मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

DNA : आनुवंशिकतेपासून गुन्हेगाराच्या शोधापर्यंत

हेमंतकुमार ·

अनामिक सदस्य Mon, 01/12/2026 - 12:36
धन्यवाद डोक्टरसाहेब. काही प्रश्न आहेत. १. अशी ओळख पटवण्यासाठी दंतरचना कितपत विश्वसनीय असते? डी एन ए इतकी नक्कीच नाही पण कितपत यूनिक असते? तुलना करण्यासाठी दंतरचना किती लोकान्ची उपलब्ध असते? पाश्च्यात्य देशात दंतरचनेचा ठसा साठवून ठेवतात का? २. सर्व घटक अनुकूल असल्यास चाचणीचे यश 98.2% पर्यंत असल्याचे आतापर्यंत दिसले आहे. असे का असावे? उरलेले १.८% statistical error असावी का अजून अज्ञात असे काही घटक? ३. नातेवाइकान्चा DNA वापरून म्रुत व्यक्तिची ओळख पटवणे आणि एखाद्या मुलाचे पितृत्व सिद्ध करणे यात तान्त्रिकद्रुश्ट्या काही फरक असतो का? रँडम पुरुषाच्या डीएनए बरोबर जुळणी करून पितृत्व निर्देशांक का काढावा लागतो? तसे काही म्रुत व्यक्तिची ओळख पटवताना करावे लागत नाही का?

In reply to by अनामिक सदस्य

हेमंतकुमार Mon, 01/12/2026 - 14:41
धन्यवाद ! चांगले प्रश्न आहेत. सवडीने एकेक घेतो. १. मृताची दंत रचना ही ओळख पटवण्याची एक प्राथमिक पद्धत आहे. तिचा एक फायदा म्हणजे अपघाताच्या ठिकाणी जर प्रचंड उष्णता निर्माण झाली असेल तर शरीराचे अन्य अवयव जळून जातात परंतु दातांचे enamel हा मानवी शरीरातील सर्वात कठीण असा पदार्थ असून तो 1000 अंश सेल्सिअस तापमानापर्यन्त सुद्धा व्यवस्थित राहतो. अशा राहिलेल्या दातामधून सुद्धा डीएनए प्रोफाईल तपासणी करता येते हा एक बोनस. तिची विश्वसनीयता यासाठीची पहिली गरज म्हणजे संबंधित व्यक्तीच्या दंत उपचारांची नोंदणी केलेली असणे. जर अशी नोंदणी उपलब्ध झाली तर या चाचणीची विश्वसनीयता 80% पर्यंत राहते. मात्र एखादी व्यक्ती जिवंतपणे कधीच दंतवैद्याकडे गेली नसेल तर मग तिची विश्वसनीयता अर्थातच खूप कमी होते. बऱ्याच युरोपीय देशांमध्ये दंतवैद्यांनी त्यांच्याकडील येणाऱ्या लोकांचे एक्स-रे आणि अन्य अहवाल अनेक वर्षे सक्तीने जपून ठेवायचे असतात. अप्रगत देशांमध्ये अर्थातच नोंदणी प्रक्रिया अत्यंत कमी असते. अशा परिस्थितीतही मृताची ओळख पटवण्यासाठी दातांचा मर्यादित वापर असा होऊ शकतो : १. व्यक्तीचे अंदाजे वय, लिंग आणि वंश समजणे. २. व्यक्तीच्या व्यसनानुसार दातांवर काही डाग आढळू शकतात. ३. सोने किंवा महागड्या धातूचा कृत्रिम दात आढळल्यास ओळख पटवण्यासाठी अजून मदत होते.

In reply to by अनामिक सदस्य

हेमंतकुमार Mon, 01/12/2026 - 16:04
चाचणीचे यश 98.2% पर्यंत असल्याचे आतापर्यंत दिसले आहे. असे का असावे?
सर्वप्रथम एक तांत्रिक कारण : प्रोफाइल चाचणीचा निष्कर्ष हा संबंधित व्यक्ती अमुक असण्याची संभाव्यता व्यक्त करतो; तो निष्कर्ष खात्रीने ही मृत व्यक्ती हीच होती असे (absolute) म्हणत नाही. ही संभाव्यता टक्केवारीच्या संदर्भात सांगितली जाते (statistical confidence). २. एखाद्या व्यक्तीचा डीएनए जेव्हा एकमेवाद्वितीय असतो असे म्हटले जाते ते शब्दशः खरे व्हायचे असल्यास संपूर्ण डीएनएची प्रोफाइल चाचणी करणे आवश्यक आहे. परंतु वास्तवात डीएनएचे फक्त विशिष्ट ठराविक भागच तुलनात्मकरित्या तपासले जातात. याचे कारण म्हणजे कुठल्याही आपत्ती प्रसंगी जेव्हा हजारो मृतदेह ठराविक वेळात ओळखायचे असतात तेव्हा वेळ आणि संसाधनांची मर्यादा हे महत्त्वाचे घटक असतात. ३. प्रयोगशाळेसंबंधीच्या errors : यामध्ये डीएनए नमुना हाताळणीपासून ते प्रशिक्षित मनुष्यबळ, उपकरणे अशा असंख्य गोष्टींचा समावेश होतो. ४. एखादी जीवशास्त्रीय चाचणी 100% अचूक आहे हे विधान कायद्यालाही मान्य होत नाही कारण मानवी चुका अजिबात न होणे हे (जवळजवळ) अशक्य असते. तसेच DNA variation संबंधीचे वैज्ञानिक ज्ञानदेखील 100% ज्ञात असतेच असे नाही.

In reply to by अनामिक सदस्य

हेमंतकुमार Mon, 01/12/2026 - 16:33
३. नातेवाइकान्चा DNA वापरून म्रुत व्यक्तिची ओळख पटवणे आणि एखाद्या मुलाचे पितृत्व सिद्ध करणे यात तान्त्रिकद्रुश्ट्या काही फरक असतो का? रँडम पुरुषाच्या डीएनए बरोबर जुळणी करून पितृत्व निर्देशांक का काढावा लागतो? तसे काही म्रुत व्यक्तिची ओळख पटवताना करावे लागत नाही का?
* तांत्रिकदृष्ट्या काही फरक नाही; प्रयोगशाळेतील पद्धत वरीलप्रमाणेच राहील. * रँडम पुरुषाच्या डीएनए बरोबर जुळणी का करायची याचे उत्तर जीवशास्त्रीय असून ते समजायला त्या विज्ञानाची शैक्षणिक पार्श्वभूमी असल्यास बरे पडेल. १. प्रथम फक्त मुलाचा डीएनए आणि संशयित वडिलांचा डीएनए ही परिस्थिती पाहू. इथे आपण पुन्हा एकदा डीएनए मधील ठराविक सिक्वेन्सेसचीच तुलना करत आहोत. या सिक्वेन्सेस पैकी काही सर्वसाधारण समाजात दुर्मिळ असतात तर काही अत्यंत कॉमन असतात ( ५०%). २. वरचे जे कॉमन सिक्वेन्सेस आहेत ते त्या वंशातील एखाद्या अन्य काहीही संबंध नसलेल्या पुरुषामध्ये सुद्धा आढळू शकतात. त्यामुळे या जुळणीचा पुरावा दुर्बल होतो. म्हणून निर्देशांक काढायचा. जेव्हा निर्देशांक 99.9% किंवा त्याहूनही जास्ती असतो तेव्हा असे म्हणता येते की, त्या खटल्यातील संभाव्य बाप असलेली व्यक्ती जैविकदृष्ट्याही बाप असण्याची शक्यता अन अन्य कुठल्याही पुरुषाच्या तुलनेत खूपच जास्त आहे. . . . मृत व्यक्तीच्या बाबतीत आपण सख्या नातेवाईकांशी तुलना करतोच आणि म्हणून लेखात म्हटल्याप्रमाणे फक्त एकापेक्षा किमान दोन सख्ख्या नातेवाईकांचे नमुने मिळवणे श्रेयस्कर.

Bhakti Mon, 01/12/2026 - 15:12
मस्तच विषय. सर अलेक जेफरीज (Sir Alec Jeffreys )यांनी जागतिक स्तरावर हा DNA फिंगरप्रिंटिंग शोध लावला . डॉ. लालजी सिंग (Dr. Lalji Singh) यांना 'भारतातील DNA फिंगरप्रिंटिंगचे जनक' मानले जाते. environmental DNA (eDNA) विषयी नव्याने समजले.

सोत्रि Tue, 01/13/2026 - 05:32
environmental DNA (eDNA) ही भन्नाट कल्पना आहे, त्यावरील संशोधन अनेक सायफाय शक्यतांना वास्तवात आणता येईल! - (अभासू) सोकाजी

निनाद Tue, 01/13/2026 - 05:59
खूप मस्त लेख. जनुकीय अभियांत्रिकीचे अनेक अंग आहेत. भारतात प्रामुख्याने आधी शेतीसाठी याचा वापर झाला. २००२ मध्ये बीटी कापूस ला मिळालेली मान्यता हा या क्षेत्रातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. यामुळे भारताच्या कापूस उत्पादनात मोठी क्रांती झाली. क्रिस्पर तंत्रज्ञानाचा वापर करून भारतीय शास्त्रज्ञांनी भात, गहू आणि मोहरीच्या जाती विकसित केल्या आहेत. मला वाटते इतक्यातच 'जीनोम इंडिया प्रोजेक्ट' यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. या अंतर्गत १०,००० भारतीयांच्या जनुकीय नमुन्यांचे सखोल विश्लेषण करण्यात आले. भारतीयांची शरीररचना पाश्चिमात्य देशांपेक्षा वेगळी असल्याने, थॅलेसेमिया, सिकल सेल ॲनिमिया सारख्या विशिष्ट भारतीय आजारांवर उपचार शोधण्यासाठी हा डेटा अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे/असावा. कॅन्सरवरील स्वदेशी उपचार, CAR-T सेल थेरपी,हा पण एक मोठा टप्पा आहे. उपचार भारतात स्वदेशी तंत्रज्ञानामुळे अत्यल्प दरात उपलब्ध झाले आहेत. हे जागतिक आरोग्य क्षेत्रात भारताचे मोठे यश आहे असे वाटते. आपल्याकडे खूप बाय टेक पदवीधर आहेत पण जनुकीय अभियांत्रिकीचे संशोधन मात्र त्यामानाने अगदी किरकोळ आहे. कारणे सर्वांना माहीतच आहेत... त्यामुळे अजून फार मोठा टप्पा यात आपल्याला गाठायचा आहे हे नक्कीच!

हेमंतकुमार Tue, 01/13/2026 - 07:52
पूरक माहितीपूर्ण प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद ! प्रतिसादांमधून आलेले वैज्ञानिकांसंबंधीचे आणि बीटी कापूस आणि आजारांवरील उपचारांचे अन्य मुद्दे महत्त्वाचे आहेत. . . . वादग्रस्त पितृत्वासंबंधीच्या अलीकडे घडलेल्या १-२ रोचक प्रकरणावर नंतर लिहितो.

हेमंतकुमार Tue, 01/13/2026 - 08:27
एका विवाहित स्त्रीने तिच्या डॉक्टरवर आरोप केला होता की तिचे मूल हे नवऱ्यापासून झालेले नसून त्या डॉक्टरपासून झालेले आहे. म्हणून ती स्वतः, तिचे मूल व डॉक्टरची डीएनए चाचणी करण्यात यावी अशी तिची मागणी होती. मात्र त्या चाचणीला संबंधित डॉक्टरने नकार दिला. त्यावर त्या स्त्रीने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आणि तिथे तिची विनंती मान्य करण्यात आली. डॉक्टरला हे मंजूर नसल्याने त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने संपूर्ण प्रकाराची शहानिशा करून या डॉक्टरच्या बाजूने निकाल देताना म्हटले आहे की, आपल्या नवऱ्याबरोबर राहात असलेल्या स्त्रीने अन्य कुठल्याही पुरुषावर निव्वळ आरोप केला म्हणून त्याची डीएनए चाचणी करता येणार नाही. असे केल्यास त्या डॉक्टरच्या आत्मसन्मानाला ठेच पोचते आणि व्यक्तिगत गोपनीयतेचाही भंग होतो. तसेच ते मूल आता सज्ञान असून त्याचा या प्रकरणात काही संबंध नसल्याचे (not a party to the proceedings) न्यायालयाने म्हटले आहे. एखाद्यावर कोणी निव्वळ आरोप केला म्हणून त्याची डीएनए चाचणी सक्तीने करता येणार नाही, हा या निर्णयाचा मथितार्थ आहे.

अनामिक सदस्य Mon, 01/12/2026 - 12:36
धन्यवाद डोक्टरसाहेब. काही प्रश्न आहेत. १. अशी ओळख पटवण्यासाठी दंतरचना कितपत विश्वसनीय असते? डी एन ए इतकी नक्कीच नाही पण कितपत यूनिक असते? तुलना करण्यासाठी दंतरचना किती लोकान्ची उपलब्ध असते? पाश्च्यात्य देशात दंतरचनेचा ठसा साठवून ठेवतात का? २. सर्व घटक अनुकूल असल्यास चाचणीचे यश 98.2% पर्यंत असल्याचे आतापर्यंत दिसले आहे. असे का असावे? उरलेले १.८% statistical error असावी का अजून अज्ञात असे काही घटक? ३. नातेवाइकान्चा DNA वापरून म्रुत व्यक्तिची ओळख पटवणे आणि एखाद्या मुलाचे पितृत्व सिद्ध करणे यात तान्त्रिकद्रुश्ट्या काही फरक असतो का? रँडम पुरुषाच्या डीएनए बरोबर जुळणी करून पितृत्व निर्देशांक का काढावा लागतो? तसे काही म्रुत व्यक्तिची ओळख पटवताना करावे लागत नाही का?

In reply to by अनामिक सदस्य

हेमंतकुमार Mon, 01/12/2026 - 14:41
धन्यवाद ! चांगले प्रश्न आहेत. सवडीने एकेक घेतो. १. मृताची दंत रचना ही ओळख पटवण्याची एक प्राथमिक पद्धत आहे. तिचा एक फायदा म्हणजे अपघाताच्या ठिकाणी जर प्रचंड उष्णता निर्माण झाली असेल तर शरीराचे अन्य अवयव जळून जातात परंतु दातांचे enamel हा मानवी शरीरातील सर्वात कठीण असा पदार्थ असून तो 1000 अंश सेल्सिअस तापमानापर्यन्त सुद्धा व्यवस्थित राहतो. अशा राहिलेल्या दातामधून सुद्धा डीएनए प्रोफाईल तपासणी करता येते हा एक बोनस. तिची विश्वसनीयता यासाठीची पहिली गरज म्हणजे संबंधित व्यक्तीच्या दंत उपचारांची नोंदणी केलेली असणे. जर अशी नोंदणी उपलब्ध झाली तर या चाचणीची विश्वसनीयता 80% पर्यंत राहते. मात्र एखादी व्यक्ती जिवंतपणे कधीच दंतवैद्याकडे गेली नसेल तर मग तिची विश्वसनीयता अर्थातच खूप कमी होते. बऱ्याच युरोपीय देशांमध्ये दंतवैद्यांनी त्यांच्याकडील येणाऱ्या लोकांचे एक्स-रे आणि अन्य अहवाल अनेक वर्षे सक्तीने जपून ठेवायचे असतात. अप्रगत देशांमध्ये अर्थातच नोंदणी प्रक्रिया अत्यंत कमी असते. अशा परिस्थितीतही मृताची ओळख पटवण्यासाठी दातांचा मर्यादित वापर असा होऊ शकतो : १. व्यक्तीचे अंदाजे वय, लिंग आणि वंश समजणे. २. व्यक्तीच्या व्यसनानुसार दातांवर काही डाग आढळू शकतात. ३. सोने किंवा महागड्या धातूचा कृत्रिम दात आढळल्यास ओळख पटवण्यासाठी अजून मदत होते.

In reply to by अनामिक सदस्य

हेमंतकुमार Mon, 01/12/2026 - 16:04
चाचणीचे यश 98.2% पर्यंत असल्याचे आतापर्यंत दिसले आहे. असे का असावे?
सर्वप्रथम एक तांत्रिक कारण : प्रोफाइल चाचणीचा निष्कर्ष हा संबंधित व्यक्ती अमुक असण्याची संभाव्यता व्यक्त करतो; तो निष्कर्ष खात्रीने ही मृत व्यक्ती हीच होती असे (absolute) म्हणत नाही. ही संभाव्यता टक्केवारीच्या संदर्भात सांगितली जाते (statistical confidence). २. एखाद्या व्यक्तीचा डीएनए जेव्हा एकमेवाद्वितीय असतो असे म्हटले जाते ते शब्दशः खरे व्हायचे असल्यास संपूर्ण डीएनएची प्रोफाइल चाचणी करणे आवश्यक आहे. परंतु वास्तवात डीएनएचे फक्त विशिष्ट ठराविक भागच तुलनात्मकरित्या तपासले जातात. याचे कारण म्हणजे कुठल्याही आपत्ती प्रसंगी जेव्हा हजारो मृतदेह ठराविक वेळात ओळखायचे असतात तेव्हा वेळ आणि संसाधनांची मर्यादा हे महत्त्वाचे घटक असतात. ३. प्रयोगशाळेसंबंधीच्या errors : यामध्ये डीएनए नमुना हाताळणीपासून ते प्रशिक्षित मनुष्यबळ, उपकरणे अशा असंख्य गोष्टींचा समावेश होतो. ४. एखादी जीवशास्त्रीय चाचणी 100% अचूक आहे हे विधान कायद्यालाही मान्य होत नाही कारण मानवी चुका अजिबात न होणे हे (जवळजवळ) अशक्य असते. तसेच DNA variation संबंधीचे वैज्ञानिक ज्ञानदेखील 100% ज्ञात असतेच असे नाही.

In reply to by अनामिक सदस्य

हेमंतकुमार Mon, 01/12/2026 - 16:33
३. नातेवाइकान्चा DNA वापरून म्रुत व्यक्तिची ओळख पटवणे आणि एखाद्या मुलाचे पितृत्व सिद्ध करणे यात तान्त्रिकद्रुश्ट्या काही फरक असतो का? रँडम पुरुषाच्या डीएनए बरोबर जुळणी करून पितृत्व निर्देशांक का काढावा लागतो? तसे काही म्रुत व्यक्तिची ओळख पटवताना करावे लागत नाही का?
* तांत्रिकदृष्ट्या काही फरक नाही; प्रयोगशाळेतील पद्धत वरीलप्रमाणेच राहील. * रँडम पुरुषाच्या डीएनए बरोबर जुळणी का करायची याचे उत्तर जीवशास्त्रीय असून ते समजायला त्या विज्ञानाची शैक्षणिक पार्श्वभूमी असल्यास बरे पडेल. १. प्रथम फक्त मुलाचा डीएनए आणि संशयित वडिलांचा डीएनए ही परिस्थिती पाहू. इथे आपण पुन्हा एकदा डीएनए मधील ठराविक सिक्वेन्सेसचीच तुलना करत आहोत. या सिक्वेन्सेस पैकी काही सर्वसाधारण समाजात दुर्मिळ असतात तर काही अत्यंत कॉमन असतात ( ५०%). २. वरचे जे कॉमन सिक्वेन्सेस आहेत ते त्या वंशातील एखाद्या अन्य काहीही संबंध नसलेल्या पुरुषामध्ये सुद्धा आढळू शकतात. त्यामुळे या जुळणीचा पुरावा दुर्बल होतो. म्हणून निर्देशांक काढायचा. जेव्हा निर्देशांक 99.9% किंवा त्याहूनही जास्ती असतो तेव्हा असे म्हणता येते की, त्या खटल्यातील संभाव्य बाप असलेली व्यक्ती जैविकदृष्ट्याही बाप असण्याची शक्यता अन अन्य कुठल्याही पुरुषाच्या तुलनेत खूपच जास्त आहे. . . . मृत व्यक्तीच्या बाबतीत आपण सख्या नातेवाईकांशी तुलना करतोच आणि म्हणून लेखात म्हटल्याप्रमाणे फक्त एकापेक्षा किमान दोन सख्ख्या नातेवाईकांचे नमुने मिळवणे श्रेयस्कर.

Bhakti Mon, 01/12/2026 - 15:12
मस्तच विषय. सर अलेक जेफरीज (Sir Alec Jeffreys )यांनी जागतिक स्तरावर हा DNA फिंगरप्रिंटिंग शोध लावला . डॉ. लालजी सिंग (Dr. Lalji Singh) यांना 'भारतातील DNA फिंगरप्रिंटिंगचे जनक' मानले जाते. environmental DNA (eDNA) विषयी नव्याने समजले.

सोत्रि Tue, 01/13/2026 - 05:32
environmental DNA (eDNA) ही भन्नाट कल्पना आहे, त्यावरील संशोधन अनेक सायफाय शक्यतांना वास्तवात आणता येईल! - (अभासू) सोकाजी

निनाद Tue, 01/13/2026 - 05:59
खूप मस्त लेख. जनुकीय अभियांत्रिकीचे अनेक अंग आहेत. भारतात प्रामुख्याने आधी शेतीसाठी याचा वापर झाला. २००२ मध्ये बीटी कापूस ला मिळालेली मान्यता हा या क्षेत्रातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. यामुळे भारताच्या कापूस उत्पादनात मोठी क्रांती झाली. क्रिस्पर तंत्रज्ञानाचा वापर करून भारतीय शास्त्रज्ञांनी भात, गहू आणि मोहरीच्या जाती विकसित केल्या आहेत. मला वाटते इतक्यातच 'जीनोम इंडिया प्रोजेक्ट' यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. या अंतर्गत १०,००० भारतीयांच्या जनुकीय नमुन्यांचे सखोल विश्लेषण करण्यात आले. भारतीयांची शरीररचना पाश्चिमात्य देशांपेक्षा वेगळी असल्याने, थॅलेसेमिया, सिकल सेल ॲनिमिया सारख्या विशिष्ट भारतीय आजारांवर उपचार शोधण्यासाठी हा डेटा अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे/असावा. कॅन्सरवरील स्वदेशी उपचार, CAR-T सेल थेरपी,हा पण एक मोठा टप्पा आहे. उपचार भारतात स्वदेशी तंत्रज्ञानामुळे अत्यल्प दरात उपलब्ध झाले आहेत. हे जागतिक आरोग्य क्षेत्रात भारताचे मोठे यश आहे असे वाटते. आपल्याकडे खूप बाय टेक पदवीधर आहेत पण जनुकीय अभियांत्रिकीचे संशोधन मात्र त्यामानाने अगदी किरकोळ आहे. कारणे सर्वांना माहीतच आहेत... त्यामुळे अजून फार मोठा टप्पा यात आपल्याला गाठायचा आहे हे नक्कीच!

हेमंतकुमार Tue, 01/13/2026 - 07:52
पूरक माहितीपूर्ण प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद ! प्रतिसादांमधून आलेले वैज्ञानिकांसंबंधीचे आणि बीटी कापूस आणि आजारांवरील उपचारांचे अन्य मुद्दे महत्त्वाचे आहेत. . . . वादग्रस्त पितृत्वासंबंधीच्या अलीकडे घडलेल्या १-२ रोचक प्रकरणावर नंतर लिहितो.

हेमंतकुमार Tue, 01/13/2026 - 08:27
एका विवाहित स्त्रीने तिच्या डॉक्टरवर आरोप केला होता की तिचे मूल हे नवऱ्यापासून झालेले नसून त्या डॉक्टरपासून झालेले आहे. म्हणून ती स्वतः, तिचे मूल व डॉक्टरची डीएनए चाचणी करण्यात यावी अशी तिची मागणी होती. मात्र त्या चाचणीला संबंधित डॉक्टरने नकार दिला. त्यावर त्या स्त्रीने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आणि तिथे तिची विनंती मान्य करण्यात आली. डॉक्टरला हे मंजूर नसल्याने त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने संपूर्ण प्रकाराची शहानिशा करून या डॉक्टरच्या बाजूने निकाल देताना म्हटले आहे की, आपल्या नवऱ्याबरोबर राहात असलेल्या स्त्रीने अन्य कुठल्याही पुरुषावर निव्वळ आरोप केला म्हणून त्याची डीएनए चाचणी करता येणार नाही. असे केल्यास त्या डॉक्टरच्या आत्मसन्मानाला ठेच पोचते आणि व्यक्तिगत गोपनीयतेचाही भंग होतो. तसेच ते मूल आता सज्ञान असून त्याचा या प्रकरणात काही संबंध नसल्याचे (not a party to the proceedings) न्यायालयाने म्हटले आहे. एखाद्यावर कोणी निव्वळ आरोप केला म्हणून त्याची डीएनए चाचणी सक्तीने करता येणार नाही, हा या निर्णयाचा मथितार्थ आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
‘डीएनए’ हे आपल्या पेशीच्या केंद्रकातील एक ऍसिड. ते आपल्या आनुवंशिकतेचा मूलाधार असते. त्यादृष्टीने त्याचा सखोल अभ्यास अनेक वर्षांपासून होत होता. त्याच्या रचनेच्या संशोधनाबद्दलचा नोबेल पुरस्कार 1962मध्ये दिला गेला हे बहुतेकांना माहीत असते. परंतु या शोधाची पाळेमुळे पार इ. स.. 1869मध्ये जाऊन पोचतात. तेव्हा Friedrich Miescher या स्वीस जीवरसायनशास्त्रज्ञाने पहिल्यांदा अशा एका रेणूची संकल्पना मांडली आणि त्याला nuclein हे नाव दिले होते. पुढे 1953मध्ये जेम्स वॅटसन यांच्या चमूने त्याची दुहेरी दंडसर्पिलाकार (helical) रचना शोधून काढली.

चार फूल हैं और दुनिया है आणि परफेक्ट डेज

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
हा चित्रपट मी खूपदा पाहिला आहे. खूप मेडिटेटिव असा हा चित्रपट आहे. अगदी जादू केल्यासारखा धरून ठेवतो. x विनोदकुमार शुक्ल गेले. हा चित्रपट आणि विनोदकुमार शुक्ल यांच्यातला एक दुवा जुळून आला. त्यांच्यावर केलेली "चार फुल हैं और दुनिया है" ही डाक्यूमेंट्री मागच्या वर्षी मुबईवर पहिली होती.

व्हेनेझुएला

खटपट्या ·

कंजूस Mon, 01/12/2026 - 05:55
एकदम झटका लेखन शैली. ( पुलंची उगाचच आठवण झाली.) तरी मी सांगत होतो यालोकांना की मिपा सोडू नका. ______________________________ [ काही वर्षांपूर्वी कळवा येथे हॉटेल अमितमध्ये झालेल्या मिपाकट्ट्याला आपण भेटलो होतो हे आठवत आहे. ट.का. ( उर्फ टवाळ कार्टाही होता.]

In reply to by कंजूस

खटपट्या Mon, 01/12/2026 - 06:11
काका, पुलं चं नाव घेऊन तुम्ही मला लाजवताय, मला आता आठवलं, आपण भेटलो होतो अमित गार्डन मध्ये. पूर्वीचे लोक का सोडून गेले मलाही माहीत नाही. प्रत्येकाची काही कारणे असतील. पण अचानक शुकशुकाट झाला होता / आहे हे खरे आहे. असो.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर Mon, 01/12/2026 - 13:59
( पुलंची उगाचच आठवण झाली.)
+१ मला पण ह्या 'बंडु' वरुन असा मी असामी मधले 'दत्तोबा कदम' आणि 'नानु सरंजामे' आठवले 😀 खटपट्यापंत... मजेदार लेख आवडला आहे 👍

सोत्रि Mon, 01/12/2026 - 08:24
मस्त खुसखुशीत!! - (बंडूसारखा मित्र असलेला) सोकाजी

विवेकपटाईत Mon, 01/12/2026 - 11:41
मस्त लेख. बंडूची पृथ्वी काका सोबत तुलना. साऊथ ब्लॉक मध्ये असताना, एकदा त्यांच्या चेंबर मध्ये सोबत कॉफी घेतली होती. अत्यंत शांत स्वभाव , मधुर वाणी आणि मुद्देसूद बोलणारे. बहुतेक वाढते वय आणि बेरोजगारीचा परिणाम.

सकाळ मध्ये ब्रिटिश नंदी यांचे एक सदर यायचे तसा खुसखुशीत लेख!! आता म्हणे तात्यांचा कोलंबियावरही डोळा आहे. मग ग्रीनलँड वगैरे आहेतच. येउंद्या अजुन.

कंजूस Mon, 01/12/2026 - 05:55
एकदम झटका लेखन शैली. ( पुलंची उगाचच आठवण झाली.) तरी मी सांगत होतो यालोकांना की मिपा सोडू नका. ______________________________ [ काही वर्षांपूर्वी कळवा येथे हॉटेल अमितमध्ये झालेल्या मिपाकट्ट्याला आपण भेटलो होतो हे आठवत आहे. ट.का. ( उर्फ टवाळ कार्टाही होता.]

In reply to by कंजूस

खटपट्या Mon, 01/12/2026 - 06:11
काका, पुलं चं नाव घेऊन तुम्ही मला लाजवताय, मला आता आठवलं, आपण भेटलो होतो अमित गार्डन मध्ये. पूर्वीचे लोक का सोडून गेले मलाही माहीत नाही. प्रत्येकाची काही कारणे असतील. पण अचानक शुकशुकाट झाला होता / आहे हे खरे आहे. असो.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर Mon, 01/12/2026 - 13:59
( पुलंची उगाचच आठवण झाली.)
+१ मला पण ह्या 'बंडु' वरुन असा मी असामी मधले 'दत्तोबा कदम' आणि 'नानु सरंजामे' आठवले 😀 खटपट्यापंत... मजेदार लेख आवडला आहे 👍

सोत्रि Mon, 01/12/2026 - 08:24
मस्त खुसखुशीत!! - (बंडूसारखा मित्र असलेला) सोकाजी

विवेकपटाईत Mon, 01/12/2026 - 11:41
मस्त लेख. बंडूची पृथ्वी काका सोबत तुलना. साऊथ ब्लॉक मध्ये असताना, एकदा त्यांच्या चेंबर मध्ये सोबत कॉफी घेतली होती. अत्यंत शांत स्वभाव , मधुर वाणी आणि मुद्देसूद बोलणारे. बहुतेक वाढते वय आणि बेरोजगारीचा परिणाम.

सकाळ मध्ये ब्रिटिश नंदी यांचे एक सदर यायचे तसा खुसखुशीत लेख!! आता म्हणे तात्यांचा कोलंबियावरही डोळा आहे. मग ग्रीनलँड वगैरे आहेतच. येउंद्या अजुन.
लेखनविषय:
लेखनप्रकार
एका आळसावलेल्या रविवारी माझा परममित्र बंडू सकाळी ८ वाजता माझ्या दारात येऊन उभा राहिला. मी - काय रे इतक्या सकाळी ? बंडू - झोपा काय काढताय ? जगात काय चालू आहे याचा काही थांगपत्ता नसेलच तुमच्या सारख्या लोकांना ! बंडू नेहमी मला "तुमच्यासारख्या लोकांना" असेच संबोधतो. म्हणजे आमच्यासारख्या लोकांचा (म्हणजे कोणत्या लोकांचा हे त्यालाच माहित) एक समूह आहे. आणि मी आमच्या सारख्या लोकांचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे आमच्या सारख्या लोकांना काही सांगायचे असेल तर हा भल्या सकाळी येऊन माझ्यावर तोंडसुख घेतो. मी - काय झालं जगात? मला कसं माहीत असणार ? बंडू - व्हेनेझुएला माहीत आहे का ? मी - नाही ! बंडू - देश आहे एक.

शहाणपण शोधतो मी...

बाजीगर ·
लेखनविषय:
Intelligence is abundant in the world, I'm searching wiseness...  जगात, बुद्धिमत्ता खूप झालीय,  शहाणपण शोधतो मी | मोठेपणा खूप झालाय,  लहानपण शोधतो मी | तर्क कुठे उगाळावा,  सहाण पण शोधतो मी | माणुसकी ची पाणपोई, तहान पण शोधतो मी | प्रत्येक उत्तर chat gpt ला, विचारणाऱ्या पिढीच्या, छद्मी AI पासून दूर नेणारे, वाहन पण शोधतो मी | शुष्क तार्किक संवादात, मायेचा ओलावा कळेना, जुन्या अडाणी प्रेमाचा, जहाँ पण शोधतो मी | बुद्धिमत्ता खूप झालीय,  शहाणपण शोधतो मी |

सहज सुचले ते...

जयंत कुलकर्णी ·

अगोचर Sun, 01/11/2026 - 21:18
सहज सुचले म्हणता !! पण खूप खोल विचार करायला लावणारे .. संन्यस्त खड्ग वाचले नाहि अजुन .. युट्युब वर सापडले तर बघणार ! पुलेशु !!

अगोचर Sun, 01/11/2026 - 21:18
सहज सुचले म्हणता !! पण खूप खोल विचार करायला लावणारे .. संन्यस्त खड्ग वाचले नाहि अजुन .. युट्युब वर सापडले तर बघणार ! पुलेशु !!
लेखनविषय:
लेखनप्रकार
सहजच जसे सुचले तसे... सुकतातची जगिया.. मृत्यू आणि जीवन यावर आजवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. काही जण मृत्यूला काडीचीही किंमत देत नाहीत त्यामुळे त्यांच्या मते जन्मालाही फारसे महत्त्व उरत नाही. उदा. काफ्का काय म्हणतो ते पहा -"ते कधितरी थांबते" एवढाच आयुष्याचा अर्थ आहे... काफ्का मृत्यूबद्दल फारच अलिप्तपणे विचार करतो आहे असे दिसते. काफ्काच्या सगळ्या कथांमधून आणि कादंबऱ्यांमधून आपल्याला हाच दृष्टीकोन पाहण्यास मिळतो.

दहा मिनिटांत घरपोच.

chetanasvaidya ·

मदनबाण Sun, 01/11/2026 - 11:52
ब्लिंकिट च्या अँब्युलन्स मागण्याच्या अ‍ॅप बद्धल कुठुन तरी मला समजले होते, त्या अ‍ॅप बद्धल मला तितकच समजल होतं आणि ते फक्त त्यासाठीच असावे असा माझा समज झाला आणि नंतर मी त्या बद्धल सर्व काही विसरुन देखील गेलो, पण काही काळाने मला काश चौधरी [ ट्रॅव्हलर व्ह्लॉगर ] च्या एका व्हिडियोतुन मला अ‍ॅप बद्धल परत कळाले! कोरियन टुरिस्टन तो हिंदुस्थानात बोलवतो, त्यांच्या बरोबर आपल्या देशात भटकंती करतो आणि दोन कोरियन पैकी एकावर या अ‍ॅपचा जबरदस्त परिणाम झालेला दिसतो. हे असं हिंदुस्थान घडु शकतं आणि खरचं सामान इतक्या कमी वेळा येऊ देखील शकतं हे पाहुन त्याला चक्क धक्का बसतो. माझ्या लेकीला या बद्धल [ म्हणजे ब्लिंकिट बद्धल माहित होते ] माहित होते, ती माझ्या मागे लागली की, बाबा काही तरी असं तप्तरते मागव! मग यावर विचार करायला लागलो मग माझ्या लक्षात आले की अ‍ॅमेझॉन ची अशीच अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हीस देतो. मी प्रयोग करायचे ठरवले रात्री १० वाजता लेकीला आवडर्‍या अणि तिची इच्छा असलेल्या गोष्टींची ऑर्डर मी दिली १२ व्या मिनिटाला समान घरी आले! आपल्या हिंदूस्थानात इतकी लोकसंख्या झाली आहे की पैसे कमवण्यासाठी लोक काहीही करायला तयार होतात, मनुष्य प्राणी सोडुन इतर सर्व गोष्टींची किंमत आहे. हल्लीच एक व्हिडियो माझ्या पाहण्यात आला होता ज्यात एका व्यक्तीने ट्रेन मधुन ऑर्डर दिली होती आणि ती ऑरडर पूर्ण करण्याच्या प्रयत्नात तो डिलेव्हरी बॉय त्या ट्रेन मधुन उतरण्याच्या नादात प्लॅटफॉम वर पडला ! चालत्या पॅसेंजर ट्रेन मधुन त्याने उडी मारली,कारण लगेच दुसरी डिलेव्हरी त्याला करायची होती. काश चौधरी चे २ व्हिडियो देऊन जातो. : https://www.youtube.com/watch?v=mkbwTVoIaJ8 https://www.youtube.com/watch?v=cLaCIVT1pdc

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Toca Toca... : Fly Project

कांदा लिंबू Sun, 01/11/2026 - 13:43
दहा मिनिटांच्या आत, ताबडतोब वस्तू हातात पाहिजे.. इतकी घाई कसली? किंवा तेवढाही दम धरवत नाही अशी अवस्था का? हा प्रश्न ग्राहकांना विचारलेला आहे असे गृहीत धरून लिहीत आहे. Quick com कंपन्या दहा-पंधरा मिनिटांमध्ये हवी ती उपलब्ध वस्तू घरपोच आणून देत आहेत, त्याची जी काही किंमत त्या कंपन्या मागत आहेत ती ग्राहक देत आहेत‌. हा एक व्यवहार आहे.‌ त्यामध्ये घाई असणे किंवा दम न धरविणे याचा काय संबंध आहे? ग्राहकांनी या सेवा वापरू नयेत असे म्हणणे आहे का?

In reply to by कांदा लिंबू

गवि Sun, 01/11/2026 - 15:11
प्रश्न रोचक आहे. रास्तही आहे. विचार करू जाता असे वाटले की अशी सर्व्हिस उपलब्ध करून देणे आणि ती ग्राहकाने घेणे हा व्यवहार असला तरी अशा प्रकारच्या अतिशय टोकाच्या स्पर्धेतून येणाऱ्या सेवा उपलब्ध करून रूढ करण्याच्या प्रक्रियेत काही काळाने लेखात म्हटली आहे तशी मानसिकता (मनात येईल ते ताबडतोब, आत्ता, दहा मिनिटांत हाती पडलेच पाहिजे) तयार होऊन तीच एक नॉर्म बनू शकते. मग पुढे काय ? पाच मिनिटे ? या सर्व्हिसेस वरवर पाहता एक सोय असली तरी अत्यंत कमी वेळात डिलिव्हरी करण्याच्या नादात ताण वाढणे आणि सुरक्षितता पाळण्याकडे दुर्लक्ष हे सहज होऊ शकतं. नोकरीची आणि उत्पन्नाची गरज असलेले अनेक तरुण तरुणी त्यासाठी तडजोड करून जोखीम घ्यायला तयार होतात किंवा असतात. शिवाय स्पर्धेचे बाय प्रॉडक्ट म्हणून ग्राहकाला झटपट डिलिव्हरी मिळणे ही आज सोय वाटत असली तरी "इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन" ही सवय दीर्घकाळात आणि सार्वत्रिक असणे कितपत योग्य हे बघायला हवं.

In reply to by गवि

कांदा लिंबू Sun, 01/11/2026 - 20:43
"इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन" ही सवय... या संदर्भात एकूण प्रतिसादाच्या आशयाशी सहमत आहेच; पण त्याबद्दल कालाय तस्मै नमः असेच म्हणावे लागेल. तथापि ...अत्यंत कमी वेळात डिलिव्हरी करण्याच्या नादात ताण वाढणे आणि सुरक्षितता पाळण्याकडे दुर्लक्ष हे सहज होऊ शकतं. नोकरीची आणि उत्पन्नाची गरज असलेले अनेक तरुण तरुणी त्यासाठी तडजोड करून जोखीम घ्यायला तयार होतात किंवा असतात. असे घटक सर्वच क्षेत्रांत, सर्वच काळांत असतात, नाही का? माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात, कामाच्या, वेळेच्या ताणामुळे असंख्य अभियंते शारीरिक व मानसिक आरोग्याशी तडजोड करतात. --- Food delivery व Q-com कंपन्या ग्राहकांना जो अपेक्षित वेळ देतात, तो त्या भागातील ट्रॅफिकचा विचार करून अवरेज वेळ दिलेला असतो. तेवढ्या वेळात डिलिव्हरी देण्यासाठी घाई करून जाण्याची गरज नसते.

कांदा लिंबू Sun, 01/11/2026 - 20:30
मी, माझे कुटुंबीय, माझा स्थानिक मित्रपरिवार इ लोक्स् हे e-com, q-com, food delivery, ride-hailing, hyper-local वगैरे सारख्या सेवांचे नियमित उपभोक्ते आहोत. एक ग्राहक म्हणून ह्या आणि अशा इतर सेवांमुळे खूपच सुविधा झाली आहे असा अनुभव आहे. इतर कोणत्याही उद्योगाप्रमाणे याही उद्योग-प्रकारांत बरे-वाईट अनुभव आहेत; पण एक सेवाक्षेत्र म्हणून ग्राहकांच्या वेळेच्या व पैशाच्या दृष्टीने या उद्योगांचा उदय व वाढ चांगलीच म्हणावी लागेल. ‌ यातल्या बव्हंशी सेवांसाठी delivery partners ना स्वतःची दुचाकी व स्मार्टफोन एवढ्या भांडवलावर महिना वीस-पंचवीस हजार रुपये किंवा अधिक उत्पन्न मिळते. दहा-पंधरा हजार रुपयापर्यंतचा स्मार्टफोन, व एक-दीड लाख रुपयापर्यंतची दुचाकी हे दोन्ही कर्जावर मिळतात. ‌व्यवस्थित, प्रामाणिक काम करणाऱ्याला तीन वर्षांमध्ये कर्जाचे हप्ते फेडून महिना किमान दहा-पंधरा हजार रुपये कमाई होते. या पार्श्वभूमीवर, सदर धाग्याच्या आशयाने विचार करुन, तसेच वरील अनेक प्रतिसादांचा विचार करून, delivery partners ची सुरक्षितता या दृष्टीने, या सेवांचे ग्राहक (किंवा मिसळपावचे वाचक) या भूमिकेतून काय action items अपेक्षित आहे?

In reply to by कांदा लिंबू

निनाद Mon, 01/12/2026 - 05:17
मला हे हवे आहे असे वाटते: १. वेळेचा अवास्तव दबाव टाळता येण्याची सुविधा - म्हणजे मला वस्तू हवी आहे पण दहा मिनिटा ऐवजी दोन तासात आली तरी चालेल हे सांगण्याची सुविधा हवी. २. जर एखाद्या वेळी डिलिव्हरीला ५-१० मिनिटे उशीर होत असेल तर, डिलिव्हरी पार्टनर्सना "काही हरकत नाही, सुरक्षित या" असा निरोप देण्यासाठी वन क्लिक बटन वर अ‍ॅपमध्ये येणे. (एक मेसेज त्यांचा मानसिक ताण कमी करू शकतो.) ३. मी कंपनी म्हणून डिलिव्हरी पार्टनर्सना लिफ्ट वापरू द्यावी यासाठी सोसायटी कमिटीकडे पाठपुरावा करेन. त्या सोसायटी अधिक चांगली प्रायोरिटी वगैरे मिळेल असे ही पाहता येईल. पायऱ्या चढून होणारा थकवा शारीरिक आरोग्यावर आणि एकाग्रतेवर परिणाम करतो असे वाटते. ४. सुरक्षिततेला महत्त्व देण्याची सुविधा म्हणजे जर एखादा रायडर हेल्मेट घालून आला असेल आणि ट्रॅफिकचे नियम पाळून आला असेल, तर त्याला रेटिंगमध्ये दाद देता आली पहिजे. छोटी टीप देणे शक्य व्हावे. ५. अ‍ॅप ने मला सांगितले पाहिजे की रात्री उशिरा किंवा खराब हवामानात असून मुसळधार पाऊस आहे. तेंव्हा ऑर्डर करणे टाळणे किंवा ऑर्डर केल्यास त्यांना 'सुरक्षित या' असा मेसेज करता आला पहिजे - त्यासाठी अ‍ॅप ने हवामान पाहून मला तसे सुचवले पाहिजे. ६. पर ट्रिप रायडर इंशुरंस मला पे करण्याची सुविधा असली पहिजे. म्हणजे माझ्यासाठी काम करणार्‍या माणसाची सुरक्षितता मी पाळतो आहे - आणि मला ते करणे शक्य आहे - याचा चांगला संदेश जाऊ शकतो. जे लोक असा इंशुरंस प्रिमियम देणार आहेत त्यांना वेगळ्या सुविधा देता येतील. तातडीच्या परिस्थितीत मदत म्हणजे अपघातात मदत म्हणून हे फार महत्त्वाचे आहे! (पर ट्रिप रायडर इंशुरंस पे करण्याची सुविधा ही सद्य काळात मायक्रो इंशुरंस विकण्याची एक उत्तम व्यवसाय कल्पना + संधी आहे असे वाटते!) इतरः डिलिवरी झाल्यावर रायडर एक 'थँक्यू' किंवा 'सांभाळून जा' असा शब्द अ‍ॅपवर टाकता आला पाहिजे. सोसायटीमध्ये डिलिव्हरी पार्टनर्ससाठी Safe Delivery Zone किंवा किमान पाणी पिण्याची सोय असली पहिजे.

रीडर Sun, 01/11/2026 - 22:11
गरजेच्या वेळेला या सेवा खूप उपयोगी पडतात पण तेच गरज नसताना सतत वापरल्यास बरेच पैसे जास्तीचे खर्च होतात. ॲप वर उपलब्ध असतील त्याच पर्यायांमधून वस्तू घ्याव्या लागतात आणि बरेचदा ब्रँडेड मोठे पॅक्स घ्यावे लागतात.. अधिक डिलिवरी फी, marketplace फी असे करत नेहमीच्या ग्रोसरी शॉपिंग पेक्षा बरेच पैसे जास्ती खर्च होतात

मदनबाण Sun, 01/11/2026 - 11:52
ब्लिंकिट च्या अँब्युलन्स मागण्याच्या अ‍ॅप बद्धल कुठुन तरी मला समजले होते, त्या अ‍ॅप बद्धल मला तितकच समजल होतं आणि ते फक्त त्यासाठीच असावे असा माझा समज झाला आणि नंतर मी त्या बद्धल सर्व काही विसरुन देखील गेलो, पण काही काळाने मला काश चौधरी [ ट्रॅव्हलर व्ह्लॉगर ] च्या एका व्हिडियोतुन मला अ‍ॅप बद्धल परत कळाले! कोरियन टुरिस्टन तो हिंदुस्थानात बोलवतो, त्यांच्या बरोबर आपल्या देशात भटकंती करतो आणि दोन कोरियन पैकी एकावर या अ‍ॅपचा जबरदस्त परिणाम झालेला दिसतो. हे असं हिंदुस्थान घडु शकतं आणि खरचं सामान इतक्या कमी वेळा येऊ देखील शकतं हे पाहुन त्याला चक्क धक्का बसतो. माझ्या लेकीला या बद्धल [ म्हणजे ब्लिंकिट बद्धल माहित होते ] माहित होते, ती माझ्या मागे लागली की, बाबा काही तरी असं तप्तरते मागव! मग यावर विचार करायला लागलो मग माझ्या लक्षात आले की अ‍ॅमेझॉन ची अशीच अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हीस देतो. मी प्रयोग करायचे ठरवले रात्री १० वाजता लेकीला आवडर्‍या अणि तिची इच्छा असलेल्या गोष्टींची ऑर्डर मी दिली १२ व्या मिनिटाला समान घरी आले! आपल्या हिंदूस्थानात इतकी लोकसंख्या झाली आहे की पैसे कमवण्यासाठी लोक काहीही करायला तयार होतात, मनुष्य प्राणी सोडुन इतर सर्व गोष्टींची किंमत आहे. हल्लीच एक व्हिडियो माझ्या पाहण्यात आला होता ज्यात एका व्यक्तीने ट्रेन मधुन ऑर्डर दिली होती आणि ती ऑरडर पूर्ण करण्याच्या प्रयत्नात तो डिलेव्हरी बॉय त्या ट्रेन मधुन उतरण्याच्या नादात प्लॅटफॉम वर पडला ! चालत्या पॅसेंजर ट्रेन मधुन त्याने उडी मारली,कारण लगेच दुसरी डिलेव्हरी त्याला करायची होती. काश चौधरी चे २ व्हिडियो देऊन जातो. : https://www.youtube.com/watch?v=mkbwTVoIaJ8 https://www.youtube.com/watch?v=cLaCIVT1pdc

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Toca Toca... : Fly Project

कांदा लिंबू Sun, 01/11/2026 - 13:43
दहा मिनिटांच्या आत, ताबडतोब वस्तू हातात पाहिजे.. इतकी घाई कसली? किंवा तेवढाही दम धरवत नाही अशी अवस्था का? हा प्रश्न ग्राहकांना विचारलेला आहे असे गृहीत धरून लिहीत आहे. Quick com कंपन्या दहा-पंधरा मिनिटांमध्ये हवी ती उपलब्ध वस्तू घरपोच आणून देत आहेत, त्याची जी काही किंमत त्या कंपन्या मागत आहेत ती ग्राहक देत आहेत‌. हा एक व्यवहार आहे.‌ त्यामध्ये घाई असणे किंवा दम न धरविणे याचा काय संबंध आहे? ग्राहकांनी या सेवा वापरू नयेत असे म्हणणे आहे का?

In reply to by कांदा लिंबू

गवि Sun, 01/11/2026 - 15:11
प्रश्न रोचक आहे. रास्तही आहे. विचार करू जाता असे वाटले की अशी सर्व्हिस उपलब्ध करून देणे आणि ती ग्राहकाने घेणे हा व्यवहार असला तरी अशा प्रकारच्या अतिशय टोकाच्या स्पर्धेतून येणाऱ्या सेवा उपलब्ध करून रूढ करण्याच्या प्रक्रियेत काही काळाने लेखात म्हटली आहे तशी मानसिकता (मनात येईल ते ताबडतोब, आत्ता, दहा मिनिटांत हाती पडलेच पाहिजे) तयार होऊन तीच एक नॉर्म बनू शकते. मग पुढे काय ? पाच मिनिटे ? या सर्व्हिसेस वरवर पाहता एक सोय असली तरी अत्यंत कमी वेळात डिलिव्हरी करण्याच्या नादात ताण वाढणे आणि सुरक्षितता पाळण्याकडे दुर्लक्ष हे सहज होऊ शकतं. नोकरीची आणि उत्पन्नाची गरज असलेले अनेक तरुण तरुणी त्यासाठी तडजोड करून जोखीम घ्यायला तयार होतात किंवा असतात. शिवाय स्पर्धेचे बाय प्रॉडक्ट म्हणून ग्राहकाला झटपट डिलिव्हरी मिळणे ही आज सोय वाटत असली तरी "इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन" ही सवय दीर्घकाळात आणि सार्वत्रिक असणे कितपत योग्य हे बघायला हवं.

In reply to by गवि

कांदा लिंबू Sun, 01/11/2026 - 20:43
"इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन" ही सवय... या संदर्भात एकूण प्रतिसादाच्या आशयाशी सहमत आहेच; पण त्याबद्दल कालाय तस्मै नमः असेच म्हणावे लागेल. तथापि ...अत्यंत कमी वेळात डिलिव्हरी करण्याच्या नादात ताण वाढणे आणि सुरक्षितता पाळण्याकडे दुर्लक्ष हे सहज होऊ शकतं. नोकरीची आणि उत्पन्नाची गरज असलेले अनेक तरुण तरुणी त्यासाठी तडजोड करून जोखीम घ्यायला तयार होतात किंवा असतात. असे घटक सर्वच क्षेत्रांत, सर्वच काळांत असतात, नाही का? माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात, कामाच्या, वेळेच्या ताणामुळे असंख्य अभियंते शारीरिक व मानसिक आरोग्याशी तडजोड करतात. --- Food delivery व Q-com कंपन्या ग्राहकांना जो अपेक्षित वेळ देतात, तो त्या भागातील ट्रॅफिकचा विचार करून अवरेज वेळ दिलेला असतो. तेवढ्या वेळात डिलिव्हरी देण्यासाठी घाई करून जाण्याची गरज नसते.

कांदा लिंबू Sun, 01/11/2026 - 20:30
मी, माझे कुटुंबीय, माझा स्थानिक मित्रपरिवार इ लोक्स् हे e-com, q-com, food delivery, ride-hailing, hyper-local वगैरे सारख्या सेवांचे नियमित उपभोक्ते आहोत. एक ग्राहक म्हणून ह्या आणि अशा इतर सेवांमुळे खूपच सुविधा झाली आहे असा अनुभव आहे. इतर कोणत्याही उद्योगाप्रमाणे याही उद्योग-प्रकारांत बरे-वाईट अनुभव आहेत; पण एक सेवाक्षेत्र म्हणून ग्राहकांच्या वेळेच्या व पैशाच्या दृष्टीने या उद्योगांचा उदय व वाढ चांगलीच म्हणावी लागेल. ‌ यातल्या बव्हंशी सेवांसाठी delivery partners ना स्वतःची दुचाकी व स्मार्टफोन एवढ्या भांडवलावर महिना वीस-पंचवीस हजार रुपये किंवा अधिक उत्पन्न मिळते. दहा-पंधरा हजार रुपयापर्यंतचा स्मार्टफोन, व एक-दीड लाख रुपयापर्यंतची दुचाकी हे दोन्ही कर्जावर मिळतात. ‌व्यवस्थित, प्रामाणिक काम करणाऱ्याला तीन वर्षांमध्ये कर्जाचे हप्ते फेडून महिना किमान दहा-पंधरा हजार रुपये कमाई होते. या पार्श्वभूमीवर, सदर धाग्याच्या आशयाने विचार करुन, तसेच वरील अनेक प्रतिसादांचा विचार करून, delivery partners ची सुरक्षितता या दृष्टीने, या सेवांचे ग्राहक (किंवा मिसळपावचे वाचक) या भूमिकेतून काय action items अपेक्षित आहे?

In reply to by कांदा लिंबू

निनाद Mon, 01/12/2026 - 05:17
मला हे हवे आहे असे वाटते: १. वेळेचा अवास्तव दबाव टाळता येण्याची सुविधा - म्हणजे मला वस्तू हवी आहे पण दहा मिनिटा ऐवजी दोन तासात आली तरी चालेल हे सांगण्याची सुविधा हवी. २. जर एखाद्या वेळी डिलिव्हरीला ५-१० मिनिटे उशीर होत असेल तर, डिलिव्हरी पार्टनर्सना "काही हरकत नाही, सुरक्षित या" असा निरोप देण्यासाठी वन क्लिक बटन वर अ‍ॅपमध्ये येणे. (एक मेसेज त्यांचा मानसिक ताण कमी करू शकतो.) ३. मी कंपनी म्हणून डिलिव्हरी पार्टनर्सना लिफ्ट वापरू द्यावी यासाठी सोसायटी कमिटीकडे पाठपुरावा करेन. त्या सोसायटी अधिक चांगली प्रायोरिटी वगैरे मिळेल असे ही पाहता येईल. पायऱ्या चढून होणारा थकवा शारीरिक आरोग्यावर आणि एकाग्रतेवर परिणाम करतो असे वाटते. ४. सुरक्षिततेला महत्त्व देण्याची सुविधा म्हणजे जर एखादा रायडर हेल्मेट घालून आला असेल आणि ट्रॅफिकचे नियम पाळून आला असेल, तर त्याला रेटिंगमध्ये दाद देता आली पहिजे. छोटी टीप देणे शक्य व्हावे. ५. अ‍ॅप ने मला सांगितले पाहिजे की रात्री उशिरा किंवा खराब हवामानात असून मुसळधार पाऊस आहे. तेंव्हा ऑर्डर करणे टाळणे किंवा ऑर्डर केल्यास त्यांना 'सुरक्षित या' असा मेसेज करता आला पहिजे - त्यासाठी अ‍ॅप ने हवामान पाहून मला तसे सुचवले पाहिजे. ६. पर ट्रिप रायडर इंशुरंस मला पे करण्याची सुविधा असली पहिजे. म्हणजे माझ्यासाठी काम करणार्‍या माणसाची सुरक्षितता मी पाळतो आहे - आणि मला ते करणे शक्य आहे - याचा चांगला संदेश जाऊ शकतो. जे लोक असा इंशुरंस प्रिमियम देणार आहेत त्यांना वेगळ्या सुविधा देता येतील. तातडीच्या परिस्थितीत मदत म्हणजे अपघातात मदत म्हणून हे फार महत्त्वाचे आहे! (पर ट्रिप रायडर इंशुरंस पे करण्याची सुविधा ही सद्य काळात मायक्रो इंशुरंस विकण्याची एक उत्तम व्यवसाय कल्पना + संधी आहे असे वाटते!) इतरः डिलिवरी झाल्यावर रायडर एक 'थँक्यू' किंवा 'सांभाळून जा' असा शब्द अ‍ॅपवर टाकता आला पाहिजे. सोसायटीमध्ये डिलिव्हरी पार्टनर्ससाठी Safe Delivery Zone किंवा किमान पाणी पिण्याची सोय असली पहिजे.

रीडर Sun, 01/11/2026 - 22:11
गरजेच्या वेळेला या सेवा खूप उपयोगी पडतात पण तेच गरज नसताना सतत वापरल्यास बरेच पैसे जास्तीचे खर्च होतात. ॲप वर उपलब्ध असतील त्याच पर्यायांमधून वस्तू घ्याव्या लागतात आणि बरेचदा ब्रँडेड मोठे पॅक्स घ्यावे लागतात.. अधिक डिलिवरी फी, marketplace फी असे करत नेहमीच्या ग्रोसरी शॉपिंग पेक्षा बरेच पैसे जास्ती खर्च होतात
लेखनप्रकार
ब्लिंकिट, इन्स्टामार्ट, झेप्टो आणि असे अन्यही खूप क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आता एकमेकांशी स्पर्धा करत दहा मिनिटांच्या डिलिव्हरी शर्यतीत उतरले आहेत. हे डिलिव्हरी करणारे लोक प्रचंड ताणाखाली वेगाने वाहने चालवतात हे आपल्याला रस्त्यात दिसतंच.