संस्कार, धर्म, श्रद्धा वगैरे वगैरे वगैरे ....

टीप : लेखात आलेले विचार अथवा असंबद्ध विधाने ही केवळ वैयक्तीक माझ्या वैचारीक कल्लोळामधुन आली आहेत, त्याचा कुणी सर्वसंमत अर्थ काढुन कॄपया गैरसमज करुन घेऊ नये. तसेच लेखातला बराच भाग हा विस्कळीत वाटण्याची शक्यता आहे, पण ते मनातले विचार आहे तसे उतरवले असल्याने त्याला पर्याय नाही

"तुम्ही ना भौ पक्के स्युडो सेक्युलर लोकं, आपला धर्म, संस्कॄती आणि देव मानणार नाहीच पण त्यावर टिका करायची म्हणलं ना की सर्वात पुढे" - इति : एक आंतरजालीय मित्र
"अरे ३ महिन्यातुन आज घरी आला आहेस, सकाळी १५-२० मिनीटे काढुन जर घरातल्या देवाची पुजा वगैरे केली तर काय तुला पाप लागणार आहे का ? " इति : आई
"चल आज रात्री तुला विठ्ठलाचे पायाचे दर्शन घेऊन आणतो २० मिनीटात, तसाही तु दिवसात रांगेतुन जाणार नाहीसच"- इति : गावाकडचा देवभोळा मित्र
"समोर दिसणार्‍या आणि जाणवणार्‍या अशाच गोष्टींवर विश्वास ठेवणे हे भुमिका फारच टोकाची आहे, नव्हे मुर्खपणा आहे. देवाचे अस्तित्व ह्यापलिकडे आहे" - इति : बाबा
" पुण्यात आलाच अहेस तर माह्या समाधानासाठी माझ्याबरोबर दगडुशेठला जाऊन येऊयात, तुझी व्ह्युव्ह्स आपण नंतर सविस्तरपणे बोलु" - पुण्यातले मित्र
"पुढच्या वेळी सुट्टी काढताना १ दिवस जास्त काढ, तु आणि हा शिर्डीला जाऊन या. सारखं टाळाटाळ करणे बरोबर नाही" - इति : काकु/काका
" आज तुझा वाढदिवस आहे ना, मग सकाळी देवळात गेला होतास का ? ते नसेल जमले अजिबात" - इति : असेच कुणीतरी
" भोसडीच्या विकेंडला रुमवर सकाळी सकाळी टीव्हीवर गाणी बघत बस पण देवळात नको येऊस " - इति : असाच एक कोणीतरी अजुन एक मित्र.
" तुमची कशावर अंधपणे श्रद्धा नाही हीच तुमची अंधश्रद्धा आहे" - इति : अजुन एक आंतरजालीय मित्र

??
????
म्हणजे काय ?

म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे ह्या सर्वांना ?
मी काय ठार नास्तिक आहे ? ह्या विश्वातल्या सुप्रिम पॉवर वर माझा विश्वास नाहीये ? का मी चक्क ढोंगी आहे असे त्यांचे मत आहे ? किंवा मी हे न करुन माझ्या शिकलेल्या शहाणपणाचे कौतुक करुन घेतो असे तर त्यांचे मत नाही ?

तसे लहानपण अतिशय देवभोळ्या, देवाचे अधिष्ठान असलेल्या व कर्मकांडाधिष्ठित समाज असलेल्या एका छोट्याश्या गावात गेले. कुटुंब आणि शेजारपाजारचे ही म्हणाल तर पक्के धार्मिक पण देवदेव आणि कर्मकांडाचा अतिरेक नसलेले, पण कसल्याश्या पुराण रिती आणि रुढींच्या कल्पना मनात घेऊन सर्वच गोष्टी अगदी मनोभावे करणारे. सर्वच वातावरण असे असल्याने व गावात १२ ही महिने "इश्वरनिष्ठांची मांदियाळी" असल्याने लहानपणातच अनेक स्त्रोत्रे, प्रार्थना, ष्लोक, ऋचा, स्तुत्या वगैरे तोंडपाठ झाल्या होत्या, तेव्हा अर्थ कळत नव्हता ह्या सर्वांचा पण म्हणताना अतिशय छान वाटायचे. इनफॅक्ट लहानपणी सगळीकडेच "मला सर्व पाठ आहे" हे दाखवण्याचा अट्टाहास झाल्याने आणि आज अगदी त्याच्या विपरीत असे काहीच औत्सुक्य न राहिल्याने स्वभाविकपणे सर्वांचा " मी नास्तिक होत चाललो आहे" हा काळजीचा विषय बनला आहे.
लहानपणी जेव्हा आजोबा सकाळी सकाळी शुचिर्भुत होउन एखाद्या ध्यानस्त ॠष्यासारखे पुजेला बसायचे, तो फुला-उदबत्यांच्या सुगंध आणि आजोबांची धीरगंभिर आवाजात चाललेली विवीध संस्कॄत स्लोकांची आवर्तने ह्याने वातावरणच असे व्हायचे की मी सुद्धा स्वाभाविकपणे ह्यात ओढला जाऊन कधी आजोबांच्या मांडीला मांडी लाऊन रोजच्या रोज नियमाने पुजेला बसायला लागलो हे मलाच समजले नाही, मग मला नंतर "आवड आहे हो त्याला देवदेवाची, रोज सक्काळी पुजा केल्याशिवाय बाहेर जात नाही हो" वगैरे कौतुक ऐकुन मनातुन गुदगुल्या व्हायच्या.
पुढे मग शिक्षणाचे, नोकरीचे व्याप मागे लागले, घर ही सुटले. ह्या काळात आडवेतिडवे वाचन आणि चर्चाही बर्‍याच झाल्या. लहानपणी असलेल्या संस्कारामुळे म्हणा अथवा आंतरीक ओढीमुळे म्हणा पण "धर्म नक्की काय सांगतो" ह्यावर बरेच काही ढुंढाळले व पचवुन घेतले. "अहं ब्रम्हास्मी, तत्वमसी. मी सर्व चराचरात आहे" वगैरे वाक्ये भुरळ पाडु लागली. हा काळ बराच मोठ्ठा होता, यादरम्यान वेळ न मिळाल्याने म्हणा अथवा तसे पुर्वीसारखे वातावरण न जमल्याने पुर्वीसारखी "पुजेला बसण्याची" गोडी राहिली नाही. शिवाय देवाच्या जवळ जायला पुजाच करायला हवी व त्यासाठी संस्कॄत श्लोकच म्हणायला हवे हा जो गोड गैरसमज होता तो आता पुर्ण संपला होता. मात्र देवाच्या अस्तित्वाची आणि त्याच्या जवळ जाण्याची ओढ होतीस, इनफॅक्ट जास्तच तीव्र झाली होती.
मग जेव्हा केव्हा घरी जायचो तेव्हा हे तात्विक वाद नक्की असायचे, घरी फक्त लोळुन आराम करु वाटत असायचा व घरच्यांचा आग्रह वेगळाच. मात्र कधी कधी माझ्या "पुजा न करण्याचे" लॉजीक जेव्हा इथे " मी नास्तिक झालो" असे लावले गेले तेव्हा हमखास तात्विक चर्चा घडायच्या. शेवटी "तुझ्याशी वाद घालण्यात अर्थ नाही" ह्या ब्रम्हवाक्यात झाली की मी निमुटपणे उठुन पुजेला बसायचो, आजही बसतो ...
म्हणजे "मी एका जागी बसुन केलेया मंत्रोच्चाराच्या घोषात केलेल्या पुजेवर माझी "अस्तिक असणे वा नास्तिक असणे" अवलंबुन आहे" हा विचार माझ्या मनाला त्रास देऊन जातो....

आमची लहानपणीची शाळाही सांस्कॄतीक वारसा वगैरे सांभाळणारी, इथेही कर्मकांडांचे प्रस्थ फार. अर्थात हे सर्व चुकच असते असे नव्हे पण समजा हे केले नाही तर मात्र समोरचा कोणीतरी पापी आणि अपवित्र प्राणी आहे हे मात्र अवश्य ठासुन मनात भरले जायचे. लहानपणी मी इर्ष्येने " इदं तु ते गुह्यतमं, प्रव्यक्षाम्यनं सुयवे. ज्ञानं विज्ञानं सहितम्, यज्ञात्वा मोक्षसे शुभात" असे गीतेचे अध्याय वगैरे पाठ केले होते व स्पर्धाही गाजवल्या होत्या. थोडक्यात शाळेच्या दृष्टीकोणातुन मी एक "आदर्श असा संस्कारी विद्यार्थी" वगैरे होतो. मग हळुहळु मोठ्ठा झालो, शाळा सोडुन बाहेरच्या जगात आलो. "गीतेच्या तत्वज्ञानाची" हळुहळु ओळख पटु लागली, गीता किती महान गोष्टी शिकवते हे ही लक्षात येऊ लागले.
पण मन पुन्हा भुर्रकन मागे गेले, अरे आमच्या शाळेने आमच्याकडुन ४-४ अध्याय पाठ करुन घेण्यापेक्षा २ श्लोक व्यवस्थित अर्थासह सांगितले असते तर तेच उत्तम होते हे ही उमगले. आजही मला "इदं तु ते गुह्यतमं..." अशी सुरवात करुन दिली की आख्खा अध्याय म्हणता येतो पण त्याचा अर्थ नाही सांगता येत. मग असे पांगळे "पाठांतर" व ते ही "संस्काराच्या नावाखाली" जे लहानपणी माझ्यावर ठासवले गेले त्याला आज माझ्या दॄष्टीने काहीच किंमत उरत नाही. आमची शाळा खरेतर "तमसो मा ज्योतिर्गमय" हे ब्रीद घेऊन चालणारी, पण खरे आवश्यक ज्ञान देण्यात शाळेची नक्की गल्लत होत आहे असे आज वाटते.
आजही तेच चालु आहे, कधीमधी गावाकडे गेले आजही तसेच गीतेचे अध्याय तोंडपाठ म्हणुन दाखवणारे विद्यार्थी दिसतात, ह्याबद्दल खेद व्यक्त केला आणि माझे विस्तॄत म्हणणे मांडले की "लहानपणी असा नव्हतास रे तु, आता अचानक असा का संस्कारांना तुझा विरोध आहे ?" असा संपुर्ण चुकीचा अर्थ लावतात ....
माझा विरोध खरोखर संस्कारांना आहे ? की संस्काराच्या नावाखाली नुसते अंध पाठांतर करुन घेण्याला ? संस्काराचा जर अर्थच समजत नसेल तर ते संस्कार काय कामाचे असे माझे म्हणणे चुक आहे ?

तेच पुन्हा येते ते वैश्विक शांती आणि बंधुतेचा संदेश देणार्‍या माउलींच्या "पसायदाना"बद्दल, आयुष्यभर इतरांकडुन पसायदानाची रोजची १०८ आवर्तने घोकुन घेणारे महाभाग जेव्हा मी दाराशी आलेल्या गरिब वारकर्‍यांना त्रास देतात तेव्हा "भुता परस्परे पडो, मैत्र जिवांचे" हे पसायदानाचेच तत्वज्ञान सोईस्करपणे विसरतात तेव्हा त्यांनी केलेया संस्काराला काय अर्थ उरतो ? मग तेच मात्र संस्कारी आणि आम्ही स्पष्ट बोलतो म्हणुन सम्स्कारविरोधी असा जो आमच्यावर अन्याय होतो त्याचे काय ?

लहानपणी गावाकडे पुजापाठ, व्रतवैकल्ये, याग, यज्ञ वगैरेंची बरीच रेलचेल, सत्यनारायणपुजा वगैरे तर अगदी नेहमीचेच. लहानपणीही कधी कसलीशी कथा वाचली म्हणुन बुडलेले जहाज वर येते ह्यावर मी अंधविश्वास कधी ठेवला नाही, मात्र ते वातावरण आणि जे काही घडते आहे त्यातुन ती पुजा घालणार्‍याच्या चेहर्‍यावर दिसणारे समाधान मात्र बरोबर वाचता यायचे. मग मोठ्ठेपणी पेशवाई आणि सत्यनारायणाची पुजा हा इतिहास समजला व लहानपणी आपण जे काही समजत होतो ते अगदीच चुक नव्हते ह्याचे समाधान वाटले. पण आजही मला सत्यनारायणाची पुजा आणि त्याचे धार्मिक महत्व काही केल्या समजत नाही, नपेक्षा मला स्वतःला कधी अशी पुजा घालावी वाटेल असे वाटत नाही. अर्थात मी हे बर्‍याच वेळा उघडपणे बोलुन दाखवल्याने समोरच्याच्या चेहर्‍यावरचे माझ्यबद्दल असणारे "धर्मबुडवेपणा"चे भाव मी सहजच वाचतो.
पण मी आजही जेव्हा केव्हा आमंत्रण येईल तेव्हा प्रसादाला जातो, पुजेच्या सारंजामापाशी बसलेले त्या घरातले कर्ते अथवा एखाद्या वयोवॄद्ध आजी/आजोबांना पाहुन मला कसेनुसेच होते, मी आपला मुकाटपणे नतमस्तक होतो व प्रसाद घेतो. त्यावेळचे त्यांच्या चेहर्‍यावरचे "अवघे सार्थक झाले" हे समाधान वाचताना त्यांच्या समस्यांचे जहाज हाच विश्वास वर आणेल ह्याचीही खात्री असते.
मात्र तरीही मला माझा सत्यनारायण पुजेच्या महत्वावर विश्वास नसणे व म्हणुन मी "धार्मिक नसणे" हा संबंध कळत नाही...

देवाला भेटण्यासाठी अथवा त्याच्याशी तादात्म्य पावण्यासाठी खास देवळातच जावे लागते हा गोड गैरसमज कधीच नव्हता. मात्र लहानपणी देवळातले वातावरण भारुन टाकत असल्याने देवळात जायची ओढ मात्र जरुर होती, अर्थात इथे देवळातल्या देवाच्या मुर्तीसमोर किती वेळ बसलो ह्याला तेव्हाही काही अर्थ नव्हता आणि आजही नाही. मात्र तेव्हा तेव्हा बरोबरच्या कंपनीमुळे म्हणा अथवा तेव्हाचे पवित्र, शांत आणि कमर्शियल न झालेले देऊळ मला जरुर खुळवत असायचे व देवळाकडे ओढला जायचो. हां, आता देवळात जाऊन तिथल्या मोठ्ठ्या पटांगणात आम्ही लहानपणी खेळायचो वगैरे ही माझी वैयक्तीक बाब झाली, इथे मी खास करुन देवाला भेटायला जात आहे असे केव्हाच नव्हते, पण समाजाच्या दॄष्टीने मात्र मी "रोज नेमाने देवळात जाणारा मुलगा" असे होतो.
आज मात्र तितकीशी ओढ नाही, देवळातल्या मुर्तीची तर कधीच नव्हती. मात्र पुर्वी जे हवेहवेसे वाटायचे ते वातावरणही आज न राहिल्याने मला आज देवळात जाणे ह्या उपचाराला तितकेसे महत्व देऊ वाटत नाही. देवावरची श्रद्धा तर तितकीच आहे जितकी पुर्वी होती. मात्र आज देवळात गेल्याने तिथले अवडंबर आणि प्रस्थ पाहुन संताप आणि चिडचिड वाढते, ज्या हेतुसाठी मी कधीकाळी देवळात जात होतो तो हेतुच आता उरला नसेल तर मला देवळात जाणे तितकेसे प्रशस्त वाटत नाही. शिवाय देवळात जाणे म्हणजेच देवावर श्रद्धा असणे हे गुणोत्तर कधीच पटले नाही, तेव्हाही नाही आणि आता तर मुळीच नाही.
जातायेताना रस्त्यावर दिसणार्‍या कोपर्‍याकोपर्‍यातल्या मंदिरापाशी थांबुन दर्शन घेणे, सकाळी कितीही गडबडीत असलो तरीही दर गुरुवारी साइमंदिराची आरती गाठणे, दर चतुर्थीला ट्राफिक ज्यॅम करुन गणपतीची आरती करणे वगैरे गोष्टींचे मला कधीच आकलन झाले नाही व ह्या गोष्टी कधीही करु वाटल्या नाहीत.
मग सध्याच्या देवळातल्या कमर्शियलायझेशन, गर्दी, आरडाओरड वगैरेला कंटाळुन तिकडे जायला खुष नसलेला मी अचानक "नास्तिक" कसा ठरतो ?
देवावरची म्हणजे सुप्रिम पॉवरवर असलेली मनातील श्रद्धा ह्याला काहीच किंमत नाही का ?
पण,
पण आजही मी कोणी मनापासुन आणि तळमळीने देवळात चलण्याचा आग्रह करीत असेल तर जरुर देवळात जातो, बरोबरच्याच्या चेहर्‍यावरच्या दिसणार्‍या समाधानातच मला बर्‍याच वेळा देव दिसतो व माझ्या देवळातल्या देवाच्या दर्शनाचे सार्थक होते....

आमच्या गावातल्या वाळवंटात आपला सर्व अहंकार बाजुला ठेऊन लक्ष-लक्ष संत कुळे "विठ्ठल विठ्ठल" चा जयघोष करत नाचली व ह्या गावाची मातीच त्यांनी पवित्र करुन टाकली, इथल्या प्रत्येक गोष्टीत एक पावित्र्य भरभरुन वहाते. तर आमच्या अशा ह्या गावात एकमेकांच्या "पाया पडण्याची" एक फार महान आणि पवित्र पद्धत आहे. लहानपणी हा काहितरी महान सोहळा आहे असे वाटायचे व मी त्यात कधी सामिल व्हायचो हे कळायचे नाही. कधी दुसर्‍या गावाला गेलो तर तिथले लोक "विठुमाऊलीची पाऊले" म्हणुन माझेच पाय धरायचे तेव्हा फार अवघडल्यासारखे व्हायचे आणि मनात काहितरी उच्च वाटायचे. तर सांगायचा मुद्दा हा की "पाया पडणे" ह्या संस्काराचे महत्व माझ्या लहानपणी खुप होते.
मग मोठ्ठा झालो, मी कुणाच्या का व कशासाठी पाया पडतो आहे व ते तरी माझ्या का पाया पडत आहेत वगैरे प्रश्न पडु लागले.
ह्यांची उत्तरे जरी वर दिल्यासारखी असली तरी ती मनाला पटेनात. मी जरी त्या गावचा असलो तर मी असा काय तीर मारला आहे की लोकांनी माझ्या पाया पडावे ? उलट मी तर ऑलरेडी गावाकडे "नास्तिक, धर्मबुडवा, वरच्या वार्‍याला लागलेला" वगैरे म्हणुन बदनाम आहे, मग ही लोकं माझ्या का पाया पडत आहेत ?
पाया न पडण्यामागे "अहंकार" वगैरे अजिबात नाही पण बुद्धीला पटेल असे कारण मिळत नसल्याने मला आजकाल हे नकोसे वाटत आहे, निदान केवळ मी त्या गावचा आहे म्हणुन वयाने मोठ्ठ्या लोकांनी माझे पाय धरणे तर साफ नामंजुर आहे. माझ्या वैयक्तीक बाबतीत म्हणाल तर तडजोड म्हणुन जास्त वाद न वाढवता मी आपला समोरच्याला मान देऊन वाद संपवतो, मनात काय आहे हा भाग अलहिदा.
तर लोकांच्या मते इथेही मी माझे "संस्कार विसरत चाललो आहे" , चालायचेच ...

खरोखर मी संस्कार विसरत चाललो आहे का ?
कुणाला एखाद्याला चुकुन पाय लागला तर मी पटकन रिफ्लेक्स अ‍ॅक्शनने त्याच्या पाया पडुन घेतो हे संस्कार नव्हे का ? इथे मला आपण त्याला चुकुन लाथ मारली आहे व त्याची आपण दखल घेऊन माफी मागितली आहे हे दाखवणारे "पाया पडणे" हे जर संस्कार असतील तर मी का ते विसरलो आहे ?
आजही कुठल्या महत्वाच्या कामाला बाहेर निघायच्या आधी पुर्वी आई जे हातावर "दही-साखर" द्यायची त्याची आठवण होते, हे काय फक्त वरवरचे आहे का ?
रोज सकाळी आन्हिके उरकताना आपोआप "गणपतीस्तोत्र" मुखातुन बाहेर पडते, त्यामागचे देवदेव वगैरे सोडले तर ते म्हणताना त्या तालातुन व ध्वनीतुन मला मिळणारा आनंद व सुख मला दिवसभरासाठी एनर्जी देते हे खरेच आहे.
कुठलाही नवा कपडा घेतला तर त्याला आधी पाणी दाखवुन मगच तो अंगावर चढवावा ह्या संस्कारामागचे शास्त्रिय कारण मला पटल्याने ते नाकारण्याचा प्रश्नच उद्धभवत नाही, मग मी सध्या जे करतो ते संस्कार नव्हेत काय ?
असो.

अशी उदाहरणे ढिगाने देता येतील, त्याला तरी काय अर्थ आहे ?
कारण, ऑलरेडी इथे समाज आणि आमच्या आसपासचे आम्हाला "नास्तिक, धर्म न मानणारा, देवावर श्रद्धा नसणारा" वगैरे ठरवुन मोकळे झाले आहेत ...

थोडक्यात काय तर आम्ही म्हणजे एक नंबरचे "नास्तिक, धर्म न मानणारे, देवावर श्रद्धा नसणारे" असे संस्कार विसरलेले विक्षिप्त इसम आहोत ...
चालायचेच ...!!!!

- समाप्त -
( खरे तर ह्या शब्दाला काही अर्थ नाही, आयुष्यातल्या २० वर्षातले असे अनुभव केवळ १०० एक ओळीत लिहणे व वर समाप्त म्हणणे हे संस्कारहीन ठरते. तुर्तास इथे विश्रांतीसाठी थांबतो. मुड आला तर एखाद्या प्रतिसादात अजुन खरडेन .... )
धन्यवाद ...!!!

(विषय दिलेला नाही)

Smile

(विषय दिलेला नाही)

Smile

(No subject)

Smile

(विषय दिलेला नाही)

Smile

(subject दिलेला नाही)

Smile

Nerd Nerd Nerd बाकरवडी Nerd Nerd Nerd

(विषय दिलेला नाही)

Smile

(विषय) not given

Smile

(ईशय) द्येलेला न्हाय

Smile

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

हे सर्व मानवनिर्मीत

धर्म देव ह्या वैक्तीक बाबी आहेत त्या कोणीच कोणावर लादू नयेत
ह्या सर्व गोष्टी मानवनिर्मीत आहेत. देव ही संकल्पनासुद्धा मानवनिर्मीत आहे.
गालीबच्या भाषेत सांगायचे तर " दिल बहलाने के लिये गालीब खयाल अच्छा है"
धर्म हा प्रमाण मानायचा तर नक्की कोण धर्म प्रमाण मानायचा
"तस्मात युद्धस्च भारत" म्हणणारा कृष्ण प्रमाण मानायचा की शत्रुला सुद्धा क्षमा कर म्हणणारा येशु ?
दिवस भर प्रार्थना कर आणि रात्री जिवापुरते खा म्हणणारा महंमद की सूर्योदयानन्तर अन्नभक्षण हे पाप आहे म्हणणारा महावीर?
अन्याय करणाराला अन्याय करु देत. विठोबा तुझी काळजी घेईल म्हणणारा भागवत धर्म की मग अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा पापी म्हणणारा इस्लाम.
चातुर्वर्ण्य आणि त्याची तारीफ करणारा मनू श्रेष्ठ मानायचा की समानतेची जाण निर्माण करणारा इस्लाम मोठा मानायचा.
शूद्रांना शिक्षण नाकारणारा मनू चांगला की शिका संघटीत व्हा म्हणणारा धम्म?

अर्धवट

अर्धवट माहितीवर आधारीत असलेला बिनडोक प्रतिसाद.

--अवलिया

+१

सहमत.

बिपिन कार्यकर्ते

+१

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

अर्धवट

अर्धवट माहितीवर आधारीत असलेला बिनडोक प्रतिसाद.
१००% सहमत.
अवलिया साहेब आणि बिपीनभौ आपण या आणि इतर बर्‍याच बाबतीतले जाणकार आहात.
मी बिनडोक आहेच त्या शिवाय का एवढे प्रश्न पडले असते ?
असो. वैयक्तीक चिखलफेक करण्याची सवय नाही तरिही माझ्या शंकांचे निरसन आपणासारख्या जाणकार त्रिकाल आणिसर्व ज्ञानी माणसाने करावे ही विनन्ती.
मी बिनडोक असलो तरिही उघडपणे जसा आहे तसा वावरतो. सर्वाना मूळच्याच नावानेच भेटतो. उगाचच अ‍ॅनानिमिटीचा वायफळ आग्रह ठेवत नाही
असो. आपण मी विचारलेल्या सर्व शंकांचे आपण बहुशृत असल्याकारणे नीट मुद्देसूद निरसन करालच. अन्यथा आपण केवळ गालीप्रदान करणे आणि भेटलाच आहे तर ठोकुन काढुया या अर्थाने उगाच निव्वळ वायफळ प्रतिसाद देणार्‍या लोकांपैकीच आहात असेच होईल

छान लेख...

स॑स्कार,संस्कृती,श्रध्दा,कर्मका॑डे आणी विश्वास या॑ची सा॑गड घालणे खरोखरच अवधड गोष्ट आहे....
जरा कुठे कमी पडल तर नास्तीक,पराचा मॉडर्न..जास्त झाल की अ॑धश्रध्दाळु,जुनाट-बुरसट विचारी .

सुहास

कोणी काही म्हणो

कोणी काही म्हणो पण तुम्ही खरे संस्कारी आहात.
तुम्ही कोणाला दुखवत तर नाही ना.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

देवाचे

देवाचे अस्तित्व ह्यापलिकडे आहे" - इति : बाबा

डॉनराव, मी आपल्या बाबांशी सहमत आहे..!

श्रद्धेला पर्याय नाही..

तिरंग्यावर, पंढरीच्या विठोबावर, लालबागच्या राजावर, माझ्या देशावर, माणसाच्या माणूसपणावर, सहृदयतेवर, सृजनशीलतेवर, आईवर, गाण्या-खाण्यापिण्यावर, मादक-आव्हानात्मक दिसणार्‍या स्त्रियांवर, मला आवडणार्‍या सर्व गायक-वादकांवर - साहित्यिकांवर - अभिनेते/अभिनेत्रींवर, अनेकानेक अज्ञात चित्रकारांवर, मूर्तीकारांवर, मिपावर, मिपाकरांवर,

अ‍ॅन्ड लास्ट बट नॉट द लीस्ट - नियतीवर!

माझी नितांत श्रद्धा आहे!

आपला,
(श्रद्धाळू) तात्या.

+१०१%

तात्याशी सहमत
फक्त हे सोडुन बरं मादक-आव्हानात्मक दिसणार्‍या स्त्रियांवर,Wink

( देवभोळा ) घाशीराम **************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! Wink

हा तर माझा

हा तर माझा चर्चेचा आणि वादावादीचा आवडता प्रांत. पण काय करणार? डॉनरावांनी इतकं तंतोतंत माझ्याच मनातलं लिहिलंय की मला काही लिहायलाच नको.

(विश्वातल्या कुठल्या सुप्रीम पॉवरवर मात्र विश्वास नाही...तशी गरज वाटत नाही)

(श्लोक पाठ असण्यापेक्षा वागणूक चांगली असणे म्हणजे संस्कार असे मानणारा) खराटा

खूप वायफळ

खूप वायफळ तात्विक चर्चा करायची झाली, तर ’आपल्या’ धर्मात ’धर्म’ हा शब्द कर्तव्य या अर्थानी कसा वापरलाय आणि त्यामुळे प्रत्येकाचा धर्म निराळा कसा असतो असं कायच्या काय खरडत बसता येईल. पण त्याला काही अर्थ नाही. त्या अर्थानी आपण धर्म हा शब्द वापरायचं केव्हाच सोडून दिलंय. आपण देव आणि धर्म या गोष्टींची सांगड घालतोच घालतो. ’तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म’ या बिनतोड युक्तिवादात वापरलाय त्याच अर्थानं चांगलं (धर्मानं!), नियमबियम पाळून वागायचं मार्गदर्शन करणारी एक संस्था याच अर्थानं आपण तो वापरतो. आपापल्या अपराधीपणावर उत्तरं शोधायला, पांघरुणं घालायला, नियम सुधारून (वाकवून?) घ्यायला, इतरांना (आणि स्वत:लाही) धाक घालायला लोक तो बर्‍याचदा वापरत असतात.

त्या अर्थानं मी आहे का धार्मिक? बहुतेक नाही.

मला पुराणातल्या बर्‍याचश्या गोष्टी माहीत असतात, देव आणि दैवतांचा इतिहास याबद्दल कुतुहल वाटतं. धर्माचा इतिहास संस्कृतीच्या पाऊलखुणा सोबत घेऊन येतो, तो वाचायला मला आवडतं. त्यात लोकांनी आपापल्या फायद्यातोट्यासाठी, कधीकधी नि:स्वार्थीपणे, कधीकधी निव्वळ मूर्खपणानं मारून ठेवलेल्या मेखी (की मेखा?) समजून घ्यायला धमाल येते.

पण देवापुढे - अगदी तिन्हीसांजेलासुद्धा - आपसूक वगैरे माझे हात नाही जोडले जात. खूप उदास असताना, खूप काळजीत असताना, खूप हैराण झालेलं असतानाही, ’आता देवच काय ते बघून घेईल’ असं चुकूनही माझ्या मनाशी येत नाही. देवाची प्रार्थना करावी असं सकाळी - रात्री कधीच वाटत नाही. अंधाराची किती भीती वाटली, तरी रामाबिमाचं नाव माझ्या तोंडात कधीच येत नाही. असली काहीतरी एण्टिटी असेल, इथपासूनच मला टोटल अविश्वास आहे, तर मग ती आपल्याला मदत करेल, असं कसं वाटणार?

म्हणजे मी धार्मिक नसणारच. असं का असेल?

आमचं घर काही तितकं अतिरेकी आधुनिक नव्हे. म्हणजे आमच्या घरी नाही, पण बाबांच्या घरी - गावाला, आणि आजोळीही, गणपती बसतो. आम्ही त्याकरता शक्य असेल तेव्हा गावाला जातो. घरात लहानसा का होईना देव्हारा आहे. नेहमी बाबा, आणि बाबा नसले तर आई देवाची पूजा करते. तिन्हीसांजेला देवापाशी दिवा लावते. फार गडबडीत नसेल, तर कधीमधी रामरक्षा पुटपुटते. शनिवारी बाबांचा उपास असतो. चतुर्थीला घरात खिचडी होते. पाळी चालू असताना आई बाजूला बसत नाही, पण मुद्दामहून देवाला शिवायलाही जात नाही. घरी कधी हळदीकुंकू वगैरे झाल्याचं आठवत नाही. पण हळदीकुंकू घ्यायला आईची ना नसते. आजी घरात असेल, तेव्हा ती हातात एखादी बांगडी चढवून ठेवते. कुठे फिरायला वगैरे गेलो, तर आम्ही तिथली देवळंही बघतो. हात जोडतो, तीर्थप्रसाद घेतो. माझी आणि माझ्या बहिणीची पत्रिका बनवलेली आहे.

असं सगळं असताना देव किंवा त्याला लागून येणारा धर्म मी इतका बेदखल का केला असेल? याचं कारण शोधताना मला नेहमी एक गंमत आठवते.

आपल्याला मतं फुटायला लागतात त्या काळात कधीतरी, म्हणजे दहावी-अकरावीत असताना असणार, माझा मावसभाऊ घरी आला होता. आडव्या-तिडव्या वाचनामुळे, आणि अंगातल्या उद्धटपणामुळे, माझे ज्वलंत - जहाल - स्त्रीवादी - निधर्मी वगैरे विचार तेव्हा जोरात होते. ते मोठ्यामोठ्यानं मांडायची खुमखुमीही होती. सगळ्यांना त्यांचा मूर्खपणा - अन्यायीपणा दाखवून वगैरे द्यायला पाहिजे, असलं काहीतरी अचाट तेव्हा वाटायचं. असल्याच कसल्यातरी वादात मी मोठ्यामोठ्यानं ’देव नसतोच’च्या बाजूनं आणि माझा भाऊ ’देव असतोच’च्या बाजूनं तारस्वरात भांडत होतो. कुठल्यातरी एका पॉईंटला त्याच्या बाजूनं आर्ग्युमेंट्स संपली. ’तुला इतकं वाटतंय ना, देव नाही असं? मग होऊन जाऊ दे. देव्हार्‍यातला देव घे आणि त्याला पाय लावून दाखव. पाहू तुला जमतं का?’ असं आव्हान त्यानं दिलं. मीही ’हात्तेरेकी, त्यात काय, घे!’ असं म्हणत शिस्तीत जाऊन देव्हार्‍यातली देवीची लहानशी पितळी मूर्ती घेऊन जमिनीवर ठेवली, त्यावर पाय दिला आणि त्याच्याकडे विजयी मुद्रेनं पाहिलं. तो अर्थातच निरुत्तर झाला. ’तू आचरट आहेस बाबा खरंच. जरापण भीती नाही...’ असलं कायतरी तो बडबडला आणि तो वाद माझ्यापुरता जिंकून संपला. परत पत्ते सुरू झाले. संपलं.

आई घरातच होती. कशातच मधे न पडता फारसं लक्ष न दिल्यासारखं करत पडल्यापडल्या शांतपणे ऐकत होती. तिनं सगळ्या वादात माझी बाजू घेतली नाही आणि त्याचीही नाही. मला थांबवलंही नाही. नंतर काही प्रतिक्रियाही व्यक्त केली नाही. कदाचित प्रतिक्रियेच्या या अभावामुळेच, तिला जणू कळलंच नाहीये, मी काय पराक्रम केला ते, अशा थाटात मी तिला मारे सगळी गोष्ट सांगायला गेले. तर ऐकून म्हणाली, पाय ठेवलास म्हणजे काय थोर साहस केलंस? पितळेची वस्तू ती. ती काय खाणारे तुला? तुझा नसेल विश्वास. तुझ्यापुरता. लोकांचा आहे ना. लोक त्या मूर्तीसमोर हात जोडतात. त्यांच्या विश्वासावर पाय ठेवलास. तूच कर विचार, चूक की बरोबर त्याचा.

विषय संपला. तिला काहीच फरक पडला नाही. नेहमीसारखा संध्याकाळचा दिवा लावणं, हात जोडणं यात काही फरक नाही. माझ्यावरही अजिबात राग दर्शवला नाही. तिच्यापुरता खरंच विषय संपला. तिनं मूर्ती साधी धुतलीही नाही लगेच. काय जनरल आठवड्या-पंधरवड्यानं देव्हार्‍याच्या साफसफाईची वेळ आली, तेव्हाच दिव्यासकट सगळ्या मूर्ती स्वच्छ झाल्या, हे मी मुद्दाम लक्ष ठेवून पाहिलं.

परत मी कधी देव आहे की नाही, या गोष्टीवरून तावातावानं वाद घातल्याचं आठवत नाही. पाळी चालू असताना उद्मेखून देवापाशी दिवा लावायला जाणं आणि ’मुद्दामहून अगोचरपणा नकोय’ वगैरे क्षीण विरोध करणार्‍या आईशी वाद घालणं वगैरे आचरट प्रकारही परत करावेसे वाटले नाहीत. मग ’माझा विश्वास नाही, मी देवापुढे हात जोडणार नाही’ असल्या घोषणाही कधी केल्या नाहीत. हात न जोडून जसा फरक पडत नाही, तसा जोडल्यानंही फरक पडत नाही इतपत तर्क आणि सहिष्णू वृत्ती माझ्यात शिरली असावी. सगळं आपापल्या समाधानाशी आणि विश्वासाशी येऊन थांबतं, हे कुठेतरी जाणवलं असावं.

म्हणूनच अंनिसच्या कामाबद्दल कधी भारावलेपणा वाटल्याचं आठवत नाही. फारशी खोली नसलेलं, लोकांची पिळवणूक बंद करण्याचा प्रयत्न करणारं एक काम, इतपतच महत्त्व त्याला द्यावंसं वाटलं. कायद्यापलीकडे शोषण होत नाही ना, इतकं पाहून लोकांना आपापले विश्वास-श्रद्धा जपायचा हक्क आहे, त्यांना आवश्यक असेल त्या - झेपेल त्या निष्कर्षावर त्यांनी स्वत:च आलं पाहिजे, अशी एक धारणा होऊन बसली. कितीतरी वेळा तर देवावर विश्वास नसलेले लोकही आपला अविश्वास असाच वारसाहक्कानं, विचार न करता कंटिन्यू करत असल्याचं दिसलं. तेव्हा ’आईनं सांगितलं म्हणून मी करते मनोभावे’ या साच्यातला गुरुवारचा उपास आणि असला देवावरचा अविश्वास यांत काय फरक, असं वाटून गंमत वाटली. मग कधीतरी ’धर्मशास्त्राचा इतिहास’, ’विवाहसंस्थेचा इतिहास’ वगैरे वाचलं, तेव्हा तर करमणूकच झाली. आणि या सगळ्या व्यवस्थेतलं शोषण - संधिसाधूपणा असं पुराव्यासह समोर ठेवलं तरीही ज्याला यातल्या कर्मकांडावर विश्वासायचं आहे, ज्यांना त्यातून अनामिक दिलासा मिळतो, ते सगळ्या पुराव्यांकडे डोळेझाक करूनही विश्वास ठेवणारच, याची खात्रीही पटली.

हिंदू असल्याचा अभिमान वगैरे तर मला कधी नव्हताच. हिंदू आहोत म्हणजे काय आहोत, हेच बोंबलायला माहीत नाही, तर अभिमान कसला कपाळाचा? त्यातल्या विशेषत: बायकांकरता खास बनवलेल्या चालींची मात्र शरम वाटायची. पण तसल्या मखलाश्या जगातल्या कुठल्याच धर्मानं करायच्या ठेवलेल्या नाहीत, हे कळलं, त्या कुठल्यातरी टप्प्यावर मी निधर्मी आहे असं स्वत:ला सांगणं मी सोडून दिलं. आकाशातला बाप, प्रेषित किंवा विहीरीत प्रेत टाकून देणं या गोष्टी नाहीतरी मला परक्या वाटतात. तितक्या हिंदू धर्मातल्या संकल्पना मला परक्या वाटत नाहीत म्हणजे हा माझा धर्म. कुठल्याही भोंगळ तत्त्वज्ञानापासून कठोर कर्मकांडापर्यंत आणि चार्वाकापासून ते बुद्धापर्यंत सगळ्यांनाच आपलं म्हणणारा आणि टिकून राहणारा हा लबाड धर्म आता मला कधी क्रूर, कधी मजेशीर, आणि नेहमीच सर्वायवलचं रहस्य जाणणारा वाटतो. त्यात अभिमान कसला नि लाज कसली? गंमत आहे.

पण म्हणजे मी धार्मिक आहे की काय? काय माहीत.

छान झाले ...

मी पुढच्या माझ्या एखाद्या प्रतिसादात मेघनाचा, संवेदचा लेख आणि त्यावर सेन च्या प्रतिक्रिया ह्याची लिंक देणारच होतो.
आता मेघनाने आख्खा लेखच दिल्याने प्रश्न मिटला ...

मेघनाचा व संवेदचा लेखही फार सुंदर आहे. सेनच्या प्रतिक्रियाही मस्त.

मागच्या पुणे भेटीत झालेले मित्रांबरोबरचे वाद आणि उपरोक्त लेख हेच माझय ह्या लेखामागची प्रेरणा ठरले असे म्हणायला हरकत नसावी.
धन्यवाद मेघना ...!!!

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... Wink

डॉन, मेघना,

डॉन, मेघना,
उत्तम! मनःपूर्वक वाचलं. मूळ लेख विचारप्रवर्तक, त्यावरची अत्यंत संयत, पण तितकीच विचारप्रवर्तक प्रतिक्रिया. अगदी उत्तम. तुमचे अभिनंदन करणार नाही. अभिमान वाटतो म्हणेन.
धर्म, त्याच्याशी निगडीत परमेश्वर, त्याच्याशी निगडीत नियती या तिन्ही गोष्टी बाजूला ठेवून स्वतःकडे पाहिल्यानंतर आपण माणूस आहोत, माणसाची विचार करण्याची शक्ती वापरतो, विवेकाचा अवलंब करतो असे वाटते का? वाटत असेलच... एखाद-दुसऱ्या प्रतिक्रियेत चुकलोही असू, कारण माणूसच आहोत. आणि तसे वाटत असेल ना, तर धर्म, परमेश्वर, नियती, धार्मिकता यांचा विचार कशाला करायचा? या तिन्ही गोष्टी बाजूला ठेवूया असे का म्हणतो? कारण, या साऱ्या चर्चेत कुठं तरी धर्म, परमेश्वर, नियती या तिन्ही गोष्टी अपौरूषेय ठरतात. त्या तिन्ही गोष्टी अपौरुषेय नाहीत, अशी धारणा झाली तर बरेच अवकाश खुले होते विचार करण्यासाठी. कारण या गोष्टी मुळातच माणसाच्या कल्पनेतून आल्या असतील तर त्यांचे विश्लेषण करावेच लागते. ते केले म्हणून कोणी आपल्याला अधर्मी म्हणत असेल तर तो म्हणणाऱ्याचा भंपकपणा असेल. इतकेच. तसे नसेल तर या गोष्टी अपौरूषेय आहेत हे आधी सिद्ध करावे लागेल. तसे सिद्ध तर होत नाही.
अशाही स्थितीत, मी असेही म्हणतो की एखाद्याची श्रद्धा असेल तर जरूर असू द्यावी. तिचा माझ्या जगण्यात हस्तक्षेप न होणे हे मी महत्त्वाचे मानतो. असा हस्तक्षेप होईल तेव्हा मी तो स्पष्ट नाकारतो. तिथं मी त्या श्रद्धेचं मूल्य तुझ्यापाशीच ठेव असंही बजावतो. माझी आई पूजा करते. तिच्या पूजेच्या वेळा सोडून इतर वेळी तिचा देव माझ्या जगण्याच्या आड येत असेल तर मी त्यापासून वेगळा होतो. कटाक्षाने वेगळा राहतो. अशावेळी "थांब रे, आमटी फोडणीला टाकायची आहे," असे ती म्हणाली तरी मी चटणी-पोळी, ताकभात खाऊन मोकळा होतो. हे वागणे मातृभक्तांच्या लेखी वावगे असेल... पण माझ्या दृष्टीने नाही. मी तिला त्रास देत नाही. मी आमटी-भात न खाता ताकभात खाल्ला याचा तिला त्रास होत असेल का? असेलच. पण तिच्या श्रद्धेची तिने मोजलेली ती किंमत आहे. आमटी-भाताऐवजी ताकभात ही माझ्या अश्रद्धतेची मी मोजलेली किंमत असेल. हे असे वागावे का? ज्याने-त्याने आपापल्या धारणेप्रमाणे ठरवावे. या वर्तणुकीचा आग्रह धरणे अयोग्य नाही, पण धरता येतोच असे नाही. अनेक गोष्टींचा तोल इथे सांभाळावयाचा असतो.
सत्यनारायण. जातो. नमस्कार करतो. धारणा तीच. न केल्याने जसे बिघडत नाही, तसेच केल्यानेही बिघडत नाही.
परवाचाच किस्सा आहे - एका मित्राच्या कार्यालयात नवे मॅकबुक आले. गणेशाची प्रतिमा ठेवून सहकाऱ्यांनी मी पूजा करावी असा आग्रह धरला. मी नकार दिला. म्हटलं, आधी इथं असलेल्या मुलींच्या हातून पूजा करा. मग मीही करतो. हा मान पुरूषाचाच हे मला खोडून काढायचं होतं. मुलींनी पूजा केली, मग मीही उदबत्ती ओवाळली (इथं अश्रद्धांच्या लेखी मी दांभीक ठरतोय).
मेघना, पितळी मूर्तीवर पाय असा प्रसंग अनेकांच्या जगण्यात घडतो का? बहुदा घडत असावा. असंच काहीसं माझ्याही बाबतीत झालं आहे. गणपतीचा फोटो फोडण्याचं कृत्य. अशाच वादातून. पण नंतर बदललो, तुझ्यासारखाच. अलीप्त असतो, पण कुणाच्या श्रद्धेच्या वाटेत येत नाही. अर्थात, त्या श्रद्धेनं माझ्या जगण्यात हस्तक्षेप न करणे ही अट कायम.
उत्तम चर्चा, हिच्या प्रतिसादांची संख्या पन्नासवर कधी जाईल?

बदल

सत्यनारायण. जातो. नमस्कार करतो. धारणा तीच. न केल्याने जसे बिघडत नाही, तसेच केल्यानेही बिघडत नाही.

मी पण असेच करतो. पुर्वीपेक्षा ताठरपणा कमी झालाय. पण शासकीय कार्यालयात सत्यनारायणाची पुजा केली जाते त्याला माझा विरोध असतो. धर्मनिरपेक्ष राष्ट्रात अशी शासकीय पुजा असु नये हे माझे मत. सत्यनाराणाची पुजा कोण करतो? ज्याला आपल्यातला खोटेपणा डाचत असतो तो. मग ती बोच कमी करण्यासाठी सत्यनारायण घालायचा. त्यापेक्षा सत्याची पुजा करा! (जी आजच्या जीवनात॑ अशक्य आहे) अशा कानपिचक्या ऑफिसमध्ये द्यायचो. सत्यनारायणाचा प्रसाद मला शिरा म्हणुन खायला आवडतो हे बहुतेकांना माहित होते. त्यांच्या घरी गेल्यावर तु शिरा म्हणुन खा बाबा! पण ये घरी असा प्रेमळ आग्रह असायचा. अश्रद्धेच्या अतिरेकापेक्षा माणुस महत्वाचा म्हणुन मी जातो. माणसे जोडायला वेळ लागतो पण तोडायला वेळ लागत नाही. मग असा विक्षिप्तपणा का करा असा विचार करतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

खासगी, वैयक्तिक

धर्म, परमेश्वर, धार्मिकता या पूर्णपणे वैयक्तिकच बाबी. त्या तशाच रहाव्यात. सरकारी कार्यालयच कशाला, माझा तर त्यांना खासगी कार्यालयातही विरोध असतो. त्याच भूमिकेतून त्या कार्यालयातील मुलींच्या हातून अग्रपूजा. किमान तेवढीच आपल्या सद् सद् विवेकाला टोचणी टाळण्याची कृती.

तुझा धर्म कोणता?

संपादित.

घोडी आवरा वैद्यबुवा!!

नाहीतर लगाम घालावा लागेल! Wink

(मोतद्दार)चतुरंग

धर्म,

धर्म, परमेश्वर, नियती, धार्मिकता या गोष्टी मुळातच माणसाच्या कल्पनेतून आल्या असतील तर त्यांचे विश्लेषण करावेच लागते. ते केले म्हणून कोणी आपल्याला अधर्मी म्हणत असेल तर तो म्हणणाऱ्याचा भंपकपणा असेल. इतकेच. तसे नसेल तर या गोष्टी अपौरूषेय आहेत हे आधी सिद्ध करावे लागेल. तसे सिद्ध तर होत नाही.

+१, असेच म्हणतो.
उपरोक्त गोष्टी ह्या पौरुषेय आहेत आणि जेव्हा त्यांची निर्मीती झाली तेव्हा त्याला स्थळ, काळ, वेळ ह्यांचे परिमाण होते. अशा परिस्थीतीत त्या आजही आहे तशाच योग्य आहेत का ह्याचा उहापोह नको का करायला ?
समजा करायला गेलो तर आमच्या नशिबी "अधर्मी" ठरणे आले, भले ते भंपक का असेना. शिवाय भंपक म्हणणारे १० लोक नसतात तर हजारोंच्या संख्येने असतात.

इनफॅक्ट आपला हिंदु धर्म ह बराच चिकित्सेला आणि संशोधनाला वाव देतो म्हणुन आम्हाला त्याचे कौतुक आहे. आपण हिंदु धर्मात अवश्य संशोधन करुन कालबाह्य परंपरा आणि रुढी ह्या प्रवाहातुन काढु शकतो म्हणुन तसे करण्याला नेहमीच प्रेरणा मिळाली आहे.
उदा : सति प्रथा, विधवांचे हक्क , जातीभेद ह्यावर बरीच चिकित्सा झाली आणि आज आपण परिणाम आणि सुधारणा पाहतो आहोत.
मग हे आता इथेच थांबवायचे का ?
आपल्या धर्मातल्या कित्येक उदात्त आणि महान गोष्टी अजुन जनसामान्यांपर्यंत पोहचल्याच नाहीत, बहुतांशी तो वर्ग अजुन खेदाने कर्मकांडातच आणि अंधविश्वासातच अडकुन पडला आहे हे सत्य नाही का ?
म्हणुन विष्लेषण हे आवश्यक ठरते, त्याला होणार्‍या विरोधाची कल्पना आहेच आणि त्यासाठी मानसीक तयारीही आहेच की, इथे फक्त काय काय करता येईल ह्यासंबंधी जार चाचपणी चालु आहे ...

मी असेही म्हणतो की एखाद्याची श्रद्धा असेल तर जरूर असू द्यावी. तिचा माझ्या जगण्यात हस्तक्षेप न होणे हे मी महत्त्वाचे मानतो. असा हस्तक्षेप होईल तेव्हा मी तो स्पष्ट नाकारतो. तिथं मी त्या श्रद्धेचं मूल्य तुझ्यापाशीच ठेव असंही बजावतो.

हो , हे सुद्धा मान्य.
मात्र हे मला प्रत्येकचवेळी जमेल असे नाही. मी कितपत अलिप्त राहु शकतो हे सांगणे कठिण आहे.
खरे सांगायचे तर "तुला करायचे ते कर, मी येणार नाही" हे मला जमत नाही, समोरचा एखादा चुकीचा अथवा अनावश्यक वागतो आहे हे जेव्हा दिसते तेव्हा मी अलिप्तपणे बाजुला होण्याऐवजी त्याला ४ गोष्टी सुनावण्याचा प्रयत्न करतो.
बहुदा हेच अनावश्यक आणि अनवॉरंटेड ठरत असावे ...

शिवाय माझे सामिल न होणे किंवा होणे ह्यावर समजा माझे "सामाजिक स्थान" अथवा "रिलेशनशिप्स" ह्यावर परिणाम होत असेल तर काय करावे ? काही वेळा नुसते "त्या श्रद्धेचं मूल्य तुझ्यापाशीच ठेव" असे सांगणे शक्यही नसते व बरोबरही नसते.
अशा वेळेस मी तुर्तास गुपचुप त्यात सामिल होण्याचा मार्ग स्विकारतो, ते मनाला पटत नाही हे माहित असुनही, तडजोडच म्हणावी लागेल ह्याला, पण करावी लागते.

अनेक गोष्टींचा तोल इथे सांभाळावयाचा असतो.

+१, अगदी परफेक्ट ...
समतोल साधणे महत्वाचे आहे ...

सत्यनारायण. जातो. नमस्कार करतो. धारणा तीच. न केल्याने जसे बिघडत नाही, तसेच केल्यानेही बिघडत नाही.

ह्यावर एक वेगळा, विस्तॄत प्रतिसाद लिहीन ...
निमीत्त सत्यनारायणाचे मात्र ह्या अनुषंगाने गरिब वर्गाला आर्थिकदॄष्ट्या परवडत नसतानसुद्धा केवळ सामाजीक कर्तव्य म्हणुन पार पाडाव्या लागणार्‍या कर्मकांडावर भाष्य करेन ...

पण नंतर बदललो, तुझ्यासारखाच. अलीप्त असतो, पण कुणाच्या श्रद्धेच्या वाटेत येत नाही. अर्थात, त्या श्रद्धेनं माझ्या जगण्यात हस्तक्षेप न करणे ही अट कायम.

ह्यावर बहुदा मला बरीच मेहनत घ्यावी लागेल. आपला स्टान्स पटतो आहे मात्र अफार अवघड आहे असे प्रथमदर्शनी दिसत आहे.
पाहतो कसे जमते ते ...!!!

उत्तम चर्चा, हिच्या प्रतिसादांची संख्या पन्नासवर कधी जाईल?

Smile
हा हा हा, ५० जाऊ देत पण अजुन काही जणांकडुन "कन्ट्रक्टिव्ह प्रतिसादांची" अपेक्षा मात्र जरुर आहे ...

मोडकसाहेबांचा प्रतिसाद आवडला ..!!!
धन्यवाद.

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... Wink

प्रतिक्रियात्मक लेख

डॉन तुझा लेख उत्तमच. पण मेघना तुझा प्रतिक्रियात्मक लेख म्हणजे माझ्या मनीचेच सारे काही मांडलेस. १०००००००० टक्के सहमत....

(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/

उत्तम मनोगत

उत्तम मनोगत, डॉनराव (यवढ भारी लिवल्यावर डॉन्या कस काय म्हणायच) जणु काही आमच्या मनातल बोल्लास. मेघनाचा प्रतिसादाने बहार आणली. समाधान पाव्लो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

आभासी

एक आभासी स्वर्गारोहणाने अस्वस्थ झालेला हाच तो डॉन का?

किस्सा

आठ नउ वर्षां पुर्वी असेल. अंनिसच्या मिटींग मध्ये आमच्या एका कार्यकर्ता मित्राने निरंजन घाटे हे शनिपाराला तेल घेउन जाताना दिसले. त्याने लगेच मिटींगमध्ये टीकेची झोड उठवली . " निरंजन घाटे तुम्ही सुद्धा?" स्टाईलने. मग स्यूडो सायंटिस्ट, भंपक विज्ञानवादी अशी विशेषणे लावायला सुरुवात केली. थोडक्यात सगळ्यांनी त्यांना वाळीत टाकले. मी खालील मुद्दे मांडले
१) निरंजन घाटे हा ही माणूस च आहे
२) त्यांची त्या मागील भूमिका विचारुन न घेताच टीका करणे वैज्ञानिक दृष्टिकोनात बसत नाही व ते मला योग्य वाटत नाही.
३) एवढ्या एका कारणामुळे त्यांनी मराठी विज्ञान साहित्यात दिलेले योगदान लगेच विसरलात काय?
४) कुटुंबातील कुणाच्या तरी वतीने ते प्रतिनिधी या नात्याने पण आले असतील तर?
परिणामी मी निरंजन घाट्यांची वकिली करतो म्हणून मलाच वाळीत टाकायला सुरुवात केली.
अजुन एक प्रसंग अगदी अलिकडला
ग.प्र. प्रधान उर्फ प्रधान मास्तर हे साधना साप्ताहिकात लिखाण करतात. आता वयपरत्वे स्वतःचा वाडा संस्थेला दान करुन ते हडपसरला साधना ट्र्स्टच्या एका खोलीत रहायला गेले. त्यांच्या एका लेखात अज्ञेयवादाकडे झुकणारा कल आमच्या एका अंनिसच्या बुद्धिवादी मित्राला ( हल्लि आम्ही विवेकवादी शब्द वापरतो) खटकला. तो म्हणाला " प्रधान मास्तर ही तसलेच शेवटी. त्यांचा विवेकवाद डळमळीत झाला. वय झाले म्हणून काय झाले. शेवटपर्यंत कट्टर रहाणारे रॅशनालिस्ट होतेच कि काही लोक."
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

धर्मश्रद्ध

आम्हीच खरे धर्मश्रद्ध हा डॉ.नरेंद्र दाभोलकारांचा दै.सकाळ मधील लेख इथे वाचता येईल
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

आस्तिक्य- नास्तिक्य

मी ज्या घरात वाढलो तिथे कट्टर म्हणावं असं धार्मिक वातावरण नव्हतं. आई-वडिल कट्टर धार्मिक होते असं नाही, पण त्यांनी कधी काही सक्ती केली नाही. लहानपणी कधी तरी आठवलेकाकांकडे परवचा म्हणायला आई-बाबा पाठवायचे. पण तो परंपरागत धार्मिक संस्कारांचा भाग असावा. त्यावेळी हे का? असे प्रश्न पडले तरी विचारायचे कुणाला? हा प्रश्न होता. पुस्तकाचं दुकान असल्याने धार्मिक पुस्तकं भरपूर होती. त्यातली बरीचशी वाचली होती. त्यातली शंकरासंदर्भातली पुस्तकं वाचल्यानंतर हा किती पांचट नि स्त्रीलोलुप देव होता, अशी प्रतिमा मात्र मनात तयार झाली होती. ती आजही कायम आहे. ती त्यावेळी कुणाकडे व्यक्त झाली मात्र नाही.

पुढे नाशिकला आल्यानंतर वाचन वाढलं. त्याचाही प्रवास फार रंजक झाला. माझा देवावर विश्वास, श्रद्धा होती का हा मलाही पडलेला प्रश्नच. पण देवावरचा विश्वास उडण्याऐवजी त्याच्यावर श्रद्धा का ठेवायची याची कारणं शोधण्याचा प्रयत्न याच काळात सुरू झाला. या शोधातच मुळ विश्वासच डळमळीत झाला. ओशो वाचनात आले नि त्यांनी पार आधीचं 'संस्कारीत' प्रतिमाविश्व उध्वस्त करून टाकलं. इतरही काही मंडळींनी हेच केलं. मग भरपूर प्रश्न पडायला लागले. मतं तयार व्हायला लागली. (खरं तर कुणाची तरी घेतली गेली.आपील मतं खरोखरंच आपली असतात की...?) मनात तोपर्यंत तयार झालेल्या महिमामंडित प्रतिमांचा शेंदूर पार सुटायला लागला. मग या वाचनातून एक बंडखोरी सुरू झाली. कुठल्याही धार्मिक कार्यातील चुका काढून दाखविण्याची नि त्यावर तावातावाने चर्चा करण्याची सवय लागली. नातेवाईकांत आपण वाचलेल्या 'चार बुकातलं' काही सांगितलं, की तेही 'आ' वासून निरूत्तर होऊन बघायचे. 'अतिशहाणा' हे बिरूदही त्यामुळे मिळालं. पण त्याचवेळी याला आपल्यापेक्षा जास्त कळतं असा त्यांच्या नजरेतला भावही उगाचच स्वतःचा अहं वाढवून जायचा.

मी तेव्हा नास्तिक होतो का? हा मलाही आज प्रश्न पडतो. नास्तिकतेच्या जवळ कुठेतरी होतो, असं वाटतं, पण आस्तिक्यपण पूर्ण सुटलं होतं, असंही नाही. कारण लग्न करताना त्यातल्या विधीत वायफळ खर्च करावा असं वाटत नव्हतं. पण लग्न 'संस्कारीत' व्हावं असं मात्र वाटत होतं, म्हणून प्रबोधिनीच्या पद्दतीने का होईना, पण चार मित्रांच्या उपस्थितीत असं 'संस्कारीत' लग्न नक्की केलं. हे संस्कार केले नसते तर काय झालं असतं? नक्कीच काही नाही. पण किमान तेवढे संस्कार हवेच, हा आतापर्यंतच्या पारंपरिक संस्कारांचा पगडा त्यावेळीही सुटू शकला नाही. त्याचवेळी नवं घर घेतलं, तेव्हा वास्तुपूजा मात्र केली नाही. पूजा केली ती साधी. सत्यनारायणाची. त्या पुजेवरही विश्वास होता असं नाही. कारण जहाजाच्या बिनडोक कथेवर काय विश्वास ठेवणार? पण पु्न्हा तीच भूमिका घरावर काही एक संस्कार व्हायला पाहिजे, म्हणून चार गोष्टी व्हाव्यात.

खरं तर माझा आस्तिक्य-नास्तिक्यमध्ये झुलणारा 'मोरू' झाला होता. पण मग वरकरणी दिसणार्‍या माझ्या नास्तिक्यवादी भूमिकेला मी थोडं बंडखोरीचं परिणाम देऊ लागलो. जे धार्मिक संस्कार करायचे त्याला काही वेगळा एंगल द्यायचा असं करायला लागलो. मुलगी झाल्यानंतर पाचपावलीला मंत्रपठणाला मी महिला पुरोहितांना बोलावलं ते त्यातूनच. मग माझ्या या दृष्टिकोनाचे कट्टर विरोधक असेलले माझे काका त्या निर्णयावरही नाराज झाले. पण त्यांच्या नाराजीपेक्षा त्यांच्या नाकावर टिच्चून मी मला हवं ते केलं, याचा आनंद (?) वाटला.

त्याला पार्श्वभूमीही वेगळी होती. आई गेली तेव्हा याच काकांशी एकदा सामना झाला. आईचा दहावा करताना विधी करा पण त्यातला भोजनाचा भाग गाळा नि ते पैसे आधाराश्रमाला द्या अशी सूचना अस्मादिकांनी केली नि काका प्रचंड संतापले. ढेरपोट्या नि बाहेरून केवळ जेवायला बोलवलेल्या ब्राह्मणांना (माझ्या आईशी ज्यांची काहीही 'गाठ' नसलेल्याना) जेवायला घालणं मला कसंसंच वाटत होतं. काकांच्या आक्रमकपणाला मीही तितकाच आक्रमक होऊन प्रतिवाद केला. पण वडिल नि भावाने नमते घेऊन काकाशरण मार्ग अवलंबला. मग या सगळ्या विधींत मी आपला कृत्रिमरित्या वावरलो. पुढे चुलत भाऊ गेला, तेव्हाही याचाच रिपीट परफॉर्मन्स झाला.

पण मी नास्तिक आहे का? की आस्तिक हा मलाही पडलेला प्रश्न. मधल्या काळात नास्तिकपणाच्या टोकाला गेलेला मी आता तिथून थोडा वळालो. विरोध कोणताच करत नाही, पण स्वतःहून कोणतीही धार्मिक गोष्ट करण्याकडे कल नसतो. त्यामुळे कुणाच्या चुकीच्या पद्धतीलाही विरोधही फारसा करत नाही. वटसावित्रीपासून कुठली पूजा करण्याची कधीही सक्ती, इच्छा व्यक्त करत नाही. घरी कधीही पुजा सहसा करत नाही. बायकोने खूप आग्रह केला तरच. तीही धार्मिक आहे असंही नाही. पाळीच्या काळात मंदिरात जाणं तिलाही वावगं वाटत नाही. नि मलाही. याचा अर्थ धार्मिक अकर्मता अंगी बाणलीय असंही नव्हे. पण बिनडोक न पटणार्‍या प्रथा, परंपरा नाही पाळायच्या हे मात्र ठरवलंय. ऐकणारं कुणी असेल तर त्यामागची भूमिका समजावूनही सांगतो. पण त्याला पटावीच हा आग्रह नसतो. तावातावाने भांडण्याची हौसही आता जिरलीय.

त्यामुळे स्वतःपुरतं जे चांगलं वाटलं ते करतो. जेथे चांगलं वाटतं,(भलेही ते मंदिर असो वा मशीद) त्यावेळी तिथं जातो. मन प्रसन्न करणारं ऐकावसं वाटलं तर ऐकतो. शंकराचार्यांच्या ओम पूर्णमिदं ची अध्यात्मिक अनुभूती छान वाटते. अथर्वशीर्षाची वर्णनं मी सृष्टीला लावतो. (या अर्थाने देवाच्या जागी मी निसर्ग रिप्लेस केलाय, असं म्हणता येईल.)

बाकी मी आस्तिक-नास्तिक, धार्मिक की अध्यात्मिक हा मलाही पडलेला गुंता आहेच. ही गुंतवळ सुटत नाही नि सोडवतही नाही.

(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/

विचारपूर्ण लेख आणि प्रतिसाद

आवडीने वाचतो आहे.

असेच

असेच म्हणतो. (कारण आम्हाला एवढं आणि असंच म्हणता येतं आणि याच्यावर मात्र आमची अढळ श्रद्धा आहे.)

चांगली चर्चा

चांगली चर्चा आहे. तुर्त जागा राखून ठेवत आहे. काही तासांनी अधिक लिहीन.

विचारांच काहूर...

मुख्य लेख आणि प्रतिसाद विचारपुर्ण, मोठा प्रतिसाद टंकायला जरा वेळ लागेल.तुर्तास प्रतिसाद राखुन ठेवते.
(सगळ्या विचारांच्या कल्लोळाला शब्दांमध्ये बांधयला स्वःतासाठी घेतलेला वेळ)
--मयुरा.

लेख आणि त्यावरील प्रतिसाद

वाचत आहे.

--अवलिया

मीही.

मीही.

अधार्मिक - नास्तिक

उच्च चर्चा.

मेघना, भोचक, श्रावण सार्‍यांचेच प्रतिसाद अतिशय उत्तम.

डॉनरावांच्या मूळ लेखातला एक मुद्दा घेऊन पुढे जातोय.
ह्या विश्वातल्या सुप्रिम पॉवर वर माझा विश्वास नाहीये ?

नास्तिकपणा किंवा अधार्मिकपणाचे अनेक पैलू आहेत. एक पैलू धर्म आंणि कर्मकांडे यांना विरोध या अंगाने जाणारा असतो. या पैलूत आस्तिक आणि नास्तिक दोन्ही बसू शकतात. म्हणजे देव आहे असे मनातून वाटणारे पण तो या दगडाच्या किंवा इतर मूर्तीत आणि कर्मकांडात नाही असे वाटणारे आस्तिकही यात येतात. डॉनराव हे अशा स्वरूपाचे आस्तिक (पण लौकिकार्थाने अधार्मिक) असावेत असे वरील वाक्यावरून वाटते.

काही जण आस्तिक पण असतात आणि कर्मकांडांना ही हरकत नसते. पण या कर्मकांडांना पॉझिटिव्ह वळण द्यावे असे वाटणारे आणि तसा प्रयत्न करणारे असतात. वर कोणीतरी आश्रमाला दान देण्याविषयी लिहिले आहे.

काही जण खरोखरच नास्तिक म्हणजे देव नाहीच अशा मताचे असतात. मेघना ही अशा पैलूतील अधार्मिक आणि 'ठार' नास्तिक असावी असे वाटते.

मी पण बराचसा मेघना टाईपचा नास्तिक आहे. अर्थात मी मूर्तीला लाथ मारेन की नाही हे सांगता येत नाही.

मी अनेकदा वडिलधार्‍यांच्या इच्छेसाठी काही धार्मिक गोष्टी करतो. त्यामागे बहुधा 'माझा नास्तिकपणा या समोरच्या व्यक्तीला दु:ख देण्याइतका महत्त्वाचा आहे का?' हा दृष्टीकोन असतो. देवळात जाऊ असे अशी व्यक्ती म्हणाली तर मी जातोही किंवा नाहीही जात. कधी बरोबर जातो पण देवळाच्या बाहेरच थांबतो. थोडक्यात माझे प्रत्यक्ष वागणे माझ्या दृष्टीकोनाशी नेहमीच सुसंगत असतेच असे नाही. पण सत्यनारायण घाल किंवा मुद्दाम जाऊन कुलदैवताचे दर्शन घेऊन ये असे त्या व्यक्तीने सांगितले तर नक्कीच करणार नाही.

माझी नास्तिकतेची पूर्वपीठिका अशी. देव या संकल्पनेचा काहीही अर्थ सांगितला तरी 'विश्वातील घटनांचे नियंत्रण करणारा आणि प्रसंगानुरूप घटनाक्रम हव्या तशा प्रकारे घडवू/बदलू शकणारा' हा अर्थ देवाच्या संकल्पनेपासून कधीही दूर करता येण्यातला नाही. कारण हा अर्थ काढून टाकला तर देव असला काय आणि नसला काय? बहुतेक आस्तिकांनाही अशा देवाचे माहात्म्य वाटणार नाही. तर वरील प्रकारची क्षमता बाळगणारी कोणतीही शक्ती या विश्वात नाही असे मी मानतो.

नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)

हे काय?

आठ नउ वर्षां पुर्वी असेल. अंनिसच्या मिटींग मध्ये आमच्या एका कार्यकर्ता मित्राने निरंजन घाटे हे शनिपाराला तेल घेउन जाताना दिसले. त्याने लगेच मिटींगमध्ये टीकेची झोड उठवली . " निरंजन घाटे तुम्ही सुद्धा?" स्टाईलने. मग स्यूडो सायंटिस्ट, भंपक विज्ञानवादी अशी विशेषणे लावायला सुरुवात केली. थोडक्यात सगळ्यांनी त्यांना वाळीत टाकले. मी खालील मुद्दे मांडले

घाटे यांना स्यूडो म्हणणे चुकीचेच आहे. कारण जो खरा विज्ञानवादी असतो. तोच दैववादी असतो, अशी माझी धारणा आहे. अशी धारणा होण्यामागेही एक घटना आहे.

माझ्या एका मित्राचे जवळचे नातेवाईक रुग्णालयात होते. ते कोमात होते. वय अधिक असले, तरी त्यांना वाचविण्यासाठी त्या कुटुंबाचे खूप प्रयत्न सुरू होते. परिस्थिती हाताबाहेर गेली होती. ते जगणे शक्‍य नव्हते. विशेष म्हणजे तो मित्र निरीश्‍वरवादी होता. आम्ही डॉक्‍टरांना भेटलो. ते म्हणाले. तुम्ही त्यांना घरी नेले, तर बरे होईल. तो मित्र मात्र तयार नव्हता. डॉ. आजोबा वाचलेच पाहिजे, असं तो वारंवार विनवत होता. त्यावेळी डॉक्‍टर फटकन म्हणाले, माझे प्रयत्न सुरूच आहेत. बाकी सर्व ईश्‍वराच्या हाती. हे ऐकल्यानंतर तो मित्र सटकलाच. म्हटला, डॉक्‍टर असून ईश्‍वराचा हवाला देता.

डॉक्‍टरांनी त्याचे ऐकून घेतले आणि शांतपणे म्हणाले, डॉक्‍टर आहे म्हणूनच ईश्‍वराचे नाव घेतले आहे. कारण मला माहिती आहे. मृत्यू हे अंतिम सत्य आहे. त्यावर जगातला कोणताच डॉक्‍टर नियंत्रण ठेवू शकत नाही. ही शक्ती एकाच गोष्टीत आहे. तिला आपण ईश्‍वर म्हणतो.

मित्र गपगार झाला. बोलण्यासारखे काही त्याच्याकडे राहिलेच नव्हते.
तो शांतपणे उठला आणि आजोबांजवळ जाऊन त्याने त्यांचा हात हातात घेतला. त्याचवेळी आजोबांच्या ओठाची थोडी हलचाल झाली. पुढे काही दिवस मी त्याच्याबरोबर रुग्णालयात जात होतो. चार दिवसांनंतर आजोबा शुद्धीवर आले.

आता बोला.

डॉक्‍टर

डॉक्‍टर आहे म्हणूनच ईश्‍वराचे नाव घेतले आहे.

क्या बात है..!

बोला गणपतीबाप्पा मोरया..!

आपला,
(गणेशप्रेमी) तात्या.

स्वगत : हम्म! भाग्यश्रीच्या शब्दात सांगायचं तर आता हा धागा हायजॅक करू की काय?! Wink

थोर थोर विचारवंतांची रेवडी उडवायला जरा मज्जा येईल! Smile

जाऊ द्या झालं! देवदेवतांच्या मूर्त्यांवर पाय देऊन तुडवणं सुरू आहे. आपण कशाला उगा मध्येच पडा! साला कुणाचा तरी पाय आपल्याही टाळक्यावर पडायचा!Smile

तात्या.

ईश्वरी

ईश्वरी अस्तित्वाबद्दल साशंक असणार्‍यांचे प्रतिसाद वाचून गंमत वाटली! Smile

असो,

थोरामोठ्या विचारवंतांची ही वैचारिक गंगा अशीच वहात राहो..! Smile

तात्या.

फुका बाता

खरंच ना तात्या.
उगा फुका बाता मारण्यात आणि आपली "असली' विद्वत्ता पाजाळण्यात अर्धवटांना फार सुख वाटते.
त्यातलीच ही चर्चा आहे. चालू द्यात. प्रत्येकजण मी किती शहाणा आणि विद्वान आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करतोय. आपण आपली मजा घेवूयात आणि अधून मधून आपले विचार पेरूया!

अन्वयराव,

उगा फुका बाता मारण्यात आणि आपली "असली' विद्वत्ता पाजाळण्यात अर्धवटांना फार सुख वाटते.

विरोधी मते असली तरी आपण वापरलेल्या अधोरेखित शब्दांसारखे दुसर्‍या प्रतिसादकर्त्यांना मानहानीकारक शब्द वापरणे योग्य नव्हे! जरा जपून लिहा. विचारपूर्वक लिहा.

(सूचक)चतुरंग

वैश्विक सत्य

कु़णाचीही मानहानी करण्याचा हेतू नाही.
तुम्हाला पटत नसले, तरी ते वैश्विक सत्य आहे.

त्याचं काय

त्याचं काय आहे अन्वयराव, इथे षड्ज ऋषभापासून वेगळा न काढता येणारे, विद्वत्ता पाजळणारे बरेच लोक आहेत. आता सगळ्यांची लेव्हल तुमच्याइतकी तर नसणार ना... पण बाकी काही म्हणा, कानाखाली वाजवून लगेच हात जोडून समोर उभं राहाण्याची तुमची ष्टाईल आवडली बॉ आपल्याला.

सहमत..!

प्रत्येकजण मी किती शहाणा आणि विद्वान आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करतोय.

हो बुवा! एकंदर प्रकार गंमतीशीर आहे खरा! Smile

आपण आपली मजा घेवूयात आणि अधून मधून आपले विचार पेरूया!

येस्स! Smile

तात्या.

श्रध्दावान......

कोणी काय मानावे आणि काय नाही यावर मी काहीच भाष्य करू शकत नाही.
परंतु मी तर म्हणेन मी धार्मिक आहे (म्हणजे डान्या ज्या पद्धतीचा धार्मिक नाही त्या पद्धतीचा मी आहे) कारण मी त्यावर विश्वास ठेवतो आणि त्यामागची भूमिका काय आहे हे शोधायचा प्रयत्न करतो आणि शेवटी डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा नियम सर्वत्र लागू आहे असे मला वाटते. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्यापर्यंत आल्या आहेत त्या या उत्क्रांतीचे टप्पे पार करत आल्या आहेत असे मला वाटते. राजवाड्यांचे भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास हे पुस्तक वाचल्यावर माझा अंदाज बरोबर आहे असेही वाटले. जसे पूर्वी लैंगिकसंबंध माणसाचे देखील पशुवत होत. आई आणि मुले देखील शरीरसंबंध करीत असत परंतु जसा जसा समाज विकसित होत गेला तसे तसे बंधने वाढत गेली. व आताच्या काळात एक सुजाण भारतीय पुरुष तरी आपल्या आईबद्दल शारीरीक संबंधाची वासना ठेवणार नाही असे वाटते. जशी जशी कोणतीही गोष्ट जास्त जास्त विकसित होत जाते तशी तशी बंधने वाढत जातात. जसे माती पहील्यांदा माती मोकळी असते, मग त्यात पाणी घालून ती कालवतात, म्हणजे प्रत्येक कणाचे वेगळे राहण्याचे स्वातंत्र्य पाण्याच्या योगाने बंधित केले जाते व मातीचा गोळा तयार होतो. मग त्या मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार देऊन मूर्ती घडविली जाते. म्हणजे त्या मातीच्या गोळ्याचे अंगभूत ओबडधोबड आकाराचे स्वातंत्र्य त्याला आकार देऊन हिरावून घेतले जाते आणि त्याला एका मूर्तीचा आकार दिला जातो. म्हटले तर स्वातंत्र्य हिरावणे आहे आणि म्हटले तर सुंदर मूर्ती घडवणे आहे.
ज्या गोष्टी आज मला घरी सांगितल्या जातात त्या सर्वच टाकावू असतात असे नाही किंवा सर्वच सरसकट योग्य असतात असंही नाही. किंवा परिस्थितीनुसार उपकारक किंवा अपकारक असू शकतात. उदा. माझी आई पाळीच्या वेळेस बाजूला बसत असे, त्यामुळे घरातली कामे उदा. स्वैपाक, भांडी, केर-वारे इ. मी, माझा दादा, माझे बाबा वाटून घेऊन करत असू. त्याचा सर्वात मोठा फायदा मला अमेरिकेत आल्यावर झाला तो असा की माझा स्वैपाक मला व्यवस्थित बनविता येत असे. खाण्यासाठी बाहेर पैसे खर्च करायची किंवा पा.कृ. ची पुस्तके धुंडाळण्याची वेळ आली नाही.
तसेच आपल्या पापपुण्याच्या संकल्पना यादेखील माणसाने वाईट वागू नये यासाठी त्याला घालण्यात आलेली भिती आहे असे मला वाटते, आणि म्हणून ते योग्य वाटते.
स्वामी विवेकानंदानी असे म्हटले होते कि 'जेव्हा आम्ही एखाद्या दगडाच्या मूर्तीची पूजा करतो तेव्हा तो देव तिथे असतो कारण ती आमची श्रद्धा असते'. तसेच कदाचित मेघनाताईंनी जसा पितळेच्या मूर्तीवर पाय दिला तसा त्यांच्या आईच्या फोटोवर किंवा एखाद्या प्रिय व्यक्तिच्या फोटोवर दिला नसता असे वाटते, कारण त्या फोटोमधे त्यानी कागदाचा कपटा न बघता आईची किंवा प्रिय व्यक्तीची छबी बघितली असती. असे निदान मला तरी वाटते. त्यामुळे एखादी धार्मिक गोष्ट मला पटली नाही तरी मी ती पाळतो. त्यावर जास्तीत जास्त विचार करून ती का करावे असे म्हटले असेल याचा शोध घेतो. केवळ कोणीतरी लिहीले सांगितले म्हणून माझ्या संस्कृतीत सांगितलेली एखादी गोष्ट मी टाकाऊ मानत नाही.
तसेच जी जी संतचरित्रे मी आजवर वाचली त्यात त्या त्या संतानी परमेश्वराची भक्ती, नामस्मरण, उपासना श्रेष्ठ हेच सांगितले आहे. आणि तेवढे कारण मला''देव' मानायला पुरेसे आहे.

बाकी सुचेल तसे पुढे लिहीत राहतो.
(१७६१मधला)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

+१

काय बोललात साहेब!

स्वामी विवेकानंदानी असे म्हटले होते कि 'जेव्हा आम्ही एखाद्या दगडाच्या मूर्तीची पूजा करतो तेव्हा तो देव तिथे असतो कारण ती आमची श्रद्धा असते'. तसेच कदाचित मेघनाताईंनी जसा पितळेच्या मूर्तीवर पाय दिला तसा त्यांच्या आईच्या फोटोवर किंवा एखाद्या प्रिय व्यक्तिच्या फोटोवर दिला नसता असे वाटते, कारण त्या फोटोमधे त्यानी कागदाचा कपटा न बघता आईची किंवा प्रिय व्यक्तीची छबी बघितली असती. असे निदान मला तरी वाटते.

Applause Applause Applause Applause Applause Applause

आवडले. असेच म्हणतो.

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

+२

काय बोल्लात मालक !!! एकच नंबर !!

जशी जशी कोणतीही गोष्ट जास्त जास्त विकसित होत जाते तशी तशी बंधने वाढत जातात. जसे माती पहील्यांदा माती मोकळी असते, मग त्यात पाणी घालून ती कालवतात, म्हणजे प्रत्येक कणाचे वेगळे राहण्याचे स्वातंत्र्य पाण्याच्या योगाने बंधित केले जाते व मातीचा गोळा तयार होतो. मग त्या मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार देऊन मूर्ती घडविली जाते. म्हणजे त्या मातीच्या गोळ्याचे अंगभूत ओबडधोबड आकाराचे स्वातंत्र्य त्याला आकार देऊन हिरावून घेतले जाते आणि त्याला एका मूर्तीचा आकार दिला जातो. म्हटले तर स्वातंत्र्य हिरावणे आहे आणि म्हटले तर सुंदर मूर्ती घडवणे आहे.

ते व्यक्तिस्वातंत्र्य वैगेरे वाल्यांनी तुमचा प्रतिसाद वाचलेला दिसत नाहीये ..