मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वडील

गुरू आतला

रोहन जगताप ·

In reply to by मुक्त विहारि

रोहन जगताप 14/12/2024 - 16:02
अगदी बरोबर आहे. बाकी प्रत्येक माणसाच्या आत एक गुरू असतो. वरील कविता ही त्या गुरूला वाहिलेली आहे. ‘कळते पण वळत नाही’ असे आपण म्हणतो. त्यातले जे कळतेपण आहे, तोच आपल्यातील गुरू आहे. पण त्याकडे लक्ष न दिल्याने कळूनही वळत नाही.

In reply to by रोहन जगताप

माझे एक मार्गदर्शक होते.. त्यांनी एक गोष्ट सांगितली आणि आज देखील ती गोष्ट मी पाळतो. रात्री झोपण्यापूर्वी , स्वतः साठी १० मिनिटे काढायची आणि त्या १० मिनिटांत, आज दिवसभरात केलेल्या सर्व गोष्टी आठवायच्या. झोपेतील, अर्धजागृत अवस्थेत, मेंदु कुठल्या गोष्टी चुकीच्या केल्या आणि त्यावरची उपाय योजना शोधून काढतो आणि ही निरंतर चाललेली साधना आहे. काही उपाय लगेच मिळतात तर काहींना प्रत्यक्षांत यायला , बेंझीन काळ लागतो. (Benzene Time, हा माझ्या मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंचा आवडता शब्द.) Benzene Time बद्दल माहिती हवी असेल तर, खालील लिंक बघा.. https://www.acs.org/molecule-of-the-week/archive/b/benzene.html#:~:text=In%201865%2C%20German%20chemist%20Friedrich,to%20conceive%20of%20the%20structure.

In reply to by रामचंद्र

रोहन जगताप 14/12/2024 - 16:12
मानवी आयुष्यात केवळ वडीलांचीच असे नव्हे, पण वडीलकीची अशी एक पोकळी असते. कोणीतरी आपल्याला सांभाळून घ्यावे, मार्गदर्शन करावे, दिशा दाखवावी अशी प्रत्येकाची कळत-नकळत इच्छा असते. परंतु अनेकदा ही पोकळी भरून येत नाही. अशावेळी माणसाच्या आतील गुरूच ही पोकळी भरून काढण्यास सक्षम असतो अशा अर्थाने वरील कविता लिहिलेली आहे. तरी कवितेच्या पहिल्या कडव्यात पुढील प्रमाणे बदल केल्यास कदाचित कविता आपल्याला परिपूर्ण वाटेल अशी आशा आहे.
नसे भोवती छत्रछाया वडील गुरू आतला सावली ती वसे नसे सोबती पितृमाया वडील गुरू लाभला माय पाठी तसे

चौथा कोनाडा 24/12/2024 - 22:25
सुंदर रचना ! गुरुचे महत्व कालातीत आहे ! म्हणुनच म्हटले आहे : गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा:, गुरु साक्षात परम ब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नम:। गुरू म्हणजे परम !

In reply to by मुक्त विहारि

रोहन जगताप 14/12/2024 - 16:02
अगदी बरोबर आहे. बाकी प्रत्येक माणसाच्या आत एक गुरू असतो. वरील कविता ही त्या गुरूला वाहिलेली आहे. ‘कळते पण वळत नाही’ असे आपण म्हणतो. त्यातले जे कळतेपण आहे, तोच आपल्यातील गुरू आहे. पण त्याकडे लक्ष न दिल्याने कळूनही वळत नाही.

In reply to by रोहन जगताप

माझे एक मार्गदर्शक होते.. त्यांनी एक गोष्ट सांगितली आणि आज देखील ती गोष्ट मी पाळतो. रात्री झोपण्यापूर्वी , स्वतः साठी १० मिनिटे काढायची आणि त्या १० मिनिटांत, आज दिवसभरात केलेल्या सर्व गोष्टी आठवायच्या. झोपेतील, अर्धजागृत अवस्थेत, मेंदु कुठल्या गोष्टी चुकीच्या केल्या आणि त्यावरची उपाय योजना शोधून काढतो आणि ही निरंतर चाललेली साधना आहे. काही उपाय लगेच मिळतात तर काहींना प्रत्यक्षांत यायला , बेंझीन काळ लागतो. (Benzene Time, हा माझ्या मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंचा आवडता शब्द.) Benzene Time बद्दल माहिती हवी असेल तर, खालील लिंक बघा.. https://www.acs.org/molecule-of-the-week/archive/b/benzene.html#:~:text=In%201865%2C%20German%20chemist%20Friedrich,to%20conceive%20of%20the%20structure.

In reply to by रामचंद्र

रोहन जगताप 14/12/2024 - 16:12
मानवी आयुष्यात केवळ वडीलांचीच असे नव्हे, पण वडीलकीची अशी एक पोकळी असते. कोणीतरी आपल्याला सांभाळून घ्यावे, मार्गदर्शन करावे, दिशा दाखवावी अशी प्रत्येकाची कळत-नकळत इच्छा असते. परंतु अनेकदा ही पोकळी भरून येत नाही. अशावेळी माणसाच्या आतील गुरूच ही पोकळी भरून काढण्यास सक्षम असतो अशा अर्थाने वरील कविता लिहिलेली आहे. तरी कवितेच्या पहिल्या कडव्यात पुढील प्रमाणे बदल केल्यास कदाचित कविता आपल्याला परिपूर्ण वाटेल अशी आशा आहे.
नसे भोवती छत्रछाया वडील गुरू आतला सावली ती वसे नसे सोबती पितृमाया वडील गुरू लाभला माय पाठी तसे

चौथा कोनाडा 24/12/2024 - 22:25
सुंदर रचना ! गुरुचे महत्व कालातीत आहे ! म्हणुनच म्हटले आहे : गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा:, गुरु साक्षात परम ब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नम:। गुरू म्हणजे परम !
नसे भोवती छत्रछाया वडील गुरू आतला सावली ती वसे नसे सोबती पितृमाया वडील गुरू लाभला प्रेम पाठी तसे
उरी पोकळी पोरकी राहिलेली भरूनी जिवाला मनी पाविले नदी कोरडी आटली वाहिलेली भिजूनी किनारा तृषा भागिले
नसे पाहिले धैर्यशाली वडील गुरू राखला हात माथी असे नसे जाहले आप्तवाली वडील गुरू जागला साथ जन्मा जसे
मने कोवळी कोंडली घुस्मटून करी मोकळा बंध जे राहिले फुले पाकळी सांडली कुस्करून सुवासास वेचू गुरू वाहिले

मायेचे वस्त्र जिर्ण झाले विरले फाटले

पाषाणभेद ·

वो था तो कोई गम न था। नही है तो आँखे नम होती है। उसकी यादोमे अक्सर राते गमगीन होती है। नसीहत जो कभी मुसीबत लगती थी। आज वही मुसीबत मे राहत लगती है। रोकता था टोकता था। अक्सर मन सोचता था ये ऐसा क्युं है। आज नही है तो दिल उसीको खोजता क्युं है। बरगद का साया था। हर राझ सिखाया था। परवरीश मे जिसने अपना तन मन धन गवांया था। था वो तो हर मुकाम मुक्कमल हुआ। जिंदगी के हर पादान पर पहाड सा खडा हुआ। बाप बनके देखो बाप क्या चिज होती है। उसकी यादोमे आज भी आँखे नम होती है। मै भी एक बाप हूँ। आज भी कमी महसुस होती है। कभी अकेला होता हूँ तो अटलजी की कवीता याद आती है। " उठो द्रोपदी वस्त्र संम्भालो अब गोबिन्द न आयेंगे।"

कविता चांगली आहे असं आत्ता म्हणण्याचे मन होत नाही . या दुःखातून मी गेलेलो असल्याने त्याची कल्पना मला आहे . आपल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत . श्रद्धांजली !

पाषाणभेद 11/01/2022 - 00:39
माफ करा. माझे वडील गेल्या मे महिन्यातच गेले आहेत, पण दु:खाचे कढ संपत नाहीत अन मग शब्दांचे रूप घेवून ते येतात. आपल्या आपूलकी बद्दल आभार.

वो था तो कोई गम न था। नही है तो आँखे नम होती है। उसकी यादोमे अक्सर राते गमगीन होती है। नसीहत जो कभी मुसीबत लगती थी। आज वही मुसीबत मे राहत लगती है। रोकता था टोकता था। अक्सर मन सोचता था ये ऐसा क्युं है। आज नही है तो दिल उसीको खोजता क्युं है। बरगद का साया था। हर राझ सिखाया था। परवरीश मे जिसने अपना तन मन धन गवांया था। था वो तो हर मुकाम मुक्कमल हुआ। जिंदगी के हर पादान पर पहाड सा खडा हुआ। बाप बनके देखो बाप क्या चिज होती है। उसकी यादोमे आज भी आँखे नम होती है। मै भी एक बाप हूँ। आज भी कमी महसुस होती है। कभी अकेला होता हूँ तो अटलजी की कवीता याद आती है। " उठो द्रोपदी वस्त्र संम्भालो अब गोबिन्द न आयेंगे।"

कविता चांगली आहे असं आत्ता म्हणण्याचे मन होत नाही . या दुःखातून मी गेलेलो असल्याने त्याची कल्पना मला आहे . आपल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत . श्रद्धांजली !

पाषाणभेद 11/01/2022 - 00:39
माफ करा. माझे वडील गेल्या मे महिन्यातच गेले आहेत, पण दु:खाचे कढ संपत नाहीत अन मग शब्दांचे रूप घेवून ते येतात. आपल्या आपूलकी बद्दल आभार.
मायेचे वस्त्र जिर्ण झाले विरले फाटले अजूनी होते हवे ते परी न आता उरले उबदार किती ते वाटे गारठ्यामधे लेवून अंगी जणू चिलखत ते भासे कितीही संकटे आली जरी घाव वर्मी ते सोसतसे किती निगूतीने वस्त्र निर्माण केले उभे आडवे धागे प्रेमादराने गुंफले शिलाई नाजूक टाके अचूक रंग तयाचे भरदार असले या वस्त्राची मजबूत न तुटणारी विण कुणी न विणकर आता न विणणार भक्कम हाती नक्षीचा ठसा कोरला पुन्हा कधी न उमटे आधार होता किती नाही म्हटले तरी आठव तयाची राहील कायमची उरी न मिळणार कधी मायेचे पांघरूण ते कठोर काळाने हिरावले माझे बाबा देवाघरी गेले - पाषाणभेद ०९/०१/२०२२

वडीलांना काव्यसुमनांजली

पाषाणभेद ·

खिलजि 23/06/2021 - 12:26
आपल्या दुःखात मी सहभागी आहे . फार वाईट वाटलं , आणि तुमचं दुःख या रचनेत पूर्णतः उतरलंय असं वाटलं . महादेव त्यांच्या आत्म्यास सद्गती देओ. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय

सौन्दर्य 23/06/2021 - 23:27
मोजक्या शब्दात व्यक्तिचित्र चांगले मांडलेत. तुमच्या दुःखाला उतारा मिळावा म्हणून देवाकडे प्रार्थना करीन. माझ्या वडिलांचा आम्हाला लहानपणापासून कधीच आधार असा झाला नाही तरी देखील माझ्या वयाच्या ३०व्या वर्षी ते गेले आणि माझे बालपण संपले असे मला जाणवले. जोपर्यंत आपल्या डोक्यावर कोणीतरी असते तो पर्यंत आपण लहानच असतो पण ते छत्र हरपले की आपण लहान राहात नाही.

चौथा कोनाडा 24/06/2021 - 13:26
हृदयस्पर्शी रचना. आम्हा भावंडांचे वडील माझ्या वयाच्या ७ व्या वर्षी गेले. वडिलांचे छत्र नसणे म्हणजे काय हे पुरेपुर अनुभवले. पण त्यांच्याच आशिर्वादाने सर्व काही सुरळीत झाले आणि आयुष्यात स्थिरस्थावर झालो. पुसटसे आठवत असलेले वडिल नेहमी सोबत असतात ही जाणीव जीवनातली दु:खं पेलण्यास बळ देते. पाभे, तुमचे वडिल देखील तुमच्या सोबत सतत असतील हे नक्की !

खिलजि 23/06/2021 - 12:26
आपल्या दुःखात मी सहभागी आहे . फार वाईट वाटलं , आणि तुमचं दुःख या रचनेत पूर्णतः उतरलंय असं वाटलं . महादेव त्यांच्या आत्म्यास सद्गती देओ. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय

सौन्दर्य 23/06/2021 - 23:27
मोजक्या शब्दात व्यक्तिचित्र चांगले मांडलेत. तुमच्या दुःखाला उतारा मिळावा म्हणून देवाकडे प्रार्थना करीन. माझ्या वडिलांचा आम्हाला लहानपणापासून कधीच आधार असा झाला नाही तरी देखील माझ्या वयाच्या ३०व्या वर्षी ते गेले आणि माझे बालपण संपले असे मला जाणवले. जोपर्यंत आपल्या डोक्यावर कोणीतरी असते तो पर्यंत आपण लहानच असतो पण ते छत्र हरपले की आपण लहान राहात नाही.

चौथा कोनाडा 24/06/2021 - 13:26
हृदयस्पर्शी रचना. आम्हा भावंडांचे वडील माझ्या वयाच्या ७ व्या वर्षी गेले. वडिलांचे छत्र नसणे म्हणजे काय हे पुरेपुर अनुभवले. पण त्यांच्याच आशिर्वादाने सर्व काही सुरळीत झाले आणि आयुष्यात स्थिरस्थावर झालो. पुसटसे आठवत असलेले वडिल नेहमी सोबत असतात ही जाणीव जीवनातली दु:खं पेलण्यास बळ देते. पाभे, तुमचे वडिल देखील तुमच्या सोबत सतत असतील हे नक्की !
तुमच्या जाण्याने जग सुने झाले सुख सारे असूनही भासे काहीतरी उणे || किती आठव काढावी किती स्मृती जपावी त्या आठवांनी डोळा पाणी आले तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||१|| रिक्त झाली तुमची नेहमीची जागा तुम्ही दिसणार तेथे आम्हा असे आशा असे कसे मधूनच जग सोडूनिया गेले? तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||२|| कार्ये केली अनेक; ओंजळ भरून दिले दान दया केली दीनांवर; सदा काळजी काळीज भरून रिक्त राहीले स्वतः केले दुसर्‍यांचे भले तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||३|| आयुष्यातले दु:ख कधी जाणवू दिले नाही शरीराच्या कष्टाने डोळा पाणी आणले नाही काळाने तुम्हाला असे अकाली का नेले? तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||४|| (मा