावयास नको आणि माहितीची खात्री करून घेण्याची जबाबदारी माहितीच्या वापरकर्त्याची असते याचे स्मरण देण्यासाठी उत्तरदायीत्वास नकार नमुद केलेला बरा पडतो. हे कायम उपयोगी पडणारे आहे. आभार. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 27/05/2021 - 17:58
व्यस्थित आणि सुटसुटीत अर्थ लावण्यासाठी एक प्रयत्न करुन पाहीनच.
हो त्यात साहाय्य हवेच आहे कारण माझी स्वतःची भाषा बर्‍याच जणांना बर्‍याच वेळा अवजड का बोजड वाटते. पण सुलभीकरण करताना एखाद्या शब्दात कायदेविषयक बारकावे असतील तर ते सुटावयास नको म्हणून अनुवाद एखाद दोन संस्करणातून गेलेला बरा पडेल असे वाटते. अनेक आभार

माझं पण 'उत्तरदायित्वास नकार लागू' ( माहीतगारसेठ) हेही प्रकरण सविस्तर समजून सांगा. च्यायला, उगाच काही लचांड नको. -दिलीप बिरुटे (सावध)

In reply to by गॉडजिला

माहितगार 27/05/2021 - 14:49
कायद्याच्या अभ्यासकांना सल्लागारपदांच्या संधीचे नवे क्षेत्र खुले होताना दिसते आहे.
२६ मे २०२१ पासून लागू झालेल्या (मिपासारख्या समाज माध्यम संस्थळांनाही) नियमावलीतील खालील अंशाच्या मराठी अनुवादात साहाय्य हवे आहे.

करोनाची लस : एक थोतांड

गामा पैलवान ·

चित्रगुप्त 01/03/2021 - 06:31
करोनाची लस मी घेणार नाही आहे. मागे एका लेखात (कोविडः एक इष्टापत्ती ?) लिहिल्याप्रमाणे आम्हा उभयतांना कोविडबाधा होऊन त्यातून आम्ही कोणताही औषधोपचार न करता पूर्ण बरे झालेलो आहोत. बाकी नशिबात जे आहे ते अगोदरच निश्चित झालेले असते फक्त आपल्याला ते ठाऊक नसल्याने आपल्याला उगाचच धास्ती वाटत रहाते याची मला स्वानुभवावरून खात्री पटलेली आहे.

In reply to by चित्रगुप्त

>>>>>>करोनाची लस मी घेणार नाही आहे. खरं म्हणजे, असे म्हणनेच मोठं धाडस आहे. बाकी आपण औषध उपचार न घेताही बरे झालात असे समजणे म्हणजे करोनाच्या असण्यावर शंका उपस्थित करणे आहे. करोनाबद्दल आपल्या मनात इतकी भिती भरवल्या गेली की आज रात्री आठ वाजेच्या नंतर खिड़कीच्या फ़टीतून तुम्ही बाहेर जरी बघितलं तरी करोनाचे विषाणु आणि तुमची नजरा-नजर झाली असे समजून करोना तुमच्या डोळ्यावाटे शरिरात प्रवेश करेल असे वाटायचे. डोळेच नव्हे तर, शरीराच्या कोणत्याही भागातून करोना आत प्रवेश करेल असे वाटायचे. इतकी ती दहशत होती. ( thanks टू मीडिया आणि सरकार) मला तर इतकी दहशत बसली की जग नष्ट होऊन फक्त झुरळच उरतील आणि मग ते जग कसे असेल असाही विचार मी करायचो. आता लस येईल, तेव्हा लस येईल म्हणून प्रेयसीची वाट पाहणा-या प्रियकरासारखे, किंवा बस थांब्यावर बसची वाट पाहतो तसे आतुर होतो. प्रयत्न सुरु होते आणि एकदाचे लशीचे वेगवेगळे व्हर्जन्स आले. कोणती लस द्यायची ते उपलब्ध साठ्यावर असेल असे सरकारने म्हटल्यापासून लशीबद्दलचा आत्मविश्वास जरा कमी झाला. तुमची लस नुसते पाणी आहे, अशी एका कंपनीची टिका दुस-या कंपनीवर होती. त्याच्या आठवणीने तर लशीची भानगड़ नको असेही वाटून गेले. आज सकाळीच जेव्हा मिपावर लशीच्या थोतांडावर लेख वाचला आणि खुप आनंद झाला. आता आनंद का झाला ते नेमकं सांगता येत नाही, पण झाला. पण आपण लस घेऊन टाकू. परिणाम होऊ की ना होऊ.....प्लासिबो इफेक्ट आता काही रिस्क नाही, असे मनाचे समाधान तरी होईल. बाकी, नशिबात जे आहे ते अगोदरच निश्चित झालेले असते,असे समजू आणि देव्हा-यातल्या देवासमोरची घंटी घेऊ, नसेल तर थाळी घेऊ, दिवाबत्ती करू करोना गो, करोना गो असे म्हणू, हाय काय आणि नाय काय...! -दिलीप बिरुटे

In reply to by उपयोजक

पण, इतक्यात घाई करू नका.... राजकीय नेते, थेट जनसंपर्क टाळू शकतात, आपण तसे करू शकत नाही... घरातून काम करत असाल तर, जनसंपर्क टाळणे, हा सर्वोत्तम उपाय आहे.

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्त 10/03/2021 - 20:47
सध्या हितं आमेरिकेत आहोत गेले आठेक महिने. गप गुमान घरीच. किंवा फारतर येकट्याने मोकळ्यात फिरायला जाणे. कोणी कुणाकडे जात नाहिये वगैरे. आता जरा लोकांनी थोडंबहुत जाणं-येणं सुरु केलय म्हणून एक-दोघांना फोन केला आणि काही मराठी मंडळी फिरायला गेलेलो असताना भेटली - मग घरी या निवांत गप्पा करायला नवीन केलेली चित्रं बघायला वगैरे म्हणालो तर त्यांचा पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही व्ह्याक्शीण घेटलाय का ? अजून नाही म्हटल्यावर लौकरात लौकर घ्या म्हणून काढता पाय घेणे. आता काही काळानंतर भारतात परतायचे आहे तेंव्हाही व्ह्याक्शीण घेतले असल्याचे दाखवावे लागणार. म्हणजे आता घ्यावीच लागणार लस्सी.

In reply to by उपयोजक

काहींना मानस पुत्र, मानस कुटुंब किंवा मानस मुलगी असते.... तसेच आमचे हे मानस बाबा महाराज आहेत... दोन चार पेगांची आहुती चढवली की, ते आत्मिक प्रगट होतात.... डोंबिवली हे जागतिक केंद्र असल्याने म्हणा किंवा आमची आराधना उत्तम असल्याने म्हणा, ते आमच्या आराधनेने कधी कधी प्रसन्न होतात... सध्या ते आम्हाला, आर्थिक षटरिपू ह्या विषयी प्रवचन देत आहेत... बाबा महाराज डोंबोलीकर, यांचे म्हणणे, जास्त मनावर घेऊ नये, ही विनंती.

लेखन आवडलं. लेखाबाबत आणि लशी बाबत अनेकांचे मतभेद होऊ शकतील, पण लेख पटणारा आहे. करोना प्रतिबंधक लस आयुष्यभर तुमचं संरक्षण करू शकणार नाही, हेही खरं आहे, पण काही काळासाठी प्रतिबंध नक्कीच होऊ शकेल असेही वाटते. -दिलीप बिरुटे (कन्फ्यूज) >>>>>आपल्याला दोन नेते जाम आवडले. मोदींनी मुखपट्टी उघडपणे नाकारली....... माझं या विषयावर आणि त्यांच्या काल कर्तुत्वावर काही दिवस मौन आहे, मुखपट्टीच लावली आहे असे समजा. -दिलीप बिरुटे (मुखपट्टीधारक)

कंजूस 01/03/2021 - 09:01
वैज्ञानिकच ठेवा म्हणतो. महाभारत त्यात आणू नका. तो एक वेगळाच करा. ---------------------- एक उदाहरण पाहा काविळीसाठी आयुर्वेदात - यकृत बिघडून पित्तरस अधिक किंवा उणे निर्माण झाल्याने होणारा रोग धरला आहे. त्रिकटू चूर्ण आणि एरंड पानांचा रस हे बरे करतात. हेच मॉडर्न मेडसन, संशोधनातून लिवरचे A,B,C, D प्रकार शोधून वेगवेगळ्या लशी केल्या. रोग होऊ नये म्हणून लस. रोग झाल्यावर फक्त बी कॉम्प्लेक्स. आयुर्वेद औषध अजूनही गुणकारी आहे!!

In reply to by कंजूस

गवि 01/03/2021 - 09:11
कारण व्हायरस ऊर्फ विषाणूची लागण एकदा झाली की थेट त्याच्यावर उपचार करुन मारणे अवघड़ पडते. Bacteria बाबत अँटीबायोटीक औषधे उपयोगी पडतात . व्हायरस मारण्याबाबत मर्यादा येतात. त्यावर केवळ बाह्य लक्षणे कमी करणारे उपायच मुख्यतः करता येतात.

चौकटराजा 01/03/2021 - 09:23
हे पुस्तक २०१३ साली लिहिलेले असल्याने २०२१ साली ते कालबाह्य झाले असण्याची शक्यता आहे ! अशक्त झालेला विषाणू शरीरात टोचल्याने प्रतिपिंडे निर्माण होऊन शरीर त्याच्या पेशीप्रवेशाला मारक अशी योजना करते असा दावा लस याबाबत आतापर्यंत करण्यात आला आहे ! आताची लस या तंत्रावर आधारित नाही अशी माझी माहिती आहे ! लस घेतल्याने प्रत्येकास भक्कम संरक्षण मिळालेच पाहिजे असा दावा निसर्गच मुळी करीत नसतो. यासाठीच तर ते शेवटचे वाक्य डॉक्टरांनी जपून ठेवलेले असते " बॉडी रिस्पॉन्स देत नाही औषधाना ! " आज देखील मला असे वाटते की नेहमीच रोग अनेकांना होत असतात ,अनेक माणसे काहीही औषध न घेता बरी होत असतात ते त्यांच्या नैसर्गिक प्रतिकार शक्तीने . पण हे सगळे अव्यक्त पातळीवर होत असल्यानं त्याचा तपशील ठेवता येत नाही ! ही केवळ तर्का ने जाणण्याची गोष्ट आहे ! तर्कट हे फायद्याचे ही ठरते वा अगदी उलट ! महाजनो गत: स: पंथः या नात्याने मी लस घेणार आहे ! लस न घेतल्याने मरण्यापेक्षा लस घेऊन मी मेलो तर मला त्या मरणाचा अभिमान असेल ज्याने हे सिद्ध होईल की लस घेतल्याने माणूस मरतो जगण्याऐवजी ! निदान त्याने लशीचा गोरखधंदा संपुष्टात तरी येईल !

In reply to by चौकटराजा

आमचे बाबा महाराज डोंबोलीकर हेच म्हणतात ....सध्या शांत रहा, घरात पडीक रहा, सांसर्गिक रोग असल्याने, जन संपर्क टाळा.लशीचे बरेवाईट परिणाम दिसायला वेळ लागेल.

In reply to by चौकटराजा

गोंधळी 01/03/2021 - 09:52
लस न घेतल्याने मरण्यापेक्षा लस घेऊन मी मेलो तर मला त्या मरणाचा अभिमान असेल ज्याने हे सिद्ध होईल की लस घेतल्याने माणूस मरतो जगण्याऐवजी ! निदान त्याने लशीचा गोरखधंदा संपुष्टात तरी येईल ! चौ रा काका हे काही पटले नाही.

In reply to by गोंधळी

चौकटराजा 01/03/2021 - 10:36
कोणतेही औषध वा लस बाजारात येण्यापूर्वी त्याचे काही दुश्परिणाम माणसावर होतात की नाही हे पाहण्यासाठी काही स्वयंसेवक गरजेचे असतात ! ही लस बाजारात येण्यापूर्वी अनेकांनी आपला जीव धोक्यात घालून त्या लसीची ७० टकके परिणामकारकता सिद्ध केली आहे ! तरी ही काही लोकांना त्यावर शंका आहे ! रसायन विज्ञानाचा विषय नसून मानस शास्त्राचा झाला आहे ! वरील स्वयंसेवकांत अनेक तरुण मंडळीही असतीलच ना ! आता धोका पत्करण्यात मी म्हातारा मग मागे का राहू ? आता राहता राहिला संशय लस निर्माते ,राजकारणी व डॉक्टर यांच्या तोडपाण्याचा ! त्यावरही संदेह लोकांना आहे ! तो ही दूर होऊन सत्य पुढे येण्याचे श्रेय संशोधकांप्रमाणेच या स्वयंसेवकांनाही आहे हे नाकारू नये !

उत्तम माहिती. सध्यातरी लस घेण्यापलिकडे पर्याय दिसत नाही. लस घेतल्याने करोना पूर्ण जाणार नाही हे माहित आहे .

Bhakti 01/03/2021 - 10:30
लसीवर चांगलाच ऊहापोह आहे.जीवानमान उंचावण हेच महत्त्वाचे आहे हे तर त्रिकाल बाधित सत्य आहे.पण म्हणून संशोधन सर्व थोडांत हे काय पटल नाही. कंजूस यांच्याप्रमाणेच मलापण​ आयुर्वेद महान आहे त्यात अजूनही शक्ती आहे हे पटल,पण मग प्रश्न पडला रामदेवबाबाच "औषध ?" करोनावर घ्यायच का? (भयानक विचार).. चौरा यांचं मत पटल लस न घेणं ही चुक ठरु शकते. बाकी महाभारतची उजाळणी आवडली :)

In reply to by आंद्रे वडापाव

Bhakti 01/03/2021 - 10:44
ते घेणारच होते. पण त्या अखिलेश बाबाला प्रोटोकॉल,नियम वगैरे काहीच कळत नाही.काहीही बरळत होता.(हा हा)

Rajesh188 01/03/2021 - 12:29
लस च नाही तर सर्वच बाबतीत अवास्तव दावे करण्याचे प्रमाण खूप आहे.सायन्स मॅगझिन मध्ये सुद्धा सर्रास खोटे दावे केले जातात.

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 01/03/2021 - 14:05
फक्त स्वच्छ हवा. रासायनिक खत आणि कीटक नाशक न वापरलेलं अन्न आणि पालेभाजी. शुद्ध पाणी. संकरित जनावर चे दूध पूर्ण बंद. आणि स्वच्छ आणि मोकळा परिसर . एवढे उपलब्ध झाले तर. लस,औषध ह्यांची बिलकुल गरज नाही

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 01/03/2021 - 15:30
या सगळ्या गोष्टी कदाचित १५०/२०० वर्षांपूर्वीपर्यंत (इ.स.१८५०) नक्कीच होत्या तर तेव्हा माणसे जास्त जगायची कि आत्ता जास्त जगतात?

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 01/03/2021 - 16:01
मलेरिया,अतिसार,प्लेग ह्या मुळे लोक जास्त मरायची . कारण योग्य उपचार नव्हते. पण उपचार निर्माण झाल्यावर ते प्रमाण कमी झाले. त्याला लसी कारणीभूत नाहीत. आता जे आयुष्य वाढले आहे असे वाटत आहे ते कोणाचे? ज्यांचे राहणीमान,आहार, विहार नैसर्गिक होता त्यांचेच. म्हणजे १९४५ ते १९७० पर्यंत ज्यांचा जन्म आहे त्यांचेच. त्याला कारण शुध्द आहार,शुद्ध हवा,आणि जोडीला वैधकिय सुविधा हे आहे. पण त्या पुढची पिढी अनेक रोगाने त्रस्त आहे कमी वयात मधुमेह ब्लड प्रेशर. किडनी चे प्रॉब्लेम खूप जास्त वजन आणि अशा अनेक रोगांनी आताची पिढी कमी वयात त्रस्त आहे. ह्याला एकमेव कारण आरोग्य व्यवस्थेचे बाजारीकरण आणि प्रदूषित,हवा,पाणी,अन्न,हे आहे बाजारीकरण मुळे नसलेले गुण चिकटवून केलेली औषनिर्माणशास्त्र ची होत असलेली जाहिरात लेखिका हेच सांगत आहे.

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 01/03/2021 - 16:12
ओके :) तुमच्यासाठी एक प्रश्न....तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का?

In reply to by टवाळ कार्टा

आग्या१९९० 01/03/2021 - 16:24
ह्यांच्या मुलांना नव्हे तर ह्यांनाच देवीचे जिवंत विषाणू टोचून घ्यावेत. नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढली कि नाही हे ही कळेल.

गोंधळी 01/03/2021 - 14:41
सांगायचा मुद्दा काये की कर्म, भक्ती, धर्म यांमध्ये साधना हा सामायिक घटक आहे. ती साधना म्हणजे नामजप. तो करायला हवाच. चांगला सणकून करूया आणि या करोना नामे थोतांडास पार पळवून लावूया. म्हणजे तुम्ही आजारी पडल्यावर वैद्यबुवां कडे जातच नाहीत का? नामजप करुन बरे होता? बाकी अध्यात्माशी सांगड घालत जगणं खुप कठीण काम वाट्ते. ego मुळे असेल कदाचीत.

In reply to by गोंधळी

सासूला, सुनेच्या जाचापासून वाचवते सुनेला, सासू पासून वाचवते स्वतःचे षंढत्व लपवायला धंदा वाढवायला लोकांची फसवणूक करायला जागा ढापायला असे ह्या कातड्याचे विविध उपयोग आहेत आध्यात्मिक माणूस, एक नंबरचा स्वार्थी आणि खोटारडा असतो, हे मी अनुभवले आहे,

टवाळ कार्टा 01/03/2021 - 15:27
लेखकासाठी एक प्रश्न....तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का?

In reply to by टवाळ कार्टा

पुर्वी गल्लोगल्ली, किंवा दरेक शाळेत, एक तरी पोलियोग्रस्त, व्यक्ती असायचीच, आता नाही --------------------- त्यामुळे, आपण लस टोचून घ्यायची. मी थोडे दिवस वाट बघून, मग कुणाकडून लस टोचून घ्यायची?, लस टोचून घेतल्या नंतर कुठे रहायचे? इत्यादि साधकबाधक विचार करून, मगच ठरवीन.... घाई गडबडीत, असे निर्णय न घेणेच उत्तम, असे माझे वैयक्तिक मत आहे... बाय द वे, लस टोचून घेतली की, एक जोरदार कट्टा करू...

जॉन रीज 01/03/2021 - 16:19
आपले जुने लेख आणि हा लेख अशी तुलना करता आपला i.d. कुणी चोरला असावा असे वाटते कारण आपण असे लिखाण कराल असे वाटत नाही आणि लेखाची शैलीही मागील लेखांशी जुळत नाही.

सूक्ष्मजीव 01/03/2021 - 19:36
मी एका ओळखीच्या डॉक्टर सोबत जे कोरोना काळात महानगरपालिके कडून हंगामी करोना सेवे साठी भरती केले आहेत त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. त्यांना मोफत लस दिली जात होती. या लशीचा प्रभाव किती काळ राहील हे विचारल्यावर ते म्हणाले की ही लस नसून एक प्रकारचा इम्यूनिटी बूस्टर आहे जे सर्व सर्दी, पडसे, खोकला, ताप इत्यादी आजारांविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवते. याबद्दल जाणकार काय म्हणतात?

In reply to by सूक्ष्मजीव

गामा पैलवान 02/03/2021 - 03:39
सूक्ष्मजीव, पर्यायी दृष्टीकोन असलेल्या डॉक्टरांना आपल्या आस्था ( = concerns ) मांडायला वाव मिळावा हा सदर लेख लिहिण्यामागे हेतू आहे. धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.

निमिष ध. 01/03/2021 - 21:16
मिपावर असा लेख असणे - तो सुद्धा करोनासारख्या अवघड काळात हे एक सामाजीक आरोग्याकरता हानीकारक आहे. वेगवेगळी मते असणे वेगळे आणि त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येणे वेगळे. त्यामुळेच इथे उत्तर लिहीतो आहे. त्या ज्या कोण सुझान हम्फ्रीज आहेत त्यांना क्वॅक (ढोंगी वैद्द्य) म्हटलेले आहे - https://medika.life/dr-suzanne-humphries-on-medikas-quack-scale/ त्यांच्या पुस्तकातील मिसल्स चे दाखले कसे खोटे आहेत ते इथे नीट सांगितलेले आहे - https://medium.com/@visualvaccines/why-dr-suzanne-humphries-an-anti-vaccine-activist-is-lying-to-you-about-measles-ce446d0a7e0f अमेरिकेत ५ लाखांहून लोक मेलेली आहेत करोनामुळे आणि जगभरात जवळ जवळ २५ लाख लोकसंख्या दगावलेली आहे. असे असताना असा बेजवाबदार लेख येणे हे चांगले नाही. कृपया कोणीही या लेखाला वाचून करोना लशीबद्दल आपली मते बनवू नयेत ही माझी कळकळीची विनंती.

In reply to by निमिष ध.

पिनाक 01/03/2021 - 22:51
अगदी बरोबर. हेंच म्हणायला इथे आलो होतो. उगीच सरकारचा त्रास वाढवू नका..गप गुमान लस घ्या आणि कामावर चला. लै झालं घरी बसून.

In reply to by निमिष ध.

गामा पैलवान 02/03/2021 - 02:57
निमिष ध., पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर सुझन हम्फ्रीझ कधीही होमियोपाथ नव्हत्या. त्यांनी अलोपथी सोडून इतर कोणतीही उपचारपद्धती सुचवली नाहीये. तुम्ही दिलेल्या दोन्ही दुव्यांत डॉक्टरबाईंना होमियोपाथ व अवांतर चिकित्सक म्हंटलेलं आहे, जे साफ चुकीचं आहे. इझाबेला बाईंचा आरोप २०१५ च्या आसपासचा म्हणजे बराच जुना आहे. डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांच्या संकेतस्थळावर या आरोपांचं खंडन केलेलं आहे : http://www.dissolvingillusions.com/critiques/ वानगीदाखल एक वृथा आरोप दाखवतो :
She promotes mystical powers of Vitamin C, calling it “the basis of life,”[10] and asserts it magically “neutralizes any toxins in the blood.”[10]
प्रत्यक्षांत उपरोक्त पुस्तकात डॉक्टरबाईंनी क जीवनसत्वाच्या चाचण्या घेतल्या नाहीत म्हणून विधान केलंय. हे क जीवनसत्वाचं प्रमोटिंग नव्हे. असो. लशीच्या दुष्परिणामांवर कोणीही काहीच का बोलंत नाही? मी डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांना संशोधिका मानंत नाही. त्यांनी कुठलाही नवा शोध लावलेला नाहीये. त्यांनी फक्त जुना विदा ठळकपणे समोर मांडलाय. जो आजपर्यंत कोणीच मांडला नव्हता. या विदाप्रस्तुतीमुळे लशीविषयी आणि जंतुसिद्धांताविषयी काही मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. कोणाकडे उत्तरं आहेत का? आ.न., -गा.पै.

बाजीगर 02/03/2021 - 14:25
गा.पै. यांच्याविषयी मला आदर आहे. पण या लेखाला मी विरोध करतो. नाही हो. चूक गलत राँगनंबर, गल्ली चूकलात. खूप भटकलात. महाभारत संदर्भ पूर्ण अनावश्यक. माझ्या माहितीतले दक्ष जागरुक मित्र करोना ने मरण पावलेत. कृृपया स्वच्छता पाळा ( त्यावर गा,पै. आपण योग्य जोर दिलात, स्वच्छ पाणी प्या / पोषक व घरचा आहार घ्या / यथाशक्ती व्यायाम,चालणं करा, अकारण जागू नका. आणि हो ...लस घ्या...त्यावर डोकं खपवू नका. हा धागा delit करा. (एवढा research आणि टंकण्याचे श्रम, मुद्दे मांडण्याचे कसब याची मला कदर आहे)

मदनबाण 02/03/2021 - 16:13
गा.पै, हिंदुस्थानातील लसी बाबत गैर समज उत्पन्न होइल असे लेखन सध्य काळात योग्य नाही ! ती किती उपायकारक आहे हे येत्या काळात कळेलच परंतु उगाच लसी विषयी शंका घ्यावी असे सध्या कोणतेच कारण नाही. परदेशातील स्थिती मात्र वेगळी दिसते आणि त्या बद्धल अनेक बातम्या इथे वाचण्यास मिळतील :- Coronavirus COVID19 जाता जाता :- तेव्हा पांडवांना कृष्ण यादव नामे एक अत्यंत लबाड इसम भेटला. या बद्धल विशेष आक्षेप ! आपल्या लिखाणासाठी परमेश्वरास कशास बोल लावावे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs​​ | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |

Rajesh188 02/03/2021 - 16:21
कशा साठी हा लेख delete करायला हवा,लेखात दुसरी बाजू मांडली आहे समजून घ्यायला काय हरकत आहे.प्रतेक विषयावरील दोन्ही बाजू समोर यायलाच हवी.लेख वाचून लगेच लोक लसी बद्द्ल निगेटिव्ह मत बनवतील असे इथे काही लोकांना का वाटत ह्याचेच मोठं आश्चर्य वाटत. वाचणारी माणसं आहेत प्रत्येकाला स्वतःची बुध्दी असते चांगले वाईट,योग्य,अयोग्य सर्वांना समजत .त्यांना गाढव समजू नका. मीच शहाणा मलाच योग्य अयोग्य कळत बाकी लोक बुद्धिहीन आहेत असले गैर समज काढून टाका. आणि लेख delete करायची काही गरज नाही.

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 02/03/2021 - 19:02
मी तरी लस टोचून घेणार नाही. आणि देवू,क्षय,पोलिओ ह्यांची लस टोचली म्हणून ते जगातून कमी झाले आहेत हे तुमचे मत आहे माझे नाही. तुम्हीच त्या प्रश्नांची उत्तरं शोधत बसा.

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 02/03/2021 - 22:11
मी तरी लस टोचून घेणार नाही.
तुम्ही लस टोचून घ्या किंवा नका घेउ...कोणालाही शष्प फरक पडत नाही. मी विचारलेला प्रश्न "तुम्ही लस टोचून घेणार की नाही?" हा नाहीये तर "तुमच्या मुलांना लहान असताना पोलिओ वगैरेच्या लस टोचवल्यात का?" असा आहे. तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का? अजूनही प्रश्न समजला नसेल तर सांगा....अजून सोप्या मराठीत लिहिन :)

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 02/03/2021 - 22:36
आपले विचार कधीच दुसऱ्या वर थोपवयचे नसतात हा साधा common सेन्स आहे. त्या मुळे मुलांना लस दिलेली आहे.ज्या लसी देण्याचे वेळापत्रक सरकार नी तयार केले आहे त्या प्रमाणे. पण आजच्या काळात वैधकीय व्यवसाय हा प्रामाणिक राहिला नाही ह्या वर माझे ठाम मत आहे . मग ते संशोधक असतील तर ते कोणत्या तरी व्यापारी कंपनी शी बांधील असतात आणि त्यांच्या इशर्या वरूनच त्यांचे संशोधन आणि त्याची माहिती ह्याचा प्रचार ,प्रसार ते करत असतात. मोठमोठ्या औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या त्यांचा वापर करून घेतात. ह्या मध्ये शेवटच्या स्तरावर डॉक्टर मंडळी असतात त्यांचे कार्य कसे चालते ह्याचे अनेक किस्से लोकांना माहीत आहेत. लुटमार करणारा व्यवसाय असे वर्णन केले तरी ते चुकीचे ठरणार नाही. मी माझ्या विषयी निर्णय घेताना मात्र त्याचा विचार करतो. एक तर आजारी पडत नाही पण कधी पडलो तर खूप पाच सहा दिवस तरी डॉक्टर कडे जात नाही औषध ही रोग बरे करत नाहीत तर रोग वाढवतात असे माझे मत आहे. अगदीच गरजेचं झाले तर च dr कडे जातो. ते पण माझ्या family dr कडेच. बाकी कोणाकडे नाही. आता सर्व उत्तर दिली आहेत परत एकच प्रश्न विचारू नका

In reply to by Rajesh188

बेंगुताई 30/04/2021 - 11:26
ठाम मत हाहाहा.पण सगळ्या डॉक्टरांचा ठेका तुम्ही म्हणून का घ्यायचा? गलत बात! आणि फॅमिली डॉक्टर पण डॉक्टरचं असतील नाही का ?

In reply to by टवाळ कार्टा

गोवर, काजण्या, गालगुंड, यांचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे किंवा त्यांना अटकाव करणारी, प्रतिकारक्षमता तरी वाढलेली आहे लस टोचून घेणे हे उत्तम, हे तुझे मत, मला तरी मान्य आहे

स्मिता. 02/03/2021 - 16:29
केवळ करोनाच नाही तर इतरही अनेक दुर्धर रोगांवरचे लसीकरण आवश्यकच आहे. आधीच्या अनेक महत्त्वाच्या लसींची माहिती आणि आकडेवारी एक गूगल सर्च केला की सापडेल आणि करोनाच्या लशीची माहिती समजून घ्यायची असल्यास इंग्लंडची (युके) आकडेवारी अभ्यासून बघता येते. तेथे जानेवारीच्या मध्यापासून तर अखेरपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वेळ आली होती. भारताच्या तुलनेत खूप लहान आणि कमी लोकसंख्येच्या या देशात दिवसाला सरासरी ६०,००० बाधीत तर दररोज सरासरी १५०० मृत्यू होत होते. त्यात भर म्हणून हे दिवस तिथल्या कडक हिवाळ्याचे, अनेक दिवस तापमान शून्याच्या मागे-पुढे असते. पण लॉकडाऊन सोबतच लसीकरणाच्या जोरावर एका महिन्याच्या कालावधीत, आजच्या दिवसाला बाधीत आणि मृत्यूचे आकडे १० पटीने कमी झाले आहेत (सरासरी ६००० बाधीत आणि १५० मृत्यू). आलेख पाहिला तर लक्षात येतं की तिथल्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेच्या तुलनेत ही तिसरी लाट बरीच मोठी असली तरी उच्चांकानंतर बाधितांची संख्या झपाट्याने खाली आली आहे. हा एका महिन्यातला फरक केवळ लसीकरणामुळे शक्य झाला आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. आधीच्या लसींच्या तुलनेत ही लस नवीन आहे आणि कमी कालवधीत बनवली आहे हे खरं असलं तरी आता लस शोधण्याचं तंत्रज्ञानसुद्धा आधीपेक्षा खूप विकसीत झालं आहे हे लक्षात घ्यायला हवं. करोनाच्या महामारीमुळे जगभरात लाखो जीव गेले आणि करोडोंचे जगणे अवघड झाले असतांना त्या महामारीला आणि ती आवरण्याच्या प्रयत्नांना कोणी थोतांड कसं म्हणू शकतं?

निपा 02/03/2021 - 18:13
लशीमुळे कुठलाही जीवघेणी साथ आटोक्यात आली नाही. या साथी मंदावल्या त्या किमान स्वच्छता पाळल्याने. हे खूपच simplification झालं . Germs theory ने आपल्याला समजले कि प्रसार कसा होतो आणि ते टाळावे कसे . हे सिद्ध केलं science ने . म्हणजे फक्त hygiene राहिल्याने रोग आटोक्यात येत नसतात. Corona च उदाहरण घेतलं तर फक्त हायजिन maintain करून प्रसार थांबणार नाही . देवीचा रोग व पहिली लस लॅन्सेट च्या लेखात काहीही असे नाही कि ते vaccination प्रोसेस ला कमी लेखते. बाकी पहिल्या vaccination च्या वेळेस प्रॉब्लेम्स झाल्याच असायला पाहिजे. पण आपण हा अर्थ नाही काढू शकत कि vaccine निरुपयोगी आहे. कितीही सर्वर लावले तरी १००% availability नाही येत . तसेच करंट vaccine चा effectiveness ९५% -९८% असा असतो म्हणजे सर्व vaccine घेटलेल्याना corona होणारच नाही असा नाही. परत हा काही पॉईंट नाही विकसन न घेण्याचा. https://www.thelancet.com/journals/laninf/article/PIIS1473-30991730445-0/fulltext बाकी लेख वाचण्या च्या लायकी चा नाही ...

निपा 02/03/2021 - 18:14
लशीमुळे कुठलाही जीवघेणी साथ आटोक्यात आली नाही. या साथी मंदावल्या त्या किमान स्वच्छता पाळल्याने. हे खूपच simplification झालं . Germs theory ने आपल्याला समजले कि प्रसार कसा होतो आणि ते टाळावे कसे . हे सिद्ध केलं science ने . म्हणजे फक्त hygiene राहिल्याने रोग आटोक्यात येत नसतात. Corona च उदाहरण घेतलं तर फक्त हायजिन maintain करून प्रसार थांबणार नाही . देवीचा रोग व पहिली लस लॅन्सेट च्या लेखात काहीही असे नाही कि ते vaccination प्रोसेस ला कमी लेखते. बाकी पहिल्या vaccination च्या वेळेस प्रॉब्लेम्स झाल्याच असायला पाहिजे. पण आपण हा अर्थ नाही काढू शकत कि vaccine निरुपयोगी आहे. कितीही सर्वर लावले तरी १००% availability नाही येत . तसेच करंट vaccine चा effectiveness ९५% -९८% असा असतो म्हणजे सर्व vaccine घेटलेल्याना corona होणारच नाही असा नाही. परत हा काही पॉईंट नाही विकसन न घेण्याचा. https://www.thelancet.com/journals/laninf/article/PIIS1473-30991730445-0/fulltext बाकी लेख वाचण्या च्या लायकी चा नाही ...

गामा पैलवान 02/03/2021 - 19:56
स्मिता.,
करोनाच्या महामारीमुळे जगभरात लाखो जीव गेले आणि करोडोंचे जगणे अवघड झाले असतांना त्या महामारीला आणि ती आवरण्याच्या प्रयत्नांना कोणी थोतांड कसं म्हणू शकतं?
करोना हे एक थोतांड आहे. कारण की अमेरिकेत ऑगस्ट २०२० पर्यंत ( म्हणजे गेल्या सहा सात महिन्यांपर्यंत ) हा विषाणू अलग केला गेला नव्हता. हे गूगल करून पहा : "Since no quantified virus isolates of the 2019-nCoV are currently available," बाकी, इथे इंग्लंडात PHE ( = Public Health England ) कडे करोना विषाणू अलग केल्याची शष्प माहिती नाही : https://www.whatdotheyknow.com/request/679566/response/1625332/attach/2/872%20FOI%20All%20records%20describing%20isolation%20of%20SARS%20COV%202.pdf करोनाचा विषाणू अलग केलेला नसतांना कोणती दिव्य लस उत्पन्न केली गेलीये? थोतांड ते थोतांडच ! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बेंगुताई 30/04/2021 - 11:34
मग मानसं कशाने बर मरत असतील? बहुतेक स्वच्छ भारत अभियान कमी पडले असणार! बाकीच्या देशाचं आपल्याला काही माहीत नाही बुवा.

In reply to by बेंगुताई

रंगीला रतन 30/04/2021 - 11:55
साधा सर्दी पडसा झालेली लोकं आपल्याला करोना झालाय या गैरसमजुतीने उगाच घाबरून मेली आहेत. जगात करोनाचा विषाणु अस्तीत्वात नाही हेच सत्य आहे! तुम्ही आम्ही कीतीही ओरडुन सांगीतले तरी धागालेखक विषाणुचे अस्तीत्व मान्य करणार नाहीत. हां पण सनातन प्रभातने तसा दावा केला तर आणि तरच त्यांचे मतपरीवर्तन नक्की होइल :)

Rajesh188 02/03/2021 - 21:14
प्लेग,देवी,इत्यादी रोग निर्माण करणारे जिवाणू ,विषाणू आज सुद्धा मानवी शरीरावर हल्ला करतात पण त्या व्यक्ती नी त्या आजाराची लस घेतली असल्या मुळे लोक आता त्या आजारांना बळी पडत नाहीत .हे कस सिद्ध केले जाते शास्त्रीय पद्धती नी. कोणी असे सिद्ध करून दाखवलं आहे का? की ते रोग कारक विषाणू,जिवाणू आता अस्तित्वातच नाहीत हे त्याला कारण आहे.

Bhakti 02/03/2021 - 23:29
फायझर लसीबाबत चांगला दुवा मिळाला..कोवीशिल्ड आणि भारत बायोटेक लसीवर शोधत आहे. ् https://www.technologyreview.com/2020/12/09/1013538/what-are-the-ingredients-of-pfizers-covid-19-vaccine/

Rajesh188 03/03/2021 - 19:51
त्यांना होणारे साथी चे आजार काही महिन्यात संपुष्टात येतात ना . कसे . ना लस ना औषध . तरी मानव जेवढं आजारांनी ,रोग राई नी मृत्यू मुखी पडतो तेवढे प्राणी पडत नाहीत. ह्याची पण काही तरी कारणे असतील ना. प्लेग उंदरा पासून माणसात संक्रमित होत होता. आता उंदरांना पण प्लेग होत नाही.

चौकस२१२ 04/03/2021 - 04:43
आधी karona थोतांड होता आपल्यामते आता लस थोतांड ! बरं.. अमेरिकेत , इंग्लंड इटली ब्राझील मध्ये हजारो लाखो मेले हे पण एक थोडांतच का? कि त्यांना लपवून ठेवलाय मोहावी वाळवंटात कि आल्प्स मध्ये ? आजवर कोणत्याही लशीने कुठल्याही रोगांची साथ आटोक्यात आलेली नाहीये यावर लवकरात लवकर कोणी मिपाकर वैद्यबुवा किंवा बाईंनी उत्तर दिले तर सर्व मिपाकरांचे भले होईल

In reply to by मुक्त विहारि

Rajesh188 04/03/2021 - 10:49
माझ्या लहानपणी मधुमेह, लठ्पणा,लहान वयात चशमे,लहान वयात केस पांढरे झालेल्या व्यक्ती दिसत नव्हत्या पण आता मात्र सर्रास दिसत आहेत. उच्च रक्तदाब असणारे तर खूपच आहेत पाहिले तेवढे नव्हते. कमी वयातच दातांचे आणि हिरड्यांचे विकार असलेली लोक पण वाढली आहेत. 32 दात 32 वर्षापर्यंत सुद्धा टिकत नाहीत पाच दहा कमी होतातच.

Rajesh188 04/03/2021 - 11:22
माझ्या गावात मला वाटतं एकच कुष्ठ रोगाचा रोगी होता तो पण वय झालेला. बाकी मी प्लेग चा आजार बघितला नाही ना अनुभवला आहे. पण हिवताप,अतिसार ,कांजण्या हे आजार असायचे आता त्याचे प्रमाण कमी झाले आहे .पण हिवताप आणि अतिसार आज सुद्धा जीवघेणा आहे. उपचार वेळेवर मिळाले नाहीत तर. सर्वात जास्त लोक हिवताप,अतिसार ह्या मुळेच पूर्वी लोक मृत्यू मुखी पडत असत आता तशी स्थिती नाही . औषध उपचार नी ह्या रोगावर विजय मिळवला आहे. रोग राई कमी होण्याचे स्वच्छता हे कारण नक्कीच आहे . धनुर्वात,rabies, ह्याचा रोगी मी आज पर्यंत तरी बघितला नाही. पण हे दोन्ही आजार पण घातक आहेत. आधुनिक वैद्यक शास्त्र नी लोकांचे आयुष्य वाढवले आहे ह्या विषयी शंका नाही. पण आता परत त्या शास्त्राला उतरती कळा लागली आहे असे म्हणता येईल. सेवा भावनेने संशोधन आणि उपचार मधल्या काळात होत होते आता त्याला बाजारू स्वरूप आले आहे.

गामा पैलवान 04/03/2021 - 15:24
चौकस२१२, तुमचा इथला संदेश वाचला. १.
आधी karona थोतांड होता आपल्यामते आता लस थोतांड !
बरोबर. करोनाचा विषाणू हे आजूनही थोतांडच आहे. जो विषाणू अद्याप विलग करता आलेला नाही, त्यावर म्हणे लस बनवली आहे. पब्लिक इतकं मूर्ख आहे का विश्वास ठेवायला? २.
यावर लवकरात लवकर कोणी मिपाकर वैद्यबुवा किंवा बाईंनी उत्तर दिले तर सर्व मिपाकरांचे भले होईल
सहमत आहे. निदान माहिती तरी मिळेल. जमल्यास डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांचं उपरोक्त पुस्तक वाचून पहा. निदान त्यातल्या साथीच्या रोगांचे आलेख तरी बघा म्हणून सुचवेन. ३.
आरे बापरे १००+ देश गंडले कि काय थोतांडामुळे
हो. मेकॉलेछाप राज्यपद्धती असली की हे असं होतंच. आ.न., -गा.पै.

चौकस२१२ 05/03/2021 - 04:22
१०० + अधिक देश त्यांची सरकार पूर्ण गंडली , आणि ती सुद्धा काही सरकारे पार उजव्या विचारसरणी ची आणि काही डाव्या तरी गंडली होय??? अरे बापरे म्हणजे जगातील सर्वात मोठा झोल म्हणाला पाहिजे नाही का? बरं आपण ४थय प्रश्नाचे उत्तर द्यायचे टाळलेत .. हजारो लाखो आणि ते सुद्धा ६० च्या आतले मेले ! कि ते हि खोटंच? का सगळे च्या सगळे असे एकदम इतर आजारांमुळे मेले आणि उगाच करोना चे कारण दिल जातंय ! बरं उत्तर द्या नका देऊ... आपली "थेरी "कळली एक काम करा तो शोधलेख एवढी मेहनत घेऊन लहिलेलेला जरा मटा किंवा लोकसत्तेत छापायला पाठवा ..( कुबेर साहेब स्वागतच करतील कारण त्यात त्यांना "सरकारने लोकांनां कसे गंडवले याचे अजून एक शास्त्रीय उदाहरण मिळेल अप्लाय कृपेने ) जनताच उत्तर देईल तुम्ह्ल्ला अहो काय हे.. चाललंय तुमचा हा हे समजू शकतो कि काही गोष्टींवर आपण प्रश्न उभे करू जसे कि ( राजेश तुम्ही पण ऐका ) लस चुकीच्या पदहतीने विकसित केली असावी , त्यात आर्थिक घोटाळा असेल, इतर उपायातील त्रुटी , पण हे सगळंच खोटा आहे ! असा दावा !

Rajesh188 05/03/2021 - 14:10
Corona लसी मुळे corona होणार नाही ह्याची शाश्वती आहे का. कोणत्याच संस्थेने covid ची लस किती दिवस covid विरूद्ध प्रतिकार क्षमता निर्माण करेल ह्या विषयी ठाम विधान केलेले नाही. म्हणजे हे लसी करण प्रोयागिक आहे.निष्कर्ष अजुन यायचा आहे.

In reply to by Rajesh188

लस १०० % करोनाला प्रतिबंध करेल असा विदा अजुन दिसला नाही. ९० टक्के प्रतिबंध होईल असे समजले तरी १० % रिस्क आहेच. काय नाय, सतत मास्क घालणे, येता-जाता साबण-पाण्याने हात धूणे सॅनिटाइजरचा वापर करणे काळजी घेणे हाच सुरक्षित राहण्याचा उत्तम उपाय आहे. करोना समजा झालाच तर औषधोपचाराने तो बराही होतो. बाकी, अजुन एक करोनास प्रतिबंध करायचा थेट लशी इतकाच उपाय, जोरजोरात थाळी वाजविणे आणि गॅलरीत जाऊन दिवाबत्ती करणे त्याचंही महत्व काही कमी नव्हतं, नाही. त्याचाही विदा येणे अजुन बाकी आहे. =)) च्यायला, आयुष्यात लै गमती जमती केल्या या करोनाने. मागे वळून पाहिल्यावर हसून हसून पुरेवाट होते. -दिलीप बिरुटे

In reply to by टवाळ कार्टा

मिपा वरील चर्चा वाचूनच, केवळ भारतच न्हवे तर,चीन, अमेरिका, पाकिस्तान आपली परराष्ट्रीय धोरणे ठरवतात.... त्यात आता, नोबेल पुरस्कार पण टाकायला हरकत नाही...

गामा पैलवान 05/03/2021 - 20:54
चौकस२१२, १.
हजारो लाखो आणि ते सुद्धा ६० च्या आतले मेले ! कि ते हि खोटंच? का सगळे च्या सगळे असे एकदम इतर आजारांमुळे मेले आणि उगाच करोना चे कारण दिल जातंय !
करोना कोणाच्याही अंगात सापडू शकतो. मेलेल्या माणसावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? करोनामुळे मृत असा छाप मारला तर अमेरिकन सरकार रोग्याचे सगळे पैसे द्यायचं. मग कोण कशाला बिनकरोनाचं प्रमाणपत्र देईल? एक लेख सापडला : https://eu.usatoday.com/story/news/factcheck/2020/04/24/fact-check-medicare-hospitals-paid-more-covid-19-patients-coronavirus/3000638001/ शितावरून भाताची परीक्षा. इथे इंग्लंडमध्ये आता फ्ल्यू चे मृत्यू अचानक नाहीसे झाले. त्यांची जागा करोनाने घेतली. घरोघरी मातीच्याच चुली म्हणावं का ? करोनचा विषाणू आजघडीला विलग ( = isolate ) झालेला नाहीये. भविष्यात तो कधी विलग होण्याची शक्यता माझ्या मते तरी ० आहे. मग नेमकी कशाची चाचणी केली जाते? आणि नेमकी कसली लस टोचली जाते? २.
म्हणजे जगातील सर्वात मोठा झोल म्हणाला पाहिजे नाही का?
होच मुळी. निदान आजवरचा तरी हा सर्वात मोठ्ठा झोल आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by रंगीला रतन

गामा पैलवान 05/03/2021 - 22:23
रंगीला रतन,
तेवढीच जेवढी त्याला थोतांड म्हणायला लागते.
हे बरोबर बोललात. तुमच्याकडे करोनाविषाणू विलगीकृत म्हणजे आयसोलेटेड केलेला आहे का? थेट रोग्याकडून नमुना मिळवलेला पाहिजे. माकडाच्या मूत्रपिंडावर वसवलेली वस्ती किंवा डुकराच्या गळ्याखाली लोंबणारी मांसरुडे ओघळून पडलेल्या चरबीच्या कणांवर वाढवलेली बुरशी वगैरे नको. असा विषाणू तुमच्याकडे नसेल तर करोना हे थोतांड आहे. महत्त्वाचा. आणि हे विधान करायला मला काडीचीही अक्कल वापरावी लागली नाही. तुमच्या उपरोक्त उद्गारांना माझं पूर्ण अनुमोदन आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

रंगीला रतन 05/03/2021 - 22:44
करोना कोणाच्याही अंगात सापडू शकतो. मेलेल्या माणसावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? या वाक्याचाआणि तो करोनाविषाणू आयसोलेटेड आहे क नाही याचा काय संबंध? असल्यास तो स्पष्ट कराच. आपला उद्धट रंगीला रतन

In reply to by रंगीला रतन

गामा पैलवान 06/03/2021 - 15:36
रंगीला रतन, तोच तर माझाही प्रश्न आहे. करोनाचा अस्सल नमुना अस्तित्वात नाही. तरीपण तो रोग्याच्या शरीरात मात्र सापडतो आहे. त्याचप्रमाणे तो निरोगी माणसातही असू शकतो. आणि तो पसरतोही म्हणे. याचाच अर्थ 'करोना' 'शोधण्याची' चाचणी करोनाइतकीच भंपक आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बेंगुताई 30/04/2021 - 12:00
त्यासाठी तुम्हाला प्रयोगशाळेत भेट द्यावी लागेल(मास्क लाउन जा बरं का?) तिथे रुग्णांचे swab असतात तिथे कदाचित दिसतील पण.(बघा एकदा उघड्या डोळ्यांनी दिसले तर) आता नसतीलच विषाणू तर दिसतीलच कशे?काहीही करतात हे लोक दिवसरात्र ते पपई किट घालून काय तर swab घेऊन काय बघतात काय माहीत काय भेटणार त्यात शेम्बडाशिवाय?

Rajesh188 05/03/2021 - 20:59
जेव्हा पासून लस पुराण चालू आहे तेव्हा पासून मला काही प्रश्न पडतात. गूगल वर उत्तर शोधली पण सविस्तर,उत्तर मिळाले नाही. १) covid१९ व्हायरस चे इन्फेक्शन होवून बरे झालेल्या रुग्णात जी प्रतीपिंड तयार होतात ,किंवा covid व्हायरस विरूद्ध प्रतिकार क्षमता निर्माण होते . ती प्रतिकार क्षमता आणि लसी मुळे निर्माण होणारी प्रतिकार क्षमता ह्या मध्ये काय फरक आहे? २) एकदा covid होवून गेल्या नंतर त्याच व्यक्ती ला परत covid झाला अशी जगात किती उदाहरणे आहेत( मी तर वाचले आहे अशी फक्त ५० उदाहरणे जगात आहेत) आणि माझ्या संपर्कात असलेल्या ज्या लोकांना covid झाला होता त्या मधील कोणालाच परत covid झालेला आहे. ना कोणा कडून तशी केस ऐकण्यात आली. इथे कोणाला reinfection झालेला covid रुग्ण माहीत आहे का?

चित्रगुप्त 01/03/2021 - 06:31
करोनाची लस मी घेणार नाही आहे. मागे एका लेखात (कोविडः एक इष्टापत्ती ?) लिहिल्याप्रमाणे आम्हा उभयतांना कोविडबाधा होऊन त्यातून आम्ही कोणताही औषधोपचार न करता पूर्ण बरे झालेलो आहोत. बाकी नशिबात जे आहे ते अगोदरच निश्चित झालेले असते फक्त आपल्याला ते ठाऊक नसल्याने आपल्याला उगाचच धास्ती वाटत रहाते याची मला स्वानुभवावरून खात्री पटलेली आहे.

In reply to by चित्रगुप्त

>>>>>>करोनाची लस मी घेणार नाही आहे. खरं म्हणजे, असे म्हणनेच मोठं धाडस आहे. बाकी आपण औषध उपचार न घेताही बरे झालात असे समजणे म्हणजे करोनाच्या असण्यावर शंका उपस्थित करणे आहे. करोनाबद्दल आपल्या मनात इतकी भिती भरवल्या गेली की आज रात्री आठ वाजेच्या नंतर खिड़कीच्या फ़टीतून तुम्ही बाहेर जरी बघितलं तरी करोनाचे विषाणु आणि तुमची नजरा-नजर झाली असे समजून करोना तुमच्या डोळ्यावाटे शरिरात प्रवेश करेल असे वाटायचे. डोळेच नव्हे तर, शरीराच्या कोणत्याही भागातून करोना आत प्रवेश करेल असे वाटायचे. इतकी ती दहशत होती. ( thanks टू मीडिया आणि सरकार) मला तर इतकी दहशत बसली की जग नष्ट होऊन फक्त झुरळच उरतील आणि मग ते जग कसे असेल असाही विचार मी करायचो. आता लस येईल, तेव्हा लस येईल म्हणून प्रेयसीची वाट पाहणा-या प्रियकरासारखे, किंवा बस थांब्यावर बसची वाट पाहतो तसे आतुर होतो. प्रयत्न सुरु होते आणि एकदाचे लशीचे वेगवेगळे व्हर्जन्स आले. कोणती लस द्यायची ते उपलब्ध साठ्यावर असेल असे सरकारने म्हटल्यापासून लशीबद्दलचा आत्मविश्वास जरा कमी झाला. तुमची लस नुसते पाणी आहे, अशी एका कंपनीची टिका दुस-या कंपनीवर होती. त्याच्या आठवणीने तर लशीची भानगड़ नको असेही वाटून गेले. आज सकाळीच जेव्हा मिपावर लशीच्या थोतांडावर लेख वाचला आणि खुप आनंद झाला. आता आनंद का झाला ते नेमकं सांगता येत नाही, पण झाला. पण आपण लस घेऊन टाकू. परिणाम होऊ की ना होऊ.....प्लासिबो इफेक्ट आता काही रिस्क नाही, असे मनाचे समाधान तरी होईल. बाकी, नशिबात जे आहे ते अगोदरच निश्चित झालेले असते,असे समजू आणि देव्हा-यातल्या देवासमोरची घंटी घेऊ, नसेल तर थाळी घेऊ, दिवाबत्ती करू करोना गो, करोना गो असे म्हणू, हाय काय आणि नाय काय...! -दिलीप बिरुटे

In reply to by उपयोजक

पण, इतक्यात घाई करू नका.... राजकीय नेते, थेट जनसंपर्क टाळू शकतात, आपण तसे करू शकत नाही... घरातून काम करत असाल तर, जनसंपर्क टाळणे, हा सर्वोत्तम उपाय आहे.

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्त 10/03/2021 - 20:47
सध्या हितं आमेरिकेत आहोत गेले आठेक महिने. गप गुमान घरीच. किंवा फारतर येकट्याने मोकळ्यात फिरायला जाणे. कोणी कुणाकडे जात नाहिये वगैरे. आता जरा लोकांनी थोडंबहुत जाणं-येणं सुरु केलय म्हणून एक-दोघांना फोन केला आणि काही मराठी मंडळी फिरायला गेलेलो असताना भेटली - मग घरी या निवांत गप्पा करायला नवीन केलेली चित्रं बघायला वगैरे म्हणालो तर त्यांचा पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही व्ह्याक्शीण घेटलाय का ? अजून नाही म्हटल्यावर लौकरात लौकर घ्या म्हणून काढता पाय घेणे. आता काही काळानंतर भारतात परतायचे आहे तेंव्हाही व्ह्याक्शीण घेतले असल्याचे दाखवावे लागणार. म्हणजे आता घ्यावीच लागणार लस्सी.

In reply to by उपयोजक

काहींना मानस पुत्र, मानस कुटुंब किंवा मानस मुलगी असते.... तसेच आमचे हे मानस बाबा महाराज आहेत... दोन चार पेगांची आहुती चढवली की, ते आत्मिक प्रगट होतात.... डोंबिवली हे जागतिक केंद्र असल्याने म्हणा किंवा आमची आराधना उत्तम असल्याने म्हणा, ते आमच्या आराधनेने कधी कधी प्रसन्न होतात... सध्या ते आम्हाला, आर्थिक षटरिपू ह्या विषयी प्रवचन देत आहेत... बाबा महाराज डोंबोलीकर, यांचे म्हणणे, जास्त मनावर घेऊ नये, ही विनंती.

लेखन आवडलं. लेखाबाबत आणि लशी बाबत अनेकांचे मतभेद होऊ शकतील, पण लेख पटणारा आहे. करोना प्रतिबंधक लस आयुष्यभर तुमचं संरक्षण करू शकणार नाही, हेही खरं आहे, पण काही काळासाठी प्रतिबंध नक्कीच होऊ शकेल असेही वाटते. -दिलीप बिरुटे (कन्फ्यूज) >>>>>आपल्याला दोन नेते जाम आवडले. मोदींनी मुखपट्टी उघडपणे नाकारली....... माझं या विषयावर आणि त्यांच्या काल कर्तुत्वावर काही दिवस मौन आहे, मुखपट्टीच लावली आहे असे समजा. -दिलीप बिरुटे (मुखपट्टीधारक)

कंजूस 01/03/2021 - 09:01
वैज्ञानिकच ठेवा म्हणतो. महाभारत त्यात आणू नका. तो एक वेगळाच करा. ---------------------- एक उदाहरण पाहा काविळीसाठी आयुर्वेदात - यकृत बिघडून पित्तरस अधिक किंवा उणे निर्माण झाल्याने होणारा रोग धरला आहे. त्रिकटू चूर्ण आणि एरंड पानांचा रस हे बरे करतात. हेच मॉडर्न मेडसन, संशोधनातून लिवरचे A,B,C, D प्रकार शोधून वेगवेगळ्या लशी केल्या. रोग होऊ नये म्हणून लस. रोग झाल्यावर फक्त बी कॉम्प्लेक्स. आयुर्वेद औषध अजूनही गुणकारी आहे!!

In reply to by कंजूस

गवि 01/03/2021 - 09:11
कारण व्हायरस ऊर्फ विषाणूची लागण एकदा झाली की थेट त्याच्यावर उपचार करुन मारणे अवघड़ पडते. Bacteria बाबत अँटीबायोटीक औषधे उपयोगी पडतात . व्हायरस मारण्याबाबत मर्यादा येतात. त्यावर केवळ बाह्य लक्षणे कमी करणारे उपायच मुख्यतः करता येतात.

चौकटराजा 01/03/2021 - 09:23
हे पुस्तक २०१३ साली लिहिलेले असल्याने २०२१ साली ते कालबाह्य झाले असण्याची शक्यता आहे ! अशक्त झालेला विषाणू शरीरात टोचल्याने प्रतिपिंडे निर्माण होऊन शरीर त्याच्या पेशीप्रवेशाला मारक अशी योजना करते असा दावा लस याबाबत आतापर्यंत करण्यात आला आहे ! आताची लस या तंत्रावर आधारित नाही अशी माझी माहिती आहे ! लस घेतल्याने प्रत्येकास भक्कम संरक्षण मिळालेच पाहिजे असा दावा निसर्गच मुळी करीत नसतो. यासाठीच तर ते शेवटचे वाक्य डॉक्टरांनी जपून ठेवलेले असते " बॉडी रिस्पॉन्स देत नाही औषधाना ! " आज देखील मला असे वाटते की नेहमीच रोग अनेकांना होत असतात ,अनेक माणसे काहीही औषध न घेता बरी होत असतात ते त्यांच्या नैसर्गिक प्रतिकार शक्तीने . पण हे सगळे अव्यक्त पातळीवर होत असल्यानं त्याचा तपशील ठेवता येत नाही ! ही केवळ तर्का ने जाणण्याची गोष्ट आहे ! तर्कट हे फायद्याचे ही ठरते वा अगदी उलट ! महाजनो गत: स: पंथः या नात्याने मी लस घेणार आहे ! लस न घेतल्याने मरण्यापेक्षा लस घेऊन मी मेलो तर मला त्या मरणाचा अभिमान असेल ज्याने हे सिद्ध होईल की लस घेतल्याने माणूस मरतो जगण्याऐवजी ! निदान त्याने लशीचा गोरखधंदा संपुष्टात तरी येईल !

In reply to by चौकटराजा

आमचे बाबा महाराज डोंबोलीकर हेच म्हणतात ....सध्या शांत रहा, घरात पडीक रहा, सांसर्गिक रोग असल्याने, जन संपर्क टाळा.लशीचे बरेवाईट परिणाम दिसायला वेळ लागेल.

In reply to by चौकटराजा

गोंधळी 01/03/2021 - 09:52
लस न घेतल्याने मरण्यापेक्षा लस घेऊन मी मेलो तर मला त्या मरणाचा अभिमान असेल ज्याने हे सिद्ध होईल की लस घेतल्याने माणूस मरतो जगण्याऐवजी ! निदान त्याने लशीचा गोरखधंदा संपुष्टात तरी येईल ! चौ रा काका हे काही पटले नाही.

In reply to by गोंधळी

चौकटराजा 01/03/2021 - 10:36
कोणतेही औषध वा लस बाजारात येण्यापूर्वी त्याचे काही दुश्परिणाम माणसावर होतात की नाही हे पाहण्यासाठी काही स्वयंसेवक गरजेचे असतात ! ही लस बाजारात येण्यापूर्वी अनेकांनी आपला जीव धोक्यात घालून त्या लसीची ७० टकके परिणामकारकता सिद्ध केली आहे ! तरी ही काही लोकांना त्यावर शंका आहे ! रसायन विज्ञानाचा विषय नसून मानस शास्त्राचा झाला आहे ! वरील स्वयंसेवकांत अनेक तरुण मंडळीही असतीलच ना ! आता धोका पत्करण्यात मी म्हातारा मग मागे का राहू ? आता राहता राहिला संशय लस निर्माते ,राजकारणी व डॉक्टर यांच्या तोडपाण्याचा ! त्यावरही संदेह लोकांना आहे ! तो ही दूर होऊन सत्य पुढे येण्याचे श्रेय संशोधकांप्रमाणेच या स्वयंसेवकांनाही आहे हे नाकारू नये !

उत्तम माहिती. सध्यातरी लस घेण्यापलिकडे पर्याय दिसत नाही. लस घेतल्याने करोना पूर्ण जाणार नाही हे माहित आहे .

Bhakti 01/03/2021 - 10:30
लसीवर चांगलाच ऊहापोह आहे.जीवानमान उंचावण हेच महत्त्वाचे आहे हे तर त्रिकाल बाधित सत्य आहे.पण म्हणून संशोधन सर्व थोडांत हे काय पटल नाही. कंजूस यांच्याप्रमाणेच मलापण​ आयुर्वेद महान आहे त्यात अजूनही शक्ती आहे हे पटल,पण मग प्रश्न पडला रामदेवबाबाच "औषध ?" करोनावर घ्यायच का? (भयानक विचार).. चौरा यांचं मत पटल लस न घेणं ही चुक ठरु शकते. बाकी महाभारतची उजाळणी आवडली :)

In reply to by आंद्रे वडापाव

Bhakti 01/03/2021 - 10:44
ते घेणारच होते. पण त्या अखिलेश बाबाला प्रोटोकॉल,नियम वगैरे काहीच कळत नाही.काहीही बरळत होता.(हा हा)

Rajesh188 01/03/2021 - 12:29
लस च नाही तर सर्वच बाबतीत अवास्तव दावे करण्याचे प्रमाण खूप आहे.सायन्स मॅगझिन मध्ये सुद्धा सर्रास खोटे दावे केले जातात.

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 01/03/2021 - 14:05
फक्त स्वच्छ हवा. रासायनिक खत आणि कीटक नाशक न वापरलेलं अन्न आणि पालेभाजी. शुद्ध पाणी. संकरित जनावर चे दूध पूर्ण बंद. आणि स्वच्छ आणि मोकळा परिसर . एवढे उपलब्ध झाले तर. लस,औषध ह्यांची बिलकुल गरज नाही

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 01/03/2021 - 15:30
या सगळ्या गोष्टी कदाचित १५०/२०० वर्षांपूर्वीपर्यंत (इ.स.१८५०) नक्कीच होत्या तर तेव्हा माणसे जास्त जगायची कि आत्ता जास्त जगतात?

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 01/03/2021 - 16:01
मलेरिया,अतिसार,प्लेग ह्या मुळे लोक जास्त मरायची . कारण योग्य उपचार नव्हते. पण उपचार निर्माण झाल्यावर ते प्रमाण कमी झाले. त्याला लसी कारणीभूत नाहीत. आता जे आयुष्य वाढले आहे असे वाटत आहे ते कोणाचे? ज्यांचे राहणीमान,आहार, विहार नैसर्गिक होता त्यांचेच. म्हणजे १९४५ ते १९७० पर्यंत ज्यांचा जन्म आहे त्यांचेच. त्याला कारण शुध्द आहार,शुद्ध हवा,आणि जोडीला वैधकिय सुविधा हे आहे. पण त्या पुढची पिढी अनेक रोगाने त्रस्त आहे कमी वयात मधुमेह ब्लड प्रेशर. किडनी चे प्रॉब्लेम खूप जास्त वजन आणि अशा अनेक रोगांनी आताची पिढी कमी वयात त्रस्त आहे. ह्याला एकमेव कारण आरोग्य व्यवस्थेचे बाजारीकरण आणि प्रदूषित,हवा,पाणी,अन्न,हे आहे बाजारीकरण मुळे नसलेले गुण चिकटवून केलेली औषनिर्माणशास्त्र ची होत असलेली जाहिरात लेखिका हेच सांगत आहे.

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 01/03/2021 - 16:12
ओके :) तुमच्यासाठी एक प्रश्न....तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का?

In reply to by टवाळ कार्टा

आग्या१९९० 01/03/2021 - 16:24
ह्यांच्या मुलांना नव्हे तर ह्यांनाच देवीचे जिवंत विषाणू टोचून घ्यावेत. नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढली कि नाही हे ही कळेल.

गोंधळी 01/03/2021 - 14:41
सांगायचा मुद्दा काये की कर्म, भक्ती, धर्म यांमध्ये साधना हा सामायिक घटक आहे. ती साधना म्हणजे नामजप. तो करायला हवाच. चांगला सणकून करूया आणि या करोना नामे थोतांडास पार पळवून लावूया. म्हणजे तुम्ही आजारी पडल्यावर वैद्यबुवां कडे जातच नाहीत का? नामजप करुन बरे होता? बाकी अध्यात्माशी सांगड घालत जगणं खुप कठीण काम वाट्ते. ego मुळे असेल कदाचीत.

In reply to by गोंधळी

सासूला, सुनेच्या जाचापासून वाचवते सुनेला, सासू पासून वाचवते स्वतःचे षंढत्व लपवायला धंदा वाढवायला लोकांची फसवणूक करायला जागा ढापायला असे ह्या कातड्याचे विविध उपयोग आहेत आध्यात्मिक माणूस, एक नंबरचा स्वार्थी आणि खोटारडा असतो, हे मी अनुभवले आहे,

टवाळ कार्टा 01/03/2021 - 15:27
लेखकासाठी एक प्रश्न....तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का?

In reply to by टवाळ कार्टा

पुर्वी गल्लोगल्ली, किंवा दरेक शाळेत, एक तरी पोलियोग्रस्त, व्यक्ती असायचीच, आता नाही --------------------- त्यामुळे, आपण लस टोचून घ्यायची. मी थोडे दिवस वाट बघून, मग कुणाकडून लस टोचून घ्यायची?, लस टोचून घेतल्या नंतर कुठे रहायचे? इत्यादि साधकबाधक विचार करून, मगच ठरवीन.... घाई गडबडीत, असे निर्णय न घेणेच उत्तम, असे माझे वैयक्तिक मत आहे... बाय द वे, लस टोचून घेतली की, एक जोरदार कट्टा करू...

जॉन रीज 01/03/2021 - 16:19
आपले जुने लेख आणि हा लेख अशी तुलना करता आपला i.d. कुणी चोरला असावा असे वाटते कारण आपण असे लिखाण कराल असे वाटत नाही आणि लेखाची शैलीही मागील लेखांशी जुळत नाही.

सूक्ष्मजीव 01/03/2021 - 19:36
मी एका ओळखीच्या डॉक्टर सोबत जे कोरोना काळात महानगरपालिके कडून हंगामी करोना सेवे साठी भरती केले आहेत त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. त्यांना मोफत लस दिली जात होती. या लशीचा प्रभाव किती काळ राहील हे विचारल्यावर ते म्हणाले की ही लस नसून एक प्रकारचा इम्यूनिटी बूस्टर आहे जे सर्व सर्दी, पडसे, खोकला, ताप इत्यादी आजारांविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवते. याबद्दल जाणकार काय म्हणतात?

In reply to by सूक्ष्मजीव

गामा पैलवान 02/03/2021 - 03:39
सूक्ष्मजीव, पर्यायी दृष्टीकोन असलेल्या डॉक्टरांना आपल्या आस्था ( = concerns ) मांडायला वाव मिळावा हा सदर लेख लिहिण्यामागे हेतू आहे. धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.

निमिष ध. 01/03/2021 - 21:16
मिपावर असा लेख असणे - तो सुद्धा करोनासारख्या अवघड काळात हे एक सामाजीक आरोग्याकरता हानीकारक आहे. वेगवेगळी मते असणे वेगळे आणि त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येणे वेगळे. त्यामुळेच इथे उत्तर लिहीतो आहे. त्या ज्या कोण सुझान हम्फ्रीज आहेत त्यांना क्वॅक (ढोंगी वैद्द्य) म्हटलेले आहे - https://medika.life/dr-suzanne-humphries-on-medikas-quack-scale/ त्यांच्या पुस्तकातील मिसल्स चे दाखले कसे खोटे आहेत ते इथे नीट सांगितलेले आहे - https://medium.com/@visualvaccines/why-dr-suzanne-humphries-an-anti-vaccine-activist-is-lying-to-you-about-measles-ce446d0a7e0f अमेरिकेत ५ लाखांहून लोक मेलेली आहेत करोनामुळे आणि जगभरात जवळ जवळ २५ लाख लोकसंख्या दगावलेली आहे. असे असताना असा बेजवाबदार लेख येणे हे चांगले नाही. कृपया कोणीही या लेखाला वाचून करोना लशीबद्दल आपली मते बनवू नयेत ही माझी कळकळीची विनंती.

In reply to by निमिष ध.

पिनाक 01/03/2021 - 22:51
अगदी बरोबर. हेंच म्हणायला इथे आलो होतो. उगीच सरकारचा त्रास वाढवू नका..गप गुमान लस घ्या आणि कामावर चला. लै झालं घरी बसून.

In reply to by निमिष ध.

गामा पैलवान 02/03/2021 - 02:57
निमिष ध., पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर सुझन हम्फ्रीझ कधीही होमियोपाथ नव्हत्या. त्यांनी अलोपथी सोडून इतर कोणतीही उपचारपद्धती सुचवली नाहीये. तुम्ही दिलेल्या दोन्ही दुव्यांत डॉक्टरबाईंना होमियोपाथ व अवांतर चिकित्सक म्हंटलेलं आहे, जे साफ चुकीचं आहे. इझाबेला बाईंचा आरोप २०१५ च्या आसपासचा म्हणजे बराच जुना आहे. डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांच्या संकेतस्थळावर या आरोपांचं खंडन केलेलं आहे : http://www.dissolvingillusions.com/critiques/ वानगीदाखल एक वृथा आरोप दाखवतो :
She promotes mystical powers of Vitamin C, calling it “the basis of life,”[10] and asserts it magically “neutralizes any toxins in the blood.”[10]
प्रत्यक्षांत उपरोक्त पुस्तकात डॉक्टरबाईंनी क जीवनसत्वाच्या चाचण्या घेतल्या नाहीत म्हणून विधान केलंय. हे क जीवनसत्वाचं प्रमोटिंग नव्हे. असो. लशीच्या दुष्परिणामांवर कोणीही काहीच का बोलंत नाही? मी डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांना संशोधिका मानंत नाही. त्यांनी कुठलाही नवा शोध लावलेला नाहीये. त्यांनी फक्त जुना विदा ठळकपणे समोर मांडलाय. जो आजपर्यंत कोणीच मांडला नव्हता. या विदाप्रस्तुतीमुळे लशीविषयी आणि जंतुसिद्धांताविषयी काही मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. कोणाकडे उत्तरं आहेत का? आ.न., -गा.पै.

बाजीगर 02/03/2021 - 14:25
गा.पै. यांच्याविषयी मला आदर आहे. पण या लेखाला मी विरोध करतो. नाही हो. चूक गलत राँगनंबर, गल्ली चूकलात. खूप भटकलात. महाभारत संदर्भ पूर्ण अनावश्यक. माझ्या माहितीतले दक्ष जागरुक मित्र करोना ने मरण पावलेत. कृृपया स्वच्छता पाळा ( त्यावर गा,पै. आपण योग्य जोर दिलात, स्वच्छ पाणी प्या / पोषक व घरचा आहार घ्या / यथाशक्ती व्यायाम,चालणं करा, अकारण जागू नका. आणि हो ...लस घ्या...त्यावर डोकं खपवू नका. हा धागा delit करा. (एवढा research आणि टंकण्याचे श्रम, मुद्दे मांडण्याचे कसब याची मला कदर आहे)

मदनबाण 02/03/2021 - 16:13
गा.पै, हिंदुस्थानातील लसी बाबत गैर समज उत्पन्न होइल असे लेखन सध्य काळात योग्य नाही ! ती किती उपायकारक आहे हे येत्या काळात कळेलच परंतु उगाच लसी विषयी शंका घ्यावी असे सध्या कोणतेच कारण नाही. परदेशातील स्थिती मात्र वेगळी दिसते आणि त्या बद्धल अनेक बातम्या इथे वाचण्यास मिळतील :- Coronavirus COVID19 जाता जाता :- तेव्हा पांडवांना कृष्ण यादव नामे एक अत्यंत लबाड इसम भेटला. या बद्धल विशेष आक्षेप ! आपल्या लिखाणासाठी परमेश्वरास कशास बोल लावावे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs​​ | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |

Rajesh188 02/03/2021 - 16:21
कशा साठी हा लेख delete करायला हवा,लेखात दुसरी बाजू मांडली आहे समजून घ्यायला काय हरकत आहे.प्रतेक विषयावरील दोन्ही बाजू समोर यायलाच हवी.लेख वाचून लगेच लोक लसी बद्द्ल निगेटिव्ह मत बनवतील असे इथे काही लोकांना का वाटत ह्याचेच मोठं आश्चर्य वाटत. वाचणारी माणसं आहेत प्रत्येकाला स्वतःची बुध्दी असते चांगले वाईट,योग्य,अयोग्य सर्वांना समजत .त्यांना गाढव समजू नका. मीच शहाणा मलाच योग्य अयोग्य कळत बाकी लोक बुद्धिहीन आहेत असले गैर समज काढून टाका. आणि लेख delete करायची काही गरज नाही.

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 02/03/2021 - 19:02
मी तरी लस टोचून घेणार नाही. आणि देवू,क्षय,पोलिओ ह्यांची लस टोचली म्हणून ते जगातून कमी झाले आहेत हे तुमचे मत आहे माझे नाही. तुम्हीच त्या प्रश्नांची उत्तरं शोधत बसा.

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 02/03/2021 - 22:11
मी तरी लस टोचून घेणार नाही.
तुम्ही लस टोचून घ्या किंवा नका घेउ...कोणालाही शष्प फरक पडत नाही. मी विचारलेला प्रश्न "तुम्ही लस टोचून घेणार की नाही?" हा नाहीये तर "तुमच्या मुलांना लहान असताना पोलिओ वगैरेच्या लस टोचवल्यात का?" असा आहे. तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का? अजूनही प्रश्न समजला नसेल तर सांगा....अजून सोप्या मराठीत लिहिन :)

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 02/03/2021 - 22:36
आपले विचार कधीच दुसऱ्या वर थोपवयचे नसतात हा साधा common सेन्स आहे. त्या मुळे मुलांना लस दिलेली आहे.ज्या लसी देण्याचे वेळापत्रक सरकार नी तयार केले आहे त्या प्रमाणे. पण आजच्या काळात वैधकीय व्यवसाय हा प्रामाणिक राहिला नाही ह्या वर माझे ठाम मत आहे . मग ते संशोधक असतील तर ते कोणत्या तरी व्यापारी कंपनी शी बांधील असतात आणि त्यांच्या इशर्या वरूनच त्यांचे संशोधन आणि त्याची माहिती ह्याचा प्रचार ,प्रसार ते करत असतात. मोठमोठ्या औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या त्यांचा वापर करून घेतात. ह्या मध्ये शेवटच्या स्तरावर डॉक्टर मंडळी असतात त्यांचे कार्य कसे चालते ह्याचे अनेक किस्से लोकांना माहीत आहेत. लुटमार करणारा व्यवसाय असे वर्णन केले तरी ते चुकीचे ठरणार नाही. मी माझ्या विषयी निर्णय घेताना मात्र त्याचा विचार करतो. एक तर आजारी पडत नाही पण कधी पडलो तर खूप पाच सहा दिवस तरी डॉक्टर कडे जात नाही औषध ही रोग बरे करत नाहीत तर रोग वाढवतात असे माझे मत आहे. अगदीच गरजेचं झाले तर च dr कडे जातो. ते पण माझ्या family dr कडेच. बाकी कोणाकडे नाही. आता सर्व उत्तर दिली आहेत परत एकच प्रश्न विचारू नका

In reply to by Rajesh188

बेंगुताई 30/04/2021 - 11:26
ठाम मत हाहाहा.पण सगळ्या डॉक्टरांचा ठेका तुम्ही म्हणून का घ्यायचा? गलत बात! आणि फॅमिली डॉक्टर पण डॉक्टरचं असतील नाही का ?

In reply to by टवाळ कार्टा

गोवर, काजण्या, गालगुंड, यांचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे किंवा त्यांना अटकाव करणारी, प्रतिकारक्षमता तरी वाढलेली आहे लस टोचून घेणे हे उत्तम, हे तुझे मत, मला तरी मान्य आहे

स्मिता. 02/03/2021 - 16:29
केवळ करोनाच नाही तर इतरही अनेक दुर्धर रोगांवरचे लसीकरण आवश्यकच आहे. आधीच्या अनेक महत्त्वाच्या लसींची माहिती आणि आकडेवारी एक गूगल सर्च केला की सापडेल आणि करोनाच्या लशीची माहिती समजून घ्यायची असल्यास इंग्लंडची (युके) आकडेवारी अभ्यासून बघता येते. तेथे जानेवारीच्या मध्यापासून तर अखेरपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वेळ आली होती. भारताच्या तुलनेत खूप लहान आणि कमी लोकसंख्येच्या या देशात दिवसाला सरासरी ६०,००० बाधीत तर दररोज सरासरी १५०० मृत्यू होत होते. त्यात भर म्हणून हे दिवस तिथल्या कडक हिवाळ्याचे, अनेक दिवस तापमान शून्याच्या मागे-पुढे असते. पण लॉकडाऊन सोबतच लसीकरणाच्या जोरावर एका महिन्याच्या कालावधीत, आजच्या दिवसाला बाधीत आणि मृत्यूचे आकडे १० पटीने कमी झाले आहेत (सरासरी ६००० बाधीत आणि १५० मृत्यू). आलेख पाहिला तर लक्षात येतं की तिथल्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेच्या तुलनेत ही तिसरी लाट बरीच मोठी असली तरी उच्चांकानंतर बाधितांची संख्या झपाट्याने खाली आली आहे. हा एका महिन्यातला फरक केवळ लसीकरणामुळे शक्य झाला आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. आधीच्या लसींच्या तुलनेत ही लस नवीन आहे आणि कमी कालवधीत बनवली आहे हे खरं असलं तरी आता लस शोधण्याचं तंत्रज्ञानसुद्धा आधीपेक्षा खूप विकसीत झालं आहे हे लक्षात घ्यायला हवं. करोनाच्या महामारीमुळे जगभरात लाखो जीव गेले आणि करोडोंचे जगणे अवघड झाले असतांना त्या महामारीला आणि ती आवरण्याच्या प्रयत्नांना कोणी थोतांड कसं म्हणू शकतं?

निपा 02/03/2021 - 18:13
लशीमुळे कुठलाही जीवघेणी साथ आटोक्यात आली नाही. या साथी मंदावल्या त्या किमान स्वच्छता पाळल्याने. हे खूपच simplification झालं . Germs theory ने आपल्याला समजले कि प्रसार कसा होतो आणि ते टाळावे कसे . हे सिद्ध केलं science ने . म्हणजे फक्त hygiene राहिल्याने रोग आटोक्यात येत नसतात. Corona च उदाहरण घेतलं तर फक्त हायजिन maintain करून प्रसार थांबणार नाही . देवीचा रोग व पहिली लस लॅन्सेट च्या लेखात काहीही असे नाही कि ते vaccination प्रोसेस ला कमी लेखते. बाकी पहिल्या vaccination च्या वेळेस प्रॉब्लेम्स झाल्याच असायला पाहिजे. पण आपण हा अर्थ नाही काढू शकत कि vaccine निरुपयोगी आहे. कितीही सर्वर लावले तरी १००% availability नाही येत . तसेच करंट vaccine चा effectiveness ९५% -९८% असा असतो म्हणजे सर्व vaccine घेटलेल्याना corona होणारच नाही असा नाही. परत हा काही पॉईंट नाही विकसन न घेण्याचा. https://www.thelancet.com/journals/laninf/article/PIIS1473-30991730445-0/fulltext बाकी लेख वाचण्या च्या लायकी चा नाही ...

निपा 02/03/2021 - 18:14
लशीमुळे कुठलाही जीवघेणी साथ आटोक्यात आली नाही. या साथी मंदावल्या त्या किमान स्वच्छता पाळल्याने. हे खूपच simplification झालं . Germs theory ने आपल्याला समजले कि प्रसार कसा होतो आणि ते टाळावे कसे . हे सिद्ध केलं science ने . म्हणजे फक्त hygiene राहिल्याने रोग आटोक्यात येत नसतात. Corona च उदाहरण घेतलं तर फक्त हायजिन maintain करून प्रसार थांबणार नाही . देवीचा रोग व पहिली लस लॅन्सेट च्या लेखात काहीही असे नाही कि ते vaccination प्रोसेस ला कमी लेखते. बाकी पहिल्या vaccination च्या वेळेस प्रॉब्लेम्स झाल्याच असायला पाहिजे. पण आपण हा अर्थ नाही काढू शकत कि vaccine निरुपयोगी आहे. कितीही सर्वर लावले तरी १००% availability नाही येत . तसेच करंट vaccine चा effectiveness ९५% -९८% असा असतो म्हणजे सर्व vaccine घेटलेल्याना corona होणारच नाही असा नाही. परत हा काही पॉईंट नाही विकसन न घेण्याचा. https://www.thelancet.com/journals/laninf/article/PIIS1473-30991730445-0/fulltext बाकी लेख वाचण्या च्या लायकी चा नाही ...

गामा पैलवान 02/03/2021 - 19:56
स्मिता.,
करोनाच्या महामारीमुळे जगभरात लाखो जीव गेले आणि करोडोंचे जगणे अवघड झाले असतांना त्या महामारीला आणि ती आवरण्याच्या प्रयत्नांना कोणी थोतांड कसं म्हणू शकतं?
करोना हे एक थोतांड आहे. कारण की अमेरिकेत ऑगस्ट २०२० पर्यंत ( म्हणजे गेल्या सहा सात महिन्यांपर्यंत ) हा विषाणू अलग केला गेला नव्हता. हे गूगल करून पहा : "Since no quantified virus isolates of the 2019-nCoV are currently available," बाकी, इथे इंग्लंडात PHE ( = Public Health England ) कडे करोना विषाणू अलग केल्याची शष्प माहिती नाही : https://www.whatdotheyknow.com/request/679566/response/1625332/attach/2/872%20FOI%20All%20records%20describing%20isolation%20of%20SARS%20COV%202.pdf करोनाचा विषाणू अलग केलेला नसतांना कोणती दिव्य लस उत्पन्न केली गेलीये? थोतांड ते थोतांडच ! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बेंगुताई 30/04/2021 - 11:34
मग मानसं कशाने बर मरत असतील? बहुतेक स्वच्छ भारत अभियान कमी पडले असणार! बाकीच्या देशाचं आपल्याला काही माहीत नाही बुवा.

In reply to by बेंगुताई

रंगीला रतन 30/04/2021 - 11:55
साधा सर्दी पडसा झालेली लोकं आपल्याला करोना झालाय या गैरसमजुतीने उगाच घाबरून मेली आहेत. जगात करोनाचा विषाणु अस्तीत्वात नाही हेच सत्य आहे! तुम्ही आम्ही कीतीही ओरडुन सांगीतले तरी धागालेखक विषाणुचे अस्तीत्व मान्य करणार नाहीत. हां पण सनातन प्रभातने तसा दावा केला तर आणि तरच त्यांचे मतपरीवर्तन नक्की होइल :)

Rajesh188 02/03/2021 - 21:14
प्लेग,देवी,इत्यादी रोग निर्माण करणारे जिवाणू ,विषाणू आज सुद्धा मानवी शरीरावर हल्ला करतात पण त्या व्यक्ती नी त्या आजाराची लस घेतली असल्या मुळे लोक आता त्या आजारांना बळी पडत नाहीत .हे कस सिद्ध केले जाते शास्त्रीय पद्धती नी. कोणी असे सिद्ध करून दाखवलं आहे का? की ते रोग कारक विषाणू,जिवाणू आता अस्तित्वातच नाहीत हे त्याला कारण आहे.

Bhakti 02/03/2021 - 23:29
फायझर लसीबाबत चांगला दुवा मिळाला..कोवीशिल्ड आणि भारत बायोटेक लसीवर शोधत आहे. ् https://www.technologyreview.com/2020/12/09/1013538/what-are-the-ingredients-of-pfizers-covid-19-vaccine/

Rajesh188 03/03/2021 - 19:51
त्यांना होणारे साथी चे आजार काही महिन्यात संपुष्टात येतात ना . कसे . ना लस ना औषध . तरी मानव जेवढं आजारांनी ,रोग राई नी मृत्यू मुखी पडतो तेवढे प्राणी पडत नाहीत. ह्याची पण काही तरी कारणे असतील ना. प्लेग उंदरा पासून माणसात संक्रमित होत होता. आता उंदरांना पण प्लेग होत नाही.

चौकस२१२ 04/03/2021 - 04:43
आधी karona थोतांड होता आपल्यामते आता लस थोतांड ! बरं.. अमेरिकेत , इंग्लंड इटली ब्राझील मध्ये हजारो लाखो मेले हे पण एक थोडांतच का? कि त्यांना लपवून ठेवलाय मोहावी वाळवंटात कि आल्प्स मध्ये ? आजवर कोणत्याही लशीने कुठल्याही रोगांची साथ आटोक्यात आलेली नाहीये यावर लवकरात लवकर कोणी मिपाकर वैद्यबुवा किंवा बाईंनी उत्तर दिले तर सर्व मिपाकरांचे भले होईल

In reply to by मुक्त विहारि

Rajesh188 04/03/2021 - 10:49
माझ्या लहानपणी मधुमेह, लठ्पणा,लहान वयात चशमे,लहान वयात केस पांढरे झालेल्या व्यक्ती दिसत नव्हत्या पण आता मात्र सर्रास दिसत आहेत. उच्च रक्तदाब असणारे तर खूपच आहेत पाहिले तेवढे नव्हते. कमी वयातच दातांचे आणि हिरड्यांचे विकार असलेली लोक पण वाढली आहेत. 32 दात 32 वर्षापर्यंत सुद्धा टिकत नाहीत पाच दहा कमी होतातच.

Rajesh188 04/03/2021 - 11:22
माझ्या गावात मला वाटतं एकच कुष्ठ रोगाचा रोगी होता तो पण वय झालेला. बाकी मी प्लेग चा आजार बघितला नाही ना अनुभवला आहे. पण हिवताप,अतिसार ,कांजण्या हे आजार असायचे आता त्याचे प्रमाण कमी झाले आहे .पण हिवताप आणि अतिसार आज सुद्धा जीवघेणा आहे. उपचार वेळेवर मिळाले नाहीत तर. सर्वात जास्त लोक हिवताप,अतिसार ह्या मुळेच पूर्वी लोक मृत्यू मुखी पडत असत आता तशी स्थिती नाही . औषध उपचार नी ह्या रोगावर विजय मिळवला आहे. रोग राई कमी होण्याचे स्वच्छता हे कारण नक्कीच आहे . धनुर्वात,rabies, ह्याचा रोगी मी आज पर्यंत तरी बघितला नाही. पण हे दोन्ही आजार पण घातक आहेत. आधुनिक वैद्यक शास्त्र नी लोकांचे आयुष्य वाढवले आहे ह्या विषयी शंका नाही. पण आता परत त्या शास्त्राला उतरती कळा लागली आहे असे म्हणता येईल. सेवा भावनेने संशोधन आणि उपचार मधल्या काळात होत होते आता त्याला बाजारू स्वरूप आले आहे.

गामा पैलवान 04/03/2021 - 15:24
चौकस२१२, तुमचा इथला संदेश वाचला. १.
आधी karona थोतांड होता आपल्यामते आता लस थोतांड !
बरोबर. करोनाचा विषाणू हे आजूनही थोतांडच आहे. जो विषाणू अद्याप विलग करता आलेला नाही, त्यावर म्हणे लस बनवली आहे. पब्लिक इतकं मूर्ख आहे का विश्वास ठेवायला? २.
यावर लवकरात लवकर कोणी मिपाकर वैद्यबुवा किंवा बाईंनी उत्तर दिले तर सर्व मिपाकरांचे भले होईल
सहमत आहे. निदान माहिती तरी मिळेल. जमल्यास डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांचं उपरोक्त पुस्तक वाचून पहा. निदान त्यातल्या साथीच्या रोगांचे आलेख तरी बघा म्हणून सुचवेन. ३.
आरे बापरे १००+ देश गंडले कि काय थोतांडामुळे
हो. मेकॉलेछाप राज्यपद्धती असली की हे असं होतंच. आ.न., -गा.पै.

चौकस२१२ 05/03/2021 - 04:22
१०० + अधिक देश त्यांची सरकार पूर्ण गंडली , आणि ती सुद्धा काही सरकारे पार उजव्या विचारसरणी ची आणि काही डाव्या तरी गंडली होय??? अरे बापरे म्हणजे जगातील सर्वात मोठा झोल म्हणाला पाहिजे नाही का? बरं आपण ४थय प्रश्नाचे उत्तर द्यायचे टाळलेत .. हजारो लाखो आणि ते सुद्धा ६० च्या आतले मेले ! कि ते हि खोटंच? का सगळे च्या सगळे असे एकदम इतर आजारांमुळे मेले आणि उगाच करोना चे कारण दिल जातंय ! बरं उत्तर द्या नका देऊ... आपली "थेरी "कळली एक काम करा तो शोधलेख एवढी मेहनत घेऊन लहिलेलेला जरा मटा किंवा लोकसत्तेत छापायला पाठवा ..( कुबेर साहेब स्वागतच करतील कारण त्यात त्यांना "सरकारने लोकांनां कसे गंडवले याचे अजून एक शास्त्रीय उदाहरण मिळेल अप्लाय कृपेने ) जनताच उत्तर देईल तुम्ह्ल्ला अहो काय हे.. चाललंय तुमचा हा हे समजू शकतो कि काही गोष्टींवर आपण प्रश्न उभे करू जसे कि ( राजेश तुम्ही पण ऐका ) लस चुकीच्या पदहतीने विकसित केली असावी , त्यात आर्थिक घोटाळा असेल, इतर उपायातील त्रुटी , पण हे सगळंच खोटा आहे ! असा दावा !

Rajesh188 05/03/2021 - 14:10
Corona लसी मुळे corona होणार नाही ह्याची शाश्वती आहे का. कोणत्याच संस्थेने covid ची लस किती दिवस covid विरूद्ध प्रतिकार क्षमता निर्माण करेल ह्या विषयी ठाम विधान केलेले नाही. म्हणजे हे लसी करण प्रोयागिक आहे.निष्कर्ष अजुन यायचा आहे.

In reply to by Rajesh188

लस १०० % करोनाला प्रतिबंध करेल असा विदा अजुन दिसला नाही. ९० टक्के प्रतिबंध होईल असे समजले तरी १० % रिस्क आहेच. काय नाय, सतत मास्क घालणे, येता-जाता साबण-पाण्याने हात धूणे सॅनिटाइजरचा वापर करणे काळजी घेणे हाच सुरक्षित राहण्याचा उत्तम उपाय आहे. करोना समजा झालाच तर औषधोपचाराने तो बराही होतो. बाकी, अजुन एक करोनास प्रतिबंध करायचा थेट लशी इतकाच उपाय, जोरजोरात थाळी वाजविणे आणि गॅलरीत जाऊन दिवाबत्ती करणे त्याचंही महत्व काही कमी नव्हतं, नाही. त्याचाही विदा येणे अजुन बाकी आहे. =)) च्यायला, आयुष्यात लै गमती जमती केल्या या करोनाने. मागे वळून पाहिल्यावर हसून हसून पुरेवाट होते. -दिलीप बिरुटे

In reply to by टवाळ कार्टा

मिपा वरील चर्चा वाचूनच, केवळ भारतच न्हवे तर,चीन, अमेरिका, पाकिस्तान आपली परराष्ट्रीय धोरणे ठरवतात.... त्यात आता, नोबेल पुरस्कार पण टाकायला हरकत नाही...

गामा पैलवान 05/03/2021 - 20:54
चौकस२१२, १.
हजारो लाखो आणि ते सुद्धा ६० च्या आतले मेले ! कि ते हि खोटंच? का सगळे च्या सगळे असे एकदम इतर आजारांमुळे मेले आणि उगाच करोना चे कारण दिल जातंय !
करोना कोणाच्याही अंगात सापडू शकतो. मेलेल्या माणसावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? करोनामुळे मृत असा छाप मारला तर अमेरिकन सरकार रोग्याचे सगळे पैसे द्यायचं. मग कोण कशाला बिनकरोनाचं प्रमाणपत्र देईल? एक लेख सापडला : https://eu.usatoday.com/story/news/factcheck/2020/04/24/fact-check-medicare-hospitals-paid-more-covid-19-patients-coronavirus/3000638001/ शितावरून भाताची परीक्षा. इथे इंग्लंडमध्ये आता फ्ल्यू चे मृत्यू अचानक नाहीसे झाले. त्यांची जागा करोनाने घेतली. घरोघरी मातीच्याच चुली म्हणावं का ? करोनचा विषाणू आजघडीला विलग ( = isolate ) झालेला नाहीये. भविष्यात तो कधी विलग होण्याची शक्यता माझ्या मते तरी ० आहे. मग नेमकी कशाची चाचणी केली जाते? आणि नेमकी कसली लस टोचली जाते? २.
म्हणजे जगातील सर्वात मोठा झोल म्हणाला पाहिजे नाही का?
होच मुळी. निदान आजवरचा तरी हा सर्वात मोठ्ठा झोल आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by रंगीला रतन

गामा पैलवान 05/03/2021 - 22:23
रंगीला रतन,
तेवढीच जेवढी त्याला थोतांड म्हणायला लागते.
हे बरोबर बोललात. तुमच्याकडे करोनाविषाणू विलगीकृत म्हणजे आयसोलेटेड केलेला आहे का? थेट रोग्याकडून नमुना मिळवलेला पाहिजे. माकडाच्या मूत्रपिंडावर वसवलेली वस्ती किंवा डुकराच्या गळ्याखाली लोंबणारी मांसरुडे ओघळून पडलेल्या चरबीच्या कणांवर वाढवलेली बुरशी वगैरे नको. असा विषाणू तुमच्याकडे नसेल तर करोना हे थोतांड आहे. महत्त्वाचा. आणि हे विधान करायला मला काडीचीही अक्कल वापरावी लागली नाही. तुमच्या उपरोक्त उद्गारांना माझं पूर्ण अनुमोदन आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

रंगीला रतन 05/03/2021 - 22:44
करोना कोणाच्याही अंगात सापडू शकतो. मेलेल्या माणसावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? या वाक्याचाआणि तो करोनाविषाणू आयसोलेटेड आहे क नाही याचा काय संबंध? असल्यास तो स्पष्ट कराच. आपला उद्धट रंगीला रतन

In reply to by रंगीला रतन

गामा पैलवान 06/03/2021 - 15:36
रंगीला रतन, तोच तर माझाही प्रश्न आहे. करोनाचा अस्सल नमुना अस्तित्वात नाही. तरीपण तो रोग्याच्या शरीरात मात्र सापडतो आहे. त्याचप्रमाणे तो निरोगी माणसातही असू शकतो. आणि तो पसरतोही म्हणे. याचाच अर्थ 'करोना' 'शोधण्याची' चाचणी करोनाइतकीच भंपक आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बेंगुताई 30/04/2021 - 12:00
त्यासाठी तुम्हाला प्रयोगशाळेत भेट द्यावी लागेल(मास्क लाउन जा बरं का?) तिथे रुग्णांचे swab असतात तिथे कदाचित दिसतील पण.(बघा एकदा उघड्या डोळ्यांनी दिसले तर) आता नसतीलच विषाणू तर दिसतीलच कशे?काहीही करतात हे लोक दिवसरात्र ते पपई किट घालून काय तर swab घेऊन काय बघतात काय माहीत काय भेटणार त्यात शेम्बडाशिवाय?

Rajesh188 05/03/2021 - 20:59
जेव्हा पासून लस पुराण चालू आहे तेव्हा पासून मला काही प्रश्न पडतात. गूगल वर उत्तर शोधली पण सविस्तर,उत्तर मिळाले नाही. १) covid१९ व्हायरस चे इन्फेक्शन होवून बरे झालेल्या रुग्णात जी प्रतीपिंड तयार होतात ,किंवा covid व्हायरस विरूद्ध प्रतिकार क्षमता निर्माण होते . ती प्रतिकार क्षमता आणि लसी मुळे निर्माण होणारी प्रतिकार क्षमता ह्या मध्ये काय फरक आहे? २) एकदा covid होवून गेल्या नंतर त्याच व्यक्ती ला परत covid झाला अशी जगात किती उदाहरणे आहेत( मी तर वाचले आहे अशी फक्त ५० उदाहरणे जगात आहेत) आणि माझ्या संपर्कात असलेल्या ज्या लोकांना covid झाला होता त्या मधील कोणालाच परत covid झालेला आहे. ना कोणा कडून तशी केस ऐकण्यात आली. इथे कोणाला reinfection झालेला covid रुग्ण माहीत आहे का?
नमस्कार लोकहो! करोना नामे मायावी थोतांड चालूच आहे. मायावी अशासाठी म्हंटलंय की पूर्वी एका मायावी राक्षसाच्या रूपातनं दुसरा राक्षस जन्म घ्यायचा, त्याचा धर्तीवर करोना या पहिल्या थोतांडातनं लस नावाचं दुसरं थोतांड उत्पन्न होतंय. आजवर कोणत्याही लशीने कुठल्याही रोगांची साथ आटोक्यात आलेली नाहीये. हां, लशीमुळे रोग नाहीसा होतो असा सार्वत्रिक भ्रम प्रचलित आहे. कारण की भरपूर प्रमाणावर तसा प्रचार केला गेलाय. या बाबतीत आपल्याला दोन नेते जाम आवडले.

ऑस्कर ग्रोएनिन्ग-ऑश्वित्झ छळ छावणीचा अकाउंटंट(लेखनिक)

आदित्य कोरडे ·

टवाळ कार्टा 17/10/2020 - 21:57
इथे जायला अजूनही मन तयार नाहीये, मित्रांकडून वर्णने ऐकलीत तीच पुरे वाटतात....त्या छळछावणीत माणसे मारायला "असेंम्बली लाईन" बनवलेली....इथून माणूस आत घालायचा आणि दुसरीकडून जळालेली राख निघणार...अजूनही तिथे माणसांचे केस वगैरे पडलेले दिसतात

मराठी_माणूस 18/10/2020 - 10:39
एक शंका
पण २०१४ साली जर्मनीत त्याच्यावर सरकार तर्फे खटला भरला गेला. ऑश्वित्झ छळ छावणीत झालेल्या ज्यू कत्तलीला सहाय्यभूत झाल्याचा ठपका त्याच्यावर ठेवला गेला
असे तर असंख्य लोक होते त्या सगळ्यावर असे खटले भरले होते ?

In reply to by मराठी_माणूस

हो अनेक जणांवर नंतर आणि ऑस्करच्या आधीही खटले भरले गेले आणि शिक्षा झाल्या. अर्थात जस जसा काल गेला तस तसे लोक मरूनच गेल्यामुळे हे प्रमाण कमी आहे २०१४ नंतर म्हणजे ७० वर्षानंतर साधारण ५० माजी नाझी सदस्यांवर खटले चालू होते किंवा ट्रायल सुरु होत्या . ऑस्करच्या बाबतीत विशेष असे कि तो अगदी साधारण शिपाई गाडी होता आधी मोठ्या उच्च पदस्थ नाझी अधिकार्यांना शोधून त्यांच्या वर खटले भरले जात हे मोठे अधिकारी असल्याने अर्थात पळून गेले असत त्यामुळे ते अवघड होई. हल्ली हल्ली साधे शिपाई सुद्धा पकडून त्यांच्यावर खटले भरले जातात. जोन दिमान्युक ह्या सोबिबोर इथल्या अशाच शिपायावर देखिल खटला भरून त्याला शिक्षा केली गेली. आतापर्यंत किमान २०० अशा कमी महत्वाच्या पदावर असलेल्या लोकांवर खटले भरले गेले काही खटले चालू असतानाच मेले काहीना शिक्षा झाल्या पण वार्धक्याने त्या शिक्षा भोगायला गेले नाहीत. जपान मध्ये देखिल अशाच प्रकारे युद्ध गुन्हेगारावर खटले भरून शिक्षा झाल्या. बहुसंख्य मात्र अज्ञातवासात जाण्यात पळून जाण्यात यशस्वी झाले . मुख्य मुद्दा असा कि जसे अत्याचार जर्मनांनी आणि अक्ष राष्ट्रांनी केले तसेच दोस्त राष्ट्रांनी आणि सोविएतनी केले होते त्याबद्दल मात्र कोणी हि काहीही केले नाही अगदी नंतर विएतनाम , कोरिया अफगानिस्तान अशा सर्व ठिकाणी अत्याचार झाले पण त्याबाबतीत काही झाले नाही

एस 18/10/2020 - 20:24
इंग्रजांनी भारतात केलेल्या कृष्णकृत्यांचा पाढा दादाभाई नौरोजींनी इंग्लंडात जाऊन वाचला होता. ते भाषण कुठे मिळाले तर आवर्जून वाचा. रच्याकने तुमचे लेख नेहमीच वाचनीय असतात. पुलेशु.

मनो 18/10/2020 - 21:38
इंग्लंडबाबतचा मुद्दा शशी थरूर गेली कित्येक वर्षे मांडत आहेत. त्यांचे ऑक्सफर्ड युनियन येथील भाषण प्रचंड गाजलेले आहे. https://youtu.be/VcWc7WqcS5M त्यांनी नंतर अँन इरा ऑफ डार्कनेस हे पुस्तकही लिहिले आहे.

सर टोबी 18/10/2020 - 21:59
नरसंहारात बळी गेलेल्यांसाठीचे जर्मनीमधील स्मारकाची माहिती वाचली आणि आपल्या देशातील लोकांबद्दल वाटणारा सल थोडा कमी झाला. तेथील काही नव-नाझींकडून त्या स्मारकावर ग्राफिटी करण्याचे प्रकार झाले. काही प्रमाणात त्या स्मारकाबद्दलच्या भावनांना धक्का पोहचेल असे गंभीर वर्तन जर्मन नागरिकांकडून होते. तरुणांकडून स्मारकाचा सेल्फी पॉईंट आणि प्रणयाराधनेचे ठिकाण म्हणून उपयोग होतो असे वाचनात आले. जाता जाता: मिपालादेखील काही वर्षानंतर मोठा ऐतिहासिक ठेवा म्हणून मागणी येऊ शकते. जाज्वल्य धार्मिक आणि राष्ट्रप्रेमाची धग चेतवत ठेवणाऱ्यांनी त्यावेळेसच्या समाजवादी आणि उदारमतवादी लोकांची कशी येथेच्छ नालस्ती केली त्यासाठी काही प्रतिसाद संपादक मंडळाने आत्ताच विशेष स्वरूपात जतन करावे अशी आपली एक सूचना.

In reply to by सर टोबी

सुबोध खरे 19/10/2020 - 12:14
जाज्वल्य धार्मिक आणि राष्ट्रप्रेमाची धग चेतवत ठेवणाऱ्यांनी त्यावेळेसच्या समाजवादी आणि उदारमतवादी लोकांची कशी येथेच्छ नालस्ती केली तुमचं पुरोगामी गळू जिथे तिथे कायम ठसठसत असतं. इतक्या उत्तम धाग्यावर ते आणून विचका केलाच पाहिजे का?

जेवढे दाखवतात किंवा सांगतात तेवढे ज्यू नाझी जर्मनीत मारले गेलेच नाहीत असे मानणारे जर्मन लोकांचे गट आहेत. जर्मनीत असे विचार व्यक्त करणे कायद्याने गुन्हा आहे पण भारतात तसा काही कायदा नाही मराठीत पराग वैद्य म्हणून कोणी आहेत ज्यांनी चांगले ७००-८०० पानांचे पुस्तक लिहिलेले असून त्यात हिटलर भलामण तसेच सगळा दोस्तांचा आणि ज्यूंचा बदनाम करण्याचा बनाव आहे असे प्रतिपादलें आहे. असो...

टवाळ कार्टा 17/10/2020 - 21:57
इथे जायला अजूनही मन तयार नाहीये, मित्रांकडून वर्णने ऐकलीत तीच पुरे वाटतात....त्या छळछावणीत माणसे मारायला "असेंम्बली लाईन" बनवलेली....इथून माणूस आत घालायचा आणि दुसरीकडून जळालेली राख निघणार...अजूनही तिथे माणसांचे केस वगैरे पडलेले दिसतात

मराठी_माणूस 18/10/2020 - 10:39
एक शंका
पण २०१४ साली जर्मनीत त्याच्यावर सरकार तर्फे खटला भरला गेला. ऑश्वित्झ छळ छावणीत झालेल्या ज्यू कत्तलीला सहाय्यभूत झाल्याचा ठपका त्याच्यावर ठेवला गेला
असे तर असंख्य लोक होते त्या सगळ्यावर असे खटले भरले होते ?

In reply to by मराठी_माणूस

हो अनेक जणांवर नंतर आणि ऑस्करच्या आधीही खटले भरले गेले आणि शिक्षा झाल्या. अर्थात जस जसा काल गेला तस तसे लोक मरूनच गेल्यामुळे हे प्रमाण कमी आहे २०१४ नंतर म्हणजे ७० वर्षानंतर साधारण ५० माजी नाझी सदस्यांवर खटले चालू होते किंवा ट्रायल सुरु होत्या . ऑस्करच्या बाबतीत विशेष असे कि तो अगदी साधारण शिपाई गाडी होता आधी मोठ्या उच्च पदस्थ नाझी अधिकार्यांना शोधून त्यांच्या वर खटले भरले जात हे मोठे अधिकारी असल्याने अर्थात पळून गेले असत त्यामुळे ते अवघड होई. हल्ली हल्ली साधे शिपाई सुद्धा पकडून त्यांच्यावर खटले भरले जातात. जोन दिमान्युक ह्या सोबिबोर इथल्या अशाच शिपायावर देखिल खटला भरून त्याला शिक्षा केली गेली. आतापर्यंत किमान २०० अशा कमी महत्वाच्या पदावर असलेल्या लोकांवर खटले भरले गेले काही खटले चालू असतानाच मेले काहीना शिक्षा झाल्या पण वार्धक्याने त्या शिक्षा भोगायला गेले नाहीत. जपान मध्ये देखिल अशाच प्रकारे युद्ध गुन्हेगारावर खटले भरून शिक्षा झाल्या. बहुसंख्य मात्र अज्ञातवासात जाण्यात पळून जाण्यात यशस्वी झाले . मुख्य मुद्दा असा कि जसे अत्याचार जर्मनांनी आणि अक्ष राष्ट्रांनी केले तसेच दोस्त राष्ट्रांनी आणि सोविएतनी केले होते त्याबद्दल मात्र कोणी हि काहीही केले नाही अगदी नंतर विएतनाम , कोरिया अफगानिस्तान अशा सर्व ठिकाणी अत्याचार झाले पण त्याबाबतीत काही झाले नाही

एस 18/10/2020 - 20:24
इंग्रजांनी भारतात केलेल्या कृष्णकृत्यांचा पाढा दादाभाई नौरोजींनी इंग्लंडात जाऊन वाचला होता. ते भाषण कुठे मिळाले तर आवर्जून वाचा. रच्याकने तुमचे लेख नेहमीच वाचनीय असतात. पुलेशु.

मनो 18/10/2020 - 21:38
इंग्लंडबाबतचा मुद्दा शशी थरूर गेली कित्येक वर्षे मांडत आहेत. त्यांचे ऑक्सफर्ड युनियन येथील भाषण प्रचंड गाजलेले आहे. https://youtu.be/VcWc7WqcS5M त्यांनी नंतर अँन इरा ऑफ डार्कनेस हे पुस्तकही लिहिले आहे.

सर टोबी 18/10/2020 - 21:59
नरसंहारात बळी गेलेल्यांसाठीचे जर्मनीमधील स्मारकाची माहिती वाचली आणि आपल्या देशातील लोकांबद्दल वाटणारा सल थोडा कमी झाला. तेथील काही नव-नाझींकडून त्या स्मारकावर ग्राफिटी करण्याचे प्रकार झाले. काही प्रमाणात त्या स्मारकाबद्दलच्या भावनांना धक्का पोहचेल असे गंभीर वर्तन जर्मन नागरिकांकडून होते. तरुणांकडून स्मारकाचा सेल्फी पॉईंट आणि प्रणयाराधनेचे ठिकाण म्हणून उपयोग होतो असे वाचनात आले. जाता जाता: मिपालादेखील काही वर्षानंतर मोठा ऐतिहासिक ठेवा म्हणून मागणी येऊ शकते. जाज्वल्य धार्मिक आणि राष्ट्रप्रेमाची धग चेतवत ठेवणाऱ्यांनी त्यावेळेसच्या समाजवादी आणि उदारमतवादी लोकांची कशी येथेच्छ नालस्ती केली त्यासाठी काही प्रतिसाद संपादक मंडळाने आत्ताच विशेष स्वरूपात जतन करावे अशी आपली एक सूचना.

In reply to by सर टोबी

सुबोध खरे 19/10/2020 - 12:14
जाज्वल्य धार्मिक आणि राष्ट्रप्रेमाची धग चेतवत ठेवणाऱ्यांनी त्यावेळेसच्या समाजवादी आणि उदारमतवादी लोकांची कशी येथेच्छ नालस्ती केली तुमचं पुरोगामी गळू जिथे तिथे कायम ठसठसत असतं. इतक्या उत्तम धाग्यावर ते आणून विचका केलाच पाहिजे का?

जेवढे दाखवतात किंवा सांगतात तेवढे ज्यू नाझी जर्मनीत मारले गेलेच नाहीत असे मानणारे जर्मन लोकांचे गट आहेत. जर्मनीत असे विचार व्यक्त करणे कायद्याने गुन्हा आहे पण भारतात तसा काही कायदा नाही मराठीत पराग वैद्य म्हणून कोणी आहेत ज्यांनी चांगले ७००-८०० पानांचे पुस्तक लिहिलेले असून त्यात हिटलर भलामण तसेच सगळा दोस्तांचा आणि ज्यूंचा बदनाम करण्याचा बनाव आहे असे प्रतिपादलें आहे. असो...
ऑस्कर ग्रोएनिन्ग-ऑश्वित्झ छळ छावणीचा अकाउंटंट(लेखनिक) Simple, Free Image and File Hosting at MediaFire नुकतीच नेटफ्लिक्स वर The Accountant Of Auschwitz ऑश्वित्झ छळ छावणीचा अकाउंटंट(लेखनिक)हि डॉक्यूफिल्म पहिली. ज्यांना दुसऱ्या महायुद्धाबद्दल थोडेफार तरी माहिती असते त्यांना ऑश्वित्झ छळ छावणीबद्दल वेगळे सांगायची गरज नसते पण ज्यांना काहीच कल्पना नाही त्यांच्या करता म्हनुन थोडक्यात सांगायचे तर दुसऱ्

राजयोग - २३ (अंतिम भाग)

रातराणी ·

प्रचेतस 08/08/2020 - 12:34
क्या बात है... शेवट अतिशय उचित. अनुवाद अत्यंत ओघवता. खूप छान झाली ही मालिका. आतापर्यंत रविंद्रनाथांचे साहित्य काहीच वाचले नव्हते. आता मात्र वाचायलाच हवे.

एस 11/08/2020 - 16:20
अनुवाद केलाय असे कुठेही जाणवत नाहीये, की त्रिपुरा आणि बंगालसारख्या अमराठी प्रदेशात घडणारी कथा आहे असेही वाटत नाहीये, यातच तुमच्या लेखणीची ताकद दिसून येते. लिहीत रहा. काहीही झाले तरी लिहिणे थांबवू नका. अनुवादही आणि स्वतंत्र लेखनही करत रहा. ठाकुरांची शैली काहीशी आपल्या गोनिदांसारखी. आजच्या व्यावहारिक युगात त्यातला भावविव्हलता, सैलसर नातेजिव्हाळी, सोशिक इदं न मम भाव, निसर्गाशी सात्मता हे सगळं उमजणं आणि पचनी पडणं अवघड आहे. पण हे सगळं जाणून घ्यायचं तर आपणही आपला 'मी'पणा थोडा बाजूला ठेवून मग ते वाचावं लागतं, तेव्हा कुठे थोडंथोडं मनाला हे लिखाण भावू लागतं. उपसंहारही वाचला. तितकाच आवडला. पुनरेकवार, लिहीत रहा.

प्रचेतस 08/08/2020 - 12:34
क्या बात है... शेवट अतिशय उचित. अनुवाद अत्यंत ओघवता. खूप छान झाली ही मालिका. आतापर्यंत रविंद्रनाथांचे साहित्य काहीच वाचले नव्हते. आता मात्र वाचायलाच हवे.

एस 11/08/2020 - 16:20
अनुवाद केलाय असे कुठेही जाणवत नाहीये, की त्रिपुरा आणि बंगालसारख्या अमराठी प्रदेशात घडणारी कथा आहे असेही वाटत नाहीये, यातच तुमच्या लेखणीची ताकद दिसून येते. लिहीत रहा. काहीही झाले तरी लिहिणे थांबवू नका. अनुवादही आणि स्वतंत्र लेखनही करत रहा. ठाकुरांची शैली काहीशी आपल्या गोनिदांसारखी. आजच्या व्यावहारिक युगात त्यातला भावविव्हलता, सैलसर नातेजिव्हाळी, सोशिक इदं न मम भाव, निसर्गाशी सात्मता हे सगळं उमजणं आणि पचनी पडणं अवघड आहे. पण हे सगळं जाणून घ्यायचं तर आपणही आपला 'मी'पणा थोडा बाजूला ठेवून मग ते वाचावं लागतं, तेव्हा कुठे थोडंथोडं मनाला हे लिखाण भावू लागतं. उपसंहारही वाचला. तितकाच आवडला. पुनरेकवार, लिहीत रहा.
राजयोग - २२ *** इकडे शाहशुजाला त्याचा भाऊ औरंगजेबाच्या सैन्याने सळो की पळो केले होते. इलाहाबादजवळ रणभूमीवर शेवटी त्याचा पराजय झाला. या पराभवाने अपमानित, भयभीत झालेल्या शुजाला आपले कोण आणि परके कोण यातला फरक कळेनासा झाला. वेषांतर करून तोही सर्वसामान्य लोकांप्रमाणे लपतछपत पळू लागला. जिकडे जाईल तिकडे त्याला शत्रूच्या घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येऊ लागला. शेवटी पटन्याला पोचल्यावर त्याने नवाबाचा वेष परिधान करून प्रजा आणि आपल्या परिवारासमोर येण्याची घोषणा केली.