तो आणि ती.... राधा! (भाग 4)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
11 Jul 2018 - 8:17 pm

तो आणि ती..... प्रस्तावना: https://www.misalpav.com/node/42956
तो आणि ती.... देवकी!: https://www.misalpav.com/node/42957
तो आणि ती.... यशोदा!: https://www.misalpav.com/node/42969

तो आणि ती................ राधा

"राधे...... तू आणि इथे द्वारकेत?"

प्रकटन

तो आणि ती.... यशोदा! (भाग 3)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
9 Jul 2018 - 5:24 pm

(खूप प्रयत्न करूनही पहिल्या दोन भागांचे दुवे जोडणे जमले नाही. क्षमस्व! दुवे कसे जोडता येतील यासाठी व्य. नि. कोणी केला तर खूप मदत होईल. धन्यवाद!)

तो आणि ती............ यशोदा!

प्रकटन

एक उनाड संध्याकाळ

सचिन काळे's picture
सचिन काळे in जनातलं, मनातलं
11 Jun 2018 - 3:53 pm

एके दिवशी मला 'एक उनाड संध्याकाळ' कशी व्यतीत करावी लागली, त्याचा एक किस्सा मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्याचे असे झाले, मी कामावरून रोज संध्याकाळी बरोबर पाचच्या दरम्यान ऑफिसमधून घरी येतो. दुपारी १२ च्या दरम्यान आमच्या सौं.नी मला ऑफिसमध्ये फोन केला. "अहो! आज संध्याकाळी चार वाजता माझ्या आठ दहा मैत्रिणी पार्टीकरीता आपल्या घरी येणार आहेत. आमचं सर्व आटपायला निदान सहा तरी वाजतील. तर आज तुम्ही घरी जरा उशीरा याल का? आणि हो! बिल्डींगजवळ आलात की मला फोन करा. मैत्रिणी गेल्या असतील तर मी तसं तुम्हाला सांगते. मग तुम्ही वर या"

लेख

माझं लिहणं (कथा/कविता/ललित) कसं सुरू झालं.

सचिन काळे's picture
सचिन काळे in जनातलं, मनातलं
12 May 2018 - 3:16 pm

मायबोली संकेतस्थळावर आमचा एक गप्पांचा कट्टा आहे. तिथे एकदा सहज गप्पा मारता मारता तेथील अक्षय नावाच्या एका मित्राने सगळ्यांना 'माझं लिहणं (कथा/कविता/ललित) कसं सुरू झालं?' ह्या विषयावर एक निबंध लिहिण्याची विनंती केली होती. त्याला अनुसरून मी तेथे खालील निबंध लिहिला. आपल्या सर्वांच्या वाचनाकरिता तोच निबंध मी खाली देत आहे.

विषय :- माझं लिहणं (कथा/कविता/ललित) कसं सुरू झालं.

प्रकटन

सोबत आणि सोबतीचे परिणाम 

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
20 Mar 2018 - 12:42 am

अनादी काळापासून मनुष्य प्राणी हा कायम समुहात राहातो. एकटेपणा त्याला आवडत नाही; हे त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणूनच कदाचित् आपण नाती निर्माण केली. सर्वात अगोदर मैत्रीच नातं निर्माण झाल असावं अस मला वाटत. मग हळूहळू पती-पत्नी आणि मग या नात्याच्या अनुषंगाने येणारी इतर नाती निर्माण झाली असावीत. कालांतराने एकटेपणा आवडत नसल्याने आपण ही नाती निर्माण केली आहेत हे मनुष्यप्राणी विसरला. त्यामुळे ही नाती म्हणजेच आयुष्य झालं आपलं. त्यामुळे आयुष्य जगण्याला एक वेगळाच अर्थ आला. एका अर्थी नाती जपण आणि या नात्यांमधला ओलावा वृद्धिंगत कारण हा आपल्या आयुष्याचा स्थायीभाव झाला. 

विचार

सर्वसामान्य आणि राजकारणी!

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
9 Feb 2018 - 9:31 am

सर्वसामान्य जनता भावूक असते
राजकारण्यांना ती मुभा नसते..

समोर होणारा अपघात बघूनही
चाकरमानी पळतात..
लेटमार्कच्या भिती पुढे हृदय गहाण ठेवतात!
त्यांच्या असहाय्यतेचे कौतुक होते...
राजकारण्यांच्या उशीराचे वाभाडे निघते...

हृदयशून्य... भावनाहीन...
राजकारणी असतात...
जणूकाही त्यांच्याकडे मनं नसतात!

निवडून दिलंय तुम्हाला...
तुमच्या प्रत्येक क्षणावर हक्क...
कराच तुम्ही चूक...
अपमानाचा चाबूक तुमच्यावर!

माझी कविता

लिव इन आणि समाजाची मानसिकता 

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
12 Jan 2018 - 11:37 pm

"अग ते माझ्या शेजारच्या flatमध्ये राहायला आलेलं जोडपं आहे ना त्याचं लग्न नाही झालेलं."

"काय सांगतेस काय? तुला बऱ्या असल्या बातम्या मिळतात."

"अग, काल मी घरी येत असताना ती भेटली जिन्यात. तर विचारल तुझा नवरा काय करतो? म्हणाली तो माझा नवरा नाही काही. आम्ही अजून लग्न नाही केलेलं असंच राहातो. कमाल आहे न? काय बोलणार यावर? मी आपली गपचूप घरात शिरले माझ्या."

'काय सांगतेस? स्पष्ट सांगितलं तिने?"

विचार