दु:ख अवघा धृवतारा मागते

काव्यरस
मागचा सारा चुकारा मागते दु: ख अवघा धृवतारा मागते थेंबही नाही उभ्या रानात अन जिंदगानी शेतसारा मागते केवढे जहरुन हे गेले शहर वीषही आता उतारा मागते वेदना ओथंबुनी येतात अन सूख मोराचा पिसारा मागते जो कधी उधळून ती जाते स्वत: प्रीत तो सारा पसारा मागते डॉ. सुनील अहिरराव

कळले नाही

काव्यरस
कळले नाही कोठे चाललो मी.. तुझ्याच दारी जणु भुललो मी.. प्रेमात तुझ्या जरी पडलो परि.. अंतरी तुझ्या पार हरलो मी.. संपले दुवे सारे संपली आशा.. आभाळी कोठे धुंद विरलो मी.. आकांक्षा सार्या गेल्या उडूनी माझ्या.. स्वप्नात फक्त आता उरलो मी.. होतीस तेंव्हा तूच मनाची आस.. अजूनी का तुझ्यात अडलो मी?...

चांदण्याला चांदणे समजू नये

काव्यरस
एकमेकांना उणे समजू नये (नी स्वतःला शाहणे समजू नये) चांदणे परसामधे पडते म्हणुन आपली तारांगणे समजू नये माणसेही राहती रानीवनी नेहमी बुजगावणे समजू नये हे असे परक्यापरी येऊ नये नी स्वत: ला पाहुणे समजू नये ही कशाची भूल या रातीवरी चांदण्याला चांदणे समजू नये पाहते ती नेहमी माझ्याकडे पण असे की, पाहणे समजू नये डॉ. सुनील अहिरराव

कोणते माझे वतन होते

काव्यरस
रोज थोडे उत्खनन होते ऱोज नात्याचे पतन होते आळ हा गंभीरही नाही पण चरित्राचे हनन होते दोष वणव्याला कसा द्यावा जर इथे गाफील वन होते कोणत्या दुनियेत मी आलो कोणते माझे वतन होते कोठल्या मातीतुनी येते जिंदगी कोठे दफन होते डॉ.सुनील अहिरराव

खट्याळ रसातली आध्यात्मिक गझल

लेखनविषय:
खट्याळ रसातली आध्यात्मिक गझल

हसण्यात जन्म घ्यावा उरकून माणसाने
प्रज्ञा, कला, प्रितीवर भाळून माणसाने

दोन्ही मुठी रिकाम्या घेऊन जन्म-मृत्यू
तृप्तीसवे करावा हनिमून माणसाने

क्रोधिष्ट भावनाला देऊन सोडचिठ्ठी
शांतीसही बघावे बिलगून माणसाने

माया, तृषा, मनीषा नेईल आडमार्गा
लागू नयेच नादी उमजून माणसाने

करपाश घट्ट द्याया अथवा विलीन व्हाया
सुमतीस वश करावे रिझवून माणसाने

रति, काम, मोह, मत्सर वरचढ-अभय न व्हावे

एक उर्दू गझल - जो ठिकाना हैं हमारा

लेखनविषय:
काव्यरस
जो ठिकाना हैं हमारा हम वही जा रहेंगे मिटटी से आये हैं मिटटी से जा मिलेंगे ये हवा जो चली हैं इसके संग संग बहेंगे कभी फूलों को चूमेंगे कभी धुल से खेलेंगे न काफ़िलों से दोस्ती न मंज़िलों से यारी कहीं भी रुकेंगे, किधरको भी चलेंगे बेकार न जायेगा रोना यहाँ हमारा एक आंसूं में से कल हज़ार फुल खिलेंगे होशवालों को मुबारक बाग़े होश की सैर हम दश्ते जुनूं में अपने यार से मिलेंगे (कुणी अनुवाद केला तर उत्तम)

सावल्यांची सरमिसळ होते ..

काव्यरस
एक ना कारण सबळ होते पण तुझे जाणे अटळ होते हे कसे नाते दुराव्याचे जे कधीकाळी जवळ होते कोणता येथे ऋतू आहे देहभर ही पानगळ होते चेततो वणवा फुलापासुन नी झुळुकही वावटळ होते रोषणाई केवढी आहे सावल्यांची सरमिसळ होते डॉ. सुनील अहिरराव

जसजसे जगणे सुखासिन होत आहे..

लेखनविषय:
काव्यरस
जसजसे जगणे सुखासिन होत आहे दु:ख अधिकाधीक नमकिन होत आहे सोसले मी जे,मला ना खंत त्याची पण पहा दुनिया उदासिन होत आहे केवढी शहरात आता शिस्त आहे बोलणे अपराध संगिन होत आहे घेतला आश्रय जिथे कोठे मिळाला देवही आता पराधिन होत आहे तू किती सांभाळ आता तावदाने ते पहा वादळ दिशाहिन होत आहे पांढरे काळे प्रतीदिन होत आहे अन तुझे भवितव्य रंगिन होत आहे डॉ.सुनील अहिरराव

मी सुखाची भेट घेणे टाळतो ..

लेखनविषय:
काव्यरस
वेळ दु:खाला दिलेली पाळतो मी सुखाची भेट घेणे टाळतो फारसे घडले नसावे कालही मी उगाचच रात सारी चाळतो ही फुलांची वाट आहे पण इथे ऱोज एखादातरी ठेचाळतो कोणते असते हवेमध्ये जहर रंग प्रेमाचा कसा डागाळतो केवढी जडशीळ दुनिया वाटते देव जाणे कोण ही सांभाळतो चालला असता तुझा साधेपणा मी कुठे रंगारुपावर भाळतो डॉ. सुनील अहिरराव
Subscribe to gajhal